<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://www.prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>Mumbai Municipal Corporation : महापालिका स्थायी समितीत यापुढे शिवसेना गटनेत्याचा न बसण्याचा निर्धार</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/decision-taken-that-the-shiv-sena-group-leader-will-no-longer-sit-in-the-municipal-corporations-standing-committee/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/decision-taken-that-the-shiv-sena-group-leader-will-no-longer-sit-in-the-municipal-corporations-standing-committee/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 14:29:03 -0400</pubDate>
      <description>कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप
एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी चक्क प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत गरीब झोपडीधारकांची फाईल मंजूर करण्यासाठभी पाच ते दहा लाखांची बोली लावून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. अशाप्रकारचा भ्रष्टाचार उघड्या डोळ्यांनी सत्तेत राहून पाहण्याऐवजी असली सत्ता नसली तरी चालेल अशा शब्दांत त्यांनी ही नाराजी व्यक्त करत जोवर अशाप्रकारचे कॉलनी ऑफीसरवर कारवाई होत नाही तोवर आपण पुढील एकाही स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही असे सांगत या समितीतून सभात्याग केला. (Mumbai Municipal Corporation)
https://www.prahaar.in/2026/09/10/pune-metro-is-ready-for-ganeshotsav-41-hours-of-continuous-service-on-anant-chaturdashi-check-the-full-schedule-with-just-one-click/
स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे शिवसेना पक्षाचे महापालिका गटनेते अमेय घोले यांनी एफ उत्तर विभागातील कॉलनी ऑफीसरच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात मागील महिन्यात हरकतीच्या मुद्दयाद्वारे आवाज उठवल्यानंतर त्याबाबत प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. पण आता मी त्यांची नावे देत आहे. एफ उत्तर विभागातील तीन कॉलनी अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत हे गरीब झोपडीधारकांकडून ५ ते १० लाख रुपयांची मागणी करत त्यांची लूट करत आहे.शासनाने एसआरए प्रकल्पातील कुटुंबांकरता अभय योजना जाहीर केली आहे. यामध्ये महापालिकेच्या मालमत्तांमधील योजनांमधील परिशिष्ट दोनसंदर्भातील नोंदी या महापालिकेकडे असल्यामुळे त्या नोंदीची दखल घेवून फाईल बनवून देण्यासाठी ही पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे एकप्रकारे गरीब कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागत असून जी कुटुंबे त्यांची मागणी पूर्ण करत नाही त्यांची फाईल बनवली जात नाही. त्यामुळे माझ्या विभागात ३५० कुटुंबांची कामे अडकली गेली आहेत. पण कॉलनी अधिकारी विरोधात कारवाई होत नाही. काहींची तीन महिन्यांपूर्वी बदली होवून ते तिथेच आहे. त्यामुळे या स्थायी समितीत बसून जर आम्हाला याची उत्तरे मिळणार नसतील तर असल्या स्थायी समितीत मी आजपासून बसणार नाही, मी या स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार घालतो. हा प्रकार एका एफ उत्तर विभागापुरता सिमित नसून संपूर्ण संपूर्ण मुंबईत असेच प्रकार सुरु आहेत. त्यामुळे असला भ्रष्टाचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही,असे सांगत त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. (Mumbai Municipal Corporation)
https://www.prahaar.in/2026/09/10/dcm-sunetra-pawar-to-meet-amit-shah-discussions-regarding-the-finance-ministry-are-underway-among-ncp-leaders/
त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी त्यांना विनंती करून बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ते निघून गेले. त्यानंतर शिंदे यांनी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अशा अधिकाऱ्यांकडे का कानाडोळा केला जाता असा सवाल कतर अभय योजनेला लाभ मिळण्यासाठी जर कुटुंबे प्रयत्न करत असतील आणि अधिकार आपले लाच मागत असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई व्हायलाच हवी. जर त्या अधिकाऱ्यांची बदली होवून ते जर तिथेच असतील तर तो महापालिका आयुक्तांच्याही आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांची बदली करण्यात यावी तसेच पुढील स्थायी समितीच्या सभेपूर्वी याचा अहवाल सादर केला जावा अशी निर्देशही शिंदे यांनी दिले. (Mumbai Municipal Corporation)</description>
      </item><item>
      <title>Pakistan Connection : व्यावसायिक इम्तियाज खत्री धमकी प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन उघड; महाबळेश्वरमधून मोठा मासा गळाला</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/pakistan-connection-revealed-in-businessman-imtiaz-khatri-threat-case-big-fish-netted-from-mahabaleshwar/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/pakistan-connection-revealed-in-businessman-imtiaz-khatri-threat-case-big-fish-netted-from-mahabaleshwar/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 14:27:19 -0400</pubDate>
      <description>मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमधील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामानंतर मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे पाकिस्तानस्थित दहशतवादाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले असून, मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने (CIU) महाबळेश्वर येथून ३९ वर्षीय मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक केली आहे.(Imtiaz Khatri Threat Case)

