<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/implement-a-campaign-to-remove-encroachments-by-prioritizing-forest-conservation-minister-adv-ashish-shelar/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/implement-a-campaign-to-remove-encroachments-by-prioritizing-forest-conservation-minister-adv-ashish-shelar/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 18:55:30 -0400</pubDate>
      <description>मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा तसेच बारव परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
राज्य शासनाने स्थापन केलेल्या बारव संवर्धन समितीची बैठक आज मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह बारव बचाव मोहीमेचे प्रतिनिधी रोहन काळे, अभ्यासक डॉ. पराग सदगीर, डॉ. चंद्रकांत रागिट, सुभाष शिंदे, श्रीनिवास वडगबळाकर, सुभाष शिंदे, श्रीकांत उमरीकर, प्रमोद कुलकर्णी, सौरभ जामकर, अरविंद कडबे, अँड. धायगुडे, भागवत मसणे आदीं या बैठकीला उपस्थितीत होते.बैठकीत बारव संवर्धनाच्या कामात येणाऱ्या अडचणी, आवश्यक उपाययोजना तसेच शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.
https://prahaar.in/2026/05/16/state-government-in-action-mode-after-corporate-jihad-in-nashik/
यावेळी मंत्री ॲड.शेलार यांनी बारव संवर्धनासाठी कार्यपद्धती निश्चित करणारे परिपत्रक जारी करण्याच्या सूचना दिल्या. समिती सदस्यांचा सहभाग, जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय, जिल्हा नियोजन निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पुरातत्व संवर्धनाचे निकष पाळणे, समितीच्या नियमित बैठकींचे वेळापत्रक निश्चित करणे आदी बाबींवर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.तसेच बारव संवर्धनासाठी कार्यरत संस्था, अभ्यासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी घटक यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळा व शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.राज्य शासनाच्या ‘मित्रा’ संस्थेमार्फत जागतिक बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून बारव संवर्धनासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.</description>
      </item><item>
      <title>Sunil Narine : जीटीविरुद्ध सुनील नरेन ऐतिहासिक रेकॉर्डच्या उंबरठ्यावर ; २०० सामने खेळणारा पहिला विदेशी!</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/sunil-narine-sunil-narine-on-the-verge-of-a-historic-record-against-gt-first-foreigner-to-play-200-matches/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/sunil-narine-sunil-narine-on-the-verge-of-a-historic-record-against-gt-first-foreigner-to-play-200-matches/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 18:28:33 -0400</pubDate>
      <description>IPL 2026 : आयपीएलमध्ये आज एक मोठा इतिहास घडणार आहे. आयपीएलमध्ये आज १६ मे रोजी कोतकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्सची लढत होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात कोलकाताकडून सुनील नरेन नवा इतिहास रचणार आहे. हा सामना त्याच्या आयपीएल करियरमधील २०० वा सामना ठरणार आहे. तो २०० सामना खेळणारा पहिला परदेशी खेळाडू बनणार आहे. त्याने २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तसेच त्याने मागील १५ वर्षांत कोलकातासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत १९९ सामन्यांमध्ये ६.७९ च्या इकॉनॉमी रेटने २०३ विकेट्स घेतल्या आहेत. इतक्या मोठ्या करियरमध्येही त्याचा इकॉनॉमी रेट कधीच सातच्या पुढे गेला नाही.

200 सामने खेळणारा पहिला विदेशी

सुनील नरेनपूर्वी आयपीएलमध्ये २०० सामने खेळण्याचा पराक्रम १२ भारतीय खेळाडूंनी केला आहे. मात्र विदेशी खेळाडूंमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे.

https://prahaar.in/2026/05/16/belgium-national-football-team-belgiums-world-cup-squad-announced-kevin-d-bruyne-named-captain-openda-out-of-the-team/

