<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml-stylesheet type="text/xsl" media="screen" href="/~d/styles/rss2full.xsl"?><?xml-stylesheet type="text/css" media="screen" href="http://feeds.feedburner.com/~d/styles/itemcontent.css"?><rss xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearch/1.1/" xmlns:georss="http://www.georss.org/georss" xmlns:gd="http://schemas.google.com/g/2005" xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0" xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0" version="2.0"><channel><atom:id>tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291</atom:id><lastBuildDate>Tue, 31 Jan 2012 05:26:54 +0000</lastBuildDate><category>महायुद्धे</category><category>आठवणी</category><category>संगीत</category><category>विज्ञान</category><category>चित्रपट</category><category>ब्लॉगविश्व</category><category>रुचिरा</category><category>इतर</category><category>रजनीकांत</category><category>निसर्ग</category><category>समाज</category><category>खरेदी</category><category>मन</category><category>मुलाखती</category><category>इतिहास</category><category>क्रिकेट</category><category>तत्वज्ञान</category><category>मांजर</category><category>पुस्तके</category><category>विनोद</category><category>भंकसगिरी</category><category>भाषा</category><title>Random Thoughts</title><description /><link>http://rbk137.blogspot.com/</link><managingEditor>noreply@blogger.com (Raj)</managingEditor><generator>Blogger</generator><openSearch:totalResults>104</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="self" type="application/rss+xml" href="http://feeds.feedburner.com/blogspot/uIlTf" /><feedburner:info uri="blogspot/uiltf" /><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="hub" href="http://pubsubhubbub.appspot.com/" /><feedburner:emailServiceId>blogspot/uIlTf</feedburner:emailServiceId><feedburner:feedburnerHostname>http://feedburner.google.com</feedburner:feedburnerHostname><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8358797118887740041</guid><pubDate>Mon, 30 Jan 2012 08:33:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-31T10:56:54.910+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतिहास</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">समाज</category><title>इंडिया आफ्टर गांधी :  एका अनपेक्षित देशाचा इतिहास</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;/div&gt;
शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही याबद्दल शंका वाटते. शाळेत शिकलेल्या इतिहासाबद्दल आणखी एक रोचक मुद्दा म्हणजे हा इतिहास गौतम बुद्ध, सम्राट अशोक यांच्यापासून ते टिळक, गांधी यांच्यापर्यंत भरभरून बोलत असे. मात्र १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे सांगून हा इतिहास तिथेच थांबत असे. नंतर १९५० मध्ये घटनेची स्थापना किंवा नंतरच्या पंचवार्षिक योजना यांचे काही उल्लेख येत, पण गेल्या पन्नास वर्षात नेमके काय घडले, काय अडचणी आल्या याबद्दल बहुतकरून मौन बाळगलेले असे. (सध्याचा अभ्यासक्रम पाहिलेला नाही त्यामुळे त्यात बदल केला असल्यास चांगलेच आहे.) &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रा. रामचंद्र गुहा यांचे 'इंडिया आफ्टर गांधी' हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास शक्य तितक्या निष्पक्षतेने मांडण्याचा प्रयत्न करते. प्रा. गुहा यांनी देश आणि परदेशातील मान्यवर संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले. नंतर बंगलोर येथे स्थायिक होऊन लेखन करण्याचा निर्णय घेतला. 'इंडिया आफ्टर गांधी'साठी त्यांचा २०११ चे साहित्य अकादेमी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षातील घटनांचा आढावा घेताना प्रा. गुहा अनेक स्त्रोतांचा दाखला देतात. पुस्तके, लेख, लोकसभेतील नोंदी हे आहेतच, याशिवाय विविध व्यक्तींची खाजगी कागदपत्रे, सीबीआय/पोलिस यांचे अहवाल, गुप्तचर खात्याचे गोपनीय अहवाल असे अनेक संदर्भ यात येतात. संदर्भसूची जवळपास नव्वद पानांची आहे यावरून संशोधनाची व्याप्ती लक्षात यावी. प्रा. गुहा यांनी याआधी भारतातील पर्यावरणवादी किंवा क्रिकेट खेळाचा इतिहास यासारख्या विषयांवर पुस्तके लिहीली आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची सर्व कारकीर्द एका तर्‍हेने 'इंडिया आफ्टर गांधी' या पुस्तकासाठी केलेली दीर्घ (आणि काहीशी यातनामय ) अशी पूर्वतयारी होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा तत्कालीन इतिहासाशी परिचय असणे सर्वात महत्वाचे
 आहे. देश ज्या परिस्थितीत आहे तिथपर्यंत तो कसा पोचला हे जाणून घेणे रोचक 
आहेच शिवाय प्रसारमाध्यमांमधून देशाचे जे चित्र बहुतकरून रंगवले जाते, ते 
कितपत बरोबर आहे हे ही यावरून उमजायला मदत होते. अर्थात हे शाळेत शिकवले 
गेले नाही तर लोक यापासून अनभिज्ञ राहतात असे अजिबात नाही. पुस्तके, लेख, 
चर्चा इ. माध्यमांमधून या इतिहासाचे विविध पैलू समोर येत असतातच. पण यात एक
 धोका असतो. बहुतेक पुस्तके - चरित्रे, आत्मचरित्रे, तेंव्हाच्या घटनांची 
प्रत्यक्ष वर्णने करणारी पुस्तके - एकांगी असण्याची दाट शक्यता असते. अशा 
वेळी या पुस्तकांची इतर माहितीसूत्रांशी तुलना करून त्यात सत्याचा अंश किती
 हे ठरवावे लागते आणि हे ठरवणारा इतिहासकार शक्य तितका निष्पक्ष असायला 
हवा. ( असे झाले नाही तर काय होते याचे एक ठळक उदाहरण म्हणजे लॅरी कॉलिन्स 
आणि डॉमिनिक लापिएर यांचे 'फ्रीडम ऍट मिडनाइट' हे गाजलेले पुस्तक. 'इंडिया 
आफ्टर गांधी' वाचल्यानंतर 'फ्रीडम ऍट मिडनाइट' अतिरंजित वाटायला लागते. 
प्रा गुहा यांच्या मते 'फ्रीडम ऍट मिडनाइट' मधील लॉर्ड माउंटबॅटन यांचे 
चित्रण पक्षपाती आहे. त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे आणि 
त्यांच्या योगदानाचे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण आहे.)&amp;nbsp; पुस्तकांपेक्षाही 
माहितीचा अधिक धोकादायक स्त्रोत म्हणजे चर्चा, मग त्या घराघरात चालणार्‍या 
असोत की वेगवेगळ्या च्यानेलवरच्या. अशा चर्चांमधील बहुतेक सर्व सहभागी 
व्यक्तींची मते ठाम असतात. त्यात पूर्वग्रहांचा वाटा बराच असतो, घटनांकडे 
एकाच चश्म्यातून पाहिले जाते.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-YhD3Iaetnhg/TyZUuYcU-QI/AAAAAAAAAcc/SDRsbXcwRPw/s1600/india-after-gandhi.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-YhD3Iaetnhg/TyZUuYcU-QI/AAAAAAAAAcc/SDRsbXcwRPw/s320/india-after-gandhi.jpg" width="211" /&gt;&lt;/a&gt;या पुस्तकात प्रा. गुहा १९५० ते १९९० या काळातील घटनांचा क्रमवार परिचय करून देतात. पुस्तकाच्या सुरूवातीलाच ते तकालीन इतिहासाची नोंद करण्यामधील धोके कोणते आहेत याची जाणीव करून देतात. सम्राट अशोकाबद्दल वाचताना वाचकांचे मत बहुतकरून तटस्थ असते कारण त्या काळाशी घनिष्ठ परिचय नसतो. मात्र गेल्या पन्नास वर्षातील घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल वाचकांची आणि इतिहासकाराचीही ठाम मते असतात. इतिहासकाराने नोंदवलेल्या घटनांचा वाचक सरळसरळ विरोध करू शकतात. बरेचदा इतिहासकारही नकळत पूर्वग्रहांच्या प्रभावाखाली येऊ शकतो. १९९० नंतरच्या घटना मांडताना प्रा. गुहा या मुद्याला अधोरेखित करतात. साधारणपणे तत्कालीन इतिहासाची मर्यादा ३० वर्षे ठरवली जाते. याचे कारण ३० वर्षांनंतर त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन तटस्थ होऊन भावनांची तीव्रता कमी झाली असेल अशी अपेक्षा असते. या कारणासाठी प्रा. गुहा १९९० नंतर नोंदवलेल्या घटनांना इतिहास न म्हणता शोधपत्रकारितेचे नाव देतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
गेल्या दहा-बारा वर्षांत भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था हा एक चमत्कार मानला जातो आहे. प्रा. गुहा यांच्या मते खरं तर याहून मोठा चमत्कार आधीच घडून गेला आहे आणि घडतो आहे पण त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. हे म्हणजे पी. सी. सरकारांनी आधी ताजमहाल अदृश्य करावा, तेंव्हा प्रेक्षक शांत. मग पिशवीतून ससा काढून दाखवावा आणि त्याला टाळ्या मिळाव्यात तसे काहीसे झाले आहे. हा चमत्कार आहे भारताच्या अस्तित्वाचा. निरनिराळे राजकारणी, विश्लेषक, संशोधक गेली शंभर वर्षे भारताची शकले कधी होणार यावर पैजा लावून बसले होते. स्वातंत्र्य मिळायच्या आधी भारताला स्वातंत्र्य दिले तर ते विघातक ठरेल ही चर्चिल आणि इतर इंग्रज अधिकार्‍यांची आवडती सबब होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक दशकात ज्या घटना घडल्या त्यानंतर जगभरात 'आता लोकशाही संपणार, इतर आशियाई देशांप्रमाणेच भारतात सैन्यदलाचे राज्य येणार' असे अंदाज वर्तवले जात होते. सुरूवातीला हे केवळ पाश्चात्य देशांपुरते मर्यादित होते, पण ८० च्या दशकामध्ये काही भारतीय विश्लेषकही असा विचार मांडत होते. दर वेळेस अत्यवस्थ दिसणारी लोकशाही परत नव्या जोमाने उभी राहीली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणीही या लोकशाहीला मुळापासून नष्ट करू शकली नाही. समाजशास्त्राचे नियम, युरोपियन इतिहासावरून बांधलेले आडाखे या सर्वांना न जुमानता भारत अजूनही एकसंध आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारताची गेल्या पन्नास वर्षांतील वाटचाल बघताना स्टीव्ह जॉब्जचे प्रसिद्ध 'कनेक्ट द डॉट्स' भाषण आठवते. आता साधारण वाटणार्‍या घटना भविष्यामध्ये अभूतपूर्व महत्वाच्या ठरतात. स्वातंत्र मिळाल्यानंतर नेहरू आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेले काही निर्णय नंतर फार महत्वाचे ठरले. वर चर्चांमधून दिशाभूल होण्याचा उल्लेख आला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे कोणत्याही चर्चेत नेहरूंचा उल्लेख आला की १९६२ चा चीनकडून झालेला पराभव आणि काश्मिर प्रश्नाची बेजबाबदार हाताळणी हे दोनच मुद्दे प्रामुख्याने चर्चेला असतात. अशा चर्चा ऐकल्या तर यापलिकडे नेहरूंचे काही कर्तुत्व होते किंवा नाही अशी शंका यायला लागते. प्रा. गुहा याचे सविस्तर आणि सखोल उत्तर देतात. इथे उदात्तीकरण किंवा 'फिल गुड' असा हेतू नसून एका प्रदीर्घ कारकीर्दीचे योग्य मूल्यमापन करणे हा उद्देश आहे हे ध्यानात घ्यायला हवे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर कोणत्या पद्धतीचे सरकार असावे यावर कॉंग्रेसमध्ये बराच खल झाला. अमेरिका आणि युरोपमधील सरकारांचा अभ्यास करून अखेर लोकशाही पद्धत निवडण्यात आली. काही निरीक्षकांच्या मते वसाहत राजवटीमधून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांसाठी हुकूमशाही अधिक योग्य असते कारण या देशातील लोक लोकशाहीसाठी तयार नसतात. इंडोनेशिया किंवा पाकिस्तानचे उदाहरण भारतानेही स्वीकारले असते तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. भारतात सैन्यदलाची हूकूमत कधी येणार याबद्दलही बरीच चर्चा होती. यासंबंधात नेहरूंचे विचार किती स्पष्ट होते याचे उदाहरण स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगातून दिसते. पहिल्या झेंडावंदनाच्या प्रसंगी आम जनतेला ध्वजाजवळ येण्याची परवानगी देऊ नये असे मत तत्कालीन सैन्यदलाच्या ब्रिटीश प्रमुखांनी व्यक्त केले होते. नेहरूंनी त्यांना लिहीलेल्या उत्तरामध्ये 'सैन्यदलाचे काम सरकारला लागेल ती मदत करण्याचे आहे, धोरण ठरवण्याचे नाही' असे ठणकावले. नंतरही जनरल करियप्पा यांचा सरकारी कामात हस्तक्षेप होतो आहे हे लक्षात आल्यावर नेहरूंनी त्यांना समज दिली होती. याचा परिणाम म्हणजे नंतरच्या काळात परिस्थिती कितीही बिकट असली तरीही सरकारच्या कामात सैन्यदलाने हस्तक्षेप केल्याचे एकही उदाहरण नाही. आपल्या शेजारच्या देशातील परिस्थिती पाहिली तर ही किती चांगली गोष्ट आहे याची खात्री पटावी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उद्योगधंद्यांवरील चर्चांमध्ये नेहेमी भारताची तुलना जपानशी केली जाते. प्रा. गुहा एक उलटी तुलना करतात. भारताची घटना निश्चित करण्याचे ठरल्यानंतर देशभरातील जनतेकडून यासाठी सुचवण्या मागवण्यात आल्या.&amp;nbsp; १९४६ ते १९४९ या काळात ११ सत्रांमध्ये चर्चा केल्यानंतर ११ खंड आणि ३४९ कलमे असलेली भारताची घटना अस्तित्वात आली. याच काळात जपानची घटनाही अस्तित्वात आली. फरक हा की ही घटना २४ अमेरिकन लोकांनी (त्यातील १६ सैन्यदलातील होते) एका खोलीत बसून तयार केली. नंतर जपानी संसदेत घटनेवर चर्चा झाली पण कोणतीही दुरूस्ती करण्यासाठी अमेरिकन अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक होती. याउलट १९३० मध्येच कॉंग्रेसने आमची घटना आम्हीच तयार करू असे इंग्रज अधिकार्‍यांना सांगितले होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज सरकारच्या काळात अस्तित्वात आलेल्या प्रशासकीय सेवेचे - इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे - काय करायचे असा प्रश्न आला. काही मंडळींची मागणी होती की आयसीएस बरखास्त करावी. याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय नेत्यांना तुरूंगवासात पाठवण्यामागे आयसीएसचा महत्वाचा सहभाग होता आणि यासाठी ही नेते मंडळी त्यांच्यावर नाराज होती. पण नेहरू आणि सहकार्‍यांनी आयसीएसचे कौशल्य आणि ताकद ओळखून त्यांना भारतीय सरकारमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचूक असल्याचा पहिला दाखला दोन वर्षातच मिळाला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका पार पाडण्याचे शिवधनुष्य पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी यशस्वीपणे पेलून दाखवले.&amp;nbsp; याखेरीज गांधीवादापासून फारकत घेऊन भारताला उद्योगधंद्यांमध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून पहिल्या आणि दुसर्‍या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अनेक महत्वपूर्ण पावले उचलली. नेहरूंनी नंतरच्या काळात केलेल्या चुका हिमालयाएवढ्या होत्या. त्याची जबाबदारी त्यांच्याकडे जातेच. पण नेहरूंचे किंवा त्यांच्यानंतर आलेल्या शास्त्रींचे राजकारण मूल्याधिष्ठीत होते हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. याउलट इंदिरा गांधींपासून व्यक्तीनिष्ठ राजकारणाची सुरूवात झाली, आधीचे सर्व निकष बदलले. आणीबाणीच्या काळात व्यक्त झालेली एक टिप्पणी या बाबतीत बोलकी आहे. "नेहरू आज असते तर त्यांनाही तुरूंगात जावे लागले असते आणि तिथून त्यांनी परत आपल्या मुलीला पत्रे लिहीली असती."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सर्व नियमांना अपवाद ठरून भारत अजूनही का तग धरून आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रा. गुहा उपसंहारात देतात. भारतीय माणसाची वृत्ती स्वाभाविकपणे लोकशाहीकडे झुकणारी आहे. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये मतदानाशी आधी कधीही संबंध न आलेल्या बहुतांशी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. नंतरही काश्मिर किंवा इतर भागात अतिरेक्यांच्या धमक्या जनतेला मतदानापासून रोखू शकल्या नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विविधता. जागतिक इतिहासात विविध भाषा, संस्कृतीचे लोक आपापली ओळख कायम ठेऊन एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र आल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. अमेरिकेत हे घडले पण भारताच्या अगदी उलट तर्‍हेने. अमेरिका 'मेल्टींग पॉट' म्हणून ओळखली जाते. जगभरातील लोक एकत्र येऊन अमेरिकन संस्कृती स्वीकारतात. याउलट भारतात 'सॅलड कल्चर' आहे, प्रत्येक वेगळी संस्कृती आपली ओळख कायम ठेवते. सुरूवातीला पाश्चात्य निरीक्षकांना अशा सरमिसळीतून एकसंध राष्ट्र उभे राहू शकेल यावर विश्वास बसत नव्हता. सध्या युरोपियन युनियनमध्ये हाच प्रयत्न चालू असताना किती अडचणी येत आहेत ते आपण पहातोच. भारतात हे घडू शकले याचे मुख्य कारण 'सॅलड संस्कृती' आणि विशेषत: भाषावार प्रांतरचना आहे असे प्रा. गुहा म्हणतात. असे केले नसते तर काय झाले असते याची उदाहरणे जवळच आहेत. श्रीलंकेत जवळजवळ अर्ध्या भागात तमिळ लोक असूनही त्यांच्यावर सिंहली भाषा लादण्यात आली, त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. पूर्व पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर पहिल्याच दिवशी भाषणात जिना यांनी पाकिस्तानमध्ये बंगाली भाषेला कोणतेही स्थान नाही, त्यांना उर्दू शिकावी लागेल असे स्पष्ट सांगितले. बांग्लादेश निर्मितीची बीजे इथेच रोवली गेली. कॉंग्रेसमध्ये १९२० पासूनच भाषावार प्रांतरचना असावी असे मत व्यक्त केले जात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंचा विचार बदलला पण सुदैवाने देशभरातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्यांनी याला मान्यता दिली. यामुळे प्रत्येक प्रांताची ओळख अबाधित राहीली आणि आज 'अनेकता में एकता' सारखी वाक्ये म्हणता येऊ लागली. आज अमेरिकेत हिस्पॅनिक लोकांची संख्या लक्षणीय आहे, मात्र राजकारणी लोकांचे धोरण 'मेल्टींग पॉट' संस्कृती सोडेल अशी चिन्हे दिसत नाहीत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आजच्या भारतात नेमकी काय परिस्थिती आहे? आपली खरंच प्रगती होते आहे का? अशा प्रश्नांना बहुतेक वेळा 'ब्लॅंकेट जनरलायझेशन' या प्रकारात मोडतील अशी उत्तरे मिळतात. 'काय होणार या देशाचं' या चालीवर म्हटलेली वेगवेगळ्या कवींची गाणी निरनिराळ्या सुरांमध्ये ऐकायला मिळतात. या प्रकाराशी बराच चांगला परिचय आहे कारण एकेकाळी अशी गाणी गाण्यात माझाही आवाज होता. बहुतेक वेळा याच्या मुळाशी परदेशात दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या वरवरच्या परिस्थितीशी केलेली तुलना असते. पण भारत आणि अमेरिका किंवा युरोप यांच्यामध्ये मूलभूत फरक आहेत, ते लक्षात घेतले नाहीत तर अशा तुलना बहुतांशी निरर्थक ठरतात. फ्रेंच किंवा जपानी लोकांच्या भाषाप्रेमाचे उदाहरण नेहेमी दिले जाते. भारतात असे होणे शक्य नाही कारण प्रत्येक माणसाला किमान तीन भाषा शिकाव्याच लागतात. फ्रेंच लोकांचे भाषाप्रेम त्यांच्या राष्ट्रप्रेमाला कारणीभूत ठरले आणि या आणि यासारख्या उदाहरणांवरून भारतासारखा देश एकसंध राष्ट्र म्हणून कधीही टिकू शकणार नाही असे अंदाज कित्येक दिग्गजांनी वर्तवले. मुळात युरोपियन इतिहासावरून भारताविषयी अंदाज वर्तवणे फारसे बरोबर नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारताचा इतिहास पाहिल्यावर आणखी एक गोष्ट जाणवते. व्यवस्थापन शास्त्रामध्ये &lt;a href="http://management.about.com/cs/generalmanagement/a/Pareto081202.htm"&gt;८०-२०&lt;/a&gt; चा नियम असतो. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीमध्ये २० % ना बाकीच्या ८० % पेक्षा अधिक महत्व असते. उदा. तुम्ही ज्या गोष्टी करता त्यातील २० % गोष्टी खरोखर महत्वाच्या असतात. आपल्या राजकारण्यांकडे पाहिल्यावर हा देश कसा चालतो असा प्रश्न कुणालाही पडावा. इथे हा नियम लागू होतो असे वाटते. याचे एक उदाहरण म्हणजे आतापर्यंत आलेले कोणतेही सरकार पाहिले तर असे दिसते की त्यांनी कितीही गलथान कारभार केला तरीही काही कामे अशी केली ज्यामुळे देशाच्या प्रगतीला अभूतपूर्व अशी कलाटणी मिळाली. नेहरूंचे योगदान वर आलेच आहे, इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये बांग्लादेश प्रश्नावर जागतिक दबावाला न जुमानता निर्णायक भूमिका घेतली. मिझोराम, पंजाब करार आणि देशातील दूरसंचार क्षेत्रातील क्रांती राजीव गांधींमुळे झाली तर खुल्या अर्थव्यवस्थेचे सर्व श्रेय नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना जाते. अगदी आणीबाणीनंतर आलेल्या अल्पायुषी जनता सरकारनेही आणिबाणीच्या काळात केलेल्या लोकशाहीच्या विरोधातील घटनादुरूस्त्या बदलल्या आणि आणीबाणी लागू करायला मंत्रीमंडळाची परवानगी हवी असा महत्वाचा बदल केला. देश का चालतो तर देशातील २० % लोक जी कामे करतात त्यामुळे बाकीच्या ८० % लोकांचा गलथानपणा चालून जातो. या २० % मध्ये अर्थातच प्रशासकीय सेवेमध्ये असणार्‍या सक्षम अधिकार्‍यांचाही महत्वाचा वाटा आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपली लोकशाही खरी आहे की आभासी? या प्रश्नावर प्रा. गुहा म्हणतात, 'फिफ्टी फिफ्टी'. निवडणुका, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अशा गोष्टीमध्ये आपल्याकडे लोकशाही आहे पण राजकारण, राजकारणी आणि त्यांच्याशी संलग्न संस्था यामध्ये चालणारे व्यवहार बरेचदा लोकशाही दिसत नाही. आजवरच्या इतिहासात काश्मीर, पंजाब आणि नागालॅंड इथे भारतापसून वेगळे होण्यासाठी सर्वात आक्रमक प्रयत्न झाले. आजही जवळपास वीस टक्के भारतामध्ये अशांतता आहे, पण चार पंचमांश भारत शांत आहे. या भागातील जनतेला लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा मिळतो आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चांगली ऐतिहासिक पुस्तके वाचताना होणारा एक रोचक परिणाम म्हणजे त्या कालमानसाची (zeitgeist) स्पष्ट कल्पना येते. मेंदू नेहेमी नवीन अनुभव संदर्भांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत असतो. संदर्भ जितके अचूक असतील तितके नवीन अनुभव आत्मसात करायला सोपे जाते. 'इंडिया आफ्टर गांधी' वाचल्यानंतर पहीली बदललेली चौकट जाणवली ती म्हणजे जुने हिंदी (आणि इतरभाषिक) चित्रपट बघताना येणार्‍या अनुभवाची. सुनील दत्तचे '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=3XWq_FM8_wM"&gt;हम हिंदुस्थानी&lt;/a&gt;' गाणे पूर्वी भाबडे आणि भावुक वाटायचे. आता पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे चित्रपट १९६० चा आहे. दोन पंचवार्षिक योजना यशस्वीपणे अमलात आल्या होत्या, दोन निवडणुका झाल्या होत्या, भिल्लईचा नवीन स्टील प्लांट उभा राहीला होता. भाक्रा-नांगल येथील अजस्त्र धरणाच्या कामाला सुरूवात झाली होती. चीनच्या आक्रमणाला दोन वर्षे बाकी होती. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याची नवलाई अजूनही ओसरली नव्हती. हे सर्व लक्षात घेतल्यावर या भावुकतेबद्दल काहीशी कौतुकमिश्रित भावना होते. आता सीईओ असणार्‍या मुलाच्या लहानपणचे व्हीडीओ बघताना आईवडीलांना वाटत असेल तसे काहीसे. नंतर ६०, ७० च्या दशकातील उलथापालथी बघितल्यावर सत्यजित रेंच्या 'जन अरण्य', 'महानगर' किंवा 'प्रतिद्वंदी' सारख्या सामजिक चित्रपटांमागची भूमिका लक्षात येते. या सर्वांची आधी कल्पना नव्हती असे नाही, पण आता चौकटी अधिक रेखीव झालेल्या जाणवतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आणखीही काही चौकटी बदलल्या असणार. कोणत्या आणि कशा हे कळेल हळूहळू. बदललेली चौकट बरेचदा जाणवतही नाही. मग एके दिवशी अचानक एक ग्लास दिसण्याऐवजी &lt;a href="http://www.hopeonhope.com/wp-content/uploads/2011/11/glass-faces.jpg"&gt;दोन चेहेरे&lt;/a&gt; दिसू लागतात. मग वाटते, 'अरेच्चा, याला ही पण बाजू आहे तर!' &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
--&lt;br /&gt;
चित्र ऍमेझॉनवरून साभार. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-8358797118887740041?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/eZbsHG296hw" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/eZbsHG296hw/blog-post_30.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-YhD3Iaetnhg/TyZUuYcU-QI/AAAAAAAAAcc/SDRsbXcwRPw/s72-c/india-after-gandhi.jpg" height="72" width="72" /><thr:total>1</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2012/01/blog-post_30.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-4174582144627445758</guid><pubDate>Sat, 21 Jan 2012 12:27:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-22T11:44:43.431+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">समाज</category><title>हम बोलेगा तो...</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
तुमच्या घरात उंदीर झाले असतील त्यावर उपाय काय? लोक पिंजरा आणतात, औषधं आणतात किंवा म्याऊला बोलावतात. पण यापेक्षा एक जालीम उपाय आहे. १०-१५ किलो आरडीएक्स आणायचं आणि घर उडवून द्यायचं. एक उंदीर शिल्लक राहीला तर सांगा. इतका सोपा उपाय असताना का बरं कुणीच करत नाही? साधारण याच स्वरूपाचा प्रश्न अमेरिकेतल्या काही शिनेटर लोकांना पडला असेल. सोपा कायद्यानुसार प्रताधिकार संरक्षण करण्यासाठी सोपी युक्ती आहे. प्रताधिकाराचा भंग झालेला दिसला की साइटच उडवून टाकायची. आणि नुसती ती साइट उडवायची नाही तर त्या साइटला गूगलनेही उडवायचे, पेपॅलने तिचे खाते बंद करायचे. म्हंजी बास, बासरी, बासरी वाजिवनारा, त्येला साथ करनारा तबलेवाला आन शिट्ट्या मारनारं पब्लिक - गेले का नाय समद्ये बाराच्या भावात? व्हाट ऍन ऐडीया सरजी! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिनेटर लोकांचा असा जंक्शान प्ल्यान कळल्यानंतर विकीसकट सर्व मुख्य सायटींनी संप पुकारला. त्यात ज्या शिनेटरने हा मतिमंद कायदा लिहीला त्याच्याच सायटीवर प्रताधिकाराचा भंग करणारे &lt;a href="http://www.vice.com/read/lamar-smith-sopa-copyright-whoops"&gt;चित्र&lt;/a&gt; सापडले. या सर्वांचा परिणाम म्हणून सुदैवाने सध्या तरी या बिलांवरची चर्चा पुढे ढकलली गेली आहे. (थोडक्यात विकीलीक्स बंद करण्यासाठी आता नवीन ऐडीया शोधावी लागणार. ज्युलियन असांज, माटीमिले, तेरा सर्वनाश हो, तेरी गोद कभी न भरे.) अर्थात संकट टळलेले नाही.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण क्षणभर असे समजूयात की या शिनेटरांना खरोखरीच प्रताधिकाराची चाड आहे. आजच्या काळात प्रताधिकाराची व्याख्या सुसंगत आहे का? &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुद्दा हा की चित्रे, गाणी, चित्रपट इतक्या सहजासहजी उपलब्ध आहेत की प्रताधिकार भंग करू नका हा प्रश्न म्हणजे तुमचा स्वसंयम किती आहे यावर अवलंबून आहे. हे म्हणजे एखाद्या चिंटूला मिठाईच्या दुकानात बसवून ठेवायचे आणि एकाही मिठाईला हात लावलास तर खबरदार म्हणून सांगायचे. ह्याला फारसा अर्थ नाही. आणि तुम्ही जाणूनबूजून केला नाही तरी तो तुमच्या हातून होणार हे निश्चित. असा कायदा ज्याचा भंग सगळ्यांच्या हातून होतो आहे तो लागू करावा का? प्रश्न 'सोपा' नाहीये. :) &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आंतरजाल अस्तित्वात येण्याच्या आधीही प्रताधिकार भंग होतच होते. मी विकत घेतलेले पुस्तक मित्राला वाचायला दिले तरी प्रताधिकार भंग होतो. कॅसेटमध्ये गाणी भरून घेणे हा ही प्रताधिकार भंगच होता. आंतरजालामुळे हे सर्व करणे अतिशय सोपे झाले आणि मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. याचा एक परिणाम असा की तुम्ही आंतरजाल वापरले की कुठे ना कुठे तुमच्या हातून प्रताधिकार भंग होणारच. यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलेत तर त्यातील बहुसंख्य प्रताधिकार उल्लंघन करणारे असतात. बहुतेक सर्व लेखांमधील चित्रे - चित्रपट परिक्षणात दिलेली चित्रपटातील प्रसंगांची चित्रे - या सर्वांमध्ये प्रताधिकाराचा भंग होतो आहे. यात तुमच्या-आमच्यासारखे आहेतच पण बरेचदा हे मान्यवर सायटींवरही होताना दिसते. उदा. टाइम मासिकात आलेला हा &lt;a href="http://globalspin.blogs.time.com/2011/08/15/how-a-late-bollywood-icon-saved-this-correspondents-life/"&gt;शम्मी कपूरवरचा&lt;/a&gt; लेख बघा. यात शम्मीच्या दोन गाण्यांचे यूट्यूबवरचे दुवे दिले आहेत. पैकी एक राजश्रीचा आहे आणि दुसरा खाजगी आहे. हा प्रताधिकार भंग झाला. मग पाडायची का टाइमची साइट बंद? की सत्यामध्ये भिकू म्हात्रे म्हणतो 'तेरी गर्लफ्रेंड तेरी गर्लफ्रेंड है, मेरी बीवी मेरी बिवी नही है' तसे तुमचा प्रताधिकार तो प्रताधिकार, आमचा प्रताधिकार म्हणजे काय नुसताच उकार? बाय द वे, सोपा अमेरिकेच्या प्रताधिकारांचे संरक्षण करतो पण अमेरिकन लोकांनी इतरांच्या प्रताधिकाराचा भंग केला तर त्याचे काय याविषयी बोलत नाही. म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी सोपा सुसंगत आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेतील जमिनीच्या मालकीहक्काच्या कायद्यात त्या जमिनीच्या वर असलेले आकाशही जमिनीच्या मालकाच्या ताब्यात होते. विमानंचा शोध लागला आणि विमाने उडायला लागल्यावर धडाधड जमिनींवर अतिक्रमणे व्हायला लागली. मग कायदा बदलण्यात आला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इथेही अशाच प्रकारच्या 'पॅराडाइम शिफ्ट'ची गरज आहे. अर्थात हे सोपासारखे बथ्थड कायदे लिहीणार्‍यांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्यापेक्षा स्वत:ची इकॉनॉमी अत्यवस्थ आहे तिच्याकडे बघा, इतर देशांच्या कारभारात नाक खुपसणे बंद करा, लोकशाही - किंवा सगळे जगच - एल. ए. मध्ये सुरु होते आणि वॉशिंग्टनमध्ये संपते हा गोड गैरसमज काढून टाका असे अनेक अनाहूत सल्ले द्यावेसे वाटतात. लेकिन...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-4174582144627445758?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/Iv75SdHef7w" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/Iv75SdHef7w/blog-post_21.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>10</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2012/01/blog-post_21.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-5022056368951256198</guid><pubDate>Fri, 13 Jan 2012 07:00:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-14T00:52:37.086+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">मन</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">समाज</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">विज्ञान</category><title>ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
ताजमहालाच्या समोर राहणार्‍यांना रोज उठून ताजमहाल बघितल्यानंतर काय वाटत असेल? की समोर काय आहे त्यांच्या लक्षातही येत नसेल? अतिपरिचय असल्यावर अशी अवज्ञा अनेक गोष्टींबाबत होते, किंबहुना गोष्ट जितकी वरकरणी सामान्य तितकी असं व्हायची शक्यता जास्त. आपण ज्या गोष्टींना गृहित धरून चालतो, त्या तशा नाहीत हे बरेचदा कळणे अवघड असते. यामागे 'कॉमन सेन्स' वापरून ठरवलेली गृहीतके बरेचदा असतात. मग एखादवेळेस अशा गृहीतकांना मुळापासून हादरा बसतो आणि आतापर्यंत आपण घोड्यासारखी झापडं लावून जगत होतो असं वाटायला लागतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ऑलीव्हर सॅक्स प्रख्यात न्यूरोसाएंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ. त्यांचं 'ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स' हे पुस्तक बर्‍याच दृष्टीकोनातून डोळे उघडायला लावणारं आहे. सॅक्स त्यांच्या विषयात तज्ज्ञ आहेतच, पण ते त्यांच्या रूग्णांकडे केवळ एक रोचक केस म्हणून न बघता त्यांच्यातल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या पुस्तकात ते सात रूग्णांबद्दल बोलतात आणि याच्या अनुषंगाने ते काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. पुस्तक वाचल्यानंतर दृष्टीहीन किंवा स्वमग्न (ऑटिस्टीक) लोकांबद्दल आपल्या समजुतींना परत तपासून बघायची वेळ आली आहे हे प्रकर्षानं जाणवतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="http://3.bp.blogspot.com/--tflycpjq_Q/Tw_WMfvYoNI/AAAAAAAAAas/xf5673_yr1Y/s1600/500x500_1032393_file.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/--tflycpjq_Q/Tw_WMfvYoNI/AAAAAAAAAas/xf5673_yr1Y/s320/500x500_1032393_file.jpeg" width="211" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
