<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/metro-path-cleared-for-the-metro-4-mogarpada-car-depot-route/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/metro-path-cleared-for-the-metro-4-mogarpada-car-depot-route/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 21:09:30 -0400</pubDate>
      <description>मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे येथील मोगरपाडा कार डेपोला जोडणाऱ्या संपर्क मार्गाच्या बांधकामासाठी ०.३९ हेक्टर कांदळवन वनजमीन हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.शासन निर्णयानुसार, ठाणे तालुक्यातील मोगरपाडा गावातील गट क्रमांक ३० मधील ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो पीआययू विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. या जमिनीचा वापर मोगरपाडा कार डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅप्रोच रोड, स्पर लाईन आणि संबंधित बांधकाम सुविधांसाठी केला जाणार आहे.

https://prahaar.in/2026/06/14/minister-nitesh-rane-will-take-the-historic-city-of-sawantwadi-to-the-international-level-minister-nitesh-rane/
मुंबई मेट्रो-४ आणि ४ए हा प्रकल्प पूर्व उपनगर, ठाणे आणि विस्तारित महानगर क्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे लाखो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे.या मंजुरीपूर्वी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून आवश्यक पर्यावरणीय आणि वनविषयक परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी प्रथम तत्त्वतः मंजुरी आणि त्यानंतर अंतिम मंजुरी देताना विविध पर्यावरणीय अटी घालण्यात आल्या असून त्यांचे काटेकोर पालन करणे एमएमआरडीएसाठी बंधनकारक राहणार आहे. राज्य शासनाने वन विभागाला प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास मंजुरी मागे घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.</description>
      </item><item>
      <title>Narendra Modi : नाविन्यता भारताच्या डीएनएमध्येच</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/narendra-modi-innovation-is-in-indias-dna/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/narendra-modi-innovation-is-in-indias-dna/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 21:04:49 -0400</pubDate>
      <description>फ्रान्समधील 'भारत इनोव्ह्हेट्स' सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची मानसिकता नाविन्यपूर्ण असून, ती संपूर्ण मानवतेचा विचार करते. भारत आज केवळ संकुचित व्यावसायिक हितसंबंधांसाठी काम न करता मानवतेच्या कल्याणासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी जागतिक स्तरावर नवनवीन शोध लावत आहे. नाविन्यता (इनोव्हेशन) ही भारताच्या डीएनएमध्येच आहे," असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. फ्रान्समधील नीस येथे आयोजित 'भारत इनोव्ह्हेट्स' या भव्य व्यासपीठाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष उपस्थिती होती.
https://prahaar.in/2026/06/14/we-are-not-hitler-channels-of-dialogue-must-be-kept-open/

&nbsp;
पंतप्रधान मोदींनी भारताच्या बदलत्या प्रतिमेवर प्रकाश टाकत सांगितले की, भारत हा जागतिक इनोव्हेशनमधील एक उगवती शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून, जगाला विविध क्षेत्रांत उपाय पुरवणारा देश बनत आहे. भारतात सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम कार्यरत आहे. या प्रदर्शनात जरी १००-१२५ स्टार्टअप्स दिसत असले, तरी भारताकडे आज २ लाखांहून अधिक स्टार्टअप्सचा अथांग पूल सज्ज आहे, जो जागतिक अर्थव्यवस्थेला गती देत आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञान या क्षेत्रांतील आपल्या अद्वितीय योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला होता, त्याच वारशाचा विस्तार आजचा तरुण करत आहे.पंतप्रधानांनी जगभरातील गुंतवणूकदार, नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था आणि अग्रगण्य उद्योजकांना भारतासोबत भागीदारी करण्याचे थेट आवाहन केले. भारत इनोव्ह्हेट्स' हे जगासाठी भारतासोबत जागतिक नवसंशोधनाचा पुढील अध्याय लिहिण्याचे एक सशक्त माध्यम आहे. भारतात या, आमच्यासोबत काम करा. 'डिझाइन इन इंडिया' आणि 'डेव्हलप इन इंडिया' च्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी शाश्वत उपाय शोधा.
https://prahaar.in/2026/06/14/minister-nitesh-rane-will-take-the-historic-city-of-sawantwadi-to-the-international-level-minister-nitesh-rane/

