<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/maharashtra-is-the-growth-engine-of-india/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/maharashtra-is-the-growth-engine-of-india/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 22:40:14 -0400</pubDate>
      <description>महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन

</description>
      </item><item>
      <title>राज्याला मिळणार नर्मदेचं १० TMC पाणी</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/maharashtra-cm-hails-narmada-project-agreement-as-win-win-for-four-states/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/maharashtra-cm-hails-narmada-project-agreement-as-win-win-for-four-states/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 22:37:32 -0400</pubDate>
      <description>राज्याला मिळणार नर्मदेचं १० TMC पाणी

</description>
      </item><item>
      <title>फिफा वर्ल्ड कप २०२६, उपांत्यपूर्व फेरी</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/fifa-world-cup-2026-quarter-final-match-schedule/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/fifa-world-cup-2026-quarter-final-match-schedule/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 22:36:06 -0400</pubDate>
      <description>फिफा वर्ल्ड कप २०२६, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक

</description>
      </item><item>
      <title>Parth Pawar : मुंढवा जमीन वादात न्यायालयाचा मोठा आदेश; पार्थ पवारांच्या कंपनीचा दस्त रद्द</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/major-court-order-in-mundhwa-land-dispute-deed-of-parth-pawar-company-cancelled/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/major-court-order-in-mundhwa-land-dispute-deed-of-parth-pawar-company-cancelled/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 22:06:01 -0400</pubDate>
      <description>पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन प्रकरणात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय देण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीच्या नावावरील ४० एकर जमीन खरेदीचा दस्त न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा या वादग्रस्त व्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे. (Parth Pawar)
मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी मालकीची जमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या जमिनीचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा खरेदी व्यवहार अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीसोबत करण्यात आला होता. मात्र, या जमिनीचे बाजारमूल्य जवळपास १,८०० कोटी रुपये असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारात आयटी पॉलिसीतील तरतुदींचा गैरवापर करून सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क टाळण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच ३०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा दस्त केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदविण्यात आल्याचा मुद्दाही या प्रकरणात चर्चेचा विषय ठरला होता. (Parth Pawar)
https://prahaar.in/2026/07/09/government-of-maharashtra-war-mode-against-disasters-maharashtra-government-ready-to-tackle-monsoon-related-crises-rescue-operations-in-full-swing-across-the-state-including-moshi-and-palghar/
प्रकरण वादात सापडल्यानंतर अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीनेच पुणे जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून संबंधित दस्त रद्द करण्याची मागणी केली होती. व्यवहारात प्रत्यक्ष पैशांची देवाणघेवाण झाली नसल्याचे, जमिनीचा ताबा हस्तांतरित करण्यात आला नसल्याचे आणि व्यवहार पूर्णत्वास गेला नसल्याचे दोन्ही पक्षांनी न्यायालयात नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने संबंधित खरेदीचा दस्त रद्द करण्याचा आदेश दिला. (Parth Pawar)
https://prahaar.in/2026/07/09/dam-overflowing-yet-water-scarcity-persists/
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या प्रकरणांमुळे सरकारी जमिनींच्या व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून, गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर न्यायालयात व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे सांगून जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अशा घटनांमुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Parth Pawar)</description>
      </item><item>
      <title>Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/mhada-to-observe-its-19th-lokshahi-din-democracy-day-on-july-13/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/mhada-to-observe-its-19th-lokshahi-din-democracy-day-on-july-13/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 22:04:29 -0400</pubDate>
      <description>मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६ रोजी 'म्हाडा'च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून घ्यावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनाने केले आहे.
https://prahaar.in/2026/07/09/government-of-maharashtra-war-mode-against-disasters-maharashtra-government-ready-to-tackle-monsoon-related-crises-rescue-operations-in-full-swing-across-the-state-including-moshi-and-palghar/
लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रत्येक लोकशाही दिन कार्यक्रमापूर्वी उपाध्यक्षांकडून यापूर्वी झालेल्या लोकशाही दिनातील प्रकरणांवर अधिकार्‍यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा देखील आढावा घेण्यात येतो. यामुळेच तसेच लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.
