<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>Sharad Pawar And Praful Patel : प्रफुल पटेल अन् शरद पवारांची 'सिल्व्हर ओक'वर गुप्तभेट?</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/praful-patel-and-sharad-pawars-secret-meeting-at-silver-oak/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/praful-patel-and-sharad-pawars-secret-meeting-at-silver-oak/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 12:06:10 -0400</pubDate>
      <description>मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गोटात सध्या अंतर्गत नाराजीनाट्य पेटलेले असतानाच, राजकीय वर्तुळाला चक्रावून टाकणारी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १२ मे च्या रात्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन गुप्तभेट घेतल्याचे समोर आले आहे. सुनील तटकरे यांच्या भेटीची चर्चा याआधी झाली असली, तरी त्यांच्या आधीच प्रफुल पटेल हे अत्यंत गुप्तपणे शरद पवारांच्या दरबारात हजर होते आणि तिथे तिन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
https://prahaar.in/2026/05/16/will-census-staff-come-to-inspect-mumbaikars-villages-houses-and-closed-houses/
राष्ट्रवादीची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती गेल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला (साईडलाईन) सारण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांचे नाव गायब झाल्याची कुजबुज आहे, तर तटकरे यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची शरद पवारांसोबत झालेली ही गुप्तभेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नव्या राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करत आहे.
१२ मे रोजी आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेही गुवाहाटीला गेले होते. मात्र, मुंबईला परतताना सुनेत्रा पवार यांनी आपल्याच पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना टाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानातून येणे पसंत केले. यामुळे दुखावलेल्या प्रफुल पटेल यांनी तातडीने शरद पवारांची वेळ मागितली. पटेल पवारांशी चर्चा करत असतानाच ऐनवेळी सुनील तटकरेही तेथे पोहोचल्याने 'सिल्व्हर ओक'वर तिन्ही बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पार्थ पवारांची तक्रार?
अजितदादांच्या पश्चात त्यांचे पुत्र पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्ष हाताळत आहेत, त्याबद्दल जुन्या-जाणत्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन पार्थ पवारांची तक्रार केली आहे. "आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अजितदादा असताना असे कधी घडत नव्हते. शरद पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी," अशी आग्रही मागणी या नेत्यांनी शरद पवारांकडे केल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून आधीच वाद निर्माण झाला असताना, आता पार्थ पवारांविरोधातील या तक्रारीमुळे पक्षात सारे काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत.</description>
      </item><item>
      <title>Vasai Shocker : पैशांच्या वादातून विवाहित प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या; मृतदेह निळ्या ड्रममध्ये कोंबला अन्...वसई हादरली!</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/vasai-shocker-married-woman-allegedly-kills-lover-dumps-body-in-blue-drum-with-husbands-help-2-arrested-so-far/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/vasai-shocker-married-woman-allegedly-kills-lover-dumps-body-in-blue-drum-with-husbands-help-2-arrested-so-far/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 12:05:56 -0400</pubDate>
      <description>वसई : पैशांच्या हव्यासापोटी प्रेमाचा किती भयंकर शेवट होऊ शकतो, याचा थरकाप उडवणारा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेने चक्क स्वतःच्या पती आणि साथीदारांच्या मदतीने २६ वर्षीय तरुण इंजिनिअर प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. अमानुष मारहाणीत या तरुणाचा जीव गेल्यानंतर, अत्यंत थंड डोक्याने त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये कोंबून निर्जन नाल्यात फेकून देण्यात आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण वसई आणि मुंब्रा परिसर हादरून गेला आहे.

पोलिसांची कारवाई आणि मृताची ओळख
या खळबळजनक प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) तत्परतेने कारवाई करत २५ वर्षीय आरोपी महिला आणि तिच्या सख्ख्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कटातील तिचा पती आणि आणखी एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. अरबाज मकसूद अली खान असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव असून, तो डोंबिवलीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे इंजिनिअर म्हणून कार्यरत होता.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-entry-in-kerala-5-days-early-rain-showers-expected-in-mumbai-konkan-by-the-end-of-may/
प्रेमसंबंध, पैशांची हाव आणि हत्येचा भयानक कट
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरबाज आणि वसईत राहणारी मेहजबीन खातून एकरान शेख हे २०२१ पासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्यात सतत संभाषण आणि मेसेजची देवाणघेवाण व्हायची. पण कालांतराने मेहजबीनने अरबाजकडे पैशांचा तगादा लावला. अरबाज तिला नियमितपणे पैसेही पाठवत असे. मात्र, जेव्हा अरबाजने तिला मासिक खर्च देणे बंद केले, तेव्हा त्यांच्यातील संबंध बिघडले. याच पैशांच्या रागातून मेहजबीनने तिचा पती हसन शेख, भाऊ तारिक शेख आणि भावाचा मित्र मोज्जम पठाण यांच्यासोबत मिळून अरबाजला कायमचे संपवण्याचा कट रचला.