भारत-फ्रान्स संबंधांचे पंचसूत्र
दोन्ही देशांमधील मजबूत आणि धोरणात्मक संबंधांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे नाते हे "कनेक्शन (संपर्क), कन्व्हिक्शन (विश्वास), इनोव्हेशन (नाविन्यता), इन्स्पिरेशन (प्रेरणा) आणि सामायिक दृष्टीकोन " या पंचसूत्रीवर आधारित आहे. जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी नेहमीच एकत्र पावले टाकली असून, हा नवा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या प्रसंगी बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचा "इनोव्हेशनचा देश" असा गौरव केला आणि भारताच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला फ्रान्सचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
https://prahaar.in/2026/06/14/we-are-not-hitler-channels-of-dialogue-must-be-kept-open/

विविध क्षेत्रांत भागीदारी
'मेक इन इंडिया' अंतर्गत फ्रान्सने भारतासोबत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लायमेट ॲक्शन (हवामान बदल) यांसारख्या गंभीर व जागतिक आव्हानांच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अत्यंत मजबुतीने एकत्र काम करत आहेत. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सच्या विकासासह नागरी अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य आगामी काळात आणखी वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.</description>
      </item><item>
      <title>Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/we-are-not-hitler-channels-of-dialogue-must-be-kept-open/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/we-are-not-hitler-channels-of-dialogue-must-be-kept-open/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 20:59:43 -0400</pubDate>
      <description>दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन
तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली पाहिजेत," या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस (सरकार्यवाह) दत्तात्रेय होसबळे यांच्या विधानाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर समर्थन केले आहे. "होसबळे यांच्या विधानाचा संदर्भ शेजारील देशाच्या (पाकिस्तानच्या) सरकारशी नसून, तिथल्या सामान्य जनतेशी होता," असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण भागवत यांनी दिले. तिरुवनंतपुरम येथे संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित एका विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. मे महिन्यात दत्तात्रेय होसबळे यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ घेत जेव्हा संघाच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही देशाबाबत संघाचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नसते; संघ नेहमी केंद्र सरकारच्या भूमिकेचे आणि धोरणांचे पालन करतो.


https://prahaar.in/2026/06/14/minister-nitesh-rane-will-take-the-historic-city-of-sawantwadi-to-the-international-level-minister-nitesh-rane/
परंतु, पाकिस्तानमधील समाजाचा उल्लेख करताना सरसंघचालक म्हणाले की, आजही पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटते की भारताची फाळणी ही एक मोठी चूक होती. तिथले अनेक पत्रकारही संघाचे आणि त्याच्या कार्याचे कौतुक करतात. पाकिस्तानात एक मोठा गट असा आहे जो त्या देशाच्या मूळ विचारसरणीला आणि 'द्वि-राष्ट्र सिद्धांता'ला तीव्र विरोध करतो. आपण एकत्र राहिलो असतो तर ते दोन्ही देशांसाठी अधिक चांगले झाले असते, अशी भावना तिथल्या लोकांमध्ये आहे."

https://prahaar.in/2026/06/14/india-defies-us-sanctions-india-defies-us-sanctions-record-oil-purchases-from-russia/
भविष्यातील संभाव्य परिस्थितीवर भाष्य करताना मोहन भागवत यांनी जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जर भारताने भविष्यात पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव केला, तर तिथल्या लोकांच्या बाबतीत केवळ दोनच पर्याय उरतील, एकतर त्यांना भारतात सामावून घेणे किंवा असे वातावरण निर्माण करणे जिथे ते स्वतःच्या देशात शांततेने राहू शकतील. ते पुढे म्हणाले, "या दोन्ही परिस्थितींचा विचार करता संवादाची दारे खुली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण हिटलरसारखे क्रूर नाही आहोत; तो आपला स्वभावही नाही आणि आपला मार्गही नाही. त्यामुळे आपण काही मार्ग नेहमी खुले ठेवले पाहिजेत. आपण अन्याय आणि दडपशाही पूर्णपणे नष्ट केली पाहिजे, परंतु जे काही चांगले आहे त्याचे जतन करणे हे देखील आपले कर्तव्य आहे."

