tag:blogger.com,1999:blog-69901123970427995572024-03-13T11:50:38.443+05:30Abstract IndiaAbstract India : A blog where you will find many Health, Ayurveda articles, thanks to Shree Balaji Tambe and Esakal.Suhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.comBlogger339125tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-53943947603067826232018-07-22T09:02:00.000+05:302018-07-22T09:02:29.843+05:30आरोग्यसंपदा : औषधी औदुंबर<h1 class="entry-title" style="background-color: white; box-sizing: border-box; color: #111111; font-family: "Noto Sans"; font-size: 34px; line-height: 42px; margin: 0px 0px 7px; word-wrap: break-word;">
<div class="td-post-header" style="box-sizing: border-box; color: black; font-size: 22px; font-weight: 400;">
<br />
<header class="td-post-title" style="box-sizing: border-box;"><div class="td-module-meta-info" style="box-sizing: border-box; font-family: "Open Sans", arial, sans-serif; font-size: 11px; line-height: 1; margin-bottom: 16px; min-height: 17px;">
<strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">औदुंबर</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">वृक्ष</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">दत्तगुरूला</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">भारी</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">प्रिय</strong><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">… </strong><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">पण</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">त्याबरोबरच</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">उंबराच्या</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">झाडाचे</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">इतरही</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">अनेक</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">उपयोग</strong><span style="color: #222222; font-family: "noto sans"; font-size: 18px; text-align: justify;"> </span><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">आहेत</strong><strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;">.</strong></div>
<div class="td-module-meta-info" style="box-sizing: border-box; font-family: "Open Sans", arial, sans-serif; font-size: 11px; line-height: 1; margin-bottom: 16px; min-height: 17px;">
<strong style="box-sizing: border-box; color: #222222; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; text-align: justify;"><img src="https://www.flowerpicturegallery.com/d/10195-2/audumbar+fruit+sinhagad+tree.JPG" /></strong></div>
</header></div>
<div class="td-post-content" style="box-sizing: border-box; color: #222222; font-size: 18px; font-weight: 400; line-height: 34px; margin-top: 21px; padding-bottom: 16px;">
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
<strong style="box-sizing: border-box;">दत्तगुरू</strong> ज्या वृक्षाखाली असतात अशी भावना असलेला वृक्ष म्हणजे औदुंबर… उंबर… उंबराची फळं उपयुक्त असतातच, पण उंबराच्या वृक्षाची लाकडे यज्ञासाठी वापरली जातात. त्याव्यतिरिक्त हा वृक्ष कुणी तोडत नाही. कच्ची उंबरे हिरव्या रंगाची तर पिकल्यावर लाल, गुलाबी रंगाची बनतात. मार्च ते जूनदरम्यान फळं येतात. उंबराच्या जवळ जर विहीर खोदली तर भरपूर पाणी लागते. त्याची फळे भरपूर मिळतात, परंतु उंबराला फुले मात्र दिसत नाहीत.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
उपचारासाठी उंबराची साल, पाने, मुळं तसेच त्यातून निघणारा दुधासारखा पांढरा द्रव या सगळ्याचा उपयोग केला जातो. उंबराचे फळ चवीला तुरट असते, पण शरीरातील कफ व पित्तदोषांचे हे संतुलन ठेवते. सूज कमी करणारा, वेदनाशामक, पचायला जरा जड. तात्पर्य पोटातील अग्नी विझविणारा तसेच असह्य वेदना कमी करणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे. आगीत होरपळल्यावर जळलेल्या त्कचेकर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
<strong style="box-sizing: border-box;">अनेक</strong> <strong style="box-sizing: border-box;">विकारांवर</strong> <strong style="box-sizing: border-box;">गुणकारी</strong></div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
उंबराचा पांढरा द्रवही शरीरातून बाहेर पडणाऱया अनेक स्रावांना रोखतो. जसे रक्त, मल-मूत्र आदी. याच्या फळांचे सेवन केल्याने पुरुषाचे वीर्य व शक्ती वाढते. तसेच मन सदैव प्रसन्न राहते. फोडं-मुरुमावर याचा रस लावल्यास ते लवकर पिकतात. याच्या मुळांचा रस शरीराची आग शांत करतो. रक्तस्राव रोखणारा तसेच नियमित सेवन केल्यास क्षयरोग व मधुमेह सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
<strong style="box-sizing: border-box;">उंबराचे</strong> <strong style="box-sizing: border-box;">असेही</strong> <strong style="box-sizing: border-box;">उपयोग</strong></div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> नाकातून रक्त येत असेल तर उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस त्यात गूळ वा मध घालून प्यावा. हाच उपाय मासिक पाळीत अधिक रक्तस्राव असल्यासही हेच प्रमाण घ्याके.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> ग्रीष्म ऋतूतील गरमी किंवा आग उत्पन्न करणारे विकार तसेच देवीच्या आजारासारख्या विकारात फोड आल्यावर पिकलेल्या फळाचा रस त्यात साखर टाकून तयार केलेलं सरबत प्यावे.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> मधुमेह झाल्यास उंबराच्या कोवळ्या पानांचा रस त्यात २० मिली. मध घालून प्रत्येक दिवशी २-३ वेळा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागत नाही. तसेच लघवीतील साखरेचे प्रमाण सामान्य होण्यास मदत होते.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> जिभेला फोडं येणे, चट्टे पडणे, हिरडय़ांतून रक्त वाहणे, दातदुखी, दात हलणे या विकारांवर याची साल किंवा पानांचा काढा तयार करून तो तोंडात ठेवावा.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
<strong style="box-sizing: border-box;">डोळ्यांची</strong> <strong style="box-sizing: border-box;">होणारी</strong> <strong style="box-sizing: border-box;">जळजळ</strong> <strong style="box-sizing: border-box;">थांबवतो</strong></div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> उंबराचा आणखी एक चांगला उपयोग म्हणजे हातापायांची त्वचा फाटल्यास किंवा पायांच्या तळव्यांना कात्रे पडल्यास होणाऱया वेदना कमी करण्यासाठी उंबराच्या पांढऱया द्रव्याचा लेप लावल्याने जखम भरून सामान्य होण्यास मदत होते. डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ आदी लक्षणं उत्पन्न झाल्यास उंबराच्या पानांचा काढा करून स्वच्छ कपडय़ाने गाळून घ्यावा व थंड झाल्यावर डोळ्यांत त्याचे२-२ थेंब दिवसातून ४ वेळा टाकावे. नेत्रज्योती तेज होते.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> त्वचाविकारात त्वचेचा रंग बिघडला तर उंबराच्या फांदीला येणारे कोंब वाटून तो लेप त्वचेला लावावा. उंबराची पिकलेली फळं खाल्ली तर गर्भाशयाच्या मांसपेशींना बळ मिळते आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.</div>
<div style="box-sizing: border-box; line-height: 34px; margin-bottom: 26px; text-align: justify;">
> लहान मुलांना पातळ शौचास होत असेल तर उंबराच्या रसात साखर घालून ते सेवन करावे. शरीरातील रक्त व पित्त दूषित होऊन अंगाची जळजळ झाल्यास उंबराच्या सालीचा काढा पोटात घ्यावा. सतत तहान लागत असल्यासही हाच काढा घेतल्यास फायदा होतो. तसेच नाक, तोंड व गुदद्वारातून रक्त पडले तर हाच काढा फायद्याचा आहे.</div>
</div>
</h1>
<br />
#Ayurveda, #Vastu shastra, #healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-17941517856016990822017-03-14T08:54:00.003+05:302017-03-14T08:54:25.171+05:30 दिवसातून आठ वेळा खा भाज्या आणि फळे <div class="panel-pane pane-views pane-detail-widgets pull-right content-gallery">
<div class="pane-content">
<div class="view view-detail-widgets view-id-detail_widgets view-display-id-block_2 view-dom-id-e8b828e408495370e0c9bd2325ee7679">
<div class="view-content">
<div class="views-row views-row-1 views-row-odd views-row-first views-row-last">
<div class="views-field views-field-colorbox">
<span class="field-content"></span> </div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="panel-pane pane-block pane-esutil-custom-print pull-right pane-esutil">
<div class="pane-content">
<a href="https://www.blogger.com/null"><span class="glyphicon glyphicon-print" style="color: grey; cursor: pointer;"></span></a>
</div>
</div>
<div class="row">
<div class="col-lg-12 col-md-12 col-sm-12 col-xs-12">
<div class="panel-pane pane-entity-field pane-node-field-image detail-title detail-cover-image">
<div class="pane-content">
<div class="field field-name-field-image field-type-image field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
<div class="field field-name-field-image field-type-image field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
<img alt="Fresh-Organic-Vegetabl" class="adaptive-image img-responsive" data-adaptive-image-breakpoint="1280" height="540" src="https://images.sakalmediagroup.com/eSakal/s3fs-public/styles/generic_md_75/public/news-story/cover-images/4Fresh_Organic_Vegetabl.jpg" title="Fresh-Organic-Vegetabl" width="960" />
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="row">
<div class="col-lg-12 col-md-12 col-sm-12 col-xs-12">
<div class="panel-pane pane-entity-field-extra pane-node-sharethis pull-right">
<div class="pane-content">
</div>
</div>
</div>
</div>
<div class="col-lg-4 col-md-4 col-sm-4 col-xs-12 summary-height">
<div class="panel-pane pane-token pane-node-summary key-summary-text text-style">
<div class="pane-content">
<span style="color: #b45f06;"><b>भाज्यांचा आहारात वापर असला पाहिजे, याविषयी बहुतेक सर्व वैद्यकीय
तज्ज्ञांचे एकमत असले तरी त्यांचे नेमके प्रमाण आहारात किती असावे, याचा
अभ्यास नॉर्वे येथील संशोधकांनी केला आहे. त्यांनी जगभरातील अग्रगण्य ९५
संशोधनपत्रिकेतील सुमारे १४२ संशोधनांचा एकत्रित अभ्यास केला आहे. त्याचे
निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले
आहेत. </b></span><br />
<br />
भाज्यांचा आहारात वापर असला पाहिजे, याविषयी बहुतेक
सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत असले तरी त्यांचे नेमके प्रमाण आहारात किती
असावे, याचा अभ्यास नॉर्वे येथील संशोधकांनी केला आहे. त्यांनी जगभरातील
अग्रगण्य ९५ संशोधनपत्रिकेतील सुमारे १४२ संशोधनांचा एकत्रित अभ्यास केला
आहे. त्याचे निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी मध्ये प्रकाशित
करण्यात आले आहेत.</div>
</div>
</div>
<div class="col-lg-12 col-md-12 col-sm-12 col-xs-12 nopadding">
<div class="panel-pane pane-node-body news-summary detail-title text-style">
<div class="pane-content">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
भाज्यांचा
आहारात वापर असला पाहिजे, याविषयी बहुतेक सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत
असले तरी त्यांचे नेमके प्रमाण आहारात किती असावे, याचा अभ्यास नॉर्वे
येथील संशोधकांनी केला आहे. त्यांनी जगभरातील अग्रगण्य ९५ संशोधनपत्रिकेतील
सुमारे १४२ संशोधनांचा एकत्रित अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष
इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.<br />
नॉर्वेयन शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक डॅगफिन औने आणि
इंपिरीअल कॉलेज लंडन येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये हृदयरोगांचा
धोका टाळण्यासाठी आहारामध्ये सुमारे ८०० ग्रॅम भाज्या व फळांचा समावेश
आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. आजवर पाचवेळा विभागून भाज्या किंवा फळे
खाण्याविषयी सांगितले जात असले तरी नेमका आकडा हा आठ असल्याचे संशोधकांनी
सांगितले.<br />
भाज्या व फळांचे योग्य प्रमाण आहारात ठेवल्यास जगभरातील ७.८ दशलक्ष
लोकांमध्ये असलेला हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग आणि अपमृत्यूचा धोका टाळणे
शक्य होणार आहे.</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<br />
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-30559093467803064992016-06-14T07:49:00.000+05:302016-06-14T07:49:03.785+05:30सेंद्रिय अन्न<table align="left" border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="background-color: white; color: black; font-family: Mangal, Verdana; width: 980px;"><tbody>
<tr><td align="left" valign="top" width="680"><div style="padding-right: 20px;">
<div>
<span style="font-size: 19px; font-weight: bold; line-height: 30px;">सेंद्रिय अन्न</span></div>
<div>
<span style="font-size: 19px; line-height: 30px;"><b><br /></b></span><img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160520/images/5166449078837871815/5481904801341956205_Org.jpg" style="float: left; font-size: 15px; line-height: 25px; padding: 5px;" title="" /></div>
<div id="NewsContainer">
<div class="NewsDetails" style="font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px; padding-top: 10px;">
<div id="mvdata">
<span style="color: #cc0000;">अन्न- पाणी- हवा या तीन गोष्टी जर नैसर्गिक अवस्थेत राहिल्या, तर आरोग्य अनुभवता येईल. पण, यात असंतुलन झाले, तर मात्र मनुष्याच्या दुःखाला सीमा राहणार नाहीत. सध्या ज्याला ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय म्हटले जात आहे, त्यालाच आयुर्वेदाने "नैसर्गिक सात्त्विक अन्न‘ असे नाव दिले आहे. जरी काही अन्नाचे प्रकार पूर्ण नैसर्गिक नसले व संपूर्णतया अनैसर्गिकही नसले, तरी अशा वेळी त्यांच्या गुणवत्तेनुसार व त्या अन्नाच्या प्रकृतीनुसार त्यांना "राजसिक‘ किंवा "तामसिक‘ म्हटले जाते. </span><br /><br />निसर्गचक्र सतत फिरत राहिले पाहिजे. अर्थात, या चक्राची गतिमानता म्हणजेच जीवन! ज्ञातातून अज्ञाताकडे, जडातून चैतन्याकडे शक्तीचे परिवर्तन म्हणजेच या सतत चालणाऱ्या चक्राची गती. नैसर्गिक जीवनपद्धती म्हणजे या चक्राच्या बरोबरीने सतत कर्मरत राहणे. किंबहुना, जीवनाची इतिकर्तव्यता निसर्गचक्राला गतिमान ठेवण्यातच असते. शक्तीच्या उन्नत स्वरूपात परिवर्तनासाठीसुद्धा मुळात शक्तीची आवश्यकता असतेच. चेतनाशक्ती (अधिक उन्नत अशी शक्ती) सर्व वस्तुजातातील जड शक्तीवर काम करून त्या जडाची उत्क्रांती घडवते. या क्रियेला भारतीय परंपरेने "यज्ञ‘ अशी संज्ञा दिली आणि हा यज्ञ ज्या कर्मामुळे घडतो ते कर्म ज्ञानानुभवाधिष्ठित असते. श्रीमद्भगवद्गीतेत पुढील श्लोक दिलेला आहे. <div>
<br />अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ।।3-14।। </div>
<div>
<br />कर्मामुळे यज्ञ (शक्तिरूपांतरण क्रिया), यज्ञामुळे पर्जन्य, पर्जन्यामुळे अन्न आणि अन्नामुळे जीवमात्र अर्थात मनुष्यसुद्धा, असे हे निसर्गचक्र सतत चालू असते. ज्याअर्थी उत्पत्ती व जीवन अन्नावर अवलंबून असते, त्याअर्थी जीवनात अन्नाचे महत्त्व अतिशयच असणार. किंबहुना, जीवनाचा स्तर किंवा जीवनातील सुख-दुःखे अन्नावरच अवलंबून असणार हे निश्चित. जे कोणी केवळ शरीरपोषणासाठी म्हणजेच फक्त भौतिक रूपांतरणासाठी अन्न सेवन करतात त्यांचे जीवन व्यर्थ, असे स्पष्टच सांगितले आहे. पण, जे जड शक्तिरूपी अन्न खाऊन ते निसर्गचक्ररूपी यज्ञात अर्पण करून त्यापासून शरीर, मन व आत्मा यांच्यासाठी लागणाऱ्या उन्नत अवस्थेच्या शक्तीमध्ये रूपांतरण करतील, ती माणसे सुखी, समाधानी व आनंदी होतात. </div>
<div>
<br />एक असाही समज आहे, की अन्न, औषध किंवा इतर वस्तू या वनस्पतिजन्य (हर्बल) असाव्यात. तसा प्रचार करून वस्तूंवर तसे लिहून अनेकांनी आपल्या तुंबड्या भरल्या. खरे पाहता नुसते वनस्पतीज असे म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. वनस्पतिजन्य म्हणण्याबरोबरच ते सेंद्रिय किंवा नैसर्गिक उत्पादन असेल, तरच त्याला अर्थ असतो व त्याचे महत्त्व उरते. सध्या बायो फूड, ऑरगॅनिक फूड, सेंद्रिय अन्न, सेंद्रिय शेती या संकल्पनांना खूप महत्त्व आले आहे. वैज्ञानिकांनी पण यावर विचारमंथन व संशोधन सुरू करून या ऑरगॅनिक म्हणजेच नैसर्गिक अन्नाचा व आरोग्याचा संबंध जोडला व सध्या वाढत असलेल्या नवीन नवीन रोगांचे कारण अनैसर्गिक रासायनिक खते वगैरे वापरून केलेले अन्न हा निष्कर्षही प्रसिद्ध केला. निसर्ग म्हणजे त्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी - हवा (वातावरण), तहानेसाठी पाणी, भुकेसाठी अन्न. म्हणजेच अन्न- पाणी- हवा या तीन गोष्टी जर नैसर्गिक अवस्थेत राहिल्या, तर आरोग्य अनुभवता येईल. पण, यात असंतुलन झाले, तर मात्र मनुष्याच्या दुःखाला सीमा राहणार नाहीत. सध्या ज्याला ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय म्हटले जात आहे, त्यालाच आयुर्वेदाने "नैसर्गिक सात्त्विक अन्न‘ असे नाव दिले आहे. जरी काही अन्नाचे प्रकार पूर्ण नैसर्गिक नसले व संपूर्णतया अनैसर्गिकही नसले, तरी अशा वेळी त्यांच्या गुणवत्तेनुसार व त्या अन्नाच्या प्रकृतीनुसार त्यांना "राजसिक‘ किंवा "तामसिक‘ म्हटले जाते. </div>
<div>
<br />जन्माला आलेल्या प्रत्येकाला जीवनाची आस असते आणि त्यासाठी आपोआपच अन्नाचीही आस असते. प्रतिष्ठा, पैसा, जमीन-जुमला कितीही असला, तरी त्याची किंमत अन्नाशिवाय शून्य राहील, हे आपण जाणून आहोतच. म्हणूनच आयुर्वेदाने तर स्पष्ट सांगितले आहे. "सर्वं अन्ने प्रतिष्ठितम्‘. अर्थात, सगळं काही अन्नाच्या आधीन आहे. </div>
<div>
<br />असे हे जीवनास अत्यावश्यक असलेले अन्न अधिकाधिक जीवनोपयोगी कसे बनवता येईल, यासाठी आयुर्वेदशास्त्राने अनेक मार्ग सुचवले, अनेक संकल्पना समजावल्या. "अग्निसंस्कार‘, "कालसंस्कार‘ एवढेच नाही, तर अन्न कधी खावे, कसे खावे, कशाबरोबर खावे अशा लहानातल्या लहान; पण अत्यंत मोलाच्या सूचनाही दिल्या. मात्र अन्न शरीर, मन, आत्म्याच्या समाधानासाठी, तुष्टी-पुष्टीसाठी असते, याचे भान मनुष्याला राहिले नाही. संपूर्ण आरोग्यविचार न करता केवळ रुचीच्या आहारी जाऊन अन्न निवडले जाऊ लागले आणि नैसर्गिक काय आहे याचा विचार न करता खोट्या आशेपायी आणि नाहक स्वार्थापायी अनैसर्गिक अन्न तयार केले गेले, अर्थातच रोगवाढीस वाव मिळाला. </div>
<div>
<br />हे सगळं आज अचानक घडलं असं नाही, तर मनुष्य मोह - हव्यासाच्या आहारी जाऊन निसर्गाविरुद्ध जेव्हा जेव्हा गेला, तेव्हा तेव्हा असंच घडलं. हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या चरकसंहितेत याचा उल्लेख सापडतो. </div>
<div>
<br />सर्वे शारीरदोषा भवन्ति ग्राम्याहारात् ।.... चरक चिकित्सास्थान </div>
<div>
<br />अर्थात, मोठ्या गावात - शहरात राहणाऱ्या म्हणजे निसर्गापासून दूर गेलेल्या व्यक्तींनी केलेला "ग्राम्याहार‘ किंवा बाहेरचे खाणे हे सर्व शरीरदोषांचे, विकारांचे मूळ कारण आहे. अर्थात, त्यावेळचे अनैसर्गिक अन्न आणि आजचे अनैसर्गिक अन्न यांत फरक आहे. चरकाचार्यांनी शिळे अन्न, सुकवलेल्या भाज्या, जुने सुकवलेले मांस, विरुद्ध अन्न, नवीन धान्य वगैरे गोष्टींचा उल्लेख केला; तसाच आज आपल्याला रासायनिक खते घालून, अनैसर्गिक कीटकनाशके फवारून उगवलेल्या भाज्या, धान्य, अन्नातील गुणसूत्रांत बदल करून तयार केलेल्या अन्नाचा समावेश करावा लागेल. </div>
<div>
<br />रासायनिक खते वापरून तयार केलेले अन्न अनैसर्गिक का, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. रात्री घराबाहेर बसलेला कुत्रा चोराची चाहूल लागल्यावर म्यॉंव म्यॉंव असे ओरडू लागला, तर आपला काय समज होईल? उघड्या ठेवलेल्या साखरेला जर मुंग्या लागल्या नाहीत किंवा कुंडीतील गुलाबाला आठवडाभर पाणी वगैरे न घालता तो मान न टाकता ताजा, टणक व उमललेला राहिला तर आपला काय समज होईल. नक्कीच साखर खोटी असणार व गुलाबाचं फूलही प्लॅस्टिकचं, बनावटी, अनैसर्गिक असणार, हे आपल्याला सहज समजेल. सध्या बाजारात मिळणारे गुलाब नाजूकही नसतात व त्यांना सुगंधही नसतो, फक्त ते दिसतात गुलाबासारखे. </div>
<div>
<br />प्रत्येक वस्तूचा एक स्वभाव असतो. आयुर्वेदात अन्नधान्य, भाजीपाला, पाणी, मूत्र वगैरे सर्व द्रव्यांचा अभ्यास करून त्याचा स्वभाव, गुण-दोष लिहून ठेवलेले आहेत. नुसतेच लिहून ठेवलेले आहेत असे नव्हे, तर नैसर्गिक अवस्थेत त्या वस्तूंच्या स्वभावाचा अनुभव आजही कुणालाही घेता येतो. स्वभाव म्हणजे त्या वस्तूचे जडत्व, उष्ण-शीतत्व, खारट-गोड आदि चव, शरीरात त्याचा होणारा परिणाम व त्याचे होणारे कर्म. कुठल्या झाडाला किती पाणी लागतं, किती सूर्यप्रकाश लागतो, कोठल्या प्रकारच्या मातीची आवश्यकता असते, कोठला ऋतू त्यासाठी अनुकूल वा प्रतिकूल आहे हे सर्व ठरलेलं असतं. वातावरणात बदल करून चुकीच्या जमिनीत रासायनिक खते वापरून तयार केलेले अन्न हा काहीतरी वेगळा प्रकार होणार व त्याला अनैसर्गिक म्हणता येईल. त्यातून दोन विजातीय संयोगातून तयार करवलेली वनस्पती म्हणजेच संकरित वनस्पती व गुणसूत्रं बदललेली वनस्पती मूळ स्वभावाशी इमानदारी ठेवून नसते. उत्पादन वाढावे व कीटकांनी वनस्पतीवर हल्ला चढवू नये, फळे मोठ्या आकाराची व एकसारखी असावीत व दिसायलाही सुंदर असावीत अशी अपेक्षा ठेवली, की गुणसूत्रांत बदल करावा लागतोच. त्यामुळे वनस्पतीचा मूळ स्वभावच बदलून त्या अनैसर्गिक होतात व त्यांच्यापासून मिळणारे अन्नपण अनैसर्गिक होते. म्हणजेच असे सर्व उत्पन्न अनैसर्गिकच म्हणावे लागेल. प्रत्येक वनस्पतीचा जसा एक स्वभाव असतो, तशी त्याची रोगप्रतिकारशक्तीही ठरलेली असते. गुणसूत्र बदलल्यामुळे त्यांच्यावर पडणारी कीड किंवा रोगराईचे निवारण करण्यासाठी अत्यंत जहाल कीटकनाशके वापरावी लागतात व या कीटकनाशकांचे विष वनस्पतीत व फुला-फळांमध्ये भिनते. </div>
<div>
<br />जगात सर्वांना, मग ते गरीब - श्रीमंत कोणीही असोत, दोन घास अन्न मिळालेच पाहिजे; पण त्यासाठी नुसते अन्नधान्य मुबलक असून चालणार नाही, तर ते विकत घेण्यासाठी खिशात चार पैसेही असावे लागतील. ते चार पैसे कष्ट केल्याशिवाय मिळणार नाहीत. मनुष्याला जर कमी कामात जास्त मोबदला किंवा काम न करता फुकट जेवण मिळू लागले, तर मग मुळात शेती करणार कोण व कशासाठी? पण कमी श्रमात खूप उत्पन्न मिळण्यासाठी रासायनिक शेती करून गहू- तांदूळ यांच्यासारखेच दिसणारे; पण संपूर्ण वेगळ्या गुणधर्माचे सर्व अन्नधान्य व भाजी, फळफळावळ देणारे वाण तयार झाले, ज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे गेल्या 50 वर्षांत मानवजातीचे आरोग्य पूर्ण ढासळत गेले. त्याचबरोबर जमीन पण जळून - होरपळून गेली आणि अशा संकरामुळे वांझ झालेल्या जमिनीतून काहीही उगवणे शक्य राहिले नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीचा माळवी पंजाबी गहू जेथे तयार होतो, त्या ठिकाणी खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमीन पूर्ण नष्ट तर झाल्याचे म्हटले आहे. अशा प्रतीचे अन्न खाल्ल्यामुळे अन्नातील झालेल्या गुणसूत्रांतील बदलांमुळे मनुष्याच्या गुणसूत्रांत बदल होतात व ते बदल चार पिढ्यांपर्यंत दिसून येऊ शकतात. तसेच, स्त्रियांच्या गर्भधारणेत अडथळा तर येतोच; परंतु गर्भपात होण्याची शक्यता वाढते, असेही पुढे म्हटलेले आहे. </div>
<div>
<br />गाई-म्हशी व दूध व दुधाचे पदार्थ याबाबतीत पण संकरित वाण आणि जनावरांना दिलेले अनैसर्गिक खाद्य व हार्मोन व इतर औषधे यामुळे मनुष्यमात्रांना नवीन नवीन रोगांना कसे तोंड द्यावे लागत आहे हेही दिसून येते. अनैसर्गिकरीत्या अन्न व औषधे देऊन वाढवलेल्या प्राण्याचे मांस खाऊन किती भयंकर मोठी आपत्ती ओढवली याची "मॅड काऊ डिसीज‘, "बर्ड फ्लू‘ अशी उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेतच. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तूंतही रसायनांचा उपयोग केल्याने काय त्रास होतो याचा प्रत्येकाला अनुभव आहे. सुगंधी फुलांची शुद्ध तेले, अत्तरे किंवा उदबत्त्या न वापरता केवळ स्वस्त किमतीचे उत्पादन करण्यासाठी कृत्रिम रासायनिक सुगंध वापरल्यामुळे फुफ्फुसांचे व त्वचेचे रोग पसरत आहेत. केसांना चिकटपणा येऊ नये म्हणून वनस्पतीज खोबरेल तेलाऐवजी रासायनिक शुद्धिप्रक्रियेतून तयार झालेले खनिज तेल वापरल्यामुळे केस जाऊन टक्कल तर पडतेच; पण उष्णता वाढून मेंदूचेही रोग होतात, डोळ्यांना कमी दिसू लागते. बाजारात मिळणाऱ्या "वनस्पतिजन्य‘ अशी उगाचच जाहिरात केलेल्या अनेक सौंदर्यप्रसाधनांत वनस्पतीचा अर्क एक थेंब असू शकतो व बाकी सर्व वस्तू रासायनिकच असतात. या वस्तूंचा प्रयोग प्राण्यांवर केला नाही, अशीही एक जाहिरात उगाचच केलेली असते. नाही तरी फेस क्रीमचा प्रयोग प्राण्याच्या चेहऱ्यावर कसा करणार? ही सर्व उत्पादने सेंद्रिय नसतात. त्यामुळे अशा सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने अनेकांना त्वचेचे विकार किंवा इतर विकार होऊ शकतात. कुंकवाच्या टिकलीने फुटक्या कपाळाचा अनुभव अनेक स्त्रियांनी घेतलेला असेलच. या अनैसर्गिक द्रव्यांच्या उपयोगामुळे, तसेच अनैसर्गिक अन्न- पाणी सेवनामुळे मनुष्याची एकूणच वीर्यशक्ती कमी झाली व असाध्य रोगांचा प्रसार वाढला. </div>
<div>
<br />अशा परिस्थितीतही निराश होण्याचे कारण नाही, कारण योग्य वेळी शास्त्रज्ञांना, विचारवंतांना आणि विशेषतः पाश्चिमात्य जनतेला आयुर्वेदाचे मार्गदर्शन लाभले आणि बायो फूड, ऑरगॅनिक अन्न म्हणजेच नैसर्गिक वस्तू व नैसर्गिक अन्नाचे महत्त्व समजून आले व त्यांनी निर्धार केला की दोन घास कमी मिळाले तरी चालेल; पण खाऊ तर नैसर्गिक अन्नच खाऊ. अनैसर्गिक वस्तू खाऊन नंतर औषधपाण्यावर जादा खर्च करण्यापेक्षा अन्नालाच थोडी अधिक किंमत दिली, तर ते अंतिमतः स्वस्तच पडते. नैसर्गिक शेतीत शेतीला लागणाऱ्या बहुतेक सर्व वस्तू (बियाणे, खत वगैरे) शेतकऱ्यांच्या घरातच तयार होतात. शिवाय, शेतीतील वस्तू शेतीतच वापरून निसर्गचक्राचे संतुलन ठेवण्यास मदत मिळते. रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे सर्व बाहेरून विकत घ्यावे लागते.<br />एकूणच खराब झालेल्या जमिनीला पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे, हजारो एकर पडीक जमीन पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे व माणसांना शेतीप्रवण करणे हे पहिले काम करावे लागेल. त्याच्यानंतर कुठलेही अनैसर्गिक अन्नच नव्हे, तर इतर कोठलीही अनैसर्गिक वस्तू अजिबात वापरायची नाही, असा निश्चय करून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा लागेल. कोबीचा गड्डा उगाचच खूप मोठा दिसतो व स्वस्त आहे म्हणून विकत घेतला, तर पचपचीत व पांचट पानांची रास व त्याबरोबर खतांची उष्णता व कॅन्सरसारख्या रोगाला बोलावणाऱ्या खुणा सहजच घरात येतील. </div>
<div>
<br />आपले स्वतःचे आपल्या मुलांचे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचे व पर्यायाने पृथ्वीचे आरोग्य व अस्तित्व टिकवायचे असेल, तर फक्त सेंद्रिय अन्नच खायचे, हा संकल्प "खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी‘ अशा निष्ठेने करावा लागेल.<br /><br />- डॉ. श्री बालाजी तांबे, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 </div>
<div>
<br /></div>
</div>
</div>
</div>
</div>
</td></tr>
</tbody></table>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-61383187126735682502016-06-13T07:43:00.001+05:302016-06-13T07:43:56.109+05:30शरीरातील घड्याळ<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana;">
<div class="NewsDetails" style="font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px; padding-top: 10px;">
<div id="mvdata">
<div>
<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="color: black; width: 660px;"><tbody>
<tr><td align="left" colspan="2" valign="top"><div class="NewsHeading" style="font-size: 19px; font-stretch: normal; font-weight: bold; line-height: 30px; padding-top: 0px;">
शरीरातील घड्याळ</div>
</td></tr>
<tr><td align="left" valign="top"><div class="NewsDetails" style="font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px;">
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)</div>
</td></tr>
</tbody></table>
</div>
<div>
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160526/images/4755682137086625710/5247138925279810911_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /><span style="color: #cc0000;">आयुर्वेदाने ऋतुचक्र व शरीरातील घड्याळ यांचा संबंध प्राचीन काळीच दाखवून दिला. वात-पित्त-कफ यांचा शरीरातील घड्याळाशी असलेला संबंध आणि दिवस-रात्र-पावसाळा-उन्हाळा यांचा निसर्गचक्राशी असलेला संबंध अभ्यासून कोणत्या वेळी कोणत्या ऋतूत काय करावे, काय खावे याचे मार्गदर्शन केले आहे. आणि त्यातूनच ब्राह्ममुहूर्तावर ध्यान, सूर्योदयापूर्वी शौचविसर्जन, दुपारी पित्ताचा प्रभाव असताना जेवण, सायंकाळचे हलके भोजन आणि रात्रीच्या पित्तप्रकोपाच्या काळात जाग्रण न करता घेतलेली झोप हे आरोग्याचे मार्ग सुचवले आहेत.</span></div>
<div>
<br /></div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">माणसाच्या पायाला आणि त्याच्या मागे अनेक चक्रे लागलेलीच असतात. मनुष्य चक्रम असला, तर त्याला सुदर्शन चक्र दाखवावे लागते आणि बुद्धिमान असला तर त्याला हैराण करणारे चक्रम काही कमी नसतात. विश्वचक्र अविरत चालणारे असून ते आपल्याबरोबर माणसाला आत ओढून ढकलत ढकलत गरागरा फिरावयास लावणारे आहे, हे सर्वपरिचित आहे. एकूण या जगात राहायचे म्हणजे या चक्राबरोबर फिरत राहायचे. पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणाऱ्या यातनांच्या तेचतेचपणाच्या कंटाळवाण्या जन्म-मरण-जन्म या पुनर्जन्माच्या चक्राच्या तडाख्यातून सुटण्यासाठी म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी औदुंबराच्या झाडाच्या भोवती प्रदक्षिणाच घालाव्या लागतात. एकूण काय की गरगर फिरण्याचे निसर्गाचे चक्र हेच सत्य हे समजून घेतल्याशिवाय जीवन सुखी होऊ शकत नाही. भारतीय संस्कृतीने ह्या चक्राला छेद देऊन बाहेर पडण्याचा म्हणजे शक्तीच्या उत्क्रांत क्रियेस "यज्ञ‘ असे नाव दिले. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान म्हणतात - </span><br /><span style="font-family: Mangal, Verdana;">अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ।। </span><div>
<br />यज्ञातून प्रकट झालेली परमात्मशक्ती मनुष्याला कार्यप्रवृत्त करते. त्यातून ऋतुचक्र निर्माण होऊन ऋतुचक्रापासून पर्जन्य आणि पुढे पावसापासून अन्न निर्माण होते. अन्नापासून "शिते तेथे भुते‘ या म्हणीप्रमाणे अन्नामागे धावणारी माणसे! आणि मग पुन्हा उत्क्रांतीसाठी यज्ञ आणि पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा कायम फिरणारे असे हे निसर्गचक्र. </div>
<div>
<br />श्रीमद्भगवद्गीतेतही म्हटलेले आहे की -<br />एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।। </div>
<div>
<br />वरील निसर्गचक्राचे जो प्राणी पालन करत नाही, त्या निसर्गचक्राला अनुसरून वागत नाही आणि जो अहंकार व स्वार्थप्रेरित इंद्रियांच्या (ही इंद्रिये असतात माणसाची पण ती वश असतात बाह्यजगतातील चमक दमक असलेल्या द्रव्याला) स्वाधीन होऊन निसर्गचक्राचे उल्लंघन करतो त्यालाच पापी म्हणतात व त्याचे आयुष्य व्यर्थच जाते. </div>
<div>
