<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:blogger='http://schemas.google.com/blogger/2008' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd="http://schemas.google.com/g/2005" xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-6045913265078590229</id><updated>2024-09-25T03:28:11.252+05:30</updated><category term="अस्मिता"/><category term="जीवन"/><category term="मराठी"/><category term="राजकारण"/><category term="इंजिनियर"/><category term="डॉक्टर"/><category term="दहशतवाद"/><category term="दिल्ली"/><category term="नोकरी"/><category term="पब्लिक"/><category term="पाकिस्तान"/><category term="पेशावर"/><category term="भविष्य"/><category term="महाराष्ट्र"/><category term="मुंबई"/><category term="राजमत"/><category term="लोकल"/><category term="विद्यार्थी"/><category term="शिक्षण. शिक्षणसंस्था"/><title type='text'>आनंद रंग</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://coolgraphica.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default?redirect=false'/><link rel='alternate' type='text/html' href='http://coolgraphica.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>आनंद</name><uri>http://www.blogger.com/profile/17833128567706221967</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='https://img1.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>3</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6045913265078590229.post-387527638417479908</id><published>2015-04-01T16:17:00.000+05:30</published><updated>2015-04-01T16:17:47.984+05:30</updated><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अस्मिता"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जीवन"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="दहशतवाद"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पाकिस्तान"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पेशावर"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मराठी"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="राजकारण"/><title type='text'>संधिसाधू राजकारणी</title><content type='html'>&lt;div dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: left;&quot; trbidi=&quot;on&quot;&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
पाकिस्तानातील
 पेशावर येथे एका शाळेवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबाराने 
अनेक कोवळ्या मुलांचे प्राण घेतले, अनेक मुलांना जायबंदी केले. जि मुले 
वाचली त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारच करवत नाही. प्रसार
 माध्यमांनी या बातमीचे हल्ले वाचकांवर सुरु केले. जगातील मान्यवर लोकांची 
टिप्पणी ते ट्वीप्पणी, निधर्मी ते स्वधर्मी लोकांच्या राग, लोभ, द्वेष, 
मत्सर आदी रसांनी ओतप्रोत वाहणारी मनोगते, शब्दबंबाळ रकाने यांचा भडीमार 
करण्याची ही आयती संधी सोडली नाही. कशी सोडणार? हेच तर ते विकतात. फेसबुक, 
Whatsapp सारख्या आभासी जगात तर दोन परस्पर विरोधी भावनांच्या, 
विचारांच्या, संवेदनांच्या नद्या अगदी दुथडी भरून वाहात होत्या .... त्यात 
एक &quot;झाले ते अतिशय वाईट झाले. दहशतवादाचा समूळ नाश करायलाच हवा&quot; आणि दुसरी 
याच्या विरोधी &quot;अतिशय उत्तम झाले ... पाकिस्तान सारख्या देशात हे आज ना 
उद्या होणारच होते ... आमच्या इथे आतंक पसरवून लाडू वाटता, जल्लोष करता 
काय?&quot; काही जण होते मध्येच गटांगळ्या खाणारे जे म्हणत होते कि &quot;पाकिस्तान 
