<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>US-Iran Deal : अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; १९ जूनला जिनेव्हात स्वाक्षरी होणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/historic-peace-agreement-between-the-us-and-iran-signing-to-take-place-in-geneva-on-june-19/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/historic-peace-agreement-between-the-us-and-iran-signing-to-take-place-in-geneva-on-june-19/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 22:50:33 -0400</pubDate>
      <description>वॉशिंग्टन / तेहरान : गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम आशियात (मध्यपूर्व) धगधगणाऱ्या युद्ध आणि लष्करी तणावाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात एका ऐतिहासिक शांतता कराराचा मार्ग मोकळा झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीची घोषणा केली आहे. आगामी शुक्रवार, १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे दोन्ही देशांमध्ये या ऐतिहासिक करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये १४ सूत्रीय सामंजस्य करारावर सहमती झाली आहे. या करारामुळे जागतिक तेलपुरवठा पुन्हा सुरळीत होऊन जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
https://prahaar.in/2026/06/15/what-did-prime-minister-modi-say-about-the-friendship-between-india-and-slovakia/
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ'वर इराणसोबतचा करार पूर्ण झाल्याचे जाहीर केले. व्हाईट हाऊसमध्ये आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'यूएफसी' कार्यक्रमाच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन! मी याद्वारे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (होर्मुझची सामुद्रधुनी) विनाशुल्क खुली करण्यास पूर्ण मंजुरी देत आहे. त्याचबरोबर अमेरिकेची नौदल नाकेबंदी त्वरित उठवण्यासही अधिकृत मान्यता देत आहे. जगातील जहाजांनो, तुमची इंजिने सुरू करा. तेलाचा प्रवाह सुरू होऊ द्या!" या करारामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य येईल, असा दावाही त्यांनी केला.
https://prahaar.in/2026/06/15/prime-minister-modi-to-lead-the-global-yoga-movement-from-kolkata-on-the-occasion-of-international-yoga-day/
तीन टप्प्यांत अंमलबजावणी
हा शांतता करार एकूण तीन मुख्य टप्प्यांत राबवला जाणार आहे. तत्काळ युद्धविराम लागू केला जाईल. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया कायमच्या थांबवल्या जातील आणि इराणवरील नौदल नाकेबंदी हटवून होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली जाईल. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत इराणची अमेरिकेकडे गोठवलेली २४ अब्ज डॉलरची मालमत्ता टप्प्याटप्प्याने मुक्त केली जाईल. यातील पहिली १२ अब्ज डॉलरची रक्कम वाटाघाटी सुरू होण्यापूर्वीच दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ६० दिवसांच्या आत इराणच्या अणुकार्यक्रमावर सविस्तर आणि अंतिम चर्चा केली जाईल. या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित १२ अब्ज डॉलरची रक्कमही इराणला सुपूर्द केली जाईल.
https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/
इराणची सावध भूमिका आणि 'विजयाचा' दावा
दुसरीकडे, इराणने या कराराचे स्वागत केले असले तरी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गारीबाबादी यांनी स्पष्ट केले की, "अमेरिकेने शत्रुत्व संपवणे, नाकेबंदी उठवणे आणि इराणची संपत्ती खुली करणे या अटी पूर्ण केल्याची खात्री पटल्यानंतरच इराण ६० दिवसांच्या औपचारिक वाटाघाटींच्या टप्प्यात प्रवेश करेल. दरम्यान, इराणच्या 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने' हा करार म्हणजे तेहरानचा मोठा राजनैतिक विजय असल्याचा दावा केला आहे. जनतेचा खंबीर पाठिंबा आणि लष्कराच्या प्रयत्नांमुळेच अमेरिकेला नमते घ्यावे लागले, असे परिषदेने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे लक्ष
या संपूर्ण कराराच्या अंमलबजावणीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष 'निरीक्षण यंत्रणा' स्थापन केली जाणार आहे. तसेच, या अंतिम कराराला 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या' ठरावाद्वारे मंजुरी मिळवण्याचाही प्रस्ताव यात ठेवण्यात आला आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही देशाने याचे उल्लंघन करू नये.
भारताला काय फायदा?
अमेरिका आणि इराणमधील हा संघर्ष मिटल्यास आणि होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित राहिल्यास जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होतील. भारत हा आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक तेल आयात करत असल्याने, तेलाचे दर कमी झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला, पर्यायाने देशातील इंधन दरांना मोठा दिलासा मिळू शकतो.
 शांतता कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत
अमेरिका आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील युद्ध समाप्तीबाबत आणि 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा सुरू करण्याबाबत झालेल्या ऐतिहासिक शांतता कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनापासून स्वागत केले आहे. या करारामुळे युद्धग्रस्त भागात पुन्हा शांतता व स्थैर्य निर्माण होईल, तसेच जागतिक व्यापार आणि सागरी वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अंतिम करारासाठी उरलेल्या मुद्द्यांवरही लवकरच एकमत होईल, अशी आशा त्यांनी दाखवली. पंतप्रधानांनी नमूद केले की, या युद्धामुळे संपूर्ण जगाला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असून अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हा शांतता करार जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
