<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
    <rss version="2.0">
    <channel>
        <title>Prahaar.in</title>
        <link>https://prahaar.in</link>
	      <description>Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live</description><item>
      <title>Nashik : रिक्षातून ९ लाखांचे दागिने चोरी, रिक्षाचालक ताब्यात</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/jewellery-worth-%e2%82%b99-lakh-stolen-from-auto-rickshaw-driver-detained/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/jewellery-worth-%e2%82%b99-lakh-stolen-from-auto-rickshaw-driver-detained/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 15:10:09 -0400</pubDate>
      <description>चाळीसगाव : रिक्षातून प्रवास करतांना नाशिक येथील महिला प्रवाशाकडील बॅगेतील सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने चोरी झाले होते. या प्रकरणात चाळीसगाव येथील टाकळी प्र.चा. भागातील रिक्षा चालकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. अंबड पोलिसांनी या घटनेची माहीती दिल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी शिताफीने तपास करून चाळीसगावच्या रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन अंबड पोलीसांच्या ताब्यात दिले.
https://prahaar.in/2026/06/16/soldier-on-leave-dies-in-a-horrific-accident/
नेमकी घटना काय ?
नलिनी धनाजी गोसावी रा.कालीकानगर, उंटवाडी, सिडको,नाशिक ह्या 25 मे 2026 रोजी आई व भावासह माहेरी कुरूकवाडी ता.शिंदखेडा येथे गेेेलेले होत्या. तेथून त्या 6 जून रोजी धुळे ते निमाणी बसने नाशिक येथे परत आल्या. निमाणी ते घरपर्यंत त्यांनी रिक्षा केली. रिक्षात त्यांचे भाऊ पुढे तर नलिनी गोसवी व त्यांच्या आई मागच्या सिटवर बसले.त्यांच्यासह आणखी दोन अनोळखी इसम मागे बसले. नलिनी गोसावी यांच्याजवळ सोन्याची दागिणे असलेली बॅग होती ती त्यांनी रिक्षात मागे ठेवली होती. रिक्षा चालकाने सिव्हील हॉस्पीटल जवळ गॅस संपल्याचे सांगत रिक्षातून उतरवत दुसर्‍या रिक्षात बसवले.रात्री 11.45 वाजेच्या सुमारास त्या घरी गेल्यावर त्यांनी बॅग उघडून पाहीले असता बॅगेत ठेवलेले सोन्याच्या दोन पोत, सोन्याचा नेकलेस व चांदीचें मनगटे असा सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने हायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-fire-massive-blaze-in-nashik-fire-breaks-out-at-an-oil-warehouse-in-bhabha-nagar-fire-brought-under-control-with-the-help-of-10-fire-tenders/
नलिनी गोसावी यांनी दागिण्यांबाबत नातेवाईकांकडे विचारणा केली परंतू दागिणे मिळून आले नाही. त्यामुळे कुरूकवाडी ते घरापर्यंत रिक्षा तसेच बसमध्ये कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून हे दागिणे काढून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात दागिणे चोरीची फिर्याद दिली.
अंबड पोलीसांनी या गुन्ह्याच्या तपासात रवि घुमटकर रमेश जाधव व चाळीसगाव येथील रिक्षाचालक लखन सुकलाल पवार (32) रा. टाकळी प्र.चा.खरजई रेल्वे गेटजवळ यांचा सहभाग असल्याचे समोर आले. यात घुमतकर व जाधव यांना अंबड पोलीसांनी यापूर्वीच अटक केली असून त्यंाच्याकडून चोरी गेलेले दागिनेही हस्तगत केले आहे तर रिक्षाचालक लखल हा फरार होता.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-crime-body-found-in-a-decomposed-state-inside-a-suitcase/
अंबड पोलीसांनी ही माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहूल सोनवणे यांनी आरोपीचा मागोवा घेतला. उपनिरीक्षक सुभाष पाटील, एएसआय अजय मालचे, हवालदार राहूल सोनवणे, अंमलदार दत्तू साळवे, सुनील पाटील, अशोक पाटील, जितेंद्र वाघ यांच्या पथकाने शोध मोहीम राबवून रिक्षाचालक लखन पवार यास ताब्यात घेतले. पवार यास अंबड पोलीसांकडे सुुपुर्द करण्यात आले.</description>
      </item><item>
      <title>Maharashtra Government : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/key-decisions-taken-at-the-maharashtra-cabinet-meeting/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/key-decisions-taken-at-the-maharashtra-cabinet-meeting/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 15:08:55 -0400</pubDate>
      <description>
वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्वाचा असा प्रकल्प नागपूर येथे राबविण्यात येणार. त्यासाठी हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प (High Energy Medical Cyclotron Project- NHECP) उभारणीस मान्यता. मध्य भारतातील एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प. गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. विविध रोगांचे, आजारांचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा वापर करता येणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण २०२६ जाहीर. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर. ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास होणार. विविध योजनांचे एकत्रिकरण करून धोरण राबविण्यात येणार. स्वच्छ, निर्जंतुक व दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचे नियोजन. योजना चांगल्या रितीने राबविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन होणार. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)
https://prahaar.in/2026/06/16/will-vaishali-nagwade-hit-the-jackpot-with-the-post-of-ncps-state-womens-wing-president/

महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली (Maharashtra Unmanned Systems Policy) धोरण-२०२६ जाहीर. हवाई, सागरी तसेच जमिनीवरील कृषि व अन्य ठिकाणच्या विविध कामांसाठी या स्वयंचलित प्रणालीतील उपकरणांची निर्मिती करण्यासाठीचे धोरण. जोखमीच्या आणि अवघड परिस्थितीतील कामांसाठी वापरता येणाऱ्या ड्रोनसह, विविध रोबोटसची निर्मिती या क्षेत्रातील संशोधन व विकास, मनुष्यबळ प्रशिक्षण आदी उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार. (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)राज्यात भारत नेट कार्यक्रम राबविण्यासाठी सुधारित पद्धतीस मंजुरी. हा (Amended Bharat Net Program) कार्यक्रम राबविण्यासाठी "महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MDIL)" या नावाने विशेष हेतू वहन यंत्रणा (State-led Special Purpose Vehicle - SPV) स्थापन करणार.(इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)
https://prahaar.in/2026/06/16/pimpari-chinchavad-hadarle-mankyache-operation-zalelya-mahilecha-doctorakadoonch-vinayabhang-76-pimpri-chinchwad-shaken-woman-who-underwent-spinal-surgery-molested-by-doctor/
विकसित भारत - जी राम जी (व्ही बी जी राम जी) योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत - जी राम जी कायदा, २०२५ या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये करण्यात येणार. या तरतुदी तसेच अध्यादेश निर्गमित करण्यास मान्यता.
(नियोजन विभाग)स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ. त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.</description>
      </item><item>
      <title>FIFA World Cup 2026 : इराणचे दमदार पुनरागमन; न्यूझीलंडविरुद्ध सामना २-२ बरोबरीत</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-irans-strong-comeback-match-against-new-zealand-ends-in-a-2-2-draw/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-irans-strong-comeback-match-against-new-zealand-ends-in-a-2-2-draw/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 15:04:35 -0400</pubDate>
      <description>कॅलिफोर्निया: फिफा वर्ल्ड कप 2026 ग्रुप- G च्या सामन्यात इराण आणि न्युझीलंडमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. दोनदा मागे पडल्यानंतर इराणने जिद्दीने पुनरागमन करत पराभव टाळला, तर न्यूझीलंडला आघाडी मिळूनही विजय हातातून निसटला आणि सामना २-२ च्या बरोबरीत संपला.

https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-thrilling-clash-between-saudi-arabia-and-uruguay-match-ends-in-a-1-1-draw/
या सामन्यात न्युझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत करीत इराणवर दबाव टाकलं.न्युझीलंडने आक्रमक भूमिका घेत सामन्याच्या सातव्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवली.अनुभवी स्ट्रायकर एलिजाह वुड याच्या उत्कृष्ट पासवर एलिजाह जस्ट याने अचूक फिनिश करत न्यूझीलंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र इराणने हार मानली नाही ३२ व्या मिनिटाता इराणच्या रामीन रेझाएयनने गोल करीत संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली.
पुन्हा जस्टचा वार,पण इराणचे आणखी एक पुनरागमन
दुसऱ्या हाफमध्ये न्यूझीलंडने पुन्हा आघाडी घेतली. पुन्हा एकदा एलिजाह वुड आणि एलिजाह जस्ट यांची जोडी चमकली. वुडच्या अचूक पासवर जस्टने वैयक्तिक दुसरा गोल करत न्यूझीलंडला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.परंतु इराणने यानंतरही संघर्ष कायम ठेवला.रेझायनने उजव्या बाजूने केलेल्या अचूक क्रॉसवर मोहम्मद मोहेब्बी याने जबरदस्त हेडर मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि सामना 2-2 असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत सुटळ्याने दोन्हीही संघांना एक- एक गुण मिळाला आहे.

