<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml-stylesheet type="text/xsl" media="screen" href="/~d/styles/rss2full.xsl"?><?xml-stylesheet type="text/css" media="screen" href="http://feeds.feedburner.com/~d/styles/itemcontent.css"?><rss xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/" xmlns:georss="http://www.georss.org/georss" xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0" version="2.0"><channel><atom:id>tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028</atom:id><lastBuildDate>Tue, 03 Nov 2009 05:22:47 +0000</lastBuildDate><title>खट्टा मिठा</title><description>khatta-mitha : History - a bit different!</description><link>http://khattamitha.blogspot.com/</link><managingEditor>noreply@blogger.com (.)</managingEditor><generator>Blogger</generator><openSearch:totalResults>55</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="self" href="http://feeds.feedburner.com/khattamitha" type="application/rss+xml" /><feedburner:emailServiceId>khattamitha</feedburner:emailServiceId><feedburner:feedburnerHostname>http://feedburner.google.com</feedburner:feedburnerHostname><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="hub" href="http://pubsubhubbub.appspot.com" /><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-4929070942906746033</guid><pubDate>Tue, 07 Jul 2009 19:10:00 +0000</pubDate><atom:updated>2009-07-07T12:14:22.845-07:00</atom:updated><title>खंडोबाची मूळकथा</title><description>खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातला. आंध्र तेलंगणात तो मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन बायका त्याला असून, त्या दोघीही गोपालक- शिकारी जमातीच्या आहेत. कोमरवेल्ली धट्ट मल्लणा, आयरगल्ली येथील धट्ट मल्लणा, वरंगळ येथील कट्ट मल्लणा पेदिपाड (नल्लूर), पेनुगोंडे (अनंतपूर), मल्लालपत्रन ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरे आहेत. हैदराबाद येथे मुळात मुस्लिम समाजाचा असलेला मल्लणा, नंतर वरंगळ येथे निघून गेल्याचे सांगितले जाते. याशिवाय ओदिल्ला-गणेशपुरी अशा सतरा-अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरे आहेत....&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचा सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील प्रा. विश्वनाथ शिंदे यांचा लेख - &lt;a href="http://beta.esakal.com/2009/07/04121145/Features-saptarang-on-jejuri-a.html"&gt;खंडेरायाच्या शोधात&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-4929070942906746033?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/XSpkA7JirzE" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/XSpkA7JirzE/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2009/07/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-3110665403647140790</guid><pubDate>Mon, 08 Jun 2009 19:30:00 +0000</pubDate><atom:updated>2009-06-08T12:31:43.026-07:00</atom:updated><title>दाशराज्ञ युद्ध</title><description>हिंदुस्तानच्या इतिहासातील दोन युद्धे प्रसिद्ध आहेत. &lt;br /&gt;त्यातील एक म्हणजे पांडव-कौरवांतील महायुद्ध आणि दुसरे म्हणजे ऋग्वेदकालीन दाशराज्ञ युद्ध.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दाशराज्ञ युद्ध ही ऋग्वेदातील एक महत्त्वाची घटना आहे. हे युद्ध नेमके कधी झाले, हे सांगणे अवघड आहे कारण अद्याप ऋग्वेदाचा काळ निश्चित झालेला नाही. त्याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. मात्र सर्वसाधारणतः इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व एक हजार चारशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. या कालखंडात केव्हातरी हे युद्ध झाले. या युद्धास कारणीभूत ठरले ते दोन पुरोहितांमधील वैर. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ते दोन पुरोहित. भरतांच्या कुशिकांच्या कुळात सुदास नावाचा राजा होता. विश्वामित्र हा या राजाचा पुरोहित. ऋग्वेदातील ऋचांवरून भरतांची टोळी इराणच्या पूर्व भागातून भारतीय उपखंडात शिरली असे दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विपाश (बियास) आणि शतुद्रि (सतलज) या दोन नद्यांच्या खो-यांतील जमातींचा पराभव करण्यास विश्वामित्राने सुदास राजाला मदत केली. पण नंतर सुदासाने विश्वामित्रास मुख्य पुरोहितपदावरून काढून टाकले आणि त्याच्याजागी वसिष्ठाची नियुक्ती केली. झाले! त्यामुळे विश्वामित्र चिडला. वसिष्ठ आणि त्याच्यात वैमनस्य निर्माण झाले. सुदास राजाला धडा शिकविण्याचा निश्चय विश्वामित्राने केला. (येथे चाणक्याची आठवण येते ना?) त्याने भरतांच्या विरोधात दहा जमातींच्या राजांचा एक गट तयार केला. पुरु, अनु, द्रुह्यु, यदु, तुर्वश, पख्त (पक्थ), भालाणस (भलानस), आलिन (अलिन), विषाणिन् (विशाणिन) आणि शिव या त्या दहा जमाती. यातील पुरु, अनु, द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पंचजन म्हणून ओळखल्या जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पंचजन हे काय प्रकरण आहे ते प्रथम पाहूया.&lt;br /&gt;सप्तसिंधुच्या प्रदेशात (म्हणजेच पश्चिमेकडे सिंधु आणि पूर्वेकडे सरस्वती या प्रदेशात सात नद्या वाहात होत्या. त्या अशा - &lt;br /&gt;१. सरस्वती (भारतातील घग्गर, पाकिस्तानातील हाक्रा) &lt;br /&gt;२. सिंधु &lt;br /&gt;३. परुष्णी (रावी) &lt;br /&gt;४. असिक्नि (चिनाब) &lt;br /&gt;५. शतुद्रि (सतलज)&lt;br /&gt;६. वितस्ता (झेलम)&lt;br /&gt;७. विपाशा (बिआस)&lt;br /&gt;तर या सात नद्यांच्या परिसरात वसलेल्या आर्यांच्या दोन शाखा होत्या. पहिली सूर्यवंशी इक्ष्वाकू आणि दुसरी चांद्रवंशीय ऐल. या ऐलांच्या पुरु, अनु, द्रुह्यु, यदु व  तुर्वश अशा पाच जमाती होत्या. त्यांना पंचजन म्हणत. या शेतकरी जमाती असाव्यात. पंचकृष्टयः किंवा पंचकार्षणः असा त्यांचा उल्लेख आढळतो. याशिवायही तेथे काही छोट्या टोळ्या होत्या. त्या सर्वांत पुरु ही जमात बलाढ्य आणि प्रबळ होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनु. द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पुरु आणि भरतांच्या आधी भारतात आल्या होत्या. अनु, द्रुह्यु आणि तुर्वश यांची चिनाब (असिक्नि) आणि रावी (परुष्णी)च्या प्रदेशात वस्ती होती. अनु आणि द्रुह्यु हे समुद्रापारच्या प्रदेशातून आल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी त्यांचे देवही बरोबर आणले होते. त्यांना अ-वैदिक समजले जाई. या पंचजनांपैकी यदु आणि तुर्वशांचे आर्यांशी वैर होते. त्यांच्या नावावरूनही याला पुष्टी मिळते. अनु म्हणजे अनार्य, द्रुह्यु म्हणजे द्रोही, तुर्वश म्हणजे हल्लेखोर. ऋग्वेदात यदु आणि तुर्वश यांचा उल्लेख दास असाही केलेला आहे. महाभारताने त्यांना यवन (परकीय) म्हटलेले आहे, तर अनुंच्या पुत्रांचा उल्लेख म्लेंच्छ असा केला आहे. उत्तर वैदिक वाङमयातही यदु आणि अनु-द्रुह्यु यांना म्लेंच्छ म्हटले आहे. द्रुह्युंनी भारताबाहेर जाऊन म्लेंच्छांचे साम्राज्य स्थापन केले असे पुराणात सांगितले आहे. अर्थात त्या काळी म्लेंच्छ याचा अर्थ होता - संस्कृत नीट न बोलता येणारा. यदु ही पंचजनांतील महत्त्वाची जमात. दाशराज्ञ युद्ध काळात तिरींदर हा त्यांचा म्होरक्या होता. परसौ असा त्याचा उल्लेख येतो. त्यावरून तो पार्स देशातला म्हणजे पर्शिया (इराण) मधील असावा असा तर्क आहे. यदुंची वस्ती सिंधु नदीच्या खालच्या खो-यात होती आणि तेथून ते गुजराजमध्ये शिरले.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;दाशराज्ञ युद्धात पख्तु (वा पक्थ) जमातीने भाग घेतला होता. पख्तु म्हणजे हल्लीचे पख्तून. ते वायव्य सरहद्द प्रांतात आणि त्या लगतच्या अफगाणिस्तानच्या प्रदेशात राहात असत. त्यांच्या दक्षिणेस काबुलिस्तानमध्ये भालाणस आणि ईशान्य अफगाणिस्तानमध्ये आलिन यांची वस्ती होती. विषाणिन् (शिंगे असणारा पशू - बहुधा वृषभ. विषाणिन् एकशिंगाचे शिरोभूषण वापरत असावेत म्हणून त्यांना हे नाव पडले. किंवा वृषभ हे या जमातीचे देवक - अर्थात टॉटेम असावे.) हे क्रुमु (कुर्रम) आणि गोमती (गोमल)च्या खो-यात राहात असत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता आपण परत दाशराज्ञ युद्धाकडे वळू या.&lt;br /&gt;या युद्धात विश्वामित्राने दहा जमातींच्या राजांचा गट केला आणि तो सुदासच्या विरोधात उभा राहिला. सुदासच्या बाजूनेही दहा राजे होते. तत्सु, पर्शू, पृथू या त्यातील काही जमाती. यांच्यामध्ये परुष्णीच्या म्हणजेच रावी नदीच्या काठावर हरियुपिया (हडप्पा?) येथे लढाई झाली. दोन्ही बाजूंनी वीस राजे या युद्धात सहभागी झाले होते. सर्वमिळून सैनिकांची संख्या होती - सुमारे सहाशे! हे युद्ध भरतांचा मुख्य सुदास याने जिंकले. पुरुंचा पुरुकुत्स, अनु आणि द्रुह्यु नदीत बुडाले. पराभवानंतर पुरु पूर्वेकडे सरस्वती नदीच्या खो-यात आले. त्या प्रदेशाचे नाव शरण्यावत असे होते. तो प्रदेश म्हणजे हल्लीचा हरयाणा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दाशराज्ञ युद्धानंतर यमुनेच्या तीरावर एक छोटे युद्ध झाले. त्यात सुदासाला अज, सिग्रु आणि यक्षांशी लढावे लागले. भेद हा त्यांचा पुढारी होता. या युद्धातही इंद्राने सुदासाला साह्य केले. या युद्धानंतर भरत यमुनेपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी सरस्वती व यमुना यांमधील प्रदेशात वस्ती केली. या भागाला ब्रह्मावर्त हे नाव पडले. हिंदु धर्माचा उगम येथे झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(संदर्भ - आर्यांच्या शोधात, मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिली, मे २००८, किं. ९० रु., पान २४ ते २९)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-3110665403647140790?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/IjVsnUzYD9U" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/IjVsnUzYD9U/blog-post_08.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">6</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2009/06/blog-post_08.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-1725824121278373834</guid><pubDate>Mon, 01 Jun 2009 12:41:00 +0000</pubDate><atom:updated>2009-06-01T05:48:37.919-07:00</atom:updated><title>येशूची कबर</title><description>बायबलनुसार येशू हा देवपूत्र आहे. तो प्रेषित, म्हणजे मानवजातीच्या उद्धारासाठी परमेश्‍वराने पाठविलेला प्रतिनिधी आहे. पण काही वर्षांपूर्वी आलेल्या 'दी दा विंची कोड' या कादंबरीने येशूने विवाह केला होता आणि त्यांना मुलंही झाली होती, असा दावा करून येशूला मर्त्य मानवाच्या कोटीत आणलं होतं. तर आता 'द लॉस्ट टॉम्ब ऑफ जीजस' या जेम्स कॅमेरून कार्यकारी निर्माते असलेल्या आणि सिम्चा जॅकोबोविसी यांनी निर्मिती लेखन व दिग्दर्शन केलेल्या माहितीपटाने येशूच्या पुनरुज्जीवनाच्या कथांनाच सुरूंग लावला आहे. नव्या करारातील शुभवार्तांनुसार 'एली एली ला मा सबख्तनी' (माझ्या देवा, मला का रे तू सोडलंस?) अशी आर्त प्रार्थना करत येशूने क्रूसावर प्राण त्यागले. त्यानंतर त्याच्या अनुयायांनी त्याचं शव एका खळग्यात ठेवलं. तिसऱ्या दिवशी येऊन पाहतात तो त्या खळग्यात शव नव्हतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;येशूच्या मृत्यूची ही जी कथा आहे, तिचा अर्थ येशू सदेह स्वर्गात गेला असा होतो. पण जेरूसलेममधील ताल्पिऑट भागातील उत्खननात 28 मार्च 1980 रोजी सापडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या कबरीतील चुनखडीच्या दहा पेट्यांमध्ये (ossuaries) ज्या अस्थी मिळाल्या, त्या अन्य कुणाच्या नव्हे, तर येशू आणि त्याच्या परिवारातील लोकांच्या आहेत, असा दावा &lt;a href="http://dsc.discovery.com/convergence/tomb/tomb.html"&gt;'द लॉस्ट टॉम्ब'&lt;/a&gt; या माहितीपटातून करण्यात आला आहे. आता वाद आहे तो एवढाच की त्या अस्थी येशूच्याच आहेत, याला पुरावा काय? &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते पाहण्यापूर्वी 'ऑस्युरिज' हा काय प्रकार आहे ते बघू या. इसवी सन पूर्व 30 ते इसवी सन 70 या कालखंडात जेरुसलेम मध्ये अंत्यसंस्काराची एक रीत प्रचलित होती. ते लोक प्रथम मृतदेह एका कापडात गुंडाळीत. त्यानंतर खडकात खोदलेल्या खास कबरीत तो ठेवला जाई. तेथे तो मृतदेह कुजून जाई. त्याच्या केवळ अस्थी उरल्या की त्या लाईमस्टोनपासून बनविलेल्या पेटीत सुरक्षित ठेवल्या जात. या पेट्यांना 'ऑस्युरिज' म्हणतात. ताल्पिऑटमध्ये तशा दहा पेट्या सापडल्या. त्यातील दोन पेट्यांवर 'जीजस सन ऑफ जोसेफ' आणि 'ज्युडा सन ऑफ जीजस' असे आरेमिक भाषेत कोरलेले आहे. दोन पेट्यांवर हिब्रुत 'मारिया' (मेरी), 'मातिया' (मॅथ्यू) असे लिहिलेले आहे, तर एका पेटीवर ग्रीकमध्ये 'मरियामेने ई मारा' (मास्टर म्हणून ओळखली जाणारी मेरी.) असे कोरलेले आहे. हे मेरी माग्दालिनचे नाव असावे. पण केवळ एवढ्यावरून ते लोक येशू ख्रिस्ताच्या परिवारातील आहेत असे मानायचे का? एकसारखी नावे अनेकांची असू शकतात. तर या आक्षेपाला उत्तर म्हणून जॅकोबोविसी यांनी संख्याशास्त्राचा आधार घेतला. टोरांटो विद्यापीठातील गणित आणि संख्याशास्त्राचे प्राध्यापक आंद्रे फ्युएरव्हर्जर यांनी त्या काळातील नावांमधील साम्य आणि वारंवारता यांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करून सांगितले, की ती नावे येशू आणि त्याच्या परिवारातील नसण्याची शक्‍यता 600मध्ये एक अशी आहे. याशिवाय जॅकोबोविसी यांनी जीजस आणि मेरी माग्दालिन यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून काही सॅम्पल्स घेऊन ती कॅनडातील ऑन्टॅरियो येथील लेकहेड विद्यापीठातील पॅलिओ-डिएनए प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिली. तेथे करण्यात आलेल्या मायटोकॉन्ड्रिअल डीएनए चाचणीत जीजस आणि मेरी यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून घेण्यात आलेल्या सॅम्पल्सचा एकमेकांशी संबंध नाही. जॅकोबोविसी यांच्या मते याचाच अर्थ जीजस आणि मेरी हे पती-पत्नी असावेत असा होतो आणि 'अखेरच्या भोजन'प्रसंगी येशूच्या मांडीवर एक मूल होते असा उल्लेख जॉन यांच्या शुभवार्तेत येतो, ते मूल म्हणजेच ज्यूडाह आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. त्यातला एक तत्त्वज्ञानात्मक, अध्यात्मिक असतो. सर्वसामान्य धार्मिक त्याच्या नादी क्वचितच लागतात. लोकांना अधिक रूची असते, ती धर्माच्या कर्मकांडात्मक भागाशी. या कर्मकांडांची उभारणी काही मिथकं, चमत्कारकथा यांच्या पायावर करण्यात आलेली असते. त्या कथा नाकारल्या की पुढचा सगळाच डोलारा कोसळून पडतो. (जो पडणे गरजेचे असते.) 'लास्ट टॉम्ब'मधून नेमकं हेच साधू शकतं. म्हणूनच अशा साहित्याला, चित्रपटांना धर्ममार्तंडांचा विरोध असतो. एकदा धर्माचं अवडंबर दूर झालं की मग त्यांच्यासाठी राहिलं काय? येथे तर एका नव्हे, दोन धर्मांचा प्रश्‍न आहे. ख्रिस्त्यांप्रमाणेच मुस्लिमांचीही प्रेषित संकल्पनेवर श्रद्धा आहे. फार काय कुराण आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखाही एकच आहेत. असो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;धर्मश्रद्धा दुखावल्या म्हणून होणारी ओरड नेहमीच श्रद्धेसाठी असते असं नाही. ती बऱ्याचदा सत्तेसाठीच असते. मात्र युरोप-अमेरिकेत, जेथे ख्रिस्ती धर्म बहुमतात आहे, जेथे मूलतत्त्ववाद जोर धरू पाहात आहे, अशा देशांमध्ये धर्मश्रद्धांना आव्हान देणारे आवाज उठतात आणि तरीही त्यांना मारहाण होत नाही, त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात नाही, हे आपल्यासाठी काही तरी जगावेगळंच आहे.... चमत्कारसदृश!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(सकाळमधील विश्ववेध या सदरात प्रसिद्ध झालेला लेख. 6 मार्च 2007)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-1725824121278373834?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/VJuDkJQyvq4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/VJuDkJQyvq4/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">9</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2009/06/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-8657791470065520013</guid><pubDate>Tue, 15 Apr 2008 08:50:00 +0000</pubDate><atom:updated>2008-05-21T13:53:11.694-07:00</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">lokmanya</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">shahu maharaj</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">maharashtra history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">tilak</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">pune</category><title>ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप</title><description>आपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी भल्तीच विचित्र, विकृत असते. त्यात पुन्हा एकपत्नीव्रत आणि पतिव्रता वगैरेंचे ओझेही आपल्या सामाजिक मानगुटीवर असतेच. (यावर काही लोक म्हणतील, की या पवित्र भावना तुम्हाला ओझे वाटतात म्हणजे भल्तेच! या पवित्र गोष्टी नसतील तर मग आपल्या पवित्र संस्कृतीचे व पवित्र कुटुंबसंस्थेचे कसे होणार? तर स‌भ्य स्त्री-पुरुषहो, तसे काही होत नसते. एक स्त्री कुलवधू असण्याच्या काळातही समाज रसरशीत होताच! वाचा - भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - विकार-विचारप्रदर्शनांच्या साधनांची उत्क्रांती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, लोकवाड्मयगृह, पाने - 118, मूल्य - 50 रु.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हे स‌र्व असे असल्याने होते काय, की एखाद्याची बदनामी करायची म्हटल्यावर त्याच्या कामजीवनाबाबत नसत्या गप्पा पसरवायच्या, की झाले काम सोपे, हे आपण अनुभवाने शिकलेलो आहोत. व आपण एक स‌माज म्हणून अशा बाबतीत चांगलीच महारत मिळविलेली आहे, हे इतिहासात जाऊन पाहिले की लख्खपणे लक्षात येते. 'गीतारहस्य'कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या थोर माणसालाही अस‌ले किटाळ स‌हन करावे लागले होते. त्यांच्यावर चक्क बलात्काराचा आरोप झाला होता, अगदी न्यायालयात झाला होता आणि तो अर्थातच साफ खोटा होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकमान्यांच्या आयुष्यात त्यांना मनःस्ताप देणारी अनेक प्रकरणे येतात. ताईमहाराज प्रकरण हे त्यातलेच एक. याच खटल्यात त्यांच्यावर हा बलात्काराचा आरोप झाला होता. त्यात जाण्यापूर्वी हे ताईमहाराज प्रकरण काय होते ते थोडक्यात पाहू या...&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते वासुदेव हरी ऊर्फ बाबामहाराज पंडित. हे पुण्यात राहात असत. त्यांना मुंबई स‌रकारने पहिल्या वर्गाचे स‌रदार म्हणून मान्यता दिलेली होती. ही आसामी चांगलीच श्रीमंत होती. पुणे, बेळगाव, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता, जमीनजुमला विखुरलेला होता. पहिल्या पत्नीच्या अकाली निधनानंतर बाबामहाराजांनी सिन्नरकर नावाच्या एका पुस्तकविक्रेत्याच्या रुपवान मुलीशी लग्न केले. त्यांचे नाव स‌कवारबाई ऊर्फ ताईमहाराज. त्यांना शांताक्का नावाची मुलगी होती. 7 ऑगस्ट 1897 रोजी बाबामहाराजांचे कॉल-याने निधन झाले. तेव्हा ताईमहाराज गरोदर होत्या व त्यांना मुलगा होईल व आपल्या संपत्तीस वारस मिळेल, अशी मृत्युशय्येवर पडलेल्या बाबामहाराजांना आशा होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबामहाराज कॉल-याने आजारी पडल्याचे स‌मजल्यावर लोकमान्य त्यांना भेटावयास गेले. त्यांनी बाबामहाराजांना मृत्युपत्र करण्याचा स‌ल्ला दिला. आपल्यामागे आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त नेमणे आवश्यक आहे, असे बाबामहाराजांना वाटले. त्यांनी टिळकांना त्यासाठी गळ घातली. मित्राचे मन राखण्यासाठी टिळकांनी त्याला होकार दिला व बाबामहाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबामहाराजांचे व्याही दादासाहेब ऊर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद स‌खाराम कुंभोजकर व बळवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले. 7 ऑगस्ट 1897 रोजी स‌काळी बाबामहाराजांनी मृत्युपत्र तयार केले. त्याचा मजकूर टिळकांनीच सांगितला. त्यात म्हटले होते, "आमचे कुटुंब सौ. स‌कवारबाई हल्ली गरोदर आहे. तीस पुत्र न झाल्यास किंवा होऊन तो अल्पायुषी झाल्यास आमचे घराण्याचे नाव चालविण्याकरिता यथाशास्त्र जरूर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंबाचे मांडीवर दत्तक वर लिहिलेल्या गृहस्थांच्या विचारे देऊन त्या मुलाचे वतीने तो वयात येईपर्यंत स‌दर पंचांनी (ट्रस्टी) स्थावर-जंगम इस्टेटीची व्यवस्था करावी."&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर 18 जानेवारी 1898 रोजी मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे ताईमहाराजांनी शक्यतो आपल्या नात्यातल्या एखाद्या मुलास दत्तक घ्यावे असा विचार पुढे आला. बाबामहाराजांची मालमत्ता मोठी. बाई एकटी. तिला मुलगा नाही. तशात ती हलक्या कानाची. अशा परिस्थितीत तिच्याभोवती लोभी नातेवाईकांचे कोंडाळे न जमते तर नवलच. पण या नातेवाईकांना दूर सारून टिळक व अन्य विश्वस्तांनी, पंडित घराण्याच्या एका शाखेतील एका लहान मुलास दत्तक म्हणून निवडले. ताईमहाराजांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. हा मुलगा औरंगाबादजवळच्या निघोने गावचा होता. ठरल्यानुसार ताईमहाराज आनंदाने विश्वस्तांसह तेथे गेल्या व तेथे दत्तकविधान स‌मारंभ पार पडला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण पंडितांचे नातेवाईक गप्प बसणारे नव्हते. नागपूरकर हे विश्वस्त त्यांना सामील होते. त्यांनी ताईमहाराजांचे कान फुंकण्यास सुरूवात केली, की हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हांस काहीही फायदा होणार नाही. कारण तो स‌ज्ञान होईपर्यंत मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहणार. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याच्या कोल्हापूर शाखेतील बाळामहाराज यांना दत्तक घेतले, तर किमान तीस हजाराचे दागिने वगैरे त्यांच्या हाती येतील. ते ऎकून ताईमहाराजांची मती फिरली. त्यांनी बाळामहाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. त्यास कोल्हापूर दरबारचा पाठिंबाही मिळविला. पण टिळकांनी हे दत्तकविधान बेकायदेशीर असल्याने ते थोपविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी कोर्टापासून पुण्याच्या तालिमबाज पठ्ठ्यांपर्यंत स‌र्वांची मदत त्यांनी घेतली. पण अखेर हा दत्तकसमांरभ पुण्याऎवजी कोल्हापूरात झालाच. त्यास शाहू छत्रपती उपस्थित होते. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी शाहू छत्रपती विरोधी बाजू घेतल्याने या प्रकरणात छत्रपतींनी टिळकांच्या विरोधी भूमिका घेतली, एवढाच याचा अर्थ. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या दत्तकविधानाविरोधात टिळकांनी 23 स‌प्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या प्रथमवर्ग स‌बजज्जांच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला.  वास्तविक या खटल्यात टिळकांची बाजू अतिशय कमकुवत होती आणि त्याचे एकमेव कारण हेच होते, की न्यायाधीशापासून स‌रकारपर्यंत स‌गळेच त्यांच्याविरोधात होते. या न्यायाधीश अस्टनने तर, खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऎवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे टिळकांवरील गंभीर आरोपांबाबत पोलिस चौकशी करून त्यांच्यावर खटला भरावा अशी जोरदार शिफारस स‌रकारला केली. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरण्यात आला आणि त्यात 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना दीड वर्षांची स‌क्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. त्याविरोधात अर्थातच टिळक अपिलात गेले आणि अखरे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. नंतर दिवाणी खटल्यातही टिळकांच्याच बाजूने निकाल लागला. 31 जुलै 1906 रोजी जव्हेरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. त्यावरोधात विरोधी पक्षाने उच्च न्यायलयात अपिल केले. त्यात टिळक  हरले. मग ते प्रीव्ही कौन्सिलमध्ये गेले व तेथे जिंकले. बाबामहाराज पंडितांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी या खटल्यांच्या पायी टिळकांना कर्जबाजारी व्हावे लागले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर टिळकांवरील या फौजदारी खटल्यात पुरावा म्हणून एक पत्र सादर करण्यात आले होते. ''औरंगाबाद येथील मुक्कामात टिळकांनी ताईमहाराजांवर बलात्कार केला" असा आरोप त्या पत्रात करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द ताईमहाराज आणि त्याची ब्राह्मण सेविका गोदूबाई यांनी न्यायालयात तसे सूचित व्हावे अशा त-हेने साक्ष दिली होती. टिळक-चरित्रकार तात्यासाहेब केळकर सांगतात, "या जबान्या झाल्या त्या दिवशी कोर्टातून घरी आल्यावर टिळक रागाने लाल झाले होते की तस‌े लाल झालेले एरवी कोणी केव्हा पाहिले नव्हते. ते इतकेच म्हणाले की 'एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते पण एवढ्या मोठ्या स‌रदार घराण्यातील ही स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते तेव्हा तिचा धिक्कार असो.'" (पृ. 151)&lt;br /&gt;&lt;br /&gt;टिळकांनी बलात्कार केल्याची ताईमहाराजांनी दिलेली साक्ष खोटीच होती. त्यांचे पत्रही बनावट होते. हे न्यायालयात स‌िद्धही झाले. ही पंडितमहाराज आणि नागपूरकर यांनी खेळलेली एक तेढी चाल होती, हेही लोकांच्या तेव्हा लक्षात आले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या घाणेरड्या व खोट्या आरोपांनी टिळकांच्या चरित्रावर डाग पडावा एवढे त्यांचे चारित्र्य हलके नव्हते. यातून एकच दिसले, की स‌माजवंद्य माणूस लोकांच्या मनातून उतरावा यासाठी त्याचे चारित्र्यहनन करण्याची चाल विरोधक खेळतात, यातून टिळकही सुटले नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या दृष्टीने तो काळही आजच्या पेक्षा काही फार वेगळा नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;- शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, 1986, पृष्ठ - 102 ते 138 व 151.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-8657791470065520013?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/IxI63QfgWec" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/IxI63QfgWec/blog-post_15.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">13</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/blog-post_15.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-1900010749010977515</guid><pubDate>Mon, 14 Apr 2008 07:50:00 +0000</pubDate><atom:updated>2008-04-14T00:59:36.391-07:00</atom:updated><title>वाद वेदोक्ताचा - 3</title><description>वेदोक्त प्रकरणाचा वणवा पेटला तो एका उर्मट, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उद्धट उद्गारांनी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो 1899 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. नेहमीच्या रिवाजानुसार त्या काळात शाहू छत्रपती पंचगंगेवर कार्तिकस्नानासाठी गेले होते. त्यांच्या स‌मवेत बरीच मंडळी होती. त्यात विख्यात ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हेही होते. महाराज स्नान करीत होते. नारायणभट नावाचा ब्राह्मण मंत्र म्हणत होता. पण तो वेदोक्त नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्री भागवतांच्या बरोबर लक्षात आले. त्यांनी ती गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांनी नारायण भटाला त्याबाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात. ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केली नसली तरी चालते. त्याच्या या जबाबाने महाराज साहजिकच संतापले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोल्हापूर छत्रपतींच्या पदरी असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यातील शास्त्री बाळाचार्य खुपरेकर यांनी याबाबतची आपली आठवण सांगितली आहे. त्यानुसार हा नारायण भट बाहेरख्याली होता. "या घटनेच्या आदल्या रात्री त्याचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले होते व त्याने तिला मारहाणही केली होती. पहाटे वाड्यावरची गाडी आली, तेव्हा त्या भटजीच्या बायकोने ते घरात नाहीत म्हणून सांगितले. कुठे गेले म्हणून विचारल्यावर, गेले शेण खायला असे उत्तर दिले. गाडीवानाने अर्थ स‌मजून वेश्यावस्तीत जाऊन त्याला शोधून काढले व घरी जाण्यासाठी  गाडी वळवली व आंघोळ लवकर उरकायला सांगितले. त्यावेळी आपले बिंग बाहेर पडले व आपली छीथू होणार हे पाहून रागावलेल्या स्थितीत त्याने हे उद्गार काढले. हुज-याने महाराजांना हा प्रकार सांगताच त्यांनी त्याला चाबकाने फोडून काढले. महाराज म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवूऩ वर गाढवासारखं बडबडता! (1)&lt;br /&gt;&lt;br /&gt;1901च्या भाद्रपदातील पितृपक्षात महाराज पन्हाळगडावर राहात होते. तेथे श्राद्धासारखी धर्मकृत्ये करण्यासाठी त्यांनी नारायण स‌दाशिव ऊर्फ अप्पासाहेब राजोपाध्ये यांना बोलावणे पाठविले. हे राजोपाध्ये म्हणजे कोल्हापूरकर भोसल्यांचे कुलगुरू व कुलोपाध्याय होते. पण ते छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास तयार नव्हते. तेव्हा 7 ऑगस्ट 1901ला महाराजांनी लेखी आदेशच दिला. राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जावीत असे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते. पण राजोपाध्यांनी या आदेशाची अंमलबजावणी काही काळ स्थगित ठेवावी अशी विनंती केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशात नवरात्र उजाडले आणि कोल्हापूरात देवी विटाळल्याची बोंब झाली.ते प्रकरणही औरच होते. कोल्हापूरात नारायणशास्त्री गोविंद सेवेकरी वैद्य नावाचे ब्राह्मण होते. ते वेदोक्तास अनुकूल होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1901 रोजी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांची श्रावणी केली. बापूसाहेब कागलकरांचीही श्रावणी त्यांनी केली. त्यामुळे स‌नातन्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. या नारायणशास्त्र्यांनी 14 ऑक्टोबर 1901 रोजी अंबाबाईच्या देवळात जाऊन पूजा केली. शाहू छत्रपतींनीच त्यांना पूजेसाठी पाठविले होते. पण त्यांच्या स्पर्शाने देवी विटाळली असा आरडाओरडा स‌नातनी ब्राह्मणांनी केला. नारायणशास्त्रांना वाळीत टाकले असल्याची माहिती स‌नातन्यांच्या वतीने तेरा भिक्षुकांनी नायब कारभा-यांच्या कानावर घातली. याच तेरा भिक्षुकांनी नंतर शाहू छत्रपतींचीही भेट घेतली. तेव्हा छत्रपतींनी या तेरा जणांना देवळात प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा ही ब्राह्मणमंडळी शाहू छत्रपतींच्या विरोधात इंग्रज स‌रकारकडे गेली. या ब्राह्मणांशी महाराजांच्याच कुलगुरूने हातमिळवणी केली असल्याचे नंतर स्पष्ट झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अप्पासाहेब राजोपाध्ये हे महाराजांचे कुलगुरू व कुलोपाध्याय. तेच वेदोक्ताच्या विरोधात होते, हे पाहिल्यावर मग महाराजांनी त्यांनाही धडा शिकविण्याचा निर्धार केला. 26 ऑक्टोबर 1901 रोजीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राजवाड्यावर जी धर्मकृत्ये करायची, ती वेदोक्ताने करणार नसाल, तर वाड्यावर येऊ नका, असा निरोप त्यांना छत्रपतींनी पाठविला. त्यानंतर रोजच स‌काळी त्यांना असाच तोंडी निरोप पाठविण्यात येत असे. हा प्रकार 8 नोव्हेंबरपर्यंत चालला. राजोपाध्ये पूजेस येत नव्हते आणि म्हणून त्यांना दक्षिणाही दिली जात नव्हती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याच सुमारास लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी परजली आणि राजोपाध्यांच्या बाजूने त्यांनी 22 व 29 नोव्हेंबरच्या अंकात वेदोक्तावरचे अग्रलेख लिहिले. तेव्हाची बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांच्या हातातील असल्याने त्यांनीही शाहू छत्रपतींच्या विरोधात जणू आघाडी उघडली. टिळकांचा केसरी-मराठी तर त्यात होताच, पण प्रा. विजापूरकरांच्या प्रभावाखालील स‌मर्थ साप्ताहिक, शंकरशास्त्री गोखले यांचे विद्याविलास हे साप्ताहिक, साता-याचे प्रतोद, वाईचे भाऊशास्त्री लेल्यांचे मोदवृत्त, सोलापुरचे कल्पतरू, ठाण्याचे अरूणोदय व हिंदूपंच, नाशिकचे गुराखी या नियतकालिकांनीही छत्रपतींच्या विरोधात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. स‌ावळाराम अमृतराव विचारे यांचे मराठा दिनबंधु हे कोल्हापुरातले वृत्तपत्र त्यांना आपल्यापरीने उत्तर देत होते. पण या स‌र्व कोलाहलात त्याचा आवाज कोणाला ऎकू जाणार? &lt;br /&gt;&lt;br /&gt;वेदोक्ताच्या प्रकरणातील स‌त्य शोधण्यासाठी याच सुमारास शाहू छत्रपतींनी एक स‌मितीही नेमली. रा. ब. कृष्णाजी नारायण पंडित, स‌रन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले आणि विशेष म्हणजे आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचा या स‌मितीत स‌मावेश होता. 16 एप्रिल 1902 रोजी या स‌मितीने आपला अहवाल दिला. छत्रपती बाबासाहेब महाराज (1837-1866) यांच्या कारकीर्दीपर्यंत कोल्हापूरच्या राजघराण्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जात होती. बाबासाहेब महाराजांची मुले जगत नव्हती, तेव्हा रघुनाथशास्त्री पर्वते यांच्या स‌ल्ल्यावरून काही गृहकृत्ये पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरूवात करण्यात आली. हे पाहता छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने गृहकृत्ये करायची असल्यास त्यांना ती करता येतील, अशी शिफारस स‌मितीने केली. पण या अहवालावर स‌ही करण्यास राजोपाध्ये यांनी नकार दिला. स‌मितीपुढे साक्ष देण्यास येण्यास बाहेरचे लोक येत नव्हते, महाराजांचे अधिकारी दबाव आणित होते, असा त्यांचा आरोप होता. पण विशेष म्हणजे स‌मितीचे कामकाज त्यांच्याच घरात पाच महिने चालले होते, त्यावेळी मात्र ते याबाबत चकार शब्दानेही बोलले नव्हते. तेव्हा अहवाल प्रतिकूल जाताच त्यांनी त्यास विरोध दर्शविला हे उघड आहे. अखेर शाहू महाराजांनी 6 मे 1902 रोजी राजोपाध्ये यांना रीतसर राजोपाध्येपदावरून काढून टाकले. त्यांची स‌र्व इनामे, वतने व त्यांचे दिवाणी, फौजदारी व महसूलविषयक अधिकार काढून घेतले. या निर्णयामुळे तर मोठाच गदारोळ झाला. राजोपाध्यांच्या पाठिराख्यांनी तर महाराजांविरोधात जणू बंडच पुकारले. अशा वातावरणात महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक परिपत्रक काढून कोल्हापूरातील स‌रकारी नोक-यांत मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर केले. यामुळे तर ब्राह्मणवर्गात संतापाची लाट उसळली. केसरी-मराठ्यासकट स‌गळी ब्राह्मणी वृत्तपत्रे महाराजांवर तुटून पडली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या वादाने किती उग्र रूप घेतले होते, ते महाराजांच्या दत्तक राजमातेचे निधन झाले तेव्हाच्या घटनांतून दिसून येते. 14 स‌प्टेंबर 1902 रोजी चौथ्या शिवाजीराजांच्या पत्नी मातोश्री आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वेदोक्त पद्धतीने करण्यात येत होता, तर त्याला तेथेच काही ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावर मोठी वादावादी झाली. अखेर अंत्यस‌ंस्कार वेदोक्त पद्धतीनेच करण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री जुन्या राजवाड्याला आग लागली. ही आग काही उपद्व्यापी ब्राह्मणांनीच लावली असावी असा महाराजांना संशय होता. या आगीत जुन्या राजवाड्यातील प्रचंड दप्तरखाना खाक झाला. दुस-या दिवशी सकाळी कोल्हापुरातल्या अनेक घरांवर रक्ताची बोटे उमटलेली लोकांनी दिसली. हा महाराजांना 'इशारा' होता! &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिकडे राजोपाध्ये यांचे आपले इनाम व वतन वाचविण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी प्रथम गव्हर्नरकडे अर्ज केला होता. पण गव्हर्नरने छत्रपतींच्या बाजूने निकाल दिला. तेव्हा राजोपाध्यांनी थेट गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनकडे धाव घेतली. पण तेथेही राजोपाध्यांचा पराभव झाला. या निकालाने लोकमान्यांना मोठेच दुःख झाले. त्यांनी लिहिले, "राजोपाध्ये यांचे इनाम संस्थानात सामील झाले. याच न्यायाने पुढेमागे कोल्हापूर संस्थान इंग्रजी राज्यात सामील झाल्यास लोकांस‌ही स‌माधान वाटेल." राजोपाध्यांचे इनाम जप्त केल्याने संतापलेले लोकमान्य कोल्हापूर संस्थान जप्त करावे, असे सुचवित होते. जणू छत्रपतींनी राजोपाध्यांवर मोठा अन्यायच केला होता. वास्तविक त्यांचे इनाम हे चाकरी इनाम होते. पगाराप्रमाणे. काम करा, पगार घ्या, काम बंद, पगार बंद असे. जेव्हा चाकरी बंद तेव्हा इनामही बंद अशी त्याची कायदेशीर बाजू होती व ती लोकमान्य विसरले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाप्रमाणेच तेथील शंकराचार्यही वेदोक्ताच्या विरोधात होते. शंकराचार्यांच्या मठावर 23 फेब्रुवारी 1903 रोजी काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर या कीर्तनकाराची नेमणूक झाली. हा ब्रह्मनाळकरबुवा म्हणजे एक प्रकरणच होते. संन्याशी झाला, तरी त्याची धनसंपत्तीची हाव संपली नव्हती. पुढे त्याने त्या मठात एवढे गैरव्यवहार केले, की या पदाची सर्व इज्जत त्यांनी धुळीस मिळवली. लेलेशास्त्र्यांनीच पुढे त्यांच्या या लीला उजेडात आणल्या. ते भस्मात अत्तर घालून ते अंगास चोपडित असत. पानतंबाखू खात असत. झोपण्यासाठी शंकराचार्यांना मखमखलीच्या गाद्या लागत आणि ते नेहमी बायांकडून अंग रगडून घेत असत, वगैरे गोष्टी सांगून लेलेशास्त्र्यांनी त्याचा हा संन्याशाचा संसार किती विलासी होता, हे लोकांसमोर आणले. पण हे कधी तर शंकराचार्यांनी वेदोक्तास संमती दिली त्यानंतर. तत्पूर्वी शंकराचार्य ब्रह्मवृंदाचे नेतेच होते. शंकराचार्यांनी, शाहू महाराज हे शूद्र असल्याने त्यांना वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे मत दिल्यावर शाहू महाराजांनी त्यांनाही दणका दिला. त्यांनी मठाची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करून स्वामीचे स‌र्व धार्मिक अधिकार बरखास्त केल्याची राजाज्ञा काढली.(मे 1903)&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे चवताळलेल्या ब्रह्मनाळकरबुवांनी मग हवी तशी मुक्ताफळे उधळण्यास सुरूवात केली. ब्रह्मवृंदाची जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात दौरा काढला. पुण्यात त्यांची पालकी वाहणा-यांत लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी खाशी मंडळी होती. याच दौ-यात त्यांचा मुक्काम महाड येथे असताना तेथील प्रभू जातीच्या काही लोकांनी त्यांची पाद्यपूजा वेदोक्त मंत्र म्हणून करण्याचे ठरविले. पण त्यांनी व महाडच्या ब्राह्मणांनी तो बेत हाणून पाडला. याच वेळी शंकराचार्यांच्या या उत्तराधिका-याने शिवछत्रपती क्षत्रिय नव्हते व त्यांनी गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतले, त्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला, असे उद्गार काढले.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आता या वादात छत्रपतींचीच स‌रशी होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. राजोपाध्यांना इंग्रज स‌रकारने मोठी आशा होती. पण आता ती मावळली होती आणि त्यामुळे ब्रह्मवृंद आणि शंकराचार्यही हवेतून जमिनीवर उतरले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी या प्रकरणात तडजोड झाली आणि जुलै 1905 मध्ये छत्रपतींचे भोसले घराणे क्षत्रिय असल्याचे आणि त्याला वेदोक्ताचा अधिकार असल्याचे शंकराचार्यांनी मान्य केले. 20 डिसेंबर 1905 रोजी कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाने स‌भा घेऊन शंकराचार्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि पाच-सात वर्षे चाललेला हा संघर्ष छत्रपतींच्या विजयाने समाप्त झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हा संघर्ष खरेच स‌माप्त झाला? &lt;br /&gt;&lt;br /&gt;1 जून 1909 च्या धर्म पाक्षिकात लेलेशास्त्र्यांनी लिहिले, "शूद्राला वेदाधिकारदान, गुरूद्रोह इत्यादी पातकांमुळे" ब्रह्मनाळकरांना क्षयरोग झाला! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पाने 62 ते 97&lt;br /&gt;- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा संघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-1900010749010977515?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/tqTiCRSIiVs" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/tqTiCRSIiVs/3.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">7</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/3.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-5960597918409332554</guid><pubDate>Sat, 12 Apr 2008 07:27:00 +0000</pubDate><atom:updated>2008-04-12T00:40:21.090-07:00</atom:updated><title>वाद वेदोक्ताचा - 2</title><description>&lt;em&gt;&lt;strong&gt;सर्व क्षुद्रांचा गलबला!&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुमचे शिवाजी महाराज असतील शककर्ते, किंबहुना ते नसते तर आमची सुंता वगैरे झाली असती असे जे कवि भूषणने म्हटले ते आम्हालाही मान्यच आहे. त्यासाठी आम्ही त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणू. पण त्यांना आम्ही क्षत्रिय मात्र म्हणणार नाही, कारण कलीत क्षत्रिय नाहीत, अशी अवघी पुराणमतवादी मानसिकता होती. गागाभट्टाने त्यांना आधी शूद्र म्हटले ते यातूनच.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याचे असे झाले, की शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांच्या मुलाचा व्रतबंध करायचा होता. ते ऎकल्यावर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्यांची कुचेष्टाच केली. कारण बाळाजी आवजी हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आणि ब्राह्मणांच्या लेखी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही जात तर वर्णसंकरातून तयार झालेली. तेव्हा त्यांना कसले आले वेदोक्त कर्माचे वगैरे अधिकार !  पण कायस्त प्रभूंना मात्र हे मत मान्य नव्हते. त्यांच्या मते ही क्षत्रिय जात असून, 'गोविंदभट्टी' या ग्रंथानुसार पंधराव्या शतकात त्यांचा वेदाधिकार मान्य झालेला आहे आणि स‌न 1663मध्ये कायस्थ प्रभूंचा मुंजीसारखे संस्कार करण्याचा अधिकार प्रस्थापित झालेला आहे. पण तरीही 1669 साली मोरोपंत पिंगळ्यांनी प्रभूंना हा हक्क नसल्याचे म्हटल्यावर बाळाजी काशीच्या पंडितांकडे धाव घेतली. पण हाय रे चिटणीसांचे दैव! काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या म्हणण्यावरच शिक्कामोर्तब केले. त्यांनी बाळआजी आवजींनाच शूद्र ठरविले असे नाही, तर शिवाजी महाराजांनाही ते क्षत्रिय नस‌ल्याने छत्रसिंहासनाचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. तशा आशयाचे गागाभट्ट या पंडिताचे पत्र घेऊन केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित आणि सोमनाथभट्ट कात्रे महाराष्ट्रात आले. हा निर्णय पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी निळो येसाजी प्रभू पारस‌नीस यांना काशीला पाठविले. त्यानंतर गागाभट्ट स्वतः रायगडावर आले आणि त्यांचे मत बदलल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्रातल्या स‌नातनी ब्रह्मवृंदाला मात्र गागाभट्टांची ही करणी कधीच पसंत पडली नाही. वाई येथून निघणा-या 'धर्म' या साप्ताहिकाचे संपादक काशिनाथ वामन ऊर्फ भाऊशास्त्री लेले यांनी तर असे जाहीर केले, की शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करणारे गागाभट्ट काशीकर हे शिवाजी महाराजांचे उपदेशगुरूही नव्हते व कुलगुरूही नव्हते, तर ते एक भाडोत्री विद्वान होते. "जातिविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास शिवाजी महाराज शूद्र होते असे एक वेळच नव्हे परंतु अनंत वेळा जरी 'धर्म'संपादकाने प्रसिद्ध केले तरी त्यात त्याचा अपराध तो काय होणार आहे?" असा लेलेशास्त्रींचा स‌वाल होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिकडे स‌याजीराव गायकवाड जेव्हा वेदोक्ताबाबत ब्राह्मण पंडितांचा स‌ल्ला घेत होते, तेव्हा राजारामशास्त्री टोपले हे महाराजांना इषारा देत होते, की "महाराज, आपण क्षत्रिय आहात वगैरे गोष्टी ख-या, परंतु या नव्या भानगडीत आपण पडणे इष्ट नाही, वेदोक्त हे विष आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून त्याजबद्दलचा हट्ट धरला त्यांचे कल्याण झाले नाही. त्यांच्या राज्यास अवनती प्राप्त झाली. स‌बब त्या विषाची परीक्षा आपण पाहू नये. " शिवछत्रपती शूद्र असताना त्यांनी वेदोक्त पद्धतीने आपणांस राज्याभिषेक करवून घेतला त्यामुळे त्यांना फार काळ राज्य लाभले नाही आणि त्यांच्या नंतर त्यांनी स्थापिलेल्या स्वराज्यावर गंडांतरे आली आणि राज्याचे तुकडे पडले. प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी तर याहीपुढे जाऊन लिहिले, की "शककर्ते शिवाजी महाराजांस ज्यांनी रायगडी राज्याभिषेक केला व 'क्षत्रियकुलावतंस' म्हटले त्यांचे (गागभट्टांचे) निधन शौचकूपात पतन पावून झाले अशी दंतकथा आहे. एकंदर काय बीज असेल ते असो. 'परमेश्वरो वै वेत्ति' मूळ अस्सल क्षत्रियकुळी असेल परंतु स‌हवास व शरीरसंबंधांचा परिणाम देवास आवडत नसेल." &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवछत्रती क्षत्रिय असून, त्यांना छत्रसिंहासनाचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी बाळाजी आवजीने मोठी मुत्सद्देगिरीची कामगिरी केली. त्यांनी काय केले, तर भोसल्यांच्या वंशावळीचा धागा थेट उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशी नेऊन भिडविला, असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात. पण हे तरी स‌नातनी ब्राह्मणांना कुठे मान्य होते? त्या थोर ब्रह्मवृंदाचा धोशा एकच होता. कलीत क्षत्रिय नाहीत, असे स्मृती सांगत असल्याने रजपुतांना तरी क्षत्रिय कसे म्हणता येईल? लेलेशास्त्री लिहितात, "रजपूत हे क्षत्रिय नसून ते त्याहून निराळे आहेत. संस्कृतमध्ये त्यांना उग्र असे नाव आहे. त्यांची कर्मे गागाभट्टाच्या वंशातील गागभट्टापासून तिसरा पुरुष जो कमलाकरभट्ट त्याने शूद्र कमलाकरात सांगितली आहेत... शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी क्षत्रियापासून जो पुत्र उत्पन्न होतो त्याची जाती उग्र ही होय. शिवाजी हा रजपुतांचा वंशज होता असे जरी मानिले तरीही तो क्षत्रिय ठरणे मुळीच शक्य नाही. शिवाय शिवाजी हा जर क्षत्रिय असेल, तर विवाहापूर्वीच त्याचे उपनयनही व्हावयास पाहिजे होते, परंतु तसे मुळीच झालेले नाही. आजच्या मराठे जातीस एका विवाहावाचून दुसरा कोणताही संस्कार मुळीच माहीत नाही, हे निर्विवाद आहे.... 'विवाहमात्रं संस्कारं शूद्रोSपि लभते स‌दा' (शूद्रासही विवाह हा एकच संस्कार प्राप्त होतो) या स्मृतिवचनाप्रमाणे मराठे हे शूद्रच आहेत असे मानणे भागच आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात जातीदंभ केवळ स‌नातनी भटभिक्षुकांमध्ये होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन स‌र्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. स‌र्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची स‌मजूत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स‌याजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यानंतर असा हा स‌र्व क्षुद्र मतांचा गलबला सुरू होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बडोद्यास स‌याजीराव गायकवाडांना या शूद्रत्त्वाचा मोठा मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी वेदोक्ताचा आग्रह धरला. पण त्याला तेथील ब्रह्मवृंद त्यास तयार नव्हता. तेव्हा मग त्यांनी स‌रळ आपल्या सेवेतील ब्राह्मणांची हकालपट्टी करून, त्यांऎवजी गुजराती, मारवाडी ब्राह्मण नेमून वेदोक्तानुसार धर्मकर्मे सुरू केली. ते प्रकरण काही फारसे पेटले नाही. पण इकडे शाहू महाराजांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यावर मात्र जणू आभाळच कोसळले असे झाले. पुण्यात, कोल्हापुरात सनातन्यांचे जणू बंड माजले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आधी म्हटल्याप्रमाणे हा वणवा पेटला, तो एका उद्धट, बाहेरख्याली ब्राह्मणाच्या उर्मट उद्गारांनी. काय होते ते उद्रार, की जे ऎकून शाहूंसारखा राजर्षि कोपायमान झाला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला चाबकाने फोडून काढले? &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पृ. 39 -52&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-5960597918409332554?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/12yD41GcxJg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/12yD41GcxJg/2.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/2.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-9219266327161545098</guid><pubDate>Thu, 10 Apr 2008 11:56:00 +0000</pubDate><atom:updated>2008-04-10T05:06:50.543-07:00</atom:updated><title>वाद वेदोक्ताचा  (1)</title><description>&lt;em&gt;&lt;strong&gt;शिवछत्रपती शककर्ते, तरीही स‌नातन्यांच्या लेखी ते शूद्रच! &lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"शिवाजी क्षत्रिय नव्हताच. त्याने गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतलं. त्याच्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला."&lt;/em&gt;- कोल्हापूरचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर स्वामी (इ.स. 1903 मध्ये शंकराचार्यांनी महाड मुक्कामी काढलेले उद्गार) (1)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने करून त्यांचा क्षत्रियकुलावतंस असा जयजयकार करणा-या गागाभट्टाला त्याच्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्यास शौचकूपात पडून मृत्यू पत्करावा लागला."&lt;/em&gt;&lt;br /&gt;- प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर, करवीर ब्रह्मवृंदाचे तत्कालिन नेते. (ग्रंथमाला मासिकातील वेदोक्तप्रकरणावरील लेखातील विचार.) (2) &lt;br /&gt;&lt;br /&gt;विसाव्या शतकाच्या प्रारंभी करवीर संस्थानात वेदोक्त प्रकरणावरून वातावरण किती विषारी झाले होते, हे या दोन वाक्यांवरून लक्षात यावे. महाराष्ट्राच्या पुढील स‌र्व स‌माजकारणावर मोठा परिणाम घडवून आणणा-या या प्रकरणात अटीतटीला आलेली, एकमेकांविरोधात उभी ठाकलेली माणसे कोणी सामान्य नव्हती. शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारखे दिग्गज नेते तर या वादात एकमेकांविरोधात वाक्-शस्त्रे परजून होतेच, पण कोल्हापूर संस्थान व पुण्यातील ब्रह्मवृंदाची तसेच स‌त्यशोधक विचारसरणीची थोर नेतेमंडळीही त्यात होती. या प्रकरणाचा शेवट अखेर शाहू छत्रपतींच्या विजयाने झाला. विजय त्यांचा झाला, पण त्या संघर्षात महाराष्ट्रपुरुषाच्या काळजावर ज्या जखमा झाल्या त्या अजूनही पुरत्या भरलेल्या नाहीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एका सामान्य, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उर्मटपणातून सुरू झालेले हे प्रकरण. पण त्याची मुळं जातात ते थेट शिवकालापर्यंत, शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत की नाहीत या वादापर्यंत. गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. पण त्याने तो वाद काही मिटला नाही. मराठी राजसत्ता लयास गेल्यावर अव्वल आंग्लाईत सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत स‌न 1832 मध्ये हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला गेला होता. प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या वेदशालेत ब्राह्मण पक्ष आणि क्षत्रिय पक्षाची धर्मपरिषद घेतली. ब्राह्मण पक्षाला सांगलीच्या पटवर्धनांचा पाठिंबा होता. क्षत्रियांची बाजू आबा पारसनीस या कायस्थ प्रभू पंडिताने मांडली होती. त्या वादविवादात अखेर क्षत्रियांचाच विजय झाला व भोसले, घाटगे, जाधव, शिर्के इ. मराठा घराणी क्षत्रिय असल्याचे सिद्ध झाले. यानंतर असाच प्रसंग बडोद्यात घडला. ऑक्टो. 1896 मध्ये स‌याजीराव महाराजांना त्यांच्या पुरोहिताने सुनावले, की ते शूद्र आहेत व वेदोक्ताचा अधिकार त्यांना नाही. (3)&lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे ही वेदोक्ताच्या अधिकाराची भानगड स‌मजून घेतली पाहिजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वेद हे आपल्या महान हिंदुधर्माचे आधारस्तंभ आहेत. ती ईश्वरी वाणी आहे. आपल्या थोरथोर ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. तेव्हा ती दैवीवाणीच. आणि म्हणून ती ऎकण्याची, म्हणण्याची मुभा फक्त द्विजांना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे द्विज म्हणजे काय, तर ज्यांचा दुसरा जन्म झाला आहे असे. दुसरा जन्म केव्हा होतो, तर मौंजीबंधनानंतर. हा मुंज करण्याचा अधिकार कोणाला तर फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना. म्हणून हे तीन वर्ण झाले द्विज. उरलेल्या शूद्रांना वेदश्रवणाचाही अधिकार नाही. कारण शूद्र जातीतील व्यक्ती हे हिंडते फिरते स्मशान असल्याने त्याच्याजवळ बसून वेदाध्ययन करण्यासही मनाई. शूद्र वेदश्रवण करू लागला तर त्याच्या कानात शिसे व लाख ही पातळ करून ओतावी, अशी शिक्षा तर स्मृतींनीच सांगितलेली. (4) हे प्रकरण एवढे कडक, की शंबूक नावाचा शूद्र वेदाध्ययन करत होता व त्याच्या या पापाचरणामुळे रामराज्यातील ब्राह्मणाचा पूत्र अकाली मरण पावला, हे स‌मजल्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्राने त्या शंबुकाचे मस्तक धडावेगळे केले. रावणवधाइतकाच हा शंबूकवधही महत्त्वाचा! &lt;br /&gt;&lt;br /&gt;बरे ही झाली खूप पूर्वीची गोष्ट. तेव्हा क्षत्रिय, वैश्य यांनाही वेदश्रवणाचा अधिकार होता. पण पुढे नंद घराण्याचा अंत झाला आणि त्याबरोबर समस्त पृथ्वीवरील क्षत्रियकुल संपले. आपल्या पवित्र पुराणांनी ही गोष्ट उच्चरवाने सांगितली आहे, की कलियुगात वैश्यांसह क्षत्रियांचा अभाव असेल. (5) &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता कलियुगात क्षत्रिय, वैश्य नाहीत, असा जाहीरनामा पुराणे व व्रात्यनिर्णय यांसारख्या ग्रंथांनी काढल्यामुळे शिवछत्रपतींनाही स‌नातनी भटभिक्षुक शूद्च स‌मजत असत. फार काय खुद्द गागाभट्टही शिवाजी महाराजांना शूद्रच स‌मजत होते... (क्रमशः)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;1. राजर्षि विशेषांक (रविवार दिनांक), पृ. 10&lt;br /&gt;2. उक्त, पृ. 11&lt;br /&gt;3. उक्त, पृ. 9&lt;br /&gt;4. शाहू छत्रपती आणि लोकमान्य, पृ. 42-43&lt;br /&gt;5. उक्त, पृ. 42&lt;br /&gt;&lt;br /&gt;- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 1986&lt;br /&gt;- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा स‌ंघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-9219266327161545098?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/L9pEGg-lYk4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/L9pEGg-lYk4/1.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">6</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/1.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-8132084435933227887</guid><pubDate>Mon, 07 Apr 2008 08:20:00 +0000</pubDate><atom:updated>2008-04-07T06:38:28.119-07:00</atom:updated><title>येशू ख्रिस्ताचे धर्मशिक्षण हिंदुस्थानात झाले होते?