बद्दल झाले याचे काही वाटत नाही कारण आपला एक नंबरचा शत्रू आहे पण त्या 
बिचाऱ्या लहान मुलांना कशाला मारायचे.&quot; त्यामुळे जे झाले त्याच्या बद्दल 
सामान्य नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था वाढवण्या साठी कारणीभूत ठरले 
फेसबुकी आभासी विश्व.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
इतिहासातले
 दाखले देत आमच्या ऑफिस मध्ये चर्चेला उधाण आले होते. गट अर्थात वर नमूद 
केल्या प्रमाणे ३ .... जहाल, मवाळ आणि या दोन्ही मध्ये नसलेले.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
मवाळ:
 &quot;कुठलीही हिंसा वाईटच हो मग ती कुठे का केली असे ना? मानवता हाच सर्व 
श्रेष्ठ धर्म. आणि त्यांनी पण म्हटले आहेच कि अशी हिंसा इस्लाम ला मंजूर 
नाही म्हणून. अश्याच दहशतवादा मुळे आपले कित्ती नुकसान झाले आहे. सकाळी 
मुले शाळेत जातात आणि मग बातमी येते कि शाळेत दहशतवादी आले आणि त्यांनी 
हिंसा केली. काही माणुसकी नाहीच या दहशतवाद्यांना. इतक्या निरागस मुलांवर 
बंदुकीची नळी ठेवून तिचा चाप तरी कसा ओढता येतो? उगीच कुठल्याही धर्माला 
टार्गेट करून हे लोकं सगळ्यांनाच दहशतवादी म्हणून मोकळे होतात. याचा 
सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि निष्पाप जीवांच्या आत्म्याला शांती 
मिळण्यासाठी १ मिनिटाची शांतता पाळली पाहिजे किंवा कॅण्डल मार्च केला 
पाहिजे&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
जहाल:
 &quot;काही नाही ... मेणबत्त्या कसल्या लावताय? निषेध कसले नोंदवताय? त्या 
देशाची तीच लायकी आहे. आज पर्यंत आपल्या देशात घुसून आपल्या माणसांना 
मारल्यावर कधीच तुम्ही इतक्या सहिष्णू प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तुम्ही 
काळे फोटो चढवता एक दिवसा पुरते किंवा मेणबत्ती लावून मोकळे होता. अल कायदा
 सारख्या सापाला आश्रय दिल्यावर एक ना एक दिवस तो पकड्याना चावणारच होता. 
आणि लहान मुलांचे म्हणाल तर ती मोठी झाल्यावर आपल्या विरूद्धच गरळ ओकणार 
ना? आणि तसेही त्यांच्या धर्माच्या कृपेने खोऱ्याने मुले असतात त्यांना.&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
मवाळ:
 &quot;अरे रे ... किती निष्ठुर विचारांचे आहात ... बोलवते तरी कसे तुम्हाला हे 
सगळे? आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवणार. आज ना उद्या त्या 
दहशतवाद्याना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होईलच.&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
जहाल:
 &quot;काही पश्चात्ताप वगैरे होत नाही. याना लहानपणापासून जिहादाचेच शिक्षण 
दिलेले असते. यांच्या मदराश्यांमध्ये इतर शिक्षणापेक्षा हिंदू द्वेषाचे डोस
 पाजले जातात. नुसते निषेध पाळून यांना काही फरक पडणार नाही. सर्व 
शक्तीनिशी लष्करी कारवाई करून यांचे समूळ उच्चाटन करायला हवे. आज इस्त्रायल
 सारखा छोटासा देश या सगळ्यांना पुरून उरतो कारण त्या लोकांचा प्रखर 
राष्ट्रवाद आणि देशभक्ती. स्वराज्य आणि सुराज्य ची स्थापना करण्यासाठी 
शस्त्र हाती धरायची तयारी हवी मेणबत्त्या नाही.&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
या
 सगळ्या गोंधळात हरवलेला मी सकाळी आल्या आल्या बाबू चहावाल्याची आतुरतेने 
वाट बघत होतो. माझ्या मनातल्या या वैचारिक वादळावर त्याचे शब्द म्हणजे 
अक्सीर इलाज. पण हा पठ्ठा आज नेमका उशीर करत होता आणि मला परत त्या 
वर्तमानपत्रातील भूतकाळाच्या&amp;nbsp;काळ्या सावल्यांकडे बघायची देखील इच्छा 
नव्हती. संगणक चालू करून कामाला सुरुवात केली खरी पण बाबूचा कटिंग चहा 
प्यायल्या शिवाय चालना मिळणे कठीण झाले होते. आजूबाजूच्या कोलाहलात देखील 
बाबूच्या चहाचा सुगंध लपून राहिला नाही. मनात म्हटले आला एकदाचा हा बाब्या.