करारातील महत्त्वाच्या १४ अटी :
१. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तात्काळ आणि कायमस्वरूपी थांबवणे.
२. ६० दिवसांच्या वाटाघाटींदरम्यान इराणची २४ अब्ज डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता टप्प्याटप्प्याने सोडणे.
३. इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिका हस्तक्षेप करणार नाही; सार्वभौमत्वाचा आदर राखणार.
४. अमेरिका ३० दिवसांच्या आत इराणच्या शेजारील परिसरातून आपले जादा सैन्य मागे घेणार.
५. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणार आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी पूर्णपणे उठवणार.
६. इराण अण्वस्त्रे विकसित न करण्याच्या आपल्या जुन्या वचनाचे काटेकोर पालन करणार.
७. इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका व मित्र राष्ट्रांकडून किमान ३०० अब्ज डॉलर्सचा फंड तयार केला जाणार.
८. इराणच्या तेल, पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या निर्यातीवरील निर्बंध तूर्तास स्थगित होणार.
९. वाटाघाटी केवळ युरेनियमचे भविष्य, संवर्धन आणि आर्थिक पुनर्रचना यापुरत्याच मर्यादित राहणार.
१०. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि मित्र सशस्त्र गटांना (प्रॉक्सी) दिलेला पाठिंबा अजेंड्यातून वगळणार.
११. शांतता वाटाघाटी सुरू असताना अमेरिका या प्रदेशात अतिरिक्त सैन्य तैनात करणार नाही किंवा नवीन निर्बंध लादणार नाही.
१२. कराराच्या पारदर्शकतेसाठी विशेष देखरेख प्रणाली स्थापित केली जाईल.
१३. अंतिम कराराला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे आंतरराष्ट्रीय मंजुरी दिली जाईल.
१४. इराणला आपली सर्व आर्थिक संसाधने आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्याची पूर्ण परवानगी असेल.</description>
      </item><item>
      <title>Rebel TMC MP : तृणमूलच्या बंडखोर खासदारांचा गट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’त विलीन</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/group-of-rebel-trinamool-mps-merges-with-the-nationalist-citizens-party/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/group-of-rebel-trinamool-mps-merges-with-the-nationalist-citizens-party/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 22:24:31 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. तृणमूलमधून बाहेर पडलेल्या २० बंडखोर खासदारांच्या गटाने रविवारी ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षात विलीन होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतर बंडखोर गटाने केंद्र सरकारमधील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
https://prahaar.in/2026/06/15/adequate-stock-of-fertilizers-in-the-country-for-the-kharif-2026-season/
बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन एनसीपी पक्षात विलीन झाल्याचे आणि एनडीएला पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यातील कायदेशीर गुंतागुंत आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी बंडखोर टीएमसी खासदारांनी या नोंदणीकृत पक्षासोबत जाण्याचा पर्याय निवडला.
https://prahaar.in/2026/06/15/what-happened-after-530-pm-that-drove-sanchita-to-take-such-an-extreme-step/
ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ खासदार सुदीप बंडोपाध्याय आता बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे बंडखोर गटाची ताकद प्रचंड वाढली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडोपाध्याय यांनी थेट ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले. ते म्हणाले, “आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षात अधिकृतपणे विलीन झालो आहोत. आता खरी टीएमसी कोणती, याचा फैसला न्यायालयातच केला जाईल.” बंडखोर खासदार आणि आमदारांच्या आग्रहास्तव आणि लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</description>
      </item><item>
      <title>fertilizers stock : खरीप २०२६ हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/adequate-stock-of-fertilizers-in-the-country-for-the-kharif-2026-season/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/adequate-stock-of-fertilizers-in-the-country-for-the-kharif-2026-season/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 22:19:13 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांच्या शांतता करारानंतर निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही खरीप हंगाम २०२६ साठी देशात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रसायन व खत मंत्रालयाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खत विभागाच्या संयुक्त सचिव वंदना प्रयाशी यांनी सांगितले की, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&amp;FW) खरीप २०२६ साठी खतांची एकूण मागणी ३८३.९ लाख मेट्रिक टन इतकी निश्चित केली आहे. सध्या देशात १९६.६५ लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असून तो एकूण गरजेच्या सुमारे ५१ टक्के आहे. सामान्यतः हा साठा सुमारे ३३ टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे यंदाची स्थिती अधिक समाधानकारक असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.

