<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/18/horrific-accident-in-madhya-pradesh-truck-rams-into-vehicle-carrying-laborers-8-dead/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/18/horrific-accident-in-madhya-pradesh-truck-rams-into-vehicle-carrying-laborers-8-dead/</guid>
      <pubDate>Tue, 18 Aug 2026 08:24:21 -0400</pubDate>
      <description>












मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 79 वर मध्यरात्री भीषण अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या लोडिंग वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ मोठी गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Madhya Pradesh News)
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. ते मध्य प्रदेशातील डबरा परिसरातील चनूर भागात भात लागवडीच्या कामासाठी आले होते. दिवसभराचे काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ते लोडिंग वाहनातून परतत होते. चिन्का परिसरात पोहोचले असताना समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ( Gwalior Accident)
धडक इतकी जोरदार होती की मजुरांचे वाहन रस्त्यावर उलटले. या दुर्घटनेत अनेक जण वाहनात अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने ग्वाल्हेरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Truck Accident)
https://prahaar.in/2026/08/18/indian-origin-jazz-musician-pritesh-walia-released-on-bail-from-ice-custody-in-the-us/
पोलिसांच्या माहितीनुसार, 5 मजुरांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी 3 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधिकारी राम महेश यादव यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. सध्या 25 ते 26 जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाचा शोध सुरू आहे. (Accident News)
अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाकडून काही निष्काळजीपणा झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







</description>
      </item><item>
      <title>Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/18/maharashtra-weather-alert-major-shift-in-maharashtras-weather-right-in-the-middle-of-the-monsoon-a-break-in-the-rain-for-the-next-few-days/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/18/maharashtra-weather-alert-major-shift-in-maharashtras-weather-right-in-the-middle-of-the-monsoon-a-break-in-the-rain-for-the-next-few-days/</guid>
      <pubDate>Tue, 18 Aug 2026 08:01:33 -0400</pubDate>
      <description>मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, १८ ते २१ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश विभागांसाठी कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. (Maharashtra Weather Alert)

कोकणात पावसाला विश्रांती :
मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सध्या मोठ्या पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असली तरी बहुतांश भागात हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Alert)
https://prahaar.in/2026/08/18/jharkhand-governments-major-decision-after-a-24-day-protest-jssc-cgl-exam-cancelled/
उत्तर महाराष्ट्रातही कोरडे हवामान :
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी दमट वातावरण राहण्याची शक्यता असून, मोठ्या पावसाची शक्यता सध्या कमी आहे. (Maharashtra Weather Alert)

पुणे, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही ब्रेक :
पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागांमध्येही सध्या कोणताही हवामान इशारा नाही. घाटमाथ्यावर मागील काही दिवसांत झालेल्या पावसानंतर आता पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Alert)

मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता कायम :
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. IMDच्या ताज्या उपविभागीय अंदाजानुसार १८ ते २४ ऑगस्टदरम्यान मराठवाड्यासाठी कोणताही इशारा नाही. (Maharashtra Weather Alert)

