<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटला; संघर्ष संपला आणि महादेव भक्तांचा विजय झाला</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/09/pimpleshwar-mahadev-mandirachya-jaminicha-prashna-sutala-sangharsh-sampala-aani-mahadev-bhaktancha-vijay-zala/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/09/pimpleshwar-mahadev-mandirachya-jaminicha-prashna-sutala-sangharsh-sampala-aani-mahadev-bhaktancha-vijay-zala/</guid>
      <pubDate>Tue, 09 Jun 2026 01:29:18 -0400</pubDate>
      <description>ठाणे महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ही सर्व जमीन आता पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी उद्योगमंत्री डॉ उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल,पिंपळेश्वर मंदिराचे विश्वस्त (ट्रस्टी) आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधीवत महापूजा करण्यात आली. यावेळी भक्त मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सहकार्यामुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले आहे. मात्र, आम्ही सर्व जण केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. त्यामुळे या यश प्राप्तीचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते. हे पुण्यकर्म करण्याची संधी महादेवाने आम्हास दिली. आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करून घेतले. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, तोच सुवर्ण इतिहास पिंपळेश्वर महादेवाला पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन या ठिकाणी करणार आहे.
पंढरीनाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.</description>
      </item><item>
      <title>Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/urgently-improve-the-current-condition-of-opds-and-toilets-in-municipal-hospitals/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/urgently-improve-the-current-condition-of-opds-and-toilets-in-municipal-hospitals/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 22:45:02 -0400</pubDate>
      <description>मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी)

प्रशासकीय अडचणी दूर करून सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेबाबत प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा, त्यात कालसुसंगत बदल करण्यासाठी काय सुधारणा आवश्यक आहेत, त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच, महानगरपालिका रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. यापुढे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा आणि उपक्रमाबाबत नियमितपणे आढावा बैठक आयोजित केली जाईल, असेही शेलार यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य खात्याबाबतची सद्यस्थिती आणि आधुनिकरण यासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ८ जून २०२६ रोजी पार पडली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेलार हे बोलत होते.

आमदार अमित साटम, आमदार श्रीमती विद्या ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, महानगरपालिका सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा, महानगरपालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी, मुंबई महानगरपालिका सध्या देत असलेल्या आरोग्य सेवेबाबत संपूर्ण माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

तर सर्व आमदारांनी या आरोग्य सेवांमध्ये प्रत्यक्ष येत असलेल्या अडचणी, रुग्णांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या, रुग्णालयांचा पुनर्विकास आणि इतर प्रशासकीय अडचणी याबाबत सूचना मांडल्या तसेच तक्रारी नोंदवल्या.

पालकमंत्री शेलार यांनी सांगितले की, महानगरपालिकेने राज्याचा आरोग्य विभाग, नगर विकास विभाग या सगळ्यांशी संबंधित असणाऱ्या प्रशासकीय बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पुढील बैठक आयोजित करावी. रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल आणि एकूणच चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशा दृष्टीने सर्व पैलूंचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, ज्या प्रशासकीय सुधारणा अपेक्षित आहेत, त्याचा आराखडा सादर करावा, असे शेलार म्हणाले. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांप्रमाणे आरोग्य सेवा पुरवठा यावी यासाठी आर्थिक तरतुदींच्या पलीकडे जाऊन आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा (मेडिटेक) अवलंब करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू करावेत, अशी सूचनाही शेलार यांनी केली.

मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यातील आवश्यक ती रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर करावी. कोविड काळामध्ये महानगरपालिकेसाठी कंत्राट तत्त्वावर सेवा बजावलेल्या मनुष्यबळाला या विहित भरती प्रक्रियेत एकवेळचे विशेष धोरण म्हणून प्राधान्य देऊन सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना महापौरांनी केली. सिद्धार्थ रुग्णालय, राजावाडी रुग्णालय यासह ज्या ज्या रुग्णालय आणि दवाखान्यांचा पुनर्विकास लांबला आहे, त्या ठिकाणी प्रशासनाने विशेष लक्ष पुरवावे. अडचणींचे युद्ध पातळीवर निराकरण करावे. प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नर्सिंग कॉटेज सुविधा पुरवावी, झिरो प्रिस्क्रिप्शन सेवा लवकर सुरू करावी, टाटा कर्करोग रुग्णालय लगत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉरिडोर करावा, केइएम रुग्णालयामध्ये एआरटी विभाग सुरू करावा तसेच तेथील संग्रहालयाचे नूतनीकरण करावे, कूपर रुग्णालयात ईएमएस वॉर्ड तयार करावा तसेच तेथे महानगरपालिकेने स्वतःच्या अखत्यारीतील शव विच्छेदन केंद्र (post mortem center) सुरू करावे, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयात मॉड्युलर ओटी तयार करावा, यासह इतर विविध निर्देश महापौरांनी दिले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता कक्ष हा विभाग स्थापन करावा. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर रुग्णांना सहाय्यता पुरवण्यासाठी सुलभ आणि पारदर्शक अशी प्रणाली विकसित करावी, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले.