https://prahaar.in/2026/06/15/64-percent-rainfall-deficit-in-the-country-16-states-including-maharashtra-await-rain/

सरकारच्या प्रभावी नियोजन, आगाऊ साठवणूक आणि सुधारित वाहतूक व्यवस्थेमुळे खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यात यश आले असल्याचेही सांगण्यात आले. चालू खरीप हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांनी १०२.७८ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची खरेदी केली आहे, जी एकूण गरजेच्या सुमारे २७ टक्के आहे. तसेच देशात सेंद्रिय खतांचा वापरही वाढताना दिसत आहे. सध्या २२.६७ लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांचा साठा उपलब्ध असून त्यापैकी ११.८२ लाख मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री केवळ ३.३१ लाख मेट्रिक टन होती. वंदना प्रयाशी यांनी सांगितले की, सेंद्रिय खतांच्या वापरात झालेली ही वाढ शेतकऱ्यांचा शाश्वत शेतीकडे वाढता कल दर्शवते. रासायनिक खतांसोबत सेंद्रिय पर्याय स्वीकारण्याची प्रवृत्ती सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/

मंत्रालयाच्या माहितीनुसार, अलीकडील जागतिक परिस्थितीनंतरही देशात १२३.६५ लाख मेट्रिक टन देशांतर्गत उत्पादन आणि ३९.३६ लाख मेट्रिक टन आयात झाली असून एकूण १६३.०१ लाख मेट्रिक टन खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, पुरेसा साठा, वेळेवर आयात आणि देशांतर्गत उत्पादनातील वाढ यामुळे खरीप हंगामात खतांच्या टंचाईचा धोका निर्माण होणार नाही. कृषी तज्ज्ञांच्या मते, वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता ही उत्पादनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्याची स्थिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताने खतांचा मजबूत साठा राखल्यामुळे खरीप हंगामातील कृषी उत्पादन स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</description>
      </item><item>
      <title>Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/vaibhav-sooryavanshi-in-ugly-fight-with-sri-lankan-player-tilak-varmas-meltdown-at-umpire-chaotic-scenes-in-dambulla/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/vaibhav-sooryavanshi-in-ugly-fight-with-sri-lankan-player-tilak-varmas-meltdown-at-umpire-chaotic-scenes-in-dambulla/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 22:14:05 -0400</pubDate>
      <description>कोलंबो : भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील रोमहर्षक झुंज केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर झालेल्या वादावादीमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरनंतर श्रीलंकेने बाजी मारली, मात्र विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याने मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
https://prahaar.in/2026/06/15/what-happened-after-530-pm-that-drove-sanchita-to-take-such-an-extreme-step/
निर्धारित ५० षटकांच्या खेळात दोन्ही संघांनी प्रत्येकी २६५ धावा केल्याने सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे मैदानात उतरले. अखेरच्या तीन चेंडूंवर १४ धावांची गरज असताना वैभवला केवळ ७ धावाच करता आल्या आणि भारताने हा सामना गमावला. पराभवाच्या पदरी पडलेल्या निराशेतून आणि मैदानावरील तणावातून वादाची ठिणगी पडली.
https://prahaar.in/2026/06/15/64-percent-rainfall-deficit-in-the-country-16-states-including-maharashtra-await-rain/
सामना संपल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू विजयाचा जल्लोष करत असतानाच, भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या एका क्षेत्ररक्षकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता-बघता धक्काबुक्कीत झाले. वैभवचा संताप इतका अनावर झाला होता की, त्याने श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून तिकडूनही तसेच कृत्य झाले. अखेर सूर्यांश शेडगे आणि श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांनाही एकमेकांपासून दूर केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/
मैदानावर निर्माण झालेल्या या तणावामागे खराब प्रकाशयोजनेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाश कमी असल्याने अंपायर सुपर ओव्हर घेण्यास तयार नव्हते, ज्यावरून भारताचा कर्णधार तिलक वर्मा आणि अंपायर यांच्यात बराच काळ वादावादी झाली होती. याच पार्श्वभूमीवर खेळाडू आधीच तणावाखाली होते आणि पराभवाच्या झटक्यानंतर या रागाचा स्फोट मैदानावर झाला.
https://prahaar.in/2026/06/15/first-phase-of-the-states-census-successful/
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ४९.२ षटकांत २६५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात अरशद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेलाही ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंतच मजल मारता आली. जरी मैदानावर काही काळ कटुता निर्माण झाली असली, तरी सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. अफगाणिस्तान 'ए' विरुद्धच्या पराभवानंतर इंडिया 'ए' चा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.</description>
      </item><item>
      <title>Sanchita Ugale : संध्याकाळी साडेपाच नंतर असं काय घडलं की संचिताने टोकाचं पाऊल उचललं ?</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/what-happened-after-530-pm-that-drove-sanchita-to-take-such-an-extreme-step/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/what-happened-after-530-pm-that-drove-sanchita-to-take-such-an-extreme-step/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 22:02:57 -0400</pubDate>
      <description>नालासोपारा : 'वागळे की दुनिया' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगले हिने गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. संचिता मुंबईजवळील नालासोपारा परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती आई वडील आणि बहीण अंजली यांच्यासोबत आचोळे गावातील घरात राहत होती.