 खरे तर तो माझ्या जागेवर येई पर्यंत धीर धरणे भाग होते.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
तो
 आल्या आल्या चहा भरताना मी विचारले &quot;काय रे बाबू ... आज उशीर केलास? मला 
वाटले तु पण निषेध नोंदवायला गेलास कि काय? किंवा मेणबत्ती घेऊन उभा राहिला
 आहेस कि काय?&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;काय
 बोलताय साहेब??? कसला निषेध?? कसली मेणबत्ती ??? ज़रा सकाळी दूध मिळायला 
उशीर झाला म्हणून तुम्हाला चहा द्यायला उशीर झाला. तुम्हाला काय वाटले त्या
 लोंढया मध्ये हा बाबू पण सामिल झाला की काय?&quot; इति बाबू.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;हो
 मग ... तुला कधीच एवढा उशीर होत नाही आणि सध्या इतके वातावरण तापलेले आहे 
की काय विचारु नकोस. वर्त्तमान पत्राचे पाहिले पान वाचावेसेच वाटत नाही. 
गेले दोन तिन दिवस तर सारख्या त्या दहशतवाद्यांच्या आणि त्या पाकिस्तानच्या
 बातम्या रकाने च्या रकाने भरून वाहत आहेत&quot;.....&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;अहो
 साहेब&quot; माझे बोलणे मध्येच थांबवत बाबू म्हणाला आणि मी पण जरा सावरून बसलो.
 &quot;सगळे वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत ... भारतातले लोक किती सहिष्णु 
आहेत. पाकिस्तान सारख्या कट्टर जन्मजात शत्रु वर आलेल्या संकटाने इथे 
लोकांना किती मानसिक धक्का बसला आहे आणि किती दुःख झाले आहे. पाकिस्तान 
दहशतवादाला कधीच थारा देणार नाही असे बरेच काही बाहि लिहून आले असेल पण 
पाकिस्तानची भुमिका ही कधीच भारताच्या दृष्टीने चांगली राहिली नाहिये. अगदी
 इथे जेंव्हा धुमश्चक्री चालु होती तेंव्हा तिथे आनंदाच्या उकळ्या फूटत पण 
असतील आणि हे सुद्धा आपल्याला प्रसार माध्यमांनी रंगवुन सांगितले असेल 
तिथल्या मुठभर लोकांच्या प्रतिक्रिये वरुन. तिथल्या सामान्य माणसाला काय 
वाटते हे कायम गुलदसत्यात राहिले आहे. तिथल्या नागरिकाला भारतिया प्रमाणे 
स्वातंत्र्य नाही. आणि सहिष्णुता व्यक्त करणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर 
अतिशय महत्वाचे पाऊल आहे.&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
(कमाल आहे याला अंतरराष्ट्रीय राजकारण कधी समजायला लागले? एका संभ्रमावस्थेतून दुसऱ्या संभ्रमावस्थेत मेंदुचे भ्रमण होत होते.)&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;आमच्या
 चायवाल्याने देखील हेच केले. त्याच्या कडून उकळीची अपेक्षा असताना हा 
फुंकर मारून मोकळा झाला त्याच बरोबर जम्मू काश्मीर मधील जनतेचा रोष होणार 
नाही याची तजवीज करुन ठेवली. इतके वर्षानी तिथे होणाऱ्या निवडणुकी मध्ये 
भाजपाला काही आशा निर्माण झाली आहे ती हा अशीतशी फुकट जाऊ देईल होय?? 