सॅक्स यांचा पहिला रूग्ण जोनाथन आय. एक प्रख्यात चित्रकार आहे. न्यूयॉर्कमध्ये ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिस्ट म्हणून त्यानं बरीच वर्ष काम केलं. १९८६ मध्ये कार मधून जात असताना एका ट्रकने धडक दिल्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर रूग्णालयात तपासणी चालू असताना असं लक्षात आलं की त्याला अक्षरं किंवा रंग ओळखता येत नाहीत. काही दिवसांनी अक्षर ओळखता यायला लागली पण तो पूर्णपणे रंगांधळा झाला. कुठलीही गोष्ट त्याला काळ्या-पांढर्‍या आणि राखाडी रंगांमध्ये दिसायला लागली. तो चित्रकार असल्यामुळे याची भीषणता त्याला अधिक जाणवली. याआधी त्याचं जग रंगांवरच आधारलेलं होतं, सामान्य माणसापेक्षा रंगांशी त्याची अधिक जवळीक होती. प्रत्येक गोष्टीच्या रंगांच्या छटा त्याला तोंडपाठ होत्या. अपघातानंतर त्याला स्वत: काढलेली चित्रही परकी वाटायला लागली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपण रंग बघतो तेव्हा नेमकं काय होतं? शाळेत शिकवताना डोळा आणि क्यामेरा यांची जी तुलना केली जाते ती वास्तवापासून इतकी दूर आहे की आता बंद करायला हवी. सफरचंदावरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्यात बर्‍याच तरंगलांबी असतात आणि प्रकाशझोत कसा आहे यावर कोणते तरंग परावर्तित होणार हे अवलंबून असतं पण आपल्याला सफरचंदाचा रंग बदलताना दिसत नाही. मग रंग कोणता हे कुठ ठरतं, डोळ्यामध्ये की मेंदूमध्ये? मेंदूमध्ये रंगांचं विश्लेषण करण्यासाठी एक खास केंद्र असतं. हे केंद्र मेंदूच्या आठवणी आणि इतर भागांशीही संपर्क ठेवून असतं. आपल्याला एखादा रंग 'दिसतो' तेव्हा त्यामागे डोळ्यांनी दिलेली माहिती, आधीच्या आठवणी, आपल्या अपेक्षा या सर्वांचा सहभाग असतो. (एखाद्या भाषेत एखाद्या रंगासाठी शब्द नसेल तर ती भाषा बोलणार्‍या लोकांना तो रंग ओळखता येत नाही. नमिबियातील हिंबा भाषेत निळ्या रंगासाठी शब्द नाही त्यामुळे त्या लोकांना निळा रंग &lt;a href="http://boingboing.net/2011/08/12/how-language-affects-color-perception.html"&gt;ओळखताना&lt;/a&gt; त्रास होतो.) अर्थात लाल रंग दिसल्यावर मेंदूत जी संवेदना निर्माण होते ती म्हणजे लाल रंग हे का, कधी, कसे ठरते हा आणखी मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर कदाचित '&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Qualia%20"&gt;क्वालिया&lt;/a&gt;' म्हणजे नेमके काय हे कळल्यावर/कळले तर मिळू शकेल. (हा प्रश्न न्यूरोसायन्सची होली ग्रेल म्हणून ओळखला जातो.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जोनाथनला सुरूवातीला बसलेला धक्का ओसरल्यानंतर तो सावरला. त्यानं काळी-पांढरी चित्रं काढायला सुरूवात केली. रंग नष्ट झाले पण त्याच्या बदल्यात त्याची नजर घारीसारखी तीक्ष्ण झाली. त्यानं रात्री बाहेर पडायला सुरूवात केली. नंतर एकदा एका डॉक्टरांनी यावर नवीन उपचार करून बघायचे का असं विचारलं पण जोनाथननं त्यांना स्पष्ट नकार दिला.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सॅक्स यांचा आणखी एक रूग्ण चित्रकारच आहे. त्याचं नाव फ्रॅंको मन्यानी. फ्रॅंको इटलीमधील पोंतितो या चिमुकल्या गावात जन्मला आणि वयाच्या बारा वर्षेपर्यंत तिथे राहीला. दरम्यान दुसर्‍या महायुद्धात नाझी सैनिकांनी पोंतितो उध्वस्त केलं. बरीच भ्रमंती केल्यानंतर फ्रॅंकोनं सॅन फ्रान्सिस्को इथं स्थायिक व्हायचं ठरवलं. याच काळात त्याला एका रहस्यमय आजारानं ग्रासलं. याच्या उपचारासाठी त्यानं काही दिवस इस्पितळात काढले. तापामध्ये बरळत असताना त्याला स्वप्नात पोंतितो दिसायला लागलं, तिथली घरं, चर्च, रस्ते. जागा झाल्यावरही हे थांबलं नाही, इस्पितळाच्या भिंतींवर, गादीवर सगळीकडे त्याला पोंतितोची स्पष्ट चित्रं दिसायला लागली. ही चित्रं त्रिमितीमध्ये होती आणि आपण एखाद्या व्हिडिओ गेममध्ये जसं वेगवेगळ्या बाजूंनी बघू शकतो तसं त्याला पोंतितो कोणत्याही कोनातून बघता येत होतं. मग त्यानं भिंतीवर दिसणारं चित्र पेन्सिलीनं गिरवायला सुरूवात केली. लवकरच हातात कधीही ब्रश न घेतलेल्या फ्रॅंकोनं पोंतितोची उत्कृष्ट चित्रं काढायला सुरूवात केली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फ्रॅंकोच्या केसमध्ये सगळंच अद्भुत आहे. त्याला कोणता आजार झाला होता? यामुळं त्याच्या मेंदूवर काय परिणाम झाला?&amp;nbsp; कोणतेही प्रशिक्षण नसताना व्यावसायिक पातळीची चित्रे काढणं त्याला कसं काय शक्य झालं? काही फोटोग्राफर पोंतितोला गेले आणि त्यांनी तिथले फोटो घेतले. फोटो आणि फ्रॅंकोची चित्रे यांची तुलना केल्यावर चित्रांमधील तपशील किती अचूक आहे याची खात्री पटली. आतापर्यंत नेणिवेत असलेली लहानपणची पोंतितोची चित्रं इतक्या स्पष्टपणे जाणिवेत कशी आणि का आली? प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. मात्र हजार-एक चित्रं काढल्यानंतर '&lt;a href="http://francomagnani.com/"&gt;मेमरी आर्टिस्ट&lt;/a&gt;' म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्रॅंकोची चित्रं जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरत आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Tourette_syndrome"&gt;तूरेत सिंड्रोम&lt;/a&gt; जगातील प्रत्येक देश, प्रत्येक वंशामध्ये आढळतो. याची प्रमुख लक्षणं म्हणजे हालचालींवर नियंत्रण नसणे, विशिष्ट हालचाली (समोरच्या वस्तूंना, माणसांना वारंवार स्पर्श करणे) परतपरत करणे, काही शब्द किंवा शिव्या देण्यावर नियंत्रण नसणे इ. ही लक्षणे पाहिल्यानंतर असा माणूस कोणतेही नाजुक काम करण्यास असमर्थ असेल असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डॉ. कार्ल बेनेट कॅनडामध्ये सर्जन आहेत आणि त्यांना तूरेत सिंड्रोम आहे. सॅक्सला हे कळल्यानंतर त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ज्याचे स्वत:च्या साध्या हालचालींवर नियंत्रण नाही तो माणूस सर्जनचे काम कसे करू शकतो? बेनेट यांनी सॅक्सना त्यांच्या दवाखान्यात येऊन शस्त्रक्रिया करताना माझ्याबरोबर स्क्रब करा असे आमंत्रण दिलं. सॅक्स तिथे गेल्यानंतर त्यांनी जे बघितले ते अविश्वसनीय होते. बेनेट त्यांना विमानतळावर घ्यायला आले. गाडी चालवत असताना बेनेट यांच्या हालचाली चालूच होत्या. दोन्ही गुडघे स्टिअरिंग व्हीलच्या समान अंतरावर ठेवणे, समोरच्या काचेला वारंवार स्पर्श करणे इ. मात्र हे करताना गाडीवरचे नियंत्रण एकदाही सुटले नाही. दवाखान्यात शस्त्रक्रिया चालू होण्याआधी सॅक्स आता काय होणार याच्या प्रचंड दडपणाखाली होते. बेनेट यांनी सुरी हातात घेतल्यानंतर त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वात बदल झाला. शस्त्रक्रिया करत असताना त्यांनी एकही अनावश्यक हालचाल केली नाही, त्यांचा हात अतिशय स्थिर होता. अडीच तास शस्त्रक्रिया चालू असेपर्यंत बेनेट यांच्यामध्ये तूरेत सिंड्रोमचा मागमूसही नव्हता. शस्त्रक्रिया संपल्यानंतर परत उड्या मारणे, समोरच्याला स्पर्श करणे वगैरे चालू झालं. यशस्वी आणि विश्वासार्ह सर्जन म्हणून बेनेट यांची ख्याती आहे. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना तूरेत सिंड्रोमसकट स्वीकारले आहे. नंतर लाउंजमध्ये इतर डॉक्टरांबरोबर गप्पा मारताना बेनेट जमिनीवर लोळत, हवेत लाथा मारत होते. सॅक्स परतताना बेनेट यांनी त्यांच्या विमानातून त्यांना कॅलगरीपर्यंत सोडले. विमान चालवतानाही तूरेत कुठेही आडवा आला नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दृष्टीहीन लोकांबद्दल आपले बरेच गैरसमज आहेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे दृष्टीहीनांसाठी सर्वात मूल्यवान भेट म्हणजे दृष्टी. चॅपलिनच्या सिटी लाइट्सपासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली रे झाली की दुसर्‍या क्षणाला पेशंटला दिसायला लागतं. (खरं तर चित्रपट तिथं सुरू व्हायला हवा.) जन्मापासून आंधळ्या असलेल्या व्यक्तींना बघता आलं तर त्यांचा सुरूवातीला आपण काय बघतो आहोत हेच त्यांना कळत नाही कारण त्यांचे सगळे जग स्पर्शांवर आणि आवाजांवर अवलंबून असतं. एका रूग्णाला आपला कुत्रा कोणता आणि मांजर कोणतं हे स्पर्श केल्याशिवाय ओळखता येत नसे. त्यांच्या आधीच्या जगात माणसे येतात आणि जातात. दिसायला लागल्यावर रूंदी, खोली किंवा वेगवान वस्तू यांचा त्यांना अर्थबोध होत नाही.&amp;nbsp; जन्मापासून किंवा बर्‍याच काळ दृष्टी नसलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये या प्रकारची गणिते करण्यासाठी आवश्यक ती वाढ झालेली नसते. अचानक दृष्टी मिळाल्यावर मेंदूवर ताण येतो. बरेचदा रूग्ण डिप्रेशनमध्ये जातात आणि काही रूग्णांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सॅक्स अशाच एका रूग्णाची गोष्ट सांगतात. दृष्टी नसताना आपली सर्व कामे आत्मविश्वासपूर्वक करणारा हा तरूण दृष्टी आल्यानंतर सैरभैर झाला. आपण आपली ओळख गमावली आहे असं त्याला वाटायला लागलं. अखेर ताण सहन न झाल्यानं आणि इतर आजारांमुळे डोळ्यांमध्ये काही दोष नसतानाही त्याला परत अंधत्व आलं. इथे सॅक्स विचारतात, केवळ आपलं जग डोळ्यांवर चालतं म्हणून आपलं आयुष्य आत्मविश्वासानं जगणार्‍या अंध लोकांवर दृष्टी लादणं कितपत बरोबर आहे? अंधत्व जन्मापासून असेल तर मेंदू त्या जगात जगण्यासाठी आवश्यक ती तजवीज करून ठेवतो. त्यांचं जग आपल्यासारखं नसतं पण आपल्याइतकच समृद्ध असतं आणि काही बाबतीत आपल्यापेक्षा जास्त. नेत्रदानाच्या वारेमाप जाहिरातींमध्ये दीर्घकाळ अंध असलेल्या लोकांना दृष्टी मिळाल्यावर ज्या अडचणी येतात त्यांचा विचार केला जातो का? &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तकाच्या शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये सॅक्स एका महत्वाच्या पण गैरसमजांनी भरलेल्या विषयावर बोलतात - स्वमग्नता किंवा ऑटीझम. स्वमग्नतेबद्दल माहिती देताना चित्रफितींमध्ये नेहेमी लहान मुले दाखवली जातात. पण मोठे झाल्यावर ती कशी बनतात याबद्दल फारशी माहिती सहसा मिळत नाही. लहानपणी साधी कामेही न करता येणारी मुले स्वयंपूर्ण आयुष्य जगू शकतात यावर विश्वास बसणे कठीण आहे. पुस्तकाचे शेवटचे प्रकरण संशोधक &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Temple_Grandin"&gt;टेंपल ग्रॅंडन&lt;/a&gt; बद्दल आहे. टेंपल स्वमग्न आहे तरीही अथक प्रयत्न करून तिने प्राणीशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. या क्षेत्रातील तिचे काम उल्लेखनीय आहेच शिवाय स्वमग्नतेवरही तिने स्वत:च्या अनुभवातून बरेच लिखाण केले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
टेंपलला सहा महिन्यांची असताना आईच्या कुशीत स्पर्श झाल्यावर गोठले गेल्याची संवेदना अजूनही आठवते. (स्वमग्न लोकांचे एक वैशिष्ट्य असे की त्यांना अगदी लहानपणीच्या गोष्टीही आठवतात. तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना ते बोलणे, त्याचा टोन, शब्द जसेच्या तसे त्यांच्या मेंदूत नोंदले जातात.) सहा वर्षांची होईपर्यंत तिला बोलताही येत नव्हते. सुदैवाने या काळात मतिमंद मुलांसाठी असलेल्या शाळेत जाण्याची तिला संधी मिळाली. तिथे एक शिक्षिका आणि स्पीच थेरपिस्ट यांनी तिला बोलायला शिकवले. बोलता यायला लागल्यावर जणू एक अडथळा पार झाला. इतर मुलांपेक्षा खूप हळू पण निश्चित अशी प्रगती दिसू लागली. संवाद साधता येत होता पण त्यातील भावना आणि परस्परसंबंध हे तिला गोंधळून टाकत असत, आजही टाकतात. रोमिओ आणि ज्युलिएट वाचल्यावर तिला हे असे का वागतात हे लक्षात येत नाही. ती स्वत:ची अवस्था स्टार ट्रेक मधील यंत्रमानव &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Data_%28Star_Trek%29"&gt;डेटा&lt;/a&gt; सारखी आहे असे मानते. डेटाला माणसांबद्दल खूप उत्सुकता आहे, निरीक्षणातून तो माणसांबद्दल नियम बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे भावनिक व्यवहार त्याला बुचकळ्यात टाकणारे असतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याचा अर्थ टेंपलला भावना म्हणजे काय हे माहित नाही का? असे अजिबात नाही. प्राण्यांशी वागताना तिच्यात आमूलाग्र बदल होतो. तिला नेहेमी गाई, डुकरे यांच्याबरोबर काम करावे लागते. प्राणी दु:खी आहेत की आनंदी, बिथरले असतील तर त्यांना शांत कसे करायचे याची तिला अचूक माहिती आहे. गाईंच्या कत्तलखान्यात चालणार्‍या अमानुष प्रक्रिया बदलण्यात तिचा मोठा वाटा आहे. गाई मारताना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना त्रास होऊ नये यासाठी तिने अनेक उपाय शोधून काढले. प्राण्यांच्या वेदना तिला सहन होत नाहीत पण माणसांबद्दल हे भावनिक बंध तिला ठेवता येत नाहीत. माणसे आणि त्यांचे व्यवहार तिला गुंतागुंतीचे वाटतात. तिचा प्राण्यांच्या देखभालीचा व्यवसाय चालवताना सुरूवातीला तिला अनेक लोकांनी फसवले कारण खोटं बोलणं ही कल्पनाच तिच्या आवाक्याबाहेर होती. मात्र आता अनुभवातून ती सावध झाली आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वमग्नतेवर टेंपलने &lt;a href="http://www.templegrandin.com/"&gt;बरंच काम&lt;/a&gt; केले आहे. स्वत:च्या अनुभवातून स्वमग्न लोकांना काय अडचणी येतात, स्वमग्न मुलांशी कसे वागावे अशा अनेक गोष्टींवर ती मार्गदर्शन करत असते. तिच्या मते स्वमग्नता, स्किझोफ्रेनिया किंवा खिन्नता याबद्दल चीड येणे साहजिक आहे. पण याची दुसरी बाजू अशी आहे की असे लोक बरेचदा प्रतिभावंत असतात. जर हे सर्व आजार मुळापासून दूर केले तर कदाचित जगातील प्रतिभाही नष्ट होईल आणि फक्त अकाऊंटंट लोक शिल्लक राहतील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तक वाचल्यानंतर त्यात विचारलेले प्रश्न वाचून आणखी प्रश्न पडतात. मानसिक दृष्ट्या निरोगी ही अवस्था खरंच अस्तित्वात आहे किंवा नाही अशी शंका येते कारण इथे रोगी आणि निरोगी अशी डिजिटल अवस्था नसते. दृष्टीहीन, मूकबधिर किंवा स्वमग्न लोक आपल्यासारखे जगत नाहीत म्हणून त्यांना आपल्या निकषांवर जगायला लावणे कितपत बरोबर आहे? याऐवजी त्यांना त्यांच्या जगात जास्तीत जास्त मोकळेपणाने कसे जगता येईल हा विचार करणे अधिक योग्य नाही का? &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
परत जाताना सॅक्स यांना टेंपल सोडायला आली तेव्हा ती भावनाविवश झाली होती. सॅक्स लिहीतात, &lt;br /&gt;
&lt;blockquote class="tr_bq"&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; Temple, who was driving, suddenly faltered and wept. "I've read that liabraries are where immortality lies....I don't want my thoughts to die with me....I want to have done something....I am not interested in power or piles of money. I want to leave something behind. I want to make a positive contribution - know that my life has meaning. Right now, I am talking about things at the very core of my existence."&lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; I was stunned. As I stepped out of the car to say goodbye, I said,"I'm going to hug you. I hope you don't mind." I hugged her - and (I think) she hugged me back. &lt;/blockquote&gt;
-----&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीप &lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; टेंपलच्या मते स्वमग्न मुलांना लवकरात लवकर थेरपी मिळणे अत्यावश्यक आहे. हंगरसाइट या संकेतस्थळाने स्वमग्न मुलांसाठी एक योजना केली आहे. &lt;a href="http://hungersite.com/clickToGive/home.faces?siteId=11&amp;amp;link=ctg_aut_home_from_ths_home_sitenav"&gt;इथे जाऊन&lt;/a&gt; रोज क्लिक केलं तर जाहीरातींमधून मिळणारं सर्व उत्पन्न स्वमग्न मुलांच्या उपचारासाठी दिले जातं.&lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; टेंपलने टेडमध्ये दिलेले भाषण &lt;a href="http://www.youtube.com/watch?v=fn_9f5x0f1Q"&gt;इथे&lt;/a&gt; बघता येईल.&lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; चित्र ऍमेझॉनवरून साभार. &amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-5022056368951256198?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/4gB5bB8QsPg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/4gB5bB8QsPg/blog-post_13.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/--tflycpjq_Q/Tw_WMfvYoNI/AAAAAAAAAas/xf5673_yr1Y/s72-c/500x500_1032393_file.jpeg" height="72" width="72" /><thr:total>15</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2012/01/blog-post_13.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-2045325899820861547</guid><pubDate>Fri, 06 Jan 2012 11:07:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-07T09:16:57.558+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतिहास</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">समाज</category><title>बिहाइंड एव्ह्री ग्रेट फॉर्च्यून...</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
जागतिक इतिहासामध्ये इ.स. १४०० च्या पुढची काही शतके महत्वाची मानली जातात. रेनेसान्स हा काळ इटालियन भाषेत रिनाशिता (Rinascita) असाही ओळखला जातो. रिनाशिता याचा अर्थ पुनर्जन्म. साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये आविष्कारांचा सुवर्णकाल म्हणता येईल असा रेनेसान्स, नंतर एनलायटनमेंट आणि औद्योगिक क्रांती या सर्व घडामोडींचे जगावर दूरगामी परिणाम झाले. या सर्वांचा उल्लेख करताना बहुतेक इतिहासकारांच्या वर्णनांमध्ये गर्व, अभिमान इ. भावनांच्या छटा आढळतात.&amp;nbsp; अर्थात सर्वच इतिहासकार पूर्वग्रहदूषित नसतात पण इतिहास जेत्यांकडूनच लिहीला जातो हे पूर्वापार चालत असलेले मत जेते आणि पराभूत यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती बदलली असतानाही दुर्दैवाने बरेचदा खरे ठरते आहे. याचे एक उदाहरण नियाल फर्गसन यांच्या 'सिव्हिलायझेशन : द वेस्ट ऍण्ड द रेस्ट' या पुस्तकामध्ये दिसते. &lt;a href="http://www.guardian.co.uk/books/2011/feb/20/niall-ferguson-interview-civilization"&gt;फर्गसनच्या &lt;/a&gt;मते जगाची आजची प्रगत अवस्था इंग्लंड, फ्रान्स, स्पेन&amp;nbsp; इ. देशांनी शतकानुशतके इतर देशांवर केलेल्या राज्यांचा परिणाम आहे. इंग्लंडला आपल्या 'कलोनियल' भूतकाळाचा अभिमान वाटला पाहिजे. या भूतकाळाबद्दलचे नैतिक प्रश्न त्याच्या दृष्टीने गौण आहेत. पाश्चात्य संस्कृतीने अंगिकारलेल्या विविध गुणांमुळे ती राष्ट्रे वरचढ ठरली पण आता इतर राष्ट्रांनीही ते गुण आत्मसात केले आहेत.&amp;nbsp; थोडक्यात पाश्चात्य लोकांनो, जागे व्हा, 'साम्राज्य' धोक्यात आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रत्येक घटनेचे - विशेषत: ती ऐतिहासिक घटना असेल तर - अनेक पैलू असतात, तिचे चांगले आणि वाइट दोन्ही प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. अशा वेळी फक्त चांगले परिणाम लक्षात घेऊन त्या घटनेचे समर्थन करणे मूर्खपणा आहे. ६५० लाख वर्षांपूर्वी डायनॉसॉर नष्ट झाले, नंतर आताचे सस्तन प्राणी उत्क्रांत होऊन बलाढ्य झाले आणि त्यातून माणूस अस्तित्वात आला. जर डायनॉसॉर नष्ट झाले नसते तर काय झाले असते?&amp;nbsp; त्याचप्रमाणे युरोपियन साम्राज्यांनी जगावर राज्य केले नसते तर जगाची प्रगती थांबली असती का? कुणी सांगावे? इतिहासात जर-तरला अर्थ नसतो. याच न्यायाने अमेरिकेत मंदी आली हे एका प्रकारे बरेच झाले असे म्हणता येईल. निदान इराकच्या आजूबाजूचे देश आक्रमणापासून तरी वाचले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला इटलीमध्ये फ्लोरेन्स या शहरात कलाविष्कारांचा अतुलनिय संगम झाला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कलाकार एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत होते. व्यापाराच्या निमित्ताने अरब देशांशी किंवा टर्कीमधील बलाढ्य ऑटमन साम्राज्याशी असणारा संपर्कही यासाठी फायदेशीर ठरला. यातून पुढे अनेक क्षेत्रांमध्ये नवीन विचार, नवीन संकल्पना आल्या. छापखान्याच्या शोधामुळे आतापर्यंत काही लोकांपर्यंत सिमित असलेले विचार घरोघरी पोचू लागले. याच काळात मजेलन, कोलंबस, वास्को द गामा यांच्या प्रयत्नांमुळे नव्या जगाचा शोध लागला. दक्षिण अमेरिका, भारत, इंडोनेशिया येथील समृद्धीच्या बातम्या युरोपात पोचल्यावर या प्रदेशांवर वर्चस्व मिळवण्याची एकच चढाओढ सुरू झाली. नंतरच्या काही शतकांमधील इतिहास आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका येथील स्थानिक रहीवासी आणि युरोपियन साम्राज्ये यांच्यातील कटू संघर्षांचा साक्षीदार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा इतिहास वाचताना मला एक विरोधाभास प्रखरपणे जाणवत राहतो. रेनेसान्स आणि एनलायटनमेंट हा काळ माणसाला सुसंस्कृत बनवणारा म्हणून ओळखला जातो. (परत इथे माणूस म्हणजे पाश्चात्य माणूस असाच अर्थ घ्यायला हवा. अन्यथा इजिप्त, चीन, भारत अशा अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींची भरभराट या काळाच्या आधीपासून चालू होती.) निक्कोलो मकियवेल्ली याने लिहीलेले इल प्रिंचिपे - द प्रिंस हे आदर्श राजा कसा असावा यावरचे पुस्तक किंवा कास्तिलोयोने याने समाजात वागण्याच्या नियमांचे - एटिकेट्सचे - द कोर्टियर हे पुस्तक - ही तेव्हाच्या युरोपमध्ये बेस्टसेलर पुस्तके होती. कोणत्याही विषयावर अधिकारवणीने बोलू शकणारा, समाजात कुठे कसे वागावे याची माहिती असणारा आदर्श पुरूष म्हणून ओळखला जाणारा रेनेसान्स मॅन याच काळात जन्माला आला. थोडक्यात आधीच्या अंधारयुगात टोळीयुद्धे करणारा युरोपियन माणूस या काळात सभ्य आणि सुसंस्कृत बनायला सुरूवात झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण हाच सुसंस्कृत माणूस जेव्हा घरापासून दूर परक्या संस्कृतींमध्ये गेला तेव्हा काय झाले? त्याने आपला सर्व सुसंस्कृतपणा सोईस्करपणे बाजूला ठेवला आणि त्या भागातील स्थानिकांवर मन मानेल तसे अत्याचार केले. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला मेक्सिकोच्या स्थानिकांची लोकसंख्या २५० लाख होती. स्पॅनिश आक्रमणानंतर इ. स. सोळाशेमध्ये ही संख्या दहा लाखावर आली. यात युरोपियन लोकांनी बरोबर आणलेल्या कांजण्यासारख्या रोगांचाही समावेश होता आणि युद्ध, अविचारी नरसंहार यांचाही. या काळात येथील सोन्याचांदीच्या खाणींमधून युरोपमध्ये दरवर्षी हजारो किलो सोने आणि चांदीची वाहतूक होत होती. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जगातील जास्तीत जास्त प्रदेश बळकावून आपले सामर्थ्य वाढवणे ही त्या काळातील प्राथमिक गरज होती. पण घरी सालस आणि सुसंस्कृत वागणारा युरोपियन बाहेरच्या देशांमध्ये इतका क्रूर का झाला? डिकन्स, ऑस्कर वाइल्डसारखे संवेदनशील लेखक आणि बर्नाड शॉ, बर्ट्रांड रसेल सारखे विचारवंत इंग्लंडमध्ये असतानाही त्यांना भारतातील ब्रिटीश राज्याची अमानुषता जाणवू नये याला काय म्हणावे? कॉनन डॉयलच्या होम्सकथांमध्ये भारतातून लुटून आणलेल्या संपत्तीचे उल्लेख बाजारातून भाजी आणावी तितक्या सहजपणे येतात! किपलिंगने तर '&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/The_White_Man%27s_Burden"&gt;व्हाइट मॅन्स बर्डन&lt;/a&gt;' मध्ये नेटिव्हांना सुसंस्कृत करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे अशी चोराची उलटी ठोकली. यातील दांभिकता लक्षात न येण्याइतकी सटल होती का? चर्चिलसारख्या चतुरस्त्र आणि दूरदृष्टी असणार्‍या नेत्याची भारताबद्दलची मते आणि त्याच्या अनुषंगाने त्याने केलेली कृत्ये हे बघितल्यावर 'धिस वॉज देअर फाइनेस्ट अवर' म्हणणारा नेता तो हाच का असा प्रश्न पडतो. हे आपल्या कृत्यांचे रॅशनलायझेशन म्हणावे की मानवी स्वभावातील गुंतागुंत? कदाचित गांधीजींना हा विरोधाभास कुठेतरी आतून जाणवला असावा. 'तुम्हालाच तुमच्या अमानुषतेची जाणीव होईल आणि मग तुम्ही इथून परत जाल' ही त्यांची प्रतिक्रिया आरसा दाखवणारी होती. [१] (भारताला स्वातंत्र्य यामुळे मिळाले किंवा कसे किंवा असा मार्ग पत्करण्याचे फायदे आणि तोटे कोणते हे निराळे विषय आहेत.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तेव्हाचा भारतीय समाज हा ही संशोधनाचा विषय ठरावा. आपल्या पारतंत्र्यामागे स्थानिक लोकंमध्ये एकी नसणे, स्वकीयांविरूद्ध परकीयांशी हातमिळवणी अशी अनेक कारणे होती. '&lt;a href="http://www.amazon.com/Antique-Land-History-Guise-Travelers/dp/0679727833"&gt;इन ऍन ऍंटीक लॅंड&lt;/a&gt;' या पुस्तकात अमिताभ घोष एक वेगळा मुद्दा मांडतात.&amp;nbsp; वास्को द गामाच्या जहाजातून पोर्तुगीज खलाशी जेव्हा इथे आले तेव्हा इथली सुबत्ता आणि संपत्ती पाहता तेव्हाच्या राजाला नजराणे देण्यासाठीही त्यांच्याकडे योग्य वस्तू नव्हत्या. स्थानिक आणि पाहुणे यांच्यातील आर्थिक विषमता नंतरच्या आक्रमणाला कारणीभूत झाली हे उघडच आहे. पण स्थानिक लोक या आक्रमणासाठी तयार नव्हते याचे एक कारण हे ही आहे की याची त्यांना गरज वाटली नाही. जेव्हा एखाद्या देशावर केलेले आक्रमण आपल्यावर झालेल्या आक्रमणाइतके यशस्वी ठरते तेव्हा या घटनेची पराभूतांच्या दृष्टीकोनातून दखल घेतली जात नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला चाकूच्या धाकावर लुबाडणारा दरोडेखोर या दोघांमध्ये सुसंस्कृत कोण? की सुसंस्कृतपणा फक्त काट्या-चमच्यांनी खाणे किंवा लोकांसाठी दारे उघडणे अशा वरवरच्या गोष्टींपर्यंतच मर्यादित आहे? &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फर्गसनच्या पुस्तकामागची वृत्ती चिंताजनक आहे. इराकवर केलेले आक्रमण इराकच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केले होते अशी आत्मप्रौढीचा वास येणारी सारवासारव याच मनोवृत्तीतून केली जाते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तक महत्वाचे नाही पण फर्गसन सोकावतोय.&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीप&lt;br /&gt;
[१] गांधीजींना एकदा प्रश्न विचारण्यात आला, "What is your opinion of Western civilization?" गांधीजी म्हणाले, "I think it would be a good idea."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-2045325899820861547?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/Z5MB_HPDEss" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/Z5MB_HPDEss/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>6</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2012/01/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8935137240142738547</guid><pubDate>Fri, 30 Dec 2011 11:47:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-30T20:07:42.110+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><title>नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड आणि ओरहान पामुक</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
वाचनाचं व्यसन लागलेल्यांसमोर असणारा एक चिरंतन प्रश्न म्हणजे एक पुस्तक वाचून झालं की पुढचं कोणतं हे कसं ठरवायचं? वाचक पट्टीचा असेल तर त्याच्या आजूबाजूला पुस्तकांचा खच पडलेला असतो. 'बेग, बॉरो'&amp;nbsp; यापैकी कोणत्याही पद्धतीने आणलेली पुस्तकं भोवताली 'मला वाच, मला वाच' असं म्हणत फेर धरून नाचत असतात. हा प्रश्न धसास लावण्यासाठी अस्मादिकांनी एका एक-सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीने तातडीने वाचलीच पाहीजेत अशा पुस्तकांची यादी करण्याची उपसूचना मांडली. ही यादी केल्यानंतर तिचा आकार पाहून प्रश्न सुटलेला नाही असं लक्षात आलं. शेवटी समिती बरखास्त केली, सीता भरोसे जे पुस्तक वाचावसं वाटेल ते वाचावं असं ठरवलं आणि समोरच्या पुस्तकात डोकं खुपसलं. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ओरहान पामुकचा '&lt;a href="http://www.amazon.co.uk/Other-Colours-Orhan-Pamuk/dp/0571236863"&gt;अदर कलर्स&lt;/a&gt;' हा लेख संग्रह मिळाला. त्याची अनुक्रमणिका बघत असताना पामुकनं त्याच्या आवडत्या लेखकांवर आणि पुस्तकांवर काही लेख लिहील्याचं दिसलं. चांगले लेखक जेव्हा इतर लेखकांवर किंवा पुस्तकांवर लिहीतात तेव्हा त्याच्या लुत्फ वेगळाच असतो. गावसकर समालोचन करत असताना मैदानातील वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टींमागची मानसिक कारणं, डावपेच यावरच्या त्याच्या 'स्पेशल कमेंट्स' करतो तेव्हा त्या त्याच्या प्रदीर्घ अनुभवामधून आल्याचं जाणवतं आणि म्हणूनच त्याचं समालोचन इतरांपेक्षा वेगळं ठरतं. पामुक दस्तोयेव्स्की, कमू, सलमान रश्दी, व्हिक्टर ह्युगो अशा बर्‍याच लेखकांबद्दल बोलतो. यादी बघत असताना अचानक नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड दिसल्यावर वाचावसं वाटलं, मग त्यासाठी पामुकला काही काळ बाजूला ठेवलं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तक वाचताना लक्षात घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा अनुवाद आहे, साहजिकच अनुवाद वाचताना जे अडथळे येऊ शकतात ते इथे गृहित धरावे लागतात. याचे बरेच अनुवाद उपलब्ध आहेत, मी वाचलेला &lt;a href="http://www.amazon.com/Notes-Underground-Fyodor-Dostoevsky/dp/067973452X"&gt;अनुवाद&lt;/a&gt; रिचर्ड पीव्हर आणि लरिसा व्होलोखोन्स्की यांनी केला आहे. याच्या प्रस्तावनेत ते इतर उपलब्ध अनुवादांवर काहीसा टिकेचा सूर लावतात. त्यांच्या मते या आधी आलेल्या अनुवादांमध्ये मूळ कादंबरीचा सूर हरवला आहे. उदा. vygoda या शब्दासाठी आधीचे अनुवाद advantage हा शब्द वापरतात पण रिचर्ड आणि लरिसा profit वापरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार vygoda मध्ये जो नाद आहे तो profit या अनुवादात कायम राहतो. "And like vygoda, with its strongly accented first syllable, 'profit' leaps from the mouth almost with the force of an expletive, quite unlike the more unctuous 'advantage' or its Russian equivalent 'preimushchestvo'.... Thus we arrive at the full music of this underground oratorio. अनुवादकांनी इतका सखोल विचार केलेला पाहून बरं वाटतं. अनुवाद वाचावासा वाटतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दस्तोयेव्स्की सारख्या लेखकांचं एक वैशिष्ट्य हे की पुस्तकामध्ये जे समोर असतं ते फक्त हिमनगाचं टोक असतं. पूर्ण हिमनग बघण्यासाठी लेखक, त्याची पार्श्वभूमी, तत्कालीन परिस्थिती हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे पुस्तक वाचलं, बाजूला ठेवलं असं होत नाही. बहुतेक वेळा 'क्लासिक्स' समजल्या जाणार्‍या पुस्तकांमध्ये इतर क्लासिक्सचे संदर्भ असतात. (याच कारणासाठी &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2011/12/blog-post_16.html"&gt;नायपॉल&lt;/a&gt; सध्याच्या कादंबरी (novel) या साहित्यप्रकारातील नाविन्य संपलं आहे असं म्हणतात, प्रत्येक लेखक त्याच्या आधीच्या लेखकांच्या जाणीवा, अनूभूती उधार घेऊन काम चालवतो आहे.) पुन्हा अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये कथा असली तर ती ही अस्वस्थ करणारी असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रत्येक पुस्तकानंतर स्वत:मध्ये किंचित बदल झाल्याची जाणीव होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड एका निवेदकाची डायरी आहे. पहिला भाग त्याचा वाचकांशी संवाद. इथे निवेदक म्हणून तोच बोलतो आणि कधी कधी तुम्ही असं म्हणाल असं म्हणून दुसरी बाजूही तोच मांडतो. सुरूवातीला त्याची परिस्थिती स्पष्ट झाल्यावर तो एका सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राहतो आहे असं कळतं. (यालाच तो अंडरग्राउंड असं म्हणतो.) त्या बोलण्यातून त्याचा स्वभाव दिसायला लागतो. एकलकोंडा, जगाविषयी आणि विशेषत: जगातील लौकिकार्थाने यशस्वी लोकांबद्दल त्याचा असूया आणि तुच्छता वाटते. पहिल्या भागातील या प्रदीर्घ संवादामध्ये तो तत्कालीन तत्वज्ञानातील 'फ्री विल' अस्तित्वात आहे का किंवा माणूस मुळात चांगला आहे याला काय आधार आहे यासारख्या काही कळीच्या मुद्यांना आव्हान देतो. इथे तेव्हाच्या रशियातील परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. युरोपमध्ये 'एनलायटनमेंट'चे वारे वाहत होते. रशियातील बुद्धिजीवींना याची भुरळ पडली होती आणि यावर आधारित एका 'युटोपियन' समाजाची संकल्पना मांडली जात होती. लेनिनच्या राजवटीची बीजे इथे रोवली गेली. या संकल्पनेचा प्रमुख प्रचारक चेर्निशेव्स्की याला उत्तर म्हणून दस्तोयेव्स्कीने नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड लिहीलं.&amp;nbsp;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-64rNT04ab24/Tv3L1AM5tMI/AAAAAAAAAag/NwUEfdIlybE/s1600/250px-Notes_from_underground_cover.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/-64rNT04ab24/Tv3L1AM5tMI/AAAAAAAAAag/NwUEfdIlybE/s320/250px-Notes_from_underground_cover.jpg" width="204" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
