<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:blogger="http://schemas.google.com/blogger/2008" xmlns:gd="http://schemas.google.com/g/2005" xmlns:georss="http://www.georss.org/georss" xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/" xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0" version="2.0"><channel><atom:id>tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985</atom:id><lastBuildDate>Sun, 22 Mar 2026 18:51:56 +0000</lastBuildDate><category>इतर</category><category>लेखनमाला</category><category>Album hittersss...</category><category>कविता</category><category>भगवद्गीता ... मला समजलेली</category><category>मनोगत</category><category>रसिक बलमा- लता मंगेशकर</category><title>रिकामटेकडेपणाचे उद्योग</title><description></description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/</link><managingEditor>noreply@blogger.com (अनय सखदेव)</managingEditor><generator>Blogger</generator><openSearch:totalResults>12</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle/><itunes:owner><itunes:email>noreply@blogger.com</itunes:email></itunes:owner><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-4710099036615532451</guid><pubDate>Sun, 22 Mar 2026 18:48:39 +0000</pubDate><atom:updated>2026-03-23T00:21:56.352+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतर</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भगवद्गीता ... मला समजलेली</category><title>श्री गणेशा</title><description>&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;/p&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgPSRU2-GiQ6mMSul0Yc10apxtGhMgAkRcPO1fVKGlUCc99_dcM2Nlaqha3G0uO6lojF2odX8l7EwMLRNicyAGEixK6ElzTdnc0DKk1Qxd6I3v_xqRZdHBuOpjlYCK_KFixaUuAaxDKtUsUX5-vG51BzjJWsW9Adky4uxqp45ZYTOjwI-S_gjF__4nLZkvy" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;img alt="" data-original-height="594" data-original-width="516" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgPSRU2-GiQ6mMSul0Yc10apxtGhMgAkRcPO1fVKGlUCc99_dcM2Nlaqha3G0uO6lojF2odX8l7EwMLRNicyAGEixK6ElzTdnc0DKk1Qxd6I3v_xqRZdHBuOpjlYCK_KFixaUuAaxDKtUsUX5-vG51BzjJWsW9Adky4uxqp45ZYTOjwI-S_gjF__4nLZkvy" width="208" /&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;भगवद्गीता!&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;अथांग सागर आहे, पण तसा समजायला सहज सोपा! याची अनुभूती संपूर्ण सागर बघून जेवढी येते, तेवढीच त्या समुद्राच्या एका थेंबानेही येते. इथे एक एक श्लोक विश्वाला मार्गदर्शन करणारा एक तेजस्वी किरण आहे!&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;अध्यात्म हा माझा अत्यंत आवडीचा विषय! त्यात भगवद्गीता हा अधिक! त्यामुळे याविषयी काहीतरी लिहावं ही मनोइच्छा आधीपासून होती. आज श्री गणेशा करत आहे इतकेच! आजवर गीतेवर बरेच जण निरूपण करून गेलेत, अजूनही करत आहेत. परंतु हे निरूपण नक्कीच नाही, तर मला जी उमजलेली आहे, समजलेली आहे त्याची एक उजळणी मात्र आहे. खरतर गीता वाचल्यावर ‘मी’, ‘माझे’ म्हणणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु हा स्व-पणाचा नकार अनुभवण्याचा आहे; भौतिक व्यवहाराचा नक्कीच नाही. गीता हा वेदांच्या प्रमाणेच, निःसंशय, ज्याला ना आदी ना अंत असा एक सनातन वैदिक धर्म ग्रंथ आहे. अर्थात त्यामुळे सदर ग्रंथ अमुक एका काळात लागू होत नाही असा कुठला काळच नाही. तो भूत - भविष्य - वर्तमान सर्वकालीन आणि सर्वव्यापी आहे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;आपल्या वैदिक धर्मात, मुख्यत्वे करून वेद, उपनिषद, पुराण, इतिहास आणि स्मृती असे अनेक ग्रंथप्रकार आहेत. यातले मूळ धर्मग्रंथ वेद आणि त्यांचे सार म्हणजेच अर्जुन-कृष्ण संवाद असलेली भगवद्गीता!, कारण वेद अन गीता हे दोन्ही स्वतः प्रत्यक्ष ईश्वराने सांगितलेले आहेत. उपनिषद हे वेदांचेच निरूपण आहे. पुराण ग्रंथ हे कर्मकांड, रामायण व महाभारत हे इतिहास-ग्रंथ आहेत. काही ज्ञानी ऋषींनी शिष्यांच्या सोबत केलेल्या संवादाचे संकलन म्हणजे स्मृती आहेत. जसे की मनूस्मृती आणि पराशर स्मृती इत्यादी. अजून पुढे जोडायचे तर, संतांचे चरित्र आणि त्यांनी रचलेले साहित्य! हे संत साहित्य म्हणजे गीतेत सांगितलेल्या कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यांचे एक मिश्रण आहे असे म्हणायला हरकत नाही. आजकाल या संत साहित्याला समाजसेवा, सामाजिक ग्रंथ वगैरे ठरवायचा घाट काहींनी घातलेला आहे खरा, परंतु सुजाण लोक सत्य काय ते नक्कीच जाणतात! त्यामुळे अधिक बोलणे आवश्यक नाही.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;आपल्या वैदिक ग्रंथांच्याबद्दल बोलायचे झाले तर, हे ग्रंथ कधीही कायद्या प्रमाणे किंवा इतर धार्मिक ग्रंथांच्या प्रमाणे शब्दशः तोलून बघता येत नाहीत. इथे आशय महत्वाचा! त्यामुळे एक श्लोक पकडून संपूर्ण ग्रंथाची समजूत करून घेता येत नाही. माझ्यामते बरेच लोक आपल्या ग्रंथांच्या बाबतीत, गीते बाबतीत हीच गल्लत करतात. आणि याचीच परिणीती म्हणून की काय, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या श्लोकाच्या पुढे बहुतांश लोकांची गीता जात नाही.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;आपल्या धर्मग्रंथांचे वैशिष्ठ्य म्हणजे, बहुतांश सर्व ग्रंथ आणि स्मृती हे प्रामाणिक संवाद आणि प्रश्नोत्तर स्वरूपात आहेत. इथे कुठेही हुकूम किंवा जबरदस्ती नाही. तार्किक शंकेला तार्किक उत्तर आहे. मुद्द्याला गुद्द्याने उत्तर नाही. म्हणूनच इतका उदारमतवादी माझा धर्म आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;आपल्या धर्मात एक नव्हे तर शेकडो संतमंडळी होऊन गेली. आजकाल संत किंवा सद्गुरू असे शब्द कोणीही उठसुठ लावून घेतो. गुरू परंपरा हा देखील आपल्या धर्माचा एक कणा आहे. ज्या महापुरुषाला स्वतःला ईश्वराप्रत जाण्याचा मार्ग माहिती आहे, फक्त माहिती नाही तर त्याची अनुभूती देखील आहे आणि जो त्यामार्गावर इतरांना देखील घेऊन जाऊ शकतो तोच खरा संत किंवा सद्गुरू म्हणता येईल. कारण ज्याला स्वतःला कोणतीही ब्रह्म म्हणजेच ईश्वर अनुभूती नाही, तो इतरांना कसा बरे मार्ग दाखवू शकेल? म्हणूनच कोणत्याही व्यक्ती पुरुषाला सद्गुरू बोलण्यापूर्वी आपण दहा वेळा तरी विचार करणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती चमत्कार करतो, म्हणजे तो साधू-संत असतो हा चुकीचा समज आहे. चमत्कार आणि ईश्वर अनुभूती या दोन्ही अत्यंत भिन्न बाबी आहेत. खरे संत तेंव्हाच चमत्कार करतात जेंव्हा प्रकृती स्वतः त्यांना आव्हान देते. उठसुठ चमत्कार करणारा निव्वळ एखादा तांत्रिक किंवा ढोंगी बाबा असतो. त्यामुळे एखादा स्वतःला सद्गुरू म्हणवून घेणारा उद्या भोंदू बाबा निघाला तर तो त्याचा एकट्याचा दोष नसून तो आपलाही आहे याची जाणीव असावी. कारण गुरुचीही परीक्षा बघणारा आपला धर्म आहे. उदाहरणच सांगायचे तर ‘स्वामी विवेकानंद’.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;काही लोक म्हणतात ईश्वर आहे तर आम्हाला दाखवा. पण मुळात ही मागणीच किती छद्मी आहे बघा! एक उदाहरण बघू, एखादा मुलगा शाळेत बक्षीस मिळवतो. तेंव्हा त्याला काय व किती आनंद झाला हे त्याच वर्गातील इतर मुलांना अजिबातच कळणार नाही. फारतर इतर मुले तो आनंदी आहे एवढंच बघू शकतील. पण त्याला झालेली जाणीव मात्र इतर कोणीही अनुभवू शकणार नाही. मग तो बक्षिसी मिळवलेला मुलगा कोणी विचारले तर समजावून सांगेल की कसा व किती आनंद झाला. काहींना तो, त्याने काय केले जेणेकरून त्याला ते बक्षीस मिळाले, ते देखील सांगेल. पुढे त्यावर विश्वास ठेऊन जी मुले त्याच खरोखरच अनुसरण करतील ते देखील अशी बक्षिसी मिळवतील. अर्थात, ईश्वर प्राप्ती ही अनुभवण्याची गोष्ट आहे. दाखवा म्हटल्यावर दाखवण्याची नाही. त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतील. आणि ते कसे घ्यायचे ते वेद, गीता, संतमंडळी यांनी सांगून ठेवलेलं आहे. याच संतांनी जी स्वतः अनुभूती घेतली, त्यावर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण करणे, हे आपल्या हातात आहे. जसे की एखाद्या वैज्ञानिकाने शोध लावला तर आपण त्यावर विश्वास ठेवतो, पण आपल्याला विश्वास नसेल तर त्याने काय नक्की प्रणाली केली आहे, ती स्वतः आपण केल्या शिवाय तुम्हाला त्याला खोटे पाडता येत नसते. अगदी तसेच इथेही आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;गीता संवाद हे स्वयं ब्रह्म आहे. कारण कोणी प्रेषित, दूत वगैरे नव्हे तर प्रत्यक्ष भगवान नारायण अर्जुनाशी संवाद साधत आहेत. वेदांच्या नंतर हा एकमेव ग्रंथ असा आहे जिथे कोणीही मध्यस्थ नाही. अठरा अध्यायात नटलेला हा संवाद, खचितच अंतिम ध्येय सांगणारा आहे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;परंतु या सर्व गोष्टी मध्ये भगवंत किंवा आपण ज्याला ईश्वर म्हणतो तो कोण? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही वस्तू, भावना किंवा जगातील कुठलीही गोष्ट जी व्यक्त असो वा अव्यक्त, ती तिच्या गुणांनी ओळखली जाते. आणि ईश्वर हा त्यापरे म्हणजेच त्रिगुणातीत (सत्व, रज, तम) आहे. अर्थात या गुणांच्या पलीकडे एकच आहे तो म्हणजे ‘असणे’ पणाचा गुण! कुठलीही गोष्ट, मग ती मानवी कल्पनेतील असो वा कल्पनेच्या बाहेरची, ती असण्यातून प्रकट होते. त्यामुळेच कुठल्याही काळात एखादी गोष्ट नसते असे होत नाही. ती मानवाला किंवा इतर भौतिक बाबींना जाणवते तेंव्हा ती व्यक्त स्वरूपात असते. ज्यावेळी ती अव्यक्त स्वरूपात जाते तेंव्हा ती जाणीव लुप्त होते इतकेच. याचा अर्थ ती गोष्ट नष्ट झाली असे होत नाही, तर तिची जाणीव आपल्याला भासत नाही इतकेच!&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;पुन्हा मूळ विषयावर येऊ. अर्जुन द्विधा मनस्थितीत (आपल्याच आप्त स्वकीयांशी कसे लढायचे) असताना त्याला त्याचा सत्य मार्ग दाखवणारा हा श्रीकृष्ण होता. अर्जुनाला दाखवलेला मार्ग हा प्रत्येक मनुष्याला कधीना कधी उपयोगी येणारा आहे. अर्जुनाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाने, प्रश्नोत्तर स्वरूपात त्याच्याशी संवाद केला आणि शंका निरसन केले. अखेरीस सर्व ज्ञान अर्जुनाला दिल्यानंतर, कृष्ण अर्जुनाला म्हणतो ‘तुला मी सगळं ज्ञान दिलेलं आहे, तेंव्हा तुला जे उचित वाटत आहे ते कर’. थोडक्यात इथे कुठलीही जबरदस्ती नाही हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही उक्ती इथे लागू होत नसली तरी आता थांबून मूळ गीतेतल्या शिकवणीकडे वळावे असे मला वाटते.