<br />जीवनचक्राचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. याच चक्रसंकल्पनेच्या मदतीने माणसाने काळ आणि त्याची मापनपद्धती शोधून काढून घड्याळ बनवले. बरीच माणसे हातावर बांधलेल्या घडाळ्याच्या फारच स्वाधीन राहतात व वेळ पाळणे हेच जणू एक मोठे कार्य आहे याचा गाजावाजा करतात. पण हे लोक शरीरातील घड्याळाची, जे जीवनचक्राशी जोडलेले आहे, काळजी घेत नाहीत. वेळ पाळणे हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच त्यामागची भूमिका, होणारे कार्य आणि अंतिमतः अनुभवता येणारी शांती महत्त्वाची गोष्ट आहे हे कधीही विसरून चालत नाही. आपण जरी शरीराचे घड्याळ विसरायचा प्रयत्न केला, तरी शरीर घड्याळाप्रमाणे चालत राहते. सर्व वनस्पती, जलचर, भूचर, प्राणी, पक्षी निसर्गाच्या चक्राला धरूनच जीवनक्रम जगतात. मनुष्याला मात्र वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर खाणे-पिणे व नैसर्गिक क्रीडा-मैथुन का जमू नये? इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा दिलेली आहे. जो दशरथी हा रथ चालवतो, त्याचा जर इंद्रियांवर ताबा राहिला नाही, तर शरीरातील घडाळ्याचे सेकंद, मिनीट, तास, गजर हे सर्व काटे उलट सुलट फिरू लागतात. वेळी अवेळी गजराच्या घंटा शरीर ऐकवते आणि त्याकडेही लक्ष दिले नाही, तर शेवटी शरीररूपी घड्याळ बंद पडते. </div>
<div>
<br />आपण बाहेर जाणार असलो तर व्हिडिओ रेकॉर्ड प्लेअर वर वेळ प्रोग्रॅम करून ठेवल्यास आपला आवडता कार्यक्रम आपण आपल्या अनुपस्थितीत जसा रेकॉर्ड करू शकतो तसेच मेंदू ठराविक वेळेला शरीरात संदेश पाठवून भूक लागणे, शौच विसर्जन करणे, झोपणे, झोपेतून जागे होणे या क्रिया करवत असतो. मनुष्य ज्या वेळी याच्या विपरीत वागतो तेव्हा तो शरीरव्यवस्थेत संप्रेरकांच्या उत्पादन व कार्यव्यवस्थेत अडथळे आणून आजारपणास आमंत्रण देत असतो.<br />आयुर्वेदाने ऋतुचक्र व शरीरातील घड्याळ यांचा संबंध प्राचीन काळीच दाखवून दिला. वात-पित्त-कफ यांचा शरीरातील घड्याळाशी असलेला संबंध आणि दिवस-रात्र-पावसाळा-उन्हाळा यांचा निसर्गचक्राशी असलेला संबंध अभ्यासून कोणत्या वेळी कोणत्या ऋतूत काय करावे, काय खावे ह्याचे मार्गदर्शन केले आहे. आणि त्यातूनच ब्राह्ममुहूर्तावर ध्यान, सूर्योदयापूर्वी शौचविसर्जन, दुपारी पित्ताचा प्रभाव असताना जेवण, सायंकाळचे हलके भोजन आणि रात्रीच्या पित्तप्रकोपाच्या काळात जाग्रण न करता घेतलेली झोप हे आरोग्याचे मार्ग सुचवले आहेत. वीर्यधातूची शरीरातील प्रभावाची वेळ ओळखून स्त्री-पुरुष संबंधांचे काळवेळ सुचवले. अर्थात अवेळी व चुकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना शक्तिनाशाचा भुर्दंड सोसावा लागतोच. </div>
<div>
<br />एखादा मनुष्य कार्यरत असला किंवा फालतू कामात वेळ घालवत असला, झोपला, उठला, त्याने काहीही केले किंवा तो थांबला तरी बाहेरचा काळ व निसर्गाचे घड्याळ चालूच राहते. प्रत्येक माणसाचे हे कर्तव्यच आहे की, त्याने स्वतःच्या हातावर बांधलेल्या किंवा भिंतीवर टांगलेल्या घडाळ्यावर लक्ष देताना शरीरातून टिकटिक-टिकटिक अशी जाणीव करून देणाऱ्या घडाळ्याकडे पण लक्ष ठेवावे व बाहेरील व आतील संतुलन साधल्याने आरोग्यप्राप्ती, कार्यसिद्धी व सुख मिळवावे.<br /><br />डॉ. श्री बालाजी तांबे<br />आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 </div>
</div>
</div>
</div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-58023849874729233782016-06-13T07:40:00.000+05:302016-06-13T07:44:32.596+05:30आरोग्य ताल<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width: 660px;"><tbody>
<tr><td align="left" colspan="2" valign="top"><div class="NewsHeading" style="font-family: Mangal, Verdana; font-size: 19px; font-stretch: normal; font-weight: bold; line-height: 30px; padding-top: 0px;">
आरोग्य ताल</div>
</td></tr>
<tr><td align="left" valign="top"><div class="NewsDetails" style="font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px;">
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)</div>
<div class="NewsDetails" style="font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px;">
<br /></div>
</td></tr>
</tbody></table>
<div>
<div class="NewsDetails" style="font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px; padding-top: 10px;">
<div id="mvdata">
<div style="background-color: white;">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160526/images/5415482006858383997/4725429350041364542_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /><span style="color: #cc0000;">आपला दिनक्रम या चक्राच्या अनुरूप ठेवला, तर शरीराच्या अनेक क्रिया सुरळीत चालतात. अर्थात, संतुलन कायम राहते. याउलट या चक्राकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत राहिल्यास आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम सहन करावेच लागतात. </span></div>
<div style="background-color: white;">
<br /></div>
<div style="background-color: white;">
वयोऽहोरात्रिभुक्तानां तेऽन्तमध्यादिगाः क्रमात् । </div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">... अष्टांगहृदय सूत्रस्थान</span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">वात- पित्त- कफ हे दोष वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती व मध्यकाळी व प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.</span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>वय </b></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">वयाचे तीन भाग म्हणजे बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनवण्याचे काम हा कफ करत असतो. </span>तारुण्यावस्थेत पित्ताचे आधिक्य असते, त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती मिळून उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. वृद्धावस्थेत वात वाढतो, त्यामुळे शरीराची शक्ती हळूहळू कमी होते, इंद्रियांची ताकद क्षीण होते व शरीराचा नाश होतो.दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचेही प्रत्येकी ३-३ भाग केले असता पहिल्या भागात कफाचे आधिक्य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात- पित्त- कफ यांचे असे ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते.आपला दिनक्रम या चक्राच्या अनुरूप ठेवला, तर शरीराच्या अनेक क्रिया सुरळीत चालतात. अर्थात, संतुलन कायम राहते. याउलट या चक्राकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत राहिल्यास आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम सहन करावेच लागतात. वात शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. झोपेतून उठण्याची क्रिया अर्थातच वाताच्या कार्यक्षेत्रातील आहे. वर पाहिल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर कफाचा काळ सुरू झाला, की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्र विसर्जन सुलभ व योग्य प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे अवघड होते. </div>
<div style="background-color: white;">
<br /></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">आधुनिक विज्ञानामुळे झोपेसाठी, उठण्यासाठी, अन्नग्रहण किंवा शौचविसर्जनासाठी शरीरात काय घडते, कुठली केमिकल्स व हार्मोन्स काम करतात हे दाखवून दिले व शरीरातील घड्याळाचा व जैविक परिक्रमेच्या कल्पनेचा स्वीकार केलेला आहे. पित्त हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे, त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. पित्ताचा काळ असूनही उपाशी राहिल्यास </span>काही काम नसलेले पित्त शरीरात अतिरिक्त उष्णता वाढवते. पित्ताचा काळ उलटून गेल्यानंतर जेवल्यास अन्न पचन करणाऱ्या पित्ताच्या अभावी पचू शकत नाही. म्हणून मध्यानी जेवणेच आरोग्यासाठी हितकर समजले जाते.</div>
<div style="background-color: white;">
<br /></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">झोपण्याच्या बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे. कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असतो. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११ च्या पुढेही जागत राहिले, म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला, की त्याने शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होते; डोळ्यांची, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा हा अनुभव आहे.</span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">बऱ्याच वेळा दवाखान्यात मला काही रुग्ण सांगतात, की सायंकाळी ६-६।। च्या सुमारास पोटात खड्डा पडतो आणि काही खावेसे वाटते. तसेच, काही जण सांगतात की रविवार असल्याने छान उशिरापर्यंत झोपायचे ठरवून आदल्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत टी.व्ही. बघत बसलो, तरी रविवारी सकाळी सहा वाजताच जाग आली. नंतर तासभर अंथरुणात लोळण्याचा प्रयत्न केला तर उठल्यावर अंग दुखू लागल्याने सगळा रविवारचा मूडच गेला. अशा प्रकारे सायंकाळी पित्ताचा काळ संपताना भूक लागल्यास काहीतरी (तळलेले पदार्थ सोडून) अवश्य खावे. जैन धर्माप्रमाणे तर अजूनही सूर्यास्तानंतर काहीही खात नाहीत.</span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अशाच प्रकारे आयुर्वेदाने बाह्य ऋतुचक्राचा व शरीरप्रकृतीच्या घड्याळाचा त्रिदोषांशी संबंध दाखवून दिला. लहान मुले, तरुण किंवा वृद्धांनी सकाळ, दुपार, संध्याकाळी, रात्री; तसेच सहा ऋतूंपैकी कोठल्या ऋतूत काय खावे, काय खाऊ नये, कोठले काम करावे आदी आहार-विहाराचे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. अर्थात, त्याचबरोबर कोठला रोग कोणत्या ऋतूत बळावण्याचा किंवा बरा होण्याची शक्यता असते हे दाखवून दिलेले आहे.</span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अशा प्रकारे मनुष्यमात्र जर या कालचक्रात किंवा घड्याळाला अनुसरून चालेल, म्हणजेच इतरांना दिलेल्या भेटीच्या वेळा सांभाळण्याबरोबरच जर परमेश्वराला म्हणजेच निसर्गाला दिलेली वेळ पाळेल; तर संतुलित, निरोगी व शांत आयुष्याची गुरुकिल्ली देव आपल्या हाती देईल.</span></div>
<div>
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
</div>
</div>
</div>
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-77817176906156381482016-05-24T07:38:00.002+05:302019-05-10T07:08:09.735+05:30<div id="stcpDiv" style="left: -1988px; position: absolute; top: -1999px;">
<div class="storytop">
<h2 class="synopsis" itemprop="description">
मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या काही विशिष्ट कल्पना, ठोकताळे, भ्रम आणि भावना आहेत.</h2>
</div>
<article class="dateholder">
<div class="date">
केतकी गद्रे | <span content="2016-04-23T10:10:30+00:00" itemprop="dateModified">
April 24, 2016 1:01 AM </span>
<br />
</div>
<div class="sharethisbx">
<div class="addthis">
<div class="icon-social">
<span class="st_fblike_hcount"><span style="color: black; cursor: pointer; display: inline-block; font-size: 11px; line-height: 0px; margin: 3px 3px 0; overflow: visible; padding: 0px; position: relative; text-decoration: none; vertical-align: bottom;"><div class="fb-like fb_iframe_widget" data-action="" data-href="http://www.loksatta.com/manoviskaar-news/psychological-counseling-1230726/" data-layout="button_count" data-send="false" data-show-faces="false">
<span style="height: 20px; vertical-align: bottom; width: 80px;"></span></div>
</span></span>
<span class="st_facebook_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-facebook-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/facebook_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">3</span></span></span></span></span></span>
<span class="st_twitter_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-twitter-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/twitter_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">0</span></span></span></span></span></span>
<span class="st_googleplus_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stButton_gradient"><span class="chicklets googleplus">Google +</span></span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">1</span></span></span></span></span></span>
<span class="st_whatsapp_hcount"></span>
<span class="st_sharethis_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-sharethis-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/sharethis_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">6</span></span></span></span></span></span>
</div>
</div>
<div class="pm-icon">
<span class="print"></span>
</div>
</div>
</article>
<section class="imgsection MT30">
<div class="imgholder" id="imgholder">
<img src="http://images.loksatta.com/2016/04/lr09-3.jpg?w=830" title="मानसशास्त्रीय समुपदेशन" /> </div>
</section>
<article class="txtsection">
<div class="rightsec" id="rightsec" itemprop="articleBody" style="float: none; width: auto;">
<div id="div-gpt-ad-1442403637733-0">
</div>
मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या काही विशिष्ट
कल्पना, ठोकताळे, भ्रम आणि भावना आहेत. या एकंदर प्रक्रियेबद्दल असणारी
त्यांची मते साधारणत: ऐकीव माहिती वा स्वानुभवावर आधारित असतात.
मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला, हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेत
येतो. खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज
भासतेच. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी- जो भावनिक व शारीरिक समस्यांना
सामोरा जात आहे, ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि
ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे. समुपदेशन
त्या प्रत्येकासाठी- ज्याला मानसिक आरोग्याच्या संपन्नतेची गरज भासते,
व्यक्तिमत्त्व विकासाची इच्छा असते व जो कौटुंबिक, सामाजिक घटकांच्या
सौख्याची आकांक्षा बाळगतो.<br />
असे असूनही बऱ्याचजणांच्या मनात मानसशास्त्र व मानसशास्त्रीय
समुपदेशनाविषयी संदेह असलेला आढळतो. या संदेहाची कारणे म्हणजे या
प्रक्रियेबद्दलचे काही ठाम विचार व मते. यामुळे समुपदेशन अवलंबिण्यावर
होणारा विपरीत परिणाम अधिक तीव्र होताना दिसतो.<br />
बरेच लोक समुपदेशन टाळतात. तेही या ठाम धारणेवर- की त्यांना त्यांच्या
मानसिकतेची पूर्ण जाणीव आहे व नक्की काय करायचे आहे याची पुरेपूर माहिती
त्यांना आहे. फक्त पाऊल तेवढं उचलण्याची खोटी! त्यांच्या मते, ज्या व्यक्ती
मनाने कमकुवत असतात, ज्यांना सतत कोणत्यातरी आधाराची, टेकूची गरज असते,
अशांनाच समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे समुपदेशन अवलंबिणाऱ्या व्यक्तींकडे
तुच्छतेने पाहायला, त्यांना हिणवायला ते कमी करत नाहीत. आपल्या मानसिक
स्थितीबद्दल अथवा समस्यांबद्दल कुटुंबातील वा आप्तेष्टांच्या
वर्तुळाबाहेरील एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगणे, हे ते कमीपणाचे लक्षण
मानतात. आपले आयुष्य व त्यांतील घटना याद्वारे चव्हाटय़ावर येतात असे मानून
ते समुपदेशन टाळतात. ‘समुपदेशनामध्ये फारसे तथ्य नाही. तो वेळेचा अपव्यय
आहे. नुसते बोलून प्रश्न सुटत नसतात’ हा विचार मनी बाळगून ते
समुपदेशनाबद्दल अपप्रचार करतात. समुपदेशन अवलंबणे म्हणजे आपण मानसिक रुग्ण
आहोत व मानसिक रुग्ण असणे ही एक सामाजिक दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे,
असे काहीसे समीकरण ते मांडताना दिसतात. केवळ दैवी शक्तीमुळेच आयुष्य सरत
असते, घटना घडत असतात व फक्त धार्मिकतेच्या आधारे (प्रार्थना, ध्यानधारणा,
इ.) कोणत्याही नकारात्मक प्रसंगावर मात करणे सहजशक्य आहे यावर त्यांचा
विश्वास असतो. आयुष्यातील समस्यांना त्यांची तीव्रता न जोखता गौण
मानण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे ‘काळ सरला की
सगळे आपोआप ठीक होईल’ हे नेहमीचे बोल. समुपदेशकांकडून सल्ले घेण्यापेक्षा-
तेही पैसे मोजून- मी माझ्या मित्रांकडून, स्नेह्य़ांकडून मोफत मार्गदर्शन
घेऊ शकतो, या विचारातूनही समुपदेशन टाळले जाते. समुपदेशनाचा अवलंब करायला
लागणे म्हणजे स्वत:च्या बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची, ‘स्व’त्वाची,
कौटुंबिक एकजुटीची हार आहे असेही बऱ्याच लोकांचे मानणे आहे. या मानण्यामुळे
समुपदेशन टाळले जाते. बऱ्याचदा समुपदेशन प्रक्रियेबद्दल फारशी माहिती
नसल्यामुळे ती करून घेण्यापेक्षा ती प्रक्रियाच टाळणे त्यांना सोयीचे
वाटते. आणि ही प्रक्रिया अवलंबण्यापेक्षा अज्ञानातून जन्मलेली तात्पुरती
सोय ते बघतात. शरीरावर खरचटले तर जखम तीव्र होऊ नये म्हणून ते त्वरित
मलमपट्टी करतात; पण भावनिक दुखापत झाल्यास भावनिक प्रथमोपचार आणि वैचारिक
मलमपट्टी करणे मात्र ते गरजेचे मानत नाहीत.<br />
समुपदेशनाप्रतिच्या आपल्या मतांवर आपल्या संगोपनाचा, जडणघडणीचा, सांस्कृतिक
स्वरूपाचा, सामाजिक दृष्टिकोनाचा, व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होत असतो. आपले
कुटुंबीय व स्नेह्य़ांची समुपदेशनाबद्दलची काय भूमिका आहे, याचाही प्रभाव
त्यात दिसून येतो.<br />
गोपनीयता (शोषण प्रसंगांव्यतिरिक्त) राखणाऱ्या व शास्त्रीय स्वरूप असणाऱ्या
समुपदेशन प्रक्रियेबद्दल नेमकी माहिती व त्यातील सूक्ष्म व स्थूल बाबींचे
ज्ञान याबद्दल विस्तृत चर्चा म्हणूनच गरजेची आहे.<br />
समुपदेशन ही प्रक्रिया शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित आहे. कालबद्ध आणि
ध्येयनिष्ठ. विविध स्वरूपांच्या आणि तीव्रतेच्या समस्यांवरच नव्हे, तर
व्यक्तिमत्त्व विकासासाठीही समुपदेशन उपयुक्त तोडगा ठरू शकतो. समुपदेशनाचा
अचूक अवलंब केल्यास एखादी समस्या तीव्र होण्यापासून वाचते. आपल्या
अडचणीच्या काळात आप्तेष्टांचा आधार आपल्याला महत्त्वाचा असतो यात शंका
नाही. परंतु काही वेळा एखादी अडचण दूर करण्यासाठी तटस्थ भूमिका घेऊन त्या
समस्येकडे पाहणे, तिचे पैलू अभ्यासणे, जीवनघटकांवर होणाऱ्या परिणामांचा
विचार करणे व सर्वागीण निर्णय घेणे गरजेचे असते. त्यावेळी कधी कधी
आप्तेष्टांची आपल्याबाबत असलेली मते व पूर्वग्रह सकारात्मक/
नकारात्मकदृष्टय़ा या निर्णयाच्या आड येऊ शकतात. अशावेळी शास्त्रीय
प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक ही भूमिका योग्य तऱ्हेने बजावून,
आत्मीयतापूर्वक सुयोग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरक व पोषक वातावरण निर्माण
करू शकतात. सक्रिय साथीदाराच्या रूपात आपल्या अडचणींकडे पाहण्याचा व त्यावर
कल्पक कार्यपद्धतींचा उपयोग करून मात करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला
योग्य ते व योग्य वेळी प्रश्न विचारून संयमाने आपले म्हणणे, वागणे ऐकून,
पाहून, त्यांतील पोषक व प्रतिकूल विचार, भावना, कृतीचा व या त्रिसूत्रीतील
सुसूत्रता व विसंगतीचा अभ्यास करून समुपदेशक समुपदेशनाची प्रक्रिया
जबाबदारीने पार पाडत असतात. प्रशिक्षित समुपदेशक आपली खासगी मते, भूमिका
आपल्यावर लादणे टाळतात व आपल्याला व्यक्ती म्हणून उपजत प्रवृत्तींसकट
स्वीकारतात. समुपदेशकांचा विश्वासपूर्ण नाते जोडण्यावर भर असतो. आपल्या
बोलण्याने, आवाजाची पट्टी व देहबोली यांतून ते आपल्याप्रति आदर व आपुलकी
दर्शवतात. इतरांना साधारणत: विक्षिप्त व नकारात्मक वाटणाऱ्या
आपल्याबाबतच्या भूमिका ते न नाकारता स्वीकारतात व गरजेचे बदल सुचवून,
समंजसपणे विवेकी विचार-आचार करण्यास प्रेरित करतात. परिस्थितीचे योग्य
अवलोकन करून व आपल्याला स्वीकार करण्यास मदत करून परिस्थितीजन्य निर्णय
घेण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समुपदेशक या सर्व प्रक्रियेची कल्पक
बांधणी करतात. मात्र, परस्पर-सल्ला देणे व आपल्या वतीने परस्पर-निर्णय घेऊन
कार्यपद्धती अवलंबणे कटाक्षाने टाळतात. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
आपल्याला सशक्त करणे- या स्वरूपाचे त्यांचे ध्येय असते.<br />
समुपदेशनाच्या प्रक्रियेचा आपल्याला किती उपयोग झाला, लाभ झाला, याचे
ठोकताळे बांधणे शक्य आहे. जसजशी समुपदेशन प्रक्रिया पुढे सरकते व अखेर
संपते तेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळाकडे, ‘स्व’त्वाकडे, सद्य:परिस्थितीकडे
नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, ती पूर्णपणे स्वीकारण्याचा आत्मविश्वास
निर्माण होतो. व्यक्ती म्हणून वृद्धिंगतेची भावना प्रस्थापित होते. आपण
आपल्या व्यक्तित्वाकडे नव्याने पाहतो. समुपदेशनात बऱ्याचदा आपल्या
कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या समावेशामुळे ही प्रक्रिया सकारात्मक ठरते व
त्याची व्याप्ती मोठी ठरते. समुपदेशनामध्ये आकलन झालेल्या कार्यपद्धतींचा
इतर वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चित उपयोग होतो. जखमा
हळुवार भरून निघण्यास मदत होते. ताण कमी होऊन शारीरिक स्वास्थ्यावरही
त्याचा पोषक प्रभाव पडतो. आपले विचार, भावना व कृतीचक्र कसे आहे व ते चालते
याची नव्याने ओळख होते. आपले गुण-अवगुण, क्षमता, त्रुटी याबाबत नवे
दृष्टिकोन प्रस्थापित होतात. नातेसंबंध दृढ होऊन आपल्याला शांत व सुरक्षित
वाटते. आपल्या आत्मविश्वासावर व निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून
येतो. समस्या निवारणक्षमता वाढते व तणावमुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध होतो.
संवादपद्धती अधिक जाणीवपूर्वक सहज व जबाबदार बनते. हे बदल तात्पुरते नसून
दीर्घकाळ आपली छाप पाडतात. यातच समुपदेशन प्रक्रियेचा विजय आहे. समुपदेशन
प्रक्रियेचे हे लाभ अनुभवण्यासाठी प्रशिक्षित, मानसशास्त्रीय सिद्धांतांवर
आधारित प्रक्रिया राबवणाऱ्या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते.
प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणाऱ्या
समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही.
याच्या जोडीने आपलेही प्रामाणिक, सहकार्याचे प्रयत्न या प्रक्रियेला
लाभदायक ठरतात.<br />
<strong>केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com</strong><br />
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)</div>
</article> - See more at: http://www.loksatta.com/manoviskaar-news/psychological-counseling-1230726/#sthash.aoT26kUW.dpuf</div>
<br />
<div id="stcpDiv" style="left: -1988px; position: absolute; top: -1999px;">
<article class="dateholder"><div class="sharethisbx">
<div class="addthis">
<div class="icon-social">
<span class="st_fblike_hcount"><span style="color: black; cursor: pointer; display: inline-block; font-size: 11px; line-height: 0px; margin: 3px 3px 0; overflow: visible; padding: 0px; position: relative; text-decoration: none; vertical-align: bottom;"></span></span>
<span class="st_facebook_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-facebook-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/facebook_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">3</span></span></span></span></span></span>
<span class="st_twitter_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-twitter-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/twitter_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">0</span></span></span></span></span></span>
<span class="st_googleplus_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stButton_gradient"><span class="chicklets googleplus">Google +</span></span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">1</span></span></span></span></span></span>
<span class="st_whatsapp_hcount"></span>
<span class="st_sharethis_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-sharethis-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/sharethis_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">6</span></span></span></span></span></span>
</div>
</div>
<div class="pm-icon">
<span class="print"></span>
</div>
</div>
</article>
<section class="imgsection MT30">
<div class="imgholder" id="imgholder">
<img src="http://images.loksatta.com/2016/04/lr09-3.jpg?w=830" title="मानसशास्त्रीय समुपदेशन" /> </div>
</section>
<article class="txtsection">
<div class="rightsec" id="rightsec" itemprop="articleBody" style="float: none; width: auto;">
<div id="div-gpt-ad-1442403637733-0">
</div>
मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या काही विशिष्ट
कल्पना, ठोकताळे, भ्रम आणि भावना आहेत. या एकंदर प्रक्रियेबद्दल असणारी
त्यांची मते साधारणत: ऐकीव माहिती वा स्वानुभवावर आधारित असतात.
मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला, हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेत
येतो. खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज
भासतेच. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी- जो भावनिक व शारीरिक समस्यांना
सामोरा जात आहे, ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि
ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे. समुपदेशन
त्या प्रत्येकासाठी- ज्याला मानसिक आरोग्याच्या संपन्नतेची गरज भासते,
व्यक्तिमत्त्व विकासाची इच्छा असते व जो कौटुंबिक, सामाजिक घटकांच्या
सौख्याची आकांक्षा बाळगतो.<br />
असे असूनही बऱ्याचजणांच्या मनात मानसशास्त्र व मानसशास्त्रीय
समुपदेशनाविषयी संदेह असलेला आढळतो. या संदेहाची कारणे म्हणजे या
प्रक्रियेबद्दलचे काही ठाम विचार व मते. यामुळे समुपदेशन अवलंबिण्यावर
होणारा विपरीत परिणाम अधिक तीव्र होताना दिसतो.<br />
बरेच लोक समुपदेशन टाळतात. तेही या ठाम धारणेवर- की त्यांना त्यांच्या
मानसिकतेची पूर्ण जाणीव आहे व नक्की काय करायचे आहे याची पुरेपूर माहिती
त्यांना आहे. फक्त पाऊल तेवढं उचलण्याची खोटी! त्यांच्या मते, ज्या व्यक्ती
मनाने कमकुवत असतात, ज्यांना सतत कोणत्यातरी आधाराची, टेकूची गरज असते,
अशांनाच समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे समुपदेशन अवलंबिणाऱ्या व्यक्तींकडे
तुच्छतेने पाहायला, त्यांना हिणवायला ते कमी करत नाहीत. आपल्या मानसिक
स्थितीबद्दल अथवा समस्यांबद्दल कुटुंबातील वा आप्तेष्टांच्या
वर्तुळाबाहेरील एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगणे, हे ते कमीपणाचे लक्षण
मानतात. आपले आयुष्य व त्यांतील घटना याद्वारे चव्हाटय़ावर येतात असे मानून
ते समुपदेशन टाळतात. ‘समुपदेशनामध्ये फारसे तथ्य नाही. तो वेळेचा अपव्यय
आहे. नुसते बोलून प्रश्न सुटत नसतात’ हा विचार मनी बाळगून ते
समुपदेशनाबद्दल अपप्रचार करतात. समुपदेशन अवलंबणे म्हणजे आपण मानसिक रुग्ण
आहोत व मानसिक रुग्ण असणे ही एक सामाजिक दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे,
असे काहीसे समीकरण ते मांडताना दिसतात. केवळ दैवी शक्तीमुळेच आयुष्य सरत
असते, घटना घडत असतात व फक्त धार्मिकतेच्या आधारे (प्रार्थना, ध्यानधारणा,
इ.) कोणत्याही नकारात्मक प्रसंगावर मात करणे सहजशक्य आहे यावर त्यांचा
विश्वास असतो. आयुष्यातील समस्यांना त्यांची तीव्रता न जोखता गौण
मानण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे ‘काळ सरला की
सगळे आपोआप ठीक होईल’ हे नेहमीचे बोल. समुपदेशकांकडून सल्ले घेण्यापेक्षा-
तेही पैसे मोजून- मी माझ्या मित्रांकडून, स्नेह्य़ांकडून मोफत मार्गदर्शन
घेऊ शकतो, या विचारातूनही समुपदेशन टाळले जाते. समुपदेशनाचा अवलंब करायला
लागणे म्हणजे स्वत:च्या बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची, ‘स्व’त्वाची,
कौटुंबिक एकजुटीची हार आहे असेही बऱ्याच लोकांचे मानणे आहे. या मानण्यामुळे
समुपदेशन टाळले जाते. बऱ्याचदा समुपदेशन प्रक्रियेबद्दल फारशी माहिती
नसल्यामुळे ती करून घेण्यापेक्षा ती प्रक्रियाच टाळणे त्यांना सोयीचे
वाटते. आणि ही प्रक्रिया अवलंबण्यापेक्षा अज्ञानातून जन्मलेली तात्पुरती
सोय ते बघतात. शरीरावर खरचटले तर जखम तीव्र होऊ नये म्हणून ते त्वरित
मलमपट्टी करतात; पण भावनिक दुखापत झाल्यास भावनिक प्रथमोपचार आणि वैचारिक
मलमपट्टी करणे मात्र ते गरजेचे मानत नाहीत.<br />
समुपदेशनाप्रतिच्या आपल्या मतांवर आपल्या संगोपनाचा, जडणघडणीचा, सांस्कृतिक
स्वरूपाचा, सामाजिक दृष्टिकोनाचा, व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होत असतो. आपले
कुटुंबीय व स्नेह्य़ांची समुपदेशनाबद्दलची काय भूमिका आहे, याचाही प्रभाव
त्यात दिसून येतो.<br />
गोपनीयता (शोषण प्रसंगांव्यतिरिक्त) राखणाऱ्या व शास्त्रीय स्वरूप असणाऱ्या
समुपदेशन प्रक्रियेबद्दल नेमकी माहिती व त्यातील सूक्ष्म व स्थूल बाबींचे
ज्ञान याबद्दल विस्तृत चर्चा म्हणूनच गरजेची आहे.<br />
समुपदेशन ही प्रक्रिया शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित आहे. कालबद्ध आणि
ध्येयनिष्ठ. विविध स्वरूपांच्या आणि तीव्रतेच्या समस्यांवरच नव्हे, तर
व्यक्तिमत्त्व विकासासाठीही समुपदेशन उपयुक्त तोडगा ठरू शकतो. समुपदेशनाचा
अचूक अवलंब केल्यास एखादी समस्या तीव्र होण्यापासून वाचते. आपल्या
अडचणीच्या काळात आप्तेष्टांचा आधार आपल्याला महत्त्वाचा असतो यात शंका
नाही. परंतु काही वेळा एखादी अडचण दूर करण्यासाठी तटस्थ भूमिका घेऊन त्या
समस्येकडे पाहणे, तिचे पैलू अभ्यासणे, जीवनघटकांवर होणाऱ्या परिणामांचा
विचार करणे व सर्वागीण निर्णय घेणे गरजेचे असते. त्यावेळी कधी कधी
आप्तेष्टांची आपल्याबाबत असलेली मते व पूर्वग्रह सकारात्मक/
नकारात्मकदृष्टय़ा या निर्णयाच्या आड येऊ शकतात. अशावेळी शास्त्रीय
प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक ही भूमिका योग्य तऱ्हेने बजावून,
आत्मीयतापूर्वक सुयोग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरक व पोषक वातावरण निर्माण
करू शकतात. सक्रिय साथीदाराच्या रूपात आपल्या अडचणींकडे पाहण्याचा व त्यावर
कल्पक कार्यपद्धतींचा उपयोग करून मात करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला
योग्य ते व योग्य वेळी प्रश्न विचारून संयमाने आपले म्हणणे, वागणे ऐकून,
पाहून, त्यांतील पोषक व प्रतिकूल विचार, भावना, कृतीचा व या त्रिसूत्रीतील
सुसूत्रता व विसंगतीचा अभ्यास करून समुपदेशक समुपदेशनाची प्रक्रिया
जबाबदारीने पार पाडत असतात. प्रशिक्षित समुपदेशक आपली खासगी मते, भूमिका
आपल्यावर लादणे टाळतात व आपल्याला व्यक्ती म्हणून उपजत प्रवृत्तींसकट
स्वीकारतात. समुपदेशकांचा विश्वासपूर्ण नाते जोडण्यावर भर असतो. आपल्या
बोलण्याने, आवाजाची पट्टी व देहबोली यांतून ते आपल्याप्रति आदर व आपुलकी
दर्शवतात. इतरांना साधारणत: विक्षिप्त व नकारात्मक वाटणाऱ्या
आपल्याबाबतच्या भूमिका ते न नाकारता स्वीकारतात व गरजेचे बदल सुचवून,
समंजसपणे विवेकी विचार-आचार करण्यास प्रेरित करतात. परिस्थितीचे योग्य
अवलोकन करून व आपल्याला स्वीकार करण्यास मदत करून परिस्थितीजन्य निर्णय
घेण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समुपदेशक या सर्व प्रक्रियेची कल्पक
बांधणी करतात. मात्र, परस्पर-सल्ला देणे व आपल्या वतीने परस्पर-निर्णय घेऊन
कार्यपद्धती अवलंबणे कटाक्षाने टाळतात. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
आपल्याला सशक्त करणे- या स्वरूपाचे त्यांचे ध्येय असते.<br />
समुपदेशनाच्या प्रक्रियेचा आपल्याला किती उपयोग झाला, लाभ झाला, याचे
ठोकताळे बांधणे शक्य आहे. जसजशी समुपदेशन प्रक्रिया पुढे सरकते व अखेर
संपते तेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळाकडे, ‘स्व’त्वाकडे, सद्य:परिस्थितीकडे
नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, ती पूर्णपणे स्वीकारण्याचा आत्मविश्वास
निर्माण होतो. व्यक्ती म्हणून वृद्धिंगतेची भावना प्रस्थापित होते. आपण
आपल्या व्यक्तित्वाकडे नव्याने पाहतो. समुपदेशनात बऱ्याचदा आपल्या
कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या समावेशामुळे ही प्रक्रिया सकारात्मक ठरते व
त्याची व्याप्ती मोठी ठरते. समुपदेशनामध्ये आकलन झालेल्या कार्यपद्धतींचा
इतर वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चित उपयोग होतो. जखमा
हळुवार भरून निघण्यास मदत होते. ताण कमी होऊन शारीरिक स्वास्थ्यावरही
त्याचा पोषक प्रभाव पडतो. आपले विचार, भावना व कृतीचक्र कसे आहे व ते चालते
याची नव्याने ओळख होते. आपले गुण-अवगुण, क्षमता, त्रुटी याबाबत नवे
दृष्टिकोन प्रस्थापित होतात. नातेसंबंध दृढ होऊन आपल्याला शांत व सुरक्षित
वाटते. आपल्या आत्मविश्वासावर व निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून
येतो. समस्या निवारणक्षमता वाढते व तणावमुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध होतो.
