<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/8-naxalites-arrested-under-operation-antim-prahaar-gadchiroli-district-finally-becomes-naxal-free/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/8-naxalites-arrested-under-operation-antim-prahaar-gadchiroli-district-finally-becomes-naxal-free/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 22:40:32 -0400</pubDate>
      <description>गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या मोहिमेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व ८ नक्षलवाद्यांना अटक केली असून, ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आणखी ५ नक्षलवाद्यांनी शनिवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/
अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी या आरोपींकडून एके-४७, एसएलआर आणि अन्य बंदुकांसह ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/
७ फेब्रुवारी २०२६ रोजी भामरागड जवळील फोदेवाडा जंगलात झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला होता. या हत्येमध्ये अटकेतील काही नक्षलवाद्यांचा सहभाग होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि दोघांना नैताळा येथून अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/
दुसरीकडे, पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या ५ नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम अशी आत्मसमर्पण केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांविरुद्धचा सशस्त्र संघर्ष संपला असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. मात्र, नक्षलवादी विचारधारा लगेच संपत नसल्यामुळे, इतर राज्यांतून नक्षलींनी जिल्ह्यात पुन्हा प्रवेश करू नये यासाठी पोलीस यापुढेही सातत्याने लक्ष ठेवून राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.</description>
      </item><item>
      <title>NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 22:15:53 -0400</pubDate>
      <description>मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांवर पूर्ण अधिकारांसह कायम आहेत, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात या दोन्ही नेत्यांच्या मुख्य पदांचा उल्लेख नव्हता, ती केवळ एक 'कारकून चूक' होती. या संदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच एक नवीन पत्र पाठवून पटेल आणि तटकरे यांच्यासह पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/
२९ एप्रिल रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रातील नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्य पदे गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. पत्रात प्रफुल पटेल यांचा उल्लेख 'राज्यसभेचे पक्षनेते' आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख 'लोकसभेचे पक्षनेते' असा करण्यात आला होता. परंतु, त्यांच्या नावांसमोर 'राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष' आणि 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष' या त्यांच्या मूळ संघटनात्मक पदांचा उल्लेख नसल्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांना पक्षात बाजूला केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. माध्यमांमधील वृत्तांचे खंडन करताना उमेश पाटील म्हणाले, "प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे आधीसारखीच कायम आहेत. निवडणूक आयोगाकडे गेलेल्या पत्रात केवळ तांत्रिक चूक झाली होती, ज्याचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. उमेश पाटील यांनी आवाहन केले की, माध्यमांमध्ये चालणाऱ्या परस्परविरोधी आणि नकारात्मक बातम्या पूर्णपणे आधारहीन असून या चर्चा आता थांबवल्या जाव्यात. "दिवंगत अजित दादांच्या निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पुढे जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/
दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन घेणार : पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार लवकरच दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावणार आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी आणि प्रशासकीय नियुक्त्यांचे वेळापत्रक या अधिवेशनात अंतिम केले जाईल. सध्या निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार हा केवळ कायदेशीर प्रक्रिया, प्रशासकीय संवाद आणि पक्षांतर्गत तात्पुरत्या सोयीसाठी करण्यात आला होता. यात आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करण्याचा अंतिम अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांना आहे. जोपर्यंत पक्षाची विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणी आणि सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नवीन निवडणूक होत नाही, तोपर्यंत सर्व वर्तमान प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जुन्या व्यवस्थेनुसारच काम पाहत राहतील. "आम्ही लवकरच निवडणूक आयोगाला नवीन सुधारित पत्र पाठवत आहोत. यामध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांची पदे स्पष्ट केली जातीलच, सोबतच पक्षाने निश्चित केलेल्या काही नवीन अंतर्गत संघटनात्मक नियुक्त्यांची माहितीही जोडली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
दिल्ली कार्यालयात प्रवेशबंदीच्या अफवांचे खंडन : पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याच्या बातम्यांचे जोरदार खंडन केले. दिल्ली कार्यालयातील जुनीच व्यवस्था पुढेही लागू राहील, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की पक्ष पूर्णपणे एकसंध असून आगामी राजकीय रणनीतीवर लक्ष केंद्रित करत आहे.</description>
      </item><item>
      <title>Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 22:10:16 -0400</pubDate>
      <description>मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे सावट जुगारून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) नियोजित वेळेच्या ४ दिवस आधीच अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्यामुळे मान्सूनचा प्रवास प्रचंड वेगाने सुरू झाला आहे.