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: inherit;"&gt;जय श्रीकृष्ण&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2026/03/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgPSRU2-GiQ6mMSul0Yc10apxtGhMgAkRcPO1fVKGlUCc99_dcM2Nlaqha3G0uO6lojF2odX8l7EwMLRNicyAGEixK6ElzTdnc0DKk1Qxd6I3v_xqRZdHBuOpjlYCK_KFixaUuAaxDKtUsUX5-vG51BzjJWsW9Adky4uxqp45ZYTOjwI-S_gjF__4nLZkvy=s72-c" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-7619079221043049243</guid><pubDate>Fri, 26 May 2023 16:42:00 +0000</pubDate><atom:updated>2023-05-26T22:12:46.516+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतर</category><title>इस्लाम आणि लव जिहाद</title><description>&lt;p&gt;&lt;span style="font-size: 11pt; text-align: justify; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्यासाठी इस्लामेतर व्यक्तीला उद्युक्त करणे आणि जो याला विरोध करील त्याच्याशी युद्ध करणे वा पुकारणे." अशी सरळ जिहादची व्याख्या आहे. इस्लाममध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचा आधार घेतला तर जिहादचे बरेच प्रकार आहेत, जसे की तलवारीने, मौखिक म्हणजे बोलून बुद्धिभेद करून आणि मनाने म्हणजे मनातल्या मनात एखाद्याची निंदानालस्ती चालवणे इत्यादी. कुराण ९.७३ (सुराह ९ आयत क्रमांक ७३) व ६६.९ सांगतात, "काफिर (इस्लामेतर) लोकांशी जिहाद करा, त्यांच्यावर सक्ती करा." जिहादचा उगम अश्या कुराण व हदीज मधील संदर्भातून आहे. त्यामुळे इस्लाम व कुराण म्हणजे पवित्र व काही मुसलमान तेवढे वाईट असतात या भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. कारण जिहादची जडच कुराण हा इस्लामिक धार्मिक ग्रंथ आहे! पुढे जाऊन कुराण ३.२८ आणि ४७.४ नुसार आदेश देते की, काफ़िरांशी दोस्ती करू नका. आणि काफ़िरांची गर्दन उडवा. त्यामुळे तुमचा आज असणारा मुसलमान मित्र वरून आदेश/फतवा निघताच तुमचीच गर्दन उडवायला मागेपुढे बघणार नाही.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;आता आपण लव्ह जिहाद वर बोलू. सदर जिहाद इस्लामेतर स्त्रियांना प्रेम जाळ्यात ओढून, black mail करून, फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे तसेच सोबत इस्लामेतर धर्मांच्या प्रजनन व कुटुंब व्यवस्थेवर आघात करणे या उद्देशाने केला जातो. कारण स्त्री ही प्रजनन व वंश विस्ताराच्या प्रमुख भूमिकेत असते. त्यामुळे हा मुळांवर घाव घालणारा आणि मानसिक खच्चीकरण करणारा जिहाद आहे. पुढे अश्या फसलेल्या स्त्रियांचा लिलाव करणे, रखेल बनवणे इत्यादी प्रकार घडतात. ही इस्लामी परंपरा इस्लामचा उदय झाल्यापासूनची आहे. स्वतः प्रेषिताने अश्या महिलांना रखेल बनवून ठेवले होते याचे संदर्भ हदीज मध्ये पडून आहेत. आफताब सुद्धा श्रद्धा वालकरचा खून केल्यावर - मला स्वर्गात जागा मिळेल, ७२ हुरे मिळतील हीच भाषा करत होता. कारण हीच भाषा कुराण व हदीज मधून शिकवली जाते.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;एक समाज म्हणून हे आव्हान संपूर्ण सनातन-हिंदूंसमोर आहे. परंतु ब्राह्मण समाज एक प्रभावशाली समाज असल्याने या समाजातील स्त्रियांवर जास्तीची वक्रदृष्टी असणे साहजिक आहे. आम्हाला भगवद्गीता वाचून माहिती नसते, वाचली तरी कर्मयोग अध्यायापलीकडे समजून घ्यायच नसतं. आताच्या १५-३० वयोगटातील मुलांना रामायण-महाभारत माहिती नसते. बाकी वेदाध्ययन फार लांबची गोष्ट आहे. अश्या स्थितीत आपल्या पौराणिक पात्रे आणि देवदेवतांवर वाट्टेल ती चेष्टा करणे. बुद्धिभेद करणारा तर्क उभा करून स्वधर्माची टवाळी करणे असे विषय चालतात. स्वतः घरातील मंडळी आपल्या पाल्याकडे धार्मिक बाबींवर चर्चा करणे हे विषय टाळतात. आणि कोणी पाल्याने विचारलंच तर अभ्यासावर/कामावर लक्ष दे, या भानगडीत तू पडू नकोस अशी ऑर्डर निघते. यात मग पुढे जाऊन वेगळं काहीतरी हवं असत. अश्यावेळी भावनेचा बुरखा पांघरलेला अब्दुल समोर येतोच. कारण अश्याच सावजाची तो शिकारी वाट बघत असतो. मग असा अब्दुल तुमचा धर्म/देव कसा निरुपयोगी व मर्यादित आहे व आमचा अल्लाह किती पवित्र व अमर्यादित आहे हे सांगायला सुरुवात करतो. आणि मग आम्हालाही ते हळूहळू पटू लागते. कारण इस्लाम हा शब्द उच्चारायला सुद्धा आमच्या घरात बंदी असते. अश्यावेळी त्याबद्दल जास्तीचे कुतूहल वाटत जाणे हा मानवी स्वभाव आहे. आणि कुठे असा बोलायचा प्रसंग आलाच तर आम्हाला सत्यापेक्षा धार्मिक सलोखा जास्त महत्वाचा वाटू लागतो. थोडक्यात आम्हीच आम्हाला कमकुवत केले आहे. आम्हीच आमच्या पायात बेड्या घालून ठेवल्या आहेत. कोणीतरी म्हटलेलंच आहे की समोरचा तुम्हाला तोवर अपमानीत करू शकत नाही जोवर तुम्ही त्याला मदत करत नाही. मग अशा तुमच्यातील त्रुटींचा फायदा एखाद्याने घेतला तर फक्त तो दोषी अस म्हणता येणार नाही. कारण आमचे संरक्षण आम्ही केलं पाहिजे. चोर हा चोरी करणारच, आपण आपल्या घरातील वस्तू कश्या सांभाळाव्या हे आपल्या हातात आहे. असो!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;आता फार खोल न जाता सर्वप्रकारच्या जिहादी आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन उपाय सांगणे मला रास्त वाटते. कारण रोगाची जास्त वेळ मीमांसा करण्यापेक्षा उपचार मला महत्वाचा वाटतो.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;१) &lt;/span&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; text-decoration-line: underline; text-decoration-skip-ink: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;स्वधर्माविषयी आत्मविश्वास आणि आदर&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; -&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;जिहादी लोक आपल्या धर्मातील संवेदनशील भागांवर बोट ठेऊन आपली दिशाभूल करण्यात आणि बुद्धिभेद करण्यात पटाईत असतात. जसे की, एवढे कोटी देव हवेत कशाला एकच पॉवरफुल नाही का? तुमचा राम स्वतःच्या बायकोचे रक्षण करू शकत नाही - तो तुमचे काय करणार? अशाप्रकारे बुद्धिभेद चालू होतो. त्यामुळे स्वधर्म जाणून घेणे, त्यावर अखंड विश्वास असणे आणि कोणत्याही स्थितीत गोंधळून न जाता थोरांकडे आपले विचार व्यक्त करणे, धार्मिक ग्रंथ स्वतः ताडून बघणे, हे काम पालक व पाल्य या दोघांनी करणे गरजेचे आहे.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;२) &lt;/span&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; text-decoration-line: underline; text-decoration-skip-ink: none; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;इस्लाम विषयी परिपूर्ण माहिती&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; -&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;जसे त्यांना आपल्या धर्मातील संवेदनशील भाग माहिती आहेत तसेच आपल्याला त्यांचे संवेदनशील भाग माहिती असणे अत्यंत गरजेचे आहेत. अशी माहिती सोशल माध्यमात उपलब्ध आहे. बऱ्याच इस्लाम सोडलेल्या लोकांनी यावर भाष्य करून ठेवलेलं आहे. कुराण-हदीज च्या प्रति इंटरनेट वर फुकट उपलब्ध आहेत. इस्लामची खरी माहिती तुम्हालाही माहिती असेल तर असा कोणी जिहादी समोर आल्यास त्याला तोडीस तोड उत्तर मिळाल्यावर तो परत तुमच्या नादी लागणार नाही. आणि हे मी स्वानुभवातून सांगत आहे. त्यामुळे अश्या जिहादचा अभ्यास त्यांची विचारधारा तपासणे आणि त्याला प्रतिउत्तर तयार ठेवणे हे आपल्या हातात आहे.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;वास्तविक एक तलवारीच्या जोरावर असलेला जिहाद सोडला तर इतर सर्वप्रकारचा जिहाद तुम्ही फक्त इस्लाम वाचून म्हणजेच कुराण व हदीज वाचून मोडून काढू शकता आणि हे सहज शक्य आहे. एकदा कुराण समजलं तर मग अब्दुल समजायला आपल्या मुलीला फार अवघड जाणार नाही. त्यामुळे ही डोंगरासारखी वाटणारी समस्या एकदम छोटी वाटू लागेल. आणि याचा नायनाट किमान समाज पातळीवर करता येईल.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: Tiro Devanagari Marathi;"&gt;धन्यवाद.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2023/05/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-5109525429821174069</guid><pubDate>Mon, 14 Mar 2022 15:48:00 +0000</pubDate><atom:updated>2022-03-14T21:18:50.873+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतर</category><title>द काश्मिर फाइल्स - एक वेगळी बाजू</title><description>&lt;div&gt;द काश्मिर फाइल्स&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;30 वर्षांनी का होईना, पण एक क्रूर सत्य दाखवण्याच धाडस कोण तरी करून दाखवलं! त्यासाठी खरंतर विवेक अग्निहोत्री टीम चे अत्यंत आभार!&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div&gt;तस तर Social मीडिया वर बऱ्याच पोस्टीं पडत आहेत, पण मला थोडी वेगळी बाजू मांडायची आहे. आणि ती म्हणजे त्यातून दाखवलेल्या विविध सिम्बॉलीक वाक्यांची! खरतर हा चित्रपट काढणे हेच शिवधनुष्य होतं. कारण इतक्या घटना दोन अडीच तासात सामावून घेणं त्यांची विविध पैलूंनी रेखाटन करणं हे खरंच अवघड होतं, आणि यासाठी एक दिग्दर्शक म्हणून अग्निहोत्री च कौतुक करावं तितक थोडं आहे.&lt;/div&gt;&lt;div&gt;आता विविध पैलू-&lt;/div&gt;&lt;div&gt;१. कश्यप आणि काश्मीर- खरंतर काश्मीर हे नाव कुणामुळे पडलं, त्याचा मागील इतिहास काय, अगदी शंकराचार्य पासून ललितादित्य पर्यंत काश्मीर कसा समृद्ध होता हे सांगितलं. हे खऱ्या अर्थाने गरजेचं होतं. फ्री काश्मीर म्हणून विधवा विलाप करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;२. काश्मिरी पंडितांनी तर कधी हातात बंदूक घेतली नाही-&lt;/div&gt;&lt;div&gt;वास्तविक, एक narrative ,चालवला गेला, आजही चालवला जातो की गरिबी मुळे, Suppress किंवा oppress केल्याने काश्मीर युथ भडकतो आणि बंदूक घेतो असा एक गोंडस युक्तिवाद मीडिया मध्ये केला जातो. तो या एका वाक्यात ध्वस्त केलेला आहे. Oppress तर काश्मिरी पंडित पण झाले, पण त्यांनी कधी बंदुका घेतल्या नाहीत हातात! इथे विषय संस्कारांचा आहे!&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;3. ज्याचा शैक्षणिक केंद्रावर ताबा तो जगावर बौद्धिक राज्य करू शकतो- खरतर हे वाक्य काश्मीर पूर्वी विद्या आणि बौद्धिक याच प्रमुख केंद्र होत आणि त्याच्यावर यासाठी हल्ला केला अस सांगितलं गेलं, पण माझ्यामते याचा खरतर रोख पूर्णपणे JNU, AMU सारख्या संस्थांकडे होता हे कळून येतं, कारण JNU या संस्थेतून केंद्रीय इतिहास लिहिला जातो, research होतात, काही प्रमुख degree ह्या तिथूनच दिल्या जातात आणि विस्थापित झाल्यानंतर देशातील कंमुनिस्ट लोकांनी तिथं हळूहळू जम बसवला आणि आपला Narrative पसरवला, आणि सोयीस्कर इतिहास लिहिला गेला, जस की जम्मू काश्मीर मध्ये ललितादित्य बद्दल, कश्यप ऋषींच्या बद्दल काही शिकवलं जातं नाही. तिथं महाराणा प्रताप, विक्रमादित्य, चंद्रगुप्त बद्दल फारसं सांगितलं जाणार नाही.