<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>नाशिकमधील &#039;कॉर्पोरेट जिहाद&#039;नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/state-government-in-action-mode-after-corporate-jihad-in-nashik/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/state-government-in-action-mode-after-corporate-jihad-in-nashik/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:56:27 -0400</pubDate>
      <description> सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी
मुंबई : नाशिकमधील एका नामांकित कंपनीत उघडकीस आलेल्या 'कॉर्पोरेट जिहाद'चे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. 'कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३' अर्थात 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात विभागाने एक परिपत्रक जारी केले असून, कंपन्यांची झाडाझडती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत.
नाशिकच्या घटनेवरून धडा घेत, राज्य शासनाने अंतर्गत सुरक्षा यंत्रणा नसलेल्या कंपन्यांवर बडगा उगारण्याचे ठरवले आहे. नव्या आदेशानुसार, राज्यातील ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी 'अंतर्गत तक्रार निवारण समिती' स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या समितीची रचना नावापुरती असू नये, म्हणून त्यात किमान ५० टक्के महिला सदस्य असणे, वरिष्ठ महिला कर्मचारीच अध्यक्ष असणे आणि बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) प्रतिनिधीचा समावेश असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/05/16/caught-on-cam-armed-robbery-at-nashik-jewellery-shop-brave-woman-shop-owner-tackles-thieves-2-held/
७ दिवसांत कारवाई होणार
पीडित महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी सरकारने केली आहे. महिलांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी ई-मेल, लेखी अर्ज तसेच केंद्र सरकारचे 'शी-बॉक्स' पोर्टल यांसारखी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या ७ दिवसांच्या आत कायदेशीर कार्यवाही सुरू करणे कंपन्यांना बंधनकारक असेल. संपूर्ण चौकशीदरम्यान गोपनीयता राखणे तसेच पीडित महिलेला मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घेत आवश्यकतेनुसार अंतरिम दिलासा (सुटी किंवा विभाग बदल) देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/
३१ मुद्द्यांची 'विशेष तपासणी सूची
महिला व बाल विकास विभागाने कंपन्यांच्या तपासणीसाठी एक विशेष '३१ मुद्द्यांची तपासणी सूची' (चेकलिस्ट) तयार केली आहे. यामध्ये कंपनीचे अधिकृत पॉश धोरण, कर्मचाऱ्यांसाठी राबवले गेलेले जनजागृती कार्यक्रम, महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल वेळेत सादर केला की नाही, कार्यस्थळावरील सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था, तसेच 'शी-बॉक्स' पोर्टलवरील अधिकृत नोंदणी यांसारख्या ३१ कठोर निकषांवर प्रत्येक आस्थापनाची पडताळणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांचे विशेष पथक कोणत्याही क्षणी कंपन्यांमध्ये जाऊन ही तपासणी करू शकते.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/
त्रुटी आढळल्यास फौजदारी कारवाई
नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संताप पाहता, सरकारने अंमलबजावणीत कोणतीही कसर सोडलेली नाही. तपासणीदरम्यान ज्या कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये त्रुटी आढळतील, किंवा अंतर्गत समिती कागदावरच असल्याचे सिद्ध होईल, अशा आस्थापनांवर 'पॉश ऍक्ट २०१३' च्या कलम २६ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे व्यावसायिक परवाने रद्द करण्यासोबतच जबाबदार व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील.</description>
      </item><item>
      <title>Thailand Open 2026 : सात्विक–चिराग फायनलमध्ये! उपांत्य फेरीत भारतीय जोडीचे शानदार कमबॅक</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/thailand-open-2026-satwik-chirag-in-the-final-indian-pair-makes-a-brilliant-comeback-in-the-semifinals/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/thailand-open-2026-satwik-chirag-in-the-final-indian-pair-makes-a-brilliant-comeback-in-the-semifinals/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:23:39 -0400</pubDate>
      <description>Thailand Open २०२६ मधून भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवला आहे आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या हंगामात प्रथमच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation) वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय जोडी मैदानात उतरणार आहे.

