<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>maharashtramajha.com</title>
	<atom:link href="https://maharashtramajha.com/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://maharashtramajha.com</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 12 Apr 2020 08:30:14 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.7.5</generator>
	<item>
		<title>भारतातील सर्वोत्तम &#8211; आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या</title>
		<link>https://maharashtramajha.com/garbh-nirodhak-golya/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/garbh-nirodhak-golya/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Ashish]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Apr 2020 08:30:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[आरोग्य]]></category>
		<category><![CDATA[आपत्कालीन]]></category>
		<category><![CDATA[गर्भनिरोधक]]></category>
		<category><![CDATA[गोळ्या]]></category>
		<category><![CDATA[जन्म नियंत्रण]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=5527</guid>

					<description><![CDATA[आपण अनियोजित गर्भधारणेबद्दल काळजीत आहात? होय, कधीकधी सर्व नियमित खबरदारी घेतल्यानंतरही, आपल्या गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी होतात. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या किंवा मॉर्निंग आफ्टर पिल्स असे ह्यांना म्हणले जाते. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या ह्या असुरक्षित लैंगिक संभोगानंतर, अवांछित किंवा अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा एक मार्ग आहे. ह्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या आणि चर्चिल्या गेलेल्या गर्भनियंत्रक गोळ्या आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी, जबरदस्तीने [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>आपण अनियोजित गर्भधारणेबद्दल काळजीत आहात? होय, कधीकधी सर्व नियमित खबरदारी घेतल्यानंतरही, आपल्या गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी होतात. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या किंवा मॉर्निंग आफ्टर पिल्स असे ह्यांना म्हणले जाते. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या ह्या असुरक्षित लैंगिक संभोगानंतर, अवांछित किंवा अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा एक मार्ग आहे. ह्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या आणि चर्चिल्या गेलेल्या गर्भनियंत्रक गोळ्या आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी, जबरदस्तीने किंवा अनियोजित संभोगामुळे झालेल्या गर्भधारणेसाठी किंवा काही वेळा पुरुष वापरत असलेले गर्भनिरोधक म्हणजे कंडोम फाटल्यास आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या वापरतात.</p>
<p>आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या अशा लोकांसाठी आशीर्वाद आहेत जे वर उल्लेख केलेल्या आपत्कालीन परिस्थितीची चिंता करतात. खबरदारी घेण्याची दुसरी पद्धत विसरल्यास किंवा ती कार्य करण्यास अयशस्वी झाल्यासच या ईसी गोळ्यांचा वापर करावा.</p>
<p>सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या आपत्कालीन गोळ्यामध्ये लेव्होनॉर्जेस्ट्रल संप्रेरक असते, ज्यामुळे गर्भाशयात अयोग्य वातावरण तयार होण्यास मदत होते जी गर्भधारणा रोखते किंवा अंडाशयातून अंडी सोडण्यास प्रतिबंध करते. सामान्यत: संभोगानंतर आपण गोळ्या किती वेळात घेतल्या यावर 90% प्रभावीपणाची खात्री दिली जाते. आपण जर लवकर गोळी घेतली तर त्याची कार्यक्षमता जास्त असते. आपण हे संभोगाच्या 72 तासांच्या आत वापरू शकता. असुरक्षित संभोगानंतर 24 तासांच्या आत हे जेव्हा वापरले जाते तेव्हा हे सर्वात प्रभावी (सुमारे 95%) असते.</p>
<p><strong>पण</strong> <strong>चुकू</strong> <strong>नका</strong></p>
<p>जर गर्भधारणा झाली असेल तर आपत्कालीन गोळी प्रभावी ठरत नाहीत. नावानुसार ही एक &#8220;आणीबाणी&#8221; गोळी आहे ज्याचा उपयोग केवळ आपत्कालीन परिस्थितीतच जसे कि जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्यास, कंडोम ब्रेक इत्यादी साठीच केला पाहिजे. ही गोळी गर्भपातासाठी वापरली जाऊ शकत नाही.</p>
<p>या गोळ्या वापरण्यापूर्वी आपणास उलट्या, मळमळ, थकवा, डोकेदुखी, स्तनामध्ये दुखणे, निद्रानाश इ. सारख्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल माहित असले पाहिजे. सर्वात वाईट म्हणजे या गोळीतील संप्रेरकांमुळे आपल्या मासिक पाळीत देखील व्यत्यय येऊ शकतो. परिणामी अनियमित रक्तस्त्राव किंवा मासिक पाळीत विलंब हे त्रास होऊ शकतात.</p>
<p>आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर गर्भवती होण्याची 20% शक्यता असते, तर नियमित गर्भनिरोधक पद्धतींच्या बाबतीत हा दर केवळ 1% असतो. त्यामुळे सामान्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला पाहिजे आणि कोणताही पर्याय शिल्लक नसेल तरच आपत्कालीन गोळ्या वापराव्यात.</p>
<p>ह्या गोळ्यांमुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळत नाही.</p>
<h2><strong>भारतात</strong> <strong>उपलब्ध</strong> <strong>असणाऱ्या</strong> <strong>आपत्कालीन</strong> <strong>गर्भनिरोधक</strong> <strong>गोळ्या</strong></h2>
<p>बाजारात अनेक आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. बरेच लोक गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये आणि आपत्कालीन गोळ्यांमध्ये गल्लत करतात. गर्भनिरोधक गोळ्या अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी घेतल्या जातात.</p>
<p>भारतामध्ये उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय आपत्कालीन गोळ्या खाली सूचीबद्ध केल्या आहेत.</p>
<h3><strong>आय</strong><strong>&#8211;</strong><strong>पिल</strong></h3>
<p>भारतात उपलब्ध असणाऱ्या आपत्कालीन गोळ्यांपैकी ही एक गोळी आहे जी गर्भधारणा टाळण्यासाठी असुरक्षित लैंगिक संबंधानंतर 72 तासांच्या आत घेतली पाहिजे. आय-पिल एक हार्मोनल गोळी आहे जी अंडमोचन / गर्भाधान / फलित अंडी रोपण न करता गर्भधारणा होऊ देत नाही. ही तोंडाने घेण्याची गोळी आहे जी काहीतरी खाल्यानंतर पाण्याबरोबर घ्यावी. ही गोळी असा दावा करते की हे स्तनपान देणाऱ्या मातांसाठीही सुरक्षित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही स्थानिक वैद्यकीय दुकानातून आय-पिल खरेदी करता येते. असुरक्षित संभोगानंतर 12 तासांच्या आत सेवन केल्यावर ह्या गोळीने 80-90% प्रभावीपणा दर्शविला आहे. ही गोळी 25 ते 45 वर्षे वयोगटातील महिलांसाठी सुरक्षित आहे.</p>
<p>आपण आय-पिल ऑनलाइन खरेदी  असलेल्या काही वेबसाइट पाहू शकता, परंतु आम्ही कोणतीही वैद्यकीय गोळ्या ऑनलाईन विशेषत: आय-पिल खरेदी करण्याची शिफारस करत नाही कारण वेळ महत्वाचा आहे. दुसर्&#x200d;या दिवशी एखाद्या वितरण करणाऱ्या मुलाने ह्या गोळ्या आपल्यापर्यंत पोहोचविण्याची वाट पाहू नये. जवळच्या दुकानामध्ये जाणे कधीही चांगले, गोळी विकत घ्यावी आणि लगेच त्याचे सेवन करावे.</p>
<p>किंमत</p>
<p>भारतात आय-पिलची किंमत प्रति गोळी 100 रुपये आहे.</p>
<h3><strong>अनवॉन्टेड</strong><strong> -72</strong></h3>
<p>अनवॉन्टेड-72 हे एक ओटीसी औषध आहे जे कोणत्याही वैद्यकीय दुकानामधून खरेदी केले जाऊ शकते. यात लेव्होनॉर्जेस्ट्रेल 1.5 मिग्रॅ असते आणि असुरक्षित संभोगानंतर 3 दिवसांच्या आत ही गोळी घेणे आवश्यक आहे. अनवॉन्टेड -72 आणि आय-पिलची तुलना केल्यास तुलनेने अनवॉन्टेड-72 चे दुष्परिणाम कमी आहेत. अनवॉन्टेड-72 ही गोळी संप्रेरक एलएच आणि एफएसएचच्या क्रिया अवरोधित करते. मेंदूचे संप्रेरक अंडी परिपक्व होण्यास मदत करतात, गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार करतात, स्त्रीबिजांचे रोपण करतात. थोडक्यात, अनवॉन्टेड-72 गर्भधारणेस अनुकूल अशी परिस्थिती अवरोधित करते. 72 तासांच्या आत वापरल्यास, गर्भधारणा रोखण्यासाठी अनवॉन्टेड-72 गोळीची कार्यक्षमता 85% आहे. लैगिक संभोगानंतर लवकरात लवकर ही गोळी वापरल्यास  परिणामाचा अधिक उच्च दर साध्य होऊ शकतो. अनवॉन्टेड-72 गोळी घेतल्यानंतर 2 ते 3 तासांपर्यंत उलट्या होणे हा एक चुकलेला डोस मानला जातो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो.</p>
<p>किंमत</p>
<p>भारतात अनवॉन्टेड-72 ची किंमत प्रति गोळी 80 रुपये आहे.</p>
<h3><strong>प्रीव्हेंटॉल</strong></h3>
<p>यात तोंडाने घेण्याच्या 2 गोळ्या असतात ज्यात लेव्होनॉर्जेस्ट्रेल बी.पी. 0.75 मिग्रॅ असते. प्रीवेन्टॉल ही भारतातील सर्वात उत्तम आपत्कालीन जन्म नियंत्रण गोळ्यांपैकी एक आहे, जी गर्भधारणा रोखण्यासाठी 72 तासात (3 दिवसात) घेतली पाहिजे. प्रीव्हेंटॉल ही लेव्होनॉर्जेस्ट्रेल ची एकच गोळी असल्याने त्याचे दुष्परिणाम कमी आहेत. जरी प्रीव्हेंटॉल अनेक वेळा सुरक्षितपणे घेतली जाऊ शकते, परंतु त्याच मासिक पाळीत अनेक वेळा वापरल्यास गोळ्याची कार्यक्षमता कमी होते.</p>
<p>येथे असुरक्षित लैंगिक संबंधानंतर प्रथम गोळी शक्य तितक्या लवकर घ्यावी आणि दुसरी गोळी प्रथम गोळी घेतल्यानंतर 12 तासांनी घ्यावी. ही आपत्कालीन गोळी वाजवी दारात उपलब्ध आहे आणि या गोळीने 85% -90% प्रभावीता दर्शविली आहे. गोळ्या जितक्या लवकर घेतल्या जातात तेवढेच अवांछित गर्भधारणेपासून संरक्षण चांगले मिळते.</p>