पाकिस्तानशी बोलणी नाकारुन त्याने आधीच आपली चाल खेळला आहे. त्यात काश्मीर 
मधील पुराग्रस्त भागाला पूर्ण सहाय्य दिल्या मुळे तेथील जनतेला प्रथमच 
भाजपा बद्दल विश्वास निर्माण होतोय. अश्या वेळी आमचा हा बनिया उगीच तोंडाची
 वाफ घालवणार नाही.&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
(मनात विचार आला बापरे काय बडबडतो हा. कस्स कळते याला?? इतका सारासार विचार करण्याची कुवत आपल्यात का नाही.)&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;आता
 इकडच्या लोकांचे म्हणाल तर स्वधर्मी आणि निधर्मी यांचा कलगी तुरा कायम 
बघायला मिळणार. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ... एक नसेल तर दुसऱ्याला 
किंमत नाही. तसे दोघेही आतातायीच ... एकाने बोंब मारायचा अवकाश दूसरा लगेच 
शिमगा करायला तैयार. कालांतराने दोघेही विसरून नविन संधी शोधत बसतात.&quot;&lt;br /&gt; बाबू आता निर्वाणीचा टोला हाणणार हे माझ्या सकट त्याच्या इतर श्रोत्यांच्या ध्यानात आले होते.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;एक
 सांगा हे दोन्ही पक्ष आपल्या घरात म्हणजेच भारतात काही झाले तर कुठल्या 
बिळात लपून बसलेले असतात??? रोजच्या रोज होणारे स्त्रियां वरचे अत्याचार, 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पैश्यांचे घोटाळे अश्या वेळेस यांचे वाग्बाण कसे 
काय निष्प्रभ होतात. नक्षलवादी जेंव्हा आपल्याच पोलिसदलाची कत्तल करतात, 
सिमेवरून शेजारी घुसखोरी करतात त्याच्या विरुद्ध साधा ब्र निघत नाही 
यांच्या तोंडातून. काहिनाही हे सगळे एकजात संधीसाधू आहेत. ज्यांना काही काम
 नाही तेच असे बेताल विषय घेऊन चघळत बसतात. आधीच्या मुद्द्यांचा चावून 
चावून चोथा झाला की आपली प्रसार माध्यमे आणि राजकारणी दूसरा विषय चघळायला 
देतात आणि यांचा रावंथ परत सुरु होतो. या पेक्षा आपण बरे आणि आपले काम 
बरे.... चहा घ्या ... थंड होईल.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
खरच या बाकीच्या चालु असलेल्या वादापेक्षा बाबुचा तरतम विश्लेषक संवाद अधिक मोलाचा ... त्याच्या अमृततुल्य चहा प्रमाणेच.&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://coolgraphica.blogspot.com/feeds/387527638417479908/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment/fullpage/post/6045913265078590229/387527638417479908' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default/387527638417479908'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default/387527638417479908'/><link rel='alternate' type='text/html' href='http://coolgraphica.blogspot.com/2015/04/blog-post_1.html' title='संधिसाधू राजकारणी'/><author><name>आनंद</name><uri>http://www.blogger.com/profile/17833128567706221967</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='https://img1.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6045913265078590229.post-3517747688862726514</id><published>2015-03-13T16:12:00.000+05:30</published><updated>2015-03-13T16:12:51.536+05:30</updated><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="इंजिनियर"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जीवन"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="डॉक्टर"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="भविष्य"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="विद्यार्थी"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="शिक्षण. शिक्षणसंस्था"/><title type='text'>&quot;मार्क्स&quot;वादी जीवन</title><content type='html'>&lt;div dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: left;&quot; trbidi=&quot;on&quot;&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
आपली
 शिक्षण संस्था म्हणजे एक कारखाना आहे कारखाना. मुल शाळा नामक चार 
भिंतीमध्ये आलं की सगळी यंत्रे फिरायला लागतात. आणि १०-१२ वर्षात पुस्तकी 
गिलावा लागलेला दगड बाहेर पडतो मग तो दगड बरेचदा आपल्या आजूबाजूचे ऐकून 
अजून एका कारखान्यात दाखल होतो. तिथे ५-७ वर्ष राबून &quot;पदवी&quot; नावाचे वेष्टन 
मिळते आणि त्या दगडाचा &quot;पदवीधर&quot; होतो. या दोन कारखान्यात फरक इतकाच की 
नंतरच्या कारखान्यात तुम्हांला आयुष्यभर कश्याप्रकारे पैसे मिळतील ते ठरवता
 येतं. उदा. पास्कलचा दाब पारेषणाचा नियम मी शाळेत कधीतरी शिकलो. तोच 
महाविद्यालयातही शिकलो. काय उपयोग आहे त्याचा व्यवहारात? आज फुग्याला पिन 
मारली तर फुगा आवाज होऊन फुटतो हे लहान पोराला देखील कळते. अनावश्यक 
प्रमेये, व्याख्या, अर्धवट इतिहास अश्या अनेक प्रकारच्या हालअपेष्टा या एका
 तपात सहन कराव्या लागतात. सहन का कराव्या लागतात कारण पर्याय नव्हता आणि 
परिस्थितीचे अनुमान नव्हते, माहितीचा प्रसार झाला नव्हता. पुस्तकी ज्ञान 
भरपूर मिळाले पण प्रात्यक्षिक/प्रायोगिक बाबतीच भोपळाच हाती आला.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
आता
 ची स्थिती अशी नाही. माहिती तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सहजसाध्य झाल्या 
आहेत. मुलांचा कल बघून आपणच त्यांना त्या बाबतीत प्रोत्साहन द्यायला हवे. 
