<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml-stylesheet type="text/xsl" media="screen" href="/~d/styles/rss2full.xsl"?><?xml-stylesheet type="text/css" media="screen" href="http://feeds.feedburner.com/~d/styles/itemcontent.css"?><rss xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/" xmlns:georss="http://www.georss.org/georss" xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0" version="2.0"><channel><atom:id>tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357</atom:id><lastBuildDate>Wed, 04 Nov 2009 03:29:48 +0000</lastBuildDate><title>Batmidar</title><description>its all about breakers of the news!</description><link>http://batmidar.blogspot.com/</link><managingEditor>noreply@blogger.com (.)</managingEditor><generator>Blogger</generator><openSearch:totalResults>136</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="self" href="http://feeds.feedburner.com/Batmidar" type="application/rss+xml" /><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="hub" href="http://pubsubhubbub.appspot.com" /><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-6554021257950234681</guid><pubDate>Fri, 30 Oct 2009 21:35:00 +0000</pubDate><atom:updated>2009-10-31T03:11:18.768+05:30</atom:updated><title>गोचीचे पॅकेज, पॅकेजची गोची!</title><description>महामहिम पत्रकार गोविंदराव तळवलकर यांनी प्याकेज पत्रकारितेच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याचे वृत्त प्रहारपत्री वाचल्यानंतर आम्हांस अन्न गोड लागेनासे झाले आहे. आमच्या हृदयाचे ठोके जलद पडत आहेत. सारखी स्वच्छतागृहास जाण्याची भावना होत आहे. (या भावनेचा आणि सकाळच्या स्वच्छतामोहिमेचा काडीमात्र संबंध नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच सकाळची स्वच्छतामोहिम ही पत्रकारिता वा पत्रकार यासंबंधीची नाही, याचीही वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) &lt;br /&gt;स्पष्टच सांगावयाचे, तर आम्ही प्रचंड भ्यालो आहोत!&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या एकूणच वातावरण भयाच्या फ्ल्यूने भारलेले आहे.&lt;br /&gt;आधीच नोकरी जाण्याचे भय. &lt;br /&gt;ती टिकली, तर वेतनकपातीचे भय. &lt;br /&gt;वेतनकपात नच झाल्यास, कामाचा बोजा वाढण्याचे भय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यात आता गोविंदरावांनी ही नवी भोकाडी आम्हां पामरांसमोर आणून ठेवली!&lt;br /&gt;तुम्हांस सांगतो, हल्ली बातमी लिहिताना सीबीआय, धाड, सक्तमजुरी, घोटाळा, काळा पैसा असे शब्द आले, तरी आम्हांस दचकायला होते.&lt;br /&gt;वाटते, उद्या आमच्याबद्दल तर अशी बातमी येणार नाही ना!&lt;br /&gt;मन फार वढाय वढाय असते हो! &lt;br /&gt;शुभ बोल म्हटले, तर मांडवाला आग लागली म्हणते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमची ही अशी सैरभैर अवस्था आमच्या हिच्यापासून लपली नाही. &lt;br /&gt;कशी लपणार?&lt;br /&gt;सकाळी कचेरीत जाताना आम्ही रामरक्षा म्हणत होतो, हे तिने बरोबर हेरले होते.&lt;br /&gt;बुशशर्टाच्या डाव्या खिशात आम्ही हल्ली स्वामी समर्थांचे छायाचित्र ठेवतो, हेही तिच्या ध्यानी आले होते. &lt;br /&gt;एरवी आम्ही निखळ पुरोगामी. त्यामुळे तिच्या बरोबर लक्षात आले, की ह्यांचे काही तरी बिघडले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिने लगेच विचारले, पोट बिघडलेय काय हो?&lt;br /&gt;तिच्या स्वरातील ती काळजी व चिंता पाहून आम्हांस गहिवरूनच आले. &lt;br /&gt;डोळ्यांच्या कडा पुसत आम्ही म्हटले, गोविंदरावांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीय.&lt;br /&gt;तिने लगेच विचारले, कोण हे गोविंदराव? त्यांचे पत्रकारितेत काय योगदान आहे?&lt;br /&gt;आमची ही रा. रा. मिखिल वागळेंची फॅन आहे. पूर्वी महानगर वाचायची.&lt;br /&gt;तिला म्हटले, ते ज्येष्ठ संपादक व विचारवंत आहेत.&lt;br /&gt;ती म्हणाली, मग काही हरकत नाही. तुम्ही काही घाबरू नका.&lt;br /&gt;म्हटले, का बरे? संपादकाचा दरारा असण्याचे दिवस कधीच संपलेत! पण अगदीच घाबरू नका म्हणजे काय?&lt;br /&gt;ती म्हणाली, संपादक आहेत ना ते. मग असे किती दिवस राहतील तुमच्या पेपरात? सकाळचं पाहताय ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;लक्षात आले, की तिचा भलामोठा गैरसमज झालेला आहे. तो आम्ही दूर केला. &lt;br /&gt;म्हटले, सखये, ते आता कोणत्याही पत्राचे संपादक नाहीत. ते निवृत्त असून, दूर सातासमुद्रापार असतात व अमेरिकेवर लिहितात. त्यांनी पॅकेज पत्रकारितेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे ऐकल्यावर मात्र तीही विचारात पडली. &lt;br /&gt;मग म्हणाली, तुम्हीपण ना बावळटच आहात!&lt;br /&gt;त्यावर आम्ही तिला बाणेदारपणे प्रत्युत्तर देणार होतो. केवळ पद व खुर्ची असल्याने वरिष्ठ अशी विशेषणे आम्हांस लावतात व त्यांच्याकडे केवळ पद व खुर्ची असल्याने आम्ही ती ऐकूनही घेतो. परंतु हे बायको, आम्ही तुझ्याकडून असे अपशब्द ऐकून घेणार नाही. ही काही संपादकीय बैठक वा कॉन्फरन्स नाही, असे आम्ही म्हणणार होतो. परंतु उपसंपादकीय बाण्यानुसार ऐनवेळी आमची शेपटी पायांमध्ये गेली.&lt;br /&gt;ती बोलतच होती, तुम्हांला ना साधी गोष्टसुद्धा समजत नाही. त्यांनी पॅकेज पत्रकारितेच्या चौकशीची मागणी केलीय ना? पाकिट पत्रकारितेच्या नाही ना? मग तुम्ही का घाबरताय? तुम्ही तर साधे पाकिटवाले. दोन पेगात बातमी देणारे. आणि मला सांगा, पॅकेज कोण घेत होतं?&lt;br /&gt;म्हटले, म्यानेजमेन्ट!&lt;br /&gt;ती म्हणाली, मेन्टलासारखे बोलू नका हो! म्यानेजमेन्ट म्हणजे कोण असतं शेवटी? मालकच ना! तेव्हा घाबरायचे असेल, तर मालकांनी घाबरावे! &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते धीराचे बोल ऐकून आमच्या प्राणात प्राण आले. &lt;br /&gt;पण मग एक शंका आली, मालक कशाला घाबरतील? त्यांनी ज्यांची पॅकेजे घेतली, त्यातील काही तर सत्ताधारी. सीबीआय चौकशी लावायची म्हटले, तरी लावणार कोण?... आणि आपण आपले उगाचच घाबरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण मग आणखी एक शंका मनात आली, की &lt;br /&gt;मालकाने पॅकेज घेतले, तरी त्या बातम्या लिहिल्या त्या आपणच की. त्या पुरवण्या लावल्या त्या आपणच की. शेवटी आपला पगार होतो तो त्यातून निर्माण झालेल्या काळ्या पैशातूनच. तेव्हा त्या पापात तर आपणही सामील आहोत. आपण वाल्या कोळ्याच्या सौभाग्यवती व सुपुत्रांसारखे वागून कसे चालेल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण मग आणखी एक शंका मनात आली, की&lt;br /&gt;मग गृहकर्जाचे हप्ते कसे फेडायचे?&lt;br /&gt;मग मुलाचे शिक्षण कसे करायचे?&lt;br /&gt;मग पत्नीस मल्टिप्लेक्सी कसे न्यायचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याकरीता नोकरी हवी.&lt;br /&gt;पगाराचे चांगले प्याकेज हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्रकारू म्हणतात हे प्याकेज हवे, &lt;br /&gt;तेव्हा मालक म्हणतात, मग ते प्याकेज हवे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भलीमोठी गोचीच की ही!&lt;br /&gt;गोविंदराव, आमच्या या गोचीची चौकशी कोण करणार हो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, ३० ऑक्टो. २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-6554021257950234681?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/K84QTBXE9Bc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/K84QTBXE9Bc/blog-post_31.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">5</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/10/blog-post_31.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-1121435157249245635</guid><pubDate>Wed, 21 Oct 2009 19:48:00 +0000</pubDate><atom:updated>2009-10-22T01:29:00.547+05:30</atom:updated><title>पत्रकार हसताहेत...</title><description>पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;खोखो हसताहेत, खिखीखिखी हसताहेत, ढसाढसा हसताहेत.&lt;br /&gt;काही गालातल्या गालात, ओठ दुमडून, &lt;br /&gt;तोंडावर रुमाल धरून हसताहेत.&lt;br /&gt;पण पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोरिबंदरच्या फलाटावर गाडी पकडताना हसताहेत&lt;br /&gt;सानपाड्याला हायवेवर बस धरताना हसताहेत&lt;br /&gt;बेलापूरला कुंपणावरून उड्या मारताना हसताहेत&lt;br /&gt;पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेजबोर्डावरचे हसताहेत, कंत्राटावरचे हसताहेत,&lt;br /&gt;पाचशेच्या व्हाऊचरवरचेसुद्धा दात कोरून हसताहेत.&lt;br /&gt;उपसंपादक पानांच्या शिरा काढताना हसताहेत,&lt;br /&gt;बातमीदार बातम्यांच्या पाट्या टाकताना हसताहेत,&lt;br /&gt;काही पत्रकार तर कसले कसले सर्व्हेचे फॉर्म भरतानाही हसताहेत.&lt;br /&gt;पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मालक चिंताग्रस्त झालेत.&lt;br /&gt;शाखाशाखांच्या व्यवस्थापकांना फोन करताहेत,&lt;br /&gt;काढून टाकायच्या लोकांची यादी करणे तूर्तास थांबवा व जाऊन पाहा,&lt;br /&gt;पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपादक काळजीने बैठका घेताहेत.&lt;br /&gt;एक जाणते संपादक,&lt;br /&gt;परिस्थिती गंभीर असून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,&lt;br /&gt;असे म्हणताहेत.&lt;br /&gt;दुसरे विचारवंत संपादक खुर्चीचा हात घट्ट धरून,&lt;br /&gt;ही लोकशाहीची गंभीर थट्टा असून, कामे कमी असल्यानेच पत्रकार हसत आहेत. &lt;br /&gt;म्हणून त्यांच्या तीन फुल्यांमध्ये बांबू घातला पाहिजे, &lt;br /&gt;असा लोकशाहीवादी विचार आपल्या डायरीत लिहित आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नेत्यांचे पीए त्यांच्या कानात सांगताहेत,&lt;br /&gt;कार्यकर्ते आपापसात उगाचच कुजबुजताहेत,&lt;br /&gt;फावले लोक फावल्या वेळात बातम्या चघळताहेत,&lt;br /&gt;की पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वृत्तवाहिन्यांवर विश्लेषणे सुरु झालीत.&lt;br /&gt;अँकर कोकलताहेत, &lt;br /&gt;सूत्रसंचालक तीस सेकंदात बोला असे तज्ञांना सांगताहेत,&lt;br /&gt;एकच क्लिप पुनःपुन्हा दाखवताहेत,&lt;br /&gt;की पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणी म्हणतेय, दिवाळीच्या गिफ्टा मिळाल्याने पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;कुणी म्हणतेय, बोनस मिळाल्याने हसताहेत.&lt;br /&gt;कुणी म्हणतेय, अद्याप नोकरी टिकल्याने हसताहेत.&lt;br /&gt;कुणी म्हणतेय, पॅकेज पत्रकारिता पाहून हसताहेत.&lt;br /&gt;कुणी म्हणतेय, पॅकेज पत्रकारितेवरील टीका वाचून हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेमके निदान कोणालाच करता येत नाहीये, &lt;br /&gt;पण अफवा अशीही आहे, की&lt;br /&gt;स्वतःचाच चेहरा पाहून पत्रकार हसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काहीही असो,&lt;br /&gt;पत्रकार स्वतःला हसताहेत&lt;br /&gt;म्हटल्यावर&lt;br /&gt;सगळे आरसे फोडलेच पाहिजेत...&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वतःशी प्रामाणिक राहणे, म्हणजे भलतेच की विनोदी!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २२ ऑक्टो. २००९)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;वाचा - &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=16935:2009-10-20-12-59-41&amp;catid=29:2009-07-09-02-02-07&amp;Itemid=7"&gt;तीन कोटींचा तमाशा &lt;/a&gt;: अग्रलेख, लोकसत्ता (२१ ऑक्टो.)&lt;br /&gt;&lt;a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=16932:2009-10-20-12-58-47&amp;catid=32:2009-07-09-02-02-48&amp;Itemid=10"&gt;त्यांनी सूर्यदेखील बाजारात आणला..!&lt;/a&gt; - अजित अभ्यंकर , संजय दाभाडे, लोकसत्ता, २१ ऑक्टो.&lt;br /&gt;&lt;a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=16931:2009-10-20-12-58-06&amp;catid=32:2009-07-09-02-02-48&amp;Itemid=10"&gt;चौथा स्तंभ विकला गेला आहे&lt;/a&gt; - अंकुश काकडे, लोकसत्ता, २१ ऑक्टो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-1121435157249245635?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/9VDawsSENKc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/9VDawsSENKc/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">2</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/10/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-6026237688066934275</guid><pubDate>Fri, 25 Sep 2009 19:05:00 +0000</pubDate><atom:updated>2009-09-26T00:37:31.673+05:30</atom:updated><title>स्पेशल सप्लिमेन्ट</title><description>दादा, हे संपादक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कार्यकर्ता म्हणाला. दादा दूरध्वनीवर बोलत होते. त्यांनी संपादकांना हातानेच समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. संपादक बसले. दादांचा दूरध्वनी सुरुच होता. टेबलवर पडलेले प्रचाराचे पत्रक हाती घेऊन संपादक ते चाळू लागले.&lt;br /&gt;जरा वेळाने दूरध्वनी खाली ठेवत दादांनी संपादकांना नमस्कार केला.&lt;br /&gt;संपादकांनीही केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग दादा म्हणाले, बोला.&lt;br /&gt;संपादक म्हणाले, विशेष काही नाही. तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात. म्हटलं, जाऊन भेटू या.&lt;br /&gt;दादा म्हणाले, तुम्ही आलात ते चांगलं केलं... पण आपली मदत पाहिजे बरं का या वेळेला.&lt;br /&gt;संपादक म्हणाले, ती तर आहेच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मग संपादक राजकीय सद्यस्थितीवर बरेच बोलले. &lt;br /&gt;ढासळती नीतीमूल्ये, समाजहितैषू वृत्तीचा लोप, सौदेबाज राजकारणी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, प्रसारमाध्यमांची ढासळती विश्वासार्हता यावरही ते बरेच बोलले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग म्हणाले, तुमच्या बातम्या-फोटो व्यवस्थित छापतोय आम्ही.&lt;br /&gt;दादांनी आपल्या कार्यकर्त्याकडे पाहिले. तो म्हणाला, चांगलं कव्हरेज देतात हे आपल्याला.&lt;br /&gt;दादा प्रसन्नसे हसले.&lt;br /&gt;मग त्यांनी विचारले, कोणता पेपर म्हणालात तुमचा?&lt;br /&gt;कार्यकर्ता म्हणाला, दादा, मोठा पेपर आहे त्यांचा. भरपूर खपतो. &lt;br /&gt;दादा म्हणाले, खप चांगला आहे म्हणता तुमचा. पण त्यातला खरा किती आणि स्किमचा किती? &lt;br /&gt;संपादक म्हणाले, राज्यातला नंबर एकचा विश्वासार्ह आणि निःपक्षपाती पेपर आहे आमचा.&lt;br /&gt;निःपक्षपाती असेल, तर मग आमच्या काय हो उपयोगाचा?&lt;br /&gt;दादांनी ज्योक केला. संपादक कसनुसे हसले. ते पाहून दादाही समजून हसले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपादक म्हणाले, या निवडणुकीत आम्ही एक स्कीम आखलीय. आम्ही तुमच्या बातम्या, लेख, फोटो हे सगळं छापणार.&lt;br /&gt;दादा म्हणाले, वा वा. छापा की. काय पाहिजे ते मटेरियल आम्ही देऊ.&lt;br /&gt;संपादक म्हणाले, नाही. मटेरियलचा प्रश्न नाही. त्यासाठी आमचे बातमीदार आहेतच.&lt;br /&gt;दादा म्हणाले, तुमचा कोण तो बातमीदार. परवाच भेटून गेला. म्हटला, मुलाखत छापतो. दोन हजार अंक घ्यावे लागतील.&lt;br /&gt;संपादक म्हणाले, तेच सांगतोय मी. आम्ही एक स्कीम आखलीय. म्हणजे तुमची नुसती मुलाखत नाही छापायची. तुमच्याबद्दलचे लेख छापायचे. फोटो छापायचे. तुमचा गुणगौरव करणा-या कविता, मान्यवरांच्या मुलाखती.. अशी एक पुरवणीच काढायची.&lt;br /&gt;दादा म्हणाले, पण त्याचा काय उपयोग. ह्ल्ली लोक खूप हुशार झालेत. त्यांना बरोबर माहित असतं, की हे सगळं पैसे देऊन छापलेलं असतं.&lt;br /&gt;संपादक म्हणाले, तेच तर सांगतोय मी. आमचा पेपर हा अत्यंत विश्वासार्ह आणि निःपक्षपाती असल्यामुळे लोकांना ती शंकाच येणार नाही. त्यांना वाटेल, आम्हीच स्वतःहून छापलंय ते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दादा म्हणाले, पण याचा रेट काय?&lt;br /&gt;संपादकांना रेट म्हणताच लाजल्यासारखे वाटले. पण ते लाजले नाहीत.&lt;br /&gt;ते म्हणाले, आता तुमच्याशी काय बोलायचं साहेब. तुम्हीच द्या समजून झालं.&lt;br /&gt;दादा म्हणाले, नाही नाही. तसं नको. तुम्ही भाव सांगा.&lt;br /&gt;संपादक म्हणाले, आता तुमच्याशी काय भाव करायचा साहेब. पण शेवटी आम्हांलाही मालक आहे. एवढी मोठी संस्था आमची. एवढं जुनं साम्राज्य. त्यात आता पसाराही वाढवून ठेवलाय. हे सर्व चालवायचं म्हणजे पैसे पाहिजेतच ना.... पाच लाखांची पुरवणी छापू तुमची.&lt;br /&gt;दादा म्हणाले, पाच म्हणजे खूपच जास्त होतात. तुमचा तो दुसरा पेपर... काय नाव त्याचं.... तो लाखभरात चार पानं छापतो म्हणाला.&lt;br /&gt;संपादक एकदम सावध झाले. &lt;br /&gt;ते म्हणाले, हॅ. तो काय पेपर आहे? तो काय विश्वासार्ह आहे का निःपक्ष?... चला, चारमध्ये करून टाकू या.&lt;br /&gt;दादांनी कार्यकर्त्याकडे पाहिले. कार्यकर्त्याने संपादकांकडे पाहिले. संपादकांनी दादांकडे पाहिले.&lt;br /&gt;मग बराच काळ त्यांची घासाघीस सुरु राहिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सौदा कितीवर झाला ते काही समजले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समजले एवढेच, &lt;br /&gt;की येत्या एक-दोन दिवसांत दादांची स्पेशल सप्लिमेन्ट विश्वासार्ह व निःपक्ष पेपरबरोबर येणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by चांगदेव पाटील, २६ सप्टें. २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-6026237688066934275?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/6qyK4X_FZBo" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/6qyK4X_FZBo/blog-post_26.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">11</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/09/blog-post_26.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-1595312758808398171</guid><pubDate>Thu, 03 Sep 2009 15:47:00 +0000</pubDate><atom:updated>2009-09-04T21:07:58.263+05:30</atom:updated><title>रा. रा. बापू यांचे वाचकांप्रती निवेदन</title><description>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/SqE0Oa3xOtI/AAAAAAAAArw/SyJ5GbYb-c4/s1600-h/navat-kay-ahe-1.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 170px;" src="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/SqE0Oa3xOtI/AAAAAAAAArw/SyJ5GbYb-c4/s320/navat-kay-ahe-1.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5377636852393130706" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य यांस सविनय निवेदन -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;गत काही महिने आम्ही एका वेगळ्या उद्योगात मग्न होतो. खरे तर उद्योग हाच, लेखनाचा होता, परंतु वेगळ्या माध्यमासाठी आम्ही लिहित होतो व ते माध्यम म्हणजे दूरचित्रवाणी हे होय.&lt;br /&gt;होय, दूरचित्रवाणीवरील मी मराठी या वाहिनीवरील एका मालिकेसाठी आम्ही लेखन करीत होतो. &lt;br /&gt;त्या मालिकेचे नाव, नावात काय आहे? असे असून, ती मालिका दर शुक्रवारी रात्री साडे नवाच्या ठोक्यास प्रक्षेपित होणार आहे. उद्या, शुक्रवार दिनांक चार सप्टेंबर रोजी त्या मालिकेचा पहिला भाग दाखविणार आहेत.&lt;br /&gt;तरी आपण सहपरिवार, इष्ट मित्रमैत्रिणींसह ही मालिका पाहून तिच्यावर टीका आणि टिपण्णी करण्याची कृपा करावी, ही विनंती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मालिकेचे लेखन संपले, की मग बातमीदारवर तुम्ही आहात आणि आम्ही आहोतच.