https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/

दरवर्षी साधारण २० मेच्या आसपास अंदमानात पोहोचणारा मान्सून यंदा १६ मे रोजीच दाखल झाला आहे. मान्सूनने निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भागात प्रगती केली आहे.

अंदमानातील वेळेआधीच्या आगमनामुळे यंदा केरळ आणि महाराष्ट्रातही मान्सून वेळेपूर्वीच धडकण्याची शक्यता आहे. सामान्यतः १ जून रोजी पोहोचणारा मान्सून यंदा २६ मेच्या आसपास केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर ६ जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचेल. ७ जूनपर्यंत पुण्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या इतर भागांत नियोजित वेळेच्या ३ ते ४ दिवस आधी म्हणजेच २ ते ५ जून दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो.

https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/

प्रवासाचा वेग जास्त : हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या अंदमान परिसरात ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे सक्रिय झाले आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार आहे. यामुळे यंदा भरपूर पाऊस पडेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.

मध्य भारतात उष्णतेची लाट : महाराष्ट्रात पावसाची शक्यता: मान्सून पुढे सरकत असतानाच, महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच १७ मेपासून दक्षिण कडील जिल्हे, मराठवाड्याचा काही भाग आणि किनारी प्रदेशात सोसाट्याचा वारा, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ईशान्य भारतात मुसळधार : पुढील ४ ते ५ दिवस ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचा प्रवास सुरू झाला असला, तरी उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट आणि उकाडा कायम राहील.</description>
      </item><item>
      <title>Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 22:03:21 -0400</pubDate>
      <description>मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा मोठा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील काही भागांत आज देखील अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. काल राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, या भागात १७ मे च्या सकाळपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील काही दुर्गम किंवा विशिष्ट भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, हवेतील आर्द्रतेच्या उच्च पातळीमुळे नागरिकांचा त्रास आणि अस्वस्थता अधिक वाढली आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्वतःला हायड्रेटेड ठेवावे (भरपूर पाणी प्यावे) आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. मुंबई आणि रायगडमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज असला, तरी वीकेंडला (शनिवार-रविवार) ठाणे आणि रायगडच्या काही भागांत हलका पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/
प्रशासनाने वर्धा, नागपूर, अकोला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. यासोबतच धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे, तिथल्या नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/
जळगावमध्ये तापमान ४५ अंशांच्या पार : राज्यात मे महिन्यात सूर्य अधिक आग ओकताना दिसत असून, अनेक भागांत ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. जळगावमध्ये सलग ४ दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पार गेला आहे. जळगावमध्ये ४५.३ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली, तर दोन दिवसांपूर्वी हा पारा तब्बल ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तापमान ४५ अंशांच्या वर गेल्याने उकाड्यात आणि उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले असून, नागरिकांची वर्दळ कमालीची घटली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू होता. आता तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४१ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. यापूर्वी याच आठवड्यात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, तापमानात घट झाली असली तरी हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने उकाडा अजूनही कायम आहे.
</description>
      </item><item>
      <title>Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/current-decade-is-one-of-uncertainty-and-global-crisis-says-modi/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/current-decade-is-one-of-uncertainty-and-global-crisis-says-modi/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 22:00:56 -0400</pubDate>
      <description>नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताचे झपाट्याने होणारे तांत्रिक परिवर्तन, लोकशाही की लवचिकता आणि वाढता जागतिक प्रभाव यावर विशेष भर दिला. त्याचबरोबर सध्याचे दशक अनिश्चितता आणि जागतिक संकटाचे राहिले आहे. त्यांनी कोविड-१९ महामारी आणि सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धांचा जगासमोरील मोठी आव्हाने म्हणून उल्लेख केला. हे दशक जगासाठी आव्हानांचे दशक बनत चालले आहे," असे ते म्हणाले. त्याचवेळी, पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, भारत हा तांत्रिक प्रगती आणि मानवी मूल्यांच्या बळावर पुढे जाणारा एक संधींचा देश आहे. मोदी म्हणाले, "भारत हा संधींचा देश आहे. भारत तंत्रज्ञानाने प्रेरित आहे आणि तितकाच तो मानवतेने प्रेरित देखील आहे. आजचा भारत एका अभूतपूर्व परिवर्तनाच्या काळातून जात आहे. भारतात आकांक्षा अमर्याद आहेत, म्हणूनच आमचे प्रयत्न देखील अथांग होत आहेत.
