<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	 xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" >

<channel>
	<title>Marathi Shout</title>
	<atom:link href="https://marathishout.com/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://marathishout.com/</link>
	<description>Marathi News, Entertainment, Blog and Stories  Publication</description>
	<lastBuildDate>Fri, 23 Feb 2024 18:22:23 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.4.8</generator>

<image>
	<url>https://marathishout.com/wp-content/uploads/2020/06/cropped-favicon-1-32x32.png</url>
	<title>Marathi Shout</title>
	<link>https://marathishout.com/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती &#124; Biography of Sindhutai Sapkal</title>
		<link>https://marathishout.com/biography-of-sindhutai-sapkal/</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रिया गोमाशे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 23 Feb 2024 18:07:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विशेष]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=10004</guid>

					<description><![CDATA[<p>०४ जानेवारी २०२२ रोजी त्या सायंकाळी त्यांचे निधन झाल्याची घटना अचानक कानी पडली आणि अख्खा महाराष्ट्र हळहळून रडला. अनाथांना पुन्हा पोरकं करून दूरवर गेलेली माय आता कधीही दिसणार नाही याची आजही मात्र खंत वाटते. ही गोष्ट आहे जगविख्यात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांची. ही कहाणी आहे हजारो अनाथांची माय आणि तिच्या लेकरांची. एक  भारतीय सामाजिक कार्यकर्त्या [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/biography-of-sindhutai-sapkal/">सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Biography of Sindhutai Sapkal</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>०४ जानेवारी २०२२ रोजी त्या सायंकाळी त्यांचे निधन झाल्याची घटना अचानक कानी पडली आणि अख्खा महाराष्ट्र हळहळून रडला. अनाथांना पुन्हा पोरकं करून दूरवर गेलेली माय आता कधीही दिसणार नाही याची आजही मात्र खंत वाटते. ही गोष्ट आहे जगविख्यात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांची. ही कहाणी आहे हजारो अनाथांची माय आणि तिच्या लेकरांची. एक  भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सोबत त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. आज सिंधूताई आपल्यात नाहीत पण एक आठवण म्हणून आज आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊयात. आणि शोध घेऊयात, की का इतक्या हळव्या, निस्वार्थ सेवाभाव असलेल्या माईंना लोकांनी ह्रुदयात जपलं ? त्याचं उत्तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बघूयात यांचा जन्म व जीवनप्रवास.</p>



<div class="wp-block-yoast-seo-table-of-contents yoast-table-of-contents"><h2>Table of contents</h2><ul><li><a href="#%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25af%25e0%25a5%2581" data-level="2">सिंधूताई सपकाळ यांचे आयुष्य | Sindhutai Sapkal Information In Marathi</a><ul><li><a href="#h-जन-म-आण-स-र-व-त-च-ज-वन" data-level="3">जन्म आणि सुरुवातीचे जीवन</a></li><li><a href="#h-व-व-ह-एक-खडतर-प-रव-स" data-level="3">विवाह एक खडतर प्रवास</a></li><li><a href="#h-स-ध-त-ई-च-य-ज-वन-त-ल-स-घर-ष" data-level="3">सिंधूताईंच्या जीवनातील संघर्ष</a></li><li><a href="#h-अन-थ-न-ममत-ब-ल-सदन-ठरल-वरद-न" data-level="3">अनाथांना ममता बाल सदन ठरले वरदान</a></li><li><a href="#h-स-ध-त-ई-सपक-ळ-य-च-म-त-य" data-level="3">सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू</a></li><li><a href="#h-स-ध-त-ई-सपक-ळ-य-न-म-ळ-ल-ल-प-रस-क-र-व-ग-रव" data-level="3">सिंधूताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार व गौरव</a></li><li><a href="#h-स-ध-त-ई-च-य-ज-वन-वर-आध-र-त-च-त-रपट" data-level="3">सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपट</a></li></ul></li></ul></div>


<h2 class="wp-block-heading" id="%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25af%25e0%25a5%2581"><strong>सिंधूताई सपकाळ यांचे आयुष्य | </strong>Sindhutai Sapkal Information In Marathi</h2>


<figure class="wp-block-table"><table><tbody><tr><td><strong>नाव</strong></td><td>सिंधूताई अभिमन्यू साठे&nbsp; ( माई )</td></tr><tr><td><strong>जन्म</strong></td><td>१४ नोव्हेंबर १९४८</td></tr><tr><td><strong>जन्मस्थान </strong></td><td>पिंप्री मेघे, वर्धा ,महाराष्ट्र</td></tr><tr><td><strong>वडील</strong></td><td>अभिमन्यू साठे</td></tr><tr><td>पती</td><td>श्रीहरी सपकाळ</td></tr><tr><td>पुरस्कार</td><td>पद्मश्री, मदार तेरेसा , नारी शक्ती, राजाई पुरस्कार</td></tr><tr><td><strong>मृत्यू</strong></td><td>0४ जानेवारी  २०२२ </td></tr></tbody></table><figcaption class="wp-element-caption">Sindhutai Sapkal Information</figcaption></figure>


<h3 class="wp-block-heading" id="h-जन-म-आण-स-र-व-त-च-ज-वन"><strong>जन्म आणि सुरुवातीचे जीवन</strong></h3>


<p>खरंतर सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे या गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी (&#8220;फाटलेल्या कापडाचा तुकडा&#8221;) ठेवले. पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडेल याचा त्यावेळी कोणी विचार ही केला नसेल. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. हे त्याचं दुर्दैव.</p>



<p>सिंधूताई वयाच्या १२ व्या वर्षी असताना श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले होते, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या २० व्या वर्षी, त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले.</p>


<h3 class="wp-block-heading" id="h-व-व-ह-एक-खडतर-प-रव-स"><strong>विवाह एक खडतर प्रवास </strong></h3>


<p>सिंधूताईंचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.</p>



<p>अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती.</p>


<h3 class="wp-block-heading" id="h-स-ध-त-ई-च-य-ज-वन-त-ल-स-घर-ष"><strong>सिंधूताईंच्या जीवनातील संघर्ष</strong></h3>


<p>दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.</p>


<h3 class="wp-block-heading" id="h-अन-थ-न-ममत-ब-ल-सदन-ठरल-वरद-न"><strong>अनाथांना ममता बाल सदन ठरले वरदान</strong></h3>


<p>अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.</p>



<p><strong>सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे बघुयात</strong></p>



<ul class="wp-block-list">
<li>बाल निकेतन हडपसर, पुणे</li>



<li>सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा</li>



<li>अभिमान बाल भवन, वर्धा</li>



<li>गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन) </li>



<li>ममता बाल सदन, सासवड</li>



<li>सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे</li>
</ul>



<p>यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना देखील केली आहे.</p>


<h3 class="wp-block-heading" id="h-स-ध-त-ई-सपक-ळ-य-च-म-त-य"><strong>सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू</strong></h3>


<p>दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.</p>



<p>२५ नोव्हेंबर २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये डायफ्रामॅटिक हर्निया शस्त्रक्रियेनंतर सपकाळ यांच्यावर शस्त्रक्रियेउत्तर फार काळजी घेण्यात येत होती. परंतू पाच वर्षांहून अधिक काळ ग्रस्त असलेल्या डायफ्रामॅटिक हर्नियामुळे त्यांचे डाव्या बाजुचे फुफ्फुस व्यवस्थितरित्या कार्य करीत नव्हते. परंतू काही काळासाठीच शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती.</p>



<p>तथापि, पाच दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांना&nbsp; हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजून १० मिनीटांना त्यांचे निधन झाले. पुणे येथील गॅलक्सी केअर या दवाखान्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.</p>


<h3 class="wp-block-heading" id="h-स-ध-त-ई-सपक-ळ-य-न-म-ळ-ल-ल-प-रस-क-र-व-ग-रव"><strong>सिंधूताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार व गौरव</strong></h3>


<p>सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले काही :-</p>



<ul class="wp-block-list">
<li>पद्मश्री पुरस्कार (२०२१)</li>



<li>महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)</li>



<li>पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा &#8216;कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार&#8217; (२०१२)</li>



<li>महाराष्ट्र शासनाचा &#8216;अहिल्याबाई होळकर पुरस्कार&#8217; (२०१०)</li>



<li>मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)</li>



<li>आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)</li>



<li>सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार</li>



<li>राजाई पुरस्कार</li>



<li>शिवलीला महिला गौरव पुरस्कार.</li>



<li>श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा &#8216;सामाजिक सहयोगी पुरस्कार&#8217; (१९९२)</li>