उपांत्य फेरीत रोमांचक विजय
उपांत्य फेरीत सात्विक–चिराग यांनी मलेशियाच्या गोह से फी आणि नूर इज्जुद्दीन रुमसानी या जोडीवर १८-२१, २२-२०, २१-१२ असा थरारक विजय मिळवला.दुसऱ्या गेममध्ये त्यांनी तणावपूर्ण परिस्थितीत दोन गेम पॉइंट्स वाचवत २२-२० ने गेम जिंकला. त्यानंतर निर्णायक गेममध्ये आक्रमक स्मॅश, अचूक नेट प्ले आणि उत्तम समन्वयाच्या जोरावर भारतीय जोडीने २१-१२ ने सामना आपल्या नावावर केला. हा सामना तब्बल १ तास २२ मिनिटे चालला.


TOYOTA Thailand Open 2026
MD - SF
🇮🇳Satwiksairaj RANKIREDDY🏅
19 22 21 🇮🇳Chirag SHETTY🏅
🇲🇾GOH Sze Fei
21 20 16 🇲🇾Nur IZZUDDIN

🕚 in 82 minutes
— BWFScore (@BWFScore) May 16, 2026

क्वार्टर फायनलमध्ये जपानी जोडीवर सहज विजय
याआधी उपांत्यपूर्व फेरीत सात्विक–चिराग यांनी जपानच्या Takumi Nomura आणि Yuichi Shimogami या जोडीचा २१-१२, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्यात भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच वर्चस्व दाखवले होते. पहिल्याच गेममध्ये त्यांनी १०-० अशी मोठी आघाडी घेत सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता.
https://prahaar.in/2026/05/16/kkr-vs-gt-do-or-die-situation-for-kkr-gujarat-target-top-two-high-voltage-match-at-eden-gardens-today/
अंतिम फेरीत कोणाशी भिडणार?
सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली सात्विक–चिराग जोडी अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या Leo Rolly Carnando – Daniel Marthin किंवा चीनच्या He Ji Ting – Ren Xiang Yu या जोडींपैकी एका जोडीशी सामना करणार आहे. विशेष म्हणजे, सात्विक–चिराग यांनी शेवटचा अंतिम सामना २०२५ मध्ये China Masters मध्ये खेळला होता. २०२४ मध्ये Thailand Open जिंकल्यानंतर ते पुन्हा एकदा विजेतेपदाच्या जवळ पोहोचले आहेत.

इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी
या स्पर्धेत इतर भारतीय खेळाडूंना मात्र यश मिळाले नाही. P. V. Sindhu हिला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची कडून १९-२१, २१-१८, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याचा थायलंडच्या कुनलावुत विटिडसार्नने १९-२१, १६-२१ असा पराभव केला.</description>
      </item><item>
      <title>Amruta Fadanvis : रेड कार्पेटची वाट पाहता येईल, पण माझा देश नेहमीच प्रथम!&quot; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांचा &#039;कान्स&#039; दौरा रद्द</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/red-carpet-can-wait-nation-comes-first-maha-cm-devendra-fadnavis-wife-amruta-cancels-cannes-visit-amid-pm-modis-appeal-video/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/red-carpet-can-wait-nation-comes-first-maha-cm-devendra-fadnavis-wife-amruta-cancels-cannes-visit-amid-pm-modis-appeal-video/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:19:54 -0400</pubDate>
      <description>मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची बचत करावी आणि परकीय चलनावर ताण येऊ नये म्हणून सोन्याची खरेदी मर्यादित ठेवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले होते. या राष्ट्रीय सादेला त्वरित आणि सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'चे (Cannes Film Festival) विशेष आमंत्रण हाती असूनही, केवळ देशाच्या हिताचा विचार करून त्यांनी आपला हा नियोजित दौरा शनिवारी रद्द केला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/could-feel-spirit-of-maharashtra-rajasthan-up-in-hague-pm-modi-lauds-indian-diasporas-grand-gesture-in-netherlands-watch/
आंतरराष्ट्रीय मंचावर 'पैठणी'च्या सादरीकरणाची होती तयारी