सक्षम, स्वावलंबी आणि संस्कारी मुल असणे हे जास्त महत्वाचे आणि भविष्यात 
अधिक गरजेचे आहे. या धकाधकीच्या जगात भरारी मारण्यासाठी देवाने आपल्या 
मुलांना पंख दिलेले आहेतच. त्या पंखाना बळ द्या, किती उंच उडायचं, कुठे 
विश्रांती घ्यायची, कुठे आणि केंव्हा घरटे बांधायचे याची जाणीव द्या. पण हे
 करतानाच त्यांच्या पंखाना आपली पिसे चिकटवू नका. आपल्या पिढीत अजूनही आई 
वडिलांच्या मर्जीचा, सल्ल्याचा, मार्गदर्शनाचा विचार केला जातो. अपवाद बरेच
 आहेत आणि ते वाढत आहेत याची खंत पण आहे आणि त्यामुळेच पुढची पिढी आपल्याला
 जाब विचारू शकेल याची खात्री वाटते. &quot;मला डॉक्टर व्हायचे होते पण 
तुम्हांला इंजिनियरींग आवडते म्हणून तुम्ही मला इंजिनियरिंग मध्ये करियर 
करायला लावून माझ्या जीवनाचे वाट्टोळे केलेत&quot; हे ऐकण्याची वेळ उतार वयात 
आपल्या पिढीवर येऊ नये हीच इच्छा. माणूस पाच हजारात पण सुखी राहू शकतो आणि 
पन्नास हजार पण पुरत नाहीत त्यामुळे त्याला महत्व नाही. विद्या असेल तर 
लक्ष्मी झक मारत येईल असं म्हणताना विद्या म्हणजे फक्त अभियांत्रिकी, 
वैद्यकीय किंवा व्यवस्थापन हेच विषय नाहीत हे ध्यानात असावे. आपल्या 
मुलांना नुसतं &quot;गुण&quot;वान बनवण्यापेक्षा &quot;प्रज्ञावंत&quot; बनवण्याचा प्रयत्न 
करा.....मार्कांची रेस फक्त १२वी - १५वी पर्यंतच ...जिंदगीकी रेस बहुत दूर 
तक जाती है मेरे दोस्त.&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://coolgraphica.blogspot.com/feeds/3517747688862726514/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment/fullpage/post/6045913265078590229/3517747688862726514' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default/3517747688862726514'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default/3517747688862726514'/><link rel='alternate' type='text/html' href='http://coolgraphica.blogspot.com/2015/03/blog-post.html' title='&quot;मार्क्स&quot;वादी जीवन'/><author><name>आनंद</name><uri>http://www.blogger.com/profile/17833128567706221967</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='https://img1.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6045913265078590229.post-2614535913879757390</id><published>2015-02-26T12:20:00.001+05:30</published><updated>2015-02-26T12:21:40.091+05:30</updated><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अस्मिता"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="दिल्ली"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="नोकरी"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पब्लिक"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मराठी"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="महाराष्ट्र"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मुंबई"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="राजकारण"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="राजमत"/><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="लोकल"/><title type='text'>मुंबई ला कोण वेगळे करणार?