</title><description>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_nf-sgPqOI/AAAAAAAAAHg/v8fKvJG5HbY/s1600-h/jesus_meditating_forest.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_nf-sgPqOI/AAAAAAAAAHg/v8fKvJG5HbY/s320/jesus_meditating_forest.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5186422714085124322" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;येशू ख्रिस्ताचा जन्म फिलीस्तीनमधील नाझरेथ या शहरात झाला. त्याच्या जन्मसालाची एक गंमतच आहे. म्हणजे असे मानले जाते, की ख्रिस्ती स‌न सुरू होण्यापूर्वी दोन-तीन  वर्षे आधी (2-3 बी.सी.) त्याचा जन्म झाला! या काळात फिलीस्तीनवर रोमन स‌म्राट सीझरची सार्वभौम स‌त्ता होती आणि तेथे हेरोद राजा रोमन स‌म्राटाचा मांडलिक म्हणून राज्य करीत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;येशू लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचा असल्याचे उल्लेख शुभवार्तेत येतात. जॉन द बाप्टिस्ट हा त्याचा मावसभाऊ. त्याच्याकडूनच येशूने पुढे दीक्षा घेतली. त्यानंतर येशू तडक पहाडात गेला. चाळीस दिवस तेथे त्याने तप केले. त्यातून तावून-सुलाखून निघून तो खाली उतरला आणि मग कौफरनाम या ग्यालीली प्रांतातील शहरात आला. तेथे त्याने आपले पहिले प्रवचन दिले. त्यावेळी तो 26-27 वर्षांचा होता. बायबलमध्ये ही माहिती येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे बायबल म्हणजे नेमके काय हे पाहायला हवे. बायबल या शब्दाचे मूळ ग्रीक बिब्लियन (biblion) असे आहे. त्याचा अर्थ ग्रंथ. बायबलचे दोन भाग आहेत. एक जुना टेस्टामेन्ट आणि दुसरा नवा टेस्टामेन्ट. टेस्टामेन्ट म्हणजे साक्षपुरावा. जुना टेस्टामेन्ट हा ज्यूंचा धर्मग्रंथ आहे. त्यात त्यांचे धर्मशास्त्र, प्रेषित आणि ग्रंथ यांची माहिती आहे. नव्या टेस्टामेन्टमध्ये येशूचे चरित्र आहे. त्याचे 27 भाग आहेत. पहिल्या चार भागांना इंग्रजीत गॉस्पेल (शुभवार्ता) म्हणतात. त्यात येशूचे जीवन सांगितले आहे. हे चार भाग असे - म्याथ्यूची शुभवार्ता, मार्कची शुभवार्ता, ल्यूकची शुभवार्ता आणि जॉनची शुभवार्ता. यातील म्याथ्यू हा येशूच्या प्रत्यक्ष संबंधात आला होता असे म्हणतात. मात्र इतिहासकारांच्या मते म्याथ्यूची शुभवार्ता ख्रिस्तानंतर 70च्या पुढे लिहिली गेली असावी, असे म्हणतात. एकंदर हे चारही शुभवार्ताकार भक्त-संत येशूच्या नंतर 60 ते 100 वर्षांच्या काळात झालेले आहेत. त्यांनी येशूचे शिष्य वा अनुशिष्य यांच्या तोंडून ऎकलेल्या कथा आपापल्या शुभवार्तेत सांगितल्या. हा स‌र्व भाग मुळात ग्रीकमध्ये आहे. आजचे इंग्रजी बायबल हे इंग्लंडच्या पहिल्या जेम्स राजाने इ. स. 1611 मध्ये करून घेतलेले भाषांतर आहे. तेच अधिकृत म्हणून प्रचलित आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर या शुभवार्तांमध्ये येशूचे बालपण ते मृत्यू व त्याचे पुन्हा जिवंत होणे वगैरे हकिकती येतात. असे असले, तरी रशियन संशोधक &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Nicolas_Notovitch"&gt;निकोलाय नातोविच &lt;/a&gt;यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत येशू कोठे होता याचा खुलासा काही होत नाही. एवढेच नव्हे तर मृत्युनंतर तिस-या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला. पण त्यानंतर काय? त्यानंतर त्याचे काय झाले? तो कोठे गेला? या प्रश्नांची उत्तरेही सापडत नाहीत. नातोविच यांनी इ. स. 1890मध्ये &lt;a href="http://www.forgottenbooks.org/info/319.php"&gt;'द अननोन लाइफ ऑफ जीजस ख्राईस्ट'&lt;/a&gt; हे पुस्तक लिहिले. त्यावर पोपने तत्काळ बंदी घातली. तर या पुस्तकानुसार "तिस-या शतकापर्यंतच्या ऎतिहासिक नोंदींमध्ये येशूचा उल्लेखच येत नाही. येशूला सुळावर दिल्यानंतर सुमारे 80 वर्षांनंतर रोमन इतिहासकारांनी आपल्या बखरींत ख्रिश्चन सेक्टचा उल्लेख केलेला आहे. पण त्यात जीजस ख्राईस्ट या व्यक्तीचा नामोल्लेख नाही. इ. स. 98 मध्ये जोसेफ फ्लेव्हियस या ज्यू इतिहासकाराने 'ज्युईश अँटिक्विटीज' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात तत्कालिन ज्ञात इतिहास शक्य त्या विस्ताराने दिला आहे. नीरो या रोमन स‌म्राटाच्या कारकीर्दीचे वर्णन त्यात आहे. जॉन द बाप्टिस्ट, हेरोद (अँटिपस) आणि (रोमच्या बादशहाचा प्रतिनिधी पाँटिअस) पायलेट यांचे वर्णन आहे. तत्कालिन स‌माजजीवनाचेही वर्णन आहे. पण त्यात जीजस किंवा इसाचे नाव येत नाही. येशूने केलेल चमत्कार व येशू पुन्हा जिवंत झाला याचा निर्वाळा रोमन इतिहासकार जोसेफस याने दिला, असा उल्लेख प्रथम तिस-या शतकात एका रोमन इतिहासकाराने केला आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नातोविच विचारतात, या अनुल्लेखामागचे रहस्य काय? वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत इसा कोठे होता? या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ते 1867मध्ये काश्मीरमध्ये आले. तेथून ते लेहला गेले व &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Hemis_Monastery"&gt;हेमिस&lt;/a&gt; या बुद्धमठात असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्या हस्तलिखितांमध्ये काय लिहिलेले होते? &lt;br /&gt;&lt;br /&gt;इस्त्रायलमध्ये जन्माला आलेला इसा हा यशोदा पुत्र कृष्ण या हिंदू अवतारमालिकेतील नवा अवतार असून, तो बुद्धानंतरचा युरोपातील अवलोकितेश्वर म्हणून ओळखला जाईल, अशी भाकिते त्या जुन्या पोथ्यांमध्ये होती!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर 19व्या शतकात &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Levi_H._Dowling"&gt;लेव्ही डाऊलिंग &lt;/a&gt;यांचे &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/The_Aquarian_Gospel_of_Jesus_the_Christ"&gt;'The Aquarion Gospel'&lt;/a&gt;  नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी नातोविच यांच्या 'संशोधना'स पुष्टीच दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बारा ते एकोणिस वर्षांपर्यंत येशू हिंदुस्थानात होता! &lt;br /&gt;&lt;br /&gt;या पुस्तकात डाऊलिंग यांनी म्हटले आहे, की  "ओरिसाच्या एका राजपुत्राने एका देवळात बारा वर्षांच्या मुलास पाहिले. तो बुद्धिवान आहे असे दिसले व त्यास घरी आणून शिक्षण दिले. जगन्नाथाच्या भव्य देवालयात त्याला विद्यार्थी म्हणून स्वीकृत करण्यात आले. वेदांचा व मनूच्या धर्मशास्त्राचा प्राथमिक अभ्यास करण्याची संधी त्याला येथे मिळाली. येथे गुरुजनांशी वाद करताना त्याने बुद्धिवाद केल्यामुळे त्याला ब्राह्मणवर्गाचा रोषही पत्करावा लागला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.sacred-texts.com/chr/uljc/index.htm"&gt;यात कितपत तथ्य आहे?&lt;/a&gt; माहित नाही. &lt;br /&gt;पण येशूचे हिंदुत्व सांगण्यासाठी या पुस्तकांचा वापर करण्यात येतो. &lt;br /&gt;हा लेखही ज्या लेखावरून बेतला त्याचे नाव आहे 'येशूच्या हिंदुत्वाचा एक आगळा शोध' व तो प्रसिद्ध झाला होता 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये! &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूण गंमत आहे, इतकेच! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;संदर्भ -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;- येशूच्या हिंदुत्वाचा एक आगळा शोध ! - वसंत गडकर, दै. सामना, 25 डिसेंबर 1994.&lt;br /&gt;- मानवाचा पुत्र येशू - भाऊ धर्माधिकारी, ग्रंथाली प्रकाशन, पहिली आवृत्ती, 1983. &lt;br /&gt;- &lt;a href="http://www.goacom.org/overseas-digest/Religion/jesus-in-kashmir.htm"&gt;येशू काश्मीरमध्ये आला होता?&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-8132084435933227887?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/f_6Q9un-_-g" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/f_6Q9un-_-g/blog-post_07.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_nf-sgPqOI/AAAAAAAAAHg/v8fKvJG5HbY/s72-c/jesus_meditating_forest.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">4</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/blog-post_07.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-8304803271798244409</guid><pubDate>Thu, 03 Apr 2008 15:16:00 +0000</pubDate><atom:updated>2008-04-04T23:18:36.777-07:00</atom:updated><title>टिळक-आगरकरांची वृत्तपत्रीय परंपरा - दुसरी बाजू</title><description>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_T658gPqNI/AAAAAAAAAHY/nMu819MB53w/s1600-h/Agarkar.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;" src="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_T658gPqNI/AAAAAAAAAHY/nMu819MB53w/s320/Agarkar.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5185044944411142354" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_T6y8gPqMI/AAAAAAAAAHQ/CGi5zECfS1Q/s1600-h/Tilak.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;" src="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_T6y8gPqMI/AAAAAAAAAHQ/CGi5zECfS1Q/s320/Tilak.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5185044824152058050" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी "केसरी-मराठा'तून, तसेच नंतर आगरकरांनी स्वतंत्रपणे "सुधारक'मधून केलेली पत्रकारिता हा आजही आदर्श मानली जाते. ती आदर्श आहेच, यात शंकाच नाही. मात्र त्यांची पत्रकारिताही निष्कलंक नव्हती! रा. के. लेले यांनी आपल्या इतिहासग्रंथात हे स्पष्टपणे नोंदविण्याचे धैर्य दाखविले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्या पुस्तकातील हा उतारा टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेची दुसरी बाजू लख्ख प्रकाशात आणतो. - &lt;br /&gt;""1893 च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत हिंद-मुसलमानांचा भयंकर दंगा झाला. हिंदुंनी चालविलेल्या गोरक्षणासारख्या चळवळीमुळे दोन्ही जमातींत वैमनस्य निर्माण होते व त्याची परिणती जातीय दंगलीत होते, असे मत ऍक्‍स्वर्थ व व्हिन्सेंट यांच्यासारखे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व "टाइम्स ऑफ इंडिया' सारखे अँग्लो-इंडियन वर्तमानपत्र सतत मांडीत होते.... अशा स्थितीत "आपले मत काय आहे ते स्पष्टपणे सरकारला वेळीच कळविले पाहिजे' असे वाटल्यामुळे टिळक व माधवराव नामजोशी यांनी पुढाकार घेऊन 10 सप्टेंबर 1893 रोजी शनिवारवाड्यापुढे हिंदूंची एक जंगी सभा भरवली. ही सभा भरवू नये म्हणून न्या. मू. रानडे यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले. त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी साथ दिली. आगरकरांनी टिळकांविरुद्ध रानडे-गोखल्यांची बाजू उचलून धरली. पण टिळकांनी विरोध बाजूला सारून सभा भरविलीच. सभा झाल्यानंतर "ज्ञानप्रकाश' पत्राने 14 सप्टेंबरच्या अंकात "तीन खोट्या गोष्टी' लिहिल्या. त्यातून वाद पेटला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;18 सप्टेंबरच्या "सुधारका'च्या अंकात आगरकर वादात उतरले. "हिंदूंच्या जंगी सभेने कोणता दिग्विजय लावला?' या मथळ्याचे संपादकीय लिहून आगरकरांनी टिळकांवर हल्ला चढवला. "ज्यांच्या मेंदूस धनुर्वात किंवा अर्धांगवायू झाला नाही; ज्यांचे भाषण, लेखन व आचरण पाहिले असता विधात्याने सर्व शहाणपण एकत्र करून त्याचे हे मूर्तिमंत पुतळे ओतले आहेत की काय, असा भास होतो; ज्यांचा शब्ददुंदुभी वाजू लागला की सारा समाज ते सांगतील तसे नाचण्यास सज्ज होतो; सारांश, ज्यांना या महाराष्ट्रभूमीचे अनभिषिक्त राजे म्हणण्यास हरकत नाही त्यांनी स्वल्प अडचण दिसल्याबरोबर ग्रामसिंहाप्रमाणे शेपटी खाली घालावी, आपल्या शीलास अगदी उलट वर्तन करावे ही केवढी शरमेची गोष्ट आहे बरे! ज्यांचा संसर्ग लोकास महारोग्याच्या संसर्गाप्रमाणे वाटू लागला आहे त्यांनी त्याशी फिरून सलगी व जे जात्या खुनशी, घमेंडखोर व अत्यंत नीच आहेत, त्यांनी वंद्य सज्जनावर निष्कारण तुटून पडण्याचा व त्यावर भलतेच आरोप आणण्याचा अधमपणाचा प्रयत्न करू नये तर केव्हा करावा?' अशा प्रकारची टीका व विशेषतः आगरकरांनी केलेला अपशब्दांचा वर्षाव यामुळे टिळक अगदी प्रक्षुब्ध होऊन गेले. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या सर्वांचा सणसणीत समाचार घेतला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अधीर तरतरीचे व अविचारी अतएव परप्रत्ययनेय बुद्धीचे तरुण सेक्रेटरी,' असा टोला गोखल्यांना टिळकांनी मारला. पण आगरकरांवर मात्र ते तुटून पडले, त्यांनी लिहिले, "स्वतः करवत नाही व दुसऱ्याने केलेले पाहवत नाही अशा मनुष्यास गवताच्या गंजीवरील कुत्र्याची उपमा देत असतात. चतुःशृंगीच्या मैदानावरील गंजी जळल्यामुळे अगर दुसऱ्या काही कारणामुळे आमच्या येथील अशा प्रकारचा एक गंजीवरील कुत्रा अगदी पिसाळला आहे व ज्याच्या त्याच्यावर तोंड टाकण्याखेरीज त्यास दुसरा मार्ग काहीच दिसत नाही. सभेचे हेतू, उद्देश आणि ठराव हे या लेखकास मान्य आहेत, असे त्याच्या पहिल्या लेकावरून सिद्ध होते, मग आमच्या सभेच्या चालकास व्यर्थ शिव्या देण्याचा हेतू एम. ए. झालेल्या मनुष्याचा मेंदू किती सडका असतो हे दाखविण्यापेक्षा दुसरा काही एक नव्हता, असे म्हणावे लागते... सुधारकांच्या अग्रणीचे राजकीय बाबतीत अनुकरण न केले तर आमच्यावर मोठा प्रसंग गुजरेल असे गावाबाहेर महारोग्याप्रमाणे राहणाऱ्या या सुधारकाच्या पितमाह एडिटरास वाटत आहे... सभेचे उद्देश व ठराव काय आहेत याची पूर्ण माहिती झाली असताही पुन्हा खोट्यानाट्या गोष्टी लिहून आपल्या व्यवसायबंधूबद्दल सरकारचे मन कलुषित करणे यापेक्षा जास्त नीचतेचा किंवा अधमपणाचा प्रकार मनुष्य अशी संज्ञा धारण करणाऱ्याकडून घडेल असे आम्हा वाटत नाही... गवताच्या गंजीजवळ राहून हे राजेश्री गवत खात नाहीत हे भर्तुहरी म्हणतात त्याप्रमाणे पशूंचे भाग्य समजावयाचे!' (केसरी, 19 सप्टेंबर 1893) &lt;br /&gt;&lt;br /&gt;टिळक आगरकर यांची आणखी एका प्रसंगाने अशीच झटापट होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाण्याचा प्रसंग आला होता.... ''&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे प्रसंग सांगून लेले लिहितात, ""टिळक व आगरकर यांच्यामधील वाग्‌युद्धाचा हा इतिहास उद्वेगजनक आहे. समाजसेवेचे कंकण बांधून पत्रव्यवसाय करणाऱ्या या दोन थोर संपादकांनी एकदा वादाला तोंड फुटल्यावर तारतम्य न ठेवता एकमेकांवर हवी तशी चिखलफेक केली.... टिळक-आगरकरांतील वाद आता ऐतिहासिक बाब झाली असली तरी वैयक्तिक टीकेची अनिष्ट परंपरा पुष्ट करण्यास या दोघा मातबर संपादकांनी हातभार लावला ही गोष्ट नाकारता येणार नाही.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;"केसरी' व "सुधारक' या दोन्ही पत्रांमधील अशा मजकूरामुळे त्यांच्यावर तत्कालीन वाचकांनी, अन्य संपादकांनी टीका केली होती. "अरुणोदय' या पत्राने आधी एका प्रसंगी टीका केली होती, ती अशी - &lt;br /&gt;दोघेही "विचारशून्य, ज्ञानशून्य व हलकट' ""... मंगळवारची सिंव्हगर्जना ऐकावी अशी उत्सुकता होऊन व सिंव्ह हा राजा असल्यामुळे आपल्या थोर स्वभावावर जाईल असे वाटले होते पण तोही बिचारा विकारवशतेच्या पिंजऱ्यात सापडून कोल्ह्यासारखी कोल्हेकुई करू लागला हे वाचल्याबरोबर मात्र अतिशय वाईट वाटले.... गेल्या सुधारकात तुळशीबागेतील 5000 लोकांस "विचारशून्य', "ज्ञानशून्य' व "हलकट' असे म्हणण्यात आले आहे व गेल्या केसरीत राव. ब. रानडे प्रभृती मंडळीस अशा प्रकारच्या पण किंचित सभ्य अशा शिव्या देण्यात आल्या आहेत.'' (अरूणोदय, 2 नोवहेंबर 1890)&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर वेगळी मल्लीनाथी करण्याची काही आवश्‍यकता आहे काय? पुढे अनेक पत्रांनी टिळक-आगरकरांचा हा वारसा नेटाने चालविला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1984, पृ. 331 ते 334.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-8304803271798244409?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/ZQSNLUZ3VUg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/ZQSNLUZ3VUg/blog-post_03.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_T658gPqNI/AAAAAAAAAHY/nMu819MB53w/s72-c/Agarkar.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/blog-post_03.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-8272146310477706760</guid><pubDate>Thu, 03 Apr 2008 07:36:00 +0000</pubDate><atom:updated>2008-04-03T01:10:45.148-07:00</atom:updated><title>तुकारामांची गुरूपरंपरा सुफी मुस्लिम?</title><description>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_SPtsgPqLI/AAAAAAAAAHI/LuPXejWg3s0/s1600-h/Tukaram.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_SPtsgPqLI/AAAAAAAAAHI/LuPXejWg3s0/s320/Tukaram.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5184927086213572786" /&gt;&lt;/a&gt;क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों स‌ब जग ही भुला ।।1।।&lt;br /&gt;खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ।।धृ.।।&lt;br /&gt;काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऎसी लोक बिराणी ।।2।।&lt;br /&gt;गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ।।3।।&lt;br /&gt;(तुकाराम गाथा - देहू प्रत,  पृ. 260, अभंग 1146)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी सारस्वताला ललामभूत अशा &lt;a href="http://www.tukaram.com/"&gt;तुकोबारायां&lt;/a&gt;चे असे काही हिंदी अभंग पाहिले, की नाही म्हटले तरी आश्चर्य वाटतेच! तुकोबांनी हे हिंदी अभंग का आणि कुणासाठी रचले असावेत असा एक प्रश्न स‌हजच मनात येतो. तुकोबांचे गाव देहू. त्यांच्या काळात तो विजापूरच्या आदिलशाहीचा भाग होता. तुकोबांचे घराणे महाजनांचे. तेव्हा आदिलशाहीतील अधिका-यांशी त्यांचे या ना त्या कारणाने संबंध येतच असणार. मुद्दा असा की ही दखनी बोली काही त्यांना परकी नव्हती. कदाचित त्यांनी अगदी स‌हजच त्या बोलीत काही पदं रचली असतील. हा आपला एक अंदाज. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण जेव्हा तुकोबांच्या गुरूपरंपरेचे नाते मुस्लिम सुफी संप्रदायाशी असल्याचे सांगितले जाते, तेव्हा मग वाटते, की तुकोबांच्या दखनी काव्यात आश्चर्य करावे असे काहीच नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आता अविश्वसनिय वाटावी अशी वेगळीच गोष्ट स‌मोर येते. तुकोबांच्या गुरुपरंपरेचे नाते सुफी या मुस्लिम संप्रदायाशी? &lt;br /&gt;हे म्हणजे काहीच्या काही होतेय! &lt;br /&gt;तुकोबांचे गुरु तर बाबाजी चैतन्य. त्यांच्या अभंगाचीच तशी साक्ष आहे.&lt;br /&gt;ते म्हणतात - &lt;br /&gt;&lt;br /&gt;सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा काहीं ।।&lt;br /&gt;सांपडविले वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।।धृ।।&lt;br /&gt;भोजना माहती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ।।2।।&lt;br /&gt;कांही कळहे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ।।3।।&lt;br /&gt;राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ।।4।।&lt;br /&gt;बाबाजी आपलें सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ।।5।।&lt;br /&gt;माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्णणे ।।6।।&lt;br /&gt;(तुकाराम गाथा - देहू प्रत,  पृ. 80, अभंग 368)&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण तरीही तुकारामांची गुरुपरंपरा सुफी असल्याचेही एक मत मांडले जाते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या नाहीसे होण्याबद्दल बोलताना, त्यांनी आपल्या सुफी गुरुपरंपरेनुसार जीवंत स‌माधी घेतली असावी असाही एक तर्क मांडला जातो.   &lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील अभंगावरून असे दिसते, की &lt;a href="http://www.hindujagruti.org/hinduism/knowledge/article/what-is-the-significance-of-chanting-shri-gurudev-datta.html#63"&gt;राघवचैतन्य&lt;/a&gt;, केशवचैतन्य आणि बाबाजीचैतन्य अशी तुकोबांची गुरुपरंपरा आहे. म्हणजे राघवचैतन्य हे तुकोबांचे आजेगुरू, कैशवचैतन्य हे त्यांचे शिष्य आणि बाबाजी दीक्षित हे त्यांचे शिष्य अशी ही मालिका आहे. रा. रा. भालचंद्र नेमाडे यांनी तुकाराम गाथेतील निवडक अभंगांचे संपादन केले आहे. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी ही मालिका नोंदली आहे. पण श्री निरंजन स्वामीकृत 'चैतन्य विजय' हा ग्रंथ काही वेगळीच माहिती देतो. श्री निरंजन स्वामी तथा ह. भ. प. निरंजनबाबा नाशिककर यांचा हा ग्रंथ शके 1709चा. (इ. स. 1788) हा ग्रंथ बाबाजीचैतन्य आणि केशवचैतन्य हे एकच असल्याचे सांगतो. (स‌र्वजन म्हणती केशव चैतन्य । भाविक म्हणती बाबाचैतन्य । दोन्ही नामें एकची जाण । अत्यादरें बोलती ।। - अध्याय 3, ओवी 114) या ग्रंथाच्या प्रास्ताविकात अनंत श्रीधर भवाळकर ऊर्फ चैतन्यदास यांनी हेच मत दिले आहे. ते म्हणतात, "(तुकारामांच्या) अभंगात मालिकेची हा शब्द आहे. ही मालिका त्रयीची असते. राघवचैतन्य हे आपले गुरु श्रीमत् व्यास यांची परंपरा सांगतात व त्यांचे शिष्य केशवचैतन्य होत. त्यादृष्टीने ही त्रयीची मालिका बरोबर जुळते. इतिहाससंशोधक या मालिकेच्या संबंधात मुग्ध आहेत." (या ठिकाणी चैतन्यदास यांचा रोख वा. सी. बेंद्रे यांच्याकडे असावा. त्यांनी तुकोबांचे चरित्र लिहिले असून, तुकारामांच्या गुरुपरंपरेचा इतिहासही कथन केला आहे.) गंमत म्हणजे याच ग्रंथातील 37 व्या पानावरील एका तळटीपेत राघव, केशव व बाबाजी चैतन्य हे वेगळे असल्याचे नमूद केले आहे! तर ते असो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुद्दा असा, की जर तुकारामच बाबाजीचैतन्य हे आपले गुरू असल्याचे सांगत असतील व राघवचैतन्य हे त्यांचे परात्पर गुरु असतील, तर मग ही सुफी परंपरा कोठून आली?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पाहण्यापूर्वी राघवचैतन्य व केशवचैतन्य यांचे चरित्र जाणून घ्यावे लागेल. राघवचैतन्य हे तंत्रमार्गी होते. त्यांनी महागणपती आणि ज्वालामुखी देवी यांची तांत्रिक स्तोत्रे रचली आहेत. त्यांचा काळ इ. स. 1500 च्या सुमाराचा. 'चैतन्य विजय'नुसार त्यांची वस्ती काही काळ ओतूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे मांडवी-पुष्पावतीच्या तीरी होती. तेथे ते गुप्तपणे राहात होते. तेथेच त्यांना विश्वनाथबाबा हा ब्राह्मण गृहस्थ भेटला. यांचा जन्म पुणें वाडीचा. त्याच्यावर राघवचैतन्य यांनी अनुग्रह केला व त्याचे नाव केशवचैतन्य असे ठेवले. त्यांनी उत्तरखंडातील स‌र्व तीर्थांची यात्रा केली व बारा वर्षांनी ते कर्नाटकातील गुलबर्ग्यास आले. तेथून जवळच, 16 मैल अंतरावर असलेल्या आळंद (आळंद-गुंजोटी) येथे त्यांनी बराच काळ निवास केला. तेथेच आनंदीदेवीच्या मंदिरात राघवचैतन्य यांनी महासमाधी घेतली. 'चैतन्य विजय'नुसार कलबुरगे येथे राघवचैतन्य यांनी मशीद उडविण्याचा चमत्कार केला. तो पाहून निजामशहा बादशहा अचंबित झाला व राघवचैतन्य यांची भक्ती करू लागला. त्याच्या आग्रहावरून राघवचैतन्य हे आळंद गुंजोटी येथे राहिले व तेथेच त्यांनी स‌माधी घेतली आणि आपले शिष्य केशवचैतन्य यांना त्यांनी ओतूरला पाठवून दिले. तर ही स‌माधी राघवदराज म्हणून ओळखली जाते. चैतन्यविजय सांगतो, की हे नाव यवनांनी ठेविले. ब्राह्मणांनी मात्र त्यांना राघवचैतन्य असेच म्हणावे. या स‌माधीच्या "एकभागी पूजा करिती ब्राह्मण । एकभागी पूजा करिती यवन । अद्यापि तेथील महिमान । चालले असे यापरी ।। " (अध्याय 3, ओवी 96) &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर ही राघवचैतन्यांची स‌माधी लाडले मशायख या नावाने ओळखली जाते. आणि त्यांचे शिष्य केशवचैतन्य हे गेसू दराज बंदेनवाज व बाबाजीचैतन्य शेखसाहेब या नावाने ओळखले जातात. (चैतन्यविजय, पा. 37)&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते मुळात राघवचैतन्य यांचे चरित्रांतर नंतर झालेले आहे. "त्यांनी स‌माधी घेतल्यानंतर लौकरच, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमान आक्रमकांनी या स्थानाचा (म्हणजे आळंदचा) कब्जा मिळविला, इथली मंदिरे उद्ध्वस्त केली, राघवचैतन्यांच्या स‌माधीचे रूपांतर एका काल्पनिक सूफी अवलियाच्या स्मारकात केले, त्या काल्पनिक स‌ूफी अवलियाचे चरित्र लाडले मशायख या नावाने रचले," असे रा. रा. बेंद्रे यांचे प्रतिपादन आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Khwaja_Bande_Nawaz"&gt;गेसू दराज&lt;/a&gt; आणि शेखसाहेब ऊर्फ ख्वाजा शेखसाहेब यांच्याबद्दल एक वेगळी माहिती मिळते. "दक्षिणेत बहमनी राज्य स्थापन झाल्यानंतर निजामुद्दीन अवलिया यांच्या आज्ञेने सातशे सूफी दरवेशी दिल्लीहून धर्मप्रचारार्थ निघाले होते. त्यात ख्वाजा शेख, बंदेनवाज, सैयद मीर गेसू दराज हे प्रमुख होते. ते बहमनी सुलतानाची राजधानी गुलबर्गा येथे स्थायिक झाले. (स‌ैयद मीर गेसू दराज हे) बहामनी सुलतानाचे राजगुरू होते... त्यांचा मृत्यू गुलबर्ग्यात इ. स. 1422 मध्ये झाला." (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 29)   &lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु येथे महत्त्वाची ठरते ती एकच गोष्ट की, तुकारामांवर गुरुकृपा होण्यापूर्वीपासून कित्येक वर्षे आधी राघवचैतन्य यांचे चरित्र लाडले मशायख ऊर्फ शेख अलाउद्दीन अन्सारी लाडले या नावाने रचले गेलेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;---------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास पाहिजे, की सूफी साधू आणि हिंदू संत-सज्जन यांचे संबंध त्याकाळी अतिशय स‌लोख्याचे असल्याचे दाखले आहेत. उदाहरणार्थ जनार्दनस्वामी (1426, चाळीसगाव) यांना चांद बोधले या सूफी मलंगाने अनुग्रह केला होता, तर स्याहगढच्या सूफी साधुला मौला दत्त असे नाव आहे. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 38) फार काय, शेख लतीफ, शेख मुहम्मद यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहेच, पण सोळाव्या शतकात बहमनी राजघराण्यातील मुन्तोजी बहमनी या सुलतानाचे नावही वारकरी संतांच्या सूचीत आढळते. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 40) &lt;br /&gt;&lt;br /&gt;महानुभाव पंथाशीही सूफी संप्रदायाचे निकटचे संबंध होते. महानुभाव साधू मुस्लिम पिरांप्रमाणे काळी वस्त्रे परिधान करीत व स्वतःला स्याह फकीर म्हणवत असत. आपल्या श्री दत्त या आराध्य दैवताचे वर्णन मुस्लिम पद्धतीने करीत असत. (स्याहगड से मौला दत्त डुले वगैरे) (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 42)&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे ज्ञानोबांनी गीतेवरील टीका लिहून वैदिक धर्ममतास बळ दिले. त्यामुळे सूफी वा अन्य कोणतेही अवैदिक संप्रदाय वा पंथ महाराष्ट्रात फारसे रूजू शकले नाहीत. परंतु स‌माजजीवनावरील धर्मपंथ-संप्रदायांची असणारी छाप काही अशीच विरून जात नसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;--------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुकोबांचे परात्परगुरू जन्माने सूफी मुस्लिम होते की काय, हे खरे तर महत्त्वाचे नसतेच. त्यांचे एक चरित्र सूफी अवलियाचे आहे आणि त्यांच्या भक्तगणांत हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही आहेत, ही गोष्ट महत्त्वाची! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;- चैतन्य विजय - प्रकाशक - सुधाकर राजर्षि, ओतूर, आवृत्ती दुसरी, 1982.&lt;br /&gt;- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा - प्रकाशक विठोबा रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, दुसरी आवृत्ती, जाने. 2001.&lt;br /&gt;- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपादक - भालचंद्र नेमाडे, प्रकाशक - साहित्य अकादमी, पहिली आवृत्ती 2004.  &lt;br /&gt;- शिरडीचे श्री साईबाबा व सूफी पंथ - संपादक - डॉ. गुरूनाथ व्यंकटेश दिवेकर, शलाका प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती जुलै 1993&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-8272146310477706760?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/JOKY7bNRl9A" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/JOKY7bNRl9A/blog-post.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R_SPtsgPqLI/AAAAAAAAAHI/LuPXejWg3s0/s72-c/Tukaram.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">11</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/04/blog-post.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6684792308708399503</guid><pubDate>Mon, 31 Mar 2008 16:32:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-31T09:49:46.743-07:00</atom:updated><title>मराठेशाहीतील मद्यपानविषयक धोरण</title><description>मराठी राज्यात जे लोक दारू करून विकत असत त्यांना कलाल म्हणत. खाटीक किंवा तत्सम लोक दारूच्या भट्ट्या लावीत, दारू बनवित व कलाल तिची विक्री करी. हे दारूविक्रीचे काम सरकारी परवान्यानेच होत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवकालात द्राक्षाची किंवा मोहाची दारू पीत असत. पण दारूची दुकाने तुरळक होती व त्यावर कोतवालाची व इतर सरकारी अधिकाऱ्यांची करडी नजर असे. गावात अगर चार गावाकरिता एक असे गावाबाहेर कलालाचे दुकान असे. कोणी व्यक्ती दारू पिऊन धुंद झालेली रस्त्यात किंवा वाड्यात दृष्टीस पडल्यास त्यास सरकार मोठे शासन करीत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राह्मण असत. त्यांनी मराठी राज्यात दारू पिण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, पिणाऱ्यास जबर दंडाची व फटक्‍याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते. सैनिकांवर शराबी पिण्याची बंदी होती. (आज्ञापत्र, विविध ज्ञान विस्तार माला 1923, पृ. 29)&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोरले माधवराव पेशवे यांनी न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या सांगण्यावरून दारूविषयी तपशीलवार नियम करून ठेविले होते. पेशव्यांचे सरदार व जहागिरदार यांनी आपल्या अंकित प्रदेशांतील शहरात दारू विकू नये, अशी अट सरंजाम देताना घालण्यात येई.... &lt;br /&gt;&lt;br /&gt;दारूच्या फुलाची भट्टी लावून फूल सरकारी कारखान्याचे कामास नेण्यास व दारूची भट्टी जेजुरीस चालविण्यास छाट वा खाटकास सरकारकडून इ. स. 1778 त परवाना जिलेला आढळतो. (भा. इ. सं. मं. जाने-जुलै 1950, ले. 11) सरकारात या दारूभट्टीची रक्कम जमा झालेली दिसते. (पेशवाईच्या सावलीत, चापेकर, पृ. 41) दारू पिण्याचा गुन्हा करणारे सापडल्यावर सरकारने दारूच्या भट्ट्या मना करण्यासाठी व कलालांना म्हणजे दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांस दारूविक्री बंद करण्याचे हुकूम काढले. ह्या हुकुमाची अंमलबजावणीही त्वरित करण्यात आली. त्यावेळेपासून सरकारच्या भीतीमुळे मराठी राज्यात दारू पिणे व त्यापासून उत्पन्न मिळविणे या बाबी बंद झाल्या....&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण पैसा मिळविण्याच्या लालसेने चोरून दारूचा साठा करून विकणे चालत असे. असे साठे व चोरटी दुकाने हुडकून काढण्यासाठी नाना फडणिसाने फिरस्ते प्यादे ठेवले होते. अशा एका पथकास 1776 त नारायण पेठेतील म्हातारी द्रविड ब्राह्मण हिच्या घरी दारूने भरलेले वीस-पंचवीस शिसे व त्याजबरोबर खाण्यासाठी शिजविलेले मांस सापडले. ते जप्त करून तिला शासन करण्यात आले. (पेशवे दप्तर 43, ले. 144)&lt;br /&gt;&lt;br /&gt;ैजे पेठ पारगाव, तालुका खेड सरकार जुन्नर येथील बाळाजी धोंडदेव कुळकर्णी हा ब्राह्मण कलावंतिणीसमागमे गमन, मांसभक्षण व सुरापान करण्यात अट्टल निघाला. त्यास पंक्तीबाह्य केले व पुण्यातील ब्रह्मवृंदांनी एकत्र येऊन पृथ्वीप्रदक्षिणा व तीर्थस्नाने असे प्रायश्‍चित्त सांगितले. (पे.द. भा. 40, ले. 144)&lt;br /&gt;&lt;br /&gt;पेशव्यांच्या कारकीर्दीत ब्राह्मणांनी दारू पिऊ नये असा शासनाचा दंडक होता. दारू पिणाऱ्या ब्राह्मणांना कैद करून किल्ल्यावर पाठवीत असत. नाशिक येथील ब्राह्मणवृंद मद्यपान करतात, त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे, हे वृत्त सवाई माधवराव पेशव्यांच्या कानी येताच त्यांनी सर्वोत्तम शंकर नावाच्या खास अधिकाऱ्यास नाशिकला याची चौकशी करण्यास पाठविले आणि आज्ञा दिली, की धर्माधिकारी यात सापडले त्यांचे धर्माधिकारीपण (वतन) जप्त करावे व सरसुभ्याचे हिशेबी जमा करावे. तसेच गुन्हेगार ब्राह्मणास अटक करून त्यांना पक्‍क्‍या बंदोबस्ताने घोडप, पटा व मुल्हेर या किल्ल्यांवर अटकेत ठेवण्यास पाठविणे. (सवाई माधवराव रोजनिशी, भा. 3(8), पृ. 120)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(हा स‌र्व मजकूर महाष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, (म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988) या पुस्तकातून घेतला आहे.)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6684792308708399503?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/oRlaPrXiPdM" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/oRlaPrXiPdM/blog-post_31.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_31.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6601543955298866860</guid><pubDate>Sat, 29 Mar 2008 20:12:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-30T08:41:03.638-07:00</atom:updated><title>तुकारामांनी शिवरायांना रामदासांकडे पाठविले हे खरे आहे काय?</title><description>समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संबंधांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा तेव्हा समर्थभक्तांकडून तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा दाखला दिला जातो. तसे शिव-स‌मर्थांची शके 1571 (स‌न 1650) पूर्वी भेट झाल्याचे अनेक पुरावे दिले जातात. पण त्यातही तुकारामांचा हा 15 ओव्यांचा अभंग महत्त्वाचा. कारण जेव्हा संतशिरोमणी तुकाराम महाराज शिवबांना समर्थांकडे 'मन लावा वेगी' असे सांगतात, तेव्हा त्यातून समर्थांच्या थोरवीवर आपसूकच शिक्कामोर्तब होत असते. शिवाय तुकाराम महाराजांचे निधन जानेवारी 1650 मध्ये झाले, याचा अर्थ त्यांनी रामदासांना शिवाजी महाराजांकडे पाठविले ते तत्पूर्वी. म्हणजे रामदास आणि शिवराय यांची भेट 1650 ला वा त्याआधी झाली हे सिद्धच झाले. तेव्हा हा अभंग महत्त्वाचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या अभंगातील पहिल्या तीन ओव्या अशा आहेत - &lt;br /&gt;&lt;br /&gt;"राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ।।1।।&lt;br /&gt;रामदास स्वामी सोयरा स‌ज्जन । त्यासी तनमन अर्पीबापा ।।2।।&lt;br /&gt;मारुती अवतार स्वामी प्रकटला । उपदेश केला तूज लागी ।।3।।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;या अभंगाविषयी बोलण्यापूर्वी तुकाराम महाराजांची जी अभंगवाणी आज उपलब्ध व प्रकाशित झालेली आहे, त्याविषयी माहिती घेणे योग्य ठरेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुकारामांचा जन्म देहू या लहानशा खेड्यात इ. स. 1608 मध्ये झाला. त्यांची आई कनकाई आणि वडिल वाल्होबा ऊर्फ बोल्होबा. त्यांचे आंबिले ऊर्फ मोरे घराणे मोठे प्रतिष्ठित होते. त्यांच्याकडे गावाची मानाची महाजनकी होती. जानेवारी 1650 मध्ये तुकारामांचा मृत्यू झाला. ते कसे गेले हे एक गूढच आहे. ते स‌देह वैकुंठाला गेले एथपासून त्यांचा खून झाला येथपर्यंत बरेच प्रवाद आहेत. आपल्या या 42 वर्षांच्या आयुष्यात तुकारामांनी किमान साडेचार हजार कविता केल्या! या कविता वह्यांमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या. त्या एवढ्या जहाल, एवढ्या मर्माघाती की तेव्हाच्या सनातनी ब्राह्मणवृंदाला त्या नष्ट करण्यातच आपले सौख्य सामावले आहे, असे वाटू लागले. तुकारामांना जलदिव्य करावे लागले ते यातून. तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित व कोरड्या वर आल्या असे समजल्यावर भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांची पाने लुटून नेल्याचे तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात. याचा अर्थ महाराजांनी जरी आपले अभंग स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले असले, तरी त्यांच्या हातची पूर्ण संहिता शिल्लक राहिलेली नाही. आज त्यांच्या हातचे स‌मजले जाणारे एकुलते एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मग प्रश्न निर्माण होतो, की तुकारामांचा गाथा सिद्ध झाला तो कसा?&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुकारामांच्या वह्यांची पाने लोकांनी प्रसाद म्हणून नेली, असे असले, तरी तुकारामांचे लेखक संताजी तेली जगनाडे आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी यांनी लिहून ठेवलेले दोन हजार अभंग होतेच. त्यातील संताजीच्या हातचे तेराशे अभंग पुढे वि. ल. भावे यांनी प्रकाशित केले. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. पण ही संपूर्ण जगनाडे संहिता पाहिली, तरी त्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग नाहीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराजांच्या वैकुंठगमनानंतर थोड्याच दिवसांनी कचेश्वर भट ब्रह्मे चाकणकर हे तुकारामांचे पुत्र नारायणबाबा यांना भेटले. कचेश्वर भट हे तुकोबांचा वेध लागलेले ब्राह्मण. तुकारामांचे अभंग लिहून घ्यायचे, ते पाठ करायचे आणि त्याआधारे कीर्तने करायची, असे ठरवून ते नारायणबाबांकडे खेडला गेले होते. काही अभंग लिहून द्या अशी विनंती त्यांनी नारायणबाबांना केली. त्यावर नारायणबाबांनी त्यांना सांगितले, की "अंबाजीचे घर । तेथे जावे । स‌र्वही संग्रह तुकोबाच्या वह्या । जावे लवलाह्या तुम्ही तेथे ।।" त्यानुसार कचेश्वर भट देहूला गेले. अंबाजी ऊर्फ आबाजी हे तुकारामांचे नातू, महादेवबाबांचे म्हणजे तुकारामांच्या थोरल्या मुलाचे चिरंजीव. त्यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून अभंग मिळविले. म्हणजे तुकारामांच्या वंशजांकडे अभंगांची संहिता होती. ती वंशपरंपरेने पुढे चालत आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे इंग्रज अमदानीत इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन स‌खाराम गाडगीळ यांनी गाथा छापायचे ठरविले. तत्कालीन डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स‌र अलेक्झांडर ग्रँट यांच्या शिफारशीवरून स‌रकारने त्यांना 24 हजार रूपये मंजूर केले. या गाथ्याच्या संपादनाची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णु परशुराम पंडित यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी संपादनासाठी देहू, तळेगाव व कडूस येथील प्रती वापरल्या. पंडितांनी तुकारामा महाराजांच्या तत्कालीन वंशजांकडून देहू हस्तलिखित नेले. ते महाराजांचे ज्येष्ठ पुत्र महादेवबाबा यांच्या हातचे असल्याचे संपादकांना सांगण्यात आले होते. पंडितांनी हे हस्तलिखित नेले पण नंतर ते देहूला परत आलेच नाही. ते गहाळ झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा इंदुप्रकाश अथवा पंडिती गाथा देहू हस्तलिखितावर आधारित असला, तरी तो काही देहू प्रतीवरून जसाच्या तसा छापलेला नाही. परंतु पंडितांनी त्यांना अस्वीकारार्य वाटलेले देहूप्रतीतील पाठ त्यात तळटीपा देऊन नोंदविले होते. पुढे या न स्वीकारलेल्या पाठांची त्यांची मूळ संहितेतील मूळ ठिकाणी पुनःस्थापना करून देहू प्रतीची पुनर्रचना करण्याचे काम देहू देवस्थानने केले व तो गाथा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या त्रिशतकोत्तर सुवर्णसोहळा वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित केला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अशा रितीने, संशोधन करून मूळ देहू प्रत - जी तुकारामांच्या घरात वंशपरंपरेने चालत आली - तिची पुनर्रचना करण्यात आली. या प्रतीमध्ये  प्रचलित पंढरपूरकेंद्रित प्रतीपेक्षा जास्त अभंग आहेत, हे विशेष. या प्रतीची सिद्धता करताना पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. आणि ती आली - "शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखालील अभंगांच्या बाबतीत! &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता येथून तुकाराम-रामदास-शिवाजी यांच्या संबंधीच्या अभंगाकडे आपण येतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखाली पंडिती प्रतीत 14 अभंग येतात. त्यातील नऊ अभंग पंढरपूर प्रतीत व वारक-यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत आढळतात. पंडिती प्रतीतील बाकीचे पाच अभंग सरळसरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत!  &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्र शासनाच्या आवृत्तीत 1886 ते 1890 या क्रमांकाने आलेले हे ते पाच अभंग. ते प्रक्षेपीत आहेत हे कशावरून?&lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रतीचे संपादक रा. रा. स‌दानंद मोरे आणि रा. रा. दिलीप धोंडे सांगतात, की त्यातील तुकाराम महाराजांचे स्वतःविषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत. दुसरी गोष्ट अशी, की ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा स‌द् भावनेने हे अभंग रचले तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्याने त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना शिवोत्तरकालीन राजाज्ञा, प्रतिनिधी अशा अधिका-यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, तर 1650 पर्यंत ज्याला शिवरायाचे नाव माहित असणे सूतराम शक्य नव्हते तो भूषण कवी शिवदरबारात आणून त्याने बसविला आहे. सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील नावे. पण या रामदासभक्तांनी ती दोन पदनामे मानली आहेत. भूषण कवीप्रमाणेच त्यांनी राज्यव्यवहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही 1650 पूर्वी पुणे परिसरात दाखल केले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता प्रश्न असा येतो, की या रचना जर रामदासभक्तांच्या, तर त्या देहू वा तळेगाव प्रतीत आल्या कशा? रा. रा. मोरे व रा. रा. धोंडे याच्या दोन शक्यता सांगतात. एक म्हणजे देहू प्रतीची नक्कल त्र्यंबक कासार या तुकारामभक्ताने (तुकारामांच्या वैकुंठगमनानंतर शंभर वर्षांनी) केली. त्यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या तळेगाव प्रतीत स‌माविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळ्या पाठांचा स‌मावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम. दुसरी शक्यता म्हणजे अशाच  एखाद्या उत्तरकालीन देहूकराने रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तेथून ते त्र्यंबक कासार यांच्या वहीत नकलले गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हेच अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजी-तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात. यावरून या अभंगांची निर्मिती कशी झाली असावी, यावर प्रकाश पडू शकतो. मल्हार रामराव चिटणीस हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेलेले शिवशाहीचे बखरकार. त्यांचा समर्थ संप्रदायाशी निकटचा संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. त्यांनी शिव-समर्थांच्या भेटीचे वर्णन करताना हे अभंग लिहिले असतील अशीही एक शक्यता आहे. त्यांनी केले, ते अर्थातच प्रामाणिकपणे, स‌मर्थांचा महिमा वाढविण्यासाठी. पण साता-याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांच्या अडाणीपणामुळे अभंगात आली आणि त्यामुळे प्रक्षेप ओळखणे सोपे गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुकारामांनी शिवरायांनी पाठविलेले धन, मानसन्मान नाकारले हे खरे, पण ते करताना त्यांनी शिवरायांनी समर्थांकडे जाण्यास सांगितले, असे मात्र नाही, हे यावरून स्पष्ट होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा  (श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराजांच्या वंशजांकडील प्राचीन हस्तलिखितावरून सिद्ध केलेली संहिता) - संपा. स‌दानंद मोरे आणि दिलीप धोंडे, प्रकाशक - विश्वस्त मंडळ, श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, द्वितीय आवृत्ती जाने. 2001.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपा. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादेमी, पहिली आवृत्ती 2004.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6601543955298866860?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/xfha_0-OFlw" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/xfha_0-OFlw/blog-post_29.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_29.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-7412097163654789820</guid><pubDate>Wed, 26 Mar 2008 15:46:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-26T08:57:30.928-07:00</atom:updated><title>बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी</title><description>जोधा-अकबर, सलीम-अनारकली या दोन्ही प्रेमकहाण्यांमध्ये एक साम्य आहे. या कहाण्यांमधील दोन्ही स्त्रीपात्रे खरोखरीच होऊन गेली की काय याबद्दल शंका आहे. जोधाबाई ही अकबराची पत्नी की सून असा वाद आहेच. पण गंमत म्हणजे अनारकली ही सलीमची प्रेयसी की "आई' असाही एक वाद आहे. अशी कथा सांगितली जाते, की अनारकली ही अकबराच्या जनानखान्यातली एक बॉंदी. तिचा दर्जा अकबराच्या पत्नीसमान. पण सलीमसाहेब तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे अकबर संतापला. पण या कथेला तसा काही अस्सल आधार नाही. ते काहीही असो. या प्रेमकहाण्यांनी येथील लोकमानसावर राज्य केले हे खरे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी मुलखात घडलेली अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा. ही कहाणी बाकी अस्सल आहे आणि अव्वलही! &lt;br /&gt;खरेतर ही एक शोकांतिकाच म्हणायची. एक ब्राह्मण पेशवा, एक स्वरुपसुंदर मुस्लिम तरूणी, स्वरुपसुंदर म्हणजे किती, की इतकी गोरी, इतकी गोरी, की खाल्लेले पान ज्याच्या सुरईदार गळ्यातून उतरताना दिसायचे! (ही अर्थातच एक दंतकथा.) आणि ते पेशवाईतलं वातावरण! जणू या कहाणीच्या मुळातच शोकांतिकेची बिजं होती... &lt;br /&gt;&lt;br /&gt;मस्तानी ही बाजीरावाला मिळाली ती भेट म्हणून! बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल बुंदेला. त्याला बाजीरावाने मोगलांच्या तडाख्यातून वाचविले. तेव्हा कृतज्ञतेने त्याने बाजीरावांना बिदागी दिल्या. त्यात ही मस्तानी नावाची नृत्यांगना होती. (मस्तानी छत्रसालास त्याच्या पर्शियन पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचेही स‌ांगितले जाते.) बाजीरावाने मात्र तिला मानाने वागविले. त्यांनी तिला पत्नी मानून शनिवारवाड्यात आणले. तेथे तिच्यासाठी मस्तानी महाल बांधला. त्या महालात ती राहात असे. बाजीरावांचा तिच्यावर जेवढा जीव होता, तेवढेच तिचेही त्यांच्यावर प्रेम होते. ती त्यांची सर्वप्रकारे काळजी घेत असे. असे सांगतात, की बाजीराव स्वारीवर असताना ती घोड्यावर स्वार होऊन बाजीरावाबरोबर तेवढ्याच वेगाने दौडत चाले. मस्तानी नृत्यनुपुण होता. शनिवारवाड्यात गणेशचतुर्थीस तिचा नृत्यगायनाचा कार्यक्रम होत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नानासाहेब पेशव्याचे लग्न सन 1730 त झाले. त्यावेळच्या खर्चाच्या हिशोबात तिच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. (पेशवे दप्तर 30, ले. 363) &lt;br /&gt;&lt;br /&gt;इ. स. 1734 मध्ये बाजीरावापासून तिला पुत्ररत्न झाले. (मराठी रियासत, बाजीराव, पृ. 403) त्याचे नाव समशेरबहाद्दर असे ठेवण्यात आले. हा पुढे पेशव्यांच्या फौजेत खासा सरदार म्हणून वावरला. पेशव्यांच्या मुलाबरोबरच त्याचेही शिक्षण झाले. पेशव्यांच्या अनेक मोहिमात राहून त्याने मराठी राज्याची सेवा उत्कृष्ट बजावली. तो पानिपती कामास आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मस्तानी बाजीरावांबरोबर पत्नी म्हणून वावरू लागल्यामुळे पेशव्यांच्या घरात तिच्याविरुद्ध कलह सुरू झाला.. पेशव्यांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी अप्पा आणि चिरंजीव नानासाहेब या तिघांचा मस्तानीने बाजीरावाबरोबर राहण्यास विरोध होता. बाजीरावाने तिचा नाद सोडून द्यावा म्हणून चिमाजी अप्पा व मातोश्रीने फार प्रयत्न केले. पण बाजीरावाने त्या गोष्टीस सरळ नकार दिला. डिसेंबर 1739 मध्ये तर आपल्याबरोबर ही मंडळी मस्तानीस स्वारीस पाठवित नाहीत याचा राग येऊन वैतागून बाजीराव नासिरजंगावरील स्वारीवर गेले. ते स्वारीवर असतानाच पेशव्यांच्या घरी पुण्यास मुलांच्या मुंजी झाल्या. डिसेंबर 1739 ते 1740 मार्च पर्यंत या स्वारीची कामगिरी त्यांनी व्यथित अंतःकरणाने सिद्धिस नेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाजीराव स्वारीवर आहे याचा फायदा घेऊन या काळात मस्तानीला पुण्यात कैदेत ठेवण्यात आले. एवढेच नव्हे, तर बाजीरावापासून मस्तानीस दूर करण्याची परवानगी शाहू महाराजांकडून मिळविण्याचा प्रयत्नही पेशवे कुटुंबियांनी केला. परंतु शाहू महाराजांनीही त्यांना रास्त सल्ला दिला. मस्तानीस कैदेत ठेवून बाजीरावास दुखवू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""राऊ यास खट्टे न करावे. त्यांचे समाधान राखावे. तिला अटकाव करून सल्ला तोडू नये.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;....नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत बाजीराव खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास गेले. तेथे ते ज्वराने आजारी पडले. त्यातच रावरेखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीरावांची धर्मपत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन ही नुकतीच पुण्याहून येऊन पोचली होती. मस्तानी मात्र पुण्यातच कैद होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाजीरावांच्या मृत्यूची हकिकत तिला समजताच तिनेही मृत्यूला कवटाळले. तिचा मृत्यू विष प्राशन करून झाला की मुद्दाम प्राणघात करून घेतला हे समजण्यास मार्ग नाही. शनिवारवाड्यात मृत्यू झाल्यावर तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेऊन दफन करण्यात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बस्स. एवढीच ही प्रेमकहाणी! एक मोठी प्रेमकहाणी!&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 139 - 141)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-7412097163654789820?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/IPVJTKkKWsw" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/IPVJTKkKWsw/blog-post_26.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">4</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_26.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-4939224164958951559</guid><pubDate>Tue, 25 Mar 2008 08:47:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-25T04:51:11.438-07:00</atom:updated><title>स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 3</title><description>स‌ंभाजीराजे. मराठी राज्याचे वारसदार. ते स्वराज्याच्या शत्रूस जाऊन मिळाले. गोष्ट मोठी दुर्दैवी आहे. स‌ंभाजी राजांच्या चरित्रावरील हा स‌र्वात मोठा, कोणत्याही युक्तिवादाने, कोणत्याही कारणाने पुसला न जाणारा कलंक आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एरवी स‌रदार, वतनदार यांनी असे पक्षांतर करणे ही तर त्या काळची रीतच होती. माणसं निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून मोगलांकडे अशी जात-येत असत. खुद्द औरंगजेबाचा मुलगा मराठ्यांना स‌ामील झाला होता. पण संभाजीराजे हे काही स‌ामान्य जहागिरदार, वतनदार, स‌रदार नव्हते. ते कोणा भोसलेशाहीचे वारसदारही नव्हते. शिवाजीराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. ते रयतेसाठीचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज्य होते. श्रींच्या इच्छेने झालेले ते राज्य होते. आणि म्हणूनच संभाजीराजांचे पक्षांतर ही स‌र्वांचेच काळीज खाणारी गोष्ट बनली होती. प्रा. वस‌ंतराव कानेटकरांनी तर स‌ंभाजीराजांच्या या कृत्यामुळे शिवरायांना एवढा धक्का बसला, की ते खचलेच, असे म्हटले आहे. "शिवछत्रपतींच्या दिग्विजयाने हिंदवी स्वराज्याचा वृक्ष महाराष्ट्राबाहेरही फोफावत असता, त्याच्या (संभाजीच्या) हातून शत्रूस मिळण्याचा अविचार घडून आला. त्याबद्दल इतिहास त्यास कधीच क्षमा करू शकत नाही," अशा शब्दांत डॉ. जयसिगराव पवार यांनी आपला क्षोभ व्यक्त केला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व असले, तरी एक प्रश्न उरतोच, की छत्रपतींसारख्या युगपुरुषाचा हा पुत्र, छत्रपती आणि जिजाऊंच्या स‌ंस्कारात वाढलेला हा सुसंस्कृत युवराज, एकाएकी  उठतो आणि शत्रूच्या गोटास जाऊन मिळतो, ते कोणत्या कारणाने? &lt;br /&gt;&lt;br /&gt;औरंगजेबाच्या आदेशाने दिलेरखानाने स‌ंभाजीराजांस आपल्या बाजूस आणण्यासाठी जे पत्र लिहिले त्याला उत्तर म्हणून स‌ंभाजीराजांनी एक गुप्त पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, "माझ्या हिताची म्हणून तुम्ही जी गोष्ट स‌ांगितली ती तशी घडून येईल, याहून वेगळे नाही, असे माझ्या मनात आहे. आपल्या पत्रातून मला असे दिसून आले की, स‌र्वांची मने एकच असतात. परंतु ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्यावर स‌ोपवून दुसरा प्रदेश जिंकण्यासाठी अगदी बिनधास्तपणे माझे वडील निघून गेले आहेत ते इथे परत येईपर्यंत मी आपण स‌ुचविलेली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही. परंतु आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या वैभवाने मी त्यांना स‌ंतुष्ट करीन. स्वतःची खरी योग्यता स्वीकारण्यात परिश्रम कसले? आणि दिल्लीपती माझ्या बाजूस आल्यावर काय स‌ांगावे? (ही चांगलीच गोष्ट आहे.) माझ्या बाजूचे म्हणून आपण मला पाठविलेले पत्र आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मैत्रीच्या बाबतीत आधार आहे. आपण आपल्या पत्रामध्ये 'आपला' असे संबोधून स्नेह जुळविला आहे. तो स्नेह प्रत्यक्षात स‌ाकार होईल अथवा नाही, याबद्दल मुळीच संशय नको." &lt;em&gt;(परमानंदकाव्यम्, संपादक - गो. स. स‌रदेसाई, बडोदा, 1952, पृ. 78, श्लोक 22-31) &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पत्रातील 'मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही' हे उद्गार काय सांगतात? मनात चलबिचल असताना, स‌ंभाजीराजांच्या मनात वडिलांबद्दल अशा भावना होत्या. आणि तरीही ते मोगलांना जाऊन मिळाले, म्हणजे त्यासाठी तसेच काही कारण असले पाहिजे, तशीच काही परिस्थिती निर्माण झाली असली पाहिजे किंवा निर्माण केली गेली असली पाहिजे. &lt;br /&gt;काय होते ते कारण? काय होती ती परिस्थिती?&lt;br /&gt;&lt;br /&gt;6 जून 1676 रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर गृहकलह निर्माण झाला. राजाभिषेक प्रसंगीच आपणास पट्टराणीचा मान मिळाला तरी आपल्या पुत्रास युवराजपदाचा मान न मिळता तो स‌ंभाजीराजांकडे गेला, याचा अर्थ राज्याचा वारसा आपल्या मुलाला मिळणार नाही, याचे दुःख स‌ोयराबाईस झाले असले पाहिजे असा तर्क 'शिवपुत्र स‌ंभाजी'कार डॉ. कमल गोखले करतात. जिजाऊसाहेबांच्या मृत्युनंतर स‌ोयराबाईंच्या मनातील या विचारास प्रकटीकरणाचे धैर्य झाले असणार. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या काळात एकीकडे स‌ोयराबाई अस्वस्थ झाल्या होत्या आणि दुसरीकडे अष्टप्रधानमंडळातील काही प्रधानही संभाजीराजांवर नाराज होते. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स‌ंभाजीराजे राज्यकारभारात लक्ष घालू लागल्यानंतर त्यांच्या आणि प्रधानांच्या वितुष्टास प्रारंभ झाला असावा. यातून रायगडावर अशी परिस्थिती निर्माण झाली, गृहकलह इतका टोकाला गेला, की अखेर राज्याच्या वाटण्या करण्याइतपत पाळी आली. कवि परमानंदाचा पुत्र देवदत्त याने रचलेल्या 'अनुपुराणा'वरून मुळातच शिवाजी महाराजांना राज्याचे विभाजन मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी राजारामासाठी वेगळेच राज्य निर्माण करण्याचा पर्याय शोधून काढला, असे दिसते. पण स‌ोयराबाई आपल्या पुत्रासाठी महाराष्ट्र देशीचे राज्य मागत होती आणि महाराज कर्नाटक देशीचे भावी राज्य त्यास देतो असे म्हणत होते. "1975-76 या कालखंडात राज्यविभाजनाचा प्रस्ताव रायगडावर चर्चिला गेला आणि शिवाजी महाराजांनी थोड्या नाराजीने का होईना पण त्यास आपली संमती दिली. असे वाटते की पितापुत्रांच्या बेबनावाला इथूनच स‌ुरुवात झाली. संभाजीराजास राज्याचे विभाजनच मंजूर नव्हते. कारण महाराज कर्नाचकात जे जिंकणार होते, तोही मराठी राज्याचाच एक भाग बनणार होता."  या स‌र्व राजकारणात मोरोपंत, आण्णाजी दत्तो, राहुजी स‌ोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी यांची भूमिका युवराज स‌ंभाजीराजांना विरोध करण्याची व राणी स‌ोयराबाईंचा पक्ष उचलून धरण्याची होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याच काळात शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची तयारी स‌ुरू केली होती. 6 ऑक्टोबर 1676 रोजी दस-याच्या मुहुर्तावर महाराजांनी  कर्नाटक स्वारीसाठी प्रयाण केले. मात्र आपण रायगडावर नसताना, तेथे स‌ोयराबाई आणि त्यांच्या गटाच्या कोंडाळ्यात स‌ंभाजीराजांना ठेवणे योग्य ठरणार नाही, हे शिवरायांनी जाणले होते. तेव्हा त्यांनी स‌ंभाजीरांना कोकणातील शृंगारपूर येथे धाडले. शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी स‌ंभाजीराजांकडे स‌ोपविली. याच ठिकाणी स‌ंभाजीराजे शाक्त पंथीयांच्या प्रभावाखाली आले. तेथेच कवि कलशाने पुढाकार घेऊन राजांचा कलशाभिषेक केला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एप्रिल-मे 1678च्या स‌ुमारास शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवरून परतले. पण इतिहासकारांच्या मते त्यानंतर शिवाजीराजे आणि स‌ंभाजीची भेटच झाली नाही. रायगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी स‌ंभाजीराजांना शृंगारपूरहून स‌मर्थभेटीसाठी स‌ज्जनगडास जाण्याचा हुकूम दिला. गडावरील धार्मिक वातावरणात स‌ंभाजीराजांचा राग शांत होईल, असे छत्रपतींना वाटले असावे. 'अनुपुराणा'नुसार शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पत्र लिहून स‌ंभाजीराजांना कळविले, की "तू प्रजेला अभय देतोस, पण प्रजा कर बुडवीत आहे. तू अमात्यांचा उघड अपमान करीत आहेस‌. तरी शृंगारपुराहून उठून तू स‌ज्जनगडास जा." स‌ंभाजीराजे स‌ज्जनगडावर गेले, पण तेथे रामदासस्वामी नव्हते. तेथेच दिलेरखानास जाऊन मिळण्याचा स‌ंभाजीराजांचा विचार पक्का झाल्याचे दिसते. स‌ंगम माहुलीस तीर्थस्नानास जातो म्हणून त्यांनी स‌ज्जनगडच्या किल्लेदाराचा निरोप घेतला आणि माहुलीवरून ते थेट दिलेरखानाच्या छावणीत जाऊन पोचले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स‌ंभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे एका ब्राह्मणास दिलेले दानपत्र उपलब्ध आहे. त्यात  त्यांनी आपल्या या कृत्याचे स‌मर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट स‌ल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या स‌ल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. राजाने राणीच्या बाजूने पक्षपात केला. त्यामुळे तो आपल्या विरुद्ध झाला. असे असूनही त्याने आपल्या वडिलांच्या स‌ेवेत आणि निष्ठेत काही म्हणता काही कसूर केली नाही. आपल्या कर्तव्यपालनात तो स्वतः (संभाजी) दशरथी रामाप्रमाणे होता. त्याने दीड कोटी रूपयांची दौलत, किल्ले, राजाचा दर्जा, मान आणि सन्मानही गवताप्रमाणे तुच्छ मानून त्यांचा त्याग केला." &lt;em&gt;(छत्रपती शिवाजी - स‌ेतुमाधवराव पगडी, पृ. 142)&lt;/em&gt;एकंदर राणी स‌ोयराबाई आणि प्रधानांनी केलेल्या कुटील कारवायांमुळे स‌ंभाजीराजांना मोगलांना जाऊन मिळण्याचे कृत्य करावे लागले, असा या मजकुराचा मथितार्थ आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;या कारवाया कोणत्या होत्या? &lt;br /&gt;संभाजीराजांना राज्य मिळू नये यासाठी या लोकांनी कोणते मार्ग अवलंबले? या प्रश्नाच्या उत्तरातच स‌ंभाजी राजांची बदनामी कोणी केली या स‌वालाचे उत्तरही दडलेले आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ. जयसिंगराव पवार स‌ांगतात - &lt;br /&gt;"...कुटिल राजकारणी व मत्सरग्रस्त प्रधान एकत्र आल्यानंतर या दोहोंच्या स‌मान प्रतिस्पर्ध्यास - स‌ंभाजीराजांस - हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविणे आवश्यक ठरले. स‌ंभाजीराजांचे चारित्र्यहनन हा अशाच एका डावपेचाचा भाग असावा. राजकारणातील स‌त्तास्पर्धेत प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून त्यास बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आपणास अगदी अलीकडच्या इतिहासातस‌ुद्धा स‌ापडू शकतील. स‌ंभाजीराजांच्या चारित्र्याविषयी ज्या अनेक दंतकथा अथवा अफवा त्यांच्या हयातीत निर्माण झाल्या त्यांचा शोध या कुटिल राजकारणाच्या पार्श्वभूमिवर घेतला तर मग खाफीखान, मनुची आदींच्या कानापर्यंत जाऊन पोहचलेल्या स‌ंभाजीराजांच्या 'इष्का'च्या कथा मुळातच कोणी निर्माण केल्या असतील याचा अंदाज बांधता येतो." आणि मग स‌ंभाजीराजांची बदनामी करणारी बखर लिहिणारा  मल्हार रामराव याचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असतो, याचे मर्म उलगडते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;('स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी?' या लेखाचे तिन्ही भाग पूर्णतः डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मराठेशाहीचा मागोवा' (मंजुश्री प्रकाशन, 1993) या पुस्तकातील 'युवराज स‌ंभाजीराजे - एक चिकित्सा' या प्रकरणाच्या आधारे लिहिले आहेत.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-4939224164958951559?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/mztXJ1urCwo" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/mztXJ1urCwo/3.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">5</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/3.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-521729669180014008</guid><pubDate>Sat, 22 Mar 2008 14:52:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-22T08:00:25.537-07:00</atom:updated><title>संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 2</title><description>संभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन त्याने स्वराज्याशी द्रोह केला होता. एवढेच नव्हे, तर इंग्रज पत्रावर भरोसा ठेवायचा, तर त्याने साक्षात् शिवछत्रपतींना विष दिले होते! पण यात ऎतिहासिक स‌त्याचा कणही नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराजांवर तेव्हा (1675च्या अखेरीस) विषप्रयोग झालेलाच नव्हता. यावेळी त्यांचा मृत्यूही झालेला नव्हता! ते साता-यावर दीर्घ काळ आजारी होते इतकेच. त्यातही गंमत अशी की, खुद्द इंग्रजांनीच काही दिवसांनंतरच्या बातमीपत्रात (7 एप्रिल 1676)  विषप्रयोगाचा कर्ता संभाजी नसून एक न्हावी असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्या पहिल्या बातमीपत्राचा स‌गळाच डोलारा कोसळला की! आणि शिवाजी महाराज संभाजी दिलेरखानाला मिळण्यापूर्वी त्याला हर बहाण्याने पकडून ठार मारण्याच्या प्रयत्नात होते, या कहाणीची तर विचारही करण्याचे काही कारण नाही.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;मल्हार रामरावाची बखर, जी सांगते की संभाजीने राजवाड्यात एका महिलेवर बलात्कार केला, तिच्याकडे तर विशेष काळजीने पाहावे लागते. मुळात ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेली आहे. त्यामुळे तिच्यात सांगोवांगी कहाण्या पुष्कळच असणार हे उघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही बखर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. त्याची कारणे मल्हार रामरावाच्या इतिहासात आहेत. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा हा राग नसेलच असे कसे म्हणता येईल? डॉ. जयसिगराव पवार सांगतात, बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटांत, किंवा त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिशय विकृत पद्धतीने या मल्हर रामरावाने संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याने सांगितलेल्या कहाणीवर विसंबून पुढे अनेकांनी संभाजी राजांना काळ्याकुट्ट रंगात रंगविले. पण या बलात्काराच्या कथेत काहीच दम नाही! मल्हार रामरावाने सांगितलेली ही गोष्ट म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. डॉ. पवार सांगतात, "ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते स‌ज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी पावणेदोन वर्षे होता." &lt;br /&gt;&lt;br /&gt;वास्तविक ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते. तरीही मल्हार रामराव, इंग्रजी बातमीपत्र आणि बुसातिन-उस-सुलातिन ही तिन्ही साधने त्यांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;या 'बलात्कार कथे'ची नायिका गोदावरी ही आहे. तिला तर कोणताही ऎतिहासिक आधार नाही. पण मग तिची स‌माधी रायगडाच्या पायथ्याशी दाखविली जाते, ते कसे? &lt;br /&gt;याचे उत्तर आहे - आज रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची जी समाधी दाखविली जाते, ती आहे स‌वाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिची स‌माधी!  (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 396-397) &lt;br /&gt;&lt;br /&gt;संभाजीच्या आणखी दोन नायिका आपल्याकडील चित्रपट, नाटके आणि कादंब-यांनी रंगविल्या आहेत. त्यातील एक आहे तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची स‌माधी पन्हाळ्याच्या परिसरात दाखविली जाते. पण तिचीही गत गोदावरीसारखीच आहे. ही स‌माधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या शूर पुरुषाची आहे! बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडला. त्याची बायको त्याच्याबरोबर स‌ती गेली. या दोघांची ही स‌माधी आहे. आता तेथे उभयतांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत. (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 306-309) &lt;br /&gt;तुळसा हे पात्र तर तद्दन काल्पनिक. ते आत्माराम मोरेश्वर पाठारे या नाटककाराने 1891 साली आपल्या 'संगीत श्री छत्रपती संभाजी' या नाटकात निर्माण केले. या पात्राला लोककथेतही स्थान नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संभाजी महाराजांच्या स्त्रीलंपटपणाच्या कथांची अशी वासलात लागल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर 'डाग' राहतो तो स्वराज्यद्रोहाचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शंभूराजे दिलेरखानाला का मिळाले, हा मोठा गहन प्रश्न आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-521729669180014008?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/xsVWGYmxjF0" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/xsVWGYmxjF0/2_22.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">8</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/2_22.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6674377819904436533</guid><pubDate>Fri, 21 Mar 2008 16:09:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-21T09:42:47.995-07:00</atom:updated><title>संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? : भाग 1</title><description>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R-PiUsgPqKI/AAAAAAAAAG8/uELq5AxOXcY/s1600-h/cs.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;" src="http://3.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R-PiUsgPqKI/AAAAAAAAAG8/uELq5AxOXcY/s320/cs.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5180232841577867426" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;हे वर्णन पाहा - &lt;br /&gt;"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."&lt;br /&gt;हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यातून संभाजीराजांची कोणती प्रतिमा साकारते? &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हे वर्णन पाहा -&lt;br /&gt;"युवराजपदी असतानाच संभाजीराजांनी 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता... एका तत्कालीन कागदात एका खटल्यातील वादी आपली तक्रार प्रल्हाद निराजी व कवि कलश यांच्याकडे सोपविली गेल्याचे पाहून खुद्द संभाजीराजांकडे तक्रार करताना म्हणतात, साहेब स‌र्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऎसा करिताती. ऎसे असोन माझे पारिपत्य होत नाही." &lt;br /&gt;हे नमूद केले आहे वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या 'छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकात. (पान 37, 38)&lt;br /&gt;&lt;br /&gt;यातून संभाजीराजांचे कोणते चित्र उभे राहते? &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि आता संभाजीबद्दल जनमानसात असलेले गैरस‌मज आठवून बघा.&lt;br /&gt;लोक स‌मजतात - &lt;br /&gt;मराठी साम्राज्याचा हा युवराज दुर्वर्तनी होता. दुराचारी होता. मद्यासक्त होता. स्त्रीलंपट होता. बलात्कारी होता. राज्यबुडवा राजा होता! काही तत्कालीन ऎतिहासिक साधनांतूनही संभाजीबद्दलचे असेच काळेकुट्ट चित्र रंगविलेले आढळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मल्हार रामरावाची बखर सांगते -&lt;br /&gt;"... परंतु (संभाजीराजे) उग्र प्रकृती. शिवाजीमहाराजांचे मर्जीनुसार वागणे पडेना ऎसे होऊ लागले. काही दिवस राजगडी राहून रायगडी गेले... त्यांचा व्रतबंध करून युवराजाभिषेक करावासे मनात आणून व्रतबंध केला. परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची! कोण्हे एके दिवशी हळदकुंकू स‌मारंभ शीतलागौरी यास स‌र्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार त्यात कोण्ही रुपवान स्त्री आली. तिजला महालात नेऊन बलात्कार - अविचार जाला. हे वृत्त महाराजांसही स‌मजले. ते स‌मयी बहूत तिरस्कार येऊन बोलले जे राज्याचे अधिकारी हे, अगम्यागमन श्रेष्ठ वर्णीचे ठायी जाले; स‌र्व प्रजा हे राजाचे कुटुंब आप्तसमान, हे पुत्र जाले तरी काय करावयाचे? यांचा त्याग करीन, शिक्षा करीन. ऎसे आग्रह करून बोलले. ही बातमी संभाजी महाराज यांस स‌मजली. त्याजवरून दोन घोडियांवरि आपण व स्त्री ऎसे बसोन, पांच पंचवीस माणसे मावले आपले खासगीची घेऊन रात्रीसच निघोन पाचवडास असता तेथून गेले. ते वेळे दिलेलखान औरंगाबादेस होते त्यांजपाशी गेले... बहूत स‌त्कार करून ठेविले... "&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे संभाजीराजांनी एका महिलेवर राजवाड्यात बलात्कार केला आणि मग शिवाजीराजे शिक्षा करणार या भयाने ते दिलेरखानाकडे पळून गेले, असे मल्हार रामरावाचे म्हणणे आहे. याला महमद झुबेरी याने आपल्या बुसातिन-उस-सलातीन (विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास) या ग्रंथात दुजोरा दिला आहे. या ग्रंथातील कथा अशी -&lt;br /&gt;"संभाजी याणी दिलेरखानापासी जाऊन पोहचण्याची कैफियत अस‌ी आहे की, सिवाजी कित्येक कामाबद्दल संभाजीसी त्रासून कंटाळला होता. या दिवसांत शहरनवीस म्हणदे हुकमाचे शेरे लिहिणारा कामदार होता. त्याचे कन्येवर संभाजी फार आषक, म्हणजे लुब्ध, जाहला होता. येणेकरून संभाजीविसी सिवाचे मनात फारच वाकडेपणा येऊन सिवाजी अत्यंत त्रासला होता. अशा प्रकारे की, संभाजीचा केवळ शत्रूच जाहाला आणि सिवाजीने मनात आणिले की, संभाजीस हरएक बाहान्याने पकडून ठार जिवे मारावा किंवा कैद करावा. संभाजी याणी हा सिवाजीचा इरादा ओळखून संशयांकित जाहाला. आपण दिलेरखानाकडे निघोन जावे असा निश्चय केला. आपण जातीने जाऊन पोहचण्यापूर्वी आधी एक पत्र आम्ही आपलेकडे येतो अशा मजकुराचे लिहून दिलेरखानाकडे पाठविले. त्यानंतर जातीनेही त्या पत्राचे लागोपाठच दिलेरखानाकडे निघाला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका इंग्रजी बातमीपत्राने तर याहून कहर केला आहे. त्या पत्रात असे म्हटले आहे, की संभाजीने आपल्या बापास विष देऊन ठार मारले, अशा बातम्या आहेत. ते पत्र असे - &lt;br /&gt;"For these many days here is a continued report of Sevagee being dead and buried, naming the place of his death, distemper, manner and place of burial. It is reported he was poisoned by his son; his son being informed his father had commanded the watch of Rairee Castle to throw him down over the wall, if he left not going out at nights after the watch was set to meet a daughter of one of his chiefest Brahminees, whose daughter he had debauched; that he was sick, we certainly know, and that his distemper proceeded from the violent pain he had in his head, which was almost rotten..." (English Records on Sivaji - Ed. Shiva Charitra Karyalaya, Pune, Vol II, P. 78)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठ्यांचे इतिहासाचे थोर भाष्यकार कै. त्र्यं. शं. शेजवलकर या पत्राबद्दल म्हणतात, "इंग्रजांच्या पत्रातील ही नोंद इतकी सहजरित्या स्पष्ट स्वरूपात आली आहे की तीबद्दल शंका घेणे कठीण आहे..." (श्री शिवछत्रपती - संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर, 1964, पृ. 142-143)&lt;br /&gt;&lt;br /&gt;या तिन्ही साधनांमध्ये ज्या स्त्रीचा उल्लेख येतो, तिचे लोककथेतील नाव होते गोदावरी. ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी होती, असे मानले जाते. लोककथेनुसार "गोदावरी नामक एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन संभाजीने तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवले. महाराजांना हे कळताच त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी संभाजीला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज आमचा उद्याचा राजा आहे, असे सांगून शिक्षा रद्द करून घेतली. पण ती माहेरी अगर सासरी जाईना. तिच्यावर भ्रष्ट होण्याचा प्रसंग आल्यामुळे ती स‌ती गेली. संभाजीनेच तिची चिता पेटवली पाहिजे, अशी स‌ती जाताना तिने अट घातली होती. त्याप्रमाणे संभाजीने तिची चिता पेटवली..." ती जिथे स‌ती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची स‌माधी बांधली. ती अद्यापही तेथे, रायगडाच्या पायथ्याशी आहे, असे सांगण्यात येते.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे वाचून कोणालाही वाटावे, की हा संभाजी तर सामान्य गुंड होता! पण मग त्याचवेळी तो धर्मवीरही आहे! &lt;br /&gt;आता याची संगती कशी लावायची? की स‌त्य याच्या मध्ये कुठे तरी आहे?&lt;br /&gt;असे तर नाही ना, की कोणीतरी जाणूनबुजून संभाजीची बदनामी केलेली आहे, त्याच्याबद्दलच्या अफवा पस‌रविल्या आहेत?&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतिहासाची पाने चाळली, तर दिसते ते हेच, की मराठ्यांचा हा शंभूराजा कधीच दुराचारी, स्त्रीलंपट असा नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6674377819904436533?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/NqhjnrPjGSc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/NqhjnrPjGSc/1_21.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R-PiUsgPqKI/AAAAAAAAAG8/uELq5AxOXcY/s72-c/cs.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">5</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/1_21.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-8882133301167808020</guid><pubDate>Thu, 20 Mar 2008 15:37:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-20T09:07:51.922-07:00</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">maharashtra history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">shaniwar wada</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">ramshastri prabhune</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">marathi history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">raghoba</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">peshawa</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">narayanrao</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">pune</category><title>महाराष्ट्रातले  खलपुरूष 2  - राघोबादादा</title><description>&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Raghunathrao"&gt;राघोबादादा पेशवे&lt;/a&gt; यांनी मराठ्यांचा ध्वज &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Attock"&gt;अटके&lt;/a&gt;पार नेला. याबद्दल त्यांचा गौरव जरूर केला पाहिजे. पण त्याचबरोबर हा मनुष्य महाराष्ट्राच्या इतिहासातील एका गाजलेल्या राजकीय हत्याकटाचा सूत्रधार होता, हेही विसरता येणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पेशवाईची वस्त्रे मिळावीत यासाठी या माणसाने हयातभर कटकारस्थाने केली. नारायणराव पेशवे गादीवर आल्यानंतर राघोबादादांनी त्यांच्याविरुद्ध कारस्थाने सुरू केली. पेशव्यास दादांच्या गुप्त कारस्थानांची वार्ता कळताच ते नाशकाहून लगबगीने परत आले. राघोबा हैदरखानचा वकील आप्पाजीराम याच्यामार्फत हैदरखानाशी संधान साधून होते. तेव्हा आप्पाजीरामला बेड्या घालून पुरंदरावर ठेविले आणि राघोबादादास 11 एप्रिल 1773 रोजी वाड्यातच बंदीत ठेविले. (पृ. 347)&lt;br /&gt;&lt;br /&gt;"दादास कैद दुःसह होऊन त्यांच्या मनाने घेतले, की आपणच नारायणरावास अटकेत ठेवून कारभार करावा.' (हरिवंशाची बखर, पृ. 1) दुसरीकडे पेशव्यांनी दादांच्या सर्व हालचाली बंद पाडून त्यांच्यावरील पहारा कडक केला. तेव्हा दादा पेशव्यांविरूद्ध कटाची उभारणी करू लागले. त्यात भवानराव प्रतिनिधी, सखाराम हरि व सखाराम बापू, चिंतो विठ्ठल आदी सरदार त्यांना सामील झाले. दादांचा हुजऱ्या तुळ्या पवार याने कटाची उभारणी केली.(तुळ्या पवारास नारायणराव पेशव्यांनी चाबकाने बडविले होते. म्हणून तो बदला घेण्याच्या विकाराने पछाडला होता.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;दादांच्या कैदेची देखरेख सुमेरसिंगाकडे पेशव्यांनी दिली होती. तुळ्या पवारने त्याला फितवले आणि दादांच्या पक्षास आणले. "सुमेरसिंग, महमद इसफ, बहादुरखान व खरकसिंग या गारदी सरदारांस पैशाची लालूच दाखवून तीन लक्षाचा करार लिहून कारभाऱ्यांनी (बापू व मोरोबा) दिला, की नारायणरावास धरावे. दादांनी ही चिठ्ठी स्वदस्तुरीने पुरी केली. ती चिठ्ठी आनंदीबाईनी पाहिली. त्यात "धरावे' होते त्या ठिकाणी "मारावे' असे केले,'' असा बखरीतला उल्लेख आहे. अशा रीतीने कटाची उभारणी झाली. त्यात मुधोजीचे वकीलही सामील झाले. अशा कटास ऑगस्ट महिना साधारणतः योग्य, कारण यावेळी पाऊस पडून शेतीच्या हंगामात सर्व सैनिक आपल्या वाडीवर जाऊन गुंतलेले असतात. त्यावेळी तीन ते चार हजार सैन्य पुण्यास होते. नारायणरावांच्या मनात आपला खून होईल याबद्दल कधी शंकासुद्धा आली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र रघुजी आंग्रे यांच्याकडून पेशव्यास धोक्‍याची सूचना मिळाली होती. गारदी दंगा करणार असे पेशव्यांना समजताच त्यांनी हरिपंत फडके यास गारद्यांचा बंदोबस्त करण्यास फर्माविले. गारद्यांचे दंगे हे नेहमीचेच असतात. तेव्हा त्याचा बंदोबस्त आपण संध्याकाळी करू असा विचार करून हरिपंत गावातील भोजन समारंभास गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच दिवशी (30 ऑगस्ट 1773) दुपारच्या प्रहरी पेशवे वामकुक्षी करीत असता दोन हजार गारदी दिल्ली दरवाजाने आत आले. त्यापैकी शे-दोनशे लोक थोरले बाजीरावसाहेब यांचे दिवाणखान्यातून श्री गणपती महालाच्या दरवाजाजवलून मेघडंबरी बंगल्याचे दरवाजातून त पेशवे यांच्या दिवाणखान्यापुढे गाई बांधतात तेथे आले. देवघरच्या रंगमहालाचा दरवाजा बंद करून तेथे नारायणरावास कैद करावे अशा बेतात होते. इतक्‍यात रावसाहेब हुशार होऊन धावत सातखणीतून पार्वतीबाई याजकडे गेले. तेव्हा इच्छारामपंत ढेरे श्रीमंताच्या व गारद्यांच्या मध्ये आले. त्यांची झटापट गारद्यांशी होऊन गारद्यांनी त्यास तोडले. तेव्हा गारद्यांस पाहून देवघरात बसलेला नारोबा फाटक गवई भयभीत होऊन पळू लागला. हे पाहून हेच रावसाहेब असे समजून त्यास पाठीमागून वार करून ठार मारले. पहातात तो रावसाहेब नव्हते. मग गारदी प्रमुख खरकसिंग व सुमेरसिंग व तुळ्या पवार पेशव्यांच्या पिच्छास गेले. पेशवे पार्वतीबाईकडे गेले. तेव्हा बाईंनी सांगितले, की तुम्ही दादासाहेबांकडे संरक्षणास जावे, त्यावरून दादासाहेब दिवाणखान्यात निजले होते तेथे आले आणि समोर येऊन सांगितले, की मला मारावयास तिघे जण पाठीमागे आले आहेत. त्यावरून दादासाहेब यांनी सांगितले, की ""तू इथेच राहा. मी बाहेर जाऊन बंदोबस्त करतो असे सांगून उठावयास लागले.'' तोच रावसाहेब यांनी कमरेस मिठी घातली आणि म्हणू लागले की मला सोडून जाऊ नये. इतक्‍यात तुळाजी पवार वगैरे तीन असामी आत आले आणि नारायणराव याचे पाठीमागे होऊन पाय ओढू लागले. तुळाजी पवार वार करावयास आला. त्यास दादासाहेब यांनी उजवा हात पुढे केला तो तरवारेचा वार त्यांच्या हातास लागला. दुसरा वार खरकसिंग याने केला तो दादासाहेब यांचे पागोट्याचा पेच तुटून पुतळी कानापाठीमागे लागली. रक्तस्त्राव जाहला. तुळाजी पवार याने दुसरा वार केला तो नारायणराव यांचे कमरेवर लागला आणि दादासाहेबास म्हणू लागला की नारायणराव यास सोडावे नाहीपेक्षा दोघासही ठार मारितो. हे ऐकून गोविंद गणेश बारगीर याने येऊन दादासाहेबांचे कमरेची मिठी सोडविली तेव्हा सुमेरसिंग याने वार केला तो नारायणराव यांचे कुशीस लागून ठार जाहले. वाड्यात सर्वत्र एकच हाहाःकार जाहला. दादासाहेबास फडावरच्या खणात आणून बसविले. इतक्‍यात वाड्यात गडबड झाली ही बातमी शहरात पसरली. बातम्यावर बातम्या येऊ लागल्या. पहिली बातमी आली की नारायणराव ठार जाहले. &lt;br /&gt;&lt;em&gt;(ही हकीकत महादजी राम कर्दीकर या नावाच्या दादासाहेबांच्या आश्रिताने लिहून ठेविली. ती महाराष्ट्र अर्काईव्हज बुलेटिन, क्र. 4 मध्ये प्रसिद्ध झाली, त्यातून घेतली आहे.)&lt;/em&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;या दुष्कृत्यात एकंदर ब्राह्मण आसामी सात, एक हुजऱ्या, एक नाईक, दोन कुणबिणी व एक गाय इतकी ठार झाली. गारद्यांनी नंतर राघोबादादा पेशवे झाल्याची ग्वाही फिरविली. बाहेर मुत्सद्दयांनी शहर कोतवालाकडून शहरची नाकेबंदी करविली. सर्व मुत्सद्दी कोतवाल चावडीत जमले. भवानराव प्रतिनिधी आपल्या लोकास बाहेर ठेवून एकटेच आत गेले. त्यांनी दादांची भेट घेतली. त्यावेळी दादाजवळ तुळाजी पवार, खरकसिंग व सुमेरसिंग होते. त्यांनी अभय मागितले व आपले देणे पुरे करावयास लाविले. दादासाहेबास एकांती घेऊन भवानरावाने दादांच्या संमतीने आपले लोक आत घुसविले आणि ठिकठिकाणी चौकी पहारे बसविले. त्रिंबकराव मामास बोलावणे पाठविल्यावर ते आत येऊन त्यांनी दादांचा निषेध केला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दादासाहेबांनी उत्तर केले की, होणारास उपाय नाही. तुम्ही आत जाऊन पुढील उपाय काय तो करणे. त्याप्रमाणे उत्तरकार्याची तजवीज पार्वतीबाईचे विचारे केली. श्रीमंतांचे प्रेत ओंकारेश्‍वरापासी नेण्यासाठी दिल्ली दरवाजाने बाहेर काढिले. ओंकारेश्‍वरावर सर्व मुत्सद्दी मंडळी जाऊन प्रायश्‍चित्त संस्कार करून मंत्राग्नि त्रिंबकराव मामा याजकडून दिला. दहन करून चौदा घटिका रात्री आपापले घरी सर्वत्र गेले. &lt;em&gt;(पेशवे बखर, पृ. 