My first step towards the austerity measures envisioned by Hon’ble PM Narendra Modi ji: putting nation first.
I was honoured with an invitation to represent Maharashtra, its culture and our glorious handloom heritage at the prestigious Cannes Film Festival. A magnificent Paithani… pic.twitter.com/MogGE2pilD
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2026

आपल्या समाजमाध्यमांवरील एका सविस्तर निवेदनाद्वारे अमृता फडणवीस यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. कान्स चित्रपट महोत्सवाच्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वारसा सादर करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली होती. महाराष्ट्राची ओळख आणि शान असलेली येवल्याची अस्सल पैठणी या महोत्सवासाठी खास डिझाईन करण्यात आली होती. स्थानिक कारागिरांनी सलग तीन महिने रात्रंदिवस एक करून ही अद्वितीय कलाकृती केवळ याच सोहळ्यासाठी हाताने विणली होती. या तयारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ही पैठणी केवळ एक वस्त्र नसून ती महाराष्ट्राची कलाकुसर, परंपरा आणि कलात्मक वारशाचे प्रतीक आहे. जगभरातील दिग्गजांसमोर राज्याचे हे वैभव मांडण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी साधनसंपत्तीच्या काटेकोर वापरासाठी आणि काटकसरीसाठी देशवासीयांना आवाहन केले, तेव्हा त्यांनी आपले वैयक्तिक स्वप्न बाजूला ठेवले. हा निर्णय भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता, कारण यामागे अनेक कारागीर आणि फॅशन डिझायनर्सची कित्येक महिन्यांची मेहनत दडली होती. तरीही, आंतरराष्ट्रीय मंचावरील उपस्थिती आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा 'राष्ट्रहित' आणि 'सामूहिक जबाबदारी' सर्वोच्च असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

कारागिरांचे मानले आभार
आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना, अमृता फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेत जोडल्या गेलेल्या सर्व कारागिरांचे, डिझायनर्सचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या या अथक परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी आपल्या संदेशाचा शेवट एका अत्यंत मार्मिक आणि प्रेरणादायी वाक्याने केला. त्या म्हणाल्या, "रेड कार्पेटला थोडी वाट पाहता येईल, पण माझा देश माझ्यासाठी नेहमीच प्रथम स्थानावर आहे."

काय होते पंतप्रधान मोदींचे आवाहन?
पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. याचा थेट फटका जागतिक पुरवठा साखळीला बसत आहे. या आर्थिक संकटाची झळ देशाला बसू नये आणि परकीय चलनाचा साठा सुरक्षित राहावा, यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यांनी जनतेला खाजगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे, अनावश्यक इंधन खर्च टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. याच राष्ट्रीय आवाहनाला पाठिंबा दर्शवत अमृता फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.</description>
      </item><item>
      <title>KKR vs GT : KKR साठी &#039;डू ऑर डाय&#039; स्थिती ! गुजरातचे लक्ष्य टॉप टू, आज ईडन गार्डन्सवर हाय-व्होल्टेज सामना</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/kkr-vs-gt-do-or-die-situation-for-kkr-gujarat-target-top-two-high-voltage-match-at-eden-gardens-today/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/kkr-vs-gt-do-or-die-situation-for-kkr-gujarat-target-top-two-high-voltage-match-at-eden-gardens-today/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:19:20 -0400</pubDate>
      <description>IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ६० वा सामना रंगणार असून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders / KKR) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans / GT) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर जोरदार लढत होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केकेआरला हा सामना जिंकणे आवश्यक आहे तर गुजरातचे लक्ष्य गुणतालिकेतील दुसरे स्थान कायम राखण्यासाठी विजय मिळवणे हा असेल.

गुजरात आधीच प्लेऑफमध्ये
शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने १२ पैकी ८ सामने जिंकत १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचे लक्ष्य गुणतालिकेतील दुसरे स्थान कायम राखणे हेच आहे.