<p>किंमत</p>
<p>भारतात प्रीव्हेंटॉलची किंमत 2 गोळ्यांसाठी 50 रुपये आहे.</p>
<h3><strong>ट्रस्टन</strong><strong> 2</strong></h3>
<p>ट्रस्टन 2 हा दोन गोळ्यांचा पॅक आहे ज्यात लेव्होनोर्जेस्टेल ०.75 मिग्रॅ आहे, फार्मास्युटिकल कंपनी, व्ही केअर फार्मा लिमिटेड यांनी हे निर्मित केलेले आहे. या कंपनीचा असा दावा आहे की या गोळीचे शून्य दुष्परिणाम आहेत आणि वेळेवर सेवन केल्यावर 80% पर्यंत प्रभावी आहे. उपरोक्त सूचीबद्ध केल्याप्रमाणे, ही गोळीसुद्धा प्रथम असुरक्षित संभोगानंतर लवकरात लवकर सेवन केली पाहिजे, शक्यतो 24 तासांच्या आत आणि दुसरी गोळी पहिल्या गोळीनंतर 12 तासांनी घावी.</p>
<p>किंमत</p>
<p>ट्रस्टन 2 गोळ्या अत्यंत किफायतशीर आहेत आणि भारतातील त्याची किंमत 60 रुपये आहे.</p>
<h3><strong>टी</strong> <strong>पिल</strong><strong> 72</strong></h3>
<p>संभोगानंतर 72 तासांच्या आत वापरल्यास टी पिल 72 प्रभावी आहे. टी पिल 72 ही 1.5 मिग्रॅ गोळी आहे जी प्रोजेस्टेरॉनच्या परिणामास प्रतिबंधित करते, जे गर्भधारणा टिकवण्यासाठी आवश्यक असे एक नैसर्गिक मादी संप्रेरक आहे. या संप्रेरकाशिवाय, मासिक पाळीप्रमाणे गर्भाशयातील अस्तर (एंडोमेट्रियम) तुटते आणि गर्भधारणेची शक्यता टळते. असुरक्षित संभोगानंतर 3 दिवसांच्या आत घेतल्यास ही गोळी 80% प्रभावी असल्याचे ज्ञात आहे.</p>
<p>किंमत</p>
<p>भारतातील टी-पिल -72 ची किंमत सुमारे 68.50 रुपये आहे.</p>
<p>भारतातील वर उल्लेख केलेली आपत्कालीन प्रभावी गोळ्यांची यादी निर्दिष्ट आहे आणि जवळच्या कोणत्याही वैद्यकीय दुकानातून त्या खरेदी केल्या जाऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर काही आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे नॉर्लेवो, ईसी, शी -२२, ह्यान, ओह! गॉड, ऑप्शन ७२ इ.</p>
<p>हे लक्षात घ्या, बाजारात या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांची सहज उपलब्धता आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही असुरक्षित संभोगानंतर प्रत्येक वेळी या गर्भनिरोधक गोळ्या वापराव्या. याच्या नावाप्रमाणेच आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीतच याचा वापर करा. नेहमी संरक्षणाची किंवा नियमित गर्भनिरोधक पद्धती वापरण्याची सवय लावा.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/garbh-nirodhak-golya/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>स्त्री शक्ती</title>
		<link>https://maharashtramajha.com/stri-shakti/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/stri-shakti/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Ashish]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 17 Mar 2020 16:31:27 +0000</pubDate>
				<category><![CDATA[संस्कॄती]]></category>
		<category><![CDATA[शक्ती]]></category>
		<category><![CDATA[स्त्री]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=5522</guid>

					<description><![CDATA[स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय. प्रत्येक स्त्रीकडे धाडस, बुद्धिकौशल्य, चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे, तरी तिला दुय्यम स्थान [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div dir="auto">स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय.</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">प्रत्येक स्त्रीकडे धाडस, बुद्धिकौशल्य, चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे, तरी तिला दुय्यम स्थान मिळते. याला कारण भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे.</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">स्त्री ही विश्वाची जननी म्हणतात तरी सुद्धा  हीच संस्कृती स्त्रीत्वाचा सन्मान करण्यास मात्र विसरली आहे. आजही बहुसंख्य स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात सर्वांत महत्त्वाचा अडसर म्हणजे त्यांचा नवरा ,त्यांची संसारातील कर्तव्ये .स्त्रीला ही मन आहे हे विसरूनच जातात ही मंडळी.</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">पूर्वी बाईनं चूल आणि मूल सांभाळावं अशी अपेक्षा केली जायची, पण आज अनेक मराठी कुटुंबांत आणि विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांत स्त्रिया नोकरी करताना दिसतात. अर्थात त्या नोकरी करतात तो केवळ घराला आíथक हातभार लागावा म्हणून. खूपच कमी घरांत आपल्या बायकोनं आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपावं, ते फुलवावं, आपल्यात असलेल्या साऱ्या शक्यता अजमाव्यात म्हणून तिला स्वत:च्या मनासारखं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. या अशा मानसिकतेमुळे अनेक स्त्रियांमध्ये असलेली प्रतिभा, कला, बुद्धी मारली जाते.</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्या क्षणापासून या गोष्टी तिला आपल्या मनात कुठं तरी मागे सरकून ठेवाव्या लागतात किंवा या गोष्टी मनाच्या एका कप्प्यात ठेवून तो कायमचा बंद करावा लागतो.पण आता थोडा समाज बदलतोय . स्त्रीला तिच्यातील सप्तगुणांची ओळख झाली आणि ती व्यक्त  होऊ लागली आहे. तिला तुमच्या मानसिक आधाराची, पाठिंब्याची गरज आहे.</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">स्त्रीला व्यक्त होऊ द्या. तिच्या मनात दडलेल्या अनेक गोष्टींना वाट करून द्या, आपले छंद झोपासण्याचा तिला देखील अधिकार असून, एक माणूस म्हणून तिलादेखील स्वच्छंदी जगू द्या !</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">अरे मानव स्त्रीला जर मुक्त होऊ दे,</div>
<div dir="auto">तिच्या पंखांना बळ दे तू,</div>
<div dir="auto">उत्तुंग भरारी घेईल &#8216;ती&#8217;</div>
<div dir="auto">एकदा विश्वास दाखव तू,</div>
<div dir="auto">विश्वासाला खरी उतरेल &#8216;ती&#8217;,</div>
<div dir="auto">पाठीवर मायेची थाप दे</div>
<div dir="auto">मेहनतीचं चीज करेल &#8216;ती&#8217;,</div>
<div dir="auto">अरे ती स्वतः आहे स्वयंसिद्धा</div>
<div dir="auto">सर्व जग जिंकिंल ती</div>
<div dir="auto"></div>
<div dir="auto">सौ.अनिता गुजर</div>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/stri-shakti/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>शंभू महादेव</title>
		<link>https://maharashtramajha.com/shambhu-mahadev/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/shambhu-mahadev/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Ashish]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 22 Feb 2020 23:15:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कविता]]></category>
		<category><![CDATA[मराठी]]></category>
		<category><![CDATA[महा शिवरात्री]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=5514</guid>

					<description><![CDATA[त्रैलोक्याचा राणा &#124; शंभू महादेव &#124; देवांचा तो देव &#124; रुद्ररूप &#124;&#124;१&#124;&#124; नको करू स्तोम &#124; दान दक्षिणांचे &#124; त्या प्रदक्षिणांचे &#124; व्यर्थ सारे &#124;&#124;२&#124;&#124; हरी ओम मंत्र &#124; सदा जप मनी &#124; पाप विमोचनी &#124; होई भस्म &#124;&#124;३&#124;&#124; महारुद्र शिव &#124; शंभो हरहर &#124; निलकंठेश्वर &#124; भोलानाथ &#124;&#124;४&#124;&#124; आवड बेलाची &#124; वहा निरंतर &#124; [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>त्रैलोक्याचा राणा | शंभू महादेव |<br />
देवांचा तो देव | रुद्ररूप ||१||</p>
<p>नको करू स्तोम | दान दक्षिणांचे |<br />
त्या प्रदक्षिणांचे | व्यर्थ सारे ||२||</p>
<p>हरी ओम मंत्र | सदा जप मनी |<br />
पाप विमोचनी | होई भस्म ||३||</p>
<p>महारुद्र शिव | शंभो हरहर |<br />
निलकंठेश्वर | भोलानाथ ||४||</p>
<p>आवड बेलाची | वहा निरंतर |<br />
स्मरा अवांतर | शिवशंभो ||५||</p>
<p>ज्योतिर्लिंगांमध्ये | जागृत ठिकाण |<br />
सर्वां त्याची जाण | सोमेश्वर ||६||</p>
<p>शुभंकरावरी | ज्याची असे श्रद्धा |<br />
सरते विपदा | अखंडीत ||७||</p>
<p>सौ.अनिता गुजर</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/shambhu-mahadev/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>माणुसकी</title>
		<link>https://maharashtramajha.com/manuski/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/manuski/#comments</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Ashish]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 20 Feb 2020 02:30:56 +0000</pubDate>
				<category><![CDATA[कविता]]></category>
		<category><![CDATA[माणुसकी]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=5509</guid>

					<description><![CDATA[&#160; माणसानं दगडाचा देव कसा घडविला पण माणुसकी धर्म पायदळी तुडविला &#124;&#124; धंदा देवाच्या नावानं माणसाने ईथे केला गरीबांचा हा भूखंड देवळाला दान दिला &#124;&#124; उंच सोन्याचा कळस मनोभावे चढविला गुलालाची उधळण आभाळात उडविला &#124;&#124; ज्याने घडवला देव तोच झालारे दानव आज आले कळोनिया कसा असतो मानव &#124;&#124; ढोल नगारा देवाचा आज याने बडविला पण [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>&nbsp;</p>
