<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0"><channel><title>प्रतिध्वनी ....</title><description>मनात येईल ते लिहायचा प्रयत्न केला आहे. जसे आहे तसे गोड मानून घ्यावे.</description><managingEditor>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</managingEditor><pubDate>Fri, 30 Aug 2024 07:59:26 -0700</pubDate><generator>Blogger http://www.blogger.com</generator><openSearch:totalResults xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/">12</openSearch:totalResults><openSearch:startIndex xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/">1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/">25</openSearch:itemsPerPage><link>http://rohitghanwat.blogspot.com/</link><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>मनात येईल ते लिहायचा प्रयत्न केला आहे. जसे आहे तसे गोड मानून घ्यावे.</itunes:subtitle><itunes:owner><itunes:email>noreply@blogger.com</itunes:email></itunes:owner><item><title>अणू आणि ऊर्जा धडकी भरवणारे प्रश्न.. उत्तरांच्या काही दिशा !</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/03/blog-post_29.html</link><category>संकलित</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Tue, 29 Mar 2011 09:46:00 -0700</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-6951949355482651254</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div align="left" style="color: magenta;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;अणू आणि ऊर्जा  धडकी भरवणारे प्रश्न.. उत्तरांच्या काही दिशा !&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;table align="left" border="0"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img src="http://onlinenews1.lokmat.com/newsimages/Manthan-52-1-26-03-2011-56313-a8f31.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;
&lt;/td&gt; &lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt;ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी दिलेल्या भरवशावर विश्वास ठेवून अणुऊर्जेचे समर्थन करावे, तर&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt; जपानमधल्या भीषण आपत्तीचा ताजा अनुभव उरात धडकी भरवतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt; ..आणि अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करावा, तर भविष्यातले विजेचे संकट कसे निवारणार, याचे उत्तर सापडणे कठीण होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt; - सर्वसामान्य माणसाची मती गुंग करणाऱ्या या कोड्याची गाठ निदान सैल करायची, तर&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt; अन्य सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून शुद्ध विज्ञानाला शरण गेले पाहिजे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt; ...तोच प्रयत्न !&lt;/span&gt;&lt;span style="color: black; font-size: x-small;"&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="font-size: small;"&gt;१९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन  शहरांवर अणुबॉम्ब टाकले गेले आणि अणुऊर्जेच्या विक्राळ स्वरूपाचे दर्शन  जगाला घडले. त्याच जपानमध्ये मार्च २०११ला झालेल्या ८.९ रिश्टर क्षमतेच्या  भूकंपामुळे आणि त्यामुळे उदभवलेल्या त्सुनामीमुळे जपानमधील अनेक  अणुभट्ट्यांना अपघात होऊन केवळ जपानलाच नव्हे तर चीन, रशिया, कोरिया,  अमेरिका इत्यादि देशांनाही किरणोत्सर्गाच्या धोक्याला सामोरे जावे लागले.  अशा वेळी एकंदरीतच अणुऊर्जा आणि तिचे धोके यांच्याबद्दल काही प्रश्न  निर्माण होतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अणुऊर्जा हानिकारक नाही का?&lt;br /&gt;
तसे पाहायला गेले तर कोणत्याही प्रकारची ऊर्जा घातक ठरू शकते. एखादी बाब  घातक ठरते ती - ती मोठ्या प्रमाणावर तत्क्षणी निर्माण झाल्यामुळे. याला आपण  विस्फोट म्हणतो. ऊर्जेच्या थोड्या थोड्या निर्मितीला आणि वापराला सामावून  घेण्याचे तंत्र आपण विकसित केलेले असेल तर तेवढी ऊर्जा हानिकारक न होता  लाभदायक म्हणता येईल. अणुऊर्जा ही माणसाने शोधून काढलेली ऊर्जा आहे.  जानेवारी १९३९ मध्ये बर्लिनमधील केसर विल्हेम इन्स्टिट्यूटमध्ये ऑटो हान  फ्रिटझ स्ट्रासमन आणि सहकार्यांनी प्रथम अणुविखंडन करून पाहिले.  अणुऊर्जेसारखी दुसरी ऊर्जा म्हणजे 'आग'. ती माणसाला कधी सापडली याचा  तारीखवार उल्लेख माहिती नाही. पण ती हजारो वर्षांपूर्वी माणसाला सापडली  असावी असा अंदाज करता येतो. 'आग' सुरक्षितपणे हाताळता येण्यासाठी जितका  कालावधी मनुष्यप्राण्याला लागला त्यामानाने अणुऊर्जा सुरक्षितपणे हाताळता  येण्याइतकी परिस्थिती यायला अजून एक शतकही झालेले नाही. वाफ आणि वीज या  शक्ती हाताळता येण्यासाठी त्यामानाने दोन शतके तीन शतके जास्ती मिळाली  म्हणून आपल्याला या शक्ती तितक्या हानिकारक वाटत नाहीत; मात्र या ऊर्जा  नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात होतच नाहीत असे म्हणता येत नाही. अपघात  होतात; पण त्याचा 'बाऊ' न करता, न घाबरता आपण त्या ऊर्जा वापरतो. अणुऊर्जा  त्या मानाने बाल्यावस्थेत आहे. ती नियंत्रणात ठेवण्याचे तंत्रज्ञान आणि ते  वापरण्याचे कौशल्य अजून विकसित झाले तर घात-अपघाताने होणारी हानी रोखता येऊ  शकेल.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अणुभट्ट्यांत अपघात झाले तर?&lt;br /&gt;