https://prahaar.in/2026/06/15/64-percent-rainfall-deficit-in-the-country-16-states-including-maharashtra-await-rain/

काय झालं ५:३० च्या नंतर ?

रविवारी संध्याकाळी संचिता आणि तिची बहीण दोघीच होत्या. आई बाबा काही कामासाठी बाहेर गेले होते. धाकटी बहीण अंजली सायंकाळी सुमारास 5.30 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरी कोणीही नाही हे पाहून संचिताने संध्याकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली. बेडरूमला आतून कडी लावली आणि पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला. तिची बहीण आणि आई बाबा जेव्हा घरी परत आले तेव्हा हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने संचिताला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

https://prahaar.in/2026/06/15/what-did-prime-minister-modi-say-about-the-friendship-between-india-and-slovakia/

प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारा पुरावा आढळून आलेला नाही. पण संचिताच्या चुलत भावाने एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याने एक सोशल मीडिया पोस्ट दाखवून पत्रकारांशी बोलताना संचिताची आत्महत्या आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या यात काहीतरी संबंध असल्याचा मुद्दा उपस्थित केला तसेच या प्रकरणी चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आता पोलीस संचिताच्या आयुष्यात मागील काही दिवसांत काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संचिता उगले आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.</description>
      </item><item>
      <title>Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/64-percent-rainfall-deficit-in-the-country-16-states-including-maharashtra-await-rain/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/64-percent-rainfall-deficit-in-the-country-16-states-including-maharashtra-await-rain/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 21:50:09 -0400</pubDate>
      <description>मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या भागावर मोसमी ढगांचा अभाव दिसून आला. हवामान विभागाच्या मते, 4 ते 15 जून दरम्यान देशात सरासरी 53.7 मिमी पाऊस पडायला हवा होता, परंतु केवळ 19.2 मिमी पाऊस झाला, ज्यामुळे पावसाची 64 टक्के तूट निर्माण झाली आहे. मोसमी पावसाच्या मंदावण्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर, मोसमी पाऊस महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपास थांबला आहे. ईशान्येकडील राज्यांमधून पुढे सरकल्यानंतर, तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये थांबला आहे.
https://prahaar.in/2026/06/15/first-phase-of-the-states-census-successful/
कोकणात आल्यानंतर थांबलेल्या मान्सूनमध्ये प्रगती होण्याची आशा असतानाच सॅटेलाईटने टिपलेल्या छायाचित्रांनी काहीसी चिंता वाढवली आहे. उपग्रहाच्या फोटोंमध्ये मान्सून भारतातून पूर्णपणे गायब झाल्यासारखा दिसत आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पावसाच्या गतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. १५ जून रोजी 'इन्सॅट-३डीएस' (INSAT-3DS) या उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये ही परिस्थिती अधिकच स्पष्टपणे समोर आली आहे. सक्रिय मान्सूनशी संबंधित असलेला ढगांचा मोठा थर दिसण्याऐवजी, बहुतांश द्वीपकल्पीय आणि मध्य भारतात आकाश असामान्यपणे निरभ्र दिसत आहे. ढगांची मुख्य हालचाल हिमालय, ईशान्य भारत आणि इंडो-गंगेच्या खोऱ्यात उत्तरेकडील भागांवर केंद्रित झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखाही कमकुवत आणि विखुरलेली दिसत आहे.
https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/
मागील काही दिवसांमध्ये मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या काही भागांत प्रगती केली असली, तरी हा वेग चिंता वाढावी इतका मंदावला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मूळ कारण आजूबाजूच्या समुद्रातील आर्द्रतेच्या कमतरतेची नसून, जमिनीपासून काही किलोमीटर वर (उच्च वातावरणात) सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील संघर्षाचे आहे. या समस्येच्या केंद्रस्थानी पश्चिमेकडून वाहणारा वेगवान वायू प्रवाह आहे. उच्च वातावरणातील हा वेगाने वाहणारा हवेचा प्रवाह नेहमीपेक्षा खूपच दक्षिणेकडे सरकला आहे. या असामान्य बदलामुळे पूर्वेकडून वाहणार वेगवान वायू सक्रिय होण्यात अडथळा येत आहे, जो भारतातील मान्सूनचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी मुख्य इंजिन म्हणून काम करतो.