केकेआरसाठी करो किंवा मरो
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) हंगामाची सुरुवात सलग पाच पराभवांनी केली होती. नंतर संघाने पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले.मागील सामन्यात आरसीबी विरुद्ध पराभव झाल्याने केकेआरची विजयी मालिका खंडित झाली. त्या सामन्यात विराटच्या शतकी खेळीने सामना फिरवला होता.सध्या केकेआरने ११ पैकी ४ सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता उरलेले तीनही सामने जिंकले तरच त्यांना जास्तीत जास्त १५ गुण मिळू शकतात. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागू शकते.केकेआरसाठी युवा फलंदाज आंगीकृष रघुवंशीने ११ सामन्यांत ३४० धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत कार्तिक त्यागीने १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत.गुजरातसाठी साई सुदर्शनने १२ सामन्यांत ५०१ धावा केल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने २१ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड
केकेआर आणि जीटी या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. त्यापैकी गुजरातने ४ सामने जिंकले आहेत, तर केकेआरला फक्त एक विजय मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यातही गुजरातने केकेआरवर मात केली होती.
https://prahaar.in/2026/05/15/rachin-ravindra-big-blow-to-kkr-star-player-out-of-the-season-without-playing-a-single-match/
पीच रिपोर्ट
ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणतः फिरकीपटूंना मदत करणारी मानली जाते. मात्र येथे मोठ्या धावसंख्या देखील पाहायला मिळतात. या मैदानावर आतापर्यंत आयपीएलचे १०४ सामने झाले असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४३ वेळा विजय मिळवला आहे, तर ५९ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-१२
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशिद खान, अर्शद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
कोलकाता: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा, मनीष पांडे.</description>
      </item><item>
      <title>Amruta Fadnavis:  इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/amruta-fadnavis-amruta-fadnavis-initiative-for-fuel-conservation/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/amruta-fadnavis-amruta-fadnavis-initiative-for-fuel-conservation/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:07:29 -0400</pubDate>
      <description> कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फ्रान्समधील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चा आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. "रेड कार्पेटवरील फॅशन आणि संधी पुन्हा मिळू शकते, परंतु देशहित आणि पंतप्रधानांचे आवाहन सर्वोच्च आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कान्स चित्रपट महोत्सवासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि विशेषतः पारंपरिक हातमाग परंपरा जगासमोर मांडण्यासाठी अमृता फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी त्यांनी विशेष तयारीही केली होती. नाशिकमधील येवला येथील स्थानिक कारागिरांनी अत्यंत कौशल्याने आणि अनेक महिन्यांच्या अहोरात्र मेहनतीने त्यांच्यासाठी एक खास पारंपरिक पैठणी साडी विणली होती. महाराष्ट्राच्या या अस्मितेचे जागतिक मंचावर सादरीकरण होणार असल्याने डिझायनर्स आणि कारागिरांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, देश पातळीवरील इंधन बचतीच्या मोहिमेला बळ देण्यासाठी त्यांनी य
हा दौरा रद्द केला.
https://prahaar.in/2026/05/16/remove-ola-uber-and-rapido-apps-from-play-store/
रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!
दौरा रद्द करण्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, "देशहिताला आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला प्राधान्य देणे हीच प्रत्येक नागरिकाची खरी जबाबदारी आहे. कान्ससारख्या जागतिक मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा नक्कीच अभिमानाचा क्षण होता. मात्र, पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थिती पाहता इंधन बचत आणि अनावश्यक परदेशी दौरे टाळण्याचे जे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देणे मी माझे कर्तव्य समजते. रेड कार्पेटची संधी भविष्यात पुन्हा मिळू शकते, पण देशाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.</description>
      </item><item>
      <title>PM Modi : &#039;द हेग&#039;मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/could-feel-spirit-of-maharashtra-rajasthan-up-in-hague-pm-modi-lauds-indian-diasporas-grand-gesture-in-netherlands-watch/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/could-feel-spirit-of-maharashtra-rajasthan-up-in-hague-pm-modi-lauds-indian-diasporas-grand-gesture-in-netherlands-watch/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 14:47:17 -0400</pubDate>
      <description>हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या एका भव्य मेळाव्याला संबोधित केले. हजारो मैलांवर परदेशात राहूनही भारतीयांनी आपली मूळ संस्कृती, परंपरा आणि मुळे किती घट्ट जपली आहेत, हे पाहून पंतप्रधान मोदी भारावून गेले. या विशेष कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना, त्यांनी भारतीय समुदायाने नेदरलँड्सच्या प्रगतीत आणि विकासामध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाचे तोंडभरून कौतुक केले. भारताच्या विकासात आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यात अनिवासी भारतीयांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/16/caught-on-cam-armed-robbery-at-nashik-jewellery-shop-brave-woman-shop-owner-tackles-thieves-2-held/
'द हेग'मध्ये अवतरला भारत; शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा विशेष उल्लेख