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावावर आहे. दोघांनीही आतापर्यंत २७९ सामने खेळले आहेत. यापूर्वी हा विक्रम चेन्नईच्या धोनीच्या नावावर होता,. धोनीने २७८ सामने खेळले आहेत. मात्र या हंगामात त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू:

२७९ – विराट कोहली

२७९ – रोहित शर्मा

२७८ – एमएस धोनी

२६५ – रवींद्र जडेजा

२५७ – दिनेश कार्तिक

२२२ – शिखर धवन

२२१ – रविचंद्रन अश्विन

२०९ – अजिंक्य रहाणे

२०५ – सुरेश रैना

२०५ – रॉबिन उथप्पा

२०४ – अंबाती रायुडू

२०२ – भुवनेश्वर कुमार

१९९ – सुनील नरेन</description>
      </item><item>
      <title>Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/belgium-national-football-team-belgiums-world-cup-squad-announced-kevin-d-bruyne-named-captain-openda-out-of-the-team/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/belgium-national-football-team-belgiums-world-cup-squad-announced-kevin-d-bruyne-named-captain-openda-out-of-the-team/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 18:24:21 -0400</pubDate>
      <description>आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी मिडफिल्डर केविन डी. ब्रुयन संघाचे नेतृत्व करताना दिसेल तर गोलकीपर थिबो कोर्टुओ व्हाईस कॅप्टन पदाची जबाबदारी हाताळेल. वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात १२ जूनपासून होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळला जाणार आहे. बेल्जियम वर्ल्ड कपच्या ग्रुप-जी मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इजिप्त, इराण आणि न्यूझीलंड संघाचा स़मावेश आहे. बेल्जियम ग्रुपमधील सर्व सामने जिंकेल असे अनेकांचे मत आहे. संघाचा पहिला सामना १६ जूनला इजिप्तविरुद्ध होणार आहे.

नागरिकता स्पॅनिश पण वर्ल्ड कप बेल्जियमसाठी खेळणार
लिलेचा २१ वर्षीय खेळाडू मटियास फॉर्नांडीज-पार्डो याला बेल्जियम संघात संधी देण्यात आली आहे. हा संघात फॉरवर्ड म्हणून खेळणार आहे. नुकतीच मटियासने स्पॅनिश नागरिकता मिळवली आहे. मात्र स्पॅनिश संघासाठी न खेळता तो बेल्जियमसाठी वर्ल्ड कप पदार्पण करणार आहे. थॉमस म्यूनिएर आणि नाथन न्गोय यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे तो बेल्जियम संघासाठी खेळत आहे असं बोललं जात आहे. प्रशिक्षक रूडी गार्सिया यांनीही या युवा खेळाडूवर विश्वास दाखवला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/thailand-open-2026-satwik-chirag-in-the-final-indian-pair-makes-a-brilliant-comeback-in-the-semifinals/
ओपेडा संघातून बाहेर
गेल्या काही हंगामापासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या युव्हेंटसचा स्ट्रायकर लोइस ओपेंडाला यावेळी वर्ल्ड कप संघात संधी मिळाली नाही. इंग्लिश क्लब लीड्स युनायटेडने त्याला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. खराब फॉर्ममुळे त्याला २६ खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले नाही. तसेच, गोलकीपर मॅट सेल्सलाही यावेळी संघात संधी मिळाली नाही.बेल्जियम संघाने आतापर्यंत १३ वेळा वर्ल्ड कप मध्ये भाग घेतला आहे. २०१८ साली बेल्जियमने वर्ल्ड कपमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.