https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-egypt-vs-belgium-belgium-dampens-egypts-spirits-world-cup-match-ends-in-a-1-1-draw/
ग्रुप-G मध्ये गुणांची विभागणी
या बरोबरीनंतर इराण आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात प्रत्येकी एका गुणाने केली. इराणसाठी रेझायन आणि मोहम्मद मोहेब्बी चमकले, तर न्यूझीलंडकडून एलिजाह जस्टने दोन गोल करत सामन्याचा हिरो ठरला. दोन्ही संघांच्या जिद्दीमुळे चाहत्यांना अखेरपर्यंत रोमांचक सामना पाहायला मिळाला.सामना बरोबरीत सुटल्यामुळे, ग्रुप- G मध्ये गुणांसाठीची लढत तीव्र होईल.</description>
      </item><item>
      <title>संत नामदेव</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/saint-namdev-6/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/saint-namdev-6/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:51:36 -0400</pubDate>
      <description>वारंवार काय विनवावे आता। 
समजावें चित्ता आपुलिया ॥ 
तू काय म्हणशी कंटाळेल हाची । 
जाईल उगाचि उडोनियां ॥
मजलागी देवा जासी चुकवोनी । 
आणीन धरूनी तुजलागी ॥ 
दृढ भक्तीभाव प्रेमाचा हा दौरा । 
बांधीन सत्वर तुझे पायीं ॥
नामा म्हणे बोल काय विठो आता । 
भेटावे सर्वथा यांत बरे ।। 

संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेरही उत्तरेत पंजाबपर्यंत फडकविली. त्यांचा एकेक अभंग म्हणजे त्यांच्या अध्यात्मिक जीवनाचं दर्शन घडविणारं भावगीत आहे. त्यातून त्यांच्या अंतरंगातील भक्तीचा सुगंध दरवळत राहिला. त्यांच्या अंतरीचे आर्त आणि जिव्हाळा त्यांच्या अभंगवाणीत व्यक्त झाला. या अभंगात त्यांच्या भक्तीरंगाचे जिव्हाळ्याचे रूप प्रकट झाले. ते म्हणतात, 'हे विठ्ठला, मी तुझी वारंवार विनवणी करावी? तू आपल्या मनाशी याचा विचार करावा. तुला वाटले असेल हा कंटाळून उठून जाईन. तू मला चुकवून कुठे कुठे जातोस. पण लक्षात ठेव, तू कुठेही गेलास तरी मी तुला पकडून आणीन.

https://prahaar.in/2026/06/16/horrific-minibus-accident-on-the-shahapur-murbad-road-driver-killed-three-passengers-critically-injured/

माझी भक्ती दृढ आहे. तिला प्रेमाच्या धाग्यांचा भक्कम पाया आहे. हा प्रेमाचा दोरा मी तुझ्या पायात बांधीन आणि प्रेमाच्या या बंधनात तुला बंदिस्त करीन. संत नामदेव म्हणतात, 'हे देवा, तू मला भेटावे हेच तुझ्या दृष्टीने योग्य आहे. नाहीतर तुला कसे पकडून आणायचे हे मला चांगले ठाऊक आहे.' संत नामदेव देवाशी संवाद करीत आहे. एक प्रकारे देवाला हुलकावणी दिलीस ती पुरे झाली. आता तू मुकाट्याने मला भेटावे अशी प्रेमळ शब्दात जणू धमकीच देत आहेत. ही ताकद संत नामदेवांच्या भक्ती भावात निश्चितपणे होती. भक्तीची उत्कट परिसीमा गाठली की देवाच्या पायात प्रेमरूपी दोरा बांधून त्याला अंकित करण्याची शक्ती भक्तामध्ये येते. નોમદેવાયાनामदेवांच्या भक्तीभावांत एक प्रकारचा लडिवाळपणा आहे. त्याच्या रोखठोक शब्दांमध्ये एक निरागस भाव आहे. नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाला हा नितळ, पारदर्शी निरागसपणा शोभून दिसतो. भक्त आणि देवातले अंतर मिटले की देव हा सखा, मित्र होतो. याच मित्रत्वाच्या नात्याने संत नामदेवांनी देवाशी रोखठोक भाषेत आपले मनोगत व्यक्त केले.</description>
      </item><item>
      <title>Nashik : आडगाव येथे अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारणार</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/nashik-state-of-the-art-truck-terminus-to-be-built-at-adgaon/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/nashik-state-of-the-art-truck-terminus-to-be-built-at-adgaon/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:45:07 -0400</pubDate>
      <description>नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढती मालवाहतूक आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आडगाव येथे अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत (Mumbai-Agra National Highway) प्रस्तावित हा प्रकल्प सार्वजनिक–खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार असून, तो मालवाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-fire-massive-blaze-in-nashik-fire-breaks-out-at-an-oil-warehouse-in-bhabha-nagar-fire-brought-under-control-with-the-help-of-10-fire-tenders/