VIDEO | Netherlands: Addressing Indian community in The Hague, PM Modi says, “As I was entering here, I could see the spirit of the entire Maharashtra and Chhatrapati Shivaji Maharaj, my beloved Rajasthan, and friends from UP and Assam among you all. After meeting all of you… pic.twitter.com/8MIrHIYA62
— Press Trust of India (@PTI_News) May 16, 2026

कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना आलेल्या भारावून टाकणाऱ्या अनुभवाचे वर्णन मोदींनी आपल्या भाषणात केले. त्यांना तिथे जणू एका 'लघु भारता'चेच (Mini India) दर्शन घडले. उपस्थितांमधील ऊर्जा आणि विविधतेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी जेव्हा या भव्य सभागृहात प्रवेश करत होतो, तेव्हा मला इथे संपूर्ण महाराष्ट्राचा (Maharashtra) आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) तोच स्फूर्तीदायक उत्साह पाहायला मिळाला. यासोबतच माझा लाडका राजस्थान, (Rajasthan) तसेच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि आसाममधून (Assam) आलेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींची संस्कृती मला इथे एकाच छताखाली अनुभवता येत आहे." विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत आणि उत्साहात आलेल्या भारतीयांनी या युरोपीय भूमीवर खऱ्या अर्थाने भारताचे रंग उधळल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.</description>
      </item><item>
      <title>Nashik Jewellery Shop : नाशिकमध्ये ६ दरोडेखोरांचा ज्वेलर्सवर सिनेस्टाईल हल्ला; कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, दोन आरोपींना बेड्या</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/caught-on-cam-armed-robbery-at-nashik-jewellery-shop-brave-woman-shop-owner-tackles-thieves-2-held/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/caught-on-cam-armed-robbery-at-nashik-jewellery-shop-brave-woman-shop-owner-tackles-thieves-2-held/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 14:35:14 -0400</pubDate>
      <description>नाशिक : नाशिक शहरात एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील गजबजलेल्या हिरावाडी (Hirwadi area) परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी एका दागिन्यांच्या दुकानावर सिनेस्टाईल दरोडा टाकला. हत्यारांसह दुकानात घुसलेल्या या लुटारूंनी थेट गोळीबार करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि सोन्याच्या दागिन्यांची लूट करून पोबारा केला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'न्यू समृद्धी ज्वेलर्स'मध्ये घडली आहे. या संपूर्ण थराराचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात दरोडेखोरांचा राडा आणि महिला दुकान मालकाने दाखवलेले धाडस स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
बंदुकेचा धाक आणि महिलेचा अभूतपूर्व प्रतिकार
रात्री दुकान बंद करण्याची लगबग सुरू असतानाच, तीन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने दुकानात अचानक प्रवेश केला. त्यावेळी दुकानाच्या मालकीण नयना पगारिया, एक महिला कर्मचारी आणि अमित श्रीमाळी हे कर्मचारी उपस्थित होते. आरोपींनी थेट त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि विरोध केल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. मात्र, या जीवघेण्या प्रसंगातही नयना पगारिया यांनी जराही न डगमगता त्या सशस्त्र दरोडेखोरांशी दोन हात करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यांना कडवा विरोध केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आणि दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, लुटमारीला विरोध होताच एका दरोडेखोराने दुकानात गोळीबार केला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान, दुकानातील धाडसी कर्मचारी अमित श्रीमाळी यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा आणि त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला चढवला.

