<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="no"?><rss xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><language>en-us</language><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</itunes:subtitle><item>
      <title>Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/vijay-singhal-appointed-as-special-officer-on-duty-for-the-dharavi-redevelopment-project/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/vijay-singhal-appointed-as-special-officer-on-duty-for-the-dharavi-redevelopment-project/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 21:15:43 -0400</pubDate>
      <description> राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात, सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, दिपेंद्र सिंह कुशवाह यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आहे. मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर वर्णी लागली आहे.
http://prahaar.in/2026/06/16/central-government-sanctions-%E2%82%B9733-28-crore-for-the-modernization-of-the-maharashtra-police-force/
विजय सिंघल यांच्या जागी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी सध्या एमएमआरडीच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी असलेल्या अश्विन मुद्गल यांची करण्यात आली आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या पी. वेलरासू यांची सचिव (वने), महसूल व वन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/16/revenue-minister-chandrashekhar-bawankule-2-5-acres-of-land-to-be-given-to-womens-self-help-groups/
डॉ. कादंबरी बलकवडे यांची उद्योग संचालनालयात विकास आयु्क्त (उद्योग) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील संजय काटकर यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्त (कुटुंब कल्याण) पदी नियुक्ती झाली आहे. तर केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन राज्य सरकारकडे रूजू झालेल्या प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे</description>
      </item><item>
      <title>Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/central-government-sanctions-%e2%82%b9733-28-crore-for-the-modernization-of-the-maharashtra-police-force/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/central-government-sanctions-%e2%82%b9733-28-crore-for-the-modernization-of-the-maharashtra-police-force/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 20:58:46 -0400</pubDate>
      <description>सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे आभार
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने मंगळवारी ७३३.२८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) आव्हान आणि सागरी सुरक्षेचा वाढता विस्तार लक्षात घेता, महाराष्ट्र पोलीस दलाला अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.
https://prahaar.in/2026/06/16/special-courses-in-six-state-itis-to-develop-skilled-manpower-for-the-port-sector-minister-nitesh-rane/
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या एकूण ७३३.२८ कोटी रुपयांच्या खर्चात ६० टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलणार असून, उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. हे लक्षात घेऊन या निधीचा मोठा हिस्सा पोलीस दलात 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केला जाईल. याशिवाय, मुंबईसह महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सागरी सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जाईल, तसेच तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ड्रग्जविरोधी मोहीम अधिक बळकट केली जाणार आहे. त्याशिवाय आधुनिक शस्त्रे आणि अत्याधुनिक वाहने या निधीतून खरेदी केली जातील.</description>
      </item><item>
      <title>Revenue Minister Chandrashekhar Bawankule : महिला बचत गटांना देणार अडीच एकर जमीन</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/revenue-minister-chandrashekhar-bawankule-2-5-acres-of-land-to-be-given-to-womens-self-help-groups/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/revenue-minister-chandrashekhar-bawankule-2-5-acres-of-land-to-be-given-to-womens-self-help-groups/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 20:28:15 -0400</pubDate>
      <description> महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; पडीक जमिनी वापरखाली आणण्यासाठी निर्णय
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सरकारच्या निश्चित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला बचत गटांना व्यवसाय आणि शेतीसाठी सरकारकडून तब्बल एक हेक्टर म्हणजेच अडीच एकर जमीन देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली आहे. सरकारच्या या धोरणामुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काची रोजगार निर्मिती उपलब्ध होणार असून, महसूल विभागाच्या ताब्यातील हजारो हेक्टर पडीक जमिनींचा प्रश्नही निकाली निघणार आहे. या जमिनींवर उत्पादक उपक्रम सुरू करण्यासाठी सरकारकडून १ लाख रुपयांचे आर्थिक अनुदानही दिले जाणार आहे.

https://prahaar.in/2026/06/16/take-immediate-action-regarding-the-issues-faced-by-fishermen-in-raigad-district/
ग्रामीण अर्थकारणाला नवी गती देणाऱ्या या योजनेमुळे महिला बचत गटांचे उत्पन्न वाढवण्यासोबतच शासकीय मालमत्तांचे रक्षण करण्याचे दुहेरी उद्दिष्ट सरकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे. शासनाच्या या नव्या धोरणानुसार, मोकळी जमीन मिळण्यासोबतच महिला बचत गटांना किंवा महिला सहकारी संस्थांना व्यवसाय उभा करण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. या आर्थिक मदतीसाठी जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीचा प्रामुख्याने वापर केला जाईल. विशेष म्हणजे, ही जमीन महिला बचत गटांना कायमस्वरूपी मालकी हक्काने दिली जाणार नसून, ती पाच वर्षांच्या लीजवर (भाडेपट्ट्याने) उपलब्ध करून दिली जाणार आहे.