२८ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक प्रकल्प
सुमारे २८ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. त्यापैकी सुमारे ६० टक्के क्षेत्र ट्रक टर्मिनससाठी तर ४० टक्के क्षेत्र वे-साईड अ‍ॅमेनिटीज (प्रवासी व वाहनचालक सुविधा) यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, बस डेपो आणि प्रमुख वाहतूक मार्गांशी सुसंगत जोडणी असल्याने हे ठिकाण लॉजिस्टिक्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या टर्मिनसमध्ये किमान ३०० ट्रक पार्किंग बेची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच माल साठवण, लोडिंग-अनलोडिंग सुविधा, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, चालकांसाठी डॉर्मिटरी आणि लॉजिस्टिक्ससाठी आवश्यक पूरक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
प्रवासी व चालकांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, फूड कोर्ट, ढाबे, किरकोळ विक्री केंद्रे, प्राथमिक उपचार केंद्र, एटीएम, इंधन केंद्र, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, पर्यटक माहिती केंद्र, अल्पकालीन निवास व्यवस्था, सेल्फ लॉन्ड्री आणि ओपन जिम अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पर्यावरणीय बाबींनाही या प्रकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. किमान १५ टक्के क्षेत्र हरित पट्टा म्हणून विकसित करण्यात येणार असून, अग्निसुरक्षा, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा मानकांचे पालन बंधनकारक राहणार आहे. पाणीपुरवठा, वीज, मलनिस्सारण आणि दूरसंचार यांसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील.
https://prahaar.in/2026/06/16/soldier-on-leave-dies-in-a-horrific-accident/
याशिवाय वजन काटा, ट्रक सर्व्हिस सेंटर, शो-रूम, ट्रान्सपोर्ट कार्यालये आणि मोटेल/हॉटेल यांसारख्या अतिरिक्त सुविधांनाही प्रकल्पात वाव देण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ ट्रक पार्किंगपुरता मर्यादित न राहता लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आडगाव ट्रक टर्मिनस प्रकल्पामुळे शहरातील अव्यवस्थित ट्रक पार्किंगला पर्याय मिळणार असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आडगाव ट्रक टर्मिनस हा केवळ पार्किंग प्रकल्प नसून नाशिकच्या भविष्यातील वाहतूक व लॉजिस्टिक्स व्यवस्थेचा महत्त्वाचा पाया आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. असे नाशिक मनपा आयुक्त मनीषा खात्री यांनी म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-crime-body-found-in-a-decomposed-state-inside-a-suitcase/