https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/
भारताच्या लोकशाही रचनेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, "भारत आपल्या प्रत्येक नागरिकाच्या लोकशाहीतील सहभागाला अत्यंत मोलाचे मानतो. लोकशाहीची जननी म्हणून हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. भारत आणि नेदरलँड्स हे दोन्ही देश विश्वासार्ह आणि पारदर्शक जागतिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. तंत्रज्ञान, व्यापार यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक प्रकल्पांपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य अधिक दृढ करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/
अनिवासी भारतीयांच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या समुदायाने भारताशी असलेले आपले मजबूत सांस्कृतिक संबंध जपले आहेत. आपल्या कर्तृत्वाने व व्यावसायिक यशामुळे परदेशात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "द हेगमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. त्यांची आपुलकी, यश आणि भारतासोबत असलेले घट्ट नाते आपल्या सर्वांसाठी सतत अभिमानास्पद ठरत आहे."
https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/
भारतीय संस्कृतीच्या शाश्वत स्वरूपावर भर देताना मोदी म्हणाले की, शतकानुशतके जागतिक बदल होऊनभी भारताची सांस्कृतिक ओळख नेहमीच जिवंत राहिली आहे. ते म्हणाले, काळाच्या ओघात अनेक संस्कृती नष्ट झाल्या. परंतु, भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आजही इथल्या लोकांच्या हृदयात तितक्याच ताकदीने धडधडत आहे. भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश सेमीकंडक्टर निर्मिती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. भारतभरात सध्या १२ सेमीकंडक्टर प्लांट्सवर काम वेगाने सुरू असून, दोन प्लांटमध्ये उत्पादन देखील सुरू झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मोदी म्हणाले, "याचा अर्थ असा की आता चिप्स भारतात 'डिझाइन'ही केल्या जातील आणि 'मेड इन इंडिया' देखील असतील."
भारतात स्टार्टअपचे मोठे नेटवर्क : भारतातील स्टार्टअप्सच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताचे स्टार्टअप नेटवर्क जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क बनले आहे. भारत स्टार्टअप्स एआय , संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत," असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की भारताची ही नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था जागतिक सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहे.
नेदरलँड महत्त्वाचा आर्थिक भागीदार : भारत तंत्रज्ञान, व्यापार, हवामान सहकार्य, सेमीकंडक्टर आणि धोरणात्मक पुरवठा साखळी यांसारख्या क्षेत्रांमध्ये नेदरलँड्ससह युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करत असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे. युरोपीय युनियनमध्ये नेदरलँड्स हा भारताचा एक महत्त्वाचा आर्थिक भागीदार म्हणून समोर आला आहे. नेदरलँड्समधील भारतीय समुदायाची लोकसंख्या २ लाखांपेक्षा जास्त असून, या समुदायाने दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.</description>
      </item><item>
      <title>Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/three-languages-mandatory-for-classes-9-and-10-from-july-1-cbse-decision/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/three-languages-mandatory-for-classes-9-and-10-from-july-1-cbse-decision/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 21:56:47 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा धोरणामध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. १५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात बोर्डाने म्हटले आहे की, ही सुधारित रचना राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-SE) २०२३ च्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/
अधिसूचनेनुसार, १ जुलै २०२६ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांचा (R1, R2 आणि R3) अभ्यास करणे अनिवार्य होईल. या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/
बोर्डाने सांगितले की, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता ९ वी आणि १० वीच्या NCERT अभ्यासक्रमाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचे शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२६ मध्येच सुरू झाले असले, तरी या बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी संक्रमणकालीन दृष्टिकोन स्वीकारला जाईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/
सुधारित भाषा धोरणानुसार, ज्या विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकायची आहे, ते इतर दोन निवडलेल्या भाषा मूळ भारतीय असतील तरच परदेशी भाषा निवडू शकतात. याव्यतिरिक्त, परदेशी भाषेचा अभ्यास चौथी अतिरिक्त भाषा म्हणूनही केला जाऊ शकतो.CBSE ने सर्व संलग्न शाळांना भाषा शिक्षणाशी संबंधित अद्ययावत अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, क्षमता आणि शिकण्याच्या निष्पत्तींचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.