&lt;br /&gt;अनेक दिवसांची कसर भरून काढायची आहे. अनेक विषय मस्तकी आहेत. &lt;br /&gt;त्यांचा सविस्तर समाचार घेऊच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यंतरी आमच्या कानी अशी चर्चा येत होती, की &lt;br /&gt;बापूंना एका वृत्तपत्राच्या म्यानेजमेन्टने दम भरल्याने बापू भयग्रस्त झाले व म्हणून त्यांनी ब्लॉगलेखन थांबविले. तर तसे काही नाही. कारण -&lt;br /&gt;१. आम्ही ज्या प्रकारचे लिखाण करतो, त्यास मराठीमध्ये मोठी परंपरा असून, त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.&lt;br /&gt;२. आम्ही बातमीदारवर जे लिहितो ते कोणाच्याही विरोधात नसते, तसेच येथे कोणाचीही बदनामी करावी असा उद्देश नसतो व हे समजून घेण्याची शक्ती पत्रकार व पत्रमालक व पत्रव्यवस्थापक आदीकरोनी सर्वांस असावी, असा आमचा अजून तरी समज आहे. &lt;br /&gt;असो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या या निवेदनाने सर्व अफवा, वावड्या, बोलवा व चर्चांस पूर्णविराम मिळेल, अशी आमची खात्री आहे.&lt;br /&gt;आपण बातमीदारवर जे प्रेम करीत आहात, ते असेच कायम राहो, हीच कामना. &lt;br /&gt;(हे फार इमोशनल होतंय का? होऊ दे.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;- आपला नम्र,&lt;br /&gt;बापू&lt;br /&gt;(दि. ३ सप्टेंबर २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-1595312758808398171?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/IJsEFr3LT_s" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/IJsEFr3LT_s/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/SqE0Oa3xOtI/AAAAAAAAArw/SyJ5GbYb-c4/s72-c/navat-kay-ahe-1.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">5</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/09/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-8514260691474311945</guid><pubDate>Mon, 22 Jun 2009 07:59:00 +0000</pubDate><atom:updated>2009-06-22T19:22:15.986+05:30</atom:updated><title>सकाळचा झिम्मडझिम्मा!</title><description>आजचा मुंबै सकाळ व चित्रमय टुडे वाचलात का?&lt;br /&gt;हो. सकाळीच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि त्यातील टुडेच्या वर्धापनदिनाची बातमी?&lt;br /&gt;ती 'सकाळ'मध्ये हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा या शीर्षकाची बातमी ना? वाचली की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग काय वाटले?&lt;br /&gt;काय वाटणार? सकाळमधील एक पुरवणी तब्बल तीन वर्षे सुरु राहिली, याबद्दल आनंदच वाटला! शिवाय बातमीचा मथळाही आवडला आम्हांला. मराठी पेपरांची ही परंपराच आहे बरे का. दरवर्षी एकदा तरी असा मथळा येतोच छापून. बहुधा त्याचा परमनंट ब्लॉक करून ठेवलेला असावा. कदाचित बातमीच्या इंट्रोचाही ब्लॉक तयार असेल. पावसाळ्यातला कार्यक्रमासाठी हा इंट्रोचा ब्लॉक. तोच कार्यक्रम उन्हाळ्यात झाला, की हा इंट्रोचा ब्लॉक. चांगले आहे. यातून डोक्याची केवढी बचत होते!    &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि त्या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल काहीच नाही वाटले?&lt;br /&gt;व्वा! वाचून मजा वाटली की. जितेंद्र जोशी यांच्या कविता आणि कोट्या, नकलाकार श्रीनिवास लखपती यांच्या नकला, असा छानच नकली कार्यक्रम आयोजित केला होता सकाळकारांनी. ही नवी परंपरा सुरु केलेली दिसतेय सकाळने. लावण्या, नकला, ऑर्केस्ट्रा, त्याचे पांचट सूत्रसंचालन... अत्यंत उंची मनोरंजन! अखेर म्हणतात ना, उंचे लोग उंची पसंद!!...  &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते जाऊ द्या हो. तुम्ही ती बातमी आणि कार्यक्रमाची चित्रझलक नीट पाहिलेली दिसत नाही...&lt;br /&gt;का? काय झाले?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अहो, त्या बातमीने तिकडे मंत्रालयात मोठी खळबळ माजली आहे. सगळे सनदी अधिकारी तर चक्रावूनच गेलेत...&lt;br /&gt;काय म्हणता काय?... अहो, पण मनिषाताई म्हैसकरांची छायाचित्रे छापून आली म्हणून काही एवढी खळबळ माजायला नको. लोकांचे पण कसे असते ना? तिकडे दिल्लीत एवढे रामायण झाले, त्याने नाही खळबळ माजली आणि...&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिल्लीत? काय झाले काय?&lt;br /&gt;तुम्हांला माहित नाही? काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे गणेश रामदासी माहिताहेत ना? ते हो, माहिती उपसंचालक. तर मनिषाबाईंनी त्यांची बदली केली होती. तिकडं नाशिकला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे लोकसत्ताच्या संजय आवटेंची झाली होती तशीच?&lt;br /&gt;हो तशीच. आता अशी चर्चा आहे, की ती बदली अत्यंत 'अभिनंदनी'य व 'थोरा'-मोठ्यांनी केलेली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून चावाच काढला म्हणा ना गणेशभाईंचा! आता गणेशभाई म्हणजे षटकार क्लबचे आधारस्तंभ. तो असा तसा कसा क्लिन बोल्ड होईल? त्यांनीसुद्धा मग फिल्डिंग लावली. जोरात सामना झाला तो. जणू लोकमान्य लोकशक्ती विरोधी महाराष्ट्र टाइम्स यांच्यातील ट्वेंटी-ट्वेंटीच. अखेर हा सामना रामदासींनीच जिंकला आणि त्यांची बदली रद्द झाली. मनिषाताईंनी केलेली बदली नव्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय ते तपासून पाहिले पाहिजे... &lt;br /&gt;&lt;br /&gt;हो पण, सकाळमधील बातमी याहून खळबळजनक आहे. मनिषा म्हैसकर यांच्याकडचे माहिती महासंचालकपद गेले म्हणतात... तुम्ही टुडेतली चित्रझलक नाही वाचलीत? तिथे फोटो कॅप्शनमध्ये, देवेंद्र भुजबळ हे राज्याचे माहिती महासंचालक असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे बातमीत मात्र त्यांचे पद उपसंचालक असे दिले आहे. म्हणजे नक्कीच काही तरी मोठा घोळ असणार!&lt;br /&gt;खिखिखिखि. तुम्ही पण काय राव पराचा कावळा करताय! अहो तो मुद्राराक्षसाचा विनोद आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाही हो. तसे असणे शक्य नाही. कारण की सकाळच्या मुद्रितशोधन विभागाचे जे प्रमुख आहेत ना, त्यांच्याच हस्ते भुजबळसाहेबांचा सत्कार होतानाचा तो फोटो आहे. त्याची कॅप्शन कशी चुकेल? शिवाय सगळीकडे मनिषाताईंचा उल्लेख केवळ लोकराज्यच्या संपादिका असाच आलेला आहे. &lt;br /&gt;नाही नाही. सकाळमध्ये काहीही होऊ शकते. तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. पराचा कावळा करू नका. छोटीशी चूक आहे ती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण मग मनिषाताई म्हणाल्या त्यात तर काही चूक नाही ना?&lt;br /&gt;काय म्हणाल्या त्या?&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचत जा हो बातम्या नीट. उगाच संपादकांसारखे करताय! त्यांना बिचा-यांना वेळ नसतो पेपर वाचायला. पण तुम्हांला काय उद्योग असतो हो?&lt;br /&gt;नाही, ते मनिषाताई काय म्हणाल्या ते सांगताय ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांनी सकाळवर टीका केली की सकाळची प्रशंसा याबद्दल मतभेद आहेत. पण त्या म्हणाल्या, की सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे. आणि येथूनच त्यांना त्यांच्या लोकराज्यसाठी प्रशिक्षित कर्मचारी मिळाले.&lt;br /&gt;असे म्हणाल्या त्या?&lt;br /&gt;&lt;br /&gt;छापून आलेय तसे सकाळमध्येच. वाचत जा हो तुम्ही...&lt;br /&gt;मनिषाताई या ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. आणि सनदी अधिकारी म्हटले, की तो बोलतो एक आणि त्याचा अर्थ असतो दुसराच. कोणत्याही मंत्र्याला विचारा हे! तेव्हा नक्कीच मनिषाताईंच्या या विधानात दोन अर्थ दडलेले असणार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यातला पहिला अर्थ कोणता?&lt;br /&gt;सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे, याचा अर्थ येथून बाहेर पडणारे पत्रकार हे सुप्रशिक्षित असतात. चांगले असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि दुसरा अर्थ?&lt;br /&gt;सकाळमधून पत्रकार नेहमीच बाहेर पडतात! टिकत नाहीत... &lt;br /&gt;&lt;br /&gt;टिकत नाहीत असे कसे म्हणता तुम्ही? अनेक पत्रकार दशकानुदशके आहेतच की सकाळमध्ये. &lt;br /&gt;तो सकाळचा नाईलाज आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;च्यामारी असा अर्थ आहे काय बाईंच्या बोलण्याचा. एकूणच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमापेक्षा ही कार्यक्रमाची बातमी म्हणजे हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा आहे! व्वा व्वा! &lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळच्या टुडे पुरवणीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by चांगदेव पाटील, दि. २२ जून २००९)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जमल्यास हेही वाचा &lt;/strong&gt;- &lt;br /&gt;&lt;a href="http://batmidar.blogspot.com/2008/06/blog-post_16.html"&gt;टुडेच्या कुशीत टुमारो आला त्या सोहळ्याचा वृत्तांत&lt;/a&gt; (बातमीदार)&lt;br /&gt;&lt;a href="http://bestofbhankas.blogspot.com/2008/05/blog-post_30.html"&gt;हॅपी बर्थडेची गोष्ट&lt;/a&gt; (बेस्ट ऑफ भंकस)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-8514260691474311945?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/NRBUVaw1HEs" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/NRBUVaw1HEs/blog-post_22.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">20</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/06/blog-post_22.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-1278481043680261210</guid><pubDate>Fri, 12 Jun 2009 07:48:00 +0000</pubDate><atom:updated>2009-06-12T13:27:40.122+05:30</atom:updated><title>आला, सकाळचा अग्रलेख आला...</title><description>कोणत्या वृत्तपत्राने कोणत्या विषयावर कधी व कसा अग्रलेख लिहावा, हे सांगणारे आपण कोण? &lt;br /&gt;अखेर अग्रलेख हा संपादकांचा विशेषाधिकार आहे. आणि तो तसा असला पाहिजे. परंतु अंकातील जाहिरातीप्रमाणेच अलीकडे बातम्यांवरही संपादकांचे फारसे नियंत्रण नसते. अनेक दडपणे, अनेक नाईलाज, अनेक गणिते असतात. संपादक ही संस्था हतबल असते. अंकातील ही अशी ९९ टक्के जागा मालक, मुद्रक, प्रकाशक, जाहिरातदार आणि वाचक यांच्या नियंत्रणाखाली आणि उरलेला अग्रलेखाचा टक्का तेवढा संपादकाचा, अशीच एक सर्वसाधारण विभागणी ठरून गेलेली आहे. वस्तुतः हा टक्काही पूर्णांशाने संपादकाचा नसतो. मालक कधीही त्यास विचारू शकतो, की संपादक, कोण म्हणतो तुम्हांला टक्का दिला? &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा परिस्थितीत आपल्यासारख्या वाचकांनीही एडिटरबुवांना अग्रलेखाचा विषय डिक्टेट करणे हा म्हणजे संपादक या संस्थेवरील अन्यायच झाला. पण तरीही कधीकधी वाटते, की या या विषयावर अग्रलेख छापून यावा. म्हणजे त्या विषयावर त्या दैनिकाचे मत काय आहे, धोरण काय आहे हे आपणांस समजेल व आपल्या ज्ञानात काही भर पडून लोकशिक्षणाचे पवित्र कार्य केल्याचे समाधान संपादकास मिळेल. याच भावनेतून पद्मसिंह पाटील अटकप्रकरणी संपादकीय मतप्रदर्शन व्हावे असे आम्हांस वाटत होते. कारण अखेर हा प्रश्न राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी निगडित आहे. माजी गृहमंत्र्याला व आजी खासदाराला खूनप्रकरणी अटक होणे, अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक नेत्याच्या हत्येचे कटकारस्थान रचले जाणे हा आम्हांस अग्रलेखाचा विषय वाटत होता. अजूनही वाटत आहे. आमचे वाटणे अगदीच गैर नव्हते, हे अटकेनंतर लगेचच महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी यांसारख्या दैनिकांनी या विषयावर अग्रलेख लिहिला यावरून स्पष्ट झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पद्मसिंह पाटील हे ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला कालपर्यंत आदरणीय होते, त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घरातले वृत्तपत्र म्हणजे सकाळ. (सकाळ या वृत्तपत्राचा शरद पवार वा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी काहीही संबंध नाही, असे जे सांगितले जाते, ते खरेच असल्याचा आमचा समज आहे, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. तेवढे बावळट आम्ही नक्कीच आहोत.) तेव्हा सकाळचे या प्रकरणी काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यास आम्ही खूप उत्सुक होतो. अशीच उत्सुकता आम्हांस लोकमान्य लोकशक्ती काय म्हणते याविषयीही आहे. आज ना उद्या या विषयास लोकसत्ताकार हात घालतीलच. आणि नाहीच घातला, तर आणखी पन्नासेक वर्षांनी त्याचा त्रिकालवेध घेतील. असो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अखेर पद्मसिंह प्रकरणावरील अग्रलेखाची सकाळ आज, १२ जूनला जेष्ठातल्या चतुर्थीच्या मुहूर्तावर उजाडली. &lt;a href="http://beta.esakal.com/2009/06/11204711/editorial-padamsingh-patil.html"&gt;'पद्मसिंहांचे निलंबन' &lt;/a&gt;असे या अग्रलेखाचे शीर्षक आहे. शीर्षकावर जाऊ नका. मथळा बातमीसारखा असला, तरी मजकूर अग्रलेखासारखाच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पद्मसिंह यांना निलंबित केल्यानंतर, 'उशीरा सुचलेले शहाणपण' अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली होती. सकाळच्या या अग्रलेखाबाबत तसे म्हणता येणार नाही. अगदी योग्यवेळीच अग्रलेखाचा निर्णय झालेला आहे. पद्मसिंह आता पक्षात नाहीत, त्यांना गचांडी देण्यात आलेली आहे, पक्षाने नैतिकतेच्या मुद्दयाची गुढी उभारून हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. तेव्हा तीच गुढी आता नाचविण्यास कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. एकदम योग्यवेळीच सकाळने अग्रलेख लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सकाळचा कोणताही संबंध नसल्याचे आपण वर पाहिलेच आहे. त्यामुळे या अग्रलेखात सकाळकारांनी राष्ट्रवादीवर अत्यंत कडक शब्दात टीकाही केलेली आहे. उदाहरणार्थ - "विविध राजकीय पक्ष वेळोवेळी स्वपक्षीयांवर आरोप झाल्यानंतर कायदा त्याचे काम करील. तोपर्यंत आम्ही संबंधिताला निर्दोषच मानतो, अशी भूमिका घेताना दिसतात. अर्थातच सर्वच पक्षांनी राजकीय नैतिकतेचे धडे नव्हे, तर मुळाक्षरेच गिरविण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे, असे हे प्रकरण सांगते," असे सकाळकारांनी लिहिले आहे. हे वाक्य म्हणजे खासकरून शरद पवार यांच्यावर टाकण्यात आलेला शाब्दिक हातगोळाच आहे. सकाळने येथे जे धाडस दाखविले त्याबद्दल सकाळकारांचे खास अभिनंदन. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या अग्रलेखाबद्दल आमचा एकच आक्षेप आहे. तो म्हणजे - "सीबीआयने ताब्यात घेतल्याबरोबर त्यांनी (पक्षी - पद्मसिंह यांनी) तातडीने पक्षाचा त्याग केला असता आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असता, तर त्यांची नैतिकता शाबूत आहे, असेही म्हणता आले असते (म्हणजे पद्मसिंहांनी आधी राजीनामा दिला असता, तर सकाळने त्यांना खरोखरच नैतिकता शाबूत असल्याचे सर्टिफिकेट दिले असते की काय? बापरे!) आणि पक्षालाही नामुष्कीला सामोरे जावे लागले नसते..." ".... निर्णयाला जो उशीर झाला त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेचे निश्चितच नुकसान झाले आहे..." हे जे सकाळकारांनी आज म्हटले आहे, ते जरा आधीच म्हटले असते, तर राष्ट्रवादीचा केवढा तरी फायदा झाला असता. नामुष्की टळली असती, प्रतिमेचे नुकसान टळले असते, राजकारणातील नैतिकता शाबूत राहिली असती, शाबित झाली असती व सकाळकारांच्या दूरदृष्टीचे व निर्भिडतेचे पवाडे युगानुयुगे गायिले गेले असते. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या अग्रलेखातून सकाळकारांनी राजकारण आणि नैतिकता यांतील द्वैत संपविण्याची आवश्यकताही प्रतिपादन केली आहे. "राजकारण आणि नैतिकता यांतील विरोधाभास संपेल तेव्हाच असे (पक्षी - हत्या, सुपारी आदी) प्रकार थांबतील," असे सोल्युशनही सकाळकारांनी येथे दिले आहे. हा विरोधाभास संपेल तेव्हा संपेल, परंतु "तोपर्यंत जनतेनेच अशा घटनांच्या संदर्भातील जागरूकता दाखवून विवेक केला पाहिजे," असे सकाळकारांनी सुचविले आहे. ही छानच व अत्यंत व्यवहार्य व नैतिक अशी सूचना आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. फक्त 'जनतेने अशा घटनांच्या संदर्भातील जागरूकता दाखवून विवेक करायचा', म्हणजे नेमके काय करायचे हे एकदा सकाळकारांनी सांगावे म्हणजे झाले! &lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by चांगदेव पाटील, दि. १२ जून २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-1278481043680261210?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/yBeLIAbasic" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/yBeLIAbasic/blog-post_12.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">5</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/06/blog-post_12.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-8620522883106036556</guid><pubDate>Mon, 08 Jun 2009 19:18:00 +0000</pubDate><atom:updated>2009-06-09T00:54:26.574+05:30</atom:updated><title>निखिल वागळे, हेमंत देसाई यांचे अभिनंदन</title><description>एकेकाळी ज्याने राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळले (येथे भूषविले असा शब्द सूचत होता. पण तो आम्ही जाणीवपूर्वक टाळला.) त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आदरणीय असलेल्या खासदार पद्मसिंह पाटील यांना खूनप्रकरणात अटक झाली. महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी, अशी ही बाब आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात पुढील अनेक वर्षे उमटत राहतील. असो. आम्हांस येथे या विषयावरील अग्रलेख लिहायचा नाही. आपली वृत्तपत्रे आपापल्या वृत्तपत्रीय धोरणानुसार यावर अग्रलेख लिहितीलच. आपण ते वाचूच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण येतील या विषयावर अग्रलेख? &lt;br /&gt;येतील. &lt;br /&gt;सकाळकारांना थोरली कसरत करावी लागेल एवढेच.  &lt;br /&gt;पद्मसिंह पाटील प्रकरण हे सकाळसाठी जरा अवघड जागचे दुखणे आहे, असे म्हणावयास हरकत नाही. &lt;br /&gt;पण म्हणून अन्य कोणी सकाळकडे बोट दाखविण्याचे कारण नाही. कारण मग तशी बोटं सगळ्यांवरच उठू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडे अवघड विषयांना अनुल्लेखाने टांग मारायचा शिरस्ता बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी घेतलेला दिसतो आहे. आठवा - आनंद यादव प्रकरण, किंवा अगदी ताजाफडफडीत शिवस्मारक वाद. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण याबाबतीत पत्रकारांनाही फार नावे ठेवून उपयोग नाही. वृत्तपत्रे हा कॉर्पोरेट बिझनेस झाल्याचा हा परिणाम आहे. &lt;br /&gt;पण सगळ्याच पत्रकारांनी, संपादकांनी आपली शस्त्रं पगाराच्या स्लीपमध्ये अगदीच गुंडाळून ठेवलेली नाहीत!  &lt;br /&gt;उदाहरणार्थ निखिल वागळे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/Si1lRQX2BII/AAAAAAAAAqQ/3lhHdihajWg/s1600-h/Image(257).jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://3.