कुटुंबाची दहशतवादी पार्श्वभूमी
तपासामध्ये असे समोर आले आहे की, संशयित शफीकचे वडील आणि दोन मोठे भाऊ पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (PoK) मुझफ्फराबाद येथे राहतात. गुप्तचर विभाग (IB) या संशयास्पद संपर्कांची कसून चौकशी करत आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, शफीकचा एक भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तो प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लश्कर-ए-तोयबा' (LeT) सोबत जोडलेला असून तो कमांडर पदापर्यंत पोहोचल्याची शक्यता आहे.(Pakistan Connection)
https://www.prahaar.in/2026/09/10/nashik-finally-relief-regarding-the-saptashrungigad-road-closure-the-route-will-remain-open-on-this-day/
धमक्यांचे मूळ आणि तांत्रिक पुरावे
अनधिकृत मशिदीविरोधातील कारवाईला आणि नागरी प्रशासनाला पाठिंबा दिल्यामुळेच इम्तियाज खत्री यांना लक्ष्य करण्यात आले होते. खत्री यांनी २२ जून रोजी तक्रार दाखल केली होती, ज्यानुसार त्यांना २१ मे पासून सातत्याने धमक्या येत होत्या. पोलिसांनी शफीकच्या फोनमधून अनेक धमकीचे व्हॉट्सॲप मेसेज आणि व्हॉइस नोट्स जप्त केले आहेत. यामध्ये पाकिस्तानी व इतर आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरील संवादांचा समावेश आहे. आयपी ॲड्रेस आणि तांत्रिक विश्लेषणावरून हे क्रमांक पाकिस्तानस्थित इंटरनेट सेवा पुरवठादारांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Imtiaz Khatri Threat Case)

तांत्रिक तपास आणि डिजिटल एक्स्ट्रॅक्शन
शफीकच्या नावावर असलेल्या एका भारतीय क्रमांकाशी एक पाकिस्तानी नंबर सतत संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर गाठून त्याला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एक पॉकेट डायरी जप्त केली आहे. त्यातील एक फोन अलीकडेच फॉरमॅट करण्यात आल्याने, डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्यासाठी उपकरणे डिजिटल एक्स्ट्रॅक्शनसाठी पाठवण्यात आली आहेत.(Pakistan Connection)
https://www.prahaar.in/2026/09/10/pm-modi-chinas-xi-jinping-likely-to-hold-bilateral-meet-at-brics-first-after-2020-galwan-clashes/
'फैयाज काश्मिरी' आणि फेसबुक कनेक्शन
चौकशीदरम्यान शफीकने तो पाकिस्तानी नंबर 'फैयाज काश्मिरी' नावाच्या व्यक्तीचा असल्याचा दावा केला असून, फेसबुकच्या माध्यमातून आपली ओळख झाल्याचे त्याने सांगितले. तपास यंत्रणांना या क्रमांकाशी संबंधित “ब्लॅक गोल्ड” आणि “फैयाज काश्मिरी” अशा ऑनलाइन ओळखी आढळल्या आहेत. पोलीस या सर्व बाबींची सत्यता पडताळत आहेत.(Imtiaz Khatri Threat Case)
सध्या तपास अधिकारी शफीकची कौटुंबिक पार्श्वभूमी, नागरिकत्व, सीमेपार झालेला संवाद तसेच संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाली आहे का, या सर्व मुद्द्यांवरून कसून चौकशी करत आहेत.</description>
      </item><item>
      <title>Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्थ खात्याच्या मागणीसाठी अमित शहांना भेटणार</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/dcm-sunetra-pawar-to-meet-amit-shah-discussions-regarding-the-finance-ministry-are-underway-among-ncp-leaders/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/dcm-sunetra-pawar-to-meet-amit-shah-discussions-regarding-the-finance-ministry-are-underway-among-ncp-leaders/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 14:13:33 -0400</pubDate>
      <description>मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविण्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शाह यांच्या १३ आणि १४ सप्टेंबरच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी बुधवारी रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.