<li>~सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला &#8216;रिअल हीरो पुरस्कार&#8217; (२०१२).</li>



<li>२००८ &#8211; दैनिक लोकसत्ताचा &#8216;सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार</li>



<li>प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)</li>



<li>डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)</li>



<li>पुणे विद्यापीठाचा &#8216;जीवन गौरव पुरस्कार</li>
</ul>


<h3 class="wp-block-heading" id="h-स-ध-त-ई-च-य-ज-वन-वर-आध-र-त-च-त-रपट"><strong>सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपट</strong></h3>


<p>सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.</p>



<p>सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.</p>



<div class="schema-faq wp-block-yoast-faq-block"><div class="schema-faq-section" id="faq-question-1708711819222"><strong class="schema-faq-question"><strong><strong>१)</strong> </strong>सिंधूताई सपकाळ यांचा जन्म केव्हा झाला ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे या गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1708711881543"><strong class="schema-faq-question">२) सिंधुताई यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. ही संस्था १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1708711925903"><strong class="schema-faq-question">३) सिंधूताई <strong>यांना</strong> पद्मश्री पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सिंधूताई यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1708712020683"><strong class="schema-faq-question">४) सिंधुताईंना सुमारे किती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1708712061589"><strong class="schema-faq-question">५) ) सिंधूताईंचे निधन केव्हा व कोठे झाले ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> ०४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजून १० मिनीटांना त्यांचे निधन झाले. पुणे येथील गॅलक्सी केअर या दवाखान्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1708712099086"><strong class="schema-faq-question">६) सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला कोणता मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे</p> </div> </div>



<p>लेखन आणि संकलन</p>



<p><strong>प्रिया गोमाशे</strong> </p>



<p></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/biography-of-sindhutai-sapkal/">सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Biography of Sindhutai Sapkal</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Sidhutai-Sapkal-Biography.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र &#124;  Jyotirao Phule Autobiography</title>
		<link>https://marathishout.com/autobiography-of-jyotirao-phule-in-marathi/</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रिया गोमाशे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 22 Feb 2024 13:54:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ब्लॉग]]></category>
		<category><![CDATA[विशेष]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9986</guid>

					<description><![CDATA[<p>आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संतांनी, महात्म्यांनी अनेक सामजिक कार्य केलेत. चळवळी राबवल्या, वेगवेगळ्या वळणातून समाजाला चालना दिली. काहींनी आपल्या प्राणाची आहुती देखील दिली. तर काही थोरा मोठ्यांची पुण्याई म्हणून समाज प्रगतिशील बनवले. अश्याच एका आगळ्या वेगळ्या पण प्रसिद्ध अश्या व्यक्तीची जीवनगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना आपण सगळेच &#8216;महात्मा फुले&#8217; या लोकप्रिय नावाने ओळखतो.  [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/autobiography-of-jyotirao-phule-in-marathi/">महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र |  Jyotirao Phule Autobiography</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संतांनी, महात्म्यांनी अनेक सामजिक कार्य केलेत. चळवळी राबवल्या, वेगवेगळ्या वळणातून समाजाला चालना दिली. काहींनी आपल्या प्राणाची आहुती देखील दिली. तर काही थोरा मोठ्यांची पुण्याई म्हणून समाज प्रगतिशील बनवले. अश्याच एका आगळ्या वेगळ्या पण प्रसिद्ध अश्या व्यक्तीची जीवनगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना आपण सगळेच &#8216;महात्मा फुले&#8217; या लोकप्रिय नावाने ओळखतो.  खरंतर महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक हे त्यांचे आद्य कार्य. आणि एवढेच नाही तर अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. अश्या थोर महात्म्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम बघुयात त्यांचा जन्म.</p>



<div class="wp-block-yoast-seo-table-of-contents yoast-table-of-contents">
<h2>Table of contents</h2>
<ul>
<li><a href="#h-मह-त-म-फ-ल-य-च-जन-म-birthplace-of-jyotirao-phule" data-level="2">महात्मा फुले यांचा जन्म | Birthplace of Jyotirao Phule</a></li>
<li><a href="#h-jyotirao-phule-information-in-marathi" data-level="2">Jyotirao Phule Information In Marathi</a>
<ul>
<li><a href="#h-ब-लपण-आण-श-क-षण-jyotirao-phule-education" data-level="3">बालपण आणि शिक्षण | Jyotirao Phule Education</a></li>
<li><a href="#h-श-क-षण-क-क-र-य-nbsp" data-level="3">शैक्षणिक कार्य : </a></li>
<li><a href="#h-स-म-ज-क-क-र-य-आण-व-च-र-प-रब-धन-jyotiba-phule-social-work" data-level="3">सामाजिक कार्य आणि विचार प्रबोधन | Jyotiba Phule Social Work</a></li>
<li><a href="#h-सत-यश-धक-सम-ज-satyashodhak-samaj" data-level="3">सत्यशोधक समाज | Satyashodhak Samaj</a></li>
<li><a href="#h-ज-य-त-ब-फ-ल-य-च-म-त-य" data-level="3">ज्योतिबा फुले यांचा मृत्यू</a></li>
<li><a href="#h-ल-खन-स-ह-त-य-वर-प-रक-श" data-level="3">लेखन साहित्यावर प्रकाश</a></li>
</ul>
</li>
</ul>
</div>


<h2 id="h-मह-त-म-फ-ल-य-च-जन-म-birthplace-of-jyotirao-phule" class="wp-block-heading"><strong>महात्मा फुले यांचा जन्म | </strong><strong>Birthplace of Jyotirao Phule</strong></h2>


<p>जोतीराव गोविंदराव फुले  यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.</p>



<p>महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती, ही गोष्ट इतिहासाच्या काळात घडली. परंतु आज त्याचे चांगले परिणाम म्हणजे अधूनिक शिक्षण. तेव्हा जोतिबांनी खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यावेळी शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची आजही मात्र तशीच कणखर ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: &#8220;महान आत्मा&#8221;, &#8220;पूज्य&#8221;) पदवी प्रदान केली होती.</p>



<p>खरंतर आपल्या महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास &#8220;फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र&#8221; असे देखील म्हणतात.</p>



<p>प्रसिद्ध असा &#8216;शेतकऱ्यांचे आसूड&#8217; हा महात्मा फुले यांचाच प्रसिद्ध ग्रंथ. त्यावेळी तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. मात्र आजही त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.</p>



<figure class="wp-block-image size-large"><img fetchpriority="high" decoding="async" width="1024" height="576" class="wp-image-9992" src="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-1024x576.jpg" alt="" srcset="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-1024x576.jpg 1024w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-300x169.jpg 300w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-768x432.jpg 768w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-150x84.jpg 150w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-750x422.jpg 750w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-1140x641.jpg 1140w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi.jpg 1280w" sizes="(max-width: 1024px) 100vw, 1024px" /></figure>


<h2 id="h-jyotirao-phule-information-in-marathi" class="wp-block-heading"><strong>Jyotirao Phule</strong> Information In Marathi</h2>


<figure class="wp-block-table">
<table>
<tbody>
<tr>
<td><strong>नाव</strong></td>
<td><strong>जोतीराव</strong> <strong>फुले</strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>जन्म</strong></td>
<td><strong>११ एप्रिल १८२७</strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>जन्मस्थान</strong></td>
<td><strong>कटगुण, सातारा ,  महाराष्ट्र  </strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>वडिलांचे</strong> <strong>नाव</strong></td>
<td><strong>गोविंदराव</strong> <strong>शेरीबा</strong> <strong>फुले</strong> <strong> </strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>आईचे</strong> <strong>नाव</strong></td>
<td><strong>चिमणाबाई</strong> <strong>फुले</strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>पत्नी</strong></td>
<td><strong>सावित्रीबाई</strong> <strong>फुले</strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>संघटना</strong></td>
<td><strong>सत्यशोधक</strong> <strong>समाज</strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>चळवळ</strong></td>
<td><strong>मुलींची</strong> <strong>पहिली</strong> <strong>शाळा</strong> <strong>सुरु</strong> <strong>करणे</strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>मृत्यू</strong></td>
<td><strong>२८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३)  </strong></td>
</tr>
<tr>
<td><strong>प्रमुख</strong> <strong>स्मारक</strong></td>
<td><strong>भिडे</strong> <strong>वाडा</strong><strong>, </strong><strong>गंज</strong> <strong>पेठ</strong><strong> ,</strong><strong>पुणे</strong> <strong> </strong></td>
</tr>
</tbody>
</table>
<figcaption class="wp-element-caption"><strong>Jyotirao Phule</strong> Information</figcaption>
</figure>



