<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>Canada vs. Netherlands: २५ चेंडूंनंतर सामना रद्द, टोरोंटोच्या मैदानावर बंदी ? नेमकं कारण काय ?</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/canada-vs-netherlands-match-abandoned-after-25-balls-toronto-venue-banned-what-is-the-exact-reason/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/canada-vs-netherlands-match-abandoned-after-25-balls-toronto-venue-banned-what-is-the-exact-reason/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 15:17:06 -0400</pubDate>
      <description>कॅनडा : मंगळवार, १६ जून रोजी, कॅनडातील टोरोंटो स्टेडियमवर नेदरलँड्स आणि कॅनडा यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ २५ चेंडूंनंतर सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाला तेव्हा, ४.१ षटकांत नेदरलँड्सच्या धावसंख्येवर १ गडी बाद १५ धावा झाल्या होत्या.नेदरलँड्सकडून मॅक्स ओ'डॉड डावाच्या दुसऱ्या षटकात एक धाव करून बाद झाला.

https://prahaar.in/2026/06/17/possibility-of-deficient-rainfall-against-the-backdrop-of-el-nino/
टोरोंटोच्या मैदानावर आयसीसीची बंदी ?
खेळपट्टीवर अतिरिक बाऊन्स असल्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा सामना पंचांनी रद्द केला, पिचमधील असामन्या बाऊन्समुळे सामन्याच्या काही काळातच अनेक फलंदाज जखमी झाले. विशेष म्हणजे, याच खेळपट्टीवर यापूर्वी एक सामना खेळला गेला होता. कॅनडा-नेदरलँड्स सामन्याच्या चार दिवस आधी, १२ जून रोजी, आयसीसीने एक निवेदन जारी करून कळवले की, ८ जून रोजी अमेरिका विरुद्ध नेदरलँड्स एकदिवसीय सामन्यात वापरण्यात आलेली किंग सिटीची खेळपट्टी असमाधानकारक ठरवण्यात आली असून तिला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. अमेरिका आणि नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करणारे सामनाधिकारी फिल थॉम्पसन यांनी सांगितले की, खेळपट्टी सामन्याच्या दर्जापेक्षा निकृष्ट होती.

https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-erling-haalands-double-strike-norway-off-to-a-winning-start-with-a-4-1-victory-over-iraq/



&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by Netherlands Cricket (@kncbcricket)




आयसीसीच्या खेळपट्टी नियमानुसार,असमाधानकारक दर्जा मिळालेल्या खेळपट्टीला एक डिमेरिट पॉइंट मिळतो. खराब दर्जाच्या खेळपट्टीला तीन डिमेरिट पॉइंट्स मिळतात. हे डिमेरिट पॉइंट्स पाच वर्षांसाठी सक्रिय राहतात. सहा डिमेरिट पॉइंट्स जमा झालेल्या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मनाई केली जाते.१२ डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास २४ महिन्यांची बंदी येते. दरम्यान, टोरोंटोच्या खेळपट्टीवरही बंदीची कारवाई होत आहे. तिला ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाले आहेत, जे कोणत्याही खेळपट्टीसाठी अत्यंत हानिकारक आहे. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास, या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार नाहीत.</description>
      </item><item>
      <title>Chalisgaon : चाळीसगावात मोटारसायकल चोरट्यांवर एलसीबीचा दणका; चोरीचा गुन्हा उघड</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/lcb-busts-motorcycle-thieves-in-chalisgaon/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/lcb-busts-motorcycle-thieves-in-chalisgaon/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 15:14:46 -0400</pubDate>
      <description>चाळीसगाव : स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली आहे. तसेच स्वतंत्र कारवाईत आणखी एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून विनानंबरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/17/fuel-theft-racket-busted-in-wadala-food-and-civil-supplies-department-conducts-a-major-raid-seizing-goods-worth-%e2%82%b91-31-crore/
नेमकं प्रकरण काय ?
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात (Chalisgaon City Police Station) दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने HF डिलक्स मोटारसायकल चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पुढील तपासात भिसे याने चोरीची दुचाकी प्रशांत दीपक राजपूत (रा. हरिगिरी बाबा नगर, पाचोरा रोड) याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
https://prahaar.in/2026/06/17/possibility-of-deficient-rainfall-against-the-backdrop-of-el-nino/
दरम्यान, गुन्हेगार शोध मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न दिल्याने प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या (Chalisgaon City Police) ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कवकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शेखर डोंभळे तसेच लक्ष्मण पाटील, राहुल पाटील आणि भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.</description>
      </item><item>
      <title>Fuel theft racket busted in Wadala :  वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/fuel-theft-racket-busted-in-wadala-food-and-civil-supplies-department-conducts-a-major-raid-seizing-goods-worth-%e2%82%b91-31-crore/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/fuel-theft-racket-busted-in-wadala-food-and-civil-supplies-department-conducts-a-major-raid-seizing-goods-worth-%e2%82%b91-31-crore/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 15:06:49 -0400</pubDate>
      <description>मुंबई: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अन्न, नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ जून २०२६ रोजी दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे आढळून आले.