बेपत्ता होण्याची तक्रार आणि तपासाला दिशा
३ एप्रिल रोजी अरबाज त्याच्या कंपनीच्या कामासाठी काही रोकड आणण्यासाठी दादरला गेला होता, पण तो घरी परतलाच नाही. तो अचानक बेपत्ता झाल्याने चिंताग्रस्त वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अरबाजचे कॉल रेकॉर्ड्स (CDR) आणि मोबाईलचे लोकेशन तपासले असता, तो बेपत्ता झाला त्या दिवशी त्याचे आणि मेहजबीनचे लोकेशन वसईत एकाच ठिकाणी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आणि तपासाला वेगळे वळण लागले.

५० हजारांचा व्यवहार आणि गुन्ह्याची कबुली
बेपत्ता होण्याच्या बरोबर एक दिवस आधी अरबाजने मेहजबीनच्या बँक खात्यात ५० हजार रुपये ट्रान्सफर केल्याचा भक्कम तांत्रिक पुरावा पोलिसांच्या हाती लागला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मेहजबीनची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या मेहजबीनने पोलिसांचा खाक्या पाहताच गुन्ह्याची कबुली दिली. तिनेच अरबाजला पैशांच्या व्यवहारावर बोलण्यासाठी वसईतील भोईदापाडा येथील तिच्या घरी बोलावून घेतले होते, जिथे त्यांच्यात मोठा वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अरबाजकडे कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मोठी रोकड आढळली नाही, तेव्हा आरोपींनी त्याचे हातपाय निर्दयपणे बांधले आणि त्याला प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अरबाजचा मृत्यू झाला. त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने या सर्व आरोपींनी त्याचा मृतदेह एका ड्रममध्ये कोंबला आणि वाळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात फेकून दिला.