https://prahaar.in/2026/06/16/special-courses-in-six-state-itis-to-develop-skilled-manpower-for-the-port-sector-minister-nitesh-rane/
वार्षिक ४ ते ५ लाखांच्या उत्पन्नाचा अंदाज
या अडीच एकर जमिनीवर महिला बचत गटांना चारा लागवड, नेपियर गवताची शेती, बांबूची लागवड किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट (कुरण विकास) यांसारखे उत्पन्न देणारे शेतीपूरक उपक्रम राबवता येणार आहेत. या जमिनीवर योग्य प्रकारे लागवड केल्यास महिला बचत गटांना वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा दावा महसूल विभागाने केला आहे. सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, या जमिनीतून मिळणाऱ्या संपूर्ण नफ्यावर आणि उत्पन्नावर केवळ संबंधित महिला बचत गटाचाच पूर्ण अधिकार असेल; त्यावर सरकार कोणताही आर्थिक दावा करणार नाही.

https://prahaar.in/2026/06/16/has-operation-tiger-stalled-due-to-the-insistence-on-a-ministerial-post/
कायदेशीर अतिक्रमणांना बसेल आळा
सध्या महसूल विभागाकडे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शासकीय जमिनी पडीक अवस्थेत आहेत, ज्यांचा नजीकच्या भविष्यात कोणत्याही शासकीय प्रकल्पासाठी वापर होण्याची शक्यता नाही. अशा मोकळ्या आणि पडीक जमिनींवर अनेकदा बेकायदेशीर अतिक्रमणे होतात. सरकारच्या या नव्या योजनेमुळे अशा पडीक जमिनी महिलांच्या कायदेशीर ताब्यात राहतील. परिणामी, एकीकडे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल आणि दुसरीकडे मौल्यवान सरकारी जमिनींचे अतिक्रमणांपासून कायमस्वरूपी संरक्षण होईल.
तहसीलदारांचे नियंत्रण
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाची विशेष मदत घेतली जाणार असून, कृषी विभागाचे तज्ज्ञ महिलांना चारा व बांबू लागवड कशी करावी, उत्पादनाचे योग्य व्यवस्थापन कसे ठेवावे आणि उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ कशी मिळवून द्यावी, याचे तांत्रिक मार्गदर्शन करतील. या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी आणि देखरेखीचे कामकाज स्थानिक तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे.</description>
      </item><item>
      <title>Gadchiroli to Australia : लॉयड्स मेटल्सची चौथी 'ग्लोबल एज्युकेशन' बॅच; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संधी</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/gadchiroli-to-australia-global-education-batch/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/gadchiroli-to-australia-global-education-batch/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 20:20:46 -0400</pubDate>
      <description>गडचिरोली: गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता जागतिक पंख मिळत आहेत. 'लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड' (LMEL) ने त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'ग्लोबल एज्युकेशन प्रोग्राम'च्या चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, याद्वारे गडचिरोलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील नामांकित कर्टिन विद्यापीठात (Curtin University) उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
https://prahaar.in/2026/06/16/special-courses-in-six-state-itis-to-develop-skilled-manpower-for-the-port-sector-minister-nitesh-rane/
काय आहे हा उपक्रम?
लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम श्री. बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत २४ विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील प्रतिभावान तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
https://prahaar.in/2026/06/16/has-operation-tiger-stalled-due-to-the-insistence-on-a-ministerial-post/
अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:


 	
शिक्षण पात्रता: ज्या विद्यार्थ्यांनी बारावी (PCM/PCMB) किंवा विज्ञान शाखेतील पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत, ते या कार्यक्रमासाठी पात्र आहेत.