https://prahaar.in/2026/07/09/dam-overflowing-yet-water-scarcity-persists/
लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात असावा. म्हाडा लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर २ प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. सदर नमुना अर्ज म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर नागरिकांसाठी या अंतर्गत लोकशाही दिन या सदरात उपलब्ध आहे. अर्जदाराची तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसतील असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देखील पाठविण्यात येईल.</description>
      </item><item>
      <title>Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/government-of-maharashtra-war-mode-against-disasters-maharashtra-government-ready-to-tackle-monsoon-related-crises-rescue-operations-in-full-swing-across-the-state-including-moshi-and-palghar/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/government-of-maharashtra-war-mode-against-disasters-maharashtra-government-ready-to-tackle-monsoon-related-crises-rescue-operations-in-full-swing-across-the-state-including-moshi-and-palghar/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 21:57:07 -0400</pubDate>
      <description>मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन पूर्णपणे 'ॲक्शन मोड'वर आले आहे. राज्यभर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच NDRF आणि SDRF यांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. (Government of Maharashtra)
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आला आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ जण होते. त्यापैकी पाच जण वरच्या मजल्यावरून स्वतः बाहेर पडले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उर्वरित नागरिकांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. (Government of Maharashtra)
https://prahaar.in/2026/07/09/dam-overflowing-yet-water-scarcity-persists/
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी विविध जिल्ह्यांतील परिस्थिती आणि सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. (Government of Maharashtra)
राज्यभर नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, मदत व बचावकार्य, तसेच २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शासनाने केले आहे.

मुंबईत सहा दिवसांत विक्रमी पाऊस :
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अवघ्या सहा दिवसांत कुलाबा येथे ८८२ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९८८ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या सुमारे ४२ टक्के इतका आहे. ताशी ५० ते ७५ किमी वेगाचे वारे आणि चार मीटरहून अधिक उंच भरतीमुळे परिस्थिती गंभीर झाली होती. तरीही विविध यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. (Government of Maharashtra)
https://prahaar.in/2026/07/09/historic-test-match-between-the-indian-and-england-womens-team-at-lords/
पालघर, रायगड, ठाणे आणि पुण्यातही प्रशासन सतर्क :
पालघर जिल्ह्यात पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत मदतकार्याची पाहणी केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून रायगड, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाण्यातील कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरे धोक्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक उपाययोजना केल्या. त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. (Government of Maharashtra)

पर्यटनस्थळांवर निर्बंध :
पावसाळ्यातील वाढती पर्यटकांची गर्दी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. राज्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका कायम असला तरी शासनाने यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे बचावकार्याचा वेग वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Government of Maharashtra)</description>
      </item><item>
      <title>Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/dam-overflowing-yet-water-scarcity-persists/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/dam-overflowing-yet-water-scarcity-persists/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 21:47:36 -0400</pubDate>
      <description>मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा साठा अंदाजे ४० दिवसांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर अद्याप सुरु असलेली १० टक्के पाणीकपात बंद होण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत सातही जलाशय भरत नाहीत तोपर्यंत १० टक्के पाणी कपात सुरूच राहील, असे बीएमसीने स्पष्ट केले आहे. जुलै महिनाअखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाणार आहे.