</title><content type='html'>&lt;div dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: left;&quot; trbidi=&quot;on&quot;&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
आमच्या
 ऑफिस मध्ये येणारा बाबू चहावाला मोठा आसामी. त्याचे व्यावहारिक तर्क पण 
आसाम चहा सारखेच एकदम कड़क. मुळात कोकणातला असल्याने साखरेचा हात सढळ असला 
तरी जिभेवर गोडवा कमीच. बेताची उंची, गोल वाटोळे शरीर, चहाच्या रंगाशी 
साधर्म्य सांगणारा ताम्बुस काळपट रंग, कंगव्याची गरज न भासेल इतपतच 
केशसांभार उरलेला, कपाळावर जमिनीला समांतर जाणाऱ्या २ ठसठशीत मस्तकरेषा आणि
 नाकाच्या सरळ रेषेत उर्ध्वगामी ओढलेले अष्टागंधाचे बोट. पांढरा शुभ्र शर्ट वजा डगला
 आणि खाली विविध डाग लागलेली मळखाऊ पैंट. ऑफिसच्या जिन्या खालीच एका 
टेबलावर हा गेली कित्येक वर्ष चहाचा धंदा करतोय आणि आमची अमृततुल्य तृष्णा 
भागवतोय. रोज सकाळी डाव्या हातात चहाची किटली आणि उजव्या हातात काचेचे 
ग्लास घेऊन ही मूर्ती आमच्या दरवाज्यात हजर होते. मस्त आलं आणि पातीचहा 
घालून केलेल्या चहाचा सुवास याच्या येण्याची वर्दी देतो.&lt;br /&gt;
&lt;a name=&#39;more&#39;&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
प्रत्येकाला
 चहा देत देत त्याच्या तोंडाची टकळी कायम चालू असते. सगळ्यांशीच त्याचे 
विशेष सख्य नसले तरी आमच्या दोन चार जणांच्या टेबला पाशी मात्र त्याचे 
गप्पांचे फड जमतात. त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय म्हणजे राजकारण, 
सामान्य पब्लिक, टिव्ही वरच्या मालिका आणि क्रिकेट. त्याचे प्रवचन चालते 
आम्हाला दिलेला चहा संपे पर्यंतच ... एकदा का आमच्या हातातील कप रिते झाले 
कि बाबू &quot;छोट्याश्या ब्रेक नंतर पुन्हा भेटू&quot;म्हणून पसार होतो आणि परत कधी 
भेटला कि उरलेले प्रवचन पूर्ण करतो. ते जर केले नाही तर कदाचित रात्री झोप 
लागत नसावी किंवा दुसर्या दिवशी चहाची चव बिघडत असावी असा माझा दाट संशय 
आहे.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
मला
 बरेच वेळा आश्चर्य वाटायचे कि हा साधा चहावाला एवढ्या वेगवेगळ्या विषयावर 
आपले मत समर्थपणे कसे मांडू शकतो. &quot;काय नाय साहेब .... डोळे आणि कान उघडे 
ठेवले कि मुंबई मध्ये सगळ्या गोष्टी कळतात. शिक्षण धड झाले नाही .. मामा 
मुंबईला घेऊन आला. बघता बघता सगळ शिकवलं मुंबई ने&quot;. खरेच आहे त्याचे म्हणा.