https://prahaar.in/2026/06/15/launch-of-indias-first-wind-energy-supply-chain-portal/
पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज पाहिल्यास १६ जून रोजी बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही भागांत ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी व कर्नाटकच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत ताशी ४०-६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच १७ जून रोजी सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह (ताशी ४०-६० किमी) पाऊस पडू शकतो. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो.
https://prahaar.in/2026/06/15/prime-minister-modi-to-lead-the-global-yoga-movement-from-kolkata-on-the-occasion-of-international-yoga-day/
महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात १७ जूनपर्यंत आणि विदर्भात १६ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यामध्ये १७ जूनपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत १६ जूनपर्यंत रात्रीच्या वेळीही उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.</description>
      </item><item>
      <title>PM Modi : भारत आणि स्लोव्हाकिया मैत्रीबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/what-did-prime-minister-modi-say-about-the-friendship-between-india-and-slovakia/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/what-did-prime-minister-modi-say-about-the-friendship-between-india-and-slovakia/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 21:43:18 -0400</pubDate>
      <description>स्लोव्हाकिया : भारत आणि स्लोव्हाकियाने आपले संबंध 'सर्वसमावेशक भागीदारी'च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे ही घोषणा केली. ते म्हणाले की, हे दोन्ही देशांमधील सामायिक विश्वास, प्राधान्यक्रम आणि भविष्याचे प्रतीक आहे.
https://prahaar.in/2026/06/15/prime-minister-modi-to-lead-the-global-yoga-movement-from-kolkata-on-the-occasion-of-international-yoga-day/

पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी ब्रातिस्लावा येथे द्विपक्षीय चर्चा केली. चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार निवेदन दिले आणि सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली.

https://prahaar.in/2026/06/15/launch-of-indias-first-wind-energy-supply-chain-portal/

पंतप्रधान मोदींनी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्लोव्हाकियाने केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी या कराराच्या लवकर अंमलबजावणीसाठी एकत्र काम करण्यावरही भर दिला. ते म्हणाले की, यामुळे दोन्ही देशांतील उद्योग, स्टार्टअप्स आणि व्यवसायांना सर्वाधिक फायदा होईल.

https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/

संरक्षण सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, या क्षेत्रातील सहकार्य हे दोन्ही देशांमधील विश्वास आणि सामरिक सामंजस्याचा परिणाम आहे. यामुळे संयुक्त विकास, उत्पादन आणि संरक्षण उद्योग सहकार्याला नवी चालना मिळेल. पंतप्रधानांनी नमूद केले की, स्लोव्हाक विद्यापीठात एआयवर एक भारतीय अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यांचा विश्वास आहे की, एआयचे भविष्य केवळ नवोन्मेषावरच नव्हे, तर विश्वास, जबाबदारी आणि मानवी प्रतिष्ठेवरही आधारित असले पाहिजे. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील संबंध हे सखोल सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंधांवर आधारित असल्याचे वर्णन केले आणि म्हणाले की, भारताच्या प्राचीन उपनिषदांचे स्लोव्हाक भाषेत झालेले भाषांतर हे आपल्या सांस्कृतिक जवळीकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच भारतातील भारतीय वंशाचे लोक अर्थव्यवस्था आणि समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