&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by Belgian Red Devils (@belgianreddevils)



वर्ल्ड कप २०२६ साठी बेल्जियमचा संघ खालीलप्रमाणे आहे
गोलकीपर: थिबो कोर्टुआ, सेने लैमेंस, माइक पेंडर्स.
डिफेंडर: टिमोथी कास्टैग्ने, जेनो डेबास्ट, मॅक्सिम डी क्यूपर, कोनी डी विंटर, ब्रँडन मेचेले, थॉमस म्यूनिएर, नाथन न्गोय, जोकिन सीस, आर्थर थिएट.
मिडफील्डर: केविन डि ब्रुइन, अमादू ओनाना, निकोलस रास्किन, युरी टिलेमैंस, हंस वानाकेन, एक्सेल विटसेल.
फॉरवर्ड: चार्ल्स डी केटलेरे, जेरेमी डोकू, मटियास फर्नांडीज-पार्डो, रोमेलु लुकाकू, डोडी लुकेबाकियो, डिएगो मोरेरा, अलेक्सिस सेलेमेकर्स, लिएंड्रो ट्रॉसार्ड
</description>
      </item><item>
      <title>NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/neet-ug-2026-paper-leak-cbi-arrests-nta-biology-lecturer-accused-of-accessing-papers-coaching-students-in-pune-questions-allegedly-matched-exam/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/neet-ug-2026-paper-leak-cbi-arrests-nta-biology-lecturer-accused-of-accessing-papers-coaching-students-in-pune-questions-allegedly-matched-exam/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 17:17:51 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या पेपरफुटी प्रकरणात आता सीबीआयने अत्यंत महत्त्वाची कारवाई करत शनिवारी एका बायोलॉजीच्या (जीवशास्त्र) प्राध्यापिकेला बेड्या ठोकल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अत्यंत गोपनीय समितीत या प्राध्यापिकेचा समावेश होता. गेल्या ३ मे रोजी ही वादग्रस्त परीक्षा पार पडली होती. या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि इतर काही आरोपींची सीबीआयने कसून चौकशी केली होती. या सखोल चौकशीतून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारेच तपास यंत्रणेने या प्राध्यापिकेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
https://prahaar.in/2026/05/16/state-government-in-action-mode-after-corporate-jihad-in-nashik/
विषय तज्ज्ञ म्हणून होती नियुक्ती
मनीषा मांढरे असे या अटक करण्यात आलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तिची प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर तिला अधिकृतरीत्या अटक करण्यात आली. एनटीएने तिची 'विषय तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती केली होती आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत तिचा थेट व महत्त्वाचा सहभाग होता, अशी धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लाखो रुपयांच्या बदल्यात 'स्पेशल क्लास'
'बॉटनी' (वनस्पतीशास्त्र) आणि 'झुऑलॉजी' (प्राणीशास्त्र) या विषयांच्या प्रश्नपत्रिका हाताळण्याचे संपूर्ण अधिकार मनीषा मांढरेकडे होते. या अधिकारांचा तिने गैरफायदा घेतला. १४ मे रोजी अटक करण्यात आलेली दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मध्यस्थीने मांढरेने एप्रिल २०२६ मध्ये काही विद्यार्थ्यांशी संधान बांधले. त्यानंतर या निवडक विद्यार्थ्यांसाठी पुण्यात स्वतःच्या घरी 'खासगी शिकवणी' सुरू केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मांढरे हिने लाखो रुपये उकळून या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्न आणि त्यांची उत्तरे डिक्टेट (लिहून देणे) केली होती. ३ मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेत विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये लिहून दिलेले हेच प्रश्न जसेच्या तसे आल्याचे निष्पन्न झाले. या पेपरफुटीचे पुरावे समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आणि अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

लातूर कनेक्शन आणि पी. व्ही. कुलकर्णीला अटक
तत्पूर्वी, याच पेपरफुटी रॅकेटमधील रसायनशास्त्राचा (केमिस्ट्री) तज्ज्ञ असणाऱ्या प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने शुक्रवारी लातूरमधून अटक केली होती. कुलकर्णी हा गेली अनेक वर्षे एनटीएच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या पॅनेलवर सक्रिय होता. कुलकर्णीनेही आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वतःच्या घरी काही विद्यार्थ्यांसाठी 'स्पेशल क्लास' घेतला होता. सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे हिच्याच माध्यमातून कुलकर्णीने विद्यार्थ्यांची जमवाजमव केली होती आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली होती. या खासगी क्लासेसमध्ये कुलकर्णीने विद्यार्थ्यांना जे प्रश्न, त्यांचे पर्याय आणि उत्तरे लिहून दिली होती, ती ३ मे रोजीच्या 'नीट' प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळली आहेत. विद्यार्थ्यांनी यासाठी अनेक लाख रुपये मोजले होते.