संवादपद्धती अधिक जाणीवपूर्वक सहज व जबाबदार बनते. हे बदल तात्पुरते नसून
दीर्घकाळ आपली छाप पाडतात. यातच समुपदेशन प्रक्रियेचा विजय आहे. समुपदेशन
प्रक्रियेचे हे लाभ अनुभवण्यासाठी प्रशिक्षित, मानसशास्त्रीय सिद्धांतांवर
आधारित प्रक्रिया राबवणाऱ्या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते.
प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणाऱ्या
समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही.
याच्या जोडीने आपलेही प्रामाणिक, सहकार्याचे प्रयत्न या प्रक्रियेला
लाभदायक ठरतात.<br />
<strong>केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com</strong><br />
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)</div>
</article> - See more at: http://www.loksatta.com/manoviskaar-news/psychological-counseling-1230726/#sthash.GEeJva08.dpuf<div id="stcpDiv" style="left: -1988px; position: absolute; top: -1999px;">
<article class="dateholder"><div class="sharethisbx">
<div class="addthis">
<div class="icon-social">
<span class="st_fblike_hcount"><span style="color: black; cursor: pointer; display: inline-block; font-size: 11px; line-height: 0px; margin: 3px 3px 0; overflow: visible; padding: 0px; position: relative; text-decoration: none; vertical-align: bottom;"></span></span>
<span class="st_facebook_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-facebook-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/facebook_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">3</span></span></span></span></span></span>
<span class="st_twitter_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-twitter-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/twitter_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">0</span></span></span></span></span></span>
<span class="st_googleplus_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stButton_gradient"><span class="chicklets googleplus">Google +</span></span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">1</span></span></span></span></span></span>
<span class="st_whatsapp_hcount"></span>
<span class="st_sharethis_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-sharethis-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/sharethis_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">6</span></span></span></span></span></span>
</div>
</div>
<div class="pm-icon">
<span class="print"></span>
</div>
</div>
</article>
<section class="imgsection MT30">
<div class="imgholder" id="imgholder">
<img src="http://images.loksatta.com/2016/04/lr09-3.jpg?w=830" title="मानसशास्त्रीय समुपदेशन" /> </div>
</section>
<article class="txtsection">
<div class="rightsec" id="rightsec" itemprop="articleBody" style="float: none; width: auto;">
<div id="div-gpt-ad-1442403637733-0">
</div>
मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या काही विशिष्ट
कल्पना, ठोकताळे, भ्रम आणि भावना आहेत. या एकंदर प्रक्रियेबद्दल असणारी
त्यांची मते साधारणत: ऐकीव माहिती वा स्वानुभवावर आधारित असतात.
मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला, हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेत
येतो. खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज
भासतेच. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी- जो भावनिक व शारीरिक समस्यांना
सामोरा जात आहे, ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि
ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे. समुपदेशन
त्या प्रत्येकासाठी- ज्याला मानसिक आरोग्याच्या संपन्नतेची गरज भासते,
व्यक्तिमत्त्व विकासाची इच्छा असते व जो कौटुंबिक, सामाजिक घटकांच्या
सौख्याची आकांक्षा बाळगतो.<br />
असे असूनही बऱ्याचजणांच्या मनात मानसशास्त्र व मानसशास्त्रीय
समुपदेशनाविषयी संदेह असलेला आढळतो. या संदेहाची कारणे म्हणजे या
प्रक्रियेबद्दलचे काही ठाम विचार व मते. यामुळे समुपदेशन अवलंबिण्यावर
होणारा विपरीत परिणाम अधिक तीव्र होताना दिसतो.<br />
बरेच लोक समुपदेशन टाळतात. तेही या ठाम धारणेवर- की त्यांना त्यांच्या
मानसिकतेची पूर्ण जाणीव आहे व नक्की काय करायचे आहे याची पुरेपूर माहिती
त्यांना आहे. फक्त पाऊल तेवढं उचलण्याची खोटी! त्यांच्या मते, ज्या व्यक्ती
मनाने कमकुवत असतात, ज्यांना सतत कोणत्यातरी आधाराची, टेकूची गरज असते,
अशांनाच समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे समुपदेशन अवलंबिणाऱ्या व्यक्तींकडे
तुच्छतेने पाहायला, त्यांना हिणवायला ते कमी करत नाहीत. आपल्या मानसिक
स्थितीबद्दल अथवा समस्यांबद्दल कुटुंबातील वा आप्तेष्टांच्या
वर्तुळाबाहेरील एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगणे, हे ते कमीपणाचे लक्षण
मानतात. आपले आयुष्य व त्यांतील घटना याद्वारे चव्हाटय़ावर येतात असे मानून
ते समुपदेशन टाळतात. ‘समुपदेशनामध्ये फारसे तथ्य नाही. तो वेळेचा अपव्यय
आहे. नुसते बोलून प्रश्न सुटत नसतात’ हा विचार मनी बाळगून ते
समुपदेशनाबद्दल अपप्रचार करतात. समुपदेशन अवलंबणे म्हणजे आपण मानसिक रुग्ण
आहोत व मानसिक रुग्ण असणे ही एक सामाजिक दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे,
असे काहीसे समीकरण ते मांडताना दिसतात. केवळ दैवी शक्तीमुळेच आयुष्य सरत
असते, घटना घडत असतात व फक्त धार्मिकतेच्या आधारे (प्रार्थना, ध्यानधारणा,
इ.) कोणत्याही नकारात्मक प्रसंगावर मात करणे सहजशक्य आहे यावर त्यांचा
विश्वास असतो. आयुष्यातील समस्यांना त्यांची तीव्रता न जोखता गौण
मानण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे ‘काळ सरला की
सगळे आपोआप ठीक होईल’ हे नेहमीचे बोल. समुपदेशकांकडून सल्ले घेण्यापेक्षा-
तेही पैसे मोजून- मी माझ्या मित्रांकडून, स्नेह्य़ांकडून मोफत मार्गदर्शन
घेऊ शकतो, या विचारातूनही समुपदेशन टाळले जाते. समुपदेशनाचा अवलंब करायला
लागणे म्हणजे स्वत:च्या बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची, ‘स्व’त्वाची,
कौटुंबिक एकजुटीची हार आहे असेही बऱ्याच लोकांचे मानणे आहे. या मानण्यामुळे
समुपदेशन टाळले जाते. बऱ्याचदा समुपदेशन प्रक्रियेबद्दल फारशी माहिती
नसल्यामुळे ती करून घेण्यापेक्षा ती प्रक्रियाच टाळणे त्यांना सोयीचे
वाटते. आणि ही प्रक्रिया अवलंबण्यापेक्षा अज्ञानातून जन्मलेली तात्पुरती
सोय ते बघतात. शरीरावर खरचटले तर जखम तीव्र होऊ नये म्हणून ते त्वरित
मलमपट्टी करतात; पण भावनिक दुखापत झाल्यास भावनिक प्रथमोपचार आणि वैचारिक
मलमपट्टी करणे मात्र ते गरजेचे मानत नाहीत.<br />
समुपदेशनाप्रतिच्या आपल्या मतांवर आपल्या संगोपनाचा, जडणघडणीचा, सांस्कृतिक
स्वरूपाचा, सामाजिक दृष्टिकोनाचा, व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होत असतो. आपले
कुटुंबीय व स्नेह्य़ांची समुपदेशनाबद्दलची काय भूमिका आहे, याचाही प्रभाव
त्यात दिसून येतो.<br />
गोपनीयता (शोषण प्रसंगांव्यतिरिक्त) राखणाऱ्या व शास्त्रीय स्वरूप असणाऱ्या
समुपदेशन प्रक्रियेबद्दल नेमकी माहिती व त्यातील सूक्ष्म व स्थूल बाबींचे
ज्ञान याबद्दल विस्तृत चर्चा म्हणूनच गरजेची आहे.<br />
समुपदेशन ही प्रक्रिया शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित आहे. कालबद्ध आणि
ध्येयनिष्ठ. विविध स्वरूपांच्या आणि तीव्रतेच्या समस्यांवरच नव्हे, तर
व्यक्तिमत्त्व विकासासाठीही समुपदेशन उपयुक्त तोडगा ठरू शकतो. समुपदेशनाचा
अचूक अवलंब केल्यास एखादी समस्या तीव्र होण्यापासून वाचते. आपल्या
अडचणीच्या काळात आप्तेष्टांचा आधार आपल्याला महत्त्वाचा असतो यात शंका
नाही. परंतु काही वेळा एखादी अडचण दूर करण्यासाठी तटस्थ भूमिका घेऊन त्या
समस्येकडे पाहणे, तिचे पैलू अभ्यासणे, जीवनघटकांवर होणाऱ्या परिणामांचा
विचार करणे व सर्वागीण निर्णय घेणे गरजेचे असते. त्यावेळी कधी कधी
आप्तेष्टांची आपल्याबाबत असलेली मते व पूर्वग्रह सकारात्मक/
नकारात्मकदृष्टय़ा या निर्णयाच्या आड येऊ शकतात. अशावेळी शास्त्रीय
प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक ही भूमिका योग्य तऱ्हेने बजावून,
आत्मीयतापूर्वक सुयोग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरक व पोषक वातावरण निर्माण
करू शकतात. सक्रिय साथीदाराच्या रूपात आपल्या अडचणींकडे पाहण्याचा व त्यावर
कल्पक कार्यपद्धतींचा उपयोग करून मात करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला
योग्य ते व योग्य वेळी प्रश्न विचारून संयमाने आपले म्हणणे, वागणे ऐकून,
पाहून, त्यांतील पोषक व प्रतिकूल विचार, भावना, कृतीचा व या त्रिसूत्रीतील
सुसूत्रता व विसंगतीचा अभ्यास करून समुपदेशक समुपदेशनाची प्रक्रिया
जबाबदारीने पार पाडत असतात. प्रशिक्षित समुपदेशक आपली खासगी मते, भूमिका
आपल्यावर लादणे टाळतात व आपल्याला व्यक्ती म्हणून उपजत प्रवृत्तींसकट
स्वीकारतात. समुपदेशकांचा विश्वासपूर्ण नाते जोडण्यावर भर असतो. आपल्या
बोलण्याने, आवाजाची पट्टी व देहबोली यांतून ते आपल्याप्रति आदर व आपुलकी
दर्शवतात. इतरांना साधारणत: विक्षिप्त व नकारात्मक वाटणाऱ्या
आपल्याबाबतच्या भूमिका ते न नाकारता स्वीकारतात व गरजेचे बदल सुचवून,
समंजसपणे विवेकी विचार-आचार करण्यास प्रेरित करतात. परिस्थितीचे योग्य
अवलोकन करून व आपल्याला स्वीकार करण्यास मदत करून परिस्थितीजन्य निर्णय
घेण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समुपदेशक या सर्व प्रक्रियेची कल्पक
बांधणी करतात. मात्र, परस्पर-सल्ला देणे व आपल्या वतीने परस्पर-निर्णय घेऊन
कार्यपद्धती अवलंबणे कटाक्षाने टाळतात. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
आपल्याला सशक्त करणे- या स्वरूपाचे त्यांचे ध्येय असते.<br />
समुपदेशनाच्या प्रक्रियेचा आपल्याला किती उपयोग झाला, लाभ झाला, याचे
ठोकताळे बांधणे शक्य आहे. जसजशी समुपदेशन प्रक्रिया पुढे सरकते व अखेर
संपते तेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळाकडे, ‘स्व’त्वाकडे, सद्य:परिस्थितीकडे
नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, ती पूर्णपणे स्वीकारण्याचा आत्मविश्वास
निर्माण होतो. व्यक्ती म्हणून वृद्धिंगतेची भावना प्रस्थापित होते. आपण
आपल्या व्यक्तित्वाकडे नव्याने पाहतो. समुपदेशनात बऱ्याचदा आपल्या
कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या समावेशामुळे ही प्रक्रिया सकारात्मक ठरते व
त्याची व्याप्ती मोठी ठरते. समुपदेशनामध्ये आकलन झालेल्या कार्यपद्धतींचा
इतर वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चित उपयोग होतो. जखमा
हळुवार भरून निघण्यास मदत होते. ताण कमी होऊन शारीरिक स्वास्थ्यावरही
त्याचा पोषक प्रभाव पडतो. आपले विचार, भावना व कृतीचक्र कसे आहे व ते चालते
याची नव्याने ओळख होते. आपले गुण-अवगुण, क्षमता, त्रुटी याबाबत नवे
दृष्टिकोन प्रस्थापित होतात. नातेसंबंध दृढ होऊन आपल्याला शांत व सुरक्षित
वाटते. आपल्या आत्मविश्वासावर व निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून
येतो. समस्या निवारणक्षमता वाढते व तणावमुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध होतो.
संवादपद्धती अधिक जाणीवपूर्वक सहज व जबाबदार बनते. हे बदल तात्पुरते नसून
दीर्घकाळ आपली छाप पाडतात. यातच समुपदेशन प्रक्रियेचा विजय आहे. समुपदेशन
प्रक्रियेचे हे लाभ अनुभवण्यासाठी प्रशिक्षित, मानसशास्त्रीय सिद्धांतांवर
आधारित प्रक्रिया राबवणाऱ्या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते.
प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणाऱ्या
समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही.
याच्या जोडीने आपलेही प्रामाणिक, सहकार्याचे प्रयत्न या प्रक्रियेला
लाभदायक ठरतात.<br />
<strong>केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com</strong><br />
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)</div>
</article> - See more at: http://www.loksatta.com/manoviskaar-news/psychological-counseling-1230726/#sthash.GEeJva08.dpuf</div>
</div>
<div id="stcpDiv" style="left: -1988px; position: absolute; top: -1999px;">
<article class="dateholder"><div class="sharethisbx">
<div class="addthis">
<div class="icon-social">
<span class="st_fblike_hcount"><span style="color: black; cursor: pointer; display: inline-block; font-size: 11px; line-height: 0px; margin: 3px 3px 0; overflow: visible; padding: 0px; position: relative; text-decoration: none; vertical-align: bottom;"></span></span>
<span class="st_facebook_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-facebook-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/facebook_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">3</span></span></span></span></span></span>
<span class="st_twitter_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-twitter-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/twitter_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">0</span></span></span></span></span></span>
<span class="st_googleplus_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stButton_gradient"><span class="chicklets googleplus">Google +</span></span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">1</span></span></span></span></span></span>
<span class="st_whatsapp_hcount"></span>
<span class="st_sharethis_hcount"><span class="stButton" style="color: black; cursor: pointer; display: inline-block; text-decoration: none;"><span><span class="stMainServices st-sharethis-counter" style="background-image: url("http://w.sharethis.com/images/sharethis_counter.png");"> </span><span class="stArrow"><span class="stButton_gradient stHBubble" style="display: inline-block;"><span class="stBubble_hcount">6</span></span></span></span></span></span>
</div>
</div>
<div class="pm-icon">
<span class="print"></span>
</div>
</div>
</article>
<section class="imgsection MT30">
<div class="imgholder" id="imgholder">
<img src="http://images.loksatta.com/2016/04/lr09-3.jpg?w=830" title="मानसशास्त्रीय समुपदेशन" /> </div>
</section>
<article class="txtsection">
<div class="rightsec" id="rightsec" itemprop="articleBody" style="float: none; width: auto;">
<div id="div-gpt-ad-1442403637733-0">
</div>
मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या काही विशिष्ट
कल्पना, ठोकताळे, भ्रम आणि भावना आहेत. या एकंदर प्रक्रियेबद्दल असणारी
त्यांची मते साधारणत: ऐकीव माहिती वा स्वानुभवावर आधारित असतात.
मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला, हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेत
येतो. खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज
भासतेच. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी- जो भावनिक व शारीरिक समस्यांना
सामोरा जात आहे, ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि
ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे. समुपदेशन
त्या प्रत्येकासाठी- ज्याला मानसिक आरोग्याच्या संपन्नतेची गरज भासते,
व्यक्तिमत्त्व विकासाची इच्छा असते व जो कौटुंबिक, सामाजिक घटकांच्या
सौख्याची आकांक्षा बाळगतो.<br />
असे असूनही बऱ्याचजणांच्या मनात मानसशास्त्र व मानसशास्त्रीय
समुपदेशनाविषयी संदेह असलेला आढळतो. या संदेहाची कारणे म्हणजे या
प्रक्रियेबद्दलचे काही ठाम विचार व मते. यामुळे समुपदेशन अवलंबिण्यावर
होणारा विपरीत परिणाम अधिक तीव्र होताना दिसतो.<br />
बरेच लोक समुपदेशन टाळतात. तेही या ठाम धारणेवर- की त्यांना त्यांच्या
मानसिकतेची पूर्ण जाणीव आहे व नक्की काय करायचे आहे याची पुरेपूर माहिती
त्यांना आहे. फक्त पाऊल तेवढं उचलण्याची खोटी! त्यांच्या मते, ज्या व्यक्ती
मनाने कमकुवत असतात, ज्यांना सतत कोणत्यातरी आधाराची, टेकूची गरज असते,
अशांनाच समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे समुपदेशन अवलंबिणाऱ्या व्यक्तींकडे
तुच्छतेने पाहायला, त्यांना हिणवायला ते कमी करत नाहीत. आपल्या मानसिक
स्थितीबद्दल अथवा समस्यांबद्दल कुटुंबातील वा आप्तेष्टांच्या
वर्तुळाबाहेरील एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगणे, हे ते कमीपणाचे लक्षण
मानतात. आपले आयुष्य व त्यांतील घटना याद्वारे चव्हाटय़ावर येतात असे मानून
ते समुपदेशन टाळतात. ‘समुपदेशनामध्ये फारसे तथ्य नाही. तो वेळेचा अपव्यय
आहे. नुसते बोलून प्रश्न सुटत नसतात’ हा विचार मनी बाळगून ते
समुपदेशनाबद्दल अपप्रचार करतात. समुपदेशन अवलंबणे म्हणजे आपण मानसिक रुग्ण
आहोत व मानसिक रुग्ण असणे ही एक सामाजिक दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे,
असे काहीसे समीकरण ते मांडताना दिसतात. केवळ दैवी शक्तीमुळेच आयुष्य सरत
असते, घटना घडत असतात व फक्त धार्मिकतेच्या आधारे (प्रार्थना, ध्यानधारणा,
इ.) कोणत्याही नकारात्मक प्रसंगावर मात करणे सहजशक्य आहे यावर त्यांचा
विश्वास असतो. आयुष्यातील समस्यांना त्यांची तीव्रता न जोखता गौण
मानण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे ‘काळ सरला की
सगळे आपोआप ठीक होईल’ हे नेहमीचे बोल. समुपदेशकांकडून सल्ले घेण्यापेक्षा-
तेही पैसे मोजून- मी माझ्या मित्रांकडून, स्नेह्य़ांकडून मोफत मार्गदर्शन
घेऊ शकतो, या विचारातूनही समुपदेशन टाळले जाते. समुपदेशनाचा अवलंब करायला
लागणे म्हणजे स्वत:च्या बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची, ‘स्व’त्वाची,
कौटुंबिक एकजुटीची हार आहे असेही बऱ्याच लोकांचे मानणे आहे. या मानण्यामुळे
समुपदेशन टाळले जाते. बऱ्याचदा समुपदेशन प्रक्रियेबद्दल फारशी माहिती
नसल्यामुळे ती करून घेण्यापेक्षा ती प्रक्रियाच टाळणे त्यांना सोयीचे
वाटते. आणि ही प्रक्रिया अवलंबण्यापेक्षा अज्ञानातून जन्मलेली तात्पुरती
सोय ते बघतात. शरीरावर खरचटले तर जखम तीव्र होऊ नये म्हणून ते त्वरित
मलमपट्टी करतात; पण भावनिक दुखापत झाल्यास भावनिक प्रथमोपचार आणि वैचारिक
मलमपट्टी करणे मात्र ते गरजेचे मानत नाहीत.<br />
समुपदेशनाप्रतिच्या आपल्या मतांवर आपल्या संगोपनाचा, जडणघडणीचा, सांस्कृतिक
स्वरूपाचा, सामाजिक दृष्टिकोनाचा, व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होत असतो. आपले
कुटुंबीय व स्नेह्य़ांची समुपदेशनाबद्दलची काय भूमिका आहे, याचाही प्रभाव
त्यात दिसून येतो.<br />
गोपनीयता (शोषण प्रसंगांव्यतिरिक्त) राखणाऱ्या व शास्त्रीय स्वरूप असणाऱ्या
समुपदेशन प्रक्रियेबद्दल नेमकी माहिती व त्यातील सूक्ष्म व स्थूल बाबींचे
ज्ञान याबद्दल विस्तृत चर्चा म्हणूनच गरजेची आहे.<br />
समुपदेशन ही प्रक्रिया शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित आहे. कालबद्ध आणि
ध्येयनिष्ठ. विविध स्वरूपांच्या आणि तीव्रतेच्या समस्यांवरच नव्हे, तर
व्यक्तिमत्त्व विकासासाठीही समुपदेशन उपयुक्त तोडगा ठरू शकतो. समुपदेशनाचा
अचूक अवलंब केल्यास एखादी समस्या तीव्र होण्यापासून वाचते. आपल्या
अडचणीच्या काळात आप्तेष्टांचा आधार आपल्याला महत्त्वाचा असतो यात शंका
नाही. परंतु काही वेळा एखादी अडचण दूर करण्यासाठी तटस्थ भूमिका घेऊन त्या
समस्येकडे पाहणे, तिचे पैलू अभ्यासणे, जीवनघटकांवर होणाऱ्या परिणामांचा
विचार करणे व सर्वागीण निर्णय घेणे गरजेचे असते. त्यावेळी कधी कधी
आप्तेष्टांची आपल्याबाबत असलेली मते व पूर्वग्रह सकारात्मक/
नकारात्मकदृष्टय़ा या निर्णयाच्या आड येऊ शकतात. अशावेळी शास्त्रीय
प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक ही भूमिका योग्य तऱ्हेने बजावून,
आत्मीयतापूर्वक सुयोग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरक व पोषक वातावरण निर्माण
करू शकतात. सक्रिय साथीदाराच्या रूपात आपल्या अडचणींकडे पाहण्याचा व त्यावर
कल्पक कार्यपद्धतींचा उपयोग करून मात करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला
योग्य ते व योग्य वेळी प्रश्न विचारून संयमाने आपले म्हणणे, वागणे ऐकून,
पाहून, त्यांतील पोषक व प्रतिकूल विचार, भावना, कृतीचा व या त्रिसूत्रीतील
सुसूत्रता व विसंगतीचा अभ्यास करून समुपदेशक समुपदेशनाची प्रक्रिया
जबाबदारीने पार पाडत असतात. प्रशिक्षित समुपदेशक आपली खासगी मते, भूमिका
आपल्यावर लादणे टाळतात व आपल्याला व्यक्ती म्हणून उपजत प्रवृत्तींसकट
स्वीकारतात. समुपदेशकांचा विश्वासपूर्ण नाते जोडण्यावर भर असतो. आपल्या
बोलण्याने, आवाजाची पट्टी व देहबोली यांतून ते आपल्याप्रति आदर व आपुलकी
दर्शवतात. इतरांना साधारणत: विक्षिप्त व नकारात्मक वाटणाऱ्या
आपल्याबाबतच्या भूमिका ते न नाकारता स्वीकारतात व गरजेचे बदल सुचवून,
समंजसपणे विवेकी विचार-आचार करण्यास प्रेरित करतात. परिस्थितीचे योग्य
अवलोकन करून व आपल्याला स्वीकार करण्यास मदत करून परिस्थितीजन्य निर्णय
घेण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समुपदेशक या सर्व प्रक्रियेची कल्पक
बांधणी करतात. मात्र, परस्पर-सल्ला देणे व आपल्या वतीने परस्पर-निर्णय घेऊन
कार्यपद्धती अवलंबणे कटाक्षाने टाळतात. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
आपल्याला सशक्त करणे- या स्वरूपाचे त्यांचे ध्येय असते.<br />
समुपदेशनाच्या प्रक्रियेचा आपल्याला किती उपयोग झाला, लाभ झाला, याचे
ठोकताळे बांधणे शक्य आहे. जसजशी समुपदेशन प्रक्रिया पुढे सरकते व अखेर
संपते तेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळाकडे, ‘स्व’त्वाकडे, सद्य:परिस्थितीकडे
नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, ती पूर्णपणे स्वीकारण्याचा आत्मविश्वास
निर्माण होतो. व्यक्ती म्हणून वृद्धिंगतेची भावना प्रस्थापित होते. आपण
आपल्या व्यक्तित्वाकडे नव्याने पाहतो. समुपदेशनात बऱ्याचदा आपल्या
कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या समावेशामुळे ही प्रक्रिया सकारात्मक ठरते व
त्याची व्याप्ती मोठी ठरते. समुपदेशनामध्ये आकलन झालेल्या कार्यपद्धतींचा
इतर वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चित उपयोग होतो. जखमा
हळुवार भरून निघण्यास मदत होते. ताण कमी होऊन शारीरिक स्वास्थ्यावरही
त्याचा पोषक प्रभाव पडतो. आपले विचार, भावना व कृतीचक्र कसे आहे व ते चालते
याची नव्याने ओळख होते. आपले गुण-अवगुण, क्षमता, त्रुटी याबाबत नवे
दृष्टिकोन प्रस्थापित होतात. नातेसंबंध दृढ होऊन आपल्याला शांत व सुरक्षित
वाटते. आपल्या आत्मविश्वासावर व निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून
येतो. समस्या निवारणक्षमता वाढते व तणावमुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध होतो.
संवादपद्धती अधिक जाणीवपूर्वक सहज व जबाबदार बनते. हे बदल तात्पुरते नसून
दीर्घकाळ आपली छाप पाडतात. यातच समुपदेशन प्रक्रियेचा विजय आहे. समुपदेशन
प्रक्रियेचे हे लाभ अनुभवण्यासाठी प्रशिक्षित, मानसशास्त्रीय सिद्धांतांवर
आधारित प्रक्रिया राबवणाऱ्या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते.
प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणाऱ्या
समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही.