<p>&nbsp;</p>


<h3 id="h-ब-लपण-आण-श-क-षण-jyotirao-phule-education" class="wp-block-heading"><strong>बालपण आणि शिक्षण | </strong><strong>Jyotirao Phule Education</strong></h3>


<p>खरंतर जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.</p>



<p>जोतीरावांचा स्वभाव म्हणजे एकंदरीत ते करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.</p>



<p>त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा &#8216;बीजमती&#8217; हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली आणि कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ देखील झाले होते. त्यातील एक &#8220;नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद &#8220;</p>


<h3 id="h-श-क-षण-क-क-र-य-nbsp" class="wp-block-heading"><strong>शैक्षणिक कार्य : </strong></h3>


<p>महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:</p>



<blockquote class="wp-block-quote is-layout-flow wp-block-quote-is-layout-flow">
<p>&nbsp;</p>
<cite>विद्येविना मती गेली ।<br />मतीविना नीती गेली ।<br />नीतीविना गती गेली ।<br />गतीविना वित्त गेले ।<br />वित्ताविना शूद्र खचले।<br />इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।</cite></blockquote>



<p>त्यावेळी जोतिबांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.</p>



<p>पुढे महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण-सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली होती. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. आणि त्यामुळे त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला होता.</p>



<figure class="wp-block-image size-large is-resized"><img decoding="async" width="1024" height="576" class="wp-image-9995" style="width: 1170px; height: auto;" src="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-1024x576.jpg" alt="Jyotirao phule Social Work" srcset="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-1024x576.jpg 1024w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-300x169.jpg 300w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-768x432.jpg 768w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-150x84.jpg 150w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-750x422.jpg 750w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-1140x641.jpg 1140w, https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1.jpg 1280w" sizes="(max-width: 1024px) 100vw, 1024px" /></figure>



<p>&nbsp;</p>


<h3 id="h-स-म-ज-क-क-र-य-आण-व-च-र-प-रब-धन-jyotiba-phule-social-work" class="wp-block-heading"><strong>सामाजिक कार्य आणि विचार प्रबोधन | Jyotiba Phule Social Work</strong></h3>


<p>संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. &#8216;कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो&#8217;, असे त्यांचे मत होते.</p>



<p>सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे.</p>



<p>आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.</p>



<p>आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री &#8211; पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला &#8216;सत्यवर्तन करणारा&#8217; म्हणावे.</p>



<p>आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री &#8211; पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे.</p>



<p>स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.</p>



<p>स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.</p>



<p>महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. &#8216;अखंड&#8217; या काव्यप्रकारात त्यांनी &#8216;मानवाचा धर्म&#8217;, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी.</p>



<p>गोष्टींवरही भाष्य केले आहे. ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला.</p>



<p>आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय.</p>



<p>वेद हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत, असे जोतीरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले . म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. ब्राह्मणांच्या पोथीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहुतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असत्या वाटे. &#8220;मनुस्मृती&#8221; ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते म्हणून ती अपवित्र आहे, असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला आहे. बुद्धाविषयी जोतिरावांना नितांत आदर वाटे. महाराष्ट्रातील संत कवींचा जोतीरावांनी धिक्कार केला आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यांनी ब्राह्मणांच्या दुष्टाकर्मांचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य दाखविले नाही. समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व राहण्यासाठी ह्या महाराष्ट्र संत कवींनी साह्य केले, असा जोतीरावांनी निष्कर्ष काढला आहे.</p>


<h3 id="h-सत-यश-धक-सम-ज-satyashodhak-samaj" class="wp-block-heading"><strong>सत्यशोधक समाज | Satyashodhak Samaj</strong></h3>


<p>२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.</p>



<p>महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.</p>



<p>सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मराठीतही मंगलाष्टके रचली गेली.</p>


<h3 id="h-ज-य-त-ब-फ-ल-य-च-म-त-य" class="wp-block-heading"><strong>ज्योतिबा फुले यांचा मृत्यू</strong></h3>


<p>महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे शेवटी सरकारने कृषी कायदा संमत केला गेला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली जी आपण बघितली, शेवटी,  २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले. आणि सर्वत्र शोककळा पसरली.</p>


<h3 id="h-ल-खन-स-ह-त-य-वर-प-रक-श" class="wp-block-heading"><strong>लेखन साहित्यावर प्रकाश</strong></h3>


<p>&#8216;सार्वजनिक सत्यधर्म&#8217; हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक &#8216;अखंड&#8217; रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला &#8216;गुलामगिरी&#8217; ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. &#8216;अस्पृश्यांची कैफियत&#8217; हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. &#8216;सार्वजनिक सत्यधर्म&#8217; हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. आता बघुयात त्यांचे लेखन कार्य.</p>



<p>१) इ.स.१८५५  (नाटक)  तृतीय रत्&#x200d;न</p>



<p>२) जून, इ.स. १८६९ (पोवाडा) छत्रपती &#8211; शिवाजीराजे    भोसले    यांचा    पोवाडा</p>



<p>३) जून इ.स. (१८६९) (पोवाडा)  -विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी</p>



<p>४) इ.स.१८६९ (पुस्तक) ब्राह्मणांचे कसब</p>



<p>५) इ.स.१८७३. (पुस्तक)  गुलामगिरी</p>



<p>६) सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ (अहवाल)  &#8211; सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत</p>



<p>७) मार्च २० इ.स. १८७७ (अहवाल) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट</p>



<p>८) एप्रिल १२ , इ.स. १८८९  (निबंध) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ</p>



<p>९) २४ मे इ.स. १८७७ (पत्रक) दुष्काळविषयक पत्रक</p>



<p>१०) १९ ऑक्टोबर इ.स. १८८२ (निवेदन)  हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन</p>



<p>११) १८ जुलै इ.स. १८८३ (पुस्तक)  शेतकऱ्याचा असूड</p>



<p>१२) ४ डिसेंबर इ.स. १८८४  (निबंध)  महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत</p>



<p>१३) ११ जून इ.स. १८८५ (पत्र) मराठी ग्रंथागार सभेस पत्र</p>



<p>१४) १३ जून इ.स. १८८५ (पुस्तक) सत्सार अंक १</p>



<p>१५) ऑक्टोंबर इ.स. १८८५ (पुस्तक) सत्सार अंक २</p>



<p>१६) १ ऑक्टोंबर इ.स. १८८५ (पुस्तक)  &#8211; इशारा</p>



<p>१७) २९ मार्च इ.स.१८८६ (जाहीर प्रकटन)  ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर</p>



<p>१८) २ जून इ.स. १८८६ (पत्र) मामा परमानंद यांस पत्र</p>



<p>१९) जून इ.स. १८८७ (पुस्तक) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी</p>



<p>२०) इ.स. १८८७   (काव्यरचना) अखंडादी काव्य रचना.</p>



<p>२१) १० जुलै इ.स. १८८७ (मृत्युपत्र)  महात्मा फुले यांचे उईलपत्र</p>



<p>२२) इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक  सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक.</p>



<div class="schema-faq wp-block-yoast-faq-block">
<div id="faq-question-1708608379916" class="schema-faq-section"><strong class="schema-faq-question"><strong>१)</strong> महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला ?</strong>
<p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> जोतीराव गोविंदराव फुले  यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.</p>
</div>
<div id="faq-question-1708608454893" class="schema-faq-section"><strong class="schema-faq-question"><strong>२)</strong> महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ?</strong>
<p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सावित्रीबाई फुले</p>
</div>
<div id="faq-question-1708608519653" class="schema-faq-section"><strong class="schema-faq-question"><strong>३) </strong>महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली ?</strong>
<p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> २४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.</p>
</div>
<div id="faq-question-1708608621092" class="schema-faq-section"><strong class="schema-faq-question"><strong>४) </strong>जोतिबा फुले यांना &#8216;महत्मा&#8217; ही उपाधी केव्हा देण्यात आली ?</strong>
<p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली.</p>
</div>
<div id="faq-question-1708608645636" class="schema-faq-section"><strong class="schema-faq-question"><strong>५) </strong>महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ कोणता आहे ?</strong>
<p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> &#8216;अस्पृश्यांची कैफियत&#8217; हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.</p>
</div>
</div>



<p>&nbsp;</p>



<p>लेखन आणि संकलन</p>



<p><strong>प्रिया गोमाशे</strong></p>



<p>&nbsp;</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/autobiography-of-jyotirao-phule-in-marathi/">महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र |  Jyotirao Phule Autobiography</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography.jpg" medium="image"></media:content>
            