https://www.prahaar.in/2026/09/10/pm-modi-chinas-xi-jinping-likely-to-hold-bilateral-meet-at-brics-first-after-2020-galwan-clashes/
देवगिरी निवासस्थानी बैठक
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थ खात्याबाबतच्या पुढील भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरता स्वतःकडे ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे सोपविले जाईल, असे त्यावेळी संकेत देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडेच राहिले आहे. राष्ट्रवादीला अर्थ खाते कधी दिले जाणार, असा प्रश्न माध्यमांनी फडणवीस यांना विचारला होता. त्यावेळी ‘सध्यातरी हे खाते माझ्याकडे आहे’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले होते..

https://www.prahaar.in/2026/09/10/nashik-finally-relief-regarding-the-saptashrungigad-road-closure-the-route-will-remain-open-on-this-day/
अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडे कार्यभार
अर्थ खाते राष्ट्रवादीकडे पुन्हा देण्याचा मुद्दा आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत आला आहे. त्यासाठी केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केल्याचे मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भेटीत अर्थ खात्याची मागणी करण्याची शक्यता आहे. शाह १३ आणि १४ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार असून, संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच दुर्मीळ पोथ्यांच्या प्रदर्शनालाही ते भेट देतील. त्यानंतर वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपविण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</description>
      </item><item>
      <title>Nashik : सप्तशृंगीगड रस्ता बंदीला अखेर दिलासा, &#039;या&#039; दिवशी मार्ग राहणार खुला</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/nashik-finally-relief-regarding-the-saptashrungigad-road-closure-the-route-will-remain-open-on-this-day/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/nashik-finally-relief-regarding-the-saptashrungigad-road-closure-the-route-will-remain-open-on-this-day/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 14:01:50 -0400</pubDate>
      <description>Nashik : रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्ता (Saptashrungigad to Nanduri Ghat Road) तब्बल १६ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अखेर या निर्णयात प्रशासनाने बदल केला आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीवर निर्बंध घालण्याबाबत प्रशासनाने सुधारित आदेश जारी केला आहे. त्यामुळे स्थानिक तसेच भाविक आणि मोठा दिलासा मिळाला आहे.