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/Si1lRQX2BII/AAAAAAAAAqQ/3lhHdihajWg/s320/Image(257).jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5345039679885804674" /&gt;&lt;/a&gt;आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी सोमवारी रात्री आजचा सवाल या त्यांच्या हिट (हिटचा एक अर्थ तडाखा असाही आहे बरे!) कार्यक्रमात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा चर्चेला घेतला होता. या मुद्दयावर निखिल वागळे यांनी त्यांचे इंटरॉगेटिव्ह जर्नालिझमचे कसब पणाला लावून राष्ट्रवादीच नव्हे, तर सर्वच पक्षांची भंबेरी उडविली. यावेळी मुद्दा पद्मसिंहाच्या अटकेचा होता. त्यामुळे निखिल वागळेंची तोफ साहजिकच शरद पवार यांच्यावर रोखलेली होती. या कार्यक्रमात ज्येष्ट पत्रकार हेमंत देसाई हेही सहभागी झाले होते. हेमंत देसाई तसे शांत प्रवृत्तीचे, मृदुभाषी पत्रकार आहेत. पण या मुद्दयावर त्यांनीही थेट शरद पवार यांच्यावर शरसंधान केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, पवारांनी गुन्हेगारांना राजाश्रय दिला, अशी सणसणीत टीका त्यांनी निर्भिडपणे केली. अजित पवार, उदयनराजे निंबाळकर, सुरेश कलमाडी आदींची तर नावे घेऊन त्यांनी टीका केली. या निर्भिडपणाबद्दल आणि प्रश्नाच्या मुद्देसूद मांडणीबद्दल निखिल वागळे आणि खासकरून हेमंत देसाई यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;झी २४ तास, स्टार माझा या वाहिन्यांनीही हे प्रकरण अशाच पद्धतीने लावून धरलेले आहे. ई-टीव्ही व साम मराठी आमच्याकडे दिसत नसल्याने त्यांचे आम्हांस माहित नाही. मात्र साम मराठीने गेल्या नागपूर अधिवेशनात लोकप्रतिनिधी कसे कायद्याच्या चिंधड्या उडवतात, यावर एक पॅकेज केले होते, ते आम्हांस या निमित्ताने स्मरते आहे. आमच्या आठवणीनुसार, विधिमंडळ परिसरात धुम्रपानबंदीचा कायदा मोडत असलेल्या एक-दोन आमदारांचे स्टिंग ऑपरेशन साम मराठीने केले होते व त्यावर नंतर मोठी चर्चाही घडवून आणली होती. धुम्रपानबंदीचा कायदा मोडण्याचा गुन्हा करणा-या आमदारांना धारेवर धरणारी ही वृत्तवाहिनी या खूनप्रकरणातही तेवढ्याच तडफेने वागेल, यात आम्हांस तरी काही शंका वाटत नाही!  &lt;br /&gt;&lt;br /&gt;पद्मसिंहांच्या अटकेनंतर उस्मानाबादेत आयबीएन-लोकमतच्या ओबी व्हॅनची मोडतोड करण्यात आली. पत्रकारांनी किमान या घटनेचा तरी निषेध करावयास हवा होता. पण निषेध तर दूरच, काही वृत्तपत्रांनी आपल्या बातमीत आयबीएन-लोकमतचा साधा उल्लेखही केला नाही. एका खासगी वृत्तवाहिनीच्या व्हॅनवर दगडफेक झाली म्हणे! अन्य वृत्तपत्राचे, वाहिनीचे नाव आपल्या पत्रात छापण्याची काय शरम वाटते वृत्तपत्रांना हे काही आम्हांस कळत नाही. संपादकाचे नाव छापायचे झाले, तर ज्येष्ठ पत्रकार असे छापतील! समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र टाइम्सचे संपादक, लोकमतचे संपादक असे म्हटले, तर काय तुमच्या पेपरचा खप कमी होईल? पण... संकुचितपणा, दुसरे काय!! या आजाराला काही औषध नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वृत्तपत्रांचे सोडून द्या. पण पत्रकारांच्या संघटना? &lt;br /&gt;त्यांना पुरस्कार वितरण सोहळे करणे वगैरे खूप कामे असतात, हे आम्हांस मान्य आहे. परंतु तरीही पत्रकारांच्या संघटनांनी अशा घटनांच्या निषेधाची शाब्दिक कृती तरी वेळात वेळ काढून करावी, अशी आमची सविनय विनंती आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;इत्यलम्.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by चांगदेव पाटील, दि. ८ जून २००९)&lt;br /&gt;&lt;br /&gt;(हा लेख आता रात्री साडेअकरा वाजता आम्ही लिहित आहोत. उद्या, मंगळवारच्या वृत्तपत्रांत पद्मसिंह प्रकरणावरचे अग्रलेख असतील. ज्या पत्रात नसेल, त्यास पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस बापूंनी केली आहे. तेव्हा कृपया अशा वृत्तपत्रांची नावे आम्हांस आवर्जून कळवा. - चां.पा.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-8620522883106036556?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/k4N4yPEsLi4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/k4N4yPEsLi4/blog-post_09.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/Si1lRQX2BII/AAAAAAAAAqQ/3lhHdihajWg/s72-c/Image(257).jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">10</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/06/blog-post_09.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-7706919293407983811</guid><pubDate>Mon, 08 Jun 2009 19:10:00 +0000</pubDate><atom:updated>2009-06-09T00:47:20.472+05:30</atom:updated><title>बातम्या किती ख-या असतात?</title><description>ब्रूस विलिसच्या डाय हार्ड या चित्रमालिकेतील चौथा भाग कुणी पाहिलाय? त्यात बघा एक कंप्युटर हॅकर मुलगा असतो. मुलगा म्हणजे खरे तर संगणकातला बाप असतो तो. सायबरपिढीचा अस्सल प्रतिनिधी. एका प्रसंगात तो ब्रूसबाबूंसमवेत कारमधून चाललेला असतो. काररेडिओवर गाणीबिणी वाजत असतात. मध्येच ब्रूसबाबू रेडिओची कळ फिरवित म्हणतात, बातम्या ऐकू यात. बातम्या म्हटल्यावर हा मुलगा आश्चर्यचकितच होतो. म्हणतो - तुम्ही बातम्या ऐकता? काही खरं असतं का त्यात? अहो, बातम्या म्हणजे अवघा बनाव असतो, कॉर्पोरेट कंपन्यांनी तयार केलेला! (आमच्या इंग्रजीच्या ज्ञानानुसार हा संवाद दिलेला आहे. चुकभूल द्यावी-घ्यावी.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;सोमवार दिनांक आठ जून दोन हजार नऊ रोजी आम्ही लोकसत्ता व सकाळ ही वृत्तपत्रे (आम्हांस उपलब्ध झाली म्हणून) वाचली आणि आम्हांस डाय हार्ड भाग चार मधील त्या प्रसंगाचे मर्म समजले. झाले असे, की सर्वप्रथम आम्ही सवयीने लोकसत्ता वाचला. त्यात पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमी होती. (ती वाचून आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास किंचित बळकट झाला.) लोकसत्ताने या प्रकरणाचे विविध पैलू विविध बातम्यांद्वारे स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ &lt;a href="http://www.loksatta.com/daily/20090608/mum02.htm"&gt;'डॉक्टरांच्या अटकेने राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरले अंथरूण!' &lt;/a&gt;अशा छान मथळ्याची एक बातमीही लोकसत्ताने दिली आहे. (पान ५) मुंबई डेटलाईनच्या या बातमीत राष्ट्रवादीची पिसे काढतानाच सदरहू बातमीदाराने म्हटले आहे, की 'पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने न्यायालयात हजर केले तेव्हा राष्ट्रवादीचा एकही नेता तेथे फिरकला नाही.' शरद पवार यांच्या यासंबंधातील वक्तव्यास दुजोरा देणारीच ही घटना होती. निंबाळकर खून प्रकरण ही 'वैयक्तिक घटना' आहे. त्यात राष्ट्रवादीचा काही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्ता वाचून झाल्यानंतर आम्ही सकाळ वाचण्यास घेतला. त्यातही पद्मसिंह पाटील अटकेच्या विविध पैलूंचा विस्कळीत समाचार घेण्यात आला होता. त्यातील आतील पानावरील (पान ४) एक &lt;a href="http://beta.esakal.com/2009/06/06230628/mumbai-cbi-ask-padmasinha-pati.html"&gt;चौकट&lt;/a&gt; वाचून मात्र आम्ही चकितच झालो! कारण की त्यात म्हटले होते - न्यायालयाच्या आवारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रीघ लागलेली होती. लोकसत्ता म्हणते, कोणीही फिरकले नाही. आणि सकाळवाले म्हणतात, रीघ लागली होती. कोण खरे? &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदर बातम्या वाचता, असे लक्षात येते, की लोकसत्ताच्या सदरहू बातमीदाराने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून बातमी दिली. आपले मत वा निष्कर्ष यांना अनुरुप अशीच तथ्ये मांडायची, असा प्रकार सध्या पत्रकारितेत बोकाळलेला आहे. त्यातलाच हा प्रकार.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशीच एक बातमी लोकसत्ता व सकाळने प्रसिद्ध केली आहे.(८ जून). बातमी आहे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाविषयीची. सकाळच्या बातमीनुसार ऑनलाइन प्रवेशासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या संकेतस्थळाची चाचणी रविवारी घेण्यात आली व ती चाचणी यशस्वी झाली. ही चाचणी कशाची होती? सकाळच्या बातमीनुसार एकाचवेळी किती विद्यार्थी वेबसाईटला भेट देऊ शकतात हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी खरेच यशस्वी ठरली का? लोकसत्ताच्या बातमीचे शीर्षक आहे - ऑनलाइनच्या रंगीत तालमीमध्ये सर्व्हरने केला घात! झाला का गोंधळ? सकाळचा बातमीदार म्हणतो - चाचणी यशस्वी. लोकसत्ता बातमीदार म्हणतो - सर्व्हरने अवसानघात केला. कोण खरे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदर बातम्या वाचता, असे लक्षात येते, की केवळ एमकेसीएलच्या अधिका-याशी बोलून सकाळने सदरहू बातमी दिली आहे. त्यामुळे बातमीस साहजिकच सरकारी पत्रकाची कळा आली. लोकसत्ताच्या बातमीदाराने मात्र या बातमीवर अधिक मेहनत घेतलेली दिसते. त्यामुळेच या चाचणीदरम्यान सर्व काही सुरळीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. ती बाब त्याने शालेय शिक्षणमंत्र्यांच्या कानावर घातल्यावर ते म्हणाले, की ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीच तर हा प्रयोग करण्यात आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या बातम्या वाचल्यानंतर कधीतरी वाचलेले एक इंग्रजी वाक्य उगाचच आठवले, की डोंट बिलिव्ह (पेपरातील बातम्यांसकट) एव्हरीथिंग यू रीड!! &lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by चांगदेव पाटील, दि. ८ जून २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-7706919293407983811?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/gqS0FmRj8_E" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/gqS0FmRj8_E/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">4</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/06/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-2750304634155586417</guid><pubDate>Sat, 30 May 2009 07:04:00 +0000</pubDate><atom:updated>2009-05-30T12:52:03.902+05:30</atom:updated><title>मंडळी, रामराम!</title><description>वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो,&lt;br /&gt;गेले वर्षभर आपण अधुनमधून येथे मस्त भंकस केली. &lt;br /&gt;आपण म्हणण्याचे कारण म्हणजे, येथे आम्ही जे लिहित होतो, ते तुम्हां सर्वांचेच होते. ते तुमच्या मनातले होते. आम्ही फक्त ते शब्दबद्ध केले. विचार, भावना तुमच्याच होत्या, आम्ही त्यांचे फक्त शब्दांकन केले.&lt;br /&gt;कुणास चिमुकचिमटे काढले, कुणाची टोपी उडविली.&lt;br /&gt;कुणास शालजोडीतले दिले, तर कुणास शब्दशाल-श्रीफलही दिले.&lt;br /&gt;तुम्हीही आम्हांस सोडले नाही.&lt;br /&gt;आमच्यावरही तुम्ही टीका केली, कधी कवळेकौतुक केले.&lt;br /&gt;एकंदर मझा आली.&lt;br /&gt;या मजेमजेत आमच्याकडून कोणी दुखावले गेले असेल, &lt;br /&gt;तर गड्यांनो, माफ करा!&lt;br /&gt;आमचे लक्ष्य कधीही व्यक्ती हे नव्हते, हे समजून घ्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता तुम्ही म्हणाल, की बापू असे निरोपाचे विडे का उचलतो आहे? &lt;br /&gt;तर आता खरोखरच निरोपाची वेळ आलेली आहे. &lt;br /&gt;(निरोपाचा क्षण फार वाईट असतो मित्रहो! पण कोणी, आता पीळ नका मारू, असे सांगण्यापूर्वीच कल्टी मारलेली बरी! कसें?)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर या ब्लॉगवर पुन्हा नक्की भेटू या.&lt;br /&gt;तोवर - टाटा, बायबाय, रामराम!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपला स्नेहांकित, &lt;br /&gt;बापू आत्रंगे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-----------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;बापू आत्रंगे यांनी काही काळासाठी, वैयक्तिक कारणांमुळे बातमीदारची रजा घेतलेली आहे. मात्र हा ब्लॉग, तसेच सहयोगी बातमीदार व कळते-समजते हे ब्लॉग सुरुच राहणार आहेत. या तिन्ही ब्लॉग्जवरील आपले प्रेम असेच कायम असू द्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- ब्लॉग एडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-2750304634155586417?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/WsNALEO17Z4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/WsNALEO17Z4/blog-post_30.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">11</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/05/blog-post_30.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-7087064792092767146</guid><pubDate>Sat, 23 May 2009 07:55:00 +0000</pubDate><atom:updated>2009-05-23T13:50:05.469+05:30</atom:updated><title>हास्यमेव जयते!</title><description>बादशहाचे आज काहीतरी बिनसले आहे, हे चाणाक्ष बिरबलाच्या तत्काल ध्यानी आले. &lt;br /&gt;त्याने चिंतेने विचारले, "खाविंद, तबियत नासाज दिसते आपली. रात्री पुरेशी निंद झाली नाही, की सकाळी उठल्यावर सामन्याचा अग्रलेख वाचलात?" &lt;br /&gt;उजव्या हाताने कानशिल दाबत बादशहा म्हणाला, "बिरबल, अरे अग्रलेख परवडला... पण आमची बेगम! लाहोलविलाकुवत!!" &lt;br /&gt;एवढ्या वर्षांचा अनुभव असल्याने बिरबलाच्या लगेच लक्षात आले, की राणीसाहेबांनी बादशहाकडे काही तरी हट्ट धरला आहे. &lt;br /&gt;"काय झाले बेगमसाहिबांना?" त्याने पुन्हा काळजीने विचारले. बादशहा आणि साहेबांच्या कुटुंबाची नेहमी आस्थेने चौकशी करावयाची असते, हा कचेरीराज्यशास्त्राचा पाठ बिरबलाने कोळून प्यायलेला होता. &lt;br /&gt;"कसे सांगू तुला?... त्या तुमच्या तंबी दुराई ऊर्फ श्रीकांत बोजेवारांना अक्षरशब्द पुरस्कार मिळाल्याच्या &lt;a href="http://www.loksatta.com/daily/20090523/rajay.htm"&gt;बातमी&lt;/a&gt;ने पुरा घोटाळा केलाय! बेगमच्या भावालासुद्धा आता पुरस्काराचे डोहाळे लागलेत! त्यासाठी त्याला हास्यरंगचे कंत्राट द्या, म्हणून बेगम मागे लागल्यात..."&lt;br /&gt;ते ऐकून बिरबल कोसळायचाच शिल्लक राहिला. &lt;br /&gt;"कसे शक्य आहे? तुमच्या मेव्हण्याला थोडीतरी विनोदबुद्धी आहे का?" &lt;br /&gt;बादशहा म्हणाला, "बेगम म्हणतात, है! आमचा मेव्हणा कधी कधी राजकीय-सामाजिक लेख लिहित असतो. हल्ली तर टीव्हीवर राजकीय विश्लेषक म्हणूनही बोलावतात लोक त्याला..." &lt;br /&gt;"खाविंद, राज्यात राजकीय अभ्यासकांची, विश्लेषकांची मुळातच कमी आहे. त्यामुळे टीव्हीवाले लोक काय, वेळ भरून काढायला कोणालाही बोलावतात! निवडणुकांच्या वेळी तुम्ही ते पाहिलेच असेल. शिवाय मेव्हणेसाहेबांचा तर वशिलाही दांडगा आहे!... ते जाऊ द्यात. मुळात मेव्हणेसाहेबांचा आणि विनोदाचा संबंधच काय?" बिरबलाने पृच्छा केली. &lt;br /&gt;"तेच तर म्हणतोय आम्ही. पण बेगमकडे गुप्तचरांचे अहवाल आहेत! त्यानुसार त्यांच्या भावाचे लेख वाचताना, त्यांचे टीव्हीवरील बोलणे ऐकताना लोक मनोमनी खदाखदा हसत असतात! म्हणजे ते केवढे विनोदी असणार बघा!" बादशहा म्हणाला.&lt;br /&gt;"खाविंद, अहो, ते विनोदी वेगळे आणि हास्यरंगमधले विनोदी लेखन वेगळे!" बिरबलाला आता स्वतःचे मस्तक स्वतःच्या हातांनी फोडावे असे वाटू लागले होते.&lt;br /&gt;"बिरबल, अरे आम्ही मालक असलो म्हणून काय झाले? आम्हांला पत्रकारितेतले थोडेफार तरी कळत असेलच की नाही? पण बेगम म्हणतात, की विनोदी लिहिणे म्हणजे काही फार मुश्किल काम नाही."&lt;br /&gt;"जहापन्हां, हा तंबी दुराईंवर अन्याय होतोय!"&lt;br /&gt;"अंहं. बेगम म्हणतात, तंबी दुराई असा कोणता तीर मारतात? आपण त्याला बिरबल-बादशहाच्या गोष्टींचे कॉपीराईट दिले. म्हणून तर तो विनोदी लेखक झाला. बेगम म्हणतात, आपण आता ते कॉपीराईट तिच्या बंधुला द्यायचे. म्हणजे झाले!!"&lt;br /&gt;"खाविंद, अहो, विनोदी लिहायचे म्हणजे त्याच्यामागे मोठी तपश्चर्या असते. अतिशय गंभीर अभ्यास असतो. भाषेवर हुकूमत असावी लागते. विसंगती टिपायची निर्विष नजर असावी लागते. तंबी दुराई इतकी वर्षे विनोदी लिहिताहेत... हे काही ये-यागबाळ्याचे काम नाही! तसे मराठीत अनेक विनोदी अखबारनवीस आहेत... ब्लॉगमध्ये बापू आत्रंगेसारखे लोक आहेत... नाही असे नाही! पण खरे सांगू? त्यांचे पीजे वाचताना धाय मोकलून रडावेसे वाटते हो!... सगळ्यांनाच ब्रिटिश नंदी किंवा तंबी दुराई नाही होता येत खाविंद!!"&lt;br /&gt;"अरे मग आता यावर उपाय काय? राणीसाहेबांची समजूत कशी काढायची? त्या तर हट्टालाच पेटल्यात." बादशहा दुखरी कानशिले दाबत म्हणाला.&lt;br /&gt;"खाविंद, आहे... यावर उपाय आहे. तुम्ही बेगमसाहिबांना सांगा... म्हणावे, मेव्हणेसाहेबांसारख्या चतुरस्त्र प्रज्ञावंताने हास्यरंगसारख्या पुरवणीत अडकून पडावे हे काही खरे नाही! त्यापेक्षा त्यांना एखाद्या अखबाराच्या एखाद्या आवृत्तीचे संपादक करा! हल्ली अशा विनोदी संपादकांची मोठी लाट आहे. त्यात ही आणखी एक भर पडेल एवढेच."&lt;br /&gt;"व्वा व्वा, बिरबल. काय अक्सीर इजाल सांगितलास! तुझ्या बुद्धीची आणि निरिक्षणशक्तीची कमाल आहे! या उपायाने सापही मरेल आणि लाठीही तुटणार नाही! व्वा!" असे म्हणत बादशहाने अतिप्रसन्न होऊन बिरबलास आपल्या हातातील अखबार दिला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या अखबाराचे नाव काही आम्हांस समजले नाही.&lt;br /&gt;त्यामुळे आमची मात्र वेगळीच पंचाईत झालीय.&lt;br /&gt;हल्ली पेपर वाचताना आम्हांस पदोपदी बादशहाच्या मेव्हण्याची आठवण येते आणि अभावितपणे आमची नजर प्रेसलाईनकडे वळते!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २३ मे २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-7087064792092767146?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/iaspOl467Gc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/iaspOl467Gc/blog-post_23.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">12</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/05/blog-post_23.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-6561340457881746013</guid><pubDate>Mon, 18 May 2009 08:49:00 +0000</pubDate><atom:updated>2009-05-18T14:37:51.534+05:30</atom:updated><title>एक होता बातमीदार!</title><description>&lt;em&gt;(मित्रांनो, &lt;br /&gt;मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशमुख यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने चांगदेव पाटील यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत. बातमीदार या ब्लॉगच्या प्रवृत्तीशी हा लेख आपणांस विसंगत वाटेल. &lt;br /&gt;प्रारंभी आम्हांसही तसेच वाटले होते. &lt;br /&gt;पण नंतर लक्षात आले, की शैली विनोदी नसली, तरी लेखाचा आशय बातमीदारशी सुसंगत असाच आहे. &lt;br /&gt;प्रकाश देशमुख यांच्यासारख्या मोठ्या बातमीदारास आदरांजली अर्पण करतानाच हा लेख आजच्या बातमीदारीविषयीही काही बोलून जातो.       &lt;br /&gt;आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. &lt;br /&gt;- बापू आत्रंगे.)&lt;/em&gt;&lt;br /&gt;---------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लो&lt;/strong&gt;कसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेना-भाजप युतीचे पानिपत झाले. मनसेमुळे ते झाले. हे असे होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. कोणीही तसे भाकित वर्तविले नव्हते. कोणाही ज्योतिषाचा तसा होरा नव्हता. या निवडणूक निकालाने सट्टेबाज, पोलवाले तोंडघशी पडले. आम्हीच समाजमनाच्या आरशात डोकावू शकतो असा भ्रम अनेक बातमीदारांना असतो. त्याचा तो भोपळाही यावेळी फुटला. अशा वेळी आम्हांला प्रकर्षाने आठवताहेत ते प्रकाश देशमुख. ते असते, तर मुंबईत, महाराष्ट्रात कोणते वारे वाहात आहे, हे नक्कीच आधीच समजू शकले असते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;'बातमीदार' प्रकाश देशमुख नसतानाची ही गेल्या ३५-४० वर्षांतली पहिलीच निवडणूक. देशमुखांचा उल्लेख येथे मुद्दामच पत्रकार वगैरे न करता, साधा सरळ बातमीदार असा केला आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगात पत्रकार या शब्दाबरोबर येणारा बौद्धिक माज कधीही नव्हता. ते हाडाचे बातमीदार होते. बातमी हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता. एरवी विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष, प्रेस क्लबच्या कार्यकारिणीचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. पण त्यापलीकडे त्यांची स्वतःची अशी ओळख होती. राज्यभरातले असंख्य बडे बडे व सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते यांच्याशी त्यांची खांद्यावर हात टाकण्याइतका परिचय होता. त्यांचे हात मंत्री आणि नेत्यांच्या खांद्यावर सहज जाऊ शकत होते, कारण त्या हातांना कुणापुढे पसरण्याची लाचार सवय नव्हती. लाचारीने कधीही बातमी मिळत नाही. मिळते ती बातमी नसते. समाजवादी विचारांतून आलेला साधेपणा, गोरगरीबांप्रती असलेली तळमळ आणि हातातील विकली न जाणारी लेखणी ही देशमुखांच्या भात्यातील शस्त्रे होती. याच जोरावर ते प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही दोन शब्द सुनावू शकत असत. देशमुखांच्या या स्वभावामुळेच आमचे पत्रकार बंधु-भगिनी त्यांना विक्षिप्त, त-हेवाईक, अव्यवहारी असे म्हणत असत. या बंधु-भगिनींचेही बरोबरच होते म्हणा! देशमुख कणा शाबूत ठेऊन बातमीदारी ना करते, तर त्यांना पत्रकारितेतही मोठा गोतावळा जमा करता आला असता!