		<media:thumbnail url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-150x150.jpg" />
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi.jpg" medium="image">
			<media:title type="html">Jyotirao-Phule-Information-in-marathi</media:title>
			<media:thumbnail url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Jyotirao-Phule-Information-in-marathi-150x150.jpg" />
		</media:content>
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1.jpg" medium="image">
			<media:title type="html">Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1</media:title>
			<media:thumbnail url="https://marathishout.com/wp-content/uploads/2024/02/Mahatma-Jyotiba-Phule-Autobiography-1-150x150.jpg" />
		</media:content>
	</item>
		<item>
		<title>सावधान ! दागिने न घालणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतात हे आजार. लगेच जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण.</title>
		<link>https://marathishout.com/why-women-need-to-wear-jewellery/</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रिया गोमाशे]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 17 Dec 2023 11:30:42 +0000</pubDate>
				<category><![CDATA[जीवनशैली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9219</guid>

					<description><![CDATA[<p>अनेक स्त्रियांना वेगवेगळे आभूषण म्हणजेच अलंकार परिधान करण्याची आवड असते. स्त्रियांचे दागिन्यांनविषयी प्रेम हे अधिकच त्यांना आकर्षित करते. नवविवाहितेचे लग्न झाल्यावर तिला काही दागिने नेहमीसाठीच घालावे लागते. परंतु यात काही स्त्रियांना मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे न परिधान केलेले त्यांना आवडते. परंतु जर काही स्त्रिया अश्या करत असतील. तर त्यांनी आधीच सावध झाले पाहिजे. कारण लग्नानंतर [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/why-women-need-to-wear-jewellery/">सावधान ! दागिने न घालणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतात हे आजार. लगेच जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण.</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-weight: 400;">अनेक स्त्रियांना वेगवेगळे आभूषण म्हणजेच अलंकार परिधान करण्याची आवड असते. स्त्रियांचे दागिन्यांनविषयी प्रेम हे अधिकच त्यांना आकर्षित करते. नवविवाहितेचे लग्न झाल्यावर तिला काही दागिने नेहमीसाठीच घालावे लागते. परंतु यात काही स्त्रियांना मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे न परिधान केलेले त्यांना आवडते. परंतु जर काही स्त्रिया अश्या करत असतील. तर त्यांनी आधीच सावध झाले पाहिजे. कारण लग्नानंतर अलंकार परिधान न करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परीणाम होऊ शकतो. होय ! खरंतर त्याकाळी प्राचीन ऋषींनी असे काही साधन निर्मित केले ज्याने मन आणि आरोग्याची रक्षा होऊ शकते. मागणी वाढल्याने यांना सुंदर दागिन्याचा रूप मिळाला आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले. आणि आज स्त्रियांच्या वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये भरपुर प्रकार पाहायला मिळतात. दागिने स्त्रियांच्या रूपाला सुभोभित करत असतात. दगिण्यांशिवाय स्त्री ही अपूर्ण आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांच्या दागिन्यांचे फायदे, लाभ आणि त्यामागील वैज्ञानिक कारण.</span></p>
<h2><strong> Why woomen need to wear jewellery?</strong></h2>
<h3><b>टिकली का लावावी ?</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">टिकली दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते शरीरातील सर्व नसा त्याच केंद्रावर एकत्र येतात. टिकली लावण्यात येणा-या या जागेला अग्नि चक्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणूनच टिकली लावल्याने एकाग्रताही वाढते आणि मन शांत राहते. तसेच, टिकली लावल्याने ताण-तणावही कमी होतो.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">टिकली डोळ्यांच्या नसा मजबूत करण्यास खुपच मदत करते. टिकली कपाळ्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते त्या ठिकाणच्या नसा आणि डोळ्यांमधील नस यांच्यात एक कनेक्शन असते. टिकली डोळ्यांच्याच्या नसांना मजबूत करण्यास मदत करते ज्यामुळे तुम्हाला एकदम स्पष्ट आणि साफ दिसण्यास मदत होते. एवढेच नाही तर टिकली लावल्याने आस-पासचे मसल्स मजबूत आणि हेल्दी होतात.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>मंगळसूत्र का घालावे ?</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते. शक्यतो या वाट्यांवर कुठल्याही प्रकारचे डिझाईन नसावे. यासोबतच  काळे मोती वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात असे मानले जाते.  शास्त्रानुसार मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील  रक्तदाब  नियंत्रणात ठेवते. याच कारणामुळे ते छातीजवळ घातल्या जाते. </span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>बांगडी घालण्याचे फायदे</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्त संचार वाढतं. हे घर्षण ऊर्जा व्युत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही. बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत मिळते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">तुटलेली बांगडी घालू नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>जोडावी का घालावी ?</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">विवाहित स्त्रिया पायाच्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही. दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्य रित्या कार्य करतं.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">जोडवी ऍक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्याने शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवणा सुरळीत होतो. या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">याने मासिक पाळी नियमित होते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;"> </span></p>
<h3><b>पैंजण का घालावे ?</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">पैंजण पायातून निघणार्&#x200d;या शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">पैंजण स्त्रियांच्या पोट आणि खालील भागातील अंगात फॅट्स कमी करण्यात मदत होते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">वास्तुच्या मते पैंजणातून येणारा स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">चांदीची पैंजणाचे पायाला घर्षण होत असल्याने पायाचे हाड मजबूत होतात.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">पायात पैंजण घातल्याने महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">पायात सोन्याची पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.</span></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/why-women-need-to-wear-jewellery/">सावधान ! दागिने न घालणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतात हे आजार. लगेच जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण.</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2022/09/Why-woomen-need-to-wear-jewellery.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र  &#124; Savitribai Phule information in marathi</title>
		<link>https://marathishout.com/savitribai-phule-information-in-marathi/</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रिया गोमाशे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 14 Dec 2023 12:00:06 +0000</pubDate>
				<category><![CDATA[लेख]]></category>
		<category><![CDATA[विशेष]]></category>
		<category><![CDATA[special]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9934</guid>

					<description><![CDATA[<p>महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक, महान व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. अनेक विविध चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि समाजाला यशाच्या शिखरावर पोहचवले. यात फक्त पुरुष मंडळीच नाही तर सामाजिक प्रबोधन चळवळीत स्त्रियांचा देखील मोठा वाटा आहे. आणि जेव्हा गोष्ट सावित्री बाई यांची येते तेव्हा अभिमानास्पद वाटते. शिक्षण, सामजिक चळवळी, स्त्रियांना योग्य न्याय, सन्मान, दर्जा आणि अस्पृश्यता [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/savitribai-phule-information-in-marathi/">क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र  | Savitribai Phule information in marathi</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक, महान व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. अनेक विविध चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि समाजाला यशाच्या शिखरावर पोहचवले. यात फक्त पुरुष मंडळीच नाही तर सामाजिक प्रबोधन चळवळीत स्त्रियांचा देखील मोठा वाटा आहे. आणि जेव्हा गोष्ट सावित्री बाई यांची येते तेव्हा अभिमानास्पद वाटते. शिक्षण, सामजिक चळवळी, स्त्रियांना योग्य न्याय, सन्मान, दर्जा आणि अस्पृश्यता नष्ट करण्यात या क्रांतिज्योतीने आपल्या प्राणाची फिकीर न करता, समाजात मोठे परिवर्तन घडवून आणले. चला तर आज आपण यांच्याच बहुमोल कार्याबाबत सखोल माहिती जाणून घेऊयात.</p>



<div class="wp-block-yoast-seo-table-of-contents yoast-table-of-contents"><h2>Table of contents</h2><ul><li><a href="#h-क-र-त-ज-य-त-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-ज-वन-savitribai-phule-information-in-marathi" data-level="2">क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन | Savitribai phule information in marathi</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-जन-म-savitribai-phule-birthplace" data-level="2">सावित्रीबाई फुले यांचा जन्म | Savitribai Phule Birthplace</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-श-क-षण-savitribai-phule-education" data-level="2">सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण | Savitribai Phule Education</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-चर-त-र-आण-स-मज-क-क-र-य-savitribai-phule-social-work" data-level="2">सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आणि सामजिक कार्य | Savitribai Phule Social Work</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-च-म-त-य-कस-झ-ल" data-level="2">सावित्रीबाईंचा मृत्यू कसा झाला ?</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-च-य-कव-त-आण-इतर-ल-खन" data-level="2">सावित्रीबाईंच्या कविता आणि इतर लेखन</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-च-सत-क-र" data-level="2">सावित्रीबाईंचा सत्कार</a></li><li><a href="#h-स-व-त-र-ब-ई-च-प-रक-श-त-प-स-तक" data-level="2">सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके</a><ul><li><a href="#h-faq" data-level="3">FAQ</a></li></ul></li></ul></div>