<p>माणसानं दगडाचा<br />
देव कसा घडविला<br />
पण माणुसकी धर्म<br />
पायदळी तुडविला ||</p>
<p>धंदा देवाच्या नावानं<br />
माणसाने ईथे केला<br />
गरीबांचा हा भूखंड<br />
देवळाला दान दिला ||</p>
<p>उंच सोन्याचा कळस<br />
मनोभावे चढविला<br />
गुलालाची उधळण<br />
आभाळात उडविला ||</p>
<p>ज्याने घडवला देव<br />
तोच झालारे दानव<br />
आज आले कळोनिया<br />
कसा असतो मानव ||</p>
<p>ढोल नगारा देवाचा<br />
आज याने बडविला<br />
पण माणुसकी धर्म<br />
पायदळी तुडविला ||</p>
<p>सौ.अनिता नरेंद्र गुजर<br />
डोंबिवली</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/manuski/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>3</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>स्मृती मंधाना &#8211; बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे</title>
		<link>https://maharashtramajha.com/smriti-mandhana-marathi-bio/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/smriti-mandhana-marathi-bio/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Ashish]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Jan 2020 09:29:44 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[उंची]]></category>
		<category><![CDATA[चित्रे]]></category>
		<category><![CDATA[बायो]]></category>
		<category><![CDATA[वजन]]></category>
		<category><![CDATA[वय]]></category>
		<category><![CDATA[शारीरिक माप]]></category>
		<category><![CDATA[स्मृती मंधाना]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=5505</guid>

					<description><![CDATA[स्मृती ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी डावखुरी फलंदाज आहे. गेल्या काही आठवड्यांत झालेल्या मॅचेसमध्ये तिने अविश्वसनीय फलंदाजी करून प्रसारमाध्यमांमध्ये ती झळकली आहे. पण असे बरेच लोक आहेत ज्यांनी अद्याप तिचे नाव ऐकले नाही आणि हे केवळ भारतात लोक पुरुषांच्या क्रिकेट कडे महिला क्रिकेट पेक्षा जास्त आकर्षित असल्यामुळे आहे. खेळामध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>स्मृती ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी डावखुरी फलंदाज आहे. गेल्या काही आठवड्यांत झालेल्या मॅचेसमध्ये तिने अविश्वसनीय फलंदाजी करून प्रसारमाध्यमांमध्ये ती झळकली आहे.</p>
<p>पण असे बरेच लोक आहेत ज्यांनी अद्याप तिचे नाव ऐकले नाही आणि हे केवळ भारतात लोक पुरुषांच्या क्रिकेट कडे महिला क्रिकेट पेक्षा जास्त आकर्षित असल्यामुळे आहे. खेळामध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी तिचे जीवन प्रेरणादायी आहे.</p>
<p>स्मृती मंधाना आणि क्रिकेटमधील तिच्या प्रवासाबद्दल आपल्याला माहित असाव्यात अशा गोष्टी येथे आहेत.</p>
<h2>जीवनी</h2>
<p>पूर्ण नाव: स्मृती श्रीनिवास मंधाना</p>
<p>जन्म: 18 जुलै 1 996, मुंबई, महाराष्ट्र, भारत</p>
<p>कडून: सांगली, महाराष्ट्र</p>
<p>फलंदाजीची पद्धत: डावखुरी</p>
<p>गोलंदाजीची शैली: उजवा हात मध्यम गती</p>
<p>भूमिका: फलंदाज</p>
<h3>स्मृती मंधाना चे बालपण</h3>
<p>स्मृती मंधाना हिचा जन्म मुंबई मध्ये 18 जुलै 1996 रोजी श्रीनिवास आणि स्मिता यांच्या कन्या म्हणून झाला. पण जेव्हा ती फक्त 2 वर्षांची होती, तेव्हा तिचे आई-वडील सांगली येथे गेले. तिचे वडील श्रीनिवास मंधाना हे जिल्हा पातळीवर माजी क्रिकेटपटू होते. त्यांनी आपल्या मुलांनी भारतीय क्रिकेटमध्ये करियर करण्याचे स्वप्न पाहिले. तिची आई स्मिता मंधाना ह्यांचा हि सुरवातीपासूनच स्मृतीला पाठिंबा होता. कोणत्याही आई ने आपल्या मुलीला पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र निवडण्यासाठी सहकार्य करणे अवघड होते. श्रीनिवास यांच्या मते, स्मृती केवळ 3 वर्षांची होती जेव्हा तिने हातात स्ट्राईक साठी प्लॅस्टिकची बॅट घेतली. तेथूनच निर्णायक दृढनिश्चय व कठोर परिश्रमांच्या परिणामामुळे ती भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर झाली.</p>
<h3>तिची क्रिकेटची प्रेरणा</h3>
<p>आधी सांगितल्याप्रमाणे, स्मृतीच्या वडिलांची त्यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय क्रिकेटमध्ये करियर करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती. स्मृती ला क्रिकेटची आवड तिचा भाऊ, श्रवण मुळे लागली, जो महाराष्ट्रातील U -16 गटासाठी खेळला होता. आपल्या मुलाचे यश पाहून तिच्या आईला तिच्या भावाचा वाटलेला अभिमान पाहिल्यावर स्मृतीने क्रिकेटपटू म्हणून आपले करियर ठरवले.</p>
<p>तिच्या भावानी नंतर वेगळे  करियर केले तरी, स्मृतीने तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. संपूर्ण कुटुंबाने स्मृतीच्या निर्णयाला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापित केले होते, तर तिच्या आईने तिच्या संतुलित आहाराची काळजी घेतली. तिचा भाऊसुद्धा आपल्या लहान बहिणीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःच्या व्यस्त बँकिंग कारकीर्दीतून वेळ देतो.</p>
<h3>क्रिकेटमधील तिचा प्रवास</h3>
<p>स्मृती वयाच्या 9व्या वर्षी महाराष्ट्र U-16 संघात खेळू लागली.</p>
<p>वयाच्या 11व्या वर्षी महाराष्ट्रात 19 वर्षाखालील संघात तिची निवड झाली.</p>
<p>15व्या वर्षी, स्मृतीने क्रिकेटमध्ये एक वर्ष ब्रेक घेण्याचे ठरवले आणि एक वर्षानंतर पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला.</p>
<p>स्मृतीने 16व्या वर्षी प्रथम आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केले आणि तिची प्रतिभा संपूर्ण खेळामध्ये ओळखली गेली.</p>
<p>महाराष्ट्राविरुद्ध गुजरातच्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने दुहेरी शतक झळकावले. 150 चेंडूत 224 धावा करून ती नाबाद राहिली.</p>
<p>त्यानंतर एक वर्षानी 2014 मध्ये ती भारताकडून पहिला कसोटी सामनाऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली ज्यात तिने प्रत्येक डावात 22 आणि 51 धावा केल्या होत्या.</p>
<p>2016 मध्ये, तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले एकदिवसीय शतक (109 चेंडूत 102) काढले.  त्यानंतर त्याच वर्षी, महिलांच्या बिग बॅश लीगसाठी ब्रिस्बेन हीटशी तिने एक वर्षाचा करार केला. हे यश मिळवणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली.</p>
<p>तिने 72 चेंडूत 90 धावा केल्या, ज्यामुळे 2017 च्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत संघाचा धावसंख्येचा दर वाढला आणि 24 तारखेला इंग्लंडविरुद्ध विजय मिळविला.</p>
<p>त्यानंतर, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे तिच्या अविश्वसनीय फलंदाजीचे कौतुक केले गेले.</p>
<h3>क्रिकेटमधील तिचे रोल मॉडेल</h3>
<p>अलीकडच्या सामन्यांमध्ये केलेली जबरदस्त खेळी आणि 18 नंबरच्या जर्सीमुळे लोकांनी स्मृती मंधानाची विराट कोहलीशी तुलना केली. बॅटिंगच्या आक्रमक शैलीमुळे तिची वीरेंद्र सेहवागशी तुलना केली गेली. परंतु, विरुने तिला पुढील सेहवाग नाही, तर स्मृतीची पहिली आवृत्ती असल्याचे म्हणले आहे. स्मृती युवराज सिंगला प्रेरणा म्हणून मानते आणि श्रीलंकेचा कुमार संगकाराची ती चाहती आहे. तिचे प्रशिक्षक अनंत तंबवेकर यांनी एकेकाळी प्रेसला सांगितले होते की, डाव्या हाताची फलंदाज असल्याने तिच्या खेळीत ह्या दोघांची शैली दिसते.</p>
<p>इंटरनेटवर फक्त तिच्या प्रतिभावंत फलंदाजीमुळेच नव्हे तर तिच्या गोंडस स्मितहास्यामुळे तिने संपूर्ण देशातल्या चाहत्यांवर भुरळ पाडली आहे. तिच्या इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्धच्या दर्जेदार खेळीमुळे ती प्रकाशझोतात आली. परंतु तिच्या गोंडसपणाकडे चाहत्यांनी रस दाखवला. अलीकडे ऑनलाईन कल असा दाखवतो कि भारतातील नवीन क्रश म्हणून स्मृती मंधानाने दिशा पटणी हिला देखील मागे टाकले आहे.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/smriti-mandhana-marathi-bio/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>फेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क &#8211; उत्पादनाची समीक्षा</title>
		<link>https://maharashtramajha.com/the-face-shop-real-nature-green-tea-face-mask/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/the-face-shop-real-nature-green-tea-face-mask/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Ashish]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 05 Jan 2020 01:52:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[आरोग्य]]></category>
		<category><![CDATA[ग्रीन टी]]></category>
		<category><![CDATA[फेस मास्क]]></category>
		<category><![CDATA[फेस शॉप]]></category>
		<category><![CDATA[रियल नेचर]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=1723</guid>

					<description><![CDATA[जेव्हा मी &#8220;Green Tea&#8221; शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनात येणारी एक गोष्ट म्हणजे त्याची चव हि गवत कापणाऱ्या मशीन च्या तळाशी चाटले असता जशी लागेल तशी असेल. परंतु त्याच्या चवीकडे दुर्लक्ष केले असता, हे सिद्ध झाले आहे कि, हरित चहा हा अनेक इतर घटकांसारखा आहे जो आपल्या त्वचेवर विशेषतः ती समस्याग्रस्त असेल तर जादूसारखे काम [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>जेव्हा मी &#8220;Green Tea&#8221; शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनात येणारी एक गोष्ट म्हणजे त्याची चव हि गवत कापणाऱ्या मशीन च्या तळाशी चाटले असता जशी लागेल तशी असेल. परंतु त्याच्या चवीकडे दुर्लक्ष केले असता, हे सिद्ध झाले आहे कि, हरित चहा हा अनेक इतर घटकांसारखा आहे जो आपल्या त्वचेवर विशेषतः ती समस्याग्रस्त असेल तर जादूसारखे काम करतो.</p>