लावलेली कलमे आणि पुढील तपास
या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी ७ मे रोजी मेहजबीन आणि तिचा भाऊ तारिक या दोघांना रीतसर अटक केली आहे. फरार असलेले हसन आणि पठाण यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये हत्या करणे, अपहरण, गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे यांसारख्या अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे.</description>
      </item><item>
      <title>Monsoon Update : केरळमध्ये ५ दिवस आधीच मान्सूनची एन्ट्री; मुंबई-कोकणात मे महिन्याच्या अखेर पावसाच्या सरींचा अंदाज</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/monsoon-entry-in-kerala-5-days-early-rain-showers-expected-in-mumbai-konkan-by-the-end-of-may/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/monsoon-entry-in-kerala-5-days-early-rain-showers-expected-in-mumbai-konkan-by-the-end-of-may/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 10:10:28 -0400</pubDate>
      <description>मुंबई : उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला असून, यंदा केरळमध्ये मान्सून सरासरी तारखेपेक्षा पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जूनला मानले जाते. मात्र यंदा २६ मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/05/16/will-census-staff-come-to-inspect-mumbaikars-villages-houses-and-closed-houses/
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत नैऋत्य मौसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, अंदमान समुद्रात तसेच अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळत असून, अंदमान-निकोबार बेटांवरही यंदा मान्सून साधारण सहा दिवस आधी दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.
केरळमध्ये मान्सून आगमनाची संभाव्य तारीख २६ मे असली तरी त्यामध्ये अधिक-उणे चार दिवसांचा फरक पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर समुद्रातून मिळणाऱ्या आर्द्रतेच्या पुरवठ्यावर त्याचा पुढील प्रवास अवलंबून असतो. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होईल, याबाबतचा स्पष्ट अंदाज केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच व्यक्त केला जाणार आहे.
दरम्यान, ‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरणनिर्मिती सुरू होईल. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र राज्याच्या अंतर्गत भागात मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/16/old-records-like-birth-and-death-records-marriage-records-will-be-available-in-just-a-few-seconds/
यंदा एल निनोचा प्रभाव जुलै महिन्यापासून जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे साठवण आणि जलसंधारण यावर भर देणे आवश्यक असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. पावसाचे प्रमाण आणि वितरण यावर एल निनोचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पुढील काळात हवामानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवताना हवामान विभाग विविध हवामान घटकांचा अभ्यास करतो. यामध्ये वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पातील मान्सूनपूर्व सरी, चीन समुद्रावरील विकिरण, आग्नेय हिंदी महासागरातील वारे, नैऋत्य प्रशांत महासागरातील विकिरण तसेच ईशान्य हिंदी महासागरातील वाऱ्यांचा समावेश असतो. या सर्व घटकांच्या आधारे केरळमधील मान्सून आगमनाची तारीख निश्चित केली जाते.
विशेष म्हणजे, भारतीय हवामान विभागाने २००५ ते २०२५ या २१ वर्षांच्या कालावधीत केरळमधील मान्सून आगमनाबाबत केलेले अंदाज बहुतांश वेळा अचूक ठरले आहेत. केवळ २०१५ सालचा अंदाज वगळता उर्वरित सर्व वर्षांमध्ये हवामान विभागाचा अंदाज वास्तवाशी जवळपास जुळला होता. गेल्या वर्षीही केरळमध्ये मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता.</description>
      </item><item>
      <title>Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/will-census-staff-come-to-inspect-mumbaikars-villages-houses-and-closed-houses/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/will-census-staff-come-to-inspect-mumbaikars-villages-houses-and-closed-houses/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 09:52:37 -0400</pubDate>
      <description>घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
मुंबई : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घरयादी व घरगणनेच्या प्रक्रियेला शनिवार, १६ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. प्रगणकांच्‍या घर भेटीदरम्‍यान नागरिकांनी त्यांना अचूक, संपूर्ण व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच, ज्यांनी स्व-नोंदणी केली आहे त्यांनी आपला स्व - गणना क्रमांक प्रगणकांना देणे आवश्यक आहे. घरयादी व घरगणना मोहिमेसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रधान जनगणना अधिकारी आश्विनी भिडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टीमुळे अनेक कुटुंब गावी गेली आहेत. तर काहीजण बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घराला टाळी लागलेली असणार. त्यामुळे या बंद घरांची पाहणी करायला हे कर्मचारी जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