आमदार अमित साटम म्हणाले की, मुंबईभर आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारण्यावर भर द्यावा. डायलिसिस सुविधांचा विस्तार करावा, शहरव्यापी 'मधुमेहमुक्त मुंबई' अभियान सुरू करावे, प्रस्तावित कर्करोग उपचार बेड वेळेवर कार्यान्वित करावे, मानसिक आरोग्य केंद्रे स्थापन करावीत आणि प्रत्येक रुग्णालयात रुग्णशय्या संख्या लक्षात घेऊन आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करावी, इत्यादी मागण्या साटम यांनी यावेळी केल्या.

पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत येत्या काही वर्षांत पाच हजार नव्या रुग्णशय्या उपलब्ध होणार असल्याने त्या प्रभावीपणे चालविण्यासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या नियोजनाबाबतही महानगरपालिकेने आतापासूनच सर्वंकष मनुष्यबळ आराखडा तयार करावा. परिचारिका, ओपीडी डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णांशी थेट संपर्कात येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे संवेदनशीलतेबाबत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना अधिक सहानुभूतीपूर्ण, सन्मानपूर्वक आणि कार्यक्षम सेवा मिळू शकेल, असे साटम यांनी सांगितले.</description>
      </item><item>
      <title>Visakhapatnam Steel Plant : विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात दुर्घटना, वितळलेले स्टील अंगावर पडले आणि...</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/8-workers-killed-after-ladle-carrying-molten-steel-explodes-in-vizag-steel-plant/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/8-workers-killed-after-ladle-carrying-molten-steel-explodes-in-vizag-steel-plant/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 22:11:43 -0400</pubDate>
      <description>विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात मोठी दुर्घटना झाली. काम सुरू असताना वितळलेले स्टील अंगावर पडल्यामुळे आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.




&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)



स्टील प्रकल्पात काम सुरू असताना स्फोट झाला. स्फोटानंतर विशिष्ट प्रकारच्या भांड्यातले वितळलेले स्टील कामगारांच्या अंगावर उडाले. या दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला. प्रकल्पातील इतर कर्मचाऱ्यांनी धावपळ केली आणि आग नियंत्रणात आणली. भाजलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
https://prahaar.in/2026/06/08/indians-ordered-to-leave-iran-immediately/
घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी विशाखापट्टणमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पोलीस आयुक्तांशी फोनवरून बातचीत केली. घटनेची माहिती घेतली आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. वितळलेले स्टील अंगावर पडून जखमी झालेल्या कामगारांना आवश्यक ती वैद्यकीय मदत तातडीने मिळवून द्या असेही निर्देश आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत. स्टील प्रकल्पातील दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याविषयीची माहिती मिळताच आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले.
https://prahaar.in/2026/06/08/oman-rescues-indian-sailors-after-airlifting-them-from-ship-in-distress/
पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
स्टील प्रकल्पातील दुर्घटनेविषयी पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना दोन - दोन लाखांची तर जखमींना उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले.


Saddened by the mishap at the Visakhapatnam Steel Plant. Condolences to those who have lost their loved ones. Praying that the injured recover at the earliest. The local authorities are providing all possible assistance to those affected.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF…
— PMO India (@PMOIndia) June 8, 2026