पुस्तकाचा दुसरा भाग कथेच्या स्वरूपात आहे. निवेदकाचे काही वर्गमित्र एका मित्राला पार्टी देणार असतात. निवेदक त्यांची इच्छा नसतानाही तिथे जातो, त्यांचा अपमान करतो. हे सर्व होत असताना आपले निवेदकाबद्दलचे मत बदलत जाते. पहिल्या भागात काही वेळा ज्यांची चुणूक दिसली असे त्याच्या स्वभावातील कंगोरे आता स्पष्टपणे समोर येतात. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्याला भास होत आहेत. एका त्रासिक माणसापासून मनोरूग्णापर्यंतच्या या प्रवासाचा एक परिणाम म्हणजे कादंबरीच्या शेवटी निवेदक anti hero ठरतो आणि तो स्वत:च हे कबूलही करतो. आपण खोल गर्तेत जात आहोत हे कळूनही स्वत:ला किंवा इतरांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न न करणारा, किंबहुना आपल्या या अध:पतनामधून एक आसुरी आनंद मिळवणारा हा निवेदक दस्तोयेव्स्कीच्या पुढच्या कादंबर्‍यांसाठी एक सुरूवात ठरलाच पण त्याचबरोबर तत्कालीन साहित्यामधील ही बंडखोरी नंतर इतर अनेक साहित्यिकांसाठी प्रेरणा ठरली. नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड ही कादंबरी &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2007/04/blog-post.html"&gt;अस्तित्ववाद&lt;/a&gt; (Existentialism) या शाखेची सुरूवात मानली जाते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इतकी माहिती पुस्तकाची प्रस्तावना आणि आंतरजालावरून मिळते. नंतर पामुकचा यावरचा लेख वाचल्यावर आणखी एक पदर उलगडला. पामुकनं हे पुस्तक त्याच्या तरूणपणात वाचलं होतं. त्या वेळी त्याला पुस्तकामध्ये हिमनगाचं फक्त वरचं टोक दिसलं होतं. यापलिकडे काहीतरी आहे याची जाणीव झाली मात्र - कदाचित त्यामुळे येणार्‍या अस्वस्थतेच्या भीतीनं - त्यानं याचा पाठापुरावा केला नाही. तीस वर्षांनंतर पुस्तक परत वाचताना त्याला दस्तोयेव्स्की 'इन बिटविन द लाइन्स' काय म्हणतो आहे ते लक्षात आले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तकाच्या पहिल्या भागात बरेचदा तत्कालीन युरोप आणि रशिया यांच्यावर टिप्पण्या आहेत. एकोणिसाव्या शतकातील रशियामधले बुद्धीजीवी खुराकासाठी संपूर्णपणे युरोपमधील एनलायटनमेंट चळवळीवर अवलंबून होते. त्यांच्या विचारांमध्ये आणि त्या विचारांमधून आलेल्या संकल्पनांमध्ये मूळ रशियन असे काहीही नव्हते, सगळ्या कल्पना उधार घेतलेल्या. दस्तोयेव्स्कीला या सगळ्या प्रकाराची चीड आली होती. पण - आणि इथेच पामुकच्या 'स्पेशल कमेंट्स'चे महत्व स्पष्ट होते - खुद्द दस्तोयेव्स्की कोणत्या विचारांचे आचरण करत होता? त्यालाही बौद्धिक भूक भागवण्यासाठी युरोपकडे वळल्यावाचून गत्यंतर नव्हते. नोट्स फ्रॉम अंडरग्राउंडचा निवेदक जी चीड, असूया आणि आत्मप्रौढी व्यक्त करतो ती तो स्वत: कधीही पूर्णपणे युरोपियन होऊ शकणार नाही या भावनेतून आली आहे. दस्तोयेव्स्कीचा राग एनलायटनेमेंटवर नव्हता, तर हे विचार आपल्याकडे तिकडून येत आहेत आणि आपले बुद्धीजीवी त्यात आनंद मानत आहेत यावर होता. या विचारांचे अवलंबन करण्यात रशियाचा फायदा आहे हे ही त्याला कळत होते पण याच गोष्टीची चीडही येत होती. खूप नंतर आयुष्याच्या शेवटी 'ब्रदर्स कारामाझॉव्ह' लिहीताना रशियाच्या परपरांबद्दल आपल्याला किती तुटपुंजी माहिती आहे याबद्दल त्याने खंत व्यक्त केली होती. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पामुकला हा मुद्दा भावला याचे कारण टर्की रशियाप्रमाणेच युरोपच्या काठावर आहे. युरोपमध्ये होणार्‍या वैचारिक मंथनाच्या लाटा रशियाप्रमाणेच टर्कीमध्येही आल्या. टर्कीच्या साहित्यावर युरोपियन विचारवंतांचा मोठा प्रभाव आहे. याच कारणासाठी १९७० च्या दरम्यान नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड चा अनुवाद टर्कीमध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा त्याच्या प्रस्तावनेत दस्तोयेव्स्कीवर प्रखर टीका करण्यात आली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आजच्या काळात तेव्हासारख्या कोणत्याही एक किंवा अधिक चळवळींचा पगडा नाही. त्यात भारतासारख्या बहुभाषिक, अनेक संस्कृतींची सरमिसळ असणार्‍या देशामध्ये राहत असताना प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होतात. १८६३ मध्ये लिहीलेले हे पुस्तक आज वाचताना मी या पुस्तकाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहावे असा एक विचार मनात येतो.&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
 चित्र विकीवरून साभार.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-8935137240142738547?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/xdIz3cFUebg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/xdIz3cFUebg/blog-post_30.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/-64rNT04ab24/Tv3L1AM5tMI/AAAAAAAAAag/NwUEfdIlybE/s72-c/250px-Notes_from_underground_cover.jpg" height="72" width="72" /><thr:total>4</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/12/blog-post_30.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-1117317301642591174</guid><pubDate>Tue, 20 Dec 2011 14:48:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-17T10:50:14.983+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">ब्लॉगविश्व</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">समाज</category><title>ब्लॉगविश्व - त्यांचं आणि आपलं</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी टाइम मासिकाने २५ सर्वोत्कृष्ट &lt;a href="http://www.time.com/time/specials/packages/completelist/0,29569,2075431,00.html"&gt;ब्लॉगांची&lt;/a&gt; यादी जाहीर केली. भूकंपांपासून ते इजिप्तच्या उठावापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण घटनांची चित्रांमधून माहिती देणारा बोस्टन ग्लोबचा &lt;a href="http://www.boston.com/bigpicture"&gt;'द बिग पिक्चर'&lt;/a&gt; असो की म्हैलामंडळाच्या सगळ्या शंकांचे निवारण करणारा '&lt;a href="http://thehairpin.com/"&gt;द हेअरपिन&lt;/a&gt;' असो, या ब्लॉगांच्या विषयांमध्ये माफक वैविध्य आहे. केन लेव्हिन M*A*S*H, एव्हरीबडी लव्हज रेमंड किंवा सिम्पसन यांचा सह-लेखक. त्याचा '&lt;a href="http://kenlevine.blogspot.com/"&gt;बाय केव्हिन लेन&lt;/a&gt;' हा ब्लॉग विनोदी मालिकांच्या लेखनाचा अनुभव आणि 'शो-बिझ' मधली त्याची दीर्घ कारकीर्द या दोन्हींचा परिपाक आहे. खवय्यांसाठी '&lt;a href="http://aht.seriouseats.com/"&gt;अ हॅंम्बर्गर टुडे&lt;/a&gt;' हा ब्लॉग अमेरिकेतील कुठली हाटेलं चांगली, तिथं कोणता बर्गर चांगला मिळतो हे सगळं चवीनं तिखट-मीठ (किंवा केचप) लावून सांगतो. '&lt;a href="http://bowiesongs.wordpress.com/"&gt;पुशिंग अहेड ऑफ डेम&lt;/a&gt;' डेव्हीड बोईच्या गाण्यांना वाहिलेला आहे. या यादीबरोबरच कोणते ब्लॉग नसले तरी चालतील याचीही एक छोटी यादी आहे आणि कोणते असलेच पाहीजेत याचीही. नको असलेल्या ब्लॉगांमध्ये अमेरिकेच्या &lt;a href="http://blog.tsa.gov/"&gt;टीएसएचा&lt;/a&gt; ब्लॉग आहे. हा वाचल्यानंतर लोकांचा रक्तदाब वाढतो अशी टिप्पणीही केली आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या यादीमधील जाणवलेली एक ठळक उणीव म्हणजे यादी 'अमेरिका = जग' हे गृहीतक धरून तयार केली असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. (या मनोवृत्तीचं दुसरं उदाहरण म्हणजे वर्ल्ड सीरीज. आपल्याच देशात, आपापसातच खेळल्या जाणार्‍या खेळाच्या स्पर्धेला वर्ल्ड सीरीज म्हणणं हे म्हणजे 'वर्ल्ड फेमस इन इंडिया' सारखं वाटतं.) ब्लॉगांची यादी करताना महत्वपूर्ण विभागात &lt;a href="http://www.deadline.com/hollywood/"&gt;हॉलीवूडचा&lt;/a&gt; ब्लॉग टाकणं हा मात्र कहर झाला [१]. अमेरिकेची अर्थव्यवस्था, बास्केटबॉल आणि बेसबॉलचे अमेरिकेतील संघ, त्यातील कुठल्या प्लेअरचा कुणाबरोबर ब्रेक अप झाला अशी माहीती, बरोबर खायला हॅम्बर्गर तेही तिथल्या हाटेलांमधले. त्यामुळं यादीतील बहुतेक ब्लॉग अमेरिकन नसाल किंवा अमेरिकेत राहत नसाल तर कुचकामाचे आहेत. यादी बघितल्यावर त्यातील फक्त दोन ब्लॉग रोचक वाटले - द बिग पिक्चर आणि बाय केन लेव्हिन. या यादीत युरोपलाच स्थान नाही तर बाकीच्यांची काय कथा? इथं युरोपमधील विविध भाषांचा अडसर येऊ शकतो हे मान्य केलं तरीही २०११ चे २५ सर्वोत्कृष्ट इंग्रजी ब्लॉग 'यू एस ऑफ ए' मधूनच निघतात या निष्कर्षाला आत्मप्रौढी म्हणण्यावाचून गत्यंतर नाही. (अपवाद कदाचित डेव्हिड बोईवरच्या ब्लॉगचा, बोई ब्रिटीश आहे मात्र ब्लॉग कुठला आहे हे कळू शकले नाही.) बाकी हॅम्बर्गरला एक आख्खा ब्लॉग वाहिलेला पाहून फ्रेंच किंवा इटालियन शेफ लोकांची दातखीळ बसली असती. बरं झालं नै त्यांना इंग्रजी वाचता येत नै ते?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे चित्र पाहिल्यावर आपल्याकडे परिस्थिती कशी आहे ते बघण्याची सवय जुनी आहे. म्हणूनच सत्यजित रेंना 'अवर फिल्म्स, देअर फिल्म्स' लिहावसं वाटलं असेल. भारतात परिस्थिती गुंतागुंतीची आहे. स्थानिक भाषांमध्ये उत्तमोत्तम ब्लॉग असले तरी ते कळणं अशक्य. इंग्रजीमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लॉग लिहीले जात आहेत. या ब्लॉगांची यादी देणार्‍या &lt;a href="http://indianbloggers.org/"&gt;सायटीही&lt;/a&gt; भरपूर आहेत. यात प्रसिद्ध व्यक्तींपासून विविध विषयांवर लेखन करणारे बरेच लोक आहेत. यातील वाचनीय कोणते हे ज्याचे त्याने ठरवावे अशी परिस्थिती आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठीत वेगळी परिस्थिती आहे. इथे जगाचा परिघ चटकन लहान होतो त्यामुळे चित्र थोडं उलटं होतं. ब्लॉगांच्या लोकप्रियतेबाबत आपले समज अजूनही बाळबोध असल्याचं जाणवतं. लेखाला किंवा ब्लॉगला भरघोस प्रतिसाद आले की तो चांगला असा एक समज आहे. हे अर्धसत्य आहे. लोकप्रिय ब्लॉगांवर भरपूर प्रतिक्रिया येऊ शकतात हे मान्य. अमिताभने 'आज डोकं दुखतय' इतकं जरी लिहीलं तरी सात-आठशे प्रतिक्रिया येतील.&amp;nbsp; प्रतिक्रिया कमी आल्या तर लोक वाचत नाहीत हे ही नेहेमीच खरं नसतं. बरेच लोक रीडरमध्ये पोस्ट वाचतात आणि सायटीवर फिरकत नाहीत. म्हणून ब्लॉगची नियमित वाचकसंख्या किती आहे हे बघणं अधिक महत्वाचं आहे. कधीकधी लोक पोस्ट वाचल्यानंतर आवडली तर फेसबुकवर दुवा देतात किंवा 'लाइक' बटण दाबतात किंवा ट्विटरवर दुवा देतात. माझ्या मते 'वर्ड-ऑफ-माउथ' सारखी ही शिफारस हा प्रतिक्रिया देण्याचा एक सुरेख मार्ग आहे. जागतिक स्तरावरील ब्लॉग या बाबतीत अधिक परिपक्व असल्याचं जाणवतं. तिथे जास्त प्रतिसाद कसे येतील याची फारशी फिकीर न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा ब्लॉग कसा पोचेल, तुमच्या ब्लॉगच्या नियमित वाचकांची संख्या कशी वाढेल आणि तुमच्या ब्लॉगची वाचनसंख्या (pageviews) कशी वाढेल यावर जास्त भर असतो. प्रतिक्रिया त्या मानाने किरकोळ बाब समजली जाते. बरेचदा जागतिक स्तरावर लोकप्रिय ब्लॉगांवर प्रतिक्रिया देण्यास मनाई केलेली असते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काहीतरी लिहायचं म्हणजे ते ललितच असलं पाहीजे असा एक समज आपल्याकडे असावा की काय अशी शंका येते. त्यातही मराठी माणसांचा ओढा (किंवा संख्या पाहता नदी, धबधबा) प्रामुख्याने कविता करण्याकडे आहे असं दिसतं. शंभरापैकी नव्वद ब्लॉग कवितांचे असतात. त्यात फेब्रुवारी महिन्यात त्यांना '&lt;span style="color: magenta;"&gt;इशेष रंगत&lt;/span&gt;' येते. बाकी ब्लॉगमध्ये ललित लेखन - यात कथा किंवा दीर्घ कादंबर्‍या येतात - मोठ्या प्रमाणावर दिसतं. इतर लेखनामध्ये चित्रपट समीक्षा, संगीतावरचे लेख, रोजच्या राजकीय आणि इतर घटनांवर भाष्य, विनोदी लेखन (बरेचदा लेखन विनोदी असूनही हसू न आल्याने यातून कारूण्यरस निर्माण होतो), विविध ठिकाणांची छायाचित्रांसहित प्रवासवर्णने असे विषय प्रामुख्याने दिसतात. वेगळी वाट धरून एखादा चाकोरीबाहेचा विषय हाताळल्याचे फारच कमी दिसते. टाइम मासिकाची 'Yo' निवड बाजूला ठेवली तर इंग्रजीमध्ये भाषा शिकण्यापासून स्कीइंगपर्यंत सर्व गोष्टींची सखोल माहिती देणारे ब्लॉग उपलब्ध आहेत. एक ब्लॉग तर चक्क अमेरिकेत &lt;a href="http://guide2homelessness.blogspot.com/"&gt;बेघर&lt;/a&gt; झाल्यास कसं जगायचं हे सांगतो. आपल्या समाजाचा परिघ इतका आकुंचित का? अनुभव विस्तृत नाहीत की यामागे आपली नोंदी ठेवण्याबाबतची पूर्वापार चालत असलेली नावड कारणीभूत आहे असे प्रश्न विचार करण्याजोगे आहेत.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठीतील ब्लॉग पाहिल्यावर हे माध्यम अजूनही रांगत असल्याचं जाणवतं. ब्लॉगांची मांडणी वाचकांना सोपं जाईल किंवा आकर्षक वाटेल अशी करण्याकडे कल कमीच दिसतो. उदा. दोन परिच्छेदांमध्ये एका ओळीची जागा सोडली तर वाचायला बरंच सुटसुटीत होतं. बरेचदा आधीच्या परिच्छेदाचं शेवटचं वाक्य लांब असेल तर ते ओळीच्या जवळजवळ शेवटपर्यंत येतं आणि लगेच पुढच्या ओळीला नवीन परिच्छेद सुरू होतो. अशा वेळी हा नवीन परिच्छेद आहे किंवा नाही हे कळतच नाही. शिवाय संपूर्ण पान एका नजरेत पाहीलं तर कुठेही मोकळी जागा न दिसता सगळं भरगच्च आणि अनाकर्षक दिसतं. मात्र या साध्या गोष्टीचा विचार कधीकधी वृत्तपत्रांमध्येही केलेला दिसत नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ब्लॉग या माध्यमाची ताकद अजूनही आपण पूर्णपणे वापरलेली नाही, किंबहुना ती आपल्याला उमगलेली नाही असं वाटतं. मराठी लेखक, खेळाडू, गायक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील कुणीही ब्लॉगलेखनाकडे वळलेले दिसत नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे. लेखनात विविधतेचा अभाव असल्याचं हे ही एक कारण आहे. भालचंद्र नेमाडे किंवा मिलिंद बोकील यांच्यासारख्या लेखकांनी ब्लॉग लेखन केलं तर वाचकांच्या उड्या पडतील. इंग्रजीत &lt;a href="http://salmanrushdie1.tumblr.com/"&gt;सलमान रश्दी&lt;/a&gt; किंवा &lt;a href="http://amitavghosh.com/blog/"&gt;अमिताभ घोष&lt;/a&gt; यांच्यासारखे दिग्गज लेखक ब्लॉग लिहीताना दिसतात. मराठीत &lt;a href="http://www.blogger.com/profile/16591743012412093153"&gt;कविता महाजन&lt;/a&gt; ब्लॉगलेखनात सक्रिय आहेत. &lt;a href="http://chinhatheartblog.blogspot.com/"&gt;चिन्ह&lt;/a&gt; मासिकाचा ब्लॉगही वाचनीय असतो. लेखक, संपादक राम जगताप कला, साहित्य आणि राजकीय घडामोडी यांच्यावर '&lt;a href="http://ramjagtap.blogspot.com/"&gt;भेजा फ्राय&lt;/a&gt;' आणि '&lt;a href="http://santapkiy.blogspot.com/"&gt;संतापकीय&lt;/a&gt;' या दोन ब्लॉगांमध्ये लिहीतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठीत सातत्याने ब्लॉगलेखन करणारी काही मंडळी आहेत [२]. वैदेही भावे यांचा '&lt;a href="http://chakali.blogspot.com/"&gt;चकली&lt;/a&gt;' हा पाकक्रियांचा ब्लॉग. माझ्या माहितीप्रमाणे मराठी ब्लॉगविश्वात या ब्लॉगची सभासदसंख्या सर्वात जास्त आहे (~ २०००) [३]. '&lt;a href="http://mokale-aakash.blogspot.com/"&gt;झाले मोकळे आकाश&lt;/a&gt;' या ब्लॉगवर गौरी नियमित रोजच्या घडामोडी, बागेतील गंमतीजमती सांगत असते. रोजच्या घडामोडींवरच आधारलेला महेंद्र कुलकर्णी यांचा '&lt;a href="http://kayvatelte.com/"&gt;काय वाट्टेल ते&lt;/a&gt;' हा आणखी एक लोकप्रिय ब्लॉग. कांचन कराई त्यांच्या '&lt;a href="http://www.mogaraafulalaa.com/"&gt;मोगरा फुलला&lt;/a&gt;' या ब्लॉगवर वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. '&lt;a href="http://akshardhool.blogspot.com/"&gt;अक्षरधूळ&lt;/a&gt;' नावाच्या ब्लॉगवर चंद्रशेखर आठवले भारत आणि भारताबाहेरील विषयांवर रोचक लेख लिहीतात. निवेदिता पूर्वी काळ्या-हिरव्या मांजराच्या गोष्टी लिहीत असे, आता ती इंग्रजीत पुस्तकांचे &lt;a href="http://niveditabarve.blogspot.com/"&gt;परीक्षण&lt;/a&gt; करते. विविध वृत्तपत्रांमध्ये येणार्‍या वाचनीय लेखांचा संग्रह दीपक यांनी '&lt;a href="https://lekhsangrah.wordpress.com/"&gt;लेख संग्रह&lt;/a&gt;' या ब्लॉगवर केलेला आहे. गुरूदत्त &lt;a href="http://chimanya.blogspot.com/"&gt;माझं चर्‍हाट'&lt;/a&gt; या ब्लॉगवर विनोदी आणि गंभीर दोन्ही प्रकारचे लेख लिहीतो. राहुल फाटक '&lt;a href="http://rahulphatak.blogspot.com/"&gt;राफा&lt;/a&gt;' वर धमाल करत असतो तर आशिष &lt;a href="http://mylifemyreviews.blogspot.com/"&gt;My Life My Review&lt;/a&gt; वर. फोटोग्राफी आणि कॅमेरा यांच्यावर स्वप्नाली '&lt;a href="http://prakashraan.blogspot.com/"&gt;प्रकाशरानातून चालताना&lt;/a&gt;' मध्ये उत्तम माहिती देतात तर भालचंद्र आणि हरदास '&lt;a href="http://photokatta.blogspot.com/"&gt;फोटोकट्टा&lt;/a&gt;' या फोटोब्लॉगवर एकाहून एक उत्तमोत्तम फोटो टाकत असतात.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोणतेही विशेष कष्ट न घेता ही यादी बनवली आहे. ती परिपूर्ण आहे असा कोणताही दावा नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्मरणरंजन किंवा नॉस्टाल्जिया मराठी माणसाचा दुर्गुण आहे असं म्हणतात मात्र याचा काळ दोन-तीन वर्षांपर्यंत कमी होईल असं वाटलं नव्हतं. मी ब्लॉग सुरु केला तेव्हा बरेच लोक जोमाने ब्लॉग लिहीत होते. रोजच्या रोज उत्तमोत्तम लेखांची मेजवानी असे. कालांतराने यातील बहुतेक सर्व थंडावले. त्यामुळे बरेच ब्लॉग जे दोन वर्षांपूर्वी या यादीत हमखास आले असते ते सध्या गाई-गाई करत आहेत. त्यांना उद्देशून 'जागो, सोनेवालों' अशी आरोळी ठोकावीशी वाटते. &lt;br /&gt;
-----------&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीपा &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[१] च्या मारी, इथं '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=GuQvlz3yM9A"&gt;इंडीपेंडन्स डे&lt;/a&gt;' आठावला. त्ये येडंबागडं व्हिलन आल्यानंतर नेम धरूनशान व्हाइटहाउसवरच्या आकाशातच मुक्काम ठोकत्यात बगा. तेनला बी म्हाइत असतं कुटला देश पावरबाज हाये ते. मंग त्यो फायटर प्रेशिडेंट दिलीपकुमार ष्टाइल कपाळावर येनारी झुल्फं झटकत काय भाशान ठोकतो म्हून सांगू जनू 'वार ऑन टेरर'च. आन त्ये ऐकुनशान अमेरिकचं शूर शिपाईगडी त्या व्हिलनचा सुपडा साफ करत्यात. मंग बाकीच्या देशातली फाटक्या कापडातली लोकं तमाखू मळत अमेरिकेचा जैजैकार करत्यात. (परत्येक खंडाला जैजैकार करन्यासाठी दोन सेकंदाचं फुटेज दिलेले हाये, तरी त्याचा योग्य उपेग करून घ्यावा ही इनंती. यात कसूर झाल्यास फुडचं 'वार ऑन टेरर' त्या देशाइरूद्ध. भाशान तयार हाये, फकस्त व्हिलनच्या जागी त्या देशाचं नाव टाकायचं. हाय काय अन नाय काय!)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[२] इथे निवड करताना सातत्य आणि वैयक्तिक आवड हे दोन निकष होते. प्रामुख्याने फक्त कथा-कविता असणार्‍या ब्लॉगांचा समावेश केलेला नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[३] तुलनेसाठी - टाइम मासिकाने निवडलेल्या ब्लॉगांच्या सभासदांची संख्या २००,००० ते १,०००,००० अशा पटीत असते. यावरून मराठी ब्लॉगविश्वाची व्याप्ती लक्षात यावी. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-1117317301642591174?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/ZJnCJiLlUG0" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/ZJnCJiLlUG0/blog-post_20.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>9</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/12/blog-post_20.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-3320462134021734226</guid><pubDate>Fri, 16 Dec 2011 06:45:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-16T23:28:00.808+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">निसर्ग</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><title>हजारों ख्वाहिशें ऐसी</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
ख्रिस स्ट्युअर्ट - '&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Genesis_%28band%29"&gt;जेनेसिस&lt;/a&gt;' या बॅंडमध्ये काही काळ ड्र्मर म्हणून काम केल्यानंतर युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढण्यापासून बिल्डींगा बांधण्यापर्यंत बरीच कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुसिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. '&lt;a href="http://drivingoverlemons.co.uk/driving-lemons/%20"&gt;ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स&lt;/a&gt;' हे अन्दालुसियामधल्या ख्रिसच्या अनुभवांवर आधारित आहे. अन्दालुसियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच जाणारी नदी, संत्री, लिंबं यांच्या बागा, फळाफुलांची शेतं. तरीही शहरातून इथे स्थायिक व्हायचं म्हणजे सोपं काम नाही. नदीवर पूल बांधण्यापासून ते टेकडीवरच्या झर्‍यातून घरापर्यंत पाणी येण्याची व्यवस्था करण्यापर्यंत सगळी कामे स्वत:च करायची. मदतीला शेजारपाजारचे दोमिन्गोसारखे मित्र होते. एकदा मूलभूत गरजा भागल्यानंतर ख्रिस आणि त्याची बायको आना यांचे प्रयोग सुरू झाले. मेंढ्या-बकर्‍या, डुकरे, कोंबड्या पाळणे, बागेतील शेती आणि मशागत. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही सपशेल फसले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ख्रिसची लिहीण्याची शैली सरळ आणि प्रामाणिक आहे. आपल्याला काय-काय जमलं नाही हे ही तो प्रांजळपणाने सांगतो. आयुष्याकडून फार गडगंज अपेक्षा न ठेवता निसर्गाच्या सान्निध्यात राहून साधं आयुष्य जगता यावं ही माफक मागणी. आपल्या निर्णयाबद्दल तो फारसं बोलत नाही. इंग्लंडमधलं आयुष्य का नकोसं वाटलं याबद्दल 'तिथे विम्याची नोंदणी करत बसण्यापेक्षा हे किती बरं' असं एखादं मोघम वाक्य येतं.&amp;nbsp; पण टेकडीवरच्या झर्‍यामधून पाण्यासाठी वाट केल्यानंतर येणारा पाण्याचा पहिला प्रवाह बघणं,&amp;nbsp; शेळ्या-मेंढ्या टेकडीवर चरताना त्यांच्या गळ्यातील घंटा झाडाखाली बसून ऐकणं किंवा उन्हाळ्यात रात्री उकाडा असह्य&amp;nbsp; झाल्यावर नदीत डुंबायला जाणं अशा वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टी करताना त्याला मिळणारा आनंद पाहून 'याचसाठी केला होता अट्टाहास' असं त्याने म्हटलं नाही तरी आपल्याला ते जाणवत रहातं.&lt;br /&gt;
&lt;blockquote class="tr_bq"&gt;
It was a thrill, that first day, watching as the water gathered and swelled and saturated the dry earth. It crept up the bank, pouring into the ant-hills and mole-runs, and little by little turned into a full-blown stream. Seeing it, I would splash through to the head and race around the next corner to await the miracle all over again.&lt;/blockquote&gt;
व्ही. एस. नायपॉल साहित्यक्षेत्रातील मोठं नाव. '&lt;a href="http://www.amazon.com/Literary-Occasions-Essays-V-S-Naipaul/dp/1400031303"&gt;लिटररी ओकेजन्स&lt;/a&gt;' हे त्यांनी वेळोवेळी लिहीलेल्या निबंधांचे पुस्तक. यात नायपॉल बर्‍याच विषयांवर बोलतात [१], त्यातील एक मुख्य आणि परतपरत येणारा विषय म्हणजे स्वत:चा शोध. त्यांचं बालपण त्रिनिदादमध्ये गेलं, आजोबा मजूर म्हणून भारतातून त्रिनिदादमध्ये आल्यानंतर नंतरच्या पिढ्या तिथेच स्थायिक झाल्या.&amp;nbsp; त्यांच्या वडीलांनी लहानपणापासून तुला लेखक व्हायचय असं मनावर बिंबवलेलं. लहानपणी डिकन्सपासून वेल्सपर्यंत जे वाचायला मिळालं, त्यातील वातावरण, पात्रे नेहेमी परकी वाटत राहीली. एकदा गावात झालेली रामलीला बघितली हाच काय तो भारतीय संस्कृतीचा परिचय. हिंदी कळत होतं पण बोलता येत नव्हतं. नायपॉल यांच्या शब्दात सांगायचं तर, 'आम्हाला वाटलं की आम्ही आमच्याबरोबर भारताचा एक तुकडा आणला आहे आणि तो एखाद्या गालिच्याप्रमाणे घरातल्या खोलीत पसरता येईल.' ऑक्सफर्डला स्कॉलरशिप मिळाल्यावर त्यांना वाटलं की आता लेखकांच्या या देशात गेल्यावर आपल्या प्रतिभेला जाग येईल, पण तसं काहीच झालं नाही. उलट गोंधळ अजून वाढत गेला. अखेर इग्लंडमध्येच त्यांना स्वत:मध्ये दडलेला लेखक सापडला, पण तो त्यांच्या लहानपणी घरासमोर जो रस्ता होता त्या रस्त्याच्या आठवणींमध्ये. रस्ता, घरं, तिथले लोक आठवत गेले आणि त्यांनी पहिलं पुस्तक लिहीलं. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पहिलं पुस्तक लिहील्यानंतर बाकीची आपोआप येतील ही त्यांची कल्पना फोल ठरली. दुसर्‍या पुस्तकाच्या वेळी पाटी परत कोरी होती. योगायोगानं त्यांना त्रिनिदाद आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लिहीण्यासाठी आमंत्रण मिळालं. यासाठी आपण जिथे रहात होतो तिथल्या त्या भागाच्या इतिहासाचा अभ्यास करता आला. अंतर्मनात आणखी एक धागा जुळला आणि हेच प्रत्येक वेळी होत राहीलं. भारतीय वंश असूनही भारत परका होता. किपलिंग, टागोर, गांधी किंवा आर. के नारायण यांच्या लेखनातून दिसणारा भारत एकांगी भासत होता. भारतात येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर भारतावर दोन पुस्तके लिहीली. एके ठिकाणी नायपॉल म्हणतात, &lt;br /&gt;
&lt;blockquote class="tr_bq"&gt;
To take an interest in a writer's work is, for me, to take an interest in his life; for one interest follows automatically the other. [२] &lt;/blockquote&gt;
ही दोन पुस्तकं कुठल्याही दुकानात एका भागात सोडाच, एका खोलीतही दिसणार नाहीत कदाचित. ही एकामागून एक वाचली म्हणून त्यांच्यातील&amp;nbsp; समानता आणि फरक लक्षात आले, नाहीतर ते ही झालं नसतं. ख्रिस किंवा नायपॉल दोघेही आपल्या सद्यस्थितीवर संतुष्ट नव्हते. दोघांनाही अस्वस्थ वाटत होतं, दोघांनी आपल्या अस्वस्थतेवर आपापल्या परीने मार्ग शोधले. ख्रिसचा मार्ग 'दिल से' किंवा ज्याला इंग्रजीत 'गट फिलिंग' म्हणतात तसा आहे तर नायपॉल आत्मपरिक्षण आणि काहीसा कॅथार्टीक म्हणता येईल असा मार्ग शोधतात. प्रत्येक पुस्तक लिहील्यानंतर त्यांना स्वत:च्याच एका पैलूची ओळख होते. ख्रिसला गिटार वादनापासून मेंढ्या पाळण्यापर्यंत अनेक गोष्टी करून झाल्यावर पहिलं पुस्तक लिहीलं तेव्हा आपल्याला लिहायला आवडतं हे उमगलं. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ख्रिसला जे हवंय ते वरकरणी सरळ आहे असं वाटतं पण तसं नसावं. शेतीच करायची तर ती इंग्लंडमध्येही करता आली असती, तसा प्रयत्नही केला होता पण त्याला स्पेन आवडतं. तिथे राहताना पहिल्यांदा एक ब्रिटीश जोडपं भेटतं तेव्हा 'हे इथे कशाला आले' असा विचार त्याच्या मनात चमकून जातो. ब्रिटीश संस्कृतीबद्दल नावड आणि दक्षिण युरोपमधील मोकळ्या-ढाकळ्या वातावरणाचं आकर्षण असा काहीसा हा पेच आहे असं वाटतं. जे इंग्लंड ख्रिसला नकोसं झालं त्याबद्दल नायपॉल यांना सुप्त आकर्षण होतं. (इथे 'कलोनियल' म्हणून जी ओळख जन्मत:च मिळाली त्याबद्दल ते विस्ताराने बोलतात.) पण त्यांच्यातला लेखक प्रगट झाला तो मात्र त्रिनिदाद आणि भारतातच. म्हणूनच ते म्हणतात, &lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;
To become a writer, that noble thing, I had thought it necessary to leave. Actually, to write, it was necessary to go back. It was the beginning of self-knowledge.&lt;/blockquote&gt;
माणसाला नेमकं काय हवय यावर भल्याभल्यांनी लिहीलय. ख्रिसला अन्दालुसियामध्ये आपलं गाव सापडलं, नायपॉलना त्यासाठी आपल्या भूतकाळात दडलेली पाळंमुळं शोधावी लागली. मात्र याच गोष्टीसाठी कुणी टोक्योमध्ये चांगला चालणारा बार बंद करून कादंबरी लिहायला घेतात, कुणी सुताराचा धंदा सोडून चित्रपटात अभिनय करायचा ठरवतात तर कुणी धर्मावर प्रवचने देता देता चित्रे काढायला लागतात. [३] &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
To each his own.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
-------------------&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीपा :&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[१] आवडलेले लेखक, त्यांच्या काही पुस्तकांची समीक्षा अशा अनेक गोष्टी यात येतात. यात त्यांचं नोबेल पारितोषिक भाषणही आहे. नायपॉलना भावलेला एक लेखक म्हणजे जोसेफ कॉनराड. आत्मशोध घेताना अनुभवलेल्या अव्यक्त अशा काही भावना त्यांना कॉनराडच्या लेखनात सापडल्या. 'कॉनराड्स डार्कनेस ऍंड माइन' या दीर्घ लेखात ते कॉनराडच्या साहित्याचे अनेक पैलू समोर आणतात.&amp;nbsp; कादंबरी (novel) या साहित्यप्रकारामध्ये आजही एकोणिसाव्या शतकात उगम पावलेल्या रूपरेखांची नक्कल चालू आहे. आताच्या साहित्यप्रकारांमध्ये अजूनही कादंबरी शेवटचे आणि सर्वोच्च माध्यम आहे हे आजच्या जगाच्या आत्मप्रौढीचं (vanity) लक्षण आहे असे त्यांना वाटते. भाषा आणि संस्कृती याबद्दल बोलताना ते म्हणतात, "Culture is like language, ever developing. There is no right or wrong, no purity from which there is decline. Usage sanctions everything." &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[२] थोडा विचार केल्यानंतर वाक्य पटायला लागतं. हॅम्लेट अनेक पातळ्यांवर श्रेष्ठ कलाकृती आहे पण शेक्सपिअरने ज्या काळात हॅम्लेट लिहीलं त्या काळातील रेनेसान्सचे युरोपभर उमटलेले प्रतिसाद, कॅथोलिक धर्माविरूद्ध मार्टीन लूथरने सुरू केलेलं बंड आणि प्रोटेस्टंट शाखेचा उदय, एनलायटनमेंटची सुरूवात हे सगळं लक्षात घेतलं तर 'टु बी ऑर नॉट टू बी' च्या अर्थाचे निराळे पदर उलगडतात. शेक्सपिअरच्या प्रेरणा, तेव्हाचे संघर्ष यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कलाकृतींचा अर्थ व्यापक होत जातो. त्याचप्रमाणे नायपॉल यांची पुस्तकं वाचल्यानंतर पुस्तकाच्या विषयापेक्षा किंवा विषयाबरोबरच नायपॉल यांची वेगळी ओळख पटायला लागते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[३] अनुक्रमे हारूकी मुराकामी, हॅरीसन फोर्ड आणि व्हिन्सेंट व्हॅन गॉफ. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-3320462134021734226?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/UeKfihjuqP4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/UeKfihjuqP4/blog-post_16.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>2</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/12/blog-post_16.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-1541417229793537663</guid><pubDate>Sun, 04 Dec 2011 07:14:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-04T17:24:29.441+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">चित्रपट</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">आठवणी</category><title>गॉड इज डेड</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
हल्ली स्मरणरंजन अर्थात नॉस्टाल्जिया म्हटलं की कपाळावर आठ्या पडतात. एका अर्थानं ते बरोबर आहे, नवीन साहित्यामध्ये 'आमचा काळ म्हणजे सुवर्णकाळ' हे तत्व मानून लिखाण होत असेल तर त्याचा कंटाळा येणारच. पण म्हणून सगळ्या आयुष्यातूनच स्मरणरंजन काढून टाकायचं का? नवीन गोष्टींकडे जुन्या चष्म्यातून पाहू नका, त्यामुळे नवीन आणि जुनं दोघांवरही अन्याय होतो. पण जुने चष्मे फोडायला हवेत का? किंबहुना ते फोडता येतात का? हे प्रश्न पडायचं कारण आज आठवणीतला एक नाजूक धागा तुटला. देव आनंद.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आमच्या घरात देव आनंदची भक्ती वडिलोपार्जित मिळालेली एक देण होती. त्याचे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघणे ही त्या काळातील हॉटेस्ट गोष्ट होती. खरं तर तेव्हा अमिताभ त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर होता, पण आम्हाला देव आनंदचे इतके अप्रूप की दुसरा कुणीही त्याच्यासमोर चालत नसे. नंतर कळायला लागल्यावर बाकीचेही अभिनेते पटायला लागले. पण तरीही मनातला एक कोपरा जिथे तो लहानपणीच घुसला, तो त्याला आजन्म लीजवर देऊन टाकला. अर्थात नंतर असे अनेक कोपरे अनेकांनी बळकावले. शेजारचाच भाडेकरू म्हणून अमिताभ आला. एके दिवशी गुलजार खोली रिकामी आहे का म्हणून विचारत आला. आजही नवीन भाडेकरू येतातच आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