https://prahaar.in/2026/05/16/only-42-electric-vehicles-in-mumbai-municipal-corporations-fleet/
जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. अचूक माहितीच्या आधारे शासनाला योग्य नियोजन करता येते आणि नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून प्रामाणिक व अचूक माहिती देऊन जनगणना २०२७ च्‍या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. घरयादी व घरगणना ही जनगणनेची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असून, या प्रक्रियेत घरांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची माहिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास आराखडे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्‍याचे आश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे.
जनगणेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने आणि निःसंकोचपणे योग्य माहिती द्यावी. नागरिकांचे सहकार्य हेच महानगराच्‍या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्‍वासही आश्विनी भिडे यांनी व्‍यक्‍त केला आहे.</description>
      </item><item>
      <title>Old Birth and Death records : जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे जुने अभिलेख अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/old-records-like-birth-and-death-records-marriage-records-will-be-available-in-just-a-few-seconds/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/old-records-like-birth-and-death-records-marriage-records-will-be-available-in-just-a-few-seconds/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 09:44:00 -0400</pubDate>
      <description>महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचा पुढाकार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्‍या ई प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) जतन करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण नागरी दस्तऐवजांचे आता अत्याधुनिक ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रणालीअंतर्गत डिजिटल जतन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जन्म - मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारख्‍या जुन्या अभिलेखांचे सुरक्षित संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच, नागरिकांना आवश्यक कागदपत्रे अधिक जलद, अचूक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दस्तऐवजांचे वर्गीकरण, स्कॅनिंग आणि डिजिटल संग्रहण करण्यात येणार आहे. त्‍यामुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यासही हातभार लागणार आहे. तसेच बोगस प्रमाणपत्रांना आळा बसेल. या सुविधेचा वापर करणारी मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका ठरणार असल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/05/16/teachers-who-have-been-deputed-to-various-offices-including-the-elections-will-be-sent-back-to-the-classroom/
महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी महानगरपालिकेच्‍या विविध 'डेटाबेस'मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञानाचा समावेश करावा. डेटा - आधारित, पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासकीय व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महानगरपालिकेने वाटचाल सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पुढाकार घेऊन ई - वॉर्डातील नागरी दस्तऐवजांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तिजोरी (व्हिजन एआय वॉल्ट) अंतर्गत जतन करण्‍याचा पथदर्शी प्रकल्‍प हाती घेण्‍याचे निश्चित केले आहे.
अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, ई प्रशासकीय विभागाकडे अनेक वर्षांपासूनचे अमूल्य नागरी दस्तऐवज जतन करण्यात आले आहेत. जन्म - मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे महत्त्वपूर्ण अभिलेख पावसाळा, दमट हवामान आणि काळाच्या कठोर परीक्षेलाही तोंड देत आजवर टिकून राहिले. मात्र, केवळ अस्तित्व टिकवून ठेवणे आता पुरेसे राहिले नव्हते. कालांतराने नोंदींवरील शाई फिकी पडू लागली, दस्तऐवजांची पाने ठिसूळ झाली आणि अनेक दस्तऐवज धूळ व जुन्या कापडात गुरफटून पडले. एका प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आठवडे, तर कधी महिने प्रतीक्षा करावी लागत होती. ई वार्डचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्‍याचे आव्‍हान प्रशासनासमोर होते, असे त्या म्हणाल्या.
https://prahaar.in/2026/05/16/only-42-electric-vehicles-in-mumbai-municipal-corporations-fleet/