परिपत्रकात अधोरेखित करण्यात आले आहे की, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यान वाचन आकलन मौखिक संवाद , व्याकरण आणि लेखन कौशल्य यांसारख्या भाषा क्षमतांमध्ये सुमारे ७५ ते ८० टक्के समानता आहे.जोपर्यंत R3 ची विशेष पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत इयत्ता ९ वीचे विद्यार्थी २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षासाठी निवडलेल्या भाषेचे इयत्ता ६ वीचे R3 चे पाठ्यपुस्तक वापरतील. शाळांना या पाठ्यपुस्तकांसोबतच स्थानिक किंवा राज्य पातळीवरील साहित्यिक साहित्य, जसे की कविता, लघुकथा आणि कादंबऱ्यांचा समावेश करण्यास सांगण्यात आले आहे.</description>
      </item><item>
      <title>IPL 2026 : ऐतिहासिक आयपीएल २०२६, सर्व १० संघांनी एकत्र येऊन केला अनोखा विक्रम</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/ipl-2026-historic-ipl-2026-all-10-teams-came-together-to-create-a-unique-record/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/ipl-2026-historic-ipl-2026-all-10-teams-came-together-to-create-a-unique-record/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 21:30:41 -0400</pubDate>
      <description>आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ च्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे, तर हंगामातला अखेरचा साखळी सामना २४ मे रोजी होणार आहे. टॉप पाच संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलच्या १९ व्या हंगामात नवीन विक्रम रचला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व १० संघांनी एकत्र येऊन अनोखा विक्रम केला आहे. प्रत्येक संघातील किमान एका क्रिकेटपटूने यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे.
आयपीएल २०२६ च्या ५७ व्या सामन्यात विराटने कोलकाता विरुद्ध शानदार शतक केले आणि आयपीएलच्या इतिहासात कधी न झालेला विक्रम नोंदवला गेला. आयपीएल २०२६ मध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभव सूर्वंशी सारख्या युवा फलंदाजाचा समावेश आहे. तसेच विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारे खेळाडू-
१. संजू सॅमसन (चेन्नई सुपर किंग्स) : संजू सॅमसनने यंदाच्या हंगामात सीएसकेकडून खेळत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने चेपॉकवर दिल्ली विरुद्ध नाबाद ११५ धावा आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १०१ धावा केल्या आहेत. त्याने यंदाच्या हंगामात दोन शतके केली आहेत.
२.क्विंटन डी कॉक, रायन रिचकलटन आणि तिलक वर्मा (मुंबई इंडियन्स) : मुंबई २०२६ च्या प्लेऑफमधूम बाहेर झाली असली तरी त्यांच्या तीन फलंदाजांनी शतक झळकवले आहे. पंजाब किंग्जविरुद्ध आपला पहिला सामना खेळताना डी कॉकने ६० चेंडूंत नाबाद ११२ धावा, तिलक वर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध ४५ चेंडूंत १०१ धावा आणि विकेटकीपर-सलामीवीर रिकल्टनने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध एमआयसाठी सर्वात जलद शतक केले. त्याने हे शतक ४४ चेंडूंत पूर्ण केले, एसआरएचविरुद्ध त्याने १२३ (५५) धावा केल्या.