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;४. सरकार कोणतंही असो system आपली आहे-&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div&gt;System म्हणण्यापेक्षा आपण Eco सिस्टिम म्हणू. तस 2000 साली सुद्धा सरकार BJP च होत पण Eco system तीच होती. 2014 पूर्वीपासून एक अशी eco system जी केंद्रात आणि राज्यात कोण मंत्री होणार हे ठरवत असे, अगदी पंतप्रधान पदाला बगल देऊन. ही System आजही बऱ्याच भागात जिवंत आहे, आणि त्यांची Establishment आहे. यालाच प्रस्थापित म्हणतात!&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;५. आताच्या पंतप्रधान (मोदी) ना मोहोब्बत नकोय, जी नेहरू, वाजपेयी ना हवी होती-&lt;/div&gt;&lt;div&gt;जम्मूरियत, काश्मीरीयत करत नेहरू पासून वाजपेयी पर्यंत पंतप्रधान झाले. पण काश्मीर चा हा नरसंहार त्यावर Solution कोण शोधू शकलं नाही, आणि भावनेच्या भरात किंवा प्रसिद्धी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी ठोस पावलं कोणी उचलली नाही. पण मोदी हा असा नेता निघाला ज्याला जम्मू आणि काश्मीर हवंय, जम्मूरियत, काश्मीरीयत वगैरे बोलघेवडे ढोंग नको, आणि 370 हटवून तेच दाखवलं गेलं, तर POK बाबत पण काही indication या सरकार ने दिले आहेत.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;६. मीडिया एक वेश्या, रखेल आहे-&lt;/div&gt;&lt;div&gt;एक अत्यंत क्रूर सत्य सांगण्याचे धाडस या वाक्यात आहे. चित्रपटातील पुनीत इस्सार जेंव्हा हे वाक्य बोलतो, तिथंच या चित्रपटाचं मेख आहे. मीडिया ही आजकाल पत्रकारिता राहिली नसून एक पैश्याचा धंदा करणारी मीडिया house बनली आहेत, आणि आपल्याला पैसे पुरवणाऱ्या मालकाचा अजेंडा ती चालवत असतात हे आजपर्यंत लोकांना कळलं आहेच, पण या चित्रपटात ते धडधडीत बोलून दाखवलं गेलं!&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;७. फक्त कश्मिरी पंडित नाही, तर दलित, ख्रिश्चन, शीख आणि इतर पण - होय जास्तीचं पलायन आणि रोख हा काश्मिरी पंडित असला तरी इतर वर्गीय लोक सुद्धा काश्मीर सोडून पळाले हे ही सत्य दाखवलं गेलं&#128076;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;८. ज्यू लोकांनी अत्याचार जगाला विसरवू दिले नाहीत-&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div&gt;खरंतर चित्रपटात याच उत्तर नीटसं दिल नाही पण इथे देतो. ज्यू जेंव्हा जेरुसलेम किंवा नाझी जर्मनी मधून पळाले ते इतर युरोप व अमेरिकेत स्थायिक झाले पण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, आणि त्यांचा विज्ञान, संस्था शैक्षणिक संस्था इथं आधीपासूनच ताबा होता त्यामुळे त्यांचा अत्याचार दाबणार कोण? आइन्स्टाइन हा स्वतः ज्यू होता. असे बरेच शास्त्रज्ञ अमेरिकेसाठी राबत होते, त्या त्या देशासाठी राबत होते. त्यामुळे ज्यू च्या बाबतीत लागलेला नियम इथं लागू होत नाही.&#128546;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;धन्यवाद&lt;/div&gt;&lt;div&gt;- अनय&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br&gt;&lt;/div&gt;</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2022/03/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-8132358648095279789</guid><pubDate>Mon, 07 Feb 2022 16:25:00 +0000</pubDate><atom:updated>2022-02-07T22:05:12.277+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">रसिक बलमा- लता मंगेशकर</category><title>रसिक बलमा</title><description>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh-aKu5OUV4xAP76FGWVWwlB9kKvZiicqJumhRHgbOcr8MDkHLEQTZk38o4h5QS4aHi5UiiPNzRPut0-EVgIhHH9BlvwIQHzBGbQjCIWV96IvIG3bFGyILWYaVB0dd5-Eu1uoNGonwKlHs2Co2_r_T6ibrx12lLbQsGwVq_TXqKhutWhF4Qvb2hbHhQww=s640" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="640" data-original-width="640" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh-aKu5OUV4xAP76FGWVWwlB9kKvZiicqJumhRHgbOcr8MDkHLEQTZk38o4h5QS4aHi5UiiPNzRPut0-EVgIhHH9BlvwIQHzBGbQjCIWV96IvIG3bFGyILWYaVB0dd5-Eu1uoNGonwKlHs2Co2_r_T6ibrx12lLbQsGwVq_TXqKhutWhF4Qvb2hbHhQww=s320" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;लताजी किंवा लता दीदी नव्हे, मला लता असंच म्हणायचं आहे. कलाकाराला अरे तुरे बोलल्याशिवाय तो आपला वाटत नाही. खरंतर हा प्रपंच मला आधीच करायचा होता. पण  निमित्त असं लताच्या जाण्यातून मिळेल याची कल्पना  नव्हती. मला तुझी सर्वात आवडती गायिका कोण अस विचारलं तर इतरांच्या प्रमाणेच लता हेच नाव तोंडी येईल. यात फार अप्रूप ते काय? पण मला लता तिच्या फक्त आणि फक्त निव्वळ आवाजासाठी नाही आवडत यात मला अप्रूप आहे आणि मला त्याचाच विस्तार करायचा आहे. आणि अर्थात त्यासाठीच हा लेखप्रपंच!&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&amp;nbsp; सांगीतिक प्रवास भलेही १९४२ पासून झाला असेल पण लता प्रकाश झोतात आली ती 'आयेगा आनेवाला' आणि 'जिया बेकारार है' या गाण्यापासून वास्तविक ही गाणी लताच एक साधं रूप दाखवणारी आहेत. अर्थात एक नाट्यसंगीत, रागधारी एवढा मुलाहिजा घेऊन एक मराठमोळी मुलगी एवढीच या गाण्यात दिसेल. अगदी इतर सर्वसामान्य तत्कालीन गायिकांच्या प्रमाणे; परंतु त्यानंतर हळूहळू ज्या पद्धतीने ही मुलगी प्रगत होत गेली त्याची आस मला आहे. आणि ही गायिका देखील अश्या ठिकाणी पोहोचली की तिथे ध्रुवाचे स्थान सुद्धा हलले असेल.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&amp;nbsp; त्यामुळे साधारण बैजू बावरा (१९५२) च्या आधी आणि बैजू बावरा नंतर हा फरक ठळक जाणवेल. नूरजहाँ या गायिकेच्या शैलीत सुरवातीला गाणाऱ्या लताने आपली हळूहळू एक अशी शैली निर्माण केली की पुढे हजारो गायिकाच काय पण अगदी सामान्य व्यक्ती देखील लताच्या आवाजात, तिच्या शैलीत आपल्याला जमत का? असा एखादा प्रयत्न नक्कीच करून बघतो. लताने आपले उर्दू, हिंदी उच्चार व्यवस्थित व्हावेत म्हणून मेहमूद नावाच्या एका मौलाना कडून उर्दू शिकून घेतले. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&amp;nbsp; बरसात (१९४९) या चित्रपटातील सर्व गाणी शंकर जयकिशन यांनी लता कडून गाऊन घेतली आणि एक अमर युगाची सुरवात झाली.  आवारा(१९५१) मध्ये एक गाणं रेकॉर्ड होणार होत 'घर आया मेरा परदेसी'. कितीही केलं तरी गाणं हवं तसं होईना शेवटी काही लोक घरी परतले, रात्री बारा वाजता एक ढोलकी वादक मिळाला आणि त्या सोबत गाण्याचे सूर देखील जुळले, गाणं लवकर रेकॉर्ड करून घ्यावं म्हणून पहाटे तीन वाजता लता ला बोलावलं स्वतः जयकिशन जाऊन घेऊन आले लता सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता आली आणि पहाटे सहा वाजेपर्यंत गाणं रेकॉर्ड झालं आणि हिट सुद्धा! ही आर्तता कदाचित कुठे पाहायला मिळेल. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;'रसिक बलमा' हे गाणं खरंतर Song of the Century अस म्हणावं लागेल. चोरी चोरी या चित्रपटातील हे गाणं ऐकताना त्यातील प्रत्येक पदर लताने ज्या तर्हेने गायले आहेत ते भलेभले मार खातील. म्हणूनच एकदा बडे गुलाम अली खां 'कम्बख़्त ये कभी बेसुरी होती ही नहीं।' असे उद्दगार काढले होते. रसिक बलमा या गाण्याला उंच पिच होता आणि ते संपूर्ण गाणं तसंच गायचं होतं. आणि संगीतकार जयकिशन यांना देखील हे गाणं फक्त लता साठीच आहे याची खात्री होती आणि त्यांनी ते करूनही घेतलं. वयाच्या पाचव्या वर्षी मा. दीनानाथ मंगेशकरांच्या शिष्याला त्याची चूक दाखवून तो पुरीया धनश्री त्याच्याचसमोर चूक दुरुस्त करून गाऊन दाखवून, आपल्याला एवरेस्ट ठेंगणा आहे हेच दाखवून दिले. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;प्रतिभा ही साधनेतून उपजत असलेल्या गुणांना सजवून येत असते. यासाठी एकच किस्सा पुरेसा आहे. कुठेतरी संगीत कार्यक्रम होता, ऑर्केस्ट्रा, सेट अप सगळ काही तयार....लता स्टेज वर उभी राहते prelude सुरू होतो... मुखडा सुरू होतो तोच अचानक ती थांबते आणि मागे वळूनही न पाहता म्हणते,&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;चार नंबर का तबला; ताल ठीक किजीए।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;बस्स, प्रतिभा ती काय असावी....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;.......भाग १.....&lt;/span&gt;&lt;/div&gt;</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2022/02/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh-aKu5OUV4xAP76FGWVWwlB9kKvZiicqJumhRHgbOcr8MDkHLEQTZk38o4h5QS4aHi5UiiPNzRPut0-EVgIhHH9BlvwIQHzBGbQjCIWV96IvIG3bFGyILWYaVB0dd5-Eu1uoNGonwKlHs2Co2_r_T6ibrx12lLbQsGwVq_TXqKhutWhF4Qvb2hbHhQww=s72-c" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-3965286214740405882</guid><pubDate>Mon, 21 Dec 2020 19:05:00 +0000</pubDate><atom:updated>2020-12-22T23:56:44.595+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">Album hittersss...</category><title>Album Hitterrrs...</title><description>&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;/p&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjT7TyzIBjwjm1aobrm0rXqGYESqTzkVDt7-NtKT6AJsBzTLyIv92XOCAT0SgUprFs_2q5loLfnEikSgB1UeZ15sQGBUbi9nMj4FzUmGgxfJsoDQXMcU_ZIrJwRYK7aR79C6AgIYzEq7x6L/s554/IMG_20201222_235540.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="492" data-original-width="554" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjT7TyzIBjwjm1aobrm0rXqGYESqTzkVDt7-NtKT6AJsBzTLyIv92XOCAT0SgUprFs_2q5loLfnEikSgB1UeZ15sQGBUbi9nMj4FzUmGgxfJsoDQXMcU_ZIrJwRYK7aR79C6AgIYzEq7x6L/s320/IMG_20201222_235540.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;सप्टेंबरच्या एक तारखेला जेंव्हा मला कोरोना झाला तेंव्हा एक महिना पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार होती. थोडक्यात कसलीही दगदग होता कामा नये. आणि यावेळेत करावं काय? हा यक्ष प्रश्न होता. कशात लक्ष न लागणे, अस्वस्थता वाटणे वगैरे नेहमीची कोविडची लक्षणे होतीच. आणि मग शेवटी संगीत आवडतं! म्हणून त्यात लक्ष गुंतवलं गेलं. शास्त्रीय संगीत तर नेहमीच पाचवीला पुजून होतं. मग दुसरं काहीतरी ऐकावं म्हणून मग विचार चालू होता. खरंतर मला बॉलीवूड मधील संगीत सुवर्णकाळ म्हणजेच १९५० ते १९७५ असा साधारण काळ; ती गाणी अगदी लहानपणापासूनच आवडत, अगदी म्हणजे साधारण चार एक वर्षांचा असताना आराधनाची कॅसेट मी घरच्यांना सारखी रिवाइंड करायला लावून ऐकायचो. पण साधारण १९८० नंतरची गाणी कधी आवडलीच नाहीत, किंबहुना भावली नाहीत, म्हणूनच आवडलीही नाहीत. तशी ऐकली खूप! नवी-जुनी अगदी रेहमानची सुद्धा! पण नाही! का? माहीत नाही!!