 कित्येक प्रकारचे रंगाचे ढंगाचे लोकं त्याच्या इथे चहा प्यायला येत असतील 
आणि याला फुकटात बातमी पुरवत असतील याचा काही नेम नाही. आमच्या साठी मात्र 
त्याच्या अमृततुल्य चहा सोबत मिळणारे ज्ञानामृत सकाळी सकाळी आमची गात्रे 
जागृत करून जायची. अशीच ही बाबूची खुमासदार चहाट(वा)ळकी तुमच्यासाठी पण....&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;अहो
 साहेब ... हे लोकं वेडे का खुळे?&quot; बाबू कपा मध्ये चहा ओतत म्हणाला. &quot;शिकले
 सवरलेले हे लोकं काय ना काय कुरापती उचकून काढतात आणि त्या आमच्या सारख्या
 चहावाल्याला उगीच त्रास देत राहतात&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;अरे देवा! आता तुझे टेबल उचलून नेले कि काय त्या अतिक्रमन विरोधी माणसांनी?&quot; आमच्या ऑफिस बॉयचा उगीच खोचक प्रश्न.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;नाय
 रे गणेश, माझ्या टेबलाला हात नाय लावू देणार ... रीतसर पावती फाडतो मी आणि
 आपल्या बिल्डींगच्या आवारात असल्याने कुणाची पण हिम्मत नाय&quot; बाबुला मध्येच
 कुणीतरी प्रश्न विचारला कि बाबूचे कान वाकडे होतात आणि त्याला बाबू 
त्याच्या मूड प्रमाणे किंवा प्रश्न विचारणार्याची पत बघून वाटेला लावतो.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
(इथे
 आमच्या सारखा चहावाला म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून ती व्यक्ती म्हणजे 
साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हांला गेल्या सहा महिन्यात कळायला 
लागले होते. त्यामुळे मी हा प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. ज्या दिवशी
 मोदी निवडून आले त्या दिवशी बाबू ने आम्हां सगळ्यांना फुकट चहा पाजला होता
 तो किस्सा परत कधी तरी)&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;अहो
 साहेब, आता मला सांगा तुमच्या ऑफिस मध्ये नवीन साहेब कश्या साठी येतो?? 
धंदा वाढवण्यासाठीच ना??? मग मुंबई चा विकास करण्यासाठी आमच्या चायवाल्याने
 जर कुणी साहेब आणायचे ठरवले तर यांच्या पोटात का दुखतंय?&quot; बाबू माझ्या 
उत्तराची वाट बघत होता.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;अरे
 बाबू असे काय करतोस. उद्या तुझ्या घरात येऊन तुला कुणी शहाणपणा शिकवायला 
लागले तर चालेल का?? आता काही जणांना वाटते कि मुंबई महाराष्ट्रा पासून 
वेगळी करण्याचा दिल्लीश्वराचा डाव आहे त्याला कोण काय करणार? आणि या आधी 
देखील असे प्रयत्न झालेले आहेत मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचे. 
शेवटी उठाव झाला, मराठी बांधवांचे रक्त सांडले आणि मुंबई सह संयुक्त 
महाराष्ट्राची स्थापना झाली. शेवटी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा 
प्रश्न आहे ना?&quot; चहाचा घुटका घेत घेत बाबूच्या तोंडून काहीतरी श्रवणीय 
ऐकायला मिळावे या उदात्त हेतूने मी माझ्या तोंडाची वाफ मोकळी केली.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;कसली
 हो मराठी अस्मिता??&quot; बाबूच्या या पहिल्याच वाक्याने आजचे निरुपण एकदम 
झक्कास होणार याची खात्री दिली. &quot;मराठी माणूस राहिलाय का या मुंबई मध्ये? 
सगळे पळाले विरार, डोंबिवली, बदलापूर सारख्या उपनगरांमध्ये. अहो इथे दोन 
मराठी माणसे देखील एकमेकांशी इंग्रजी किंवा बम्बैय्या हिंदी मध्ये बोलतात. 