विदर्भातही सध्या मोठा अलर्ट नाही :
अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या भागांतही सध्या कोणताही इशारा नाही. मात्र, IMDच्या अंदाजानुसार विदर्भात १७-१८ ऑगस्टनंतर २१ ते २३ ऑगस्टदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)
https://prahaar.in/2026/08/18/setback-for-fda-from-bombay-high-court-%e2%82%b95-lakh-fine-imposed-court-expresses-displeasure-over-excessive-enforcement-action/
राज्यात पावसाचा जोर कमी; पुढे काय?
एकूणच, महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, याचा अर्थ संपूर्ण राज्यात पाऊस पूर्णपणे थांबणार असा नाही. स्थानिक पातळीवर हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज पाहूनच नियोजन करणे महत्त्वाचे आहे. (Maharashtra Weather Alert)
विशेष म्हणजे, IMDच्या १८ ऑगस्टच्या ताज्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी १८ ते २१ ऑगस्टदरम्यान कोणताही इशारा नाही. त्यामुळे सध्या राज्यात मोठ्या पावसापेक्षा पावसाच्या विश्रांतीचे चित्र अधिक स्पष्ट आहे. (Maharashtra Weather Alert)</description>
      </item><item>
      <title>Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/18/indian-origin-jazz-musician-pritesh-walia-released-on-bail-from-ice-custody-in-the-us/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/18/indian-origin-jazz-musician-pritesh-walia-released-on-bail-from-ice-custody-in-the-us/</guid>
      <pubDate>Tue, 18 Aug 2026 07:59:39 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2 ऑगस्ट रोजी लॉस एंजेलिसला परतल्यानंतर त्यांना अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (ICE) ताब्यात घेतले होते. सुटका झाल्यानंतर वालिया यांनी या काळात मानसिकदृष्ट्या खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे सांगितले.
वालिया हे त्यांच्या मैत्रीण लिसासोबत लॉस एंजेलिसला परतले होते. विमानतळावर परतल्यानंतर त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कॅलिफोर्नियातील अॅडेलँटो ICE प्रोसेसिंग सेंटरमध्ये नेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा फोन आणि इतर वैयक्तिक वस्तूही जप्त करण्यात आल्याने त्यांना बाहेरील जगाशी संपर्क साधता आला नाही.
https://prahaar.in/2026/08/18/jharkhand-governments-major-decision-after-a-24-day-protest-jssc-cgl-exam-cancelled/
वालिया यांची मैत्रीण लिसाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत चाहत्यांना या घटनेची माहिती दिली होती. वालिया यांच्या कुटुंबीयांसह वकिलांकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिने सांगितले होते. दरम्यान, ICEकडून त्यांच्या ताब्याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्या व्हिसाच्या स्थितीबाबतही वालिया यांनी सार्वजनिकपणे कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.
सुटकेनंतर वालिया यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. अटकेत असताना अनेक वेळा आपण पूर्णपणे खचून गेल्यासारखे वाटले आणि पुढे काय होईल याची चिंता होती, असे त्यांनी सांगितले. मात्र कुटुंबीय, मित्र, वकील आणि जॅझ संगीत क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांना या कठीण काळातून बाहेर पडण्याचे बळ मिळाले.
प्रितेश वालिया यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि तेथे संगीत क्षेत्रातील शिक्षण घेतले. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग असून इंस्टाग्रामवर त्यांना 57 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
सुटकेनंतर सध्या काही काळ प्रसिद्धीपासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आणि विश्रांती घेण्याचा निर्णय वालिया यांनी घेतला आहे. त्यांच्या सुटकेनंतर त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
</description>
      </item><item>
      <title>Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/18/jharkhand-governments-major-decision-after-a-24-day-protest-jssc-cgl-exam-cancelled/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/18/jharkhand-governments-major-decision-after-a-24-day-protest-jssc-cgl-exam-cancelled/</guid>
      <pubDate>Tue, 18 Aug 2026 07:42:35 -0400</pubDate>
      <description>झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीनंतर JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि अनियमिततेविरोधात विद्यार्थी आंदोलन करत होते. सरकारच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये जल्लोष केला. (Jharkhand News)

परिक्षा रद्द करण्याचा निर्णय
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, JSSC-CGL सोबतच संबंधित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा, जाहीर झालेले निकाल आणि उमेदवारांच्या निवडीशी संबंधित प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 2014 पासून झालेल्या छोट्या-मोठ्या त्रुटींचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Hemant Soren)
https://prahaar.in/2026/08/17/fir-registered-against-sonia-gandhi-and-kharge-at-dindoshi-police-station-in-mumbai-over-the-vande-mataram-issue/
परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने नवीन सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना आपल्या सूचना देता याव्यात यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या सूचनांचा तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून परीक्षा प्रक्रियेत आवश्यक बदल केले जाणार आहेत. (Jharkhand Students)

नवीन समितीची स्थापना
तसेच IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी विविध संस्था, तज्ज्ञ आणि जाणकारांशी चर्चा करणार आहे. भविष्यात परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी नवीन नियम आणि कार्यपद्धती तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. (India News)