&lt;br /&gt;&lt;br /&gt;अखेरच्या काळात देशमुखांची साथ त्यांच्या प्रकृतीनेही सोडली! त्यांना मधुमेह होता, हद्रोगही होता. आयुष्यभर केलेल्या वणवणीची ही फळे होती. हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवण्यासाठीही त्यांना स्वतःलाच वणवण करावी लागली. त्यासाठी त्यांना कर्जही काढावे लागले. याच काळात गरज सरो, वैद्य मरो या उक्तीचाही अनुभव त्यांना आला. ज्या संस्थेचे गुणगान गाताना त्यांची जीभ थकत नसे, त्या संस्थेची, त्या संस्थेतील काही उच्चपदस्थांची त्यांच्या अखेरच्या काळातील वागणूक ही धादांत माणुसकीशून्य होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या कर्तव्याआड मात्र त्यांनी कधीही आजारपण येऊ दिले नाही. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरही ते कचेरीत जात असत. बातम्या देत असत. पण आता त्यांच्या कचेरीला त्यांची गरज राहिलेली नव्हती. बातमीदारीतला ब किंवा ब्रही ज्यांना अजून नीट उच्चारता येत नव्हता, अशा कॉलेजफ्रेश मुलीही आता देशमुखांना बातमी कशी असावी, हे सांगण्यास धजावू लागल्या होत्या. देशमुखांनाही ही नवी बातमीदारी कधीही उमजली नव्हती. मॉलमध्ये या आठवड्यात कोणती नवी स्कीम आली आहे, याच्या रसभरीत बातमीऐवजी देशमुखांना सरकारने कोणती नवी योजना आखली आहे, यात रस होता. बी प्लस आणि ए प्लस वाचक ही काय भानगड आहे, हे त्यांना कळत नव्हते. ज्याला मराठी वाचता येते ते सगळे आपले वाचक, अशी त्यांची काहीशी भाबडी समज होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;देशमुखांनी बातमीदारी केली ती प्रामुख्याने सर्वसामान्यांसाठीच. तसा आव खरेतर सारेच आणत असतात. पण देशमुखांना हे 'सर्वसामान्य' म्हणजे नेमके कोण, ते कुठे राहतात, ते काय खातात हे सगळे माहित होते. हल्ली बातमीदारांच्या मुंबईची शीव मंत्रालय, विधिमंडळ, पालिका, रेल्वे आणि पोलिस मुख्यालय यापुढे जात नाही. देशमुखांना तळहातांवरील रेषांप्रमाणे मुंबई माहित होती. राजभवन ते भांडुप-मुलुंडच्या झोपडपट्ट्यांपर्यंत सर्वत्र त्यांचे फिरणे होते. देशमुखांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांविषयी एक लेखमाला लिहिली होती. दिवसभर फिरून बातमी देण्यासाठी ते जेव्हा कचेरीत येत, तेव्हा लोक ओरडत त्यांच्यावर - "देशमुख, अंगाचा कसला वास मारतोय!" नरकसदृश झोपडपट्ट्यांतून फिरून आल्यानंतर अंगाला असाच वास येणार. देशमुख झोपडपट्ट्यांची अवस्था समक्ष पाहून येत असत आणि मगच त्यावर लिहित असत. ती लेखमाला अर्थातच गाजली, हे वेगळे सांगायला नको. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा प्रकारे थेट जाऊन, पाहून, लोकांशी बोलून बातमीदारी करण्याचा प्रकार आजकाल फारसा आढळत नाही. आणि म्हणूनच मग पत्रकारांचे अंदाज चुकतात. लोकसभेच्या निवडणुकीत हेच झाले. देशमुख असते, तर त्यांनी नक्कीच नेहमीप्रमाणे मुंबईभर पायपीट केली असती. अनेकांशी बोलले असते. नेत्यांच्या मसलतखान्यांपासून गल्ल्यांमधल्या पानटप-यांपर्यंत सगळीकडचे कानोसे त्यांनी घेतले असते. अभ्यासाला वस्तुस्थितीच्या अवलोकनाची जोड दिली असती. आणि मग त्यांनी जे वार्तापत्र लिहिले असते, जे भाकित वर्तविले असते, ते असे चुकले नसते!&lt;br /&gt; &lt;br /&gt;असो. &lt;br /&gt;देशमुख गेले. बरोबर वर्षापूर्वी ते गेले. &lt;br /&gt;त्यांच्याबरोबर पायपीट करणा-या बातमीदारांची पिढीही इतिहासजमा झाली!&lt;br /&gt;हेही आता असोच!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by चांगदेव पाटील, दि. १८ मे २००९)&lt;br /&gt;संबंधित वृत्त - &lt;a href="http://batmidar2.blogspot.com/2009_05_18_archive.html"&gt;प्रकाश देशमुख यांच्या स्मृत्यर्थ शिष्यवृत्ती&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-6561340457881746013?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/imuBWrMBxJY" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/imuBWrMBxJY/blog-post_18.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">15</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/05/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-741827798240349745</guid><pubDate>Wed, 13 May 2009 07:08:00 +0000</pubDate><atom:updated>2009-05-13T12:44:53.344+05:30</atom:updated><title>सगळे काही हसण्यावारी...</title><description>दिवस सुटीचा. वेळ बाराची. &lt;br /&gt;दोन डिशा कांदेपोह्याच्या, वर कोपभर कषायपेय व दोन खारी, ऐसा तुडुंब अल्पोपहार नुक्ताच झाला होता. नियोजनानुसार आता वामकुक्षीची वेळ झाली होती. तेव्हा स्वतःस बा नीज गडे लडिवाळा ऐसे बजावत आम्ही डोळ्यांवर लोकमत ओढला व हाताशी सकाळ ठेवला. हाही आमुचा नित्यक्रम. लोकमतच्या अग्रलेखाने पेंग आली रे आली, की सकाळचे संपादकीय घ्यायचे! विश्वासार्ह निद्रेची शाश्वती शक्य! &lt;br /&gt;एकूणात आमुचे झोपेचे प्रयोग सुरु होते, तोच दाराची कडी अवचट वाजली. हे कोण बरे तडमडले, ऐसा संत्रस्त विचार करीत आम्ही कवाडे खोलली, तर समोर साक्षात् लेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यांचा पण बुधवारचा विकली ऑफ झाला की काय? बोंबला! मनीं ऐसा प्रेमळ विचार करीतच आम्ही लेलेंचे स्वागत केले. अखेर काहीही झाले तरी लेले हे आमचे शेजारी आहेत. (शिवाय त्यांचेकडे एटीएम कार्डही आहे!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;नमनाला एक थेंबही तेल न दवडता, हातातील लोकसत्ता फडकावत लेलेंनी भडिमारास सुरुवात केली, &lt;br /&gt;"तुम्हाला काय वाटतं, मराठीतले तुम्हीच एकमेव विनोदी पत्रकार आहात काय?"&lt;br /&gt;"ऑं!?!??" लेलेंच्या या प्रश्नाने आम्ही भुईसपाटच झालो. काय उत्तरावे तेच सुचेना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वास्तविक आमच्या मते, आम्ही म्हणजे हजरजबाबी! जाबसालात हार जाणार नाही कोणास! कोणताही प्रश्न फेका आमुचे उत्तर तयार! सह्याद्री, साम मराठी या वाहिन्यांवरून कित्ती कित्ती अवघड बहुपर्यायी प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ परवा त्यांनी प्रश्न विचारला होता, की माहेरची साडी या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीने काम केले होते - अलका कुबल, अलका बुकल की अलका कबुल? केवढी काठिण्यपातळी! सर्वसामान्य प्रेक्षकांच्या ज्ञानाची केवढी मोठी ही परीक्षा! पण आम्हांस काय नाय त्याचे! एका फटक्यात सांगून टाकले - अलका कुबल. तथापि लेलेंच्या या प्रश्नाने आमुचे दोन्ही मेंदू आमूलाग्र हलले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;"लेले, अहो असं कसं म्हणता! केवढे बडेबडे विनोदी पत्रकार-लेखक आहेत मराठीत..."&lt;br /&gt;"नाव घेऊन बोला. हवे तर त्यांच्या पेपरचे नाव नाही घेतले तरी चालेल. दुस-या पेपरातले असतील, तर नुसते ज्येष्ठ पत्रकार म्हटले तरी पुरेसे! पण नाव घेऊन बोला..," लेलेंनी बोलता बोलता मराठी पत्ररुढीच्या कासोट्यालाच हात घातला!   &lt;br /&gt;"अहो, मटातले चकोर आहेत. छान, ओल्या नारळाच्या करंजीसारखं लिहितात... खुसखुशीत! आमचे लोकसत्तेतले तंबी दुराई आहेत. भाषा बघा त्यांची आणि विनोदाची खोली! झालेच तर महागुरु प्रवीणभाई टोकेकर आहेत... भंकसकार विसोबा खेचर आहेत... कुणाचे नाव घ्यायला आपण डरतो की काय!!" &lt;br /&gt;(बोलता बोलता जठरातील ऍसिडिटी एकदम घशातच आली! हा चहाखारीचा परिणाम की कुणाबद्दल बरे बोलल्याचा? डॉक्टरला दाखविले पाहिजे!)&lt;br /&gt;"हेच ते... हेच ते... तुम्ही म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांचीच नावं घेणार! बाकीच्या पत्रकारांमध्ये विनोदबुद्धीच नाही, असं वाटतं ना तुम्हाला!!" लेले खवळून बोलले. &lt;br /&gt;(हे आमचे जवळचे लोक? मनःपूर्वक व सविनय सांगतो, त्यांच्या सावलीशी जाण्याचीही आमची पात्रता नाही!)&lt;br /&gt;"नाही नाही, असं कधी म्हटलो मी? बाकीच्या पत्रकारांमध्ये विनोदबुद्धी नसती, तर एवढे विनोदी पेपर निघाले असते का?" &lt;br /&gt;"करा, करा, टीका करा... कोणत्या पेपराबद्दल तुम्ही कधी चांगलं म्हटलंय का?" &lt;br /&gt;"लेले, अहो विनोदाला विनोदी म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं? आता परवाची सकाळमधली बातमी बघा.. संपादक विशेष प्रकल्प म्हणून नियुक्ती! संपादक... विशेष प्रकल्प!?" (खीखीखी!!!)  &lt;br /&gt;"मग त्यात हसण्यासारखं काय आहे? उलट अशी अभिनव पदनामे निर्माण करण्याच्या हातोटीबद्दल सकाळकारांना शाल व श्रीफल द्यायला पाहिजे!!" &lt;br /&gt;"आणि हा पुढारी..."&lt;br /&gt;"त्याचे काय? तो आला ना?"&lt;br /&gt;"आला ना! पण येण्यापूर्वी किती छान वाटत होता!!" &lt;br /&gt;"मग?"&lt;br /&gt;"अंधारात कोणीतरी आपल्याला भॉ करतं. आपण एकदम दचकतो. आणि मग कशाला घाबरलो, म्हणून हसायला लागतो!" आम्ही किंचित फिलॉसॉफीत शिरलो. &lt;br /&gt;"त्याचा पुढारीशी काय संबंध?"&lt;br /&gt;"आहे ना! लोकमत आणि सकाळमध्ये लोक हल्ली असेच हसताहेत!.... हे सगळं विनोदी नाही काय लेले?" आम्ही इनोसण्टली विचारले. &lt;br /&gt;"पण हे पेपरांबद्दल झालं. मी पत्रकारांबद्दल बोलतोय," लेले मुद्दा काही सोडत नव्हते. &lt;br /&gt;शेवटी आम्हीच हार पत्करली, "असतील ना.. पत्रकारही विनोदी असतील..."&lt;br /&gt;"असतील नव्हे, आहेतच. मी पुराव्याने बोलत असतो!"&lt;br /&gt;पुरावा? पत्रकार विनोदी असल्याचा चक्क पुरावा आहे लेलेंकडे? आमचे दोन्ही मेंदू तिनशेसाठ अंशात चक्रावले.&lt;br /&gt;"हा बघा आजचा लोकसत्ता. वाचा ही बातमी. बघा यात काय म्हटलंय..." &lt;br /&gt;"अहो, ही कसाबच्या खटल्याच्या सुनावणीची बातमी आहे."&lt;br /&gt;"पुढे वाचा ना... काय म्हटलंय? 'न्या. टहलियानी यांनी, तू ओंबळेंचे नाव उच्चारताच का हसतोस अशी विचारणा कसाबकडे केली. त्यावर कसाबने आपण जाणूनबुजून हसत नाही, तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्याला हसायला भाग पाडतात, असा दावा केला.' आलं ना लक्षात? अहो भर कोर्टात एका क्रूर कसाबाला हसायला लावणे म्हणजे काही सोपे काम नाही! पण आपल्या न्यायालयीन प्रतिनिधींनी ते केले आहे. म्हणजे कसाबचा तसा दावा आहे. आणि तो खरा असेल, तर बापू, आपले सर्व पत्रकार हे अत्यंत विनोदी आहेत, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल."&lt;br /&gt;आता एवढे सगळे वाचल्यानंतर, आम्ही तरी ते कुठल्या तोंडाने अमान्य करणार होतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही मग सगळेच हसण्यावारी मान्य केले &lt;br /&gt;व मग हसण्यावारीच समस्त पेपरे वाचू लागलो... &lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. १३ मे २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-741827798240349745?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/xXL7GUiQ8a4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/xXL7GUiQ8a4/blog-post_13.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">9</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/05/blog-post_13.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-1785829107268514125</guid><pubDate>Mon, 11 May 2009 07:40:00 +0000</pubDate><atom:updated>2009-05-11T13:13:54.971+05:30</atom:updated><title>निवेदन</title><description>बातमीदारवर नवा लेख घेऊन लवकरच येतोय...&lt;br /&gt;तोवर वाचा -&lt;br /&gt;पूढारितील मूद्रीतशोध नाचा येटकोळ!&lt;br /&gt;ढापूकलेचा नवा नमुना&lt;br /&gt;लोकप्रभेतला जोडा &lt;br /&gt;आणि बरेच काही&lt;br /&gt;&lt;a href="http://batmidar1.blogspot.com/"&gt;सहयोगी बातमीदार&lt;/a&gt;मध्ये...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-1785829107268514125?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/Ynmdw9F7EMY" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/Ynmdw9F7EMY/blog-post_11.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">2</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/05/blog-post_11.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-3946961082566674483</guid><pubDate>Mon, 04 May 2009 06:12:00 +0000</pubDate><atom:updated>2009-05-04T11:54:58.264+05:30</atom:updated><title>गणगौळण</title><description>आता निस्तं समजायचं बरंका मंडळी... &lt;br /&gt;निस्तं समजायचं, का ह्यो एक रंगमंचहे. ह्या रंगमंचावर नेपथ्या म्हनून एक परदा सोडलेलाहे. त्या परद्यावर यमुनेचं चित्र काडलेलंहे. यमुना म्हंजे रात्र काळी, घागर काळी यमुनाजळी काळी वो मायमधली यमुना! आधीच स्पष्ट केलेलं बरं. नाय तं तुमचा गैरसंबंध व्हायचा! त्या यमुनेच्या काठावर एक वडाचा डेरेदार वृक्शहे. रंगमंचाच्या मोहरं पब्लिक म्हंजी मायबाप प्रेक्शकजन बसलेलंहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पन मंडळी ह्यो इव्हेंट हाय तरी काय? &lt;br /&gt;तं तुम्हाला आता लई ताटकळत ठेवत नाय. सांगूनच सोडतो, का इथं आता गनगौळन व्हनार हाय. ते बगा 'घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निगाल्या पान्या गौळनी' या गवळनगीताचं बॅकग्राऊंड मुझिकबी सुरु झालं. &lt;br /&gt;(सारेगमप लिटिल च्यांपमधी हे गीत कोनी गायलं व्हतं? पल्लवी जोशीनं की कार्तिकी गायकवाडनं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा पत्रकारांना, मुंबईत पुढारी नेमका कव्हा लॉंच व्हनार याची तारीख पोस्टाने कळविन्यात येईल. तव्हा पाचपाचपाच चारपाचपाच या क्रमांकावर लगेच यसेमेस करा.) &lt;br /&gt;ते बगा, आला... आला... (पुढारी नव्हं!) रंगमंचावर गवळनींचा जथा आला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पेंद्या - स्टॉप. कोणीही यापुढं जायचं नाही... खबरदार! जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या... &lt;br /&gt;मावशी - येss, चिंधड्या कोणास म्हणतो रे फुल्याफुल्याफुल्या? &lt;br /&gt;पेंद्या - छट्, वाक्य पण पूर्ण करु देत नाहीत!... डायरेक्टर, आपण गणगौळण सादर करतोय की 'आजचा सवाल'? च्यामारी, सगळेच आजकाल अर्णब गोस्वामी झालेत!! &lt;br /&gt;मावशी - अगंss बाई! वाक्य अर्धवटच राह्यलं का तुमचं? बोला बोला...&lt;br /&gt;पेंद्या - आता बोलाबिला काही नाही! आधी मला सांगा तुम्ही कुठं चाललात?  &lt;br /&gt;गौळण - मावशे, कोण गं हा ऑम्बुडस्मन?&lt;br /&gt;पेंद्या - मी कोण? मी कोण? माहित नाही तुला?&lt;br /&gt;गौळण - सगळं माहित असायला, मी काय त्रिकालवेधी आहे? तेवढा दृष्टिकोन नाही माझ्याकडे!! &lt;br /&gt;मावशी - अगं पेंद्या आहे तो! त्याच्या नाववरचा पीआरबीचा स्टार तरी लक्षात घ्यायचास! हा स्टार लागला की माणसाला वाटतं, आपण किती विद्वान, आपण किती प्रसिद्ध! पण हल्ली ना, केवळ पत्रिकेत स्टार असतील ना, तर कोणालाही हा स्टार मिळतो.... म्हणजे, असं पुण्यात म्हणतात! &lt;br /&gt;गौळण - ओह आय सी! &lt;br /&gt;पेंद्या - पटली ना ओळख? मग आता मला सांगा, कुठं निघालात तुम्ही?  &lt;br /&gt;मावशी - हा पेंद्या म्हणजे गेल्या जन्मी नक्की उपसंपादक असला पाहिजे! त्यांना रोजरोज तीच ती पानं लावून कंटाळा येत नाही. आणि याला रोजरोज तोच तो सवाल विचारून बोअर होत नाही! अरे, आम्ही मथुरेच्या बाजाराला निघालो आहोत...&lt;br /&gt;पेंद्या - बाजाराला? ते कशासाठी?  &lt;br /&gt;गौळण - प्रेस कॉन्फरन्स आहे कॉकटेल-डिनरवाली! येतोस? अरे, प्रॉडक्ट विकायला चाललोय आम्ही.&lt;br /&gt;पेंद्या - मग अजिबात जाऊ नका. बाजार आधीच सॅच्युरेट झालाय. आता तिथं स्कोप नाही.  &lt;br /&gt;मावशी - कोण म्हणतो स्कोप नाही? मार्केटिंग पक्कं असलं ना, तर कुठंही दर्डावून सेल करता येतो. हे इकॉनॉमिक्स जरा पुढार-लेलं आहे. तुला समजायचं नाही! &lt;br /&gt;पेंद्या - मग तू समजावून सांग.&lt;br /&gt;मावशी - तसं काही फार अवघड नाही ते. आता हे बघ. हे काय आहे? निरसं दूध. क्वालिटीदार. पण त्याची किंमत जास्त. प्रॉडक्शन व्हॅल्यू जास्त. आपण ते विकायचंच नाही. आपण दूध घ्यायचं. त्यात जरा पाणी घालायचं. थोडा युरिया घालायचा. किंचित साखर घालायची. क्वांटिटी वाढवायची. तिकडं कोल्हापुरात तर दुधात तिखट मसालासुद्धा घालतात! आणि असं दूध सुरवातीला स्वस्तात विकायचं. रुपयाला एक शेर! लोकांचं काय आहे, लोकं नुसती दुधाची पिशवी बघतात! ती झॅकपॅक असली म्हणजे झालं!... आणि महत्त्वाचं म्हणजे, बाजारात दुस-या डेरीचं दूध सहसा येवूच द्यायचं नाही. किरकोळ विक्रेत्यांना लोणी लावलं, की तेही जमून जातं... पुढं पुढं लोकांनाही मग अशाच दुधाची सवय लागते! मग त्यांना सकाळ-चं रतीबाचं दूध नको होतं!   &lt;br /&gt;गौळण - मावशे, अगं त्याला असं सांगून समजायचं नाही. त्यापेक्षा पेंद्या, तूच चल ना आमच्याबरोबर बाजाराला. समक्षच सगळं बघता येईल तुला... &lt;br /&gt;मावशी - खरंच की! चल की. आपण वन डे वुईथ मावशी करू या!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(वन डे वुईथ मावशी करायचं आसंल, तं त्या पॅकेजची किंमत किती व्हईल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा टीव्ही पत्रकारांना, एका पेडन्यूजच्या पैशांचा चेक घरपोच पाठविला जाईल. तव्हा आपापल्या मार्केटिंग खात्याला लगेच यसेमेस करा. नंबर तं सगळ्यांनाच माहित हाये!!) &lt;br /&gt;&lt;br /&gt;पेंद्या - मावशे, तू तर गोरस विक्रीचा धंदाच करायला लागलीस?&lt;br /&gt;गौळण - येss, धंदा म्हणायचं काम नाही! हा धंदा असला, तरी त्याला व्यवसाय म्हणायचं!&lt;br /&gt;मावशी - पाणीदार दूध असलं, तरी त्याला प्रॉडक्ट म्हणायचं!&lt;br /&gt;गौळण - आणि एकदा प्रॉडक्ट म्हटलं, की सगळं माफ असतं. ते विकलं जातं की नाही, एवढंच महत्त्वाचं असतं! &lt;br /&gt;पेंद्या - हे काही खरं नाही! काही खरं नाही! आपल्याला काही हे जमणार नाही! आपल्याला काही हे पटत नाही!&lt;br /&gt;मावशी - पेंद्या, तुला एक सल्ला देऊ?... बाळा, असं काही चुकूनही रडू नकोस. असं रडणाराचं काय होतं माहित आहे का?&lt;br /&gt;पेंद्या - काय होतं?&lt;br /&gt;मावशी - तो आजी असेल, तर माजी होतो. नाही तर...&lt;br /&gt;पेंद्या - नाही तर?&lt;br /&gt;मावशी - नाही तर काय य माजी होतो!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. ४ मे २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-3946961082566674483?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/4W9CrzhNUOg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/4W9CrzhNUOg/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">22</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/05/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-2260882663871519661</guid><pubDate>Tue, 28 Apr 2009 18:35:00 +0000</pubDate><atom:updated>2009-04-30T13:56:59.811+05:30</atom:updated><title>विक्रम, वेताळ आणि वृत्तपत्रविश्व</title><description>राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतातला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला. आणि म्हणाला, राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटते. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. ऐक...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आर्यावर्तात पत्रनगर नामक एक विशाल नगरी होती. तेथे सम्राट पत्रवणिक राज्य करीत असत. सम्राट पत्रवणिक हे महान पराक्रमी होते. परंतु मनुष्य कितीही पराक्रमी असला, तरी युद्धात त्याचेही नुकसान होतेच. शत्रुपत्रांच्या नित्य स्वा-यांमुळे पत्रनगर साम्राज्याच्या वर्धापन व रिटेन कार्यात खूपच खर्च होत होता. त्या कारणें पत्रनगरच्या खजिन्यावर ताण येत होता. सम्राट पत्रवणिक यांना त्याचीच मोठी चिंता असे. त्या चिंतेने त्यांच्या जिव्हेस अस्थीभ्रंश विकार झाला होता. या विकारात मनुष्यप्राण्याचा जिव्हेवरील ताबा सुटतो व ती अद्वातद्वा चालते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सम्राट पत्रवणिक यांच्या दरबारात का.सं.दत्त नामक प्रधान होते. का.सं.दत्त हे चौदा कला व चौसष्ट विद्यांमध्ये पारंगत होते, असे त्यांचे स्वमत होते! परंतु ते वस्तुतः व्यवस्थापनकलाकुशल होते. त्या कारणें पत्रनगरच्या कारभाराचा रथ ते उत्तमरीत्या हाकत होते. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे पत्रनगरचे प्रजाजन व पत्रश्रेष्ठी मनोमन कुढत दिनक्रमण करीत होते. का.सं.दत्त यांना एकच दुःख होते. ते म्हणजे सम्राट मीडियादत्त यांचा जिव्हाविकार. त्या विकाराचा फटका कासंदत्त यांना नित्य बसे. त्या कारणे ते मनोमन दुःखी असत. परंतु मासाखेरीस मिळणारे द्रव्य पाहून ते आपले दुःख प्राशन करून घेत असत. असा एकूण काळ चालला होता. ऋतुंमागून ऋतू चालले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा वसंत ऋतु सरता सरता सर्व मासांमध्ये उत्तम असा निवडणूक मास दाखल झाला. पत्रनगरच नव्हे तर अन्य राज्ये व साम्राज्ये यांतही हा मास हर्षोल्हासाने साजरा करतात. कोणी त्यास रणांगण नामे साजरे करते, तर कोणी त्यास कुरुक्षेत्र म्हणते, तर कोणी त्यास पॉवरप्ले म्हणते. एका पत्रराज्यात तर त्यास आयपीएल नामेही संबोधिले जाते. याच मासारंभी एके दिवशी प्रातःकाली का.सं.दत्त आपल्या कचेरीमहालातील अंतःपुरात बसले होते. एकाग्रचित्ताने ते साम्राज्यातून आलेले अहवालपठण करीत होते. अचानक त्यांच्या भालप्रदेशावर आठ्यांचे जाळे पसरले. भृकुटी वक्र झाली. त्यांनी तत्त्काल मेजावरील दूरध्वनीसंयंत्र हाती घेतले व त्यावरील कळफलकावरून काही क्रमांक दाबले.  &lt;br /&gt;दूरध्वनीसंचातून काही काळ होले होले हवा चालती है ऐसे हवामानगीत ऐकू येऊ लागले. किंचित कालाने त्यातून हॅलो असा भित्रट ध्वनी आला. तो ऐकताच कासंदत्त आपल्या व्यवस्थापनकुशल स्वरात म्हणाले, "वृत्तदास, मी का.सं.दत्त बोलतोय."&lt;br /&gt;"हां सर?"&lt;br /&gt;"अहो वृत्तदास, अमुक मतदारसंघातून किती वीर द्वंद्वास उतरले आहेत?"&lt;br /&gt;"द्वादश, सर. परंतु खरे द्वंद्व दोनच योद्ध्यांमध्ये आहे. सत्तामित्र व अर्थकेतू अशी त्यांची नावे आहेत."&lt;br /&gt;"होय ना? परंतु आपल्या पत्री केवल सत्तामित्र यांचेच वृत्त दिसते आहे." का.सं.दत्त संतापून विचारते झाले. &lt;br /&gt;त्यावर वृत्तदास म्हणाला, "होय सर. सत्तामित्र यांच्याशी आपण संधी केली आहे. तसे मला सूचित करण्यात आले होते."&lt;br /&gt;सत्तामित्र यांच्याशी सदरील संधीकरार का.सं.दत्त यांच्याच व्यवस्थापनकौशल्यामुळे जाहला होता. त्या करारामुळे साम्राज्याच्या खजिन्यात पंचदश लक्ष सुवर्णमुद्रांची भर पडणार होती.&lt;br /&gt;"होय, परंतु वृत्तदास, याचा अर्थ असा नाही, की अर्थकेतू यांची वृत्ते देणे नाही. त्यांचीही वृत्ते दिसली पाहिजेत."&lt;br /&gt;"होय सर," वृत्तदास म्हणाला, "आजपासून तसे करतो."&lt;br /&gt;"हे पाहा, एकदम तसे करू नका. प्रथम त्यांच्यासमवेत संधीकरार करा. त्यांची पॅकेजक्षमता समजून घ्या. पत्रनगरची सेवा करण्याची ही संधी तुम्हांस मिळते आहे, हे तुमचे केवढे सौभाग्य आहे वृत्तदास!"&lt;br /&gt;का.सं.दत्त यांच्या या विधानाने वृत्तदास यांच्या उदरी विशाल खड्डा पडला. परंतु मासाखेरीस मिळणारे द्रव्य पाहून त्यांनीही तो खड्डा भरून काढला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, की हे राजा, सत्तामित्र व अर्थकेतू यांच्यात द्वंद्वयुद्ध होणार असताना व सत्तामित्र यांची वृत्ते आपल्या पत्री प्रसिद्ध होत असतानाही का.सं.दत्त यांनी अर्थकेतू यांचीही वृत्ते प्रसिद्ध करण्याचा आग्रह का धरला? त्या मुळे सत्तामित्र यांच्यावर अन्याय होणार नाही का? तसेच अर्थकेतू यांच्याशीही संधीकरार करण्याची आज्ञा ऐकताच वृत्तदास यांच्या उदरात खड्डा कशामुळे पडला? या प्रश्नांची उत्तरे ठावूक असूनही दिले नाहीस, तर हे राजा, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावरती लोळू लागतील!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ते ऐकताच विक्रमादित्याने आपले मौन सोडले व तो सांगू लागला, हे वेताळा, का.सं.दत्त हे पत्रसंपादक असून, त्यांचे पत्र हे मोठे विश्वासार्ह असल्याचे या कथेतून प्रतित होते. विश्वासार्हता हा मोठा सद्गुण आहे. तो कमावण्यास खूप काळ लागतो. गमावण्यास क्षणही पुरेसा असतो. ही विश्वासार्हता निष्पक्षपातीपणातून येत असते. सत्तामित्र याच्याशी पत्राची संधी होती. त्या कारणे त्याची वृत्ते छापून येत होती. व त्या बदल्यात पत्रनगरीच्या खजिन्यात पंचदश लक्ष सुवर्णमुद्रा जमा झाल्या होत्या. परंतु त्यामुळे अर्थकेतू याच्यावर अन्याय होत होता. तो दूर करण्याकरीता व निष्पक्षपातीपणा टिकविण्यासाठीच का.सं.दत्त यांनी अर्थकेतू याच्याशीही संधी करण्याची आज्ञा वृत्तदासास दिली. त्यामुळे दोघांस समान न्याय मिळून, पत्रनगरची विश्वासार्हता टिकून त्याचबरोबर खजिन्यात भरही पडणार होती. म्हणून का.सं.दत्त यांचा आग्रह रास्तच आहे. मात्र पत्रनगरच्या खजिन्यात भर पडली तरच आपणांस मासाखेरीस द्रव्यलाभ होईल हे वृत्तदासास त्याच्या अविद्येमुळे समजले नाही. शिवाय तो -हस्वदृष्टीचा होता. पत्रनगरच्या लाभाऐवजी त्यास आपला स्वार्थ दिसत होता. त्याच्या उदरी खड्डा पडला यातून, वृत्तदास आधीच अर्थकेतू यांस जाऊन भेटला होता, हे स्पष्ट होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजाच्या या उत्तराने वेताळ खुश झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.&lt;br /&gt;त्याच्या बाजूलाच वृत्तपत्रांची विश्वासार्हता व निष्पक्षपातीपणाही लोंबकळत होता!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २९ एप्रिल २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-2260882663871519661?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/LuOqbdIe0DU" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/LuOqbdIe0DU/blog-post_29.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">17</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/04/blog-post_29.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-4741118105964540413</guid><pubDate>Mon, 27 Apr 2009 06:52:00 +0000</pubDate><atom:updated>2009-04-27T12:29:56.299+05:30</atom:updated><title>वृत्तढापूकला व शास्त्र</title><description>ढापू बाई ढापू &lt;br /&gt;गं ढापू बाई ढापू&lt;br /&gt;एक बातमी ढापू &lt;br /&gt;गं दोन लेख ढापू&lt;br /&gt;कुणाला कळतंय? &lt;br /&gt;दे ठोकून... छापू&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पारंपरिक वृत्तपत्रीय लोकगीत असल्याचे सर्वश्रुत आहेच. वृत्तपत्रांचा लेलेकृत इतिहास निव्वळ चाळला, तरी अनेक श्रीयुतांनी हे गीत आळवल्याचे आपणांस दिसून येईल. आणि समस्तांस हे ज्ञातच आहे, की मराठी माणूस म्हटला की तो परंपराप्रिय असतोच. त्या कारणें समकालिन मराठी पत्रविश्वातही हे ढापू गीत ऐकावयास खासच मिळते. ज्याची सुरम्य उदाहरणे नेहमीच आपणांसमोर फडफडत असतात.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यातील एक ताजे टवटवीत तरल उदाहरण येथे उद्धृत करण्यायोग्य आहे. &lt;br /&gt;ते वृत्त होते आमदारनिवासातील. एका मंत्र्याच्या पाहुणीस मंत्रीपत्नीने रात्रीच्या समयी चौदावे रत्न दाखविले, अशी ती रा. रा. सुकृत खांडेकरकृत सुरस व चमत्कारिक बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती. (वाचली होती ना तुम्ही ती बातमी... अगदी शेवटच्या पूर्णविरामापर्यंत? चवीचवीने?... तिचे पारायण करताना, भाव दाटले मनी अनामिक असे विचित्रसे काही होऊन आमच्याही नाडीचे ठोके वाढले होते!) तर तीच बातमी दुस-या दिवशी अन्य काही पत्रांमध्येही झळकली. शेमटूशेम. माशीटूमाशी. ते पाहून आम्ही मनोमनी म्हटले, असू देत. ढापू देत. अशी माहिती सर्व पत्रांच्या वाचकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने लोक असे काही वाचून काळजी तरी घेत जातील. तात्पर्य काय, तर ढापणाराने असा विवेक व तारतम्य ठेवून बातमी ढापली, तर कुणाची काही तक्रार असण्याचे कारण नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वस्तुतः वृत्तढापूगिरी ही जशी कला आहे, तसेच ते एक शास्त्र आहे. ते ठाऊक असलेला बातमीदार कधीही लोकप्रिय व स्वस्त इंग्रजी दैनिकांतील बातमी ढापत नाही. तो विचार करतो, की टैम्सॉफिंडिया वा एचटीमधील बातमी ढापणे म्हणजे सीसीटीव्हीक्यामे-यासमोर उभे राहून चोरी करण्यासारखे आहे. ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठीच करायचे, तर मग हिंदु, इकॉनॉनिक्स टाइम्स आदी जड पत्रेच का घेऊ नयेत? फ्री प्रेस इंड्या असेल तर अतिउत्तम. (ते मोठे जादुई वृत्तपत्र आहे. असते, पण दिसत नाही!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;ढापूगिरी कलाप्रांतात महामाहिर असलेले बातमीदार कधीही बातमी जशीच्या तशी ढापत नाहीत. ते बातमीचा फॉलोअप देतात! त्यात अर्थातच थोडी जास्त अंगमेहनत असते. पण ती अनेकदा सार्थकीही लागू शकते. कारण की अशा बातमीत बायलाईन मिळण्याची अंगभूत सोय असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व वाचल्यानंतर आपणांस या कला व शास्त्रात काहीच काठिण्यपातळी नाही, असे वाटू शकेल. पण वाचकांतील पत्रकार हो, येथे फसगत होण्याची शक्यता असते. जशी ती सकाळमधील एका उपसंपादकाची झाली. ती कथाही मोठी मनोरंजक व ज्ञानवर्धक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती एप्रिल फूलची गोष्ट आहे. &lt;br /&gt;(माहितीसाठी - दरवर्षी १ एप्रिल रोजी एप्रिल फूल असतो.) &lt;br /&gt;तर त्या दिवशी लोक एकमेकांस एप्रिल फूल करतात. अनेक वृत्तपत्रे त्या दिवशी थोडीशी चंमतग करतात. एखादी भन्नाट बातमी देतात, की वाचकांस क्षणभर भिरभिरल्यासम व्हावे. चाणाक्ष वाचक मात्र अशा बातम्यांना फसत नाहीत. ते अशा बातम्या वाचतात. ओठांच्या कोप-यातल्या कोप-यात कणभर हसतात. आणि मग ती बातमी विसरून जातात. (हे अर्थात सरासरी सगळ्याच बातम्यांबाबत होत असते. शिवाय आता वाचकांस एप्रिलफूल बातम्यांत फारसा रसही राहिलेला नाही. इंड्या टीव्ही व आयबीएनसेव्हन व सामना व पुण्यनगरी असताना त्यात कुणास काय नाविन्य वाटेल? असो.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर गेल्या एक एप्रिलला महाराष्ट्र टाइम्सच्या पोटातील मुंबई टाइम्स पुरवणीने अशीच एक गंमत केली. त्यांनी चक्क भार्गवी चिरमुले ही आपली मराठी अभिनेत्री थेट बॉण्डपटात झळकणार अशी &lt;a href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4341839.cms"&gt;बातमी&lt;/a&gt; प्रसिद्ध केली. या वृत्तातच 'सविस्तर बातमी वाचा पान तीनवर' अशी जोडणीही देण्यात आली होती. पान तीनवर स्वच्छपणे 'एप्रिल फूल बनाया' असे छापले होते. थोडीशी गंमत. दुसरे काय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण ही गंमत पुणे सकाळच्या त्या कुण्या ढापूकलाशास्त्रात प्रवीण नसलेल्या उपसंपादकाच्या डोक्यावरून गेली. अगदी तीनताड गेली. &lt;br /&gt;त्यास बिचा-यास खरेच वाटले, की आपल्या भार्गवीताई खरोखरीच बॉण्डपटात काम करणार आहेत. (जेम्स बॉण्डला एक धाकटी बहिण असते. ती लहानपणीच बिछ़डलेली असते. मग एकदा अतिरेक्यांचा माग काढत बॉण्ड ऐन गणपतीत पुण्यात येतो. आणि सिटी पोस्टाजवळ नेमकी त्याला ही धाकटी बहिण सापडते. तीच आपली भार्गवीताई, असा काहीसा त्या उपसंपादकाचा समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.)    &lt;br /&gt;ही गुडन्यूज आपल्याही, म्हणजे सकाळच्या लक्षलक्ष वाचकांना कळावी म्हणून त्याने हळूच मटाची ती एक एप्रिलची बातमी उचलली व सरळ &lt;a href=" http://beta.esakal.com/2009/04/09142717/entertainment-bhargavi-chirmul.html. "&gt;सकाळ&lt;/a&gt;च्या पुणे (ग्रामीण) आवृत्तीत नऊ एप्रिलला प्रसिद्ध करून टाकली. (नऊ एप्रिलला प्रसिद्ध केल्यामुळे ती बातमी आपोआपच एप्रिल फूलची होत नाही, असाही त्या उपसंपादकाचा समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुण्यात कसल्याच शक्यता नाकारता येत नाहीत!) &lt;br /&gt;&lt;br /&gt;तात्पर्य काय, तर माणूस ढापूकलेत किमान मॅट्रिकपास तरी पाहिजे! नाही तर बिचा-या त्या सकाळच्या उपसंपादकासारखे होते. आपण तर एप्रिल फूल बनतोच, पण वाचकांनाही शेंडी लावून जातो. (खोटे नाही हे. पुराव्यादाखल सकाळच्या संकेतस्थळावर त्या बातमीखाली प्रसिद्ध झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पाहा. काही जणांनी तर आपल्या मराठी बाण्यास जागून भार्गवीचे खूप खूप अभिनंदन केले आहे!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता यावर सकाळ काही खुलासा-बिलासा करणार का? असा प्रश्न मात्र तुम्ही विचारू नये.&lt;br /&gt;असे प्रश्न अग्रलेखांसारखेच असतात. भाकड! &lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २७ एप्रिल २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-4741118105964540413?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/rLM7dJxQuYg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/rLM7dJxQuYg/blog-post_27.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">10</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/04/blog-post_27.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-3982265894774503382</guid><pubDate>Tue, 21 Apr 2009 07:16:00 +0000</pubDate><atom:updated>2009-04-23T19:12:24.383+05:30</atom:updated><title>गोखलेकृत भाषांतरमाला</title><description>विद्या-अर्थीमित्र हो, &lt;br /&gt;आज आपण येथे संगणकावरील माहितीच्या महाजालाची उपयुक्तता व गुगलपूर्व व गुगलोत्तर कालखंड या विषयीची माहिती घेणार आहोत. &lt;br /&gt;इसवीसनाच्या विसाव्या शतकातील गुगलपूर्व कालखंडात मराठी पत्रसृष्टीतील अनेक अत्यंत थोरथोर माणसे (उदाहरणार्थ ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्स गोविंदराव तळवलकर, माजी संपादक, सांज लोकसत्ता व परिक्रमाकार लता राजे मॅडम, माननीय ज्येष्ठ पत्रकार विजयराव साळुंखे इत्यादी व वगैरे) परदेशातील घटना-घडामोडींबद्दल लिहित असत. गुगलपूर्व काळात असे लिहिणे सोपे नव्हते! त्यात तुडुंब बौद्धिक व दैहिक कष्ट होते. (एशियाटिक मध्ये जा, ब्रिटिश काऊन्सिलात जा... वाचत बसा, नोट्स काढा.... केवढा तो कुटाणा!) &lt;br /&gt;&lt;br /&gt;आज मात्र संगणकावरील माहितीच्या महाजालामुळे ते कित्तीकित्ती सोपे झाले आहे. इतके की आजकाल कोणीही, म्हणजे गेलाबाजार सकाळचे कन्वर्जन्सबळी रवी आमले हेसुद्धा कचेरीत बसून विश्ववेध वगैरे घेऊ शकतात. यात अतिशयोक्ती वाटत असेल, तर प्रहारचे अमर्त्यसेन रा. रा. राहुल बोरगावकर अथवा लोकसत्तेचे मिनीकेतकर रा. रा. संजय आवटे यांना विचारा! (तेही असाच विश्ववेध घेतात!) &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर मुद्दा असा, की इतिहासातील गुगलपूर्व कालखंडात एकंदरच परदेशी घडामोडींबद्दल लिहिणे किती तरी अवघड व कठिण होते. आता मात्र तसे काही राहिलेले नाही. &lt;br /&gt;आता महाराष्ट्र बॅंकेत बचत खाते असले-नसले तरी काही बिघडत नाही, तुम्ही खुश्शाल स्विस बॅंकेवर लिहू शकता! लिहू शकता म्हणजे काय? लिहिलेच आहे आमच्या अरविंद व्यं. गोखले (द्वारा लोकसत्ता, पुणे) यांनी. गेल्याच्या गेल्या रविवारच्या (१२ एप्रिल) लोकरंगात त्यांचा स्विस बॅंकेची 'भाकड'कथा हा अत्यंत माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व विद्वत्तापूर्ण लेख प्रसिद्ध झाला आहे. (गोखलेसरांचे बॅंकेत - स्विस नव्हे, पुण्यातल्या - खाते आहे याची कृपया नोंद घ्यावी. गैरसमज नको!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, संगणकावरील माहितीच्या महाजालाच्या आधारे आपण परदेशी घटना-घडामोडींवर छानसुंदर लेख लिहू शकतो, हे आपण येथवर पाहिले. तेव्हा पाठ्यपुस्तकबाह्य उपक्रम म्हणून आपण या उन्हाळ्याच्या सुटीत असा एखादा लेख पाडावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तथापि तत्पूर्वी आपणांस गोखलेकृत भाषांतरमालाही अभ्यासावी लागणार आहे. त्याकरीता आपण &lt;a href="http://www.loksatta.com/daily/20090412/lokkal.htm"&gt;स्विस बॅंकेची भाकडकथा &lt;/a&gt;हा लेख आणि &lt;a href="http://money.howstuffworks.com/personal-finance/banking/swiss-bank-account.htm"&gt;हाऊ स्टफ वर्क्स &lt;/a&gt;या संकेतस्थळावरील एक लेख यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अभ्यासाच्या सोयीकरीता प्रथम आपण हाऊ स्टफ वर्क्स या संकेतस्थळावरील लेखातील काही इंग्रेजी वाक्ये घेऊ. तुम्ही मनातल्या मनात त्यांचे ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मर्राठी करा. ते झाले की लगेच स्विस बॅंकेची भाकडकथा या लेखातील वाक्यांशी ते ताडून पाहा. त्यायोगे आपणांस आपले भाषांतर योग्य की चुकीचे ते समजेल. तर आपण आता आपल्या भाषांतर कार्यशाळेस सुरुवात करू या. -&lt;br /&gt;---------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;em&gt;हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -&lt;/em&gt;&lt;br /&gt;­Swiss bank accounts aren't just for millionaires, criminals or government officials trying to hide ill-gotten wealth, or celebrities protecting their assets from former spouses. They're available to anyone and lots of average people have Swiss bank accounts. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -&lt;/em&gt;&lt;br /&gt;स्विस बँकेत पैसे ठेवणारे केवळ कोटय़धीश, अब्जाधीश असतात असे नाही, तर बऱ्याचदा ते अब्ज-अब्जाधीश असतात. यात गुन्हेगार, अनेक देशांतले राजकारणी आणि ‘सेलिब्रेटिज’ही असतात. त्यात असंख्य अभिनेते, चित्रपट अभिनेत्री आदींचा समावेश असतो. हॉलिवूडमधल्या अनेक नट-नटय़ांचे पैसे या बँकांमध्ये आहेत. त्यामागे हेतू असा सांगण्यात येतो की, उद्या जर जोडीदाराबरोबर जमले नाही आणि घटस्फोट घ्यायची वेळ आली तर आपले सर्वच पैसे त्याच्याबरोबर वा तिच्याबरोबर जाऊ नयेत, यासाठी त्यांनी घेतलेली ती खबरदारी असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्य - &lt;/em&gt;&lt;br /&gt;People who live in countries with unstable governments and banks in particular often turn to Swiss banks because of their security and privacy.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -&lt;/em&gt;&lt;br /&gt;ज्या देशांमध्ये नेहमीच अस्थिर सरकारे आहेत, अशा देशांचे राजकारणी तसेच श्रीमंत उद्योगपती यांनीही आपली अमाप संपत्ती स्विस बँकांमध्ये ठेवल्याचे सांगितले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -&lt;/em&gt;&lt;br /&gt;Walk into the wrong Swiss bank and you'll be quickly escorted out and pointed in the direction of the bank you "should" be entering. What just happened? You've just walked into a "private" bank rather than a "retail" bank.