https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/
गेल्या आठ दिवसांपासून तीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला न्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सहा टक्क्यांपर्यंत घटलेल्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे नाशिक जिल्ह्यात येत असून, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस बरसत आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस झाल्यास जलसाठ्यात झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाने स्पष्ट केला आहे.(Mumbai)
https://prahaar.in/2026/07/09/whatsapp-announces-meta-business-agent-ai-a-new-ai-solution-to-provide-24-7-customer-service-to-businesses/
तुळशी, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात घरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ८ जुलैला पाच लाख ९८ हजार ५८९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल आणि मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.(Monsoon Update)</description>
      </item><item>
      <title>Ind vs Eng : लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये ऐतिहासिक कसोटी सामना</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/historic-test-match-between-the-indian-and-england-womens-team-at-lords/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/historic-test-match-between-the-indian-and-england-womens-team-at-lords/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 21:43:38 -0400</pubDate>
      <description>लंडन: क्रिकेटचे सर्वात प्रतिष्ठित मैदान असलेल्या लॉर्ड्सवर शुक्रवारी पहिला महिला कसोटी सामना खेळला जाणार असून, तिथे इतिहास घडणार आहे. भारतीय आणि इंग्लंड संघ एकाच कसोटी सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना केवळ जय-पराजयापुरता मर्यादित नाही, तर महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक प्रसंग मानला जात आहे. (Ind vs Eng)
१४० वर्षांहून अधिक काळापूर्वी लॉर्ड्सवर पहिला पुरुष कसोटी सामना खेळला गेला होता, पण आता, प्रथमच, या मैदानावर महिला कसोटी क्रिकेट होणार आहे. चार दिवसांत ३०,००० हून अधिक तिकिटे विकली गेली असून, ब्रिटनमधील महिला कसोटी सामन्यासाठी ही सर्वात मोठी उपस्थिती ठरली आहे. (Ind vs Eng)
इंग्लंड संघ कसोटी क्रिकेटमधील आपली खराब कामगिरी मागे टाकण्याचा प्रयत्न करेल. गेल्या १० वर्षांत त्यांनी केवळ एकच महिला कसोटी सामना जिंकला आहे. यावर्षी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, तर मायदेशात टी-२० विश्वचषक अंतिम सामना गमावल्याची निराशाही कायम आहे. कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटला आशा असेल की लाल चेंडूचे क्रिकेट संघासाठी एक नवी सुरुवात ठरेल. (Ind vs Eng)
https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/
दुसरीकडे, टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर भारत नव्या उर्जेने या सामन्यात उतरेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या काही वर्षांत कमी कसोटी सामने खेळले असले तरी, जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या मोठ्या विजयाने आणि त्यानंतर पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या दिवस-रात्र कसोटीने भारताने इंग्लंडमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण केले. (Ind vs Eng)
इंग्लंडच्या भूमीवर महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी उत्कृष्ट आहे. इंग्लंडमध्ये खेळलेल्या नऊ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ कधीही हरलेला नाही. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या १५ महिलांच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताला केवळ एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. भारताने तीन सामने जिंकले आहेत, तर उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. (Ind vs Eng)
२०१४ मध्ये वर्म्सले येथे भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय आजही महिला क्रिकेटमधील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. त्या सामन्यात आठ खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले होते आणि आठ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या संघाने इंग्लंडला पराभूत केले होते. त्यानंतर, २०२४ मध्ये नवी मुंबईत इंग्लंडला ३४७ धावांनी पराभूत करून भारताने आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. (Ind vs Eng)
इंग्लंडने या सामन्यासाठी तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. ॲलिस कॅप्सी, इलेनॉर थ्रेलकेल्ड, ग्रेस पॉट्स, मॅडी व्हिलियर्स आणि किशोरवयीन डावखुरी फिरकी गोलंदाज टिली कोर्टिन-कोलमन यांचा कसोटी संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. चार्ली डीनला विश्रांती देण्यात आली आहे. भारताच्या संघातही काही नवीन चेहरे आहेत. हरलीन देओल, डावखुरी फिरकी गोलंदाज एन. श्री चरानी आणि वेगवान गोलंदाज नंदनी शर्मा कसोटी पदार्पण करू शकतात. वेगवान गोलंदाजी करणारी अष्टपैलू क्रिकेटपटू सायली सातघरे हिलाही संघाचा समतोल राखण्यासाठी एक मजबूत पर्याय मानले जाते. (Ind vs Eng)