https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/
डोक्यावर पिस्तुलाचे वार, कर्मचारी 'आयसीयू'मध्ये
पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांनी अमित श्रीमाळी यांच्या डोक्यावर पिस्तुलाच्या मागच्या भागाने सपासप वार केले. या अमानुष मारहाणीत श्रीमाळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
"मी अजिबात घाबरले नाही..." मालकिणीने सांगितला थरार
या भयंकर प्रसंगाचे वर्णन करताना नयना पगारिया म्हणाल्या की, गोळीबार होऊनही त्यांनी आपला प्रतिकार थांबवला नाही. "आम्ही दुकानातील दागिने पिशव्यांमध्ये भरत होतो, तितक्यात तोंडाला रुमाल बांधलेले सहा जण आले आणि त्यांनी थेट आमच्यावर बंदुका रोखल्या. मी अजिबात घाबरले नाही आणि त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला," असे त्या म्हणाल्या. नयना पगारिया पुढे म्हणाल्या, "माझा सहकारी श्रीमाळी यानेही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मी दरोडेखोरांना पळवून लावण्यासाठी काऊंटरवरून थेट त्यांच्या अंगावर ताट भिरकावले आणि त्यांना पकडण्यासाठी मी काऊंटरवरही चढले." त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि आरडाओरडीमुळे दरोडेखोरांचे धाबे दणाणले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दागिन्यांचे काही बॉक्स घेतले आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि विविध पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उर्वरित फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.</description>
      </item><item>
      <title>ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप प्ले-स्टोअरवरून हटवा</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/remove-ola-uber-and-rapido-apps-from-play-store/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/remove-ola-uber-and-rapido-apps-from-play-store/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 14:23:26 -0400</pubDate>
      <description>परिवहन विभागाचे महाराष्ट्र सायबर विभागाला आदेश; बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
मुंबई : महाराष्ट्रात परिवहन नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. राज्यातील ओला, उबर आणि रॅपिडो या नामांकित कंपन्यांची मोबाईल ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून त्वरित हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत.
वारंवार दिलेले इशारे झिडकारणे, राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा उघडपणे अवमान करणे आणि प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेशी तडजोड करणे या कारणांमुळे राज्य सरकारने हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून १५ मे रोजी गुगल आणि ॲपल कंपन्यांना अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (आयटी ऍक्ट) मधील कलम ७९(३)(ब) अन्वये मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून सायबर विभागाने या दोन्ही जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना उबर, ओला आणि रॅपिडोचे ॲप्स तात्काळ ब्लॉक करण्याचे आणि त्यांचा वापरकर्त्यांसाठीचा ॲक्सेस बंद करण्याचे थेट निर्देश दिले आहेत.
मंत्री सरनाईक यांच्या पत्रानंतर कारवाई
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १२ मे रोजी सायबर विभागाला एक पत्र लिहून राज्यातील बेकायदेशीर बाईक टॅक्सींच्या मनमानी कारभारावर तात्काळ चाप लावण्याची मागणी केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत सायबर विभागाने अवघ्या ७२ तासांत ही मोठी कारवाई अंमलात आणली.

नोटिशीत काय?
गुगल-ॲपलला पाठवलेल्या नोटीसमध्ये सायबर विभागाने स्पष्ट केले आहे की, या ॲप्सद्वारे चालवली जाणारी बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. परिवहन विभागाची कोणतीही वैध परवानगी, व्यावसायिक परवाना किंवा मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन न करताच ही प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत या ॲप्समध्ये गंभीर त्रुटी असल्याचा ठपका सरकारने ठेवला आहे. बाईक टॅक्सी चालकांची पार्श्वभूमी तपासणे, प्रवाशांना मिळणारे विमा कवच आणि आपत्कालीन परिस्थितीतील 'पॅनिक बटण' सारखी यंत्रणा अत्यंत सुमार दर्जाची असल्याचे समोर आले आहे.अलीकडेच एका बाईक टॅक्सी प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात एका महिला प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्याप्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल आहे. याशिवाय महिला प्रवाशांशी गैरवर्तन आणि छेडछाडीच्या अनेक तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत नोंदवल्या गेल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास गुगल आणि ॲपलवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रोजगारापेक्षा महिलांची सुरक्षा महत्त्वाची
या कारवाईबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आम्ही महाराष्ट्र सायबर विभागामार्फत गुगल आणि ॲपलला पत्रे पाठवली आहेत. महाराष्ट्रात बाईक टॅक्सी बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहेत. आमच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यापेक्षा महिलांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे," असे सरनाईक यांनी सांगितले.

