<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/ashadhi-wari-2026-news-palkhi-mahamarg-nitin-gadkari-inspection-pandharpur-highway-update/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/ashadhi-wari-2026-news-palkhi-mahamarg-nitin-gadkari-inspection-pandharpur-highway-update/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 15:25:05 -0400</pubDate>
      <description>सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पंढरपूर (Pandharpur) आणि श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट (Akkalkot) यांसारखी जगप्रसिद्ध व भाविकांचे श्रद्धास्थान असलेली तीर्थक्षेत्रे आहेत. राज्यभरातून आणि देशभरातून येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या परिसरातील रस्त्यांचे जाळे मजबूत व अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक होते. हीच गरज ओळखून केंद्र सरकारने या भागात भव्य महामार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत. या महामार्गांमुळे भाविकांना आता तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले आहे. विशेषतः दरवर्षी आषाढी वारीसाठी ऊन-पावसाची तमा न बाळगता पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी या महामार्गावर एक स्वतंत्र मार्गिका (लेन) तयार करण्यात आली आहे. यामुळे वारकऱ्यांची पायी वारी आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी (१४ मे) नितीन गडकरी यांनी स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
https://prahaar.in/2026/05/15/shivsena-symbol-case-supreme-court-hearing-uddhav-thackeray-eknath-shinde/
आईच्या इच्छेपूर्तीचे समाधान आणि प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे आश्वासन
या पाहणी दौऱ्यादरम्यान पालखी महामार्गाविषयी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक झाले. ते म्हणाले की, "काही वर्षांपूर्वी तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोटला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना तसेच वाहनाने येणाऱ्या भाविकांना प्रवासात मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही परिस्थिती पाहून माझ्या आईने मला आवर्जून सांगितले होते की, जर कधी भविष्यात तुला संधी मिळाली, तर या तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते नक्कीच चांगले कर." आईची तीच प्रबळ इच्छा आणि साक्षात पांडुरंगाच्या आशीर्वादाने आज मला या पवित्र मार्गाची सेवा करण्याचे आणि हे रस्ते उत्तम बनवण्याचे भाग्य लाभले आहे, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली.
महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना गडकरींनी स्पष्ट केले की, पालखी महामार्गाचे तब्बल ८० टक्के काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, उर्वरित कामे युद्धपातळीवर मार्गी लावली जात आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव कामे रखडली आहेत, ती या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, वाखरी ते पंढरपूर या टप्प्यातील रस्त्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाची अद्याप आवश्यक परवानगी मिळालेली नाही. मात्र, त्याबाबत तातडीने पाठपुरावा करून तो अडथळाही लवकरात लवकर दूर केला जाईल आणि वारकऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
</description>
      </item><item>
      <title>State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/state-government-announces-new-policy-to-stop-relocation-of-schools-for-commercial-purposes/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/state-government-announces-new-policy-to-stop-relocation-of-schools-for-commercial-purposes/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 15:17:05 -0400</pubDate>
      <description> कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले
मुंबई : राज्यातील शाळांच्या स्थलांतरामागे असलेला व्यावसायिक हेतू आणि व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील शाळांच्या स्थलांतर धोरणात व्यापक सुधारणा करणारा नवीन शासन निर्णय जारी केला असून, यानुसार यापुढे केवळ अपवादात्मक परिस्थिती आणि भौतिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठीच शाळांना स्थलांतराची परवानगी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा आणि ४० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या माध्यमिक शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळण्यात आले असून, त्यांचे प्रस्ताव आता थेट नाकारले जाणार आहेत.
वाढते शहरीकरण, जागांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि व्यावसायिक नफा कमावण्यासाठी अनेक शिक्षण संस्था आपल्या शाळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोयीस्करपणे हलवत असल्याच्या तक्रारी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने आधीचे सर्व नियम अधिक्रमित करून नवीन सुधारित निकष लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार, शाळा केवळ दोनच परिस्थितीत स्थलांतरासाठी अर्ज करू शकते. पहिली म्हणजे, शाळेची इमारत अतिधोकादायक किंवा जीर्ण झाली असल्यास, अथवा नैसर्गिक आपत्ती किंवा विकास प्रकल्पामुळे शाळा बाधित झाली असल्यास अनिवार्य स्थलांतर करता येईल. दुसरी परिस्थिती म्हणजे, अपुऱ्या भौतिक सुविधा असलेल्या इमारतीमधून संस्थेच्या स्वतःच्या जागेत जाण्यासाठी किंवा वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे गुणात्मक वाढ करण्यासाठीच ही परवानगी अनुज्ञेय राहील.