डॉ. अश्विनी जोशी यांनी पुढे नमूद केले की, जुन्या अभिलेखांच्‍या सुरक्षित संवर्धनासाठी महानगरपालिकेने ‘व्हिजन एआय प्रोजेक्ट’ राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम म्हणजे भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्‍त्‍वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्प अंतर्गत अनेक वर्षांपासूनच्या लाखांहून अधिक हस्तलिखित नागरी नोंदींचे जतन करण्यासाठी अत्याधुनिक एआय-आधारित डिजिटल तिजोरी (व्हिजन एआय वॉल्ट) उभारण्यात येणार आहे. हे साधे स्कॅनिंग किंवा पारंपरिक, कालबाह्य ऑप्टीकल कॅरेक्टर रिकग्निशन' तंत्रज्ञान पुरते मर्यादित नसून, दस्तऐवजांना नवसंजीवनी दिली जाणार आहे. ही प्रणाली वळणदार इंग्रजी, मराठी आणि हिंदी हस्तलिखित लिपी अचूकपणे वाचू शकते; काळाच्या ओघात पुसट झालेल्या अक्षरांना पुन्हा स्पष्ट करू शकते; शाईच्या उमटलेल्या डागांमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करू शकते; तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील नाजूक आणि जीर्ण पानांनाही नव्याने स्पष्टता व ओळख प्राप्त करून देऊ शकते.
ज्या प्रक्रियेसाठी पूर्वी किमान ३० दिवस, तर काही प्रकरणांमध्ये तब्बल एक ते दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती, ती सेवा आता अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार आहे. नाजूक आणि जीर्ण नोंदवह्यांमधील किचकट हाताने शोध, नागरिकांच्या लांबच लांब रांगा आणि अनिश्चिततेने भरलेली प्रतीक्षा याला आता पूर्णविराम मिळणार असून, नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ सेवा अनुभवता येणार आहे. एआय आधारित प्रणालीमुळे आता प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि वेगवान होणार आहे.
एआय काम कसे करणार !
नागरिकाने केवळ एक नाव टाइप करताच, एआय संबंधित नोंद काही क्षणांत शोधून काढेल. त्यानंतर मूळ अभिलेखाचे पान तत्काळ स्क्रीनवर उपलब्ध होईल आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र क्षणार्धात तयार केले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऐतिहासिक वारसा सुरक्षित ठेवत नागरिकांना तत्पर सेवा देण्याची नवी व्यवस्था उभी राहणार आहे. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘ई’ विभागाचे सहायक आयुक्‍त आनंद कंकाळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली हा प्रकल्‍प राबविला जाणार असल्‍याचे अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्‍पष्‍ट केले.</description>
      </item><item>
      <title>BMC Electric Vehicles (EV) : मुंबई महापालिकेच्या ताफ्यात केवळ ४२ इलेक्ट्रिक वाहने</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/only-42-electric-vehicles-in-mumbai-municipal-corporations-fleet/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/only-42-electric-vehicles-in-mumbai-municipal-corporations-fleet/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 09:36:23 -0400</pubDate>
      <description>मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर इंधन बचतीकरता अनेकांनी वाहनांचा ताफा कमी करून तसचे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात निव्वळ ३६ इलेक्ट्रिक वाहने आहेत, तर सहा पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहने अशाप्रकारची हायब्रीड व्हेहीकल आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने आपल्या वाहनांचा ताफा वाढवतानाइलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात नसून यासाठी आता प्रशासनाला आता ईव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचाच वाहनांचा अवलंब करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
https://prahaar.in/2026/05/16/teachers-who-have-been-deputed-to-various-offices-including-the-elections-will-be-sent-back-to-the-classroom/
मुंबई महापालिकेच्या ताफ्यात सध्या २२० वाहने असून त्यातील पेट्रोल व इलेक्ट्रीक संयुक्त आधारीत ०६ वाहने तर निव्वळ इलेक्ट्रीक ३६ वाहनांचा समावेश आहे. या ३६इलेक्ट्रीक वाहनांचा वापर सध्या खातेप्रमुख व विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून केले जात आहे. ही इलेक्ट्रिक वाहने एका चार्जिंगमध्ये सरासरी २८० किलोमीटर सेवा देतात. तर भाडेतत्वावरील एकूण ३५० वाहनांची सेवा घेतली जाणार असून त्यातील ७० वाहने ही निव्वळ इलेक्ट्रीक वाहने आहेत. अशाप्रकारची वाहने खरेदी केल्यानंतर त्यांची चार्जिंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सध्या मुंबई महापालिकेच्यावतीने २० ठिकाणी ३२ चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई महापालिकेला इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगकरता सीएनजीच्या पंपांच्या धर्तीवर चार्जिंगची व्यवस्था केलेले केंद्र उभारण्यावर भर द्यावा लागेल असे बोलले जात आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने २३.०७.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ जाहीर केले आहे. तसेच या शासन निर्णयान्वये धोरणामधील विविध प्रोत्साहने व अंमलबजावणीची विभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली असून परिवहन विभागास नोडल विभाग म्हणून जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ च्या अंमलबजावणीचा कालावधी ३१. मार्च २०२५ पर्यंत होता. पण ०१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीकरिता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पण या नव्या धोरणामुळे प्रत्यक्षात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढण्यास विलंब झाला. अन्यथा सन २०२१नंतर आज खऱ्या अर्थाने शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित वापरात येणारी वाहने तसेच खासगी तसेच खासगी वाहनांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली असती. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी प्रत्येक जण पुढे येत असले तरी प्रत्यक्षात या वाहनांची संख्या कमी असल्यामुळे याचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नाही. महापालिकेत सध्या हे प्रमाण एकूण वाहनांच्या २० टक्के एवढे राखण्याचे लक्ष्य ठेवण्यात आला असला तर सध्या १८ टक्के एवढाच आहे.</description>