https://prahaar.in/2026/06/15/first-phase-of-the-states-census-successful/

२०१७ मध्ये भारताने स्लोव्हाकियाचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. आज, भारत अंतराळ क्षेत्रात अभूतपूर्व वेगाने नवीन उंची गाठत आहे. त्यांनी स्लोव्हाकियन कंपन्यांना विकासाच्या या प्रवासात सामील होण्याचे आवाहन केले.</description>
      </item><item>
      <title>Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/first-phase-of-the-states-census-successful/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/first-phase-of-the-states-census-successful/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 21:39:52 -0400</pubDate>
      <description>मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत हा पहिला टप्‍पा राबवला. या टप्प्यादरम्यान प्रगणकांनी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या गृह सूची क्षेत्रातील कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची उत्तरे एका मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संकलित केली. हे प्रश्न प्रामुख्याने घरांची स्थिती, त्या त्या कुटुंबांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि कौटुंबिक मालमत्ता या बाबींशी संबंधित होते. जनगणनेच्या अनुषंगाने कुटुंबांनी पुरवलेली सर्व वैयक्तिक माहिती कायद्याद्वारे सुरक्षित असून, ही माहिती पूर्णतः गोपनीय असणार आहे. या टप्प्यात राबवल्या गेलेल्या गृह सूची प्रक्रियेमुळे घरांची स्थिती, कौटुंबिक सुविधा आणि मालमत्तांची उपलब्धता याबद्दलची माहिती संकलित होणार आहे. यासोबतच फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या मुख्य लोकसंख्या प्रगणनेसाठी (Population Enumeration) आवश्यक असलेला आराखडाही यामुळे आखता येणार आहे. त्यामुळे या जगगणनेत प्रत्येक घटकाची नोंद होईल याची सुनिश्चिती होणार आहे.
https://prahaar.in/2026/06/15/prime-minister-modi-to-lead-the-global-yoga-movement-from-kolkata-on-the-occasion-of-international-yoga-day/
महाराष्ट्रातील जनगणना 2027 चा हा पहिला टप्पा सर्व 36 जिल्हे आणि 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये राबवला गेला. यासाठी मुख्य जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही प्रगणना प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्धतीने पार पडावी याण्यासाठी एकूण 2,20,514 गृह सूची क्षेत्रांची आखणी केली गेली होती, आणि त्यासंबंधीची जबाबदारी वैयक्तिक प्रगणकांकडे सोपवण्यात आली होते. या अंतर्गत प्रत्येक सहा प्रगणकांच्या गटाच्या कामाची देखरेख करण्याची जबाबदारी प्रत्येकी एका पर्यवेक्षकाने पार पाडली. ही मोहीम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये 34 जिल्हाधिकारी आणि 29 महानगरपालिका आयुक्तांसह 63 मुख्य जनगणना अधिकारी, 947 चार्ज अधिकारी, 141 मुख्य प्रशिक्षक, 3,850 क्षेत्र प्रशिक्षक आणि सुमारे 2.45 लाख प्रगणक तसेच पर्यवेक्षक तैनात करण्यात आले होते.
https://prahaar.in/2026/06/15/launch-of-indias-first-wind-energy-supply-chain-portal/
देशातली याआधीची अखेरची जनगणना 2011 मध्ये झाली होती. आगामी जनगणना 2027 ही देशातील 16 वी आणि स्वातंत्र्योत्तर काळातील 8 वी जनगणना ठरणार आहे. ही मोहीम निर्धारित मुदतीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि जनगणनेशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांबद्दल महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच जनगणना 2027 च्या या गृह सूची आणि गृह गणना करण्याच्या टप्प्यात मोलाचे सहकार्य आणि पाठबळ दिल्याबद्दल संचालनालयाने राज्यातील नागरिक, महाराष्ट्र राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि प्रसारमाध्यम संस्थांचेही आभार मानले आहेत.</description>
      </item><item>
      <title>Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी कोलकातातून जागतिक योग चळवळीचे करणार नेतृत्व</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/prime-minister-modi-to-lead-the-global-yoga-movement-from-kolkata-on-the-occasion-of-international-yoga-day/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/prime-minister-modi-to-lead-the-global-yoga-movement-from-kolkata-on-the-occasion-of-international-yoga-day/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 21:22:48 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देणारा विशेष कार्यक्रम आज केंद्रीय आयुष मंत्रालयाने, नवी दिल्लीतील राष्‍ट्रीय माध्‍यम केंद्रामध्‍ये घेतला. या कार्यक्रमातून, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध समारंभांची घोषणा करण्यात आली. यंदाचा योगदिनाचा देशातील मुख्य कार्यक्रम, 21 जून रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यानिमित्त, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा दाश, आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल आणि पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/15/launch-of-indias-first-wind-energy-supply-chain-portal/