'या' दिवशी मार्ग राहणार खुला
१० सप्टेंबर २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रस्ता बंद ठेवण्यात येणार असला, तरी भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता काही दिवस म्हणजे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित आदेशानुसार शनिवार दि. १२ सप्टेंबर, रविवार दि. १३ सप्टेंबर, शनिवार दि. १९ सप्टेंबर, रविवार दि. २० सप्टेंबर तसेच शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी नांदुरी–सप्तशृंगगड मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे सप्ताह अखेर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/simhastha-mahakumbh-mela-2027-extension-of-registration-for-simhastha-mahakumbh-ganesh-mandal-competition/
पायी मार्ग नियमित सुरू
रस्ता बंद असलेल्या दिवसांमध्ये नांदुरी ते सप्तशृंगगड पायी जाणारा मार्ग नियमित खुला राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि स्कूल बस यांना आवश्यकतेनुसार मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि बंद कालावधीत विनाकारण वाहन घेऊन या मार्गावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.</description>
      </item><item>
      <title>Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/dont-just-be-gen-z-become-the-green-generation-girish-mahajans-appeal/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/dont-just-be-gen-z-become-the-green-generation-girish-mahajans-appeal/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 13:43:32 -0400</pubDate>
      <description>Nashik : आजचा काळ ‘Gen Z’ युवकांचा आहे. त्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि इन्स्टाग्रामसारखी आधुनिक साधने आहेत; मात्र केवळ ‘Gen Z’ बनून चालणार नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत ‘Green Generation’ बनले पाहिजे,” असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. युवकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याबरोबरच लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी सुध्दा स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले.‘पर्यावरण संवर्धनाचा खरा आणि मुख्य स्रोत हा देशाचा युवक असला पाहिजे’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून द सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या ऐतिहासिक भोसला मिलिटरी कॉलेज कॅम्पसमध्ये आज ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ (Mission Green Monsoon) उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संस्थेच्या कार्याचे कौतुक करून महाजन म्हणाले, सैनिकी शिक्षणाची गरज ओळखून धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी स्कूल उभारले, देशभक्ती,राष्ट्रनिष्ठेने ध्येयाने प्रेरीत आणि शिस्तबध्द, संस्कारक्षम युवक घडावा हा यामागील दूरदृष्टीकोन होता. संस्था याच उद्देशाने आज कार्यरत आहे, याबद्दल आनंद वाटतो, या कॅम्पसमध्ये येण्याची माझी खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली असेही ते म्हणाले.
https://www.prahaar.in/2026/09/10/simhastha-mahakumbh-mela-2027-extension-of-registration-for-simhastha-mahakumbh-ganesh-mandal-competition/
वृक्षलागवडीबरोबरच संवर्धनही हवे
पुढे ते म्हणाले, युवकांकडे आज तंत्रज्ञानाची ताकद असून त्याचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी केला पाहिजे. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता वृक्षांच्या वाढीसाठी आणि जपणुकीसाठी सातत्यपूर्ण चळवळ झाली पाहिजे, असे महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पतंप्रधानाचे महासत्ता करण्याचे स्वप्न व व्यसनापासून दूर राहण्यास सांगितले.

तिर्थस्थळाचा दर्जा,पावित्र्यही जपावे
गोदावरी ही नाशिकची संस्कृती आहे. रामकुंड आणि दुतोंड्या मारुती ही नाशिकची ओळख आहे. असे नमूद करून ते म्हणाले, देश-विदेशातील भाविकांना नाशिकचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे शहराचा तीर्थक्षेत्र म्हणून असलेला दर्जा, त्याची धार्मिक-सांस्कृतिक ओळख आणि पर्यावरणीय समृद्धी आपण जपली पाहिजे. नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिक आणि विशेषतः युवकांनी अधिक सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दूरदृष्टीकोन आणि शहर विकास डोळ्यासमोर ठेवून विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याची सद्यस्थितीत सुरु असलेली कामे आणि या कामानंतर नाशिकचा चेहरामोहरा बदललेला आपणास दिसले, यंदा १२ कोटी भाविक येणे अपेक्षित असल्याने त्यांना सर्व प्रकाराच्या सुविधा देण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस आयुक्त डॉ.संदीप कर्णीक यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तत्पुर्वी मंत्री महाजन यांनी कॅम्पसमधील रामाचे दर्शन घेत वृक्षारोपण केले.
यावेळी आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णीक, संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि.संजय पगारे, सदस्य शितल देशपांडे, नरेंद्र वाणी,कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. विजयप्रसाद अवस्थी, मिथीला देशपांडे, प्राचार्य डॉ.आर.पी.पाटील यांच्यासह अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्यासह विविध अधिकारी,राजकीय क्षेत्रातील लोक उपस्थित होते.</description>
      </item><item>
      <title>PM Modi XI Jinping Meeting : गलवान संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी अन् चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमनेसामने; ब्रिक्स परिषदेत द्विपक्षीय चर्चेची शक्यता</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/pm-modi-chinas-xi-jinping-likely-to-hold-bilateral-meet-at-brics-first-after-2020-galwan-clashes/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/pm-modi-chinas-xi-jinping-likely-to-hold-bilateral-meet-at-brics-first-after-2020-galwan-clashes/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 13:25:10 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : नवी दिल्लीत १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (China President Xi Jinping) यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच थेट आणि औपचारिक बैठक असेल. २०२० च्या सीमावादानंतर भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. सीमेवरील तणावासोबतच आर्थिक, व्यापारी आणि तांत्रिक पातळीवरील संवादही थांबला होता. या पार्श्वभूमीवर, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात येत आहेत. गेल्या सात वर्षांतील आणि गलवान संघर्षानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या बैठकीची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरीही या संभाव्य बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे झालेल्या 'एससीओ' (SCO) परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाली होती, परंतु तिथे फक्त हस्तांदोलन झाले होते; कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती.