सीबीआयकडून विशेष पथकांची स्थापना
या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेत सीबीआयने रीतसर प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला आहे. तसेच, या मोठ्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि पुढील सखोल तपासासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. देशभरातील ५५१ शहरांसह परदेशातील १४ केंद्रांवर ही अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून तब्बल २३ लाख उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी या रॅकेटने खेळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एनटीएने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ३ मे रोजी परीक्षा पार पडल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच ७ मे रोजी संध्याकाळी त्यांच्याकडे या गैरव्यवहाराची पहिली माहिती आली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पुढील 'स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी' दुसऱ्याच दिवशी (८ मे) सकाळी हा अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आला होता.</description>
      </item><item>
      <title>&#039;पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?&#039;</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/pakistan-should-decide-whether-they-want-to-be-part-of-geography-or-history/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/pakistan-should-decide-whether-they-want-to-be-part-of-geography-or-history/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 17:10:42 -0400</pubDate>
      <description>नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याना पाकिस्तानला जबर दणका दिला. नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानचे दहशतवाद्यांसाठीचे तळ नष्ट केले. तसेच पाकिस्तानमध्ये सुरू असलेली प्रमुख दहशतवाद्यांची प्रमुख प्रशिक्षण केंद्र पण नष्ट केली. यानंतरही पाकिस्तान पूर्ण सुधारलेला नाही. गुप्तचरांच्या ताज्या अहवालानुसार पाकिस्तान पुन्हा एकदा भारताची कुरापत काढण्यासाठी दहशतवाद्यांना बळ पुरवण्याचे नियोजन करत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एका विशेष कार्यक्रमात भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा, अशा सूचक शब्दात भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
राजधानी नवी दिल्लीत मानेकशॉ सेंटरमध्ये एका संवादात्मक सत्रादरम्यान, गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरला कारणीभूत ठरलेली परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास भारतीय लष्कर कसा प्रतिसाद देईल, या प्रश्नाला भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सूचक शब्दात उत्तर दिले. मी याआधी जे म्हटले ते तुम्ही ऐकलेच असेल, असे सांगत लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात कारवाया करणे सुरूच ठेवले, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा, असे लष्करप्रमुख म्हणाले.देशाने आणि लष्कराने काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. यानंतर सेना संवाद या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी पाकिस्ताना सूचक शब्दात इशारा दिला.
https://prahaar.in/2026/05/16/could-feel-spirit-of-maharashtra-rajasthan-up-in-hague-pm-modi-lauds-indian-diasporas-grand-gesture-in-netherlands-watch/
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला होता. या घटनेनंतर दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी भारताने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारताच्या सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई केली. दहशतवादी तळ आणि दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्र नष्ट करण्यात आली. नंतर पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानने गंभीर चूक करताच भारताने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या हवाई तळांवर भेदक हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या काही हवई तळांचे प्रचंड नुकसान झाले.अवघ्या ८८ तासांत भारताने पाकिस्तानला खिळखिळे करून टाकले. अखेर पाकिस्तानने भारताला फोन केला आणि युद्धबंदीची विनंती केली. यानंतर भारताने पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आणि १० मे २०२५ रोजी लष्करी संघर्ष स्थगित झाला.</description>
      </item><item>