https://prahaar.in/2026/07/09/whatsapp-announces-meta-business-agent-ai-a-new-ai-solution-to-provide-24-7-customer-service-to-businesses/
सलामीवीर प्रतीका रावलच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला संघातून वगळण्यात आले असून, प्रिया पुनियाचा संघात समावेश करण्यात आला आहे. फलंदाजीच्या क्रमात शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया आणि हरलीन देओल यांच्यात जागांसाठी स्पर्धा असेल. गोलंदाजी विभागात, मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांना रेणुका सिंग, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा यांच्यात योग्य ताळमेळ साधावा लागेल. सायली सातघरेच्या अष्टपैलू क्षमतेमुळे तिला अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळू शकते. (Ind vs Eng)
इंग्लंडला घरच्या मैदानाची आणि मजबूत संघाची साथ आहे, तर भारत आपल्या प्रभावी कामगिरीवर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असेल. लॉर्ड्सवरील हा ऐतिहासिक महिला कसोटी सामना क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.</description>
      </item><item>
      <title>Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/chemical-leak-at-lote-midc-causes-a-stir-mpcb-issues-production-ban-notices-to-six-factories/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/chemical-leak-at-lote-midc-causes-a-stir-mpcb-issues-production-ban-notices-to-six-factories/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 21:40:18 -0400</pubDate>
      <description>खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे नदीच्या दिशेने वाहून गेल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राथमिक कारवाई करत सुप्रिया लाइफ सायन्स, स्पॅक कंपनी, विनंती ग्रो, अक्वीला कंपनी, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि एसएमडी स्पेशालिटी या सहा कारखान्यांना उत्पादनबंदीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारखान्यांमधून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
https://prahaar.in/2026/07/09/whatsapp-announces-meta-business-agent-ai-a-new-ai-solution-to-provide-24-7-customer-service-to-businesses/
कांचन चाळके (माजी सैनिक), शीतल जाधव आणि संजना घाग या सोनगावातील महिला ग्रामस्थांनी प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर केवळ नोटिसा देऊन न थांबता त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
https://prahaar.in/2026/07/09/central-railway-major-impact-of-landslide-on-the-lonavala-karjat-railway-route-several-express-trains-including-the-deccan-queen-cancelled-until-july-17/
लोटे एमआयडीसीतील प्रदूषण प्रश्न यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाने बजावलेल्या उत्पादन बंदीच्या नोटीसांची प्रभावी अंमलबजावणी होते का व दोषींवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.</description>
      </item><item>
      <title>Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'</title>
      <link>https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/</guid>
      <pubDate>Thu, 09 Jul 2026 21:34:07 -0400</pubDate>
      <description>मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यांत पावसाचा धोका कायम असून, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (९ जुलै) 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
https://prahaar.in/2026/07/09/whatsapp-announces-meta-business-agent-ai-a-new-ai-solution-to-provide-24-7-customer-service-to-businesses/
पुणे आणि सातारा(Pune - Satara) घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील ढगांची संख्या कमी झाल्यामुळे, पुढील काही दिवसांत उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आता पाऊस प्रामुख्याने स्थानिक हवामानानुसार पडेल. गेल्या २४ तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड होता. अनेक ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावरील ताम्हिणी (५३० मिमी) येथे झाला. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३२ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्वरमध्ये नीचांकी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
https://prahaar.in/2026/07/09/central-railway-major-impact-of-landslide-on-the-lonavala-karjat-railway-route-several-express-trains-including-the-deccan-queen-cancelled-until-july-17/
सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते ईशान्येकडे सरकत आहे. याशिवाय, नैर्ऋत्य राजस्थान ते बांगलादेश असा एक कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात आणि केरळ किनारपट्टीवरही कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याने राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण अजूनही कायम आहे.
https://prahaar.in/2026/07/09/cbi-files-11-charge-sheets-in-mahadev-app-betting-case/
हवामान विभागाने घाटमाथ्यावरील रहिवाशांना आणि डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.</description>
      </item></channel>
    </rss>