https://prahaar.in/2026/06/17/possibility-of-deficient-rainfall-against-the-backdrop-of-el-nino/
दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले. तपासात २० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्लास्टिक पाईप व व्हॉल्वच्या साहाय्याने इंधन काढले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तपासणी केलेल्या एमएच-०४ केयू-१८२६ या टँकरमध्ये १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल, तर एमएच-०४ एलवाय-६३८८ या टँकरमध्ये २९ हजार लीटर विमान इंधन (एटीएफ) असल्याचे आढळून आले.कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व (एटीएफ) इंधनासह संबंधित टँकर आणि अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहायक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी केली.प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.</description>
      </item><item>
      <title>Nashik : एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता , शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : रविंद्र माने</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/possibility-of-deficient-rainfall-against-the-backdrop-of-el-nino/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/possibility-of-deficient-rainfall-against-the-backdrop-of-el-nino/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:48:07 -0400</pubDate>
      <description>नाशिक : भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केली असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन, जलसंधारण आणि हवामानाधारित शेती व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
https://prahaar.in/2026/06/17/important-notice-for-lpg-consumers-complete-this-before-june-30/
नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यात मका, बाजरी, भात, सोयाबीन, मूग, भुईमूग, तूर यासह फळबागांचा समावेश आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९० टक्के (±५ %) पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
फलोत्पादनासाठी द्राक्ष, डाळिंब व आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापन, मल्चिंग, बाष्परोधक फवारणी, ठिबक सिंचन आणि उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.“एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व” ही पद्धत टाळून मिश्र पीक पद्धती, कमी कालावधीचे वाण, पाणी साठवण आणि हवामानानुसार निर्णय हे सूत्र शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन नाशिक जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
https://prahaar.in/2026/06/17/fake-anti-corruption-officials-exposed-in-satpur/
कृषी विभागाच्या प्रमुख सूचना :
अपुरा पाऊस असताना घाईघाईने पेरणी करू नये. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
संपूर्ण क्षेत्राची एकाच वेळी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने पेरणी करावी.
दुबार पेरणीची गरज भासू नये यासाठी प्रमाणित बियाण्यांचा राखीव साठा ठेवावा.
कमी कालावधीच्या व दुष्काळसहिष्णू वाणांना प्राधान्य द्यावे.
ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करावी.
तूर + सोयाबीन, बाजरी + तूर यांसारख्या मिश्र व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
बीबीएफ पद्धती, कंटूर बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग यांसारख्या जलसंधारण उपायांचा वापर करावा.
पीक अवशेष, पेंढा, पालापाचोळ्याचा वापर करून मल्चिंग करावे.
शेततळे, जलसाठे आणि सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर वाढवावा.
महाअॅग्री एआय व हवामान सेवांचा वापर करून हवामानानुसार शेती नियोजन करावे.
पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांकडे वळावे.</description>
      </item><item>
      <title>Cabinet sub-committee&#039;s decision : सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/cabinet-sub-committees-decision-decision-to-withdraw-44-cases-related-to-social-and-political-agitations/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/cabinet-sub-committees-decision-decision-to-withdraw-44-cases-related-to-social-and-political-agitations/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:36:06 -0400</pubDate>
      <description>मुंबई: राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांनी दिली.राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमता विकास मंत्री.अँड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. आज या सह्याद्री अतिथी गृहावर बैठक झाली. यापुर्वी झालेल्या बैठकीत 77 खटले मागे घेण्यात आले होते. तर आज 44 खटले मागे घेण्याची शिफारस करण्यात आली.
https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-erling-haalands-double-strike-norway-off-to-a-winning-start-with-a-4-1-victory-over-iraq/
या समितीच्या बैठकीत पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या 133 अर्जदारापैकी 44 अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव,अभियोग संचालनालयाचे संचालक, गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.स्त्रीविषयक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक व दिवाणी प्रकरणे ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.तसेच, आमदार, माजी आमदार, खासदार व माजी खासदार यांच्याशी संबंधित प्रकरणांबाबत, शासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई उच्च न्यायालयातच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. त्या दिशेनेही पावले उचलण्यात येतात."
https://prahaar.in/2026/06/17/navnath-ban-internal-politics-within-the-ubt-faction-not-the-bjp-or-shiv-sena-is-behind-operation-tiger/
मंत्रिमंडळ उपसमितीकडे प्राप्त 133 अर्जदारापैकी 14 अर्जावर पुन्हा विचार करण्याची शिफारस करण्यात आली असून ही प्रकरणे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त क्षेत्रीय समितीपुढे ठेवण्यात येतील. तसेच 35 प्रकरणा पैकी काही खटले निकाली निघाले होते तर 32 खटले हे समितीच्या कार्यकक्षेत न येणारे होते. आज आलेल्या खटल्यापैंकी केवळ 8 खटले प्रलंबित राहिले आहेत.सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, आंदोलक, विचारधारात्मक चळवळींतील सहभागी यांच्यावर विनाकारण खटले दाखल करण्यात आले होते. अशा अनावश्यक खटल्यांपासून त्यांची मुक्तता करणे, हे सरकारचे उत्तरदायित्व असल्याचे मंत्री अँड शेलार यांनी सांगितले. आज मागे घेण्यात आलेल्या खटल्यांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, सामाजिक कार्यक्रम, गोवंश संरक्षण आंदोलन, कामगार आंदोलन अशा विविध खटल्या़चा समावेश होता.
https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-lionel-messi-messis-magical-hat-trick-argentina-defeated-algeria-3-0/</description>
      </item><item>
      <title>LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 जूनपूर्वी &#039;ही&#039; गोष्ट पूर्ण करा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/important-notice-for-lpg-consumers-complete-this-before-june-30/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/important-notice-for-lpg-consumers-complete-this-before-june-30/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:33:15 -0400</pubDate>
      <description>
अन्यथा सबसिडी मिळण्यात अडचण











घरगुती एलपीजी गॅस (LPG Gas) सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सर्व गॅस ग्राहकांना 30 जूनपर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.


https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-erling-haalands-double-strike-norway-off-to-a-winning-start-with-a-4-1-victory-over-iraq/

सरकारच्या माहितीनुसार, गॅस सबसिडीचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि बनावट तसेच डुप्लिकेट कनेक्शनवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे.

e-KYC का महत्त्वाची?
गेल्या काही वर्षांत अनेक ग्राहकांनी आपल्या एलपीजी कनेक्शनची माहिती अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांची ओळख आणि कनेक्शनची पडताळणी करण्यासाठी e-KYC प्रक्रिया राबवली जात आहे.
या प्रक्रियेमुळे:
- डुप्लिकेट आणि बनावट कनेक्शन ओळखणे सोपे होईल.
- सबसिडीचा लाभ पात्र ग्राहकांनाच मिळेल.
- गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत राहील.
- भविष्यातील सेवा सुरळीत मिळतील.