https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/
यापूर्वी मे महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत, "भारताने पाकिस्तान आणि त्या देशाकडून प्रायोजित केल्या जाणाऱ्या दहशतवादाचा सामना कसा करावा?" असा प्रश्न होसबळे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना होसबळे म्हणाले होते, "कोणत्याही देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान हे सर्वात आधी आणि सर्वोपरि असले पाहिजे आणि सध्याच्या सरकारने याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. मात्र, त्याच वेळी आपण संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत; संवादासाठी आपण नेहमीच तयार राहिले पाहिजे." नेमक्या याच भूमिकेचे आता सरसंघचालकांनी समर्थन केले आहे.</description>
      </item><item>
      <title>Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/minister-nitesh-rane-will-take-the-historic-city-of-sawantwadi-to-the-international-level-minister-nitesh-rane/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/minister-nitesh-rane-will-take-the-historic-city-of-sawantwadi-to-the-international-level-minister-nitesh-rane/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 20:55:59 -0400</pubDate>
      <description>सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सावंतवाडीकरांना दिलेला शहराच्या विकासाचा शब्द आम्ही पूर्ण करत असून, विरोधकांच्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि आपली 'रेघ' मोठी करून कामे पूर्ण करा, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानंतर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेतील २७ सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपाध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्याधिकारी विनायक औंधकर, लखमराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/

या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते म्हणाले, नगर परिषद निवडणूकीत खासदार नारायण राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शहराचा जुना विकासाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे. यामध्ये माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांचे योगदान मोठे आहे. सध्या नगरपरिषदेमध्ये काम करण्याची प्रचंड तळमळ असणारे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक लाभले आहेत. त्यामुळे शहरासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन विकास करायचा आहे. लोकोपयोगी विकासकामांचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. ही कामे केवळ पायाभूत सुविधा उभारणारी नसून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारी आहे. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी आणि नगरपरिषदेने चांगला विकास आराखडा तयार केला. त्यामुळे सावंतवाडी पर्यटनाच्या दृष्टीने अधिक वेगाने विकसित होईल, असा विश्वास आहे. ते पुढे म्हणाले, आज सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देताना त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते. जिल्ह्यात अधिकाधिक चांगले प्रकल्प आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. गुजरात मधील 'वनतारा' प्रकल्प आणि तेथील विकास पाहून एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो. केवळ गुजरातचे कौतुक करत न बसता आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावात असा जागतिक दर्जाचा प्रकल्प कसा उभारता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जगातील लोकांना आपल्या सावंतवाडीचा हेवा वाटेल असे काम करून मतदारांनी दिलेल्या विश्वासाला व मताला आम्ही पूर्ण न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

https://prahaar.in/2026/06/14/india-defies-us-sanctions-india-defies-us-sanctions-record-oil-purchases-from-russia/