देव पहिला भाडेकरू म्हणून त्याचं महत्व जास्त. आणि तो पहिला बॉलीवूड सुपरस्टार ज्याला याची देही, याची डोळा बघता आलं, त्याची सही घेता आली. डेक्कन कॉलेजात 'हम नौजवान'चं शूटिंग बघताना देवाला डोळे भरून पाहिलं. आणि हे सगळं घडलं त्या काळात आमचे मूल्यवान खजिने म्हणजे नेपाळचे त्रिकोणी पोस्टाचे तिकीट किंवा नेहेमीपेक्षा दुप्पट आकाराची गोटी असे होते. त्यात चक्क देव आनंदची स्वाक्षरी म्हणजे कोहीनूर हिराच. चित्रपटही आवर्जून बघितला. नंतर स्वाक्षर्‍या घेण्यातला फोलपणाही कळला आणि सेलेब्रिटीजला बघून भारावून जाणंही कमी व्हायला लागलं. किंबहुना सेलेब्रिटीज खर्‍या आयुष्यात कसे आहेत हे न कळलेलंच बरं असं आता वाटतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पंखे लोक आपल्या देवावर प्रेम करताना मागेपुढे पहात नाहीत. आणि हे आजच नाही, पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. इटालियन ऑपेराचा शिल्पकार ज्युसेप्पे व्हेर्दी जेव्हा मिलानमध्ये त्याच्या घरात पक्षाघाताच्या झटक्याने आजारी होता, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी बाहेरच्या रस्त्यावर गवत पसरलं होतं, टांग्यांच्या आवाजाने 'इल मैस्त्रो' ला त्रास होऊ नये म्हणून. या देवावरही लोकांनी असंच प्रेम केलं. हम दोनो, गाइड, काला पानी, ज्वेल थीफ भारतीय सिनेरसिकांना विसरता येणं अशक्य. गोल्डी आणि त्याने मिळून बनवलेले चित्रपट त्याच्या कारकीर्दीतील मैलाचे दगड ठरले आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तत्वज्ञ नित्शेचं वाक्य आज एका वेगळ्या अर्थानं खरं ठरलं आहे. "गॉड इज डेड."&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-1541417229793537663?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/RpXGh6KtMpo" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/RpXGh6KtMpo/blog-post_04.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>3</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/12/blog-post_04.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-4492813557909240937</guid><pubDate>Fri, 02 Dec 2011 07:38:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-05T11:31:50.061+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">मन</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">विज्ञान</category><title>प्रतिभेच्या आविष्काराचे वेगळे रूप</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
मेंदू नक्की काय चीज आहे ते मेंदूलाच अजून माहीत नाही. संगणकाच्या भाषेत हा प्रश्न म्हणजे 'एखाद्या भाषेत लिहीलेला कंपायलर पहिल्यांदा कसा कंपाईल करणार?' यासारखा आहे. अर्थात इथे &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Bootstrapping_%28compilers%29"&gt;'बूटस्ट्रॅपिंग'&lt;/a&gt; हे उत्तर आहे पण मेंदूच्या बाबतीत मात्र अजून तरी ठाम उत्तर नाही. तरीही उत्तराच्या दिशेने प्रवास चालू आहे हे निश्चित. मेंदूची तुलना नेहेमी संगणकाबरोबर केली जाते पण मेंदू बर्‍याच बाबतीत वरचढ आहे. मेंदू आणि संगणकात अनेक फरक आहेत त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे मेंदू प्रतिभावंत आहे. या प्रतिभेचं प्रकटीकरण मेंदूमध्ये कसं होतं हा प्रश्न रोचक आहे. गेल्या काही वर्षात एमआरआय किंवा कॅटस्कॅन सारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने मेंदूची चिरफाड न करता आत काय होतं आहे हे बघणं शक्य झालं आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-E4GwnvmaKC0/TtnCBnQ3hUI/AAAAAAAAAaQ/ZdZvjkbM7qw/s1600/creating-brain-neuroscience-genius-nancy-c-andreasen-hardcover-cover-art.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-E4GwnvmaKC0/TtnCBnQ3hUI/AAAAAAAAAaQ/ZdZvjkbM7qw/s1600/creating-brain-neuroscience-genius-nancy-c-andreasen-hardcover-cover-art.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
या संदर्भात &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Nancy_Coover_Andreasen"&gt;नॅन्सी आंद्रेआसन&lt;/a&gt; यांचं '&lt;a href="http://www.amazon.com/Creating-Brain-Neuroscience-Genius/dp/1932594078"&gt;द क्रिएटींग ब्रेन&lt;/a&gt;' हे पुस्तक वाचनात आलं. आंद्रेआसन बाईंची कारकीर्द अचंबित करायला लावणारी आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पीएचडी केलं आणि तीन वर्ष कॉलेजात रेनेसान्स साहित्य शिकवलं. नंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन मानसशास्त्रामध्ये डॉक्टरची पदवी घेतली. विविध मानसिक आजारांच्या संशोधनामध्ये नवीन इमेंजिंग पद्धतींचा वापर करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. यासाठी इ. स. २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या हस्ते 'नॅशनल मेडल ऑफ सायन्स' या पारितोषिकाने त्यांचा गौरव करण्यात आला. या पुस्तकात मात्र त्या एका वेगळ्या विषयाबद्दल बोलतात. साहित्याचा अभ्यास करताना त्यातील प्रतिभेचे आविष्कार पाहून त्या अवाक होत असत. नंतर मेंदूचे संशोधन करताना ही प्रतिभा मेंदूत कुठे असते, तिला कशी वाट मिळते असे प्रश्न त्यांना पडायचे. पण मेंदूच्या संशोधनामध्ये हा विषय फारसा लोकप्रिय नाही आणि आजारांचे संशोधन अधिक महत्वाचे मानले जाते त्यामुळे याला निधी मिळण्याची शक्यताही कमी. अखेर एका खाजगी देणगीदाराकडून निधी मिळाल्यावर त्यांना या दिशेने वाटचाल करता आली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या पुस्तकात 'रेनेसान्स साहित्य आणि कलाप्रकार' यांचा व्यासंग आणि मेंदूचे सखोल &amp;nbsp;ज्ञान यांचा सुरेख मिलाफ झाला आहे. चर्चा करताना लेखक नील सायमन, संगीतकार मोझार्ट, चायकोव्स्की, गणितज्ञ प्वंकारे यांचे अनुभव दिले आहेत. बेंझीन रेणूचा आकार केकूलेला स्वप्नात दिसला हे सर्वश्रुत आहे. मात्र इतर अनेक प्रतिभावंतांचे आविष्कार अशाच पद्धतीने झाले हे पाहील्यावर प्रतिभेचे एक वेगळे रूप समोर येतं. मेंदूचे निरनिराळे भाग एकमेकांशी संवाद साधण्यासाठी चेतापेशींचा (न्यूरॉन) वापर करतात. आपल्या मेंदूमध्ये १००,००० कोटी चेतापेशी असतात आणि त्या एकमेकांसोबत सतत संदेशांची देवाणघेवाण करत असतात. यावरून मेंदूचे कार्य किती गुंतागुंतीचे असेल याची कल्पना यावी. &amp;nbsp;एखाद्या समस्येवर जाणीवेमध्ये मेंदूची झटापट चालू असते, तेव्हा हातात काहीच येत नाही. नंतर कलाकार किंवा संशोधक दुसर्‍या कामात लक्ष घालतात पण त्याच काळात त्यांच्या नेणिवेमध्ये यावर काम चालू असतं. मेंदूचे निरनिराळे भाग कलाकाराच्या नकळत एकमेकांशी 'बोलत' असतात. सुरूवातीला हे 'बोलणं' तर्कशुद्ध किंवा स्पष्ट नसतं. उत्तर - मग ती कविता असेल, रेणूचा आकार असेल, नवीन सिंफनी असेल किंवा गणिताचे सूत्र असेल - मेंदूमध्ये तयार होत असताना त्याचा जाणिवेला पत्ता नसतो. फक्त काही धूसर अशा कल्पना पृष्ठभागावर असतात. आणि मग एके दिवशी अचानक हवे ते भाग जोडले जातात आणि उत्तर जाणिवेत प्रकट होतं, याला आपण प्रतिभेचा आविष्कार म्हणतो. म्हणूनच लेखिका याचं वर्णन करताना म्हणतात, "In general, creativity is not a rational, logical process."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे उत्तर जाणिवेत आल्यावर कलाकारांना ते कुठून आलं याचा पत्ता नसतो. मग यालाच म्यूझ किंवा इन्स्पिरेशन असं नाव दिलं जातं. मोझार्टला आख्खी सिंफनी मन:चक्षूंवर दिसत असे, आणि सिंफनीचे सर्व भाग एकाच वेळी 'ऐकू' येत असत. हे मनासारखं झालं की तो फक्त सिंफनी कागदावर उतरवण्याचे काम करत असे. प्वंकारे जेव्हा जाणीवपूर्वक गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा उत्तर मिळायचे नाही. मग पडद्यामागचे काम संपले की अचानक त्याला हायपरजॉमेट्रिक सीरीजची सूत्रे डोळ्यापुढे दिसत असत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रतिभावंत मेंदूसाठी कोणते घटक आवश्यक आहेत याचे उत्तर देताना लेखिका काही सुचवण्या करतात. यात काही सुचवण्या सर्वांसाठी आहेत तर काही विशेषत: लहान मुलांसाठी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१. प्रतिभेचा संपर्क: इतिहासात विशिष्ट वेळी प्रतिभेच्या आविष्कारांचे स्फोट झाल्याचे बरेच पुरावे आहेत, चौथ्या-पाचव्या शतकातील ग्रीस किंवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील पॅरीस. इटलीमधील इ. स. १४०० - १७०० हा रेनेसान्स काळ एक ठळक उदाहरण. आजूबाजूला प्रतिभा असेल तर मेंदूला आपोआप चालना मिळते, नवीन विचारांची देवाणघेवाण होते. हवे ते करण्याचे स्वातंत्र्य, वेगळ्या वाटा चोखाळण्याची निकड, आर्थिक सुबत्ता यासारख्या गोष्टी प्रतिभेला निश्चितच मदत करणार्‍या ठरतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२. यूज इट ऑर लूझ इट : जिममध्ये तासनतास घाम गाळून बरेच लोक सिक्स प्याक कमावण्यावर भर देतात. मात्र शरीरातील सर्वात महत्वपूर्ण भागाला व्यायाम कसा मिळेल याचा जाणीवपूर्वक विचार क्वचितच होताना दिसतो. आपण मेंदू वापरला की &amp;nbsp;चेतापेशींची नवीन जाळी तयार होतात. जो भाग आपण वापरतो त्याचा आकार वाढतो. उदा. संगीतकारांमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागांचा आकार नेहेमीपेक्षा मोठा असल्याचे आढळले आहे. प्रत्येक नवीन कल्पना, नवीन पद्धत, नवीन तंत्र शिकल्यानंतर आपला मेंदू थोडासा बदलतो आणि हे आपल्या आयुष्यभर अव्याहतपणे चालत असते. मेंदू लवचिक करायचा असेल तर तुमच्या नेहेमीच्या क्षेत्रापेक्षा एखादे नवीन क्षेत्र निवडा आणि त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. तुम्ही आयटीमध्ये असाल तर इतिहासाचा अभ्यास करा. एखादी नवीन भाषा शिका, एखादे वाद्य वाजवायला शिका. मेंदूला चालना मिळेल असे काहीतरी करत रहा. या प्रकारच्या व्यायामाला वयाचे बंधन नाही. मेंदू लवचिक असेल तर अल्झायमरसारख्या रोगांपासून बचाव होण्यासही मदत होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
३. ध्यान (Meditation) - ध्यानासंबंधी बोलताना लेखिका म्हणतात,&lt;br /&gt;
&lt;blockquote class="tr_bq"&gt;
If you think that meditation is a silly practice that is performed primarily by warmed-over hippies, think again. The study of the effects of meditation on the brain has become a serious area of research in neuroscience, and it indicates that practicing meditation has measurable beneficial effects on brain function.&lt;/blockquote&gt;
बुद्ध भिक्षूंच्या मेंदूचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये ध्यान करताना लक्षणीय &lt;a href="http://www.pnas.org/content/101/46/16369.long"&gt;बदल&lt;/a&gt; आढळून आले आहेत. हे बदल ध्यान संपल्यानंतरही बराच काळ राहतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
४. टीव्ही बंद करा : विशेषत: लहान मुलांसाठी. टिव्हीवर नेहेमी दाखवल्या जाणार्‍या प्रतिमांचा एक परिणाम म्हणजे मुलांच्य जाणिवा बोथट होतात. त्याऐवजी लेखिका मुलांना वाचनाची सवय लावा असे सांगतात. मुलांना पुस्तके वाचून दाखवणे मूल पाच-सहा महिन्यांचे असतानाच सुरु करायला हवं. 'वाचाल तर वाचाल' हा क्लिशे आहे पण सत्य आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीप :&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
योगायोगाने पुस्तक वाचल्यावर आंतरजालावर मेंदूला व्यायाम देणारे &lt;a href="http://ankisrs.net/"&gt;अंकी&lt;/a&gt; हे सॉफ्टवेअर सापडलं. समजा तुम्ही एखादी भाषा शिकत असाल तर अंकी तुम्हाला रोज त्या भाषेतील काही शब्दांचा अर्थ विचारतं. रोज नवीन शब्द देणार्‍या बर्‍याच सायटी आहेत पण त्या शब्दाची उजळणी झाली नाही तर तो विस्मृतीत जाण्याची शक्यता अधिक. याचा मुख्य उपयोग नवीन भाषा, तिचे शब्द, व्याकरण लक्षात ठेवण्यासाठी आहे. याची उत्तरे देणे सोपे गेले की कठीण याची नोंद तुम्ही केल्यानंतर अंकी परत तो प्रश्न किती दिवसांनी विचारायचा हे ठरवतं. विशेष म्हणजे एखादा विषय तुम्हाला अवघड जात असेल (म्हणजे फार कमी उत्तरे बरोबर येत असतील) तर अंकी त्यावरच्या प्रश्नांची संख्या कमी करतं.&lt;br /&gt;
याउलट सोपा विषय असेल तर जास्त प्रश्न विचारले जातात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विविध उपलब्ध प्रकारांमधून तुम्हाला हवी ती प्रश्नावली उतरवून घेता येते. तयार प्रकारांमध्ये बहुतेक भाषेवर आहेत पण जीआरई, अमिनो ऍसिड पासून पायथॉन किंवा जावा अशा गोष्टींवरही प्रश्नावली दिसल्या. तुम्ही पाहिजे त्या विषयावर तुमची प्रश्नावलीही तयार करू शकता. याखेरीज विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे, देश-राजधान्या, रसायनशास्त्रातील समीकरणे वगैरे गोष्टी लक्षात ठेवायलाही याची मदत होईल. रोजच्या उजळणीला काही मिनिटे पुरतात.&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
चित्र ऍमेझॉनवरून साभार. &lt;br /&gt;
&lt;div&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-4492813557909240937?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/RWWvKgyFYhs" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/RWWvKgyFYhs/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/-E4GwnvmaKC0/TtnCBnQ3hUI/AAAAAAAAAaQ/ZdZvjkbM7qw/s72-c/creating-brain-neuroscience-genius-nancy-c-andreasen-hardcover-cover-art.jpg" height="72" width="72" /><thr:total>6</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/12/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-3649207564307985229</guid><pubDate>Fri, 25 Nov 2011 10:12:00 +0000</pubDate><atom:updated>2011-11-26T12:42:58.750+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">चित्रपट</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">मुलाखती</category><title>इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
आपल्याकडे कोणत्याही च्यानेलवरच्या मुलाखती पाहील्या तर मुलाखत घेणे या प्रकाराविषयी एकूणातच अनास्था दिसते. मुलाखत घेण्याचे उद्देश कोणते, ती कशी घ्यावी, कशी घेऊ नये अशा बर्‍याचशा महत्वाच्या मुद्यांचा विचारही केलेला दिसत नाही. अर्थात याचा अर्थ सगळेच मुलाखत घेणारे एकाच पातळीवर आहेत असा अजिबात नाही. करण थापर किंवा विनोद दुआसारखी मंडळी उत्तम मुलाखत घेतात मात्र त्यांचा उद्देश शोधपत्रकारिता असल्याने मुलाखतीचे क्षेत्र मुख्यत: प्रसिद्ध व्यक्तींना वादग्रस्त विषयांवर बोलते करणे आणि शब्दात पकडणे इथपर्यंतच मर्यादित राहते. यात वावगे काही नाही, पण इथे मुलाखतीचा एकच पैलू दिसतो. 'रॉंदेवू विथ सिम्मी गरेवाल' कडून अपेक्षा होत्या पण लवकरच मुख्य विषय अभिनेत्यांची कारकीर्द नसून त्यांचे खाजगी आयुष्य आहे हे लक्षात आले. अभिनेत्यांना नाजूक प्रश्न विचारायचे, मग त्यांच्या चेहेर्‍याचा क्लोजअप, त्यात त्यांचे डोळे ओलावले (खरे की खोटे सिम्मीच जाणे) तर दुधात साखर असले प्रकार पाहून उबग आला. 'कॉफी विथ करण'मध्ये जे काय चालते त्याला मुलाखत म्हणण्याची माझी छाती नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अर्थात परदेशी च्यानेलवरही फारसा वेगळा प्रकार नाही. लॅरी किंगचा 'सिक्टी मिनिट्स' उल्लेखनीय होता पण इथेही बरेचदा प्रकाशझोतात असणार्‍या व्यक्ती असायच्या आणि विषय वादग्रस्त, त्यामुळे मर्यादा यायच्या. बाकी 'एलेन डीजनरेस' किंवा 'डेव्ह लेटरमॅन' वगैरे प्रयत्न चांगले आहेत पण इथे मुलाखत हा एकच उद्देश नाही, दहा-बारा आयटम करायचे, त्यापैकी मुलाखतीला मिळणार सात मिनिटे, त्यात विचारणारा काय विचारणार आणि बोलणारा काय बोलणार. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे जे सगळे निष्कर्ष आहेत मुलाखत कशी असावी याचा आदर्श बघायला मिळाल्यानंतरचे आहेत. जपानमध्ये असताना एखादा इंग्रजी च्यानेल सापडतो का हे बघण्याच्या प्रयत्नात हा कार्यक्रम सापडला. एकदा सापडल्यावर त्याकडे पाठ फिरवणे अशक्य होते. मुलाखत कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्राव्हो च्यानेलवरचा '&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Inside_the_Actors_Studio"&gt;इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ&lt;/a&gt;' हा कार्यक्रम. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
'इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ' आणि वर उल्लेख केलेले आणि न केलेले कार्यक्रम यांच्यामध्ये बरेच मूलभूत फरक आहेत. या कार्यक्रमचा सह-निर्माता आणि होस्ट जेम्स लिप्टन हा स्वत: एक अभिनेता आहे. या मुलाखती पेस युनिव्हर्सिटी आणि&amp;nbsp; मायकेल शिमर सेंटर फॉर आर्टस यांच्या सहयोगाचे फलित आहेत. पेस युनिव्हर्सिटी इथल्या ऍक्टर्स स्टुडिओ ड्रामा स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील दिग्गज कसे काम करतात हे बघायला मिळावे हा या मुलाखतींचा मुख्य उद्देश आहे. मुलाखतींंचे शूटींग करताना वेळेचे बंधन नसते, नंतर यातून साधारण एक तास (किंवा जास्त) असा भाग संपादित केला जातो. मुलाखतीमध्ये मर्यादा ओलांडणारे कोणतेही वैयक्तिक प्रश्न विचारले जात नाहीत. मुलाखतीच्या आधी जेम्स लिप्टन ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती गोळा करतो. बरेचदा अभिनेते 'हे तुला कसे माहीत?' असे म्हणून आश्चर्यचकित झालेले दिसतात. पण इथेही अभिनेत्याला अवघडल्यासारखे वाटेल अशा गोष्टींचा उल्लेख चुकूनही केला जात नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जेम्स लिप्टन स्वत: कमीत कमी बोलतो आणि पाहुण्याला बोलतं करतो. हे करताना वातावरणात कुठेही उत्तरे मिळण्याची घाई दिसत नाही. एखाद्या प्रश्नाला पूर्ण उत्तर मिळाले नाही तर एखाद्या गुन्ह्याच्या मागावर असलेल्या डिटेक्टीव्हप्रमाणे त्याचा पाठपुरावा करणे असले प्रकार अजिबात नाहीत. कोणताही औपचारिकपणा न बाळगता दिलखुलास गप्पा पण त्यातही अवांतर टाइमपास न होऊ देता कलाकाराचे काम, त्याची त्याकडे बघण्याची दृष्टी, त्यामागची त्याची विचारसरणी अशा अनेक गोष्टी या गप्पांमध्ये सहजपणे समोर येतात. मधून-मधून कलाकाराच्या उल्लेखनीय चित्रपटांचे तुकडे दाखवले जातात, त्याच्या अनुषंगाने आणखी चर्चा होते. हे सगळे नेहेमीपेक्षा वेगळे आहे हे कलाकारांनाही जाणवते आहे हे स्पष्ट दिसते. टॉम हॅंक्स दुसर्‍यांदा या कार्यक्रमात आल्यावर उस्फूर्तपणे म्हणाला, "इथे यायला मला नेहेमी आवडतं. इतर कार्यक्रमांमध्ये बोलावल्यावर आमच्यावर स्टार म्हणून वागाण्याचं दडपण असतं. तीन मिनिटात हायपर होऊन आमच्या नवीन चित्रपटाबद्दल सांगायचं असतं. इथे तसं कोणतही दडपण नसतं."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या कार्यक्रमात हॉलीवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली आहे. कपोला, स्पिलबर्ग, जीन हॅकमन, रॉबर्ट रेडफर्ड, मेरील स्ट्रीप.. यादी मोठी आहे. सिंपसन किंवा एव्हरीबडी लव्हज रेमंड यासारख्या लोकप्रिय मालिकांचे कलाकारही इथे येऊन गेले आहेत. मार्लन ब्रॅंडो आणि कॅथरीन हेपबर्न यांनी मात्र बरेचदा विनंती करूनही येण्यास नकार दिला तर ग्रेगरी पेक यांनी अखेर विनंती मान्य केली पण त्यानंतर थोड्याच काळात त्यांचा मृत्यू झाला. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलाखत संपल्यावर लिप्टन पाहुण्यांना एका प्रश्नावलीत असलेले दहा प्रश्न विचारतो. ही प्रश्नावली फ्रेंच मुलाखतकार &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Bernard_Pivot"&gt;बर्नार्ड पिव्हो&lt;/a&gt; यांनी लेखक मार्सेल प्राउस्ट यांच्या प्रश्नावलीला आधार मानून तयार केली आहे.&amp;nbsp; तुमचा आवडता आणि नावडता शब्द कोणता, आवडता आणि नावडता आवाज कोणता या प्रकारचे हे प्रश्न असतात. यांची उत्तरे व्यक्तीमत्वाचे काही पैलू समोर आणतात असे मानले जाते. सर्वात शेवटी ड्रामा स्कूलचे विद्यार्थी पाहुण्यांना प्रश्न विचारतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सगळ्याच मुलाखती बघण्यासारख्या आहेत. मला सर्वात जास्त आवडलेल्या मुलाखतींपैकी एक &lt;a href="http://www.youtube.com/watch?v=evq8wnvTC3M"&gt;रॉबिन विलियम्सची&lt;/a&gt; होती. हा एकमेव पाहुणा असा होता ज्याच्यापुढे लिप्टनचे काहीही चालले नाही. याचे कारण आल्यापासूनच रॉबिन जो सुटला तो थांबायचे नावच घेईना. स्टॅंड अप कॉमेडी आणि इम्प्रॉव्ह साठी लागणारी विनोदबुद्धी, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा यावर तासभर बोलूनसुद्धा जे सांगता आले नसते ते त्याने करून दाखवले. हा कार्यक्रम दोन भागात सादर केला गेला. याखेरीज कपोला, डस्टीन हॉफमन, अल पचिनो, &amp;nbsp;क्लिंट इस्टवूड, &lt;a href="http://www.youtube.com/watch?v=bKKDKAKNH-k"&gt;केव्हिन स्पेसी&lt;/a&gt; अशा अनेक मुलाखती अनेकदा बघण्यासारख्या आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोणताही बडेजाव न करणारा साधा सेट, अगदी मोजके असे पार्श्वसंगीत, टीआरपी, प्रायोजक यांची&amp;nbsp; फिकीर न करता 'कंटेंट इज किंग' हे सूत्र मध्यवर्ती ठेवून तयार करण्यात आलेली ही मालिका खरे तर प्राइम टाइमला दाखवायला हवी. आपल्याकडच्या च्यानेलवर हा कार्यक्रम कुठे दिसतो का हे बघण्याचा प्रयत्न केला, शेवटी एका दुर्लक्षित च्यानेलवर सापडला. वेळ होती शनिवारी सकाळी ८.३०! सुदैवाने युट्यूबवर याचे बरेच भाग आहेत. ग्लॅमरच्या मुखवट्यामागे दडलेला&amp;nbsp; कलाकार, त्याचा प्रवास, कलेच्या साधनेमध्ये अत्युच्च पातळी गाठण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न हे सर्व बघायचे असेल तर ही मालिका जरूर पहावी. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-3649207564307985229?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/aOI1QK2n6Xc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/aOI1QK2n6Xc/blog-post_25.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>3</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/11/blog-post_25.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-2463735222636036408</guid><pubDate>Fri, 18 Nov 2011 08:57:00 +0000</pubDate><atom:updated>2011-11-18T16:07:34.490+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">समाज</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतर</category><title>बोले तो तू करता क्या है मामू?</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
हल्ली मला हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. "तू काय करतोयस?" लोक ओळखीचे असतील तर 'य' असतो, पहिल्यांदा भेटत असतील तर नसतो. :)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
खर तर हा प्रश्न साधा आहे आणि ९९.९९% लोक याचे उत्तर "मी इथे आहे, मी तिथे अमुक करतो" असे देतात. सध्या माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे उत्तर बदलणारे आहे कारण मी याचे खरे उत्तर द्यायचे ठरवले तर "मी फ्रेंच शिकतोय" किंवा "मी लेख लिहीतो" असे द्यावे लागेल. तसे देऊन बघितले पण लोकांचे समाधान होईना. मग काही लोक आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न करतात, "तू एक्झॅक्टली काय करतोयस?" (एक्झॅक्टली बोल्ड टायपात.) मला त्यांचा रोख कळतो पण तरीही मी समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. का ते हे घडाभर तेल संपल्यानंतर कळेल अशी अपेक्षा आहे. (खरं तर या भागात नुसते तेलच आहे, जगाची तेल-समस्या इथे सुटायला हरकत नाही.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विज्ञान विषयात पीएचडी, नंतर काही वर्षे संशोधन असे केल्यानंतर ठराविक पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये पर्मनंट पोझिशन घेऊन संशोधन करणे किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी - तिथे संशोधन आणि शिकवणे दोन्ही करावे लागते किंवा एखाद्या कंपनीत नोकरी. माझ्या बरोबरच्या सर्व मित्रमैत्रिणिंंनी यापैकी एखादा पर्याय निवडलेला आहे. मला तीनही पर्याय मान्य नव्हते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिकवण्यासाठी जो अमाप संयम लागतो तो माझ्याकडे नाही. कंपनी जे म्हणेल त्यावर काम करायचे आणि थांब म्हणले की थांबायचे हे मला जमणारे नाही. आणि फक्त संशोधन करायचे म्हटले तर ते ही शक्य नाही कारण -कारण हल्ली मला रिसर्च बोअर होतो. हे कारण माझ्या काही प्राध्यापकांना सांगितल्यावर त्यांचे आश्चर्यचकित चेहेरे अजूनही आठवतात. (विकट हास्य)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रिसर्च कंटाळवाणा का वाटू लागला याचीही बरीच कारणे आहेत. &lt;br /&gt;
१. जसजसे तुम्ही अधिकाधिक सिनियर होत जाता, तसतसे तुम्हाला प्रयोगशाळेत काम करण्याची संधी कमीकमी होत जाते. मग पीएचडीचे विद्यार्थी, अंडरग्रॅड्स यांना मार्गदर्शन करणे, मिटिंगा अटेंड करणे, रिपोर्ट लिहीणे, पेपर लिहीणे अशी कामे वाढू लागतात. नंतर नंतर तुम्ही नुसती देखख करता. मला ही बाकीची कामे कंटाळवाणी वाटायला लागली. ही आवश्यक आहेत हे खरेच पण ती करताना माझा वेळ वाया जातो आहे असे वाटायला लागले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२. पीएचडी किंवा स्पेशलायझेशन ही दुधारी तलवार आहे. एखाद्या क्षेत्रात तुम्ही खोल जाण्याचा निर्णय घेता तेव्हाच इतर क्षेत्रे बंद करण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. याची परिसीमा म्हणजे मी प्रोब मायक्रोस्कोपीच्या एका शाखेमध्ये संशोधन करत असलो तर इतर काही शाखांमध्ये काय चालले आहे हे मला कळते पण त्यापलिकडे नोंद ठेवणे अशक्य. मग पदार्थविज्ञानाच्या इतर शाखांमध्ये&amp;nbsp; किंवा रसायनशास्त्र/ जीवशास्त्र यांचे काय चालले आहे हे कळणे दुरापास्तच. (अगदी जागतिक दर्जाचे संशोधन झाले तर कळते, उदा. नुकताच प्रकाशाचा वेग ओलांडला गेला अशी बातमी आली.) जसजसे मी खोल जायला लागलो, तसतसे हे मला जाचक वाटू लागले. कारण माझे आवडीचे विषय वाढत होते, त्यात फक्त विज्ञानच नव्हे तर भाषा, इतिहास, साहित्य असे विषय यायला लागले. विविध क्षेत्रांमध्ये जाणून घेण्यासारख्या इतक्या गोष्टी असताना फक्त एका छोट्या विषयावर आपले आयुष्य खर्च करणे हा मला वेळेचा अपव्यय वाटू लागला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
३. माझा निर्णय सध्याच्या आपल्या व्यवस्थेच्या विरूद्ध एक छोटीशी बंडखोरी आहे. या व्यवस्थेमध्ये तुम्ही एकदा एक मार्ग पत्करला की परत फिरण्याची मुभा नाही. (इथे गॉडफादर आठवतो, एकदा त्या मार्गाला लागलात की सुधारणे नाही. :) ) मला हे पटत नाही. अर्थात ज्यांना तो मार्ग पत्करायचा आहे त्यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. पण एखाद्या क्षेत्रामध्ये पुरेसा काळ घालवल्यानंतर त्या क्षेत्राचा कंटाळा आला तर काय करायचे याला आपल्या व्यवस्थेकडे उत्तर नाही. पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Leonardo_da_Vinci"&gt;दा विंचीसारखे&lt;/a&gt; लोक काय-काय होते याची यादी पाहिली तर छाती दडपते. (चित्रकार, शिल्पकार, वास्तुशात्रज्ञ, संगीतकार, गणितज्ञ, इंजिनियर, भूगर्भशास्त्रज्ञ, लेखक, इ. इ.) इथे दा विंचीच्या प्रतिभेशी तुलना करण्याचा हेतू नाही, तो वेडेपणा ठरेल. मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते. त्या काळात सर्वांना चित्रकला ते शेती - कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य होते. सध्याच्या स्पेशलायझेशनमुळे हे स्वातंत्र्य हिरावले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
४. तुम्ही जे काम करता ते तुम्हाला आवडते की नाही हे शोधण्याचा एक सोपा मार्ग आहे. जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात विकांताची आतुरतेने वाट पहात असाल आणि जर सोमवार म्हटले की नको वाटत असेल तर तुमचे काम तुम्हाला आवडत नाही असे मानायला हरकत नसावी. कल्पना करा, पिकासो 'आज कंटाळा आलाय, आज नाही चित्र काढत' असे कधी म्हणाला असेल का? परत, तुलना पिकासोशी नाही. पिकासोने जो मार्ग निवडला त्याच्याशी आहे. हे बरेचसे 'थ्री इडियट्स' सारखे आहे मात्र हा विचार मात्र चित्रपट यायच्या बराच आधीपासून डोक्यात चालू होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
५. प्रयोगशाळेत काम करतानाही बराच वेळ इतर गोष्टींध्येच जातो. जपानमध्ये निर्वात चेंबरमध्ये टायटॅनियम डायऑक्साइडचे एसटीएम इमेजिंग करायचे होते. यासाठी त्याचा पृष्ठभाग स्वच्छ हवा. किती स्वच्छ? त्यावर दुसरा कोणताही अणू दिसायला नको. हे कसे करायचे तर टायटॅनियम डायऑक्साइड एका विशिष्ट तपमानार्यंत तापवायचे, मग त्यावर आयनचा मारा करायचा, परत तापवायचे, परत आयन. असे चक्र पृष्ठभाग स्वच्छ होईपर्यंत करायचे. याला किती वेळ लागला? तीन महिने. तीन महीने सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत (जेवण इ. सोडून) मी फक्त हेच काम करत होतो. तीन महिन्यानंतर पहिली इमेज घेता आली. हे चालू असताना मला माझे आयुष्य कणाकणाने कमी होत असल्याचे जाणवत होते. :)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अर्थात आपले क्षेत्र सोडण्याचा निर्णय सोपा नाही हे मान्यच. किंबहुना माझ्यावर कोणतीही जबाबदारी नसल्याने मी हा निर्णय घेऊ शकलो पण अन्यथा हे शक्य झाले नसते याचीही जाणीव आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"मग तुला करायचय तरी काय?" [१]&lt;br /&gt;
असा प्रश्न उघड विचारत नाहीत, पण मनातल्या मनात विचारलेला मला ऐकू येतो. (इकट हास्य)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मला अजून पाच एक तरी भाषा शिकायच्या आहेत. दहा-एक हजार पुस्तके वाचायची आहेत. जी पहिली भाषा जाणीवपूर्वक शिकलो (इटालियन) तिच्यामध्ये असलेले &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Italo_Calvino%20"&gt;इतालो काल्विनोसारखे&lt;/a&gt; बाप लेखक मूळ भाषेत वाचायचे आहेत. या सर्वांबद्दल लिहायचे आहे. विषय आवडीचा असेल तर लेख लिहीणे मला कधीही कंटाळवाणे वाटत नाही. (त्याचा प्रत्यय इथे दिसतोच आहे.) अजूनही काही गोष्टी डोक्यात आहेत पण सगळेच आता सांगितले तर पुढे मजा काय? आम्ही सेंट रामदासांना फॉलो करतो,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"फर्स्ट डू बाबा, देन टेल ना." :) &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
[१] हे लिहीत असताना कोणते गाणे चालू असावे? &lt;br /&gt;
ऐ दिल-ए-नादां&lt;br /&gt;
आरजू क्या है &lt;br /&gt;
जुस्तजू क्या है&amp;nbsp; :)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-2463735222636036408?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/UYPmTmLbriE" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/UYPmTmLbriE/blog-post_18.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>12</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/11/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-6346062875778092816</guid><pubDate>Fri, 11 Nov 2011 08:49:00 +0000</pubDate><atom:updated>2011-11-15T22:17:30.127+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">चित्रपट</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">संगीत</category><title>रॉकस्टार</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
काय बोलायचं? जितकी प्रशंसा करणं शक्य आहे ती आधीच &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2010/08/blog-post.html"&gt;करून झाली&lt;/a&gt; आहे. आता नवीन शब्द कुठून आणायचे? तेवढी प्रतिभा असती तर काय पाहिजे होतं?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;/div&gt;
रहमान आणि आताचे इतर भारतीय संगीतकार म्हणजे जणू अंबानी आणि कोपर्‍यावरचा किराणा दुकानदार, सचिन आणि मकरंद साळगावकर (भोकरवाडी टीमचा क्याप्टन), टर्मिनेटर आणि आर-ए १, गॉडफादर आणि धर्मात्मा (आई ग!). असो, तुम्हाला बिंदू कळला असेल. हा माणूस जादूगार आहे. आपण फक्त त्याच्या पोतडीतून काय काय येते आहे ते ऐकत रहायचे आणि आनंद लुटायचा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या पोतडीतून निघालेला लेटेश्ट आविष्कार म्हणजे रॉकस्टार. रहमानची गाणी ऐकताना नेहेमीप्रमाणे आपल्या ऐकण्यात बदल होत जातात. पहिल्यांदा वाटतं, काय केलय हे? ह्याला गाणं म्हणायचं? नंतर एक दोनदा ऐकलं की ते गाणं आपोआप मनात वाजायला लागतं आणि तुम्हाला कळायच्या आत तुम्ही त्या गाण्याचे पंखे होऊन जाता. मग वाटतं, हे गाणं आपल्याला पहिल्यांदा आवडलं नव्हतं? कसं शक्य आहे आहे हे? आमिर खान एका मुलाखतीत म्हणाला होता, "रंगीलाच्या वेळेस रामू गाण्यांची कॅसेट घेऊन माझ्याकडे आला आणि आम्ही 'मंगता है क्या, वो बोलो' ऐकत होतो. मी रामूला म्हणालो, 'हे काय आहे? तू चुकून साउथच्या गाण्याची कॅसेट तर नाही आणलीस?' चार-पाच वेळा ऐकल्यावर ते गाणं आमच्या रक्तात भिनलं."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