तो धोका आहेच. आपण किती कडेकोट बंदोबस्त करणे आवश्यक आहे ते त्या-त्या  अणुभट्टीच्या भौगोलिक प्रदेशावर आणि आसमंतावर ठरेल. त्याबाबत विनाकारण  गुप्तता बाळगणे योग्य नाही. गुप्ततेमुळे दोन धोके संभवतात. एक, लोकांमध्ये  भयगंड वाढत राहू शकतो आणि दुसरा, संयंत्र उभारणीत फाजील (अति) आत्मविश्वास  निर्माण होतो. पहिल्या अणुबॉम्ब निर्मितीत असणाऱ्या गाभा गटातील  शास्त्रज्ञही अणुविखंडन तंत्रज्ञान गुप्त राहावे या बाजूने नव्हते. अमेरिकी  लष्करी अधिकाऱ्यांचा डाव ते अमेरिकेपुरतेच राहावे असा होता, तो चक्क एका  शास्त्रज्ञ जोडप्याने चोरी करून, ते तंत्रज्ञान रशियाला पुरवून हाणून  पाडला. अणुऊर्जा निर्मितीबाबत गुप्तता पाळली गेल्याने त्यात भ्रष्टाचार तर  होऊच शकतो शिवाय अपघात झाले तर त्यांची चौकशीही होऊ शकत नाही आणि त्यामुळे  चुका सुधारण्यास शास्त्रज्ञांना-तंत्रज्ञांना संधी मिळत नाही, अपघात  संभाव्य क्षेत्रात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या क्षणी काय करावे याचे धडे मिळत  नाहीत. अणुऊर्जेच्या बाबतीत गुप्ततेचे आवरण काढले पाहिजे. दुसरे म्हणजे  अपघाताचा धोका आहे म्हणून ते टाळले पाहिजे, असे काही मानवी संस्कृती सांगत  नाही. असे धोके पत्करूनही आपल्या पूर्वजांनी आजची नागरी संस्कृती इथपर्यंत  आणली याबद्दल सतत ऋणी राहण्याची मानसिकता जोपासली जावी.&lt;br /&gt;
&lt;/span&gt;    &lt;span style="color: #20124d; font-size: small;"&gt;अणुभट्टीतील राख लाखो वर्षं किरणोत्सार करीत राहील त्याचा धोका नाही का?&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br style="color: #20124d;" /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #20124d; font-size: small;"&gt; अणुभट्टीतून राख येते म्हणण्याऐवजी त्याला 'उर्वरक' म्हणणे अधिक सयुक्तिक  ठरेल. औष्णिक भट्टीतून पसरणाऱ्या राखेचे लोटच्या लोट चंद्रपूर भागात  आपल्याला दिसतात तसे अणुभट्टीतील उर्वरकांबाबत नसते. दुसरे म्हणजे  अणुभट्टीत निर्माण झालेल्या उर्वरकांमध्ये किरणोत्सार करणारे अनेक घटक तयार  होतात. किरणोत्सार कमी कमी होत जातो. किरणोत्साराचे प्रमाण ठराविक काळाने  निम्म्यावर येते त्या काळाला अर्धआयुकाल म्हणतात. उदा. आयोडिन १३१ या  किरणोत्सारी अणुप्रकाराचा अर्धआयुकाल आठ वर्षे आहे. याचा अर्थ किरणोत्सार  १६ वर्षांनंतर संपतो असे नाही तर तो निम्मा होतो. साधारणपणे  अर्धआयुकालाच्या सात पट कालापर्यंत किरणोत्सार प्रभावी असतो. म्हणजे वरील  उदाहरणात तो ५६ वर्षं मानता येईल. लाखो वर्षं नाही; मात्र  सैद्धान्तिकदृष्ट्या किरणोत्सार आधीचा निम्मा, त्याच्या निम्मा करत करत  लाखच नव्हे कोटी वर्षंही तो राहू शकतो. त्याची काळजी घेतलीच पाहिजे.  चेर्नोबिलच्या अपघातानंतर त्या भागातून भारतात आलेल्या किरणोत्साराने बाधित  लोण्याबाबत एक खटला दाखल झाला होता तो इतका रेंगाळला की लोण्यातील  किरणोत्सार धोकादायक पातळीच्या खाली आला. न्यायालयीन दिरंगाईचा फायदाच  म्हणावा ! &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br style="color: #76a5af;" /&gt;&lt;br /&gt;
अणुऊर्जा सुरक्षित असेल तर गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अणुभट्ट्यांची उभारणी कमी का झाली?&lt;br /&gt;
एक तर ऊर्जानिर्मितीचे अन्य उपाय जे अधिक सुरक्षित किवा आखूड शिगी बहूदुधी -  वाटले त्याकडे त्या त्या देशांनी लक्ष दिले. ते स्वाभाविकच आहे. आणखी एक  महत्त्वाचे कारण म्हणजे अणुभट्टीतून वीजनिर्मितीनंतर शिल्लक राहिलेल्या  उर्वरकामध्ये असणाऱ्या प्लुटोनियमची मागणी कमी झाली. प्लुटोनियमचा मुख्य  वापर अणुबॉम्ब बनविण्यासाठी होतो. अणुबॉम्ब आहेत किवा इतरांपेक्षा जास्ती  आहेत तो देश परकीय आक्रमणांपासून सुरक्षित  अशी जरबेची समजूत बदलत्या  जागतिक रचनेत फोल ठरली. उलट आपल्या भूमीवर असणाऱ्या अणुबॉम्बच्या  ज्वालामुखीच्या तोंडावर आपण बसलो आहोत याची जाणीव त्या देशातील नागरिकांना  आणि सरकारला व्हायला लागली. शिवाय शिल्लक उर्वरकाची विल्हेवाट लावण्याचे  अन्य सुरक्षित मार्ग फारसे शोधले गेल्याचे दिसत नाही. खनिजातून कण कण गोळा  करून शुद्ध करून तुळ्यांच्या रूपात वापरलेले अणुइंधन काम झाल्यावर पुन्हा  कण कण करून विखरून निसर्गाला परत करणे - हा मार्ग खर्चिक असला तरी कमी  धोक्याचा असावा, असे मला वाटते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी किरणोत्सार लागतो आणि ती निर्माण झाल्यावरही किरणोत्सार होतो शिवाय ती खर्चिकही आहे - त्याचे काय?&lt;br /&gt;
घरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवायची तर त्याही आधी काही तरी पेटवायला  लागतेच. आता सुरक्षित आगकाड्या, लायटर अशी साधने आहेत. त्यातही अग्नी आहे  आणि चूल पेटविल्यावरही अग्नी निर्माण होतो. तसेच अणुऊर्जेबाबतही आहे. अणु  हा पदार्थाचा अतिसूक्ष्म कण. तो इतका छोटा आहे की एका मिलीमीटरमध्ये एक  कोटी अणु मावतात. त्या अणुत असणारे केंद्रक अणुच्या आकारापेक्षाही खूपच  लहान. इतके लहान की एका अणुच्या आकारात एक लाख अणुकेंद्रके मावतील. त्या  अणुकेंद्रकामध्ये धनभारीत प्रोटॉन असतात. त्यांच्यावरील विद्युतभार सारखाच  असल्याने ते एकमेकांना तीव्र बलाने ढकलतात. त्या ढकलण्याच्या बलाच्या  विरोधात जे बल प्रभाव टाकते ते म्हणजे अणुऊर्जा. ती प्रत्येक अणुत असतेच;  पण प्रत्येक प्रकारचा अणु फोडून ही ऊर्जा मुक्त करता येत नाही. युरेनियम,  थोरीयम, प्रोटेक्टॅनियम, प्लुटोनियम अशा प्रकारच्या अणुचेच विखंडन करणे  आजपर्यंत माणसाला शक्य झाले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
किरणोत्साराबद्दल थोडा वेगळा विचार करावा लागेल. आज तुम्ही, मी, आपणच काय  तर प्रत्येक सजीव- किडामुंगी, प्राणी, वनस्पती अगदी सूक्ष्मजीवसुद्धा  आपल्या देहात किरणोत्सारी मूलद्रव्य घेऊन वावरतो. त्याला कार्बन-१४ असे नाव  आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत या कार्बन-१४ चे कार्बन-१२ शी  असलेले प्रमाण स्थिर राहते. सजीवाचा मृत्यू झाला की कार्बन-१४ किरणोत्सारी  असल्याने त्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. याशिवाय ज्या मूलद्रव्यांचे  अणुविखंडन करून अणुऊर्जा मिळविता येते असे अणु आपल्या आसमंतात असतातच  त्यांच्यापासूनही सातत्याने किरणोत्सार होत असतोच. सूर्यावर होणारी वादळे  आणि इतर दूरवरच्या ताऱ्यांवरून फेकला जाणारा किरणोत्सारही असतोच. तो टाळता  येत नाही. त्यातला काही किरणोत्सार सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यकही  आहे.&lt;br /&gt;
दुसऱ्या बाजूने आधुनिक औषधोपचार पद्धतींमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण, सीटी  स्कॅन, एमआरआय यासारख्या यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न  फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.  क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची  हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा  वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच.&lt;br /&gt;
तारापूर अणुवीज निर्मिती केंद्रातून गळती होते का, याची पाहणी करण्यासाठी  तेथील सुरक्षितता तपासण्यासाठी काही खासदारांचे एक पथक गेले होते. त्या  सर्वांना विशेष प्रकारची चिलखते घालून अणुभट्टीतून अनेक गोष्टी सुरक्षित  अंतरावरून दाखविण्यात आल्या. ते पथक अतिसंरक्षित भागातून बाहेर  पडण्यापूर्वी त्यांच्या शरीरावर पडलेल्या किरणोत्साराची मात्रा तपासण्यात  आली. तपासणी नाका स्वयंचलित होता. किरणोत्सार मर्यादित असेल तरच दार उघडून  बाहेर जाऊ देणार. तसे एक सोडून सर्व खासदार बाहेर जाऊ शकले. या खासदार  महाशयांना तपासणी नाका बाहेर जाऊ देईना. कारण त्यांच्या शरीरातून बाहेर  पडणारा किरणोत्सार धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक होता. सगळे बुचकळ्यात पडले.  शेवटी चौकशी करता असे समजले की, या खासदारांची काही दिवसांपूर्वीच  अॅंजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी वापरलेल्या औषधींमधून बाहेर पडणारा  किरणोत्सर्ग अजूनही त्यांच्या शरीरात होता. ही धोकादायक मात्रा घेऊन या  खासदारांनी किती जणांना किरणोत्साराचा प्रसाद दिला असेल? मला वाटते किमान  तारापूर येथे तरी किरणोत्सार धोकादायक पातळीच्या वर जाणार नाही याची काळजी  घेतली जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल काय?&lt;br /&gt;
माझा कल एकंदरीतच महाकाय प्रकल्पांच्या बाजूने नाही. त्यात खर्च, गुंतवणूक,  धोके, लाभांसाठी करावा लागणारी तजवीज, सुरक्षा यंत्रणा, उर्वरकांची  विल्हेवाट, पर्यावरणीय हानी यांचा बोजा मोठा येतो. महाकाय प्रकल्पांचे  तंत्र आणि त्यामागील विज्ञानाकडे चिकित्सक आणि संवेदनशील शास्त्रज्ञही  साशंकतेने पाहतात. आपल्याकडे मनुष्यबळ प्रचंड आहे. त्याचा बौद्धिक,  शारीरिक, मानसिक वापर करणारे तंत्र आणि विज्ञान विकसित व्हायला पाहिजे.  परावलंबनाच्या जोखडातून आपण, आपले शिक्षण, आपले विज्ञान, आपले  तंत्रविज्ञान, आपले संशोधक, आपले शासन, प्रशासन मुक्त व्हायला हवे. सुटा  सुटा विचार करून प्रश्न सुटत नाहीत. एकात्मिक विचार व्हायला हवा. &lt;br /&gt;
जपानी नागरिकांसारखी पुन्हा उभारी घेण्याची मानसिकता आपल्यात निर्माण झाली तर आपली 'ऊर्जा' कितीतरी जबर असेल.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
- विनय र. र.&lt;br /&gt;
(vinay.ramaraghunath@yahoo.com )&lt;/span&gt;     &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;सदर लेख दै. 'लोकमत' मधून संकलित केला आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>-आवरा वरून साभार</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/03/blog-post_06.html</link><category>vinod</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Sun, 6 Mar 2011 06:57:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-4538216547242137185</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3 class="UIIntentionalStory_Message" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;msg&amp;quot;}"&gt;&lt;span class="UIIntentionalStory_Names" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;name&amp;quot;}"&gt;                      &lt;/span&gt;&lt;span class="UIStory_Message"&gt;खूप दिवसांनी....परत एकदा ..संसारिक जोक  !!&lt;br /&gt;