&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;जुनी गाणी ऐकायचा छंद! पण कधी त्याचा संगीतकार कोण? शैली काय? इतपत कधी गेलो नव्हतो. तसे तत्कालीन नौशाद, एस डी बर्मन, आर डी बर्मन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, रवी, ओ पी नय्यर वगैरे नावे पक्की ठाऊक होती. पण ओ पी म्हणजे घोड्यांच्या टापांचा आवाज, आर डी/बप्पी लहरी म्हणजे पॉप-डिस्को यापलीकडे फारसे कधी लक्ष गेले नाही. मध्यंतरी लॉकडाउन काळात राजकपूरची गाणी; म्हणजे, त्याच्या चित्रपटातील जुनी गाणी ऐकली. नेहमीसारखी ती पण आवडती होतीच. पण तेंव्हा त्या गाण्यांबद्दल थोडं एक वेगळ्याच प्रकारचे औत्सुक्य निर्माण झालेल होतं. काहीतरी वेगळेपण नक्कीच जाणवत होतं. पुढे सांगलीत परत आल्यानंतर तो उत्साह मावळला होता; जो कोरोना लागण झाल्यावर परत डोके वर काढू लागला होता. आणि त्याच पहिल्या आठवड्यात सुरवातीच काम केलं की या गीतांचा संगीतकार कोण?&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;शंकर-जयकिशन! शंकर जयकिशन अस या संगीतकारच नाव होतं. खर तर ही जोडगोळी आहे, पण एकच आहे! पुढे औत्सुक्य इतकं ताणल गेलं की मिळेल ती माहिती गोळा करायला सुरुवात केली. आणि पुढील वीस एक दिवस डोक्यात फक्त तोच विषय होता. एक वेगळीच जादू असलेला संगीतकार. जादूच! हे मी नाही मुघल ए आजम, बैजू बावरा सारख्या चित्रपटाचे संगीतकार नौशाद सहाब म्हणून गेलेत, 'They are not musicians, They are magicians'. खरतर या फंदात पडण्यापूर्वी माझ्याभोवती फक्त आर डी बर्मनच एक वर्तुळ होत. एक वेगळा संगीतकार, आधुनिक, Innovative, वगैरे आणि वगैरे! पण हे सगळं वर्तुळ त्या वीस दिवसात पार उधळून गेलं. आपल्यासाठी सत्य तोवरच सत्य असतं जोवर पडद्याआडच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येत नाहीत. शंकर सिंग रघुवंशी आणि जयकिशन दयाभाई पांचाळ ही अशीच पडद्याआडील दोन नावे होती.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;बरसात (१९४९) ते गोरी (१९९२) पर्यंतची १७० चित्रपटांची कारकीर्द पण खऱ्या अर्थाने १९७१ पर्यंतच म्हणजे जयकिशन हयात असे पर्यंतच धरावी लागेल कारण हे दोघे मिळून एक अधिक एक फक्त अकरा नाही तर एकशे अकरा होते. राज कपूर व पृथ्वीराज कपूरनी हे हिरे हेरले तरी त्यांना संधी आग (१९४८) चे संगीतकार राम गांगुली पृथ्वी थिएटर सोडून गेल्यावर बरसात (१९४९) मध्ये मिळाली. आणि तो जिंदगीतला पहिलाच अल्बम ब्लॉकबस्टर अल्बम ठरला. याच चित्रपटातील 'जिया बेकरार है' या गाण्यानेच तर लता मंगेशकर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. पुढे आवारा (१९५१) मधील यशाने रातोरात दोघे सुपरस्टार झाले. हो सुपरस्टारच! इतकी प्रसिद्धी कधीच कोणत्या संगीतकाराला मिळाली नसेल. एक तर किस्सा ऐकला आहे, एका बड्या पार्टीत राज-दिलीप-देव हे तिघे आले होते पण जशी जयकिशनची इम्पाला कॉरिडॉर मध्ये आली तेंव्हा सगळा जत्था तिकडे वळला होता. पण आवारा नन्तर इतर दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी पण काम करायला सुरुवात केली. ती घोडदौड चालूच राहिली. फिल्मफेअर सुरू झाले १९५४ साली! आणि १९५४ ते १९७२ या दरम्यान अठरा वर्षात नऊ फिल्मफेअर पटकवणे आजवर इतक्या कमी कालावधीत कोणाला जमलेलं नाही. चित्रपटातील नायक नायिकेपेक्षा जास्त मानधन घेणारे पण हे एकमेव. साधारण १९५६ नन्तर एखादा दिग्दर्शक "आम्ही या चित्रपटात संगीत द्यायला तयार आहोत" एवढं लिहून शंकर-जयकिशनची सही केलेली चिट्ठी जरी घेऊन गेला तर अगदी कोणताही निर्माता डोळे झाकून नायक-नायिका कोण आहे हे सुद्धा न बघता वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार असायचा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी NSC चे सर्टिफिकेट लोकांनी खरेदी करावेत म्हणून जो हे सर्टिफिकेट घेईल त्याला शंकर जयकिशन यांच्या कार्यक्रमाचे फुकट तिकीट मिळेल म्हणून ऑफर काढली होती. नव नवीन प्रघात पाडणे, नावीन्य आणणे, हा तर हातखंडा होता. एक बरसात मधील 'जिया बेकरार है' हे गाणं ते अंदाज मधील 'जिंदगी एक सफर है सुहाना' हे गाणं या वीस वर्षांत त्यांनी कुठून कुठे चित्रपट संगीत नेऊन ठेवलं होतं हे दिसेल. संगीतकार म्हणून तसे यशाच्या उच्च शिखरावर फार काळ राहिलेले तसे फक्त तीनच १)शंकर जयकिशन २) लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि ३) ए आर रेहमान. यातील लक्ष्मीकांत प्यारेलाल तर स्वतःहून म्हणत की ते शंकर जयकिशन यांचीच शैली वापरतात. पण जयकिशनचा अकाली वयाच्या फक्त एकेचाळीसाव्या वर्षी मृत्यू झाला नसता तर कदाचित ही जोडी अजून पुढे गेली असती. पाश्चात्य, अरेबियन आणि हिंदुस्तानी शास्त्रीय या सर्वांचा सुरेख मेळ त्यांना जमत होता. ड्रम, पियानो, तबला, डफली, accordion, violin आणि गिटार ही आवडती वाद्ये.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;शैली बद्दल बोलायच तर एकदा एका गाण्याला दिलेला रिदम, ठेका, चाल, ठेवण पुन्हा तशीच दुसऱ्या गाण्यात दिसणार नाही. मोठया ऑर्केस्ट्राचा वापर करणे ही सुरवात सुद्धा याच जोडगोळीने&amp;nbsp; केली. आवारा मधील '&lt;i&gt;घर आया मेरा परदेसी&lt;/i&gt;' हे ड्रीम सॉंग आणि जीस जिस देश में गंगा बहती है मधील '&lt;i&gt;आ अब लौट चले&lt;/i&gt;' ही उत्तम उदाहरणे आहेत. आ अब लौट चले या गाण्याला सर्वात जास्त म्हणजे १२० violin, ४० quairs एकावेळी वाजत होते. काही म्युझिशीअन्सना स्टुडिओच्या बाहेर बसावे लागले होते, गाणं व्यवस्थित व्हावं म्हणून रात्री रेकॉर्डिंग केलं. पण जिथे आवश्यक नाही तिथे इतका ऑर्केस्ट्रा अजिबात वापरत नसत. काही sad सॉंग्स साठी वगैरे. एक वैशिष्ट्य म्हणजे गाण्याचा फ्लो, अगदी म्हणजे prelude नंतर मुखडा मग interlude व कडवं मग postlude हे सगळं एका धाग्यात विणल्या सारखं! prelude, interlude वगैरे चालू&amp;nbsp;असताना फोकस फक्त रिदमवर असे पण तेच बोल सुरू झाले की फोकस शब्दांवर व सुरांवर! असे आवाजात चढ उतार अगदी परफेक्ट होत. त्यात तो जमाना सिंगल ट्रॅक रेकॉर्डिंगचा होता. prelude कुठूनतरी ठिकाणाहून सुरू होऊन ते फिरत, गिरकी घेत घेत बरोबर त्या चालीवर आणणे हे नक्कीच सोपं काम नाही याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर लाट सहाब मधील 'जाने मेरा दिल किसे ढूंढ रहा है' हे सांगावं लागेल. कुठूनतरी एका किंकाळीच्या आवाजातून तो prelude चालू होतो व फिरत फिरत तो बरोबर मुखड्याकडे येतो व अत्यंत चपखलपणे तिथे स्थिरावतो हे खरोखरच दिपून टाकणारं आहे. Interlude बद्दल सांगायच तर बदन पे सितारे हे गाणं काय कमी आहे? आजसुद्धा हे गाणं तितकंच ताज वाटतं. आणि 'जान पहचान हो' या गाण्याच्या रिदमनेच धमाल उडवून दिली की ते परदेशात अजूनही फेमस आहे. परदेशस्थ लोकांना त्यांच्या चित्रपटात एखादा हिंदी/भारतीयपणा दाखवायचा असेल तर 'आवारा हु', 'मेरा जुता है जपानी' आणि 'जान पहचान हो' या तीन पैकी एक गाणं बॅकग्राऊंड ला ठेवतातच, अगदी आजही! पुढे जेंव्हा यांची फी परवडणारी नसायची किंवा जयकिशनच्या मृत्यूनंतर निर्माते इतर संगीतकरांच्या समोर 'शंकर जयकिशन जैसा म्युझिक दो' म्हणून आपली डिमांड ठेवायचे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;मूलतः शैलेंद्र व हसरत हे दोघे गीतकार ठरलेले होते आणि या दोघांचा वाटा पण महत्वाचा आहे. कारण गीत हिट व्हायला नुसतं संगीत नाही तर संगीतावर लिहिलेले शब्द देखील वजनदार असले पाहिजेत. कारण बहुतांशी आधी चाल तयार व्हायची नंतर मग त्या चालीवर गीत लिहिलं जायचं हे काम सुद्धा सोपं नाही. पण मुळात अस करायचं कारण की संगीतकार शब्दांच्या चौकटीतुन बाहेर पडतो. त्यामुळे शंकर जयकिशनच्या संगीतात बरीच विविधता आहे. दोन गीतकारांच्या सोबतच दोन सहाय्यक दत्ताराम व सेबास्टियन हे दोघे पण महत्वाचे आहेत. कारण arrangement सांभाळणे हे महत्वाचे काम या दोघांचे असे. साधारण रिदम दत्ताराम सांभाळी तर सेबास्टियन सूर विभाग. हे दोघेही शंकर जयकिशनचा डावा आणि उजवा हात होते यात कोणतीही शंका नाही.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी फक्त १७० चित्रपट केले. पण त्याला काही कारणे आहेत एक त्यांचं मानधन, इतर संगीतकरांच्या मानाने मानधन प्रचंड होतं. काही चित्रपटांत चित्रपटातील नायक/नायिकेपेक्षा जास्त किंबहुना दुप्पट मानधन घेतलेलं आहे. बऱ्याच निर्मात्यांना ही गोष्ट परवडण्याजोगी नव्हती मग ते इतर संगीतकारांकडे वळत. दुसरं एक वेळ, दोघांच्या कडे वेळ कमी, शेवटी त्यांनी कामं वाटून घेतली तरी पण वेळ अपुरा पडे. त्याला सुद्धा एक कारण होतं एखादं गीत असलं तर त्याच संगीत&amp;nbsp;आपल्या म्युझिक arrangers ना अगदी अथ पासून इति पर्यंत विस्कटून सांगत. म्हणजे अगदी तबल्यावर किती कमी अथवा जास्त थापा पडाव्यात इतपत. बहुतांश संगीतकार ते arrangers वर सोडून देत काही मूळ वाद्ये कशी वाजवी एवढंच सांगत तस इथं नव्हतं, अगदी त्या रेकॉर्डिंग मध्ये वाजणारं साध्यातल साधं वाद्य कस वाजाव हे सुद्धाठरवले जाई. दोघांमधील जयकिशनजींची एक खासियत होती, ती म्हणजे टायमिंग! चित्रपटाला दिल जाणार बॅकग्राऊंड म्युझिक एकवार सीन बघून हाताच्या बोटांवर मोजून नोटेशन लिहून द्यायचे. आणि ते म्युझिक तिथं चपखल बसायचं. तस दोघांच्यात तुलना करणेच चुकीचे आहे. दोघेही आपापल्या जागी शंकर व जयकिशन दोन्हीही होते. कोणती चाल कोणी लावली हे दोघेही सीक्रेट ठेवत आणि तितकेच इतर लोकांना ते जाणून घेण्याची उत्सुकता! कायम संगीताबद्दल नवनवीन अभ्यास चालू असे. त्यामुळेच एखादी चाल सुचली आणि त्यांना आवडली तर ठणकावून सांगत की हे गाणं गाजणार म्हणजे गाजणार! 'है ना बोलो बोलो' हे अंदाज (१९७१) मधील गाणं. सिप्पी बंधूंना शंकरजींनी असंच ठणकावून सांगितले होते की हे गाणं ब्लॉकबस्टर होईल जर नाही झालं तर संगीत सोडून देईन. इतका आत्मविश्वास फक्त तेच दाखवू जाणे! सांगेल तितकं थोडं आहे!&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;एक चित्रपट असला तर त्यातलं एखादं गाणं कोणीही हिट करेल. दोन हिट केली म्हणजे वाह वाह! पण इथे ही जोडी संपूर्ण अल्बम हिट करत होती. एवढ्या चित्रपटांत बहुतांशी चित्रपट संपूर्ण अल्बम हिट झालेले आहेत. यातलेच काही मला जास्ती आवडलेले अल्बम आणि त्याची माहिती मला सांगायची आहे..!&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Kalam;"&gt;क्रमशः...&lt;/span&gt;&lt;/p&gt;</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2020/12/album-hitterrrs.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjT7TyzIBjwjm1aobrm0rXqGYESqTzkVDt7-NtKT6AJsBzTLyIv92XOCAT0SgUprFs_2q5loLfnEikSgB1UeZ15sQGBUbi9nMj4FzUmGgxfJsoDQXMcU_ZIrJwRYK7aR79C6AgIYzEq7x6L/s72-c/IMG_20201222_235540.jpg" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-5921861968990245133</guid><pubDate>Sat, 24 Aug 2019 18:41:00 +0000</pubDate><atom:updated>2019-08-25T00:11:08.647+05:30</atom:updated><title>न भेटणाऱ्या आठवणी</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: justify;"&gt;