आज कुठलाही मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबई मध्ये घर घेण्याचे स्वप्न देखील 
बघू शकत नाहीत. दुकानाच्या पाट्या मराठीत करा असा फतवा ठाकर्यांच्या राज ने
 काढला होता ... पण तेरड्याचे रंग तीन दिवस. त्याने पण पब्लीशिटी ष्टंट 
करून हवा तयार केली &quot;राज&quot;कारणाची. तो अगदी मराठी माणसाच्या भविष्यासाठी गळे
 काढत असला तरी सध्या त्याला विचारतेय कोण? आणि तसेही हे राजकारणी लोकं 
आपल्या सोयीचे बघतात.&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
बाबूची
 गाडी सुसाट सुटली होती आणि ती आता राजकारण नावाच्या स्टेशन वर बराच वेळ 
रेंगाळणार हे नक्की. ते ऐकण्या साठी अजून चार पाच कानाच्या जोड्या 
सरसावल्या. बाबूचे प्रवचन चालू असताना बाकी कुणी मध्ये बोलायचे नाही हा 
दंडकच असल्याने प्रत्येक जण आता ही प्रभृती काय सांगणार या आशेवर चहा चा 
आस्वाद घेत होती.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&quot;राजकारणी
 लोकं पण मोठे बेरकी ... मुद्दा नसला कि असे काही ठेवणीतले विषय 
अस्मितेच्या नावाखाली भिजत ठेवायचे. अहो असे थोडीच एखादे शहर वेगळे करता 
येईल ??? काहीतरी कायदा असेलच ना? मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी पण 
सगळी बकाल करून ठेवली या लोकांनी. येणारे परप्रांतीयांचे लोंढे, वाढणारी 
गर्दी याच्या कडे मतांच्या बेगमी करीता डोळेझाक करणारे राजकारणी. याच 
भस्मासुराचा व्यवस्थेवर पडणारा ताण आणि विस्कटलेली मुंबई ची घडी. खरे तर जे
 आज मराठी अस्मितेचा कैवार घेऊन नाचत आहेत त्यांचीच तर सत्ता आहे मुंबई वर 
गेली कित्येक वर्ष. मुंबई बद्दल बाहेरचा कुणी बोलायला लागला कि यांना आठवते
 मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र, हुतात्मा दिवस पण मुंबई मधून मराठी 
टक्का घसरत असताना हेच राजकारणी कुठल्या श्रींच्या वाड्यावर लपून बसतात कोण
 जाणे.&quot; बाबूच्या वाणीतून अविरत शब्द गळत होते.&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
अर्थात
 खरच होतं त्याचे म्हणणे. पण कुणाला पडली आहे इथे? इथे कामकरी, कष्टकरी 
वर्गच जास्त. उपनगरातून मुंबई मध्ये यावे, ८-१० तास काम करावे आणि झोपायला 
आपल्या घरी जावे. कधी रिक्षा वाले छळतात तर कधी ऑटोवाले संप करतात. 
उपनगरीय रेल्वे वेळेत चालली अशी स्वप्न पडली तरी भीती वाटते गाडी 
चुकण्याची. कधी नळाला पाणी नाही तर कधी ४ - ४ तास वीज नाही. या सगळ्या 
भानगडीत मुंबईत मध्ये वावरत असतो तो अस्मिता पिचलेला मराठी माणूस....&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
कपातला
 चहा संपत आला तरी मनात बाबूच्या बोलण्याचे विचारचक्र सुरूच होते. जाता 
जाता बाबू म्हणाला &quot;साहेब काय हरकत आहे .... अजून एक मोठा साहेब आला आणि 
त्यांनी काही सुधारणा केली तर? आणि आमच्या चायवाल्याने आधीच सांगितले आहे 
तो असे पर्यंत मुंबई महाराष्ट्रा पासून दूर करणार नाही मग कसली चिंता?&quot;&lt;/div&gt;
&lt;div data-mce-style=&quot;text-align: justify;&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
(साप्ताहिक राजमत मध्ये पूर्व प्रकाशित) &lt;/div&gt;
&lt;/div&gt;
</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://coolgraphica.blogspot.com/feeds/2614535913879757390/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment/fullpage/post/6045913265078590229/2614535913879757390' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default/2614535913879757390'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6045913265078590229/posts/default/2614535913879757390'/><link rel='alternate' type='text/html' href='http://coolgraphica.blogspot.com/2015/02/blog-post_26.html' title='मुंबई ला कोण वेगळे करणार?'/><author><name>आनंद</name><uri>http://www.blogger.com/profile/17833128567706221967</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='https://img1.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry></feed>