अंतराची मर्यादा निश्चित
नवीन धोरणामध्ये शाळा स्थलांतरित करण्याच्या अंतरावरही कठोर मर्यादा घालण्यात आल्या आहेत, जेणेकरून मूळ जागेवरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. प्राथमिक शाळेसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी) मूळ जागेपासून केवळ ५ किलोमीटर, माध्यमिक शाळेसाठी (इयत्ता ९ वी व १० वी) १० किलोमीटर आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी (इयत्ता ११ वी व १२ वी) कमाल २० किलोमीटरच्या परिघातच स्थलांतर करता येईल. यापेक्षा जास्त अंतरावरील प्रस्ताव थेट फेटाळले जातील. तथापि, इमारतीचे मोठे बांधकाम किंवा दुरुस्ती करायची असल्यास, २ वर्षांच्या मर्यादेसाठी मूळ जागेपासून ३ किलोमीटरच्या आत तात्पुरते स्थलांतर करण्याचे अधिकार विभागीय उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
https://prahaar.in/2026/05/15/chief-minister-fadnavis-big-announcement-from-satara-distribution-of-15-lakh-houses-next-year/
शिक्षकांचे समायोजन बंधनकारक
नवीन ठिकाणी स्थलांतर करण्यापूर्वी जुन्या आणि नव्या जागेचे तुलनात्मक फोटो गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रासह जोडणे बंधनकारक राहील. तसेच, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे 'युडायस' अहवालानुसार १०० टक्के आधार प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चालू संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पूर्ण समायोजन केल्याशिवाय संस्थांना स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवता येणार नाही आणि स्थलांतरित ठिकाणी सर्व जुन्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे लागेल.

२८ मुद्यांची 'तपासणी सूची'
शाळा व्यवस्थापनाने या सर्व निकषांची पूर्तता केल्याची खात्री करण्यासाठी २८ मुद्यांची एक 'तपासणी सूची' जोडण्यात आली आहे. यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांचा दाखला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतराचे प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि किमान १५ वर्षे मुदतीचा नोंदणीकृत भाडेकरार किंवा ७/१२ उतारा सादर करणे बंधनकारक आहे. सोबतच २० हजार रुपयांचे स्थलांतर शुल्कही आकारावे लागणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर हा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनाकडे पाठवला जाईल.</description>
      </item><item>
      <title>Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/shivsena-symbol-case-supreme-court-hearing-uddhav-thackeray-eknath-shinde/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/shivsena-symbol-case-supreme-court-hearing-uddhav-thackeray-eknath-shinde/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 15:08:05 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह' प्रकरणावर सुनावणी पार पडली. मागील तब्बल तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा अंतिम निकाल कधी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागून आहे. आजच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने प्रकरणाचा निपटारा लवकर व्हावा, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र, या घाईवरून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ठाकरे गटाच्या वकिलांची चांगलीच कानउघडणी केली. आता या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर, म्हणजेच ३० जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
"तुमच्या नेत्यांना आधी आवरा!"
आज सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अनेक प्रलंबित खटल्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण आणि पक्ष कुणाचा, हा वाद केंद्रस्थानी होता. ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील ॲड. देवदत्त कामत यांनी न्यायालयाला या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची गळ घातली. मात्र, ही विनंती ऐकताच न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. "तुमचे राजकीय नेते न्यायालयाच्या कामकाजावर आणि निर्णयांवर सार्वजनिक व्यासपीठांवरून वाटेल तशी आणि अशोभनीय वक्तव्ये करत आहेत. तुम्ही आधी तुमच्या नेत्यांना समज द्या आणि त्यांना आवरा," अशा शब्दांत न्यायमूर्तींनी ठाकरे गटाला फटकारले.