      <title>नाशिकमधील &#039;कॉर्पोरेट जिहाद&#039;नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/state-government-in-action-mode-after-corporate-jihad-in-nashik/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/state-government-in-action-mode-after-corporate-jihad-in-nashik/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:56:27 -0400</pubDate>
      <description> सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी
मुंबई : नाशिकमधील एका नामांकित कंपनीत उघडकीस आलेल्या 'कॉर्पोरेट जिहाद'चे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. 'कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३' अर्थात 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात विभागाने एक परिपत्रक जारी केले असून, कंपन्यांची झाडाझडती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत.
नाशिकच्या घटनेवरून धडा घेत, राज्य शासनाने अंतर्गत सुरक्षा यंत्रणा नसलेल्या कंपन्यांवर बडगा उगारण्याचे ठरवले आहे. नव्या आदेशानुसार, राज्यातील ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी 'अंतर्गत तक्रार निवारण समिती' स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या समितीची रचना नावापुरती असू नये, म्हणून त्यात किमान ५० टक्के महिला सदस्य असणे, वरिष्ठ महिला कर्मचारीच अध्यक्ष असणे आणि बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) प्रतिनिधीचा समावेश असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/05/16/caught-on-cam-armed-robbery-at-nashik-jewellery-shop-brave-woman-shop-owner-tackles-thieves-2-held/
७ दिवसांत कारवाई होणार
पीडित महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी सरकारने केली आहे. महिलांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी ई-मेल, लेखी अर्ज तसेच केंद्र सरकारचे 'शी-बॉक्स' पोर्टल यांसारखी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या ७ दिवसांच्या आत कायदेशीर कार्यवाही सुरू करणे कंपन्यांना बंधनकारक असेल. संपूर्ण चौकशीदरम्यान गोपनीयता राखणे तसेच पीडित महिलेला मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घेत आवश्यकतेनुसार अंतरिम दिलासा (सुटी किंवा विभाग बदल) देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/
३१ मुद्द्यांची 'विशेष तपासणी सूची
महिला व बाल विकास विभागाने कंपन्यांच्या तपासणीसाठी एक विशेष '३१ मुद्द्यांची तपासणी सूची' (चेकलिस्ट) तयार केली आहे. यामध्ये कंपनीचे अधिकृत पॉश धोरण, कर्मचाऱ्यांसाठी राबवले गेलेले जनजागृती कार्यक्रम, महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल वेळेत सादर केला की नाही, कार्यस्थळावरील सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था, तसेच 'शी-बॉक्स' पोर्टलवरील अधिकृत नोंदणी यांसारख्या ३१ कठोर निकषांवर प्रत्येक आस्थापनाची पडताळणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांचे विशेष पथक कोणत्याही क्षणी कंपन्यांमध्ये जाऊन ही तपासणी करू शकते.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-in-andaman-2026-monsoon-arrives-in-andamans-when-will-it-hit-the-konkan-coast/
त्रुटी आढळल्यास फौजदारी कारवाई
नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संताप पाहता, सरकारने अंमलबजावणीत कोणतीही कसर सोडलेली नाही. तपासणीदरम्यान ज्या कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये त्रुटी आढळतील, किंवा अंतर्गत समिती कागदावरच असल्याचे सिद्ध होईल, अशा आस्थापनांवर 'पॉश ऍक्ट २०१३' च्या कलम २६ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे व्यावसायिक परवाने रद्द करण्यासोबतच जबाबदार व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील.</description>
      </item><item>
      <title>Thailand Open 2026 : सात्विक–चिराग फायनलमध्ये! उपांत्य फेरीत भारतीय जोडीचे शानदार कमबॅक</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/thailand-open-2026-satwik-chirag-in-the-final-indian-pair-makes-a-brilliant-comeback-in-the-semifinals/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/thailand-open-2026-satwik-chirag-in-the-final-indian-pair-makes-a-brilliant-comeback-in-the-semifinals/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:23:39 -0400</pubDate>
      <description>Thailand Open २०२६ मधून भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवला आहे आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या हंगामात प्रथमच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation) वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय जोडी मैदानात उतरणार आहे.