यावेळी उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना ते म्हणाले की, विकासकामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा निधीचे दरवाजे बंद होतील. मतदारांच्या आशीर्वादामुळे सावंतवाडीला आदर्श शहर बनवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. 'सिंधुरत्न' योजनेसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामे वेळेत पूर्ण करा आणि पुढच्या निधीची अपेक्षा ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतुक करताना सांगितले की, शहरात आधुनिक सुविधांनी युक्त भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली जात आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेतही मोठी सुधारणा होणार आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे भरघोस निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा दिवस सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर उभारले जात आहे तसेच अनेक विकासकामांचा शुभारंभ होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले की, आज नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रास्ताविकातून नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.</description>
      </item><item>
      <title>India : भारताने अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारले! रशियाकडून विक्रमी तेल खरेदी</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/india-defies-us-sanctions-india-defies-us-sanctions-record-oil-purchases-from-russia/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/india-defies-us-sanctions-india-defies-us-sanctions-record-oil-purchases-from-russia/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 20:50:27 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : पाश्चात्य देशांचे भू-राजकीय दबाव आणि निर्बंध झुगारून भारताने रशियाकडून जीवाश्म इंधनाची मोठी खरेदी सुरूच ठेवली आहे. युरोपियन थिंक टँक 'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर'च्या ताज्या अहवालानुसार, मे २०२६ मध्ये भारत रशियाकडून जीवाश्म इंधन आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे. भारताने या एकाच महिन्यात रशियाकडून अंदाजे ५.८ अब्ज युरो (सुमारे ६.७ अब्ज डॉलर) किमतीचे हायड्रोकार्बन आयात केले आहेत.
या एकूण आयातीमध्ये कच्च्या तेलाचा वाटा सर्वाधिक म्हणजे ८३ टक्के (४.८ अब्ज युरो) होता. याव्यतिरिक्त, ५५० दशलक्ष युरोची तेल उत्पादने आणि ४२९ दशलक्ष युरो किमतीच्या कोळशाची आयात करण्यात आली. अहवालानुसार, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील तेलाची खरेदी वाढवल्यामुळे, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताच्या या वाढीव आयातीमागे रशियाकडून होणाऱ्या पुरवठ्यातील २१ टक्क्यांची वाढ हे मुख्य कारण आहे.(Raigad Accident)
https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/
रशियन तेलाची आवक वाढली
एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात गुजरातच्या 'वडीनार रिफायनरी'मध्ये रशियन तेलाचे अनलोडिंग ३६ टक्क्यांनी वाढले, तर 'जामनगर रिफायनिंग कॉम्प्लेक्स'मध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढले. नोव्हेंबर २०२५ मध्ये रशियन तेलाची आयात थांबवणाऱ्या 'न्यू मंगळूर' आणि 'विशाखापट्टणम' या सरकारी रिफायनरींनी मार्च २०२६ पासून पुन्हा खरेदी सुरू केली आहे. मे महिन्यात न्यू मंगळूर रिफायनरीच्या आवकेत १३ टक्के, तर विशाखापट्टणम रिफायनरीच्या आवकेत ४२ टक्क्यांची मोठी वाढ झाली. ओडिशातील 'पारादीप रिफायनरी'ने मे २०२६ मध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक रशियन कच्च्या तेलाची आयात करून नवा उच्चांक गाठला.