<p>अलीकडेच मी द फेस शॉप जी एक  कोरियन स्किन केअर आणि सौंदर्य कंपनी आहे त्यांचा  ग्रीन टी चा मास्क वापरला. हवामानातील बदल आणि कदाचित प्रचंड प्रदूषणाचा दररोज मारा झाल्यामुळे माझी त्वचा खराब झाली होती, म्हणून मला त्यासाठी काहीतरी करण्याची अतिशय गरज होती.  या पोस्टमध्ये मी, माझे त्या उत्पादनाबद्दल चे विचार आणि त्याचे कार्य कसे झाले याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. जर तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पुढे वाचा.</p>
<h3><strong>किंमत</strong></h3>
<p>हे मास्क नायका येथे 100 रुपयांना विकले गेले आहे.</p>
<h3>पॅकेजिंग</h3>
<p>हे एका प्लॅस्टिक च्या पिशवीत असते ज्याच्या आत पत्रक दुमडून ठेवले आहे. आपल्या डोळे, नाक आणि तोंडासाठी त्यात काही छिद्र आहेत आणि हे मास्क एका पातळ कपड्यासारख्या पदार्थाने बनवले आहे जे पूर्णपणे सिरम मध्ये भिजवलेले आहे. पॅकेजिंग प्रत्यक्षात खूपच साधे परंतु खूप छान आहे. बाहेरील पॅकेटसाठी चांगली गुणवत्ता असलेल्या प्लॅस्टिकचा वापर केला आहे, त्याला मॅट फिनिश केलेलं आहे आणि प्रवासासाठी नक्कीच उपयुक्त आहे. आपल्या प्रवासाच्या बॅगमध्ये यासारखे अनेक मास्क घेऊन आपण निश्चितपणे प्रवास करू शकता.</p>
<h3>ते काय दावा करतात</h3>
<p>सीरममध्ये भिजवलेल्या मास्क शीटमुळे पर्यावरणातील घटकांमुळे त्वचेची होणारी आग ग्रीन टी मुळे कमी होते, त्वचेचा ताजेपणा टिकतो आणि पुनरुत्थान होते.</p>
<h3>हे कसे काम करते आणि माझे विचार काय आहेत</h3>
<p>जेव्हा त्वचेची काळजी हा विषय येतो तेव्हा मला वाटते की के सौंदर्यप्रसाधनामध्ये अशा काही पवित्र उत्पादनांचा समावेश आहे. स्नेल गूप  किंवा सिरम चे मास्क रात्रभर ठेवले तर ते तुमच्या त्वचेवरील डाग घालवण्यास मदत करतात.  तथापि, शीट मास्क हे एक असे उत्पादन आहे जे मला सुंदरतेसाठी थोडेसे अतिरिक्त असल्याचे नेहमीच जाणवत होते. याचा अर्थ असा आहे की विचार करा, आपण त्या उत्पादनासाठी 100 किंवा 150 रुपये द्यावे जे आपण केवळ एकदाच वापरु शकतो आणि आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की विशेषत: जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा एकदा वापरून काहीही उपयोग होत नाही; म्हणून ते मला फार आवडले नाही.</p>
<p>पण अलीकडेच, सततच्या प्रवासामुळे, उन्हात फिरल्यामुळे आणि चुकीच्या अन्न सवयीमुळे माझ्या त्वचेला मदतीची अतिशय गरज होती. दरवेळी आधीपेक्षा जास्त त्रास माझ्या त्वचेला होत होता म्हणूनच मी कोरियन शीट मास्क वापरायचे ठरवले आणि ते माझ्या त्वचेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खरोखरच काहीतरी करू शकेल का ते पाहायचं ठरवलं.</p>
<p>सध्या मी ग्रीन टी पिणाऱ्यांच्या गटाचा भाग नसीन, परंतु मी ते नाकारणार नाही की ग्रीन टी आपल्या त्वचेवर उपचार करण्यासाठी किंवा तिचा दाह कमी करण्यासाठी खरोखर चांगले कार्य करते. म्हणून मी द फेस शॉप चा ग्रीन टी शीट मास्क वापरायला सुरुवात केली, ज्याची किंमत १०० रुपये आहे, जे ठीक आहे असे दिसते. या उत्पादनाचा खरोखरच उपयोग होतो कि नाही हे बघायला मी एक वेळ एवढे पैसे खर्च करायला तयार होते.</p>
<p>मास्क वापरण्याच्या सूचना फार स्पष्ट आहेत. आपला चेहरा प्रथम धुवून कोरडा करण्याची गरज आहे. त्यानंतर चेहऱ्याला शीट मास्क लावा. आपल्याला हवे तितका वेळ मास्क चेहऱ्यावर ठेवा (किमान 20 मिनिटे शिफारसीय आहेत) आणि नंतर ते काढून टाका. आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर उरलेल्या मास्क ने मसाज करा व ते आपल्या त्वचेमध्ये शोषून घेण्यासाठी ठेवा.</p>
<p>हे ग्रीन टी मास्क असल्यामुळे, ह्याचा वास ग्रीन टी सारखा उग्र येईल असे मला वाटत होते, परंतु या उत्पादनाचा सुगंध माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. परंतु तो एखाद्या महाग उत्पादनासारखा होता. सीरममध्ये शीट भिजवल्यामुळे, जेव्हा आपण पॅकमधून मास्क बाहेर काढतो तेव्हा ते गळायला सुरू होते, म्हणून ते लगेच लावण्याची आवश्यकता आहे.  मास्कचा आकार अगदी एकसारखा नाही, म्हणून जेव्हा आपण ते वापरता तेव्हा आपल्या गरजेनुसार विशेषत: नाकाजवळ ते जुळवून घ्या.</p>
<p>आता ह्याच्या कामगिरीकडे  येऊ. जेव्हा मास्क चेहऱ्यावर होता तेव्हा मला थंडगार वाटत होते. आणि त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक चमक दिसली. त्वचेचा ओलावा टिकण्यास मदत झाली तसेच ती रीफ्रेश झाली होती आणि माझ्या फोडांसाठी मी काहीच न करता पुढच्या दिवशी ते अगदी लहान दिसले.</p>
<p>परंतु, ह्या मास्क मुळे माझा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा चमकत होता. ज्या लोकांची त्वचा कोरडी आणि खराब आहे अशांसाठी हा मास्क खूप चांगला आहे. ग्रीन टी मुळे कदाचित आपल्या फोडांवर फरक पडेल जर आपण हा मास्क बऱ्याच वेळा वापरलात. परंतु एक वेळ वापरून, आपण निश्चितपणे चमकणाऱ्या आणि हायड्रेटेड त्वचेची अपेक्षा करू शकता.</p>
<h3>साधक आणि बाधक</h3>
<p><strong>गुणः</strong></p>
<ul>
<li>प्रवासासाठी अनुकूल पॅकेजिंग</li>
<li>परवडणारी किंमत</li>
<li>खूप चांगला वास</li>
<li>आपली त्वचा चमकते</li>
<li>कोरडी त्वचा हायड्रेटेड बनवते.</li>
</ul>
<p><strong>विसंगत</strong><strong>:</strong></p>
<ul>
<li>एक वेळच्या उत्पादन वापरामुळे त्वचेमध्ये कोणतेही कठोर बदल होत नाहीत.</li>
</ul>
<h3>रेटिंग</h3>
<p>मी या उत्पादनास 5 पैकी 3.5 गूण देऊ शकेन कारण प्रामुख्याने माझ्या त्वचेला चमक येण्याव्यतिरिक्त ह्या उत्पादनाचा खरोखरीच दुसरा उपयोग झाला नाही. मुख्यतः त्वचेवरील फोड कमी करण्याची मी जास्त अपेक्षा करीत होते, कारण त्यात ग्रीन टी वापरले होते. पण त्या प्रकारचे काहीही खरोखर झाले नाही. परंतु आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमापूर्वी आपली त्वचा उजळण्यास काहीतरी शोधत असाल तर आपण हे शीट मास्क नक्कीच वापरून पहावे.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/the-face-shop-real-nature-green-tea-face-mask/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मला कळालेले पानिपत !</title>
		<link>https://maharashtramajha.com/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a4/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a4/#comments</comments>
		
		<dc:creator><![CDATA[satyamavdhutwar]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 15 Jan 2017 12:19:10 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[अहमदशहा अब्दाली]]></category>
		<category><![CDATA[इब्राहिम खान गारदी]]></category>
		<category><![CDATA[दिल्ली]]></category>
		<category><![CDATA[नजिबखान]]></category>
		<category><![CDATA[पानिपत]]></category>
		<category><![CDATA[पानिपतचे तिसरे युद्ध]]></category>
		<category><![CDATA[पेशवे]]></category>
		<category><![CDATA[बलीदान]]></category>
		<category><![CDATA[मराठे]]></category>
		<category><![CDATA[मराठेशाही]]></category>
		<category><![CDATA[मल्हारराव होळकर]]></category>
		<category><![CDATA[महायुद्ध]]></category>
		<category><![CDATA[विश्वासराव]]></category>
		<category><![CDATA[शिवकालीन इतिहास]]></category>
		<category><![CDATA[सरसेनापती सदाशिव भाऊ]]></category>
		<category><![CDATA[सेनापती दत्ताजी शिंदे]]></category>
		<category><![CDATA[हिंदवी स्वराज्य]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=1628</guid>

					<description><![CDATA[पानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की &#8220;पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="line-height: 1.5">पानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की &#8220;पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते सांग ?&#8221; तर माझं उत्तर नकारात्मक असेल. कारण, पानिपतात कुणीच जिंकलं नाही !  &#8220;मराठे संख्यात्मक दृष्ट्या हरले, तर अफगान सैन्य मोहीम फत्ते झाली नाही म्हणुन.&#8221; अहमदशाह अब्दालीने त्या महायुद्धातील मराठ्यांच्या संगरतांडवाची अशी काही धसकी घेतली, की त्याला आपला गाशा गुंडाळुन मायदेशी परत जावे लागले. कारण, मराठ्यांचं एक तृतियांश 1/3 सैन्य पानिपतावर अब्दालीशी भिडलं होतं, पण अब्दालीचं सर्वच्या सर्व सैन्य युद्धात होतं त्यापैकी 70% सैन्य मरण पावलं. तिकडे अब्दालीच्या बंधुंनी गादी मिळवण्यासाठी बंड केलं आणि अब्दालीने युद्धानंतर मोहीम सोडुन तडकाफडकी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. </span></p>
<p>&nbsp;</p>