      </item><item>
      <title>Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/teachers-who-have-been-deputed-to-various-offices-including-the-elections-will-be-sent-back-to-the-classroom/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/teachers-who-have-been-deputed-to-various-offices-including-the-elections-will-be-sent-back-to-the-classroom/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 09:30:04 -0400</pubDate>
      <description>शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी
मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे प्रतिनियुक्तीवर निवडणूक कामांसह इतर कामांसाठी व विविध कार्यालयांमध्ये रुजू झालेले असून शिक्षकांनी केवळ शिकवण्याचे काम करणे आवश्यक असतानाही काही शिक्षक कायमस्वरुपी निवडणूक व इतर विभागांमध्येच कार्यरत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे निवडणूक विभागांमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून घेत त्यांच्या मूळ जागांवर रुजू करून घेण्याचे परिपत्रकच १३ मे २०२६ रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक कामांसाठी कायमस्वरुपी जुंपलेल्या शिक्षकांना पुन्हा आपल्या जागांवर किंवा पर्यायी शाळांमध्ये जावून काम करावे लागणार आहे. मात्र, हे परिपत्रक प्रतिनियुक्तीवर शिक्षकांसाठी असून सध्या एसआयआर आणि जनगणनेच्या कामांसाठी जे बीएलओ नियुक्त करण्यात आलेले आहेत, त्यांना हे परिपत्रक लागू नसेल, त्यांना आपल्या ड्युटीबरोबरच जनगणनेचे आणि एसआयआरचेही काम करावेच लागेल,असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/05/16/gold-price-today-16-may-2026-latest-news-updates/
या परिपत्रकामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते. तसेच निवडणूक व अन्य कामांवर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या निर्देशानुसार सर्व संबंधीत शिक्षकांना (स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणा-या) त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करावी,असेही नमुद केले आहे.
कार्यालयास सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करुन त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच सर्व संबंधीतांना कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर, त्या शिक्षकांचे मे, २०२६ म्हणजे जून २०२६ पासूनचे वेतन अदा होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी. याबाबत संबंधीत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरुन आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. तसेच शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत. याचा एकत्रित अहवाल ३१ मे २०२६ पर्यंत या कार्यालयास सादर करावा. जेणेकरुन एकत्रित अहवाल सत्वर शासनास सादर करणे शक्य होईल,असेही नमुद केले आहे.
https://prahaar.in/2026/05/16/nagpur-madgaon-biweekly-train-regular/
सध्या मुंबईतील अनेक खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांसह महापालिका शाळांमधील शिक्षकांना निवडणूक विभागामध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे, तर काही शिक्षक हे प्रशासकीय कामांसाठी करीरोड येथील शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे या सर्व प्रशासकीय कामे करणाऱ्या शिक्षकांना पुन्हा एकदा वर्गावर जावे लागणार असून त्यांना जर प्रशासकीय कामांमधून मुक्त करून वर्गावर न पाठवल्यास मे महिन्याचा पगारही मिळणार नसून त्यांना पुढील कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे या परिपत्रकाद्वारे स्पष्ट झाले आहे.</description>
      </item><item>
      <title>Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे भाव</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/gold-price-today-16-may-2026-latest-news-updates/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/gold-price-today-16-may-2026-latest-news-updates/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 09:21:47 -0400</pubDate>
      <description>मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं असलं तरी लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचा कल वाढत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू असून शनिवार, १६ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोनं आणि चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे खरेदी वाढली असली तरी दुसरीकडे जागतिक बाजारातील घडामोडींमुळे दरांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत.