३. केएल राहुल (दिल्ली कॅपिटल्स) :  दिल्लीने या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, मात्र केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राहुलने पंजाब किंग्जविरुद्ध ६६ चेंडूंत नाबाद १५२ धावा केल्या. ही खेळी या हंगामातील सर्वोच्च आणि आयपीएलच्या इतिहासातील एका भारतीय खेळाडूने केलेली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
४. वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स): वैभवने यंदाच्या हंगामात सर्वात जलद शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. त्याने हैदराबादच्या विरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत १२ षटकारांच्या जोरावर १०३ धावा केल्या.
५. साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) : साई सुदर्शनने या हंगामात गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आरसीबीविरुद्ध ५७ चेंडूत शतकी खेळी केली आहे.
६. अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैद्राबाद) : हैदराबादच्या या डावखुऱ्या फलंदाजाने दिल्लीविरुद्ध ६८ चेंडूत १३५ धावांची खेळी केली होती.
७. कूपर कॉनोली (पंजाब किंग्ज) : कूपर कॉनोलीने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात हैदराबादविरुद्ध ५९ चेंडूत १०७ धावांची खेळी केली होती.
८. फिन ऍलन (कोलकाता नाईट रायडर्स) : न्यूझीलंडच्या या फलंदाजाने दिल्लीविरुद्ध ४७ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या.
९. मिचेल मार्श (लखनऊ सुपर जायंट्स) : मार्शने लखनऊसाठी आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक केले आहे. त्याने आरसीबीविरुद्ध ४९ चेंडूत १०० धावा केल्या.
१०. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : कोहालीने केकेआरविरुद्धात लक्ष्याचा पाठलाग करताना ६० चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या.</description>
      </item><item>
      <title>कृषी वीजपुरवठा स्वतंत्र पद्धतीने हाताळण्यासाठी निर्णय; 'एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड'कडे कारभार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/decision-to-handle-agricultural-energy-supply-independently-mseb-solar-agro-power-limited-takes-charge/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/decision-to-handle-agricultural-energy-supply-independently-mseb-solar-agro-power-limited-takes-charge/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 20:50:24 -0400</pubDate>
      <description>महावितरणचे अखेर विभाजन
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महावितरणच्या विभाजनावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, राज्यातील कृषी वीजपुरवठा स्वतंत्र पद्धतीने हाताळण्यासाठी महावितरणचे दोन तुकडे करण्यात आले आहेत. या संदर्भातील ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची पुनर्रचना आणि हस्तांतरण योजना, २०२६’ अधिसूचना सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. या निर्णयानुसार, राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याचा संपूर्ण कारभार आता ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड’ या नव्या स्वतंत्र संस्थेकडे सोपवण्यात आला असून ही व्यवस्था १ एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू मानली जाणार आहे.
राज्य सरकारने महावितरणचा कृषी वीजपुरवठा विभाग पूर्णपणे वेगळा केला आहे. नव्याने स्थापन झालेली ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड’ ही कंपनी आता कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र 'वीज वितरण परवानाधारक' म्हणून काम करेल. ही कंपनी एमएसईबी होल्डिंग कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात आता शेतकऱ्यांसाठी देशातील पहिली स्वतंत्र वीज कंपनी अस्तित्वात आली आहे.शेतकऱ्यांशी संबंधित सर्व आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार आता या नव्या कंपनीच्या अखत्यारीत येतील. यामध्ये कृषी ग्राहकांची नवीन नोंदणी आणि नवीन वीज जोडण्या देणे, शेतकऱ्यांचे वीजबिल तयार करणे आणि वीजबिल वसुली करणे, ग्राहक सेवा, नियामक अर्ज आणि लेखांकन सांभाळणे, सरकारकडून मिळणारे कृषी अनुदान आणि सबसिडीचे व्यवस्थापन करणे, आदी कामांचा समावेश आहे.
https://prahaar.in/2026/05/16/implement-a-campaign-to-remove-encroachments-by-prioritizing-forest-conservation-minister-adv-ashish-shelar/
पायाभूत सुविधा महावितरणकडेच
या विभाजनात एक मोठी तांत्रिक मेख आहे. वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे, वितरण यंत्रणा आणि इतर सर्व पायाभूत सुविधा महावितरणकडेच सुरक्षित राहतील. औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि बिगर कृषी ग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणच वीजपुरवठा करेल. नवी कृषी कंपनी ही केवळ 'किरकोळ वीजपुरवठादार' म्हणून काम करेल. महावितरण या नव्या कंपनीला वीज वितरणासाठी आपल्या पायाभूत सुविधा पुरवणार असून, त्या बदल्यात महावितरणला सेवा शुल्क दिले जाईल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०२६ ते २०३० या कालावधीसाठी वार्षिक अंदाजे १ हजार ५०० कोटी रुपयांच्या सेवा शुल्काची तरतूद केली आहे.