घरबसल्या कशी कराल e-KYC?
गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
प्रक्रिया:
1. संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत अॅप किंवा वेबसाइट उघडा.
2. आपल्या मोबाईल नंबरने लॉगिन करा.
3. e-KYC किंवा Re-KYC पर्याय निवडा.
4. मोबाईल कॅमेराद्वारे फेस व्हेरिफिकेशन करा.
5. माहिती जुळल्यानंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
या प्रक्रियेसाठी कोणत्याही कागदी कागदपत्रांची आवश्यकता नसून काही मिनिटांत काम पूर्ण होऊ शकते.
https://prahaar.in/2026/06/17/water-levels-in-nashiks-dams-at-a-worrying-stage/
ऑफलाइनही करता येणार e-KYC
ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया शक्य नाही, त्यांनी जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरक कार्यालयात जाऊन e-KYC पूर्ण करू शकतात.
यासाठी:
- आधार कार्ड
- गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे
- नोंदणीकृत मोबाईल नंबर
सोबत असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी बायोमेट्रिक पडताळणीही केली जाऊ शकते.

ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला
अंतिम तारखेची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर e-KYC प्रक्रिया पूर्ण करा. त्यामुळे गॅस सबसिडी, गॅस बुकिंग आणि इतर सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.













</description>
      </item><item>
      <title>दु:खातून फुले वैयक्तिक विकास...</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/personal-growth-blossoms-from-sorrow/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/personal-growth-blossoms-from-sorrow/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:26:19 -0400</pubDate>
      <description>माेरपीस-पूजा काळे



माणसांना माणसात आणण्याचं काम करणारे, पीडितांच्या जीवनात चैतन्याची ज्योत तेवत ठेवणारे बाबा आमटे यांचं आयुष्य म्हणजे दीनदुबळ्यांसाठी आशेचा किरण. या जाणिवेतून जगण्याच्या लढाईत युगप्रवर्तक विचारांनी प्रेरित झालेला दुःखी माणूस स्वसामर्थ्याच्या कक्षा ओळखून नवी स्वप्न पाहू लागला. दु:खितांना आपल्या कवेत घेऊन फिरणारी आनंदवन सारखी चैतन्यमय वास्तू वैयक्तिक विकासाचा मार्ग ठरू लागली. समाजभान जपलेलं समाजमन काठी बनलं. आजाराने झिजलेल्या कृष शरीराचं मनोधैर्य उंचावण्यासाठी, त्याला उभं करण्यासाठी संघर्षाची पायाभरणी झाली. जन्मजात लढा, दुःखाला सहन करण्याची ताकद आणि वेदनेला खपली भरण्याचं काम नंदनवनाने स्वीकारलं, जोपासलं आणि पुढे जाऊन अनेकांच्या आयुष्यात स्वप्निल चांदण्याचं नंदनवन फुलवलं. दुःखितावर फुंकर घालणारी माणसं स्वतः आगीत होरपळलेली असली तरी, दैवी वरदहस्त लाभल्याने ती इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवतात, याचं उत्तम उदाहरण म्हणून नंदनवनाकडे पाहाता येईल. गंभीर प्रकारच्या दुर्धर आजाराने पछाडलेल्या, समाजाने वाळीत टाकलेल्या आणि अनाथांचे नाथ झालेल्या आनंदवनातल्या छत्रछायेत हजारोंनी आपला आत्मविश्वास कमावला, इथून आत्मसन्मानाची ज्योत पेटत राहिली. हाताला काम मिळाल्याने मनातला न्यूनगंड संपला, स्वप्नांना नवे पंख लाभले, मनाने गगन भरारी घेतली. विश्वासाचा जय होता होता विकासाचं श्रद्धेत परिवर्तन झालं आणि नव्या विचारांची मुळं रोवली गेली. शारीरिक दुःखातून उमललेला वैयक्तिक विकास हजारोंच्या संख्येने मैलोनमैल फैलावत गेला.