<h2 class="wp-block-heading" id="h-क-र-त-ज-य-त-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-ज-वन-savitribai-phule-information-in-marathi"><strong>क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन | Savitribai phule information in marathi</strong></h2>


<figure class="wp-block-table"><table><tbody><tr><td>नाव</td><td>सावित्रीबाई फुले</td></tr><tr><td>जन्म</td><td>३ जानेवारी, इ.स. १८३१</td></tr><tr><td>उपमा</td><td>ज्ञानज्योती, क्रांतिज्योती</td></tr><tr><td>जन्मस्थान</td><td>नायगाव, सातारा, महाराष्ट्र, भारत</td></tr><tr><td>वडिलांचे नाव</td><td>खंडोजी नेवसे</td></tr><tr><td>आईचे नाव</td><td>सत्यवती नेवसे</td></tr><tr><td>पतीचे नाव</td><td>जोतीराव फुले</td></tr><tr><td>अपत्ये</td><td>यशवंत फुले</td></tr><tr><td>चळवळ</td><td>मुलींची पहिली शाळा सुरु करणे</td></tr><tr><td>संघटना</td><td>सत्यशोधक समाज</td></tr><tr><td>मृत्यू</td><td>मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, महाराष्ट्र</td></tr><tr><td>मृत्यूचे कारण</td><td>प्लेग</td></tr><tr><td>प्रमुख स्मारक</td><td>जन्मभूमी नायगाव, सातारा, महाराष्ट्र</td></tr></tbody></table><figcaption class="wp-element-caption"><strong>Savitribai phule information</strong></figcaption></figure>



<p>&nbsp;</p>



<p>खरंतर या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी असे देखील मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली होती. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.</p>



<p></p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-जन-म-savitribai-phule-birthplace"><strong>सावित्रीबाई फुले यांचा जन्म</strong> | <strong>Savitribai Phule Birthplace</strong></h2>


<p>भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला.</p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-श-क-षण-savitribai-phule-education"><strong> सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण | Savitribai Phule Education</strong></h2>


<p></p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-फ-ल-य-च-चर-त-र-आण-स-मज-क-क-र-य-savitribai-phule-social-work"><strong>सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आणि सामजिक कार्य | Savitribai Phule Social Work</strong></h2>


<p>सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना &#8220;फुले&#8221; हे आडनाव मिळाले होते.</p>



<p>सावित्रीबाईंचे पती जोतीराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.</p>



<p>१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. ही शाळा मात्र आजही पुण्यात पाहायला मिळते.</p>



<p>&nbsp;या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.</p>



<p>तेव्हा सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी &#8220;धर्म बुडाला&#8230;. जग बुडणार&#8230;. कली आला&#8230;.&#8221; असे सांगून केले होते. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले गेले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा देखील केली होती. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना देखील घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. परंतु अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नव्हत्या.</p>



<p>शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत असत.</p>



<p>त्यावेळी जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.</p>



<p>केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली होती. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.</p>



<p>इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.</p>



<p>महत्त्वाचं म्हणजे इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करत असत.</p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-च-म-त-य-कस-झ-ल"><strong>सावित्रीबाईंचा मृत्यू कसा झाला ?</strong></h2>


<p>सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी १८९७ मध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले. क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त भागात करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला. आणि सर्वत्र शोककळा पसरली.</p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-च-य-कव-त-आण-इतर-ल-खन"><strong>सावित्रीबाईंच्या कविता आणि इतर लेखन</strong></h2>


<p>सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी १८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि &#8220;जा, शिक्षण मिळवा&#8221; नावाची कविता देखील प्रकाशित केली, ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कट स्त्रीवादी बनल्या. महिलांच्या हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी महिलांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव मुक्त असलेल्या मेळाव्याचे ठिकाण देखील बोलावले. याचे प्रतिक म्हणजे उपस्थित सर्व महिलांनी एकाच चटईवर बसायचे. त्या भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्यासुद्धा होत्या. सावित्री बाई यांनी महिलासांठी निवारास्थान उघडले होते, जेथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तेथे सोडू शकतात. त्यांनी बालविवाहाविरुद्धही मोहीम चालवली आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी घर सुरू केले होते.</p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-च-सत-क-र"><strong>सावित्रीबाईंचा</strong> <strong>सत्कार</strong></h2>


<p>पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्&#x200d;नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.</p>


<h2 class="wp-block-heading" id="h-स-व-त-र-ब-ई-च-प-रक-श-त-प-स-तक"><strong>सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके</strong></h2>


<ul class="wp-block-list">
<li>काव्यफुले (काव्यसंग्रह)</li>



<li>सावित्रीबाईंची गाणी (१८९१)</li>



<li>सुबोध रत्नाकर</li>



<li>बावनकशी</li>



<li>जोतिबांची भाषणे (संपादक सावित्रीबाई फुले १८५६)</li>
</ul>



<p>सावित्रीबाई यांचा विलोभनीय जीवनप्रवास खरचं प्रेरित करणारा आहे. त्या शिक्षणा संदर्भात असं म्हणतात,</p>



<blockquote class="wp-block-quote is-layout-flow wp-block-quote-is-layout-flow">
<p><strong>&#8220;विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून</strong></p>



<p><strong>तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन&#8221;</strong></p>
</blockquote>


<h3 class="wp-block-heading" id="h-faq"><strong>FAQ</strong></h3>


<div class="schema-faq wp-block-yoast-faq-block"><div class="schema-faq-section" id="faq-question-1702553125244"><strong class="schema-faq-question">१) <strong>सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?</strong></strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1702553251411"><strong class="schema-faq-question">२)<strong> </strong>जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह केव्हा झाला ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> इ.स १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह केव्हा झाला.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1702553701961"><strong class="schema-faq-question">३<strong>) </strong>१८५२ मध्ये कोणत्या सरकारने त्यांचा सत्कार केला होता ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्&#x200d;नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला होता.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1702553381289"><strong class="schema-faq-question">४) बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा केव्हा काढली ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली होती.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1702553452578"><strong class="schema-faq-question">५)  सवित्री<strong> </strong>बाई यांचा मृत्यु केव्हा झाला?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> १०<strong> </strong>मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्यावेळी सर्वत्र शोककळा पसरली होती.</p> </div> <div class="schema-faq-section" id="faq-question-1702553627274"><strong class="schema-faq-question">६) प्लेग ची साथ केव्हा आली होती ?</strong> <p class="schema-faq-answer"><strong>उत्तर:</strong> इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता.</p> </div> </div>



<p>&nbsp;</p>



<p class="has-text-align-left"><strong>लेखन आणि संकलन :</strong></p>



<p class="has-text-align-left"><strong> प्रिया गोमाशे</strong></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/savitribai-phule-information-in-marathi/">क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र  | Savitribai Phule information in marathi</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2023/12/Savitribai-phule-biography.png" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर  शुभेच्छा !</title>
		<link>https://marathishout.com/samantha-ruth-prabhu-announces-production-house/</link>
		