<p>जरा दुसऱ्या बाजुने ह्या महायुद्धाच्या परिणामांचा विचार केला, तर ह्या महायुद्धात मराठे जिंकले असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठ्यांचे लक्ष्य हे अब्दालीला रोखने आणि दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करणे हेच होते. आणि अप्रत्यक्षरित्या मराठ्यांनी ते साध्य केले होते. कारण त्यानंतर अब्दाली मोहीम सोडुन माघारी फिरला आणि स्वत: त्याने पेशव्यांना संबंधित आशयाचे पत्र लिहुन हे कळविले की &#8211; &#8220;तुम्ही नेमलेल्या दिल्लीचा बादशहाला मी देखिल पुनश्च बादशहा म्हणुन मान्यता देतो, आणि दिल्लीचे रक्षण पुर्वीप्रमाणे मराठ्यांनीच करावे ही विनंती.&#8221; हे पत्र स्वत: अहमदशहा अब्दालीने लिहुन पेशव्यांना पाठविणे म्हणजे मराठ्यांचा पानिपतावर अप्रत्यक्षपणे झालेला विजयच.</p>
<p>&nbsp;</p>
<p>पानिपतचे महायुद्ध संख्यात्मकदृष्ट्या हारण्याची कारणे आणि त्यानंतरचे भारतीय राजकारणावर झालेले परिणाम आणि राजकीय लाभ ह्याचा विचार करता, अब्दाली सरळसरळ संख्यात्मक दृष्ट्या जिंकला होता, परंतु मराठ्यांच्या भिमटोल्याने अब्दालीचे एवढे नुकसान झाले की त्याला त्याच्या उरलेल्या सैनिकांसमवेत दिल्लीवर स्वत:चे राज्य घोषित करुन ते टिकविणे शक्य नव्हते. कारण, मराठ्यांचे दोन तृतियांश  2/3 सैन्य अजुनही महाराष्ट्रात होते, जर मराठ्यांनी पानिपतच्या पराभवाचा सुड घेण्यासाठी परत दिल्लीला धडक मारली, तर माझ्या कबरीचं थडगं नावालापण शिल्लक ठेवणार नाहीत ! ही भिती अब्दालीच्या मनात घर करुन होती. कारण मराठ्यांची दहशतच तशी होती ! काय तो काळ जेंव्हा शिवरायांना दिल्ली दरबारी नजरकैदेत ठेवल्या गेलं होतं, आणि एक हा काळ जेथे दिल्लीच्या गादीवरचा (नामधारी) बादशहा मराठ्यांनी तिन वेळा बदलला.</p>
<p>&nbsp;</p>
<p>पानिपतच्या महायुद्धानंतर राजकीय फायदा ना मराठ्यांना झाला ना अब्दालीला. फायदा झाला तो उत्तरेतील संस्थानांना ! (म्हणजेच रजपुत, जाट, शिख, गुजर ईत्यादी) कारण अब्दाली म्हणजे राष्ट्रीय संकट आणि मराठे म्हणजे दिल्लीच्या तख्ताचे रक्षणकर्ते ह्यांच्यात युद्ध झाले. दोन्ही बाजुस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या गंभीर हानी झाली, आणि दिल्लीची राजकीय परिस्थिती पुर्वपदावर येऊ लागली (उत्तरेतल्या हिंदू राजा-महाराजांना अपेक्षित असलेली). पानिपतचा रणसंग्राम चालु असताना मराठ्यांना मदत न करता स्वत:ची कातडी वाचवुन लांबुन नजारा पाहणाऱ्या हिंदू राजे-महाराजांनी वर्षभरानंतर दिल्लीत हातपाय पसरायला सुरुवात केली, आणि दिल्लीच्या (नामधारी) बादशहाचे नियंत्रण मिळविण्यासाठी जाळे विणायला सुरु केले होते. ह्या प्रकाराला मी दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणेन, कारण, अब्दाली आणि मराठे अश्या दोन मांजरांचे भांडण चाललय आणि उत्तरेतली माकडं भांडण सरल्यावर दिल्लीचं लोणी खायला उड्या मारत गेले. पानिपतच्या महायुद्धानंतर दिल्लीच्या आणि संपुर्ण भारताच्या राजकारणाला एक वेगळंच असं अनपेक्षित वळण मिळालं. खरं सागायचं झाल्यास पानिपतचं युद्ध हे अटळच होतं. कारण, तेंव्हाची राजकीय परिस्थिती पाहता (दिल्लीवर होणारी आक्रमणे) ह्यांना कुठल्यातरी प्रकारे लगाम लावणे आणि &#8220;एकछत्री हिंदूपदपातशाहीचे स्वप्न&#8221; अस्तित्वात आणण्यासाठी स्थिर असलेली राजसत्ता दिल्लीत असणे आवश्यक होते. नाझेरखान (अब्दालीचा गुरु) चे अयशस्वी झालेले मनसुबे पुर्ण करण्यासाठी अब्दाली नजिबखानाच्या औपचारिक बोलावण्यावरुन तिसऱ्यांदा स्वारीस आला होता, यापुर्वी जेंव्हा दोन वेळा अब्दाली आला होता, तेंव्हा तो पहिल्यांदा उप-सेनापती व दुसऱ्यांदा सेनापती म्हणुन आला. नाझेरखानच्या मृत्युनंतर अब्दालीने इराण पासुन अफगाणीस्तान वेगळा केला आणि त्याने कंदाहारची माती मौलवी हस्ते कपाळाला लाउन स्वत:ला अफगाणचा राजा घोषित केले. स्वत:चे राज्य स्थापन केल्यानंतर त्याला राज्यकारभारासाठी चांगला खजिना पाहिजे होता, अब्दाली हिंदूस्तानात तिसरी स्वारी करण्याच्या विचारातच होता, त्यात प्रत्यक्ष हिंदूस्तानातुन रोहिल्याच्या नजिबखानाने औपचारिक पत्र पाठविले आणि अब्दाली वादळाप्रमाणे हिंदूस्तानच्या सरहदीवर येऊन धडकला.</p>
<p>&nbsp;</p>
<p>10 जानेवारी 1760 मध्ये क्रुरकर्म्या नजिबाने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला आणि मल्हारराव होळकरांचा विश्वासघात. नजिब्याने  अयोद्धेचा नवाब सुजाउदौला, दुर्राणी बादशहा अहमदशहा अब्दाली आणि आसपासच्या मुलुखातली वतनदार मुस्लिम सरदार मंडळी इस्लामच्या नावाने जमा केलं. मौलाना सुजावली खान ने ह्या सर्वांना पवित्र &#8220;दार-उल-इस्लाम&#8221; साठी जिहाद करण्याची शपथ दिली अशी नोंद आहे. (सध्या पाकिस्तानात व अफगाणीस्तानातील तमाम दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीचा जनक म्हणजे मौलाना सुजावली खान होय. 1857 मध्ये भारतात सुरु झालेल्या खिलाफत चळवळीचे धागेदोरे हे मौलाना सुजावली खान पर्यंत पोहचतात). तर दुसरीकडे अहमदशहा अब्दालीची बेगम झिनतने (मराठ्यांचा तोफखाना प्रमुख) इब्राहिम खान गारदीला पवित्र &#8220;दार-उल-इस्लाम&#8221; ची दिलेली शपथ त्याने झिडकारुन लावली, इब्राहिम खान आणि सदाशिव भाऊंच्या मैत्रीच्या एका आदर्श उदाहरणाची नोंद इतिहासाला करणं भाग पडलं.  नजिब्याने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला, ही बातमी जशी पुण्याला पोहचली तशी शनीवारवाड्यात एकच खळबळ उडाली. पेशव्यांनी राघोबादादांऐवजी सदाशिवभाऊंना उत्तरेच्या मोहीमेकडे नेतृत्व करण्याची संधी दिली खरी, पण पेशविणबाईंच्या दबावाने त्यांनी मोहीम काढली ती चिरंजीव विश्वासरावांच्या नावानेच. पेशव्यांनी भाऊंना संधी दिली पण अधिकार दिला नाही, अश्या अविश्वासाची भाऊंना अपेक्षा नसेल, पण ही वेळ मान-मनसुब्यासाठी झगडा करण्याची नव्हे तर राष्ट्ररक्षणासाठी अब्दालीला दिल्लीपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशीलपणे लढण्याची आहे. भाऊंच्या पाठीवर लादलेले बाजारबुणगे, शंखफुके भटजी, चिलीमफुके साधूबाबा, बायकालेकरांचे लटांबरं अन् पंढरपुरच्या जत्रंला निघाल्यासारखे टाळ कुटणारे हौशे, गवशे, नवशे म्हणजे खायला काळ अन् भुईला भारंच होते, सैनिकमावळ्यांना ह्या बाजारबुणग्यांच्या लटांबरामुळं अन्नपाणी कमी पडत असे, प्रवासाची गती कमी होत असे. जेंव्हा अब्दालीने मराठ्यांची पंजाबातील रसद तोडली, नदीवर धरण बांधुन पुर्ण पाणी अडवलं, तेंव्हा ह्या तिर्थक्षेत्रासाठी उड्या मारत आलेले शंखफुके, चिलीमफुके, हौशे, गवशे, नवशे ह्यांनी भाऊंना आपल्याला परत पुण्याकडे पाठवण्यासाठी पायी लोटांगण घातले. हा प्रकार अप्रत्यक्षरित्या पराभवाचे कारण असु शकते.</p>
<p>&nbsp;</p>
<p>विश्वासरावांनी आणि भाऊंनी वेळोवेळी पेशव्यांना हलाखीची परिस्थिती सांगुन मदत मागितली, पेशवे सरकार 40 हजाराची सेना घेउन निघाले खरे ! पण, पैठण मुक्कामी त्यांनी आंगाला हळद फासुन, गुडघ्याला बांशिंग बांधले. 40 हजाराच्या सेनेचं लग्णाच्या वऱ्हाडात रुपांतर झालं, ही बातमी जेंव्हा भाऊंना कळाली तेंव्हा भाऊंना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे सैन्य एक आठवड्यापासुन उपाशी आहे, नदीकाठची शाडुची माती, गांजरगवत, कंदमुळं खाउन सैन्य दिवस काढित होतं, आणि ज्या श्रीमंत पेशव्यांची भाऊ वाट पाहत बसले होते, ते आपल्या सैनिकांसोबत नविन सासुरवाडीत पाहुनचार घेत होते. ही अजुन एक बाब पराभवासाठी प्रत्यक्षपणे कारणीभुत होती. जर श्रीमंत पेशवे तडकाफडकी 40 हजाराच्या फौजेसोबत पानिपतावर उतरले असते तर अब्दालीची कबर रणमैदानात खणुन त्याचा अध्यायच संपवला असता. प्रत्यक्ष रणमैदानात युद्धप्रसंगी सदाशिवभाऊंनी आणि इब्राहिमखान यांनी बनविलेली गोलाकार व्युहरचना गायकवाड, विंचुरकर मोडुन पुढे गेले नसते तर अब्दालीच्या सैन्याला व्युहात प्रवेश करता आला नसता. दूपारी 3 पर्यंत इब्राहिम खानच्या तोफांनी अन् भाऊंच्या युद्धनितीने साधारणपणे युद्धाची परिस्थिती मराठ्यांच्या हातातच होती, पण गायकवाड अन् विंचुरकरांच्या एका चुकीमुळे व्युहरचना मोडली, शत्रु आत घुसला, समयसुचकतेच्या अभावाने, आणि भावनाविवश होउन मराठ्यांनी हातातील परिस्थिती गमावली. रक्ताचा सडा टाकुन मिळवलेलं हे युद्ध शेवटच्या तासात मराठ्यांना गमवावं लागलं. एवढ्या बिकट परिस्थितीत मराठे लढले, लढता लढता ह्या मातीत एकरुप झाले. कोणत्याही मदती शिवाय, युद्ध सुरु होण्यापुर्वी सकाळच्या पहिल्या घटकेपर्यंत भाऊंची मनस्थिती कशी असेल ? ह्याचा अंदाजच लावता येत नाही. कोणाचीही कसलीही मदत न घेता आठवड्याभराचा अन्नपाण्याशी चाललेला संघर्ष, श्रीमंतांनी केलेला विश्वासघात, उत्तरेतील हिंदू राजांनी केलेले दुर्लक्ष, ह्यांना न जुमानणाऱ्या भाऊंनी लाखभर मावळ्यांच्या हृदयात प्राणज्योत पेटवली तरी कशी ?  ह्या विचारानेच मी वेडा होउन जातो. किती ताकदवान असतील ते भाऊंचे शब्द ज्याच्यात हजारो मंत्रांची ऊर्जा संक्रमित झालेली होती. जर भाऊंच्या जागी कदाचित दुसरा कुणी असता तर खचितच तो शरण गेला असता, असं म्हणनं वावगं ठरणार नाही.</p>
<p>&nbsp;</p>
<p>तानाजी मालुसरे पासुन दत्ताजी शिंदे पर्यंतच्या मर्द मावळ्यांच्या रक्ताचं कर्ज फेडण्यासाठी शिव-शंभुंना भाऊंनी वाहीलेली श्रद्धांजली म्हणजे पानिपत.</p>
<p>&nbsp;</p>
<p>राष्ट्ररक्षणासाठी कसलाही जातभेद, प्रांतभेद, भाषाभेद न मानता शत्रुला रोखण्यासाठी मर्द मऱ्हाठी मावळ्यांनी &#8220;हर हर महादेव&#8221; ची गगनभेदी ललकारी देत सणसणित हाणलेला भिमटोला म्हणजे पानिपत.</p>
<p>&nbsp;</p>
<p>जात, धर्मापेक्षा हे राष्ट्र सर्वोच्च आहे, आणि ह्या राष्ट्राच्या रक्षणास्तव &#8220;मारीता मारीता मरावे&#8221; हा वसा घेऊन रणमैदानी मराठ्यांनी केलेले संगरतांडव म्हणजे पानिपत.</p>
<p>&nbsp;</p>
<p>मायभूमीचे पांग फेडण्यासाठी परिणामांची पर्वा न करता मराठ्यांनी स्वत:च्या रक्ताने जिथे भारतमातेचे चरण धुतले ते ठिकाण म्हणजे पानिपत.</p>