दुःखाचा सखोल विचार करता शारीरिक व्याधीतून जन्मलेलं दुःख ते मानसिक अनारोग्यातून आलेलं दुःख याचा ऊहापोह करणं म्हणजे मानवी जीवनाच्या अत्यंत नाजूक पण महत्वाच्या अशा अनिवार्य पैलूंचा विचार होणं. जीवनात कधी ना कधी संकटांचा सामना करावा लागतो. काही लोकांचं दुःख उघडपणे दिसतं तर काहींचा संघर्ष पूर्णपणे अदृश्य असतो. कधी तो पैशांचा प्रश्न असू शकतो, तर कधी नाते संबंधातील तणाव असू शकतो किंवा स्वत:च्या मनाशी चाललेली एखादी मोठी लढाई असू शकते. यास्तव दुःखातून निर्माण होणाऱ्या मानसशास्त्राच्या पायवाटा अधोरेखित करताना त्या वाटा वैयक्तिक विकासाकडे वळल्याचे चित्र दिसतं. मानवी दुःखाचे अर्थ समजून घेताना, विकासाच्या पहिल्या टप्पात येणारा वैश्विक चिंताग्रस्त प्रश्न पडतो की, माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे? याचं उत्तर सोपं आहे, जसं की व्यक्तिगणिक दुःखाची जातकुळी वेगळी असली तरी, त्यातल्या असामान्य वेदना टाळता येत नाहीत. संघर्षातून दु:खामागील उद्देशाचा पाठपुरावा केल्यास मानवी जीवनाला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. संघर्षातून नवा दृष्टिकोन चित्कारतो ज्यातून मार्ग काढणं सोपं होतं. कोणतीही समस्या सोडविण्याची पाहिली पायरी म्हणजे ती समस्या आहे हे मान्य करणं त्यामुळे जितक्या लवकर आयुष्यात दुःखाचा प्रवेश होतो तितक्या लवकर ते सहन करण्याची व त्यावर मात करण्याची तसंच परिस्थितीतून उभं राहण्याची शक्ती येते. कधी कधी मनोभूमिकेच्या सुप्तावस्थेत आदर्श परिस्थितीची गोड कल्पना आपण केलेली असते; परंतु याहून वेगळं असं नियंत्रण नसलेलं वास्तव असतं. अपेक्षेचं रान आणि वास्तवाचं भान असलेली दोन वेगळी टोकं एकत्र कशी नांदणार? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. अपेक्षा विरुद्ध वास्तव यांतली दरी मोठी होत जाता उद्भवलेली निराशा आपण स्वीकारतो आणि त्या प्रसंगाला साजेशी मानसिकता निर्माण होते. जितक्या जास्त समस्या, अडचणी आणि दुःखे जीवनात येतात तितक्या लवकर त्यावर मात करण्याची शक्तीही त्यायोगे निर्माण होते. संकटातून सर्वश्रेष्ठ शिक्षण मिळत असल्याने आनंदातून नव्हे तर आलेल्या परिस्थितीतून आपण शिकतो आणि शहाणे होतो. दुःखाचा अर्थ शोधताना सापडलेली दुसरी अवस्था म्हणजे कठीण समय. काळावर आघात करणाऱ्या कठीण परिस्थितीत माणूस जगू लागतो तेव्हाचं त्याला जगण्याचा अर्थ उमगतो. समोरचे दुःख मानवाला प्रगल्भ बनवते, शहाणे करून सोडते आणि अंतर्मुख करते. वेदनेमागे लपलेला विकास समजायला वेळ लागतो, पण सन्मान, मर्यादा, माणुसकी, चुकीचे नातेसंबंध या गोष्टी सांभाळल्या की, मानवी वैचारिक क्षमता वाढून लवचिकता निर्माण होण्यास अवधी लागत नाही. जेवढा मोठा संघर्ष तेवढी मोठी लवचिकता निर्माण झाल्याने मनातील वेदना कमजोरी न राहता परिपक्वतेची खूण बनून राहतात. असं म्हटले जाते की, माणसाने सुखात अटकू नये आणि दुःखातही भटकू नये. सुखापेक्षा दुःखाचे चटके तीव्र, वेदनादायी असल्याने परीक्षेत तावून सुलाखून निघालेला प्रत्येक विद्यार्थी हुशार होतो. शिवाय संकटांचा सामना करायला तो हार मानत नाही. विकासाचे दरवाजे उघडायला वेळ लागू शकतो, पण जेव्हा उघडतात तेव्हा सर्वसामर्थ्य बलवान ठरतात. अंतर्मनातला आवाज ऐकता आला, तर सर्वांगीण विकासाची सुरुवात आपल्यापासून होते. आयुष्य नवं काही शोधण्याची संधी देत असल्याने, समस्यांचे ऋण मानण्यात धन्यता मानावी. खऱ्या भावना समजून घेणं हा मानसिक आरोग्याचा पाया असल्याने दुःखातून उमगलेला वैयक्तिक विकास सामर्थ्य वाढवतो. उत्तरोत्तर तुम्हाला वर आणतो. गरज आहे फक्त स्वतःला ओळखण्याची. हार न मानता काळाला सामोर जाण्याची. विचार बदला जग बदलेल या न्यायाने दुःखाला स्मरण करून द्या. चांगल्या वाईटाची नशा पिऊ द्या. मगच त्याला वाचा फुटेल. संथगतीने पडणारं पाऊल यशाकडे कूच करेल. यावेळी उन्नतीचे शिखर लांब नसेल. प्रयत्न करून पाहा. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्माचा अचूक नियम म्हणजे आपण जगाला जे देतो, तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येते. आजच्या घडीला जाणीव नेणिवांवर अवलंबून असलेला वैयक्तिक विकास आपला धर्म मानून कूच करण्यात शहाणपण आहे असं मला वाटतं.दुःखातून उमलते जीवन सारं, होई विकास वैयक्तिक... न द्यावा अतिरिक्त भार, सुसंगती घडो वैचारिक.</description>
      </item><item>
      <title>प्राची भाटियाची ‘चोखट’</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/prachi-bhatias-chokhat/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/prachi-bhatias-chokhat/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:22:21 -0400</pubDate>
      <description>दी लेडी बॉस - अर्चना सोंडे

गाझियाबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आर्थिक अडचणी, सामाजिक पूर्वग्रह आणि आयुष्यातील अनेक अडथळे तिच्या वाट्याला आले. मात्र, या अडथळ्यांना शरण न जाता तिने त्यांच्यावर मात केली आणि केवळ एक लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या व्यवसायाला आज ३५ लाख रुपयांच्या उलाढालीपर्यंत नेऊन ठेवले आहे. ही कथा आहे २८ वर्षीय उद्योजिका प्राची भाटिया हीची आणि तिच्या ‘चोखट’ या गृहसजावटीच्या ब्रँडची.प्राचीचे वडील पत्रकार तर आई गृहिणी. घरातील आर्थिक परिस्थिती मर्यादित होती. पूर्व दिल्लीतील प्रियदर्शनी विहार येथील लवली पब्लिक स्कूलमधून तिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तिला डिझाइन क्षेत्रात करिअर करायचे होते. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी)ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, दिल्लीतील शिक्षण आणि वसतिगृहाचा खर्च परवडत नसल्याने ती तेथे जाऊ शकली नाही. त्याऐवजी तिने गुरुग्राम येथील जी. डी. गोएंका युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्यासाठी तिला शैक्षणिक कर्जही घ्यावे लागले.


शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी प्राचीने कॉलेजमध्ये असतानाच छोटा व्यवसाय सुरू केला. फेसबुक पेजच्या माध्यमातून ती फोटो अल्बम, फोटो प्रिंट केलेले दिवे, हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे आणि हाताने बनवलेली गुलाबाची फुले विकत असे. २०१७ मध्ये तिने जी. डी. गोएंका युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ डिझाइन पदवी संपादन केली. तिला अनेक शिष्यवृत्त्याही मिळाल्या. त्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या शिष्यवृत्तीचा समावेश होता. या शिष्यवृत्तीअंतर्गत चार वर्षे दरवर्षी ३६ हजार रुपयांची मदत मिळाली. प्राचीच्या आयुष्यातील आणखी एक मोठे आव्हान म्हणजे व्हिटिलिगो (पांढरे डाग) हा त्वचारोग. या आजारामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये तिची अनेकदा टिंगल करण्यात आली.
पदवी पूर्ण झाल्यानंतर प्राचीने व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. गुरुग्राममधील ‘एस अँड आर एक्सपोर्ट्स’मध्ये ती असिस्टंट डिझायनर म्हणून काम करू लागली. त्यानंतर ‘ली अँड फंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत मर्चंडायझर म्हणून काम केले. मात्र, तिच्या मनात उद्योजक होण्याचे स्वप्न सतत जागे होते.नवीन नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी तिला जाणवले की तिला इतरांसाठी काम करणे आवडत नाही. दोन दिवसांतच तिने राजीनामा दिला. त्यावेळी प्राची अवघ्या २४ वर्षांची होती. नोकरीचा राजीनामा देऊन गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील आपल्या घरातून व्यवसायाला सुरुवात केली. ती उत्पादनांचे डिझाइन तयार करायची. कारागिरांना भेटायची, फोटोशूट करायची आणि आपल्या वेबसाइटवर ती उत्पादने विक्रीसाठी ठेवायची. सुरुवातीला सर्व काही ती एकटीच करत होती.


अननस फ्रुट बास्केट, नेत्रा टिश्यू होल्डर आणि बुलबुल कटलरी होल्डर यांसारख्या केवळ सात उत्पादनांपासून तिने सुरुवात केली. या उत्पादनांच्या निर्मितीसाठी तिने मुरादाबाद, जयपूर आणि नोएडा येथील कारागिरांशी संपर्क साधला. वयाने लहान आणि त्यात महिला असल्यामुळे अनेक अनुभवी कारागिरांकडून तिला सुरुवातीला विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, आपल्या डिझाइनवर विश्वास ठेवून ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. प्राचीची डिझाइन्स प्रामुख्याने निसर्ग, पक्षी, फळे आणि प्राण्यांपासून प्रेरित असतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील नात्याचे प्रतीक तिच्या उत्पादनांतून दिसून येते.नोकरीचा अनुभव आणि डिझाइनची आवड यांच्या जोरावर तिने स्वतःचा होम डेकोर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांच्या चर्चेनंतर ब्रँडचे नाव ठेवण्यात आले, ‘चोखट’. कोणतेही बाह्य गुंतवणूकदार किंवा आर्थिक पाठबळ नसताना तिने स्वतःच्या बचतीतील एक लाख रुपयांमधून व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केला त्यावेळी तिच्या कुटुंबात फक्त वडील आणि मोठी बहीण कमावणारे होते.

व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी तिने फेसबुक आणि इंस्टाग्रामचा आधार घेतला. सुरुवातीला दिवसाला केवळ ४० रुपयांच्या जाहिराती चालवल्या जात होत्या. त्यासोबत पत्रके वाटणे आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग घेणे अशा पारंपरिक पद्धतींचाही वापर करण्यात आला. कालांतराने तिचे मार्केटिंग बजेट वाढून दरमहा ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचले.पहिल्या काही महिन्यांत ऑर्डर्स अत्यल्प होत्या. मात्र, प्राचीने प्रयत्न सुरूच ठेवले. त्याचे परिणामही दिसू लागले. पहिल्या वर्षी ३ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ११ लाख रुपये, तिसऱ्या वर्षी ११.३ लाख रुपये तर चौथ्या वर्षी ३५.५ लाख रुपये उलाढाल झाली.कोरोना महामारी आणि लॉकडाऊन अनेक व्यवसायांसाठी संकट घेऊन आले. प्राचीचाही व्यवसाय त्यातून सुटला नाही. मात्र, तिने परिस्थितीला संधीमध्ये बदलले. लॉकडाऊन काळात सोशल मीडियावरील वाढलेली सक्रियता ओळखून तिने डिजिटल मार्केटिंगवर भर दिला. परिणामी, तिला तब्बल ११.५ लाख रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या.आज ‘चोखट’कडे ७० हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. देशभरातून ऑर्डर्स मिळतात. प्राची आता १२०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या कार्यालयातून काम करते. तिच्यासोबत दोन इंटर्न आणि एक पूर्णवेळ पॅकिंग कर्मचारी काम करतात. कुर्मा कँडल होल्डरपासून ते १६९९ रुपयांच्या अननस फ्रुट बास्केटपर्यंत विविध उत्पादने ग्राहकांना उपलब्ध आहेत. सध्या सर्व उत्पादने केवळ त्यांच्या वेबसाइटद्वारे विकली जातात. एप्रिल २०२३ मध्ये ‘चोखट’चे रूपांतर ‘चोखट होम प्रा. लि.’ या खासगी मर्यादित कंपनीत करण्यात आले.