"गेली ३ वर्षे आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत..."
न्यायालयात आपला युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी अत्यंत सावधगिरीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, "आज हे प्रकरण केवळ पुढील दिशा ठरवण्यासाठी (Directions) कामकाजाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. आमची न्यायालयाकडून एवढीच रास्त अपेक्षा आहे की, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लवकरात लवकर नियमित सुनावणी सुरू व्हावी." त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, "गेली तीन वर्षे आम्ही एका अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत खेटे घालत आहोत. त्यामुळे या खटल्यासाठी न्यायालयाकडून केवळ योग्य वेळ आणि निश्चित तारीख मिळावी, हीच आमची मुख्य मागणी आहे."

https://prahaar.in/2026/05/15/we-spoke-about-groceries-before-he-left-virar-family-mourns-best-conductor-killed-in-andheri-bus-crash-video/
"आम्ही इथे रिकामे बसलेलो नाही!"
ठाकरे गटाच्या वकिलांनी 'तीन वर्षांचा विलंब' असा उल्लेख करताच न्यायालयाचा पारा चांगलाच चढला. या टिप्पणीवर अत्यंत तीव्र आक्षेप घेत न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली. "न्यायालयीन प्रक्रियेत आम्ही दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून सामंजस्याची आणि सहकार्याची अपेक्षा ठेवतो. सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या जातीलच, मात्र विलंबाचे खापर न्यायालयावर फोडणारी कोणतीही बेजबाबदार विधाने आम्ही अजिबात खपवून घेणार नाही," अशी तंबी न्यायालयाने दिली. आपला संताप व्यक्त करताना खंडपीठ पुढे म्हणाले, "आम्ही दररोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अविरत काम करत असतो. आम्ही इथे रिकामे बसलेलो नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी. न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर असे आरोप करणे पूर्णपणे अयोग्य आहे." या सडेतोड स्पष्टीकरणानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी ३० जुलै रोजी घेण्याचे आदेश दिले.
शिंदे गटाचा ठाकरे गटावर पलटवार
याच तापलेल्या सुनावणीदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही ठाकरे गटाच्या भूमिकेवर कडाडून हल्लाबोल केला. न्यायालयाची बाजू सावरत रोहतगी म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयावर दररोज किती खटल्यांचा आणि कामाचा प्रचंड ताण असतो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आमच्या पक्षकारांकडून न्यायालयाच्या कामकाजाबाबत कधीही असे आक्षेपार्ह विधान केले गेलेले नाही आणि इतर कुणीही ते करू नये. न्यायालयाने आजवर सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत मोठा संयम बाळगला आहे. त्यामुळे स्वतःच्या सोयीनुसार न्यायालयावर विलंबाचे बेछूट आरोप करण्याचा अधिकार कोणत्याही पक्षाला दिलेला नाही."</description>
      </item><item>
      <title>साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/chief-minister-fadnavis-big-announcement-from-satara-distribution-of-15-lakh-houses-next-year/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/chief-minister-fadnavis-big-announcement-from-satara-distribution-of-15-lakh-houses-next-year/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 15:04:43 -0400</pubDate>
      <description>कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात तब्बल पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले , खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष राजू भोसले ग्रामविकास विभागा चे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१६ ते २०२२ या कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यानंतर नव्याने अनेक गरजू कुटुंबांची नावे समोर आल्याने आणखी ३० लाख घरांची गरज निर्माण झाली. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वितरण होणार आहे.
राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या सहकार्याने त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही केंद्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात यश आले असून, हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचाही उल्लेख करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. “हे सरकार सर्वसामान्य, शेतकरी आणि कामगारांचे सरकार आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना देशहितासाठी ऊर्जा बचतीचे आवाहन केले.विक्रमी वेळेमध्ये ग्रामविकास विभागाने पाच लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल ग्रामविकास विभाग त्या विभागाचे तत्कालीन सचिव आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केले .ग्रामविकास विभागाचे मंत्री जयकुमार यांनी घरकुल उद्दिष्ट पूर्तीचे शिव धनुष्य यशस्वीपणे पेलले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले .
शिवराज सिंह चौहान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील संपूर्ण जनतेला सुखकर जीवनासाठी वाक्या घरांचे महत्त्वकांक्षी उद्दिष्ट हातात घेतले असून महाराष्ट्रातील प्रशासन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्या घराच्या माध्यमातून पोहोचत आहे .पुढील वर्षी 15 लाख घरांचे वितरण कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने पुन्हा लाडक्या भावांचे आणि बहिणींचे अर्ज मागविण्यात येत आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याची ग्रामविकास विभाग सातत्याने कार्यरत आहोत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी संघटितपणे एकत्र काम करूया पुढच्या वेळेला पुन्हा येथे कार्यक्रमासाठी येण्याकरता मला नक्की आवडेल असे कौतुक उद्गार शिवराज सिंह चौहान उर्फ मामाजी यांनी काढले .
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले महाराष्ट्राला 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले होते .पैकी पाच लाख घरांचे विक्रमी वेळेमध्ये करण्यात आलेले वितरण यामध्ये ग्रामविकास विभागाचे सर्व प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्या संघटित प्रयत्नाला यश आले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला काही काटकसरीचे मंत्र दिले असून त्याची अंमलबजावणी करणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानुसार पुढील वर्षी 15 लाख घरांची बांधणी करून त्याच्याही घरांचे वितरण तातडीने करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास यंत्रणा कधीही कमी पडणार नाही .महाराष्ट्रात एकही माणूस बेघर राहणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आपण सामूहिकपणे सत्यात उतरवून याकरिता सातत्याने आपण सक्रिय राहू असे कळकळीचे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले .
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रामविकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे 9000 कोटी रुपयांचा धनादेश यावेळी प्रदान केला .भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने व ग्रामविकास विभागाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली .तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास यंत्रणेने महत्त्वाकांक्षी राबवलेल्या प्रकल्पांची माहिती पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले
https://prahaar.in/2026/05/15/will-not-tolerate-insulting-youth-sanjay-raut-will-apologize/
पालकमंत्री शंभूराज देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीने रवाना
जिल्हा परिषदेच्या सदस्य निवडी वेळी महायुतीचे घटक पक्ष असणारे भाजप व शिवसेना यांच्यात राजकीय रणकंदन माजले होते या रणकंदनाचा कोणताही प्रतिकूल परिणाम घरकुल सोहळ्याच्या कार्यक्रमावर जाणवला नाही .शिष्टाचाराला अनुसरून पालकमंत्री शंभूराज देसाई हे सातारा सैनिक स्कूलच्या हेलीपॅड वर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोहोचले .तसेच व्यासपीठावर सुद्धा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री शंभूराजे हे आमने-सामने आले त्यांनी एकमेकांना सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनौपचारिक भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले .महायुतीचे जिल्ह्यातील धुरंदर घरकुल सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर यावेळी पाहायला मिळाले .शिवेंद्रसिंह राजे मुख्यमंत्री पालकमंत्री शंभूरा देसाई एकाच गाडीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रमाला एकत्र पोहोचल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले .सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा यशवंत एकजिनसीपणा यावेळी प्रकर्षाने दिसून आला .

खासदार उदयनराजे भोसले सुद्धा व्यासपीठावर
सातारा शहराच्या सक्रिय राजकारणातून बऱ्याच काळापासून अलिप्त असलेले सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आवर्जून आज घरकुल सोहळ्याच्या व्यासपीठावर उपस्थित होते .खासदार उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलन केले .यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सुद्धा आवर्जून उपस्थित होते .बऱ्याच काळानंतर जाहीर कार्यक्रमात उदयनराजे सहभागी झाल्याने खासदार गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जोरदार राजकीय बूस्टर मिळाला .सातारा नगरपालिकेच्या राजकारणातील नगरसेवकांमधील तीव्रतेने झालेले मतभेद या कार्यक्रमात कुठेही जाणवले नाहीत .