दुर्घटनेची चौकशी होणार
स्टील प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी होणार आहे. स्फोट नेमका का झाला हे जाणून घेतले जाईल. दुर्घटनेत ठार झालेले कर्मचारी कंत्राटी होते की कंपनीत कार्यरत होते हे अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.</description>
      </item><item>
      <title>Advisory For Indians : भारतीयांना तत्काळ इराण सोडण्याचे आदेश</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/indians-ordered-to-leave-iran-immediately/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/indians-ordered-to-leave-iran-immediately/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 21:53:41 -0400</pubDate>
      <description>तेहरान : इराणआणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष कमालीचा वाढला असून मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रविवारी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागल्यानंतर, इस्रायलनेही इराणच्या मुख्य भूमीवर प्रतिहल्ला केला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत, उपलब्ध मार्गांचा वापर करून तात्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच इतर भारतीयांना इराणचा प्रवास न करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी या परिस्थितीला अमेरिका थेट जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, इस्रायलने हल्ले सुरूच ठेवल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'बाब-अल-मंदेब' हा समुद्री मार्ग बंद केला जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे. हा जलमार्ग आशिया, युरोप आणि अरब देशांमधील व्यापाराचा मुख्य कणा असल्याने, इराणच्या या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.</description>
      </item><item>
      <title>Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/geomagnetic-storm-to-hit-earth-nasa-warns-aurora-likely-to-be-seen-in-india-too/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/geomagnetic-storm-to-hit-earth-nasa-warns-aurora-likely-to-be-seen-in-india-too/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 21:18:03 -0400</pubDate>
      <description>मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा ढग वेगाने प्रवास करत असून, त्यातून तीव्र भूचुंबकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हे भूचुंबकीय वादळ आज पृथ्वीवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेची स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर (एसडब्यूपीसी) या संस्थेने जी थ्री श्रेणीच्या (तीव्र) भूचुंबकीय वादळाचा इशारा दिला आहे.
सूर्यापासून आलेल्या ऊर्जेमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात तात्पुरता व्यत्यय निर्माण होतो यालाच भूचुंबकीय वादळ असे म्हणतात. सूर्यातून निर्माण होणाऱ्या सौर ज्वालांचा उद्रेक झाल्यानंतर चुंबकीय वायूचे प्रचंड ढग आकाशात गेले जातात. यापैकी काही उद्रेक पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला स्पर्श करून पुढे जातात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नुकताच सूर्याच्या पृष्ठभागावरील सक्रिय भागातून सौर ज्वाला (सोलर फ्लेअर ) उसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात चुंबकीय वायू आणि फिलामेंट (सूर्यावरील प्लाझ्माचा पट्टा) अवकाशात फेकला गेला. हा ढग पृथ्वीच्या दिशेने सरकत असून त्याचा परिणाम पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर होऊ शकतो. हा प्लाझ्माचा ढग सुमारे १ हजार ४०० किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत आहे.
https://prahaar.in/2026/06/08/oman-rescues-indian-sailors-after-airlifting-them-from-ship-in-distress/
घटना काय ?
सूर्याच्या पृष्ठभागावरील ‘ऍक्टिव्ह रिजन ४४६१’ या भागातून एम १.८ श्रेणीची सौर ज्वाला उसळली. सौर ज्वाला म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर साठलेल्या चुंबकीय ऊर्जेचा अचानक आणि तीव्र स्फोट होय. या स्फोटासोबत दाट आणि चुंबकीय ‘कोर फिलामेंट’ अवकाशात फेकले गेले, ज्याची दिशा थेट पृथ्वीच्या दिशेने आहे. कोर फिलामेंट म्हणजे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात अडकलेला घनदाट प्लाझ्माचा मुख्य भाग. हा भाग तुटून अवकाशात गेला तर त्यातून शक्तिशाली सौर उद्रेक निर्माण होऊ शकतो.
परिणाम काय ?
प्लाझ्माचा ढग पृथ्वीवर थेट आदळत नाही कारण पृथ्वीभोवती मजबूत चुंबकीय कवच (मॅग्नेटोस्फिअर) असते. हे कवच आपले संरक्षण करते. मात्र हा ढग पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आल्यावर त्यात तात्पुरता व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे काही उपग्रहांच्या कार्यात तात्पुरते अडथळे निर्माण होतात तसेच जीपीएस सेवांमध्ये काही क्षण व्यत्यय येण्याची शक्यता असते.
https://prahaar.in/2026/06/08/powerful-7-8-magnitude-earthquake-hits-philippines/
ऑरोरा दिसण्याची शक्यता
भूचुंबकीय वादळाची तीव्रता वाढल्यास जगातील काही भागांमध्ये ‘ऑरोरा’ अर्थात आकाशातील रंगीत प्रकाशरेषा दिसू शकतात. ऑरोरा ही निसर्गातील एक अद्भुत आणि सुंदर घटना मानली जाते. हिरव्या, जांभळ्या आणि लाल रंगाचे आकर्षक प्रकाशरेषा आकाशात दिसून येतात. उत्तर भारतातील काही भागांत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे ऑरोरा दिसण्याची शक्यता अधिक असते.</description>
      </item><item>
      <title>Indian Seafarers Rescue : संकटात सापडलेल्या जहाजावरून एअरलिफ्ट केले, भारताच्या खलाशांना ओमानने वाचवले</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/oman-rescues-indian-sailors-after-airlifting-them-from-ship-in-distress/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/oman-rescues-indian-sailors-after-airlifting-them-from-ship-in-distress/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 20:59:30 -0400</pubDate>
      <description>ओमान : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, 'होर्मुझ सामुद्रधुनी'च्या दक्षिणेला २४ भारतीय खलाशी असलेल्या 'एमटी मारिव्हिक्स' या जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. या जहाजावर आग लागल्याच्या घटनेला केंद्रीय बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी दुजोरा दिला. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सध्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मंत्रालयाने सांगितले.ओमानने हेलिकॉप्टरद्वारे खुलाशांना एअरलिफ्ट केले आहे.