प्रमुख सुविधा
डॉर्मिटरी व चालक विश्रांतीगृह
फूड कोर्ट व ढाबे
पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे
प्राथमिक आरोग्य केंद्र
वाहन दुरुस्ती सुविधा
इंधन व ई-चार्जिंग स्टेशन
माल साठवण व लोडिंग-अनलोडिंग सुविधा
एटीएम व किरकोळ विक्री केंद्रे</description>
      </item><item>
      <title>India&#039;s Growth : भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/the-era-of-indias-cultural-renaissance/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/the-era-of-indias-cultural-renaissance/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:42:03 -0400</pubDate>
      <description>भारत आज विविध क्षेत्रांत अत्यंत वेगाने विकास करत आहे. अर्थव्यवस्था, सामाजिक सुरक्षा, ऊर्जा, पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान यांसह, विविध क्षेत्रांत देश नवनवी उंची गाठत आहे. भौतिक विकासाच्या या सर्व क्षेत्रात प्रगती करत असताना, हेही महत्त्वाचे आहे, की आपण आपली प्राचीन संस्कृती, इतिहास, वारसा आणि परंपरांना विसरून जाऊ नये.
भारत जगातील अतिप्राचीन मात्र जिवंत संस्कृतींपैकी एक देश आहे, कित्येक शतके, परदेशी आक्रमकांसोबत सुरू असलेल्या संघर्षात, देशाच्या राजकीय सत्तेत बदल होत राहिले, मात्र त्या काळातही, भारत आपली संस्कृती एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीपर्यंत यशस्वीपणे सोपवत राहिला. या काळात झालेल्या राजकीय उलथापालथीत,आपली धार्मिक स्थळे, ग्रंथसंपदा, वाचनालये, विद्यापीठे, सगळ्यांचा विध्वंस करण्यात आला. मात्र तरीही, आपली संस्कृती आणि परंपरा जिवंत राहिल्या. सांस्कृतिक भारतावर दुसरा घाला आमच्या शिक्षण पद्धतीत केलेल्या बदलांमुळे घातला गेला. या हल्ल्यातून, आमच्या अंतर्मनात आपल्याच संस्कृतीविषयी हीन भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-crime-body-found-in-a-decomposed-state-inside-a-suitcase/
वर्ष २०२४ पासून, मात्र, भारताने आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासोबतच, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठे परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली, हे वर्ष आपल्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या प्रारंभाचे वर्ष म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सांस्कृतिक भारत आज आपल्या अभिमानास्पद भूतकाळाचे पुन:स्मरण करत, त्याचे वैभव, त्याची भव्यतेची पुनर्स्थापना करत आहे, त्याचवेळी सामाजिक जीवनात देखील तीच संस्कृती पुन्हा स्थापन केली जात आहे. आज आपले उत्सव, प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारके, खाद्यसंस्कृती, वस्त्र कला, नृत्य, संगीत, शास्त्र, शिल्पकला ह्या सगळ्या गोष्टी जागतिक आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत.भारतीय संस्कृतीची वाढती स्वीकारार्हतागेल्या १२ वर्षांत जगात भारतीय संस्कृती केवळ स्वीकारार्ह ठरली नाही, तर लोकप्रिय होते आहे.
आज सगळे जग, २१ जूनला योग दिवस साजरा करतात. हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर, हे एक प्राचीन भारतीय दर्शनशास्त्र आहे, एक विज्ञान आहे जे आज जगन्मान्य झाले. मानवी आयुष्यात त्याची उपयुक्तता बघा, त्याला जगाने स्वीकारले. आज जगातील अनेक देशात असलेल्या आपल्या वारशाच्या वस्तू, भारतात परत आणल्या जात आहे, त्यांची संख्या देखील, एक अत्यंत रोचक वास्तव आहे. वर्ष २०१३ च्या आधी, केवळ १३ वारसा वस्तू परदेशातून भारतात आणल्या गेल्या. मात्र गेल्या १२ वर्षांत ६४० पेक्षा अधिक वारसा वस्तू, परदेशातून भारतात आणल्या गेल्या आहे. संस्कृतीमध्ये केवळ परंपरांचे पुनरुज्जीवन नाही, तर संस्कृतीची प्रतीक चिन्हे परत आणण्यातही आम्ही गांभीर्य दाखवले आहे. ही प्रतीक चिन्हे, आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, ह्या आमच्या पूर्वजांची कला, शिल्प आणि विविध विषयांच्या ज्ञानाच्या खुणा आहेत, चिन्हे आहेत, ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आहे.
https://prahaar.in/2026/06/16/pimpari-chinchavad-hadarle-mankyache-operation-zalelya-mahilecha-doctorakadoonch-vinayabhang-76-pimpri-chinchwad-shaken-woman-who-underwent-spinal-surgery-molested-by-doctor/

दुर्गा पूजा आणि दिवाळी यांसारख्या सामाजिक-धार्मिक उत्सवांना, युनेस्कोने जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली. ही मान्यता, केवळ उत्सवांना नसते, तर त्यामागे असलेल्या संदेशांनाही दिली जाते. विचारांना दिली जाते, जे सांगतात, की असत्यावर कायम सत्याचा विजय होतो. आपल्या प्राचीन इतिहासालाही आज युनेस्कोने मान्यता दिली आहे. त्याचा पुरावा म्हणजे, भारत ४४ जागतिक वारसा स्थळांना मान्यता मिळून, भारत या क्रमवारीत आशियात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ही वारसास्थळे, आपल्या परंपरांचे प्रतीक आहेत, ज्यांच्याकडे बघून, भारतीयांना आपली संस्कृती आणि इतिहासाची ओळख होते आणि त्याविषयी अभिमान वाटतो.