दौऱ्यापूर्वी सुरक्षा आणि राजनैतिक स्तरावर बैठकांचा धडाका
शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि लष्करी संवाद पुन्हा वेगाने सुरू झाला आहे. या बैठकीची पूर्वतयारी म्हणून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी नुकताच चीनचा दौरा केला आणि तिथल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. याव्यतिरिक्त, भारत-चीन सीमाप्रश्नावर काम करणाऱ्या 'डब्ल्यूएमसीसी' (WMCC) समितीच्या बैठका पार पडल्या असून, दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्येही संवाद झाला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) तणावाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे हटवल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध हळूहळू सामान्य करण्यासाठी या राजनैतिक हालचाली अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

गलवान खोऱ्यातील संघर्ष आणि त्यानंतरचा काळ
जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये भीषण हिंसक चकमक झाली होती. या संघर्षात भारताचे २० वीर जवान शहीद झाले होते, तर चीननेही आपले चार सैनिक मारले गेल्याचे उशिरा मान्य केले होते. या घटनेनंतर दोन्ही महासत्तांमधील संबंध ऐतिहासिक पातळीवर ताणले गेले. गलवानच्या घटनेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनी हजारो सैनिक आणि युद्धसामग्री तैनात करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत लष्करी आणि राजनैतिक स्तरावर पार पडलेल्या अनेक बैठकांनंतर काही विवादित ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यात यश आले. यामुळे थेट लष्करी संघर्षाचा धोका टळला असला, तरी सीमावादाचा मूळ प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे मोदी आणि जिनपिंग यांची ही भेट दोन्ही देशांतील संबंधांना पुन्हा एकदा नव्या दिशेने नेण्यासाठी निर्णायक ठरू शकते.
https://www.prahaar.in/2026/09/10/ganeshotsav-2026-pen-ganesh-idols-see-strong-demand-from-india-abroad-out-of-70-lakh-sold-20-lakh-sent-overseas-mumbai-news/
अरुणाचल प्रदेशाबाबत चीनचा दावा आणि भारताची आक्रमक भूमिका
पूर्व लडाखमध्ये काही प्रमाणात शांतता निर्माण झाली असली, तरी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनच्या कारवाया भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. चीन संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगतो आणि त्याला 'झांगनान' (दक्षिण तिबेट) असे नाव देतो. मात्र, भारताने चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील, हे स्पष्ट केले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या 'अप्पर सुबनसिरी' भागात चीनने लष्करी हालचाली आणि पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. तसेच, २०१७ सालापासून चीन अरुणाचलमधील विविध ठिकाणांची काल्पनिक चिनी नावे असलेली यादी जाहीर करत असतो. भारताने या चिनी खोडसाळपणाचा कडक शब्दांत निषेध केला असून, केवळ नावे बदलल्याने जमिनीवरील वास्तव किंवा भारताचे सार्वभौमत्व बदलत नाही, असे चीनला ठणकावून सांगितले आहे. तसेच भारताने स्वतः अरुणाचलमधील २७ ठिकाणांची अधिकृत भारतीय नावे निश्चित केली असून, त्यावर चीनने घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे.