चीन अव्वल स्थानावर
जागतिक पातळीवर रशियाच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सर्वाधिक ५० टक्के खरेदी चीनने केली आहे, तर ३६ टक्क्यांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तुर्की ६ टक्क्यांसह तिसऱ्या आणि युरोपियन युनियन ५ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मे २०२६ मध्ये रशियाला सर्वाधिक महसूल चीनकडून मिळाला. रशियाच्या पहिल्या पाच आयातदार देशांकडून मिळालेल्या एकूण महसुलात चीनचा वाटा ३८ टक्के (सुमारे ७ अब्ज युरो) होता. चीनच्या या आयातीत कच्चे तेल, पाईपलाईन गॅस, कोळसा आणि एलएनजीचा समावेश होता.
https://prahaar.in/2026/06/14/14-women-officers-ready-in-the-first-nda-batch-following-the-supreme-courts-verdict/
जामनगर रिफायनरीतून अमेरिकेला पुरवठा
अहवालानुसार, यापैकी अंदाजे २१४ दशलक्ष युरो किमतीची उत्पादने थेट रशियन कच्च्या तेलावर प्रक्रिया करून बनवण्यात आली होती. अमेरिकेला जाणारे हे इंधन प्रामुख्याने भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरी आणि तुर्कीच्या स्टार व तुप्रास इझमिट रिफायनरीमधून पाठवले गेले. गेल्या तीन महिन्यांत जामनगर रिफायनरीच्या एकूण कच्च्या तेलाच्या फीडस्टॉक पैकी १५ टक्के फीडस्टॉक रशियामधून आला होता, असेही सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरने स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/06/14/monsoon-update-will-the-monsoon-arrive-in-mumbai-by-june-20/
निर्बंध असूनही रशियन तेल युरोप आणि अमेरिकेत!
युरोपियन युनियनने २१ जानेवारी २०२६ पासून रशियन तेल उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. असे असूनही, रशियन कच्च्या तेलाचा वापर करणाऱ्या इतर देशांतील रिफायनरींमधून तेल उत्पादनांच्या १० मोठ्या खेपा मे महिन्यात युरोपियन बंदरांवर दाखल झाल्या आहेत. इराण, तुर्की, ब्रुनेई आणि भारत यांसारख्या देशांमधून मे २०२६ मध्ये पाश्चात्य देशांना ६४१ दशलक्ष युरो किमतीची तेल उत्पादने निर्यात करण्यात आली. यामध्ये रशियन तेलावर प्रक्रिया करून तयार केलेले इंधन खरेदी करणाऱ्या देशांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
ऑस्ट्रेलिया: २७५ दशलक्ष युरो
युरोपियन युनियन: १७४ दशलक्ष युरो
अमेरिका: १४७ दशलक्ष युरो
न्यूझीलंड: ४५ दशलक्ष युरो</description>
      </item><item>
      <title>Connon Wealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय ॲथलीट संघ जाहीर</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 20:45:14 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने ३२ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला आहे. या संघात भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा तात्पुरता समावेश करण्यात आला आहे.पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या नीरजने अद्याप २०२६ हंगामात स्पर्धात्मक पुनरागमन केलेले नाही. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त होत असून लवकरच स्पर्धेत उतरणार असल्याची माहिती महासंघाने दिली आहे. अंतिम संघात स्थान निश्चित करण्यासाठी नीरजला ८२.६१ मीटरची पात्रता मर्यादा गाठावी लागणार आहे.
https://prahaar.in/2026/06/14/14-women-officers-ready-in-the-first-nda-batch-following-the-supreme-courts-verdict/

नीरजप्रमाणेच ट्रिपल जंपपटू सेल्वा प्रभू यालाही सशर्त संधी देण्यात आली आहे. त्याने नुकतेच अमेरिकेतील एनसीएए स्पर्धेत १६.९२ मीटर उडी मारून विजेतेपद मिळवले होते. मात्र, ग्लासगोसाठी पात्र ठरण्यासाठी त्याला आगामी इंटर-स्टेट स्पर्धेत पात्रता सिद्ध करावी लागेल.
भारतीय संघात २२ पुरुष आणि १० महिला खेळाडूंचा समावेश आहे. फेडरेशन कप आणि इंडियन अॅथलेटिक्स सिरीजमधील कामगिरीच्या आधारे बहुतांश खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. काही खेळाडूंना परदेशातील स्पर्धांमध्ये पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली होती.संघात गुरिंदरवीर सिंह, अनिमेष कुजूर, गुलवीर सिंह, मुरली श्रीशंकर, तजिंदरपाल सिंह तूर, प्रियंका गोस्वामी, पारुल चौधरी, मनप्रीत कौर यांसारख्या अनुभवी खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/14/monsoon-update-will-the-monsoon-arrive-in-mumbai-by-june-20/
भारतीय संघातील प्रमुख खेळाडू
नीरज चोप्रा – भालाफेक
रोहित यादव – भालाफेक
यशवीर सिंह – भालाफेक
मुरली श्रीशंकर – लांब उडी
तजिंदरपाल सिंह तूर – गोळाफेक
गुरिंदरवीर सिंह – १०० मीटर
अनिमेष कुजूर – २०० मीटर
पारुल चौधरी – ५००० मीटर
प्रियंका गोस्वामी – रेस वॉक
मनप्रीत कौर – गोळाफेक</description>
      </item><item>
      <title>NDA : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडीएच्या पहिल्या बॅचमध्ये १४ महिला अधिकारी सज्ज</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/14-women-officers-ready-in-the-first-nda-batch-following-the-supreme-courts-verdict/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/14-women-officers-ready-in-the-first-nda-batch-following-the-supreme-courts-verdict/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 20:40:59 -0400</pubDate>
      <description>देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीतील १४ कॅडेट्सनी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून आर्मी आणि एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून यशस्वीरित्या पदभार स्वीकारला आहे.