 	
अर्ज कालावधी: अर्ज प्रक्रिया १३ जून ते २० जून २०२६ या कालावधीत खुली आहे.


https://prahaar.in/2026/06/16/take-immediate-action-regarding-the-issues-faced-by-fishermen-in-raigad-district/

श्री. बी. प्रभाकरन काय म्हणाले?
या उपक्रमाविषयी बोलताना लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले की, “देशातील काही अत्यंत हुशार विद्यार्थी अशा भागांतून येतात जिथे संधींची कमतरता असते. आम्ही केवळ शिक्षणच नाही, तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वासही देत आहोत. जिल्ह्यातील विद्यार्थी आज परदेशात शिक्षण घेऊन स्वतःसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत, हे पाहून खूप अभिमान वाटतो.”
https://prahaar.in/2026/06/16/despite-skipping-the-cabinet-meeting-things-unfolded-against-shambhuraj-desais-wishes/

बदलते गडचिरोली
आर्थिक अडचणींमुळे अनेकदा गडचिरोलीतील हुशार विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, लॉयड्स मेटल्सच्या या पुढाकारामुळे हे 'आर्थिक अंतर' कमी होण्यास मदत झाली आहे. या चौथ्या बॅचच्या घोषणेमुळे गडचिरोलीतील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांना आपल्या करिअरला एक नवी दिशा देण्याची संधी मिळाली आहे.</description>
      </item><item>
      <title>बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/special-courses-in-six-state-itis-to-develop-skilled-manpower-for-the-port-sector-minister-nitesh-rane/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/special-courses-in-six-state-itis-to-develop-skilled-manpower-for-the-port-sector-minister-nitesh-rane/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 20:15:30 -0400</pubDate>
      <description>मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. विद्यमान आयटीआय इमारतींमध्येच विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार असून, अद्ययावत व उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/06/16/take-immediate-action-regarding-the-issues-faced-by-fishermen-in-raigad-district/
राज्यातील बंदरे क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने बंदरे विभागाशी निगडित आयटीआय कौशल्य विकास व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचना जारी करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीत निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सागरी व किनारी भागांमधील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यावर विशेष भर देण्यात आला.

https://prahaar.in/2026/06/16/has-operation-tiger-stalled-due-to-the-insistence-on-a-ministerial-postv/
विशेषतः शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा विचार करून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक युवकांना प्राधान्याने प्रशिक्षण देऊन त्यांना बंदर क्षेत्रातील रोजगारासाठी सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक , राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सहसचिव विकास ढाकणे , कौशल्य विभागाचे सल्लागार चिन्मय शेटे व इंद्रराज राणे ,रूरल एनहान्सर्स ग्रुप चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयडे,वॅगन्स लार्निंग लिमिटेड चे उदय शेट्टी,अश्विन कसलीवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.</description>
      </item><item>
      <title>Operation Tiger : मंत्रिपदाच्या हट्टामुळे अडले 'ऑपरेशन टायगर'?</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/has-operation-tiger-stalled-due-to-the-insistence-on-a-ministerial-post/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/has-operation-tiger-stalled-due-to-the-insistence-on-a-ministerial-post/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 20:06:21 -0400</pubDate>
      <description> ४ खासदार उत्सुक; मराठवाड्यातील 'त्या' नेत्याला लॉटरी लागण्याची शक्यता
मुंबई : उबाठा गटातील अंतर्गत अस्वस्थतेचा फायदा उठवत सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेले 'ऑपरेशन टायगर' आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा आहे. ६ खासदारांचा एक गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, या मोहिमेचे नेतृत्व मराठवाड्यातील एका वरिष्ठ खासदाराकडे असल्याचे समजते. उबाठाला हा मोठा धक्का देण्याच्या बदल्यात मराठवाड्यातील 'त्या' खासदाराला दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या संभाव्य बंडखोर गटातील इतर ४ खासदारही स्वतः मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याने, 'ऑपरेशन टायगर'चे घोडे सध्या दिल्लीतील मंत्रिपदाच्या चढाओढीत अडकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

https://prahaar.in/2026/06/16/leopard-attacks-two-people-in-chinchkhed/
१९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उबाठाचे लोकसभेतील ९ पैकी तब्बल ६ खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, याच नाराजीतून हा नवा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरू आहे. या संभाव्य बंडाची कुणकुण लागताच पक्षनेतृत्वाने 'मातोश्री'वर सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला केवळ चारच खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित ५ खासदारांनी बैठकीला दांडी मारली होती. खासदार संजय राऊत यांनी हे ५ खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा केला असला, तरी या अनुपस्थितीने पक्षातील नाराजी चव्हाट्यावर आणली आहे. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार या बैठकीला अनुपस्थित होते. यातील यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी तर दिल्ली गाठत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

https://prahaar.in/2026/06/16/a-drone-and-robotics-revolution-now-in-maharashtra/
पक्षांतर बंदी कायद्यानुसार लोकसभेत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदार फुटणे आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील एका वरिष्ठ खासदाराच्या नेतृत्वाखाली हा ६ खासदारांचा गट तयार झाला असून त्यांची दिल्लीत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठकही पार पडली आहे. हा गट थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटाचा मान्यता प्रस्ताव देण्याच्या तयारीत आहे.