कॅब, ऑटो सेवा सुरू राहणार
या कारवाईमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून सरकारने स्पष्टोक्ती दिली आहे. या कारवाईचा फटका केवळ 'बाईक टॅक्सी' (दुचाकी सेवा) सेवेला बसेल. या कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या चारचाकी गाड्या (कॅब), ऑटो रिक्षा आणि अन्न पुरवठा (फूड डिलिव्हरी) करणाऱ्या सेवा पूर्ववत आणि नेहमीप्रमाणे सुरू राहतील. सरकारचा मुळात बाईक टॅक्सी या संकल्पनेला विरोध नाही. प्रदूषण कमी व्हावे म्हणून सरकारने केवळ 'इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी' चालवण्यास अटी शर्तींवर तात्कालिक परवानगी दिली होती. या कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली गेली होती.परंतु, ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांनी अद्याप एकही कागदपत्र सादर केलेले नाही. उलट, नियमांना केराची टोपली दाखवत हजारो पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी रस्त्यावर उतरवून बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवल्यानेच ही कारवाई करावी लागली, असेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.</description>
      </item><item>
      <title>Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 14:17:38 -0400</pubDate>
      <description>संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman) वेशीवर येऊन पोहोचला आहे. देशात सध्या उन्हाचा कडाका आणि उष्णतेच्या लाटा जाणवत असतानाच, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेळेपूर्वीच अंदमान आणि निकोबार बेटांवर अधिकृतरीत्या हजेरी लावली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, त्याचे हे वेळेआधीच झालेले आगमन बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांसाठीच एक मोठा दिलासा देणारे ठरले आहे.

केरळ आणि कोकणातील प्रवासाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अत्यंत अनुकूल वातावरणाचा फायदा घेत आपला पुढचा प्रवास वेगवान केला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये (Keral) धडकतो. मात्र, यंदा या वाऱ्यांचा वेग पाहता, तब्बल पाच ते सहा दिवस आधीच म्हणजेच २६ मे च्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण राहिल्यास, साधारणतः ६ जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि कोकण किनारपट्टीवर यंदा वेळेआधीच पावसाच्या दमदार सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
https://prahaar.in/2026/05/16/fake-news-alert-dgipr-calls-ola-uber-rapido-shut-report-in-maharashtra-as-misleading/
 मान्सूनचे वेळापत्रक कधी आणि कुठे?
अंदमान आणि निकोबार बेटे : १६ मेला दाखल झाला
केरळ किनारपट्टी : २६ मे (संभाव्य अंदाज)
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : ६ जून (संभाव्य अंदाज)

हवामान विभागाचा दुजोरा आणि कृषी क्षेत्रासाठी 'गुड न्यूज'
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पुणे केंद्राने मान्सूनच्या या वेगवान वाटचालीला अधिकृत दुजोरा दिला आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मान्सूनने आपल्या निर्धारित सरासरी तारखेच्या तब्बल ६ दिवस आधीच अंदमानमध्ये प्रवेश केला आहे. ही देशाच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी मानली जात आहे. तसेच, केरळमध्येही तो सरासरीच्या ४ ते ५ दिवस आधी (२६ मे रोजी) दाखल होईल. मान्सूनच्या या वेळेपूर्वीच्या आगमनामुळे देशभरात यंदा खरीपाच्या पेरण्या वेळेवर आणि योग्य प्रकारे होण्यास मोठी मदत होईल, अशी आशा कृषी तज्ज्ञ आणि हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.</description>
      </item><item>
      <title>Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात &#039;कॅब&#039; सेवा सुरूच राहणार; &#039;डीजीआयपीआर&#039;ने सांगितले सत्य!</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/fake-news-alert-dgipr-calls-ola-uber-rapido-shut-report-in-maharashtra-as-misleading/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/fake-news-alert-dgipr-calls-ola-uber-rapido-shut-report-in-maharashtra-as-misleading/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 13:53:28 -0400</pubDate>
      <description>सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या असल्याच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. यामुळे प्रवाशांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) शुक्रवारी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, या ॲप्सवर किंवा त्यांच्या कार सेवांवर कोणतीही सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. कारवाईचा बडगा केवळ या ॲप्सच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'अनधिकृत बाईक टॅक्सी' (Bike Taxi) सेवांवर उगारण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/the-government-is-now-watching-over-construction-and-demolition-debris-in-cities/
चुकीच्या माहितीचा पर्दाफाश