उपांत्य फेरीत रोमांचक विजय
उपांत्य फेरीत सात्विक–चिराग यांनी मलेशियाच्या गोह से फी आणि नूर इज्जुद्दीन रुमसानी या जोडीवर १८-२१, २२-२०, २१-१२ असा थरारक विजय मिळवला.दुसऱ्या गेममध्ये त्यांनी तणावपूर्ण परिस्थितीत दोन गेम पॉइंट्स वाचवत २२-२० ने गेम जिंकला. त्यानंतर निर्णायक गेममध्ये आक्रमक स्मॅश, अचूक नेट प्ले आणि उत्तम समन्वयाच्या जोरावर भारतीय जोडीने २१-१२ ने सामना आपल्या नावावर केला. हा सामना तब्बल १ तास २२ मिनिटे चालला.


TOYOTA Thailand Open 2026
MD - SF
🇮🇳Satwiksairaj RANKIREDDY🏅
19 22 21 🇮🇳Chirag SHETTY🏅
🇲🇾GOH Sze Fei
21 20 16 🇲🇾Nur IZZUDDIN

🕚 in 82 minutes
— BWFScore (@BWFScore) May 16, 2026

क्वार्टर फायनलमध्ये जपानी जोडीवर सहज विजय
याआधी उपांत्यपूर्व फेरीत सात्विक–चिराग यांनी जपानच्या Takumi Nomura आणि Yuichi Shimogami या जोडीचा २१-१२, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्यात भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच वर्चस्व दाखवले होते. पहिल्याच गेममध्ये त्यांनी १०-० अशी मोठी आघाडी घेत सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता.
https://prahaar.in/2026/05/16/kkr-vs-gt-do-or-die-situation-for-kkr-gujarat-target-top-two-high-voltage-match-at-eden-gardens-today/
अंतिम फेरीत कोणाशी भिडणार?
सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली सात्विक–चिराग जोडी अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या Leo Rolly Carnando – Daniel Marthin किंवा चीनच्या He Ji Ting – Ren Xiang Yu या जोडींपैकी एका जोडीशी सामना करणार आहे. विशेष म्हणजे, सात्विक–चिराग यांनी शेवटचा अंतिम सामना २०२५ मध्ये China Masters मध्ये खेळला होता. २०२४ मध्ये Thailand Open जिंकल्यानंतर ते पुन्हा एकदा विजेतेपदाच्या जवळ पोहोचले आहेत.

इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी
या स्पर्धेत इतर भारतीय खेळाडूंना मात्र यश मिळाले नाही. P. V. Sindhu हिला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची कडून १९-२१, २१-१८, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याचा थायलंडच्या कुनलावुत विटिडसार्नने १९-२१, १६-२१ असा पराभव केला.</description>
      </item><item>
      <title>Amruta Fadanvis : रेड कार्पेटची वाट पाहता येईल, पण माझा देश नेहमीच प्रथम!&quot; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांचा &#039;कान्स&#039; दौरा रद्द</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/red-carpet-can-wait-nation-comes-first-maha-cm-devendra-fadnavis-wife-amruta-cancels-cannes-visit-amid-pm-modis-appeal-video/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/red-carpet-can-wait-nation-comes-first-maha-cm-devendra-fadnavis-wife-amruta-cancels-cannes-visit-amid-pm-modis-appeal-video/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:19:54 -0400</pubDate>
      <description>मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची बचत करावी आणि परकीय चलनावर ताण येऊ नये म्हणून सोन्याची खरेदी मर्यादित ठेवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले होते. या राष्ट्रीय सादेला त्वरित आणि सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'चे (Cannes Film Festival) विशेष आमंत्रण हाती असूनही, केवळ देशाच्या हिताचा विचार करून त्यांनी आपला हा नियोजित दौरा शनिवारी रद्द केला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/could-feel-spirit-of-maharashtra-rajasthan-up-in-hague-pm-modi-lauds-indian-diasporas-grand-gesture-in-netherlands-watch/
आंतरराष्ट्रीय मंचावर 'पैठणी'च्या सादरीकरणाची होती तयारी