https://prahaar.in/2026/06/14/monsoon-update-will-the-monsoon-arrive-in-mumbai-by-june-20/
सात दशकांहून अधिक काळ फक्त पुरुषांसाठी खुले असलेल्या राष्ट्रीय रक्षा अकादमी (एनडीए) मधून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला बॅचमधील १४ कॅडेट्स आता लष्कर आणि वायुदलात अधिकारी पदावर सज्ज झाल्या. इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए), देहरादून येथे नुकत्याच झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये ९ महिला कॅडेट्सची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.भारतीय वायुसेना (इंडियन एअर फोर्स) हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमी (एएफए), डुंडीगल येथे ५ महिला कॅडेट्स फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमीशन झाल्या. या सर्व महिला अधिकाऱ्यांना थेट परमनंट कमिशन देण्यात आले. विशेष म्हणजे या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना एनडीएच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासूनच कायमस्वरूपी कमिशन मिळाले. त्यांचा प्रवास २०२१ मध्ये सुरू झाला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे उघडले गेले. यापूर्वी लष्कर आणि वायुदलात महिला अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) द्वारे प्रवेश करत असत. एनडीए-आयएमए आणि एनडीए-एएफए मार्गे येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच कायमस्वरूपी कमिशन मिळते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात, एकूण ५१५ जेंटलमन कॅडेट्सनी अंतिम टप्पा पार करून लष्करी जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. आयएमएच्या पासिंग आउट परेडमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहणी केली, तर एअर फोर्स अकादमीच्या परेडला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/14/solapur-accident-eight-killed-after-pickup-vehicle-plunges-into-a-well-shockwaves-in-the-area/

भारतीय लष्कराच्या ड्रेस कोडमध्ये बदल; नवीन युनिफॉर्म श्रेणींचा समावेश
भारतीय लष्कराच्या गणवेश नियमावलीत सुधारणा करण्यात आले असून विविध प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या गणवेशामध्ये काही नवीन ड्रेस जोडण्यात आले. समारंभीय हिवाळी गणवेशमध्ये आता जवान आणि अधिकाऱ्यांसाठी एकच समान ड्रेस असणार आहे. अधिकाऱ्यांसाठी नवीन विंटर जॅकेटही युनिफॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार अधिकाऱ्यांसाठी नवीन हिवाळी जॅकेटचा समावेश करण्यात आला असून “३बी” नावाचा नवीन हिवाळी गणवेश प्रकार लागू करण्यात आला आहे. या गणवेशात आधुनिक हिवाळी जॅकेटचा समावेश आहे. हे जॅकेट सध्या भारतीय हवाई दल आणि नौदलात वापरले जात होते आणि आता ते लष्करातही समाविष्ट करण्यात आले आहे. हा गणवेश प्रामुख्याने शांतताकालीन तळांवर वापरला जाणार आहे, कारण प्रत्यक्ष क्षेत्रीय तळांवर सामान्यतः लढाऊ गणवेशच वापरला जातो. लढाऊ गणवेशातही बदल करण्यात आले असून “७ए” नावाचा नवीन प्रकार जोडण्यात आला आहे, ज्यामध्ये टी-शर्टचा समावेश असेल. तसेच “७बी” हा हिवाळी लढाऊ जॅकेट असलेला गणवेश प्रकारही नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या हिवाळी समारंभीय गणवेशात “१सी” हा नवीन प्रकार जोडण्यात आला आहे. हा गणवेश यापूर्वी सैनिक आणि कनिष्ठ आयोगित अधिकारी (जेसीओ) यांच्यासाठी मर्यादित होता, मात्र आता तो अधिकाऱ्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. याआधी गणवेशांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता पुन्हा विविध प्रकारचे गणवेश समाविष्ट केल्याने त्या निर्णयाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.</description>
      </item><item>
      <title>Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/monsoon-update-will-the-monsoon-arrive-in-mumbai-by-june-20/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/monsoon-update-will-the-monsoon-arrive-in-mumbai-by-june-20/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 20:26:31 -0400</pubDate>
      <description>Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे. राज्यात मान्सून पोहोचला असला तरी नागरिकांना उकाडा आणि दमट हवामानापासून अद्याप दिलासा मिळालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मान्सूनचा पुढील प्रवास १९ ते २० जून पर्यंत लांबू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती की, महाराष्ट्रात मान्सून काही दिवस पुढे सरकला आहे. मात्र १३ जूनच्या अद्ययावत अहवालात महाराष्ट्राचा उल्लेख वगळण्यात आला असून राज्यातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/14/solapur-accident-eight-killed-after-pickup-vehicle-plunges-into-a-well-shockwaves-in-the-area/