विस्मृतीत गेलेल्या, विखुरलेल्या ज्ञानाचे संकलन
भारत बराच काळ परकीय आक्रमकांशी संघर्ष करत राहिला. ज्ञान आणि संस्कृतीचा आदर न करणाऱ्या या परकीय आक्रमकांनी आपल्या देशाच्या अमूल्य ज्ञानपरंपरेचा वारसा असलेली समृद्ध विद्यापीठे, गुरुकुले आणि हस्तलिखितांमध्ये नोंदविलेले ज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दीर्घ कालखंडात आपल्या ज्ञानपरंपरेची अमूल्य संपत्ती असलेली ही हस्तलिखिते विविध मठ, मंदिरे, संस्था आणि घरांमध्ये जतन केली गेली; मात्र कालांतराने ती विस्मृतीत गेली. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतरही या हस्तलिखितांचे संकलन करून प्राचीन ज्ञान पुन्हा प्राप्त करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न
झाले नाही.
https://prahaar.in/2026/06/16/water-storage-in-ahilyanagar-district-has-dropped-to-just-24-54-percent/

आज संपूर्ण देशात ज्ञान भारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अंतर्गत या हस्तलिखितांची नोंदणी आणि यादी केली जात आहे. अत्यंत आनंदाची बाब म्हणजे देशभरातून आतापर्यंत ८८ लाखांहून अधिक हस्तलिखिते शोधून काढण्यात आली. या ज्ञानसंपदेचे संकलन करण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांचे डिजिटायझेशनही केले जात आहे. या हस्तलिखितांमध्ये नोंदविलेल्या ज्ञानाचे संवर्धन आणि सुरक्षित जतन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. भविष्यात हा संग्रह आपल्या पुढील पिढ्यांना अध्यात्म, विज्ञान, कला, शिल्पकला आणि इतर अनेक क्षेत्रांतील भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेची समृद्धी आणि उत्कृष्टता यांची ओळख करून देईल तसेच त्या वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देईल.सांस्कृतिक प्रतीक चिन्हांचे पुनरुज्जीवन
भारतातील मंदिरे, किल्ले, मेळावे, ऐतिहासिक वारसास्थळे आपली गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाच्या प्रतीकाची चिन्हे आहे.
मात्र, दु:खद गोष्ट ही आहे, की स्वातंत्र्यानंतर भारतात या सांस्कृतिक स्थळांची उपेक्षा करण्यात आली. केवळ काही निवडक स्मारकांचा जागतिक पातळीवर प्रचार-प्रसार करण्यात आला. ही मंदिरे, भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला एका सूत्रात बांधून ठेवू शकतात. देशातली धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळे, कित्येक वर्षांपासून, उपेक्षा आणि अव्यवस्था सहन करत आहेत. गेल्या १२ वर्षांत, या स्थळांचा कायापालट करण्यात आला. आज भारतात देशाच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा दिमाखात मिरवणारे, काशी विश्वनाथ धाम, महाकाल कॉरीडोर, केदारनाथ, सोमनाथ यासह विविध मंदिरे आणि तीर्थनगरी यांचा व्यापक विकास करण्यात आला. भक्तांसाठी तिथे सुविधा विकसित करण्यात आल्या, ज्यामुळे आध्यात्मिक पर्यटन वाढण्यासह, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाल्या. युवकांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी जागरूकता आली. आज या स्थळांवर येणाऱ्या युवकांची वाढती संख्या, भारतीय संस्कृतच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. या स्थळांचा विकास आणि इथल्या तीर्थयात्रा, यामुळे, युवकांच्या मनांत आपल्या संस्कृतविषयी अभिमानाची भावना जागृत होते आहे.
https://prahaar.in/2026/06/16/municipal-corporation-takes-a-tough-stance-on-delays-in-simhastha-related-works/