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -&lt;/em&gt;&lt;br /&gt;तुम्ही कोणत्याही स्विस बॅंकेत प्रवेश केलात आणि ती जर तुमची बँक नसेल, तर तुम्हाला अतिशय सौम्य शब्दांत समजावून देऊन बाहेर काढले जाते आणि तुमची योग्य बँक तुमच्या निदर्शनास आणून देण्यात येते. ‘रिटेल’ बँकेऐवजी तुम्ही खासगी बँकेत शिरल्याचा तो परिणाम असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -&lt;/em&gt;&lt;br /&gt;Private banking refers to services provided by banks to private individuals with exceptionally large assets to work with. It's called "private" because customers receive a much more personal level of service than in mass-market retail banking. This historically exclusive service has been reserved for those with liquid assets over $1 million, although accepted deposits as low as $50,000 are not unheard of these days.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -&lt;/em&gt;&lt;br /&gt;दुसऱ्या प्रकारात तुम्हाला जरा खास वागणूक देण्यात येते. तर आधीच्या प्रकारात तुमच्याकडे फुटकळ ग्राहक म्हणूनच पाहिले जाते. थोडक्यात- खासगी बँकेत तुम्हाला खास दर्जाची वागणूक दिली जाते. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमची पाश्र्वभूमी कोणती आहे, असे प्रश्न तिथे विचारले जात नाहीत. दहा लाख डॉलरपेक्षा अधिक रक्कम ठेवणाऱ्यांना त्याहून चांगली- म्हणजे अतिखास वागणूक दिली जाते. एखादा ५० हजार डॉलर खासगी स्विस बँकेत ठेवायला गेलाय, असे सहसा होत नाही. ‘रिटेल’ बँकेत मात्र हा ‘बाजार’ चालतो. ही पारंपरिक बँकिंग पद्धती तिथे आजही आहे. तिथेही किमान दहा हजार डॉलरपासून पुढच्याच रकमा घेतल्या जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -&lt;/em&gt;&lt;br /&gt;Swiss law forbids bankers to disclose the existence of your account or any other information about it without your consent . in Switzerland, if a banker divulges information about a bank account without permission, immediate prosecution is begun by the Swiss public attorney. Bankers face up to six months in prison and a fine of up to 50,000 Swiss francs. The only exceptions to the Swiss banking privacy rule are criminal activities such as drug trafficking, insider trading or organized crime,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -&lt;/em&gt;&lt;br /&gt;‘स्विस बँक व्हेराईन’ (Schweizerischer Bankverein ) म्हणजेच स्विस बँक कॉर्पोरेशन ही अनेक बँकांची संघटना तुमच्या पैशाची व्यवस्थित काळजी घेते. या बँका तुमचा पैसा व तुमचे खाते क्रमांक गुप्त ठेवायला बांधील असतात. स्विस कायद्यानुसार या बँकांना ही गुप्तता सर्वाधिक महत्त्वाची वाटते. तुमच्या परवानगीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्या बँक खात्याविषयी कुणाला माहिती पुरवलीच, तर त्याला स्विस कायद्यान्वये अनेक महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा पैसा गंभीर गुन्ह्य़ांतला, मादक पदार्थाच्या व्यापारातला किंवा शस्त्रास्त्रांच्या विक्रीतून मिळवल्याचे सिद्ध झाल्यास अशी माहिती या कायद्याला अपवाद ठरते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, आपण गोखलेकृत भाषांतरमालेचा अभ्यास येथे केला. या लेखावरून आपणांस ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मर्राठीचे महत्त्व निश्चितच लक्षात आले असेल. तेव्हा व्हा तय्यार, लिहा लेख आणि द्या झाले लोकसत्तेकडे पाठवून. कुणाला कळतेय कुठून ट्रान्स्लेट केलेय ते! कसें? (उगा रा. रा. प्रशांत दीक्षितांप्रमाणे तळटीपेत संदर्भ वा स्त्रोत देण्याची काय गरज व आवश्यकता आहे?)&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. १७ एप्रिल २००९) &lt;br /&gt;&lt;br /&gt;(&lt;em&gt;हाऊ स्टफ वर्क्समधील लेखाची लिंक आमच्याकडे पाठविणा-या पत्रकाराचे आभार. त्यांच्या विनंतीवरून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-3982265894774503382?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/dzhqmmIccLI" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/dzhqmmIccLI/blog-post_21.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">19</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/04/blog-post_21.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-7121172761432758905</guid><pubDate>Sat, 18 Apr 2009 16:30:00 +0000</pubDate><atom:updated>2009-04-18T22:24:24.626+05:30</atom:updated><title>उपास सोडला!</title><description>हॅ!&lt;br /&gt;गत पंधराएक दिवस अगदी हॅ म्हणजे हॅ गेले... निवडणूक वार्तापत्रांसारखे... पोकळ! &lt;br /&gt;यास कारण आमची ही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणाली : &lt;br /&gt;कशाला लिव्हता हो तुम्ही ते लेखबिख?.... आणि लिहायचं तं जरा चांगलं तरी लिहायचं! एरवी बरे, संपादकांचा लेखबिख छापून आल्यावर, वाचायच्या आधी एक्स्लंट आर्टिकल म्हणून एसेमेस करता! मग इथंच का तुमचा पेन असा आडव्यात शिरतो?... सारखं आपलं याला-त्याला नावं ठेवायची आणि याच्या-त्याच्या चुका शोधायच्या!... आता एक तरी पेपर ठेवलाय का तुम्ही बाकी? उद्या सकाळच्या नाय तं लोकसत्तेच्या दारी उभारायची वेळ आली, तर करतील का ते तुम्हांला रिसेप्शनपाशी तरी उभं?... दिवस कसे रिसेशनचे आहेत. पण यांना आहे का त्याचं काही??!&lt;br /&gt;एवढी करदावली, एवढी करदावली, की त्या दिशी आम्ही शपथच खाल्ली रामारक्ताची, की बस्स, आजपासून ब्लॉगबिग बंद. लेखबिख बंद. पूर्ण लेखनसंन्यास. हाताची घडी तोंडावर बोट! &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, किती कसोशीने पाळली आम्ही ही मुस्कटदाबी! &lt;br /&gt;अवतीभवती इतकी गंमत चाललीय निवडणुकीची, की प्रत्येक पत्रात एकेक विनोदी सदर सुरु झाले आहे. (नाही हो, आम्ही निवडणूक वार्तापत्रांबद्दल बोलत नाही आहोत! तुमचा तसा समज होणे रास्त असले, तरी येथे आपण ख-याखु-या इनोदी सदरांबद्दल बोलत आहोत.) परंतु तरीही आम्ही आपले गप्पगप्पच राहिलो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्तेने या निवडणुकीपायी त्यांचा फाय-डे-वीक पुन्हा सहा दिवसांवर आणला. खरे तर निवडणूक हा नुस्ता बहाणा बरे का! फाय-डे-वीक केला, तर पत्रकारे फोर-डे-वीक एवढेच काम करू लागली म्हटल्यावर एचारवाले तरी काय करणार? हे एक जाऊ द्या. पण आमचे सुहृद संजय आवटे यांची मधल्या काळात नागपुरी बदली झाली. या बदलीच्या गुंज की गुंज सगळ्या पुण्यात उमटली. आमच्याही मोबाईली काही लघुसंदेश आले. ते शुद्ध इंग्रेजीत होते. त्यामुळे आम्हांस काही उमजले नाहीत. पण त्यात केतकर, संघ, वाद, राष्ट्रवादी असे काही काही परिचयातले शब्द होते. मलबार टेकडीवर जाऊन त्यांचा अर्थ लावून घ्यावा असे आम्हांस खूप खूप वाटले. पण तरीही आम्ही आपले चुप्पचुप्पच राहिलो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेले कितीएक दिवस फुडारीकडे आम्ही व औरंगाबादचे बाबूजी डोळे लावून बसलेलो. पण त्यांची आपली केवळ तारीख पे तारीख, तारीख पे तारीख! आणि तिकडे सकाळच्या कागदाचा खर्च मात्र वाढत चाललेला! फुडारीने नीट व व्यवस्थितपणे एकच तारीख दिली असती, की आम्ही अमुकअमुक दिनांकी मुंबय मुक्कामी येनार हाय वो ढुमढुमढुम.... तर सकाळला त्या तारखेच्या आधी दोन दिवस पाने परसता आली नसती का? आता बिचारे कधीपासून चार पाने एक्स्ट्राची देत आहेत. ती पाने लावण्यात मनुष्यबळाचा केवढा अपव्यय! हे अतिरिक्त काम नसते, तर बिचा-यांस शिरगणतीकरीता अधिक वेळ देता आला असता. होय वो होय. सकाळची पत्रकारे हल्ली जनगणनेच्या कामात व्यस्त आहेत. परवाच आम्ही एका बातमीदारास रंगेहात पकडला पालिकेत. हवी तर बातमी नका देऊ हो, पण एवढा एक फॉर्म भरा हो, अशी गयावया करीत होता. बिच्चारा! रेशनिंग कारकून वाटला आम्हांस त्याक्षणी तो! परंतु तरीही आम्ही हुप्पचुप्पगप्पच बसलो! &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी मटाचे डेपुटी एडिटर प्रकाश अकोलकर यांस सावाना (पक्षी : सार्वजनिक वाचनालय, नाशिक) तर्फे यंदाचा बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर पुरस्कार देण्यात आला. यासारखी गोष्ट अनुल्लेखाने मारण्याची प्रथा आमच्यात आहे. त्या प्रथेचे पालन करावयाचे होते. ते एक राहून गेले. अकोलकरांना मिळालेला हा पुरस्कार सात हजाराचा होता. त्यात तेवढेच पैसे टाकून त्यांनी ती रक्कम सावानाला परत केली. तुम्हांस सांगतो, काही वर्षांपूर्वी भांडुपच्या बाल गणेश क्रीडा मंडळ रजिस्टर्डने आम्हांस गुलाबपुष्प देऊन आमचा भव्य सत्कार केला होता. ते गुलाबाचे फूल किती कसोशीने सांभाळून आम्ही घरी आणले होते. तीन दिवस स्टीलच्या ग्लासात ते होते. आणि येथे अकोलकर मिळालेले पैसेसुद्धा घरी नेत नाहीत! याचा एकच अर्थ संभवतो. मटात मंदीबिंदी काही नाही! परंतु मटातील बहुतांची अंतरे काही वेगळेच सांगत आहेत. खरे तर त्यांना मनःपूर्वक नीट सांगताही येत नाहीये आणि मनःपूर्वक सहनही होत नाहीये. आम्हांस लाख वाटले, की उठावे, साबडेंना भेटावे, नानलांना विचारावे व मग निचितीने लिहावे. परंतु तरीही आम्ही हुप्पचुप्पगप्पगप्पच राहिलो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु किती काळ आम्ही असे मौनमुके राहणार?&lt;br /&gt;किती काळ ही जठरातील एसिडिटी सहन करणार? &lt;br /&gt;आता आम्हांस बोललेच पाहिजे. उपास सोडलाच पाहिजे! &lt;br /&gt;आजपासून सोडला उपास!&lt;br /&gt; &lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. १९ एप्रिल २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-7121172761432758905?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/5DI_Q8Ibk-Y" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/5DI_Q8Ibk-Y/blog-post_18.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">8</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/04/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-5198758154056718069</guid><pubDate>Tue, 31 Mar 2009 08:15:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-31T13:53:33.251+05:30</atom:updated><title>अरे ब्लॉग म्हन्जे हाय काय अन् नाय काय!</title><description>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/SdHSwlH4fwI/AAAAAAAAAlA/lHlxq4SVhhM/s1600-h/lok-blog.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 117px; height: 320px;" src="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/SdHSwlH4fwI/AAAAAAAAAlA/lHlxq4SVhhM/s320/lok-blog.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5319264366941994754" /&gt;&lt;/a&gt;आम्ही लोकसत्ता ब्लॉगर झालो. आमचे लेख लोकसत्तेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. ते जगभरातील लाखो वाचकांनी वाचले. लाखो वाचकांतील शेकडो वाचक त्यावर कॉमेन्टले. आम्ही खूप खूप प्रसिद्ध झालो. मराठी विश्वातील एक आघाडीचे ब्लॉगर म्हणून लोक आम्हांस ओळखू लागले...&lt;br /&gt;रोज रात्री साडेनवाच्या ठोक्याला तोंडावरून गोधडी ओढली रे ओढली, की आम्ही या सुखस्वप्नात रममाण होतो. गेले आठ दिवस दिसते मजला हे स्वप्न नवे! &lt;br /&gt;पण कसले काय आणि फाटक्यात पाय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्ताने मारे जाह्यराती देऊन जाहीर केले, की व्हा लोकसत्ता ब्लॉगर. संकेतस्थळावर ब्लॉग नोंदवा म्हणून एक लिंकपण देऊन ठेवली.&lt;br /&gt;पण ब्लॉग नोंदविणाराने ब्लॉग नोंदवायचा तर कुठे नोंदवायचा? &lt;br /&gt;अजून व अद्याप लोकसत्तेचा ब्लॉगफलाट काही तयार झालेला नाही.&lt;br /&gt;दोन दिवस आम्ही वाट पाहिली. &lt;br /&gt;म्हटले, चुकून पीडब्ल्यूडीकडे हा फलाट बांधण्याचे काम तर दिले नाही ना केतकरांनी (पक्षी - कुमार केतकर, त्रिकालवेधी संपादक, लोकसत्ता)?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अखेर न राहवून आम्ही लोकसत्तातील ब्लॉगर-पत्रकार रा. रा. शेखर जोशींना हल्केच पुसले, की जोशीबुवा, जोशीबुवा, लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार? &lt;br /&gt;तेव्हा जोशीबुवांनी आपल्याकडे खूप काम आहे व ठालेपाटलांनंतर आपणांसच समग्र साहित्य व्यवहार सांभाळायचा आहे, अशी वाङ्मयीन पोझ घेतली. आमचा सवाल त्यांच्या कर्णरंध्रापर्यंत पोचलाच नसावा, असे वाटून आम्ही त्यांस पहिलाच प्रश्न दुस-यांदा केला. तर त्यांनी पुन्हा तीच पोझ घेतली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता काय करावे, असा खूपखूप विचार करून आम्ही लोकसत्तातील अन्य ब्लॉगर-पत्रकार रा. रा. पंकज भोसले फिल्लमवाले यांच्याकडे गेलो. तर ते नुसतेच लेखामागून लेख लिहित होते. बातम्यांमागून बातम्या लिहित होते. पानांमागून पाने लावीत होते. उरलेल्या वेळात डीव्हीडीमागून डीव्हीडी पाहात होते. (त्यांच्या या लेखनकामाठीचे आमच्या ताईंना केवढे कौतुक! किती रे बाबा लिहितोस, म्हणत मनातल्या मनात सारख्या काळजी करीत असतात!!) रा. रा. भोसलेंचा हा असा लेखनदिग्विजय सुरु. तरीही आम्ही अदबीने त्यांस व्यत्ययिले व युनिकोड मराठीत पुसले, की राजे भोसले, राजे भोसले, लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार? &lt;br /&gt;त्यावर त्यांनी आमच्याकडे, आम्ही म्हणजे क्युरियस केस ऑफ मराठी ब्लॉगर आहोत, असा एक किंचितकृपाकटाक्ष टाकला. मग स्लमडॉगमधील अनिल कपूरसारखा चेहरा करीत त्यांनी आम्हांलाच एक कोटीचा सवाल केला, "कसला ब्लॉग?" &lt;br /&gt;आता मुख्य अंकवाले ऑनलाईनवाल्यांना बिनकामाचे समजतात. ऑनलाईनवाल्यांना मुख्य अंकवाले म्हणजे मागासलेले वाटतात. हा वर्गसंघर्ष पेपरोपेपरी असतो. ई-सकाळसम्राट सम्राट फडणीस हे या संघर्षावर एक अख्खी साईट काढू शकतात! पण तरीही ऑनलाईन एडिशनबद्दल एवढीही माहिती नसणे म्हणजे अतिच झाले. तेव्हा आम्ही रा. रा. राजे भोसलेंना लोकसत्तेचा ब्लॉग हे प्रकरण युनिकोड मराठीतून समजावून दिले. &lt;br /&gt;"अच्छा, ते होय," राजे भोसले म्हणाले, "ते ब्लॉगबिग आम्हांला काय माहित नाही. ते तुम्ही विनायक परब यांना विचारा."&lt;br /&gt;माझी बातमी लागली का हो आज पानात, असे विचारत येणा-या ज्युनियर बातमीदाराला पानलावे उपसंपादक ज्या प्रेमाने हुडुत् करतात, तेच सराईत प्रेम राजे भोसलेंच्या या उत्तरात होते! &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता रा. रा. विनायक परब यांना गाठायचे म्हणजे केवढा सिटी वॉक करावा लागणार या कल्पनेनेच आमच्या देही झेंडू फुटला. परंतु योगायोगाने ते कचेरीतच होते. शिवाय कॅम्पस मूडमध्येही होते. ते पाहून आम्ही त्यांस विचारले, की लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?&lt;br /&gt;तर त्यांना धक्काच बसला!&lt;br /&gt;ते उद्गारले, "कधी येणार म्हणजे? सुरु पण झालाय आमचा ब्लॉग." &lt;br /&gt;ते ऐकून मनीं म्हटले, यांची सांगण्यात काही चूक होतेय की आपल्याच कर्णरंध्रांत काही समस्या आहे?&lt;br /&gt;"अहो, तेथे नुसतेच म्हटलेय की ब्लॉग नोंदवा. पण त्यावर क्लिक केले, की आत कॉमेन्टचा फॉर्म येतो!" आम्ही आमचे अवकाशव्यापी दुःख हलके केले. &lt;br /&gt;"मग? त्यालाच तर म्हणतात ब्लॉग! या माध्यमातून आम्ही ब्लॉगचे केवढे मोठे ब्रॅंडिंग करतो आहोत! मराठी वाचकांमध्ये ब्लॉग या माध्यमाबद्दलची जाणीव जागृती करण्याचे केवढे प्रचंड काम यातून होत आहे." &lt;br /&gt;नंतर बराच वेळ त्यांनी आमचे ब्लॉग म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, संगणक म्हणजे काय, लिहिणे म्हणजे काय असे थोरथोर प्रबोधन केले.  &lt;br /&gt;बुद्धाला बोधीवृक्षाखाली बुद्धत्त्व प्राप्त झाले. आम्हांस वृत्तांताच्या आधारवडाखाली बुद्धत्त्व आले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाटले,&lt;br /&gt;फुकाच आपण स्वतःस ब्लॉगर म्हणवित मिरवित होतो.&lt;br /&gt;अरे मूढबापू, ब्लॉग म्हणजे अखेर असते रे काय? &lt;br /&gt;आपण ज्यास लेख म्हणतो, ते सुद्धा अखेरीस कॉमेन्टच असतात ना!&lt;br /&gt;अरे शतमूर्खा, अखेर अवघे लेखन हेच एक ब्लॉग आहे. &lt;br /&gt;कोणी लेखांस ब्लॉगमधील पोस्ट म्हणते.&lt;br /&gt;कोणी वाचकांच्या पत्रव्यवहारास ब्लॉग म्हणते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ब्लॉग याने की वेबलॉग या संकल्पनेस एवढे सुंदर, एवढे सरळ, एवढे सोपे रुप कोणी दिले, याच्या शोधात आम्ही सध्या आहोत. &lt;br /&gt;लोकसत्तामधील कोणी याचे उत्तर देईल काय?&lt;br /&gt;(कृपया, उत्तरासाठी या लेखासोबतच्या कॉमेन्ट फॉर्ममध्ये आपला ब्लॉग नोंदवा!!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ मार्च २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-5198758154056718069?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/0Vo3_Q43ZcE" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/0Vo3_Q43ZcE/blog-post_31.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/SdHSwlH4fwI/AAAAAAAAAlA/lHlxq4SVhhM/s72-c/lok-blog.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">23</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_31.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-4332213093540940014</guid><pubDate>Wed, 25 Mar 2009 07:37:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-25T13:32:06.866+05:30</atom:updated><title>लोकसत्तेचा हॉर्नओकेप्लीज</title><description>कालची गोष्ट. &lt;br /&gt;सक्काळसकाळी नेहमीप्रमाणे एका हाती कषायपेयपात्र, दुज्या हाती पारले जी माने जिनियस बिस्कुटे आणि समोर पेपरांचे चघाळ अशी रवंथसामुग्री घेऊन बसलो होतो. &lt;br /&gt;नेहमीच्या सवयीने आधी मुंटातील छायाचित्रे पोटभरून पाहून घेतली. मग सकाळचा अग्रलेख वाचला. हल्ली अग्रलेखाबरोबरच सकाळच्या संपादकांनी लिहिलेली (लागले बोवा लिहायला संपादक!... छडी लागे छमछम विद्या येई घमघम!!) निवडणूक वार्तापत्रेही आम्ही आवडीने वाचतो. ती वाचून आम्हांस म्हाराष्ट्राच्या समस्त राजकीय परिस्थितीचे धादांत आकलन होते. कारण की त्यात गेल्या निवडणुकीचा इतिहास व यावेळी हे निवडून नाही आले तर ते निवडून येतील असे खोलखोलसखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण असते. त्याचे परिशिलन केल्यावर आम्ही पुन्हा मटाकडे वळलो. त्यायोगे आम्हांस सभ्यसामना वाचल्याचे पुण्य लाभले. (तुम्हांस सांगतो, तो दिवस आता दूर नाही, की ज्या दिवशी सामनाच्या पहिल्या पानी चौकट छापून येईल, की आमची कोठेही शाखा नाही! बोरिबंदरात तर नाहीच नाही!! असो.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;यानंतर आम्ही लोकसत्ता हाती घेतला आणि आमच्या कानी अचानक पॉंगपॉंग पॉंगपॉंग ऐसा कर्कश्श ध्वनी उमटला. केवढे दचकलो आम्ही! त्या भरात हातातील उष्ण चहा राप्र महामंडळाच्या प्रहारवर सांडला. (तर त्याचे क्षणात कोल्ड ड्रिंक झाले!!)&lt;br /&gt; &lt;br /&gt;तुला काय समजते की नाही? कानाजवळ भोंगे कसले वाजवतेस भलत्या वेळी? असे आम्ही रागेजून हिला बोलणार, तर ती तेथे नव्हतीच. मग हा आवाज केला तरी कोणी? &lt;br /&gt;पाहतो तो वेळूच्या बनातून बासरीचे सूर यावेत त्याप्रमाणे लोकसत्तेच्या पानातून हे हॉर्नओकेप्लीज येत होते.&lt;br /&gt;काय बरे हे आक्रीत? असे स्वगत म्हणत आम्ही लोकसत्तेचा पर्णसंभार चाळू लागलो. &lt;br /&gt;आणि लख्खकन् आम्हांस आवाssज कुणाचा? याचा उलगडा झाला.&lt;br /&gt;हा तर आमचे त्रिकालवेधी संपादक रा. रा. कुमार केतकर यांचा हॉर्न!&lt;br /&gt;&lt;br /&gt;'गेले काही दिवस मराठी सारस्वतात जे काही चालू आहे त्यावर भाष्य करणे, मत प्रदर्शित करणे, सल्ला देणे म्हणजे त्या कर्कश्श गोंगाटात आपलाही हॉर्न वाजवण्यासारखे आहे...' असे म्हणत रा. रा. केतकर यांनी '&lt;a href="http://www.loksatta.com/daily/20090324/edt.htm"&gt;सुशिक्षितांची निर्बुद्धता!