याच्या जोडीने आपलेही प्रामाणिक, सहकार्याचे प्रयत्न या प्रक्रियेला
लाभदायक ठरतात.<br />
<strong>केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com</strong><br />
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)</div>
</article> - See more at: http://www.loksatta.com/manoviskaar-news/psychological-counseling-1230726/#sthash.GEeJva08.dpuf</div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-90326314543066397692016-03-03T08:21:00.000+05:302016-05-17T10:33:51.575+05:30नातं हृदयाशी – अति रक्तदाब : कारणे, लक्षणे व उपचाररक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे.<br /><br />दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे अति रक्तदाब (Hypertension). दिवसेंदिवस अति रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा वाढते आहे. तो फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये रुजली आहेत.<br /><br />आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.<br /><br />विविध देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून येते की एकंदर लोकसंख्येच्या १० ते २५ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण आढळते. त्यामुळे या रोगाबद्दल माहिती करून घेणे, तो न व्हावा, किंवा झाल्यास आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे ठरते.<br /><br />रक्तदाब म्हणजे काय?<br /><br />हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.<br /><br />सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.<br /><br />दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.<br /><br />एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.<br /><br />रक्तदाबाचे प्रकार<br /><br />अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.<br /><br />१. साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. जवळजवळ ९०-९५ टक्के लोकांमध्ये साधा अति रक्तदाब असतो.<br /><br />२. अनुषंगिक अति रक्तदाब : (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.<br /><br />अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)<br /><br />ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :<br /><br />कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.<br /><br />क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.<br /><br />ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.<br /><br />ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.<br /><br />इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.<br /><br />रक्तदाबाची कारणे :<br /><br />१. आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते.<br /><br />२. स्वभाव व मानसिकता : कित्येक लोकांचा स्वभाव मुळात असमाधानी व अति महत्त्वाकांक्षी असतो. ते थोडय़ा वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात व वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अॅड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.<br /><br />मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अॅड्रिनालीन व नॉरेअॅड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.<br /><br />‘अ’ व्यक्तिमत्त्व (Type A-Personality) असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.<br /><br />३. धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत ‘निकोटिन’ व ‘कार्बन मोनोक्साइड’ ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे नॉरेअॅड्रिनालीन या स्स्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.<br /><br />४. मद्यपान : मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते.<br /><br />५. मिठाचा अतिरेक : जे लोक मिठाचा अल्प प्रमाणात उपयोग करतात त्याचा रक्तदाब हा कमी किंवा नॉर्मल असतो. त्याच्याविरुद्ध ज्या व्यक्ती मिठाचा अतिरेक करतात, त्यांना अति रक्तदाब असण्याचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनक्षील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने जर आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर अशा रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल होऊ शकतो, किंवा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.<br /><br />६) रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (ATHEROSCLEROSIS)<br /><br />जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांच्या आंतरस्तरावरील दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात आनुवंशिकता, वाढणारे वय, रक्तातील चरबीचे अतिप्रमाण, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा व बैठे जीवन आणि ताण-तणावाचे जीवन या गोष्टींचा समावेश होतो.<br /><br />७) लठ्ठपणा, अतिरक्त वजन :<br /><br />स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा लहान वयातच सुरू होऊ शकतो. तसेच जर अशा लोकांनी वजन कमी केल्यास त्यांचा अति रक्तदाब थोडय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.<br /><br />अति रक्तदाबाची लक्षणे :<br /><br />अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ (Silent Killer) आहे, असे म्हटले जाते. कारण बऱ्याचदा मनुष्याला अति रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. बऱ्याच वेळा इतर काही आजारांसाठी मनुष्य डॉक्टरकडे जातो आणि तपासणीचा एक भाग म्हणून डॉक्टर रक्तदाब तपासतात, तेव्हा तो वाढलेला आढळतो, अशा वेळी अति रक्तदाबाचे निदान होते.<br /><br />अति रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.<br /><br />* सतत डोके दुखणे, जड वाटणे.<br /><br />* चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.<br /><br />* छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.<br /><br />* लैंगिक सामथ्र्य कमी होणे.<br /><br />रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.<br /><br />* दृष्टिदोष, कमी दिसणे, अंधूक दिसणे<br /><br />* नाकातून रक्तस्राव होणे.<br /><br />* हातापायावर सूज येणे.<br /><br />* किंवा कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी त्रास होऊ शकतो.<br /><br />उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम<br /><br />१) हृदयाची अकार्यक्षमता :<br /><br />उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.<br /><br />उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.<br /><br />२) मूत्रपिंडावर परिणाम :<br /><br />उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.<br /><br />३) इतर दुष्परिणाम :<br /><br />अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.<br /><br />उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.<br /><br />अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)<br /><br />अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.<br /><br />रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.<br /><br />* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.<br /><br />* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.<br /><br />* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY असे म्हणतात.<br /><br />* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अॅवोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.<br /><br />अति रक्तदाबाचे उपचार<br /><br />अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.<br /><br />वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.<br /><br />रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.<br /><br />१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.<br /><br />२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.<br /><br />३) वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते. चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.<br /><br />स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.<br /><br />* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.<br /><br />* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.<br /><br />* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.<br /><br />* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.<br /><br />* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.<br /><br />४) व्यायाम आणि योगासने :<br /><br />* वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.<br /><br />* भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.<br /><br />* अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.<br /><br />* योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.<br /><br />‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.<br /><br />ताण-तणाव कमी करणे<br /><br />उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.<br /><br />नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.<br /><br />क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.<br /><br />मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.<br /><br />दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी.<br /><br />‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे. ‘HURRY, WORRY, CURRYX’ या गोष्टी आजाराला निमंत्रण देतात. या टाळण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण सर्व दीर्घायुषी व्हाल यात शंकाच नाही. डॉ. गजानन रत्नपारखी Suhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-78614947700889117532016-03-03T08:18:00.000+05:302016-05-17T10:21:06.243+05:30रक्तदाब<table align="left" border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="background-color: white; color: black; font-family: Mangal, Verdana; width: 980px;"><tbody>
<tr><td align="left" valign="top" width="680"><div style="padding-right: 20px;">
<div>
<br /></div>
<div id="NewsContainer">
<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width: 660px;"><tbody>
<tr><td align="left" valign="top"><div class="NewsDetails" style="font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px;">
डॉ. श्री बालाजी तांबे</div>
<div class="DateTimeClass" style="color: #999999; font-family: Verdana; font-size: 13px; font-stretch: normal; line-height: 18px;">
<br /></div>
</td><td align="right" style="padding-top: 3px;" valign="top"><br /></td></tr>
</tbody></table>
<div>
<div class="NewsDetails" style="font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px; padding-top: 10px;">
<div id="mvdata">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/eSakal/20130904/images/5637866998681067628/5003609555643515299_Org.jpg" height="200" style="float: left; padding: 5px;" title="" width="196" /><span style="color: #0033cc;">वाढलेला रक्तदाब गोळ्या घेऊन कमी केला म्हणजे झाले, </span><br />
<span style="color: #0033cc;">असा हिशेब मांडणे एखादे गणित सोडवावे इतके सोपे नाही. </span><br />
<span style="color: #0033cc;">रक्तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. </span><br />
<span style="color: #0033cc;">पण तरीही रक्तदाब झालाच तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून </span><br />
<span style="color: #0033cc;">बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. योग्य उपचारांना संतुलित आहार, </span><br />
<span style="color: #0033cc;">निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड द्यावी. </span><br />
<br />
काही वर्षांपूर्वी रक्तदाब म्हणजे चाळिशीनंतर होणारा आजार, अशी सर्वसामान्य धारणा होती.<br />
सध्या मात्र तिशीच्या आसपासही अनेकदा रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसते.<br />
सरासरीपेक्षा (80-120) वाढलेला किंवा कमी झालेला रक्तदाब हा "रक्तदाब विकार‘ म्हणून ओळखला जातो. वाढलेला रक्तदाब<br />
गोळ्यांच्या साह्याने कमी केला म्हणजे झाले, इतका साधा हिशेब अनेकांच्या मनात असतो; पण एखादे गणित सोडवावे तसा हा<br />
हिशेब सुटत नाही.<br />
<b><br />रक्तदाब म्हणजे काय? </b><br />
सर्वप्रथम रक्तदाब म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ.<br />
रक्त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले, तरी ते रक्तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते.<br />
मेंदू, हृदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्तवाहिन्यांमधून रक्त<br />
फिरत असते. यालाच "रक्ताभिसरण क्रिया‘ म्हणतात व त्यातूनच रक्तदाब तयार होत असतो. अर्थातच<br />
रक्तावर सरासरी दाब प्रत्येक व्यक्तीला असतोच, कारण त्याखेरीज रक्ताभिसरण होऊच शकणार नाही.<br />
<br />
निरोगी अवस्थेतही रक्तदाब प्रसंगानुरूप थोडा फार कमी जास्ती होत असतो. भरभर चालण्याने, पळण्याने,<br />
जशी श्वासाची गती वाढते, तसेच श्रम झाल्यास रक्तदाब थोडा वाढतो. पण विश्रांती घेतल्यावर आपला<br />
आपण प्राकृतावस्थेत येतो.<br />
<br />
आयुर्वेदात "रक्तदाब‘ या नावाने वेगळा असा व्याधी सांगितलेला आढळत नाही. मात्र शरीरातील रस, रक्त<br />
धातूंच्या गतीतील विकृतीमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विकारांपैकी हा एक विकार होय. ही गती विकृती<br />
रक्ताभिसरणास कारणीभूत असणाऱ्या हृदय किंवा रक्तवाहिन्यातील बिघाडामुळे होऊ शकते, शरीरातील<br />
अतिरिक्त क्लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणाऱ्या किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उद्भवू शकते किंवा<br />
"चिन्त्यानां चाति चिन्तनात्‘ न्यायानुसार अति मानसिक ताणामुळे, अति विचार करण्यामुळे अर्थातच<br />
मेंदूच्या अति श्रमानेही होऊ शकते.<br />
<br />
तसेच रक्तदाब वाढला असता किंवा कमी झाला असताही शरीर, मनावर दिसणारी लक्षणे वात, पित्त दोष<br />
वाढल्याची असतात. म्हणून आयुर्वेदानुसार रक्तदाबावर उपचार करताना त्रिदोष संतुलनाबरोबरच, रक्तदाबाचा<br />
त्रास होण्याचे मूळ कारण काय आहे याचा विचार केला जातो व त्यानुसार केलेल्या उपचारांनी रक्तदाबावर<br />
यशस्वी चिकित्सा करता येऊ शकते.<br />
<br />
<b>रक्तदाबाची कारणे </b><br />
रक्तदाबाची सामान्य कारणे अशी सांगता येतील -<a href="https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhElBuy8PIZIMJdO8zLRiqlvO__-khizlF0rlwASFGED-Iw6M32QSoGJ6LoXAz7EJm1OyCsjmpTEUIff8P_hdhc9fnW8n16K0c2C9JTf_6khZ6t34EJlNSewUKF-8zeEstG47KqUhBk8icinZpY3pQNfoo346daaeqC0Nk78r3CtrzBEsLSuiAftjWjcLiUCtp_afxURFNAMdXy9sM=" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"></a><br />
<ul>
<li>पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अतिसेवन उदा. तेल, चीज, मांसाहार</li>
<li>खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा</li>
<li>व्यायामाचा अभाव</li>
<li>अतिस्थूलता</li>
<li>अतिरिक्त धूम्रपान व मद्यपान</li>
<li>अतिचिंता तसेच कामामध्ये अतिव्यस्तता</li>
</ul>
याखेरीज किडनीचे कार्य नीट न होणे, अनेक वर्षांचा मधुमेह, रक्तवाहिन्या कठीण व जाड होणे, स्त्रियांच्या<br />
बाबतीत गर्भारपणात रक्तदाब वाढल्याचा इतिहास असणे, तसेच गर्भाशय काढून टाकणे इत्यादींमुळे रक्तदाब<br />
वाढू शकतो.<br />
<br />
मुळात रक्तदाबाचा विकार मागे लागूच नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. हा विकार ओळखणे खरे पाहता<br />
अतिशय सोपे आहे. रक्तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरीसुद्धा<br />
साध्या यंत्राच्या साह्याने रक्तदाब मोजता येणे शक्य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे<br />
दिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने<br />
वयाच्या पस्तिशीनंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्तदाब मोजून घ्यावा. घरी रक्तदाबाची किंवा<br />
हृद्ररोगाची आनुवंशिकता असणाऱ्यांनी तर अधिकच दक्ष राहावे. वर सांगितलेली कारणे लागू होत<br />
असणाऱ्यांनीही अधिक काळजी घ्यावी.<br />
<br />
<b>रक्तदाब वाढण्याची लक्षणे </b><br />
<ul>
<li>रक्तदाब वाढण्याची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.</li>
<li>डोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड वाटणे.</li>
<li>अशक्तपणा वाटणे, गळून गेल्यासारखे वाटणे.</li>
<li>अवेळी डोळ्यांवर झापड येणे पण योग्य वेळी झोप न येणे.</li>
<li>छातीत धडधडणे.</li>
<li>भरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे.</li>
<li>छातीत दुखणे.</li>
<li>अकारण चिडचिड होणे.</li>
</ul>
सुरवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत, काही वेळाने आपोआप नाहीशी होतात. अशा वेळेला लक्षणे दिसत<br />
असताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्तदाबाचे निदान होऊ शकते.<br />
<br />
कैक वेळेला रक्तदाब वाढला तरी व्यक्तीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत<br />
नाही म्हणून तपासणी केली जात नाही किंवा औषधांची नियमितता राखली जात नाही.<br />
या दोन्ही गोष्टी आरोग्यास घातक होत.<br />
<br />
रक्तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवटपर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार हे मात्र<br />
प्रत्येक केस मध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे<br />
व रस-रक्ताच्या गती-विकृतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्तदाब बराही होऊ शकतो. अर्थातच<br />
जितक्या लवकर, नियमित व योग्य उपचार केले जातील तितका लवकर व चांगला उपयोग होताना दिसतो.<br />
<br />
<b>रक्तदाब असेल तर... </b><br />
<ul>
<li>रक्तदाब असणाऱ्यांनी पुढील गोष्टींवर लक्ष ठेवावे.</li>
<li>तळलेले, तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत.</li>
<li>चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरभरा वगैरे पचायला जड असणाऱ्या व </li>
<li>वातवर्धक गोष्टी टाळाव्यात.</li>
<li>कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडावी.</li>
<li>वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले असल्यास योग्य उपायांनी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.</li>
<li>रात्री उशिरा जेवण्याची सवय मोडावी.</li>
<li>रोज 30-35 मिनिटे चालायला जावे, योगासने करावीत. मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळावेत.</li>
<li>रात्री लवकर झोपावे व प्रकृतिनुरूप किमान सहा ते सात तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवावे.</li>
</ul>
दिवसभराच्या कामाचा ताण किंवा नातेसंबंधातील तणावाचा स्वतःवर कमीत कमी परिणाम होईल यासाठी<br />
प्रयत्नरत राहावे, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे, आपल्या आवडत्या छंदात मन गुंतवणे,<br />
मनःशांती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे अशा सारखा जमेल तो उपाय करावा.<br />
काम करताना थकवा जाणवावयास सुरवात झाल्यास वेळीच विश्रांती घ्यावी. शरीर व मन दोहोंवर जबरदस्ती<br />
करू नये.<br />
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhL6xpLiMhoWb6vAq_jmTzV9gB2a93gu0_vjpfVoG67r-3lk_mVNggdf-ds0uiKcoixXeP4L9lbuvRH4hfCNOLTrGXE1elNLvkB4XtEoUKqaoJW7JdmfMRyWOkQJ2rlz1IthxNmtOvzA80EoiiFlXSjf1x8qWjmGHvdtTULFcukOqY8WUfN434qvScXyF4xuOALTTXZbmeReGD33K0=" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"></a>रक्तदाब वात-पित्त असंतुलनातून तयार होत असल्याने दूध, घरी बनवलेले साजूक तूप, साधा, सात्त्विक<br />
पण चौरस आहार ठेवावा. वजन वा कोलेस्टेरॉल वाढण्याच्या भीतीने हृदय, मेंदूला पोषक व वात-पित्तशामक<br />
आहार पदार्थ अकारण बंद करू नयेत. मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेले तूप, बाजारातील लोणी वगैरे गोष्टी<br />
निश्चितच टाळाव्यात.<br />
<br />
रक्ताभिसरण वाढवण्यासाठी, रसरक्तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शरीरातील रक्तवाहिन्यांतील<br />
काठिण्य नष्ट होण्यासाठी "अभ्यंग‘ करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय आहे.<br />
अभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची<br />
विशेषता अशी की याने कमी झालेला रक्तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्तदाब कमी होऊ<br />
शकतो.<br />
<br />
आयुर्वेदशास्त्राने सांगितलेले त्रिदोष संतुलन करणारे स्नेहन स्वेदनपूर्वक पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावे. विशेषतः विरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्तदाबात उत्कृष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण,<br />
पिंडस्वेदन वगैरे उपचार उत्तम फायदा करणारे आहेत.<br />
<br />
शवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो.<br />
आत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून योगनिद्रा<br />
संगीताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्तदाब नियंत्रणासाठी उपयोग<br />
करता येईल.<br />
<br />
रक्तदाब कमी करणाऱ्या इतर औषधांच्या बरोबरीने मुळापासूनच रक्तदाब बरा करू शकणारी आयुर्वेदिक<br />
औषधेही सुरू करावीत म्हणजे हळूहळू त्रिदोषसंतुलन प्रस्थापित झाले, रस-रक्तधातूतील गती विकृती<br />
नाहीशी झाली व बरोबरीने आहार-विहारातील अनुशासन कायम ठेवले की रक्तदाबापासून मुक्ती मिळू शकते.<br />
<br />
<b>योग्य औषधाची निवड </b><br />
रक्तदाबाचे एक विशिष्ट असे औषध नसते, तर प्रकृती, वय, रक्तदाबाचा त्रास होण्याचे कारण वगैरे गोष्टींचा<br />
विचार करून योग्य औषध निवडावे लागते.किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्र, पुनर्नवासव,<br />
गोक्षुरादि चूर्ण, चंद्रप्रभा वगैरे औषधांचा वापर करावा लागतो. हृदयामुळे, रक्तवाहिन्यांमधील काठिण्यामुळे<br />
रक्तदाबाचा त्रास होत असल्यास बृहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, अर्जुनारिष्ट, सुवर्णसूतशेखर,<br />
वगैरे औषधे प्रकृतीनुरूप योजावी लागतात. तर रक्तदाबाचे मूळ कारण मेंदूशी संबंधित असल्यास जटामांसी,<br />
ब्राह्मी, ब्राह्मीघृत, वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.<br />
<br />
थोडक्यात सांगायचे झाले तर, रक्तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. पण<br />
तरीही रक्तदाब झालाच तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत.<br />
योग्य उपचारांना संतुलित आहार, निर्व्यसनी जीवन पद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक<br />
स्वास्थ्य यांची जोड द्यावी. </div>
</div>
</div>
</div>
</div>
</td></tr>
</tbody></table>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, <br />
<a name='more'></a>Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
<!-- Blogger automated replacement: "https://images-blogger-opensocial.googleusercontent.com/gadgets/proxy?url=http%3A%2F%2Fwww.esakal.com%2FeSakal%2F20130904%2Fimages%2F5637866998681067628%2F5278576865521348207_Org.jpg&container=blogger&gadget=a&rewriteMime=image%2F*" with "https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhL6xpLiMhoWb6vAq_jmTzV9gB2a93gu0_vjpfVoG67r-3lk_mVNggdf-ds0uiKcoixXeP4L9lbuvRH4hfCNOLTrGXE1elNLvkB4XtEoUKqaoJW7JdmfMRyWOkQJ2rlz1IthxNmtOvzA80EoiiFlXSjf1x8qWjmGHvdtTULFcukOqY8WUfN434qvScXyF4xuOALTTXZbmeReGD33K0=" --><!-- Blogger automated replacement: "https://images-blogger-opensocial.googleusercontent.com/gadgets/proxy?url=http%3A%2F%2Fwww.esakal.com%2FeSakal%2F20130904%2Fimages%2F5637866998681067628%2F5374348927861614206_Org.jpg&container=blogger&gadget=a&rewriteMime=image%2F*" with "https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhElBuy8PIZIMJdO8zLRiqlvO__-khizlF0rlwASFGED-Iw6M32QSoGJ6LoXAz7EJm1OyCsjmpTEUIff8P_hdhc9fnW8n16K0c2C9JTf_6khZ6t34EJlNSewUKF-8zeEstG47KqUhBk8icinZpY3pQNfoo346daaeqC0Nk78r3CtrzBEsLSuiAftjWjcLiUCtp_afxURFNAMdXy9sM=" -->Suhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-29703169161820845472016-03-03T07:21:00.000+05:302016-03-03T07:21:56.690+05:30तरुणांमधील उच्च रक्तदाब<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="background-color: white; color: black; font-family: Mangal, Verdana; width: 660px;"><tbody>
<tr><td align="left" valign="top"><div class="NewsDetails" style="font-size: 15px; font-stretch: normal; line-height: 25px;">
- डॉ. श्रीपाद खेडेकर</div>
</td></tr>
</tbody></table>
<div closure_uid_e2ogug="53" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000;">आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात तरुणांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. उच्च रक्तदाब हा त्यातूनच उद्भवतो. नंतर हा आजार धोकादायक बनतो. अकाली वृद्धत्वाकडे झुकणे, तसेच हृदयविकाराच्या समस्या निर्माण होणे, हे प्रकार सुरू होतात. वयस्कर व्यक्तींना हृदयविकाराच्या समस्या जाणवतात, हे आपण जाणतोच. पण आता तरुणांमध्येही या समस्या सर्रासपणे दिसून येऊ लागल्या आहेत. </span><strong></strong></div>
<div closure_uid_e2ogug="57" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
त रुणांमधील उच्च रक्तदाबाची काही प्रकरणं अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले आहे की, हा आजार त्यांना नंतर हृदयविकाराकडे नेतो. प्रसंगी हृदयविकाराचा तीव्र झटकादेखील येतो. उच्च रक्तदाब ही समस्या अगदी १८ वर्षांच्या मुलांमध्येदेखील दिसून आली आहे. २० वर्षांच्या मुलांमध्ये असे आजार आढळल्यानंतर त्याचे परावर्तन हे नंतर हृदयविकाराच्या गंभीर समस्येमध्ये झाल्याचेही दिसून आले आहे. ही मुलं जेव्हा ३५ ते ५० वयोगटात जातात, तेव्हा हृदयविकाराची समस्या त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. रक्तदाब सामान्य असला तरी त्यांना ही समस्या भेडसावते.<br />तरुणांमध्ये उच्च रक्तदाब आढळण्याची काही ठराविक कारणे आहेत. ती अशी - </div>
<div closure_uid_e2ogug="57" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br />- वेगाने बदलणारी जीवनशैली, गतिमान व तणावग्रस्त आयुष्य.<br />- व्यायामाचा अभाव, अतिव्यग्र जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ नसल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते.<br />- आनुवंशिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. कुटुंबातील कुणा व्यक्तीला अशी समस्या असल्यास ती पुढच्या पिढीत दिसून येते.<br />- चुकीचा आणि अपायकारक आहार. मेदयुक्त व अतिक्षार असलेल्या पदार्थांचे सेवन करणे हे वाढत आहे.<br />- पुरेशी झोप नसणे, हा या तरुण पिढीला शाप म्हणता येईल. प्रत्येक रात्री किमान सहा तास झोप आवश्यक असून, ती नसेल तर ही समस्या अधिकांश प्रमाणात जाणवते.<br />- मद्यपान हे उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरणारे महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.<br /> धूम्रपान.<br />- लठ्ठपणा व वजनवाढीवर नियंत्रण नसणे. हा लठ्ठपणा हा पुन्हा अयोग्य जीवनशैलीशी निगडित आहे. </div>
<div closure_uid_e2ogug="58" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<strong closure_uid_e2ogug="59">उच्च रक्तदाबांची लक्षणे </strong>उच्च रक्तदाबाची जाणीव होताच स्वतःच्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हा आजार अधिकच बळावू शकतो. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करून उपचाराला सुरवात करावी. उच्च रक्तदाबाची अनेक लक्षणे आहेत, ती ध्यानात घेऊन त्यानुसार आपण आपली काळजी घ्यावी.</div>
<div closure_uid_e2ogug="58" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div closure_uid_e2ogug="60" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
- डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसू लागतात. डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसणे हे या आजारात आढळणारे सर्वसामान्य लक्षण आहे.<br />- मधुमेह असलेल्या किंवा रक्तदाब असलेल्यांमध्ये रक्ताचे स्पॉट्स ही सामान्य बाब आहे.<br />- चेहऱ्याचा उजळपणा काहीवेळा चिंताजनक असू शकतो. कारण रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेहरा लालसर दिसू लागतो. त्याचबरोबर चेहऱ्याला जळजळ जाणवते. सूर्यप्रकाश, थंड हवामान, मसालेदार पदार्थ, गार वारा, गरम पेय, मद्यपान, व्यायामाचा अभाव अशा बाबीदेखील हा परिणाम घडवून आणतात. त्यामुळे त्वचेची काळजीदेखील घ्यावी लागते. चेहऱ्यातील हा फरक भावनिक बदलदेखील घडवतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा रक्तदाबदेखील वाढतो. वाढता रक्तदाब हा चेहऱ्याच्या उजळपणाशी संबंधित असतो. जर आपला रक्तदाब सामान्य असेल तर चेहऱ्यावर फरक जाणवणार नाही.<br />- उच्च रक्तदाबामुळे चक्कर येत नाही, तर त्यासाठी आपण घेत असलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे हा त्रास जाणवतो. चक्कर येत असल्याचे ध्यानात येताच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराचा तोल जाणे तसेच चालताना त्रास होणे ही हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब हा असे झटका येण्याचे कारण असतो.</div>
<div closure_uid_e2ogug="60" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /><strong>उच्च रक्तदाबाचे निदान तपासा </strong>आरोग्यदायी वाटत असले तरी तरुणांनी दोन वर्षांनी एकदा तरी त्यांच्या रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. ज्यांच्या घरी, कुटुंबात, अगोदरच्या पिढींमध्ये किंवा आई-वडिलांना रक्तदाबाचा आजार आहे, त्यांनी तर ही काळजी विशेषत्वाने घेतली पाहिजे. अशा घरातील तरुण मुलांना लहानवयातच ही समस्या होऊ शकते. त्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वेळीच तपासणी केली तर जोखीम कमी करता येते. पान</div>
<div closure_uid_e2ogug="60" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने आपले रक्तदाबाचे प्रमाण कितपत आहे, याची माहिती व मोजमाप वर्षातून एकदा तरी करून घेतले पाहिजे. रक्तदाब नसेल तर ठीक किंवा त्याचे प्रमाण कितपत आहे आणि ते कितपत होऊ शकते, याचा अंदाज घेऊन त्यानुसार पथ्ये पाळणे सोपे होते. तरुणपणातील तपासणी व उपचारांमुळे त्याचे भविष्यातील प्रमाण कमी-जास्त राहते. तपासणी केली नाही, तर वयोमानानुसार तो वाढत असल्याने नंतरच्या काळात त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे आपल्या हृदयाचे तसेच रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे वेळीच निदान व्हायला हवे. तसे झाले तर तो नियंत्रणात ठेवण्यास व आपल्या शरीराचे नुकसान थांबवण्यास मदत होऊ शकते.</div>
<div closure_uid_e2ogug="60" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div closure_uid_e2ogug="62" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<strong>उपयुक्त उपचारपद्धती</strong>- सुदैवाने, रक्तदाब कमी असेल तर उपचार घेणे सोपे होते आणि उत्तम आरोग्यदेखील राखता येते. आपल्या जीवनशैलीत त्यानुसार आपण बदल करू शकतो. तसेच होणारा अधिक त्रास कमी करू शकतो.<br />- वजन नियंत्रित ठेवले तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी आणि शरीर निरोगी राहते.<br />- दररोज व्यायाम करा - उच्च रक्तदाबाची जोखीम कमी करण्यासाठी दररोज व्यायाम आवश्यक आहे. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातील सर्व दिवस आपला व्यायाम होईल, यानुसार आपल्या कामाचे नियोजन करा.<br />- पोषक आहार घ्या - फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि कमी चरबी असलेली उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ असा सकस आहार रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो.<br />- मीठ कमी खा. अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत मिठाचा वापर होतो. हे मीठ सूप तसेच भाजलेल्या-शिजवलेल्या पदार्थांतून मिळते. पण त्याचे प्रमाण कमी अथवा संतुलित असेल, तर रक्तदाब कमी होण्यास मदत होते.<br />- धूम्रपान करू नका - धूम्रपानामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, झटका आणि अन्य आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते टाळा.<br />- रात्री चांगली झोप घ्या. रात्री मिळणारी चांगली झोप ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.</div>
--------------------------------<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-54348758472958660292016-02-07T10:08:00.000+05:302016-02-07T10:08:00.161+05:30स्रोतस सिद्धांत -3<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160122/images/5182612914386700445/5043635690686376543_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /><span style="color: #cc0000;">प्रकुपित दोष शरीरात भ्रमण करत असताना जेथे ‘ख-वैगुण्य’ म्हणजे स्रोतसांमध्ये बिघाड झालेला असेल तेथे व्याधी तयार होतो. म्हणजेच दोष हे रोगाचे कारण असले तरी शरीरात नेमक्या कोणत्या ठिकाणी रोग होईल हे स्रोतसांच्या दुष्टीवर ठरत असते. व्यवहारात यालाच आपण ‘वीक पॉइंट’ असे म्हणतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