https://prahaar.in/2026/05/15/load-shedding-history-will-be-made-in-maharashtra-majestic-scheme-approved/
धुरंधर जया भाऊंची कार्यक्रमावर पकड
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हा सातारा जिल्ह्यातील भाजपचा ग्रामीण चेहरा आणि तोही आक्रमक रणनीतीचा चेहरा म्हणून सातत्याने पुढे आले आहेत मानखटासारख्या दुष्काळी भागात विरोधी पक्षाला सातत्याने विशेषता राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले आहेत .ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची राजकीय वाटचाल उत्तरोत्तर प्रगल्भ होत असून राजकीय मुरब्बीपणा त्यांच्या वागण्यात जाणवू लागला आहे .या कार्यक्रम सोहळ्यात सुद्धा तो मुरब्बीपणा पदोपदी जाणवला कार्यक्रमाचे नेटके आणि काटकसरीचे संयोजन करून घरकुलांचा मास्टर स्ट्रोक लगावण्यात आणि भाजपची जिल्ह्यात मजबूत पकड निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे यश आले आहे त्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे यशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .</description>
      </item><item>
      <title>युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागान</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/will-not-tolerate-insulting-youth-sanjay-raut-will-apologize/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/will-not-tolerate-insulting-youth-sanjay-raut-will-apologize/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 14:55:44 -0400</pubDate>
      <description>युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा
देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत
ठाणे : देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेनेकडून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी आज दिला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरनाईक म्हणाले की, राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय आहे. राऊतच मंद झाले असून भरकटले आहेत, अशी टीका सरनाईक यांनी केली. राऊत यांनी तरुणांबद्दल केलेल्या एक्स पोस्टची सरनाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते पुढे म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवर खापर फोडले असावे, असा टोला सरनाईक यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहे. देश विकास पथावर आहे, मात्र विकासावर टीका करणे हा राऊत यांना रोग लागला आहे. राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेणार नाही. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.
https://prahaar.in/2026/05/15/load-shedding-history-will-be-made-in-maharashtra-majestic-scheme-approved/
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगले काम करतील, असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. राऊतांकडून युवकांना भरकटवण्याचे काम होत आहे मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही, असे सरनाईक म्हणाले.</description>
      </item><item>
      <title>महाराष्ट्रात भारनियमन इतिहासजमा होणार - 'मॅजेस्टिक' योजनेला मंजुरी</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/load-shedding-history-will-be-made-in-maharashtra-majestic-scheme-approved/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/load-shedding-history-will-be-made-in-maharashtra-majestic-scheme-approved/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 14:45:59 -0400</pubDate>
      <description> जागतिक बँकेच्या सहकार्याने वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण करणार
मुंबई : राज्यातील उद्योगांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. राज्यातील वीज यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जेला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी "मॅजेस्टिक" या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. या महाप्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेतले जाणार असून, यामुळे राज्यातील भारनियमन (लोड शेडिंग) येत्या काळात पूर्णपणे इतिहासजमा होणार आहे.
कोविड संकटानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेने घेतलेल्या गरुडझेपमुळे महाराष्ट्रात विजेची मागणी वार्षिक ८ ते १० टक्के या विक्रमी दराने वाढली आहे. 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत होणारी औद्योगिक गुंतवणूक, पायाभूत सुविधांचे महाप्रकल्प आणि कृषी क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता अखंडित, परवडणारा आणि विश्वासार्ह वीजपुरवठा करणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर, पारंपरिक स्रोतांवर आधारित वीज निर्मितीऐवजी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा मुख्य ग्रीडमध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश करून संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी "मॅजेस्टिक" प्रकल्प आखण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील आर्थिक व्यवहार विभागामार्फत जागतिक बँकेचे हे कर्ज घेतले जाईल. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही राज्य वीज कंपन्या संयुक्तपणे या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत.
https://prahaar.in/2026/05/15/every-house-in-mumbai-will-get-a-property-card/
काय आहे 'मॅजेस्टिक' योजना?