असं का होतं याची बरीच कारणं आहेत. एक तर रहमान कधीही नियम पाळत नाही. त्याच्या गाण्यात पुढच्या ओळीत, अंतर्‍यात काय असेल याची कल्पना करणं अशक्य असतं. म्हणूनच जुन्या रूढी प्रिय असणार्‍या लोकांना रहमान भावत नाही. मग त्याच्यावर सिंथेटीक असल्याचा शिक्का मारला जातो. लगान, भगतसिंग किंवा रंग दे बसंतीच्या संगीताला सिंथेटीक कसे म्हणता येईल हे तो दयाघन प्रभूच जाणे. टीकाकारांचे मुख्य ध्येय टीका करणे असते, त्यात सत्याचा अंश किती ही बाब गौण असते. म्हणूनच सत्यजित रेंवर गरीबीचे भांडवल केल्याचा आरोप होतो, 'खालील अशुद्ध बंगालीतील उतारा शुद्ध बंगालीत लिहा' असे म्हणून परीक्षेत टागोरांचा उतारा घालण्यात येतो आणि बेथोवनची नववी सिंफनी ऐकताना मला जागे रहाणे अशक्य झाले असे एक &lt;a href="http://www.lucare.com/immortal/9_critics.html"&gt;टीकाकार&lt;/a&gt; म्हणतो. या सर्वांमध्ये एक समान धागा आहे. हे सर्व लोक चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन, वेगळे देण्याचा प्रयत्न करीत होते. सत्यजित रेंनी 'पाथेर पांचाली' बनवताना तत्कालीन बंगाली सिनेमातील बटबटीत मेलोड्रामा कटाक्षाने टाळला, टागोरांची वैश्विक जाणीव क्षुद्र मनांच्या कुवतीबाहेरची होती आणि क्लासिकल संगीताचे नियम धाब्यावर बसवून बेथोवनने 'सेल्फ एक्सप्रेशन'चा घालून दिलेला पायंडा काळाच्या पुढे होता. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-a6g6Ys64e30/Trzj-WtcD3I/AAAAAAAAAYs/0AY61FZBrMQ/s1600/220px-Rockstar2011.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="292" src="http://4.bp.blogspot.com/-a6g6Ys64e30/Trzj-WtcD3I/AAAAAAAAAYs/0AY61FZBrMQ/s320/220px-Rockstar2011.jpg" width="220" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
गेली काही वर्षे रहमान जागतिक पातळीवर संगीत देतो आहे आणि याचे पडसाद त्याच्या संगीतामध्ये दिसतात. रॉकस्टार हा चित्रपट नावाप्रमाणेच एका गायकाच्या प्रवासावर आधारीत आहे. यात रहमानने तब्बल १३ गाणी दिली आहेत आणि प्रत्येक गाणे वेगळे आहे. मुख्य गायक म्हणून मोहीत चौहानने कमाल केली आहे. मसक्कलीमध्ये जी त्याच्या आवाजाची कसोटी लागली होती तो ट्रेलर होता. रॉकस्टारची गाणी गायल्यावर त्याला डबल मॅरॅथॉन केल्यासारखे वाटले असणार. 'शहर में' किंवा 'हवा-हवा' मध्ये किशोरच्या यॉडलिंगची आठवण करून देणार्‍या करामती आहेत. ('शहर में' मधला शेवटचा गिटार पीस ऐकून क्षणभर &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2008/06/i-want-my-mtv.html"&gt;मार्क नॉफलरच&lt;/a&gt; अवतरला की काय असे वाटले.) इथे किशोरदा आणि रहमान एकत्र आले असते तर बहार आली असती असा विचार मनात येतो. रॉकस्टार नाव असूनही रहमानने सर्व गाणी रॉकच्या मुशीत बसवलेली नाहीत. 'सड्डा-हक' हिंदी चित्रपटातील पहिले रॉक गाणे म्हणून ओळखले जावे. (अवधूत गुप्तेंचा 'कांदेपोहे' हा मराठीतील प्रयत्न उल्लेखनीय होता. मराठी रांगडी भाषा आहे हे खरेच, मात्र भूतका&lt;b&gt;ळ&lt;/b&gt;च्या आणि अ&lt;b&gt;ट्ट&lt;/b&gt;हास हे शब्द टाळता आले नसते का?) 'कुन-फायाकुन' ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात बसून ऐकत आहोत असं वाटतं तर 'कतेयां करू, कतेयां करू' बाबा बुल्लेशाहची आठवण करून देतं. (ही बाबा बुल्लेशाह यांची रचना असावी कदाचित, गाण्यात 'यारा बुल्ले लुटियां करूं' असा उल्लेख आहे.) गाण्यातील रहमानच्या प्रयोगांबद्दल काय बोलावे? अरेबिक संगीत, फ्लेमेंको ते पारंपारिक कव्वाली - या माणसाला काहीही वर्ज्य नाही. रॉकस्टारची गाणी तब्बेतीने ऐकण्यासारखी आहेत. त्यातील करामती, लटके-झटके लक्षात यायलाही वेळ लागतो. 'शीला की जवानी' साडेतीन मिनिटात ऐकून होते, तसे इथे नाही. हे संगीत अंगात मुरावे लागते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रहमान त्याच्या टिकाकारांना क्वचितच उत्तर देतो, उत्तर द्यायला त्याला वेळही नाही. कुंथून कुंथून वर्षाला कशाबश्या एक-दोन चाली पाडणार्‍या संगीतकारांमध्ये तो नाही. प्रतिभेची अभूतपूर्व देणगी असूनही त्याच्यामध्ये गर्वाचा अंशही नाही. (इथे चाली चोरणे हा धर्म मानणारे काही 'बाजीगर' संगीतकार आठवतात.) रहमान काय किंवा बेथोवन काय, अशा लोकांना दुसर्‍या एका साहेबांचा [१] डायलॉक फिट्ट बसतो,&lt;br /&gt;
&lt;blockquote class="tr_bq"&gt;
हम भी वो है जो कभी किसी लाइन में खडे नही होते.&lt;br /&gt;
जहां हम खडे होते है, लाइन वहीं से शुरू होती है.&lt;/blockquote&gt;
तळटीपा&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[१] या साहेबांचे जुने चित्रपट कितीही वेळा बघावेसे वाटतात. सध्या ते काय करतायत त्यांनाच माहीत. मात्र त्यांचा आवाज अजूनही लाजबाब आहे. 'मगर' हा शब्द फक्त त्यांनी आणि त्यांनीच म्हणावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
चित्र विकीवरून साभार.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-6346062875778092816?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/b_RZ9ga6yws" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/b_RZ9ga6yws/blog-post_11.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-a6g6Ys64e30/Trzj-WtcD3I/AAAAAAAAAYs/0AY61FZBrMQ/s72-c/220px-Rockstar2011.jpg" height="72" width="72" /><thr:total>7</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/11/blog-post_11.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-7363513748327272400</guid><pubDate>Fri, 04 Nov 2011 08:15:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-08T13:21:34.392+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भाषा</category><title>... आणि हॅरी पॉटर मेला</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
पुस्तकांच्या दुकानात हॅरी पॉटरचा मराठी अनुवाद दिसला, उत्सुकतेने चाळायला घेतला आणि "जमीन फटने लगी, आसमान टूट पडा और हमारी आंखों के आगे अंधेरा छाने लगा." (याचा संदर्भ माहीत नसेल तर स्वत:ला हिंदी सिनेरसिक समजणे बंद करा.) तर असे व्हायचे कारण म्हणजे पुस्तक चाळताना आम्ही जे पान उघडले त्या पानावर नेमका हॅरी आणि व्होल्डमॉर्ट यांच्यातील अंतिम सामना होता. व्होल्डमॉर्ट हॅरीवर नेम धरतो आणि ओरडतो, "मृत्युदंश!"&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मृत्युदंश?मृत्युदंश?? हॅरीला त्याच्या आईच्या प्रेमाने संरक्षण दिले होते, पण त्याने जर हा शाप ऐकला असता तर बिचारा जागीच हाय खाऊन आईला भेटायला गेला असता. मृत्युदंश?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अनुवाद करणारा किंवा करणारी यांच्यावरची जबाबदारी फार महत्वाची आणि नाजुक असते. मूळ कथेतील गाभ्याला कोणताही धक्का न लागू देता, त्या कथेतील संवाद आणि वर्णन आपल्या भाषेत आणायचे असते. इथे प्रत्येक तपशिलाचे रूपांतर करायचे किंवा नाही हा निर्णय क्रिकेटमधील नो बॉलप्रमाणे असतो. पाय थोडा पुढे गेला तर चालून जाते पण अर्ध्याहून अधिक पुढे गेला तर चालत नाही. मृत्युदंश हा सरळसरळ नो बॉल आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हॅरी राहतो लंडनमध्ये, बोलतो इंग्रजी. अनुवादात तो मराठी बोलतो आहे पण ते केवळ वाचकांच्या सोईसाठी. असे असताना शाप देताना मात्र त्याच्या तोंडी संस्कृत शाप येतात? ही कोणती जादू आहे? हॅरी पॉटरमधील मंत्र हे त्या कथानाकाचे अविभाज्य भाग आहेत. ते बदलणार असाल तर मग पुढे जाऊन हॅरी पॉटरचे हरी पाटील करा, त्याला मुंबईत आणा, दादरच्या शाळेत घाला (अभिनव जादूविद्यालय?), व्होल्डमॉर्टचे विक्राळ विंचू (छकुला..छकुला..छकुला!) करा, त्याला धारावीमध्ये टाका. वाटच लावायची आहे तर सगळीच लावून टाका. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मृत्युदंश हे ज्याचे रूपांतर आहे तो मूळ शाप अव्हादा केदाव्रा (Avada Kedavra) असा आहे. याचे मूळ आरेमैक भाषेत आहे. हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी बघितली तर रिड्डीक्युलस हा एकमेव मंत्र इंग्रजीमध्ये आहे. बाकी बहुतेक सर्व &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/List_of_spells_in_Harry_Potter"&gt;मंत्र&lt;/a&gt; लॅटीन किंवा इटालियन भाषांमधून घेतलेले आहेत. फिनिते इनकंटाटम, इंपेडिमेंटा, प्रोतेगो, एक्सपेलियार्मस. रोलिंगबाईंनी असे का बरे केले असेल? त्यांना इंग्रजी भाषेत मंत्र तयार करणे अवघड होते का?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रोलिंगबाईंनी असे केले याचे कारण त्यांची विविध भाषांची जाण सखोल आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इंडो-युरोपियन भाषांमध्ये लॅटीनमधून आलेल्या रोमान्स भाषा (इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीझ, रोमानियन आणि कातालान या मुख्य भाषा) आणि जर्मेनिक भाषा (इंग्रजी, जर्मन, स्विडीश, डॅनिश) असे दोन प्रमुख गट पडतात. या दोन गटात अनेक फरक आहेत, त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे रोमान्स भाषा, विशेषत: इटालियनमध्ये प्रत्येक शब्दात स्वरांची रेलचेल आहे. 'के सरा सरा' गाताना स्वर कितीही वेळ लांबवता येतो. ऑपेराचा जन्म इटलीमध्ये झाला हा अपघात नव्हता, त्याला इटालियन भाषेचा नादमधुर स्वभाव कारणीभूत होता. याउलट जर्मनसारख्या भाषेत व्यंजनांचा सुळसुळाट आणि तीही इंग्रजीत ज्याला 'हार्ड' म्हणतात तशी कठीण व्यंजने. यामुळे जर्मन भाषेत स्वर लांबवता येणे शक्यच नाही, ही खटक्यांची भाषा आहे. परिणामत: जेव्हा जर्मन लोकांनी इटालियन ऑपेरा आपल्या मातृभाषेत नेला तेव्हा त्यांना ते करताना मूलभूत बदल करावे लागले. इटालियन ऑपेरा गाणी आणि गायक यांच्यावर विसंबून असतो, जर्मन ऑपेरामध्ये ते शक्य नव्हते म्हणून वाद्यवृंदाला अधिक महत्व प्राप्त झाले. मोझार्ट आणि वॅग्नर यांच्या ऑपेरांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे त्याचे मूळ या दोन भाषांच्या वेगळ्या स्वभावामध्ये आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जर्मन लोकांनी इटालियन ऑपेराची नक्कल करून त्यांच्या ऑपेरात तसेच गायचे ठरवले असते तर काय झाले असते? त्यांचा मृत्युदंश झाला असता. अव्हादा केदाव्रा या दोन्ही शब्दांचा शेवट आ मध्ये होतो. म्हणून व्होल्डमॉर्ट 'अव्हादाsssss केदाव्राsssss' असे ओरडतो तेव्हा त्याला शेवटचा आ कितीही वेळ लांबवता येतो. ज्याच्यावर कोणताही उपाय नाही असा शाप म्हणायची पद्धतही तितकीच प्रभावी असायला हवी. असे मृत्युदंशमध्ये करून बघा करता येते का? एकतर या शब्दामध्ये कठीण व्यंजने आहेत, स्वरांचा पत्ता नाही आणि शेवटचा श संपला की पुढे काही नाही. हा शाप न वाटता रेलवे स्टेशनवर 'एक दादर' असे म्हटल्यासारखे वाटते. इतर शापांची काय वाट लावली आहे हे बघण्याचे धैर्य झाले नाही हे इथे नमूद करावेसे वाटते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नवीन शब्द शोधताना संस्कृतकडे धावणे या अगम्य सवयीची परिणिती मृत्युदंशमध्ये झाली आहे. आपली भाषा म्हणजे २४ क्यारट सोन्यासारखी शुद्ध, त्यात परकीय शब्द म्हणजे भेसळ असे समज जोपर्यंत कायम आहेत तोपर्यंत असेच होत रहाणार. खरे तर संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालणार्‍या ज्या काही थोड्या पद्धती अस्तित्वात आहेत त्यात भाषा येतात. मारून मुटकून भाषेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण इतिहासात नाही. १९८४ सारखे 'थॉट पोलिस' असतील तर गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षात असेही प्रयत्न टिकत नाहीत हे &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Dissolution_of_the_Soviet_Union"&gt;१९९१&lt;/a&gt; मध्ये दिसलेच.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शेक्सपियर किंवा तुकाराम यांनी भाषेला भरपूर दिले, समृद्ध केले पण हे करताना त्यांचा हेतू भाषा सुधारणे हा नव्हता. त्यांनी भाषा हे संवादाचे एक माध्यम आहे हे जाणले आणि त्यात गरज पडली तसे बदल केले. ते करण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती. एका भाषेतील शब्दा-शब्दामागे त्या समाजाचे आर्थिक, सामाजिक, नैतिक संचित उभे असते. लोकांमुळे भाषा घडते, हस्तिदंती मनोर्‍यात बसून भाषेच्या चर्चा करणारे पंडित भाषेचे अंतिम स्वरूप ठरवत नाहीत, ठरवू शकत नाहीत. म्हणूनच प्रत्येक भाषेच्या व्याकरणाच्या नियमांमध्ये अपवादच जास्त असतात. 'यू वॉज' न होता 'यू वेअर' होते. लोक जशी भाषा वापरतात तसे व्याकरणाला बदलावे लागते [१] आणि यामुळेच प्रत्येक भाषेला तिचा स्वभाव येतो. नाहीतर कोबोलपासून जावापर्यंत दिले ते काम चोख करणार्‍या भाषा आहेतच की. पण त्या भाषांमध्ये&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;blockquote class="tr_bq"&gt;
जब कि तुझ बिन नही कोई मौजूद,&lt;br /&gt;
फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है?&lt;/blockquote&gt;
लिहीता येईल का? भाषा प्रवाही असते. नायगाराला (किंवा तेवढेही परकीय उदाहरण नको असेल तर गंगा [२]) बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर बांध फोडून तो कुठूनही बाहेर पडतो.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिरीष कणेकरांच्या एका पुस्तकात 'देवदास कधी मेला' या प्रश्नाचे उत्तर एका बुजुर्गांनी 'दिलिपकुमारने त्याला पडद्यावर आणला तेव्हा' असे दिल्याचे स्मरते. (त्यांनी शाहरूखचा देवदास पाहिला असता तर काय म्हटले असते कुणास ठाउक!)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तसेच हॅरी पॉटर कधी मेला या प्रश्नाचे उत्तर आहे, 'मृत्युदंश ऐकल्यावर.'&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीपा&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[१] गेल्या हजार वर्षात इंग्रजी भाषेचे स्वरूप किती बदलले याचे &lt;a href="http://www.xibalba.demon.co.uk/jbr/futurese.html"&gt;उदाहरण&lt;/a&gt; रोचक आहे. हजार वर्षात परकीय शब्द, व्याकरण यांचा अर्थ किती संकुचित होतो हे इथे दिसते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
1000 AD:&lt;br /&gt;
Wé cildra biddaþ þé, éalá láréow, þæt þú taéce ús sprecan rihte, forþám ungelaérede wé sindon, and gewæmmodlíce we sprecaþ...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
2000 AD:&lt;br /&gt;
We children beg you, teacher, that you should teach us to speak correctly, because we are ignorant and we speak corruptly...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याचे आणखी एक उदाहरण &lt;a href="http://www.youtube.com/watch?v=MeTG2eDmTzs&amp;amp;feature=related"&gt;इथे&lt;/a&gt;. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[२] आयच्या गावात, 'मेमरी चार्म' ने आठवणी बदलता आल्या असत्या तर किती बरे झाले असते. गंगा म्हटले की आम्हाला घ..घ..घईचा प..प..परदेस आठवतो. शिरां पडलां त्यांच्या तोंडार तो! &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-7363513748327272400?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/58w1YxpM-q8" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/58w1YxpM-q8/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>18</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/11/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-1719650282487205557</guid><pubDate>Wed, 26 Oct 2011 03:41:00 +0000</pubDate><atom:updated>2011-10-26T11:30:27.877+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">विनोद</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भंकसगिरी</category><title>एलेमेंटरी, माय डिअर..</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
सहारा वाळवंटातल्या एका लहानशा खेड्यात आपलं आयुष्य काढलेला एक माणूस पहिल्यांदा शहरात मुलाकडे गेला. त्याचा पोरगा उत्साहाने त्याला मोठ्या पडद्यावर "टायटॅनिक" दाखवायला घेऊन गेला. &lt;br /&gt;
चित्रपट संपल्यावर त्याने आतुरतेनं बापाला विचारलं, &lt;br /&gt;
"काय, आवडला का?"&amp;nbsp; &lt;br /&gt;
"हो तर," बाप म्हणाला, "इतकं मुबलक पाणी असल्यावर कुणाला नाही आवडणार?"&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे आठवायचं कारण शेरलॉक होम्सच्या कथा बघताना आणि वाचताना लोक त्याच्या प्रखर बुद्धीमतेमुळे, अजोड तर्कामुळे प्रभावित होतात, मात्र आमचं लक्ष भलतीकडेच असतं. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जेव्हा बघावं तेव्हा होम्स[१] त्या बिचार्‍या मिसेस हडसनना [२] दुस्वासाने वागवत असतो. कल्पना करा, त्यांच्या जागी एखादी भारतीय मोलकरीण असती तर?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्स : वॉटसन, आता एक क्षणही दवडून चालणार नाही. तो लंडनचा नकाशा या टेबलावर पसर. गंगूबाई[३], गंगूबाई, किती पसारा झाला आहे या टेबलावर? &lt;br /&gt;
गंगूबाई : पसारा झालाय तर मी काय करू? द्येवानं दोनच हात दिलत की मला. सकाळधरनं उभी हाय मी, कंबरेचा काटा ढिला झालाय निस्ता. सुनामी आल्यागत घरात पसारा करून ठेवायचा आन मग गंगूबाईला आवरायला सांगायचा. आन ह्या आठवड्यात बोनस देनार हुते त्याचं काय झालं? उद्यापर्यंत बोनसचं बघा नायतर मोरियार्टीकडं खुल्ली ऑफर हाय मला! नंतर म्हनू नगा, न सांगता गेली म्हनून. जाते आता, पोरगं यायचय शाळेतून. किचनमधी कपबश्या पडल्यात, त्या धुऊन ठेवा, उद्यापर्यंत र्‍हायल्या तर मुंग्या लागतील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्स कपाळ बडवून घेतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या कथांमधील दुसरे आश्चर्यजनक पात्र म्हणजे टांगेवाले. कधीही, कुठेही जायला एका पायावर तयार असतात. बरं, भाड्याविषयी चकार शब्द काढत नाहीत. जे दिलं ते निमूटपणे घेतात, थांबावं लागलं तर वेटींग चार्जही लावत नाहीत. त्या जागी पुण्याचा टांगेवाला असता तर?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्स : (वॉटसनबरोबर धावत येत) मित्रा, चल लवकर. रेल्वे स्टेशन.&lt;br /&gt;
टांगेवाला होम्स आणि वॉटसनला बाजूला व्हा अशी खूण करतो. ते लगबगीने बाजूला होतात तसा तो दोन बोटांनी ओठांसमोर 'व्ही' चा आकार करून दोघांच्या मधून पानाची पिंक टाकतो आणि जिभेने 'चक्क' असा आवाज करतो.&lt;br /&gt;
होम्स : म्हणजे?&lt;br /&gt;
टांगेवाला : जमनार नाय.&lt;br /&gt;
वॉटसन : जमणार नाही? अरे बाबा, हा कुणाच्या तरी जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
टांगेवाला : रेलवे ठेसन म्हंजी मला उलट पडतय, तिकडून सवारी भेटत नाय. मधे अंधार हाय, घोडं बिचकतं.. हाफ रिटन पडेल बघा..&lt;br /&gt;
वॉटसन : हे बघा, तुम्ही कायद्याने असे करू शकत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
टांगेवाला : ओ सायेब, बिधास कंप्लेंट करा ना. आपन कुनाला डरत नाय. आन यवढ्या रातचं ठेसनला जाताच कशापायी तुम्ही, सकाळी जावा की आरामशीर.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्स परत कपाळ बडवून घेतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्सच्या अजरामर कथांमधील एक म्हणजे 'ऍबी ग्रेंजचे प्रकरण'. हा प्रसंग पुस्तकात नाहीये मात्र मालिकेत आहे. यात होम्स आणि वॉटसन रेलवे स्टेशनच्या बाकावर बसलेले असतात. &lt;br /&gt;
होम्स म्हणतो "आपली गाडी आली." &lt;br /&gt;
वॉटसन म्हणतो, "मला तर गाडीचा आवाज नाही आला." &lt;br /&gt;
मग होम्स म्हणतो, "मलाही नाही आला." पण त्याला गाडीचा धूर दिसला, हातात हिरवे निशाण घेतलेला गार्ड दिसला, त्यावरून त्याने अनुमान काढलं, वगैरे वगैरे, नेहेमीची शायनिंग. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जर इथे आपली भारतीय रेलवे[४] असती तर?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"आपली गाडी आली." होम्स.&lt;br /&gt;
"होम्स, गाडी येते आहे हे खरे आहे. पण ती कालची गाडी आहे. २४ तास लेट." इति वॉटसन. &lt;br /&gt;
घोषणा : सभी यात्रियों से निवेदन है की होशियारपुरसे&amp;nbsp; दिल्ली जानेवाली आकांक्षा एक्सप्रेस २४ घंटे देरी से प्लॅटफॉर्म क्रमांक २ पर आ रही है. यात्रियों की असुविधा के लिये खेद है.&lt;br /&gt;
होम्सच्या कपाळावर पिटुकले टेंगूळ आले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्सचा भारतीय कर्मचार्‍यांशी संबंध आला नाही हे बरेच म्हणायचे. त्याहीपेक्षा एकाही हिंदी चित्रपट निर्मात्याला होम्सवर चित्रपट काढावासा वाटला नाही याचा अर्थ देव जागा आहे असे म्हणायला जागा आहे.&lt;br /&gt;
होम्सचे हिंदी चित्रपटात काय कडबोळे झाले असते कुणास ठाउक. मध्यंतरापर्यंत तर वॉटसन-मिसेस हडसनचे विनोद वगैरे. गुंडाच्या भूमिकेत रंजीतच्या यक्ष्ट्रा करिकुलर ऍक्टिव्हीटीज.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
होम्स सज्जनांचा तारणहार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे अशा अर्थाचे एक गाणे. (जिंदगी तो बेवफा हय टाइप). इंटरव्हलनंतर काली घाटीमधल्या रंजीतच्या अड्ड्याचा होम्सला पत्ता लागणार.&lt;br /&gt;
मग होम्स गुंडाला पकडणार इतक्यात गुंडीणीच्या भूमिकेत बिंदू तिरछी नजरोंसे होम्सला घायाळ करण्याचा प्रयत्न करत गाणं म्हणणार. त्याच वेळी मिसेस हडसन येशूच्या मूर्तिसमोर प्रार्थना करीत आणखी एक गाणे म्हणणार. &lt;br /&gt;
शेवटी गुंड ताब्यात आल्यावर 'कानून के हाथ बहोत लंबे होते हय' - इति लस्ट्रेडच्या भूमिकेतील अंजन श्रीवास्तव.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अर्थात होम्सवर मराठी किंवा हिंदी मालिका निघाली तर हे सर्व ऑस्करपात्र वाटायला लागेल. मालिकेचे २५-३० भाग तर मिसेस हडसन घराची सफाई करताना दाखवण्यातच निघून जातील. मग वॉटसनच्या क्लिनिकमध्ये १०-१५ एपिसोड, त्यातल्या एखाद्या पेशंटचा आजार, त्याच्या घरातल्या अडचणी,&amp;nbsp; पेशंटच्या सासूला निमोनिया होतो, त्याचा घटस्फोट आणि प्रेमप्रकरण(हे फारच इंटरेष्टींग व्हायला लागलं तर सगळी मालिका इथेच), त्याच्या ऑफिसमधील क्लार्कच्या वडीलांच्या मित्राचा धाकटा मुलगा शिकारीला गेलेला असताना जखमी होतो, हे सगळं होईपर्यंत दीडशे-एक भाग सहज निघून जातील. (काळजी करू नका, जोपर्यंत पडद्यावर हालचाल होते आहे तोपर्यंत प्रेक्षक नेटानं बघत राहतात. जातील कुठं?) मग अखेर (नाइलाजास्तव) होम्सचं आगमन. वीस-पंचवीस भाग होम्सची दिनचर्या, तो आणि वॉटसन गप्पा मारणार, चहा पिणार, गप्पा मारणार, सिगरेट पिणार, गप्पा मारणार, जेवणार, गप्पा मारणार, मिसेस हडसनशी किरकोळ कारणावरून खटके उडणार, गप्पा मारणार, खिडकीतून बघणार, गप्पा मारणार. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
असे २०० भाग झाले की एक दिवशी एक क्लायंट येणार. (इतके एक्साइट होऊ नका, अजून क्लायंट यायला २०-३० भाग बाकी आहेत. कुठं काश्मीर-सिंगापूर-हवाई-अंटार्क्टिका ट्रिप वगैरे करायची असेल तर खुशाल करून या.) &lt;br /&gt;
मग संवाद पुढीलप्रमाणे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्स : मित्रा..&lt;br /&gt;
वॉटसन : बोल ..&lt;br /&gt;
होम्स : एक बातमी आहे. (ढ्याण-ढ्याण-ढ्याण)&lt;br /&gt;
क्यामेरा&amp;nbsp; होम्स वर तीनदा, वॉटसनवर तीनदा. &lt;br /&gt;
वॉटसन : बातमी? बातमी? बातमी? (मूळ बातमीचे दोन एको) &lt;br /&gt;
होम्सचा तीव्र कटाक्ष. वॉटसनाचा प्रत्युत्तर म्हणून आणखी तीव्र कटाक्ष.&lt;br /&gt;
होम्स : हो..&lt;br /&gt;
वॉटसन : बोल..&lt;br /&gt;
होम्स : माझ्या ..&lt;br /&gt;
वॉटसन : तुझ्या?&lt;br /&gt;
होम्स : माझ्या.. माझ्या..&lt;br /&gt;
वॉटसन : तुझ्या.. तुझ्या काय मित्रा? &lt;br /&gt;
होम्स त्याच्या हात उंच करून हातातील बाटली दाखवतो. क्यामेरा स्लोमोशनमध्ये बाटलीला तीन प्रदक्षिणा घालतो. &lt;br /&gt;
होम्स : माझ्या.. माझ्या.. माझ्या बाटलीतील शाई संपली आहे.&lt;br /&gt;
होम्सचा तीव्र कटाक्ष. वॉटसनाचा प्रत्युत्तर म्हणून आणखी एक जळजळीत कटाक्ष.&lt;br /&gt;
(ढ्याण-ढ्याण-ढ्याण)&lt;br /&gt;
क्यामेरा&amp;nbsp; होम्स वर तीनदा, वॉटसनवर तीनदा. &lt;br /&gt;
चित्र फ्रीझ होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
होम्ससहीत इतर सर्व अभिजात कलाकृतींकडे आपल्या मालिका निर्मात्यांचे लक्ष जाऊ नये हीच प्रार्थना. &lt;br /&gt;
इत्यलम.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तळटीपा :&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[१] पुणे-मुंबई परिसरातील होम्सचे पंखे आणि पंखिण्या यांची संख्या लक्षात घेता लेख वाचल्यानंतर लेखकाच्या घरावर मोर्चा - बहुतांशी लाटणे मोर्चा - येण्याची दाट शक्यता आहे. स्वसंरक्षणार्थ लेखक हे स्पष्ट करू इच्छितो की होम्स त्याचाही अत्यंत &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2007/09/blog-post_19.html"&gt;आवडता&lt;/a&gt; आहे. लेखातील विनोद हे आपण घरातील एखाद्या आवडत्या माणसाची थट्टा करतो त्या पद्धतीने घ्यावेत आणि लाटणी परत फडताळात ठेवावीत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[२]मिसेस हडसनसारखी मोलकरीण भारतात सापडली तर तिला पद्मश्री द्यायला काहीच हरकत नाही. तसेही पद्मश्रीसाठी किमान नाकातून तरी गाता यायला हवे किंवा आयटेम नंबर करण्याइतका तरी अभिनय करता यायला हवा या आतापर्यंतच्या जाचक अटी आता शिथिल करण्यात येतील असे ऐकून आहोत. आधारचे काम संपले की निलेकणी पद्मश्रीसाठी सुलभ आवेदन फार्म डिझाइन करणार आहेत म्हणे. पूर्वी लोक बजाजच्या गाड्यांसाठी नंबर लावायचे, आता पद्मश्रीसाठी लावतील, हाय काय अन नाय काय. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[३] इथे मिसेस हडसन नऊवारीत कशा दिसतील असा विचार मनात आला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[४] सध्याच्या काळातील भारतीय रेलवे बरीच सुधारली आहे. पूर्वी रेलवे प्रवासाला जाताना घड्याळाऐवजी क्यालेंडर घेऊन जावे असे म्हणत असत.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
---------------&lt;br /&gt;
पूर्वप्रकाशन : मायबोली &lt;a href="http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2011/index.html"&gt;दिवाळी अंक २०११.&lt;/a&gt; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-1719650282487205557?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/MrGC1qHgwAc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/MrGC1qHgwAc/blog-post_26.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>10</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/10/blog-post_26.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-3606317888198099320</guid><pubDate>Fri, 14 Oct 2011 15:19:00 +0000</pubDate><atom:updated>2011-10-15T12:24:29.568+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><title>महात्मा बसवेश्वर आणि बेन यिशु</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे 'प्रेरणा' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. पुस्तक मुलांसाठी आहे. प्राचार्यांच्याच शब्दात हे पुस्तक म्हणजे पराक्रमांच्या शिखरांचे दर्शन आहे. यातील आइनस्टाइन, मेरी क्युरी पासून टॉलस्टॉय आणि कार्ल मार्क्सपर्यंत बरीच नावे सर्वश्रुत आहेत. इंदिरा गांधींसारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्वांचाही यात समावेश आहे. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीबद्दल लिहीताना प्राचार्यांना थोडी कसरत करावी लागली आहे असे जाणवते. प्राचार्यांची इंदिराजी आणि त्यांची कारकीर्द याबद्दलची परखड मते काय असतील आणि प्रोत्साहनपर ओळख करून द्यायची असे बंधन नसते तर त्यांनी हा परिचय कसा करून दिला असता असा एक विचार मनात येऊन गेला. असा लेख वेगळा झाला असता असे मानायला जागा आहे कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय करून देताना, आपल्या विशेष जिव्हाळ्याच्या अशा शिक्षणक्षेत्राबद्दल बोलताना प्राचार्य म्हणतात, "अकारण चार-दोन महाविद्यालये काढणे हा काही मंडळींचा छंद आहे. त्यांना त्यामुळे सहज शिक्षणमहर्षी पद मिळण्याची शक्यता वाढते."&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तर पुस्तकातील बहुतेक सर्व नावे ओळखीची होती, काही अतिपरिचयाची तर काही त्या मानाने कमी परिचयाची. मात्र एका नावापाशी अडखळायला झाले. हे नाव शाळेत इतिहासाचा अभ्यास करताना कानावर पडले असेल तर माहीत नाही. (आणि पडले असेल तर विस्मरण होण्यास कारण शाळेतील वातावरण की आमची अभ्यासाविषयीची अनास्था हे ही माहीत नाही.) हे नाव होते महात्मा बसवेश्वर (इ. स. ११३१ ते इ. स. ११६१) यांचे. आपल्या देशात संत, महात्मे यांची कमी नाही. आजच्या काळात गूगल पांडित्यामुळे हवी ती माहीती चुटकीसरशी उपलब्ध आहे. बहुतेक वेळा कुणी नवीन विचार मांडला तर त्यामागे चौफेरवाचन आहे हे जाणवते पण त्यात मनन किंवा विचारमंथन असेलच अशी खात्री नसते. 'कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन' - माहितीचे साठवण ही एक गोष्ट झाली आणि माहितीचा उपयोग करून त्यातून नवीन विचार मांडणे ही दुसरी गोष्ट झाली. एक करण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी असते, दुसरीसाठी प्रतिभा लागते. ज्या काळात कुणी मेल्याची बातमी यायलासुद्धा महीने-वर्ष लागत असे, त्या काळात माहितीचे स्त्रोत फारच कमी होते. 'सर्व माणसे सारखी, सर्व व्यवसाय समान योग्यतेचे, सगळ्या जाती समान. वर्णभेद, जातिभेद हे अनैसर्गिक आहेत. मठांची उठाठेव आवश्यक नाही.' हे विचार आज आपल्याला फारसे क्रांतिकारी वाटणार नाहीत, पण बाराव्या शतकात हे विचार किती आधुनिक होते हे लक्षात आल्यावर महात्मा बसवेश्वर यांचे वेगळेपण विशेष जाणवते आणि त्यांची ओळख इतक्या उशिरा झाल्याबद्दल खंतही वाटते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लोकांनी तत्वचिंतन आणि आत्मशोधन करावे हा हेतू मनात धरून बसवेश्वर यांनी 'अनुभव मंडप' या विद्यापीठाची स्थापना केली. ज्या काळात विद्यार्जन ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, त्या काळात अनुभव मंडपामध्ये चांभार, लोहार, सुतार, व्यापारी हे सर्व लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करीत होते. स्त्रीशिक्षण हा विचार ज्या काळात लोकांच्या कुवतीबाहेर होता तेव्हाच इथे नगम्मा, सत्यक्का अशा अनेक स्त्री सभासद होत्या. आंतरजातीय विवाह इथे खुलेपणाने होत होते. 'कायक वे कैलास' - कायेने आचरलेले व्यवसायकर्म निष्ठेने करावे -&amp;nbsp; हे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनसूत्र होते. ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्याप्रमाणेच बसवेश्वर यांनी कवितेमधून समाजसुधारणा केली. त्यांनी कन्नडमध्ये लिहीलेल्या या कविता 'वचन साहित्य' या नावाने ओळखल्या जातात. समाजसुधारक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Basava"&gt;महात्मा बसवेश्वर&lt;/a&gt; यांना कर्नाटकाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