https://prahaar.in/2026/06/16/despite-skipping-the-cabinet-meeting-things-unfolded-against-shambhuraj-desais-wishes/

७ खासदार आणि १६ आमदार संपर्कात - कृपाल तुमाने
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी खळबळजनक दावा केला आहे. "महाविकास आघाडीतील आणि प्रामुख्याने उबाठा गटातील ७ विद्यमान खासदार आणि विविध पक्षांचे १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान हे मोठे चेहरे जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश करतील," असेही ते म्हणाले. आमदार दीपक केसरकर यांनीही "येत्या काळात आमची शिवसेना आणखी मजबूत होणार," असे सांगत तुमानेंच्या विधानाला दुजोरा दिला आहे.</description>
      </item><item>
      <title>Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/take-immediate-action-regarding-the-issues-faced-by-fishermen-in-raigad-district/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/take-immediate-action-regarding-the-issues-faced-by-fishermen-in-raigad-district/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 19:59:41 -0400</pubDate>
      <description>मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात घेतला.
यावेळी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
https://prahaar.in/2026/06/16/emphasis-on-accelerating-development-works-of-the-fisheries-and-ports-department/
मौजे नवेदार-नवगाव येथील मत्स्य जेट्टी तसेच अलिबाग येथील रेवस-मांडवा प्रवासी जेट्टीच्या प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांशी संबंधित विविध बाबींची सद्यस्थिती तपासून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याबाबतही मंत्री राणे यांनी सूचना केल्या.
बैठकीस आमदार महेंद्र दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप,महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.</description>
      </item><item>
      <title>Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारूनही शंभूराज देसाईंच्या मनाविरुद्ध घडले</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/despite-skipping-the-cabinet-meeting-things-unfolded-against-shambhuraj-desais-wishes/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/despite-skipping-the-cabinet-meeting-things-unfolded-against-shambhuraj-desais-wishes/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 19:57:09 -0400</pubDate>
      <description> सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक; महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश
मुंबई : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीमध्ये उफाळून आलेला अंतर्गत कलह मंत्रालयापर्यंत पोहोचला. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे संतप्त झालेले राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. मात्र, या बैठकीला गैरहजर राहून दबावाचे राजकारण करण्याचा देसाईंचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात हस्तक्षेप करत, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करावे, असा सक्त आदेश दिला आहे. त्यामुळे शंभूराज देसाई यांना अखेर आपल्या मनाविरुद्ध जाऊन महायुतीचा धर्म पाळावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..(Vaibhav Sooryvanshi)

https://prahaar.in/2026/06/16/leopard-attacks-two-people-in-chinchkhed/
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीकडून भाजपने धैर्यशील कदम यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभयसिंह जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू आहे. या राजकीय संघर्षाला सातारा जिल्हा परिषदेत (झेडपी) काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्काबुक्कीची आणि स्थानिक वर्चस्ववादाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली होती. १३ जून रोजी कराड येथे भाजपने बोलावलेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे या दोन्ही मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/16/romania-bipin-kumar-gets-honorary-citizenship/

एकनाथ शिंदेंचे आदेश काय?
या पार्श्वभूमीवर, मंत्री देसाई यांनी सोमवारी साताऱ्यात शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांच्या या भावनांचा सविस्तर अहवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. "शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, फक्त आमची नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचावी," अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.मात्र, हा अहवाल हाती पडताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही सबब ऐकून न घेता, "सातारा-सांगली निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे, एकही मत फुटता कामा नये," असा आदेश शंभूराज देसाई यांना दिला.</description>
      </item><item>
      <title>Romania Bipin Kumar : बर्फाळ तलावातून चिमुरडीला वाचवणाऱ्या विपिन कुमार यांना 'मानद नागरिकत्व'</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/romania-bipin-kumar-gets-honorary-citizenship/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/romania-bipin-kumar-gets-honorary-citizenship/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 19:38:15 -0400</pubDate>
      <description>रोमानिया: रोमानियातील क्रायोवा शहरात एका भारतीय नागरिकाने माणुसकीचे उत्तम उदाहरण पेश केले आहे. गोठवणाऱ्या थंडीत बर्फाळ तलावात पडलेल्या ५ वर्षांच्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या ४१ वर्षीय भारतीय बांधकाम कामगार विपिन कुमार यांचा रोमानिया सरकारने 'मानद नागरिकत्व' देऊन विशेष सन्मान केला आहे.
https://prahaar.in/2026/06/16/a-drone-and-robotics-revolution-now-in-maharashtra/