प्राचीचे ध्येय केवळ व्यवसाय चालवणे नाही, तर ‘चोखट’ला ४०० कोटी रुपयांची कंपनी बनवणे आणि गृहसजावटीच्या उत्पादनांसाठी ग्राहकांची पहिली पसंती ठरणे हे आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलीपासून ते यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा प्राची भाटियाचा प्रवास हा जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर असलेल्या विश्वासाची प्रेरणादायी कहाणी आहे.आर्थिक अडचणी, सामाजिक पूर्वग्रह, आरोग्यविषयक संघर्ष आणि व्यावसायिक आव्हाने यांवर मात करत तिने सिद्ध केले की, मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेण्याची तयारी असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो.</description>
      </item><item>
      <title>हर्षद मेहतानंतर राजेश मेहता !</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/rajesh-mehta-after-harshad-mehta/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/rajesh-mehta-after-harshad-mehta/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:18:15 -0400</pubDate>
      <description>कैलास ठोळे

भारतीय भांडवली बाजाराची नियामक संस्था असलेल्या ‘सेबी’च्या डोळ्यांत धूळफेक करून गुंतवणूदारांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार अनेकदा घडले. ‘राजेश एक्सपोर्टस’ प्रकरणाने हेच केले. नियामक संस्था अधिक सक्षम बनवण्याची, नियम कडक करण्याची आणि पारदर्शकता वाढवण्याची चर्चा नेहमी होते, मात्र जागतिक स्तर, परदेशी उपकंपन्या, विविध देशांमधील व्यवहारामुळे सत्य शोधणे अधिक कठीण बनले आहे.



भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही दशकांमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. काही कंपन्यांनी आपल्या कामगिरीने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला, तर काहींनी फसवणूक, गैरव्यवहार आणि दिशाभूल करणाऱ्या आर्थिक अहवालांमुळे बाजाराच्या विश्वासाला तडा दिला. अलीकडेच समोर आलेल्या ‘राजेश एक्सपोर्टस’ प्रकरणाने कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणारे आकडे कितपत खरे असतात आणि त्यांची पडताळणी करणाऱ्या यंत्रणा किती सक्षम आहेत, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. सामान्य माणूस ‘पंधरा लाख कोटी रुपयांचा घोटाळा’ असा शब्दप्रयोग ऐकतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर देशातील सर्वात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचे चित्र उभे राहते. पंधरा लाख कोटी रुपये ही रक्कम इतकी प्रचंड आहे, की तिची कल्पना करणेही अवघड आहे. भारताच्या वार्षिक निर्यातीच्या मोठ्या भागाइतकी ही रक्कम आहे. त्यामुळे तीन हजार कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची कंपनी इतक्या मोठ्या आकड्यांशी जोडली जाते, तेव्हा सामान्य गुंतवणूकदार गोंधळून जातो; परंतु या प्रकरणाचा गाभा समजून घेतला, तर लक्षात येते, की येथे पैशांची चोरी किंवा बँकांचे कर्ज बुडवण्यापेक्षा अधिक गंभीर ठरणारा प्रश्न आहे तो आर्थिक विश्वासार्हतेचा.



शेअर बाजार विश्वासावर उभा असतो. गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना तिच्या उत्पादनांवर नव्हे, तर आर्थिक अहवालांवर, लेखापरीक्षणावर आणि व्यवस्थापनाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतो. कंपनीने जाहीर केलेले उत्पन्न, नफा, मालमत्ता आणि व्यवसायाच्या व्याप्तीसंदर्भातले सर्व आकडे गुंतवणूकदारांच्या निर्णयाला दिशा देतात. हेच आकडे संशयास्पद ठरल्यास संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो.‘राजेश एक्सपोर्टस’चे प्रकरण नेमके याच कारणासाठी महत्त्वाचे ठरते. ‘सेबी’च्या प्राथमिक निष्कर्षांनुसार कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात विक्री झाल्याचे दाखवले; परंतु त्या विक्रीचा मोठा भाग प्रत्यक्ष व्यवहारांवर आधारित नसून कागदोपत्री असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. येथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. पंधरा लाख कोटी रुपये म्हणजे कंपनीच्या तिजोरीत असलेले किंवा कुठे तरी गायब झालेले पैसे नव्हेत. हा आकडा कंपनीने दाखवलेल्या एकूण उलाढालीचा आहे. म्हणजेच प्रश्न पैशांच्या चोरीचा नाही, तर आर्थिक वास्तव आणि दाखवलेले वास्तव यातील तफावतीचा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगतात आकडे हे शक्तिशाली शस्त्र बनले आहेत. मोठी उलाढाल, मोठे उत्पन्न आणि मोठी वाढ यांची भाषा गुंतवणूकदारांना आकर्षित करते. बाजारात कंपनीची प्रतिमा उंचावते. बँका अधिक विश्वासाने कर्ज देतात. संस्थात्मक गुंतवणूकदार पैसा गुंतवतात. विश्लेषक कंपनीच्या भविष्यासंबंधी सकारात्मक मत व्यक्त करतात. अशा वेळी या आकड्यांमागील वास्तव वेगळेच निघाले, तर नुकसान केवळ आर्थिक राहत नाही, तर नैतिक आणि संस्थात्मक स्वरूपाचेही असते. या प्रकरणाने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समोर आणला आहे, तो म्हणजे लेखापरीक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता. कोणत्याही कंपनीचे आर्थिक अहवाल स्वतंत्र लेखापरीक्षकांकडून तपासले जातात. त्यांचे काम म्हणजे कंपनीने दिलेली माहिती सत्य, अचूक आणि नियमांनुसार असल्याची खात्री करणे. अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार होत असतील आणि ते लेखापरीक्षकांच्या नजरेतून सुटत असतील, तर ही बाब चिंताजनक आहे. अशा वेळी प्रश्न एका कंपनीपुरता न राहता संपूर्ण ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’च्या चौकटीवर येतो.