योगायोगाने बाराव्या शतकातील जीवनावर आधारित आणखी एक पुस्तक नुकतेच वाचनात आले ते म्हणजे अमिताभ घोष यांचे '&lt;a href="http://www.amazon.com/Antique-Land-History-Guise-Travelers/dp/0679727833"&gt;इन ऍन ऍंटीक लॅंड&lt;/a&gt;'. हे पुस्तक म्हणजे खरेतर मानवशास्त्रावरील एक निबंध आहे पण एखादा चित्रकार साधी घराची भिंत रंगवतानाही त्यात आपला वेगळा ठसा उमटवून जाईल तसेच अमिताभ घोष यांनी त्यांची साहित्यिक प्रतिभा वापरून या निबंधाला एक वेगळे रूप दिले आहे. अमिताभ घोष ऑक्सफर्डमध्ये मानवशास्त्रामध्ये पी. एच. डी करत असताना संशोधनासाठी त्यांना इजिप्तमध्ये काही काळ घालवावा लागला. या पुस्तकात त्यांनी आपले संशोधन आणि इजिप्तमध्ये आलेले अनुभव यांची सुरेख गुंफण केली आहे. यामुळे पुस्तक तथ्यांची माहिती असलेला एक रूक्ष निबंध न राहता त्याला भावनिक मिती प्राप्त होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तक आहे अब्राहम बेन यिशुबद्दल. बेन यिशु (Ben Yiju) ट्युनिशियामध्ये जन्मला, मात्र नंतर इजिप्त, भारत, येमेन इ. ठिकाणी त्याने प्रवास आणि वास्तव्य केले. भारतात त्याचा मुक्काम मंगलोर इथे होता. बेन यिशु याने इ. स. ११३२ मध्ये मंगलोरमधून लिहीलेले एक पत्र घोष यांना योगायोगाने मिळाले आणि नंतरची काही वर्षे त्यांनी भारतात वास्तव्य केलेल्या या व्यापार्‍याची पत्रे शोधणासाठी रशिया, अमेरिका, इंग्लंड इ. ठिकाणी जाऊन पुराणवस्तूसंग्रहालय आणि विद्यापीठांमध्ये शोध घेतला. या पत्रांमधून आणि त्याच्या अनुषंगाने त्यावेळची भाषा, समाज, रीती इ. लक्षात घेऊन घोष बेन यिशुच्या आयुष्याचे एक चित्र उभे करतात. बेन यिशु मंगलोरला आल्यावर त्याने आशु नावाच्या एका भारतीय गुलाम स्त्रीला विकत घेतले, गुलामगिरीतून मुक्त केले आणि नंतर तिच्याशी विवाह केला. बेन यिशुने इजिप्त आणि आसपासच्या इतर व्यापार्‍यांना पाठवलेल्या पत्रांमधून त्या काळातील मंगलोरमधील औद्योगिक उलाढालींची कल्पना येते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याला समांतर असे कथानक घोष यांच्या इजिप्तमधील वास्तव्याचे. त्यांना तेथे 'दोक्तोर-अल-हिंद' - भारतीय डॉक्टर अशी हाक मारत असत. इजिप्तमधील तेव्हाचे तरूण इराकमध्ये जाऊन पैसे कमवण्याची स्वप्ने पहात होते. इराक म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग होता. घोष १० वर्षांनी परत गेले तेव्हा त्यांना आठवत असलेली बरीचशी मुले इराकमध्ये मिळेल त्या कामावर गेली होती, पहिले इराक युद्ध सुरू असल्याने इराकमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेच्या खुणा त्यांच्या घरात दिसत होत्या. इजिप्तमधील कट्टर मुस्लीम संस्कृती, त्यांचे हिंदूंविषयीचे गैरसमज आणि त्यामधून उद्भवणार्‍या कधी गमतीदार तर कधी गंभीर अडचणी हे सर्व नोंदतानाही त्यांच्यातील मानवशास्त्रज्ञ दक्ष असल्याचे जाणवते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जवळजवळ दोन टोकाच्या दोन पुस्तकांमधून आठ-नऊशे वर्षांपूर्वी राहणार्‍या एकाच राज्यातील दोन व्यक्ती भेटाव्यात हा योगायोग रोचक वाटला. म्हणून हा लेखन प्रपंच.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-3606317888198099320?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/IKXbWvlnwSs" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/IKXbWvlnwSs/blog-post_14.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>5</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/10/blog-post_14.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-6971650921633175264</guid><pubDate>Tue, 11 Oct 2011 18:19:00 +0000</pubDate><atom:updated>2011-11-15T22:25:16.142+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">विनोद</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भंकसगिरी</category><title>देख के दुनिया की दिवाली..</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
नाही, म्हणजे यांचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे? पैसे नाहीत, वेळ नाही का कामच करायचं नाहीये? ही दोन वाक्ये लिहीपर्यंत दोनदा वीज गेली होती हे सांगितल्यावर 'ते' म्हणजे कोण याचा प्रकाश तुमच्या डोक्यात पडला असेलच. तर आज आपण वीज जाण्याचे आणि घालवण्याचे विविध प्रकार कोणते आहेत त्याची ओळख करून घेणार आहोत.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रकार एक : लोड शेडींग&amp;nbsp;(विकट हास्य) &lt;br /&gt;
आपल्या दुर्दैवी देशाचं लोड इतकं आहे की कितीही शेड केलं तरी ते शेडच होत नाही, यू नो? दर वेळी याची कारणे वेगळी असतात. टाटाला द्यायला पैसे नाहीत, आंध्रामध्ये कोळसा भिजला इ. इ. सध्या म्हणे एमएसइबीला पुणे विभागाचे लोड शेडींग कसं करायचं याचं वेळापत्रक करायलाच वेळ नाहीये, आता बोला! बहुधा डूटीवर असणारे अधिकारी अकडम तिकडम तडतड बाजा करून कोणत्या विभागाचं बटण दाबायचं हे ठरवत असावेत. कारण सध्या दिवसातून कोणत्याही वेळेला वीज जाते, कधी एक तास, कधी दीड तास. एक तास किंवा दीड तास वीज गेली तर ते लोड शेडींग नाहीतर इतर काहीतरी (पुढे बघावे). अर्थात 'इतर काहीतरी'मुळे गेलेली वीज नेमकी एक तास किंवा दीड तास जाऊ शकते पण तसेही तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही (शब्दश: आणि वाक्प्रचार, दोन्ही अर्थाने) अंधारात आहात आणि अंधारातच रहाणार.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रकार दोन :&amp;nbsp; गरजत बरसत सावन आयो रे.. &lt;br /&gt;
चांदोबातल्या गोष्टींमध्ये राक्षसाचा एक अवयव नाजुक असतो तिथे बाण मारला तर तो मरतो. तसं आपल्या देशाचा सगळ्यात नाजुक अवयव म्हणजे वीज. सावन कशाला, नुसता गार वारा जरी सुटला तरी वीज जायला ते पुरेसं असतं. कधीकधी हे एमएसइबीवाले प्रिएम्प्टीव्ह वीज घालवतात असं वाटतं. म्हणजे वारा सुटलाय, वादळ येतय, वीज जाणार ही काळ्या दगडावरची रेघ. मग आधीच घालवून टाकूयात. कधीकधी पाऊस आला-वीज गेली, पाऊस थांबला-वीज आली, पाऊस आला-वीज गेली असं दुष्टचक्र सुरु असतं.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सावनवरून आठवलं, या वर्षी पावसाला झालंय काय? दिवाळी आली तरी बदाबदा कोसळतोच आहे? वर जो कोणी शिफ्टला होता तो ट्याप सुरू करून रजेवर गेला बहुतेक. या वर्षी म्हणे हवामान विभागाने वीस वर्षात पहिल्यांदाच अंदाज चुकला अशी &lt;a href="http://www.deccanherald.com/content/197037/imd-admits-failure-monsoon-forecast.html"&gt;कबुली&lt;/a&gt; दिली आहे. ('वीस वर्षात पहिल्यांदा अंदाज चुकला' ही कबुली नाही, कबुली वीस वर्षात पहिल्यांदाच दिली आहे. आई बात समझमें?)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ह्यॅह्यॅह्यॅ. हे म्हणजे दाउदने "नाही, म्हणजे माझ्याकडून काही वेळा कायद्याचं उल्लंघन झालं असण्याची शक्यता आहे, नाही असं नाही," म्हणण्यासारखं आहे. आणि इतका पाउस कोसळूनही पुढच्या उन्हाळ्यात काय होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. मे सुरू झाला नाही झाला की लगेच - धरणात तेवीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट? &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रकार तीन : कहीं दीप जले कहीं दिल &lt;br /&gt;
१. लाइट जातात. &lt;br /&gt;
२. तुम्ही टॉर्च, मेणबत्ती, काड्यापेटी शोधून, एकदाची मेणबत्ती लावता. ती घेऊन 'कहीं दीप जले कहीं दिल' करत दुसर्‍या खोलीत जाता.&lt;br /&gt;
३. मेणबत्ती टेबलावर ठेवून वळलात की लाइट येतात. तुम्ही हुश्श म्हणून मेणबत्ती विझवता, जिथून आणली तिथे ठेवता आणि परत आपल्या जागेवर येऊन बसता.&lt;br /&gt;
४. लाइट जातात. (विकट हास्य). परत 'कहीं दीप जले कहीं दिल'. (बहुतेकवेळा दिलच.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे असं कितीही वेळा होऊ शकतं. असं झालं की मला 'अंदाज अपना अपना' मधला परेश रावल आठवतो. &lt;br /&gt;
"ये है असली हिरे."&lt;br /&gt;
"शाबाश."&lt;br /&gt;
"अरे नही, असली तो लाल वाली में थे." &lt;br /&gt;
"रवीना की मां, मै आ रहा हूं."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यावर उपाय म्हणजे वीज गेल्यावर काही न करता आहात तसेच अंधारात बसून रहा. आता दोन गोष्टी घडू शकतात.&lt;br /&gt;
१. वीज आली - पुन्हा जाईपर्यंत एन्जॉय करा.&lt;br /&gt;
२. वीज आली नाही - बसून रहा. तसेही तुम्ही काय दिवे लावणार आहात? ह्यॅह्यॅह्यॅ. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रकार चार : एक फेज जाणे&lt;br /&gt;
म्हणजे लाइट जातात, तुम्ही खिडकीतून बाहेर नजर टाकता तर समोरची बिल्डींग बेजिंग ऑलिंपिकच्या तोंडात मारेल अशी झगमगत असते. तुमच्या पोटात खड्डा पडतो. तुम्ही 'हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले' असा आकांत करत शेजार्‍या-पाजार्‍यांना विचारता. फक्त तुमची बिल्डींग किंवा तुमची, पलिकडची आणि शेजारची अशा काहीतरी विचित्र कॉम्बिनेशनमध्ये लाइट गेलेले असतात. यावर एकच उत्तर, "एक फेज गेली असेल." ही एक फेज कुठे असते? ती नेमकी आपलीच कशी जाते? 'त्यांची' एक फेज कुठे असते? ती कधी जात का नाही?&amp;nbsp; एक फेज वगैरे बोलायच्या गोष्टी आहेत, खरी गोम अशी आहे की तुम्हारा बॅड लकीच खराब आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आणखीही काही उपप्रकार आहेत, जसे की - एकच क्षण वीज गेल्यासारखे होणे. प्रकार दोनच्या आधी बरेचदा पूर्वसूचना म्हणूनही हिचा उपयोग केला जातो. किंवा कधी कधी एमएसइबीने उदार अंत:करणाने लोड शेडींगचे वेळापत्रक दिलेले असते. त्या दिवशी प्रकार दोनमुळे आधीच वीज जाते, पाऊस थांबतो, वीज येते आणि मग लोड शेडींगच्या वेळेला परत जाते (विकट हास्य). &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उपप्रकारांवर अजून तितकी माहिती उपलब्ध नाही पण येत्या काही वर्षात ती उपलब्ध होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. हास्ता ला विस्ता, बेबी. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-6971650921633175264?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/IKJxnFpNuGk" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/IKJxnFpNuGk/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>10</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/10/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8537094821614901949</guid><pubDate>Sat, 24 Sep 2011 06:56:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-25T00:20:43.231+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">विज्ञान</category><title>सापेक्षता सिद्धांतामध्ये क्रांती?</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;आमचं आयुष्य त्या मानानं फारसं इंटरेष्टींग नाही. म्हणजे कसं, की जन्मलो तेव्हा स्वातंत्र्य वगैरे मिळालं होतं, ज्यांची नुसती भाषणं ऐकून लोकांनी आपले प्राण पणाला लावले असे सगळे महान नेते काळाच्या पडद्याआड गेले होते. नंतर एका &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2008/11/blog-post.html"&gt;नेत्यामध्ये&lt;/a&gt; ती चमक आहे असा भास झाला पण तो खरा हिरा नाही हे लवकरच लक्षात आले. आमच्या पूर्वजांनी क्रांत्या केल्या आणि पाहील्या, काहींनी तर जग पार उलटेपालटे होताना पाहिले. उदा. इ. स. १९०५ सालच्या जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यात एका माणसाने जगाच्या स्वत:बद्दलच्या कल्पना चुकीच्या आहेत हे सप्रमाण दाखवून दिले. तोपर्यंत स्थल आणि काल या दोन्ही गोष्टी म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होत्या पण त्या सापेक्ष आहेत असे आइन्स्टाइनने सिद्ध केले आणि जग मुळापासून हादरले. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहेच. अशा क्रांतीकारक काळातील माणसांचे अनुभव कसे असतील याबद्दल उत्सुकता वाटते.&amp;nbsp; असे आमच्या नशिबात काही आले नाही. आंतरजालाने क्रांती केली पण ती एका दिवसात झाली नाही, आणि जेव्हा झाली तेव्हा ती होते आहे हे लक्षातही आले नाही. इ. स. १९०० मध्ये जसे शास्त्रज्ञ 'आता कोणताही शोध लावायचा शिल्लक नाही' असे म्हणत होते तशी काहीशी परिस्थिती आली आहे का असे वाटायला लागले.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शक्यता थोडी आहे तरीही - कदाचित - एक नवी क्रांती होऊ पहात आहे. या आठवड्यात स्विट्झरलंडची &lt;a href="http://www.cern.ch/"&gt;सर्न &lt;/a&gt;(CERN) आणि इटलीमधील ग्रान सास्सो या दोन प्रयोगशाळांच्या सहकार्यातून केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष &lt;a href="http://www.newscientist.com/article/dn20961-fasterthanlight-neutrino-claim-bolstered.html"&gt;जाहीर&lt;/a&gt; करण्यात आले. प्रयोग होता - न्युट्रिनो या कणांचा अभ्यास करण्याचा. &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Neutrino"&gt;न्युट्रिनो&lt;/a&gt; हा भाररहित (electrically neutral), आणि अगदी सूक्ष्म वस्तुमान असलेला कण आहे. आपल्या भोवताली नेहेमी न्युट्रिनोंचा वावर असतो. सूर्यामधून निघालेले कित्येक कोटी न्युट्रिनो तुमच्या डोळ्यातून प्रत्येक क्षणाला जात असतात. ऑपेरा असे नाव दिलेल्या या प्रयोगात शास्त्रज्ञांनी सर्न मधून वेगवान न्यूट्रीनो सोडले आणि ७३० किमी लांबीच्या निर्वात भुयारातून प्रवास केल्यानंतर इटलीच्या ग्रान सास्सो प्रयोगशाळेत ते कधी येतात हे मोजले. या सगळ्या प्रकाराला फार तर ३ मिलीसेकंद (एक मिलीसेकंद म्हणजे सेकंदाचा हजारावा भाग) लागले. हे मोजमाप अत्यंत काटेकोर होते, मोजमाप करण्यामधील ऍक्युरसी १० नॅनोसेकंद (एक नॅनोसेकंद = १/एकावर नऊ शून्ये) इतकी होती. हे मोजमाप केल्यानंतर असे आढळले की न्युट्रिनो अपेक्षेपेक्षा ६० नॅनोसेकंद आधीच आले होते. ही अपेक्षा होती प्रकाशाचा वेग जमेस धरून केलेली. आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांतामधील एक मूलभूत विधान म्हणजे प्रकाशाचा वेग हा सर्वोच्च असतो. यापेक्षा जास्त वेगाने कोणतीही वस्तू जाऊ शकत नाही. आतापर्यंत हे विधान पडताळून बघण्याचे जितके प्रयोग झाले त्या सर्वांमध्ये याची सत्यता निदर्शनास आली आहे. या विधानावर गेल्या शंभर वर्षातील बरेच सिद्धांत आधारलेले आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
न्युट्रिनो प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाऊ शकतात हे म्हणजे एखादे दिवशी उठावे आणि सूर्य उत्तरेकडून उगवावा असे आहे. ज्या शास्त्रज्ञांनी हे मोजमाप केले त्यांचा ही यावर विश्वास बसला नाही. अर्थातच त्यांनी पुन्हा पुन्हा सर्व शक्यता पडताळून पाहिल्या, कुठे मोजमापात चूक होत नाही ना हे ही पाहीले. सर्व केल्यानंतरही तेच उत्तर आल्यावर शेवटी होम्सला शरण जाण्यावाचून पर्याय नव्हता.&lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;When you have eliminated all which is impossible, then whatever remains, however improbable, must be the truth. &lt;/blockquote&gt;अशा प्रकारची मोजमापे सांख्यिकी पद्धतीने केली जातात. १५००० न्युट्रिनोचे मोजमाप केल्यानंतर हे अनुमान काढण्यात आले आहे. अशा मोजमापे कितपत विश्वासार्ह आहेत याचा एक निदर्शक म्हणजे सिग्मा. साधारणपणे पाच सिग्मा म्हणजे विश्वासार्ह असे मानले जाते. या प्रयोगातील शास्त्रज्ञ सहा सिग्माची ग्वाही देत आहेत, याचा अर्थ त्यांना मोजमापात कोणतीही शंका नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अर्थात निबंध अजून अधिकृतरीत्या प्रकाशित झालेला नाही. तो मासिकाकडे गेल्यावर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्वल्पविराम डोळ्यात तेल घालून तपासला जाईल. तो जरी प्रकाशित झाला तरी जोपर्यंत इतर प्रयोगशाळांमधून त्याला दुजोरा मिळत नाही तोपर्यंत त्याची सत्यता अधांतरीच मानली जाईल. दुसरा असा प्रयोग करण्यासाठी किमान २०१२ पर्यंत थांबण्याची गरज आहे. हा निबंध प्रसिद्ध केल्यानंतर संशोधन जगतात प्रचंड खळबळ माजली आहे. बरेचसे शास्त्रज्ञ यात कुठेतरी चूक आहे यावर पैज लावून आहेत. काही जर हे खरे असले तर त्याचे परिणाम काय असू शकतील याचा खल करीत आहेत. विशेष सापेक्षता सिद्धांताचा डोलारा ज्यावर उभा आहे ती वीटच काढून घेतली तर त्याचे परिणाम काय होतील हे सांगणे कठीण आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रकाशापेक्षा अधिक वेगाने गेल्यास होणारा एक परिणाम म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे परस्परसंबंध (causality) नेहेमीपेक्षा वेगळे होतात. घटनेचा परिणाम घटना घडायच्या आधीच घडू शकतो. समजा तुम्ही प्रकाशाहून अधिक वेगाने जात आहात आणि कुणाला फोन केला तर त्याचे उत्तर तुम्ही फोन करायच्या आधीच येऊ शकते. अर्थात हे माणसांच्या बाबतीत फक्त सायन्स फिक्शनमध्ये घडते, पण प्रयोग खरा असेल तर किमान तत्वत: असे घडू शकते हे सिद्ध होईल. या प्रकाराला &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Tachyonic_antitelephone"&gt;टॅकयोनिक ऍंटीटेलीफोन&lt;/a&gt; असे नाव दिले आहे. (प्रकाशाहून अधिक वेगाने जाणार्‍या कणांना टॅकयॉन म्हणतात.) &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जवळपास १०० वर्षांपूर्वी आइनस्टाइनने विज्ञानात क्रांती घडविली. आता परत तीच वेळ आली आहे का याचे उत्तर लवकरच मिळेल. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-8537094821614901949?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/gadcx6JCRxk" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/gadcx6JCRxk/blog-post_24.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>3</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/09/blog-post_24.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8397055327716588656</guid><pubDate>Wed, 07 Sep 2011 11:47:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-08T00:55:08.539+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भाषा</category><title>संवादाचा सुवावो</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
बंगाली चित्रपट बघताना माझी पंचाईत होते. एखाद्या छोटुकल्याला पहिल्यांदा सर्कसला न्यावं, आणि समोर मौत का कुआ सारखे चित्तथरारक खेळ चालू असताना त्याचं सगळं लक्ष मात्र विदूषकाकडे असावं, तसं काहीस होतं. याचं कारण म्हणजे बंगाली भाषा. न्हावी लोक चित्रपट बघायला गेल्यावर कळत-नकळत सर्वांचे केस नीट कापले आहेत की नाही हे बघत असणार, मुली शिंपिणी नसूनही करीनाच्या चूडीदार पॅटर्नची मोजदाद ठेवण्यात गुंग असतात, मी आपला शब्दांची श्रवणभक्ती करत असतो. कुणाचं काय तर कुणाचं काय!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एखादा मस्त शब्द कानावर पडतो, सबटायटलमुळे त्याचा अर्थ लागतो आणि तो शब्द निरखण्याकडेच सगळं लक्ष जातं.&amp;nbsp; पहिल्यांदा उत्तमकुमार-शर्मिलाचा 'नायक' बघताना असंच झालं. त्यात उत्तमकुमार एके ठिकाणी म्हणतो, "आपणार नॉम शॉनेछी, लेखा पॉढेछी, तेयाप्रोशान आलाप केरी गेलान." (ऐकलं तसं, चूभूद्याघ्या) ते ऐकल्यावर मला लगेच "शुंदर! ओद्भुत!" असं ओरडावसं वाटलं. जन्मभर क्लार्क केंटला सरळ भांग पाडून, ढापण्या लावून, बावळटपणा करताना पहावं आणि एखादे दिवशी तोच सुपरमॅनच्या वेशात जग वाचवताना दिसावा. की चोमोत्कार!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संस्कृतच्या आजोळी &lt;a href="http://shabdavali.blogspot.com/2010/02/blog-post_04.html"&gt;'लप'&lt;/a&gt; या धातूपासून आलाप हा शब्द झाला. तिथून तो&amp;nbsp; मराठी, हिंदी आणि बंगालीत आला. पण हिंदी-मराठीमध्ये या शब्दाची कुचंबणा झाली. एखाद्या बोर्डीग शाळेत, कडक शिस्तीत, पोरं जशी काटेकोरपणे वागतात तसा हा बिचारा आलाप संगीताची उपासना करणारे गायक,&amp;nbsp; रसिक, समीक्षक यांच्या कडक देखरेखीखाली, सकाळ-संध्याकाळ रियाज करत, शिस्तीत वाढला. याउलट कोलकात्याला गेल्यावर शांतिकेतनमध्ये ऍडमिशन झाली, तिथं त्याला सांगितलं, "तुला जे आवडेल ते कर." तिथं तो बहरला आणि "आलाप करणे" असा त्याचा पुनर्जन्म झाला. नाही म्हणायला हिंदीमध्ये "वार्तालाप करना" अशी एक व्होकेशनल स्कालरशिप मिळाली त्याला, पण आलाप करण्यात जे मार्दव आहे ते वार्तालापात नाही. जे आपल्याकडे नाही ते दुसरीकडे पाहीलं की त्याची निकड जास्त जाणवते. मला मराठीचं प्रेम नाही अशातला भाग नाही. पण बंगालीत जी गोडी आहे ती मराठीत नाही हे कबूल करण्यावाचून पर्याय नाही. आलापला उत्तर म्हणून मराठीत "मला तुमच्याशी बोलायचं आहे" अगदी रोखठोक वाटतं. किंवा "मला तुमच्याशी चर्चा करायची आहे" (नको! महाराज, माफी!) म्हणजे आता 'अमेरिकेच्या अर्थसंकल्पाचे तिसर्‍या जगात उमटलेले पडसाद' यावर एक तास स्वगत ऐकावं लागणार असं वाटतं.&amp;nbsp; आलापला तोडीस तोड प्रतिशब्द फक्त उर्दूमध्ये आहे, गुफ्तगू करना. इथे अर्थाच्या सूक्ष्म छटांमध्ये मात्र फरक आहेत. गुफ्तगू म्हणजे थोडासा प्रायव्हेट मामला वाटतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपल्याकडच्या बर्‍याच गुन्हेगारांचं तिकडे पुनर्वसन झालं. मराठीतल्या शिष्टला तिकडे म्यानर्सच्या क्लासमध्ये घातलं, त्याचा अर्थ बंगालीत सुसंस्कृत असा झाला. संस्कृतचे कितीतरी शब्द मराठीत उपरे, औपचारिक वाटतात, त्यांचा बंगालीत पूर्ण कायापालट होतो. नायकमधलाच उत्तमकुमारचा आणखी एक संवाद, "दॅखलेन तो, आपणार देबोतुल्य नायक?" मराठीमध्ये 'देवतुल्य नायक' रोजच्या संभाषणामध्ये वापण्याची कल्पनाही करवत नाही. बंगालीत ही उपजत गोडी कुठून आली? नाही म्हणायला गुजराथीही कानाला गोड आहे पण काही वेळातच एक किलो जिलबी खाल्ल्यानंतर जसा गोडपणा नकोसा वाटेल तसं गुजराथीचं होतं. याउलट बंगाली म्हणजे मधुर हापूस आंबा. ओनुमान, प्रोयोजन, ब्यॅपार, शोत्यकोथा - आपल्याकडे कडक इस्त्रीचा सफारी सूट, हातात फाइल आणि कपाळावर आठ्या अशा शासकीय पेहेरावात वावरणारे हे सगळे शब्द तिकडे जीन्स, टी शर्ट घालून, रे ब्यान लावून मोकळेपणाने हिंडत आहेत असं कधीकधी वाटतं. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शब्द कोण वापरतो यावर ते किती परिणामकारक ठरतील हे बरेचसे अवलंबून असावे. बाबूजी - अर्थात सुपरसिनियर बच्चन - एका कवितेमध्ये म्हणतात,&lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;
जिस दिन मेरी चेतना जगी,&lt;br /&gt;
मैने देखा मै खडा हुआ हूं इस दुनिया के मेले में
&lt;/blockquote&gt;
'चेतना जगी' किती समर्पक आहे इथे. 'ज्या दिवशी मला जगाचं भान आलं' हा त्याचा अनुवाद होऊ शकतो पण 'चेतना जगी' ला जो खोल अर्थ आहे तो 'भान येणे' मध्ये येतो याबद्दल साशंकता वाटते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठीत हिशेब किंवा हिंदीमध्ये हिसाब बर्‍यापैकी रूक्ष शब्द. पण फैज साहेबांनी त्याला अशा खुबीने दोनदा वापरला की क्या कहने!&lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;
कर रहा था गम-ए-जहां का हिसाब&lt;br /&gt;
आज तुम याद बेहिसाब आए &lt;/blockquote&gt;
उर्दूमधील आणखी एक आवडीचा शब्द म्हणजे काशाना. याचा अर्थ घर. गालिबच्या एका शेरात हा पहिल्यांदा भेटला.&lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;
गिरीया चाहे है ख़राबी मेरे काशाने की&lt;br /&gt;
दर-ओ-दीवार से टपके है बयाबां होना &lt;/blockquote&gt;
याचा विस्तृत अर्थ &lt;a href="http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ghalib/017/17_02.html?nagari"&gt;इथे&lt;/a&gt;.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
'संवादाचा सुवावो' हे महेश एलकुंचवार यांनी प्राचार्य राम शेवाळकरांशी मारलेल्या गप्पांचं पुस्तक नुकतंच वाचलं. संवादाचा सुवावो - संवादाचा अनुकूल वारा - ही सुंदर शब्दरचना ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील आहे.&lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;
म्हणोनि संवादाचा सुवावो ढळे |&lt;br /&gt;
तर्‍ही हृदयाकाश सारस्वते बोळे |&lt;br /&gt;
आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे |&lt;br /&gt;
मांडला रसु ||&lt;/blockquote&gt;
(संवादाचा अनुकूल वारा सुटला की, हृदयाकाश सारस्वताने भरून येते. मग श्रोत्यांचे मन थार्‍यावर नसले, तरी वितळते व त्यातून रस उत्पन्न होतो.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आलाप करणे, गुफ्तगू करणे यांच्या तोडीचा वाक्प्रचार आज मराठीत प्रचलित नसला तरी कधीकाळी नक्कीच होता. &lt;/div&gt;
&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-8397055327716588656?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/qE7kBfjmM8I" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/qE7kBfjmM8I/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/09/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-2071327076841411371</guid><pubDate>Sun, 28 Aug 2011 14:26:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-22T21:32:26.500+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">विनोद</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भंकसगिरी</category><title>पालुस जुनियर, अमिग्डला आणि उत्क्रांती</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;समाजमनाची विविध आंदोलने तात्कालिक आवर्तनांमधून जात असताना त्यांना निरखून पाहिले असता त्यांचे प्रकटन तेव्हा बोलल्या जाणार्‍या भाषेमधूनही होते असे जाणकारांच्या अनुभवास आले आहे. जाणकार म्हणजे अर्थातच आम्ही, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. थोडक्यात सांगायचे तर, कमिंग स्ट्रेट टु द बिंदू (रेखा,हेलन) विदाउट बिटींग (रंजीत,डॅनी) अराउंड द झुडूप आय टेल यू, दुबईस्थित व्यावसायिक पक्या डेंजर यांनी म्हटल्याप्रमाणे जो [१] पब्लिक के दिल मे र्‍हैता हय, वोईच उसकी जुबान पे आता हय. हा साक्षात्कार आम्हाला होण्याचे कारण म्हणजे सध्या आंतरजालावर बर्‍याच ठिकाणी दिसणारा Awwwwww! हा उद्गार-कम-आश्चर्य-कम-इमोसनल-अत्याचार वाचक शब्द. बहुतेक वेळा मांजरांच्या चित्राखाली हा आढळतो आणि याच्या उद्गारकर्त्या म्हैला अंदाजे सव्वा महिना ते ९७ वर्षे या वयोगटातील असतात. हा शब्द जितका लांब तितकी उद्गारकर्तीणीची भावणा अधिक तीव्र असा अंगठ्याचा नियम [२] लावता येतो. या शब्दाची इतर रूपेही आहेत. शो श्वीट किंवा शो क्यूट हे त्याचेच प्रकार. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
क्यूट नक्की कशाला म्हणायचे? सवयीनुसार क्यूटची व्याख्या बदलू शकते का? माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना जाळ्या आहेत. एक दिवस संध्याकाळी जाळीच्या बाहेरच्या बाजूला एक पालोबा दिसले. पालोबाईही असतील कदाचित. जाळीवरून हळूहळू फिरणारे त्यांचे पाय पाहून मला जुरासिक पार्कमधील टी-रेक्स आठवला. (लाइफ, फाइंड्स अ वे.) हळूहळू त्यांची सवय झाली, त्यांचे डेली रूटीनही लक्षात आले. दिवसभर बाहेर उन असल्याने जाळीत ताणून द्यायची आणि रात्री शब्दश: माशा मारायला निघायचे, हाय काय अन नाय काय. बिलं भरणे, स्वैपाक करणे असली फालतू कामे करायला ते काय उत्क्रांत झाले होते का? मग एके दिवशी दुसर्‍या खिडकीच्या जाळीत एक पालपिल्लू दिसले. त्याची फिरण्याची इष्टाइल पाहून त्याचे नाव ठेवले - पालुस. मग शिणियर पालोबा आठवले, त्यांच्यावर अन्याय का? मग दोघांची नावे ठेवली - पालुस जुनियर आणि पालुस सिनियर. पालुस जुनियर मांजराच्या पिल्लाइतका क्यूट नसला तरी पिल्लू क्याटेगरीत असल्याने चालून जातो. पालुस सिनियर अचानक दिसले तर दोन क्षण पोटुसमध्ये खड्डुस पडतो, पण ती &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Amygdala"&gt;अमिग्डलाची&lt;/a&gt; करामत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-z-DDgVy0xXM/TntbMxv3jBI/AAAAAAAAAYQ/XYXc1pjAr-k/s1600/220px-T._rex_old_posture.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="228" src="http://4.bp.blogspot.com/-z-DDgVy0xXM/TntbMxv3jBI/AAAAAAAAAYQ/XYXc1pjAr-k/s320/220px-T._rex_old_posture.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;पालुस जुनियर, कोण होतास तू, काय झालास तू&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;आमचे पूर्वज याच अमिग्डलाच्या भरवशावर शिकारी करायला निघायचे. अमिग्डला म्हणजे क्रांतीवीर सिनेमात जिला नाना पाटेकर छोटा दिमाग म्हणतो ती. एखाद्या झुडुपातून खसफस ऐकू आली की थांबून लढायचे की धूम [३] ठोकायची याचा निर्णय क्षणार्धात करावा लागायचा. अर्थात कधीकधी निर्णय चुकायचा. म्हणजे वाघ समजून धूम ठोकावी आणि कोल्ह्याचे पिल्लू निघावे असाही प्रकार व्हायचा. मग रात्री गुहेत शेकोटीच्या आसपास गप्पांचा फड रंगल्यावर त्या कोल्ह्याच्या पिलाचे रूपांतर सिंहात व्हायचे आणि कथेला रंग चढायचा. आज कोल्ह्याच्या जागी क्लायंट असतो आणि आपण त्याला कसे गंडवून कॉन्ट्रॅक्ट दुपटीच्या दरात मिळवले याची सुरस कथा ग्लासातील बर्फाच्या किणकिणणार्‍या पार्श्वसंगीतावर सांगितली जाते. इतपत उत्क्रांती [४] व्हायला गेलाबाजार&amp;nbsp; ३०,००० वर्षे लागली, आहात कुठे? [५] उत्क्रांती या शब्दाची शोकांतिका ही की यात क्रांती हा शब्द दडलेला आहे. क्रांती म्हटले की मनोजकुमारने भारतीय सिनेरसिकांवर केलेला अत्याचार आठवतो. त च्या जागी ट करून हिंदी बोलणारे टॉम अल्टर, बॉब क्रिस्टो आठवतात. आपण उत्क्रांत झालो आहोत यावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो.&lt;br /&gt;
--&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;तळटीपा :&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;[१] अमरू उपराष्ट्राध्यक्ष नव्हेत.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;पीजे : जो बायडेन पाळण्यात असताना त्यांची आई कोणते गाणे म्हणायची? उत्तर : बाळा जो जो रे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;[२] अंगठ्याचा नियम अर्थात रूल ऑफ थंब. जेव्हा आपल्याकडे लोक अंगठा लावत होते किंवा कापून घेत होते तेव्हा हा अंगठ्याचा नियम वापरून पाश्चात्य संशोधकांनी अनेक शोध लावले, प्रगती केली आणि आपल्याला अंगठा दाखवला. त्यांची प्रगती झाली म्हणून आपली पॅसेंजर झाली. तेव्हा ते तसे झाले म्हणून तर आत्ता हे असे झाले. असो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;[३] चित्रपट नव्हे. धूम २ मध्ये ऐश्वर्याचा अभिनय पाहून जी ठोकावीशी वाटते ती धूम. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;[४] उत्क्रांतीवरून आठवलं. शाळेत आम्हाला उत्क्रांतीचा धडा सरमळकर बाईंनी शिकवला. मी, सावड्या, लेल्या आणि शिर्क्या मागच्या बेंचांवर भंकस करत बसायचो. लेल्याची आई रोज डब्यात थालपीटं, कोथिंबीरीच्या वड्या द्यायची. लेल्याच्या वाट्याला एखादा तुकडा यायचा, बाकी आम्हीच संपवायचो. प्रिलिमच्या आधी लेल्यानं बातमी आणली, "उत्क्रांतीचा प्रश्न पंधरा मार्काला येणारे, गॅरंटेड." तसा सावड्या मला विचारतो, "इचिभना, उत्क्रांती म्हणजे काय रे सुर्व्या?" मी म्हणालो, "मला तरी कुठे माहितै? डेक्कनक्वीनने कधी शिकवलं कुणाला माहीत?" असो. गेले ते दिवस. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;[५] आहात कुठे ही नक्की काय भानगड आहे? या प्रश्नाला काही अर्थ आहे का? काही लोकांचा हा आवडता प्रश्न आहे. अंबानीने ढमके अब्ज देऊन घर [अ] बांधले, आहात कुठे?&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
--&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;span style="color: #274e13;"&gt;तळतळटीपा :&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #274e13;"&gt;[अ] अंबानीने जे बांधले त्याला घर म्हणणे म्हणजे मार्लन ब्रॅंडोला 'आग ही आग' मध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका देण्यासारखे आहे. पण आमच्या मध्यमवर्गीय शब्दकोषात याला साजेसा शब्दच नाही त्याला आम्ही काय करणार? फार तर बंगला. आमच्या पालुसची धाव घर, १-२ बीएचके यापलिकडे जात नाही. थिट्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या घुसमटीचे प्रकटन करण्यासाठी आविष्काराची निकड भासणे, त्या निकडीचे रूपांतर रक्ताळलेल्या बोथट जखमांच्या खपल्यांमध्ये होणे, त्या खपल्यांवर चढलेला खुंटलेल्या संवेदनांचा पिवळसर-जांभळा रंग, कधी त्रिज्येमधून तर कधी परिघाबाहेरून भाग न जाणारे अपरिमेय गणित, भागाकारात हच्चा घेतला तरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढींच्या उसवलेल्या झग्यातून कुरकूरणारी बोथट मनांची आक्रंदने, चेंगीझ खानपासून राखी सावंतपर्यंत हेलपटलेल्या झगझगीत रूपेरी वाफांच्या मनस्वी झिलया, हीच आजच्या भगभगीत, ओशट, तडकलेल्या बूर्झ्वा भावनिक आंदोलनांची शोकांतिका आहे. &amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #274e13;"&gt;----&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #274e13;"&gt;&lt;span style="color: black;"&gt;चित्र विकीवरून साभार.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-2071327076841411371?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/0xPDb0dcDpQ" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/0xPDb0dcDpQ/blog-post_28.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-z-DDgVy0xXM/TntbMxv3jBI/AAAAAAAAAYQ/XYXc1pjAr-k/s72-c/220px-T._rex_old_posture.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/08/blog-post_28.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8420826141789914869</guid><pubDate>Mon, 22 Aug 2011 08:08:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-01T20:24:01.304+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">इतिहास</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><title>आर्यांच्या शोधात</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;blockquote&gt;
नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमपरो यत् ।&lt;br /&gt;
किमावरीवः कुहकस्यशर्मन्नंभः किमासीद्गहनं गभीरं ॥ १ ॥&lt;/blockquote&gt;
&lt;blockquote&gt;
-- ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२९&lt;/blockquote&gt;
&lt;br /&gt;