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिना ची संकल्पना " सुदृढ वृद्धत्वासाठी योग" अशी असून, हा विषय, ही या शतकातील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आणि संधींपैकी एका विषयाला स्पर्श करणारा आहे., असे जाधव यांनी यावेळी सांगितले. जगभरातील लोकांचे आयुर्मान पूर्वीपेक्षा अधिक वाढत आहे. मात्र, वार्धक्याकडे झुकल्यानंतरही, निरोगी, सक्रिय, स्वावलंबी आणि अर्थपूर्ण आयुष्य लाभणे, हेच खरे आव्हान आहे. योग हा निरोगी वृद्धत्वाचा काळाच्या कसोटीवर खरा ठरलेला आणि सर्वसमावेशक मार्ग आहे. तो शारीरिक आरोग्य सुदृढ करतो, मानसिक आरोग्याला चालना देतो आणि जीवनाची एकूण गुणवत्ता उंचावतो." असेही जाधव यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आजवरच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने भारताचा प्रस्ताव स्वीकारला. यामुळे योग साधनेचे रूपांतर एका भारतीय परंपरेतून आरोग्य आणि कल्याणासाठीच्या जागतिक चळवळीत झाले असल्याचे ते म्हणाले. आज योग साधना ही सीमा, संस्कृती आणि भाषांच्या पलीकडे गेली आहे, आणि आरोग्य, सौहार्द आणि कल्याणाच्या शोध घेत असलेल्या लोकांना एकत्र आणणारी एक परस्पर सामायिक जागतिक चळवळ म्हणून योग साधना उदयाला आली आहे, असे ते म्हणाले. या चळवळीच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय विस्तारावराबद्दलची माहितीही त्यांनी दिली. आयसीसीआर म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सहकार्याने परदेशातील 210 पेक्षा जास्त भारतीय दूतावास जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अभूतपूर्व सहभागातून योग साधनेबद्दलचे जागतिक आकर्षण तसेच विविध समाजांमधील सध्याच्या आरोग्य विषयक आव्हानांवर मात करण्यासाठी योग साधनेच्या उपयुक्ततेची प्रचिती येते असेही ते म्हणाले.

https://prahaar.in/2026/06/15/major-action-by-fssai-staple-pins-and-metal-wires-in-food-packaging-banned-penalties-for-violations/

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पूर्वतयारीच्या कालावधीदरम्यान साध्य केलेल्या एका मोठ्या यशाची घोषणाही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केली. 14 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष देशव्यापी योग सत्रात एकाच वेळी चार लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. यामुळे एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. या यशातून लोकांमध्ये योग साधनेप्रती असलेला विलक्षण उत्साह दिसून येतो, तसेच या चळवळीतील लोकसहभाग दरवर्षी कशा रितीने यशाची नवी शिखरे गाठत आहे याचीही प्रचिती येते असे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 100 महत्वाच्या ठिकाणी विशेष आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आयोजनांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि योग परंपरेचे एकात्मिकरण घडवून आणले जाईल असे ते म्हणाले. या उपक्रमातून आरोग्य, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमानाचा एक अनोखा संगम घडून येईल, तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे रूपांतर पिढ्यानपिढ्या आणि भौगोलिक सीमा ओलांडणाऱ्या एका उत्सवात होईल असे ते म्हणाले.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 चा मुख्य राष्ट्रीय सोहळा 21 जून रोजी कोलकाता इथल्या ऐतिहासिक रेड रोड इथे आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडेल अशी घोषणाही त्यांनी केली.यासोबतच गेल्या काही महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या काउंटडाउन कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेखही त्यांनी केला. याअंतर्गत नवी दिल्लीतील 100 दिवसांचा काउंटडाउन कार्यक्रम, महाराष्ट्रातील लोणार इथे 75 दिवसांचा कार्यक्रम, हैदराबादमधील कान्हा शांती वनम इथे 50 दिवसांचा कार्यक्रम आणि खजुराहो इथे 25 दिवसांच्या काउंटडाउन कार्यक्रमांचा समावेश होता.