		<dc:creator><![CDATA[मराठी Shout]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 12 Dec 2023 08:39:28 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मनोरंजन]]></category>
		<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9876</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही सिनेसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री असून  आत्तापर्यंत तिने तामिळ आणि तेलुगूत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तिने तिच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. ती म्हणजे नुकतीच तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसची [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/samantha-ruth-prabhu-announces-production-house/">अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर  शुभेच्छा !</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-weight: 400;">मुंबई : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही सिनेसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री असून  आत्तापर्यंत तिने तामिळ आणि तेलुगूत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तिने तिच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. ती म्हणजे नुकतीच तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. हे ऐकल्यानंतर तिचे चाहते खूप खूश झाले आहेत.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">इन्स्टाग्रामवर सामंथाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो  सोशल मीडियावर  भरपूर व्हायरल झाला आहे. फॅन्सनेदेखील या व्हिडीओचं भरभरुन कौतुक केलं आहे आणि या प्रोडक्शन हाऊसला शुभेच्छा दिल्या आहे. </span></p>
<blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 540px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-captioned="" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/reel/C0q-kATr5oG/?utm_source=ig_embed&amp;utm_campaign=loading" data-instgrm-version="14">
<div style="padding: 16px;">
<p>&nbsp;</p>
<div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;"></div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;"></div>
</div>
</div>
<div style="padding: 19% 0;"></div>
<div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;"></div>
<div style="padding-top: 8px;">
<div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;">View this post on Instagram</div>
</div>
<div style="padding: 12.5% 0;"></div>
<div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;">
<div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);"></div>
</div>
<div style="margin-left: 8px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);"></div>
</div>
<div style="margin-left: auto;">
<div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);"></div>
</div>
</div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;"></div>
</div>
<p>&nbsp;</p>
<p style="color: #c9c8cd; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; line-height: 17px; margin-bottom: 0; margin-top: 8px; overflow: hidden; padding: 8px 0 7px; text-align: center; text-overflow: ellipsis; white-space: nowrap;"><a style="color: #c9c8cd; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: normal; line-height: 17px; text-decoration: none;" href="https://www.instagram.com/reel/C0q-kATr5oG/?utm_source=ig_embed&amp;utm_campaign=loading" target="_blank" rel="noopener">A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)</a></p>
</div>
</blockquote>
<p><script async src="//www.instagram.com/embed.js"></script></p>
<p><span style="font-weight: 400;">सामंथाने इन्स्टाग्राम वर  हा व्हिडीओ पोस्ट करत सामंथाने लिहीलं  की, &#8220;माझ्या नव्या आणि स्वत:च्या प्रोडक्शन हाऊस त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे.  ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्सचं मुख्य उद्दिष्ट नवीन युगातील अभिव्यक्ति आणइ विचार  प्रतिनिधी कंटेंट तयार करणं आहे. एक पोषण स्थान जो त्या कहाणींना आमंत्रित आणि प्रोत्साहित करतो जो आमच्या सामाजिक फॅब्रिकची ताकद आणि जटिलता सांगते. हा एक असा मंच आहे जिथे सिने निर्मात्यांना असा कहाणी सांगण्याचा मंच जो सार्थक, प्रामाणिक आणि सार्वभौमिक आहे&#8221;</span></p>
<p><span style="font-weight: 400;">सध्या सामंथाने एक्टिंगमधून ब्रेक घेतला आहे. सध्या ती मायोसिटिस ऑटोइम्यून  या नावाच्या आजाराचा सामना करत आहे. काही दिवसांपुर्वी तिने तिच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले होते. याविषयी बोलताना सामंथा रुथ प्रभू म्हणाली की, &#8216;मी अयशस्वी विवाहाच्या सर्वात खालच्या टप्प्यावर पोहोचलो आणि त्यावेळी माझे आरोग्य आणि काम या दोन्हींवर परिणाम झाला. हे माझ्यासाठी तिहेरी धक्क्यासारखं होतं. त्यादरम्यान, मी अशा अभिनेत्यांबद्दल वाचलं होतं जे आरोग्याच्या समस्यांमधून गेले आणि त्यांनी पुनरागमन केलं. त्यांच्या स्टोरी वाचून मला मदत झाली किंवा माझे मनोबल वाढलं. जर त्यांनी ते हे करु शकतात तर मी देखील करू शकते हे जाणून घेण्याचे बळ यामुळे मला मिळालं.&#8221;</span></p>
<p><span style="font-weight: 400;">साध्य सामंथाच्या  नव्या प्रोडक्शन हाऊस &#8211; त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सची याला चाहत्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या असून इंस्टा वर कमेंट चा वर्षाव केला आहे. </span></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/samantha-ruth-prabhu-announces-production-house/">अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर  शुभेच्छा !</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2023/12/samantha-prabhu-production-house.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू</title>
		<link>https://marathishout.com/karnataka-raj-bhavan-receives-bomb-threat-call-search-ops-underway/</link>
		
		<dc:creator><![CDATA[मराठी Shout]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 12 Dec 2023 06:30:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[बातम्या]]></category>
		<category><![CDATA[भारत]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9872</guid>

					<description><![CDATA[<p>कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरु केली.  &#160; बंगळुरु: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ( Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway) पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ शोध [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/karnataka-raj-bhavan-receives-bomb-threat-call-search-ops-underway/">BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-weight: 400;">कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरु केली. </span></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;"><strong>बंगळुरु: </strong>कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.</span></p>
<p><strong>( Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway)</strong></p>
<p><span style="font-weight: 400;">पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ शोध मोहीम सुरु केली आहे.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">फोन कोन केला याबाबत काही कळू शकलेले नाही. फोन कॉल आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे</span><span style="font-weight: 400;"> सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.</span></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/karnataka-raj-bhavan-receives-bomb-threat-call-search-ops-underway/">BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2023/12/kernatak-rajbhavan.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>नवरात्रीत गरबा का खेळला जातो ? जाणून घ्या यामागील धार्मिक कारण.</title>
		<link>https://marathishout.com/why-garbha-play-in-navratri/</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रिया गोमाशे]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 24 Sep 2023 14:29:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[इतिहास आणि संस्कृती]]></category>
		<category><![CDATA[Navratri]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9541</guid>

					<description><![CDATA[<p>नवरात्रीचा उत्सव म्हटल्यावर एक वेगळंच चैतन्य वातावरण निर्माण होते. घटस्थापना, ते नऊदिवस देवीची उपासना सेवा, व्रतवैतल्य, आणि भाविकांची अफाट श्रद्धा यामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. सोबतच ठरलेल्या दिवसात गरब्याचे आयोजन होतच असते. आता गरबा म्हटल्यावर देखील रसिकांच्या मनात एक वेगळीच ओढ असते. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. अगदी गरबा खेळण्यासाठीही ते जातात. [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/why-garbha-play-in-navratri/">नवरात्रीत गरबा का खेळला जातो ? जाणून घ्या यामागील धार्मिक कारण.</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-weight: 400;">नवरात्रीचा उत्सव म्हटल्यावर एक वेगळंच चैतन्य वातावरण निर्माण होते. घटस्थापना, ते नऊदिवस देवीची उपासना सेवा, व्रतवैतल्य, आणि भाविकांची अफाट श्रद्धा यामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. सोबतच ठरलेल्या दिवसात गरब्याचे आयोजन होतच असते. आता गरबा म्हटल्यावर देखील रसिकांच्या मनात एक वेगळीच ओढ असते. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. अगदी गरबा खेळण्यासाठीही ते जातात. मनसोक्त गरबा खेळतात. मात्र, त्यांना फक्त नवरात्रीतच गरबा का खेळला जातो ? किंवा नवरात्री आणि गरबा यांचा काय संबंध आहे ? याबाबत फारशी कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही माहिती सांगणार आहोत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला गरबा खेळण्यामागील रहस्यमय कथा सांगणार आहोत. हा लेख वाचून तुम्हाला गरबा खेळणयास आणखी ऊर्जा संचारेल हे मात्र नक्की. मग चला तर वेळ ना गमावता जाणून घेऊयात या मागील रहस्य.</span></p>
<h2><strong>Why Garba Play in Navratri ? </strong></h2>
<h3><b>यासाठी नवरात्रीत गरबा खेळला जातो</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">सध्याच्या आधुनिक काळात नवरात्रीतील &#8216;गरबा&#8217; हा एक ट्रेण्ड सुरू झालाय. या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. माते अंबेने महिषासुराचा वध केला असे मानले जाते. महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले. या नृत्याला लोक &#8216;गरबा&#8217; म्हणून ओळखले जाते. माँ अंबे यांना हे नृत्य खूप आवडते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मातेची स्थापना केल्यानंतर श्रद्धेने गरबा करण्याची परंपरा सुरू आहे. यामुळे माता प्रसन्न होते, असे देखील मानले जाते. आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघित्यास या नृत्याने संपूर्ण शरीराची हालचाल होऊन आपल्या शरीरयष्टीचा फारच चांगला विकास होत असतो.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>गरब्यामागील पौराणिक कथा</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">पारंपारिकपणे मातीच्या भांड्याभोवती दिवा लावून गरबा केला जातो, ज्याला &#8216;गर्भ दीप&#8217; म्हणतात. हे एक प्रतीकात्मक आहे. नर्तक या मातीच्या भांड्यात किंवा घागरीभोवती वर्तुळात फिरतात आणि हात आणि पायांनी गोलाकार हालचाल करतात. हा हावभाव जीवनाच्या चक्राचे प्रतीक देखील मानला जातो. जो जीवनापासून मृत्यूपर्यंत पुनर्जन्मापर्यंत प्रगती करतो. मातीचे भांडे किंवा गार्बो हे गर्भाचे प्रतीक आहे. </span></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">यामागील एक रहस्य असे की, अंबा माता (अंबे माँ) ही एक स्त्री आणि जगाची रक्षक आहे. ती आपल्या मुलांचे बाह्य जगाच्या क्रोधापासून संरक्षण करते आणि प्रत्येक आईप्रमाणेच आपल्या मुलांसाठी उभी राहते. आतील प्रकाश हे गर्भातील बाळाचे प्रतीक आहे. हा प्रत्येक स्त्रीचा, विशेषतः मातांचा सन्मान आहे. गर्भ देखील जीवन देणारा आहे, जिथे शरीर जन्म घेते आणि आकार घेते. यासाठी नवरात्रीत गरबा खेळण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीदेखील येत्या नवरात्रीत गरब्याचा आनंद घ्या.</span></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/why-garbha-play-in-navratri/">नवरात्रीत गरबा का खेळला जातो ? जाणून घ्या यामागील धार्मिक कारण.</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2022/09/Why-garba-play-in-navratri.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>ओणम या सणाचं हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का ? का करतात हा सण साजरा, नक्की वाचा.</title>
		<link>https://marathishout.com/what-is-the-purpose-of-onam-festival/</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रिया गोमाशे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 08 Sep 2023 12:24:44 +0000</pubDate>
				<category><![CDATA[इतिहास आणि संस्कृती]]></category>
		<category><![CDATA[onam date]]></category>
		<category><![CDATA[onam story]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=8797</guid>