या ऐतिहासिक बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात जर बैठक पार पडली, तर त्यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे:
सीमाप्रश्न आणि एलएसी : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) संपूर्ण शांतता प्रस्थापित करणे आणि भविष्यात तणाव वाढू नये यासाठी मजबूत यंत्रणा उभारणे.
व्यापार आणि गुंतवणूक : गेल्या काही वर्षांत ठप्प झालेला द्विपक्षीय व्यापार, चिनी कंपन्यांवरील निर्बंध आणि गुंतवणुकीचे नियम यावर चर्चा.
प्रादेशिक सुरक्षा व संपर्क : दोन्ही देशांतील नागरिकांमधील संवाद, पर्यटन आणि व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुलभ करणे.
जागतिक परिस्थिती : सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (शुल्क) धोरणांमुळे जागतिक व्यापारावर झालेला परिणाम आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव या जागतिक घडामोडींवरही दोन्ही नेते चर्चा करू शकतात.
भारतासाठी आपल्या सीमांचे रक्षण करत शांतता राखणे आणि आर्थिक हितसंबंध जपणे हे मुख्य उद्दिष्ट असेल, तर चीनसाठी भारतासोबतचे संबंध सुधारून 'ब्रिक्स'सारख्या जागतिक मंचांवर आपले स्थान मजबूत करण्याची ही मोठी संधी असेल.</description>
      </item><item>
      <title>बाप्पाच्या दर्शनासाठी Pune Metro सज्ज, गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; वाचा एका क्लिकवर वेळापत्रक</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/pune-metro-is-ready-for-ganeshotsav-41-hours-of-continuous-service-on-anant-chaturdashi-check-the-full-schedule-with-just-one-click/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/pune-metro-is-ready-for-ganeshotsav-41-hours-of-continuous-service-on-anant-chaturdashi-check-the-full-schedule-with-just-one-click/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 13:24:01 -0400</pubDate>
      <description>पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. या काळामध्ये महा मेट्रोकडून अतिरिक्त वेळेमध्ये मेट्रो चालवली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार असेल, तर तुम्ही नक्की जाऊ शकता. 'पुणे मेट्रो'ने त्यांच्या सोशल मिडिया हँडलवरून गणेशभक्तांना ही महत्त्वाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता, पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/10/mpsc-poor-preparation-debt-stress-and-despair-punyaat-28-year-old-tarunachi-commits-suicide/

१४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत या नियमित वेळेमध्ये मेट्रो चालवली जाणार आहे. तर, १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत मेट्रो चालवली जाणार आहे. तर, शुक्रवारी २५ सप्टेंबर २०२६ रोजी म्हणजेच, अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ६ ते शनिवारी २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा सुरू राहील. एकूण ४१ तासांसाठी महा मेट्रोकडून गणेशभक्तांना ही खास सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू होईल.

&nbsp;

बाप्पाच्या दर्शनासाठी, पुणे मेट्रोची साथ!
यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ करण्यात येणार आहे. या वेळेपत्रकानुसार आपल्या बाप्पा दर्शनाचे नियोजन करा. बाप्पाच्या दर्शनासाठी येताना पुणे मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करा आणि पर्यावरणपूरक प्रवासातून… pic.twitter.com/iJ1F366u13
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 9, 2026