मुंबईत दमट उकाडा कायम
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत १६ जूनपर्यंत उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील किमान तापमान गेल्या सात दिवसांपासून ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जात आहे. यामुळे मुंबईकरांना पावसासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.(Legal notice served to Amazon)

राज्यात उष्णता कायम
मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे रविवारी उष्णतेची तीव्रता वाढू शकते. तर अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत सोमवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अमरावती आणि बुलढाणा येथे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/14/bhimashankar-heritage-wadi-project-to-transform-the-area/

पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही प्रतीक्षेत आहेत. पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्यावरील भागांत पूर्वमान्सूनच्या हलक्या सरी कोसळू शकतात. खानदेशात मान्सूनचे आगमन रखडले असून तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ असले तरी उष्णता कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी जोरदार पावसासाठी जुलै अखेरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. हवामानातील या बदलांमुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. २० जूननंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.</description>
      </item><item>
      <title>Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/solapur-accident-eight-killed-after-pickup-vehicle-plunges-into-a-well-shockwaves-in-the-area/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/solapur-accident-eight-killed-after-pickup-vehicle-plunges-into-a-well-shockwaves-in-the-area/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 19:33:54 -0400</pubDate>
      <description>सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जणांना स्थानिकांनी वाचवले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या पिकअप गाडीतील १४ जण सोलापूरच्या रांजणीगावचे स्थानिक होते. मिळालेल्या माहितीनुसार हे १४ जण देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून घरी परत येताना ही घटना घडली आहे.




&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)



नेमकं घडलं काय ?
हा अपघात माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ झाला. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत हा अपघात झाला.विहिरीला कठडे नव्हते. तसेच ती काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली. हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण भरदिवसा ही अपघाताची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे १४ जण म्हसवडमधील सिद्धनाथच्या दर्शनासाठी पिकअप गाडीने गेले होते. दर्शन करून परत येताना हा अपघात झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने १४ पैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.


सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सुदैवाने…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2026

अपघाताबाबत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. "सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे वाहन विहिरीत पडून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर उपचार सुरू असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल," असे त्यांनी म्हटले आहे.</description>
      </item><item>
      <title>Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/14/bhimashankar-heritage-wadi-project-to-transform-the-area/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/14/bhimashankar-heritage-wadi-project-to-transform-the-area/</guid>
      <pubDate>Sun, 14 Jun 2026 19:22:19 -0400</pubDate>
      <description>मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. यावेळी त्यांनी भाविकांसाठी प्रस्तावित विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होण्यास मदत होईल. तसेच ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे आणि पर्यटन विकासाला चालना मिळून संपूर्ण परिसराचे सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

https://prahaar.in/2026/06/14/the-honor-of-the-palanquin-the-privilege-of-drawing-the-palanquin-chariot-and-chaughada-carriage-once-again-goes-to-the-princely-states-pairs-of-bullocks/

यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच 'एल निनो' च्या संभाव्य संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी प्रार्थनाही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार अतुल बेनके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.</description>
      </item></channel>
    </rss>