दूरदर्शन वयात येत असतानाची गोष्ट, जेव्हा मालिका या शब्दाआधी दर्जेदार हे विशेषण नि:संकोचपणे वापरता येऊ शके. त्या काळात दर रविवारी रात्री नऊ वाजता ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचे हे श्लोक आणि नंतर पं. वसंत देव यांनी केलेला हिंदीतील अनुवाद कानावर पडत असे. 'भारत एक खोज' बघताना पहिल्यांदाच शाळेत शिकवला जातो त्यापेक्षा पूर्वीचा आपला इतिहास कसा होता याविषयी उत्सुकता निर्माण झाली. नुकतेच प्रा. मधुकर केशव ढवळीकर यांचे 'आर्यांच्या शोधात' हे पुस्तक वाचले आणि हा विषय किती गहन, जटील आणि तरीही रोचक आहे याची जाणीव झाली. प्रा. ढवळीकर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्र विषयात अनेक वर्षे संशोधन केले. यातील काही काळ डेक्कन कॉलेजचे संचालक आणि उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नुकताच त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारतात आर्यांचे आगमन कधी, कुठून झाले याबद्दल निरनिराळ्या विद्वानांनी मांडलेली मते, त्यातील त्रुटी, उपलब्ध पुरावे आणि त्यावरून आर्यांचे मूळ उत्तर सिंधु संस्कृतीत असले पाहिजे हा निघणारा निष्कर्ष या सर्वांचा उहापोह 'आर्यांच्या शोधात' या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच प्रा. ढवळीकर या संदर्भात लोकमान्य टिळक, हार्वड विद्यापीठाचे मायकेल विट्झेल, केंब्रिज विद्यापीठाचे कोलीन रेनफ्र्यु यांच्यासह २० विद्वानांच्या वेगवेगळ्या मतांचा आढावा घेतात. लो. टिळक वेदांमधील खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर वेदांचा काळ इ. पू. ६००० असा ठरवतात. आर्य उत्तर ध्रुवावरून आले असावेत असे त्यांचे मत आहे तर रेनफ्र्यु यांच्या मते आर्यांचे उगमस्थान तुर्कस्तानात होते. विट्झेल आर्य भारतात दोनदा आले असे मानतात. पण तलगेरींना हे अजिबात मान्य नाही. आर्य भारतातीलच आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. या मतांमधील प्रचंड वैविध्य पाहिल्यावर 'आर्यांचा प्रश्न भारताच्याच नव्हे, तर सार्‍या जगाच्या इतिहासातील कूट समस्या होऊन बसला आहे' या पुस्तकाच्या पहिल्याच वाक्याची सत्यता पटते. विविध विद्वानांच्या या टोकाच्या मतांमुळे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चर्चा करताना त्यांच्यात कटुता येऊ लागली आहे. काही विद्वान तर चक्क काही काळ हा प्रश्न बासनात ठेवून द्यावा अशा मतापर्यंत आले आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यासारख्या प्रचंड व्याप्तीच्या विषयावर सुलभ पुस्तक लिहीताना त्यातील पुरातत्वशास्त्र, तौलनिक भाषाशास्त्र यासारख्या शाखांमध्ये संशोधन कसे केले जाते याच्या तपशिलात जाणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याऐवजी ओघाने येतील तसे विषय आणि ते समजण्यासाठी लागणारी पुरेशी पार्श्वभूमी यांचा समन्वय पुस्तकात साधलेला दिसून येतो.&amp;nbsp; इतिहासामध्ये संशोधन करताना विविध प्रकारच्या पुराव्यांचा आधार घेतला जातो. भाषाशास्त्रीय पुरावे - विविध भाषांमधील समान शब्दांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ भाषेविषयी आणि त्यावरून ती भाषा बोलणार्‍या लोकांविषयी अंदाज बांधता येतात.&amp;nbsp; त्या काळच्या वाङमयाचा अभ्यास करून तेव्हाची भौगोलिक परिस्थिती, तेव्हा घडलेल्या महत्वाच्या घटना याविषयी मौलिक माहिती मिळू शकते. इराणी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तामध्ये बरेच संस्कृत शब्द, तसेच भारतातील नद्यांची आणि प्रदेशांची नावे सापडतात. याउलट ऋग्वेदामध्ये इराणी परंपरेचा एकही उल्लेख सापडत नाही यावरून त्यांचे स्थलांतर भारतातून इराणमध्ये झाले असावे असा अंदाज बांधता येतो. मायकेल विट्झेल यांच्या मते ऋग्वेदाचे सातवे मंडल म्हणजे निखळ इतिहास आहे. याखेरीज सर्वात महत्वाचे पुरावे म्हणजे उत्खनन केल्यावर मिळणारे प्राचीन संस्कृतींचे अवशेष. भारतीय इतिहासातील एक चमत्कृतीजन्य विशेष म्हणजे आर्यांच्या संस्कृतीचे वाङमयीन पुरावे भरपूर आहेत मात्र त्यांचे पुरातत्वीय अवशेष अजिबात सापडत नाहीत. याउलट सिंधु संस्कृतीचे अवशेष भरपूर आहेत पण त्याबद्दलचा लिखित पुरावा अद्याप उपलब्ध नाही कारण सिंधु लिपी अजून वाचली गेलेली नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
'ऋग्वेदातील संस्कृती' या प्रकरणात त्या काळातील आर्यांच्या राहणीमानाबद्दल रोचक माहिती दिली आहे. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे आर्यांची वस्ती सप्तसिंधुच्या प्रदेशात होती. सप्तसिंधु म्हणजे पश्चिमेकडे सिंधु आणि पूर्वेकडे सरस्वती यांच्यामधला भूभाग. ऋग्वेदामध्ये सर्वाधिक वर्णन केले आहे अशी प्राचीन सरस्वती नदी म्हणजे आताची कोणती याबद्दल पुन्हा वाद आहेत. तरीही सध्याच्या भारतातील घग्गर आणि पाकीस्तानातील हाक्रा ही सरस्वती आहे असे मानायला पुरावे आहेत. ऋग्वेदकालीन आर्य शेती करत असले तरी त्यांच्या उपजीवीकेचे मुख्य साधन पशुपालन होते. दगडी हत्यारे, मौल्यवान दगडांचे तसेच सोन्याचे मणी, लाकडाची आणि मातीची भांडी यांचा वापर ते करीत असत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आर्यांच्या वापरातील एका गोष्टीवरून विद्वानांमध्ये परत रण माजले आहे, ती गोष्ट म्हणजे घोडा. यावर सर मॉर्टिमर व्हीलर म्हणतात, "No horse, No Aryans." ऋग्वेदामध्ये आर्यांचा सर्वात आवडता प्राणी म्हणजे घोडा, मात्र तिथे अश्व याचा अर्थ गाढव असाही होतो. ऋग्वेदात घोड्याला ३४ बरगड्या असल्याचा उल्लेख आहे. युरोपमधील घोड्यांना ३६ बरगड्या असतात, तर भारतातील घोड्यांना ३४ बरगड्या असतात. सिंधु संस्कृतीच्या उत्खननामध्ये काही हाडे सापडली ती घोड्याची की गाढवाची यावर बरीच वर्षे खल चालू होता. यावर भारत सरकारने हंगेरीमधील 'घोडा' या विषयावरील जगन्मान्य तज्ज्ञ सांडोर बोकोनी यांना पाचारण केले. त्यांनी सर्व हाडे तपासून ती घोड्याची असल्याचा निर्वाळा दिला. पण हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ रिचर्ड मिडो यांनी ती हाडे गाढवाची असल्याचे जाहीर केले. घोडा भारतात पहिल्यांदा इ. पू. २००० मध्ये आल्याचे विश्वसनीय पुरावे आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
'आर्यांचे पुरातत्वीय अवशेष' या प्रकरणात उपलब्ध पुरातत्वीय पुरावे आणि त्यातून काढता येणारे निष्कर्ष दिले आहेत. भारतात लोखंडाचा वापर इ. पू. १५०० पासून सुरू झाला. ऋग्वेदामध्ये मात्र लोखंडाचा उल्लेख नाही. तिथे येणार्‍या अयस या शब्दाचा अर्थ तांबे असा होतो. हा पुरावा आणि घोड्याचा पुरावा या दोन गोष्टींवरून वेदांचा काळ इ. पू. २०००-१५०० असा निश्चित करता येतो. एकदा काल निश्चित झाला की त्यांच्या वसाहती कुठे होत्या याबद्दल अनुमान बांधता येते. सिंधु संस्कृतीच्या उत्खननामध्ये ज्या वसाहती समोर आल्या आहेत, त्यामध्ये पूर्व सिंधु (इ. पू. ३२५०-२६५०), नागरी सिंधु (इ. पू. २६००-२२००) आणि उत्तर सिंधु (इ. पू. २०००-१४००) या प्रमुख वसाहती आहेत. प्रा. ढवळीकर आर्यांची वस्ती म्हणजे उत्तर सिंधू संस्कृती असे समीकरण मांडतात. याच्या पुष्ट्यर्थ तेव्हाच्या नद्या, पर्यावरण यांची वर्णने तसेच घरे, शेती, स्थापत्य, अवजारे, भांडी, नाणी असे उत्खननात सापडलेले अनेक पुरावे त्यांनी दिले आहेत. ही उत्खनने सिंधु खोरे, मोहेंजोदारो, हरप्पा, कालीबंगन, भगवानपुरा इ. ठिकाणी केली आहेत. हे मत बहुतेक पाश्चात्य विद्वानांना मान्य नाही. सबळ पुरावा असूनही आर्य बाहेरूनच आले याच मताला ते चिकटून आहेत. मात्र यातही अपवाद आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ प्रा. केनेथ केनेडी यांनी भारतीय उपखंडात सापडलेया जवळजवळ सर्व मानवी सांगाड्यांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवे लोक आले नाहीत.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उत्तर सिंधुकालीन लोक वैदिक आर्य होते असे मानले तर ते कुठून आले या प्रश्नाच्या मुळाशी जाता येते. 'वैदिक आर्यांचे पूर्वज' या प्रकरणात याची सखोल चर्चा केली आहे. मेहेरगढ येथील उत्खननावरून असे दिसून येते की ९००० वर्षांपासून ते सुमारे ७००० वर्षांपर्यंत तेथे एकाच प्रकारचे लोक राहत होते. इ. पू. ४५०० च्या सुमारास नव्या लोकांचे आगमन भारतीय उपखंडात झाले. इथून पुढे टोगाओ संस्कृती (इ. पू. ४५००-३८००) सुरू झाली.&amp;nbsp; तेच लोक इ. पू. १७५० म्हणजे उत्तर सिंधु संस्कृतीचा र्‍हास होईपर्यंत राहत होते. या नव्या लोकांची दातांची ठेवण आधीच्या नवाश्मयुगीन लोकांपेक्षा वेगळी होती. त्यांची विशिष्ट प्रकारची दाढेची ठेवण युरोपियन आणि दक्षिण आशियातील काही लोकांमध्ये आढळते. या नवीन लोकांनी बर्‍याच नवीन गोष्टी आपल्याबरोबर आणल्या. ते इथे आल्यावर आधीचे नवाश्मयुगीन लोक त्यांच्यात सामावून गेले असण्याची शक्यता आहे. या लोकांची भाषा इंडो-आर्यन (संस्कृतसारखी) असावी. यातील काही लोकांनी पूर्वेकडे स्थलांतर केले, त्यातून हाक्रा संस्कृती (इ. पू. ३८००-३२००) उदयास आली. त्यामधून पूर्व, नागरी आणि उत्तर सिंधु अशी वाटचाल झाली. या सांस्कृतिक विकासाचे चित्र आपल्याला आज ऋग्वेदात दिसते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नागरी सिंधु संस्कृतीच्या काळात राजस्थानमध्ये हवामान अनुकूल होते, १८ इंच पावसामुळे सरस्वती दुथडी भरून वहात होती. परिणामत: नागरी सिंधु संस्कृती बहरली. परंतू इ. पू. २२००-२००० च्या दरम्यान झालेल्या भूकंपांमुळे पर्यावरणात बदल होऊन हवामान दुष्काळी झाले. सिंधु खोरे राहण्यास प्रतिकूल झाल्यावर आर्यांची बर्‍याच प्रमाणात स्थलांतरे झाली. याची चर्चा 'आर्यांची स्थलांतरे' या प्रकरणात केली आहे. इ. पू. १८००-१६०० दरम्यान आर्य इराणमध्ये गेले. तेथील नद्यांना त्यांनी आपल्याकडची नावे दिली. हरैवती-सरस्वती, हरोयु-शरोयु. इराणमध्ये केलेल्या या स्थलांतराचा वृत्तांत झेंद अवेस्तामध्ये आढळतो. सप्तसिंधुमधून इराणमध्ये जाताना ज्या क्रमाने नद्या लागतात बरोबर त्याच क्रमाने त्यांचे वर्णन अवेस्तामध्ये आहे. आर्य सप्तसिंधुमधून इराणमध्ये गेले याला अवेस्तामध्ये सज्जड पुरावे असूनही पाश्चात्य विद्वानांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांची तुलना रोचक आहे. इराणी लोक असुरांना देव आणि देवांना दैत्य मानतात. इंद्र हा अंद्र या नावाने दैत्य मानला जातो तर आपल्याकडील वृत्र हा दैत्य व्रिथ बनून देव मानला जातो. आर्य इराणमध्ये गेल्यानंतर त्यातील काही त्याहून पुढे म्हणजे तुर्कस्तान, इजिप्त, इथियोपिया आणि ग्रीसपर्यंत पोचल्याचे पुरावे आहेत. येथील देवांची नावे, भाषांमध्ये संस्कृतचा प्रभाव, दफनपद्धतीमध्ये ऋग्वेदात वर्णन केलेल्या दफनपद्धतीशी साम्य अशा अनेक गोष्टींमध्ये सिंधु संस्कृतीचा प्रभाव आढळून येतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आर्यांची भारतातही स्थलांतरे झाली. राजस्थानातून सिंधु संस्कृती मध्य प्रदेशात कायथा संस्कृती (इ. पू. २४५०-२०००) या नावाने पसरली. कायथा (जि. उज्जैन) येथे तिचे पहिले अवशेष सापडले म्हणून तिला कायथा संस्कृती हे नाव दिले गेले. याचा विस्तार पुढे महाराष्ट्रात माळवा संस्कृतीच्या (इ. पू. १७००-१४००) रूपाने झाला. ती इ. पू. १४०० मध्ये लयास गेली पण तत्पूर्वी तिच्यामधून निर्माण झालेली जोर्वे संस्कृती (इ. पू. १५००-९००) कोकण किनारपट्टी सोडल्यास सबंध महाराष्ट्रात पसरली होती. इनामगाव (जि. पुणे), दायमाबाद, नेवासे (जि. अहमदनगर) आणि प्रकाश (जि. नंदूरबार) ही या संस्कृतीची महत्वाची ठिकाणे होती. याखेरीज सौराष्ट्र, कच्छ तसेच पूर्वेकडे बिहारमध्ये आर्यांनी स्थलांतरे केल्याची उदाहरणे आहेत. गंगेच्या खोर्‍यातही आर्यांच्या वस्तीच्या खुणा सापडतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुमारे १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इतिहासाचे वाङमयीन उल्लेख आणि पुरातत्वीय पुरावे यांच्या आधारावर जे चित्र उभे राहते त्याचा सारांश उपसंहार या शेवटच्या प्रकरणात आहे. इ. पू. ५००० च्या सुमारास जे नवीन लोक भारतात आले, त्यांचा टोगाओ संस्कृती-हाक्रा-संस्कृती-पूर्व/नागरी/उत्तर सिंधु संस्कृती असा प्रवास झाला. ऋग्वेदकाळ म्हणजे उत्तर सिंधु संस्कृती असे समीकरण जरी मांडलेले असले तरी ऋग्वेदातील काही ऋचा नागरी सिंधु किंवा त्याहूनही आधी म्हणजे पूर्व सिंधु काळात रचल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. पुढे इ. पू. २२००-२००० मध्ये सिंधु संस्कृती लयास गेल्यावर आर्यांनी भारताबाहेर आणि भारतात स्थलांतरे केली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आर्यांच्या उगमासारख्या कूट समस्येवर सर्व थरातील लोकांपर्यंत पोचेल असे पुस्तक लिहीणे निश्चितच कठीण काम आहे. 'आर्यांच्या शोधात' पुस्तकामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तेवढा पुस्तकाचा व्यापही नाही. मात्र या प्रश्नाबद्दल उत्सुकता निर्मांण करण्यात पुस्तक नक्कीच यशस्वी ठरते. सुरूवातीच्या प्रकरणांमध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती होते. तसेच काही ठिकाणी तारखांचा थोडा गोंधळ होतो. उदा. वर दिलेले प्रा. केनेडी यांचे मत - 'गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवीन लोक आले नाहीत' - इथे इ. पू. ५००० की इ. पू. ३००० हे स्पष्ट होत नाही.&amp;nbsp; या किरकोळ दुरूस्त्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये करता येऊ शकतील असे वाटते. पुस्तकाच्या शेवटी दिलेली अद्ययावत संदर्भसूची या विषयात खोलात जाऊ इच्छीणार्‍या वाचकांसाठी नक्कीच उपयोगी ठरावी.&amp;nbsp; पुस्तक वाचताना मूळ प्रश्नासोबतच 'इंटेरेस्टींग टिट्सबिट्स' या शीर्षकाखाली येऊ शकेल अशी रोचक माहितीही मिळते. उदा. आर्यकालीन संस्कृतीमध्ये भारताचे नाव मेलुहा असे होते. तेव्हाच्या या सर्व संस्कृतींमध्ये मूळ धर्म जरी हिंदू असला तरी तो आचरणात आणण्याच्या धार्मिक चालीरीतींमध्ये फरक होते. सिंधु संस्कृतीमध्ये अग्निकुंडे मोठ्या प्रमाणावर आढळतात तर हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे मात्र अग्निकुंडे अजिबात आढळत नाहित. आजही भारतभर दिसणार्‍या एकच हिंदू धर्माच्या निरनिराळ्या चालिरीतींचे मूळ अशा प्रकारे पाच हजार वर्ष जुन्या परंपरांमध्ये आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुस्तक वाचण्याचा अनुभव कसा असेल हे बरेचसे पुस्तक कोणत्या प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. ललित साहित्य किंवा कविता यांचा आस्वाद घेताना येणारी अनुभूती वेगळी असते. खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगनच्या 'कॉसमॉस' या पुस्तकात व्हॉयेजर अंतराळयानातून घेतलेले पृथ्वीचे चित्र दिले आहे. सूर्यमालेच्या बाहेरून घेतलेल्या या चित्रात सूर्यप्रकाशाच्या झोतात मध्यभागी एक छोटासा निळा बिंदू दिसतो, तीच पृथ्वी.&amp;nbsp; याला इंग्रजीत एक चपखल वाक्प्रचार आहे, 'लुकिंग ऍट द बिग पिक्चर.' संस्कृती हा शब्द सामाजिक, नैतिक आणि राजकीय संदर्भांमध्ये ज्या बेधडकपणे वापरला जातो त्याचा परिणाम म्हणून संस्कृतीचा अर्थ एखादी कोणत्याही धक्क्याने सहज तुटणारी नाजूक वस्तू इतकाच होऊन बसला आहे. बहुतेक धार्मिक चालीरीतींचे व्यावसायिकरण झाले आहे. वेद, पुराणे यांचा उल्लेख आल्यावर त्यावर भक्तीभावाने विश्वास ठेवणारे धार्मिक किंवा त्यांना कोणतीही किंमत न देणारे विज्ञानवादी अशी दोन परस्परविरोधी टोके प्रामुख्याने दिसतात. पण यातच आपल्या इतिहासाच्या खुणा लपलेल्या आहेत याची जाणीव क्वचितच दिसते. 'आर्यांच्या शोधात' सारखे आपल्या पूर्वजांचा मागोवा घेणारे पुस्तक वाचल्यावर समाज आणि संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण कळत आणि नकळत 'मोठ्या चित्राचा' विचार करायला लागतो. संस्कृतीच्या नावाखाली आपण आज ज्या चालीरीती क्षणाचाही विचार न करता वापरतो, त्यांचा उगम आणि प्रसार कुठे, कधी, कसा झाला हे जाणून घेणे हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो.&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
आर्यांच्या शोधात&lt;br /&gt;
मधुकर केशव ढवळीकर&lt;br /&gt;
राजहंस प्रकाशन&lt;br /&gt;
प्रथम आवृत्ती - एप्रिल २००८&lt;br /&gt;
किंमत - १०० रूपये &lt;/div&gt;
&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-8420826141789914869?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/B8f6HhnDJ2E" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/B8f6HhnDJ2E/blog-post_22.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/08/blog-post_22.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-3918467092176728337</guid><pubDate>Sun, 14 Aug 2011 13:49:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-14T23:02:02.214+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">चित्रपट</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">भाषा</category><title>बस कहर चले, जब आवे सिंघम - माय मराठी आयशीयूमधून बाहेर आली होssss</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;गेली काही वर्षे मराठी भाषा अत्यवस्थ असल्याची आणि त्याबद्दल सुतकी चेहेरा करून उसासे सोडण्याची फ्याशन आली होती. मराठीवर इतर भाषिकांचे आक्रमण - बॉलीवूड मुंबईत असूनही पंजाबी, बिहारी भाषांना, तेथील कथांना मिळणारे प्राधान्य - मराठी कलाकारांना बॉलीवूडमध्ये मिळणारा दुजाभाव (इथे मंगेशकरांपासून गोवारीकरांपर्यंत या सर्वांचा सोईस्करपणे पडलेला विसर) - आणि या सगळ्यावर होणार्‍या चर्चा - यांनी नाकीनऊ करून सोडले होते. भाषा वापरण्याची सक्ती केल्यास असे प्रयत्न यशस्वी होत नाहीत याची इतिहासात ढीगभर उदाहरणे आहेत, तरीही प्रतिशब्द चळवळ जोरात आहे : ड्रॉवरला खण का म्हणू नये? - (कारण खणाने ओटी भरतात?). इंग्रजीत एक म्हण आहे, "टु पुट द कार्ट बिफोर द हॉर्स."&amp;nbsp; इथेही तेच होत होते, आधी गाडी मग घोडा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भाषा संवाद साधण्याचे एक साधन आहे, पण भाषा म्हणजे उद्दीष्ट नव्हे. जगात सध्या सहा एक हजार भाषा आहेत. आपल्याला मराठी जितकी आवडते तितकीच इतरांना त्यांची भाषा आवडते. लोक आपणहून तुमची भाषा कधी वापरतील? याचे उत्तर म्हणून आणखी एक प्रश्न. लोक कोणतेही काम आवडीने कधी करतात? (हिंट : सगळ्या जगाला आज मॅंडॅरिन शिकायची हौस का आली आहे?)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"द होल थिंग इज दॅट के भय्या सबसे बडा रूपय्या."&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सिंघम चित्रपटाचा नायक मराठी आहे आणि तो अभिमानाने सांगतो, "मी मराठा आहे.". याआधी हिंदी चित्रपटात मराठी नायकांची बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत मात्र इथे ते मराठीपण नावापुरते उरलेले नाही. उलट नायक मराठी असल्याचा सुरेख उपयोग करून घेतला आहे. इथे अजय मराठी बोलतो, आईला आई, आजोबांना आजोबा म्हणतो, मराठी शिव्या देतो (आइच्या गावात!) आणि व्हिलनला सांगतो, "नायतर माझी सटकेल." हिंदी चित्रपटांच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडते आहे. हा सुखद बदल तथाकथित भाषा रक्षकांच्या लक्षात आला नसावा कारण याचा उल्लेख अजून कुठेही बघायला मिळालेला नाही. सिंघम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींच्या वर कमावले आहेत. मराठी चालतच नव्हे तर पळते आहे. तात्पर्य : पैसा मिळत असेल तर लोक मराठीच काय पार्सेलटंगही आनंदाने बोलायला तयार होतील. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बिचार्‍या अजय देवगणची अवस्था राहुल द्रविडसारखी झाली आहे. कामाची कोणतीही जाहिरात न करता कामालाच बोलू देणे हा दोघांचा खाक्या. पण कदाचित यामुळेच यशस्वी लोकांची यादी होते तेव्हा या दोघांचा सर्वांना सोईस्कर विसर पडतो. सिंघमसाठी अजयनेही सिक्स पॅक कमावले पण दोन्ही खानांनी केला तसा त्याचा बोलबाला कुठेही केला नाही. फूल और कांटे पासूनचा त्याचा आलेख पाहिला तर केलेल्या चुकांपासून धडे घेत उत्तरोत्तर विकसित होत जाणारा एक कष्टाळू, गुणी अभिनेता दिसतो. भगतसिंगच्या ऐतिहासिक भूमिकेपासून कंपनीमधील डॉनपर्यंत सगळ्या भूमिका अजयने मन लावून केल्या. परत कोणतेही पब्लिसिटी स्टंट नाहीत, कुणाशी अफेअरच्या वावड्या नाहीत, आपण बरे आपले काम बरे. दोनदा उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही अजय भूमिकेत मागून शिरलो का पुढून वगैरे गप्पा मारताना दिसत नाही. त्याचे एकूण वागणे पाहिल्यावर असा मितभाषी माणूस बॉलीवूडमध्ये टिकला कसा याचेच आश्चर्य वाटते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चित्रपटातील आणखी एक उल्लेखनीय बाजू म्हणजे अजय-अतुल यांचे संगीत. ज्याचा परिणाम होईल असे एकच गाणे चित्रपटात आहे ते म्हणजे शीर्षकगीत &lt;a href="http://youtu.be/w6iFLBNbCGA"&gt;सिंघम&lt;/a&gt;. याचे महत्व पुरेपूर ओळखून या गाण्यात अजय-अतुलने कमाल केली आहे. जोशपूर्ण अशा या गाण्यातील ताल म्हणजे अस्सल "वरून रांगडा कणखर काळा, ओबडधोबड मातीचा" आहे. त्याच्या जोडीला सुखविंदरचा आवाज कमाल करतो. अजयची एंट्रीच या गाण्याने होते आणि त्याच्या व्यक्तिरेखेचा जोश गाण्यात पुरेपूर उतरला आहे. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही मराठी आहात की कानडी याने फरक पडत नाही हेच अजय-अतुल यांच्या यशाने परत एकदा सिद्ध केले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
गोलमाल मालिकेचे दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांचा हा चित्रपट आहे. त्यांचे ध्येय एक मनोरंजनात्मक ऍक्शनपट बनवणे होते, ते त्यांनी चोख पार पाडले आहे. चित्रपट बघायला गेलात तर कृपया सत्यजित रे किंवा कुरोसावा यांच्या आठवणी डोक्यात घेऊन जाऊ नये. पिझ्झा हटला गेल्यावर झुणका भाकर कशी मिळणार? तर्क नावाची वस्तू थोडा काळ बाजूला ठेवलीत आणि मराठी अस्मितेबरोबर चित्रपट बघितलात तर आवडण्याची शक्यता जास्त. इत्यलम.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-3918467092176728337?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/Z42e-shK1NY" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/Z42e-shK1NY/ssss.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/08/ssss.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-2343560240414645378</guid><pubDate>Tue, 09 Aug 2011 06:18:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-22T21:22:45.554+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">चित्रपट</category><title>ये स्क्रिप्ट जरूर मिली है दोबारा</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;यजमानीणबाईंची सुगरण म्हणून ख्याती आहे. आपल्यापुढे ह्या वेळेस शब्दश: काय वाढून ठेवले असणार आहे याबद्दल सुखद कल्पनाविलास करत भलेभले त्यांच्या दाराची बेल वाजवतात. तुम्हीही आज तसेच करता. यथावकाश, तासभर त्यांच्या भाच्याच्या मुंजीचे फोटू सहन केल्यावर, ती वेळ येते. यजमानीण बाई एक सुरेखशी डिश घेऊन येतात. पदार्थ नवीन दिसतो आहे. वर कोथिंबीर, खोबरे बगैरे सगळी सजावट असते. खमंग वास. तुम्ही खायला सुरू करता. चवही एकदम झकास. यजमानीण बाई सांगत असतात. "काल सासरकडची मंडळी येणार होती. त्यांना थालपीटं आवडतात म्हणून केली आणि ऐन वेळी त्यांनी कॅन्सल केलं. आता ह्या थालपीटांचं करायच तरी काय?" &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तुमचे त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष नसते कारण तुम्ही चमच्यातील पदार्थाकडे निरखून बघत असता. चमच्यात थालपीटाचा तुकडा असतो. यजमानीणबाईंची रेसिपी शिळ्या थालपीटांची आहे हे तुमच्या लक्षात येते. अर्थात चव चांगली असते त्यामुळे तुम्ही डिश संपवता. नंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करून सटकता. तुमच्या मनात विचारचक्र चालूच असते. मी आत्ता नेमके काय खाल्ले? डिश छान होती यात वाद नाही पण ती शिळी होती याची कुठेतरी रूखरूखही आहे. छान डिश खाल्याबद्दल समाधान वाटावे की उरलेले शिळेपाके खाल्याबद्दल खंत या संभ्रमातून तुमची सुटका होत नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
झोया अख्तरचा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' बघताना अशी अवस्था झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपले निर्माते एकदा का पब्लिकला आवडणारा फार्म्युला मिळाला की तो सहजासहजी सोडत नाहीत. मनमोहन देसाईंनी लॉस्ट ऍंड फाउंड जन्मभर वापरला. बडजात्या गेलाबाजार दहा-एक लग्नांच्या व्हिडिओ शूटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसला होता पण प्रेक्षकांच्या सुदैवाने हम साथ-साथ है सात दिवसही चालला नाही. म्हातारी जगली, बडजात्या सोकावला नाही. जोहर-चोपडा यांनी एनारआय राहुल-बाप अमरीश पुरी-आई फरिदा जलाल इ. सामग्रीवर देस-परदेस के सरसोंके खेतोमें जो गोंधळ घातला तो बरीच वर्षे चालला. आता ह्या यादीत एक नवीन भर पडली आहे, अख्तर कुटुंबाची. जावेदसाब हाडाचे कवी आणि मुरलेले कथा-पटकथालेखक, त्यामुळे त्यांचे प्याकेजिंग छान असते. तरूणाईला आवडणारे, पात्रे संवेदनाशील, चांगली विनोदबुद्धी असणारी - यंग जनला आवडेल असा सगळा मसाला.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-BgyKKijJnY8/TntZf1-YopI/AAAAAAAAAYM/AHRSglrhdII/s1600/220px-Zindaginamilegidobara.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-BgyKKijJnY8/TntZf1-YopI/AAAAAAAAAYM/AHRSglrhdII/s1600/220px-Zindaginamilegidobara.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;'जिंदगी..' चा पूर्वार्ध म्हणजे डिसीएच भाग ३ आहे. (रॉक ऑन भाग २ आहे.) अक्षय-हृतिक, आमिर-फरहान, अभय-सैफ व्यक्तिरेखा कार्बन कॉपी असल्याप्रमाणे फिट्ट बसतात. दोन्हीकडे अभय/सैफ नॉनकमिटल, दोघांच्याही बाजूने. फरहान-आमिर नेहेमी चेष्टामस्करी करणारा आणि अक्षय-हृतिक गंभीर. तिथे ते गोवा ट्रिप करतात, इथे हे स्पेन ट्रिप करतात. ट्रिपला जातानाचे कारमधले काही प्रसंग तर फारच सारखे. तिथे ही बीच-इथे ही बीच. तिथे अक्षय आमिरच्या कानाखाली वाजवतो, इथे हृतिक फरहानच्या कानाखाली जाळ काढतो. तिथे त्यांचा गैरसमज नंतर होतो, इथे आधीपासूनच असतो. सिन्योरीटा गाणे बघताना 'कोई कहे, कहता रहे' आठवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
झोया उत्तम दिग्दर्शिका आहे यात वाद नाही. लक बाय चान्स ने हे सिद्ध केले आहे. पण आता प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'जिंदगी..' मध्ये काही प्रसंग सुरेख तर काही टाळता आले असते असे वाटण्यासारखे. सुरूवातीला श्रेयनामावली येते आणि हे तिघे प्रवासाची तयारी करत असतात. हृतिकची एंट्रीच &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Jerry_Maguire"&gt;जेरी मॅग्वायरची&lt;/a&gt; आठवण करून देणारी. नंतर परत फ्लाइटमध्ये तो फॉर्च्युन मासिक वाचायला घेतो हे 'ओव्हर-द-टॉप' वाटते. तीच गोष्ट किती वेळा सांगायची? जणू काही अख्तरबाई एक यादी घेऊन बसल्या आहेत, 'चला कॅरॅक्टर एस्टॅब्लिश झाले. टिक. पुढे' असे वाटते. दिग्दर्शक दिसावा पण इतका उघडपणे दिसला तर त्यातील मजा जाते. त्याऐवजी श्रेयनामावलीत त्यांचा भूतकाळ दाखवला असता तरी चालले असते. शेवटी अभयचे काय होते याबद्दल इतकी साशंकता बाळगायचीही गरज नव्हती. म्हणजे प्रेक्षकांना डोळ्यात तेल घालून शेवटी कोण कुणाबरोबर नाचते आहे यावरून सगळे अंदाज बांधायला लावणे यातून नेमके काय साधले कल्पना नाही. कौतुक करण्यासारखे बरेच प्रसंग आहेत. जन्मदाता बाप खरोखरी २५-३० वर्षांनी भेटला तर कोणताही मेलोड्रामा न होता जे काय घडू शकेल ते अत्यंत संयत रीतीने मांडले आहे. पात्रांची निवड अचूक.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शंकर-अहसान-लॉयने यावेळी आपल्या पोतडीतील खास चीजा बाहेर काढल्या नाहीत. एकही गाणे, आले कधी गेले कधी, कळतही नाही. सर्वांचा अभिनय पूरक - पण अभिनयाची कसोटी लागावी असे किती प्रसंग सिनेमात आहेत? आणि ज्या प्रसंगात गरज आहे तिथे नसीर बाकी सगळ्यांना काखोटीला गुंडाळून एकटा बाजी मारून जातो. त्या प्रसंगात नॉन स्ट्रायकर एंडला फरहानची साथ चांगली आहे. बाकीच्या चित्रपटात ही मंडळी जन्मभर फिल्म इंडस्ट्रीत आहेत हे लक्षात घेता फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अर्थात जन्मभर तिथे असूनही अभिनयाच्या बाबतीत काही कुमार मंडळी कमळाच्या पानाप्रमाणे कोरडी ठणठणीत राहीली हे ही खरेच. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फरहानच्या आवाजात कविता ऐकल्या की आम्हाला अमिताभने  म्हटलेल्या बाबूजींच्या कविता आठवतात. अमिताभने नंतर आलेल्या सर्वांची गोची करून ठेवली आहे. कवितावाचनाला त्याने ज्या पातळीवर नेऊन ठेवले आहे तिथे कुणीही, कधीही पोचू शकेल असे वाटत नाही. त्यामुळे फरहानचा घोगरा आवाज आमच्या दृष्टीने नो डील. जावेदसाहेबांच्या कविताही या वेळेस फारश्या भावल्या नाहीत. ते नेहेमी ट्वीट करत असतात त्यातलेच काही तुकडे वाटले. "मै और मेरी तनहाई" कधीही विसरणे शक्य नाही. त्यात अमिताभचे श्रेय किती आणि जावेदसाहेबांचे किती, ठाउक नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुढच्या वेळी झोया बाईंनी शिळी थालिपीटे न निवडता एखादी नवीन रेसिपी करून पहावी असे वाटते. त्या सुगरण आहेत, त्यामुळे त्यांना जमायला काहीच हरकत नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ताक. अरे हो, एक राहीलच की. ती १२००० युरो/साडे सात लाखाची ब्याग. तेवढा अफ्रिकेतल्या एखाद्या पिटुकल्या देशाचा अर्थसंकल्प असायचा. तर तशी एक बॅग &lt;a href="http://www.lamomparis.com/2011/04/shopping-with-daddy.html"&gt;इथे बघायला&lt;/a&gt; मिळेल. एका मुलीला तिच्या डाडने भेट दिली आहे. धन्य ते डाड आणि धन्य ती मुलगी. बॅग नेमकी तीच का माहीत नाही कारण त्यांनी चित्रपटात डिझायनर कोणता हे सांगितले नाही. अशा विकृत किमतीच्या वस्तू&amp;nbsp; पाहिल्या की मला वेगळेच प्रश्न पडतात. समजा तुमच्याकडे ही ब्याग आहे आणि कुणी तुम्हाला टोमॅटो फेकून मारला तुम्ही स्वत:ला वाचवाल की बॅगला? तुमचा चेहेरा धुता येईल, बॅगचा डाग निघाला नाही तर त्या दु:खाची किंमत किती?&lt;br /&gt;
----&lt;br /&gt;