<p>&nbsp;</p>
<p>न भुतो न भविष्यती असे हे पानिपत पानिपत पानिपत !</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>~ माहिति संकलन आणि लेखन : सत्यम अवधुतवार</p>
<p>&nbsp;</p>
<p>(सदरील लेख हा वाचलेल्या साहित्यातुन, दृकश्राव्य माध्यमांतुन, मिळालेल्या माहीतीनुसार मी माझं मतं येथे सविस्तरपणे मांडलेलं आहे)</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a4/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>1</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ</title>
		<link>https://maharashtramajha.com/rakt-ranjit-lal-kranti/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/rakt-ranjit-lal-kranti/#comments</comments>
		
		<dc:creator><![CDATA[satyamavdhutwar]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 12 Jan 2017 06:39:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Red Revolution]]></category>
		<category><![CDATA[आंबेडकर]]></category>
		<category><![CDATA[आंबेडकरी चळवळ]]></category>
		<category><![CDATA[कार्ल मार्क्स]]></category>
		<category><![CDATA[नक्षलवाद]]></category>
		<category><![CDATA[मृगजळ]]></category>
		<category><![CDATA[रक्तरंजित]]></category>
		<category><![CDATA[लाल सलाम]]></category>
		<category><![CDATA[लालक्रांती]]></category>
		<category><![CDATA[सामाजिक समस्या]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=1622</guid>

					<description><![CDATA[ह्या क्रांतीला मृगजळ म्हणुन संबोधने कितपत योग्य ठरेल हे सांगने कठिण आहे. परंतु तूर्तास तरी ही उपमा देता येईल, कारण लालक्रांती / लालसलाम हे नाव ऐकताच कितीतरी चेहरे, संघटना, राजकीय पक्ष हे गारा पडल्यासारखे डोक्यात गर्दी करतात. भारतातील माओवादी, नक्सली, साम्यवादी, फूटीरतावादी मंडळी कोणत्या पत्यावरलालसूर्याचा लालप्रकाश शोधत हिंडताहेत हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे !  लालक्रांती साठी समाजातील नक्की [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span id="more-1622"></span></p>
<p>ह्या क्रांतीला <b>मृगजळ</b> म्हणुन संबोधने कितपत योग्य ठरेल हे सांगने कठिण आहे. परंतु तूर्तास तरी ही उपमा देता येईल, कारण लालक्रांती / लालसलाम हे नाव ऐकताच कितीतरी चेहरे, संघटना, राजकीय पक्ष हे गारा पडल्यासारखे डोक्यात गर्दी करतात.</p>
<figure id="attachment_1623" aria-describedby="caption-attachment-1623" style="width: 519px" class="wp-caption alignleft"><img fetchpriority="high" decoding="async" class="size-full wp-image-1623" src="https://digitalmarketinginstitute.in/mh/wp-content/uploads/sites/2/2017/01/lal-kranti.jpg" alt="लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ." width="519" height="692" /><figcaption id="caption-attachment-1623" class="wp-caption-text">लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ.</figcaption></figure>
<p dir="ltr">भारतातील माओवादी, नक्सली, साम्यवादी, फूटीरतावादी मंडळी कोणत्या पत्यावर<b>लाल</b>सूर्याचा <b>लाल</b>प्रकाश शोधत हिंडताहेत हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे !  <b><i>लालक्रांती</i></b><i> साठी समाजातील नक्की कोणती आदर्श परिस्थिती ह्या लोकांना अपेक्षित आहे</i>??  ही संकल्पना समाजापुढे स्पष्ट व्हायला हवी. धर्माला अफूची गोळी म्हणुन संबोधणाऱ्या मार्क्सच्या (भारतातील) अनुयायांनी, काश्मिरला भारतासहित “<b>दार-उल-ईस्लाम</b>” बनविण्याची शपथ घेतलेल्या फुटिरतावाद्यांच, पाकपुरस्कृत दहशतवादाचं छूपं समर्थन करुन, जगापुढे काश्मिरी जनतेच्या मानवअधिकाराच्या आणि धर्मविरहीत लोकशाहीच्या गप्पा कराव्यात !  हा परालौकिक विरोधाभास पाहुन तो मार्क्स ढगातल्या ढगात बेरंगी अश्रू गाळीत असावा.</p>
<p dir="ltr">अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी मजुर/कामगारांना ठेउन एक आदर्श आर्थिक प्रारुप ठेवण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्सने केला. खिळखिळी झालेली नेतृत्वहीन राजसत्ता व पोपच्या धर्मव्यवस्थे विरोधात स्वत:च्या हक्कासाठी उभी राहिलेली जनतेची चळवळ, मार्क्सच्या सामाजिक परिवर्तनाच्या <i><b>साम्यवादी</b></i>  विचारसरणीला जन्म देऊन गेली. एव्हाना समाजविकासासाठी, मानवांच्या मूलभूत हक्कांसाठी, सामाजिक समतेसाठी लढणारी मार्क्सची विचारसरणी विशुद्ध स्वरुपात न राहता ‘<i>राजकीय स्वरुपातील हुकुमशाही पुतळ्याच्या साच्याचा आकार घेत होती</i>‘. स्टॅलिन, लेनिन, माओ, फिडेल कॅस्ट्रो यांनी मार्क्सच्या मूळ विचारसरणीला फाटा देऊन स्वत:ची राजकीय ईच्छापुर्ती करण्यासाठी त्या विचारसरणीला हुकुमशाहीच्या अन् घराणेशाहीच्या साच्यात व्यवस्थितपणे उतरवलं आणि त्याला मार्क्सचा मुखवटा बसवुन (वंशपरंपरागत) राजसत्ता उपभोगण्यासाठीचा  “<b>रक्तरंजित</b>  <b>लालरस्ता</b>”  यांत्रिकपणे बनत गेला. कारण बाह्यदर्शनी ही चळवळ मार्क्सचीच आहे,  असे दाखविण्यात येत असले तरीही ह्या चळवळीला वेगळे सुत्रधार मिळालेले होते.</p>
<p dir="ltr">स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात पाय रोवत असताना (<i>आंबेडकरांच्या चळवळीला स्वत:चा पर्याय दाखविण्यासाठी</i>) काही दशकांपर्यंत कम्यूनिस्ट लोकांनी भारतातील शोषित, मागास असलेला कामगारांचा वर्ग “<i>टार्गेट</i>“<i> </i>करण्यासाठी 1930 पासुन प्रयत्न चालविले होते. एवढे वर्ष मेहनत घेउनही कम्यूनिस्टांना अपेक्षित असा कामगार वर्ग भेटत नव्हता. तेंव्हा त्यांना नाईलाजाने आंबेडकरांच्या चळवळीचा आधार घेणे योग्य वाटले.</p>
<p dir="ltr">राजसत्ता मिळविण्यासाठी हूकुमशाही स्विकारतील ते <b>आंबेडकर</b> कसले ?? आंबेडकरांच्या शुद्ध लोकशाही विचारांशी तडजोड करणे कम्यूनिस्टांना परवडण्यासारखे नव्हते. ब्रिटीशांच्या पदरी होऊ घातलेल्या तत्कालिन निवडणुकीत कॉमरेड लोकांनी आंबेडकरांच्या विरोधात केलेला अपप्रचार आणि आंबेडकरांनी काठमांडूच्या भाषणात आपल्या राजकीय ईच्छाशक्तीची फाडलेली लख्तरं तसेच वैचारिक विरोधाने, स्वातंत्र्योत्तर काळातील कॉमरेड जनतेला कळून चुकले की, हूकुमशाहीची धोरणं आता गुंडाळून ठेवावी लागणार आणि हळूच (<i>हूकुमशाहीच्या  साच्यातील </i>) तथाकथित लोकशाहीवाल्या चळवळीला मार्क्सचा मुखवटा काढून लगेच आंबेडकरांचा मुखवटा चढवला.  तडजोडीनं दलित  आणि आदिवासी समाजाला सुरुवातीला धर्मसत्तेविरुद्ध आणि हळूहळू राजसत्ते विरुद्ध ढकलण्याचे काम सुरु झाले.</p>
<p dir="ltr"> 70, 80 च्या दशकात उदयास आलेल्या औद्योगिक क्रांतीने भारतात कामगारांचा एक (<i>बहुप्रतिक्षीत आणि अपेक्षित असलेला</i>) <i> </i>बहुसंख्यांक वर्ग हळुहळु तयार होत गेला.  कम्यूनिस्टांनी कामगार वर्गातील दलित समाजाला टार्गेट करण्याकडे आपला मोर्चा वळवला खरा पण दूर्दैवाने (<i>आपल्या सुदैवाने</i>) त्यांना कामगारवर्गाला आणि दलितांना  <i><b>साम्यवादी</b></i>  विचारसरणीशी पूर्णत: जोडता आले नाही, अर्थात ते अयशस्वी झाले असेही म्हणता येणार नाही. आंबेडकरांचे गुणगाण गाउन त्यांच्या अनुयायांना हळुहळु टप्याटप्याने  <i><b>साम्यवादी</b></i>  बनवले आणि त्यानंतर लोकशाहीच्या विरोधाकडे झुकवायला सुरु केले,  इंग्रजी भाषा साक्षरता अभियानाच्या अभ्यासक्रमाचा समारोप हा <b>“कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो” </b>आणि<b> “दास कॅपिटल” </b>ने झाला. दुर्गम क्षेत्रात, जंगलभागात राहणारे आदिवासी, जनजाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागास वर्गातील लोकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोईसुविधांपासुन वंचित ठेऊन स्वत: कॉमरेड लोकांनी त्याचे श्रेय घेतले स्वत:ला  त्यांचा <b>मसिहा </b>म्हणुन दाखविण्याचा प्रयत्न हा इंदिरा गांधींच्या आणिबाणी नंतर यशस्वी होऊ लागला.  80च्या दशकात गिरणी कामगारांच्या समस्या म्हणजे (<i>हूकुमशाही</i>) राजसत्तेकडे कूच करण्यासाठी जणु गवसलेला एखादा राजमार्गच वाटत होता. भांडवलशाही हळुहळु कामगारांची आर्थिक पिळवणूक करीत होती तर कम्यूनिस्ट लोक त्याचा पुरेपुर फायदा उचलत होते. ह्यावेळेसही त्यांना अपेक्षित  यश मिळालं नाही. भांडवलशाहीने गिरणी कामगारांची चळवळ दाबली, सरकारी नियमांमुळे नाईलाजाने त्यांचे अर्धेअधुरे पगार देउन बोळवण केली, आणि कम्यूनिस्टांच्या लेखी गिरणी कामगारांच्या चळवळीचे (<i>राजकीय</i>) महत्व कमी झाले आणि त्यांच्या समस्याही.</p>