नेमकी घटना काय?
या वर्षाच्या सुरुवातीला (जानेवारी महिन्यात) विपिन कुमार हे निकोलाय रोमानेस्कू पार्कमध्ये आपल्या मित्रासोबत फिरत होते. दरम्यान, त्यांना तलावाच्या गोठलेल्या पाण्यात एक लहान मुलगी पडल्याचे दिसले.


 	
क्षणार्धात घेतलेला निर्णय: मुलीचा जीव धोक्यात असल्याचे पाहून विपिन यांनी कसलाही विचार न करता थेट त्या गोठवणाऱ्या पाण्यात उडी मारली.

 	
३० मिनिटांचा संघर्ष: पाण्यात उतरल्यानंतर त्यांनी त्या मुलीला आधार दिला. आपत्कालीन बचाव पथक (Rescue Team) येईपर्यंत सुमारे ३० मिनिटे त्यांनी अत्यंत थंड पाण्यात मुलीला पृष्ठभागावर धरून ठेवले आणि तिचे प्राण वाचवले.


https://prahaar.in/2026/06/16/the-fate-of-government-school-students-brightened-now-the-journey-of-nasa-and-isro/

प्रशासनाकडून सन्मान
विपिन यांच्या या निःस्वार्थ आणि धाडसी कामगिरीची दखल क्रायोव्हाच्या महापौर लिया ओल्गुटा वासिलेस्कू यांनी घेतली. ४ जून रोजी एका विशेष समारंभात त्यांना 'मानद नागरिकत्व' देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला रोमानियातील भारताचे राजदूत डॉ. मनोज कुमार मोहपात्रा हे देखील उपस्थित होते.

राजदूतांचे गौरवोद्गार
यावेळी बोलताना राजदूत डॉ. मोहपात्रा म्हणाले की, "विपिन कुमार यांनी केलेले कार्य हे करुणा आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यांनी 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रत्यय जगाला दिला आहे. श्री विपिन कुमार यांनी जे केले, ते भारताचे खरे प्रतीक आहे."
https://prahaar.in/2026/06/16/cabinet-meeting-minimum-water-tax-rate-in-rural-maharashtra-now-%e2%82%b9150/
रोमानियातील भारतीय समुदायाचा गौरव
विपिन कुमार यांच्या या सन्मानामुळे रोमानियात काम करणाऱ्या भारतीय समुदायाचाही मान वाढला आहे. रोमानियामध्ये सध्या हजारो भारतीय नागरिक बांधकाम, उत्पादन (Manufacturing), हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. या घटनेने भारतीय कामगारांच्या धाडसी आणि मदतीला तत्पर राहणाऱ्या स्वभावावर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब केले आहे.</description>
      </item><item>
      <title>Nashik : चिंचखेड येथे बिबट्याची दोघांवर झडप, थोडक्यात बचावले</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/leopard-attacks-two-people-in-chinchkhed/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/leopard-attacks-two-people-in-chinchkhed/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 19:30:40 -0400</pubDate>
      <description>दिंडोरी : तालुक्यात बिबट्यांचा सुळसुळाट कायम आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याने दोन शेतकऱ्यांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश रंगनाथ पांडे (वय 70) आणि अक्षय अनिल पगारे (वय 26) या दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे.

नेमकं काय घडलं ?
सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान रमेश रंगनाथ पांडे शेतातून काम आटोपून मोटारसायकल वरून घरी येत होते. पांडे यांच्या हातात दुधाची किटली होती. दरम्यान बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने पांडे यांच्या गुडघ्याला चावा घेतला. ज्यामुळे पांडे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गाडीवरून गावाकडून मळ्याकडे जात असताना अक्षय पगारे या तरुणाच्या गाडीवर बिबट्याने धडक मारत त्याच्याही पायाला चावा घेतला.
दोन्ही जखमींवर स्थानिक डॉक्टरांनी ड्रेसिंग करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर या बिबट्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.</description>
      </item></channel>
    </rss>