‘राजेश एक्सपोर्टस’ प्रकरणातील परदेशी उपकंपन्यांचा उल्लेख याच संदर्भात महत्त्वाचा आहे. आज व्यवसायाचे जागतिकीकरण झाले आहे. एका देशात मुख्यालय, दुसऱ्या देशात उत्पादन आणि तिसऱ्या देशात विक्री अशी व्यवस्था सामान्य झाली आहे; पण या जागतिक रचनेचा वापर पारदर्शकतेसाठी होतो की माहिती लपवण्यासाठी हा प्रश्न प्रत्येक वेळी विचारावा लागतो. नियामक संस्थांसाठीही ही मोठी कसोटी असते. सामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीने या प्रकरणातील सर्वात मोठा धडा म्हणजे केवळ आकड्यांच्या मोहात न पडणे. अनेक गुंतवणूकदार कंपनीची उलाढाल किंवा बाजारातील प्रतिष्ठा पाहून गुंतवणूक करतात; परंतु उलाढाल मोठी असणे म्हणजे कंपनी मजबूत असणे, असे समीकरण नेहमीच खरे नसते. व्यवसायातून प्रत्यक्ष रोख प्रवाह किती निर्माण होतो, कर्जाचे प्रमाण किती आहे, नफा टिकाऊ आहे का, व्यवस्थापन किती पारदर्शक आहे, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे असतात. शेअर बाजारात अनेकदा ‘कथा’ विकल्या जातात. एखादी कंपनी वेगाने वाढत आहे, जगभर विस्तार करत आहे, नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहे, अशी कथा गुंतवणूकदारांना आकर्षित कसरते; परंतु शेवटी कोणतीही कथा आर्थिक वास्तवावर टिकली पाहिजे. अन्यथा, ती फक्त आकड्यांची जादू ठरते. आणि जादूचा पडदा सरकला की वास्तव समोर येते. या संपूर्ण प्रकरणात ‘सेबी’ची भूमिकाही महत्त्वाची आहे. बाजार नियामक म्हणून गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. एखाद्या कंपनीने आर्थिक माहितीबाबत दिशाभूल केली असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.



न्यायाच्या तत्त्वानुसार अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण नियामकांचा आरोप आणि न्यायालयीन किंवा अंतिम प्रशासकीय निष्कर्ष यांमध्ये फरक असतो. ‘राजेश एक्सपोर्टस’ने सर्व आरोप फेटाळले आहेत आणि आपले आर्थिक अहवाल योग्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अंतिम सत्य पुढील तपासणीतूनच समोर येईल; मात्र या टप्प्यावरही एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट होते, ती म्हणजे कॉर्पोरेट जगतातील पारदर्शकता हा पर्याय नसून अत्यावश्यक खबरदारी आहे. भारतीय अर्थव्यवस्था आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशात लाखो नवे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत आहेत. म्युच्युअल फंड, डीमॅट खाती आणि डिजिटल गुंतवणूक यामुळे भांडवली बाजाराचा विस्तार अभूतपूर्व वेगाने होत आहे. अशा काळात प्रत्येक आर्थिक घोटाळा किंवा संशयास्पद व्यवहार केवळ एका कंपनीची प्रतिमा मलिन करत नाही; तो संपूर्ण गुंतवणूक संस्कृतीवर परिणाम करतो. विश्वास हे बाजाराचे सर्वात मोठे भांडवल असते. बाजारात पैसा गमावल्यास गुंतवणूकदार पुन्हा कमवू शकतो; परंतु विश्वास गमावलेला गुंतवणूकदार बाजारापासून कायमचा दूर जाऊ शकतो. म्हणूनच नियामक, लेखापरीक्षक, संचालक मंडळे आणि व्यवस्थापन यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांना केवळ नियमांचे पालन करायचे नसते, तर विश्वासाची जपणूक करायची असते. ‘राजेश एक्सपोर्टस’ प्रकरणात कोणतेही तथ्य पुढे येवो; या घटनेने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. आर्थिक अहवालातील प्रत्येक आकडा हा केवळ संख्या नसतो, तर तो लाखो गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक असतो. त्या आकड्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होते, तेव्हा केवळ एका कंपनीची विश्वासार्हता धोक्यात येत नाही, तर संपूर्ण बाजारव्यवस्थेच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होतात. आज गरज आहे ती अधिक पारदर्शक, अधिक जबाबदार आणि अधिक उत्तरदायी कॉर्पोरेट संस्कृतीची. कारण आकडे कितीही मोठे असले, तरी त्यांच्यापेक्षा मोठी बाब म्हणजे विश्वास आणि एकदा विश्वास ढासळला, तर कोणताही ताळेबंद त्याची भरपाई करू शकत नाही.त्यामुळे पंधरा लाख कोटींच्या या कथेकडे केवळ एका कंपनीच्या संकटाच्या रूपात न पाहता, भारतीय कॉर्पोरेट व्यवस्थेला मिळालेल्या गंभीर इशाऱ्याच्या रूपात पाहणे अधिक योग्य ठरेल.</description>
      </item><item>
      <title>FIFA World Cup 2026 : एर्लिंग हालांडचा दुहेरी धमाका; इराकवर 4-1 विजय मिळवत नॉर्वेची विजयी सुरुवात</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-erling-haalands-double-strike-norway-off-to-a-winning-start-with-a-4-1-victory-over-iraq/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-erling-haalands-double-strike-norway-off-to-a-winning-start-with-a-4-1-victory-over-iraq/</guid>
      <pubDate>Wed, 17 Jun 2026 14:08:36 -0400</pubDate>
      <description>Mumbai : फिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेने दमदार सुरुवात करत ग्रुप-I मधील पहिल्या सामन्यात इराकचा 4-1 असा पराभव केला. स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालांडने (Erling Haaland) दोन गोल झळकावत विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोठी छाप पाडली. या विजयासह नॉर्वेने तीन गुणांची कमाई करत ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले.