देवेंद्र नाथ महतो यांनी उपोषण सोडले
दरम्यान, आंदोलन करणारे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी रांचीच्या सदर रुग्णालयात आमरण उपोषण सोडले. मंत्री दीपिका पांडे सिंह, मंत्री इरफान अन्सारी आणि जेएलकेएमचे आमदार जयराम महतो यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
मात्र, विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशीची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आंदोलन पूर्णपणे संपलेले नसल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सीबीआय चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. (Exam Cancelled)
देवेंद्र नाथ महतो यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले, मात्र अजून मोठा लढा बाकी असल्याचे सांगितले. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे हे पुढील उद्दिष्ट असल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
</description>
      </item><item>
      <title>Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/18/setback-for-fda-from-bombay-high-court-%e2%82%b95-lakh-fine-imposed-court-expresses-displeasure-over-excessive-enforcement-action/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/18/setback-for-fda-from-bombay-high-court-%e2%82%b95-lakh-fine-imposed-court-expresses-displeasure-over-excessive-enforcement-action/</guid>
      <pubDate>Tue, 18 Aug 2026 07:24:26 -0400</pubDate>
      <description>मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स या आस्थापनाचा परवाना निलंबित केल्यानंतरही तो पूर्ववत न केल्याप्रकरणी न्यायालयाने FDA ला तब्बल ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Bombay High Court on FDA)
FDA ने १३ जून रोजी नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत संबंधित दुकानाचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या पुनर्तपासणीत दुकानाने तब्बल ९८ टक्के नियमांचे पालन केल्याचे समोर आले. मात्र, त्यानंतरही परवाना पूर्ववत करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली. (Bombay High Court on FDA)
https://prahaar.in/2026/08/17/marathi-is-the-language-of-devotion-non-marathi-brethren-have-set-an-ideal-of-cultural-integration-by-embracing-marathi/
या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने FDA च्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाने परिस्थितीनुसार आणि प्रमाणबद्ध पद्धतीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. (Bombay High Court on FDA)
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत FDA कडून हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी आणि खाद्य व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला कारवाई करताना योग्य प्रक्रिया आणि न्याय्य निकष पाळण्याचे निर्देश दिले आहेत. काही प्रकरणांमध्ये परवाना थेट निलंबित करण्याऐवजी संबंधितांना त्रुटी सुधारण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. (Bombay High Court on FDA)
https://prahaar.in/2026/08/17/fir-registered-against-sonia-gandhi-and-kharge-at-dindoshi-police-station-in-mumbai-over-the-vande-mataram-issue/
यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कारवाई गरजेची असली, तरी कारवाईचा अतिरेक होऊ नये आणि प्रशासनाने आपल्या अधिकारांचा विवेकपूर्ण वापर करावा, हा संदेश या निकालातून FDA ला मिळाला आहे. FDA च्या कारवाईवर उच्च न्यायालयाची नजर असल्याने आता प्रशासन पुढील कारवाई कशी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Bombay High Court on FDA)</description>
      </item><item>
      <title>DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/17/marathi-is-the-language-of-devotion-non-marathi-brethren-have-set-an-ideal-of-cultural-integration-by-embracing-marathi/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/17/marathi-is-the-language-of-devotion-non-marathi-brethren-have-set-an-ideal-of-cultural-integration-by-embracing-marathi/</guid>
      <pubDate>Mon, 17 Aug 2026 23:23:15 -0400</pubDate>
      <description>ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ सांगता समारंभात ते बोलत होते. हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवादभाषा” हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे, असेही ते म्हणाले.
https://prahaar.in/2026/08/17/fir-registered-against-sonia-gandhi-and-kharge-at-dindoshi-police-station-in-mumbai-over-the-vande-mataram-issue/