हरित ऊर्जेची निर्मिती ही प्रामुख्याने निसर्गावर (सूर्यप्रकाश आणि वारा) अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा वीज निर्मिती जास्त होते, तेव्हा ती साठवून ठेवणे आणि मागणी वाढेल तेव्हा ती ग्रीडमध्ये सोडणे, यासाठी अत्याधुनिक साठवणूक तंत्रज्ञानाची गरज असते. 'मॅजेस्टिक' योजनेच्या माध्यमातून राज्यभरात अशा प्रकारची अद्ययावत साठवणूक केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे विजेची टंचाई असतानाच्या काळात ग्राहकांना अखंडित पुरवठा करणे शक्य होणार असून, भारनियमनाची समस्या कायमची संपुष्टात येईल.

आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राला बळ
राज्याला देशातील पहिली 'ट्रिलियन डॉलर' अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. उद्योग आणि कृषी क्षेत्राला हक्काची वीज मिळाल्यास राज्याचा विकास दर अधिक गतीने वाढेल. जागतिक बँकेच्या या अर्थसहाय्यामुळे महावितरण आणि महापारेषणच्या पायाभूत वाहिन्यांचे जाळे सुधारेल, वीज गळती कमी होईल आणि परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.</description>
      </item><item>
      <title>CSK VS LSG : पंजाबच्या पराभवानंतर चेन्नईसमोर सुवर्णसंधी, आज लखनऊविरुद्ध निर्णायक लढत</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/csk-vs-lsg-after-punjabs-defeat-chennai-have-a-golden-opportunity-decisive-match-against-lucknow-today/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/csk-vs-lsg-after-punjabs-defeat-chennai-have-a-golden-opportunity-decisive-match-against-lucknow-today/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 14:32:19 -0400</pubDate>
      <description>IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात महत्त्वाची लढत रंगणार आहे. हा सामना लखनऊमधील अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना या हंगामातील ५९ वा सामना आहे. आयपीएल २०२६ चे साखळी सामने आता संपत आले असून अखेरचा साखळी सामना २४ मे रोजी होणार आहे. त्यामुळे अव्वल पाच संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. काल १४ मे रोजी पंजाबच्या पराभवानंतर चेन्नईसमोर मोठी संधी निर्माण झाली आहे.
या हंगामात चेन्नईने आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले असून १२ गुणांसह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईला आजचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने ११ पैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत. सहा गुणांसह लखनऊ संघ सध्या गुणतालिकेच्या तळाशी आहे, आणि प्लेऑफ शर्यतीतून बाहेर झाले आहेत.संजू सॅमसनने चेन्नईसाठी आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ४३० धावा केल्या असून त्यात दोन शतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत अंशुल कंबोजने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. ११ सामन्यांत कंबोजने १९ बळी घेतले आहेत.लखनऊसाठी या हंगामात मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ३७७ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत प्रिन्स यादवने चांगली कामगिरी करत ११ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत.
https://prahaar.in/2026/05/14/tilak-varma-shines-mumbai-wins-the-match-punjab-suffers-fifth-defeat/
हेड टू हेड
आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत सात वेळा सामना झाला आहे. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. विशेष म्हणजे चेन्नईने मागील दोन सामन्यांत लखनऊचा पराभव केला आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईच्या विजयाची शक्यता अधिक मानली जात आहे. मात्र चेन्नईसाठी हा करो किंवा मरो चा सामना असल्याने चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

चेन्नईला मोठा धक्का
या सामन्यापूर्वी चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे हंगामातून बाहेर झाला आहे. मांडीच्या दुखापतीमुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. विशेष म्हणजे मागील सामन्यात लखनऊविरुद्धच्या लढतीत जेमी ओव्हरटन सामनावीर ठरला होता.

कशी असेल खेळपट्टी?
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना इकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. येथे आतापर्यंत २७ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला १४ सामन्यांत विजय मिळाला आहे.
संभाव्य अंतिम ११ 
चेन्नई सुपर किंग्स:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, अकील हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, सरफराज खान.