एक खवट सासू ( पवित्र रिश्ता मधल्या उषा नाडकर्णी सारखी :-P )&lt;br /&gt;
तिच्या सुनेला म्हणते..&lt;br /&gt;
" अगं ए बाई..हे काय बनवला आहेस ..जेवण आहे की शेण ".&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
&lt;span class="text_exposed_show"&gt;.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते..&lt;br /&gt;
ती लगेच म्हणते,&lt;br /&gt;
" अरे देवा ! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय !!! "&lt;br /&gt;
Courtesy - Abhijit Shivajirao&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>-आवरा वरून साभार</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/03/blog-post.html</link><category>vinod</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Sun, 6 Mar 2011 06:55:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-8422961412385226079</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3 class="UIIntentionalStory_Message" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;msg&amp;quot;}"&gt;&lt;span class="UIStory_Message"&gt;वैधानिक इशारा : पांचटपणा सहन होणार नसेल..तर चुकून पण वाचू नका..&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
दुकानुतून १० पुस्तके १७० रुपयांना आणली तर..एक पुस्तक कसे पडले ?.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
&lt;span class="text_exposed_show"&gt;.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पिशवी फाटल्यामुळे ...........!!!!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total></item><item><title>जब क्रिकेट मेट बॉलिवूड !</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post_15.html</link><category>bollywood</category><category>cricket</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Tue, 15 Feb 2011 23:35:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-9009574329257202888</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;क&lt;/b&gt;ल्पना करा, तुम्ही चॅनेल "सर्फिंग' करताय! कुठं एखादी  नवीन हिट फिल्म दिसतीय, तर कुठं एखादा जुन्या जमान्यातला "क्‍लासिक'  चित्रपटही सुरूय. कुठं क्रिकेटची लाईव्ह मॅच रंगात आलीय; तर कुठं "वर्ल्ड  कप'च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. मात्र, एक चॅनल असं दिसलं की  ज्यावर कपील देव आणि सचिन तेंडुलकर आजूबाजूला बसलेत आणि त्यांच्यासमोर आहेत  त्या शर्मिला टागोर आणि दीपिका पदुकोन. हे चौघं एकमेकांशी त्यांच्या  चित्रपट आणि क्रिकेटप्रेमाविषयी गप्पा मारताहेत. अर्थातच या चॅनलवर  स्थिरावलेलं आपलं रिमोटचं बटण या "सेलिब्रिटीं'मधल्या गप्पा संपेपर्यंत  काही दाबलं जाणार नाही. थोडक्‍यात, क्रिकेट आणि बॉलिवूड हे दोन घटक आपल्या  रक्तात इतके भिनले आहेत की, त्यांच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच  करू शकणार नाही. भारतीय मनोरंजन-उद्योगाचे हे दोन भिन्न चेहरे; परंतु, या  दोन चेहऱ्यांमध्ये आपण सतत आपला चेहरा पाहत असतो. त्यावर आपल्या ज्या काही  बऱ्या-वाईट प्रतिक्रिया असतील, त्या अगदी पोटतिडकीनं मांडत असतो. म्हणूनच  या दोन क्षेत्रांमध्ये अत्युच्च कार्य करणाऱ्यांना आपण देवस्थानी नेऊन  ठेवलंय.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b style="color: #6aa84f;"&gt;सचिन-आमिरची अनोखी मैत्री&lt;/b&gt;&lt;br /&gt;
एक किस्सा  माझ्या चांगलाच लक्षात आहे. साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीची ही घटना असेल.  तो मकरसंक्रांतीचा दिवस होता. याच दिवशी भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेटची  "वन डे' मॅच सुरू होती. एका "फाईव्ह स्टार' हॉटेलमध्ये अभिनेता गोविंदाच्या  चित्रपटाचं शूटिंग "कव्हर' करण्यासाठी मी गेलो होतो. या चित्रपटाचा  दिग्दर्शक आणि इतर कलाकार मंडळी क्रिकेटची "फॅन' होती. दिग्दर्शकानं काही  प्रसंगांचं चित्रीकरण झटपट आटोपून घेतलं आणि हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेत  टीव्ही संच लावून घेतला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ही मॅच पाहण्यात सगळे इतके गुंग झाले होते  की, इथं शूटिंग सुरू आहे, याचा सगळ्यांना विसर पडला होता. ही मॅच  संपल्यानंतरच मग पुन्हा शूटिंग सुरू झालं. हा झाला एक प्रातिनिधिक प्रसंग.  क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या घट्ट नात्याचे असे अनेक प्रसंग इथं नेहमीच  पाहायला मिळतात. अनेक क्रिकेटपटू बॉलिवूडमधील "स्टार्स'चे चाहते आहेत; तर  स्टार मंडळी क्रिकेटपटूंचे "दीवाने' आहेत. यातूनच अनेकांची छान मैत्रीही  झालीय. अभिनेता आमिर खान आणि सचिन तेंडुलकर यांच्यातलं नातं विलक्षण असंच  म्हणावं लागेल. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपला कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या  उंबरठ्यावर असला की आमिर तो आधी सचिनला दाखवतो. सचिनलाही सिनेमाचं वेड आहे.  कोणते नवीन चित्रपट चांगले आहेत, याकडं त्याचं बारकाईनं लक्ष असतं.  त्यामुळे क्रिकेटचा "सीझन' आटोपला की तो मग आपल्या "लिस्ट'मधील चित्रपट  पाहण्यास सुरवात करतो. सचिनचं हे चित्रपटप्रेम आता बॉलिवूडलाही ठाऊक  झाल्यानं निर्माते-दिग्दर्शक मंडळी त्याच्यासाठी आपल्या चित्रपटाचं एखाद्या  "प्रीव्ह्यू थिएटर'मध्ये "स्पेशल स्क्रिनिंग' ठेवतात. असा मान अलीकडच्या  काळातील दुसऱ्या कोणत्या क्रिकेटपटूला क्वचितच मिळालाय. &lt;br /&gt;