हा या अभियानाचा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवादभाषा” हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. सलग १०५ दिवस चाललेल्या या अभियानातून १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण… https://t.co/uBGx4txEFZ pic.twitter.com/KWat0ARsmi
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 17, 2026

https://prahaar.in/2026/08/17/india-faces-the-challenge-of-disposing-of-19000-tonnes-of-plastic-waste-daily/
यंदाच्या वर्षी १०५ दिवस चाललेल्या अभियानातून १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. “लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी…” या ओळी उद्धृत करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकविण्याचा मार्ग स्वीकारल्याचे कौतुक करत, “कायद्याने नाही, प्रेमाने भाषा शिकते,” असे शिंदे म्हणाले. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचे आवाहनही शिंदेंनी केले.
https://prahaar.in/2026/08/17/good-news-indias-unemployment-rate-has-dropped-to-5-1-percent-womens-participation-has-also-increased/
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, लेक लाडकी आणि आईचे नाव अधिकृत नोंदीत देण्याचे निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा ५० कोटींचा निधी भविष्यात १,००० कोटींवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, जीडीपी आणि परदेशी गुंतवणुकीत अव्वल असून दावोसमध्ये ३ व ४ लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक कार्यक्रमांत संसदेने मान्यता दिलेले अधिकृत वंदे मातरम् गायले जावे, अशी सूचना करत “मायबोलीची भक्ती, मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती” असल्याचा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी रिक्षा टॅक्सी चालक बंधू-भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.</description>
      </item><item>
      <title>Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/17/fir-registered-against-sonia-gandhi-and-kharge-at-dindoshi-police-station-in-mumbai-over-the-vande-mataram-issue/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/17/fir-registered-against-sonia-gandhi-and-kharge-at-dindoshi-police-station-in-mumbai-over-the-vande-mataram-issue/</guid>
      <pubDate>Mon, 17 Aug 2026 23:15:45 -0400</pubDate>
      <description>मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय आणल्याच्या आरोपांबाबत, भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजपचे मुंबई सचिव अखिलेश चौबे यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीद्वारे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदवून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/08/16/sonia-gandhi-complaint-filed-against-sonia-gandhi-over-the-insult-to-vande-mataram/
तक्रारीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील एआयसीसी (AICC) मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/08/15/what-exactly-happened-at-the-congress-headquarters-while-vande-mataram-was-being-played-who-will-face-punishment-now/
तक्रारीत नमूद केल्यानुसार, कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत गायले जात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चौबे यांनी आरोप केला आहे की, या व्हिडीओमध्ये सोनिया गांधी मंचावरील लोकांशी खुणांद्वारे संवाद साधताना दिसत आहेत आणि वंदे मातरमचा सुरुवातीचा भाग झाल्यानंतर ते थांबवण्याचा इशारा करत असल्याचेही दिसून येत आहे. तसेच, वंदे मातरम सुरू असतानाच राहुल गांधी यांनीही काही खुणा केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
https://prahaar.in/2026/08/17/vinod-tawde-piyush-goyal-and-bharati-pawar-in-bjps-national-executive/
याआधी वंदे मातरम्' प्रकरणात कर्नाटकातील मंगळूर येथील उर्वा पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांकडून सोनिया गांधी यांच्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ गायले जात असताना ते दोन कडव्यांनंतर थांबवण्याचे निर्देश दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप नेते विकास पुत्तूर यांनी कर्नाटकमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता मुंबईत मालाडच्या दिंडोशी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली आहे. यामुळे सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/08/17/smriti-irani-smriti-irani-to-join-the-bjps-new-team-raghav-chadhas-name-also-being-discussed/
नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘वंदे मातरम’चे गायन करण्यात आले. भाजपच्या आरोपानुसार, गीताची दोन कडवी झाल्यानंतर ते थांबवण्यात आले. कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने या घटनेला ‘वंदे मातरम’चा अवमान असल्याचे म्हटले आहे.</description>
      </item><item>
      <title>Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/17/noel-tata-met-amit-shah-and-an-official-from-the-prime-ministers-office/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/17/noel-tata-met-amit-shah-and-an-official-from-the-prime-ministers-office/</guid>
      <pubDate>Mon, 17 Aug 2026 23:01:05 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या आणि सर रतन टाटा ट्रस्टमधील सुरू असलेल्या कायदेशीर अडचणींच्या पार्श्वभूमीवर, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. टाटा समूहातील संचालक मंडळातील उत्तराधिकार आणि प्रशासकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी शनिवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान कार्यालयातील एका प्रमुख अधिकाऱ्याची भेट घेतली, अशी माहिती या घडामोडींची जाण असलेल्या व्यक्तींनी दिली.
https://prahaar.in/2026/08/17/good-news-indias-unemployment-rate-has-dropped-to-5-1-percent-womens-participation-has-also-increased/
सदिच्छा भेट म्हणून मानली जाणारी ही भेट, टाटा समूहातील अंतर्गत अशांततेच्या काळात होत आहे. ट्रस्ट्समधील अंतर्गत संघर्ष आणि त्यांच्या आतील व बाहेरील लोकांकडून होत असलेल्या प्रशासकीय त्रुटींच्या आरोपांशी हा समूह झुंज देत आहे. त्यातच टाटा समूहाला गेल्या बुधवारी सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी संचालक मंडळाला पत्र लिहून कळवले की, २० फेब्रुवारी २०२७ रोजी त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यावर ते पुनर्नियुक्तीसाठी स्वतःचा विचार केला जावा म्हणून अर्ज करणार नाहीत.
https://prahaar.in/2026/08/12/nine-free-trade-agreements-have-boosted-indian-industries-and-businesses/
या घटनेच्या एका दिवसानंतर, सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये टाटा सन्सच्या नियमावलीनुसार चंद्रशेखरन यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.</description>
      </item><item>
      <title>Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/17/first-international-cargo-flight-at-navi-mumbai-airport/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/17/first-international-cargo-flight-at-navi-mumbai-airport/</guid>
      <pubDate>Mon, 17 Aug 2026 22:47:13 -0400</pubDate>
      <description>पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला. हाँगकाँग येथून हाँगकाँग एअर कार्गोचे पहिले समर्पित आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांच्या विस्ताराचा हा महत्त्वाचा टप्पा असून, आगामी काळात आणखी १३ नवीन आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा सुरू होणार आहेत.
https://prahaar.in/2026/08/17/accelerate-the-construction-of-the-silla-aquarium-and-sea-lion-entertainment-centre-in-panvel-fisheries-minister-nitesh-rane/
हाँगकाँग एअर कार्गोतर्फे हाँगकाँग आणि नवी मुंबई दरम्यान आठवड्यातून तीन सेवा चालविण्यात येणार आहेत. यामुळे दर आठवड्याला सहा मालवाहतूक हवाई फेऱ्या होतील. या सेवेसाठी एअरबस ए३३०-२००एफ या मालवाहूविमानाचा वापर केला जाणार असून, त्यातून आयात-निर्यात मिळूनसुमारे ६० टन मालाची वाहतूक केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील विस्ताराला वेग देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अल्पावधीत दोन महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. १५ जुलै २०२६ रोजी एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबीला जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू झाली. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी इंडिगो कार्गोची शारजाहला जाणारी पहिली समर्पित मालवाहू सेवा सुरूकरण्यात आली. या सेवेद्वारे २० टन मालाची वाहतूक करण्यात आली. या घडामोडींमुळे प्रवासी तसेच मालवाहतूक क्षेत्रात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वेगवान प्रगती अधोरेखित झाली आहे.
https://prahaar.in/2026/08/17/india-faces-the-challenge-of-disposing-of-19000-tonnes-of-plastic-waste-daily/
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचा विस्तार वेगाने होतअसून, आशिया, युरोप आणि पश्चिम आशियातील प्रमुख शहरांसाठी विविध आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केले असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. यामध्ये हाँगकाँग, चेंगडू, बँकॉक, तैपेई, क्वालालंपूर, सिंगापूर, अबुधाबी, दोहा, फ्रँकफर्ट, इस्तंबूल, दुबई, अॅमस्टरडॅम, बहरीन, पॅरिस आणि रियाध या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