<p dir="ltr">एव्हाना कम्यूनिस्ट धार्जिण्या रशियन एजंटांनी वैचारिक बुद्धिभेदाला सुरुवात केली होती. <b>K.G.B.</b> ह्या निमशासकिय रशियन गुप्तहेर कंपनीचा “युरी बेझमेनोव्ह” (Yuri Bezmenov) हा पहिला रशियन एजंट 1963 साली भारतामध्ये आला. तो एजंट म्हणुन नव्हे तर वृत्तपत्राचा संपादक म्हणुन आला आणि त्याने वृत्तपत्राद्वारे धर्मनिरपेक्षतेच्या आड हिंदूत्वावर आणि भारतीय संस्कृतीवर आघात केले, धार्मिक व्यक्तिमत्वांवर प्रश्नचिन्ह उचलले, धर्मग्रंथ काल्पनिक आहेत की नाही अश्या विषयांवर उलटसुलट चर्चा सुरु केली,  शैक्षणिक अभ्यासक्रमात मुघलांचे उदात्तीकरण केले, भारतीय स्वातंत्र्यढ्याचा मर्यादित इतिहासच शिकविण्यास भाग पाडले, हळूहळू धार्मिकविरोधाकडून तो भारतीय संस्कृतीच्या विरोधाकडे वळत होता. योग, आयुर्वेद, भारतीय विचारमूल्य, शास्त्रे, जीवनपद्धती ह्याचा जसाजसा तो सखोल अभ्यास करत गेला तसा तो भारतदेशाच्या प्रेमात पडत गेला, आणि शेवटी त्याला स्वत:च्या चूकिची जाणिव झाली, की त्याने ह्या देशातल्या दोन पिढींचे शैक्षणिक पद्धतीद्वारे ब्रेनवॉशच केले होते. त्याच्या एका मुलाखतीमध्ये त्याने <b>How to brainwash a nation</b> हा विषय सांगितला होता, रक्ताचा एकही थेंब ही न सांडता शत्रुराष्ट्राला वैचारिक बुद्धिभेद करुन नामोहरम कसे करावे, त्यावरुनच कम्यूनिस्टांच्या राष्ट्रविरोधी अजेंड्याची कल्पना येते. विवीध प्रकारचे समवैचारिक N.G.O., संघटणा ह्या मानवतावादी, लोकशाही विचारांचा मुखवटा घालुन महाविद्यालय, विद्यापीठ परिसरात कार्यरत असतात, विद्यार्थ्यांमधील व्यवस्थेविरोधात चिड ओळखुन त्यांना विद्रोहाकडे झुकवतात, आणि विद्रोह हा टोकाला गेला की तो हिसंक रूप घेत असतो, ह्याचेच उदाहरण म्हणजेच <b>नक्षलवाद</b>.  ज्याला सशस्त्र विद्रोह म्हणता येईल. ह्या परिस्थितीचे बळी पडलेल्यांची अनेक उदाहरणं देता येतील.</p>
<p dir="ltr">जून 2016 च्या “लोकमुद्रा”  मासिकात  <b>कबिर कला मंच </b> च्या ‘<i>सचिन माळी</i>‘<i> </i>ने आर्थर रोडच्या तुरुंगात असताना  “<i><b>जातिअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान</b></i>”  हे पुस्तक लिहीले होते. ह्या पुस्तकाविषयी माहितीपर लेख त्या मासिकात छापला होता. नक्षलवादाचा आरोप असलेल्या सचिनला हे देखिल माहित नव्हते की त्याचे गांभिर्य काय आहे ?  त्याला झालेला पश्चाताप आणि <b>लालपहाट </b>चा भ्रमनिरास त्याने पुस्तकात लिहून काढलाय. आंबेडकरी चळवळीतील एक सामान्य तरुण विद्रोह करता करता नक्षलवादाकडे कसा झुकला हे विचार करण्यासारखे अन त्यातुन बोध घेण्यासारखे आहे.</p>
<p dir="ltr">रक्तरंजित वाटेवर धावणारे हे लालक्रांतीचे मृगजळ सचिन सारख्या अजुन किती तरुणांचे आयुष्य बरबाद करणार  आहे ??</p>
<p dir="ltr">माहिती संकलन आणि लेखन : सत्यम अवधूतवार.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/rakt-ranjit-lal-kranti/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>1</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>राज संन्यास &#8211; नाटकार रा. ग. गडकरि कि संभाजी ब्रिगेड?</title>
		<link>https://maharashtramajha.com/raj-sanyas-sambhaji-udyan/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/raj-sanyas-sambhaji-udyan/#comments</comments>
		
		<dc:creator><![CDATA[akshaybikkad]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 07 Jan 2017 10:10:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[पुतळा]]></category>
		<category><![CDATA[राज संन्यास]]></category>
		<category><![CDATA[संभाजी उद्यान]]></category>
		<category><![CDATA[संभाजी ब्रिगेड]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=1616</guid>

					<description><![CDATA[काल राम गणेश गडकरीनी लिहिलेलं राज संन्यास हे नाटक वाचलं आणि त्यांच्या विषयी असणारा थोडाफार आदर भुर्रकन उडून गेला. खरं पाहता गडकरींनी शंभू राजांबद्दल वापरलेले शब्द कोणासाठीही वापरू नयेत असे आहेत. परंतु त्यांचा पुतळा फोडण्यामागे हे नाटक आणि त्यातील मजकूर असेल असं वाटत नाही, कारण हे नाटक प्रकाशित होऊन एक शतक (शंभर वर्षे) लोटलं आहे [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>काल राम गणेश गडकरीनी लिहिलेलं राज संन्यास हे नाटक वाचलं आणि त्यांच्या विषयी असणारा थोडाफार आदर भुर्रकन उडून गेला. खरं पाहता गडकरींनी शंभू राजांबद्दल वापरलेले शब्द कोणासाठीही वापरू नयेत असे आहेत. परंतु त्यांचा पुतळा फोडण्यामागे हे नाटक आणि त्यातील मजकूर असेल असं वाटत नाही, कारण हे नाटक प्रकाशित होऊन एक शतक (शंभर वर्षे) लोटलं आहे आणि या पूर्ण शतकात हे नाटक कोणीच वाचलं नसेल असं म्हणण मूर्खपणा असेल. हे कृत्य शंभू प्रेमातून नक्कीच झाल नाही. तस असत तर छत्रपती संभाजीं राजेंना हाल हाल करून मारणाऱ्या औरंजेबाची कबर आधी फोडली असती. परंतु त्याची कबर फोडून काही राजकीय लाभ होणार नाही हे बिग्रेडी चांगलेच ओळखून आहेत. ब्राम्हण आणि मराठा वाद पेटवून देण हा बिग्रेड चा आवडता छंद आहे.आणि हा प्रकार निव्वळ ब्राह्मण द्वेषातून झालेला आहे न कि शंभू प्रेमातून.</p>
<p>गडकरीचा पुतळा फोडण्या आधी किती लोकांना त्यांचा पुतळा संभाजी उद्यानात आहे हे माहिती होत? किती लोकांनी राज संन्यास हे नाटक वाचल होत? किती जणांना रा. ग. गडकरी माहित होते?</p>
<p>जे नाटक आधी ४ लोकांनी वाचल होत ते आता यांच्या उथळपणा मुळे लाखो लोकांनी वाचल. यांच्या मुळे काळाच्या पडद्याआड गेलेले ते शब्द पुन्हा एकदा घराघरात पोचले. मागच्या शंभर वर्षात जेवढ्या लोकांनी ते नाटक वाचलं नसेल त्याच्या पेक्षा जास्त लोकांनी मागच्या दोन दिवसात ते वाचल. जर या लोकांना संभाजी महाराजांबद्दल खरच प्रेम आणि आदर असता तर त्यांनी पुतळा फोडून याच राजकारण न करता त्यांनी या पुस्तकावर बंदीची मागणी केली असती जेणेकरून हे साहित्य पसरण्यापासून रोखता आल असत. प्रसिद्धी पाई महाराजाबद्दलचा बदनामीकारक मजकूर जाणूनबुजून सोशल मेडिया वर पसरविणारे हे लोक देखील त्या गडकरी इतकेच दोषी आहेत. तो मजकूर जाणूनबुजून पसरविण्यात आला जेणेकरून मराठा तरुणांचे डोके भडकून देऊन त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा समाज कंटकांचा मनसुबा होता. परंतु महाराष्ट्राची जनता असल्या प्रयत्नांना भिक घालणार नाही.</p>
<p>गडकरींचा पुतळा फोडून ब्राह्मण समाजाला डीवचायाचं आणि एका ब्राह्मणानं आपल्या राजाची बदनामी केली आहे असं बोलून मराठ्यांना भडकून द्यायचं आणि मग आपण मजा पाहत बसायचं हा त्यांचा डाव होता जो कि चांगलाच फसला आहे.</p>
<p>आपल्याकडे पुस्तकांवर बंदी घालणे हि नवीन गोष्ट नाही. मुस्लिमांच्या भावना दुखावणारया सलमान रश्दी यांनी लिहिलेल्या &#8220;सतनिक वर्सेस&#8221; वर १९८८ मध्ये बंदी घातली होती. याच आणखीन एक ताज उदाहरण म्हणजे सोनिया गांधी बद्दल आक्षेपार्ह मजकूर असणार रेड सारी ह्या पुस्तकावर तत्कालीन रालोंआ सरकारने बंदी घातली होती. म्हणून छत्रपतींची बदनामी करणाऱ्या राज संन्यास या नाटकावर बंदी घालायला हवी जेणेकरून बदनामीकारक मजकूर सोशल मेडिया वर पसरविला जाणार नाही.</p>
<p>गडकरीचा पुतळा फेकुन देणाऱ्यांनी अजून पण त्या पुस्तकावर बंदी घालायची मागणी केलेली नाही यावरून आपल्याला कळून येत कि राजांची बदनामी रोखण हा उद्देश्य नसून त्याच्या बदनामीच भांडवल करून स्वतःचा फायदा करून घेण आहे.</p>
<p>संभाजी महाराजांची बदनामी करणार नाटक लिहिणाऱ्या गडकरीचा निषेध आणि आणि त्याच भांद्डल करून जातीय तेढ निर्माण करण्याच प्रयत्न करणाऱ्या बिग्रेडचा पण जाहीर निषेध.</p>
<p>धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय | पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि जय.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/raj-sanyas-sambhaji-udyan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>1</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>नाना ‘नटसम्राट&#8230; असा नट होणे नाही’</title>
		<link>https://maharashtramajha.com/natsamrat-movie-review/</link>
					<comments>https://maharashtramajha.com/natsamrat-movie-review/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[jayeshmestry]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 03 Jan 2016 19:05:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मनोरंजन]]></category>
		<category><![CDATA[Movie Review]]></category>
		<category><![CDATA[नटसम्राट]]></category>
		<category><![CDATA[नाना पाटेकर]]></category>
		<guid isPermaLink="false">https://maharashtramajha.com/?p=1597</guid>

					<description><![CDATA[वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकावर आधारीत ‘नटसम्राट&#8230; असा नट होणे नाही’ हा चित्रपट आहे. नाटक आणि चित्रपट यांत जमीन-आस्मानाचं अंतर असतं. चित्रपटाचं माध्यम भव्य आहे. नाटकाला काही मर्यादा असतात. पण मर्यादा हेच नाटकाचं वैशिष्ट्य असतं. त्या मर्यादेत राहून केवळ एका रंगमंचावर तुम्हाला अखंड विश्व उभं करायचं असतं. म्हणून चित्रपट व नाटक ही दोन [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकावर आधारीत ‘नटसम्राट&#8230; असा नट होणे नाही’ हा चित्रपट आहे. नाटक आणि चित्रपट यांत जमीन-आस्मानाचं अंतर असतं. चित्रपटाचं माध्यम भव्य आहे. नाटकाला काही मर्यादा असतात. पण मर्यादा हेच नाटकाचं वैशिष्ट्य असतं. त्या मर्यादेत राहून केवळ एका रंगमंचावर तुम्हाला अखंड विश्व उभं करायचं असतं. म्हणून चित्रपट व नाटक ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. यात श्रेष्ठत्व कुणालाच बहाल करता येत नाही. दोन्ही माध्यमं आपापल्या जागी ठामपणे उभी आहेत. तुम्ही जर नटसम्राट हे नाटक पाहिलं असेल, तर ते काही वेळेसाठी विसरुन ‘नटसम्राट&#8230; असा नट होणे नाही’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रवेश करावा. त्यामुळे नाटकात असं दाखवलं होतं, चित्रपटात असं नाही दाखवलं. नाटकातले अप्पासाहेब वेगळे होते, चित्रपटातले वेगळे आहेत, वगैरे वगैरे अशी तुलना करणं कटाक्षानं टाळलं जाईल. मुळात नाटक आणि सिनेमाची तुलना होऊ शकत नाही. ८ &#8211; १० प्रवेशात तुम्हाला नाटक मांडायचं असतं. चित्रपटांत अनेक सीन्स असतात. चित्रपटाला पटकथा असते. म्हणून मूळ नाटकाचा गाभा हरवून न देता नव्याने पटकथा मांडण्यात आली आहे. स्टोरी लाईनमध्ये म्हणजेच मूळ कथानकामध्ये हलकासा बदल करण्यात आलेला आहे. चित्रपटात दोन नवे प्रमुख पात्र घेण्यात आलेले आहेत. एक सिद्धार्थ, जो आपली विदेशातली प्रशस्त नोकरी सोडून नाटकाच्या वेडाने भारतात परततो, दुरसं पात्र म्हणजे राम अभ्यंकर जो नटसम्राट अप्पासाहेब बेलवकरांचा मित्र आहे व स्वतः एक उत्कृष्ट नट आहे. पण नशीबाने या नटाला साथ दिली नाही.</p>