आयुर्वेदातील स्रोतस सिद्धांताची माहिती आपण घेतो आहोत. शरीर निरोगी, राहण्यासाठी स्रोतसांचे योगदान महत्त्वाचे असते. तसेच रोग होण्यासाठीसुद्धा स्रोतसांची दुष्टी कारणीभूत असते. </div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावनम् ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">यत्र संगः खवैगुण्याद् व्याधिस्तत्रोपजायते ।।....सुश्रुत सूत्रस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">प्रकुपित दोष शरीरात भ्रमण करत असताना जेथे ‘ख-वैगुण्य’ म्हणजे स्रोतसांमध्ये बिघाड झालेला असेल तेथे व्याधी तयार होतो. म्हणजेच दोष हे रोगाचे कारण असले तरी शरीरात नेमक्या कोणत्या ठिकाणी रोग होईल हे स्रोतसांच्या दुष्टीवर ठरत असते. व्यवहारात यालाच आपण वीक पॉइंट असे म्हणतो म्हणजे चार व्यक्ती पावसात भिजल्या तर त्यातल्या एकाला सर्दी होईल, दुसऱ्याला कंबर दुखू लागेल, तिसऱ्याचा अपचनाचा त्रास होईल आणि चवथ्याला कदाचित काहीही होणार नाही. पावसात भिजण्याने, थंडी वाजण्याने शरीरात वातदोष आणि कफदोष प्रकुपित होत असतात. ज्याची श्वसनसंस्था अशक्त असेल त्याला सर्दी होईल, ज्याच्या शरीरात अगोदरपासून वातदोष बिघडलेला असेल त्याची कंबर दुखू लागेल, ज्याची पचनसंस्था अशक्त असेल त्याला अपचनाचा त्रास होईल आणि ज्याच्या शरीरात असा कोणताच अशक्त पॉइंट नसेल म्हणजेच ज्याच्या स्रोतसात ‘ख-वैगुण्य’ नसेल त्याला काहीच त्रास होणार नाही.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">यातून अजून एक गोष्ट लक्षात येऊ शकेल, की दोषांमध्ये थोड्या-फार प्रमाणात चढाव-उतार होणे स्वाभाविक असते. वय, ऋतुकाळ, आहार-आचरण या सर्वांनुसार दोष कमी-जास्त होत असतात, त्यामुळे एका बाजूने दोष प्रकुपित व्हायला नकोत यासाठी दक्ष राहायला हवे, तसे दुसऱ्या बाजूने स्रोतसांमध्ये ख-वैगुण्य तयार होणार नाही याकडेही लक्ष ठेवता यायला हवे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">चरकसंहितेनुसार तेरा स्रोतसांचे ‘मूल’ काय असते आणि ते स्रोतस बिघडले तर शरीरावर कोणकोणती लक्षणे उत्पन्न होतात हे आपण पाहू.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">१. प्राणवह स्रोतस</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>मूल -</b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">तत्र प्राणवहानां स्रोतसां हृदयं मूलं महास्रोतश्च ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">...चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">हृदय आणि महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग हे प्राणवहस्रोतसाचे मूळ होत.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>स्रोतसदुष्टीची लक्षणे -</b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अतिसृष्टम् अतिबद्धं कुपितं अल्पाल्पम् अभीक्ष्णं वा सशब्दशूलम् उच्छवसन्तं दृष्ट्वा प्राणवहान्यस्य स्रोतांसि प्रदुष्टानि विद्यात् । ...चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- श्वास फार जोराने चालू होणे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- बांधल्यासारखा किंवा कोंडल्यासारखा वाटणे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- कुपित झाल्यासारखा म्हणजे जोराजोराने आणि अनियमित गतीने घेतला जाणे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- थोडा थोडा घेतला जाणे किंवा बाहेर पडणे, दीर्घश्वसन करता न येणे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- जलद गतीने सुरू होणे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- श्वास घेताना आवाज होणे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- श्वासोच्छ्वास करताना वेदना होणे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अशी लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतील त्याचे प्राणवहस्रोतस बिघडले आहे असे समजावे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b><br /></b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>प्राणवह स्रोतसामध्ये बिघाड होण्याची कारणे -</b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">क्षयात् संधारणात् रौक्ष्यात् व्यायामात् क्षुधितस्य च ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">प्राणवाहिनी दुष्यन्ति स्रोतांस्यन्यैश्च दारुणैः ।। </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">...चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"> शरीरातील धातूंची झीज झाल्याने</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"> मल, मूत्र, अधोवायू वगैरे नैसर्गिक आवेगांना जबरदस्तीने अडवून ठेवण्याने</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"> शरीरात रुक्षता वाढल्याने</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"> भूक लागलेली असताना भूक न शमवता व्यायाम करण्याने</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"> स्वशक्तीचा विचार न करता इतर कोणतेही श्रमकारक, कठोर काम करण्याने प्राणवहस्रोतसात बिघाड उत्पन्न होऊ शकतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">पुढच्या वेळेला आपण अन्नवह, उदकवह वगैरे इतर स्रोतसांची माहिती घेऊ या.</span></div>
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-33971200942709600332016-02-07T00:30:00.000+05:302016-02-07T00:30:06.891+05:30स्रोतस सिद्धांत -4<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160129/images/5131111222197177315/5599986101298946520_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /><span style="color: #cc0000;">उदक म्हणजे पाणी, शरीरातील एकंदर जलतत्त्व. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेले असले तरी त्यातील जलतत्त्वाचे योगदान खूप महत्त्वाचे असते. आधुनिक शास्त्रानेही हे स्वीकारलेले आहे. म्हणूनच अन्नापेक्षा अधिक गरज पाण्याची असते. सतत कोरडे अन्न खाण्याने किंवा रुक्ष गुणाचे अन्न सेवन करण्याने, तसेच तहान लागूनही पाणी न पिण्याने उदकवहस्रोतसात दोष उत्पन्न होऊ शकतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">आपण आयुर्वेदातील स्रोतसांची माहिती घेतो आहोत. मागच्या वेळी प्राणवहस्रोतसाचे मूळ, ते बिघडले असता उद्भवणारी लक्षणे आणि बिघाडामागची कारणे काय असतात हे बघितले होते. आता आपण यापुढच्या स्रोतसांविषयी जाणून घेणार आहोत. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>उदकवहस्रोतस </b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">उदक म्हणजे पाणी, शरीरातील एकंदर जलतत्त्व. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेले असले तरी त्यातील जलतत्त्वाचे योगदान खूप महत्त्वाचे असते. आधुनिक शास्त्रानेही हे स्वीकारलेले आहे. म्हणूनच अन्नापेक्षा अधिक गरज पाण्याची असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">मूल - उदकवहानां स्रोतसां तालुमूलं क्लोम च ।....चरक विमानस्थान </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">मुखाच्या आत असणारा टाळू आणि क्लोम (या शरीररचनेची परिभाषा निश्चित नाही. काही विद्वानांनी याचा अर्थ श्वासनलिका असा घ्यावा, तर काहींच्या मते अग्न्याशय -पॅन्क्रियाज घ्यावा असे म्हटलेले आहे) हे उदकवहस्रोतसाचे मूळ होय. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>स्रोतसदुष्टीची लक्षणे -</b> </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">प्रदुष्टानां तु खल्वेषामिदं विशेषविज्ञानं भवति; तद्यथा - जिह्वाताल्वोष्ठकण्ठक्लोमशोषं पिपासां चातिप्रवृद्धां दृष्ट्वोदकवहान्यस्य स्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- जीभ, टाळू, ओठ, कंठ, क्लोम ही स्थाने अगदी कोरडी पडणे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- फार तहान लागणे. पाणी पिऊनही शमत नाही अशी तहान लागणे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">स्रोतसात बिघाड होण्याची लक्षणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">औष्ण्यादामाद्भयात् पानादतिशुष्कान्नसेवनात् । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अम्बुवाहीनि दुष्यन्ति तृष्णायाश्चातिपीडनात् ।।.....चरक विमानस्थान </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- उष्णतेशी सातत्याने संपर्कात राहिल्याने उदा. उष्ण गुणाचे अन्न सेवन करणे, उन्हात फार वेळ राहणे, अग्नीजवळ काम करणे वगैरे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- शरीरात आमदोष वाढल्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- भीती वाटल्याने, सातत्याने भीतीच्या अमलाखाली राहण्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- मद्यपान अतिप्रमाणात करण्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- सतत कोरडे अन्न खाण्याने किंवा रुक्ष गुणाचे अन्न सेवन करण्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- तहान लागूनही पाणी न पिण्याने उदकवहस्रोतसात दोष उत्पन्न होऊ शकतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>अन्नवहस्रोतस </b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">यालाच महास्रोतस असेही म्हणतात. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">मूल - अन्नवहानां स्रोतसां आमाशयो मूलं वामञ्च पार्श्वम् । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">आमाशय (अन्न सेवन केल्यानंतर लगेचच जेथे साठवले जाते तो अवयव) आणि डाव्याबाजूची कूस हे अन्नवहस्रोतसाचे मूळ होय </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">स्रोतसदुष्टीची लक्षणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">प्रदुष्टानां तु खल्वेषामिदं विशेषविज्ञानं भवति; तद्यथा - अनन्नाभिलषणमरोचकाविपाकौ छर्दिं च दृष्ट्वाऽन्नवहान्यस्य स्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- अन्न सेवन करण्याची इच्छा न होणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- तोंडाला चव न राहणे, तसेच काही खाल्ले तर त्याची चव न समजणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- पचनक्रिया व्यवस्थित न होणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- उलट्या होणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">स्रोतसात बिघाड होण्याची कारणे </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनात् । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अन्नवाहीनि दुष्यन्ति वैगुण्यात पावकस्य च ।।....चरक विमानस्थान </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- अति प्रमाणात (भूक लागलेली असेल त्यापेक्षा अधिक प्रमाणात) जेवण करण्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- अवेळी जेवण करण्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- अहितकर म्हणजे स्वतःच्या प्रकृतीला प्रतिकूल किंवा शिळे, जुने, खराब झालेले अन्न सेवन करण्याने </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">- जाठराग्नीमध्ये बिघाड झाल्याने अन्नवहस्रोतसांत दोष उत्पन्न होत असतो </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">यापुढे सात धातूंची सात स्रोतसे समजावली आहेत, त्यांची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-48055188876171646472016-02-04T20:00:00.000+05:302016-02-04T20:00:03.685+05:30आरोग्यासाठी प्रसन्न मन -3<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160106/images/4818127388519145959/5318716807028310839_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" />- डॉ. श्री. बालाजी तांबे</div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000;">शारीरिक रोगांच्या आधी मनोरोग असावेत. कारण शरीरात रोग येण्यासाठी कारण मनच असते. या मनोरोगात अगदी शेवटचा रोग म्हणजे उन्माद. मनाचे आरोग्य उत्तम असणाऱ्या शंकराचार्य, गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्ती जन्मजन्मांतराने एकेका युगात एखादीच झालेली दिसते. मनोरोग नाही अशी व्यक्ती सापडणारही नाही आणि मनोरोग असलाच तर तो बरा करणे हे काम महाकर्मकठीण आहे. मनोरोग कुठल्या प्रकारचा आहे व तो कशाप्रकारे प्रकट होतो आहे, त्याची वाटचाल सावकाश आहे की जलद आहे, तो उन्मादाच्या अवस्थेला कधी पोचेल हे सर्व गणित अवघड असते. आपल्या चिंतनाने, ध्यानाने, हवनाने एक वेळ देव प्रसन्न होईल, पण मन प्रसन्न होणे खूप अवघड आहे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">संपूर्ण निरोगी, आरोग्यवान, तेजःपुंज, स्वस्थ मनुष्य ही कल्पना केवळ व्याख्येपुरती आहे का? अशा तऱ्हेची व्यक्ती खरोखर अस्तित्वात आहे असे कोणी सांगितले तर, या विधानावर बहुतेक वेळा विश्वास ठेवला जाणार नाही. प्रत्येकाला काही ना काही बारीक-सारीक त्रास असतोच. सर्दी-पडसे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ डोळे चुरचुरणे, कधी तरी एखादा दिवस झोप न येणे किंवा ताप येणे अशा बारीक-सारीक तक्रारी तरी असतातच. काही नाही तर कानदुखी, दाढदुखी अशा तऱ्हेचा एखादा त्रास असू शकतो. सर्वतोपरी आरोग्यवान असलेल्या स्त्रीला पाळी वेळेवर न येणे, अंगावरून कमी-अधिक जाणे असा एखादा त्रास असू शकतो. याचे कारण काय असावे याचा विचार करावा लागेल. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">ऋषी-मुनींनी, भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय परंपरेप्रमाणे स्वभावधर्मानुसार, लोककल्याणार्थ खूप संशोधन करून शरीराविषयी, आरोग्याविषयी स्वच्छ कल्पना लिहून ठेवलेल्या आहेत. जगातील प्रत्येक वस्तुमात्राचा उपयोग आरोग्यासाठी कसा करता येईल हेही भारतीय शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेले आहे. असे असताना माणसाला आरोग्य का टिकवता येऊ नये? रोगाच्या व्याख्या जरा अवघडच वाटतात. म्हणजे मनुष्याला चारचौघात वावरता येणार नाही, त्याची उपस्थिती आजूबाजूच्या चारचौघांना उपद्रव ठरेल अशा प्रकारच्या एका मानसरोगाचे नाव आहे उन्माद. उन्मादाची व्याख्या करताना मस्तकात मद गेल्यामुळे होणारा अवरोध, त्यातल्या त्यात मनोनाडीत होणारा अवरोध असे आयुर्वेदात सांगितलेले दिसते. हा मद कुठे आहे, कुठे आहे मेदोरोग, कुठे आहे उन्माद हे समजायला आपल्याला बराच अभ्यास करावा लागेल. शारीरिक रोगांच्या आधी मनोरोग असावेत. कारण शरीरात रोग येण्यासाठी कारण मनच असते. या मनोरोगात अगदी शेवटचा रोग म्हणजे उन्माद. त्याच्या आधी अनेक प्रकारचे मनोरोग सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार मनुष्य म्हणजे केवळ एक ६०-७० किलोचे शरीर, ज्यात हाड, मांस, मेद, मज्जा, रक्त, रस व वीर्य हे सर्व घटक असतात असे नव्हे. शरीर म्हणजे हे सर्व घटक असे म्हणणे एखाद्या वस्तूत अमुक तमुक घटक आहेत असे मोघम सांगण्यासारखे आहे. सर्व गंमत आहे ती गणिताची. अन्न खाल्ल्यावर रस तयार होतो, पण कोणी किती अन्न खावे, आपापल्या वजनाच्या हिशेबात खावे, की भुकेच्या हिशेबात खावे, अन्नाच्या प्रकारानुसार त्याचे प्रमाण कमी-जास्त व्हावे की प्रसंगानुसार कमी-जास्त व्हावे? शेवटी आयुष्य संख्येने बांधले जाणारच असते. शरीराचे घटक असलेले सात धातू अन्नामधूनच तयार होतात. त्यामुळे कोणत्या प्रकारचे अन्न विशिष्ट शरीरघटक तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात हे शोधून काढून त्यानुसार आहार ठरविला तर आरोग्यासाठी उपयोगी ठरेल असे आपल्याला वाटू शकते. परंतु आपल्या शरीरात व्यक्तिगत फरकाने किती रस असावा, किती रक्त असावे वगैरे मर्यादा कोठे माहीत आहेत? </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">याच्याही पेक्षा कळायला अवघड असतात ते मनोदोष. मनाचे आरोग्य उत्तम असणाऱ्या शंकराचार्य, गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्ती जन्मजन्मांतराने एकेका युगात एखादीच झालेली दिसते. मनोरोग नाही अशी व्यक्ती सापडणारही नाही आणि मनोरोग असलाच तर तो बरा करणे हे काम महाकर्मकठीण आहे. मनोरोग कुठल्या प्रकारचा आहे व तो कशाप्रकारे प्रकट होतो आहे, त्याची वाटचाल सावकाश आहे की जलद आहे, तो उन्मादाच्या अवस्थेला कधी पोचेल हे सर्व गणित अवघड असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">म्हणून रोगांची व्याख्या करण्याआधी आयुर्वेदाने स्वास्थ्याची व्याख्या केलेली आहे, ती अशी, </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः। </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।। </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">वात-पित्त-कफ वगैरे दोष यांचे गणित, हे गणित शास्त्रातील अवघडातील अवघड शाखेचे गणित असावे. कारण वात-पित्त-कफदोष या संकल्पना आहेत, पदार्थ नव्हेत. रस, रक्त वगैरे सप्तधातूंचे गणितही अवघड असते. यानंतर येतो तो सम अग्नी. जाठराग्नी किंवा सर्व धातूत अग्नी असतात असे थोडेफार माहीत असते व त्यावरच समाधान मानले जाते. हा अग्नी काय करतो, कुठे असतो? अग्नी धनसंपदा देणारा आहे अशी त्याची व्याख्या केलेली असल्यामुळे तो शरीररूपी धन देणारा आहे. वीर्यातून स्फोट झाल्यावर </span>उत्पन्न होणारे ओज म्हणजे प्रकाश, तसे या अग्नीच्या शक्तीद्वारा घडलेल्या कर्मातून उपलब्ध होणारे धनच शरीरालासुद्धा अग्नीत शुद्ध करून तेजस्वी व मजबूत बनविणारे, व्यक्तिमत्त्वाची धार अत्यंत सूक्ष्म करणारे असे हे अग्नितत्त्व. अनेक वेळा लोखंडावर अग्निसंस्कार करून तलवारीला धार केली जाते, तसे शरीरातील अग्नी शरीराला व मनाला धारदार बनवितात. म्हणजेच शरीरातील अग्नी व्यवस्थित असला तर व्यक्ती रुबाबदार असते, त्याची शरीरसंपदा उत्तम असते, त्याचे कर्म समाजोपयोगी असते, त्याच्याबरोबर आलेली बाह्यसंपदा म्हणजे समृद्धी वगैरे उत्तम असते. हा सर्व विचार करणे आवश्यक आहे. अग्नी दूषित झाल्यानंतर उन्माद नक्की ठरलेला आहेच. उन्मादामुळे अग्नी जास्त प्रदीप्त होतो, त्यामुळे उन्मादाचा वेग आला की माणसे कोसळतात, कारण अशा वेळी त्यांच्या शरीरात अग्नी उरलेला नसतो. </div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">यानंतरच्या ‘प्रसन्नात्मेन्द्रियमनाः’ या शब्दात आत्मा, इंद्रिये व मन यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्या चिंतनाने, ध्यानाने, हवनाने एक वेळ देव प्रसन्न होईल, पण मन प्रसन्न होणे खूप अवघड आहे, मन प्रसन्न होण्यासाठी मुळात त्याची भेट तर व्हायला पाहिजे!! भल्याभल्यांची स्वतःच्या मनाशी भेट होत नाही. पायाला भिंगरी लागलेल्या व्यक्तीला सतत प्रवास करावा लागतो, तसे मनरूपी भिंगरी सतत भिरभिरत असते. ती एका जागी स्थिर राहात नाही, उलटी फिरते, सुलटी फिरते, फिरत आहे असे भासते तेव्हा ती फिरत असते आणि फिरत आहे असे भासते तेव्हा स्थिर असते. अशी ही मनभिंगरी प्रसन्न कशी होणार? मन प्रसन्न असणे, त्यानंतर इंद्रिये प्रसन्न असणे आवश्यक आहे. (क्रमशः)</span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-3207087779748577602016-02-04T18:30:00.000+05:302016-02-04T18:30:25.684+05:30आरोग्यासाठी प्रसन्न मन -2<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160104/images/5397008915262550488/4765158380976361234_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /><span style="color: #cc0000; font-family: Mangal, Verdana;">अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर, असा विचार करत ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">जग हे जडापासून बनलेले आहे. या विश्वातील मायेच्या चमक-दमककडे आकर्षित होऊन किंवा चुकीच्या आवाहनामुळे मनुष्य चुकीच्या मार्गाला जातो. यामुळे मन प्रसन्नता हा सोम्यागोम्यासाठीचा मार्ग नव्हे असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक माणसाला आज ना उद्या स्वतःचे आरोग्य, समृद्धी, आत्मसमाधान व तेजाचा विचार करावाच लागेल. कारण सरतेशेवटी शांती त्या ठिकाणीच मिळणार असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व थोड्या थोड्या फरकाने एकमेकांपासून वेगळे असले, तरी ते सर्व एकच आहेत. यातील बुद्धी आहे महत्त्वाची. अहंकार हा अंधकारच होय. तेथे सगळ्याचाच अभाव असतो. तेथे असतो फक्त स्वार्थीपणा व लंपटपणा. चित्त हे बुद्धीचे आदेश मनापर्यंत पोचविण्याचे माध्यम. बुद्धीचे व्यवस्थित मार्गदर्शन मनाला मिळाले तर मन शांत होऊ शकते, प्रसन्न होऊ शकते. एखादा मनुष्य नशीबवान आहे असे आपण म्हणतो. तो नशीबवान होतो, कारण त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात. त्याला खरोखर भगवंतांचा कृपाशीर्वाद मिळत असणार, जेणेकरून त्याला जीव, आत्मा व परमात्म्याच्या श्रेयस गोष्टी सुचतात. बुद्धीने अशा प्रकारे ऐनवेळेला सु-विचार सुचविण्यासाठी, चांगली कल्पना सुचविण्यासाठी, चांगल्या अनुभवाचा साक्षीदार करून देण्यासाठी खूप पूर्वतयारी असण्याची गरज असते. म्हणून ज्ञान हे अनुभवावर आधारित असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">एक गृहस्थ मोठे कवी होते. त्यांनी गंगेवर एक छान काव्य रचले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, तेव्हा गंगास्नान करून जावे अशा हेतूने ते गंगेवर पोचले. ते पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होते. काठावर असलेल्या एकाने सांगितले येथे उतरू नका, कारण येथे खूप मगरी, सुसरी आहेत. त्यावर कवी म्हणाले की, मगरी-सुसरी या तर गंगेचे वाहनच आहेत. मी तळापर्यंत जाणारच नाही, कारण वाहनावर गंगा आरूढ झालेली आहे. मी फक्त वर वरच्या पाण्यात स्नान करणार आहे. पाण्यात उतरल्यावर मगरीने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वाहनाचा अनुभव आधी घ्यायला पाहिजे होता असे लक्षात आले. गंगेचे वाहन मगर आहे म्हणत असताना मगर गंगेच्या पाण्यावर विहरत असतात, गंगा मगरावर आरूढ झालेली नसते. हा अनुभव नसल्याने नुसत्या शब्दाच्या माध्यमातून लिहिलेल्या काव्याला पुरस्कार मिळू शकतो, पण व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाची आग होऊ लागली, तेव्हा त्यांनी सर्प थंड असतो म्हणून सर्पाला कंठाभोवती लपेटून घेतले. परंतु प्रत्यक्ष सर्पाचा थंडपणा अनुभवल्यावर मिळणारे ज्ञान वेगळे असते. असे अनेक प्रसंग आठवतील की, ज्यात बुद्धी व बुद्धीवर बसविलेले तर्क यांनाच ज्ञान समजून आचरण केल्याने आयुष्यात चांगल्या संधीला मुकावे लागले. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर असा विचार करत आपण ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. विषयांवर जबाबदारी टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे पॅकिंग फारच आकर्षक असल्यामुळे ती वस्तू आपण वापरतो, एखादा मनुष्य दिसायला अतिशय स्मार्ट व रुबाबदार किंवा स्त्री सौंदर्यवान दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे आमचे मन आकर्षित होते अशा प्रकारे विषयावर जबाबदारी टाकली जाते. विषय मनाला विचलित करतात हे एका दृष्टीने बरोबर आहे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">प्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या गुणांनी बांधलेले असते. विषयांचे पण स्वतःचे गुण ठरलेले असतात. त्यामुळे इंद्रिये विषयाकडे आकर्षित होतात. सृष्टीने सृजनासाठीचे आणि जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत. त्यातही अशी आकर्षणे निसर्गतःच टाकून ठेवलेली आहेत, उदा. प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडणारे पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षण. पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षणामुळे जीवनात शृंगाररस उत्पन्न होतो व एकूण जीवनाचे सौंदर्य कळून जीवनाविषयी आकर्षण उत्पन्न होते. विषयांना समजून घेणे खूप आवश्यक आहे. विषय कशासाठी आहे हे पाहणे आवश्यक असते. शिडी ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साधन आहे. शिडी कितीही उत्तम दर्जाची बनवायची असे ठरविले, तरी ती सोन्याची बनवता येत नाही, कारण सोने मऊ असल्याने सोन्याच्या पायऱ्या वाकू शकतात. शिडीच्या पायऱ्या सुंदर दिसणाऱ्या चकचकीत धातूच्याही करता येत नाहीत, कारण शिडीच्या पायऱ्यांवर पाय द्यायचाच असतो. शिडीवरून चढून गेल्यावर आपल्या परमप्रिय व्यक्तीची भेट झाली, तर शिडीची कोणी पूजा करत नाही आणि कायम शिडी बरोबर घेऊनही कोणी फिरत नाही. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">अशा प्रकारे प्रत्येक बाह्यवस्तूचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकाने नक्की केले, तर विषयांपासून सुटका होण्याचे नक्की होऊ शकते. जेवल्याशिवाय राहता येत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते, ते प्रत्येकाला आवश्यक असतेच. परंतु ज्या वेळी जिवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा पाण्यावर भागत नाही. अन्नावाचून चालत नसले, तरी त्यावाचून महिनाभर राहता येऊ शकते. आवडीच्या वस्तू जेवणात असल्या, तर जेवण जाते; अन्यथा तोंडात घास गोल फिरतो असे म्हणणारी व्यक्ती उपासमार झाली की गणपतीला वाहिलेल्या दूर्वा खायलाही मागे-पुढे पाहत नाही. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">प्रत्येक विषयाचे चिंतन करून आपले जीवन चालविण्यासाठी, जीवनात हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मुळात कुठले विषय अगदी निकडीचे आहेत ते ठरविणे, त्या विषयांची वर्गवारी लावून, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले प्राधान्य ठरवून नंतर त्या विषयांचे आपल्या आयुष्यातील स्थान नक्की करावे. विवाहिताला पत्नी व तिच्यापासून मिळणारे सुख हा विषय महत्त्वाचा असणे साहजिक आहे. परंतु लग्न न झालेल्या अनेक व्यक्ती असतात. आपल्याला जीवनाच्या लक्ष्याप्रत पोचण्यासाठी काय अत्यावश्यक आहे हेही ठरवावे लागते. श्रीमद् आदि शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्’ या स्तोत्रात ‘एतद् मांसवसादिविकारम्’ असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्या वस्तूंची डोळ्यांना भुरळ पडते ते आयुर्वेदातील मज्जा व मांस यांचे खेळ असतात. तेव्हा त्यांना अवास्तव महत्त्व न देता हे मज्जा व मांस ज्या जिवाशी संबंध ठेवून असतात त्या जिवाचा, त्या व्यक्तीचा विचार करणे अधिक आवश्यक असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">असे करत गेल्याने सरतेशेवटी अणूरेणूत असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचल्यानंतर विषयनिवृत्ती सोपी होऊ शकेल. अशी विषयनिवृत्ती झाली, तर इंद्रियांवर अनुशासन करणे सोपे होईल. </span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-38939435050395712232016-02-04T10:50:00.000+05:302016-02-04T10:50:08.906+05:30प्रसन्न मन -1<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000; font-family: "mangal" , "verdana";">रोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्तीला कितीही त्रास होत असला, तरी त्याची सहनशक्ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करतील. रक्तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्तीला करणे बहुधा अशक्य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्ती व इच्छाशक्ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्यताही कमीच असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">हीन सत्त्व म्हणजे दुर्बल मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्ती स्वतः स्वतःला तर धीर देऊ शकत नाहीतच, पण दुसऱ्याने समजावले तरी मनाची वृत्ती बदलवू शकत नाहीत. संकटात यांचे मन अगदीच कावरेबावरे होते. भीती, शोक, लोभ, मोह, अहंकार यांचा या व्यक्तींच्या मनावर मोठा पगडा असतो. छोट्या मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जाणे, धैर्यपूर्वक मार्ग काढणे यांच्यासाठी अवघड असते. एखादी भयानक, अप्रिय, तिटकारा असणारी विकृत कथा ऐकल्यास किंवा पाहिल्यास, तसेच पशू किंवा मनुष्याचे रक्त पाहिल्यास यांना मनात विषाद उत्पन्न होतो. मनावर परिणाम होऊ शकतो किंवा घेरी येऊन भान हरपू शकते. कधी कधी तर यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">रोगाचे निदान तसेच उपचार करताना, विशेषतः पंचकर्मासारखे उपचार करताना व्यक्तीची मनोवृत्ती लक्षात घेणे आवश्यक असते. कारण श्रेष्ठ मनोवृत्तीच्या व्यक्तीला कितीही त्रास होत असला तरी त्याची सहनशक्ती मोठी असल्याने तो त्रासाचे वर्णन होत असल्यापेक्षा कमी करेल. याउलट हीन, दुर्बल मनोवृत्तीच्या व्यक्ती राईचा पर्वत करून सांगण्याचा प्रयत्न करेल. रक्तमोक्षण, अग्निकर्म, क्षारकर्मासारखे अवघड उपचार हीन सत्त्वाच्या व्यक्तीला करणे बहुधा अशक्य असते. श्रेष्ठ मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीवर उपचार करणे व रोगातून बरे करणे त्यामानाने सोपे असते. सहसा अशा व्यक्तींची मूळची ताकद, प्रतिकारशक्ती व इच्छाशक्ती चांगली असल्याने त्यांना रोग होण्याची शक्यताही कमीच असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">मन, आत्मा आणि शरीर यापैकी मन सर्वांत महत्त्वाचे कारण मनच आत्म्याशी संयुक्त होऊन संपूर्ण शरीराचे नियमन करत असते. म्हणूनच आपली भावनिकता, एखाद्या बिकट प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आवड-निवड वैगरे सर्व भाव मनाच्या शक्तीवरच अवलंबून असतात. मनाची शक्ती मानसिकतेवरून ओळखता येते. आयुर्वेदाने मनाच्या शक्तीवरून मनाचे तीन भाग केले आहेत. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">तत्र त्रिविधं बलभेदेन - प्रवरं, मध्यमं, अवरं चेति ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अतश्च प्रवरमध्यावरसत्त्वाः पुरुषाः भवन्ति । ....चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">१ - प्रवरसत्त्व पुरुष (आत्मतत्त्व) म्हणजे उत्तम मनशक्ती असणाऱ्या व्यक्ती.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">२ - मध्यमसत्त्व पुरुष म्हणजे मध्यम मनशक्ती असणाऱ्या व्यक्ती.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">३ - अवरसत्त्व पुरुष म्हणजे हीन (कमी) मनशक्ती असणाऱ्या व्यक्ती.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">प्रवर अर्थात श्रेष्ठ मनःशक्ती असणारी व्यक्ती शरीराने बलवान असली-नसली तरी मनाने खंबीर असते. शरीरातील वात-पित्त-कफातील असंतुलनामुळे किंवा बाह्य आघातामुळे कितीही कठीण प्रसंग ओढवला तरी</span>अशी व्यक्ती हडबडून किंवा गोंधळून जात नाही. प्रवर सत्त्ववान व्यक्ती उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या बुद्धिमान व उत्साही असतात, भक्तिभावाने संपन्न, कृतज्ञ, पवित्र तसेच धीर धरू शकणाऱ्या त्या असतात. प्रसंगी पराक्रम करून दाखविणाऱ्या असतात, त्यांच्या ठिकाणी विषादाचा लवलेश नसतो, त्यांची गती सुव्यवस्थित असते. धडपडणे, ठेच लागणे, अडखळणे अशा गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. त्यांची विचारसरणी व हालचाली गंभीर (म्हणजे सुसूत्रतापूर्ण) असतात. त्यांचे मन आणि बुद्धी सातत्याने कल्याणाच्या मार्गाचाच विचार करत असतात. </div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">मध्यम म्हणजे साधारण मनःशक्ती असणारी व्यक्ती दुसऱ्याच्या आधाराने किंवा दुसऱ्याने आश्वस्त केले की, परिस्थितीशी सामना करण्यास तयार होते. अशा प्रकारे मानसिकतेवरून मनाचे तीन विभाग केले असले तरी मनाची शक्ती वाढवता येणे शक्य असते. ही मानसशक्ती तीन प्रकारची असते. धी, धृती आणि स्मृती या तिन्ही मानसशक्ती नीट समजून घेतल्या आणि त्यांना अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला तर मनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><b>धी-धी म्हणजे मेधा व बुद्धी.</b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">धारणावती धीः मेधा ।...चरक सूत्रस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">कोणतीही गोष्ट आकलन करण्याचे, समजून घेण्याचे काम मेधा करते. आपली प्रकृती काय आहे, प्रकृतीला अनुरूप आहार-आचरण म्हणजे नेमके काय हे समजून घेणारी मेधा असते. मेधा ही स्मृतीच्या अलीकडची पायरी असते. एखादी गोष्ट समजली तरच ती नंतर लक्षात राहू शकते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">निश्चयात्मिका धीः बुद्धिः ।...सुश्रुत शारीरस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">एखाद्या विषयाचे निश्चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती बुद्धी. मनाच्या द्विधा अवस्थेतून एका निर्णयाप्रती आणते ती बुद्धी. उदा. तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तीला आइस्क्रीम खाण्याची इच्छा झाली तरी बुद्धी त्याला या अवस्थेत आईस्क्रीम खाणे बरोबर नाही हा निर्णय देत असते. एखादा विषय व्यवस्थित मुळापर्यंत नीट समजून ज्ञात करून घेणारी बुद्धी असते. त्यामुळे स्वतःची प्रकृती व्यवस्थित समजून घेणे, आपल्या प्रकृतीला चांगले काय, वाईट काय हे अगदी पक्के जाणून घेणे हे बुद्धीवर अवलंबून असते. प्रकृतीमध्ये काही बदल होत असला, असंतुलन होत असले तर तेही बुद्धीलाच कळू शकते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">मेधा तसेच बुद्धीने विषय आकलन केला, त्याचे व्यवस्थित ज्ञान करून घेतले, त्यानुसार अचूक निर्णय घ्यायला मदत केली तरी बुद्धीने दिलेला निर्णय कायम ठेवून योग्य ती गोष्ट करण्यास मनाला प्रवृत्त करणारी असते ती धृती.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">नियमात्मिका बुद्धिः धृतिः ।...सुश्रुत शरीरस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">नुकताच ताप येऊन गेला आहे, अशा अवस्थेत आईस्क्रीम खाणे योग्य नाही असा बुद्धीने निर्णय दिला तरी, आइस्क्रीमच्या मोहात अडकलेल्या मनावर संयम ठेवण्याची जबाबदारी धृतीची असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">धृतीप्रमाणेच स्मृतीचेही योगदान महत्त्वाचे असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अनुभवजन्य ज्ञानं स्मृतिः ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">एखादी गोष्ट वाचली, ऐकली आणि ती लक्षात ठेवली म्हणजे ज्ञान झाले असे नाही. माहिती व ज्ञान या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक असतो. मिळालेल्या माहितीचा अनुभव घेतलेल्याशिवाय त्याला ज्ञान म्हणता येत नाही. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची आठवण स्मृतीमुळे राहते. मागच्या वेळी आइस्क्रीम खाल्ले होते तेव्हा त्रास झाला होता ही अनुभवजन्यआठवण असली तरच आइस्क्रीमसमोर असूनही खाणे बरोबर नाही हा निर्णय ठाम राहू शकतो. अनुभव मनुष्याला शिकवतो, शहाणे करतो असे म्हटले जाते, ते स्मृतीच्या जोरावरच! नुसती माहिती असली तर ती योग्य वेळी आठवेल न आठवेल याची खात्री देता येत नाही. अनुभव गाठीशी असला तर तो निश्चितपणे मार्गदर्शन करू शकतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: "mangal" , "verdana";">अशाप्रकारे धी सारासार विचार करून निर्णय देण्याचे काम करते, धृती अहितापासून दूर ठेवणारी असते तर स्मृती वेळेवर पूर्वीचा अनुभव लक्षात आणून सावध करण्याचे काम करते. जोपर्यंत या तिन्ही मानसशक्ती कार्यरत असतात, तोपर्यंत मनात सत्त्वगुणाचे आधिक्य राहते, मात्र धी, धृती, स्मृती भ्रष्ट झाल्या, आपापले काम योग्य रीतीने करेनाशा झाल्या तर हळूहळू मनात रज तसेच तमदोषाचे प्राबल्य वाढत जाते आणि त्यातून अनेक मानसिक तसेच शारीरिक रोगांना आमंत्रण मिळू शकते.</span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-91891721409506374702016-02-04T10:32:00.000+05:302016-02-04T10:32:08.620+05:30स्रोतस सिद्धांत -2<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20160115/images/5088957383426890681/4688662674216968944_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" />- डॉ. श्री. बालाजी तांबे </div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000;">स्रोतसे आपापल्या द्रव्याचे वहन व्यवस्थित करत असतात तोपर्यंत आरोग्य नीट राहते. जो आहार किंवा जे आचरण दोषांच्या गुणाशी समान गुणांनी युक्त असते म्हणजे दोषांना वाढवणारे असते आणि धातूूच्या गुणांना विरोधी असते म्हणजे धातूंना अशक्त करणारा असते. तो आहार आणि ते आचरण स्रोतसांमध्ये बिघाडाला कारण ठरत असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
आयुर्वेदाचे वैशिष्ट्य समजला जाणारा सिद्धांत म्हणजे स्रोतससिद्धांत. शरीरात जेथे जेथे अवकाश आहे, जेथे जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते, त्या सर्वांना स्रोतस ही संज्ञा देता येते. असंख्य स्रोतसांपैकी काही स्रोतसे महत्त्वाची समजली जातात. कारण या स्रोतसांच्या मुळांवर म्हणजे स्रोतस जेथून सुरू होतात त्या उत्पत्तीस्थानावर आघात झाला, तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच या मुख्य स्रोतसांमध्ये दोष उत्पन्न झाला तर त्याची लक्षणे शरीरावर विशेषत्वाने दिसतात. </div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><b><br /></b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><b>स्रोतसांचे मुख्यत्वे दोन प्रकार केले जातात. </b></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">१. बहिर्मुख स्रोतस - ज्या स्रोतसांचे मुख शरारीवर उघडते ती बहिर्मुख स्रोतसे होत. दोन डोळे, दोन कान, मुख, नाकपुड्या, गुद आणि मूत्रमार्ग ही नऊ स्रोतसे बहिर्मुख असतात. तसेच स्त्रियांमध्ये दोन स्तन आणि योनी अशी तीन स्रोतसे विशेषत्वाने असतात. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">२. अंतर्मुख स्रोतस - ज्या स्रोतसांचे मूळ शरीराच्या आत असते, जी स्रोतसे शरीरावर बाहेर दिसू शकत नाहीत त्यांना अंतर्मुख स्रोतसे म्हणतात. प्राणवह, उदकवह, अन्नवह, सात धातूंची सात स्रोतसे आणि तीन मलांची तीन स्रोतसे अशी एकूण तेरा स्रोतसे अंतर्मुख असतात या सर्व स्रोतसांमध्ये वात, पित्त व कफ हे तिन्ही सातत्याने संचार करत असतात. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">ही अंतर्मुख स्रोतसे शरीराच्या आत असल्याने सहजासहजी पाहता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वरूप कसे असते हे पुढील सूत्रातून सांगितले आहे, </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">स्वधातुसमवर्णानि वृत्तस्थूलान्यणूनि च ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">स्रोतांसि दीर्घाण्याकृता प्रतानसदृशानि च ।। ...चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">स्रोतसे आतून पोकळ असतात. नळीच्या आकाराची असतात. काही स्रोतसे स्थूल तर काही सूक्ष्म, बारीक असतात, काही लांब (दीर्घ) असतात, तर काही वेलीच्या शाखा-उपशाखांप्रमाणे पसरलेली असतात. स्रोतसाचा वर्ण ते ज्या द्रव्याला वाहून नेते त्या द्रव्याच्या वर्णासारखा असतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">जोपर्यंत स्रोतसे आपापल्या द्रव्याचे वहन व्यवस्थित करत असतात तोपर्यंत आरोग्य नीट राहते. मात्र स्रोतसातील द्रव्याची मात्रा वाढली, त्याच्या वहनाचा वेग वाढला किंवा स्रोतसामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा उत्पन्न झाला, सिरांमध्ये ग्रंथी तयार झाली किंवा चुकून एका स्रोतसाचे द्रव्य दुसऱ्या स्रोतसात गेले, तर त्यामुळे स्रोतसांच्या कार्यात दोष उत्पन्न होतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">स्रोतसांमध्ये अशा प्रकारचा बिघाड का होतो हे पुढील सूत्राद्वारा स्पष्ट केले आहे, </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">आहारश्च विहारश्च यः स्यात् दोषगुणैः समः ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">धातुभिर्विगुणश्चापि स्रोतसां स प्रदुषकः ।। ...चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">जो आहार किंवा जे आचरण दोषांच्या गुणाशी समान गुणांनी युक्त असते म्हणजे दोषांना वाढवणारे असते आणि धातूूच्या गुणांना विरोधी असते म्हणजे धातूंना अशक्त करणारा असते तो आहार आणि ते आचरण स्रोतसांमध्ये बिघाडाला कारण ठरत असते. या प्रकारे स्रोतस बिघडण्यामागे सामान्य कारण सांगितलेले असले तरी मुख्य तेरा स्रोतसांना बिघडवणारी विशिष्ट कारणे आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली आहेत. तसेच प्रत्येक स्रोतसाचे मूळ काय, स्रोतसात बिघाड झाला तर शरीरावर काय परिणाम होतो हेही समजावले आहे. याची माहिती आपण पुढच्या वेळी घेणार आहोत.</span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-52284571036539912782016-02-03T17:00:00.000+05:302016-02-03T17:00:11.483+05:30स्रोतस सिद्धांत -1<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000;">एखाद्या तळ्यात कमळदलाचे जाळे इतस्ततः पसरलेले असते किंवा एखादी वेल तिच्या फांद्यांनी सर्वदूर पसरते, त्याप्रमाणे शरीरातही स्रोतसांचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. शरीरात जेथे जेथे रिकामी जागा आहे, अवकाश आहे, जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते, त्या सर्वांना स्रोतस समजले जाते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