मध्यंतरी  अभिनेत्री दीपिका पदुकोननं आपल्या "ओम शांती ओम'च्या "प्रीमियर शो'साठी  महेंद्रसिंग धोनीला आमंत्रित केलं होतं. त्यामुळेच या दोघांमधील कथित  "अफेअर'ची चर्चा बरेच दिवस रंगली होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;&lt;span style="color: #6aa84f;"&gt;"लगान'नं "चमकला' रुपेरी पडदा &lt;/span&gt;&lt;/b&gt;क्रिकेटचा  प्रभाव चित्रपटांमधूनही अनेकदा पाहायला मिळालाय. अभिनेता-दिग्दर्शक देव  आनंदच्या "ऑल राउंडर' चित्रपटात क्रिकेटचा विषय हाताळण्यात आला होता; परंतु  देव आनंदचा हा पडता काळ असल्यानं आमिर खानसारखा कलाकार असूनही हा चित्रपट  कोणाच्याही लक्षात राहिला नाही. क्रिकेटला चित्रपटमाध्यमातून मोठ्या उंचीवर  नेलं ते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या "लगान' चित्रपटानं. या चित्रपटाचा  शेवटचा अर्धा तास म्हणजे क्रिकेटची मॅचच होती; परंतु, दिग्दर्शकानं  क्रिकेटमधील बारकावे लक्षात घेऊन हा भाग असा काही रंगवला की, प्रेक्षकांना  चित्रपटाऐवजी ती खरीखुरी मॅच वाटली होती. क्रिकेटवर आधारलेला बॉलिवूडमधील  आणखी एक प्रभावशाली चित्रपट म्हणजे "इकबाल'. जलदगती गोलंदाज बनण्याची  महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका मूकबधीर तरुणाची ही हृदय हेलावून सोडणारी  कहाणी होती. दिग्दर्शक नागेश कुकनूरनं मूळ कथानकाशी क्रिकेटचा धागा खूप छान  विणला होता. त्यामुळे एक "क्‍लासिक' चित्रपट म्हणून "इकबाल'ची गणना झाली.  त्यानंतरही "हॅटट्रिक', "स्टम्प्ड्‌' असे काही क्रिकेटवर आधारलेले चित्रपट  आले. परंतु, वर उल्लेखिलेल्या दोन चित्रपटांची सर काही त्यांना आली नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;&lt;span style="color: #6aa84f;"&gt;लोकप्रियतेचा उपयोग "एक्‍सचेंज'साठी&lt;/span&gt;&lt;/b&gt;क्रिकेट  आणि बॉलिवूड या दोन क्षेत्रांमध्ये मिळालेल्या लोकप्रियतेचा उपयोग मग  "एक्‍सचेंज'साठी होतो. क्रिकेटमधले खेळाडू चित्रपटांमध्ये चमकतात. सुनील  गावसकर, संदीप पाटील, अजय जडेजा, विनोदी कांबळी, सलील अंकोला यांसारखे  खेळाडू वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये चमकले आहेत; परंतु, यापैकी कोणालाच तिथं  "लॉंग इनिंग' खेळता आलेली नाही. खेळांडूप्रमाणे कलाकारांनी आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये थेट सहभाग घेतलेला नसला तरी ते वेगवेगळ्या मार्गांनी या  खेळाशी निगडित आहेत. अमिताभ बच्चनसारखा कलाकार क्रिकेटसंदर्भातील जाहिराती  करतो. खेळाडू आणि कलाकारांमधील एक "कॉमन' गोष्ट म्हणजे त्यांचं  जाहिरातींमधील चमकणं. गेल्या पाच वर्षांमधील जाहिरातींमध्ये झळकलेल्या  व्यक्तिमत्त्वांची संख्यात्मक तुलना करावयाचे ठरवल्यास अमिताभ बच्चन, आमिर  खान, शाहरुख खान, करिना कपूर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी ही नावं  आघाडीवर असल्याचं लक्षात येतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;&lt;span style="color: #6aa84f;"&gt;"स्टार प्रेक्षक'ही स्टेडियममध्ये&lt;/span&gt;&lt;/b&gt;ज्याप्रमाणं  क्रिकेट चित्रपटांमधून दिसलं, त्याप्रमाणंच क्रिकेटमधून चित्रपटही नेहमीच  पाहायला मिळतो. 1980 च्या दशकात "शारजा'मध्ये अनेक स्पर्धा व्हायच्या. त्या  स्पर्धांमध्ये "बाउंड्री लाईन'वर लावण्यात आलेले जाहिरातफलक विशेषकरून  लक्ष वेधायचे.&lt;br /&gt;
निर्माता-दिग्दर्शक फिरोज खाननं आपल्या "जॉंबाज'  चित्रपटाची जाहिरात अशा स्पर्धांमधून करण्याची कल्पकता तेव्हा दाखविली  होती. क्रिकेटवरील प्रेमाखातर अनेक चित्रपट स्टार्स वेळात वेळ काढून  "लाईव्ह' मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतात. या वेळी या गॉगलधारी  स्टार्सवर कॅमेऱ्याची नजर पडली नाही तरच नवल! कॅमेऱ्यानं या स्टार्सना  टिपलं की मग "कॉमेंट्री बॉक्‍स'मधील सुनील गावसकर, रवी शास्त्री, हर्ष  भोगले यांच्यासारखी मंडळी आपल्या शेजारी बसलेल्या विदेशी कॉमेंट्रीटर्सना  या स्टार्सबद्दलची बहुमोल माहिती पुरवितात. ते ऐकणं अगदी रंजक असतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;&lt;span style="color: #6aa84f;"&gt;"आयपीएल'नं दूर केलं उरलंसुरलं अंतर&lt;/span&gt;&lt;/b&gt;क्रिकेट  आणि बॉलिवूडमध्ये जे काही थोडंफार अंतर शिल्लक राहिलं होतं, ते दूर केलं  ते "आयपीएल' स्पर्धेनं. आतापर्यंत स्टार मंडळी कोणाच्या तरी "बेनिफिट  मॅच'मध्ये आपल्या पायाला पॅड बांधून मैदानात उतरायचे; परंतु "आयपीएल'मुळं  शाहरुख खानसारख्या "स्टार'नं "नेट प्रॅक्‍टिस' करताना पॅड बांधले आणि  आपल्या संघातील चांगल्या गोलंदाजांना सामोरं जाण्याची संधी सोडली नाही. एका  संघाचा मालक झाल्यामुळं सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गजावर तोंडसुख  घेण्यापर्यंत त्यानं मजल मारली; परंतु त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया  आल्यानंतर लगेचच त्यानं "यू टर्न' घेतला. शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा या  अभिनेत्रींनी आपलं अभिनयातलं "करिअर' संपायला आलंय, हे वेळीच ओळखून  क्रिकेटकडं मोर्चा वळवला. मात्र, दीपिका पदुकोनसारख्या अभिनेत्रीनं चतुराई  दाखवीत विजय मल्ल्यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याबरोबर मैत्री वाढवीत  सिनेमाबरोबरच क्रिकेटमध्येही लक्ष घालण्यास सुरवात केलीय. "आयटम सॉंग' फक्त  चित्रपटांमध्येच असतं, हा गैरसमज "आयपीएल'नं दूर केला आणि गेल्या एक-दोन  वर्षांमध्ये बॉलिवूडमधील तारका "चीअर-लीडर्स'च्या साह्यानं क्रिकेटच्या  मैदानात थिरकताना दिसत आहेत. "आयपीएल'चा वाढणारा पसारा, क्रिकेटचे वाढणारे  "फॉलोअर्स', भारतीय चित्रपटसृष्टीचा जगातील वाढणारा दबदबा लक्षात घेता  मनोरंजन हा आता एक समुद्रच बनला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात त्यात  क्रिकेटपटू आणि स्टार्सनी मोठ्या संख्येनं उड्या मारल्या तर आश्‍चर्य  वाटायला नको. एक प्रेक्षक म्हणून त्यांच्या या समुद्रस्नानाचा आनंद  आपल्याला निश्‍चितच मिळेल. तोही कामी कमी नाही!&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-size: medium;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; - सदर लेख&lt;span style="color: #ea9999;"&gt;&lt;span style="color: #134f5c;"&gt; दै.सकाळ&lt;/span&gt; &lt;/span&gt;मधून संकलित केला आहे. &lt;/span&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total></item><item><title>इजिप्त क्रांतीचा नवा नायक</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post_7771.html</link><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Mon, 14 Feb 2011 23:25:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-514733062683391048</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;'&lt;span style="font-size: large;"&gt;ज्यांची मुले या आंदोलनात मारली गेली, त्या प्रत्येक माता-पित्याची मी जड  अंतःकरणाने माफी मागतो. मात्र ही आमची चूक नाही. जे सत्तेत ठाण मांडून बसले  आहेत, तो प्रत्येक जण याला जबाबदार आहे. त्यांना सत्ता सोडावीशी वाटतच  नाही.'' वेल घोनिम या तरुणाची दूरचित्रवाणीवाहिनीवरील ही मुलाखत ऐकताना  सारा इजिप्त हेलावून गेला. कैरोच्या ताहरीर चौकात जमलेल्या लाखो  निदर्शकांमध्ये लढ्यासाठी नवा जोम संचारला. कोण हा वेल घोनिम? तीस वर्षीय  घोनिम हा या क्रांतीचा "नायक'च ठरला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
1980 मध्ये इजिप्तमध्ये  जन्मलेला घोनिम हा सध्या "गूगल' या सर्च इंजिनचा पश्‍चिम आशियाई देशांचा  मार्केटिंगचा प्रमुख. तो लहानाचा मोठा झाला संयुक्त अरब अमिरातमध्ये. कैरो  विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यानंतर अमेरिकी विद्यापीठातून  त्याने एमबीए केले. त्यानंतर इजिप्त सरकारची वेबसाईटही त्यानेच डिझाईन  केली. मुक्त जगाचा अनुभव घेतलेल्या; तसेच ट्विटर, फेसबुक वापरणाऱ्या तरुण  पिढीचा प्रतिनिधी असलेल्या घोनिमला देशातील हुकूमशाही मनातून डाचतच होती.  त्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उत्कृष्ट करिअरची संधी हातात असताना  मायदेशात गुप्तपणे क्रांती घडविण्याचा मार्ग पत्करला. यासाठी त्याने  दुबईतून कैरोत बदली मागून घेतली. 25 जानेवारीस त्याने फेसबुकवर "वुई आर ऑल  खलीद सैद' हे पेज तयार केले. अलेक्‍झांड्रिया शहरात खलीद हा 28 वर्षीय  तंत्रज्ञ पोलिस अत्याचाराचा बळी ठरला होता. फेसबुकवरील या पेजला साऱ्या अरब  जगतातून अफाट प्रतिसाद मिळाला. रात्रंदिवस जागून घोनिम फेसबुकवर  प्रतिक्रियांना प्रतिसाद देत होता. फारच थोड्या लोकांना ही बाब माहिती  होती. 27 जानेवारीस त्याने "प्रे फॉर इजिप्त' असा मेसेज ट्‌विटरवर टाकला.  त्याचा मेसेज वाचून हजारो तरुणांची पावले आपसूकच आंदोलनासाठी घराबाहेर पडत  होती. त्याच दिवशी रात्री त्याला अटक झाली. 28 तारखेस ताहरीर चौकाकडे  निघालेल्या निदर्शकांवर तुफान लाठीमार झाला. अश्रुधुराचा वापर करण्यात आला.  घोनिमचे मित्र, पत्नी तसेच "गूगल'ने त्याच्या शोधासाठी हरप्रकारे प्रयत्न  केले. तब्बल आठवड्यानंतर विरोधी पक्षाचे नेते मुस्तफा अल्नागर यांनी घोनिम  जिवंत असून, सरकारने त्याला अटक केल्याचा गौप्यस्फोट केला आणि साऱ्या देशात  जनक्षोभ उसळला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"ऍम्नेस्टी इंटरनॅशनल'ने त्याच्या सुटकेची मागणी  केली. अखेर सरकारला त्याला सात फेब्रुवारीस तुरुंगातून सोडणे भाग पडले.  तब्बल दहा दिवसांच्या कोठडीतून घोनिम बाहेर पडला तो इजिप्तचा नवा "हिरो'  होऊनच. व्यक्ती, संघटना आणि पक्ष यांच्यापेक्षा देश मोठा, हे त्याने अत्यंत  प्रभावीपणे आंदोलकांच्या मनावर बिंबवले... अन्‌ इजिप्तच्या नव्या पिढीला  आपला नेता गवसला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #ea9999;"&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;- धनंजय बिजले&lt;/span&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-size: large;"&gt; &amp;nbsp;&amp;nbsp; - सदर लेख&lt;span style="color: #ea9999;"&gt;&lt;span style="color: #134f5c;"&gt; दै.सकाळ&lt;/span&gt; &lt;/span&gt;मधून संकलित केला आहे. &lt;/span&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>'उपेक्षित'</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post_4086.html</link><category>कविता</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Mon, 14 Feb 2011 02:19:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-7868505425991758075</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;मी कोण ? मला नेहमी प्रश्न पडतो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;उत्तरच मिळत नाही.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;खुप  शोधावस&amp;nbsp; वाटतं&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;पण गणितच जुळत नाही.&lt;br /&gt;