&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiH2sOs987sTGNYHFg8TIrzYgXxU004LYiWCrk02abHG53Lf23GbfX0dDfDs1_qUS40iXjVBpwmwm6sHvbqXzuDrTyd4almHxjIA9i3l2W8J9LungNh3ZYwUlmJ9yi5nNOIlhoyKv2VvyfT/s1600/images+%25281%2529.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="308" data-original-width="478" height="206" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiH2sOs987sTGNYHFg8TIrzYgXxU004LYiWCrk02abHG53Lf23GbfX0dDfDs1_qUS40iXjVBpwmwm6sHvbqXzuDrTyd4almHxjIA9i3l2W8J9LungNh3ZYwUlmJ9yi5nNOIlhoyKv2VvyfT/s320/images+%25281%2529.jpeg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
पर्वताच्या कड्यावरून जरी उडी ठोकली तरी झुरळाला मरण भेटत नाही. आठवणी तशाच असाव्यात सतत वळवळ करणाऱ्या, आणि ...कधी न मरणाऱ्या! जाणीव देतात पण छे! भेटत नाहीत!! नियतीचा हाच खेळ असावा. हवे ते फासे पडत नाहीत आणि जेंव्हा पडतात तेंव्हा चाल खेळायला डाव हातातून गेलेला असतो. मग ना फासे कामाचे ना खेळ. डाव खेळता खेळता नियती आपला डाव साधत असते. असो नियतीला उत्तर नाही.&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
काहीश्या जंजाळातून सावरत थोडं शांत बसावयास मन डोळे झाकून पहुडतं अन मग&amp;nbsp;उगाच एक माशी कानाशी येते आठवण घेऊन! घोंगावत राहते. ना जाते ना पकडीस येते! हं!! आपण पण तिला उगाच पकडण्याचा प्रयत्न करत बसतो ना, अशक्य गोष्ट करत! आणि तरी यदाकदाचित ती पकडीस आलीच तर ती मेलेली निघते! उगा मग त्याच मेलेल्या मड्यास कुरवाळत बसतो. साध्य काहीही होणार नाही माहीत असून सुद्धा! कदाचित!!&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
माहितीय हा डाव आहे, पण फासे फेकत राहावे लागेल कसल्यातरी आशेवर; कधीतरी आपला डाव लागेल या जीवावर!&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
ह्याच आशेत जळताना कधीतरी मग झोप लागते. पण काही आठवणी तिथेही पाठ सोडत नाहीत. जळू सारख्या चिकटून बसतात. मग स्वप्नात गोष्टी घडत जातात. तिथेही फासे उलटे पडले की फार आश्चर्य वाटत नाही. हे उधळण केलेले घोडे आहेत त्यांना ना वेसण आहे ना मर्यादा. म्हणूनच नेहमी मर्यादा ते ओलांडत जात असावेत. एखादा फारच पुढे जातो भावनेच्या भरात इतका की त्याला स्वप्नांची कवाडं सुद्धा दूर सारू वाटतात. त्याला लगाम लावण्यात अर्धी रात जाते. पण तो लगाम सुद्धा तितकाच असतो. तात्पुरता व मर्यादित!&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
नजरबंदीच्या आड कुठेतर त्याचा उपाय आहे म्हणतात. पण आजवर त्याला कोणी पाहिले नाही. योग्य वेळी योग्य फासा पडल्यावर दिसेल कदाचित. किंवा तो फासाच जिंकून देईल एखादा डाव! नको!! पुन्हा दुसरा डाव खेळायचा आहे! इच्छा नसताना सुद्धा आणि मग तोही जिंकावा लागेल! हरलो तर?! छे! नको ती कल्पना...! समुद्राच्या मातीत उगाच रेघोट्या ओढत बसण्यात काय ठेवलंय! नेहमी एक लाट येऊन रेखालेल्या कथेला निराळाच आकार देत असते! अगदी तिला हवा तसा! मग लाटेतच एकरूप व्हावं का?! नाही, नको!! ही तर शरणागत होईल. त्यापेक्षा थोपवू तिला! मित्र म्हणतो नियतीला का कोणी अडवू शकतो? खरंच आहे त्याचे म्हणणे. आणि पटतंय आता! पण तरीही अजून बरीच रेखाटने बाकी आहेत, बरेच डाव बाकी आहेत, पण फासे मात्र जरासंधाचे आहेत..! उलटे पडणारे!!&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
आजची रात्र वेगळी आहे कदाचित, कुठेही रात किडे नाहीत. क्षणभंगुरता तर मुळीच नाही. उद्याचा डाव कोणता असेल काय ठाऊक? परंतु जुने डाव अजूनही डोळ्यासमोर तुऱ्या देत आहेत! जमतील तश्या जखमा देऊन पसार होत आहेत..!&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
हा आठव मत्कृर आहे! फारच!!&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2019/08/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiH2sOs987sTGNYHFg8TIrzYgXxU004LYiWCrk02abHG53Lf23GbfX0dDfDs1_qUS40iXjVBpwmwm6sHvbqXzuDrTyd4almHxjIA9i3l2W8J9LungNh3ZYwUlmJ9yi5nNOIlhoyKv2VvyfT/s72-c/images+%25281%2529.jpeg" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-8179513900991503321</guid><pubDate>Thu, 10 Jan 2019 05:00:00 +0000</pubDate><atom:updated>2024-07-26T08:43:25.845+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतर</category><title>होकार...</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUEylBBBIQJ6IIlWPB_Y9qxYH5vndNoSwUS16kn22NlWhd0PjwItUGgUiYga0K9VYiJK7U2i17yT5utvSQ1Y8P9Z9iDgvF870sOKSO4bI2d-ATk3YHVqFkyh6JbafVYYkujkxDvyVMGxrz/s1600/images.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="288" data-original-width="511" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUEylBBBIQJ6IIlWPB_Y9qxYH5vndNoSwUS16kn22NlWhd0PjwItUGgUiYga0K9VYiJK7U2i17yT5utvSQ1Y8P9Z9iDgvF870sOKSO4bI2d-ATk3YHVqFkyh6JbafVYYkujkxDvyVMGxrz/s320/images.jpeg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" id="docs-internal-guid-3d9fa40c-ee8e-15ba-60bd-eb4fa9a5fb06" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;नेहमीप्रमाणे ती नदीकाठावर बसली होती. तिचा लहानपणीचा मित्र किशोर आज भेटायला आला होता. अनेक वर्षांच्या आठवणी संवादात ढवळून निघत होत्या. अचानक त्या आठवणीने ती शून्यात निघून गेली. त्या घडून गेलेल्या घटनेमुळे तिचे आजवर लग्न जमले नव्हते. मनाने फार खंगली होती. सर्व बाजुंनी फक्त नकार! अंधार!!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;किशोर तिची समजूत घालत होता. शेवटी त्रागा करून ती त्याला म्हणाली, “मग, तू करशील लग्न?” तिच्या त्या वाक्याने तो एकदम गडबडून गेला. थोड्यावेळाच्या शांततेनन्तर निघून गेला. दिवसाच्या दावणीला सूर्य हिसडे देत होता. पण तिच्या हुंदक्यांनी तो देखील थोडासा स्तंभित झाला. कदाचित आजचा दिवस वेगळा असावा!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;वयाच्या चौदाव्या वर्षी गावातल्या चार नराधमांनी तिच्या पाकळ्या तोडल्या होत्या. त्याच्या जखमा आजही अस्तित्व टिकवून होत्या. किंबहुना समाजाने त्यांना मिटू दिले नव्हते. ते फुल उमलण्याआधीच कोमेजले होते. लोक मात्र ‘हीच ती मुलगी’ असा अविर्भाव घेऊन वावरत होते. घरच्यांचा बांध रोज फुटे! वडील तर तेंव्हाच हृदयविकार होऊन गेलेले! आईची जीवनज्योत कोनाड्यातल्या देवापुढे प्रार्थनेच्या तेलाने सदैव तेवत होती.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;किशोरच्या मनात नानाविध विचार चालले होते. त्याची श्रीमंती लग्नासाठी दुसऱ्या श्रीमंतीच्या शोधात होती. पण त्याच्या मनात हलकल्लोळ माजलेला! तिने विचारलेला प्रश्न त्याला विचाराधीन करून गेला होता. ‘अश्या किती मुली असतील? घटनेपुरती न्युज होते. गुन्हेगारांना शिक्षा झाली. सरकारने मदत दिली. पुढे काय?’ तो स्तब्ध होता. चंद्र मात्र आज खिडकीतून प्रकाशत होता. आज त्याने दिशा बदलली असावी!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;सायंकाळी उशिरा पोस्टमन येऊन पत्र टाकून गेला. आश्चर्याने तिने ते पत्र हाती घेतले. किशोरचे होते. पत्र उघडून आतला मजकूर तिने वाचला. डोळ्यांनी ते पत्र चिंब भिजवून काढले. पत्रात त्याने लग्नाला होकार कळवला होता! ती धावत आईकडे गेली. कदाचित इथून पुढे ती फक्त धावणारच होती…!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-size: 11pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;courier new&amp;quot; , &amp;quot;courier&amp;quot; , monospace;"&gt;समाप्त&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2019/01/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUEylBBBIQJ6IIlWPB_Y9qxYH5vndNoSwUS16kn22NlWhd0PjwItUGgUiYga0K9VYiJK7U2i17yT5utvSQ1Y8P9Z9iDgvF870sOKSO4bI2d-ATk3YHVqFkyh6JbafVYYkujkxDvyVMGxrz/s72-c/images.jpeg" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-7111742896419263517</guid><pubDate>Mon, 28 May 2018 08:09:00 +0000</pubDate><atom:updated>2018-05-28T13:44:40.323+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">लेखनमाला</category><title>मराठी विनोदी साहित्याचा तिसरा आधारस्तंभ: पु ल देशपांडे</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div dir="ltr" id="docs-internal-guid-d427d0c9-a4d1-b71e-7a13-725a12fdf84a" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcRfXdfSbQSuGls6vViAWanX17njtBu-NO8ydy2fgcu7-ht8e-4n1l8UJebVxf0gFXFadPfVm1folV8PSLlcxJ4qZozK4AO1lsgeW63rlwILysdflbWfLoQl1pXe92Vvmw3LwPc0ZEQkXy/s1600/images+%252814%2529.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="313" data-original-width="469" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcRfXdfSbQSuGls6vViAWanX17njtBu-NO8ydy2fgcu7-ht8e-4n1l8UJebVxf0gFXFadPfVm1folV8PSLlcxJ4qZozK4AO1lsgeW63rlwILysdflbWfLoQl1pXe92Vvmw3LwPc0ZEQkXy/s320/images+%252814%2529.jpeg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;दगड आणला, छिन्नीचे घाव घातले म्हणून मूर्ती पूर्ण होत नाही. नक्षीकामाची कल्पकता त्यामागे असावी लागते. ही कल्पकता त्या मूर्तीला संगमरवरी शलाकेचा साज आणून देते. वरवर कोरलेल्या नक्षीकामाचे साक्षीदार चांगले आतवर जाऊन त्यात प्राण आल्याची साक्ष देतात. तीच साक्ष मराठी जनतेने पु ल देशपांडेंच्या अभिवादनाला दिली. ‘शब्दांनी शब्दांचे केले वर्णन तरीही अर्थ उरे काही!’ तसा इतके लिहून, इतके बोलून अजून ‘दशांगुळे उरला’ अस पुलंच्या बाबतीत म्हणावं लागेल. मराठी विनोदाला साहित्यिक, कलात्मक, अलंकारिक रूप सजवलं ते पुलंनी! कदाचित सरस्वतीनेच आपला एखादा दूत पाठवला असेल!&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;ह्या दूताचा पहिला पदस्पर्श दिनांक ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मराठी मातीला झाला, आणि त्या मातीला एक परिहासाचे नवचैतन्य मिळाले. सरस्वतीने जणू पैलू पाडलेला हिराच जन्माला घातला होता. या पैलूंचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला पुढील ऐंशी वर्षे हसवणार होते! पुलंचे लहानपण मुंबईत गेले. तिथेच दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या कडे गायन आणि हार्मोनियम वादन शिकून घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षीच बालगंधर्वांच्या समोर पेटी वाजवून त्यांची थाप पाठीवर मिळवली होती. लहानपणीच एकदा कुठेसे अत्रेंचे भाषण ऐकले आणि ते त्यांचे चाहते झाले. पुढे शिक्षणात M.A. व LLB ह्या पदव्या संपादन केल्या.