‘आयुर्वेद उवाच’ या सदरात आता आपण आयुर्वेदातील ‘स्रोतस’ या सिद्धांताची माहिती घेणार आहोत. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, अष्टांगसंग्रह वगैरे सर्व महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये स्रोतस ही संकल्पना समजावलेली आहे. शरीरातील विविध क्रिया कशा होत असतात आणि शरीरातील विविध संरचनांचा, अवयवांचा परस्परांशी कसा संबंध असतो, दोन शरीरभाव शारीरिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असले तरी कार्यामुळे कसे जोडलेले असतात, अशा अनेक गोष्टी ‘स्रोतस’ सिद्धांतामुळे समजू शकतात. </div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">‘स्रोतस’ शब्दाची निरुक्ती चरकसंहितेत ‘स्रवणात् स्रोतांसि’ अशी केलेली आहे. म्हणजे ज्या मार्गातून सतत काहीतरी स्रवत असते त्याला ‘स्रोतस’ असे म्हणतात. चरकसंहितेमध्ये स्रोतस सिद्धांत पुढील सूत्राद्वारा समजावलेला आहे, </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">यावन्तः पुरुषे मूर्तिमन्तो भावविशेषास्तावन्त एवास्मिन् स्रोतसां प्रकारविशेषाः । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">सर्वे हि भावाः पुरुषान्तरेण स्रोतांसि अभिनिर्वर्तन्ते, क्षयं वा अपि अभिगच्छति । </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">स्रोतांसि खलु परिणामआपद्यमानानां धातूनाम् अभिवाहिनी भवन्ति अयनार्थेन ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">व्यक्तीच्या शरीरात जे जे मूर्तिमंत भावविशेष (म्हणजे आकारमान असणारे शरीरघटक) आहेत तेवढे शरीरात स्रोतसांचे प्रकार आहेत. स्रोतसांशिवाय शरीरातील भाव तयार होऊ शकत नाहीत किंवा क्षीणही पावू शकत नाहीत. शरीरातील सर्व धातू तयार होण्याचे काम; तसेच त्यांचे शरीरात वहन करण्याचे काम स्रोतसांकरवीच होत असते. या सूत्रावरून तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात, </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">१. व्यक्तीच्या शरीरात जेवढे म्हणून भावविशेष (शरीरघटक) आहेत, त्या प्रत्येकाचे आपापले असे एक-एक स्रोतस आहे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">२. शरीरातील कोणत्याही घटकाची उत्पत्ती किंवा क्षय स्रोतसाच्या माध्यमातूनच होत असतो. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">३. धातूंचे परिणमन आणि धातूंचे परिवहनही स्रोतसांच्या माध्यमातून होत असते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">अर्थात शरीरात असंख्य स्रोतसे आहेत, त्यांना संख्येत मोजता येणे अशक्य होय. स्रोतसाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शरीरातील कोणकोणत्या रचनांना स्रोतस म्हणता येते हे चरकसंहितेत पुढील सूत्राद्वारा सांगितलेले आहे, </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">स्रोतांसि, सिराः, धमन्यः रसायन्यः, रसवाहिन्यः, नाड्यः, पन्थानः, मार्गाः, शरीरच्छिद्राणि, संवृतासंवृत्तानि, स्थानानि, आशयाः, निकेताश्चेसि, शरीरधात्ववकाशानां लक्ष्यालक्ष्याणां नामानि भवन्ति। ...चरक विमानस्थान</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">सिरा, धमनी, रस वाहून नेणारी रसायनी, नाडी, पंथ, मार्ग, शरीरछिद्र, एका बाजूला बंद दुसऱ्या बाजूला उघडलेले किंवा दोन्ही बाजूंनी उघडलेले स्थान, आशय, दोन शरीरधातूंमधले डोळ्यांनी दिसणारे किंवा न दिसणारे अवकाश या सर्वांनाच स्रोतसात मोजता येते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">थोडक्यात शरीरात जेथे जेथे रिकामी जागा आहे, अवकाश आहे, जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते त्या सर्वांना स्रोतस समजले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या तळ्यात कमळनालाचे जाळे इतस्ततः पसरलेले असते किंवा ज्याप्रमाणे एखादी वेल तिच्या फांद्यांनी सर्वदूर पसरते, त्याप्रमाणे शरीरातही स्रोतसांचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. फक्त शरीरातील स्रोतसे आतून पोकळ असतात. कारण त्यातून शरीरातील भावपदार्थ वहन करत असतात. अशा प्रकारे वास्तविक शरीरात असंख्य स्रोतसे असतात. तरीही त्यात काही मुख्य स्रोतसे अशी असतात की त्यांना नाव देता येते. चरकसंहितेमध्ये अशी तेरा मुख्य स्रोतसे सांगितलेली आहेत.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"> </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">प्राणोदकान्त-रस-रुधिर-मांसमेदोऽस्थि-मज्ज-शुक्र-मूत्र-पुरीष-स्वेदवहानि इति ।</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">प्राणवह स्रोतस, उदकवह स्रोतस, अन्नवह स्रोतस, रसवह, रक्तवह, मांसवह, मेदोवह, अस्थिवह, मज्जावह, शुक्रवह अशी सात धातूंची सात स्रोतसे, मूत्रवहस्रोतस, पुरीषवह स्रोतस आणि स्वेदवह स्रोतस अशी तेरा स्रोतसे नावाने सांगता येतात. ही स्रोतसे महत्त्वाची का आहेत हे आपण पुढच्या वेळी पाहूया.</span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-78568594379006327082016-02-03T10:21:00.003+05:302016-02-03T10:21:52.079+05:30ताणतणाव<span style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">- डाॅ. ह. वि. सरदेसाई</span><br />
<div id="mvdata" style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<div>
<span style="color: #cc0000;">कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.</span></div>
<div>
<br /></div>
<div>
परिस्थितीत होणारा बदल कमी जास्त प्रमाणात ताण निर्माण करतो. या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेतील त्रुटी तणाव निर्माण करते. हा बदल कधी कधी तुलनेने नगण्यही असू शकतो. कधी तर झालेला किंवा होऊ घातलेला बदल किफायतशीरदेखील असू शकतो (जसे बढती मिळणे व बदली होणे), अशा कोणत्याही बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असण्याने माणसाच्या मनोशारीरिक अस्तित्वात विकार होऊ शकतात. कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.</div>
<div>
<br /></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाचा प्रकार वयोमानानुसार बदलू शकतो. पौगंडावस्थेत आपल्या पालकांच्या अपेक्षा, तारुण्यात वैवाहिक साथीदारांसंबंधीची मिलनोत्सुकता, पुढे कामातील वरिष्ठांशी संबंध, आर्थिक स्वास्थ्य-सुबत्ता मिळण्याची आणि ती कमावण्याकरिता करावी लागणारी धडपड, पुढे वैवाहिक जोडीदाराबरोबर सलोख्याचे स्नेह-संबंध टिकणे, वयस्कर वाड-वडिलांच्या प्रकृतीच्या समस्यांना सांभाळणे, लहान मुलांचे बेशिस्त वागणे, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होताना पाहणे, वार्धक्याबरोबर येणारी शारीरिक आणि आर्थिक तूट, याबरोबर घसरणारी कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि नेहमीच असणारी, परंतु वार्धक्यात विशेषतः जाणीव होत राहणारी मृत्यूची भीती, ही सारी कमी-जास्त प्रमाणात तणाव निर्माण करणारी कारणे प्रत्येक व्यक्तीत असू शकतात. या कारणांना वास्तवात जाणणे, वास्तव स्वीकारणे आणि वास्तवाचा उपभोग घेण्याची क्षमता जोपासणे, हे खऱ्या समृद्ध मनाचे लक्षण होय.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">तणावामुळे व्यक्ती चिंतातुर अथवा खिन्न होऊ शकते. अनेकांना शारीरिक लक्षणे उद्भवतात. काही जणांची वृत्ती समस्यांपासून पलायन करण्याची असते. अशा व्यक्ती मद्यपाशात स्वतःला झुगारून देतात किंवा अतिरेकी खातात व स्थूल बनतात किंवा जुगार, रेस अथवा पत्ते खेळणे, अशा वास्तवातून पलायनाच्या मार्गाला लागतात. बहुतेकांना तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांच्या पुनरावृत्तीचे भय वाटत राहते. (जसे परीक्षा, सभेत भाषण करणे, मुलाखत देणे) काहींना क्रोध येत राहतो (अपेक्षा भंग होणे) काहींना अपराधीपणाची भावना येत राहणे (आपल्या हातून चूक घडली याचा पश्चात्ताप, ‘पाप’ घडल्याची टोचणी) काहींना घडून गेलेल्या घटनेबद्दल शरम वाटत राहते, (आपल्या कृत्यांबद्दल अथवा इतरांनी केलेल्या आपल्या ‘अपमाना’बद्दल) अशी भीती, राग, अपराधीपणाची भावना, लाज वाटणे इत्यादी भावना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रसंग घडताना </span></div>
<div>
<br /></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">निर्माण होतात, त्याचप्रमाणे त्या त्या प्रसंगाच्या आठवणीनेदेखील जशाच्या तशाच निर्माण होतात. या भावनांमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. माणसाची चिडचिड होते, स्वभाव रागीट किंवा चिडका बनतो, अकारण थकवा येतो, लहान सहान गोष्टींनी (आवाजामुळे) दचकावयाला होते आणि आपण तणावाखाली असण्याची जाणीव होते. या तणावामुळे एकाग्रता शक्य होत नाही, मनात विचारांचे वारू बेलगाम संचार करू लागतात, झोपेत व्यत्यय येऊ लागतो (झोप लागण्यास वेळ लागतो, जाग लवकर येते, सारखी जाग येते) अस्वस्थ करणारी स्वप्ने पडू लागतात. आपण आजारी आहोत, या भावनेने व्यक्ती पछाडली जाते, स्वतःला योग्य वाटेल ती औषधे (विनाकारण) घेण्याकडे कल होऊ लागतो. व्यसनाधीनता बळावते. प्रत्यक्ष त्रास होत असल्याने विविध तपासण्यांत फारसा दोष सापडत नाही, याचे नवल वाटू लागते.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">बदलांना स्वीकारताना होणारे त्रास हे ‘चिंतातुर’तेपेक्षा वेगळे असतात, याचे ध्यान ठेवावे. शिवाय, इतर मानसिक आजार किंवा स्वभाव-दोष यांपासूनदेखील या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यातील त्रुटी’ने होणारे दोष वेगळे असतात. काही शारीरिक आजारांबरोबर आलेल्या मानसिक आजारांचीदेखील दखल घेणे आवश्यक असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेतील त्रुटीमुळे होणारे त्रास ती परिस्थिती बदलली (परीक्षा किंवा मुलाखत होऊन गेली) की आपोआप शमतात, तसे मानसिक विकारांचे होत नाही. परिस्थिती स्वीकारली म्हणजे जुळवून घेण्याचा प्रश्न मागे राहात नाही. परिस्थितीत बदल झाल्यावर येणारे विकार होण्यास जबाबदार असणारा परिस्थितीतील बदल न्यायालयांचे समन्स येणे, मिलनोत्सुक प्रेमसंबंधात विधान होणे) ओळखता येतो. साधारणपणे अशा घटनेचे परिणाम जेव्हा सहा महिने होतात, तेव्हा या तणावांना तीव्र प्रकारचे म्हटले जाते आणि जेव्हा जास्त काळ (अथवा कायम) होत राहणारा त्रास हा दीर्घकाळ चालणारा त्रास मानला जातो.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">अशा बदलामुळे आलेल्या घटनांच्या उपचारात विविध प्रकारचे उपाय करणे उपयोगी पडते. सुरवात काही क्रियांपासून करणे इष्ट असते. बरीच माणसे श्वास भरभर घेऊ लागतात; परिणामी, रक्तीतील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, नाक व चेहरा किंवा कान येथेही अशा संवेदना जाणवतात. या संवेदनामुळे व्यक्ती आणखीनच भयभीत होते. शरीरक्रियांच्या अज्ञानातून उद्भवलेल्या भीतीचे निराकरण करून तक्रार लगेच दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला एखाद्या (बंद) कागदाच्या पिशवीत श्वासोच्छवास करावयास सूचना द्याव्यात. थोड्याच श्वसनानंतर मुंग्या येणे थांबेल, भीती जाईल, मग कागदी पिशवी काढावी.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">कोणत्याही कारणाने माणसाने श्वास भराभर घेतला तरी त्याच्या रक्तातील कार्बन-डाय ऑक्साइडचा निचरा होतो. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. शिवाय, काही रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणेही संभवते. आपल्या मेंदूतील टेंपोरल लोब या भागात अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे शक्य होते. परिणामी, त्या व्यक्तीला</span>काही प्रकारचे ‘भास’ होणे शक्य आहे. याची माहिती प्राणायामातील ‘भास्त्रिका’ हा प्रकार करणाऱ्या साधकांना असावी.ज्या व्यक्तींना विशिष्ट बदलांमुळे तणाव येतो याची कल्पना असते किंवा देता आली तर अशा प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे समुपदेशन उपयोगी पडते. तणावांची जाणीव होऊ लागताच शवासनासारखे शरीर सैल करणे व श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचार करण्याकरिता मन मोकळे न ठेवणे याचाही उपयोग होतो. हा एका प्रकारे जागृत मन विचाररहित ठेवण्याचा (ध्यानाचा) प्रयत्न होय.</div>
<div>
<br /></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">काही सामाजिक परिस्थितीचा परिणाम तणाव निर्मितीत होणे शक्य असते. काहींना गर्दीत जाणे नको वाटते, काहींना नव्या ओळखी करून घ्याव्याशा वाटत नाहीत, व्यासपीठावर जाण्याची अकारण भीती काहींना असते, अशा सामाजिक प्रसंगांना ओळखणे महत्त्वाचे ठरते. या प्रसंगांतून बाहेर पडताना सुरवात अगदी माफक (दोन-तीन माणसे) आकड्यापासून सुरवात करून (किंवा तशी कल्पना करून) त्या प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी केली जाते. काही वेळा मोठे बदल करावे लागतात. (उदा. नोकरी बदलणे) परंतु, हे निर्णय पूर्ण विचारांच्या नंतरच घ्यावेत.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">मानसोपचार क्वचितच लागतो; परंतु समुपदेशन उपयोगी पडते. मनाला भविष्यकाळ किंवा भूतकाळांतील घटनांच्या विचारांत गुंतण्याची सवय लागलेली असते. त्याऐवजी मनाला वर्तमानकाळात आणि आताच्या परिस्थितीत राहण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते. चिंता ही नेहमीच भवितव्याशी संबंधित तर अपराधीपणा हा नेहमीच भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतो, याची जाणीव ठेवावी.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">काही औषधांचा वापरदेखील उपयोगी ठरतो. अर्थात, कोणत्याही औषधांचा वापर त्या संबंधात ज्ञान आणि वापरण्याचा अनुभव असणाऱ्या (डॉक्टर) व्यक्तीनेच करावा. पूर्वी आपल्याला बरे वाटले होते, हा अनुभव किंवा केवळ सद्हेतूने सुचविलेले औषध घेणे केवळ निरुपयोगीच नव्हे, तर अपायकारकही ठरू शकते, याचीदेखील जाणीव असावी. अनेक औषधांना नको असणारे परिणाम असतात, कधी कधी हे नको असणारे परिणाम गंभीर परिणाम करू शकतात, घातकही ठरू शकतात. यासंबंधात अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या एका शोध-निबंधातील माहिती दखलपात्र आहे. सलग दाखल झालेल्या सहाशे रुग्णांना ‘उपचाराचा’ झालेला त्रास अभ्यासला गेला तेव्हा असे आढळले की, या ६०० पैकी २९० रुग्णांना उपचारांचा काहींना काही त्रास झाला. यापैकी ७७ रुग्णांना गंभीर दुखणे झाले, तर १५ रुग्ण त्यांच्या आजारांनी नव्हे, तर उपचारांच्या दुष्परिणामांनी दगावले! लोरॅझिपॅम ०.५ ते १.० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा असे उपयोगी पडणारे औषध डॉक्टरांच्या नजरेखाली मर्यादित काळापुरते फायदेशीर ठरू शकते.</span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;">सहसा योग्य समुपदेशन व रुग्णाला आजाराच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन भीती घालविण्याने बरेच रुग्ण बरे होतात. उशिरा केलेले किंवा चुकीचे उपचार, आजार रेंगाळवतात व दीर्घकाळ चालू राहिलेले आजार एकदा जुनाट झाले की बरे होणे कठीण होते.</span></div>
<div>
<br /></div>
</div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-2300435336278007592016-02-03T10:20:00.004+05:302016-02-03T10:20:53.543+05:30खिन्नता<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
- डॉ. ह. वि. सरदेसाई</div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000;">एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
आपल्या ‘फॅमिली डॉक्टर’कडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांपैकी तीस टक्के रुग्णांच्या तक्रारींचा उगम ‘खिन्नते’तून येतो. आपल्या जनुकीय रचनेवर मेंदूच्या पेशींच्या दळणवळणाचे कार्य अहोरात्र चालू असते. हे दळणवळण ज्या रासायनिक रेणूंमार्फत घडते, त्या रेणूंना न्यूरो-ट्रान्समिटर्स म्हणतात. हे रेणू विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला, विशिष्ट प्रमाणात निर्माण होणे आणि विशिष्ट वेळांत त्यांचा निचरा होणे आवश्यक असते. तसे झाले तरच मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालू शकते. भावना, विचार आणि अनुभवांची स्मृती योग्य प्रकारे होण्याकरता या कार्याची योग्य प्रकारे कार्यवाही आवश्यक असते. या व्यवस्थेवर आपल्या जनुकीय रचनेचा मोठा ताबा असतो. कोणती भावना, कोणत्या वेळी, कोणत्या प्रमाणात निर्माण व्हावी हे या कार्यावर ठरत राहते.</div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">जनुकीय रचनेप्रमाणे, वाढीच्या वयातील अनुभव आणि समस्या यांचादेखील या रसायनांच्या निर्मितीवर परिणाम होत राहतो. काही व्यक्तिमत्त्वातील दोष (समाजाचे स्थैर्य विसकटण्यास जबाबदार असे वागणे ः कायदे न पालणे, इतरांना शारीरिक इजा करण्याकडे प्रवृत्ती असणे, जबाबदारीची जाणीव नसणे) प्रकट होऊ लागतात. या पेक्षाही आई-वडिलांचा विवाह-विच्छेद किंवा वडिलांचे अर्थाजन बंद पडणे या अनुभवांचे दुष्परिणाम होतात. अशा मुलांमध्ये अनेक शारीरिक तक्रारी येतात; परंतु कोणताही आजार आढळून येत नाही. एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">खिन्नतेने ग्रासलेल्या व्यक्तीला किमान चार प्रकारचे त्रास जाणवू लागतात. १) खिन्नतेची, बरे वाटत नसल्याची भावना आणि परिस्थितीला जुळवून घेण्यातील क्षमतेची त्रुटी, २) खिन्नतेमुळे होणारे आजार, ३) खिन्नता आणि उन्माद यांच्या परिक्रमा आणि ४) आजार आणि उपचार यांच्यातून निर्माण झालेले त्रास, नको असणारे दुष्परिणाम, आजाराला होणारे प्रतिसाद.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">१) परिस्थितीत घडलेल्या घटनेला प्रतिसाद म्हणून येणारी खिन्नता. प्रिय व्यक्तीचा विरह अथवा मृत्यू, विवाहविच्छेद, आर्थिक नुकसान, सामाजिक (अथवा कौटुंबिक) आदर गमावणे. अशा घटना घटताना राग येतो, नंतर अपराधीपणाची भावना बळावते. घटना घडल्यावर तीन महिन्यांच्या आंत त्रास होतो. आपले दैनंदिन कार्य करताना अडचणी जाणवू लागतात. थोडेफार वाईट वाटत राहते. चिंता येत राहते. स्वभाव चिडका बनतो. एकाग्रता जमत नाही. काहीही कार्य करण्याबद्दल आत्मविश्वास डळमळू लागतो आणि खिन्नतेच्या भावनेच्या जोडीला विविध शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. (पुढे पहावे).</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">२) मोठ्या प्रमाणात खिन्नतेचे परिणाम ः कोणत्याही बाबीत रस घ्यावासा वाटेनासा होतो. कशाचाही आनंद होत नाही. सगळ्या गोष्टींतून निवृत्त व्हावे ही भावना बळावते. आपले सगळे निर्णय चुकले आहेत, अशी अपराधीभावना येत राहते. मन एकाग्र होऊ शकत नाही. सतत थकवा वाटत राहतो. आता आपली काही किंमत राहिलेली नाही, असे वाटते. ज्या तक्रारींची कारणे सापडू शकत नाहीत, अशा विविध शारीरिक तक्रारी सतत येत राहतात. लैंगिक विषयात आणि संबंधातील रस लोपतो. मृत्यूचे विचार थैमान घालतात. कधी कधी या विचारांचे रूपांतर आचारात (आत्महत्या करण्यात) होऊ शकते. (परीक्षेत किंवा प्रेमात अपयश, आर्थिक नुकसान, प्रिय व्यक्तीचा मृत्यू) यातील बऱ्याच तक्रारी, विशेषतः थकवा, दिवसाच्या सुरवातीला (सकाळी) अधिक जाणवतात. झोपेत व्यत्यय येतो, सहसा भल्या पहाटेच जाग येते व तेव्हा मन खिन्न असते. भूक लागेनाशी होते. वजन कमी होऊ लागते, मलावरोध (शौच्याला घट्ट होणे, मल बाहेर पडण्यात अडचण जाणवणे) बळावतो. एखाद्या रुग्णाला खूप अस्वास्थ्य जाणवते व वास्तवाला अनुरूप नसणारे विचार आणि आजार होऊ लागताच. असा प्रकार वयस्कर रुग्णात अधिक प्रमाणात आढळतो. शंकेखोर प्रवृत्ती वाढते. ‘आपल्याबद्दल माणसे बोलतात, आपल्यामागे आपल्याला नावे ठेवतात’ असे विचार येतात. ‘आपल्याला कॅन्सरसारखा एखादा मोठा आजार झाला आहे’ हा विचार पिच्छा सोडत नाही. काही रुग्णात खूप झोप येऊ लागते, खादाडपणा वाढतो, थकवा असतो; परंतु एखादी बातमी ऐकून खूप उत्साहित होतात. काही रुग्णांना ऋतुमानानुसार आजार दिसू लागतात. या प्रकाराला SAD (Seasonal Affeclive Disorder) म्हणतात. ज्या देशात (अथवा प्रदेशात) हिवाळ्यात दिवस खूपच लहान असतो, तेथे हे आजार अधिक प्रमाणात आढळतात. या रुग्णांना कर्बोदके (साखर, भात, बटाटा) खाण्याची इच्छा बळावते. उत्साह वाटेनासा होतो. खा खा सुटते व झोप पुरेनाशी होते. काही गर्भवती स्त्रियांना बाळंतपणानंतर तीन आठवडे ते सहा महिन्यांनी खिन्नतेचा मोठा विकार जडतो. माफक प्रमाणात थकवा आणि खिन्नता अनेक स्त्रियांना (८० टक्के) बाळंतपणानंतर जाणवू शकतो. दहा ते पंधरा टक्के या नव-मातांना मोठ्या प्रमाणात खिन्नतेचा आजार होऊ शकतो. आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल अतिरेकी चिंता निर्माण होते. या माताना झोप लागत नाही. वागण्यात अतिरेकी चिंता किंवा अविश्वास दाखविला जाऊ लागतो. वेळीच उपचार आवश्यक असतात.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">काही खिन्न व्यक्ती सतत थकलेल्या, निरुत्साही, सर्व कार्यांतून अंग काढून घेणाऱ्या असतात. असा आजार एक-दोन वर्षे चालतो. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी खिन्नतेने पछाडले जाते, तर काहींना मासिक पाळी येण्यापूर्वीचे दोन आठवडे खिन्नतेचे त्रास होऊ शकतात.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">३) उन्माद आणि खिन्नता यांच्या परिक्रमा येणे हा एक स्वतंत्र आजारच मानला जातो. आजाराच्या नावाप्रमाणे रुग्णाला उन्मादाचे आणि खिन्नतेचे आलटून-पालटून झटके येतात. उन्मादाच्या स्थितीत रुग्ण अस्वस्थ आणि बेचैन असतो, त्याला स्वस्थ बसवत नाही. जे डोक्यात विचार येतात, त्यांत अतिरेकी उत्साहाने भाग घेतला जातो, चटकन राग येतो. कल्पनांच्या भराऱ्या सुरू होतात. कोणत्याही एका विचारावर किंवा कामांत दीर्घकाळ रस राहत नाही, थोडीच झोप पुरते. या वैचारिक आणि भावनात्मक भराऱ्यांचे ऐकणाऱ्याला सुरवातीला कौतुक वाटते, पण काही वेळातच सारखे बदलणारे विचार, इतरांचा दृष्टिकोन स्वीकारण्यातील त्रुटी, मधून-अधून येणारा थकवा आणि स्वभावातील स्वतःच्या विचारांबद्दलचा भंपक मोठेपणा या अवगुणांची ओळख पटल्यावर ‘नको यांची संगती’ असा विचार मित्रांत फैलावू लागतो. </span>स्वभाव अतिरेकी खर्चिक बनतो. ‘नोकरीवर लाथ मारीन’ अशा विचाराने वारंवार त्यागपत्र देऊन मागून पश्चात्तापाची पाळी येते. लग्न घाईत ठरविणे, उरकणे, विवाहबाह्य लैंगिक संबंध जोपासणे, मोठेपणाच्या फुशारक्या मारणे अशा वागण्याने कुटुंबीय व स्नेही कंटाळून जातात. दीर्घकाळ मैत्री जोपासणे किंवा स्थिर, सुखी संसार करणे क्वचितच जमते. सामान्यपणे उन्मादाचा काळ हा खिन्नतेच्या काळापेक्षा कमी लांबीचा असतो.</div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">याच प्रकारात ‘सायक्लो थायमिक डिसॉर्डर्स’ नावाने ओळखला जाणारा एक भाग असतो. या व्यक्ती सतत काही वेळा खिन्नता तर काही वेळा थोड्या प्रमाणात उन्माद अशा आलटून-पालटून असतात. या व्यक्तींचे वर्णन पुढील श्लोकात चांगले आहे - ‘‘क्षणे तुष्ट - क्षणे रुष्टा - तुष्टा रुष्टा - क्षणे क्षणे। अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयंकर (लोकोक्ती) (अर्थ - क्षणात समाधान पावणारा तर क्षणात रागावणारा. क्षणाक्षणात रागावणारा तर कधी हसणारा अशा अस्थिर चित्ताच्या माणसाची कृपी ही भयंकर हानिकारक असते. अर्थात् क्षणा-क्षणाला हा अतिशयोक्तीचा भाग आहे. सायक्लो थायमिक डिसऑर्डरमध्ये प्रत्येक भावना साधारण दोन वर्षे राहते!</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">४) आजारांना प्रतिसाद अथवा रासायनिक रेणूंना (औषधांना) प्रतिसाद म्हणून घेणारी खिन्नता बहुतेक सर्व. सौम्य अथवा गंभीर विकारांना आपले अस्तित्व ‘खिन्नता’ अथवा ‘चिंता’ या स्वरूपात प्रतिसाद देतेच. हृदयविकार, पक्षाघात, दीर्घकाळ चालणारे संधिवातासारखे आजार आले म्हणजे खिन्नता येतेच. कॅन्सर झाला आहे, ही बातमी धक्कादायक, चिंताजनक आणि खिन्नता निर्माण करणारी असते. रजोनिवृत्ती संबंधात वर उल्लेख आलेला आहेच. मद्यपान हे खिन्नतेचे आणि आत्मघाताचे महत्त्वाचे कारण असते. ब्लडप्रेशर ताब्यात ठेवण्याकरता एकेकाळी रेसर्पित नावाचे औषध वापरले जाई, त्याने अनेकांना खिन्नता येई. कॉर्टिकोस्टेरॉईडस् आणि गर्भ-प्रतिबंधक गोळ्यांच्या वापराने देखील खिन्नता येते. सध्या ब्लडप्रेशर ताब्यात आणण्याकरता वापरत असणाऱ्या मिथाईल डोपा आणि क्लोनिडीन या औषधांच्या वापरात खिन्नता येणे हा एक नको असणारा आहे.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">हृदयविकारात वापरले जाणारे डिजिटॅलिस हे जगत्विख्यात औषध आणि पार्किन्सन्स डिसीनमध्ये वापरले जाणारे लिव्हीडोपा हे औषध घेणाऱ्यांना डिप्रेशन येते. नेहमीच्या वापरातील औषधांपैकी बीटा ब्लॉकर्स प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतली तर खिन्नता येऊ शकते. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी रुग्णाला खिन्नता येण्याचा पूर्व-इतिहास असला तर खात्री करून घेणेच इष्ट असते.</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">खिन्नता हा विकार अनेकांना असतो व त्याचे परिणाम अनेक प्रकारचे असतात, याची कल्पना समाजाला, रुग्णांना आणि डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. विशेषतः थकवा, निरुत्साह, निद्रानाश, भूक न लागणे, वजन कमी होणे, मलावरोध असे वरपांगी शारीरिक दुखणे खिन्नतेमुळे असण्याची शक्यता कधीही नजरेआड होऊ देता कामा नये.</span></div>
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-6700885103336522242016-02-03T03:30:00.000+05:302016-02-03T10:42:08.554+05:30आरोग्यासाठी प्रसन्न मन -1<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="color: #cc0000;">ज्याला आपण मन म्हणतो त्याचे केंद्र हे फक्त मेंदूपुरते मर्यादित आहे का? ज्याअर्थी मनाचा अंमल सर्व शरीरावर असतो त्याअर्थी मन प्रत्येक पेशीत असतेच. माझे मन कशावर तरी बसलेले आहे, माझे मन कशावर तरी जडले आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मन मेंदूपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी झालेली असते. मनाची व्याप्ती एवढी छोटी नसते, की ते एका ठिकाणी बसले, की दुसऱ्या ठिकाणी त्याचे कार्य चालत नाही. मन ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीने कार्य करण्याची शक्ती प्रत्येक पेशीत असते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियात पण मन असते. आणि त्याचा वापर करून इंद्रियावर जरी बाहेरून बंधन घातले तरी कार्य करत राहते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">‘मला सगळे कळते’ असे ज्या वेळी माणसाला वाटते, निदान एखाद्या विषयात तरी मी संपूर्ण ज्ञानी आहे (उदा. मला रोगांचे व औषधांचे सर्व कळते असे डॉक्टरला वाटते, मला सर्व तांत्रिक कळते असे इंजिनिअरला वाटते, मला संगीतातील सर्व कळते असे संगीतकाराला वाटते) आणि तो स्वतःला मोठे समजतो, त्या वेळी त्याला सम्यक ज्ञान मिळू शकत नाही. सम्यक ज्ञान मिळवण्याची त्याची तयारी नसते. मनुष्य स्वतःला मी मोठा असे समजतो, त्यातून अहंकार उत्पन्न होतो, त्यातून मान-अपमान तयार होतो, एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे न झाल्यास उत्पन्न होणाऱ्या त्राग्यामुळे राग, क्रोध तयार होतात व यामुळे बेशुद्धी येते. या ऐवजी मनुष्याने गुरूंचे - ज्ञानाचे व अभ्यासाचे मार्गदर्शन घेतले तर तो योग्य मार्गाने आत्मानंदापर्यंत पोचू शकतो. म्हणूनच ‘सद्गुरुवाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी’ असे म्हटलेले आहे. पाय का धरायचे, तर सद्गुरूंच्या डोक्यावर बसायचे नसते, कुठल्याही प्रकारे आव्हान करून, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे वाद करून त्यांना निःशब्द करण्याचा किंवा माझे तेच खरे असे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नसतो. गुरूंची कधीही निंदा करायची नसते तर त्याऐवजी त्यांच्या पायाकडे लक्ष</span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">ठेवायचे असते, म्हणजे त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जायचे असते. ‘मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही’ असे जे म्हटलेले आहे ते यासाठीच. गुरूंचा चेहरा व्यवहारात वेगवेगळा दिसला तरी आतमध्ये गुरूतत्त्व एकच असते. या गुरूतत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली बुद्धीचा वापर होऊ शकतो. शेवटी गुरू काय किंवा तुमची अंतरबुद्धी काय, दोन्ही केवळ रस्ता दाखवण्याचे काम करतात; चालावे लागते स्वतः व्यक्तीलाच, म्हणजे शेवटी इंद्रियांचेच व्यापार चालतात. त्या बुद्धीच्या वापरानंतर मनावर ताबा मिळून इंद्रियविजय मिळविणे सोपे होते. इंद्रिये ताब्यात आल्यावर मन प्रसन्नता मिळून शक्ती मिळेल, रोगनिवारणही होऊ शकेल. मनाचे आरोग्य आले की, पाठोपाठ शरीराचे आरोग्य येऊ शकते. तेव्हा मन प्रसन्नतेच्या मार्गाने गेले तर आपल्याला शारीरिक आरोग्यही मिळू शकते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">शेवटी पुन्हा मुद्दा इंद्रियांवरच येऊन थांबला आहे. इंद्रिये शारीरिक पातळीवर असतात, इंद्रियांचे व्यवहार आपल्याला समजू शकतात, कळू शकतात. इंद्रियांचे व्यवहार त्या त्या विषयापुरते, त्या त्या क्षेत्रापुरते चालतात. इंद्रियांना त्यांचे काम करू द्यायचे की थांबवायचे यासाठी व्यवस्था असते. मन प्रसन्नतेतील अडथळे शोधत असताना आपण पुन्हा इंद्रियनिग्रहापर्यंत म्हणजेच इंद्रियांच्या व्यवस्थापनापर्यंत किंवा त्यांच्या अनुशासनापर्यंत येऊन पोचतो. डोळे मिटून घेता येतात, म्हणजे इंद्रियांचे व्यवहार थांबवता येतात किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते असे आपण समजतो. डोळे बंद करून घेतले तरी डोळ्यांचे आंतरेंद्रिय, विषय पाहिलेला नसताना, आतल्या आत कल्पना करत असते व तो विचार मनापर्यंत पोचवते. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसल्यामुळे साहजिकच मन स्वस्थ राहात नाही. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">ज्याला आपण मन म्हणतो त्याचे केंद्र मन हे फक्त मेंदूपुरते मर्यादित आहे का? ज्याअर्थी मनाचा अंमल सर्व शरीरावर असतो त्याअर्थी मन प्रत्येक पेशीत असतेच. माझे मन कशावर तरी बसलेले आहे, माझे मन कशावर तरी जडले आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मन मेंदूपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी झालेली असते. मनाची व्याप्ती एवढी छोटी नसते की, ते एका ठिकाणी बसले की, दुसऱ्या ठिकाणी त्याचे कार्य चालत नाही. मन ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीने कार्य करण्यची शक्ती प्रत्येक पेशीत असते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियात पण मन असते. आणि त्याचा वापर करून इंद्रियावर जरी बाहेरून बंधन घातले तरी कार्य करत राहते. उदा- डोळे मिटून घेतले तरी त्यातले मन डोळ्यांच्या विषयाविषयी चिंतन करून नको नको ते सत्य नसलेले किंवा काल्पनिक विचार तयार करून त्याभोवती चिंतन करत राहते. हीच खरी अडचण आहे. डोळे मिटून बसले तरी आत चिंतन चालूच राहते, कान बंद केले तरी आपण विचार ‘ऐकत’ राहतो. काही न खाता उपवास करायचा ठरविला तरी काही तरी बहाणा शोधून ‘हे चालेल, ते चालेल’ असे ठरवून खाल्ले जाते. ‘हे खाल्ल्याने मला बरे वाटेल, ते खाल्ल्याने बरे वाटेल, उपवास असल्यामुळे आज अमुक गोष्ट मी खाल्ली नाही तरी उद्या मात्र नक्की खाणार. हा उपवासाचा दिवस कधी संपेल आणि मी भरपूर पोटभर केव्हा खाईन’ वगैरे विचारसुद्धा खाण्याच्या इंद्रियाचेच आहेत. यौवन इंद्रियेसुद्धा मैथुनाविषयी वेगवेगळ्या कल्पना रंगवत राहतात. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">असे सर्व विचार इंद्रियांवर निग्रह केल्यावरही येत राहिलेले असतात, म्हणजे खरे पाहता इंद्रियांचे काम चालू राहिलेलेच असते. या सगळ्यामुळे सम्यक मनाला विचारांना बुद्धीच्या प्रभावाखाली आणून प्रत्यक्ष ज्ञान करून घेऊन मेंदूपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यास वावच मिळत नाही. तेव्हा मनाला आवरण्यासाठी, इंद्रियांना आवरण्यासाठी बुद्धी हा एकमेव आधार शिल्लक राहतो. म्हणून बुद्ध केव्हा अवतार घेऊन येतील, श्रीकृष्णांनी म्हटल्यानुसार ते केव्हा अवतार घेतील व आम्हाला मदत करतील याची वाट सामान्यजन वर्षानुवर्षे पाहात राहतात. ‘तुझे आहे तुझपाशी’ किंवा ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ असे जे म्हटले जाते त्याचा अर्थ असा की, प्रत्येकाजवळ त्याच्या आतच आयुष्याला चांगली दिशा दाखवून आनंद मिळविण्यासाठीची बुद्धी असतेच; मिळविलेल्या बुद्धीचा उपयोग करून घेणे प्रत्येकाच्या हातात असते आणि त्यातून ‘नर से नारायण’ स्वतःलाच व्हावे लागते. </span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana; font-size: 15px; line-height: 25px;">
<span style="font-family: Mangal, Verdana;">अनुभवातून तावून सुलाखून निघालेली बुद्धी म्हणजे ज्ञान. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी पुस्तकात असतात, पण ते ‘ज्ञान’ नसते ती ‘माहिती’ असते. या माहितीचा वापर करणारे धाडशी व नशिबवान असतात व त्यांनी मिळविलेल्या अनुभवाला ज्ञान म्हणता येते. अशा अनुभवी व्यक्तीकडून चांगल्या-वाईटाचे मार्गदर्शन बुद्धीमार्फत करून घेणे हाच शेवटचा उपाय दिसतो. </span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><br /></span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-65645147588647180552015-07-17T12:06:00.002+05:302015-07-17T12:06:17.537+05:30 शरीराचे घड्याळ <a href="" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" class="irc_mut" height="280" src="" style="margin-top: 57px;" width="285" /></a><span style="color: #cc0000; font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">भौतिक
प्रगतीच्या मागे धावणाऱ्यांना निसर्ग माफ करत नाही. निसर्ग माणसाला
त्याच्या चुकीची नेहमीच शिक्षा देत असतो. गगनचुंबी इमारती बांधल्यावर तेथे
साहजिकच सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे त्यात राहणाऱ्यांना
सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकत नाहीत. अशा ठिकाणी भर दुपारी बारा वाजता
सूर्यप्रकाश आला, तरी यात राहणारी मंडळी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून
वंचित राहतात. एकंदर मनुष्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश दिसणे आवश्यक
आहे. त्यामुळे शरीराच्या घड्याळाला ट्युनिंग होत राहते. सूर्य जसजसा आकाशात
सरकतो तसे शरीराचे घड्याळ चालू राहते. जेथे विज्ञान प्रगत झालेले आहे अशा
देशांमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस का होईना
बागबगीचांमध्ये जाणे, उपवनांमध्ये सगळ्यांनी जमणे अशा तऱ्हेचे उपक्रम
मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत, तसेच सूर्यकिरणांतील नीलतरंग पण
आरोग्यासाठी उपयुक्त असतात हे लक्षात आले आहे.</span></span><br />
<div>
<br />डॉ. श्री. बालाजी तांबे</div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">मनुष्याला
काळाचे भान कसे झाले? एक तर बाह्यवातावरणात झालेल्या बदलांमुळे किंवा
दुसरे स्वतःच्या आत आलेल्या अनुभवांमुळे. बाहेरचा बदल सर्वप्रथम दोन
प्रकारे लक्षात आला. बाहेर एक तर प्रकाश आहे किंवा अंधार आहे हे लक्षात
आले. त्यामुळे दिवस व रात्र हे काळाचे दोन मोठे विभाग लक्षात आले.