चित्र विकीवरून साभार. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-2343560240414645378?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/4chEAa0umSg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/4chEAa0umSg/blog-post_09.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-BgyKKijJnY8/TntZf1-YopI/AAAAAAAAAYM/AHRSglrhdII/s72-c/220px-Zindaginamilegidobara.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/08/blog-post_09.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-2507090018377559244</guid><pubDate>Fri, 05 Aug 2011 13:05:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-06T09:02:45.790+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">मुलाखती</category><title>'रॉक पेपर टायगर' च्या लेखिका लिसा ब्रॅकमन यांची मुलाखत</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-2ZG-EMQ6l-Q/TjvlRquEaWI/AAAAAAAAAW4/J8eiWr1EX80/s1600/rock-paper.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-2ZG-EMQ6l-Q/TjvlRquEaWI/AAAAAAAAAW4/J8eiWr1EX80/s1600/rock-paper.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;इराक युद्धामधून जखमी होऊन परत आलेली एक वैद्यकीय कर्मचारी एली, बेजिंगमध्ये येऊन पोचते. मोडकळीला आलेलं लग्न, इराकमध्ये असताना आलेले माणुसकीला काळिमा फासणारे अनुभव आणि भविष्याबद्दल असणारी अनिश्चितता या सर्वांशी तडजोड करत असतानाच एके दिवशी तिच्या मित्राच्या घरी तिची भेट एका विस्थापित नागरिकाशी होते. ही भेट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. यानंतर अमेरिकन गुप्तहेर खाते, चीनमधील विविध सरकारी आणि खाजगी गुप्त यंत्रणा आणि चिनी सरकारविरूद्ध भूमिगत चळवळ करणारे गट या सर्वांच्या जाळ्यात सापडलेल्या एलीला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणे अशक्य होते. एलीचा मित्र चित्रकार असतो. बेजिंगमधील सध्याच्या कलाजगताचे दर्शन घडत असतानाच कलाकारांच्या स्वातंत्र्यावर घातलेल्या निर्बंधांचे वास्तव कथानकातून समोर येते. कोणत्याही कारणासाठी लोक एकत्र येत असतील - मग भले ते कारण कलाकारांचा एकमेकांशी संवाद व्हावा इतके साधे आणि अराजकीय असो - तर अदृश्य पडद्यामागील चेहेर्‍यावर आठ्या पडतात. एलीचा सतत पाठलाग होत असताना फोन, इ-मेल यापैकी कोणतेही साधन वापरणे धोकादायक असते. अशा परिस्थितीत संपर्क ठेवण्यासाठी एक अफलातून मार्ग निवडला जातो. 'द स्वॉर्ड ऑफ इल रेप्युट' नावाच्या ऑनलाइन गेममध्ये वेगवेगळे अवतार धारण केलेल्या व्यक्ती असतात. संदेश पाठवण्यासाठी खेळातील ड्रॅगन वगैरेंशी लढता लढता या व्यक्ती अवतारांच्या माध्यमातून एकमेकांना गुप्त संदेश देतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा ब्रॅकमन यांच्या रॉक पेपर टायगर या कादंबरीचे हे सूत्र आहे. याआधी लिसा यांनी एका बॅंडमध्ये गीतकार/गायिका/वादक किंवा चित्रपटनिर्मितीमध्ये सहाय्यक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. रॉक पेपर टायगरने ऍमेझॉनच्या टॉप टेन मिस्टरी/थ्रिलरमध्ये जागा मिळविली, तसेच स्ट्रॅंड मासिकाच्या नविदित लेखकांसाठीच्या क्रिटिक्स पारितोषिकासाठी नामांकनही मिळवले. न्युयॉर्क टाइम्सने आपल्या &lt;a href="https://www.nytimes.com/2010/07/11/books/review/Tepper-t.html"&gt;परिक्षणात&lt;/a&gt; "बी प्रिपेअर्ड फॉर अ वाइल्ड राइड" या शब्दांत या कादंबरीची प्रशंसा केली आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एक चांगले पुस्तक वाचण्याचा अनुभव वेगळाच असतो. त्याहूनही रोचक अनुभव त्या पुस्तकाबद्दल लेखकाशी बोलण्याचा असतो. रॉक पेपर टायगर बद्दल लिसा यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : रॉक पेपर टायगर लिहीताना तुम्ही अमुक पानांनंतर कथानकाने वळण घ्यायला हवे यासारखे नेहेमी वापरले जाणारे ठोकताळे जमेस धरले का? की शेवट मनात ठेवून तुमच्या प्रतिभेला मुक्त संचार करण्याची तुम्ही मोकळीक दिली?&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-Fg3Nlu8vHi0/TjvpjtUhvzI/AAAAAAAAAXI/mGstqK8cxyU/s1600/50553_152228632281_3774_n.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="203" src="http://1.bp.blogspot.com/-Fg3Nlu8vHi0/TjvpjtUhvzI/AAAAAAAAAXI/mGstqK8cxyU/s320/50553_152228632281_3774_n.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;लिसा : माझ्या लिहीण्याच्या पद्धतीचे वर्णन मी "मुलांनो, हे घरी करून पाहू नका" अशा शब्दांमध्ये करते. ही पद्धत कोणतेही नियम न पाळणारी आहे. मी कथासूत्र आखून घेत नाही, पण काही मुख्य प्रसंग - ज्यांच्यावर काम करायचे आहे ते माझ्या डोक्यात असतात. लिहीताना काही विशिष्ट रूपरेखांचा धांडोळा घेण्यात मला रूची असते, आणि नंतर या सगळ्याचा मेळ कसा घालायचा यात खरे कौशल्य पणाला लागते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रॉक पेपर टायगरसाठी आधुनिक चीनमध्ये घडणारी कथा मला लिहायची आहे हे नक्की होते. याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाचा पाश्चात्य लेखकांनी पुरेसा उपयोग केलेला नाही असे मला वाटते. चीनमधील सध्याचे कलाजगत हा ही याचा एक भाग असणार होता कारण त्यात मला विशेष रूची आहे. शिवाय अमेरिकेचे दहशतीच्या विरोधातील युद्ध आणि इराकवर आक्रमण याबद्दल मला बरीच काळजी वाटत होती. आता या वेगवेगळ्या घटकांचा उपयोग करून मी कोणती कथा लिहू शकते? यात इराकमध्ये काम करणारी वैद्यकीय कर्मचारी, एली कूपर, ही मध्यवर्ती व्यक्तीरेखा होती. तिच्यामार्फत मला हे जाणवले की सार्वभौम सत्तास्थाने आणि अनिर्बंध अधिकारशाही, मग ती अमेरिकन असो कि चिनी, यांच्यात किती साम्य असू शकते हे मला दाखवायचे होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
खरे तर पुस्तकाचा शेवट कसा होणार आहे याची मला अधी अजिबात कल्पना नव्हती. एलीचे पात्र आणि या निगडीत असलेल्या संकल्पना यांनी मला जो मार्ग दाखविला तो मी स्वीकारला. आणि या मार्गावर जात असताना माझ्या लक्षात आले की ही गोष्ट व्यक्तीस्वातंत्र्याला काडीचीही किंमत न देणार्‍या शक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात उलथापालथ करतात तेव्हा एक अर्थपूर्ण आणि मूल्याधिष्ठीत आयुष्य कसे जगावे याची आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला एक उत्कठावर्धक आणि रोमांचक कथा लिहायची होती जी वाचकांना रोचक वाटेल आणि पुस्तक खाली ठेवणे अशक्य होईल.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : कथेमध्ये पिकासोच्या गुएर्निका या चित्राबद्दल आणि या अनुषंगाने - राजकीय हेतूंसाठी निर्माण झालेली कला आणि कलाकाराची अभिव्यक्ती - याबद्दलची हॅरिसन या व्यक्तिरेखेची मते रोचक आहेत. तुमचे या संदर्भात काय मत आहे?&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा : मी हॅरिसनशी सहमत आहे - लोकांचे शिक्षण करण्याच्या दृष्टीने केलेली कला (डायडॅक्टीक आर्ट) क्वचितच उच्च दर्जाची असते. तरीही, मी अशीही कला पाहिली आहे जिचा हेतू राजकीय आहे आणि तरीही ती प्रभावशाली आहे. यात बर्‍याच प्रमाणात चिनी कलेचा अंतर्भाव होतो. काही वर्षांपूर्वी मी क्युबाच्या आधुनिक कलेसंबंधित एक प्रदर्शन पाहिले होते, ते बघताना मला अंतरीची खूण पटल्यासारखे वाटले. थोडक्यात सांगायचे तर राजकीय हेतू मनात ठेवून निर्माण केलेली कलाही मला आवडते - ती कोणत्या रूपात अभिव्यक्त होते आहे यावर सर्व अवलंबून आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एका दृष्टीने रॉक पेपर टायगरमधील&amp;nbsp; मधील कलेविषयीची चर्चा मी पुस्तक लिहीण्याबद्दल माझ्या मनात होणारी चर्चा होती - राजकारण, त्याविषयीच्या कल्पना माझ्या मनात होत्या आणि त्याबद्दल माझा निश्चितच एक दृष्टीकोन&amp;nbsp; आहे. पण मला असे पुस्तक लिहायचे होते जे फ्लाइटवर असताना लोक वाचू शकतील आणि त्यांचे मनोरंजन होऊ शकेल. (उन्हाळ्यात बीचवर वाचण्याच्या पुस्तकांच्या काही याद्यांमध्ये या पुस्तकाचा समावेश झाला तेव्हा मला आनंद झाला.) कला राजकारणापुरतीच सिमित राहीली (इफ आर्ट डझ नॉट ट्रान्सेंड पॉलीटीक्स) तर पुस्तक महा कंटाळवाणे होईल. आणि ते मला कोणत्याही परिस्थितीत टाळायचे होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : बेजिंग शहरातील कॅफे, गेम पार्लर आणि बकाल राहणीमान यांच्या पार्श्वभूमीमुळे बेजिंग शहर कथेमधील एक महत्वपूर्ण घटक आहे. बेजिंग शहराचे तुमच्यासाठी काय महत्व आहे?&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा : मी बेजिंगला पहिल्यांदा १९७९ मध्ये सांस्कृतिक क्रांती झाल्यानंतर गेले. तिथे मी सहा-एक महिने राहीले. त्या वेळेस मी तरूण होते आणि त्या अनुभवाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. यामुळे माझे आयुष्य संपूर्णपणे बदलले असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्या काळाच्या तुलनेत आता बेजिंग इतके बदलले आहे की बरेचसे शहर ओळखताही येऊ नये. बेजिंग शहराची ओळख करून घेणे, तेथील रस्त्यांमधून मार्ग काढणे हे सोपे नाही, आणि शहराबाबत काही गोष्टी निराशाजनक आहेत, मला बरेचदा त्यांचा राग येतो. (ऐतिहासिक वास्तूंची वाटेल तशी तोडफोड आणि त्या जागी उभ्या राहीलेल्या नवीन इमारती मला विशेष क्लेश देतात.) तरीही मी तिथे गेल्यावर मला ओळखीच्या जागी गेल्यासारखे, घरी आल्यासारखे वाटते. आणि तिथे कधीही कंटाळा येत नाही. शिवाय तुम्हाला जर आजच्या चीनबद्दल जाणून घ्यायचे असेल तर बेजिंग त्याचा महत्वपूर्ण घटक आहे. बेजिंग म्हणजे चीन नव्हे, चीनमध्ये बेजिंग वगळता आणखी बरेच काही आहे, बरेचसे परदेशी पर्यटक बेजिंग आणि शांघाय बघतात आणि परत घरी जाताना चीनचे एक संपूर्णपणे एकांगी चित्र बरोबर घेऊन जातात. पण चीनचे अत्याधुनिक रूप, तेथील राजकीय आणि सांस्कृतिक मतांचा उगम होणारे ठिकाण बघायचे असेल तर बेजिंगशिवाय पर्याय नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : रॉक पेपर टायगर वाचत असताना मला जाणवले की खलनायकांबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाहिये. सूट क्र. १ आणि २ त्यांच्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळत असतात. आणि पार्श्वभूमीत नेहेमी तुमची प्रत्येक हालचाल टिपणार्‍या एक अदृश्य, अनोळखी शक्तीचा वावर जाणवत असतो. खलशक्तीबद्दल ही अनिश्चितता - याचे मूळ कशात आहे?&lt;/span&gt;&lt;b&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;
&lt;b&gt;&lt;br /&gt;
&lt;/b&gt;&lt;br /&gt;
लिसा : या प्रश्नाचे उत्तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराशी निगडीत आहे. रॉक पेपर टायगरची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की बहुतेक माणसांकडे खलनायक आणि प्रभावी शक्तींचा सामना करण्याची आणि त्यांच्यावर सहजासहजी मात करण्याची शक्ती नाही. कल्पनाविलास म्हणून हे ठीक आहे, पण आपल्यापैकी बहुतेक लोक आपली नोकरी, भविष्य, आपले म्हणून एक घर असावे याविषयी चिंता करत असतात. एका अर्थाने या सर्व समस्या अस्तित्ववादी आहेत : कोणत्या ना कोणत्या पातळीवर प्रत्येक जण "मी कसे जगले पाहिजे?" या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो. पण एलीचे आयुष्य ज्या गोष्टींमुळे उध्वस्त झाले आहे त्यावर तिचे काहीच नियंत्रण नाही. तिला नोकरी मिळत नाहिये आणि पुढचे शिक्षण करण्यासाठी पैशांची गरज आहे, म्हणून ती राष्ट्रीय सैन्य दलात भरती होते. हा चुकीचा निर्णय होता कदाचित, पण त्या परिस्थितीत असलेल्या व्यक्तीसाठी तर्कसंगत होता. मग तिच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रभावशाली&amp;nbsp; तिच्या देशाचे नेते युद्धाचा निर्णय घेतात, आणि या युद्धामध्ये तिला सहभागी व्हावे लागते. या बाबतीत तिची संमती असण्याचा प्रश्न कुठेही येत नाही. त्या वेळेस पुढे काय वाढून ठेवले आहे हे समजण्याइतका तिच्याकडे अनुभवही नाही आणि तेवढी माहीतीही तिला नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याचा अर्थ असाही नाही की आपल्या आयुष्यातील घटनांवर आपले नियंत्रण नसते, आणि पुस्तकाच्या प्रवासामध्ये ही गोष्ट एलीच्या लक्षात येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तरीही अबू घैरेब प्रकरण, किंवा कैद्यांच्या छळाच्या घटना - या सर्व प्रकरणांमध्ये फक्त खालच्या अधिकार्‍यांना शिक्षा झाल्या. छळ करणे हे एक अधिकृत शस्त्र आहे हा निर्णय सर्वोच्च पातळीवरून केला गेला होता. त्यापैकी कोणत्याही अधिकार्‍यांना स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आले नाही. आणि येईल अशी शक्यताही नाही. या त्या अदृश्य, अनोळखी शक्ती आहेत. खरे तर ते कोण आहेत हे आपल्याला माहीत आहे. अमेरिकेत ते कोण आहेत हे ही आपल्याला माहीत आहे आणि चीनमध्ये ते कोण आहेत हे ही. सर्वात जास्त पैसा आणि सत्ता असलेले हे लोक आहेत, सर्वात महत्वाचे निर्णय ते घेतात,&amp;nbsp; अस्तित्वात असलेल्या सत्तेच्या यंत्रणेचा या लोकांना सर्वात जास्त फायदा होतो आणि हेच लोक ती यंत्रणा कायम राहील याची काळजी घेतात.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : तुम्ही चिनी भाषा उत्तम प्रकारे बोलता. चिनी भाषा इंडो-युरोपिअयन कुटुंबातील भाषांपेक्षा बरीच वेगळी आहे. या भाषेमुळे तुमच्या दृष्टीकोनात काय बदल झाले?&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा : मला भाषा शिकायला खूप आवडते, आणि मी आळशी नसते किंवा माझी चित्त एकाग्र करण्याची शक्ती चांगली असती तर मी आणखी भाषा शिकले असते. मी ज्या इतर भाषा शिकले आहे त्यापेक्षा चिनी भाषा वेगळी आहे असे मला वाटत नाही. फक्त त्या भाषेचे स्वरूप, तिची जडणघडण वेगळी आहे. तिच्या उच्चारांकडे लक्ष दिले, म्हणजे तोंडात आवाज कसे निर्माण होतात, तर मला जर्मन भाषेशी बरेच साम्य दिसते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तरीही इंग्रजी भाषा आणि चिनी भाषा यामध्ये समान उगम असणारे शब्द जवळजवळ नाहीतच हे मान्य केले पाहीजे. याखेरीज लिपी पूर्णपणे वेगळी आहे आणि तिचे सांस्कृतिक महत्व बरेच आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ही एक महत्वाची गोष्ट आहे. चिनी बोलता येत असल्यामुळे (मी अस्खलीत चिनी बोलत नाही) मी चीनला जाते तेव्हाचा तिथला अनुभव पूर्णपणे बदलून जातो. जणू काही तुमच्याकडे एखादी जादुची किल्ली आहे जिच्यामुळे सगळे सांस्कृतिक दरवाजे उघडले जातात, तुम्ही लोकांशी त्यांच्या भाषेत बोलू शकला नाहीत तर हे कधीच शक्य होत नाही. माझा भाषाशास्त्राचा अभ्यास नाही, पण भाषांचा विविध संस्कृतींवर आणि त्या भाषा आत्मसात करत वाढलेल्या लोकांवर बराच परिणाम होतो हे उघड आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : तुमच्या येणार्‍या पुस्तकाबद्दल काही सांगाल का?&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा : ही एक लिटररी थ्रिलर कथा आहे जी प्युएर्तो व्हालार्ता, मेक्सिको इथे घडते, इथे मी बराच काळ व्यतीत केला आहे. कथेमध्ये एका अमेरिकन स्त्रीचा रिअल इस्टेट एजंट नवरा मेला आहे, तो पैशांची अफरातफर करत होता आणि आता ती कफल्लक आहे असे तिच्या लक्षात येते, एकुणात ती बर्‍याच पातळ्यांवर संघर्षाला तोंड देते आहे. यातून मार्ग काढण्यासाठी डोके चालवायला चालना मिळावी म्हणून ती प्युएर्तो व्हालार्ता इथे सुट्टीवर जाते, तिथे बीचवर एका आकर्षक तरूणाला भेटते, ते तिच्या हॉटेलवर परत जातात आणि सगळ्या अनपेक्षित घटना घडायला सुरूवात होते. पुस्तक ड्रग्जचे व्यवहार करणार्‍या संघटना, राजकीय सत्ता आणि सीमेच्या दोन्ही बाजूला चालणारा भ्रष्टाचार यांच्याबद्दलही आहे. पुस्तकाचे नाव गेटवे आहे, आणि सोहो प्रेसतर्फे ते मे २०१२ मध्ये प्रकाशित होईल. द डे ऑफ द डेड या नावाखाली हार्पर, इंग्लंडचे प्रकाशन होईल. हार्पर, इंग्लंड रॉक पेपर टायगर हे पुस्तक इयर ऑफ द टायगर या नावाखाली कॉमनवेल्थ देशांमध्ये एप्रिल २०१२ मध्ये प्रकाशित करतील. या सर्वांबद्दल मला बरीच उत्कंठा आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: blue;"&gt;राज : &lt;/span&gt;&lt;span style="color: blue;"&gt;लिसा, या मनमोकळ्या संवादाबद्दल अनेक आभार. तुमच्या आगामी पुस्तकाबद्दल अनेकानेक शुभेच्छा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास प्रतिसादांमध्ये दिले तर त्या उत्तरे देतील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
------&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लिसा ब्रॅकमन यांचे संकेतस्थळ &lt;a href="http://lisabrackmann.com/"&gt;इथे&lt;/a&gt; आहे, तसेच त्यांना तुम्ही &lt;a href="http://twitter.com/otherlisa"&gt;ट्विटर&lt;/a&gt; आणि &lt;a href="https://www.facebook.com/lisabrackmannauthor"&gt;फेसबुकवर&lt;/a&gt; फॉलो करू शकता. भारतातील वाचकांसाठी - रॉक पेपर टायगर &lt;a href="http://www.flipkart.com/search/a/books?query=rock+paper+tiger&amp;amp;vertical=books&amp;amp;dd=0&amp;amp;autosuggest[as]=off&amp;amp;autosuggest[as-submittype]=default-search&amp;amp;autosuggest[as-grouprank]=0&amp;amp;autosuggest[as-overallrank]=0&amp;amp;Search=%C2%A0&amp;amp;_r=11FxOYiYfpMxmANj4kGJzg--&amp;amp;_l=Sb93MPREKaWtPLwzn7apBw--&amp;amp;ref=4808011f-6002-4db4-903a-fcf5f0a0b6bc&amp;amp;selmitem=Books"&gt;फ्लिपकार्टवरून&lt;/a&gt; घरपोच मागवता येईल. &lt;br /&gt;
चित्रांसाठी लिसा आणि ऍमेझॉन यांचे अनेक आभार.&lt;br /&gt;
------&lt;br /&gt;
ताक : इंग्रजी &lt;a href="http://rajkashana.blogspot.com/2011/08/interview-with-lisa-brackmann.html"&gt;मुलाखतीच्या&lt;/a&gt; प्रतिसादांमध्ये आणखी प्रश्नोत्तरे वाचायला मिळतील.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;img id="smallDivTip" src="chrome://dictionarytip/skin/dtipIconHover.png" style="border: 0px solid blue; left: 38px; position: absolute; top: 552px; z-index: 90;" /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-2507090018377559244?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/VUEHTVlWEBc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/VUEHTVlWEBc/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-2ZG-EMQ6l-Q/TjvlRquEaWI/AAAAAAAAAW4/J8eiWr1EX80/s72-c/rock-paper.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/08/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-6739630285744586558</guid><pubDate>Sat, 30 Jul 2011 05:19:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-03T18:39:57.822+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">चित्रपट</category><title>अ शो अबाउट नथिंग</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;पूर्वीच्या काळी - म्हणजे भारत आर्थिक महासत्ता वगैरे व्हायला लागण्याच्या अगोदर - कोणतीही चांगली गोष्ट पेणसिलीपासून ते मोटारगाडीपर्यंत - म्हणजे फारिन मेड हे समीकरण ठरलेले असे. आता सुदैवाने काळ बदलला आहे, सगळ्या वस्तू इथे मिळायला लागल्या आहेत. तरीही एका गोष्टीसाठी मात्र अजूनही पल्याडचे तोंड बघावे लागते आणि ती म्हणजे विनोद. विनोद हे माणसाचे नाव बरेच प्रचलित असले तरी जातिवंत, खळखळून हसायला लावणारा विनोद मात्र इथे दुर्मिळ झाला आहे. विनोद म्हटले की पुलंचे नाव समोर ठेवायला लोक तत्पर असतात. जातिवंत विनोदी साहित्य निर्मितीमध्ये त्यांचे काम नि:संशय उल्लेखनीय आहे. पण त्यानंतर काय? साहित्य तर सोडाच, पण इतर माध्यमांमध्येही विनोदाला फारसे गंभीरपणे घेतले जात नाही असे दिसते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
परदेशाचे तोंड बघावे लागते ते इथे. अमेरिकन सिटकॉम हा अफलातून प्रकार आपल्याकडे होणे शक्य नाही कारण त्याला जी मेहनत अपेक्षित आहे ती आपल्या मालिकांचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडून कदापि होणे नाही. तिथे पाट्या टाकून चालत नाही, प्रत्येक भाग स्वतंत्र त्यामुळे लांबण लावता येत नाही. प्रत्येक वर्षीच्या सीझनमध्ये अमुक भाग करायचे असे ठरलेले असते. वर्षाला घाऊक दरामध्ये पाडलेल्या चारशे अन पाचशे भागांच्या खानावळीच्या पंक्तींना निगुतीने रांधलेल्या सुग्रास जेवणाची सर कशी यावी? सिटकॉमच्या जवळ जाणारा एकमेव प्रकार मराठीत पाहिला मिळाला तो म्हणजे लहानपणी बघितलेला '&lt;a href="http://www.prahaar.in/manoranjan/theatre/42340.html"&gt;विच्छा माझी पुरी करा&lt;/a&gt;' चा प्रयोग. मी पाहिलेल्या प्रयोगात विजय कदम, जनार्दन लवंगारे, दीपक शिर्के आणि किशोर नांदलसकर होते. तेव्हा हसून हसून जी पुरेवाट झाली तसा अनुभव परत आला नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अमेरिकन सिटकॉममध्ये वेगवेगळ्या मालिकांचे चाहतेवर्ग आहेत. आमची फेवरिट म्हणजे &lt;a href="https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/Seinfeld"&gt;साइनफेल्ड&lt;/a&gt;. इतरही आवडतात, टू ऍंड अ हाफ मेन किंवा रेमंड पण साइनफेल्डची सर कुणालाही येणार नाही असे आमचे ठाम मत आहे. गेली १०-१२ वर्षे या मालिकेचे भाग अनेकदा पाहूनही परत बघावेसे वाटतात हे विशेष. साइनफेल्ड मालिकेची कल्पना जेरी साइनफेल्ड आणि लॅरी डेव्हिड या दोघांच्या डोक्यातून निघाली. जेरी त्यावेळी स्टॅंड अप कॉमेडियन म्हणून नुकताच प्रसिद्ध होऊ लागला होता. लॅरी आणि त्याने मिळून या मालिकेची रूपरेखा निश्चित केली. त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे मालिकेत कोणत्याही प्रकारचे भावनात्मक प्रसंग असणार नाहीत. 'अ शो अबाउट नथिंग' असे सूचक वर्णन करून रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या निरर्थक वाटणार्‍या गोष्टींभोवती प्रत्येक भागाची कथा गुंफलेली आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-1KSvkwWGp50/TjPAyvFQnrI/AAAAAAAAAW0/8iuBLEywkcI/s1600/220px-Jerry_Seinfeld_%25281997%2529.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-1KSvkwWGp50/TjPAyvFQnrI/AAAAAAAAAW0/8iuBLEywkcI/s320/220px-Jerry_Seinfeld_%25281997%2529.jpg" width="207" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;जेरी साइनफेल्ड&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;यातील प्रमुखे पात्रे चार. जेरी साइनफेल्डने स्वत:चीच भूमिका केली आहे, त्याचा शेजारी क्रेमर, मित्र जॉर्ज आणि मैत्रिण इलेन. जसजसे मालिकेचे भाग वाढत गेले तसतशी यातील प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये अधिक ठळक होत गेली. जेरी कधीही संतापत नाही, त्याने चिडून कुणावर ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज चिरकतो. जॉर्ज अतिशय चिंगूस तर इलेनला एकही मैत्रिण नाही. यातील &lt;a href="http://youtu.be/jt_JHR9D0lw"&gt;क्रेमरचे&lt;/a&gt; पात्र विशेष आहे. सुरूवातीला लॅरी डेव्हिडने आपल्या एका शेजार्‍यावर याची व्यक्तिरेखा बेतली होती (त्या शेजार्‍याचे नावही क्रेमर होते.) नंतर क्रेमरची भूमिका करणार्‍या मायकेल रिचर्ड्सने आपली कल्पनाशक्ति पणाला लावून या व्यक्तिरेखेत रंग भरायला सुरूवात केली. निरनिराळे आवाज काढणे, कधीही दारावर टकटक न करता धाडकन दरवाजा उघडून आत येणे, सतत धडपडणे अशा अनेक लकबींमुळे त्याच्या व्यक्तिरेखेला एक विशिष्ट आकार आला. असे होते आहे हे लक्षात आल्यावर मालिकेच्या लेखकांनी त्या व्यक्तिरेखेला शोभतील असे प्रसंग लिहीण्यास सुरूवात केली. कल्पनाशक्ति आणि मेहनत यांच्या जोरावर मायकेलने आपल्या पात्राला एक स्वतंत्र रूप मिळवून दिले. क्रेमर दरवाजा उघडून धाडकन आत का येतो? यावर मायकेलचे म्हणणे असे की क्रेमर जसा लोकांच्या आयुष्यात बिनबोलावता घुसतो त्यासाठी मला एक प्रतिमा हवी होती. त्याचे धाडकन आत येणे यात मला ती सापडली. जॉर्जचे पात्र लेखक लॅरी डेव्हीडवरच बेतले आहे. जॉर्जची भूमिका करणार्‍या जेसनला सुरूवातीला हे माहित नव्हते. एकदा एक प्रसंग वाचत असताना तो लॅरीला म्हणाला, "छे, असे कधी होणे शक्य आहे का?" त्यावर लॅरी म्हणाला, "का नाही? माझ्या बाबतीत झाले आहे." ते ऐकल्यावर जेसनच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने लॅरीच्या लकबी जॉर्जच्या भूमिकेत आणायला सुरूवात केली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याखेरीज जॉर्जचे आई-वडील फ्रॅंक आणि एस्टेल कोस्टान्झा, जेरीचे आई-वडील मॉर्टी आणि हेलन साइनफेल्ड, जेरीचे काका लिओ, जेरीचा शेजारी आणि जानी दुष्मन पोस्टमन न्यूमन ही पात्रेही महत्वाची आहेत. न्यूमन म्हणजे जुरासिक पार्कमधील जाड्या, भ्रष्ट प्रोग्रामर. जेफके सिनेमात त्याचे नाव न्यूमन होते तेच इथेही ठेवले. त्याची आणि जेरीची नेमकी का दुष्मनी आहे याचे कारण कधीच उघड केले जात नाही. जेरीच्या म्हणण्यानुसार सुपरमॅनला जसा एक खलनायक असतो तसा मला न्यूमन. जॉर्जचे आईवडील म्हणजे विक्षिप्तपणाचे अर्क आहेत. जॉर्जची आई आयुष्यात कधीही हसलेली नाही, वडील स्विमिंगपूलमध्ये चपला घालून पोहतात. अंकल लिओ बोलताना नेहेमी समोरच्याचा खांदा पकडतो. इतर कमी महत्वाची पात्रेही काही कमी नाहीत. जॉर्जचा बॉस, क्रूगर, क्रूगर इंडस्ट्रीजचा मालक आहे पण त्याला कंपनी गाळात चालली आहे याची अजिबात फिकीर नाही. जॉर्जला त्याच्या मानगुटीवर बसून काम करून घ्यावे लागते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रत्येक भागात एखाद्या साध्याश्या वाटणार्‍या गोष्टीभोवती सर्व पात्रांच्या कथा गुंफल्या जातात. ही कथानक निर्मिती, सर्व पात्रांचे स्वभाव त्याला चपखल बसणे आणि त्यातून होणारी निखळ विनोदनिर्मिती ही या मालिकेची वैशिष्ट्ये म्हणता येतील. लोकांच्या विक्षिप्त सवयी - उदा. बोलताना खूप जवळ उभे राहणे, फोनवर तासनतास बोलत राहणे यासारख्या गोष्टींचा विनोदासाठी कसा उपयोग करावा हे बघण्यातच मजा आहे. एका भागात जेरी चक्क पर्स घेऊन हिंडतो आणि त्यामुळे गदारोळ झाल्यावर शेवटी जगाला ओरडून सांगतो, "यस, आय कॅरी अ पर्स!" याखेरीज गॉडफादर, जेएफके, अपोकॅलिप्स नाऊ या चित्रपटांची उत्कृष्ट विडंबने साइनफेल्डमध्ये बघायला मिळतात. काही भाग तर जेरी आणि जॉर्ज एनबीसीमध्ये मालिका तयार करण्यासाठी बोलणी करायला जातात या सत्य घटनांवरच आधारलेले आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१९८९ ते १९९८ असे नऊ सीझन केल्यानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि च्यानेलची पुढच्या सीझनसाठी प्रत्येक भागाला पन्नास लाखांची ऑफर असतानाही जेरी साइनफेल्डने मालिका संपवण्याचा निर्णय घेतला. अर्थात मालिका संपली म्हणून तिची लोकप्रियता थांबली नाही. मालिकेच्या पुन:प्रसारणामुळे मिळालेल्या उत्पन्नाने जेरी साइनफेल्डला फोर्ब्ज मासिकाच्या गडगंज श्रीमंतांच्या यादीमध्ये नेऊन ठेवले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सिटकॉममध्ये अभिनयकौशल्य दाखवण्यास कितपत वाव आहे याबाबत दुमत असू शकेल पण संवादफेक, टायमिंग, स्वरांचे चढ उतार या सर्व बाबतीत साइनफेल्डचे कलाकार बाजी मारून जातात. अभिनय म्हणजे क्यामेरावर श्वास सोडता येईल इतके जवळ उभे राहून चेहेरा वेडावाकडा करत जमतील ते भाव आणणे, जितका चेहेरा पिळवटलेला तितका अभिनय चांगला ही समजूत आपल्या भारतभूमधून जाईल तो सुदिन.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सरेनिटी नाऊ! सरेनिटी नाऊ! &lt;br /&gt;
--&lt;br /&gt;
चित्र विकीवरून साभार. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-6739630285744586558?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/pdnwIlz1CHU" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/pdnwIlz1CHU/blog-post_30.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/-1KSvkwWGp50/TjPAyvFQnrI/AAAAAAAAAW0/8iuBLEywkcI/s72-c/220px-Jerry_Seinfeld_%25281997%2529.jpg" height="72" width="72" /><thr:total>2</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/07/blog-post_30.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8645589300192767618</guid><pubDate>Thu, 21 Jul 2011 17:36:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-02T19:52:06.984+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">पुस्तके</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">खरेदी</category><title>बहुत आनंदे, बुके वाचिते..१</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;'पुणे तिथे काय उणे' हा प्रश्न नसून यादी आहे, फक्त काय नंतर आणखी एक काय टंकायचा राहिला आहे असे सखोल विचारांती आमचे मत झाले आहे. शिस्तशीर ट्र्याफिक, दुपारी उघडी असणारी दुकाने किंवा वेळेवर येणार्‍या बशी यांच्याबद्दल बोलत नाहिये, ते एकेका स्वतंत्र लेखाचे इषय आहेत. सध्या या 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' मध्ये जाणवणारी मोठ्ठी उणीव म्हणजे पाहिजे ते आंग्ल भाषिक पुस्तक मिळण्याची आहे. तसे बघायला गेले तर पुस्तकांची दुकाने (दिसायला) भरपूर आहेत पण तिथे आर्चर/ग्रिशॅम/कोहेल्लो असे पापुलर किंवा शेक्सपियरपासून डिकन्स पर्यंत नेहेमीचेच यशस्वी क्लासिक्स सोडले तर बाकी सगळा आनंदच असतो. क्रॉसवर्डच्या इतक्या शाखा असूनही तिथे काही वेगळे दिसत नाही. मॅनीजचा एकेकाळी जो दरारा होता तो ही आता उरला नाही. नाही म्हणायला लँडमार्क वासरात लंगडी गाय शहाणी आहे, तिथे बर्‍यापैकी संग्रह आहे. पण तरीही सगळीकडे तेच ते लेखक आणि तीच ती पुस्तके, अगदी डेक्कनवरचे बेकायदेशीर पुस्तके विकणारेही याला अपवाद नाहीत. साधे जॉन ल कारचे 'द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड' शोधायचे म्हटले तर अवघड मग अपडाइक किंवा एडवर्ड रदरफर्ड यांची गोष्टच सोडा. एकदा मॅनीजमध्ये पुस्तक नव्हते तेव्हा तिथल्या म्हैलेने उदार अंत:करणाने मागवून ठेवते असे सांगून फोननंबर वगैरे टिपून घेतला. नंतर ती बहुदा टाइम ट्रॅव्हल करून १९६१ मध्ये गेली असावी आणि तिथल्या पुरामध्ये यादी गहाळ झाली असावी. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याला एक चांगला पर्याय आहे आणि तो म्हणजे ब्रिटीश ग्रंथालय. ग्रंथसंग्रह आमच्यासाख्या हावरटांच्या अपेक्षेप्रमाणे हवा तितका नसला तरी बरीच दुर्मिळ आणि सहसा न दिसणारी पुस्तके इथे आहेत. (दोन लेखांपूर्वी आलेली &lt;a href="http://rbk137.blogspot.com/2011/07/blog-post.html"&gt;रीजनरेशन त्रिधारा&lt;/a&gt; इथूनच मिळाली होती.) अर्थात इथेही मर्यादा आहेत. इथे ठराविक लेखकच सापडतात, सगळे नाही. त्यात पुन्हा हवे ते पुस्तक हवे तेव्हा असेलच असे नाही, बेगर्स आर नॉट चूझर्स या न्यायाने तुम्ही जाल तेव्हा जे असेल त्यातून निवडायचे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मग तुम्हाला हवे ते पुस्तक मिळवायचे असेल तर ऍमेझॉन किंवा तत्सम पर्याय उपलब्ध आहेत. इथे एक तोटा म्हणजे बहुतेक वेळा दुर्मिळ पुस्तके अमेरिका किंवा युरोप येथील असतात. तिथून जुनी, वापरलेली मागवायची म्हटली तरी त्यांचा पोष्टाचा खर्च धरून एकूण किंमत दुप्पटच्या आसपास होते, परत वर डॉलर ते रूपया दर जमेस धरला तर सौदा बराच महाग पडतो. मध्ये ऍमेझॉन फुकट पुस्तके पाठवणार असल्याची बातमी होती पण त्यांच्या अटी बर्‍याच आहेत. त्यातील एक म्हणजे तुमची खरेदी २५ पौंडापेक्षा अधिक हवी. नाइस ट्राय!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अशा वेळी एखादे मस्त पुस्तक बाजारात (पल्याडच्या) आले आहे अशी बातमी वाचली की मग 'ओ दुनिया के रखवाले, सुन दर्दभरे मेरे नाले' अशी गाणी आठवायला लागतात. असेच एकदा जरा आवाज लावून लावून गाणे म्हटले, आजूबाजूला लहान मुले खेळत होती ती घाबरून पळून गेली. काहींनी सुटे पैसे काढायला हात खिशात घातला पण &lt;b&gt;त्याला&lt;/b&gt; आवाज ऐकू गेला. आमची प्रार्थना &lt;b&gt;त्याने&lt;/b&gt; ऐकली. जणू टामीला हाडूक मिळाले, जणू चिनीला (घर्र..घर्र) दुधावरची साय मिळाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वर दिलेल्या सर्व समस्यांचे उत्तर आहे &lt;a href="http://www.flipkart.com/?_pop=tab" rel="nofollow"&gt;फ्लिपकार्ट&lt;/a&gt;. ही सेवा इतकी सोपी आणि सुटसुटीत आहे याचा प्रत्यय पहिल्यांदा इथून पुस्तक मागवल्यावर आणि आठ दिवसात ते कोणतीही अडचण न येता घरपोच हातात पडले तेव्हा आला. ही पद्धत अशी आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फ्लिपकार्ट साइटवर जाउन हवे ते पुस्तक/पुस्तके शोधा. पुस्तक मागवण्यासाठी तिथे खाते उघडावे लागत नाही यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाहीतर एखाद्या साइटवर चाराण्याचे काम करायचे असले तरी रजिस्ट्रेशन-पासवर्ड-तो कन्फ़र्म करा-कापच्यातील (मोडी + इजिप्शियन हायलोग्राफिक्स) गुंतावळ ओळखा- बेरीज करा -तुमच्या आतेमावसबहिणीच्या डोळ्यांचा रंग सांगा असे साग्रसंगीत विधी करावे लागतात. (खाते उघडण्याची सुविधा अर्थातच आहे पण ती सक्तीची नाही.) फ्लिपकार्टवर फक्त तुमचा इ-मेल नोंदवा. मग तुम्ही पैसे कसे भरू इच्छीता याचे पर्याय दिसतात. क्रेडीट कार्ड, व्हिसा इ. नेहेमीचे पर्याय आहेतच पण शिवाय क्याश ऑन डिलिव्हरी हा ही एक पर्याय आहे. पर्याय निवडा. तुम्हाला इ-मेल आणि एसेमेस ने सूचना येईल. दुसर्‍या दिवशी नोंद तुम्हीच केली आहे का हे विचारणारा एक फोन येईल. पुस्तकाची डिलिव्हरी ज्या दिवशी होणार असेल त्या दिवशी अजून एक मेल आणि एसेमेस येईल. याखेरीज तुमची शिपमेंट कुठपर्यंत पोचली आहे हे तुम्ही रोज पाहू शकता. काही दिवसात हवे ते पुस्तक तुमच्या हातात, काम खतम. त्यात ही कंपनी भारतीय असल्याने किमती रूपयांमध्ये आहेत त्यामुळे ऍमेझॉनच्या तुलनेत पुस्तके बरीच स्वस्त पडतात, शिवाय यात सूटही असते. (मी मागवलेल्या पुस्तकावर छापील किंमत $१४ आहे, मला पुस्तक &lt;img alt="Indian Rupee symbol.svg" height="10" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ee/Indian_Rupee_symbol.svg/7px-Indian_Rupee_symbol.svg.png" style="vertical-align: baseline;" width="7" /&gt;५०३ ला पडले!)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फ्लिपकार्टवर पुस्तकांखेरीज चित्रपट, मोबाइल, आयपॉड, क्यामेरे इ. बर्‍याच वस्तू विकत घेता येतात पण अजून त्याचा अनुभव घेतलेला नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आता अर्थातच गाणे बदलले आहे, 'आज मै उपर, आसमा नीचे.."&lt;br /&gt;
--&lt;br /&gt;
१.&lt;br /&gt;
&lt;blockquote&gt;कापासीदामासूंबाल्याचावुंडाये |&lt;br /&gt;
किडमेंअस्सऊन लठ्ठ | बुक्कें लींहते | -- पुलं&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3894626648953747291-8645589300192767618?l=rbk137.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/blogspot/uIlTf/~4/hayZbVVMoko" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/blogspot/uIlTf/~3/hayZbVVMoko/blog-post_21.html</link><author>noreply@blogger.com (Raj)</author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://rbk137.blogspot.com/2011/07/blog-post_21.html</feedburner:origLink></item></channel></rss>