&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-size: large;"&gt;नंतर कुणीतरी सांगतं,&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;की मी आहे एक उपेक्षित&amp;nbsp;  माणुस.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;कधी  धरणग्रस्त, कधी शेतकरी,&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तर कधी गिरणी कामगार.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;भूमिका कशाही  असल्या तरी&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;प्रत्येक वेळी पदरी उपेक्षाच,&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;सरकारकडून,  समाजाकडून.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-size: large;"&gt;अन्यायाविरुद्ध पेटून उठतो,&lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=7123244686992103322&amp;amp;postID=7868505425991758075" name="more"&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;परंतु पंखच छाटले  जातात.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;स्वताच्या हक्कासाठी, &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;रस्त्यावर यायच, &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;घरदार  बायका मुलं सोडून.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;कित्येकानी हुतात्मे व्हायचं,&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;बाकिच्यानी आश्वासनं झेलायची,&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आशा निराशेच्या वादळात जे मिळतं ते&amp;nbsp; घ्यायचं, &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तेवढ्यावरच&amp;nbsp; समाधान मानायचं. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;कारण मी आहे उपेक्षित माणूस.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt;&lt;a href="http://www.sahyadribana.com/2010/12/blog-post_31.html" style="color: #38761d;"&gt;'उपेक्षित'&lt;/a&gt;&amp;nbsp; ही कविता &lt;a href="http://www.sahyadribana.com/" style="color: #38761d;"&gt;प्रकाश पोळ&lt;/a&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt; &lt;/span&gt;यांच्या &lt;a href="http://www.sahyadribana.com/" style="color: #38761d;"&gt;'सह्याद्री बाणा...'&lt;/a&gt; या ब्लॉग वरून घेतलेली आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>आवरा वरून साभार ...</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post_7323.html</link><category>vinod</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Mon, 14 Feb 2011 01:10:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-8631738373974091174</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3 class="UIIntentionalStory_Message" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;msg&amp;quot;}"&gt;&lt;span class="UIIntentionalStory_Names" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;name&amp;quot;}"&gt;                       &lt;/span&gt;&lt;span class="UIStory_Message"&gt;वैधनिक  इशारा-अतिशय पांचट आहे ,&lt;br /&gt;
ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये !  :P :P :P&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
टंप्या -अरे झंप्या कंटाळा आलाय रे !&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span class="text_exposed_hide"&gt;...&lt;/span&gt;&lt;span class="text_exposed_show"&gt;झंप्या-अरे  ,मग दरवाजा उघडू नकोस ,राहू दे  त्याला बाहेरच  ! :P :D&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>आवरा वरून साभार ...</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post_9636.html</link><category>shaker</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Mon, 14 Feb 2011 01:08:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-2466596013361301058</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3 class="UIIntentionalStory_Message" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;msg&amp;quot;}"&gt;&lt;span class="UIIntentionalStory_Names" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;name&amp;quot;}"&gt;                      &lt;/span&gt;&lt;span class="UIStory_Message"&gt;चंद्राला कोण हलवू शकतो ?.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