My first step towards the austerity measures envisioned by Hon’ble PM Narendra Modi ji: putting nation first.
I was honoured with an invitation to represent Maharashtra, its culture and our glorious handloom heritage at the prestigious Cannes Film Festival. A magnificent Paithani… pic.twitter.com/MogGE2pilD
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2026

आपल्या समाजमाध्यमांवरील एका सविस्तर निवेदनाद्वारे अमृता फडणवीस यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. कान्स चित्रपट महोत्सवाच्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वारसा सादर करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली होती. महाराष्ट्राची ओळख आणि शान असलेली येवल्याची अस्सल पैठणी या महोत्सवासाठी खास डिझाईन करण्यात आली होती. स्थानिक कारागिरांनी सलग तीन महिने रात्रंदिवस एक करून ही अद्वितीय कलाकृती केवळ याच सोहळ्यासाठी हाताने विणली होती. या तयारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ही पैठणी केवळ एक वस्त्र नसून ती महाराष्ट्राची कलाकुसर, परंपरा आणि कलात्मक वारशाचे प्रतीक आहे. जगभरातील दिग्गजांसमोर राज्याचे हे वैभव मांडण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी साधनसंपत्तीच्या काटेकोर वापरासाठी आणि काटकसरीसाठी देशवासीयांना आवाहन केले, तेव्हा त्यांनी आपले वैयक्तिक स्वप्न बाजूला ठेवले. हा निर्णय भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता, कारण यामागे अनेक कारागीर आणि फॅशन डिझायनर्सची कित्येक महिन्यांची मेहनत दडली होती. तरीही, आंतरराष्ट्रीय मंचावरील उपस्थिती आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा 'राष्ट्रहित' आणि 'सामूहिक जबाबदारी' सर्वोच्च असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

कारागिरांचे मानले आभार
आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना, अमृता फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेत जोडल्या गेलेल्या सर्व कारागिरांचे, डिझायनर्सचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या या अथक परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी आपल्या संदेशाचा शेवट एका अत्यंत मार्मिक आणि प्रेरणादायी वाक्याने केला. त्या म्हणाल्या, "रेड कार्पेटला थोडी वाट पाहता येईल, पण माझा देश माझ्यासाठी नेहमीच प्रथम स्थानावर आहे."

काय होते पंतप्रधान मोदींचे आवाहन?
पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. याचा थेट फटका जागतिक पुरवठा साखळीला बसत आहे. या आर्थिक संकटाची झळ देशाला बसू नये आणि परकीय चलनाचा साठा सुरक्षित राहावा, यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यांनी जनतेला खाजगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे, अनावश्यक इंधन खर्च टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. याच राष्ट्रीय आवाहनाला पाठिंबा दर्शवत अमृता फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.</description>
      </item><item>
      <title>KKR vs GT : KKR साठी &#039;डू ऑर डाय&#039; स्थिती ! गुजरातचे लक्ष्य टॉप टू, आज ईडन गार्डन्सवर हाय-व्होल्टेज सामना</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/kkr-vs-gt-do-or-die-situation-for-kkr-gujarat-target-top-two-high-voltage-match-at-eden-gardens-today/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/kkr-vs-gt-do-or-die-situation-for-kkr-gujarat-target-top-two-high-voltage-match-at-eden-gardens-today/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:19:20 -0400</pubDate>
      <description>IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ६० वा सामना रंगणार असून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders / KKR) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans / GT) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर जोरदार लढत होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केकेआरला हा सामना जिंकणे आवश्यक आहे तर गुजरातचे लक्ष्य गुणतालिकेतील दुसरे स्थान कायम राखण्यासाठी विजय मिळवणे हा असेल.

गुजरात आधीच प्लेऑफमध्ये
शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने १२ पैकी ८ सामने जिंकत १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचे लक्ष्य गुणतालिकेतील दुसरे स्थान कायम राखणे हेच आहे.