&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)



'डीजीआयपीआर'ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून या संभ्रमावर पडदा टाकला. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बंदीच्या दाव्यांना पूर्णपणे 'दिशाभूल करणारे' (Misleading) ठरवले आहे. ओला, उबर आणि रॅपिडोच्या सर्व सेवा संपूर्ण राज्यभरात आणि कालांतराने देशभरात बंद केल्या जातील, असा खोटा प्रचार काही पोस्ट्समधून केला जात होता. परंतु, अशा प्रकारची कोणतीही सरसकट बंदी लागू केलेली नाही, असा निर्वाळा सरकारने दिला आहे.

नेमकी कारवाई कशावर ? परिवहन विभागाचा कठोर पवित्रा
मग नेमकी कारवाई कशावर होत आहे? यावर स्पष्टीकरण देताना सरकारने सांगितले की, परिवहन विभागाने केवळ परवाना नसलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. महाराष्ट्रात योग्य त्या परवानग्या न घेता उबर, ओला आणि रॅपिडो यांसारख्या ॲप्सवरून ज्या दुचाकी प्रवासी सेवा पुरवल्या जात आहेत, त्या बेकायदेशीर आहेत. परिवहन विभागाची ही कारवाई केवळ या अवैध दुचाकी सेवांपुरतीच मर्यादित आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांचे पत्र आणि ॲप स्टोअर्सना नोटीस
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट सायबर गुन्हे विभागाला पत्र लिहिले आहे. अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर कायदेशीर कारवाई करावी आणि या सेवा त्वरित निलंबित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत या कंपन्या बेकायदेशीर दुचाकी सेवा थांबवत नाहीत, तोपर्यंत गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ॲपल ॲप स्टोअरवरून (Apple App Store) त्यांचे ॲप्स हटवण्यात यावेत, अशा कडक नोटिसा महाराष्ट्र सायबर सेलने 'माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ७९(३)(ब)' अंतर्गत बजावल्या आहेत. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न
या अनधिकृत बाईक टॅक्सींवर बंदी घालण्यामागे प्रवाशांची सुरक्षा हेच प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या दुचाकी सेवांमध्ये चालकांची कोणतीही योग्य पडताळणी (Driver Verification) केली जात नाही. तसेच, अपघाताच्या वेळी प्रवाशांना पुरेसे विमा संरक्षणही मिळत नाही. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आपत्कालीन मदत यंत्रणा अतिशय कमकुवत असते. याशिवाय, अनेक बाईक टॅक्सी चालकांच्या बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या सवयींमुळे रस्त्यावरील सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याची बाबही महाराष्ट्र सायबर सेलने प्रकर्षाने मांडली आहे.

परदेशी कंपन्यांना भारतीय कायद्यांचा इशारा
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना उपमहानिरीक्षक (DIG) संजय शिंत्रे यांनी कडक शब्दांत ताकीद दिली आहे. ते म्हणाले की, भारतात किंवा महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही कंपनीला भारतीय कायद्यांचे आणि नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. या नोटिशीसंदर्भात संबंधित ॲप कंपन्या आणि मध्यस्थांकडून शासनाला लवकरात लवकर आणि सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. थोडक्यात, कायदेशीर चौकटीत राहून कॅब सेवा देण्यास कोणतीही मनाई नाही, मात्र बेकायदेशीर दुचाकी सेवा खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे.</description>
      </item></channel>
    </rss>