https://prahaar.in/2026/06/16/ravichandra-ashwin-r-ashwin-to-play-alongside-this-pakistani-player-both-in-the-same-team/
इराकची चूक, हालांडचा फायदा
बॉस्टन येथे झालेल्या या सामन्यात नॉर्वेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 29व्या मिनिटाला अँटोनियो नुसाच्या शानदार पासवर डेव्हिड मोलर वुल्फने केलेल्या क्रॉसला हालांडने अचूक स्पर्श करत गोल नोंदवला आणि नॉर्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.मात्र इराकनेही हार मानली नाही. 39व्या मिनिटाला आमिर अल-अम्मारीच्या क्रॉसवर अयमन हुसेनने जबरदस्त हेडर मारत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. बरोबरीनंतर इराकचा आत्मविश्वास वाढला होता. पण पहिल्या हाफच्या अखेरीस झालेल्या एका मोठ्या चुकीचा नॉर्वेने पुरेपूर फायदा घेतला. गोलरक्षक जलाल हसन याने बॅकपासवर उशिरा प्रतिक्रिया दिली आणि त्याचा क्लिअरन्स हालांडच्या पायाला लागून थेट गोलमध्ये गेला. त्यामुळे नॉर्वेने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली.या गोलसह हालांडने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 51 सामन्यांत 57 गोलांचा टप्पा गाठला.

https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-lionel-messi-messis-magical-hat-trick-argentina-defeated-algeria-3-0/
ऑस्टिगार्डने विजयावर शिक्कामोर्तब केले
दुसऱ्या हाफमध्ये इराकने पुनरागमनाचा प्रयत्न केला.इब्राहिम बायेश, अली अल-हमादी आणि अकाम हाशिम यांनी काही चांगल्या संधी निर्माण केल्या, मात्र नॉर्वेच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही.76व्या मिनिटाला मार्टिन ओडेगार्डच्या कॉर्नरवर बदली खेळाडू लिओ ऑस्टिगार्डने शानदार हेडरद्वारे गोल करत नॉर्वेची आघाडी 3-1 अशी वाढवली.सामन्याच्या अतिरिक्त वेळेत हालांडला हॅट्ट्रिकची संधी होती, पण इराकचा गोलरक्षक हसनने उत्कृष्ट बचाव केला. मात्र काही क्षणांनंतर हालांडच्या हेडरमुळे निर्माण झालेल्या गोंधळात अयमन हुसेनकडून आत्मघातकी गोल झाला आणि नॉर्वेने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. याच गटातील दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने सेनेगलवर 3-1 असा विजय मिळवला. मात्र अधिक गोलफरकामुळे नॉर्वे सध्या ग्रुप-I मध्ये अव्वल स्थानावर आहे. आता 22 जून रोजी नॉर्वेचा पुढील सामना फ्रान्सविरुद्ध होणार असून,या लढतीकडे सर्व फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. एर्लिंग हालांडच्या दुहेरी गोलांच्या जोरावर नॉर्वेने विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली असून, आता फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात त्यांची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे.



&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)








या हंगामातील हालंडची कामगिरी.

मँचेस्टर सिटीचा स्टार स्ट्रायकर अर्लिंग हालांड याने २०२५-२६ च्या फुटबॉल हंगामात सर्व स्पर्धांमध्ये मिळवून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या संपूर्ण हंगामात एकूण ४८ सामने खेळले असून, त्यात ३५ गोल डागले आणि ८ असिस्ट (गोल करण्यासाठी सहकाऱ्यांना दिलेली मदत) केले. त्याच्या या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर त्याने प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा मानाचा 'गोल्डन बूट' पुरस्कार देखील पटकावला.विविध स्पर्धांचा विचार केल्यास, हालांडने प्रीमियर लीगच्या ३५ सामन्यांमध्ये सर्वाधिक २७ गोल केले आणि ८ असिस्ट नोंदवले. युरोपमधील मानाच्या युएफा चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) स्पर्धेत त्याने १० सामने खेळत ८ गोल केले. मात्र, एफए कप (FA Cup) आणि काराबाओ कप (EFL Cup) या घरगुती कप स्पर्धांमधील ४ सामन्यांत त्याला एकही गोल करता आला नाही, पण त्याने एफए कपमध्ये १ असिस्ट नक्की केला. क्लब फुटबॉलव्यतिरिक्त, नॉर्वे देशाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतानाही त्याचा फॉर्म जबरदस्त होता. त्याने २०२६ च्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीत केवळ ८ सामन्यांत १६ गोल केले, तर सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला तर त्याने एकूण २० गोल झळकावले.</description>
      </item></channel>
    </rss>