केकेआरसाठी करो किंवा मरो
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) हंगामाची सुरुवात सलग पाच पराभवांनी केली होती. नंतर संघाने पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले.मागील सामन्यात आरसीबी विरुद्ध पराभव झाल्याने केकेआरची विजयी मालिका खंडित झाली. त्या सामन्यात विराटच्या शतकी खेळीने सामना फिरवला होता.सध्या केकेआरने ११ पैकी ४ सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता उरलेले तीनही सामने जिंकले तरच त्यांना जास्तीत जास्त १५ गुण मिळू शकतात. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागू शकते.केकेआरसाठी युवा फलंदाज आंगीकृष रघुवंशीने ११ सामन्यांत ३४० धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत कार्तिक त्यागीने १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत.गुजरातसाठी साई सुदर्शनने १२ सामन्यांत ५०१ धावा केल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने २१ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड
केकेआर आणि जीटी या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. त्यापैकी गुजरातने ४ सामने जिंकले आहेत, तर केकेआरला फक्त एक विजय मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यातही गुजरातने केकेआरवर मात केली होती.
https://prahaar.in/2026/05/15/rachin-ravindra-big-blow-to-kkr-star-player-out-of-the-season-without-playing-a-single-match/
पीच रिपोर्ट
ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणतः फिरकीपटूंना मदत करणारी मानली जाते. मात्र येथे मोठ्या धावसंख्या देखील पाहायला मिळतात. या मैदानावर आतापर्यंत आयपीएलचे १०४ सामने झाले असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४३ वेळा विजय मिळवला आहे, तर ५९ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-१२
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशिद खान, अर्शद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
कोलकाता: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा, मनीष पांडे.</description>
      </item><item>
      <title>Amruta Fadnavis:  इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार</title>
      <link>https://prahaar.in/2026/05/16/amruta-fadnavis-amruta-fadnavis-initiative-for-fuel-conservation/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/05/16/amruta-fadnavis-amruta-fadnavis-initiative-for-fuel-conservation/</guid>
      <pubDate>Sat, 16 May 2026 15:07:29 -0400</pubDate>
      <description> कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फ्रान्समधील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चा आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. "रेड कार्पेटवरील फॅशन आणि संधी पुन्हा मिळू शकते, परंतु देशहित आणि पंतप्रधानांचे आवाहन सर्वोच्च आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कान्स चित्रपट महोत्सवासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि विशेषतः पारंपरिक हातमाग परंपरा जगासमोर मांडण्यासाठी अमृता फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी त्यांनी विशेष तयारीही केली होती. नाशिकमधील येवला येथील स्थानिक कारागिरांनी अत्यंत कौशल्याने आणि अनेक महिन्यांच्या अहोरात्र मेहनतीने त्यांच्यासाठी एक खास पारंपरिक पैठणी साडी विणली होती. महाराष्ट्राच्या या अस्मितेचे जागतिक मंचावर सादरीकरण होणार असल्याने डिझायनर्स आणि कारागिरांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, देश पातळीवरील इंधन बचतीच्या मोहिमेला बळ देण्यासाठी त्यांनी य
हा दौरा रद्द केला.
https://prahaar.in/2026/05/16/remove-ola-uber-and-rapido-apps-from-play-store/
रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!
दौरा रद्द करण्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, "देशहिताला आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला प्राधान्य देणे हीच प्रत्येक नागरिकाची खरी जबाबदारी आहे. कान्ससारख्या जागतिक मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा नक्कीच अभिमानाचा क्षण होता. मात्र, पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थिती पाहता इंधन बचत आणि अनावश्यक परदेशी दौरे टाळण्याचे जे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देणे मी माझे कर्तव्य समजते. रेड कार्पेटची संधी भविष्यात पुन्हा मिळू शकते, पण देशाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.</description>
      </item></channel>
    </rss>