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;१९४७ साली कुबेर नावाच्या एका मराठी चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहली. हे पहिले काम! नन्तर त्यांना बरेच चित्रपट मिळत गेले. काही चित्रपटात काम देखील केले. १९५३ चा गुळाचा गणपती हा शेवटचा! हा चित्रपट खूप गाजला! हा चित्रपट सबकुछ पुलं असा होता. कारण कथा, पटकथा, नायक, संगीत, दिग्दर्शन सगळं काही पुलंनी केलं होतं. या दरम्यान बरेचसे अनुभव त्यांनी मिळवले. बेळगावला महाविद्यालयात प्राध्यापकी करत तेथील रावसाहेब त्यांनी अनुभवले. असे बरेच अनुभव त्यांनी जतन केले. एक होता विदूषक (१९९२) हा पुलंनी पटकथा लिहलेला शेवटचा चित्रपट! पण पुलं घराघरात पोचले ते गुळाचा गणपती गाजल्या मुळे!&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काहीतरी एक निर्णायक टप्पा असतोच. ‘बटाट्याची चाळ’ व त्याचे प्रयोग हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा! खूप वर्षांपासून चाळीतले अनुभव पुलंनी लिहून ठेवले होते. अधून मधून महाविद्यालयात त्याचे मोघम वाचन देखील झाले होते. मात्र त्याचा पहिला एकपात्री प्रयोग मुंबईत झाला आणि रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. या एकपात्री प्रयोगाने तो कसा असावा याची एक मिसाल घालून दिली. आजही त्या प्रयोगाची आठवण काढली जाते. परंतु त्याचे फक्त ५० प्रयोग केले गेले. यानन्तर वाऱ्यावरची वरात, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा अशी बरीच नाटके झाली. सर्वांना प्रसिद्धी मिळाली. पुन्हा असा मी आसामी ने उच्चांक मोडला. असा मी आसामी ची वाक्ये आजही अनेक तरुणांच्या तोंडी आढळतील.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;१९६५ साली ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. या जोडीला इतर उद्योग चालू होतेच. जिथे संगीताची बैठक होणार आहे तिथे ते आपली बैठक घेऊन जात. गाण्याबद्दल प्रचंड आस्था होती. एका मुलाखतीत सुद्धा साहित्या पेक्षा संगीताबद्दलची आस्था त्यांनी बोलून दाखवली आहे. कविता ऐकण्याचा व वाचण्याचा या व्यक्तीला खूप छंद. कुठेही प्रवासाला निघाले की सुनीता देशपांडे व पु ल यांच्यामध्ये कवितांच्या भेंड्या रंगत. त्या आवडत्या कवितेप्रमाणेच पु लं ची भाषा पण काव्यमय होती.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;पु लं सर्वश्रुत आहेत ते त्यांच्या कथाकथना साठी! व्यक्ती आणि वल्ली प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातले ललित खूप गाजले. यात पुलंनी बोलून दाखवलेली पात्रे खरोखरच दुनियेत कुठेतरी असावीत अस वाटतं. या पात्रांचा प्रपंच त्यांच्याच तोंडून ऐकताना तो एक वेगळाच परिहास असल्याची जाणीव होते. हसवणूक, गोळाबेरीज, खोगीरभरती, पुरचुंडी अशी बरीच पुस्तके निघाली. रावसाहेब हे खरोखर होतेच ते त्यांनी तसेच लेखणीतून जिवंत ठेवले. पण अंतू बरवा, सखाराम गटणे, हरितात्या, नारायण ह्या समाजात वावरणाऱ्या मूर्त प्रस्थांना त्यांनी खरोखरीच जिवंत केले! पाळीव प्राणी-पक्षी, बिगरी ते मॅट्रिक वगैरे कथानकातून विनोदाबरोबरच सामाजिक जाणिव घडवून दिली.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;पुलंची प्रतिभा किती होती ह्याची मोजदाद कदाचीत कोणीच नाही करू शकणार. साक्षात सरस्वती वीज बनून संचार करते की काय अस ते लिखाण! परिहासविजल्पित आणि काव्यमय लिखाण! वाक्यावाक्यातून गद्य लिहिताना त्यात विणलेली पद्य शैली दिसून येईल. यांचा सुंदर मिलाफ क्वचित कोणाला जमेल. विनोदी उपमा देण्याची कला, वाक्यात देखील यमक जुळवलेली प्रक्रिया! त्यातुन निर्माण होणारा सौंदर्यविलास हे सारंच भारावून टाकणारं! बटाट्याच्या चाळीतील एक प्रसंग आहे. भ्रमण मंडळ नुकत बोरिबंदर स्टेशन वर पोहोचतं तेंव्हा पु ल वर्णन करतात- ‘व्हिकटोरिया थांबल्या थांबल्या दसऱ्याला सोनं लुटावं तस हमालानी सामान बाहेर काढायला सुरवात केली. त्या गडबडीत काशीनाथ नाडकर्णीचा तो पेटारा एका हमालाने खेचला. त्याचा धक्का त्रिलोकेकरच्या हातात असलेल्या टिफिनला लागला. आणि सकाळी बाबली बाईंनी करून दिलेला गोडी बटाटीचा रस्सा जरासा त्रिलोकेकरांच्या पॅन्टवर आणि बराचसा बाबूकाका खरेंच्या धोतरावर सांडला. तेवढ्यात दुसऱ्या एका हमालाने तो खेचला आणि उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, व तो पुलाव खाऊन बोरिबंदरचा रस्ता अगदी तृप्त झाला.’ हे इतकं बहारदार वर्णन दुसरं कोण करू शकेल? त्यांचा विनोद स्थितीपेक्षा वाक्यरचनेतुन जास्त फुलून दिसे. शब्दांची ठेवण अशी असायची की फिदीफिदी हसण्यापेक्षा स्मितहास्याची गर्दी अधिक जमे! पुलंचे विनोद मन हसवणारे होते. ते हास्य अधिककाळ रुजवून ठेवण्याची ताकद त्या विनोदाच्या मध्ये होती. त्यांचा विनोद तात्पुरता नव्हता. तो मनात घर करून बसे. मग पुढे त्याच विनोदाची आठवण येऊन मन उल्हासित होऊन जाते. शब्दांची किमया दाखवणारी कोणती तरी जादू त्यांच्याकडे असावी. प्रत्येक ठिकाणी अवस्थेप्रमाणे त्या भाषेचा रंगही बदले. ‘पानवाला’ आणि ‘नारायण’ यातली भाषा दोन्हीकडे भिन्न आहे. ‘पानवाला’ मधील विनोद त्यातल्या पानाप्रमाणेच रासनिष्पंन आणि अगम्य होऊन रंगतो. तर नारायण मध्ये त्यातील संवादशैली आणि स्थितीच्या अवस्थेतून फुलणारा परिहास बेरंगी पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे रंगणारा! त्यांच्या लेखणीचे मूळ संस्कार तेच ठेऊन साहित्याचा रंग तेवढा वेगळा देण्याची त्यांची सचोटी इतर कोणी नाकारू नाही शकणार. निरनिराळ्या स्थिती वर्णन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी पात्रे निर्माण केली. त्यानुसार भाषाशैली मध्ये बदल ठेवले. काही ठिकाणी रंग एकच पण त्यांच्या छटा वेगळ्या! त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाषा व त्यातली समृद्धी वेगळी वाटे. पुलंचे लिखाण अगदी विनोदापुरतच मर्यादित होत अस नाही पण बाकी त्यांनी घेतलेल्या मुलाखती, इतर प्रवास वर्णने, लेख, कविता यात देखील त्यांचं एक निराळं रूप बघायला मिळत. पण विनोद हे मुख्य साधन! अफाट निरीक्षणशक्ती, भरपूर वाचन आणि प्रचंड लाभलेली स्मरणशक्ती ह्या तिजोरीतुन ही विनोदाची मूर्ती उभी राहिली. त्या मूर्तीच्या हातून घडलेलं व्यक्ती आणि वल्लीच साम्राज्य आज अनेक लोकांच मनोरंजन करत आहे, दुःख हलकं करत आहे. देवाने ह्या वल्लीचे जरी प्राण नेले असले तरी त्यांनी उभ्या केलेल्या वल्लींचे प्राण हरपणे त्याला नाही जमणार! मूर्तिकार गेला तरी मूर्तीच्या रुपात तो आपलं जीवन सौंदर्य मागे सोडूनच जातो!&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;(संपुर्ण)&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2018/05/blog-post_28.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcRfXdfSbQSuGls6vViAWanX17njtBu-NO8ydy2fgcu7-ht8e-4n1l8UJebVxf0gFXFadPfVm1folV8PSLlcxJ4qZozK4AO1lsgeW63rlwILysdflbWfLoQl1pXe92Vvmw3LwPc0ZEQkXy/s72-c/images+%252814%2529.jpeg" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-4384221807566277486</guid><pubDate>Sun, 27 May 2018 14:20:00 +0000</pubDate><atom:updated>2021-01-03T18:17:26.107+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">कविता</category><title>मेघ-सरिता</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
तिकडून येते सरिता&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
तो मेघ न्याहाळत होता&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
सुकलेले पर्ण बघून&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
तो खाली धावून आला&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
भेट घडली दोघांची&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
साक्षीला क्षितिज होते&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
त्या प्रेमाची आठवण घेऊन&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
तो सूर्य निजून गेला&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
त्या संध्यासमयी&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
मी मुक्त छंद होतो&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
त्या प्रीतीच्या वेलींवर&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
झोके झुलवित होतो&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
ती प्रभा निसटून आली&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
या हाती, माझ्या ओठी&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
प्रेमाचे गीत करून वेडे&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
मी लाड पुरवीत होतो&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
ते झाले असे काही&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
वेलींचे व्हावे रान&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
रानाच्या हट्टापुढे&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: center;"&gt;