https://prahaar.in/2026/05/16/nagpur-madgaon-biweekly-train-regular/

शनिवार, १६ मे रोजी सकाळी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. राजधानी दिल्ली (New Delhi) मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५८,०५० रुपयांवर आला. याआधी शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर तब्बल ३,२०० रुपयांनी म्हणजेच १.९३ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,६२,००० रुपयांवर बंद झाला होता. डॉलर मजबूत होणे आणि गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर नफावसुली झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस ४,५४८.४६ डॉलर इतका नोंदवला गेला.

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,०५० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १,४४,८९० रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) आणि कोलकाता (Kolkata) येथे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,७४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा दर १,५७,९०० रुपये आहे. तर चेन्नई (Chennai) मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६१,०७० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४७,६४० रुपये इतका आहे. तसेच पुणे (Pune) आणि बेंगळुरू( Bengaluru) येथेही २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५७,९०० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४४,७४० रुपये नोंदवला गेला.

https://prahaar.in/2026/05/16/nationwide-strike-against-fuel-price-hike-many-app-based-services-including-swiggy-ola-uber-zepto-shut-down-today/

सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

दिल्ली – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

मुंबई – २२ कॅरेट: १,४४,७४० | २४ कॅरेट: १,५७,९००

अहमदाबाद – २२ कॅरेट: १,४४,७९० | २४ कॅरेट: १,५७,९५०

चेन्नई – २२ कॅरेट: १,४७,६४० | २४ कॅरेट: १,६१,०७०

कोलकाता – २२ कॅरेट: १,४४,७४० | २४ कॅरेट: १,५७,९००

हैदराबाद – २२ कॅरेट: १,४४,७४० | २४ कॅरेट: १,५७,९००

जयपूर – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

भोपाळ – २२ कॅरेट: १,४४,७९० | २४ कॅरेट: १,५७,९५०

लखनौ – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

चंदीगड – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. १६ मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलो २,८९,९०० रुपयांवर आला. आदल्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर तब्बल २१,६०० रुपयांनी म्हणजेच ७.३ टक्क्यांनी घसरून प्रति किलो २,७५,००० रुपयांवर बंद झाला होता. यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीच्या दराने ४ लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर प्रति औंस ७८.२१ डॉलर इतका आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात भारताच्या सोन्याच्या आयातीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये सोन्याची आयात ८१.६९ टक्क्यांनी वाढून ५.६२ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्याचप्रमाणे चांदीची आयात १५७.१६ टक्क्यांनी वाढून ४१.१ कोटी डॉलर झाली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सोन्याची आयात मूल्याच्या दृष्टीने २४ टक्क्यांनी वाढून विक्रमी ७१.९८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र परिमाणाच्या दृष्टीने आयात ४.७६ टक्क्यांनी घटून ७२१.०३ टन इतकी झाली. दुसरीकडे चांदीची आयात जवळपास १५० टक्क्यांनी वाढून १२ अब्ज डॉलरवर पोहोचली असून परिमाणाच्या दृष्टीने ती ४२ टक्क्यांनी वाढून ७,३३४.९६ टन इतकी झाली आहे.</description>
      </item><item>
      <title>Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/nagpur-madgaon-biweekly-train-regular/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/nagpur-madgaon-biweekly-train-regular/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 08:54:46 -0400</pubDate>
      <description>कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून ही रेल्वे नियमित सेवेत दाखल झाली आहे.
कोकणवासीयांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जात आहे. आतापर्यंत विशेष गाडी म्हणून चालवली जाणारी नागपूर-मडगाव-नागपूर रेल्वे आता ‘नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे.
https://prahaar.in/2026/05/16/mumbai-hyderabad-bullet-train-project/
नागपूरहून ही गाडी १६ मे २०२६ पासून नियमितपणे धावण्यास सुरुवात झाली आहे. ही एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ वाजता नागपूर जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
तसेच मडगावहून ही गाडी १७ मे २०२६ पासून नियमित सेवेत दाखल होणार असून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता मडगाव स्थानकावरून सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ९:२५ वाजता ही गाडी नागपूर जंक्शनला पोहोचणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड आणि करमाळी या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विदर्भ आणि कोकण यांच्यातील प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.</description>
      </item><item>
      <title>Gig Workers Strike : इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी संप; स्विगी, ओला-उबर, झेप्टोसह अनेक ॲप-आधारित सेवा आज ठप्प!</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/nationwide-strike-against-fuel-price-hike-many-app-based-services-including-swiggy-ola-uber-zepto-shut-down-today/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/nationwide-strike-against-fuel-price-hike-many-app-based-services-including-swiggy-ola-uber-zepto-shut-down-today/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 08:29:53 -0400</pubDate>
      <description>मुंबई : देशभरातील गिग वर्कर्सनी आज, १६ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून त्याचा परिणाम अनेक लोकप्रिय ॲप-आधारित सेवांवर होणार आहे. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, ओला, उबर, रॅपिडोसह अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी सेवांमध्ये काम करणारे लाखो कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे आर्थिक ताण वाढल्याचा दावा करत गिग-प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनने हा संप पुकारला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/mumbai-hyderabad-bullet-train-project/
LPG, CNG, दूध तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गिग वर्कर्समध्ये नाराजी आहे. विशेषतः पेट्रोल-डिझेलच्या दरात नुकतीच प्रति लिटर तीन रुपयांची वाढ झाल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल १.२ कोटी गिग वर्कर्सनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
युनियनच्या माहितीनुसार, आज १६ मे रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक ॲप-आधारित सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात फूड डिलिव्हरी, ग्रोसरी डिलिव्हरी तसेच कॅब सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑर्डर डिलिव्हरी आणि प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
गिग-प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईमुळे आणि इंधन दरवाढीमुळे गिग वर्कर्सच्या रोजच्या कमाईवर मोठा परिणाम होत आहे. बहुतांश डिलिव्हरी बॉय आणि कॅब चालक हे बाइक किंवा स्कूटरवर अवलंबून असल्याने इंधन खर्चात वाढ झाल्यास त्यांचा नफा कमी होत आहे.
युनियनने सरकार आणि संबंधित कंपन्यांकडे प्रति किलोमीटर सेवा दर वाढवण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढीनंतर किमान २० रुपये प्रति किलोमीटर सेवा दर निश्चित करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच गिग वर्कर्सच्या मानधनासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.</description>
      </item></channel>
    </rss>