					<description><![CDATA[<p>ओणम सण हा शब्द कित्येकदा आपल्या कानावर पडला असावा. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचे महत्व काय असते ? आणि मुख्य कोणत्या जमातीतील लोकं हा सण साजरा करतात ? पण या सणाला आहे वैज्ञानिकदृष्या महत्व. ते कसे हे आज आपण आजच्या खास लेखातून जाणुन घेणार आहोत. What is Onam Festival &#124; ओणम सण काय [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/what-is-the-purpose-of-onam-festival/">ओणम या सणाचं हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का ? का करतात हा सण साजरा, नक्की वाचा.</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-weight: 400;">ओणम सण हा शब्द कित्येकदा आपल्या कानावर पडला असावा. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचे महत्व काय असते ? आणि मुख्य कोणत्या जमातीतील लोकं हा सण साजरा करतात ? पण या सणाला आहे वैज्ञानिकदृष्या महत्व. ते कसे हे आज आपण आजच्या खास लेखातून जाणुन घेणार आहोत.</span></p>
<h2><strong>What is Onam Festival | ओणम सण काय आहे </strong></h2>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">केरळमध्ये धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’ ! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती! ओणम हा कापणीच्या हंगामातील सण. पावसाळा संपत आलेला असतो. बहरलेल्या हिरवाइच्या रूपात निसर्गदेवता ओणमचे स्वागत करायला सज्ज झालेली असते. फुलांची रांगोळी हेही या सणाचे एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते. वर फुलांची रांगोळी काढण्यात मुलेमुली गढून जातात. घराच्या आजूबाजूला सकाळी लवकर फिरून पुक्काळम्साठी विविध रंगांची फुलं गोळा करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा असतो.</span></p>
<h2><strong>Importance of Onam Festival | ओणम सणाचे महत्व काय </strong></h2>
<h3><b>दिवसांचे महत्वविशेष</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">पहिल्या दिवशी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत रोज थोडी थोडी फुलांची भर पडत जाते. दहाव्या दिवशी या फुलांच्या रांगोळीचा भलामोठा आकार बघण्यासारखा असतो. विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा हा आनंदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा सण दहा दिवसांचा असला तरी त्यातील पहिल्या दिवसाला महत्त्व असते. या सणाचा पहिला दिवस गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. त्याला ‘अत्तम’ म्हणतात. पहिल्या दिवशी केरळमधल्या गावागावांतून या सणाचा म्हणून ध्वज उभारला जातो. हा ध्वज मग ते अ&#x200d;ॅलेप्पी जिल्ह्याच्या एडत्वा गावातील चर्च असो वा चेरामन येथील भारतातील आद्य मशीद असो- सर्वत्र असतो. ध्वज उभारण्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा केरळमधील सर्व मंदिरांत सारखीच असते.</span></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">कोचीनजवळील त्रिक्काक्करा या गावातील मंदिर संकुलात वामनाचे मुख्य मंदिर आहे. या संकुलात विष्णूचीही मंदिरं भरपूर आहेत. सणाच्या पहिल्या दिवशी वामनाची मूर्ती अग्रभागी ठेवून मोठी मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिराला चोहोबाजूने वेढलेल्या चट्टविळकमध्ये पणत्या लावल्या जातात. या देवळांत ओणसद्या मोठय़ा प्रमाणावर दिली जाते.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>साफसफाईला महत्व </b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">उत्सवाच्या दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच कथकलीसारखे करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. या सणाची मल्याळी लोकांना एवढी उत्सुकता असते, की अगोदरच्या महिन्यापासूनच म्हणजे मल्याळी कर्केटम महिन्यापासून घरातील साफसफाईला सुरुवात होते. उद वगरे जाळून घरातील किडय़ामुंग्यांना घालवले जाते. जुनाट टाकाऊ वस्तू बांबूच्या परातीत घालून त्यांना घरातील इडा-पीडा समजून नोकराकरवी त्या दूरवर फेकल्या जातात. त्या नोकराकरवी घराबाहेर काढताना वाटेत घरातील कोणी नोकराला आडवे जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>केळींच्या पदार्थांचा बेत</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. जेवणातील मुख्य पदार्थाबरोबर हेही पदार्थ वाढले जातात. या दिवसांत कोणाही मल्याळी माणसाच्या घरात पाहुणे म्हणून जा- कुरकुरीत खाऱ्या केळ्याच्या चिप्सबरोबर कॉफीच्या कपाने तुमचे मनापासून स्वागत होईल.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>पारंपरिक पद्धतीने मूर्तिपूजा</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">पूर्वीच्या काळी गावांत काही ठिकाणी झाडावर झोपाळे बांधले जात. हे झुले सुंदर फुलांनी सजवले जात. नाटकं, संगीत, जलसे यांचा या दिवसांत नुसता जल्लोष असतो. ओणमला चिकणमातीपासून अंडाकृती आकाराच्या विष्णूच्या मूर्ती बनवल्या जातात. तांदळाच्या पिठीचा वापर करून त्यावर नक्षी काढली जाते. माडाच्या काडय़ा या मूर्तीना टोचून त्यावर सुरेख फुलं खोचली जातात. अशा सजवलेल्या मूर्ती अंगणात, फुलांच्या रांगोळीच्या मधे ठेवल्या जातात. त्या दिवशी या देवाला तीन वेळा नवेद्य दाखवला जातो.</span></p>
<p>&nbsp;</p>
<h3><b>सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन</b></h3>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">ओणम हा सण १९६० पासून केरळ सरकार राज्यपातळीवर साजरा करू लागले आहे. या महिन्यात हा ‘पर्यटन सप्ताह’ आखला जातो. संपूर्ण राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. यानिमित्त विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन केले जाते. ज्यात धाडसाची गरज असते असे पुरुषांचे खेळ- म्हणजे तळप्पंतू कळी (बलापाठोपाठ त्याचा कासरा धरून वेगाने धावणे), वळ्ळम्कळी (सरोवरे आणि नदीपात्रातील बोटींच्या शर्यती), पुलीकळी (वाघाच्या सोंगांचा खेळ) हे खेळ खेळले जातात. तर महिला कईकोट्टी कळी आणि तुंबी तुल्लाल (एक-दुसरीला टाळ्या देत फेर धरून केले जाणारे नृत्य) खेळतात.</span></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">दहाव्या दिवशी मंदिर आवारातील ओणमचा ध्वज उतरवण्यात येतो. ध्वज उतरवण्याचा पहिला मान कोचीपासून १२ कि.मी.वरील त्रिपुण्णित्तुरा येथील देवळाला जातो. त्रिपुण्णितुरा ही पूर्वी केरळची राजधानी होती. येथील मंदिरातील ध्वज खाली आणल्यावरच सर्व ठिकाणचे ध्वज खाली आणले जातात.</span></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="font-weight: 400;">या सणाच्या दिवसांत केरळमधील स्त्रिया पारंपरिक वस्त्रांत वावरतात. ओणम हा एकमेकांना भेटवस्तू देण्याचा व घेण्याचा सण समजला जातो. घरातील कुटुंबप्रमुख कुटुंबातील प्रत्येकाला त्या दिवशी नवीन कपडे- ज्याला ओणपुडावा म्हणतात- भेट देतो. घरातल्यांना या भेटी दिल्यावर मग घरातील नोकर व शेतातील मजुरांनाही भेटवस्तू देतात. असे केल्याने अश्या देवाण-घेवाणातून नातं अगदी घट्ट होत असते हे या सणाचे खास वैशिष्टय आहे हे यावरून कळते.</span></p>
<p>The post <a href="https://marathishout.com/what-is-the-purpose-of-onam-festival/">ओणम या सणाचं हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का ? का करतात हा सण साजरा, नक्की वाचा.</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2022/09/What-is-Onam-Festival.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>SUV कार खरेदीच्या करण्याचा अगोदर बघा GST चे हे दर जे बिघडवू  शकते  तुमचं गणित !</title>
		<link>https://marathishout.com/gst-on-suv-cars/</link>
		