लखनऊ सुपर जायंट्स:
मिचेल मार्श, जोस इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शहबाज अहमद, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी.</description>
      </item><item>
      <title>Property Card : पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही प्रत्येक घराला मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/every-house-in-mumbai-will-get-a-property-card/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/every-house-in-mumbai-will-get-a-property-card/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 13:55:24 -0400</pubDate>
      <description>महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे;  मुंबई उपनगरातील ५ हजार कोटींची सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई : पुण्याच्या धर्तीवर आता मुंबईतील प्रत्येक घराला हक्काचे 'प्रॉपर्टी कार्ड' मिळणार आहे. "आधी मोजणी, मग नोंदणी आणि त्यानंतर थेट प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल. यामुळे 'लँड टायटलिंग' करणारी मुंबई देशात पहिली ठरेल," अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली. मुंबई उपनगरातील धनदांडग्यांच्या घशात जाणारी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची शासकीय जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणमुक्त केल्याचे कौतुक करत, सरकारी जमिनी बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
https://prahaar.in/2026/05/15/curbing-hidden-fee-collection-in-colleges/
अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात' महसूलमंत्री बोलत होते. यावेळी सर्वसामान्यांची अडवणूक करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत तंबी दिली. "महसूल विभागातील अधिकाऱ्यांची एक चुकीची सही सर्वसामान्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकते, कोणाचा जीव घेऊ शकते. अधिकारी जेव्हा जनतेला वेठीस धरतात, तेव्हा तीव्र मनस्ताप होतो. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर सोपवली असून, अधिकाऱ्यांनीही जनतेच्या मनातले काम केले पाहिजे," अशा शब्दांत बावनकुळे यांनी सुनावले.
ते म्हणाले, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने नियमावलीत मोठे फेरबदल केले आहेत. तुकडा बंदी कायदा लागू केल्यामुळे आता घरांच्या अधिकृत नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, पुनर्वसनातील घरे विकण्यासाठी असलेली १० वर्षांची अट आता ५ वर्षांवर आणण्यात आली आहे. गरिबांना दिलासा देत, अनधिकृत घरे नियमित करण्यासाठीचे शुल्क १० टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच 'लँड टायटलिंग' कायद्यामुळे घराचा संपूर्ण डेटा सुरक्षित राहील आणि फसवणुकीला आळा बसून थेट ऑनलाइन खरेदी-विक्री शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
शर्थभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
"ज्या उद्देशासाठी शासकीय जमिनी दिल्या आहेत, त्याच कामासाठी त्यांचा वापर झाला पाहिजे. शासकीय जमिनींच्या वाटपातील अटींचे उल्लंघन (शर्थभंग) होत असताना जर महसूल अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली, तर त्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल," असा सज्जड दम त्यांनी भरला. तसेच, मुंबईतील घर मोजणीच्या कामासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीडिसी) १० कोटी रुपयांचा निधी भूमी अभिलेख विभागाला द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.</description>
      </item><item>
      <title>Andheri Bus Crash : किराणा सामान आणायचंय...' मुलाशी झालेला 'Maharashtra'तो''s Colleges : महाविद्यालयांमधील 'Andheri Bus Crash : किराणा सामान आणायचंय...' मुलाशी झालेला 'तो'' संवाद ठरला शेवटचा! अंधेरी बस अपघातात BEST वाहकाचा करुण अंत शुल्क वसुलीला चाप</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/curbing-hidden-fee-collection-in-colleges/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/curbing-hidden-fee-collection-in-colleges/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 13:47:20 -0400</pubDate>
      <description>प्रवेश शुल्काबाबत सर्व माहिती दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक; लपवाछपवी केल्यास कारवाई
मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच, राज्य सरकारने महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी शुल्क वसुलीला चाप लावला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांनी ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर सर्व प्रकारच्या शुल्काची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
https://prahaar.in/2026/05/15/pm-modi-uae-visit-plane-entered-uae-airspace-f16-fighter-jets-escort-watch-video-received-grand-welcome/