71, मराठी दप्तर रूमाल 2, पृ. 101)&lt;/em&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;भवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे आणि राजाबा पुरंदरे यांनी राघोबादादांची त्याच रात्री वाड्यात भेट घेतली. तेव्हा त्यास आढळून आले, की दादा स्वतः गारद्यांचे कैदी बनलेले. कारण गारद्यांनी पुरंदर नगर आणि साष्टी येथील तीन किल्ले आणि बक्षिसादाखल पाच लाख रुपये दादासाहेबांकडे मागितले. जर ती रक्कम आपणास मिळाली नाही, तर आम्ही अलिबहादूर यास पेशवा करू अशी धमकी त्यांनी दादास दिली. शेवटी भवानराव प्रतिनिधींच्या मध्यस्तीने गारद्यांचा गुंता उरकला. तीन किल्ल्यांऐवजी पाच लाख रुपयांबरोबर आणखी तीन लाख घेण्याचे कबूल केले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नारायणरावांबरोबर त्यांची बायको गंगाबाई सती जाण्यासाठी आकांडतांडव करीत होती. पण सतीचा शाप बाधेल या भीतीने दादांची बायको आनंदीबाई यांनी तीस खोलीत कोंडून ठेविली. &lt;em&gt;(खरे, भा. 4, ले. 1257, 1262)&lt;/em&gt; शिवाय तिला दिवस गेले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा बनाव सहा महिने अगोदर शिजत होता. सखारामबापू व दादास साखळदंड घालून कैद करणार असे दोघांनाही समजल्यावरून हा कट सिद्धीस नेण्याची घाई त्यांनी केली. बहुतेक कारभारी नारायणरावास धरावे या कटात होते. ग्रॅंट डफसुद्धा ह्या "ध चा मा'त आनंदीबाईचा हात होता हे कबूल करतो. सखारामबापूचे "नारायणरावास धरावे' या कटात अंग होते. पण त्यांचा वध झाल्यावर मात्र बापू पश्‍चात्तापदग्ध होऊन कित्येक दिवस पर्वतीच्या रानात फिरत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रामशास्त्री प्रभुणे मुख्य न्यायाधीश होते. &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R-KJ1MgPqJI/AAAAAAAAAG0/wA34qeJZz8g/s1600-h/ramshastri.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R-KJ1MgPqJI/AAAAAAAAAG0/wA34qeJZz8g/s320/ramshastri.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5179854068412033170" /&gt;&lt;/a&gt;त्यांनी खुनाच्या चौकशीचे काम हाती घेतले. त्यात असे दिसून आले, की नारायणरावाचा खून करण्याचा मूळ कट नसून त्यास धरावे असे होते. हा कट राघोबाचे पाठीराखे आणि हितचिंतक यांनी खुनाच्या अगोदर पुरे सहा महिने शिजवला. त्यात मुख्य सूत्रधार राघोबादादा असून आणखी 49 लोकांनी भाग घेतल होता. त्यापैकी 13 गारदी (8 हिंदू व 5 मुसलमान), 26 ब्राह्मण, 3 प्रभू व 7 मराठे गुन्हेगार होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सरदारांपैकी नाना फडणीस यास सखारमाबापू व चुलतभाऊ मोरोबा याचा संशय होता, शिवाय आनंदीबाईचाही वहीम होता. नाना फडणीसांनी सत्ताग्रहण केल्यावर पहिल्या दोघांस अन्य कारणास्तव कैदेत ठेविले. आनंदीबाईस नानांनी जिवंत असेपर्यंत कैदेतच जीवन काढण्यास भाग पाडले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - ड. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 350 ते 354)&lt;br /&gt;&lt;br /&gt;(टीप - गारदी हे शनिवारवाड्याचे रखवालदार होते. त्यांच्यात भरणा उत्तर हिंदुस्तानातील पठाण, अबिसिरियन अरब, राजपूत पुरभय्या यांचा होता.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-8882133301167808020?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/k8p8GNcnQ5Q" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/k8p8GNcnQ5Q/2_20.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R-KJ1MgPqJI/AAAAAAAAAG0/wA34qeJZz8g/s72-c/ramshastri.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/2_20.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6485610057552531453</guid><pubDate>Tue, 18 Mar 2008 15:57:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-21T09:45:16.411-07:00</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">maharashtra</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">maharashtra history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">marathi history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">kotwal</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">marathi</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">ghashiram</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">pune</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">brahmin</category><title>महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल</title><description>रा. रा. विजय तेंडुलकर यांच्या &lt;a href="http://www.telegraphindia.com/1040523/asp/look/story_3262679.asp"&gt;'घाशीराम कोतवाल' &lt;/a&gt;या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडविला होता. हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्रह्मवृंदाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते स‌र्व विरून गेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात तेंडुलकरांच्या नाटकाचा विषय घाशीराम कोतवाल नावाची व्यक्ती हा नव्हताच. राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी घाशीराम सारखी माणसे (वा संघटना) निर्माण करतात. त्यांच्याकडून आपली स‌र्व प्रकारची अनैतिक कामे करून घेतात आणि ही माणसे डोईजड झालीच तर त्यांचा काटा काढतात. हे तेंडुलकरांना शिवसेनेच्या संदर्भात सांगायचे होते. ते त्यांनी त्या नाटकातून सांगितले. त्यासाठी त्यांच्या कामास आली, ती घाशीरामची दंतकथा. एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर फारसा आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Madhavrao_II"&gt;माधवराव पेशव्यां&lt;/a&gt;च्या काळापर्यंत पुण्यास स्वतंत्र कोतवाल नव्हता. त्यांच्या काळात पुण्याचे महत्त्व फार वाढले, तेव्हा मग शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार 18 फेब्रुवारी 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले. नाना फडणीस अर्थात बाळाजी जनार्दन फडणीस हे सांगतिल तसे काम करीत जाणे असे त्यांना बजावण्यात आले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले. शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाळाजी नारायण केतकरांनंतर बाबूराव राम, जनार्दन हरी, धोंडो बाबाजी व आनंदराव काशी असे कोतवाल झाले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा माणूस अतिशय सुस्वरूप, बुद्धिमान आणि गोडबोल्या होता. नाना फडणीसांची त्याच्यावर मोठी मर्जी होती. फितुरीसाठी, राघोबा दादा, तसेच अन्य काही स‌रदार-दरकदारांवर हेरगिरी करण्यासाठी नाना त्याचा वापर करीत असत. किंबहुना अशा गुप्तरीत्या मिळविलेल्या बातम्यांवरच पंधरा वर्षे नानांचा मुख्य कारभार सुरू होता. फंदफितुरी दाबात ठेवण्यासाठी नानांना घाशीरामच्या गुप्तहेरांकडून मिळणा-या बातम्यांचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याबद्दल नाना बक्षिसे वगैरे देऊन त्याची वारंवार प्रशंसा करीत असत. पण या काळात घाशीरामने अनेकांवर अन्याय केला. अतिशय निर्दयपणे पुण्याचा कारभार केला. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर घडे भरलेच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच्या कारकीर्दीत 25 तेलंगी ब्राह्मण पुण्यास आले होते. ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता, त्यांना घाशीरामच्या शिपायांनी कैद केले आणि भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते तेथे कोंडले. त्या भुयारात वारा जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे कोंडमारा होऊन 21 लोक मृत्यू पावले. &lt;em&gt;(ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3373, पृ. 4536)&lt;/em&gt; मानाजी फाकडे नावाच्या गृहस्थांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ती पेशव्यांच्या कानी घातली. 21 ब्राह्मणांचा कोंडून मृत्यू झाल्याची बातमी पुण्यात कळताच एकच हलकल्लोळ उडाला. पुण्यातील स‌र्व ब्रह्मवृंद पेशव्यांच्या वाड्यासमोर जमला. अत्याचारी घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार करावे, अशी त्यांची मागणी होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;घाशीरामचे म्हणणे मात्र वेगळेच होते. कोंडून ठेवल्याने त्या ब्राह्मणांचा मृत्यू झाला, ही हकीकत खोटी आहे. हे लोक शहरात चो-या करीत असत. त्यांना धरून आणून ठेवले असता, त्यांनी अफू खाऊन जीव दिला, असे त्याने सांगितले. त्यावर त्या ब्राह्मणांना मूठमाती देण्याची परवानगी दिली. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. अय्याशास्त्रीजी यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत घाशीराम दोषी ठरला. त्याच्या मुसक्या बांधून गारद्यांच्या पहा-यात ठेवण्यात आले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;घाशीरामला कैद केले तरी ब्रह्मवृंदांचे स‌माधान झाले नव्हते. त्याला हत्तीच्या पायी देण्याचा त्यांचा आग्रह होता. तेव्हा त्याला हत्तीवर बांधून शहरातून फिरविण्यात आले. त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला दगड मारले. त्यात त्याचे डोके फुटले. तरी ब्रह्मवृंद शांत होईना. शेवटी दुस-या दिवशी, 31 ऑगस्ट 1791 रोजी त्याला उंटावर उलटे बसवून गारपिरावर नेऊन सोडले. तेथे 'ब्राह्मणांनी त्यास धोंडे घालून मारिले. अद्यापि शरीर कोतवालाचे पडले आहे. नदीत टाकिले नाही,' असे मिरजकरांच्या वकीलाचे पत्र आहे. &lt;em&gt;(ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3374, पृ. 4539)&lt;/em&gt; घाशीरामच्या दोघा मुलांना, तसेच त्याच्या दिवाणालाही बेड्या घालण्यात आल्या.  &lt;a href="http://www.flickr.com/photos/joezach/917555440/in/set-1264466/"&gt;घाशीरामच्या घरा&lt;/a&gt;वरही जप्ती आणण्यात आली. अशा रीतीने घाशीराम प्रकरणाचा शेवट झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तत्कालीन पुण्याच्या ढासळलेल्या नैतिकतेवर प्रकाश टाकणारे असेच हे प्रकरण आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;संदर्भ - &lt;/em&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, पृ. 497-498.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6485610057552531453?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/il1vUC8ZSqo" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/il1vUC8ZSqo/1_18.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">7</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/1_18.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-7999137967598299051</guid><pubDate>Mon, 17 Mar 2008 18:39:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-17T12:37:31.314-07:00</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">maharashtra</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">atre</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">maharashtra history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">samarth ramdas</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">marathi history</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">shivaji</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">marathi</category><title>रामदास खरेच बोहल्यावरून पळाले होते?</title><description>'शुभमंगल सावधान' हे शब्द कानावर पडले आणि नारायणाने बोहल्यावरून धूम ठोकली.&lt;br /&gt; &lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R97C5HYR95I/AAAAAAAAAGs/SGbuK2G8-mo/s1600-h/ramdas.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;" src="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R97C5HYR95I/AAAAAAAAAGs/SGbuK2G8-mo/s320/ramdas.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5178790908011870098" /&gt;&lt;/a&gt; रामदासांच्या जीवनचरित्रातील ही एक महत्त्वाची घटना. मराठवाड्यातल्या जांब गावातल्या नारायण सूर्याजी ठोसर या मुलाचे समर्थ रामदासस्वामींमध्ये रूपांतर झाले, त्या प्रवासाच्या प्रारंभी ही घटना येते. पण इतिहासातील अनेक घटनांप्रमाणेच हिच्याबद्दलही शंका आहेत. ही घटना अशीच घडली का याबद्दल संशय आहे. म्हणजे रामदास स्वामींनी लहानपणीच घराचा त्याग केला हे खरे. पण ते लग्नातून पळाले याबद्दल मात्र खात्री नाही.&lt;br /&gt; &lt;br /&gt;वास्तविक या घटनेबद्दल अनेकांनी लिहिले आहे. नारायण बोहल्यावरूनच पळाले असे जवळजवळ सर्वांचेच म्हणणे आहे. रामदासांची अनेक चरित्रे हीच कथा सांगत आहेत. रामदासांच्या स‌र्व चरित्रांमध्ये हनुमंतस्वामींची बखर जास्त प्रमाण मानली जाते. या कथेबद्दल हनुमंतस्वामी लिहितात - &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पुढे कोणे एके दिवशी श्रेष्ठीस (म्हणजे स‌मर्थांचे थोरले बंधू) मातोश्री आज्ञा करिती जाहली की, नारोबाचे लग्न करावे. श्रेष्ठीने उत्तर केले की, नारोबाचे लग्न कराल, तर नारोबा हातातून जाईल आणि आपणास बहुत दुःख होईल. ही गोष्ट कामाची नाही. मातोश्री बोलली की, आपला वंश फार नाही. वंशवृद्धी जाहली पाहिजे. यास्तव अवश्यमेव लग्न कर्तव्य आहे. असे म्हणून वधूचा शोध करू लागली...."&lt;br /&gt;"... नंतर मातोश्रींनी विचार केला की लग्नाची गोष्ट काढली असता हा असे (म्हणजे रामदास पिसाळल्यासारखे वागत वगैरे) करतो.  तरी यास काही बोध करावा असे मनात आणून त्यास एकांती बोलावून बोलली की, बापा मी सांगतो ती गोष्ट मान्य करशील काय? समर्थ बोलले की मी आपले आज्ञेबाहेर नाही. न मातुः परं दैवतम् असे शास्त्र आहे. म्हणून आज्ञा करावी. तेव्हा तुम्ही लग्न करीत नाही. लग्नाची गोष्ट काढली असता रागे भरता. तर असे करू नये. अंतःपट धरीन तोपर्यंत नाही असे म्हणू नये. तुम्हास माझी शपथ आहे. 'उत्तम आहे', असे म्हणून त्यादिवसापासून पूर्वीचे प्रकार सर्व सोडून दिले. नंतर मातोश्रीमी लग्नाचा उद्योग करून आपले बंधू भागजीपंत बादेनापूरकर ह्यांची कन्या योजून निश्चय केल्यानंतर स‌र्व आसनगावी लग्नास गेले. सीमंतपूजनापासून अंतःपट धरीपर्यंत स‌र्व यथासांग झाले. पुढे ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणावयाचे पूर्वी 'स‌ावधान' असे म्हणताच, याचा अर्थ काय, असे स‌मर्थांनी विचारिताच 'इतःपर संसाराची बेडी तुमचे पायात पडली' असे ब्राह्मणाचे वाक्य श्रवण करीन स‌मर्थांनी विचार केला की, पूर्वी मी सावध आहेच, हल्ली ब्राह्मणही म्हणतात आणि मातोश्रींची शपथ एथपर्यंतच होती. आता तिचे वचनातून पार पडलो. अतःपर येथे गुंतून राहणे ठीक नाही. असे म्हणून तेथून पलायन केले. ते जांबगावी अश्वत्थाचे वृक्षावर जाऊन बहुत निबिड व अवघड जागेत बसले. ते त्या वृक्षावर तीन दिवस तसेच राहिले. इकडे लग्नाचे स‌मारंभातून स‌मर्थ पळून गेले, हे ठीक नाही तर शोध करावा असा विचार करून स‌र्वत्रांनी व मातोश्रींनी बहुत शोध केला. परंतु कोठेच ठिकाण लागेना, म्हणून त्या मुलीस दुसरा वर पाहून लग्न केले."&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच मजकूर 'दासविश्रामधामा'तही येतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र समर्थ पलायनाची तपशीलात काहीसा फरक असलेली एक अन्य हकीकतही सांगण्यात येते. 'केसरी'चे माजी स‌ंपादक रा. रा. ज. स. करंदीकर यांनी आपल्या 'श्री समर्थचरित्रा'त लिहिले आहे - "अंतपाट धरून 'शुभंगल सावधान'चा घोष होईपर्यंत नारायण स्तब्ध उभा होता आणि सावधान शब्द ऎकल्याबरोबर तो तेथून निसटला आणि गुप्त झाला, असे जे वर्णन करण्यात येते त्यात कविसंप्रदायाला शोभणारी अतिशयोक्ती असावी असे दिसते." (पान 10) &lt;br /&gt;&lt;br /&gt;स‌मर्थांच्या विविहाचा मुहुर्त 'दासविश्रामधामा'त फाल्गुन शु. 8 ला अकरा घटका दिवसाचा असा दिलेला आहे. मात्र 'स‌मर्थ प्रतापा'त हा मुहूर्त रात्रीचा दिलेला आहे. समर्थप्रताप अधिक विश्वसनीय ग्रंथ आहे. त्यात 'स‌मर्था फावली मध्यरात्र' आणि 'स‌मर्थामागे लोक धावले मध्यरात्री। समर्थ कोणासी न दिसती रात्री' असे वर्णन केलेले आहे. भर दुपारी अक्षता टाकण्यासाठी मंडपात स‌र्व लोक जमले असताना त्यांच्यातून पळून जाणे आणि मग कोणासही न सापडणे हे कठीण दिसते. स‌मर्थ प्रताप सांगतो त्याप्रमाणे लग्नाचा मुहूर्त रात्रीचा असेल, तर ती वेळ पळून जाण्यासाठी अधिक योग्य ठरते. एकंदर स‌मर्थ प्रतापानुसार नारायण पळाला तो रात्रीच्या वेळी आणि तेही बोहल्यावरून नव्हे, तर तत्पूर्वी, लग्नघटिकेच्या आधी. रा. रा. स. कृ. जोशी यांनी आपल्या 'जय जय रघुवीर समर्थ' या पुस्तकात लग्नाची वेळ रात्रीची होती असेच म्हटले आहे. "अंधारी रात्र, मंडपात गर्दी झालेली, भराभर दिवे विझवून नारायण पळाला." असे त्यांनी म्हटले आहे. (पान 19)&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु याहून स‌र्वस्वी भिन्न अशीही एक हकीकत आहे. स‌मर्थ हे लग्नातून नव्हे, तर अन्य कारणामुळे पळाले असे रा. रा. वि. ल. भावे-तुळपुळे यांनी 'महाराष्ट्र सारस्वता'त (पाचवी आवृत्ती, पान 314) म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली कहाणी अशी - "लहानपणी रामदासांच्या थोरल्या बंधूला त्यांच्या वडिलांनी मंत्रोपदेश व अनुग्रह दिला. तो आपल्यालाही द्यावा असा आग्रह रामदासांनी धरला. परंतु तुला अधिकार नाही म्हणून बापाने निवारले व मंत्रानुग्रह दिला नाही. या गोष्टीची चीड येऊन नारायण हा रागाने घरातून निघून गेला." या मजकुरावर सारस्वतकारांनी एक टीपही दिली असून, त्यात म्हटले आहे, की &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नारायण ऊर्फ रामदास हा लहानपणी आपल्या लग्नाच्या वेळी अंतःपट धरला असताच, ब्राह्मण अष्टके म्हणत होते तोच नदाचा शेला दूर होण्यापूर्वीच तेथून एकदम पळाला, अशी हकीकत बखरकार सांगतात. ही गोष्ट महाराष्ट्रात स‌र्वभर मानली जाते. पण वर दिलेली हकीकत 'श्री सांप्रदायिक विवध विषय' या पुस्तकात दिली आहे. ती जास्त स्वाभाविक व खरी वाटते. स‌ावधान शब्द ऎकून पळून गेल्याच्या हकीकतीत काव्य आहे. ती सांगण्याला आणि ऎकण्याला गोड आहे. मोठ्या लोकांसंबंधी अशा गोड काव्यमय हकीकती चरित्रकार हौसेने सांगतात व पुष्कळ वेळा स्वतः चरित्रनायक अशा अद्भूत हकीकती पसरविण्यास कारण होतात. पण पुष्कळदा त्या स‌त्यशोधनाच्या आड येऊन चरित्रकारास फसविण्यास व वाचकास रंजविण्यास मात्र कारणीभूत होतात." &lt;br /&gt;&lt;br /&gt;'रामदास जन्मकथा'कारानेही तसेच म्हटले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;आचार्य अत्रे यांनी 23 डिसेंबर 1968 रोजी 'मराठा' मध्ये लिहिलेला श्री स‌मर्थांची टवाळी (भाग 2) हा लेख.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-7999137967598299051?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/buUpsqppzeg" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/buUpsqppzeg/blog-post_17.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R97C5HYR95I/AAAAAAAAAGs/SGbuK2G8-mo/s72-c/ramdas.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">3</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_17.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-3240966288791821373</guid><pubDate>Sat, 15 Mar 2008 17:03:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-15T11:00:25.162-07:00</atom:updated><title>वाद रामदास-शिवाजी संबंधाचा!</title><description>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R9wHcHYR93I/AAAAAAAAAGc/wF9367RPG3Y/s1600-h/srsmall.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R9wHcHYR93I/AAAAAAAAAGc/wF9367RPG3Y/s200/srsmall.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5178021851167848306" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Samarth_Ramdas"&gt;स‌मर्थ रामदास&lt;/a&gt; हे शिवाजी महाराजांचे गुरू होते काय, हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहिलेला आहे. या वादात स्वाभाविकच दोन पक्ष आहेत. पहिला पक्ष आहे महाराजांची व समर्थांची भेट शके 1571 मध्ये झाली होती असे मानणारांचा, तर दुस-या पक्षाचे म्हणणे आहे, ही भेट शके 1594 मध्ये झाली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पक्ष पहिला&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्या पक्षानुसार छत्रपती आणि रामदास स्वामी यांचे अतिशय निकटचे संबंध होते. शिवाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचे जे कार्य हाती घेतले होते, त्यामागील प्रेरणा समर्थांची होती. यास आधार म्हणून शिवाजी महाराजांनी रामदासांना लिहिलेले एक पत्र सादर करण्यात येते. &lt;a href="http://www.aroundpune.com/chaphal.htm"&gt;चाफळ&lt;/a&gt;ची स‌नद म्हणून ते पत्र ओळखले जाते. ते असे - &lt;br /&gt;&lt;br /&gt;" श. 1601-2&lt;br /&gt;सु. 1080-81&lt;br /&gt;इ. स. 1679-80&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी-रामदास&lt;br /&gt;&lt;br /&gt;चरणरज शिवाजी राजे यानी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे, मजवर कृपा करूनु स‌नाथ केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव ब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पाळणा रक्षण करावें. हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो  उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा; विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऎशीं स्थळें दुर्घट करावी; ऎसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें पूर्ण केलें. या उपरी राज्य संपादिलें. तें चरणीं अर्पण करुनु स‌र्वकाळ सेवा घडावी ऎसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं, तुम्हास पूर्वी धर्म सांगितलें तेच करावे. तीच सेवा होय. ऎसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऎशी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगव्हारी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंतविस्तिर्णता घडली."&lt;br /&gt;(शिवकालीन पत्रसार संग्रह 2237)&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पत्राचा मायना पाहता शिवाजीराजे यांच्या जीवनात रामदासांचे अतिशय महत्त्वाचे स्थान होते, असे दिसते. शिवरायांनी रामदासांच्या झोळीत राज्य टाकले होते, अशी कथा सांगण्यात येते. तिचाही उल्लेख या पत्रात आहे. या पत्राचे महत्त्व हे, की यावरून स्वराज्याची उभारणी होण्यापूर्वीच समर्थांची व शिवरायांची भेट झाली असली पाहिजे हे स्पष्ट होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;याशिवाय शिव-समर्थांच्या भेटीस अनेक कागदपत्रे आणि ऎतिहासिक संदर्भ यांचे पुरावे आहेत. यातील सर्वांत विश्वसनीय मानला जाणारा पुरावा आहे तो समर्थ वाकेनिशीचा. वाकेनिशी म्हणजे हकीकतीचे टिपण. समर्थ वाकेनिशीमध्ये त्यांच्या दिनचर्येचे वर्णन येते. ती त्यांच्या हयातीतच अनंत गोपाळ कुडाळकर (वाकेनिस) यांनी लिहून ठेवली होती. स‌मर्थ स‌माधिस्त झाल्यानंतर तीनच दिवसांनी (म्हणजे 25 जानेवारी 1682 रोजी), त्यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या गोष्टींचे टिपण वाकेनिसांनी लिहून ठेवले होते. तीच समर्थ वाकेनिशी या नावाने प्रसिद्ध आहे. या वाकेनिशीतील अठराव्या टिपणात पुढील नोंद आहे. - "शिवाजी महाराज यास अनुग्रह शके 1571त शिंगणवाडीचे बागेत वैशाख शुद्ध नवमीस गुरुवारी झाला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;हनुमंतस्वामी यांच्या बखरीतही हीच तारीख दिलेली आहे. हनुमतस्वामी हे स‌मर्थांच्या घराण्यातीलच. समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांच्यापासून ते चौथे पुरुष होत. पूर्वीच्या काळी पूर्वजांच्या आठवणी लिहून ठेवण्याची पद्धत होती, तीनुसार त्यांनी ठोसर घराण्याच्या अनेक आठवणी नोंदविल्या आहेत. हनुमंत स्वामींनी समर्थ चरित्र सांगणारी ही बखर समर्थ स‌माधिस्त झाल्यानंतर एक वर्षाच्या आत लिहिली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांनी 62 व्यक्तींना स्वतः राज्याभिषेकाचे आमंत्रण दिले होते. साता-याचे इतिहाससंशोधक पारसनीस यांनी या 62 लोकांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात पहिले नाव रामदासांचे आहे. मात्र रामदास या समारंभास उपस्थित राहिले नव्हते. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो अशी त्यांची वृत्ती असल्याने ते या सोहळ्यास हजर नव्हते इतकेच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चाफळ, सज्जनगड आणि शिवथर घळ येथे शिव-समर्थांच्या अनेक भेटी झाल्याचे गिरीधर स्वामींनी त्यांच्या समर्थ प्रतापमध्ये नमूद केले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यावरून शिवाजी महाराज यांची व समर्थ रामदासांची भेट शके 1571 मध्येच झाली आणि रामदास हे शिवाजीचे गुरू होते, असे स्पष्ट होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पक्ष दुसरा&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराज व समर्थांची भेट शके 1571ची म्हटल्यावर शिवरायांच्या कार्यामागे समर्थांची प्रेरणा असल्याचे आपोआपच सिद्ध होऊन जाते. दुस-या पक्षास हे मान्य नसून, त्यांच्या म्हणण्यानुसार राजांच्या स्वराज्य उभारणीशी समर्थांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या मते ही भेट शके 1594 किंवा त्यानंतरची आहे. यावेळेपर्यंत शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभारणीचे काम संपत आले होते. तेव्हा रामदास हे जरी त्यांचे गुरू ठरले तरी ते केवळ मोक्षगुरू ठरतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा 1594चा वाद सुमारे शंभर वर्षांपूर्वी रा. रा. गोविंद चांदोरकर यांनी प्रथम निर्माण केला. चांदोरकर हे वारकरी सांप्रदायाचे अभिमानी होते. आणि वारकरी सांप्रदायाच्या संतमालिकेत रामदासांना स्थान नाही, हे तर सर्वश्रुतच आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी समर्थांची बाजू घेऊन वारकरी संतांना टाळकुटे वगैरे म्हटल्याने चांदोरकर दुखावले होते. तशात त्यांना रामदासी सांप्रदायासंबंधी काही पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्यात त्यांनी शके 1594 साली केशव गोसावी यांनी दिवाकर गोसावी यास लिहिलेल्या एका पत्राची नक्कल सापडली. ते पत्र असे - &lt;br /&gt;&lt;br /&gt;"श्री गुरुभक्त-परायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसावी यासी प्रतिपूर्वक केशव गोसावी नमस्कार. उपरि येथील कुशल. आपण पत्र पाठवले ते पावले. मजकूर समजला. राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते स‌मजले. मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली. येणे होत नाही. मी इकडून येणेसाठी लिहिले. परंतु एकाचेही येणे व्हावयाचे नाही. गावी भानजी गोसावी तेथे असतील. राजे ह्यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे. उपयोग होईल. झाडी बहुत आहे. लोभ करावा मीति चैत्र व।। 1 शके 1594 हे विज्ञाप्त."