&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)



सोमवारी दुपारी सुमारे दीड वाजता जहाजावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली, यानंतर भारत सरकारच्या प्रतिनिधीने जहाज कंपनीशी संपर्क साधला. भारताचा ओमानमधील दूतावास पण सक्रीय झाला. ओमान सरकार तसेच जहाजावरील खलाशी यांच्याशीही समन्वय साधण्यात आला. काही वेळानंतर ओमानच्या हेलिकॉप्टरद्वारे टप्प्याटप्प्याने भारतीय खुलाशांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आले. सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.


We are thankful to the Omani authorities for their swift response and rescue of all the 24 crew members of Indian nationality , onboard MT Marivex, and ensuring their safety.@MG_MOD_OMAN @OMAN_MSC@SpokespersonMoD@indiannavy@MEAIndia
— India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) June 8, 2026

https://prahaar.in/2026/06/08/israel-iran-conflict-indian-ship-attacked-oman-coast-24-sailors-trapped/
याआधी रिकामे तेलवाहक जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडून दक्षिणेच्या दिशेने बरेच पुढे गेले होते. या जहाजावर भारतीय खलाशी होते. नेमका याच जहाजावर हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणचे जहाज समजून अमेरिकेकडूनच या रिकाम्या जहाजावर हल्ला झाला होता.
युनियनने सोशल मीडियावर मागितली मदत
'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट करून ओमानच्या किनारपट्टीजवळ अडकलेल्या भारतीय खलाशांसाठी तातडीने मदतीची मागणी केली होती. या पोस्टची त्वरित दखल घेत ओमानमधील भारतीय दूतावासाने जहाजावरील खलाशांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे सांगितले.
https://prahaar.in/2026/06/08/powerful-7-8-magnitude-earthquake-hits-philippines/
३,५०० हून अधिक खलाशांची सुरक्षित सुटका
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने 'डीजी शिपिंग'च्या माध्यमातून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षाने आतापर्यंत १२ हजारांहून अधिक कॉल्स आणि २६ हजारांपेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या ९६ तासांतच खलाशांच्या कुटुंबीयांकडून ३९० कॉल्स आले आहेत. नियंत्रण कक्षाने समन्वय साधल्यामुळे ३५०० पेक्षा जास्त खुलाशांना संकटातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे.</description>
      </item><item>
      <title>फिलीपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/powerful-7-8-magnitude-earthquake-hits-philippines/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/powerful-7-8-magnitude-earthquake-hits-philippines/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 20:33:45 -0400</pubDate>
      <description>मनिला : फिलीपिन्समध्ये सोमवारी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला असून, यामध्ये किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. फिलीपिन्सच्या नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
स्थानिक नागरी संरक्षण कार्यालयाचे संचालक रॉड्रिगो सोसमेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मृतांपैकी १२ जणांचा मृत्यू एकट्या 'सोक्ससारजेन' या चार प्रांत आणि एका शहराचा समावेश असलेल्या भागात झाला आहे. यामध्ये दक्षिण कोटाबाटो, सुलतान कुदरात, सारंगानी आणि जनरल सँटोस सिटी या भागांचा समावेश आहे. याच भागात १२९ हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
https://prahaar.in/2026/06/08/14-rebel-mps-of-trinamool-congress-on-their-way-to-bjp/
फिलीपिन्सच्या 'डिपार्टमेंट ऑफ सोशल वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट'चे सचिव रेक्स गॅचलियन यांनी स्थानिक प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. बाधित कुटुंबांसाठी मिंदानाओ भागात तब्बल ११ लाख 'फॅमिली फूड पॅक्स' उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी देशभरात एकूण ४७ लाख अन्न पाकिटे आधीच सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यात आली आहेत, जी तातडीने वितरित केली जात आहेत. प्रभावित भागात मोबाईल कमांड सेंटर्स, मोबाईल किचन आणि इतर आवश्यक उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले की, नागरी संरक्षण कार्यालय आणि राष्ट्रीय आपत्ती जोखीम नियंत्रण व व्यवस्थापन परिषदेसह सर्व आपत्कालीन यंत्रणांना तत्काळ सक्रिय करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/08/sanjay-nirupan-on-tcs-issue/
९ प्रांत रिकामे करण्याचे आदेश