मालमत्ता, थकबाकी आणि कर्ज विभागणी कशी?
कृषी ग्राहकांकडील जुनी अब्जावधी रुपयांची थकबाकी आणि सरकारकडून येणारे कृषी अनुदान आता नव्या संस्थेकडे हस्तांतरित केले जाईल. या नव्या कृषी संस्थेचा गाडा सुरुवातीला सुरळीत चालावा आणि खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकार तब्बल २ हजार ५०० कोटी रुपयांची बँक हमी देणार आहे.महावितरणवर असलेली विद्यमान कर्जे, बँक दायित्वे आणि विविध कंपन्यांसोबत झालेले मूळ 'वीज खरेदी करार' महावितरणकडेच राहतील, ते नव्या कंपनीकडे जाणार नाहीत. मात्र, या करारांतर्गत मिळणाऱ्या विजेचा लाभ कृषी संस्थेला दिला जाईल. या योजनेत भविष्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.</description>
      </item><item>
      <title>मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/action-against-unauthorized-construction-along-with-turf-in-the-premises-of-mulund-kalidas-natya-griha/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/action-against-unauthorized-construction-along-with-turf-in-the-premises-of-mulund-kalidas-natya-griha/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 20:22:35 -0400</pubDate>
      <description>महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात
मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना आणि बांधकाम, टर्फ यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'टी' विभाग कार्यालयाने शनिवारी १६ मे २०२६ पासून निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे.यात इमारत क्रमांक २ (तथास्तु सभागृह) जवळ असलेले अनधिकृत तात्पुरते शेड आणि शेजारील टर्फ तोडण्यात आले. तसेच इमारत क्रमांक २ च्या बाहेरील बाजूस असलेले २ अतिरिक्त शेडही हटवण्यात आले.मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी बैठक झाली. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल तसेच कालिदास नाट्यगृह कामकाजाच्या अनुषंगाने पुनर्रचना आणि सुधार करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर परिसरात पाहणी करण्यात आली.
या बैठकीस आणि पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत आमदार मिहिर कोटेचा, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, नगरसेविका दीपिका घाग, नगरसेविका हेतल गाला - मोरवेकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्यासह उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.या पाहणी दरम्यान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात काही अनियमितता, तात्पुरत्या संरचना आणि अनधिकृत बांधकामे आढळून आली. त्या संरचना तसेच अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. त्यानुसार शनिवार पासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
'टी' विभाग कार्यालयाने शनिवारी सकाळीच क्रीडा संकुलात कारवाई सुरू केली. यात इमारत क्रमांक २ (तथास्तु सभागृह) जवळ असलेले अनधिकृत तात्पुरते शेड आणि शेजारील टर्फ तोडण्यात आले. तसेच इमारत क्रमांक २ च्या बाहेरील बाजूस असलेले २ अतिरिक्त शेड देखील हटवण्यात आले.बॅडमिंटन कोर्ट व सांस्कृतिक सभागृह (इमारत क्रमांक ४) च्या बाहेरील बाजूस फायबर शीट लावून केलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले, तसेच इमारतीच्या आत लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्यात आले. टेनिस कोर्टच्या प्रेक्षक गॅलरीवर उभारलेले तात्पुरते शेडही पूर्णपणे हटवण्यात आली.