&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पत्रात 'राजे ह्यांची पहिलीच भेट आहे' असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ राजे व समर्थांची तत्पूर्वी भेटच झाली नव्हती असा होतो. त्यामुळे बाकीच्या बखरींचे स‌र्व पुरावे गळून पडतात व शिवरायांनी समर्थांचा अनुग्रह घेतला असेल, तर तो यानंतर म्हणजे वयाच्या 42व्या वर्षानंतर असे सिद्ध होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे झाले दोन पक्ष. यात पहिल्या पक्षाचे पारडे जड  आहे, हे दिसतेच आहे. त्यांच्याकडे भरपूर पुरावे आहेत. त्यातील काहींबाबत संशय घेण्यास जागा असली तरी हे पुरावे शिव-समर्थांचे संबंध शिवरायांनी कार्यारंभ केला तेव्हापासूनचे आहेत हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, असे दिसते व दुस-या पक्षाचा स‌र्व डोलारा केवळ पहिलीच भेट झाली या एका वाक्यावर अवलंबून आहे हेही दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिसराच पक्ष &lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र स‌ध्या एक तिसरा पक्ष जोर धरू पाहात आहे. येथे त्याबाबत लिहावे की न लिहावे असा संभ्रम काही क्षण मला पडला होता. या पक्षाचे म्हणणे असे, की रामदास आणि शिवाजी यांची कधी भेटच झाली नव्हती. आता हे काही आजचे मत नाही. प्रा. न. र. फाटक यांनी तर 1929 मध्ये असे मत मांडले होते. जुलै 1929 च्या 'विविधज्ञानविस्तारा'त त्यांनी म्हटले आहे, की "जवळच्या स‌मकालीन लेखकांनी या दोघांच्या आपसातील संबंधांचा ओझरतासुद्धा उल्लेख करू नये व मागून झालेल्या लेखकांनी तोच संबंध कादंबरीसारखा विलक्षण गुंतागुंतीच्या विस्तारासह नमूद करावा ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे." (पृ. 256) मात्र आज हे मत मांडताना स‌भ्यतेच्या किमान मर्यादाही पाळल्या जात नाहीत. त्याचे उदाहरण म्हणून नागपूरच्या प्रा. मा. म. देशमुख यांच्या 'रामदास आणि पेशवाई' या पुस्तकाकडे पाहता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पूर्वीच्या दोन लेखांमध्ये आपण रा. रा. पु. ना. ओक आणि रा. रा. आचवल यांचे 'इतिहाससंशोधन'  पाहिले होते. त्यांना त्याद्वारे वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व कथन करायचे होते. रा. रा. देशमुख यांना त्यांच्या संशोधनातून ब्राह्मणांना ठोकायचे असून, &lt;a href="http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19970724/20550153.html"&gt;बहुजन समाजाला पेटवायचे &lt;/a&gt;आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. देशमुख यांच्या पुस्तकातील रामदासांविषयीच्या प्रकरणाचे नावच मुळी 'रामदास औरंगजेबाचा हेर होता' असे आहे. त्यांच्या मते - रामदास शिवाजीचे गुरू नव्हते. पण दिनायतराव, मुरार जगदेव, मुधोळचा बाजी घोरपडे या विजापूरच्या अदिलशहाच्या अंमलदारांचे, शिवाजीच्या शत्रूंचे ते गुरू होते. या अंमलदारांनी रामदासांच्या नव्या देवस्थानाला जमिनी इनाम दिल्याचा उल्लेख आहे. ज्या वर्षी शिवाजी राजांच्या पुंडाव्याबद्दल अदिलशहाने आपल्या अंमलदारांना जरबेची पत्रे लिहिली, त्याच वर्षी त्याच्याच हुकुमाने रामदासांनी मसुराच्या रामनवमीच्या उत्सवात आलेली आडव्या फांदीची अडचण निस्तरून घेतली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रामदास आणि औरंगजेबाचे संबंध होते. कधी कधी प्रसंगोपात त्यांच्या भेटी होत. त्या भेटी देव एकच आहे हे सांगण्याकरीता होत, असे 'दासविश्रामधामा'त म्हटल्याचे रा. रा. देशमुख यांनी रा. रा. शंकरराव देव यांच्या 'स‌मर्थचरित्रा'चा हवाला देत आपल्या लेखात म्हटले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संभाजीराजांचे वर्तन सुधारावे म्हणून शिवरायांनी त्यांना शृंगारपुरी ठेवले होते. संभाजी सोबत तेथे उमाजी पंडित होता. तेथून संभाजी स‌ज्जनगडावर रामदासांची भेट घेण्यासाठी गेला आणि त्याच्या दुस-याच दिवशी स‌ज्जनगडावरून तो थेट औरंगजेबाचा सुभेदार दिलेरखानाकडे गेला. तारीख होती 13 डिसेंबर 1678. ही घटना रा. रा. देशमुख यांनी रामदासांच्या हेरगिरीचा नमुना म्हणून दिली आहे! म्हणे, रामदासांच्या स‌त्संगतीचा संभाजीवर असा परिणाम झाला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. देशमुख यांची एवढी उद्धृते पुरेशी आहेत. या पुस्तकात त्यांनी याहून कहर केला असून, रामदासांवर थेट अनैतिक असल्याचे आरोप केले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जातीयवादी प्रचाराचा उत्तम नमुना एवढेच म्हणून या पुस्तकाकडे पाहावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;-----------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;वास्तविक शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी असे होते, त्यांनी त्यांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा दिली असे म्हटल्याने काहीही बिघडत नाही. शिवाजी महाराजांचे तसे गुरू आणखीही काही होते. त्या काळच्या अनेक संतसज्जनांशी त्यांचे संबंध होते. त्यांच्या भेटी ते घेत असत. प्रेरणांचे म्हणावे, तर ती जशी धार्मिक ग्रंथ नि पुरूषांपासून मिळते, तशीच ती आजुबाजूच्या वास्तवातूनही मिळत असते. आणि राजांचा या वास्तवाकडे कधीही  काणाडोळा झालेला नाही. फार फार तर येथे एवढे म्हणता येईल, की रामदासांशी संबंध असल्याचे सांगून राजांना उगा हिंदुत्ववाद्यांच्या रथात नेऊन बसवू नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;- महापूर - आचार्य अत्रे, परचुरे प्रकाशन मंदिर, पहिली आवृत्ती ऑगस्ट 1999, या पुस्तकातील स‌मर्थांचे स‌त्वहरण भाग 1 ते 3 हे लेख - पा. 190 ते 203.&lt;br /&gt;- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे - प्र. न. देशपांडे, स‌ुषमा प्रकाशन, धुळे, पहिली आवृत्ती 1983, पत्र क्र. 193, पा. 243.&lt;br /&gt;- रामदास आणि पेशवाई - प्रा. मा. म. देशमुख, शिवभारती प्रकाशन, पहिली आवृत्ती 1992. &lt;br /&gt;- शिव-समर्थ भेटीचे अनेक पुरावे - सुनिल चिंचोलकर, स‌ज्जनगड मासिक पत्रिका, 16 फेब्रुवारी 2001, पा. 25 ते 28.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-3240966288791821373?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/p0jbgniO5ls" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/p0jbgniO5ls/blog-post_15.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R9wHcHYR93I/AAAAAAAAAGc/wF9367RPG3Y/s72-c/srsmall.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">8</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_15.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6113092702043401414</guid><pubDate>Fri, 14 Mar 2008 15:52:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-14T09:38:24.669-07:00</atom:updated><title>आपले पूर्वज काय खात असत?</title><description>ऋग्वेदातील आर्य हे पशुपालन करणारे टोळी-संघ होते. त्यांचे कांस्य युगात भारतीय उपखंडात आगमन झाले. पशुपालन करणा-या या आर्यांचे मुख्य पशुधन गोधन होते. साहजिकच त्यांच्या भोजनात गायीगुरांपासून मिळणा-या पदार्थांचा स‌मावेश असणार. भारतीय उपखंडात आल्यानंतर या आर्यांनी शेती करण्यासही सुरुवात केली. पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यतः गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे. त्यासंदर्भातले एक सूक्त ऋग्वेदात आहे - क्षेत्रस्य पतीना वयं व हितेन जयामसी गामाश्वं पोशयिन्ता स‌नो मुळातिदृशे (4/57) &lt;br /&gt;&lt;br /&gt;ऋग्वेदाचा अंतकाळ, यजुर्वेदकाळ ह्या काळातच शेती व्यवस्थेची सुरूवात झाली. ऋग्वेदात फक्त याव (बार्ली) या धान्याचा उल्लेख आहे. यानंतरचा काळ ब्राह्मणग्रंथांचा काळ. या काळात अगोदरच्या मानाने शेतीतंत्र प्रगल्भ झाले होते. शस्यम या नावाने ओळखला जाणारा तांदूळ हे या काळातले मुख्य पीक. यजुर्वेदात तांदूळ, सातू, बोरे, जव, स‌ाळी या धान्यप्रकारांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे हविर्भागात तूप, दही, मध, काकडी, साळीच्या लाह्या यांचा स‌मावेश आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;ऎतरेय ब्राह्मणात तांदूळ व बार्ली यापासून तयार होणा-या धान, करंभ, परिवाप, पुरोडाश, पायस्या अशा पदार्थांची नावे आहेत. शतपथ ब्राह्मणात युवागुं या अन्नपदार्थाचा उल्लेख आहे. तो याव या धान्यापासून तयार करण्यात येत असावा. तैतिरेय ब्राह्मणात पृथुका, स‌क्तु, लाज (लाह्या. लाजाहोम - लज्जाहोम हा शब्द यापासूनच आला.), धाना, मसूस्य आणि करंभ अशा पदार्थांचा उल्लेख येतो. सायनाचार्य या जुन्या टीकाकाराच्या मते हे स‌र्व पदार्थ तांदूळ व बार्ली यांपासून बनविलेले आहेत. दुर्गाबाई भागवत सांगतात, वेदकाळातला पुरोडाश हा पदार्थ आपल्या इडलीसारखीच, पण मऊसा, लुसलुशीत, फारसा न फुगलेला पदार्थ असावा. तो तेव्हाच्या लोकांच्या नेहमीच्या आहारात असे आणि त्याचा नैवेद्य दाखवित असत. मात्र जयंत गडकरी यांच्या मते पुरोडाश हे दूध व लाह्या यांचे असावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मांसाहार&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र ब्राह्मणकाळात शेतीतंत्र आधीच्या काळापेक्षा प्रगल्भ झालेले असले, तरी धान्योत्पादन हे अजूनही गुजराण करण्याचे मुख्य साधन झाले नव्हते. या काळातही पशुंचे मांस हेच महत्त्वाचे अन्न होते. त्यांत &lt;a href="http://www.hinduonnet.com/2001/08/14/stories/13140833.htm"&gt;गाय, बैल, मेंढा, बकरा हेच मुख्य मांसाशन &lt;/a&gt;होते. विविध यज्ञांचा भाग म्हणून पशुयज्ञ होत. त्यामध्ये नेहमीच्या ग्राम्य पशूंबरोबर हरीण, मोर, तित्तीर, रेडा अशा विविध वन्य प्राण्यांचीही हत्या केली जाईल. श्राद्धसंसंस्कार विषयक समारंभांत बैलाचे मांस खाल्ले जाई. (जोगीराज बसू यांच्या एज् ऑफ ब्राह्मणाज या ग्रंथात ही माहिती दिली आहे.) शतपथ ब्राह्मणात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, की 'राजा किंवा ब्राह्मण घरी पाहुणा आल्यास त्या प्रीत्यर्थ बैल किंवा बकरा मारावा.' (राज्ञे वा ब्राह्मणाय वा महोक्शम् वा महाजाम् वा पचेत्). ऎतरेय ब्राह्मणांतही राजा किंवा प्रतिष्ठित गृहस्थ पाहुणा आल्यास बैल वा वंध्या गाय मारावी, असे सांगितले आहे. (मनुष्यराजे आगते न्यास्मिन् वा अर्हती उक्षाणाम् वा वेहतम् ला क्षदन्तः) शतपथ ब्राह्मणाचे एक कर्ते याज्ञवल्क्य म्हणतात - मी गायबैलाचे मांस खातो, पण ते मऊ असेल तरच! शतपथ ब्राह्मणात मांसाशनाची स‌र्वांत चांगले अन्न म्हणून प्रशंसाही केली आहे. (...एतदू परमम् अन्नाद्यम् यन् मांसम्)&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज मांसाहार आणि गोहत्या निषिद्ध मानण्यात येत असले, तरी प्राचीन आर्य-ब्राह्मणांसाठी तो धर्मकृत्यांचा एक भाग होता. सत्ययुगातल्या सोळा श्रेष्ठ राजांपैकी एक असा जो रन्तिदेव, तो अतिथीधर्मासाठी खूपच प्रसिद्ध होता. महाभारतातील वर्णनानुसार त्याच्या पाकशाळेत रोज दोन हजार गायींचा वध होत असे. त्यांची ओली चामडी पाकशाळेत ठेवलेली असत. त्यांतून झिरपणा-या पाण्याचा एक प्रवाह बनून मग त्याची नदी बनली. चर्मामधून उगम पावणारी नदी म्हणून तिला चर्मण्वती नाव पडलं! महाभारतातला तो श्लोक असा आहे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;राज्ञो महानसे पूर्वं रन्तिदेवस्य वै द्विज&lt;br /&gt;आहन्यहनि वध्यते द्वो स‌हस्त्रो गवां तथा&lt;br /&gt;स‌मासं ददतो हन्नं रन्तिदेवस्य नित्यशः&lt;br /&gt;अतुला कीर्तिरभवन्नृपस्य द्विजसत्तम &lt;br /&gt;(वनपर्व, 208/8-10 )&lt;br /&gt;&lt;br /&gt;गायींचा वध करणा-या या रन्तिदेवाचं कीर्तिगायन कालिदासाने मेघदूतामध्ये केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे साधारणतः बुद्धोत्तरकालात गोमांसवर्जनास सुरूवात झाली. &lt;a href="http://www.answers.com/topic/rahul-sankrityayan"&gt;पं. राहुल ‌सांकृत्यायन &lt;/a&gt;यांच्या प्रतिपादनानुसार, ब्राह्मण हे बौद्धांना आपले जबरदस्त प्रतिस्पर्धी मानीत असत. बौद्ध गोमांसभक्षक होते. म्हणून मग ब्राह्मणांनी गोमांसवर्जन आणि गोब्राह्मणसंरक्षण यांचा प्रचार सुरू केला. धर्मसूत्रांत विविध प्राण्यांचे मांस निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. दूध देणारी गाय (धेनू, अनु दुहा) व बैल यांचे मांस खाण्याच्या निषेधाने याची सुरूवात झाली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;चटणी-कोशिंबिर...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाभारत काळात  (इसवीसन पूर्व सुमारे 300 वर्षे हा मूळ महाभारताचा काळ असल्याचे मत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मांडले आहे. मात्र महाभारताची संस्करणे लक्षात घेता हा काळ इसवीसनाच्या आठव्या-नवव्या शतकापर्यंत येतो.) वराहाचे आणि हरिणाचे मांस लोकांचे आवडते होते. त्याचबरोबर याकाळी भाज्या, आमट्या, चटण्या, कोशिंबिरी, गोड पदार्थ तयार होत होते. तांदूळ, गहू, ज्वारी, सत्तू इत्यादी धान्ये लोकांच्या खाण्यात होती. उत्तम कंदमूळे, फळे, मध, तूप, स‌ुंठ घालून पक्वान्ने तयार करीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मद्यपान&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या पूर्वजांना मद्यपान निषिद्ध नव्हते. ऋग्वेदापासून मद्याचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात सोम हा देव आहे. पण मुळात ते आर्यांचे उत्साहवर्धक पेय आहे. सोमवल्ली नावाच्या वेली कुटून ते केले जाई व कुटण्याची क्रिया ग्राव या कठिण दगडाच्या साह्याने केली जाई असे उल्लेख वारंवार येतात. ऋग्वेदात तर एक ग्रावसुक्त आहे. सोमात दूध घातले जाई. पं. राहुल सांकृत्यायन यांच्या मते सोमात घोडीचे दूध मिस‌ळले जाई. यावरून ते आपण समजतो तसे आधुनिक मद्य नाही. ती भांग होय. हा पदार्थ नित्यसेवनात असे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुरुषमेध यज्ञामध्ये तेव्हाच्या स‌र्व कारागिरी व्यवसायांचा एकत्रित उल्लेख आहे. त्यात सुराकार म्हणजे दारू बनविणारा याचाही स‌मावेश आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.marathiworld.com/sahitya/sahitik/bhagwat.htm"&gt;दुर्गाबाई भागवतां&lt;/a&gt;नी सीतेबद्दलही अशीच एक रंजक माहिती दिली आहे. त्या सांगतात, की सीता ही क्षत्रिणी होती, मांसाहारी होती. वनवासाला निघताना सुरूवातीलाच शरयू नदी ओलांडून जायच्या अगोदर तिने तेथील देवीची पूजा केली. तिला सांगितलं, की वनवासातून सुखरूप परत आल्यावर मी स्वतः मांसाचा स्वयंपाक करून तुला नैवेद्य दाखविन आणि मद्य देईन. त्याठिकाणी तो पदार्थ कोणत्या प्राण्याच्या मांसाचा वगैरे काही दिलेले नाही. सीता तांदळापासून मैरेय नावाचे मद्य बनवायची, असाही उल्लेख आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कौटिलिय अर्थशास्त्रात मद्य कसे करायचे याची माहिती दिलेली आहे.   &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्राचीनांची पाककला&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भीम हा खादाड असल्याचे आपणांस माहित असते. पण तो उत्तम स्वयंपाकीही होता. अज्ञातवासात असताना विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणूनच तो नोकरी करीत होता. (म्हणजे हा तर जगातला पहिला सेलेब्रिटी शेफ!) या भीमाच्या खात्यावर दोन छान पदार्थ जमा आहेत. श्रीखंड कसे करायचे हे त्यानेच शोधून काढले. आज आपण खातो त्या फ्रूट स‌लाडचा शोधही भीमानेच लावला आहे. पण त्याचं फ्रूट सलाड दुधातले नव्हते. दही, साखरेत वेगवेगळी फळे घालून ते केलेले असे. त्याला शिखरिणी असे नाव होते. म्हणजे हे आपले शिकरण!&lt;br /&gt;&lt;br /&gt;भीमाप्रमाणे श्रीकृष्णही पाकशास्त्र जाणत होता. त्याने घीवर हा पदार्थ शोधून काढल्याचे सांगितले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुराणप्रसिद्ध नलराजा याचे तर पाकशास्त्रावर एक पुस्तकच आहे. तो विविध खाद्यपदार्थ करण्यात पारंगत होता. आपण ज्याला मसाले म्हणतो त्याला तो धातू म्हणतो. पाणी थंडगार कसे ठेवायचे, ते सुवासिक कसे करायचे, पाण्याचा बर्फ कसा करायचा हेही त्याने सांगितले आहे. नलराजा हिमालयाजवळ राहणारा. त्यामुळे त्याने हिमालयावरून बर्फ खाली कसा आणायचा, तो साठवून ठेवायचा कसा हेही सांगितले आहे. या नलराजाची आठवण म्हणून आजही धुंधुरमास केला जातो. (धुंधुरमास म्हणजे पहाटे उठून स्वयंपाक करून सूर्योदयालाच जेवायची पद्धत.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदर तेव्हाचे पुरूष, एवढेच नव्हे, तर राजे वगैरे लोकही पाककुशल असत. आता पुरुषांनी स्वयंपाक करणे यात काही विशेष नाही. आजही लग्नकार्यासारख्या मोठ्या समारंभात स्वयंपाक करायचा असेल, तर तो पुरुषच करतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;- &lt;a href="http://www.popularprakashan.com/Showbook.asp?bookid=222"&gt;समाज आणि धर्म &lt;/a&gt;- ऋग्वेदकाळ ते पुराणकाळ - जयंत गडकरी, ग्रंथाली, पहिली आवृत्ती - 1989, पाने - 7, 10, 45 ते 47.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- ऎसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन, नोव्हें. 1999, पाने 151 ते 156.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- वोल्गा ते गंगा - राहुल सांकृत्यायन, लोकवाड्मय गृह, दहावी आवृत्ती 2006, पाने 27, 164, 165, 167.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6113092702043401414?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/1ymsIAxV6rc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/1ymsIAxV6rc/blog-post_14.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">9</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_14.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6793029007108662571</guid><pubDate>Tue, 11 Mar 2008 16:57:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-13T09:04:31.465-07:00</atom:updated><title>ख्राईस्ट म्हणजे कृष्ण आणि मुसलमान हे सामवेदी !!!?</title><description>गोपाळ गणेश आचवल यांच्यापासून पु. ना. ओक यांनी प्रेरणा घेतली की कसे हे नक्की सांगता येणार नाही, पण ओक यांच्या संशोधनात आणि आचवल यांच्या संशोधनात खूपच साम्य दिसून येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रंथाच्या प्रस्तावनेत आचवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामध्ये त्यांनी मक्केविषयीचा मजकूर पाहिला आणि त्यांना हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मग त्यांनी जयंतराव टिळकांकडून एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचे खंड आणले. काही संदर्भ पुस्तके विकत घेतली. शिवाय हिंदुधर्माविषयीचा त्यांचा अभ्यास होताच. त्यातून हा 510 पानांचा महाग्रंथ बाहेर पडला. या ग्रंथाची प्रस्तावनाच 140 पाने आहे. या अभ्यासातून आचवल यांना काय सिद्ध करायचे होते तर ते हे, की सर्व जगभर वैदिक धर्म होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रंथाच्या पहिल्या दोन प्रकरणात त्यांचा मुख्य भर बायबलवर आहे. बायबलमध्ये कृष्णमयता किती आहे, हे सांगताना ते लिहितात, कृष्णमास आणि ख्रिसमस हे एकच. ख्राईस्ट म्हणजे कृष्ट म्हणजे उटी लावलेला, स‌ेंट जॉन म्हणजे स‌ंत जनार्दन, स‌ेंट मऍथ्यू म्हणजे संत माधव. &lt;br /&gt;जुदा इस्कारियट म्हणजे यदुवंशी अक्रूर याने जेजस ख्राईस्ट म्हणजे यशोदा कृष्ण याला हेरोदी म्हणजे हरिविरोधी कंस याच्याकडे मारावयास हवाली केले. ओकांनीही शब्दोत्पत्तीच्या साम्यावर अशाचप्रकारे भर दिलेला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुसलमानांविषयीचे आचवलांचे संशोधन तर अफलातून आहे. त्यांच्या संशोधनानुसार मुसलमान हे स‌ेमेटिक म्हणजे सामवेदी. मुसलमान म्हणजे लढाईत मुसलायुध वापरणारे लोक. ते स‌लाम म्हणतात तो श्रीराम. मुसलमानातले स‌ुनी म्हणजे वैष्णव आणि शिया म्हणजे शैव. मुसलमानांचा शादी हा शब्द स‌ीतेपासून आला. महंमद पैगंबराच्या आईचे नाव अमिना (यमुना) होते. त्याच्या मुलीचे नाव फातमा (पद्मावती) होते. त्याच्या दुस-या बायकोचे नाव Sauda  स‌ीता असे होते.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे काही संशोधन नमुनेही पाहण्यासारखे आहेत. - &lt;br /&gt;&lt;br /&gt;इंद्राने जेव्हा अतिवृष्टी केली तेव्हा गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी उचलून धरला. त्या कथेला अनुलक्षून girder (गिरिधर) तुळई असा शब्द आहे. Beam म्हणजे तुळई असा शब्द आहे, तोदेखील ती तुळई भीमासारखी मजबूत असावी, अशा अर्थी आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हिप हिप हुर्रा म्हणजे हे प्रभो प्रभो हरे. (पु. ना. ओक यांनी याची व्युत्पत्ती स‌ीप स‌ीप हरे - शीव शीव हरे अशी दिली आहे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;हनीमून म्हणजे हनुमान. (हनुमानाप्रमाणे ब्रह्मचर्य पाळणे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;पेशव्यांच्या दरबारी इंग्लिश रेसिडेन्ट मऍलेट - मारूती होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रुसेड म्हणजे क्रिश्चन - श्रीकृष्णानुयायांनी मुसलमानांबरोबर श्रीकृष्णाप्रीत्यर्थ केलेले युद्ध.&lt;br /&gt;&lt;br /&gt;युरोपियन लोक वृंदावनाला ब्रऍंडिवाईन आणि शंकराला शूमेकर म्हणतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जोन ऑफ आर्क म्हणजे जनाबाई.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता याला इतिहास संशोधन म्हणायचे की काय, हे ज्याने त्याने ठरवावे.&lt;br /&gt;पण एक मात्र खरे, की या पु.ना. स्कूलचा प्रभाव अनेकांवर आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यंतरी एक कादंबरी वाचली. 'पाताळयात्रा' नावाची. लेखक आहेत अनिल ज. पाटील. (उन्मेष प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 2002, पाने 276, किं. 200 रु.) अतिशय मनोरंजक, रहस्यमय अशी ही कादंबरी. हातात घेतली तर वाचल्याशिवाय खाली ठेववणार नाही अशी. बळीराजाला वामनाने पाताळात लोटले या कथेवर ही कादंबरी आधारलेली आहे. पाताळ म्हणजे पेरूदेश आणि तेथे बळीला धाडण्यात आले, असे कल्पून लिहिलेली ही कादंबरी एखाद्या इंग्रजी रहस्यकथेच्या तोडीस तोड अशी आहे. या कादंबरीत रा. रा. पु. ना. ओक यांच्या ऋणाचा निर्देश केला असून, अन्य ग्रंथांप्रमाणेच ओक यांच्या काही पुस्तकांचाही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केलेला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. अनिल पाटील यांनी पेरू, तेथील &lt;a href="http://archaeology.about.com/od/incaarchaeology/a/inca_empire.htm"&gt;इन्का संस्कृती &lt;/a&gt;आणि वैदिक व द्रविडी संस्कृती यांत नाते असल्याचे कादंबरीत दाखविले आहे. एकूणच मोठे मनोरंजक, तितकेच गंभीर असे ते आहे.   &lt;br /&gt;ते वाचल्यानंतर वाटते, की पुना स्कूलच्या अंगाने जाण्यापेक्षा  इतिहाससंशोधकांनी अधिक गंभीर मार्ग चोखाळला तर किती बरे होईल.     &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ - &lt;br /&gt;- आगळं-वेगळं - स. गं. मालशे, सुपर्ण प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती 1986, पाने 146 या पुस्तकातील विश्वव्यापी वैदिक संस्कृती हा लेख.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6793029007108662571?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/KHGZdXfHltE" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/KHGZdXfHltE/2_11.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">6</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/2_11.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-1323684163782319105</guid><pubDate>Tue, 11 Mar 2008 15:58:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-11T20:34:53.857-07:00</atom:updated><title>इतिहास संशोधनाचं 'पुना' स्कूल</title><description>'खरा इतिहास' असं काही असतं काय याबद्दल माझ्या मनात शंका आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण उदाहरणार्थ चारशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट अशी अशी घडली हे कशावरून सांगतो, तर त्याबाबतच्या लेखांवरून. ते लेख ग्रंथांतले असतात, बखरींतले, कुणाच्या रोजनिशीतले, पोथीतले, ताम्रपटावर वा शिळेवर कोरलेले वगैरे असतात. तर अशी काही इतिहासाची साधने आपण अभ्यासतो आणि मग सांगतो, की ती घटना अशीच घडली. पण तेवढ्यावरून ती घटना तशीच घडली हे कसे काय बुवा नक्की होते? माझ्यापुढचा प्रश्न हा आहे. स‌मजा एखाद्या घटनेबाबत दोन मतं असलेले पुरावे सापडले. तर मग काय करायचं? मग वाद होतात. दोन्ही पक्ष आपण सांगतो तेच खरं असं मानू लागतात. आपल्याकडे शिवजयंतीचा वाद झाला होता मागे, तसं ते स‌गळं होतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे आज आपण जे खरं मानून चालतो इतिहासातलं, ते खरं असतं ते आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांपुरतंच. उद्या आणखी काही पुरावे मिळाले, तर आजचं खरं उद्याचं खोटं ठरू शकेल. तेव्हा इतिहासकारानं उगाच न्यायाधीश बनू नये. स्वतःस ब्रह्मदेव स‌मजण्याची चूक करू नये आणि अस्मितांच्या वगैरे गोंधळात तेल ओतण्याचे उद्योग करू नयेत. त्याने आपलं स्वच्छ  सांगावं, की बाबांनो, आज उपलब्ध असलेला पुरावा हा असा असा आहे. त्याचा अन्वयार्थ मी असा असा लावलेला आहे. त्यासाठी माझी अभ्यासाची, विचारांची दिशा ही ही होती. तेव्हा आहे ते एवढंच आहे. बस्स! या पुढे एक अक्षर जास्त नाही की कमी!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता असं होत नाही का? मी एकाही इतिहासकारावर अप्रामाणिकपणाचा आरोप करण्यास तयार नाही. पण होतं काय की इतिहासकार ही माणसेच असतात. आणि माणसांकडे आपापले दृष्टिकोन असतात. त्या चष्म्यातून ती इतिहासाकडे पाहू जातात. कडवे राष्ट्रवादी, धार्मिक-वांशिक-जातीय अस्मितावाले, स‌माजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवाले आणि साम्राज्यशाहीवाले... खूपखूप चष्मे आहेत. त्यातलाच एक मोठा गंमतीदार चष्मा आहे. ओकांचा चष्मा! &lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या गावाकडच्या जत्रेत एक तंबू यायचा आरशांचा. हे भले भले आरसे. पण स‌गळे वेडेवाकडे. कधी त्यात आपण बुटके दिसायचो, तर कधी फताडे. कधी उंच, तर कधी काटकुळे. चेहरे तर असे दिसायचे की हसून हसून पुरेवाट व्हायची दुस-यांची!  तर हा जो गंमतीदार चष्मा आहे, तो या आरशांसारखाच आहे. त्यातून इतिहासही असाच दिसतो. तर सादर आहे ओकांचा चष्मा!&lt;br /&gt;&lt;br /&gt;-------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वैदिक क्षत्रियांचे विश्वसाम्राज्य&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Purushottam_Nagesh_Oak"&gt;पु. ना. ओक &lt;/a&gt;हे एक स‌नातन वैदिक धर्मावर असीम श्रद्धा असलेले इतिहासाचे अभ्यासक होते. आपल्या या अभ्यासातून त्यांनी 'भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका' मांडल्या आहेत. त्यांच्या मते, "कौरवपांडवयुद्धापर्यंत जगात स‌र्वत्र वैदिक क्षत्रियांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात संस्कृत हीच सर्व मानवांची भाषा होती. चार-पाच हजार वर्षांपूर्वी &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/History_of_Syria"&gt;स‌िरिया&lt;/a&gt;, &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Asyria"&gt;असिरिया&lt;/a&gt;, &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Babylonia#History"&gt;बाबिलोनिया&lt;/a&gt;, &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Mesopotamia"&gt;मेसोपोटेमिया&lt;/a&gt; ही प्राचीन राष्ट्रे होती. परंतु सुर व असुरांत वैर होते. वैदिक साम्राज्य मोडल्यानंतर सुरांचे राज्य सुरिय (Syria) व असुरांचे Assyria  झाले." त्यांच्या मते बाबिलोनीया म्हणजे बाहुबलनीय व मेसोपोटेमिया म्हणजे महिषीपट्टनीयम = राणिपूर. "वैदिक ‌संस्कृती लोप पावत केवळ सिंधु प्रदेशातच टिकून राहिली म्हणून तिचे नाव हिंदू. वैदिक विश्वसाम्राज्याची भाषा ‌संस्कृत असल्याने प्राचीन काळी देशांची, सागरांची वगैरे नावे संस्कृतच होती." त्या नावांचा नंतर अपभ्रंश झाला. "उदा. स‌िंधुस्थानचे हिंदुस्थान, त्याप्रमाणे अर्बस्थान, तुर्गस्थान, कझाकस्थान, बलुचिस्थान, अफगाणिस्थान इत्यादि. रशिया हे मूळचे ऋषिय होते. स‌ैबेरिया - शिबिरिय, प्रशिया - प्रऋषिय, पार्थिया - पार्थीय, ग्रीस - गिरीईश, युरोप - स‌सुरूप, ऑस्ट्रेलिया - अस्त्रालय, अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय, जर्मनी अर्थात Deutschland - दैत्यस्थान, Dutch -  दैत्य."&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर या पुराव्यांवरून विश्वात पूर्वी वैदिक ‌संस्कृती होती!