शिवाय, गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो स्थानकांवर आणि मेट्रोमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल, पाकिट, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवण्याची माहिती, मेट्रो प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांना दिली आहे. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारांकडून चोरी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेट्रो प्रशासनानेही गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेशभक्तांकडून मेट्रोला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. पीक अवर्समध्ये दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची महामेट्रोकडून तपासणी केली जात आहे, चाचणी यशस्वी होताच ती आंमलात आणली जाणार आहे.</description>
      </item><item>
      <title>Mumbai Airport News : मुंबई विमानतळावरील अनधिकृत मशीद हटवा!</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/remove-unauthorized-mosque-at-mumbai-airport/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/remove-unauthorized-mosque-at-mumbai-airport/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 13:04:44 -0400</pubDate>
      <description>- ‘एमएमआरडीए’चे निर्देश; ‘लँड जिहाद’ झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ जवळ उभारण्यात आलेली मशीद अनधिकृत स्पष्ट करीत ती हटविण्याचे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिले आहेत. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे एमएमआरडीएने विमानतळ प्रशासनाला कळविल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलीस चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विमानतळाच्या व्हीआयपी गेटजवळ ही मशीद उभारण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला. या ठिकाणी १२ वातानुकूलित यंत्रे आणि ३० पाण्याचे नळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या बांधकामाविरोधात आपण आवाज उठवल्यानंतर महायुती सरकारच्या माध्यमातून एमएमआरडीएने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला याबाबत इशारा दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला. एमएमआरडीएने संबंधित बांधकामासाठी कोणतीही मंजुरी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले असून, ते अनधिकृत असल्याने ते तातडीने हटविण्याचे निर्देश विमानतळ कंपनीला देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यासंदर्भातील पत्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/simhastha-mahakumbh-mela-2027-extension-of-registration-for-simhastha-mahakumbh-ganesh-mandal-competition/
या प्रकरणावरून सोमय्या यांनी ‘लँड जिहाद’चा आरोपही केला आहे. संवेदनशील ठिकाणी मशीद, कब्र किंवा दर्ग्याच्या नावाखाली अशा प्रकारे जमिनीवर अतिक्रमण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी करण्याची मागणी आपण केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. यापूर्वी वांद्रे रेल्वे टर्मिनसजवळ बांगलादेशी मुस्लिम येऊन स्थायिक झाल्याचा दावा करत त्यांनी आता विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणाजवळ अशा प्रकारचे बांधकाम झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
या प्रकरणामागे असलेल्या विश्वस्तांसह संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी मुंबई विमानतळ आणि एमएमआरडीएकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मतांसाठी विरोधक देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यास तयार असल्याचा आरोप त्यांनी केला.</description>
      </item><item>
      <title>Supreme Court Abu Salem: अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळला</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/abu-salemla-supreme-courts-rebuke-fetalla-claims-to-have-completed-25-years-of-education/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/abu-salemla-supreme-courts-rebuke-fetalla-claims-to-have-completed-25-years-of-education/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 12:58:41 -0400</pubDate>
      <description>मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन (Pradeep Jain) यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला (Abu Salem) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. 25 वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर आपली सुटका करावी, अशी मागणी करणारी सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
अबू सालेमला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले होते. त्यावेळी भारत सरकारने त्याला 25 वर्षांपेक्षा जास्त काळ कारावासात ठेवले जाणार नाही, असे पोर्तुगाल सरकारला आश्वासन दिल्याचा दावा सालेमने केला होता. त्यानुसार आपली 25 वर्षांची शिक्षा 31 मार्च 2025 रोजी पूर्ण झाली असल्याचे त्याचे म्हणणे होते. यामध्ये खटला सुरू असतानाचा कालावधी, शिक्षेनंतरचा तुरुंगवास आणि चांगल्या वर्तणुकीमुळे मिळालेली सूट यांचा समावेश करावा, अशी मागणी त्याने केली होती. (1993 Mumbai Bomb Blast)
https://www.prahaar.in/2026/09/10/mmrda-directs-action-against-unauthorized-mosque-in-mumbai-airport-vicinity-kirit-somaiya-demands-registration-of-an-fir/
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सालेमचा हा दावा मान्य केलेला नाही. पोर्तुगालमध्ये पासपोर्टशी संबंधित फसवणूक प्रकरणात त्याने भोगलेल्या शिक्षेचा कालावधी भारतातील 25 वर्षांच्या कारावासाच्या गणनेत धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग सध्या बंद झाला आहे. (Mumbai Serial Blast 1993)
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही सालेमने सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 2022 मधील निर्णयाचा आधार घेण्यात आला होता. या निर्णयात भारत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सालेमच्या शिक्षेबाबत केंद्राने योग्य वेळी प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले होते. (Pradeep Jain murder case)