ही कारवाई करण्यासाठी २५ कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी १ जेसीबी, २ गॅस कटर आणि २ ग्राइंडर या संयंत्रांचा वापर करण्यात आला.महापौरांच्या निर्देशानंतर अवघ्या २४ तासांच्या आत महानगरपालिकेने ही धडक कारवाई केली यामुळे क्रीडाप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही ही तोडक कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.</description>
      </item><item>
      <title>विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/the-responsibility-of-the-assistant-commissioner-for-civil-works-in-the-department-is-under-the-responsibility-of-health-building/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/the-responsibility-of-the-assistant-commissioner-for-civil-works-in-the-department-is-under-the-responsibility-of-health-building/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 20:19:03 -0400</pubDate>
      <description>रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश
रुग्णालयांमधील कामांवर सहायक आयुक्तांना भेटी देत लक्ष देण्याच्या सूचना
मुंबई :दवाखाने व रुग्णालयांच्या इमारती आकर्षक, एकसमान रंगसंगतीने उठावदार दिसाव्यात, परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीमुळे या आरोग्य संस्थांचे दर्जेदार स्वरूप कायम राखले जावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी शनिवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले. प्रशासकीय विभागांच्‍या (वॉर्ड) सहायक आयुक्‍तांनी विविध आरोग्‍य संस्‍थांना स्‍वयंप्रेरणेने भेट देऊन परिसर स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, दुरुस्तीची कामे, रंगसंगती आणि नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असेही निर्देश भिडे यांनी यावेळी दिले. आता आता दवाखाने, रुग्णालये आदी परिसर फेरीवाला मुक्त होवू स्वच्छ आणि सुंदर दिसतील अशी आशा मुंबईकरांनी बाळगायला हरकत नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवरी १६ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.
मुंबईकरांच्या आरोग्यसेवेसाठी मुंबई महानगरपालिकेची सुमारे ५०० हून अधिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे, विशेषोपचार रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे दोन कोटींहून अधिक नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिकता आणि वैद्यकीय सेवांची गुणवत्ता सातत्याने अधिक सक्षम व उंचावत आहे. मात्र, उत्कृष्ट आरोग्यसेवेसोबतच या सर्व आरोग्य संस्थांचा परिसरही स्वच्छ, अतिक्रमणमुक्त आणि नागरिकांच्या दैनंदिन वावरासाठी सुसज्ज असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, आरोग्‍य संस्‍थांच्‍या इमारतींचे संरचनात्मक सुरक्षा लेखापरीक्षण, आवश्यक दुरुस्ती आणि नियमित देखभाल वेळोवेळी करून आरोग्य संस्थांची गुणवत्ता व विश्वासार्हता कायम राखावी. महानगरपालिकेच्या गरजेनुसार सुरक्षा व गृहव्यवस्थापन (हाऊसकीपिंग) कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी. यासोबतच आरोग्य संस्थांचे दिशादर्शक फलक, सुशोभीकरण आणि एकूण सादरीकरण अधिक आकर्षक, सुबक व नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्‍यात. संबंधित विभागांच्‍या सहायक आयुक्‍तांनी आरोग्‍य संस्‍थांना नियमितपणे भेट द्यावी. विभागांच्या सहायक अभियंता (परिरक्षण) यांनी आरोग्य संस्थांच्या देखभाल, दुरुस्ती व आवश्यक परिरक्षण कामांची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देशही भिडे यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण १४ हजार ६५३ रुग्णखाटा उपलब्ध असून, नवीन रुग्णालयांच्या उभारणीनंतर आणखी सुमारे ४ हजार ५५६ रुग्णखाटांची भर पडणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत सुमारे २१ हजार २९९ कायम कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, मुंबईकरांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी करताना केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे, तर आरोग्य संस्थांमधील मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि परिसर व्यवस्थापन यांनाही तितकेच प्राधान्य देणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधांच्या परिसरातील अतिक्रमणे व विविध अडथळे दूर करून नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ वातावरण निर्माण करण्यात यावे. अखंडित पाणी व वीजपुरवठा सुनिश्चित करण्याबरोबरच अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. रुग्णालये व दवाखान्यांतील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, देखभाल व निर्जंतुकीकरण करून परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी राखावा. रुग्ण, कर्मचारी व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सक्षम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच, परिसरातील दृश्यमानता व सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी वृक्षांच्या फांद्यांची नियमित छाटणी करावी,असेही निर्देश दिले.</description>
      </item></channel>
    </rss>