झुकली माझी मान.&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2018/05/blog-post_27.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-1533026995055243028</guid><pubDate>Sun, 13 May 2018 11:08:00 +0000</pubDate><atom:updated>2018-05-13T16:38:20.174+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">लेखनमाला</category><title>मराठी विनोदी साहित्याचा दुसरा आधारस्तंभ: आचार्य अत्रे</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div dir="ltr" id="docs-internal-guid-5e9d86c8-e344-5f77-8455-54ecb661a77f" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDxIYWcDJ74CS-VfrP-PsgHzZoi4Qb0hTqBpjQMbsZsYL7YIAZpPiRM1uvmjMSXnMqVD44_Mgk9X8qensN7roY2vzUo2EHAOo8hU5Dn8Fw1qvyfXt_y94ed7N02bxFcat6pTsyOiVzgcTw/s1600/images+%25286%2529.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="350" data-original-width="421" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDxIYWcDJ74CS-VfrP-PsgHzZoi4Qb0hTqBpjQMbsZsYL7YIAZpPiRM1uvmjMSXnMqVD44_Mgk9X8qensN7roY2vzUo2EHAOo8hU5Dn8Fw1qvyfXt_y94ed7N02bxFcat6pTsyOiVzgcTw/s320/images+%25286%2529.jpeg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;दूर वरून जणू ईश्वराने आपल्या हाताने अर्ध्य द्यावे तसे अनेक ओहोळ येतात. डोंगरांच्या अनेक कड्या कपारीतून त्यांचे पाट आपापली वाट शोधत खाली येऊ लागतात. पण ते जो पर्यंत एकत्र येत नाहीत तो पर्यंत नदीचे स्वरूप त्याला प्राप्त होत नाही. आणि ते एकत्र नसले तर तो विधात्याचा डोंगर त्यांना कधी खाऊन टाकतो हे त्यांनाही कळत नाही. विनोदाचे अर्ध्य गडकरी मास्तरांनी सोडले खरे; पण त्याला दिशा दिली नव्हती. जमिनीत रोवलेलं हे रोप सूर्याच्या कोणत्या दिशेने जाईल हे अजून ठरले नव्हते. त्या रोपाला योग्य दिशा द्यायचं काम केलं ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी!&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;विनोदाचा पुतळा असलेल्या ह्या अवलिया व्यक्तीचा जन्म दिनांक १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे झाला. कलेचा गुण कुठून तरी रक्तात येतो म्हणतात, त्यांची आजी अत्यंत हजरजबाबी होती असे ते सांगत आणि हाच गुण त्यांच्यात उतरला. पुढे शिक्षणासाठी म्हणून ते पुण्यात आले. तिथे राम गणेश गडकरी यांच्या सारख्या प्रतिभावंत आसामिशी त्यांचा संबंध आला. गडकरी तापट स्वभावाचे असून देखील ते त्यांच्या जवळ बसून रहात; अगदी हाकलून देई पर्यंत बसत. गडकरींनी अत्रे यांची साहित्य विषयक आवड बघून त्यांना मार्गदर्शन सुरू केले. सुरवातीला आपले प्रेमसंन्यास हे पंचअंकी नाटक वाचायला दिले. त्यातली प्रतिभा बघून अत्रे अगदी भारावून गेले. पुढे गडकऱ्यांनी त्यांना, ‘घ्या हा मॉलिअर वाचा, हा हाजीराम केजीराम वाचा’ असं सांगून बरेच मार्गदर्शन केले. गडकरी त्यांना घेऊन पुण्यात फिरत. या काळात अत्रेंनी निरीक्षण कला शिकून घेतली आणि मनाच्या देव्हाऱ्यात गडकरींना गुरुस्थानी जागा दिली!&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;१९२० पर्यंत गडकरी व बालकवी हे जग सोडून गेले आणि मराठी काव्यविश्व पोरकं होऊन गेलं. अशा वेळी माधव ज्युलियन यांच्या नेतृत्वाखाली सात आठ जण मिळून ‘रविकिरण मंडळ’ची स्थापना झाली. परंतु त्यातील अनेक त्रुटी, पारशी भाषेचा आत्यंतिक प्रभाव ह्या बाबी कुठे तरी तांदळात आढळणाऱ्या खड्या सारख्या लागत होत्या. ह्या खड्यांमुळेच १९२२ रोजी अत्रेंचा झेंडूची फुले हा विडंबन काव्यसंग्रह निर्माण झाला. पुढे चार वर्षांनी १९२५ साली झालेल्या शारदोपासक संमेलनात आग्रहास्तव याचे पहिले जाहीर वाचन झाले आणि प्रेक्षकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. याच काळात १९२७ रोजी गडकरी जयंती निमित्त प्र के अत्रे यांचे पहिले जाहीर भाषण झाले आणि एक उत्तम वक्ता मराठीला आंदण म्हणून मिळाला! या भाषणाची सुरवात देखील ‘कालच गडकरी माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनीच मला तुमचे आभार मानायला सांगितले’ अशी करून पहिल्या वाक्याला टाळी घेतली. पुढे ते लंडनहुन TD ही पदवी घेऊन आले. ज्याचा फायदा त्यांना पुढे नवयुग वाचनमालेत झाला. १९३७ रोजी ते नगरसेवक म्हणून पुणे म न पा मध्ये निवडून गेले व तिथे त्यांची चेअरमन पदी नियुक्ती झाली! ह्याच महापालिकेने त्यांना खूप विनोद शिकवला असे ते म्हणत! इतक्या वर्षात हा वल्ली विडंबन कवी म्हणून नावारूपाला आलेला होता.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;नाटक हा अत्रेंच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ते स्वतः नाटकी, खट्याळ असल्याने त्यांची नाटके देखील तशीच आहेत. १९३६ साली लिहलेले साष्टांग नमस्कार हे समाजातील वेडं गोळा करून लिहलेले नाटक! या नाटकाने हास्याचे उचांक मोडले. पुढे ब्रह्मचारी, ब्रॅण्डीची बाटली, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा अशी बरीच विनोदी नाटके त्यांनी लिहली. या सोबतच घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच अशी सामाजिक बांधिलकी जपून त्यातील अन्यायाला वाचा फोडणारी नाटके देखील लिहली. ‘चांगुणा’ ही सगुणा नावाच्या एका अभागी स्त्री वर लिहलेली छोटी कादंबरी! यात थोडाही विनोद नसून पूर्णपणे करुणरसाने ही कादंबरी भरली आहे. अत्र्यांची नाटके ही जनसामान्यांना रुचेल अश्या भाषेत आहेत. त्यात फारशी अलंकारिक भाषा नाही की कुठे दिखावा नाही. साधे लिखाण, बोलकी भाषा यातून सुद्धा मार्मिक विनोद त्यांनी साधलेला आहे. हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आचार्य अत्रे हे नाव म्हटलं की त्यांनी जीवनात खेळलेले वाद ओघाने आलेच. अगदी मामा वरेरकर, श्री मा माटे, ना सि फडके यांच्या पासून ते शेवटचा वाद म्हणजे ठाकरे विरुद्ध अत्रे इथपर्यंत त्यांची समयरेखा आहे. या गाजलेल्या वादातुन त्यांना विनोद बुद्धीने अजेय ठरवले. आणि त्या विनोदी भाषेमुळेच ते हास्यसाम्राट झाले. एकदा १९४४ साली धुळे जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलन भरवले होते. मामा वरेरकर त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या संमेलनाच्या कमिटी मध्ये अंदाधुंद कारभार माजला होता. आचार्य अत्र्यांना निमंत्रण दिले गेले नाही. परंतु अचानक एका साप्ताहिकातून अस्सल धुळेकर या नावाने लेख येऊ लागले आणि त्या संमेलनापेक्षा लोकांचे त्या लेखन मालिकेकडेच जास्ती लक्ष गेले. ह्या अस्सल धुळेकराने त्या संमेलनाची इत्यंभूत माहिती फोडायला आणि झोडायला सुरवात केली. त्यात जोडीला विनोदाची फोडणी देखील दिली होती. हा अस्सल धुळेकर दुसरा तिसरा कोणी नसून आचार्य अत्रे होते! त्या वर्षीचे ते संमेलन पुण्यात बसून अत्र्यांनी गाजवले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;१९४० साली आचार्य अत्रेंनी नवयुग वाचनमाला काढली आणि शैक्षणिक अभ्यासक्रम कसा असावा याची रेकॉर्ड ब्रेक नोंद केली. आजवर असा अभ्यासक्रम कोणालाही जमलेला नाही! अभ्यास सोप्पा करण्याच्या नादात त्यातलं वाङ्मय विसरता कामा नये या उक्तीवर त्यांनी भर दिला. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाल्यावर जनतेच्या पाठिंब्याने ‘मराठा’ हे दैनंदिन वृत्तपत्र सुरू केले. आज देखील लोक संयुक्त महाराष्ट्र झाला तो अत्रे यांच्या घणाघाती भाषणांमुळे असे म्हणतात. आयुष्याच्या उत्तर काळात कर्हेचे पाणी या नावाने पाच खंडांचे आत्मचरित्र लिहले. आयुष्यात जगलेल्या अनेक खेळींचे प्रहार या आत्मचरित्रात उमटलेले आहेत. जगातली प्रत्येक गोष्ट आपणास यायला हवी ह्या विचारांचा हा माणूस! जेवढा अंगाने धिप्पाड तितकाच मनाने मोठा! माफी देण्याचे वस्त्र तर ते डोक्याला बांधूनच हिंडत! जीवनमार्गात मांडलेल्या पटांचा खेळ हसत हसत खेळून तो अगदी मुक्त उपभोगला! त्यात कधी हार आली कधी जित! पण तिकडे त्यांचं लक्षच नव्हतं! विनोदाची लहर मात्र सारखी अंगातून विजेसारखी भिने! असाच एक खेळ १३ जून १९६९ रोजी नियतीने त्यांच्याशी खेळला! हा शेवटचाच खेळ! ते हरले! आणि सतत हसवणारा हा बाबुराव अत्रे संबंध महाराष्ट्राला रडवून गेला!&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;सूर्य आणि त्याच्या किरणांचा जितका दृढसंबंध तितकाच संबंध अत्रे आणि त्यांची भाषणे यांचा करता येईल; कारण ती किरणे विरोधी पक्षाला पोळून काढत; अगदी नामोहरम करीत! तर इकडे श्रोत्यांना प्रकाशाचे दान पण देत. हे दान पण अगदी निखळ असे! कारण यातून हास्याचा खळखळाट ऐकू येई. भाषण करण्याची ढब अत्र्यांच्या कडून बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी उचलली. पण अत्र्यांनी त्याचा अभ्यास केला होता. थोरामोठ्यांची भाषणे त्यांनी ऐकली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर कसे मुद्देसूद बोलतात, गडकरी कसे विनोद करतात, अच्युतराव कोल्हटकर कसे खिळवून ठेवतात, लोकमान्य टिळक कसे बघतात, त्यांचा प्रभाव वाणीतुन कसा प्रकट होतो, या सर्वांचा अभ्यास केल्यावर ही भाषणाची लकब त्यांना आत्मसात झाली होती. भाषण करताना लागणाऱ्या प्रसंगावधान, अभ्यास, विनोदबुद्धी, आत्मविश्वास या सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. विनोदाचे तंत्र त्यांनी विकसित केले, जितकं बोलायचं तितकंच बोलून काही इंचच टाळी घेण्याची कला त्यांच्या कडे होती. असेच एकदा अत्र्यांचा सत्कार होत असताना त्यांच्या बद्दल एक वक्ता बोलला की अत्र्यांचा विनोद खूप छान आहे वगैरे पण ते सगळ्यांची बिन पाण्याची करतात. लगेच मागे खुर्चीवर बसलेले अत्रे उठून बोलले, “अस नाही बर का, कधी कधी मी पाणी वापरतो”. अत्रेंनी विनोद करताना जास्ती अलंकार वापरले नाहीत कारण ‘जो मराठी बोलतो, तो मराठी माणूस’ इतक्या साध्या विचारांचा हा माणूस! त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्यांचे विनोद कळत. लेखन करताना विडंबन आणि अतिशयोक्ती यांचा भरपूर वापर केला. त्यांचे नाट्यलेखन विनोद प्रहसना मुळे गाजले. पण त्यापेक्षा त्यांनी वाद आणि भाषणे जास्ती गाजवली. अत्रेंचा विनोद चांगला होताच पण तो खट्याळ जास्ती होता, रोजच्या जीवनातील बोलले जाणारे व्यंग त्यात होते. साहित्यिक मुलामा पेक्षा साध्या दगड विटांनी तो उभारला होता. या इमारतीला सजवण्याचे, रंगवण्याचे काम केले ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी! &lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;(क्रमशः….)&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 12pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2018/05/blog-post_13.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDxIYWcDJ74CS-VfrP-PsgHzZoi4Qb0hTqBpjQMbsZsYL7YIAZpPiRM1uvmjMSXnMqVD44_Mgk9X8qensN7roY2vzUo2EHAOo8hU5Dn8Fw1qvyfXt_y94ed7N02bxFcat6pTsyOiVzgcTw/s72-c/images+%25286%2529.jpeg" width="72"/><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-8054712271513770661</guid><pubDate>Tue, 08 May 2018 19:56:00 +0000</pubDate><atom:updated>2018-05-09T01:26:59.988+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">लेखनमाला</category><title>मराठी विनोदी साहित्याचा पहिला आधारस्तंभ: राम गणेश गडकरी</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div dir="ltr" id="docs-internal-guid-5e9d86c8-c445-1266-1933-29999675435a" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt; text-align: justify;"&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjX_1qV1vs-6sp2TKzuq_tXaAQaWDhtpEPvZAPfQk697l1LxhGPJSLcTw7M-IkB5fZP_da0931YR9CLmKaL6RnwUPvdqc9SOyrrUDIwxLlxHixj-gTy0UkBVA5suWmkONihrMnOnw5Nzyw6/s1600/images+%25283%2529.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" data-original-height="177" data-original-width="165" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjX_1qV1vs-6sp2TKzuq_tXaAQaWDhtpEPvZAPfQk697l1LxhGPJSLcTw7M-IkB5fZP_da0931YR9CLmKaL6RnwUPvdqc9SOyrrUDIwxLlxHixj-gTy0UkBVA5suWmkONihrMnOnw5Nzyw6/s1600/images+%25283%2529.jpeg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;div dir="ltr" id="docs-internal-guid-5e9d86c8-0714-85a4-7c07-c3b153263126" style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; white-space: pre-wrap;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;मानवाच्या विविध जीवनरसातील एक महत्वाची रसनिष्पत्ती म्हणजे विनोद! अनेक दुःखांच्या डोंगरात विविध छटांनी वाहिलेल्या ह्या हास्यरसाच्या नद्या मानवीय जीवनाला हलका आधार देऊन जातात. यांच्या अस्तित्वाने सुखाची गंगोत्री नक्कीच कुठे तरी सापडेल या आशेवर माणूस तग धरून राहतो. हे रस कधी बैठकांच्या स्वरूपात दिसून येतात, कुठे महाविद्यालयाच्या कट्ट्यावर पाहण्यास मिळतात, तर कधी साध्या साध्या प्रसंगातून यांचे तुषार मनाला मोहरून जातात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; white-space: pre-wrap;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;