&lt;span class="text_exposed_hide"&gt;...&lt;/span&gt;&lt;span class="text_exposed_show"&gt;.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
चंद्र-SHAKER  :P :P&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
चालले लगेच रजनीकांत रजनीकांत बोंबलत :D :D&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>आवरा वरून साभार ...</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post_14.html</link><category>rajani</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Mon, 14 Feb 2011 01:04:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-1513096112326379304</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3 class="UIIntentionalStory_Message" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;msg&amp;quot;}"&gt;&lt;span class="UIStory_Message"&gt;झंप्या: काल जंगलातून भटकत असताना माझा वाघाशी  सामना झाला&lt;br /&gt;
आमच्या मध्ये खूप जोरदार झटापटी झाली...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रजनीकांत:  मग, पुढे काय झालं?&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
&lt;span class="text_exposed_hide"&gt;...&lt;/span&gt;&lt;span class="text_exposed_show"&gt;....&lt;br /&gt;
झंप्या: पुढे काय.... मी पळून गेलो....&lt;br /&gt;
रजनीकांत:  हे..हे...हे.. भित्रा!! मी असतो तर...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
झंप्या: अये गप ए!! मी  वाघाचे प्राण वाचावे म्हणून पळालो; कारण 'Only 1411 are left'&lt;br /&gt;
नाहीतर  सगळे मला ओळखून आहेतच&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>आवरा वरून साभार ...</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2011/02/blog-post.html</link><category>valentine fever</category><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Mon, 14 Feb 2011 01:02:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-2872777173347899548</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3 class="UIIntentionalStory_Message" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:&amp;quot;msg&amp;quot;}"&gt;&lt;span class="UIStory_Message"&gt;Valentine  Fever आतापासूनच ....&lt;br /&gt;
झम्प्याची  गर्लफ्रेंड ...खूप लाडात येऊन त्याला म्हणते..&lt;br /&gt;
" या वेळेस मला  ना..Valentine Day ला ...महागडी गिफ्टच पाहिजे.. "&lt;br /&gt;
झंप्या लगेच  म्हणतो.." हो चालेल..."&lt;br /&gt;
त्याची गर्लफ्रेंड लगेच उत्सुकतेने विचारते... "  सांग ना सांग ना मला काय देणार ..? "&lt;br /&gt;
&lt;span class="text_exposed_hide"&gt;...&lt;/span&gt;&lt;span class="text_exposed_show"&gt;झंप्या पण थोडीच गप बसणार..&lt;br /&gt;
" तो लगेच  म्हणतो...हो एक किलो कांदे न एक लिटर पेट्रोल !!!"&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;/div&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title/><link>http://rohitghanwat.blogspot.com/2010/12/blog-post_30.html</link><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Thu, 30 Dec 2010 01:07:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-1560894340291398746</guid><description>&lt;span&gt;सत्य असत्याशी मन केले ग्वाही ! मानियेले नाही बहुमता !!  - संत  तुकोबा&lt;/span&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item><item><title>कृष्णाकाठाचा कर्मयोगी......</title><link>http://rohitghanwat.blogspot.com/2010/12/blog-post_22.html</link><author>noreply@blogger.com (Rohit Ghanwat)</author><pubDate>Wed, 22 Dec 2010 02:11:00 -0800</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-7123244686992103322.post-5849957996159784121</guid><description>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhP7Iwp7qY6Ur9OXyXGCWaheQ5XqOBMRUYoTFhaq84RyN0a0qQ7nkJpfJIuejLIrmFv5AfWHv_oaqSPuV8GCzAn9M5QXxNAR8fjlmRJBrLhHbeJ0ErcpZEQaI0mQy2jWx2635RridptmbrP/s1600/epaperimages_22122010_22122010-md-asa-3_191831562.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhP7Iwp7qY6Ur9OXyXGCWaheQ5XqOBMRUYoTFhaq84RyN0a0qQ7nkJpfJIuejLIrmFv5AfWHv_oaqSPuV8GCzAn9M5QXxNAR8fjlmRJBrLhHbeJ0ErcpZEQaI0mQy2jWx2635RridptmbrP/s640/epaperimages_22122010_22122010-md-asa-3_191831562.JPG" width="484" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;</description><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" height="72" url="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhP7Iwp7qY6Ur9OXyXGCWaheQ5XqOBMRUYoTFhaq84RyN0a0qQ7nkJpfJIuejLIrmFv5AfWHv_oaqSPuV8GCzAn9M5QXxNAR8fjlmRJBrLhHbeJ0ErcpZEQaI0mQy2jWx2635RridptmbrP/s72-c/epaperimages_22122010_22122010-md-asa-3_191831562.JPG" width="72"/><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total></item></channel></rss>