प्रदीप जैन हत्या प्रकरणात जन्मठेपाची शिक्षा
अबू सालेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणासह प्रदीप जैन हत्या प्रकरणात त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. त्याच्या सुटकेसंदर्भातील मागणीवर केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका तसेच कायदेशीर बाबी यापूर्वी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे सालेमच्या सुटकेच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे.
</description>
      </item><item>
      <title>Simhastha Mahakumbh Mela 2027: ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीला मुदतवाढ, आता &#039;या&#039; तारखेपर्यंत करता येणार नोंदणी</title>
      <link>https://www.prahaar.in/2026/09/10/simhastha-mahakumbh-mela-2027-extension-of-registration-for-simhastha-mahakumbh-ganesh-mandal-competition/</link>
      <guid>https://www.prahaar.in/2026/09/10/simhastha-mahakumbh-mela-2027-extension-of-registration-for-simhastha-mahakumbh-ganesh-mandal-competition/</guid>
      <pubDate>Thu, 10 Sep 2026 12:48:13 -0400</pubDate>
      <description>Simhastha Mahakumbh Mela 2027 : ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) नाव नोंदवू इच्छिणाऱ्या मंडळांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७चा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १० सप्टेंबर २०२६पर्यंत असलेली नोंदणी आता १७ सप्टेंबर २०२६पर्यंत करता येणार आहे.

स्पर्धेमागचा हेतू काय ?
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सिंहस्थचा आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक गणेश मंडळांना या उपक्रमात सहभागी होता यावे आणि त्यांच्या कल्पकतेला महासिंहस्थच्या जनजागृतीशी जोडता यावे, या उद्देशाने नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. नाशिक शहर तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, मंडळांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सिंहस्थविषयक जनजागृती, सामाजिक सहभाग आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

खर्चाला टाळा
गणेशोत्सव म्हटलं की अनेक लोक खर्चिक मार्गांचा पर्याय अवलंबतात. पण हे सर्व टाळून उत्तम अशा कल्पनेला प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे स्पर्धेत मोठ्या किंवा खर्चिक सजावटीपेक्षा कल्पकता, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वतता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे लहान-मोठ्या सर्व गणेश मंडळांना सहभागी होऊन आपली संकल्पना मांडण्याची समान संधी मिळणार आहे. सिंहस्थच्या विषयाशी सुसंगतता, कल्पकता, अंमलबजावणीची गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग व उपक्रमाचा परिणाम तसेच शाश्वतता या निकषांवर मंडळांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/nashik-trouble-mounts-for-the-fraudster-ashok-kharat-judicial-proceedings-have-now-begun-in-this-case/
पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी एक लाखांचे पारितोषिक
‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) पाच प्रमुख श्रेणी असून प्रत्येक श्रेणीतील विजेत्या मंडळाला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
- कुंभ संकल्पनेवर आधारित सर्वोत्कृष्ट देखावा – ₹१ लाख
- सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक देखावा – ₹१ लाख
- सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक गणेश मंडळ – ₹१ लाख
- सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नाविन्य – ₹१ लाख
- सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम – ₹१ लाख
याशिवाय नावीन्यपूर्ण आणि विशेष संकल्पनेसाठी २ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

सहा विषयांवर आधारित उपक्रम
गणेश मंडळांना सिंहस्थशी संबंधित सहा प्रमुख विषयांभोवती देखावे किंवा विविध जनजागृती उपक्रम राबविता येणार आहेत. यामध्ये महाकुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, तंत्रज्ञान आणि कुंभ, हरित व शाश्वत कुंभ, कुंभ आणि आखाडे तसेच भाविकांची सेवा आणि समर्पण या विषयांचा समावेश आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांना आता १७ सप्टेंबर २०२६पर्यंत नोंदणी करता येणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत Instagram हँडल ‘ntkma2027’ वर उपलब्ध Google Form द्वारे नोंदणी करता येईल.
स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना, नोंदणी प्रक्रिया आणि पुढील घोषणा याच सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.</description>
      </item></channel>
    </rss>