भूकंपानंतर समुद्रामध्ये धोकादायक लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जपान, फिलीपिन्स आणि इंडोनेशिया या देशांनी त्सुनामीचा सतर्कतेचा इशारा जारी केला होता. अमेरिकेतील 'पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर'ने दिलेल्या माहितीनुसार, फिलीपिन्सच्या किनारपट्टीवर ३ मीटर (सुमारे ९.८ फूट) उंचीच्या, तर इंडोनेशिया आणि मलेशियाच्या काही भागांत १ मीटरपर्यंतच्या त्सुनामी लाटा धडकण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, फिलीपिन्स प्रशासनाने सारंगानी, दाव्हाओ ऑक्सिडेंटल, तावी-तावी आणि सुलू यांसह ९ प्रांतांमधील किनारपट्टीवरील नागरिकांना तात्काळ उंचावर किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते.
शेजारील देशांमध्येही हाय-अलर्ट
या भूकंपाचे धक्के इंडोनेशियापर्यंत जाणवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी, उत्तर गोरोन्तालो प्रांत आणि सँगीहे बेटांवरील रहिवाशांना देखील किनारपट्टी सोडून उंचावर जाण्यास सांगण्यात आले आहे. फिलीपिन्स राष्ट्रीय पोलीस आणि इतर मदत यंत्रणा सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
https://prahaar.in/2026/06/08/meghna-sakore-bordikar-on-mahavitaran/
भूतानमध्ये ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
भूतान (वृत्तसंस्था): भारतचा शेजारी देश असलेल्या भूतानमध्ये रविवारी (७ जून) रात्री उशिरा ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भारताच्या 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी'ने या भूकंपाची नोंद केली असून यासंबंधीची अधिकृत माहिती दिली आहे. 'एनसीएस'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली २६ किलोमीटर खोलीवर होता.मुख्य भूकंपानंतर काही मिनिटांच्या अंतराने भूतानमध्ये अनेक 'आफ्टरशॉक्स' (भूकंपानंतरचे सौम्य धक्के) देखील नोंदवले गेले, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहिला धक्का रात्री ११:१८ वाजता २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला, ज्याची खोली २२ किमी होती. दुसरा धक्का रात्री ११:५२ वाजता २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला, ज्याची खोली १८ किमी होती.</description>
      </item><item>
      <title>Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसचे १४ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/14-rebel-mps-of-trinamool-congress-on-their-way-to-bjp/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/14-rebel-mps-of-trinamool-congress-on-their-way-to-bjp/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 20:25:47 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही 'तृणमूल काँग्रेस' पक्षाला सर्वात मोठे खिंडार पडले आहे. सोमवारी (८ जून ) नवी दिल्लीत एकीकडे 'इंडिया' आघाडीची बैठक सुरू असतानाच, दुसरीकडे तृणमूलच्या तब्बल १४ बंडखोर खासदारांचा गट भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीला पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी देखील उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/06/08/sunil-tatkare-on-nda-meeting-postpone/
सोमवारी दुपारी अचानक दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे थेट भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील एकूण खासदारांपैकी तब्बल १४ बंडखोर खासदार या गुप्त बैठकीला उपस्थित होते.या ऐतिहासिक बंडामध्ये त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लव कुमार देव हे देखील महत्त्वाची भूमिका बजावत असून, ते तृणमूलच्या खासदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. या १४ खासदारांच्या बंडामुळे लोकसभेत तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे खासदार भाजपला थेट पाठिंबा देण्याची किंवा अधिकृतपणे पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/08/powerful-7-8-magnitude-earthquake-hits-philippines/
भाजप नेत्यांच्या घरी चाललेल्या या महाबैठकीपूर्वी दिल्लीत आणखी एक नाट्यमय घटना घडली होती. सकाळीच राज्यसभा खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देणारे तृणमूलचे ज्येष्ठ नेते सुखेंदु शेखर राय यांच्या निवासस्थानी ५ प्रमुख खासदारांनी गुप्त भेट घेतली होती.या बैठकीला शर्मिला सरकार (बर्धमान पूर्व), प्रसून बॅनर्जी (हावडा), जगदीश बसुनिया (कूचबिहार), कालिपद सोरेन (झारग्राम), अरूप चक्रवर्ती (बांकुरा) हे खासदार उपस्थित होते. सुखेंदु शेखर राय यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतर हेच खासदार आता इतर सहकाऱ्यांसह सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीला पोहोचल्याचे समजते.