<p>चित्रपट हा नाटकापेक्षा किती वेगळा असतो याचं भान पहिल्या सीनपासून येतं. चहाच्या किटलीत चहा ओतला जातो इथून सीन उघडतो. एक वयोवृद्ध दाढी वाढलेली व्यक्ती बसलेल्या ग्राहकांना चहा देत आहे व काहीतरी पुटपुटत आहे. तो त्यानेच निभावलेल्या भुमिकांचे संवाद म्हणत असतो. काही लोक आश्चर्यानं व कौतुकानं या माणसाकडे पाहतात. तिथेच सिद्धार्थ बसलेला असतो. सिद्धार्थ हा उच्चशिक्षित तरुण आहे. नाटकाच्या वेडापायी आपली प्रशस्त नोकरी सोडतो. त्याला अप्पासाहेब बेलवकर दिसतात. तो पाहताक्षणी अप्पासाहेबांना ओळखतो. पण हे अप्पासाहेबांपासून लपवून ठेवतो. बेलवलकर जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करतो. बेलवलकरांकडून नाटकाविषयी त्याला जाणून घ्यायचं असतं. बेलवलकर बर्&#x200d;याचदा त्याला सांगतात की माझा पाठलाग करु नकोस. पण तो काही ऐकत नाही. एकदा नाट्यगृहाला आग लागली अशी बातमी वर्तमानपत्रात छापून येते आणि बेलवलकर अस्वस्थ होतात व ते तडक नाट्यगृहाकडे निघतात. त्यांच्या पाठोपाठ सिद्धार्थ जातो आणि आग लागलेल्या नाट्यगृहात फ्लॅशबॅकच्या स्वरुपातून सुरु होते नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची शोकांतिका. हा फरक आहे नाटकातील प्रवेश आणि पटकथेमधला. जळलेलं नाट्यगृह आणि फ्लॅशबॅक ही महेश मांजरेकर यांनी दिलेली मेजवानीच आहे. हे समिकरण खुप छान जमलंय. ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला नट स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. आपली इस्टेट, बचत सर्व काही मुलांच्या नावावर करुन मोकळा होतो. हा निर्णय बेलवलकरांचा मित्र राम अभ्यंकर आणि बेलवलकारांच्या पत्नीला पटत नाही. बेलवलकरांचं स्वच्छंदी, बिनधास्त वागणं त्यांच्या सुनेला आणि मुलाला खटकतं. ते आपल्या मुलीकडे राहायला जातात. पण त्यांचं वागणं मुलीलाही खटकतं व त्यांच्यावर चोरीचा आळ घेण्यात येतो. अर्थात त्यांनी चोरी केलेली नसते हे सिद्ध होतं. ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. मुलीनं बजावलेलं असतं की घर सोडायचं नाही. तरी पावसाळ्या रात्री ते घर सोडतात. त्या प्रवासात बेलवलकरांच्या पत्नीचा मृत्यू होतो. महान नटसम्राट रस्त्यावर राहू लागतो. चहाच्या दुकानात नोकरी करतो. त्यांची मुलं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या कथेमध्ये राम अभ्यंकर या उपेक्षित राहिलेल्या नटाची कथा उत्तमरित्या दखवण्यात आलेली आहे. शिरवाडकरांच्या मूळ नाटकात राम अभ्यंकरांचा उल्लेखही नाही. राम अभ्यंकर हे बेलवकरांपेक्षा उत्तम नट, दिसायला सुंदर. तरीही रसिकांनी बेलवकरांना नटसम्राट बनवलं. ही खंत चित्रपटात अनेकदा अभ्यंकरांच्या तोंडी दाखवली आहेच. एका सीनमध्ये तर बेलवलकरही कबूल करतात की अभ्यंकर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नट आहेत. सिद्धार्थ हे पात्र सुद्धा असंच अनपेक्षितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येतं. पण ते खटकत नाही. उलट चित्रपटाची कथा पुढे ढलकत राहतं.</p>
<p>राम अभ्यंकरांची भुमिका अतिशय समर्थपणे विक्रम गोखले यांनी निभावली आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोघांचे एकत्रीत सीन्स इतके बहारदार झाले आहेत की अभिनयाच्या प्रांगणात वावरणार्&#x200d;या कलाकारांसाठी ते अभिनयाची कार्यशाळाच ठरले आहेत. विक्रम गोखले यांचा शेवटचा सीन तर इतका नाटकी तरीही कथानकाला साजेसा आणि गोखलेंच्या अभिनयाचं कौशल्य दाखवणारा आहे. विक्रम गोखलेंचे हाव-भाव कमी अधिक होणारा धीरगंभीर आवाज. यामुळे तो सीन चित्रपटसृष्टीतल्या उत्कृष्ट सीन्सपैकी एक आहे. अजित परब (मकरंद, बेलवलकरांचा मुलगा), नेहा पेंडसे (नेहा, बेलवलकरांची सून) यांची भुमिका छान झाली आहे. मृण्मयी देशपांडे (विद्या, बेलवलकरांची मुलगी) हिने उत्तम अभिनय केलाय. तिचं गोड दिसणं, हे तिच्या भुमिकेची जमेची बाजू ठरते. सुनील बर्वे (राहूल बर्वे, बेलवलकरांचा जावई) यांनी अतिशय समतोल राखणारी भुमिका निभावली आहे. हळू आणि कमी बोलणं, जास्त एक्स्रेस न होणं, एक टिपिकल सज्जन माणूस अशी ही भुमिका आहे. नेहमीप्रमाणे बर्वेंचा अभिनय उत्कृष्टच आहे. मेधा मांजरेकर (सरकार, बेलवलकरांच्या पत्नी) या चित्रपटातील महत्वाचे पात्र असूनही यांना फार कमी संवाद आहेत. पण त्यांची बॉडी लॅंग्वेज व त्यांनी डोळ्यांनी केलेला अभिनय जबरदस्त आहे. कमी पण महत्वाचे बोलणे. आपल्या नवर्&#x200d;याचा अपमान सहन न होणे. आपला नवरा नट आहे. तो दौर्&#x200d;यावर असतो, त्याच्या गैरहाजिरीमध्ये कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. हे सगळे भाव त्यांच्या डोळ्यात दिसतात. अभिनयाची दुनिया तशी रंगीत दुनिया. या रंगीत दुनियेत स्त्री पुरुषांचे संबंधही रंगीत असतात. हे ती जाणून आहे, तरीही तिला नवर्&#x200d;याबद्दल कुठलीच तक्रार नाही. सीता, सावित्री या ज्या हिंदू धर्माच्या आदर्श स्त्रीया आहेत. त्याची एक झलक म्हणजे नटसम्राटाची पत्नी. तिची हौस सुद्धा खुपच साधी आहे. त्यांच्या गावाच्या घरामागील अंगणात तुळशी वृंदावन बांधणं ही या बाईची राहून गेलेली हौसआहे व ती नवर्&#x200d;याला पूर्ण करण्यास सांगते. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली मेधा मांजजेकरांनी भारतातील त्यागवृत्तीच्या स्त्रीचं दर्शन घडवून आणलं आहे. राजा हे मूळ नाटकात असलेलं पात्र इथे वेगळ्या पद्धतीनं पहायला मिळतं. हे पात्र सुद्धा सुंदर रंगवलंय. संदिप पाठकने दारुड्याची भुमिका निभावली आहे. छोट्या भुमिकेत तोही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. जितेंद्र जोशी सुद्धा या चित्रपटात आहे. त्यनेही आपली भुमिका चांगली केलीय. आता महत्वाचं पात्र म्हणजे अप्पासाहेब बेलवलकर. नाना पटेकर यांनी त्यांच्याकडे जे काही होतं. ते सर्व या नटसम्राटाला अर्पण केलं आहे. या चित्रपटाची थीम जरी गंभीर असली तरी हसत खेळत चित्रपट पुढे जातो. सर्व प्रसंगात नाना उजवे ठरतात. नानांनी खुपच वेगळ्या पद्धतीने ही भुमिका साकारली आहे. यात बर्&#x200d;याचदा नानांचा टिपिकल स्पर्श होतो. पण तो खटकत नाही. अनेक अग्रेसिव्ह सीन्समध्ये नाना स्पष्टपणे जाणवतात. पण अनेक नटांनी नटसम्राट ही भुमिका साकारली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे ही भुमिका निभावलेली आहे. नाना यांनी त्यांच्या पद्धतीने ही भुमिका साकारली व ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. फ्रेममध्ये असताना त्यांची बॉडी लॅंग्वेज आणि क्लोज अपमध्ये त्यांनी दिलेले एक्स्प्रेशन उत्तम आहेत. हे एका उत्कृष्ट नटालाच जमतं. नानांचा अनुभव, त्यांची इतक्या वर्षांची अभिनयाची तपस्या त्यांनी या भुमिकेत ओतली आहे. नाना पाटेकर यांच्या आयुष्यातली ही सर्वोत्कृष्ट भुमिका आहे. नानांनी सगळ्या भुमिका उत्तम निभावल्या आहेत. परंतु नाना पाटेकर यांच्यामुळे नटसम्राट या भुमिकेला न्याय मिळाला आहे व नटसम्राट या भुमिकेमुळे नानांच्या अभिनय कौशल्याला, प्रवासाला न्याय मिळाला आहे असंच म्हणावसं वाटतं.</p>
<p>उत्तम दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, छायांकन आणि बरंच काही असं या चित्रपटाचं गणीत आहे. महेश मांजरेकरांनी नटसम्राट ही कलाकृती चित्रपटाद्वारे मांडण्याचं आवाहन स्वीकारलं व ते त्यांनी उत्तमरीतीने निभावलं आहे. कथेत थोडासा बदल करुनही शिरवाडकरांच्या मूळ संहितेला कुठेच धक्का बसू दिलेला नाही. शिरवाडकर जर आज असते तर ते मांजरेकरांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणाले असते. नटसम्राटाचा शेवटचा संवाद, यात ते त्यांनी निभवलेल्या भुमिकांचं वर्णन करुन सांगत की मी आहे हॅम्लेट, मी आहे ऑथेलो, असं म्हणत म्हणत ते शेवटी म्हणतात मी आहे नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर&#8230; आणि चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या मांडीवर बसलेला माझा साडे-तीन वर्षांचा मुलगा सुद्धा टाळ्या वाजवतो. अप्पासाहेब जमीनीवर कोसळतात, सिद्धार्थ त्यांना धरतो. सगळी प्रमुख पात्रे अप्पासाहेबांच्या जवळ येतात. &#8220;कळलं का रे सिद्धार्था, असं असतं नाटक&#8221; असं म्हणत, आपल्या रक्ताच्या नातेवाईंकाकडे दुर्लक्ष करत अप्पासाहेब स्तब्ध होतात. ते काहीच बोलत नाहीत. एक अश्रूचा थेंब त्यांच्या डोळ्यांतून गालावर उतरतो. तो अश्रूचा थेंब तुम्हाला प्रत्येक प्रेक्षाकाच्या डोळ्यांतून उतरताना दिसतो. तो अश्रूचा थेंब तुमच्या डोळ्यांतूनही उतरत असतो. न कळत तुमचे हात अश्रूच्या थेबाचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचे प्रयत्न असफल होतात. कारण असे असंख्य अश्रूंचे थेंब तुमच्या डोळ्यातून उतरुन नटसम्राट नाना पाटेकर यांना सलामी देत असतात. खरंच असा नट होणे नाही&#8230; आबालवृद्धांनी बर्&#x200d;याचदा पहावा असा हा चित्रपट आहे, ‘नटसम्राट&#8230; असा नट होणे नाही’</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://maharashtramajha.com/natsamrat-movie-review/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