प्रवेश शुल्काबाबत विद्यार्थ्यांची किंवा पालकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेलेच शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार आहे. प्रवेश घेण्यापूर्वीच इच्छुक विद्यार्थ्यांना या शुल्काची संपूर्ण माहिती देणे ही संबंधित महाविद्यालयांची कायदेशीर जबाबदारी असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
अनेकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर किंवा छुप्या शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर, "प्रवेश शुल्काबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची सर्वस्वी दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालय प्रशासनाला थेट जबाबदार धरून कारवाई केली जाईल," असा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
https://prahaar.in/2026/05/15/we-spoke-about-groceries-before-he-left-virar-family-mourns-best-conductor-killed-in-andheri-bus-crash-video/

सहसंचालक आणि कुलसचिवांवर जबाबदारी
महाविद्यालयांनी आपल्या सूचना फलकावर आणि माहितीपुस्तकेत शुल्काचा तपशील प्रसिद्ध केला आहे की नाही, हे तपासण्याची आणि त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव आणि विभागीय सहसंचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांना याबाबतचे आदेश तात्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</description>
      </item><item>
      <title>Andheri Bus Crash : किराणा सामान आणायचंय...' मुलाशी झालेला 'Maharashtra'तो''s Colleges : महाविद्यालयांमधील 'Andheri Bus Crash : किराणा सामान आणायचंय...' मुलाशी झालेला 'तो'' संवाद ठरला शेवटचा! अंधेरी बस अपघातात BEST वाहकाचा करुण अंत शुल्क वसुलीला चाप</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/15/we-spoke-about-groceries-before-he-left-virar-family-mourns-best-conductor-killed-in-andheri-bus-crash-video/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/15/we-spoke-about-groceries-before-he-left-virar-family-mourns-best-conductor-killed-in-andheri-bus-crash-video/</guid>
      <pubDate>Fri, 15 May 2026 13:38:56 -0400</pubDate>
      <description>मुंबई : विरारला राहणारे ५३ वर्षीय शेखर बाबुराव रवते गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. घरातून निघताना त्यांनी आपल्या धाकट्या मुलासोबत घरगुती किराणा सामान आणण्याबाबत सहज गप्पा मारल्या होत्या. मात्र, हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरेल, याची कोणालाच पुसटशीही कल्पना नव्हती. काही तासांनंतर रवते कुटुंबाला अंधेरी पश्चिम येथे झालेल्या एका भीषण अपघातात शेखर यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

झाड कोसळल्याने झालेली कोंडी आणि तो भीषण अपघात
https://prahaar.in/2026/05/15/pm-modi-uae-visit-plane-entered-uae-airspace-f16-fighter-jets-escort-watch-video-received-grand-welcome/
हा दुर्दैवी अपघात एस. व्ही. रोडवरील आंबोली नाक्याजवळ घडला. रस्त्यावर एक झाड कोसळल्यामुळे त्या भागातील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. याच दरम्यान एकापाठोपाठ एक गाड्या एकमेकांवर आदळून एक भीषण 'चेन अपघात' झाला. शेखर रवते हे मातेश्वरी ट्रान्सपोर्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'बेस्ट' (BEST) बसमध्ये वाहक (कंडक्टर) म्हणून ड्युटीवर होते. या अपघाताच्या गोंधळात दोन बसेसच्या मध्ये अडकून चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला.

धक्कादायक बातमीने कुटुंबाला बसलेला मोठा हादरा
या अचानक ओढवलेल्या संकटामुळे रवते कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. महिंद्रा ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश याने सांगितले की, हे सर्व इतक्या अचानक घडले आहे की कुटुंबातील कोणाचाही यावर अजून विश्वास बसत नाहीये. "रोजच्या प्रमाणेच ते संध्याकाळी आपली ड्युटी संपवून घरी परत येतील, अशीच आमची अपेक्षा होती," अशी हतबल भावना कुटुंबातील एका सदस्याने व्यक्त केली. रवते हे अत्यंत मनमिळाऊ, शांत स्वभावाचे आणि कष्टाळू व्यक्ती होते, असे त्यांचे नातेवाईक आणि शेजारी आवर्जून सांगतात. सध्याच्या बेस्टच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे वसई-विरार शहर बस सेवेतही प्रामाणिकपणे काम केले होते.

कष्टाळू कर्मचाऱ्याच्या जाण्याने परिसरात शोककळा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कामाचे तास कितीही लांबले किंवा प्रवासाची कितीही दगदग असली, तरी शेखर रवते हे नेहमीच आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या या अपघाती मृत्यूची बातमी विरारमधील त्यांच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. एका चांगल्या व्यक्तीला गमावल्याचे समजताच, दुःखात बुडालेल्या रवते कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.</description>
      </item></channel>
    </rss>