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;इस्लामचे वैदिक मूळ&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम हा धर्मही मूळचा वैदिकच आहे! `इस्लामचे वैदिक मूळ' या प्रकरणात ते सांगतात, मक्का नगर इस्लामपूर्व आंतरराष्ट्रीय वैदनक धर्माचे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र होते. मक्का = मखः (म्हणजे यज्ञ) आणि मदिना = मेदिनी (म्हणजे पृथ्वी). यावरून मक्कामदिना ही मखमेदिनी म्हणजे यज्ञभूमी होती. मक्का-मदिनेची उत्पत्ती लागली. पण काबाचे काय?  तर "मक्केत शेषशायी विष्णूचे विशाल मंदिर होते. त्याच्या गर्भगृहास ‌संक्षेपाने गाभा म्हणत. त्याचाच अपभ्रंश काबा असा झाला." &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Mecca#History"&gt;काबा या स्थानी विविध देवदेवतांच्या 360 मूर्ती होत्या&lt;/a&gt;. इ. स. 930 ह्या वर्षी कारमेथियन लोकांनी काबा लुटून त्यातले शिवलिंग पळवून नेले," असे ते एन्सायक्लोपेडिया इस्लामिया आणि एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचा आधार घेऊन सांगतात. शिवाय अर्वा म्हणजे घोडा. यावरून अर्बस्थान - अर्वस्थान म्हणजे घोड्यांचा देश हे नाम तयार झाले. "यावरून वैदिक क्षत्रियांनी तेथे जातिवंत घोड्यांची उत्पत्ती शास्त्रीय पद्धतीने करविली होती."&lt;br /&gt;&lt;br /&gt;इस्लामचा प्रेषित महंमद पैगंबर याचे मूळही वैदिकच होते. ते कसे, तर महंमद हा ‌संस्कृत बहुब्रीही स‌मास आहे. 'महान मदः यस्य इति महंमद'. महंमदाच्या कुलाचे नाव कुरेशी. कुर + ईशी. हे कौरव कुलातील लोक होते. अल्ला, अंबा, अक्का ही देवीची द्योतक स‌मानार्थी नावे आहेत. महंमद पैगंबराची कुलदेवता अल्ला (ऊर्फ अंबा) होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;येशू ख्रिस्त हे काल्पनिक पात्र&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पु. ना. ओक यांच्या मते "येशू ख्रिस्तही वास्तविक काल्पनिक आहे. पण तसा कोणी मनुष्य होता हे खरे मानले तरी एखाद्या भंपक आरोपावर असहाय्यपणे धरून खिळे ठोकून भीषण मृत्यू पावलेला मनुष्य कधी स‌र्वशक्तिमान परमेश्वराचा अवतार असतो का?" असा खडा स‌वाल ते टाकतात. कारण त्यांच्या धारणेनुसार "ईश्वरावतारी व्यक्ती अहिंसावादी असूच शकत नाही." &lt;br /&gt;&lt;br /&gt;वास्तविक ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनितीच आहे. तो शब्द ख्रिश्चनिटी = कृस्तनिती = कृष्णनिती असा तयार झाला. Constantine = Cons + Tantine =  कंस - दैत्यन्. यावरून युरोपात महाभारतात होते, असे रा. रा. ओक यांचे म्हणणे आहे. जेरूसलेम ऊर्फ येरुशालेम म्हणजे यदु ईशालयम्. आफ्रिकेतील एका बंदराचे नाव दारेसलाम असे आहे. हे द्वार ईशालयचा अपभ्रंश आहे. त्यावरून प्राचीन काळी तेथे एक टोलेजंग श्रीकृष्णाचे वा अन्य देवतेचे मंदिर असले पाहिजे, असेही ते सांगतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यावरून राम व कृष्ण यांचे प्राचीनत्व ‌िसद्ध होते असा त्यांचा दावा असून, त्या समर्थनार्थ ते सांगतात, की जपानमधील शिंटो हा शब्द म्हणजे िसंधु स‌संस्कृतीचा अपभ्रंश आहे. चीनमध्ये देव शब्दाचा उच्चार ताओ असा आहे. तेथील ताओ म्हणजे देव हे राम-कृष्ण-शिव इ. असल्याने Taoism (ताओईझम) म्हणजे वैदिक ऊर्फ हिंदु संस्कृतीच. रामवरून Rome झाले, रामघाट म्हणजे इंग्लंडमधील Ramsgate, असे अनेक 'पुरावे' देत रा. रा. ओक राम व कृष्णाचे प्राचीनत्वही स‌िद्ध करतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वैदिक संस्कृतीतील विज्ञान&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही वैदिक संस्कृती महान होती हे तर झालेच, पण तिने मोठी वैज्ञानिक प्रगतीही केली होती. रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार "पूर्वी ज्योतिर्लिंगे ही अणुशक्ती निर्माण करणारी केंद्रे असत... म्हणून शंकराच्या पिंडीवर स‌तत पाणी ठिबकत ठेवलेले असते. शंकराच्या पूजेचे सांडपाणी किरणोत्सर्गी असे म्हणून ते ओलांडून न जाता भक्तगण आल्या वाटेने परत येत."&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेद हे पृथ्वीवरील चमत्कार आहेत. ते अपौरूषेय आहेत, अशा शब्दांत रा. रा. ओक वेदांची महती गातानाच सांगतात, की "वेद हे पृथ्वीवरील जीवनास लागू असणा-या स‌मस्त शास्त्रीय ज्ञानाचे भांडार असल्याने एका वर्गाने ते घोकून स‌तत जतन करावे असा ईश्वरी संकेत आहे. त्या भांडारातून मानवास असे प्रात्यक्षिक ज्ञान वेळोवेळी मिळवू पाहणा-यास तीन गुण आवश्यक आहेत. ते असे - 1) वेद हे संस्कृतात असल्याने त्यातून ज्ञानाचे कण घेऊ पाहणारा मनुष्य संस्कृतज्ञ असला पाहिजे. 2) वेदात उच्चतम वैश्विक स्तराचे ज्ञान उद्धृत असल्याने त्यातून काही ज्ञान मिळू पाहणारी व्यक्ती स्वतः उच्च विद्याविभूषित (म्हणजे उदा. एम.एस्सी. उत्तीर्ण श्रेणीची) असावी. 3) ती व्यक्ती अनासक्त, स्थितप्रज्ञ, विरक्त जीवन जगत असावी." &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;इस्लामचे योगदान शून्य&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हे स‌गळं झाल्यावर रा. रा. ओक आपणांस भारतीय इतिहाससंशोधनातील आणखी एक घोडचूक सांगू लागतात. इस्लामचे हिंदुस्थानच्या इतिहासात काही योगदानच नस‌ल्याचे त्यांचे मत आहे. "एेतिहासिक म्हणून गणली गेलेली कोणतीच इमारत इस्लामी नाही," असा त्यांचा सिद्धांत आहे. ते विचारतात, "इस्लामी हल्लेखोरांनी स‌र्व कबरीच कबरी व मशीदीच मशीदी कशा बांधल्या? पांडवांपासून पृथ्वीराजापर्यंत स‌ुमारे 6500 वर्षांतील हिंदु राजेरजवाड्यांचे महाल कोठे आहेत? बापाचा व भावांचा वध करून गादी बळकावणारे मुसलमान स‌ुलतान बादशहा पदरचे कोट्यवधी रुपये खर्च करून मारलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रेतांच्या निरर्थक निवा-यासाठी टोलेजंग कबरी व निर्धन सामान्य मुसलमानांना नमाज पढण्यासाठी भव्य मशिदी का उभारतील?...&lt;br /&gt;ताजमहाल, लालकिल्ला, जामा मशीद, मोती मशीद, अजमेरचा दर्गा ते तथाकथित मकब-यांपर्यंत स‌र्व इमारती तसेच फतेपूर सिक्री सारखे शहरही मुस्लिम नाही." हे कशावरून, तर त्याचे भरभक्कम पुरावे रा. रा. ओक यांच्याकडे आहेत.  ते सांगतात - &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुमताझमहलचे खरे नाव शाहजहानच्या दरबारी बखरीत मुमताझ उल् झमानी असे आहे. मुमताझमहलमध्ये झ हे अक्षर आहे, तर ताजमहालात ज हे अक्षर येते. शिवाय तत्कालिन परदेशी प्रवासी ताजमहालचा ताज-इ-महल वा ताज-ए-महल असा उल्लेख करतात. त्यावरून तो शब्द मुळात संस्कृत तेजोमहालय असाच तत्समयीच्या आग्र्यातील हिंदूंच्या तोंडून एकलेला पाश्चात्यांच्या नोंदींत उतरला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लालकिल्ला हेस‌ुद्धा हिंदूच नाव आहे. अहमदनगरमधील नगर हा शब्द हिंदुत्व सिद्ध करतो. &lt;br /&gt;फतेपूर सिक्री मधील फते सोडल्यास पूर व सीकरी ऊर्फ सीकडी हे संस्कृत शब्द आहेत. &lt;br /&gt;अशा प्रकारे काही एेतिहासिक मुस्लिम स्थळे वा वास्तू यांची नावे ही संस्कृत नावांचे अपभ्रंश आहेत वा संस्कृत नावांशी त्यांचे साधर्म्य आहे म्हणून त्या इमारती वा स्थळे मुस्लिम नाहीत. त्याचप्रमाणे काही इमारतींच्या बांधकामासाठी लाल (केशरी) रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. उदा. लालकिल्ला, जामा मशीद, कुतुबमिनार वगैरे. केशरी रंग हा वैदिक, राजपूत रंग आहे. म्हणून या इमारतीही वैदिक आहेत. त्याचप्रमाणे काही इमारतींच्या बांधकामात हिंदू प्रतिके वा संस्कृतात कोरलेली वचने आढळतात, म्हणून त्या इमारती मुस्लिम नाहीत, असे रा. रा. ओक पुराव्यादाखल सांगतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे झाले इमारती वा शहरांचे. अन्य क्षेत्रातील इस्लामी योगदानाचे काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;रा. रा. पु. ना. ओक विचारतात, "इस्लाममध्ये कोणत्याही जिवंत प्राण्याची आकृती काढणे निषिद्ध असतां धर्मांध इस्लामी हल्लेखोरांनी चित्रकला जोपासली वा वाढीस लावली असणे शक्यच नाही. इस्लामी चित्रशैली इस्लामी नाही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;संगीताची वाढही मुसलमानांनी केली नाही. "संगीतकला जगाच्या आरंभापासून सामवेदांतून निर्माण झाली आहे. म्हणून पाश्चात्य संगीतदेखील वेदमूलकच आहे, हे sing, song, singer, singin आदी संगीतमूलक शब्दांवरून कळून येईल. इस्लाम व संगीताचे विळ्या-भोपळ्यासारखे वाकडे आहे." &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;इतिहाससंशोधक गोपाळ गणेश आचवल&lt;/strong&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;पु. ना. ओक यांच्याप्रमाणेच गोपाळ गणेश आचवल यांनीही इतिहाससंशोधन केले आहे. त्यांच्या ग्रंथाचे नाव `विश्वव्यापी वैदिक संस्कृती - भाग पहिला' असे असून, हा ग्रंथ 510 पानांचा आहे. याचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला नाही. आचवल यांचे संशोधन पाहता तेही 'पुना स्कूल'चेच असल्याचे दिसून येते. त्यांचे संशोधन आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहू या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका - पु. ना. ओक, मनोरमा प्रकाशन, जाने. 1992, किं. 150 रु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;Pls read - &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/The_Quest_for_the_Origins_of_Vedic_Culture"&gt;The Quest for the Origins of Vedic Culture - by Edwin Bryant&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-1323684163782319105?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/12ww5zJdxr4" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/12ww5zJdxr4/blog-post_11.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">7</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_11.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6463689380522420196</guid><pubDate>Mon, 10 Mar 2008 13:10:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-10T06:20:29.922-07:00</atom:updated><title>सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता!</title><description>एखादे असत्य वारंवार सांगितले, की ते सत्यच वाटू लागते. इतिहास वाचताना हे अनेकदा दिसून येतं. मराठ्यांच्या इतिहासातलं असं एक प्रकरण म्हणजे सूर्याजी पिसाळ याची फितुरी. या माणसाने देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;या फितुरीची आख्यायिका रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासतीच्या दुस-या, 'स्थिरबुद्धी राजाराम' या खंडात दिली आहे. (पृ.156-157). त्यात म्हटले आहे, - &lt;br /&gt;&lt;br /&gt;"शौर्यादि गुणांत मराठे कोणासही हार जाणारे नाहीत; त्यांचे मरण गळेकापू स्वभावात आहे, हा प्रकार रायगड किल्ल्याचे बाबतीत चांगला निदर्शनास आला. किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता. त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्यावेळी येसूबाईची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत ती मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली." &lt;br /&gt;&lt;br /&gt;ही झाली आख्यायिका. वास्तविक सू्र्याजी पिसाळ वतनलोभी होती. संधीसाधू होता. स्वराज्य स्थापनेमागे शिवछत्रपतींचे जे हेतू होते, ते कळूच न शकणारा दगड होता. पण त्याने फितुरी केलेली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा गृहस्थ वाई परगण्यातील ओझर्डे गावचा पाटील. संपूर्ण वाई परगण्याचा देशमुख वतनदार बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. शिवाजी राजांच्या कारकीर्दीत वाईच्या देशमुखीवर दत्ताजी केशवजी पिसाळ होता. याचा पुत्र केशव. त्याच्या पत्नीने दीर गंगाजी याचा पुत्र दत्ताजी यास दत्तक घेतले होते. संभाजी राजांच्या काळात, 1688 मध्ये स्वराज्यावर मोगलांनी जोराचा हल्ला केला. वाई परगणा मोगलांच्या ताब्यात गेला. तेव्हा स्वराज्याशी एकनिष्ठ असलेला दत्ताजी परागंदा झाला. त्याचे देशमुखी वतन वाईचा अंमलदार न्याहरखान याने बळकावले. या धामधुमीत सूर्याजीच्या मनाची चलबिचल सुरू होती. त्याने गावचा वसूल सरकारात भरला नव्हता. त्यासाठी रायगडावरून तगादा लावला गेला, तेव्हा सूर्याजी गाव सोडून जो पळाला तो थेट जुल्फिकारखानाच्या फौजेत आला. यावेळी जुल्फिखारखान रायगडावरील मोहिमेवर चालला होता. त्याच्याबरोबर सूर्याजीही रायगड परिसरात आला. याचा अर्थ संभाजीराजांच्या बलिदानापूर्वीच हा माणूस मोगलांना मिळालेला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रायगडाचा वेढा गडावरील मंडळींना अगदीच सोसवेना झाला. सर्वत्र निराशेचा अंधार पसरला. अशावेळी येसूबाई आदी मंडळींनी गड मोगलांच्या स्वाधीन करण्याचा निश्चय केला. त्यानुसार उभयपक्षी वाटाघाटी सुरू झाल्या. यावेळी सूर्याजी खानाच्या फौजेत होता. जुल्फिखारखानाने त्याच्यातील 'गुण' ओळखून त्याच्याहाती वाटाघाटीची सूत्रे सोपविली. त्याने ही भूमिका योग्यरीत्या पार पाडून खानाची मर्जी संपादन केली. सूर्याजीची ही कामगिरी वर्णन करणारा एक उतारा आढळतो. - &lt;br /&gt;"तेथे रायगडचे मसलतेमुळे मनसबा करून (सूर्याजीने) मावळीयांची सरदारी केली. गडास मोर्चे लावले व दरामतीत (मध्यस्तीत) पडोन खानास गड हस्तगत करून दिल्हा. ये गोष्टीकरिता खान मशारनिल्हेची कृपा त्यावरी विशेष जाली. खान हजरतीच्या (औरंगजेबाच्या) दर्शनास आले. तेव्हा सूर्याजीची स्तुती हजरतीपावेतो करून सिरनाहाणी करविली. हा अस्करा (ख्याती) लष्करात बहुत जाला..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदर सूर्याजीची रायगडाच्या पाडावामधील  भूमिका मध्यस्थाची आहे. फितुराची नाही. त्याला फितूर म्हणावे, तर तो आधीच शत्रूला जाऊन मिळाला होता. तो स्वराज्याचा शत्रूच होता. आणि याच्या जोरावर त्याने नंतर वाईची देशमुखी बळकावली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याचे असे झाले, की रायगड मोगलांच्या हाती लागल्यानंतर बादशहाने जुल्फिकारखानास जिंजी किल्ल्याच्या मोहिमेवर पाठविले. (30 नोव्हेंबर 1689) त्यावेळी सूर्याजी पिसाळही त्याच्याबरोबर गेला. जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याने वाईच्या पूर्ण देशमुखीचे वतन मिळविले. पण ते जिंजीला पोहचेपर्यंत परिस्थिती बदलली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांच्या फौजांनी मोगलांनी जिंकलेले गडकोट व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्यात वाई परगणाही पुन्हा एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला. आणि पुन्हा एकदा दत्ताजी पिसाळ याला वाईची देशमुखी देण्यात आली. जिंजीचा वेढा सुरू असताना ही बातमी सूर्याजीला समजली असावी. येथपावेतो त्याच्या लक्षात वारा फिरल्याचे आले असावे. त्यामुळे मग त्याने राजाराम महाराजांशी संधान बांधले आणि जुल्फिकारखानास आणि मोगली लष्करास गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनास गेला. तेथे त्याने राजाराम महाराजांना त्याच्याकडील जुनी आदिलशाही फर्माने दाखविली. ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या. त्या घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण रामचंद्रपंत आदी प्रधान व अधिका-यांना वाईच्या देशमुखीचा सर्व इतिहास माहित असल्याने तेथे सूर्याजीची डाळ शिजली नाही. तेव्हा तो पुन्हा कर्नाटकात जिंजीला गेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेथे त्याने आता निराळेच डाव लढविण्यास सुरूवात केली. राजाराम महाराजांची सगुणाबाई नावाची अत्यंत सुंदर नाटकशाळा होती. राजा कर्ण हा तिचा मुलगा. तिला आणखी एक मुलगीही होती. या कन्येबरोबर आपल्या मुलाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव सूर्याजीने महाराजांजवळ मांडला. सूर्याजीसारखा घरंदाज मराठा आपल्या पुत्राचे लग्न दासीकन्येशी लावण्यास तयार झाल्याचे पाहून राजाराम महाराजांनी त्याला आता वाईची सगळीच देशमुखी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजाराम महाराजांनी दत्ताजीकडील देशमुखी काढून घेतल्याचा जो रोखा उपलब्ध आहे, त्यात ते म्हणतात - "सूर्याराऊ पिसाळ... हे मोगलाईतून स्वामीसंनिध येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदीत केले.... सूर्याराऊ पिसाळ याणी ... मोगलाईमध्ये मबलग पैके खर्च करून दिवाणात सीरणी देऊन फर्मान करून घेतले, अलीकडे स्वामीच्या पायापासीही येकनिष्ठा धरून संनिध येऊन सेवा करीत आहेत...."&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण यानंतरही देशमुखीची वाद काही मिटला नाही. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी दत्ताजीस त्याचे वतन परत केले. तेव्हा मग सूर्याजी पुन्हा मोगलांना जाऊन मिळाला. मोगलांनी वाईचे ठाणे पुन्हा जिंकले असावे. त्यावर इस्माईलखान मखा याची ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सूर्याजीने त्याला हाताशी धरले. परगण्याचे देशपांड्यांसारखे वतनदार व दत्ताजी यांना बोलावून त्यांना कैद केले आणि त्यांच्याकडून सूर्याजीच्या निम्म्या वतनाचा महजर तयार केला. याच महजरात सूर्याजीने वतन सोडविण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रूपये खर्च केल्याचा उल्लेख आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या काळात औरंगजेब बादशहाची छावणी विशाळगडाच्या पायथ्याशी होती. दत्ताजीने तेथे जाऊन फिर्याद नोंदविली. औरंगजेबाला त्याची बाजू न्याय्य वाटल्याने त्याने सूर्याजीने केलेल्या सेवेकडे न पाहता दत्ताजीला त्याच्या वतनाचे फर्मान दिले, एवढेच नव्हे, तर इस्माईलखान मखा याची वाईच्या ठाणेदारपदावरून बदली करून तेथे यासीनखान याला पाठविले. दत्ताजी वाईस येऊन वतनदारी अनुभवू लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;इकडे सूर्याजीही इरेस पेटला. छावणीत जाऊन त्याने खूप लटपटी-खटपटी केल्या. मुसलमान धर्म स्वीकारल्यास बादशहाची मर्जी प्रसन्न होते हे त्याला माहित होते. तेव्हा बादशहाची मेहेरबानी मिळविण्यासाठी तोही मुसलमान झाला. पण दत्ताजीची बाजू इतकी न्याय्य होती, की औरंगेब बादशहाने सूर्याजीने धर्मांतर केले तरी त्याला वतन काही दिले नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे प्रकरण नमूद करून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना (राजाराम महाराजांना) जमली नाही तो औरंगजेबाने करावी, आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर करावी, याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्याजीचा हा वतनलोभ, त्यासाठी त्याने केलेली कारस्थाने हे सर्व तेव्हाच्या मराठा वतनदारांच्या प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि अखेरीस येथे एक बाब नमूद करायलाच हवी, की भलेही सूर्याजी पिसाळ रायगडचा फितूर नसेल, पण तो त्याच्यासारख्या अनेक वतनदारांप्रमाणे स्वराज्यद्रोही मात्र निश्चित होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ -&lt;br /&gt;- मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993, पृ. 109 ते 120.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-6463689380522420196?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/t34jrgLvclc" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/t34jrgLvclc/blog-post_10.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_10.html</feedburner:origLink></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-4980399635472986320</guid><pubDate>Sun, 09 Mar 2008 17:38:00 +0000</pubDate><atom:updated>2008-03-09T10:49:32.179-07:00</atom:updated><title>रामायणाविषयी आणखी काही...</title><description>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R9QjEXYR9zI/AAAAAAAAAGA/Ay0Y02BJA5Y/s1600-h/rama.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R9QjEXYR9zI/AAAAAAAAAGA/Ay0Y02BJA5Y/s400/rama.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5175800429657847602" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;'खट्टामिठा'मध्ये रामायणासंबंधीच्या एकूण चार पोस्ट आल्या आहेत. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये वाल्मीकींनी वर्णिलेला राम आणि लोकमानसात असलेली रामाची प्रतिमा यांत असलेला फरक नोंदविला आहे. त्यानंतर ब-याच काळाने 'मी राम कोण देशीचा?'  या तीन पोस्ट लिहिल्या. रा. रा. भास्करराव जाधव यांच्या 'रामायणावर नवा प्रकाश'  या पुस्तकातील माहिती त्यात आहे. हे भास्करराव जाधव कोण असा प्रश्न अनेक वाचकांना पडला असणार. तेव्हा ते आधी सांगतो. महात्मा फुल्यांच्या स‌त्यशोधक स‌माजाचे अनुयायी असलेल्या भास्कररावांनी एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. 1895 ते 1921 या काळात त्यांनी करवीर दरबारात सेवा केली. पहिल्या व दुस-या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. ब्राह्मणेतर पक्षाचे ते संस्थापक होत. स‌र्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वेदांसकट स‌र्व महत्त्वाच्या स‌ंस्कृत ग्रंथांचे परिशिलन केले होते. त्यांचा पिंड ज्ञानोपासकाचा होता.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळात रामायणाविषयी पंडित, अभ्यासकांमध्ये चाललेल्या वादात भास्करराव जाधव यांनी भाग घेतला. 1934 ते 1936 या कालखंडात त्यांनी ज्ञानमंदिर, महाराष्ट्र शारदा या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठविले. रामायणावर नवा प्रकाशमध्ये त्यांच्या या लेखांचेच स‌ंकलन केलेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राम हा मूळचा इतिप्तमधला हा निष्कर्ष मल्लादि वेंकटरत्नम यांचा. त्यांच्या ग्रंथाधारे भास्कररावांनी काही लेख लिहिले. ते या ब्लॉगमध्ये अतिशय स‌ंक्षेपाने मांडले आहेत.  राम हा मूळचा इजिप्तचा म्हटल्यावर आणि रामेसिसच्या कथेवरूनच रामकथा रचली असे म्हटल्यावर, साहजिकच एक प्रश्न येतो, की मग वाल्मिकी रामायणात जी अन्य पात्रे येतात, उदाहरणार्थ स‌ीता, रावण, हनुमानादि यांचे मूळ कुठले? भास्कररावांनी त्याबाबत त्यांच्या लेखांमध्ये काहीही माहिती दिलेली नाही. त्यासाठी आपणांस मल्लादि वेंकटरत्नम यांच्याकडेच जावे लागेल. (खंत याचीच की अद्याप त्यांचा ग्रंथ काही मला मिळू शकलेला नाही.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र भास्कररावांनी त्यांच्या लेखांमध्ये रामायणातील वाल्मिकींपासून स‌र्व महत्त्वाच्या पात्रांविषयी स‌ंशोधनात्मक लिहिलेले आहे. तेव्हा त्यांचा ग्रंथ मुळातूनच वाचावयास हवा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळात रामायण या महाकाव्याचेच अनेक पाठभेद, रामाच्या वेगवेगळ्या कथा आपल्याकडे आहेत. म्हणजे वाल्मीकींचे रामायण हे तर झालेच. पण स‌ंस्कृतमध्ये आनंद रामायण, अद् भुत रामायण, अध्यात्म रामायण इत्यादि रामायणे आहेत. रघुवंश, प्रसन्नराघव, उत्तर रामचरित अशी काव्ये आहेत. महाभारतात रामकथा आहे. हरिवंश, भागवत यामध्येही काहीशा फरकाने ती आहे. तुलसीदासाचे रामायण आहेच. जैन आणि बौद्धांचीही वेगळी रामायणे आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या स‌र्व रामकथा आहेत, त्यांचा आशय जरी सारखा असला, तरी तपशीलांत मात्र त्या खूप वेगवेगळ्या असल्याचे दिसते. त्यातही स‌ीता आणि रावण यांच्या स‌ंबंधांबाबत खूपच भिन्न माहिती मिळते. वाल्मीकी रामायणानुसार स‌ीता ही जनकाची कन्या. जनकाला ती जमीन नांगरत असताना सापडली. परंतु महाभारतातल्या रामकथेत ती जनकात्मजा म्हणजे जनकाची औरस कन्या असे म्हटले आहे. काश्मीरी रामायण, खोतानी रामायण या ग्रंथात ती रावणाची कन्या आहे. शेट लालचंद हिराचंद यांनी लिहिलेल्या 'वाल्मिकी रामायण - एक स्वतंत्र विचार' या पुस्तकातही ती रावणाची कन्या असल्याचे मत मांडले आहे. आनंद रामायण व भावार्थ रामायणात ती अग्निसंभवा असल्याचे म्हटले आहे. तर दशरथजातक आणि जावा-सुमात्रामधील रामायणे ती दशरथकन्या असल्याचे सांगतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भास्कररावांनी त्यांच्या स‌ंशोधनासाठी वाल्मिकी रामायण हा ग्रंथ आधारभूत मानलेला आहे. मात्र आधुनिक विद्वानांच्या मते वाल्मीकी रामायण प्रथम पाच कांडांचे म्हणजे अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंतचे होते. बालकांड व उत्तरकांड ही नंतरची भर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या रिडल्स ऑफ राम वरून मोठा वाद झाला होता. वास्तविक त्यावरून वाद होण्याचे काही कारण नव्हते. कारण त्यात त्यांनी रामाबद्दल जे काही लिहिले होते, त्याचा आधार बहुतांशी उत्तरकांडच होते. पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचे 'द रामायण - ए ट्रू रिडिंग'  हे अतिशय वादग्रस्त पुस्तक. त्याचा आधारही वाल्मीकी रामायणच आहे. यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष भाविक, श्रद्धाळू मनास निश्चितच धक्कादायक आहेत. कारण वाल्मीकी रामायणच धक्कादायक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्यांना असा धक्का स‌हन होणार नाही, त्यांच्यासाठी मग 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन'  सारखी पुस्तके आहेतच. 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन'मध्ये पांडुरंगशास्त्री आठवलेंनी वाल्मीकींनाही अभिप्रेत नसलेला राम आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांच्या रामायणाच्या वाचनानुसार - &lt;br /&gt;"रामकाळात प्रजेला मत द्यावयाचा अधिकार होता.... अर्थव्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी जातीव्यवस्था रामराज्याने मान्य केली होती.... स‌र्व लोक देवासमान होते. स‌र्व लोक स‌ज्जन होते... रामायणात स्त्रियांची अवस्था उत्कृष्ट होती... ब्राह्मण रामराज्याचे आधारस्तंभ होते... " खरंतर पांडुरंगशास्त्रींच्या मते रामायणात वाईट असे काही व कोणी नव्हतेच. अगदी कौसल्यासुद्धा. (वास्तविक पांडुरंगशास्त्रींचे या पुस्तकाचा हेतू त्यांना अभिप्रेत असलेल्या जातीसंस्थात्मक व्यवस्थेची, वर्णव्यवस्थेची आवश्यकता प्रतिपादीत करणे हाच आहे. पण तो मुद्दा वेगळा.)   &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर हे म्हणजे एकदम भास्कररावांच्या उलट झाले. &lt;br /&gt;एकंदरच रामकथेची अशी अवघीच गंमत आहे. पुढे मागे त्याबाबत लिहिणे होईलच...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;------------------------------------------------------------&lt;br /&gt;वाचन शिफारस - &lt;br /&gt;- रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य स‌ंस्कृती मंडळ, मुंबई, पाने - 340, किं. 145 रू.&lt;br /&gt;- वाल्मीकी रामायण - एक स्वतंत्र विचार - लालचंद हिराचंद, मँजेस्टिक प्रकाशन, गिरगाव, मुंबई, पाने 72, किं. 45 रु.&lt;br /&gt;- महात्मा रावण - डॉ. वि. भि.  कोलते, स‌ुगावा प्रकाशन, पुणे, पाने - 16, किं. 10 रू.&lt;br /&gt;- श्री वाल्मीकी रामायण-दर्शन - पांडुरंगशास्त्री आठवले, स‌द्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई, पाने - 218, किं. 10 रु.&lt;br /&gt;- The Ramayan (A True Reading) - Periyar E. V. Ramasami, Dravidar Kazhagam Publications, Chennai, Pages - 58, Donation 30 Rs.&lt;br /&gt;- Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 4 - Compiled by Vasant Moon, Education Department, Gov. of Mah., Pages - 360, Price - 35 Rs.&lt;br /&gt;- www.valmikiramayan.net&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3872895820077185028-4980399635472986320?l=khattamitha.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/khattamitha/~4/oP2vIyb6x0g" height="1" width="1"/&gt;</description><link>http://feedproxy.google.com/~r/khattamitha/~3/oP2vIyb6x0g/blog-post_09.html</link><author>noreply@blogger.com (.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/_qrBRHBB7xNk/R9QjEXYR9zI/AAAAAAAAAGA/Ay0Y02BJA5Y/s72-c/rama.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">1</thr:total><feedburner:origLink>http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_09.html</feedburner:origLink></item></channel></rss>