https://prahaar.in/2026/08/17/good-news-indias-unemployment-rate-has-dropped-to-5-1-percent-womens-participation-has-also-increased/
ऑगस्टच्या अखेरीस मालवाहू विमानांच्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. आशिया, युरोपआणि पश्चिम आशियातील महत्त्वाच्या बाजारपेठांशी जोडणी मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात येणार आहे. या वाढत्या नेटवर्कमुळे निर्यातदार, आयातदार आणि उद्योगांना अधिक संधी उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्र आणि पश्चिम भारतासाठी धोरणात्मक लॉजिस्टिक्स व व्यापार प्रवेशद्वार म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूमिका अधिक भक्कम होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणारी आणि विस्तारक्षम मालवाहतूक पायाभूत सुविधा देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय, एक्स्प्रेस तसेच विशेष प्रकारच्या मालवाहतुकीसाठी सज्ज आहे. यामध्ये औषधे, नाशवंतवस्तू, मौल्यवानवस्तू, अवजड माल आणि धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे. भविष्यात माल हाताळणी प्रक्रियेत स्वयंचलित तंत्रज्ञान आणि डिजिटल मालवाहतूक प्रणालींचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे.
https://prahaar.in/2026/08/17/minister-ashish-shelar-assumes-charge-as-chairman-of-n-d-studio-key-decisions-taken-to-boost-film-production/
पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र : राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण तसेच महाराष्ट्र शासनाच्या लॉजिस्टिक्स धोरण २०२४ शी सुसंगत पद्धतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तंत्रज्ञानाधारित आणि अखंडित मालवाहतूक व्यवस्था उभारली जात आहे. या विस्तारित नेटवर्कमुळे विमानतळाची जगातील प्रमुख व्यापार व लॉजिस्टिक्स केंद्रांशी जोडणी होणार असून, पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र म्हणून विमानतळाचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.</description>
      </item><item>
      <title>Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट</title>
      <link>https://prahaar.in/2026/08/17/will-dahi-handi-be-included-in-the-commonwealth-games-and-olympics-major-update-on-pro-govinda/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/08/17/will-dahi-handi-be-included-in-the-commonwealth-games-and-olympics-major-update-on-pro-govinda/</guid>
      <pubDate>Mon, 17 Aug 2026 22:40:45 -0400</pubDate>
      <description>मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची या वर्षीच्या हंगामासाठी 'ब्रांड ॲम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली आहे. लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मुंबईच्या या पारंपारिक खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प सोडला असून, भविष्यात दहीहंडीचा राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) आणि ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
https://prahaar.in/2026/08/17/permanent-solution-to-mobile-network-problem-in-sindhudurg-will-be-found-guardian-minister-nitesh-rane-instructs-jio-officials/
उद्घाटनाच्या दिवशी सर्व सहभागी संघांच्या कर्णधारांनी रॅम्प वॉक केला आणि त्यानंतर मानवी मनोरा (ह्युमन पिरामिड) रचून पारंपरिक गोविंदा संस्कृतीचे दर्शन घडवले. या लीगच्या माध्यमातून तब्बल ३,२०० गोविंदा खेळाडूंना आपली कला दाखवण्याची आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल याने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जबाबदारी सांभाळली होती, तर यंदा मुंबईचाच स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, चौथ्या हंगामातही प्रो गोविंदाने या पारंपरिक खेळाला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
https://prahaar.in/2026/08/17/financial-assistance-of-15-73-crore-provided-to-795-patients-for-organ-transplants-from-the-chief-ministers-medical-assistance-fund/
ऑलिंपिकपर्यंतच्या प्रवासाचे स्वप्न : पत्रकारांशी बोलताना पूर्वेश सरनाईक म्हणाले, "दहीहंडी हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित खेळ नसून तो जागतिक स्तरावर पोहोचावा हे आमचे स्वप्न आहे. दहीहंडी ऑलिंपिकमध्ये कशी जाणार यावर काही लोक हसतात; पण स्वप्न पाहणे चुकीचे नाही. त्यासाठी २५ वर्षे लागली तरी मी कठोर परिश्रम करेन. प्रथम राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतर ऑलिंपिकपर्यंत हा खेळ पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन."</description>
      </item></channel>
    </rss>