&lt;/a&gt;' (लोकसत्ता, चोवीस मार्च दोन हजार नऊ) असा हॉर्न मागाहून 'वाहतूक सुरळीत' झाल्यानंतर वाजविला आहे.  &lt;br /&gt;या हॉर्नच्या (हॉर्न कसला, ही तर इशारतीची तोफच!!) आवाजाने आमचा जीव मात्र भांड्यात पडला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हांस आधी तर असे वाटले होते, की रा. रा. केतकर परदेशात जावे, तसे सूक्ष्मात वा मौनातच गेले आहेत! &lt;br /&gt;आमचे (राजी)नामचीन लेखकसूर्य आनंद यादव यांनी तळ्यात-मळ्यात करता करता संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा मसापच्या डोहात टाकला. त्या दिशी आम्हांस वाटले, की समस्त पत्रांतून फटाके फुटणार. झालेही तसेच. परंतु त्यात लोकसत्तेचा आपटबार काही नव्हता. त्या दिशी लोकसत्तेत आनंद यादवांऐवजी लालू यादवांवरचा अग्रलेख. ते पाहून आम्ही मनी म्हटले, अगंबाईअरेच्चा! ही लोकसत्तेच्या न्यूजरॅपची गफलत म्हणावयाची, की रेखाबाईंची नजरचूक? चुकून त्यांनी या यादवांऐवजी त्या यादवांवरचा अग्रलेख तर नाही ना डकवला? &lt;br /&gt;तेव्हा आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणाने लोकसत्तेत चौकशी केली, तर समजले की सध्या केतकरसाहेब औटॉफ महाराष्ट्रा आहेत. म्हणजे नक्कीच, रा. रा. श्रीकांत बोजेवारांना कार्यबाहुल्यामुळे अग्रलेख लिहिण्यास सवड व वेळ मिळाली नसणार आणि नेहमीप्रमाणे पुण्याची लाईन बंद पडलेली असणार. त्या गोंधळात राहून गेला या यादवांवरचा अग्रलेख. मग आम्ही टाईमप्लीज म्हटले आणि दुस-या दिवसाची वाट पाहिली. मग आम्ही तिस-या, चौथ्या, पाचव्या दिवसाची वाट पाहातच राहिलो. परंतु तो अग्रलेख काही आलाच नाही.&lt;br /&gt;म्हटले रा. रा. कुमार केतकर हे काही डांबराला डरणारातले नाहीत!&lt;br /&gt;मग हे ऐसे का बरे झाले असावे?&lt;br /&gt;या संपूर्ण प्रकरणात सोनिया, पवार, स्वयंभू डावे आदींचा सहभाग नसल्याने तर त्यास अनुल्लेखाने डावलले नसेल ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेले चार-पाच दिवस आम्ही आणि आमची तनहाई याच गोष्टीचा सखोल विचार करीत बसलो होतो. &lt;br /&gt;आणि अचानक हे पॉंगपॉंग झाले. &lt;br /&gt;मनी म्हटले, उशीरा आले, योग्य मुक्कामी आले!!&lt;br /&gt;पण आले ते कसे आले, सर्वांच्या कानी सटासट सटके देतच आले.&lt;br /&gt;अग्रलेखाचे शीर्षक (सुशिक्षितांची निर्बुद्धता!) वाचून तर आधी आम्हांस वाटले, केतकरसाहेब आमच्यावरच घसरले की काय?&lt;br /&gt;(आम्ही सुशिक्षित आहोत, याचा दाखला आमच्याकडे आहे. आमच्या बुद्धपणाबाबत मात्र अनेकांचे अनेक समज आहेत!) &lt;br /&gt;किंतु नंतर समजले, की मसापमधील अनेकांसही तसेच वाटत होते. &lt;br /&gt;म्हणजे वार सुस्थळी बसलाय!&lt;br /&gt;म्हणजे चांगले झाले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तथापि या संपूर्ण लेखातून आम्हांस एवढेच समजले नाही, की&lt;br /&gt;''इतक्या अचाट प्रमाणावर ‘संस्कृतीकरण’ (!) होत असले तरी महाराष्ट्रात इतके सांस्कृतिक अराजक कसे? इतकी सर्वव्यापी निर्बुद्धता कशी? इतकी असहिष्णुता आणि अरसिकता कशी? या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत,'' असे साक्षात कुमार केतकर म्हणत असतील, तर या सवालांच्या उत्तरांकरीता वाचकांनी कुणाकडे जावयाचे? कोण्या एडिटराच्या तोंडाकडे पाहावयाचे?&lt;br /&gt;या समग्र परिस्थितीस जबाबदार कोण? &lt;br /&gt;या समग्र परिस्थितीत समस्त गंभीर वृत्तपत्रांची जबाबदारी काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;की आम्ही आता आमच्या पेपरवाल्यास मुंबई चौफेर टाकावयास सांगू?&lt;br /&gt;कालपासून आमच्या कानात या विचारांचा हॉर्न सारखा भोंभों करीत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २५ मार्च २००९)&lt;br /&gt;&lt;br /&gt;(लोकसत्तेचा अग्रलेख वाचण्यासाठी &lt;a href="http://www.loksatta.com/daily/20090324/edt.htm"&gt;येथे&lt;/a&gt; क्लिक करा)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-4332213093540940014?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/I0ReDI2gYas" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/I0ReDI2gYas/blog-post_25.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">12</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_25.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-2088490042679287695</guid><pubDate>Sat, 21 Mar 2009 05:34:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-21T11:31:31.105+05:30</atom:updated><title>चांगदेव पाटिलकी</title><description>वास्तविक मराठीत अशी प्रथा नाही, परंपरा नाही, रीत नाही.&lt;br /&gt;परंतु चांगदेवजी कुठले ऐकायला!&lt;br /&gt;त्यांनी एक कोरडीगंभीर चांगदेवपाटिलकी करून बातमीची उठाठेव केलीच.&lt;br /&gt;अपेक्षेनुसार यावर फार काही प्रतिक्रिया येणार नव्हत्याच. &lt;br /&gt;त्या आल्या नाहीतच. &lt;br /&gt;कारण की आपण सगळे श्रमिक पत्रकार असल्याने आपण बातमी लिहिणार, बातमी तपासणार, पाने लावणार की बातमीच्या संकल्पनेवर कॉमेन्टा टाकत बसणार? काय अन्य व्यवहार नाहीत काय आपणांस?&lt;br /&gt;परंतु चांगदेवजी कुठले समजायला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;या लेखाचीही एक गंमतच झाली. आमच्या एका अनामवीरास वाटले की हा लेख वाहिन्यांवर आक्षेप घेणाराच आहे. त्यामुळे आमचे चांगदेवजी चांगलेच खट्टू वगैरे झाले. त्या भरात त्यांनी आणखी एक &lt;a href="http://batmidar1.blogspot.com/2009/03/blog-post_20.html"&gt;कोरडागंभीर लेख &lt;/a&gt;लिहिला. &lt;br /&gt;यावेळी मात्र ती चांगदेवपाटिलकी आम्ही &lt;a href="http://batmidar1.blogspot.com/2009/03/blog-post_20.html"&gt;सहयोगी बातमीदार&lt;/a&gt;वर देत आहोत. तेथे (झालीच तर) या विषयावर आपण चर्चाबिर्चा करू यात. नाहीतर आपले चाललेलेच आहे बातम्या देणे, बातम्या तपासणे, पाने लावणे वगैरे आणि इत्यादी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २२ मार्च २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-2088490042679287695?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/Q4OBxKq2Zyk" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/Q4OBxKq2Zyk/blog-post_21.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">6</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_21.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-8376097922515830249</guid><pubDate>Thu, 19 Mar 2009 20:51:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-20T02:21:00.564+05:30</atom:updated><title>बातमीबाबत गंभीर काही...</title><description>वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,&lt;br /&gt;आम्ही हाडाचे पत्रकार नसलो, तरी बातमी हा आमच्या चर्वणाचा एक विषय आहे.&lt;br /&gt;आपण हे पाहतोच आहोत की अलीकडे वाहिन्यांमुळे वृत्तपत्रांची मोठी कुचंबणा झाली आहे.&lt;br /&gt;शिळ्या, वाहिन्यांनी चघळलेल्या बातम्या देणे हे काही वृत्तपत्रांतील लोकांना फार आवडते असे नाही. &lt;br /&gt;आता यावर काही उपाय आहे का? &lt;br /&gt;आम्हांस हे माहित आहे, की आपल्यांतील अनेकांना हा प्रश्न सतावतो आहे. अनेकांनी यावर आपल्या परीने उत्तरे शोधली आहेत. अनेक जण यावर सातत्याने बोलत आहेत. &lt;br /&gt;आमच्या चांगदेव पाटलांनीही यासंदर्भात काही मुद्दे मांडले आहेत. &lt;br /&gt;आजच्या दिवशी अंमळ गंभीर होऊन आपण त्यांचा विचार करूया. (एरवी मग आपली भंकस चालूच असते की!)&lt;br /&gt;तेव्हा वाचा - बदलती बातमी &lt;br /&gt;आपली मते आणि प्रतिक्रिया जरूर पाठवा.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;बदलती बातमी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;- चांगदेव पाटील&lt;/em&gt;&lt;br /&gt;दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्यांची स्पर्धा तर स्पष्टच दिसते आहे. पण त्या स्पर्धेला तोंड कसे द्यायचे, कोणत्या हत्यारांनी लढायचे याचा अंदाज काही येत नाही, असे काहीसे मराठी वृत्तपत्रांचे झाल्याचे दिसत असून, त्यामुळे एकंदरीतच स‌र्व वृत्तपत्रे कुचंबल्यासारखी दिसत आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा करायची म्हणजे वृत्तवाहिन्यांसारखेच दिसायचे असा काहीसा गैरसमज काही वृत्तपत्र-चालकांचा व संपादकांचा झाल्याचे दिसत आहे. वृत्तपत्रे रंगीत झाली, त्यात मोठमोठी रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध होऊ लागली हे तांत्रिक प्रगतीमुळे झाले हे मान्यच. परंतु असे करण्याची निकड आली ती वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेमुळेच. हे केवळ दृश्यात्मकतेपुरतेच मर्यादित राहिले असे नव्हे. पहिल्या पानावरील बातम्यांच्या निवडीपर्यंत हा परिणाम झालेला आहे. अन्यथा, आरुषी हत्याप्रकरणासारखी बातमी एरवी मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर कधीही येऊ शकली नसती. खड्ड्यात पडलेल्या प्रिन्सच्या बातमीचे उदाहरण तर या स‌ंदर्भात कायम लक्षात राहण्यासारखे आहे. ब्रेकिंग न्यूज या प्रकाराने तर मराठी वृत्तपत्रांतील ताजेपणाच हरवून गेला आहे. &lt;br /&gt; &lt;br /&gt;दूरचित्रवाणी आणि त्याचबरोबर इंटरनेट ही माध्यमे प्रचंड डायनॅमिक आहेत. हे या माध्यमांचे एक बलस्थान आहे. कोणतीही बातमी घडताक्षणी ती वाचक-प्रेक्षकांसमोर आणण्याची या माध्यमांची क्षमता, दर चोवीस तासांनी अपडेट होणारी वृत्तपत्रे कधीही गाठू शकणार नाहीत.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;वृत्तवाहिन्यांनी दिवसभर एखाद्या बातमीचे दोहन करून त्या घटनेचा चोथा केल्यानंतर दुस-या दिवशी स‌काळी तमाम वृत्तपत्रांनी ती मुख्य बातमी म्हणून मुखपृष्ठावर छापावी, यात काय अर्थ आहे तो त्या स‌ंपादकांनाच ठाऊक. पण हा वाचकाच्या वेळेचा, पैशाचा, वृत्तपत्रांच्या किमती कागदाचा अपव्यय आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते पत्रकारिता या व्यवस‌ायाच्या विपरीत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर आमचे काही मित्र असा युक्तिवाद करतात, की असे जर असेल, तर मग वाचक क्रिकेटच्या बातम्या कशा रस घेऊन वाचतात? &lt;br /&gt;बरोबरच आहे. आदल्या दिवशी क्रिकेटचा स‌ामना पाहिल्यानंतर दुस-या दिवशी तेच लोक क्रिकेटच्या बातम्याही आवर्जून वाचतात. पण कशासाठी? तो स‌ामना कोणी जिंकला हे जाणून घेण्यासाठी? त्या स‌ामन्यात किती धावा झाल्या याची माहिती घेण्यासाठी? वाचक वाचतात ते पुनःप्रत्ययाच्या आनंदासाठी, त्या स‌ामन्याच्या रसग्रहणासाठी. हेच इतरही अशाच काही बातम्यांच्याबाबतीत घडते. वृत्तपत्रे अजाणता ते देतात, म्हणून लोक वाचतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि यातच खरे तर वृत्तपत्रांच्या स‌ुटकेचा मार्ग आहे. बातमी पुढची बातमी. आज घडलेल्या बातम्या आजच वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट देतील. तुम्ही उद्या त्या बातमीच्या पुढची बातमी देऊ शकता. त्या बातमीमागची बातमी स‌ांगू शकता. बातमीचे विश्लेषण करू शकता. विश्लेषण हा तर खास वृत्तपत्रांचा आणि वेबसाईट्सचा प्रांत होऊ शकतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चलत् चित्र हे वृत्तवाहिन्यांचे बलस्थान आहे, तसीच ती त्यांची कमजोरीही आहे. ज्या बातम्यांमध्ये व्हिडिओची शक्यता नाही, अशा बातम्या वृत्तवाहिन्यांसाठी अयोग्यच ठरतात. त्या दिल्या जात नाहीत, असे नाही. पूर्वी - खरे तर आजही - आपली स‌ह्याद्री वाहिनी अशाच बातम्या देते. अनेकदा अशा कोरड्या बातम्या देण्याशिवाय वृत्तवाहिन्यांना गत्यंतर नसते. पण तो त्यांचा नाईलाजाचा भाग असतो. आणि म्हणूनच याचा लाभ वृत्तपत्रे घेऊ शकतात. जेथे वृत्तवाहिन्या जाऊ शकत नाहीत, तेथे वृत्तपत्रे जाऊ शकतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;खरे तर यात नवे काहीच नाही. आपल्या मराठी वृत्तपत्रांना याची जाणीव नाही, असेही नाही. लोकसत्ता आणि काही प्रमाणात स‌काळ या वृत्तपत्रांना हे चांगलेच स‌मजले आहे. याचा अर्थ लोकसत्ता किंवा स‌काळ मध्ये नेहमीच्या, वाहिन्यांनी चघळलेल्या बातम्या येत नाहीत असा नाही. पण अनेकदा ही वृत्तपत्रे त्याही पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. पुणे स‌काळमधील काही पत्रकार मित्रांशी बोलल्यानंतर, त्यांनी एक स‌ंस्था म्हणून याचा खूपच विचार केलेला आहे, हे दिसले. 'एटी पर्सेंट डिफरन्ट' हे कार्यसूत्र म्हणून स‌काळने स्वीकारले आहे. याचा अर्थ अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांहून ऎंशी टक्के वेगळा मजकूर स‌काळ देणार. तसे स‌दा होत नाही आणि तेथे अनेक चांगल्या कल्पनांचा अंमलबजावणीच्या पातळीवर विचका केला जातो, हा भाग अलाहिदा. पण त्यांचा प्रयत्न तरी तो असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसत्ताने वृत्तलेखनाच्या पद्धतीत जाणीवपूर्वक की अजाणता ते माहित नाही, पण खूपच बदल केला असल्याचे दिसून येते. स‌विस्तर बातमी हे लोकसत्ताचे वैशिष्ट्य. पण आता तेथे वृत्तलेखांनाही पहिल्या पानावर जागा दिली जाते. सकाळमध्ये नेमके याच्या उलट. वाचकांजवळ वेळ नाही म्हणून दहा मिनिटांत बातम्यांसारखा प्रयोग केल्यानंतर पुन्हा बाकीच्या बातम्या त्रोटक, कमी शब्दांतच दिल्या जाव्यात हा स‌काळचा हट्ट स‌मजण्यापलीकडचा आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बातमी ही पवित्र असते, त्यामुळे त्यात मते येता कामा नयेत, हा पत्रकारितेचा पहिला पाठ. पण लोकसत्ताने आता त्याकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. व त्यात काही गैर आहे, असे मानण्याचे कारण नाही. तुमची बातमी देण्यातील एकाधिकारशाही स‌ंपल्यानंतर व खरे तर इतर स‌ाधनांमुळे ते तुमच्या अस्तित्वाचे मुलभूत प्रयोजनच न उरल्यानंतर, बातमीचे पावित्र्य या गोष्टीला काही अर्थच उरत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचकाला कोरडी बातमी द्या व त्याला तिचा अन्वयार्थ लावू द्या, असे स‌ांगणारे एक स्कूल पत्रकारितेत अद्याप आहे. वाचकाला तितका वेळ आहे आणि त्याची तितकी स‌मज आहे, हे या स्कूलने कोठेतरी गृहीत धरलेले असते. परंतु आता परिस्थिती पालटली आहे. वाचक स‌ूज्ञ आहे आणि त्याच्याकडे खरेच वेळ नाही. त्यामुळे बातमीत मते आली, तर त्याला ती हवीच आहेत. ती मते त्याला पटली नाही, तर ती तो फेकून देऊ शकतो अथवा वृत्तपत्रच बदलू शकतो. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वाचकाची वृत्तपत्राप्रती जी निष्ठा असते, ती बातम्यांमुळे ठरत नाही. ती ठरते ती त्या वृत्तपत्राच्या धोरणांमुळे, मतांमुळे. हे धोरण, हे मत बातमीत आल्यास त्यामुळे बातमीचा विनयभंग होतो असे स‌मजण्याचे कारण नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वृत्तपत्रांना वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेत ठाम टिकायचे असेल, तर अशा बदलांचा अंगिकार करावाच लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. २० मार्च २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-8376097922515830249?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/ZS12cBamOJM" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/ZS12cBamOJM/blog-post_20.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">11</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_20.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-209893003092696728</guid><pubDate>Thu, 19 Mar 2009 09:47:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-19T15:23:30.556+05:30</atom:updated><title>वादंगाचे डोही....</title><description>बोला पुंडलिकावरदा हारि विट्टल&lt;br /&gt;श्रीज्ञानदेवतुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर मंडळी, तुकोबारायांचा एक द्रिष्टांत आहे. महाराज म्हन्तात - &lt;br /&gt;बोल बोलता सोपे वाटे... &lt;br /&gt;पण करणी करता....? &lt;br /&gt;अगदी बरोबर. &lt;br /&gt;महाराज सांगतात - करणी करता टीर कापे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंडळी तुम्ही म्हणाल, की बुवांनी मधूनच कुठून हा अभंग उचलला आहे. पन त्याला येक कारन आहे. ते कारन म्हंजे आमची पेपरवाली मंडळी.  &lt;br /&gt;या पेपरवाल्या मंडळींनी आज आमच्या आनंदराव यादवबुवांबद्दल अग्रलेख छापले आहेत.&lt;br /&gt;आता आपल्यासारखी मंडळी आणि ही पेपरवाली मंडळी यांच्यात हा मोठाच फरक आहे मंडळी. आपण म्हंजे काला आक्षर भैस बराबर. दोन शब्द लिहायचे म्हटले तरी आपल्याला केवढा कंटाळा! तुकोबा म्हंतात - &lt;br /&gt;काय करू मज नागविले आळसे &lt;br /&gt;बहुत या सोसे पीडा केली...&lt;br /&gt;पन या पेपरवाल्या मंडळींनी असा आळस करून चालत नाही. रोजच्या रोज अग्रलेख लिहावाच लागतो. म्हनून मंडळी, ते अग्रलेख लिहितात!&lt;br /&gt;तर हे अग्रलेख म्हंजे कसे? &lt;br /&gt;कागदी लिहिली नावाची साकर&lt;br /&gt;चाटिता मधुर केवी लागे&lt;br /&gt;बोलाचीच कढी बोलाचाची भात &lt;br /&gt;जेऊनियां तृप्त कोण जाला&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोला पुंडलिकावरदा हारिविट्टल श्री ज्ञानदेवतुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर मंडळी, आजच्या या अग्रलेखांचा विषय आहे आनंदबुवा यादवांचा राजीनामा. या मान्सानं तुकोबामावलींबद्दल पुस्तक लिहिलं. त्याच्यात महाराजांबद्दल काहीच्याबाही लिहिलं. म्हटल्यावर वारकरी मंडळी काय गप्प बसतात? आमचे सामनावाले साहेब लिहितात - &lt;br /&gt;"कादंबरीला आकर्षक नाव द्यायचे आणि तुकोबारायांसारख्या सच्छील चारित्र्याच्या परोपकारी संतावर संशोधनाच्या नावाखाली लक्षात येतील न येतील असे शिंतोडे उडवायचे. पुन्हा सारे काही आपल्या साहित्यिक कर्तृत्वामुळे खपून जाईल या भ्रमात वावरायचे. या वृत्तीला वारकरी मंडळींनी एक सणसणीत तडाखा दिला आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता आपन वारकरी म्हंजे कसे? तर मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास. पण कुठवर, तर भले असू तिथवर. तुकोबा मावली म्हंतात - &lt;br /&gt;भले तरि देऊं गांडीची लंगोटी &lt;br /&gt;नाठ्याळा चि गांठी देऊं माथा.... &lt;br /&gt;मायबापाहूनी बहु मायावंत&lt;br /&gt;करू घातपात शत्रुहूनि&lt;br /&gt;&lt;br /&gt;सामनावाल्या साहेबांना हे असेच वारकरी पायजेल हायेत. पण तरीसुद्धा सामनावाले म्हणतात - "मुळात वारकरी मंडळींनी विषय तुटेपर्यंत ताणण्याची गरज नव्हती. एखादा आपली चूक कबूल करून शरण आल्यास त्याला अभय द्यावे हीसुद्धा संतांचीच शिकवणूक."&lt;br /&gt;हे बाकी सोळा आने बरोबरहे. आमच्या नारायणरावांचा प्रहारसुद्धा हेच म्हणतो. "या प्रकरणाने वारक-यांच्या सहिष्णुतेचे पितळही उघडे पडले आहे. तुकाराम महाराजांना छळणा-यांनाही त्यांनी माफ केले होते, याचा विचार वारक-यांनी करणे गरजेचे होते."&lt;br /&gt;अगदी सत्यवचन. भागवत संप्रदाय सांगतो - दयाक्षमाशांती तेथे देवाची वसती! &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हे सामनावाले एकीकडे वारक-यांनी अतिरेक केला असंही म्हणतात, "संत तुकारामांचे मन आकाशाएवढे मोठे होते. कुणाच्या लिहिण्याने, बोलण्याने संत तुकारामांना किंवा त्यांच्या विचारांना खुजेपणा येत नाही", असंही म्हणतात आणि तिथंच म्हणतात, की "संतांवर, हिंदू देवदेवतांवर, श्रद्धास्थानांवर ज्यावेळी आघात होतात त्यावेळी उसळून उठाल तर तुम्ही खरे धर्मरक्षक. निदान यापुढे तरी ही काळजी घ्या."&lt;br /&gt;सामनावाल्यांची ही अशी वैचारिक डबलढोलकी कशामुळं झाली असेल मंडळी? &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय&lt;br /&gt;कारण कमाईविण नाही....