शरीराच्या आत अनुभवाला येणाऱ्या बदलांमध्ये भूक लागणे व मलविसर्जन
प्रवृत्ती होणे या दोन उलट-सुलट क्रिया लक्षात आल्या. हेही लक्षात आले, की
प्रकाश देणारा व बाह्यवातावरणाचे भान करून देणारा आकाशातील भानू - सूर्य
नियमाने उगवतो व मावळतो. बाह्य वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार शरीरात काय
बदल होतात हे मनुष्याच्या लक्षात आले. बाह्य वातावरणातील उष्णतेमुळे
होणाऱ्या बदलामुळे वारा जोरात वाहू लागतो किंवा थांबतो आणि एका चक्राची
सुरवात होते हेही लक्षात आले. शरीरावर या सर्व बाह्य वातावरणाचा मुख्य
म्हणजे सूर्याचा परिणाम होऊन शरीराचेही एक घड्याळ तयार होते. या घडाळाचा
अभ्यास करून आयुर्वेदाने पंचमहाभूतांची चालणारी कार्ये, त्यांचे अपापसांतील
संबंध व त्यातून सर्व वस्तुजातावर विशेष परिणाम कसा घडतो हे दाखवून दिले.
या परिणामांचा अभ्यास करून वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष निसर्गात व शरीरात
क्रमाने कसे वाढतात हे लक्षात घेतले, उदा. वसंत ऋतूत हलकी उष्णता वाढते,
त्यानंतर ग्रीष्म ऋतूत कडक उन्हाळा सुरू होतो, हेमंत ऋतूत हलकी थंडी पडते व
नंतर येणाऱ्या शिशिर ऋतूत कडक थंडी पडते वगैरे. या ऋतूंचा शरीरावर परिणाम
होत असतो, उदा. शिशिर ऋतूत कफ साठू लागतो व वसंतात त्याचा प्रकोप होतो;
ग्रीष्मात वात साठतो, तर नंतर येणाऱ्या वर्षा ऋतूंत वाताचा प्रकोप होतो
वगैरे. अशा प्रकारे तीन दोषांत होणारे सहा बदल लक्षात घेऊन काळ सहा
ऋतूंमध्ये विभागला आहे हे लक्षात येते. हे ऋतुचक्र व दिवस-रात्रीचे चक्र
पुन्हा पुन्हा चालते हे मनुष्याच्या लक्षात आले. सहा ऋतू एकानंतर एक परत
परत येतात हे लक्षात आल्यावर वर्षाची संकल्पना लक्षात आली. हा सर्व अनुभव
सर्वसामान्यांना येण्यासारखा होता. त्यासाठी फार मोठ्या संशोधनाची गरज
नव्हती.</span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">तात्पर्य
हे, की मनुष्याच्या शरीरावर बाह्य वातावरणातील उष्णतेचा, सूर्यप्रकाशाचा
परिणाम होतो व त्यातून त्याचे जन्म-मरणाचे चक्रही उत्पन्न होते. काळानुसार
शरीरात अनेक बदल होत असतात, तसेच कालानुसार जन्म-मरणाच्या चक्रातही बदल होत
असतात. </span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">मनुष्याला
सूर्याचे महत्त्व पटल्यामुळे ‘भास्कराय नमः’ ही प्रथम प्रार्थना त्याच्या
तोंडून बाहेर पडली. जो सर्वांना ज्ञान देतो व ज्याच्यावर सगळ्या जगाचे
अस्तित्व अवलंबून आहे अशा तेज देणाऱ्या, तेजाचे अनुभव देणाऱ्या सूर्याला
देवत्व बहाल केले. हा रोज नियमाने उगवणारा सूर्य सर्वांना मदत करतो,
त्यामुळे त्याला मित्र असेही म्हटले जाऊ लागले. तो जणू आकाशात उडणारा पक्षी
आहे म्हणून त्याला खग म्हटले जाऊ लागले. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग,
पूष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क, भास्कर अशी सूर्याची बारा
नावे घेऊन सकाळी सूर्यनमस्कार घातले जाऊ लागले. आरोग्यासाठी, चांगल्या
जीवनासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि ज्ञानाच्या समाधानासाठी हा पहिला योगप्रकार
मनुष्याच्या जीवनात सहजरीत्या अंतर्भूत झाला. आरोग्यासाठी सूर्यप्रकाशाची,
सूर्यकिरणांची अत्यंत आवश्यकता असते हे आता सर्व जगाला पटलेले आहे. </span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">शरीराचे
घड्याळ वेळच्या वेळी चालले नाही तर शरीराचे आरोग्य नीट राहणार नाही हे
लहान मुलालाही कळते. भूक लागल्यानंतर अगदी तान्हे मूलही कसे आकांत करते हे
प्रत्येक आईच्या अनुभवाचे असते. भूक लागल्यानंतर शरीराची प्रत्येक पेशी
अशाच प्रकारे आकांत करते. ती वेळ सांभाळली गेली नाही, शरीराचे घड्याळ
सांभाळले नाही तर रोगोत्पत्ती होते. त्यात एक मोठी अडचण अशी दिसून आली, की
प्रत्यक्ष सूर्यप्रकाश अंगावर आल्यावर शरीरात काही विशेष जीवनसत्त्वे तयार
होतात. त्यामुळे सतत बंद खोलीत राहणाऱ्यांच्या व सतत विजेच्या दिव्यांमध्ये
बसून काम करणाऱ्यांच्या आरोग्यात बदल व्हायला लागतात व आजारपण वाढायला
लागते. मनुष्याने मोठा गुन्हा केला तर त्याला सर्वप्रथम अंधारकोठडीत टाकले
जाते म्हणजे त्याला इतर लोकांपासून व सूर्यप्रकाशापासून तोडले जाते,
जेणेकरून त्याला काळाचे भान राहणार नाही. </span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">भौतिक
प्रगतीच्या मागे धावणाऱ्यांना निसर्ग माफ करत नाही. निसर्ग माणसाला
त्याच्या चुकीची नेहमीच शिक्षा देत असतो. गगनचुंबी इमारती बांधल्यावर तेथे
साहजिकच सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे त्यात राहणाऱ्यांना
सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकत नाहीत. अशा ठिकाणी भर दुपारी बारा वाजता
सूर्यप्रकाश आला, तरी यात राहणारी मंडळी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून
वंचित राहतात. एकंदर मनुष्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश दिसणे आवश्यक
आहे. त्यामुळे शरीराच्या घड्याळाला ट्युनिंग होत राहते. सूर्य जसजसा आकाशात
सरकतो तसे शरीराचे घड्याळ चालू राहते. जेथे विज्ञान प्रगत झालेले आहे अशा
देशांमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस का होईना
बागबगीचांमध्ये जाणे, उपवनांमध्ये सगळ्यांनी जमणे अशा तऱ्हेचे उपक्रम
मोठ्या प्रमाणावर केले सुरू होत आहेत, तसेच सूर्यकिरणांतील नीलतरंग पण
आरोग्यासाठी उपयुक्त असतात हे लक्षात आले आहे. </span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">प्राचीन
भारतीय संस्कृतीतही उपवनांमध्ये जमणे, वृक्षपूजा करणे, सकाळी सूर्याला
अर्घ्य देणे अशा पद्धती रूढ होत्या. तसे पाहता, सूर्य हा
पावसा-पाण्यासाठीही जबाबदार असतो. आपण सर्वांना पुन्हा सूर्यप्रकाशात येऊन
आरोग्य, ऐश्वर्य व समाधान मिळण्याच्या हेतूने फूल ना फुलाची पाकळी म्हणून
सूर्याला पळीभर अर्घ्य देण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे.</span></span></div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-72339563841533198682015-07-17T12:03:00.002+05:302015-07-17T12:03:45.423+05:30निसर्गचक्र आणि दिनचर्या <a href="http://thumbs.dreamstime.com/t/mount-fersman-khibiny-26673193.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" class="irc_mi" height="160" src="http://thumbs.dreamstime.com/t/mount-fersman-khibiny-26673193.jpg" style="margin-top: 117px;" width="240" /></a><span style="color: #cc0000; font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"> </span></span>डॉ. श्री. बालाजी तांबे<br />
<span style="color: #cc0000; font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">वयानुसारही
शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग
केलेले आहेत... बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था! बाल्यावस्थेत
स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे
अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्यप्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ
बनविण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण
बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा
यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात
संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर
होऊ शकतो.</span></span><br />
<div>
<span style="color: #cc0000; font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;">- डॉ. श्री बालाजी तांबे</span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-family: Mangal, Verdana;"><div style="font-size: 15px; line-height: 25px;">
कोणतेही
काम वेळेवर केले की चांगल्या प्रकारे होते आणि नंतर होणारा मनस्ताप टाळता
येतो, हा आपल्या सर्वांचा रोजचा अनुभव असतो. उदा. विजेचे किंवा टेलिफोनचे
बिल भरायचे असले तर दिलेल्या अंतिम तारखेच्या आत ते भरणे सयुक्तिक असते.
तारीख उलटून गेली तर दंड भरावा लागतो, फारच उशीर झाला तर घर अंधारात बुडू
शकते. अगदी असेच आपल्या शरीराच्या बाबतीतही असते. चौरचौघांमध्ये किंवा
समाजामध्ये कसे वागावे, बोलावे हे आपल्या सर्वांना माहिती असते. पण
स्वतःच्या आरोग्यासाठी शरीराकडून कोणत्या वेळी काय करून घ्यायला हवे,
हेसुद्धा समजून घ्यायला हवे. </div>
<div style="font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div style="font-size: 15px; line-height: 25px;">
याचसाठी
आयुर्वेदाने ‘दिनचर्या’ ही संकल्पना समजावलेली आहे. दररोज सकाळी
उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. त्या वेळेवर
केल्या तर त्या सहजतेने होतात, शिवाय चांगल्या प्रकारे होतात आणि सर्वांत
महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. कोणत्या
वेळी काय काम करावे, हे निसर्गचक्रानुसार ठरवले जाते. उदा. पहाटे सूर्योदय
होतो त्या वेळी किंवा त्याच्या आधीच उठणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते.
रात्री वेळेवर झोपले व रात्री शांत झोप लागलेली असली तर सकाळी लवकर उठणे
सोपे असते. </div>
<div style="font-size: 15px; line-height: 25px;">
<br /></div>
<div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">एकदा सूर्य वर आला आणि अंगात आळस भरला की उठता उठवत नाही, शिवाय उठल्यावर उत्साह वाटत नाही, हा अनुभव सर्वांचा असतो. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">निसर्ग व शरीर यांचे हे समांतर रीतीने चालणारे चक्र पुढील सूत्रातून समजावलेले आहे,</span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">वयोऽहोरात्रिभुक्तानां तेऽन्तमध्यादिगाः क्रमात् । </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">... अष्टांगहृदय सूत्रस्थान</span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">वात-पित्त-कफ
हे दोष, वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती, मध्यकाळी व
प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.</span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">दिवसाचे
१२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचे प्रत्येकी तीन-तीन भाग केले असता
पहिल्या भागात कफाचे आधिक्य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा
काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या
काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व
रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात-पित्त-कफ यांचे असे
ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात
अविरत, रोजच्या रोज चालू असते.</span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">वात
हे शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. त्यामुळे झोपेतून उठण्याची
क्रिया तसेच पोट साफ होण्याची क्रिया वाताच्या कार्यक्षेत्रातील असते.
वरील सूत्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. म्हणजे
सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर
कफाचा काळ सुरू झाला की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा
दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्रविसर्जन सुलभ व योग्य
प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे
अवघड होते, पर्यायाने अख्खा दिवस आळसात जाऊ शकतो. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">पहाटे
सहानंतर कफाचा कालावधी सुरू होतो. ‘कफ’ हा शांत, स्थिर स्वभावाचा असल्याने
सकाळच्या वेळी अभ्यास किंवा उपासना करणे मन एकाग्र होण्याच्या
दृष्टिकोनातून सोपे असते. तसेच सकाळच्या या कफाच्या काळात मुखातील
अतिरिक्त कफाची शुद्धी व्हावी यासाठी गंडुष, कफनाशक वनस्पतींनी मुखमार्जन
वगैरे उपचार करायचे असतात. डोळ्यांत अंजन घालून तेथून कफदोष दूर केल्यास
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. सकाळच्या वेळी व्यायाम करण्याचा फायदा
सर्वाधिक असतो. कारण, कफाच्या काळात केलेल्या व्यायामाने शरीरात कफदोष
संतुलित राहतो. मेदसुद्धा अति प्रमाणात वाढत नाही, एकंदर शरीरसौष्ठव आणि
दिवसभरासाठी आवश्यक असणारी स्फूर्ती मिळवून ठेवता येते. कफदोषामुळे शरीरात
येणारा जडपणा, आळस, मंदपणा दूर होण्यासाठी आपल्या भारतीय परंपरेत सकाळच्या
वेळी सूर्यस्नान घेण्यास सुचवले आहे. सकाळी जोपर्यंत सूर्याची किरणे फार
तीव्र नसतात तोपर्यंत म्हणजे उन्हाळ्यात आठच्या आधी, हिवाळ्यात नऊपर्यंत
अगोदर अंगाला तेल लावून थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यकिरणांत
सूर्यनमस्कार करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, हाडांची बळकटी
टिकविणारे, रोगप्रतिकारशक्ती नीट ठेवण्यास कारणीभूत असणारे असते, तसेच
मधुमेह होण्यास प्रतिबंध करणारे डी जीवनसत्त्व फक्त सूर्यप्रकाशातच शरीर
तयार करू शकते, असे आधुनिक विज्ञानाने शोधून काढले आहे. मात्र, फार तीव्र
सूर्यप्रकाश त्वचेसाठी धोकादायक असू शकतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या
सूर्यप्रकाशात १०-१५ मिनिटांसाठी बसणे किंवा सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार
करणे आरोग्यासाठी उत्तम होय. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">पित्त
हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे. त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात
दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. जेवणाची
वेळ होऊनही जेवले नाही तरी निसर्गचक्रानुसार पाचक पित्त</span></div>
</div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">स्रवतेच
आणि त्याला पचवायला काही नसले की त्यामुळे पोटात, आतड्यात उष्णता वाढत
राहते. आयुर्वेदात तर सांगितले आहे की संधुक्षित झालेल्या अग्नीला
पचविण्यासाठी अन्न मिळाले नाही तर तो शरीरधातूंना पचवायला सुरवात करतो,
परिणामी शरीरातील आवश्यक तत्त्वे जळून जातात. याचसाठी वेळेवर जेवणे
महत्त्वाचे होय. वेळेवर न जेवता फार उशिरा जेवले तर तोपर्यंत स्रवलेले पाचक
पित्त विरून गेलेले असते. परिणामतः अन्न योग्य प्रकारे पचू शकत नाही,
पचनसंस्थेवर अतिरिक्त ताणही येतो. प्रत्यक्षातही असे दिसते की अनेक दिवस
वेळेवर न जेवणाऱ्या व्यक्तींना अपचन, गॅसेस, वजन वाढणे अशा प्रकारचे अनेक
त्रास होऊ लागतात. हे सर्व टाळायचे असेल तर दुपारचे जेवण पित्ताच्या काळात
म्हणजे १२ ते १ या अवधीत करणे उत्तम होय. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">झोपण्याच्या
बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे.
कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास
झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११च्या पुढेही जागत
राहिले म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला की त्याने शरीरात पित्तदोषाचे
असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होणे, डोळ्यांची व हातापायांच्या
तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण
मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा
हा अनुभव आहे. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">वयानुसारही
शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग
केलेले आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत
स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्य असते कारण या काळात शरीराची वाढ होणे
अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ
बनवण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण
बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा
यासारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित
कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.</span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">तारुण्यावस्थेत
पित्ताचे आधिक्य असते त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती, मिळून
उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. मात्र अति उत्साहाने
शरीराची ताकद विनाकारण खर्च होणार नाही, उलट ताकद टिकून राहील यासाठी काळजी
या काळात घ्यायची असते. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">वृद्धावस्थेत
वात वाढतो त्यामुळे शरीराची शक्ती हळूहळू कमी होणे, इंद्रियांची ताकद
क्षीण होणे स्वाभाविक असते, म्हणूनच या काळात वाताला शक्य तेवढे संतुलित
ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. </span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: 15px; line-height: 25px;">अशा
प्रकारे निसर्गाचे चक्र लक्षात घेऊन जीवनाचा क्रम तसेच रोजचा दिनक्रम आखला
तर आरोग्य टिकेलच शिवाय जीवनाचा अधिकाधिक आनंद घेता येईल.</span></div>
</div>
</span></div>
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-78640794357264667542014-11-11T18:13:00.001+05:302014-11-11T18:13:16.128+05:30अनियमित 'मासिक' त्रास!<div class="detail-byline" style="color: #7a7a7a; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 15px; line-height: 18px;">
<span style="background-color: #eeeeee;"><br /></span></div>
<div class="detail-byline" style="color: #7a7a7a; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 15px; line-height: 18px;">
<span style="background-color: #eeeeee;">डॉ. वैशाली बिनिवाले, स्त्रीरोगतज्ज्ञ </span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<img alt="menstruation cycle" src="http://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/11/9-150x100.jpg" /></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;">मासिक पाळी अनियमित होण्याची कारणे अनेक आहेत. शिवाय ही कारणे स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी असू शकतात. मुलगी वयात येते तेव्हा म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती अनियमित होणे, तरुण वयात म्हणजे ज्याला 'रीप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप' म्हणतात त्या वयातली अनियमित पाळी आणि रजोनिवृत्तीच्या वेळी पाळीच्या चक्रात होणारे बदल या तिन्ही गोष्टींचा इथे वेगवेगळा विचार करावा लागेल. या तीन वयोगटांमध्ये अनियमित पाळीचा त्रास कसा होतो ते जाणून घेऊ..</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>मासिक पाळी सुरू होण्याचा काळ</strong><br />वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षी जेव्हा मुलींची मासिक पाळी नुकतीच सुरू होते, तेव्हा सुरुवातीला ती नियमितपणे येतेच असे नाही. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर पुढचे २-३ महिने, अगदी ६ महिनेदेखील पाळी आलीच नाही, असेही होऊ शकते. स्त्रीच्या शरीरात स्त्रीबीज तयार होण्याचे जे चक्र असते (ओव्ह्य़ुलेशन सायकल) ते सुरळीत नसणे हे याचे कारण असते. वयात येताना सुरुवातीला कधी कधी संप्रेरकांमधील बदलांमुळे पाळी येते, पण ओव्ह्य़ुलेशनच होत नसते किंवा ते अनियमित होत असते. या सर्व कारणांमुळे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिली दोन वर्षे ती अनियमितपणे येण्याची शक्यता असते. या काळात तीस दिवसांऐवजी चाळीस दिवसांनी किंवा साठ दिवसांनी पाळी आली तरी लगेच मुलींनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पाळीच्या चक्राची घडी नीट बसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो हे लक्षात ठेवावे.<br />पाळीच्या ठरलेल्या चक्रापेक्षा आधीच म्हणजे दर १०-१५ दिवसांनी पाळी येत असेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. पाळी उशिरा आल्यानंतर अधिक दिवस रक्तस्राव सुरू राहिला किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला गरजेचा. काही जणींना ३-४ महिन्यांनी पाळी येते आणि मग २०-२५ दिवस रक्तस्राव थांबत नाही. अशा वेळीही डॉक्टरांकडे जाणे टाळू नये. शरीरातून गरजेपेक्षा अधिक रक्तस्राव होऊ नये यासाठी वेळीच केलेले उपचार उपयुक्त ठरतात.</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>प्रजननक्षम वयातील अनियमित पाळी</strong> <br />प्रजननक्षम वयात पाळी एकदम अनियमित होऊ लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. या वयात पाळी चुकल्यानंतर गरोदर राहण्याची असलेली शक्यता आधी पडताळून पाहिली जाते. तशी शक्यता नसेल तर पाळी अनियमित होण्याची इतरही कारणे असू शकतात.</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी)</strong><br />शरीरातील मासिक पाळीच्या चक्राची घडी बसल्यानंतर म्हणजे तरुण वयात पाळी अनियमित होण्याचे सर्रास दिसणारे कारण म्हणजे 'पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज'. यात ओव्हरीजवर लहान लहान 'सिस्ट' म्हणजे गाठी येतात. स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियेतील दोषांमुळे असे होऊ शकते. यामुळे संप्रेरकांच्या पातळीत असंतुलन होऊन बीजनिर्मिती अनियमित होते किंवा ती होतच नाही. याचाच परिणाम म्हणून मासिक पाळी अनियमित होते. यात मुलींचे वजन वाढू लागते, चेहऱ्यावर मुरुमे येऊ लागतात. हनुवटी किंवा ओठांवरती लवदेखील वाढू शकते. डोक्यावरचे केस गळू लागतात. शरीरात होणाऱ्या 'इन्शुलिन' निर्मितीत अडचणी निर्माण होऊन पुढे मधुमेहाचाही धोका उद्भवू शकतो. 'पीसीओडी'मध्ये बीजनिर्मिती प्रक्रिया अनियमित होत असल्याने पुढे वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याचीही शक्यता असते. 'पीसीओडी'चे निदान झाल्यास त्यावरील वैद्यकीय उपचार वयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. तरीही नियमित व्यायाम 'पीसीओडी'मध्ये खूप फायदेशीर ठरतो. वजन वाढले असेल तर ते कमी करून प्रमाणात राखणे देखील तितकेच महत्त्वाचे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, मूल होण्याचे पुढे गेलेले वय ही कारणे बहुतेक जणींच्या 'पीसीओडी'मागे दिसतात.</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>थायरॉइड डिसऑर्डर्स</strong><br />थायरॉइड ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळेही अनियमित पाळीचा त्रास उद्भवू शकतो. यात अचानक काही महिन्यांत वजन वाढते, सतत दमल्यासारखे वाटते तसेच पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होतो. अनियमित पाळीची तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रियांना हॉर्मोन्सच्या म्हणजे संप्रेरकांच्या चाचण्या करायला सांगितल्या जातात. त्यात थायरॉइडच्या त्रासाचे निदान होते. त्यावरही औषधोपचारांच्या बरोबरीने अतिरिक्त वजन कमी करण्यास सांगितले जाते.</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>स्थूलत्वामुळे अनियमित होणारी पाळी</strong><br />केवळ स्थूलत्वामुळेही पाळी अनियमित होऊ शकते. यात योग्य व्यायाम आणि योग्य आहाराच्या साहाय्याने वजन कमी करणे गरजेचे ठरते. हल्ली मुलींमध्ये अनियमित पाळीसाठी वाढलेल्या वजनाचे कारण मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळते.</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>चाळिशीनंतरची अनियमित पाळी</strong><br />चाळिशीनंतर म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात पुन्हा 'ओव्ह्य़ुलेशन'चे चक्र अनियमित होऊ लागते. संप्रेरकांच्या पातळीतही असंतुलन होते. परिणामी मासिक पाळी अनियमित होते. यातही लगेच घाबरून जाण्यासारखे काही नाही. मात्र या वयात पाळी आली नाही म्हणजे तो रजोनिवृत्तीचाच एक भाग असावा असे गृहीत धरू नये. अगदी पन्नाशीपर्यंतच्या स्त्रियांनीही पाळी चुकण्याचा अर्थ आपण गरोदर तर नाही ना ही शक्यता जरूर पडताळून पाहावी. ही शक्यता नाही हे ताडून पाहिल्यानंतरही पाळी उशिरा येत आहे, असे दिसले तर घाबरायचे कारण नाही. पण पाळी लवकर येऊ लागली, अधिक दिवस तसेच अधिक प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला, पाळी सुरू असताना वेदनांचा त्रास होऊ लागला तर मात्र डॉक्टरांना लगेच दाखवावे. या वयातही काही जणींना ३-४ महिन्यांनी पाळी येते आणि ती खूप दिवस टिकते. असे असेल तरी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा. काही वेळा पाळी ठरलेल्या वेळेवर येते पण दोन मासिक चक्रांच्यामध्ये देखील रक्तस्राव होतो. अशा वेळीही नेमका त्रास काय आहे याचे निदान करून घेणे गरजेचे ठरते.</span></div>
<div style="color: #303030; font-family: '4CGandhiMarathi'; font-size: 20px; letter-spacing: 1px; line-height: 24px; padding: 0px 0px 16px; text-align: justify; width: auto;">
<span style="background-color: #eeeeee;"><strong>पाळी अनियमित होऊ नये यासाठी काय करावे?</strong><br />नियमित व्यायाम आवश्यकच.<br />वजनावर नियंत्रण हवे.<br />मानसिक ताणाचाही पाळीच्या चक्रावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.<br />आहार संतुलित आणि वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे.</span></div>
Suhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-84480443492895392052014-04-04T13:20:00.001+05:302014-04-04T13:20:46.483+05:30आरोग्यप्रसादरामनवमीला पंजिरी खाण्याने नुसतेच उन्हाळ्यापासून संरक्षण मिळते असे नव्हे, तर त्यात वीर्यवर्धक, पौष्टिक व बाहेरचा उष्मा सहन होऊन स्वस्थ झोप मिळेल अशा घटकांचीही व्यवस्था केलेली असते. पंजिरी केवळ रामनवमीलाच खावी असे नव्हे, तर रामजन्मापासून पुढे महिनाभर, अगदी ज्येष्ठ महिन्यापर्यंत खायला हरकत नाही. याने खूप फायदा होऊ शकेल. शरीराला ताकद मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी आणण्यासाठी लहान मुलांना चमचाभर भिजविलेली चण्याची डाळ देण्याची पद्धत लक्षात घेतली तर हनुमान जयंतीला गूळ-चणे खाण्यामागचा अर्थ लक्षात येईल. <br /> <br />भा रतीय संस्कृती ही संपूर्णपणे केवळ मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करते. त्या निमित्ताने सण-वार, देव-धर्म, पूजा-अर्चा, यज्ञ-कर्म अशा अनेक गोष्टी परंपरेत आणून मनुष्यमात्राला समृद्धीबरोबर आरोग्य मिळेल याचाच विचार केलेला असतो. तसे पाहता खरे म्हणजे देवाला प्रेमाशिवाय काहीही नको असते. मनुष्याला पण हवे असते प्रेम. तेव्हा चंदनाची उटी, केशराची फुले, सुवर्णालंकार व मोदकमेवा हे सर्व देवाला आवश्यक नसते. प्रसाद देवाला दाखवला तरी शेवटी तो खाल्ला जातो दाखवणाऱ्याकडूनच. म्हणूनच सुदाम्याच्या मूठभर पोह्यांनी श्रीकृष्ण जेवढे प्रसन्न झाले तेवढे अन्नाचे 56 भोग लावूनही झाले नसतील. देवाला अर्पण केलेल्या प्रसादात वातावरणातील श्रद्धेमुळे देवाचा आशीर्वाद ओढला जातो व गूळ-दाण्यांचे रूपांतर प्रसादात होते. शिरा कितीही चांगला झालेला असला व तो कितीही खाल्ला तरी समाधान होत नाही, पण तोच शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला की होणारे समाधान अनोखे असते. पूजेत विज्ञान आहेच, ते कळले नसले तरी पूजा केल्यावर व प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाला मिळणारी आत्मतृप्ती व समाधान लॉटरीचे मोठे बक्षीस लागले तरी होत नाही. हाच प्रसादाचा फायदा. <br />भारतीय सणांची योजना करताना त्या त्या वेळचे ऋतुमान, त्या ठिकाणचा काळ लक्षात घेऊन काय खावे काय न खावे, कुठले पक्वान्न असावे असे अलिखित नियम तयार झालेले दिसतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी व नंतर तोंड गोड करणारे श्रीखंड, त्यानंतर येणाऱ्या रामनवमीला मिळणारी पंजिरी आणि हनुमान जयंतीला मिळणारे चणे-गूळ आरोग्याला लाभदायक असतात. श्रीखंड पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे. असे श्रीखंड शरीरात सहज सात्म्य व्हावे व शरीराला पुष्टी मिळावी, वीर्य व आरोग्य मिळावे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. यात जवळचा रस्ता शोधण्यासाठी व स्वस्तात साधन शोधण्यासाठी बदल केला आणि त्यामुळे श्रीखंड बाधले तर त्याची जबाबदारी गुढीपाडव्यावर नसते. ही जबाबदारी, अन्न नेहमी चांगल्या गुणवत्तेचे व सात्त्विक असावे हा सर्वसाधारण नियम डावलून पैसे वाचविण्यासाठी खाल्लेल्या अन्नावर वा तसा विचार करणाऱ्यावर असते. आयुर्वेदिक श्रीखंड करताना दही ज्या मातीच्या भांड्यात लावायचे ते कापराने धुपवलेले असते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप टाकलेले असते. <br /><br />चैत्र-वैशाख हा वसंत ऋतू. या वेळी उन्हाळ्याची नुकतीच सुरवात झालेली असते. या दिवसाचे वर्णन "चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती? दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखी राम जन्माला, ' या शब्दांत गीतरामायणात केलेले आहे. या दिवसात जिवाची काहिली झाली नाही, जिवाची तगमग वाढली नाही तरच नवल. म्हणून रामनवमीच्या प्रसादासाठी "पंजिरी'ची योजना केलेली असते. मूत्रविसर्जन व्यवस्थित व्हावे, मूत्राघात होऊ नये, जळजळ होऊ नये, शरीरात उष्णता वाढू नये, डोळ्यांची आग होऊ नये, अन्नपचन व्यवस्थित व्हावे आणि शरीरातील अग्नी संतुलित राहावा म्हणजेच शरीरातील हार्मोन्सची व्यवस्था नीट चालावी या दृष्टीने पंजिरीत ओवा, सुंठ, धणे यांचा समावेश केलेला असावा. मधुर रसाशिवाय प्रसाद नसतो, पक्वान्न नसते, त्यामुळे या प्रसादात साखर असतेच. ज्यांच्याजवळ सोय असेल त्यांना चारोळी, बदाम, पिस्ता, केशर हे पदार्थही यात टाकता येतात. अशा रीतीने बनविलेली चमचाभर पंजिरी खाऊन भांडेभर पाणी प्यायल्यावर राम अंतर्यामी दर्शन देऊन जातो. वसंत ऋतूत वितळणारा कफ त्रास देऊ शकतो तेव्हा कफदोष कमी करण्याचीही या प्रसादात व्यवस्था केलेली असते. सर्वसामान्यांच्या घरी पंजिरी फार कष्ट न घेता व फार पैसे खर्च न करताही बनवलेली असू शकते किंवा एखाद्या स्वयंभू मंदिरात वा हृदयस्थ रामाच्या दर्शनासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी विशेष पंजिरीची योजना केलेली असते. आयुर्वेद ही कुठलीही मागणी पूर्ण करणारी व आरोग्य देणारी कामधेनू आहे. साध्या पंजिरीमध्ये धणे, बडीशेप, थोडीशी सुंठ, जिरे वगैरे टाकलेले असते; तर विशेष पंजिरीमध्ये धणे, बडीशेप, डिंकाची लाही, मिरी, सुंठ, वेलची, जायफळ, जायपत्री वगैरेंची योजना केलेली असते. पंजिरी खाण्याने नुसतेच उन्हाळ्यापासून संरक्षण मिळते असे नव्हे तर त्यात वीर्यवर्धक, पौष्टिक व बाहेरचा उष्मा सहन होऊन स्वस्थ झोप मिळेल अशा घटकांचीही व्यवस्था केलेली असते. पंजिरी केवळ गुढीपाडव्याला वा रामनवमीलाच खावी असे नव्हे तर रामजन्मापासून पुढे महिनाभर, अगदी ज्येष्ठ महिन्यापर्यंत खायला हरकत नाही. याने खूप फायदा होऊ शकेल. शरीराला ताकद मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी आणण्यासाठी लहान मुलांना चमचाभर भिजविलेली चण्याची डाळ देण्याची पद्धत लक्षात घेतली तर हनुमान जयंतीला गूळ-चणे खाण्यामागचा अर्थ लक्षात येईल व हनुमान देवता ताकदीची व बलदंड का आहे हेही लक्षात येईल. <br /><br />हे सगळे पहिले की एकूण आयुर्वेद अनेक प्रकारे मनुष्यमात्राची कशा प्रकारे काळजी घेतो हे लक्षात येईल आणि चरक, सुश्रुत या आचार्यांना मनोमन नमस्कार केल्याशिवाय राहता येणार नाही. <br />
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-47843877792256986442014-04-04T13:17:00.000+05:302014-04-04T13:18:21.324+05:30उन्हाळ्याचे औषध पंजिरी<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width: 660px;"><tbody>
<tr><td align="left" colspan="2" valign="top"><div class="NewsHeading">
</div>
</td></tr>
<tr><td align="left" valign="top"><div class="NewsDetails">
- डॉ. श्री बालाजी तांबे </div>
</td><td align="right" style="padding-top: 3px;" valign="top"><div class="NewsDetails_Share">
<br />
</div>
</td></tr>
<tr><td align="left" colspan="2" valign="top"><div class="TagsClass" style="padding-top: 5px;">
</div>
</td></tr>
</tbody></table>
<div>
<div class="NewsDetails" style="padding-top: 10px;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://www.esakal.com/esakal/20140403/images/4993928476465970541/5703777568951246129_Org.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20140403/images/4993928476465970541/5703777568951246129_Org.jpg" style="padding: 5px;" title="" /></a></div>
<div id="divNewsdata">
<span style="color: #cc0000;">रामनवमीची पंजिरी आणि हनुमानजयंतीचे गूळ-चणे यांची चव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलेली असेल. या दोन्ही दिवशी विशेष प्रसादाची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली आहे. यासाठी लागणारी घटकद्रव्ये तशी पाहता साधीच असतात, प्रत्येकाच्या घरात असतात. मात्र त्यांची प्रसादरूपाने योजना करण्याने अंततः आपलेच आरोग्य सुरक्षित राहत असते. संस्कृतीतील गोष्टींकडे जरा डोळसपणे पाहिले तर लक्षात येते की, नैवेद्य, प्रसाद, निरनिराळी फुले, पाने वापरून केली जाणारी पूजा, धूप, आरती अशा सर्व गोष्टी करण्यामागे आरोग्यरक्षण हा मुख्य उद्देश असतो. </span><br />
<span style="color: #cc0000;"></span> <br />
आयुर्वेद, भारतीय संस्कृती आणि आरोग्यरक्षण या तिन्ही गोष्टींची सांगड अशी काही पक्की घातलेली आहे की तिचा पदोपदी अनुभव घेता येतो. चैत्राची सुरवात म्हणजेच वसंत ऋतूचे आगमन. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला गुढीमध्ये दिलेले अढळ स्थान, जेवणाच्या सुरुवातीला सेवन केली जाणारी कडुनिंबाची चटणी याचीच उदाहरणे होत. पाडव्याच्या पाठोपाठ येतात ते रामनवमी व हनुमान जयंती हे दोन उत्सव. याही दिवशी विशेष प्रसादाची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली आहे. यासाठी लागणारी घटकद्रव्ये तशी पाहता साधीच असतात, प्रत्येकाच्या घरात असतात मात्र त्यांची प्रसादरूपाने योजना करण्याने अंततः आपलेच आरोग्य सुरक्षित राहत असते. <br />
<br />
रामनवमीची पंजिरी आणि हनुमान जयंतीचे गूळ-चणे यांची चव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलेली असेल. आजआपण त्याचे आरोग्यदायी गुणधर्म काय असतात, हे पाहणार आहोत. रामनवमीला केल्या जाणाऱ्या पंजिरीमध्ये मुख्य घटकद्रव्य असतात, धणे, बडीशेप, सुंठ, जिरे, डिंकाची लाही, थोड्या प्रमाणात ओवा, मिरी, खसखस, वेलची, जायफळ, जायपत्री, केशर आणि अर्थातच खडीसाखर. कोणत्याही स्वयंपाकघरात मिळू शकतील अशा या गोष्टी औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत, हे आयुर्वेदातील पुढील माहितीवरून लक्षात येईल. <br />
<br />
<strong>धणे -</strong> कोथिंबिरीची फळे म्हणजे धणे. धणे त्रिदोषशामक असतात. वसंत म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराचा दाह होऊ नये यासाठी धण्यासारखे उत्तम औषध नाही. उष्णता वाढली की शरीरात साठलेला कफदोष वितळण्यास सुरवात होते, परिणामतः सर्दी, शिंका, ताप, खोकला वगैरे कफाचे त्रास होऊ शकतात. कफदोषाचा हा प्रकोप शांत करण्याचे कामही धणे उत्तम प्रकारे करतात. तापामध्ये शरीराचा दाह होतो, कितीही पाणी प्यायले तरी तहान शमत नाही अशा वेळी धण्याचे पाणी किंवा धण्याचा काढा घेणे उत्तम असते. उष्णता वाढली की "उन्हाळी' लागण्याचा त्रासही अनेकांच्या अनुभवाचा असतो. धणे मूत्रल म्हणजे लघवीचे प्रमाण वाढवून मूत्राशय साफ होण्यास मदत करणारे असल्याने लघवी कमी होणे, दाहयुक्त होणे, अडखळत होणे वगैरे त्रासांवर धण्याचे पाणी साखरेसह घेणे उपयुक्त असते. धणे पचनक्रियेस मदत करणारे व आमदोषाला पचविणारे असल्याने पोट जड होणे, भूक न लागणे, वायू न सरणे वगैरे त्रासातही धणे उपयोगी ठरतात. <br />
<br />
<strong>बडीशेप -</strong> सर्वसाधारणतः मुखशुद्धीसाठी प्रसिद्ध असणारी बडीशेप अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. मुख्यत्वे वातदोष व कफदोष कमी करणारी बडीशेप पचनसंस्थेसाठी हितावह असते. वसंतऋतूत कफ वितळला की, त्यामुळे अग्नी मंदावणे स्वाभाविक असते. या मंद अग्नीला पुन्हा प्रदीप्त करण्याचे काम बडीशेप करू शकते. पोटात वायू धरणे, त्यामुळे पोट दुखणे, जड वाटणे वगैरे सर्व तक्रारींवर बडीशेप भाजून घेऊन खाण्याचा उपयोग होतो. अगदी लहान बालकांनाही बडीशेप पाण्यात उकळून तयार केलेला काढा थोडा थोडा देण्याने वात सरायला मदत मिळते. लहान मुलांची कफ प्रवृत्ती असतेच, त्यामुळे अग्नी मंद झाला की, त्यातून वारंवार खोकला, ताप, जुलाब, भूक न लागणे वगैरे त्रासांना आमंत्रण मिळते. यावरही बडीशेपेचे पाणी किंवा काढा पिण्याचा उपयोग होतो. पोटात आव होऊन जुलाब होत असतील, पोटात मुरडा येऊन शौचाला जावे लागत असेल तर त्यावरही बडीशेप उपयोगी पडते. <br />
<br />
<strong>सुंठ -</strong> "विश्वभेषज' म्हणजे विश्वातील सर्व रोगांवर औषध म्हणून उपयोगी पडणारी सुंठ चवीला तिखट असली तरी विपाकाने म्हणजे पचनानंतर मधुर होते. म्हणूनच मुख्यत्वे वात व कफदोष कमी करणारी सुंठ पित्त वाढवत नाही. सुंठीची विशेषतः अशी, की ती जिभेवर ठेवल्या ठेवल्याच तिचे काम करू लागते. सुंठीचे चूर्ण तोंडाचा बेचवपणा दूर करते, मुख व कंठामधील कफदोष दूर करून स्वर सुधारण्यासही मदत करते. सुंठ ही पचनसंस्थेसाठी वरदानच होय. वसंतातील कफप्रकोपामुळे मंदावलेला अग्नी पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी, शरीरातील आमदोष पचविण्यासाठी, जुलाब, ताप, आमवात वगैरे विकार बरे करण्यासाठी सुंठ हे एक उत्कृष्ट औषध समजले जाते. तापामध्ये सुंठ व पित्तपापडा यांचा काढा थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो. आमवातामध्ये सुंठ-गूळ-तुपाची गोळी घेणे चांगले असते.<br />
<br />
<strong>जिरे -</strong> जिरे स्वयंपाकघरात जेवढे वापरले जाते तेवढेच ते आयुर्वेदिक औषधांमध्येही महत्त्वाचे असते. अग्निदीपन, अन्नपचनासाठी जिरे हे एक उत्तम औषध आहे. अग्नीची कार्यक्षमता वाढवणे, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणे, तोंडाचा बेचवपणा दूर करणे अशी किती तरी कामे जिरे करत असते. ताकाबरोबर घेतलेले जिरे पोटातील वायू सरून जाण्यास मदत करते, ग्रहणीरोगात हितकर असते. साखरेबरोबर घेतलेले जिरे पित्तामुळे होत असलेल्या उलट्या थांबविण्यास मदत करते. लोण्याबरोबर घेतलेले जिरे शुक्रासाठी पोषक असते. लघवी कमी, अडखळत किंवा दाह होऊन होत असल्यास धण्या-जिऱ्याचे पाणी पिण्याने लगेच बरे वाटते. याशिवाय डोळे, बुद्धी यांसाठीही जिरे उपयोगी असतात. बाळंतिणीसाठी जिरे फारच उपयुक्त असते. गर्भाशयशुद्धी, स्तन्यवृद्धी, स्तन्यशुद्धी अशी अनेक कार्ये जिरे करत असते. अशा प्रकारे वसंतातील मंदावलेले पचन पुन्हा सुरळीत होण्यासाठी जिऱ्याचे योगदान महत्त्वाचे होय. <br />
<br />
<strong>ओवा -</strong> प्रकुपित कफाचे शमन करण्यासाठी ओव्यासारखे उत्तम औषध नाही. कफ वाढला की परिणामतः अग्नी मंदावतो, तोंडाची चव जाते अशा वेळी ओवा खाणे उत्तम होय. मिठाबरोबर भाजलेला ओवा जेवणानंतर खाण्याने वायू सरण्यास मदत मिळते, पोटदुखी कमी होते, जंत होण्याच्या प्रवृत्तीलाही आळा बसतो. <br />
<br />
<strong>वेलची -</strong> ही त्रिदोषशामक असते. अतिशय सुगंधी व चविष्ट असणारी वेलची पदार्थाचा स्वाद तर वाढवतेच; पण तोंडालाही रुची आणते. वसंतातील उष्णतेमुळे वाढणारा कफदोष कमी करण्यासाठी व मंदावलेल्या पचनाला ताकद देण्यासाठी वेलची उत्तम होय. लघवीला जळजळ होणे, अडखळत होणे, वाढत्या उष्णतेमुळे डोके दुखणे अशा अनेक तक्रारींवर वेलची औषध म्हणून वापरली जाते. <br />
<br />
<strong>केशर -</strong> अतिशय सुगंधी व रसायन गुणांनी युक्त केशर त्रिदोषशामक असते. केशर रक्तधातूला वाढवते, रक्तशुद्धीसुद्धा करते, त्यामुळे कांतिवर्धनासाठी उत्तम असते. वाढलेला कफदोष कमी करणे, रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे, अग्नीची कार्यक्षमता वाढवणे यासाठी केशर उत्तम असते, अगदी कमी मात्रेतही केशर उत्तम गुणकारी ठरू शकते. <br />
<br />
<strong>जायफळ, जायपत्री -</strong> कफशामक, कृमिनाशक असे जायफळ अतिशय सुगंधी असते. केशराप्रमाणे जायफळ व जायपत्री अगदी थोड्या प्रमाणात वापरायची असते. पचनसंस्थेत वाढलेला कफदोष शोषून घेण्याची क्षमता यात असते. त्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते, जंत कमी होतात, मुखदुर्गंधी नष्ट होते, खोकला, दमा वगैरे विकारातही आराम मिळतो. <br />
<br />
<strong>डिंक -</strong> उत्तम प्रतीचा बाभळीचा डिंक हा नैसर्गिक कॅल्शिमयचा उत्तम स्रोत असतो, हाडांना ताकद मिळावी व एकंदर शक्ती टिकून राहावी यासाठी साजूक तुपात तळून घेतलेला डिंक (डिंकाची लाही) अतिशय पौष्टिक असतो. <br />
<br />
<strong>खसखस -</strong> हीसुद्धा अतिशय पौष्टिक व रसायन गुणांनी युक्त असते, हाडांसाठी पोषक असते. <br />
<br />
अशा प्रकारे पंजिरीतील प्रत्येक घटकद्रव्य या ऋतूत आपले आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करणारे आहे. रामनवमीच्या निमित्ताने पंजिरी करून ठेवली व उन्हाळा संपेपर्यंत रोज खाल्ली तर उन्हाळ्यासारखा अवघड ऋतू कधी सुरू झाला व कधी संपला, हे कळणारही नाही. <br />
<br />
हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्तवर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे. <br />
<br />
थोडक्यात, नैवेद्य, प्रसाद, निरनिराळी फुले, पाने वापरून केली जाणारी पूजा, धूप, आरती अशा सर्व गोष्टी करण्यामागे आरोग्यरक्षण हा मुख्य उद्देश असतो. संस्कृती महत्त्वाची समजणाऱ्यांना, परंपरेचा सन्मान करणाऱ्यांना हा फायदा आपसूकच मिळत असतो. </div>
</div>
</div>
<br />
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-51218053047822176952014-03-31T10:14:00.002+05:302014-03-31T10:14:12.727+05:30आरोग्यदायी कडुनिंब<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="background-color: white; color: black; font-family: Mangal, Verdana; width: 660px;"><tbody>
<tr><td align="left" valign="top"><div class="NewsDetails" style="font-size: 15px; line-height: 25px;">
- डॉ. श्री बालाजी तांबे</div>
<div class="DateTimeClass" style="color: #999999; font-family: Verdana; font-size: 13px; line-height: 18px;">
<br /></div>
</td><td align="right" style="padding-top: 3px;" valign="top"><br /></td></tr>
</tbody></table>
<div style="background-color: white; font-family: Mangal, Verdana;">
<div class="NewsDetails" style="font-size: 15px; line-height: 25px; padding-top: 10px;">
<div id="divNewsdata">
<br /><span style="color: #cc3333;"><img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20140327/images/5739457653856725962/4799297258648714805_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" />भारतीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडुनिंबाची पाने, फुले, डहाळी या सर्वांची आवश्यकता असते. यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. कडुनिंबाचे पाने, फुले, फळे, मूळ व खोड हे सर्व भाग औषधी गुणांनी युक्त असतात. उष्णतेचे आजार व त्वचारोगांवर गुणकारी औषध असलेला कडुनिंब हा एक बहुउपयोगी औषधी वृक्ष आहे. </span><br /><span style="color: #cc3333;"></span><br />चवीला कडू असला तरी गुणाने उत्कृष्ट असा कडुनिंब सर्वांच्या परिचयाचा असतो. चैत्रातील प्रतिपदा म्हणजे भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस. वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुनिंबाची पाने, फुले, डहाळी या सर्वांची आवश्यकता असते. यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. कडुनिंबाच्या झाडाच्या आसमंतात हवा शुद्ध राहते, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो. म्हणूनच घराच्या अंगणात कडुनिंब लावण्याची पद्धत असते.<br /><br />कडुनिंबाचा वृक्ष मोठा असला तरी त्याचे पंचांग म्हणजे पाने, फुले, फळे, मूळ व खोड हे सर्व भाग औषधी गुणांनी युक्त असतात. कडुनिंब फक्त भारतात सर्वत्र उगवतो, पण फार पाऊस असणाऱ्या ठिकाणी कडुनिंब सहजासहजी येत नाही. कडुनिंबाचा वृक्ष जसा जसा जुना होईल, तसतसा त्याच्या खोडातील आतील गाभा सुगंधित होत जातो. कडुनिंबाचे लाकूड बांधकामासाठीसुद्धा उत्तम असते. कारण त्याला कीड लागण्याची भीती नसते. शेतातील जमिनीत कडुनिंबाची झाडे लावण्याने जमिनीचा कस कायम राहतो, शिवाय जंतुसंसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो.<br /><br /><strong><img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20140327/images/5739457653856725962/5619395757038088758_Org.jpg" style="float: right; padding: 5px;" title="" />शुभ्र फुले माळून नटती... </strong>याचा वृक्ष 8-10 मीटर उंच होतो. मुख्य खोड सरळ असते व त्याच्या चारीही बाजूंनी फांद्या फुटतात. पाने छोटी व मधल्या दांड्याच्या दोन्ही बाजूंना जोडीजोडीने असतात. टोकाचे पान मध्यात असते. फुले लहान व पांढऱ्या रंगाची असतात. त्यांना मंद सुगंध असतो. फळ कच्चे असताना हिरवे व टणक असते, मात्र पिकले की पिवळे व मऊ बनते. फळांना सामान्य भाषेत निंबोळी असेही म्हटले जाते. फळाच्या आत एक बी असते. बीच्या आत मगज असतो. या मगजापासून तेल काढले जाते. कडुनिंबाची पाने हिवाळ्यात गळतात. वसंताची चाहूल लागली की कोवळी पालवी फुटते आणि वसंताच्या अखेरीपर्यंत झुपक्यांनी फुले येऊ लागतात. कडुनिंबाचे गुणधर्म "भावप्रकाशा'त पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,<br />निम्बः शीतो लघुर्ग्राही कटुस्तिक्ताऽग्निवातकृत् ।<br />अहृद्यः श्रमतृट्कास ज्वरारुचि कृमिप्रणुत् ।। ...भावप्रकाश<br /><br />कडुनिंब गुणाने लघू म्हणजे पचायला हलका, चवीने कडू व तुरट, विपाकाने तिखट असतो, मात्र वीर्याने शीतल असतो. मुख्यत्वे कफदोष व त्यामागोमाग पित्तदोषाचे शमन करतो, मात्र वात वाढवतो. कडुनिंब चवीमुळे नकोसा वाटला तरी अग्नीला प्रदीप्त करणारा असतो. योग्य प्रमाणात सेवन केल्यास श्रमांमुळे झालेल्या अशक्ततेला भरून आणतो, तहान शमवतो; खोकला, ताप, अरुची (तोंडाला चव नसणे) व जंत या सर्व विकारांत उपयुक्त असतो.<br /><br /><strong>जखमेवर पानांचा लेप </strong>कडुनिंब जखम भरून येण्यासाठी उपयुक्त असतो. जंतुसंसर्ग झाला असला तर कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने जखम अगोदर धुऊन घेऊन नंतर कडुनिंबाची पाने मधासह वाटून तयार झालेला लगदा जखमेवर बसवून पाटा बांधून टाकला जातो. या प्रकारे काही दिवस रोज केल्याने हळूहळू जखम भरून येते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्त असतात. कडुनिंबाच्या पानांचा रस खडीसाखरेबरोबर काही दिवस घेतल्याने कडकी कमी होते.<br />आग होणाऱ्या सुजेवर पानांचा लेप करण्याने लगेच बरे वाटते. कडुनिंबाची पाने बारीक करून पाण्यात मिसळून व्यवस्थित फेटली की पाण्यावर फेस तयार होतो. हा फेस अंगाला लावला असता दाह कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेल्या तापात त्वचेचा दाह होतो, तो शांत करण्यासाठी हा फेस उपयुक्त असतो.<br />नखुरडे झाले असता तुपावर परतलेला कडुनिंबाचा पाला बांधून ठेवण्याचा उपयोग होतो.<br />स्नानाच्या पाण्यात याच्या पाल्याचा काढा मिसळल्याने त्वचारोग बरे होण्यास- विशेषतः खाज कमी होण्यास मदत मिळते. गोवर, कांजिण्या वगैरे संसर्गजन्य रोगांमध्ये अंग पुसून घेण्यासाठी पानांचा काढा मिसळलेले पाणी वापरणे हितावह असते, तसेच या रोगात स्नानाच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकण्याची पद्धत असते. विषबाधेवर, विशेषतः सापाच्या विषावर कडुनिंबाचा पाला अतिशय प्रभावी असतो. कडुनिंबाची पाने चावून खाल्ली व तरीही कडू लागली नाही तर त्याचा अर्थ साप चावून विषबाधा झाली आहे, अशा परीक्षा प्रचलित आहे व यावर पाल्याचा रस देण्याची पद्धत आहे. कडुनिंबाचा पाला वाटून तयार केलेला लहान सुपारीच्या आकाराचा गोळा त्यात हिंग मिसळून काही दिवस नियमित सेवन करण्याने जंतांचा नाश होतो.<br />रक्तदोषावर फुलांची चटणी<br />फुले वाळवून तयार केलेले चूर्ण रोज रात्री गरम पाण्याबरोबर घेण्याने शौचास साफ होते व शक्ती वाढण्यास मदत होते.<br />कडुनिंबाची फुले वाटून तयार केलेला लेप पापणीवर व डोळ्यांच्या आसपास लावण्याने नेत्ररोग बरे होतात.<br />रसोनिम्बस्य मञ्जर्याः पीतश्चैत्रे हितावहः ।<br />हन्ति रक्तविकारांश्च वातपित्तं कफं तथा ।।<br />चैत्र महिन्यात कडुनिंबाच्या ताज्या फुलांचा रस पिण्याने सर्व प्रकारचे रक्तदोष दूर होतात, म्हणूनच गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची व फुलांची चटणी खाण्याची परंपरा आहे.<br /><br /><strong>शीतगुणी साल </strong>तापावर कडुनिंबाच्या सालीचा काढा घेण्याची पद्धत आहे. ताप येणे बंद झाले तरी नंतर चांगली भूक लागेपर्यंत व तापामुळे आलेली अशक्तता भरून येईपर्यंत असा काढा घेत राहणे हितावह असते. सालीच्या आतमध्ये असलेला गाभा सुगंधित व शीत गुणाचा असतो. दीर्घकालीन ताप, गोवर, कांजिण्या, कावीळ वगैरे कोणत्याही कारणाने शरीरात मुरलेली कडकी दूर करण्यासाठी गाभा उगाळून तयार केलेले गंध खडीसाखरेबरोबर घेतले जाते. बाळंतिणीला वाफारा देण्यासाठी सालीचा काढा वापरणे उत्तम असते. यामुळे वातशमन तर होतेच, पण जंतुसंसर्ग होण्यासही प्रतिबंध होतो. कडुनिंबाची साल डोळे येतात त्यावरही उपयुक्त असते,<br />निम्बस्य चोदुम्बरवल्कलस्यएरण्डयष्टिमधुचन्दनस्य ।<br />पिण्डी विधेया नयने प्रकोपितेकफेन पित्तेन समीरणेन ।।<br />कडुनिंबाची साल, उंबराची साल, एरंड मूळ, ज्येष्ठमध व चंदन हे सर्व बारीक वाटून तयार केलेला लेप बंद पापण्यांवर लावण्याने कफ, पित्त किंवा वात या कशामुळेही डोळे आले असले तरी शांत होतात.<br /><br /><strong>निंबोळीचे उपयोग </strong>कडुनिंबाच्या फळामध्ये असणारी बी बारीक करून लावण्याने खरूज बरी होते. डोक्यामध्ये उवा, लिखा झाल्या असल्यासही बिया बारीक करून डोक्यावर बांधून ठेवल्याने उपयोग होतो. बियांपासून काढलेले तेल त्वचारोगांवर खूपच उपयुक्त असते. हे वरून लावण्याने खाज कमी होते, त्वचा पूर्ववत होण्यास मदत मिळते व रक्तदोषामुळे काळवंडलेली त्वचा किंवा डागही नष्ट होतात. कडुनिंबाच्या बियांचे तेल नस्यासाठीही वापरता येते.<br />निम्बस्य बीजानि हि भावितानिभृस्य तोयेन तथाऽशनस्य ।<br />तैलञ्च तेषां विनिहन्ति नस्यात् दुग्धान्नभोक्तुं पलितं समूलम् ।।<br />बियांना माक्याच्या रसाच्या व असाणा वृक्षाच्या काढ्याच्या भावना द्याव्यात. पुरेशा भावना देऊन झाल्या की या बियांमधून तेल काढावे. या तेलाचे नस्य घेण्याने व केवळ दूध-भातावर राहण्याने पलित रोग नष्ट होतो, केस पांढरे होणे थांबते.<br />निंबोणी ताजी असताना खाण्याने जंतांचा नाश होतो. प्रमेहावरही ती उपयोगी असते.<br />पंचनिंब चूर्ण नावाचे एक औषध त्वचारोगावर सांगितले आहे. यात कडुनिंबाचे मूळ, पाने, फुले, फळे व साल अशी पंचांगे त्या त्या ऋतूत गोळा करून एकत्र करायची असतात. यात इतर रक्तशुद्धिकर औषधे मिसळून त्याला माक्याच्या रसाची, खदिराच्या काढ्याची भावना देऊन औषध तयार केले जाते. हे औषध सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर प्रभावी असते.<br /><br /><strong>पानांचा धूप </strong>हवा शुद्ध करण्यासाठी, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यासाठी घरात, तसेच ठिकठिकाणी धूप करण्यास सुचवला जातो. या प्रकारच्या धूपात कडुनिंबाच्या पानांचा समावेश अवश्य असतो.<br />निम्बपत्रैः कृतं चूर्णः लोध्रचूर्णसमन्वितम् ।<br />वस्त्रबद्धं जले क्षिप्तं पूरणं नेत्र रोगनुत् ।।<br />कडुनिंबाची पाने व लोध्र यांच्या समभाग चूर्णाची पुरचुंडी बांधावी. ही पुरचुंडी पाण्यात काही वेळ भिजत ठेवावी. हे पाणी डोळ्यांत टाकण्याने नेत्ररोग दूर होतात.<br />निम्बस्य पत्राणि सदा घृतेनधात्रीविमिश्राव्यथवा प्रयुञ्जात् ।<br />विस्फोटकोठक्षतशीतपित्तंकण्ड्वस्रपित्तं सकलानि हन्यात् ।।<br /><br />कडुनिंबाची पाने तुपासह सेवन करण्याने किंवा कडुनिंबाची पाने व आवळा यांचे समभाग चूर्ण घेण्याने अंगावर पित्त उठणे, फोड येणे, खाज येणे वगैरे त्रास नष्ट होतात. अशा प्रकारे कडुनिंब हा एक बहुउपयोगी औषधी वृक्ष आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारताना त्याला भारतीय संस्कृतीने इतके महत्त्वाचे स्थान देणे किती यथार्थ आहे, हे लक्षात येऊ शकते. </div>
</div>
</div>
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, LoveSuhas Patwahttp://www.blogger.com/profile/17602900798999249591noreply@blogger.com0