ममता बॅनर्जींची अस्तित्वाची लढाई
राज्यसभेत एक दशकाहून अधिक काळ पक्षाचा मुख्य चेहरा राहिलेले सुखेंदु शेखर राय यांनी सोडलेली साथ आणि त्यानंतर लोकसभेच्या १४ खासदारांनी पुकारलेले बंड यामुळे तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात पूर्णपणे एकट्या पडल्या आहेत. बंगालमधील बंडखोर आमदार आणि नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी आधीच दावा केला आहे की, "ममता बॅनर्जी यांची आमदारांवरील पकड पूर्णपणे ढिली झाली असून, अनेक टीएमसी आमदार आमच्या संपर्कात आहेत. आधी बंगालमधील सत्ता जाणे, त्यानंतर आमदार फुटणे आणि आता थेट संसदेतील खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याने तृणमूल काँग्रेससमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.</description>
      </item><item>
      <title>दिल्ली आग प्रकरणी हॉटेलच्या मुख्य अकाउंटंटचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/hotel-chief-accountant-surrenders-before-court-in-delhi-fire-case/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/hotel-chief-accountant-surrenders-before-court-in-delhi-fire-case/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 20:22:14 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दिल्लीतील मालवीय नगर येथील एका गेस्ट हाऊसला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फरार असलेला हॉटेलचा मुख्य अकाउंटंट जय मिश्रा याने सोमवारी साकेत न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जय मिश्रा हा हॉटेलचे व्यवस्थापन, परवाने , ना-हरकत प्रमाणपत्र आणि कायदेशीर कागदपत्रांची कामे मॅनेजर राकेशसोबत मिळून पाहत होता. याप्रकरणी पोलिसांनी आधीच हॉटेल मालक लवकेश बजाज आणि कुक केशव नेगी यांना अटक केली आहे.
https://prahaar.in/2026/06/08/slum-rehabilitation-proposal-in-aarey-colony-finally-cancelled/
किचनमधील इलेक्ट्रिक शेगडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय आहे. आग लागल्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का, ज्यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले, याचाही तपास सुरू आहे. गेस्ट हाऊसमध्ये सीलबंद खिडक्या, कुलूप लावलेले आपत्कालीन दरवाजे आणि अपुरी वायुविजन व्यवस्था असे अनेक नियमभंग आढळून आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ५० ते ६० मोबाईल आणि ३० पासपोर्ट जप्त केले आहेत. मृतांमध्ये मेडिकल व्हिसावर भारतात आलेल्या अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे.सध्या पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि परवान्यांची कसून चौकशी करत आहेत.</description>
      </item><item>
      <title>Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि &#039;अदानी एअरपोर्ट&#039; प्रशासनाला नोटीस</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/08/notice-issued-by-the-chief-ministers-office-to-cidco-and-the-adani-airport-administration/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/08/notice-issued-by-the-chief-ministers-office-to-cidco-and-the-adani-airport-administration/</guid>
      <pubDate>Mon, 08 Jun 2026 19:57:35 -0400</pubDate>
      <description>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा भंग
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) उल्लंघन झाल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ६ जून रोजी झालेल्या या शासकीय सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रणच दिले गेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सिडको प्रशासन आणि अदानी नवी मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीला 'कारण दाखवा' (शो-कॉज) नोटीस बजावून तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे.
https://prahaar.in/2026/06/08/slum-rehabilitation-proposal-in-aarey-colony-finally-cancelled/
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फुटी कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे, शासकीय सोहळ्यात 'व्हीआयपी प्रोटोकॉल'च्या नियमांकडे डोळेझाक करून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दूर का ठेवले, याचा जाब मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि विमानतळ प्रशासनाला विचारला आहे. तसेच, भविष्यात अशा नियोजनात शिष्टाचाराचे नियम सक्तीने पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</description>
      </item></channel>
    </rss>