		<dc:creator><![CDATA[मराठी Shout]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 12 Jul 2023 06:47:04 +0000</pubDate>
				<category><![CDATA[टेक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9866</guid>

					<description><![CDATA[<p>देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये बदल झालेले आहेत . आर्थिकदृष्ट्या काही व्यवहार सोपे झाले असले तरीही काही गणितं मात्र आणखी कठीण होऊन बसली आहेत. त्यातच भर घातली ती म्हणजे SUV वाहनांवरील जीएसटीनं. नुकत्यात GST परिषदेच्या बैठकीदरम्यान अनेक मोठे निर्णय आणि घोषणा झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये नजरा वळवल्या त्या म्हणजे चारचाकी वाहनं, एसयुव्ही कारवरील [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/gst-on-suv-cars/">SUV कार खरेदीच्या करण्याचा अगोदर बघा GST चे हे दर जे बिघडवू  शकते  तुमचं गणित !</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये बदल झालेले आहेत . आर्थिकदृष्ट्या काही व्यवहार सोपे झाले असले तरीही काही गणितं मात्र आणखी कठीण होऊन बसली आहेत. त्यातच भर घातली ती म्हणजे SUV वाहनांवरील जीएसटीनं. नुकत्यात GST परिषदेच्या बैठकीदरम्यान अनेक मोठे निर्णय आणि घोषणा झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये नजरा वळवल्या त्या म्हणजे चारचाकी वाहनं, एसयुव्ही कारवरील जीएसटीच्या नियमानं.</p>
<p>GST on SUV Cars: येत्या काळात तुम्हीही एखादी एसयुव्ही कार खरेदी करत असाल, तर शासनाचा एक निर्णय नक्कीच वाचून घ्या. कारण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मल्टी-यूटिलिटी व्हीकल्स (MUV) वर 22 टक्के कंपनसेशन सेस लावण्यास मान्यता दिली आहे. पण, सिडॅन कार या प्रवर्गात येणार नाहीत याची इथं नोंद घ्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं.</p>
<p>जीएसटी परिषदेदरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 1500 सीसीहून जास्त क्षमता असणाऱ्या कर आणि 170 mm हून अधिक ग्राऊंड क्लिअरन्स आणि 4 मीटरहून मोठ्या असणाऱ्या MUVs या 22 टक्के सेससाठी ग्राह्य धरल्या जातील. ज्यामुळं इनोव्हा, टोयोटा, मारुती अर्टिगा यांसारख्या कारचे दर वाढतील.</p>
<p>जीएसटी परिषदेदरम्यान झालेल्या निर्णयांसोबतच युटिलिटी कारसंदर्भातील काही नियमही जाहीर करण्यात आले जिथं 22 टक्के सेससाठी काही निकष निर्धारित करण्यात आले आहे.  वर नमूद करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे हा कर लागू असेल. तसेच एसयुव्ही कारवर 28 टक्के जीएसटी आकारला जाईल.</p>
<p>28 टक्के GST Slab मध्ये SUV कार कायम असतील. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात विक्री होणारी प्रत्येत एसयुव्ही आणि मल्टी युटिलिटी कार या करप्रणालीत येते.</p>
<p>&nbsp;</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/gst-on-suv-cars/">SUV कार खरेदीच्या करण्याचा अगोदर बघा GST चे हे दर जे बिघडवू  शकते  तुमचं गणित !</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2023/07/SUV-Car-Price.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
		<item>
		<title>Apple iPhone वर लागणार  &#8216;टाटा&#8217;चा शिक्का ! लवकरच भारतात तयार होणार आयफोन?</title>
		<link>https://marathishout.com/apple-iphone-tata-manufacture-phone/</link>
		
		<dc:creator><![CDATA[मराठी Shout]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 12 Jul 2023 06:11:08 +0000</pubDate>
				<category><![CDATA[टेक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://marathishout.com/?p=9863</guid>

					<description><![CDATA[<p>Apple कंपनीच्या आयफोनचा क्रेझ जवळपास सगळ्यांनाच असतो. लहन्यांपासून तर मोठयनपर्यंत सगळ्यांना आयफोन घेणायची इच्छा असते. आयफोन (iPhone) किंवा अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट बाजारात लाँच होताच त्याची मागणी प्रचंड वाढते वाढते. आयफोन घेणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली दिसत आहे . टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच भारतात आयफोन बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. टाटा कंपनी [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/apple-iphone-tata-manufacture-phone/">Apple iPhone वर लागणार  &#8216;टाटा&#8217;चा शिक्का ! लवकरच भारतात तयार होणार आयफोन?</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>Apple कंपनीच्या आयफोनचा क्रेझ जवळपास सगळ्यांनाच असतो. लहन्यांपासून तर मोठयनपर्यंत सगळ्यांना आयफोन घेणायची इच्छा असते.</p>
<p>आयफोन (iPhone) किंवा अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट बाजारात लाँच होताच त्याची मागणी प्रचंड वाढते वाढते. आयफोन घेणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली दिसत आहे . टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच भारतात आयफोन बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. टाटा कंपनी आयफोन ठरवणारी पहिली कंपनी बनू शकते. लवकरच टाटाचा अॅपलसोबतचा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. येणाऱ्या ऑगस्ट २०२३ पर्यंत यासंबंधी शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे . टाटा आणि अ&#x200d;ॅपलमधला हा करार प्रत्यक्षात उतरल्यास ही एक मोठी घडामोड ठरणार आहे. कारण आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करणारी टाटा ही पहिली स्थानिक भारतीय कंपनी ठरणार.</p>
<p>कर्नाटकात स्थायी असलेल्या विस्ट्रॉन कॉर्प या कारखान्याचे अधिग्रहण टाटा ग्रुप करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे. या कारखान्याची किंमत जवळपास 600 मिलियन डॉलर इतकी आहे. इथे जवळपास 10,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. सध्या इथे iphone 14 या हँडसेडची निर्मिती करण्यात येणार आहे. हा करार जवळपास 5 हजार कोटींचा असल्याची चर्चा आहे. मात्र, अॅपल आणि विस्ट्रॉन कॉर्पकडून अद्याप कोणतीही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही</p>
<p>दरम्यान, विस्ट्रोनने 2024 पर्यंत कारखान्यातून किमान $1.8 अब्ज किंमतीच्या आयफोन निर्मित करणार आहे . त्यासाठी पुढील वर्षापर्यंत कारखान्यातील कामगारांची संख्या तिप्पट करण्याची योजनासुद्धा आहे. मात्र, विस्ट्रॉन आता भारतातून आयफोन निर्मिती न करण्याच्या विचारात आहे. त्यामुळं टाटाने कारखाना खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रकरणात टाटा, विस्ट्रॉन आणि अॅपलच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.</p>
<p>अॅपल कंपनीचा आयफोन तसंच इतर डिव्हाइस बनवण्यासाठी भारतात तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. यात विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन यांचा कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्प या तैवान देशाच्या कंपन्या आहे त्यामुळं भारतात आयफोन बनवल्यास अॅपललाच त्याचा जास्त फायदा होणार.</p>
<p>टाटा हा भारतातील विश्वासनीय ब्रँड आहे. .गेल्या 155 वर्षांपासून टाटा भारतातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचला आहे. मीठापासून ते तंत्रज्ञानापर्यंत टाटा वस्तू तयार करते त्यामुळं भारतात जर आयफोनचे उत्पादन होणार असेल तर भारतीयांसाठी ही मोठी गोष्ट असेल.</p>
<p>The post <a href="https://marathishout.com/apple-iphone-tata-manufacture-phone/">Apple iPhone वर लागणार  &#8216;टाटा&#8217;चा शिक्का ! लवकरच भारतात तयार होणार आयफोन?</a> appeared first on <a href="https://marathishout.com">Marathi Shout</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
		<media:content url="https://marathishout.com/wp-content/uploads/2023/07/Apple_Iphone_tata_Contarct.jpg" medium="image"></media:content>
            
	</item>
	</channel>
</rss>