&lt;br /&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;परंतु भारतात हे रस फक्त जीवन विषयक तत्वाकडेच अडकले होते. त्यांना साहित्यिक ओंजळीची उपासना कोणी दिली नव्हती. त्याची सुरवात काहीश्या प्रमाणात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली. मात्र या विनोदरसाची गंगोत्री निर्माण करणारा खरा भगीरथ म्हणजे राम गणेश गडकरी! विनोदी साहित्याचा पहिला आधारस्तंभ! गडकऱ्यांना मराठी भाषेतील ‘शेक्सपियर’ म्हणतात. आणि ते खरेच आहे. या अवलियाने आपल्या समग्र वाङ्मयातून अनेक गड सर करून दिले आणि त्यावर इतरांनी मराठी विनोदी लेखनाचे साम्राज्य उभे केले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;राम गणेश गडकरी हे नाव आज १०० वर्षांनी देखील स्मरणात आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विपुल लेखन मराठी भाषेला दिले. त्यांच्या लेखणीतून निघालेले प्रत्येक अमृततुल्य शब्द आज सुद्धा त्यांच्या त्यावेळच्या सामाजिक भानाची, जाणिवेची आठवण करून देतात. गडकऱ्यांचा जन्म, २६ मे १८८५ रोजी नवसार, मुंबई प्रांत (आजचा गुजरात) येथे झाला. लवकरच १८९२ ला वडिलांचे निधन झाले व त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला आले. शालेय शिक्षण झाल्यावर ते फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेताना किर्लोस्कर नाटक मंडळींच्या नाटकातले आवाज त्यांच्या कानी पडले आणि त्यांचा वावर तिकडेच जास्त वाढू लागला. कमवण्यासाठी ते तिथेच काम करु लागले. जोडीला नाटकांचा अभ्यास चालू केला. वयाच्या १९ व्या वर्षी ज्या व्यक्तीला धड मराठी बोलता येत नव्हते, ती व्यक्ती नरा चा नारायण व्हावा तशी मराठी भाषेच्या पदस्पर्शाने पावन होऊन निघाली. इंग्रजी, संस्कृत इत्यादी भाषेतील पौराणिक, आधुनिक भाषा व नाट्य यांचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला आणि या सर्व भांडवलावर १९१२ साली प्रेमसंन्यास हे नाटक लिहून पूर्ण झालं! या नाटकाला भाषिक सौंदर्याचा उत्कृष्ठ नमुना असंच म्हणावं लागेल. त्यांचे शिष्य आचार्य अत्रे यांना पण साहित्याची गोडी या नाटकामुळे लागली असे ते म्हणत. राजसंन्यास वाचून तर खुद्द त्यांच्या गुरूंनी, म्हणजे कोल्हटकरांनी तर “मी जर शिक्षण मंत्री असतो तर हे नाटक प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाला ठेवले असते” असे उद्दगार काढले!&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;तशी गडकऱ्यांना १८ नाटके लिहायची होती.पण अवघ्या ९ वर्षात त्यांनी प्रेमसंन्यास, भावबंधन, पुण्यप्रभाव व एकच प्याला ही पूर्ण नाटके तर वेड्यांचा बाजार, गर्वहरण, राजसंन्यास ही तीन अपूर्ण नाटके लिहिली. या जोडीला वाग्वैजयंती नावाचा कविता संग्रह गोविंदाग्रज हे टोपणनाव वापरून लिहला. शिवाय बाळकराम या नावाने इतर स्फुटलेख, कथा हे चालू होतंच. ठकीचे लग्न या कथेने तर त्या काळी हास्य कल्लोळ उडवून दिला होता. पण हे कार्य ही अपूर्णच राहून गेले. लहान मुलांच्या साठी दोन बालनाट्ये आणि काही इसापनीतीच्या कथा प्रसिद्ध केल्या. यांचे विशेष म्हणजे या कथेत एकही जोडाक्षर त्यांनी वापरले नाही! या महर्षीचा मृत्यू वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी, २३ जानेवारी १९१९ रोजी झाला. मराठीला ईश्वराने दिलेला हा हिरा त्यांच्याच अंगी असलेल्या स्वभाव हट्टी गुणाने हिरावून घेतला. माधवराव पेशवे गेल्याने जे मराठा साम्राज्याचे नुकसान झाले तेच मराठी भाषेचे या व्यक्तीच्या अचानक निधनाने झाले. दिलेले दान पुरेसे पडण्याआधीच ईश्वराने आपला हात काढून घेतला होता.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;गडकऱ्यांचे लेखन अनुप्रास अलंकाराने बहुत नटले होते. वाक्यरचनेच्या रुपात त्यांनी विविध नाट्यरंग अगदी भरून काढले होते. “प्रेमात राजा गुलाम होतो, पण दारू पिल्यावर गुलाम देखील राजा सारखा वागू लागतो” हे एकच प्याला नाटकातील अजरामर वाक्य कोण विसरेल? याच नाटकातून त्यांनी उभा केलेला तळीराम हा सर्वसामान्य लोकांच्यात वावरणारा तळीराम आहे, हे नाकारून चालेल का? “मुलीने उंबरठा ओलांडल्या दिवसापासून बापाने दारा बाहेर पडायचे बंद केले आहे” या वाक्यातून विनोदीच पण करुण रसाने भरलेल्या त्या काळच्या बापाची कैफियत त्यांनी प्रेमसंन्यास या नाटकात दाखवली आहे. गडकऱ्यांचा विनोद पूर्णतः निखळ होता. ते जेवढं लिहीत त्या पेक्षा त्यांचं बोलणं जास्त विनोदी होत. प्रेमसंन्यास मधील विसरभोळा गोकुळ तर सगळ्यांच्या तोंडी असेल आजही! आजकाल आपण ज्याला PJ का काय म्हणतो त्याचा उगम देखील गडकऱ्यांनी केलेला आहे असं म्हटलं तरी वावग नाही ठरणार! कारण त्यांनी वेड्यांचा बाजार मधील बळवंत नाटक मंडळीमध्ये काम करणारा देशपांडे नावाचा गृहस्थ अशाच प्रकारच्या PJ नी रंगवलेला आहे. गडकरी हे किर्लोस्कर नाटक मंडळी चे कडवे निष्ठावंत. पुढे काही वादामुळे गंधर्व नाटक मंडळी वेगळी झाली आणि त्यांनी स्वतःची नाटक कंपनी स्थापन केली! पाहिलं नाटक गाजल्यावर बोडस येऊन गडकऱ्यांना चिडवून लगेच म्हणाले, “मास्तर, आमच्या कंपनीचा नारळ फुटला बर का!” गडकरी पण लगेच उत्तरले, “नारळ फुटला आता कंपनी केंव्हा फुटणार?”. असा त्यांचा विनोद होता. उदाहरणे बरीच आहेत. पण गडकरी स्वभावाने फटकळ! पटकन बोलून जायचे त्याचे स्वरूप त्यांच्या ध्यानी नसायचे, विनोद त्यांनी आणला खरा परंतु त्याचा तंत्र शुद्ध अभ्यास मात्र त्यांचे शिष्य आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांनी केला.&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="line-height: 1.38; margin-bottom: 0pt; margin-top: 0pt;"&gt;
&lt;span style="font-family: &amp;quot;arial&amp;quot;; font-size: 13pt; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"&gt;(क्रमशः….)&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2018/05/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjX_1qV1vs-6sp2TKzuq_tXaAQaWDhtpEPvZAPfQk697l1LxhGPJSLcTw7M-IkB5fZP_da0931YR9CLmKaL6RnwUPvdqc9SOyrrUDIwxLlxHixj-gTy0UkBVA5suWmkONihrMnOnw5Nzyw6/s72-c/images+%25283%2529.jpeg" width="72"/><thr:total>2</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-5100297718773489985.post-8024743504557272025</guid><pubDate>Tue, 08 May 2018 19:42:00 +0000</pubDate><atom:updated>2018-05-09T02:06:04.748+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">मनोगत</category><title>मनोगत</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;h2 style="text-align: left;"&gt;
मनोगत....&lt;/h2&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;आजपासून मी माझा वैयक्तिक ब्लॉग सुरू करत आहे. वास्तविक ब्लॉग ला प्रस्तावना लिहावी की नाही ह्यावर थोडा संभ्रमित होतो. परंतु मसुदा कोणताच पक्का नाही आणि त्यावर पूर्वग्रहित संरचना धरून प्रस्तावना लिहणे मनाला कुठेतरी पटत नव्हतेच. म्हणून सरळ मनोगत लिहावे ह्या विचारावर मी येऊन थांबलो.&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;खरंतर बऱ्याच दिवसांपासून काही मित्र, आप्त स्वकीय मी ब्लॉग लिहावा असे सुचवले होते. पण स्वतःची अपूर्णता व मनाची तितकी तयारी नसल्याने ते मी करायला तयार नव्हतो. एकदा घडी बसली की मग श्रीगणेशा करावा ह्या विचारात ब्लॉग लिहण्याचा विचार मी सोडून दिलेला होता. मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून हातातील लेखणीचा कागदाला काही तरी उपयोग व्हावा अस सारखं वाटत होतं! त्यातून काही सुचलेले शब्द सोशल मीडियावर पडत होते, काहींनी ते उचलून देखील धरले. पण या सगळ्यात हातातील मोरपिसाची तहान भागेना, आणि त्याची भूक म्हणून हा ब्लॉग नावारूपाला येत आहे!&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;'&lt;i&gt;रिकामटेकडेपणाचे उद्योग'&lt;/i&gt; हे नाव मला राम गणेश गडकऱ्यांच्या '&lt;i&gt;रिकामटेकडेपणाची कामगिरी&lt;/i&gt;' यावरून सुचलं. साहित्यात त्यांचे स्थान माझ्याकरिता अत्यंत आदराचे आहे. अनुप्रासा ने नटलेले त्यांचे भाषिक सौंदर्य माझ्या मनाला खूप भावलेले आहे. विनोदात अत्रे, पु ल देशपांडे ह्या वल्ली अजरामर आहेत. काव्य क्षेत्रात ग्रेस माझे आवडते, तरीही माडगूळकर, बोरकर, पाडगावकर यांना मनात विशेष स्थान आहे. या सर्वांनी दिलेले भांडवल जे थोडेबहुत माझ्या अंगवळचणीला पडले आहे त्यातून ह्या उद्योगांचे पाढे मला सुचत आहेत.&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;ह्या ब्लॉग मध्ये माझे विचार, सुचलेल्या कथा, कविता, सांगावे वाटणारे शब्द व लेख, काही अनुभव आदी गोष्टी मी मांडणार आहे, ते समाधानासाठी! यातून कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाला अहितकारक बोलण्याचा उद्देश आजिबात नाही. वाचकांनी यांतील बाबींवर अभिप्राय कळवावेत एवढी एकच माफक अपेक्षा ठेऊन मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की माझ्या ह्या लेखणीला कधी पूर्णविराम न मिळो!&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: justify;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: right;"&gt;
आपला विनम्र,&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: right;"&gt;
अनय सखदेव&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: right;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: left;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: left;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: left;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;div style="text-align: left;"&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</description><link>https://rikamtekadepanacheudyog.blogspot.com/2018/05/blog-post_9.html</link><author>noreply@blogger.com (अनय सखदेव)</author><thr:total>2</thr:total></item></channel></rss>