13 ते 20 जून दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या "गंगोत्री ते गंगासागर: गंगा तट योग यात्रा" यावरही जाधव यांनी प्रकाश टाकला. गंगोत्री, हरिद्वार, वाराणसी, पटना, हुगळी आणि गंगासागर या ठिकाणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाचा उद्देश योगाला पर्यावरण संवर्धन, नदी संस्कृती आणि सामुदायिक सहभाग यांच्याशी जोडणे हा आहे. याशिवाय मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोलकाता येथे काही विशेष कार्यक्रमांची मालिका देखील आयोजित केली जाणारे असल्याचे त्यांनी सांगितले. 19 जून रोजी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करणारा "दौड से ध्यान" हा कार्यक्रम शहरातआयोजित केला जाईल, तर 20 जून रोजी "वंदे योगम्" तसेच पश्चिम बंगाल दिनाच्या सोहळ्यांसह इतर कार्यक्रमांमध्ये योग, देशभक्ती आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुसंवादी संगम दिसून येईल.</description>
      </item><item>
      <title>Wind Energy : देशातील पहिल्या पवन ऊर्जा पुरवठा साखळी पोर्टलचा शुभारंभ</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/15/launch-of-indias-first-wind-energy-supply-chain-portal/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/15/launch-of-indias-first-wind-energy-supply-chain-portal/</guid>
      <pubDate>Mon, 15 Jun 2026 21:16:08 -0400</pubDate>
      <description>पणजी : भारताची नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था बळकट करण्याच्या आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज गोव्यात आयोजित 'ग्लोबल विंड डे कॉन्फरन्स 2026' मध्ये 'डब्ल्यूटी-मारुत' (विंड टर्बाइन मटेरियल्स अँड रिसोर्सेस युटिलिटी ट्रॅकर) या भारतातील पहिल्या वहिल्या 'पवन ऊर्जा टर्बाइन साहित्य पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी समर्पित पोर्टल'चा आरंभ केला. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक; गोवा सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री सुदिन ढवळीकर; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी; तसेच उत्पादक आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/06/15/successful-test-of-a-long-range-surface-to-surface-cruise-missile/

"पवन ऊर्जा: महत्त्वाकांक्षेपासून गतिमान प्रगतीकडे" (विंड एनर्जी: फ्रॉम अँबिशन टू अ‍ॅक्सलरेशन) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेत, ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच पर्यावरणीय शाश्वततेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पवन ऊर्जा अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाल्याचे स्पष्ट करताना, पवनऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन आणि निर्यात यांमध्ये प्रमुख जागतिक केंद्र बनण्याची भारतामध्ये क्षमता आहे, यावर जोशी यांनी विशेष भर दिला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते 'विंड डीसीआर' पोर्टल, 'पवन ऊर्जा' या विषयावरील कॉफी टेबल बुक तसेच प्रमुख उद्योग आणि ज्ञान-भागीदारांनी तयार केलेले अनेक ज्ञान-विषयक आणि राज्यनिहाय धोरण अहवालांचेही प्रकाशन करण्यात आले.
https://prahaar.in/2026/06/15/major-action-by-fssai-staple-pins-and-metal-wires-in-food-packaging-banned-penalties-for-violations/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक उद्दिष्ट आता लोकचळवळीत रुपांतरित झाले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आपल्या विशेष भाषणात सांगितले. भारताच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी निम्मी वीज आता बिगरजीवाश्म इंधन स्रोतांपासून तयार केली जात असल्यामुळे 2030 पर्यंत बिगर जीवाश्म स्रोतांपासून 500 गिगावॅट वीज निर्मितीचे तसेच 2070 पर्यंत 'नेट झिरो' (निव्वळ उत्सर्जन शून्यावर)चे उद्दीष्ट साध्य करण्याची भारताची वचनबद्धता आणखी पक्की झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/06/14/rumor-spread-in-morena-madhya-pradesh-leading-to-a-major-accident-on-the-railway-tracks-that-claimed-the-lives-of-four-people/

गोव्याचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी परिषदेला संबोधित करताना, गोव्यात पवन ऊर्जा विकासाचा विस्तार करण्याच्या संधी आणि क्षमतेवर प्रकाश टाकला तसेच नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पाठिंबा देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
https://prahaar.in/2026/06/14/14-women-officers-ready-in-the-first-nda-batch-following-the-supreme-courts-verdict/

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) 'इंडियन विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' (आयडब्ल्यूटीएमए), 'विंड इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन' (डब्ल्यूआयपीपीए) आणि 'इंडियन विंड पॉवर असोसिएशन' (आयडब्ल्यूपीए) यांसारख्या पवन ऊर्जेच्या क्षेत्रातील प्रमुख संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, विकासक, उत्पादक, वित्तीय संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक सहभागी झाले होते.</description>
      </item></channel>
    </rss>