&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण मंडळी आमच्या लोकमतवाल्यांनी याला चांगलं उत्तर दिलं आहे. &lt;br /&gt;लोकमतवाले म्हंतात - "तुमच्या श्रद्धास्थानांची चिकित्सा होऊ दे, आमची दैवते मात्र तिच्यापासून दूर राहू दे, ही राजकारणातली वृत्ती याही क्षेत्रात अवतरली आहे काय? की रामदासाची चिकित्सा करा, जमले तर त्याच्यावर टीकाही करा, आमच्या संतांना मात्र हात लावू नका असे एकारलेपण साहित्यानेही आता अंगिकारले आहे?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंडळी, या राजकारणाने आपल्या वारक-यांच्या फडातसुद्धा शिरकाव केला आहे. वारक-यांमध्येसुद्धा आता पुढारी घुसले आहेत. परंतु मंडळी, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने.&lt;br /&gt;महाराष्ट्र टाइम्सवाल्या साहेबांनीसुदिक हीच शंका घेतलेली आहे. मंडळी, ते काय सांगतात ऐका - "ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेखाचा वाद ज्या टोकापर्यंत ताणला गेला, त्यावरून वारकरी संप्रदायावर प्रभाव असलेल्या वारकरी पुढा-यांच्या भावनांचा अन्य हेतूंसाठी वापर करण्यात आला काय, अशी शंका येते."&lt;br /&gt;मटावाले साहेब पुढं काय म्हंतात - "यादव यांनी हे पुस्तक मागे घेतले, वारकऱ्यांची देहूला जाऊन माफीही मागितली. तेथे यादव यांनी धक्काबुक्कीला तोंड दिले. वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेला धक्का लावणारीच ही घटना होती. यानंतर वास्तविक वादाचा मूळ मुद्दाच संपला होता. या कादंबरीशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला त्यानंतरही लक्ष्य करणे अनाकलनीयच होते. त्यामुळेच त्यामागील 'बोलविते धनी' कोणी वेगळे आहेत काय या चर्चेला वाव मिळाला आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मटाचा हा अग्रलेख, मंडळी तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घालनारा आहे. मटावाले साहेब म्हंतात - "आविष्कार स्वातंत्र्य अनिर्बंध नाही हे खरेच आहे. एखादे लेखन हे भावना दुखावण्याच्याच हेतूने बेदरकारपणे केले गेले असेल, तर कायद्याच्या मार्गाने अशा लेखनाला आळा घालणे हा सुसंस्कृत समाजापुढील पर्याय आहे. दुसरा पर्याय, असे लेखन अनुल्लेखाने मारणे हा आहे. दुदैैर्वाने आज या पर्यायांपेक्षा, समाजगटाला चिथावून दडपण आणण्याचा मार्ग रूढ झाला आहे. त्यामुळे बेजबाबदार लेखकांना जरब बसेलही, पण त्याबरोबर सर्जनशीलताही कुंठित होईल." &lt;br /&gt;सकाळवाल्या साहेबांनीसुद्धा असाच मुद्दा मांडलाय. "त्यांच्यातर्फे (वारक-यांतर्फे) सेन्सॉरशीपची कल्पनाही पुढे येऊ लागली. अमुक माणसाला तमुक लिहायचे असेल, तर त्याने अमुकाची परवानगी घेतली पाहिजे, असे काही उतावीळवीर बोलू लागले. त्यातूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वाट लागत होती."&lt;br /&gt;पण आता त्यांचं ऐकनार कोन? &lt;br /&gt;तुकोबांचंसुद्धा ऐकलं नाही या मंडळींनी. महाराज म्हंतात - &lt;br /&gt;किती सांगो तरी नाईकती बटकीचे &lt;br /&gt;पुढे सिंदळीचे रडतील...&lt;br /&gt;तेव्हा त्यांच्याबद्दल आपन काय म्हणणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोला - पुंडलिकावरदा हारिविट्टल.....&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंडळी सकाळवाल्या साहेबांनी वारक-यांच्या कपाळी विचारांचा टाळ घातला. पण त्यांनी आमच्या यादवबुवांनाही सोडलं नाही. ते म्हणतात - "ज्यांनी ते (म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य) टिकवून ठेवायचे ते डॉ. यादवही क्षमायाचनेचा मार्ग शोधत होते." प्रहारवाले साहेबसुद्दा लिहून जातात - "यादवही दोषास पात्र आहेत. ते कोणत्याच मुद्दयावर ठाम राहिले नाहीत." लोकमतवाल्या साहेबांनी तर यादवबुवांना सडकूनच काढलंय. मटावाले म्हंतात - "आनंद यादव यांना ज्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे मराठी साहित्यिकांचीच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेचीही मान लाजेने खाली गेली आहे." पण आमच्या लोकमतवाल्या साहेबांचा काहीतरी वेगळाच राग आहे. ते म्हंतात - "आपले पुस्तक मागे घेण्याची घोषणा करून त्यांनी (यादवबुवांनी) आपल्या आयुष्यभराच्या वाङ्मयीन मिळकतीवरच पाणी सोडले.... त्यांच्यावर विश्वास ठेवणा-या सगळ्या लेखक-कवींना आणि चाहत्या भक्तांना त्यांनी निराधार केले.... आपला शब्द आणि त्यातील सत्य याविषयीची खात्री नसणा-यांनी लिहायचे तरी कशाला?..."&lt;br /&gt;सवाल मोठा रोकडा आहे. &lt;br /&gt;पण आमच्या ऐक्यवाल्या साहेबांनी परस्परच त्याचं उत्तर दिलं आहे. ऐक्यातले साहेब म्हंतात - "मेणबत्त्या घेऊन विचार स्वातंत्र्याचा प्रकाश पाडणारे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी सुध्दा अंधारात गुडूप झाले होते. कुणी काही म्हटले तरी, यादव यांच्या पाठीशी एकही साहित्य संस्था, महामंडळ उभे राहिले नाही. यादव एकाकी पडले. महाराष्ट्र आणि मराठी साहित्य संमेलनाच्या भवितव्याचा, मराठी रसिकांचा विचार करून त्यांनी अत्यंत शांतपणे आपल्या अध्यक्षपदाचा रा जीनामा दिला. त्यांनी राजीनामा देऊन पलायनवादी मार्गाचा स्वीकार केल्याची टीका करणाऱ्या, उपटसुंभ साहित्यिकांची दातखिळी गेले दोन महिने का बसली होती?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;उपटसुंभ साहित्यिकांचीच कशाला? सगळ्या पेपरवाल्या साहेबांची दातखिळसुद्धा दोन महिने अशीच बसली होती. या पेपरवाल्या मंडळींची एवढी गोची झाली होती, मंडळी की त्यांना कोणाची बाजू घ्यावी हेच उमगत नव्हतं. म्हणून ते गप्प होते. आणि आता सगळे मिळून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने पुंडलिकावरदा करीत आहेत. आनंदबुवा तुम्हाराच चुक्या असं म्हनत आहेत. अशा लोकांसाठीच तर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेलेत -&lt;br /&gt;बोल बोलता सोपे वाटे &lt;br /&gt;करणी करता टीर कापे....&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या लोकसत्ताचं बघा. त्या साहेबांनी काही बोललंच नाही!&lt;br /&gt;एकंदर या वादंगाच्या डोहात आमच्या पेपरवाल्यांचाही थोडा बुका सांडलाच मंडळी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बोल पुंडलिकावरदा हारिविट्टल श्री ज्ञानदेवतुकाराम &lt;br /&gt;पंढरीनाथ महाराज की जय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. १९ मार्च २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-209893003092696728?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/ySSU7V-WM2s" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/ySSU7V-WM2s/blog-post_19.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">10</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_19.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-5871112234253885388</guid><pubDate>Wed, 18 Mar 2009 06:31:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-18T12:02:22.214+05:30</atom:updated><title>अप्पा आणि रिसेशन टाइम्समधला निरो</title><description>अप्पा अंदाजपत्रकावरून शेवटचा हात फिरवित होते. 'रुपया असा आला, रुपया असा गेला' याचे इन्फोग्राफिक मात्र त्यांना काही केल्या जमत नव्हते. कसे जमणार? एक तर आलेल्या रुपयात कपात झाली होती आणि रुपया हा हा म्हणता अस्सा जात होता... अखेर वैतागून त्यांनी हातातील एक्सेलशिट बाजूस भिरकावून दिले आणि मटामध्ये डोके घातले.&lt;br /&gt;"अप्पा, फिडल म्हंजे काय वो?"&lt;br /&gt;अचानक आलेल्या या प्रश्नाने ते दचकलेच. या पप्पूला काही काळवेळच नाही. इथे वर्तमान धोक्यात आलेय आणि हा इतिहास उगाळतोय! &lt;br /&gt;"एवढं पण तुला माहित नाही?... ते एक वाद्य असतं."&lt;br /&gt;"ते तं काय मम्मीला पण माहिताय... पण वाद्य म्हंजे नेमकं कसं?" &lt;br /&gt;"मोतमावलीच्या जत्रेत घेतली होती ना तुला, त्या पिपाणीसारखंच काहीतरी असतं बघ ते..," अप्पा पत्रधर्मास जागून मोघमपणे बोलते झाले.&lt;br /&gt;"पिपाणीसारखं नसतं काय ते.... पत्र्याच्या डब्यासारखं असतं." पप्पू संपादकाच्या आत्मविश्वासाने म्हणाला.&lt;br /&gt;"अरे डब्यासारखं कसं असेल ते?" &lt;br /&gt;"मग? त्याशिवाय का ते होळीत वाजवतात?"&lt;br /&gt;"होळीत? फिडल होळीत वाजवतात?... कोणत्या मुर्खाने सांगितलं तुला?" &lt;br /&gt;"मम्मीनं! तीच म्हणाली, ते फिडल की काय ते रोममध्ये होळीत वाजवतात म्हणून..."&lt;br /&gt;"मग असेल बुवा तसं." अप्पा म्यानेजमेन्ट आणि मम्मी यांच्याशी कधीही आर्गुमेन्ट करीत नाहीत. "पण पप्पू, खरा इतिहास काय आहे माहिते का तुला? अरे त्या रोमची होळी पेटली होती ना तेव्हा तो निरो आपल्या राजवाड्यात फिडल वाजवत बसल होता."&lt;br /&gt;"निरो म्हंजे काय?"&lt;br /&gt;"नीरो म्हणजे... मालक होता तो!" &lt;br /&gt;अप्पांना या क्षणी का कोण जाणे, पण एकदम आपल्या छोट्या मालकाची आठवण आली. त्याच्या रंगलेल्या होळी पार्टीची आठवण आली. त्या पार्टीच्या फोटो गॅलरीची आठवण आली. इंडियत कुठल्या संकेतस्थळी बरे आपणांस त्या छायाचित्रांची नेटभेट झाली होती?.... मग त्यांना आर्थिक मंदीची आठवण झाली. त्यांनंतर त्यांना कपातलेले कर्मचारी आणि झालेली वेतनकपात यांची आठवण आली. अप्पा म्हणजे जणू आठवणींचे झाड झाले!&lt;br /&gt;या आठवणी झटकण्यासाठी त्यांनी आपले मस्तक गदागदा हलविले. &lt;br /&gt;त्या झटक्याने त्यांच्या हातातील मटा गळून पडला.&lt;br /&gt;"अहो, आज हापिसला जायचंय की नाय? किती वाजले बघा..."&lt;br /&gt;मुदपाकखान्यातून हाक आली, तसे अप्पांनी अभावितपणे हातातील रिस्टवॉचात पाहिले... आणि त्यांचे डोळेच विस्फारले.&lt;br /&gt;रिस्टवॉचातले काटे गायब झाले होते. &lt;br /&gt;त्या तबकडीत त्यांना अवघा रिसेशन टाइम्स दिसत होता!... &lt;br /&gt;रिसेशन टाइम्स आणि त्या काळात होळीच्या पार्टीत फिडल वाजवणारा निरो!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. १८ मार्च २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-5871112234253885388?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/lSW4421bC_8" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/lSW4421bC_8/blog-post_18.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">5</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4803601050397353357.post-6456959640695854818</guid><pubDate>Thu, 12 Mar 2009 05:57:00 +0000</pubDate><atom:updated>2009-03-12T11:39:27.032+05:30</atom:updated><title>शिमग्यानंतरचे कवित्व : काही रंगचित्रे</title><description>&lt;em&gt;(होळीनिमित्ताने केलेले हे बुरा न मानो होली है परंपरेतील लेखन वास्तविक कालच प्रसिद्ध व्हायला हवे होते. किंतु शिळ्या पोळीप्रमाणे कधी कधी शिळा लेखही अधिक चवदार लागतो, असे आम्हीच कुठेतरी म्हटले आहे. त्या एका विधानाच्या आधारावर येथे हा कालचा लेख आज प्रसिद्ध करण्याची जुर्रत करीत आहोत. - बापू)&lt;/em&gt;&lt;br /&gt;---------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;बॅक्ग्राऊंडला समग्र होळीगीते ढणढणत आहेत. सप्तरंग, लोकरंग, नवरंग अशी भिन्नभिन्न रंगउधळण सुरु आहे. &lt;br /&gt;वातावरणाने जणू मुंबैटाईम्सचा लेऔटच ल्याला आहे. काव्यशास्त्रविनोदाच्या पिचका-या उडत आहेत. मागील बाजूस एका टेबलावर कसलेसे पात्र आहे. त्यात कसलेसे सफेद द्रव्य आहे. (क्यामेरामन, तो तेवढा भाग तेवढा ब्लर करून टाका!) सगळ्यांचे चेहरे रंगाने एवढे माखलेले आहेत, की इतरांस काय, त्यांचे त्यांनाही ते ओळखू येत नाहीत. परिणामी त्यांची ओळख अंदाजानेच लावणे क्रमप्राप्त आहे. (चू.भू.द्या.घ्या.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता आपणांस प्रश्न व सवाल पडला असेल, की हे कशाचे वर्णन आहे? व ते काय म्हणून दिले आहे?&lt;br /&gt;तर मुंबैतील समस्त पेपरांस होळीची कचेरीबंद सुटी असते. (वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या एकजुटीची विजय असो!) हा दुर्मिळ वार्षिक योग साधून यंदा संपादक परिषदेने संपादकांची होळी (यात कुठलाही श्लेष नाही याची कृपया नोंद घ्यावी!) आयोजित केली होती, त्या रंगोत्सवाची ध्वनीचित्रफीत नुकतीच आपल्या हाती आली आहे. (होळीचे आयोजन संपादक परिषदेचे होते म्हटल्यावर ती प्रायोजित असणार हे काय वेगळे व स्वतंत्र सांगावयास हवे? होळीतल्या एकेका गोवरीपासून आगपेटीच्या काडीपर्यंत व गुलाल-बुक्क्यापासून प्लास्टिकच्या पिचकारीपर्यंत एकेक गोष्ट व वस्तू तेथे प्रायोजित होती. होलिकोत्सवाचे श्रीफल तेवढे संपादक परिषदेच्या मालकीचे होते! त्यातही वदंता अशी, की तो नारळ संपादक परिषदेने सत्काराचे साटेलोटे करून कमाविलेला होता! सत्य-असत्य रा. रा. यशवंत पाध्ये जाणे!!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;या फेस्टिव्हलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास बहुतेक सगळे संपादक दस्तुरखुद्द उपस्थित होते. यात कोणासही नवल व आश्चर्य वाटेल. परंतु लक्षात घ्या, या कार्यक्रमाचे आयोजक आहेत - संपादक परिषद! (होय, होय, तीच संपादक परिषद, की जी संपादकांस प्रायोजित पुरस्कार देते. मंदीच्या काळात या पुरस्कारांचे मूल्य व मोल अधिकच वाढलेले आहे मित्रहो!) तेव्हा आता अधिक काळनाश न करता आपण पाहू या, या शिमगोत्सवातील नेहमीच्या यशस्वी संपादकांच्या रंगपंचमीचे संपादित अंश...&lt;br /&gt;&lt;br /&gt;ते पाहा, &lt;br /&gt;होळीचे ढोलताशेझांजनगारे जोरजोरात वाजत असताना एका कोप-यात काही जण घोळक्याने उभे आहेत. इसवीसन तीन हजार नऊमध्ये जगभरातला शिमगोत्सव कसा असेल, याचा त्रिकालवेध ते घेत आहेत व तेथे रा. रा. प्रवीण टोकेकर ते रा. रा. संजय आवटे सदृश चेहरे दिसत आहेत म्हटल्यावर, तो नक्कीच केतकरपीठाचा सत्संग असणार! पण तेथे रा. रा. कुमार केतकर दिसत नाहीत. ते कोठे आहेत? &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते पाहा, दिसले. कुमार केतकर. आपल्या फाऊंटन पेनचे टोपण उघडून त्यांनी सपकन् कोणाच्या तरी पाठीवर काळ्या शाईचा सपकारा मारला! कोण बरे असेल ते? पाठीमागून तरी ते रा. रा. अरुण टिकेकर वाटताहेत. त्यांनी पवारांच्या भाषणांचे संपादन केले, त्याची तर ही सजा नव्हे? &lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. डॉक्टर मात्र अत्यंत तारतम्याने रंग उडवित आहेत. वास्तविक ते रंग उडवित आहेत असे म्हणणे हे मोठेच उदारमतवादी विधान झाले. सिगारेटची राख झटकावी, तसे ते रंग झटकीत आहेत! पिचकारी रंगाची असो, की मतांची, हातात पेपर असल्याशिवाय त्याचा परिणाम होत नाही, हे त्यांस जाणवले असेल का? &lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉक्टरांप्रमाणेच रा. रा. अशोकराव पानवलकर (पक्षी - अप्पा) हेही अत्यंत धीरगंभीरपणे रंग खेळत आहेत. आपल्या कनिष्ठाच्या कधी गाली, तर कधी पाठीवरी ते रंगचपराक वा रंगथाप मारत आहेत. &lt;br /&gt;बघा, बघा, त्यांनी आपल्या एका कंत्राटी सहका-याच्या अंगावर अचानक रंग टाकला. पण त्याबरोबर तो बिच्चारा एवढा दचकला व टरकला व घाबरला की त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले! त्याने घाईघाईने अप्पांनी कोणता रंग टाकलाय ते पाहिले. रंग पिंक स्लिपसारखा नव्हता! तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला! &lt;br /&gt;अप्पांच्या रंगपंचमीतही एक सराईतपणा दिसतो आहे. मटाचा प्लास्टिक इमल्शन काढून त्यास टिकावू रंग देण्याचा नेटका उद्योग त्यांनी अलीकडे सुरु केल्याचे सांगणारे सांगतात. त्यातून तर त्यांस ही रंगसफाई साधली नसेल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मटातील सहका-यांपासून सावध अंतर राखून कोणी एक व्यक्ती फिरताना दिसत आहे. पांढरीफेक सुरवार, पांढराफेक कुर्ता. डोईस कोल्हापुरी फेटा. उंच कपाळी गुलालाचा उभा टिळा. छातीवर हात जोडून येत्या-जात्यास पुढारी-छाप नमस्कार. रा. रा. संजीव साबडे तर नव्हेत हे? आता ऐन होळीत, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी असे गाणे गुणगुणत कोणी अत्तराचा फाया हुंगत चालले असेल, तर त्याची अन्य काय बरे ओळख असेल? साबडेच असावेत ते. स्वप्नपूर्तीच्या आनंदरंगात ते इतके न्हाऊन गेले आहेत, की इतरांना रंग लावण्याचेही भान त्यांना उरलेले नाही. पण समजा त्यांनी रंग टाकले, तरी ते पक्के बसणारच नाहीत, याची काळजी घेण्यासाठी सकाळ आणि लोकमतने पूर्ण सज्जता केली आहे. याची कल्पना त्यांस असेल काय? &lt;br /&gt;&lt;br /&gt;अरेच्चा! ती चंमतग पाहा... तिकडे तिकडे... आली का तुमच्या रडारवर? येतेय का ऐकू?&lt;br /&gt;"आज माझ्या या पृथ्वीवर माझ्या आकाशाखाली माझ्या जमिनीवर ही माझी होळी माझे लोक साजरे करीत आहेत. माझ्या या पारंपरिक सणामध्ये मी आणलेले माझे रंग मीच उडविणार आहे. माझी रंगाची पिचकारी माझ्या डाव्या हातात आहे. माझ्या उजव्या बाजूला मी माझ्या मी मी मी...."&lt;br /&gt;तर वाचक हो, हा आजचा सवाल! &lt;br /&gt;काय असेल बरे त्यांचे नाव? नक्कीच मीखिल! कोणावर बरे त्यांनी नेम धरलाय? शिरिष पारकर (संपादक, पा. महाराष्ट्र माझा, मुखपत्र, मनसे) यांच्यावर तर नव्हे? (परंतु ते असे कोणावरही पिचकारी टाकू शकतात. उद्या त्यांच्यासमोर दगड आणून बसविला, तरी ते त्यालाही पिचकारतील, की 'तुम्हाला असे वाटत नाही का, की तुम्ही रस्त्यावर येथे तेथे पडता त्यामुळे सर्वच पक्षांच्या गुंडांना दगडफेक करण्यास प्रोत्साहन मिळते?'... ते कुणालाही बोलण्याची संधी न देऊन निरुत्तर करू शकतात!!) पुढची निवडणूक लक्षात घेऊन ते बहुधा येथे पिचकारीची प्रॅक्टिस करण्यासाठी आले असावेत!&lt;br /&gt;&lt;br /&gt;रंगपंचमी आता अगदी रंगात आली आहे. प्रत्येक संपादक दुस-याकडे पाहून न पाहिल्यासारखे करीत रंग खेळत आहे. संजय राऊत हे मात्र त्यात दिसत नाहीत. त्यात नाहीत म्हणजे नक्कीच ते एखाद्या च्यानेलास बाईट देत असणार. अगदी बरोब्बर. ते पाहा, ते तिकडे एका च्यानेलबाळास एक होलिकागीत ऐकवित आहेत. 'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज घड्याळाचा काटाही रुतावा हा पवारगेम आहे...' ते ऐकून रा. रा. आल्हाद गोडबोले यांच्या हातातील रंगास मात्र उकळ्या फुटत होत्या! या रंगाचा पिचुकप्रहार कोणावर करावा, हे विचारण्यासाठी, ते पाहा, त्यांनी बंगल्यावर फोन लावला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांचा फोन सुरु असतानाच रा. रा. उत्तमराव कांबळे (पक्षी - महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री) तेथे हजर झाले. ते सकाळचे सर्व्हेसर्वा. त्यामुळे त्यांच्यासमवेत ३६ बातमीदारांची फौज होतीच. आल्याक्षणी त्यांनी घड्याळात पाहिले. मग बातमीदारांची मिटिंग घेतली व लोक टमरेलाने रंग उडवितात की पिचकारीने याच्या सर्वेक्षणाला बसल्याजागी सुरुवात केली! हल्ली त्यांचा सर्वेक्षणावर मोठा जोर. त्याचबरोबर हल्ली सर्व कामे घड्याळाबरहुकूम करण्यावरही त्यांचा कटाक्ष, असे सांगणारे सांगतात. कामकाळवेळेचे गणित बरोब्बर व सुयोग्य जमल्यामुळेच त्यांचे 'पुण्यावर स्वारी' हे नवे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे, असेही सांगणारे सांगतात!&lt;br /&gt;&lt;br /&gt;होळी आता बरीच रंगबिरंगी झाली आहे. बाकीच्या संपादकांचे चेहरे तर अंदाजानेही ओळखणे कठीण झाले आहे. &lt;br /&gt;निवडणुकीच्या काळात होळी आली की असेच होते. भूमिका व चेहरे इतके बदलतात, की हेच का ते, असा प्रश्न पडावा. &lt;br /&gt;तेव्हा आता त्या फंदात आपणां जनसामान्यांनी न पडलेलेच बरे... &lt;br /&gt;त्यांचे हे असे रंग त्यांनाच लखलाभ होवोत. &lt;br /&gt;गड्यांनो, आपणांसाठी आपले सीएमवायकेच बरे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Posted by बापू आत्रंगे, दि. १२ मार्च २००९)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4803601050397353357-6456959640695854818?l=batmidar.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/Batmidar/~4/KeWpScVeiCo" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/Batmidar/~3/KeWpScVeiCo/blog-post_12.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">22</thr:total><feedburner:origLink>http://batmidar.blogspot.com/2009/03/blog-post_12.html</feedburner:origLink></item></channel></rss>