वारसाही, विकासही
आज आपल्या संस्कृतीची प्रतीके असलेली धार्मिक स्थळे, मंदिरे आणि धार्मिक मेळावे हे स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा बनले. आध्यात्मिक पर्यटनात झालेल्या वाढीमुळे स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास तर झाला, शिवाय या शहरांमधील आर्थिक उपक्रमांनाही मोठी चालना मिळाली. परिणामी, तेथील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली. आज ऋषिकेश, अयोध्या, प्रयागराज, काशी यांसह भारतातील विविध आध्यात्मिक नगरींमध्ये भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी परदेशी पर्यटक येत आहेत. भारतीय संस्कृतीच्या व्यापकतेने आणि समृद्धीने ते प्रभावित होत आहे. यामुळे केवळ भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार होत नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा लाभ होत आहे.
आपल्या मुळापर्यंत पोहोचणारा भारत

आज भारत आपल्या प्राचीन वारशाचा अभिमान बाळगत, आधुनिक जगासोबत खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. आतापर्यंत विस्मृतीत ठेवलेल्या आपल्या संस्कृतीच्या पुनर्जागृतीचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. कित्येक शतके संघर्षात होरपळत असलेला भारत, आज कूस बदलून, आपली प्राचीन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख पुनर्स्थापित करत आहे. भारत जगाला सांगतो आहे, की प्राचीन परंपरा आणि संस्कृतीसोबत, आधुनिकतेचाही अंगीकार केला जाऊ शकतो. येणारा काळ भारताचा आहे. भविष्यात भारताचा विचार, दर्शनशास्त्रे, संस्कृती जगाला नवी दिशा
देणारी असेल.
(लेखक भारत सरकारचे संस्कृती
आणि पर्यटन मंत्री आहेत)</description>
      </item><item>
      <title>Nashik Fire : नाशिकमध्ये अग्नितांडव! भाभानगरातील ऑईल गोदामाला आग; १० बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/nashik-fire-massive-blaze-in-nashik-fire-breaks-out-at-an-oil-warehouse-in-bhabha-nagar-fire-brought-under-control-with-the-help-of-10-fire-tenders/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/nashik-fire-massive-blaze-in-nashik-fire-breaks-out-at-an-oil-warehouse-in-bhabha-nagar-fire-brought-under-control-with-the-help-of-10-fire-tenders/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:29:18 -0400</pubDate>
      <description>नाशिक : मुंबई नाका परिसरातील भाभानगर येथील एका ऑईल गोदामाला सोमवारी रात्री भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. (Nashik Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस असलेल्या अकरा ट्रान्सपोर्ट आणि जंटकी ट्रान्सपोर्टच्या गोदामात ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. (Nashik Fire)
आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवत नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवले. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग आजूबाजूच्या इमारती आणि परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. (Nashik Fire)
https://prahaar.in/2026/06/16/soldier-on-leave-dies-in-a-horrific-accident/
या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणावरील माल जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ऑईल साठवणुकीच्या ठिकाणी शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. (Nashik Fire)
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सुरक्षेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार असून तपासानंतर आगीचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. (Nashik Fire)




&nbsp;










View this post on Instagram






















&nbsp;
A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)


</description>
      </item><item>
      <title>Crime News : दक्षिण महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/alarm-bells-for-southern-maharashtra/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/alarm-bells-for-southern-maharashtra/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:28:32 -0400</pubDate>
      <description>सांगली जिल्हा, जो सहकार चळवळ आणि कृषी समृद्धीसाठी ओळखला जात होता, तो सध्या वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. खून, टोळी संघर्ष आणि संघटित गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकेकाळी साखर कारखाने, सहकार चळवळ, कृषी समृद्धी आणि शांत सामाजिक वातावरणासाठी ओळखला जाणारा सांगली जिल्हा सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून, टोळी संघर्ष, घरफोड्या, अवैध व्यवसाय आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमुळे केवळ सांगलीकरच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. अलीकडेच अभयनगर परिसरात घडलेल्या वेदांत बंडगर हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली. पाच जणांच्या टोळीने घरात घुसून अवघ्या १४ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-thrilling-clash-between-saudi-arabia-and-uruguay-match-ends-in-a-1-1-draw/
प्राथमिक तपासात हल्लेखोरांचे लक्ष्य कुटुंबातील अन्य व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांचे वाढते धाडस आणि कायद्याच्या भीतीत झालेली घट यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. याआधीही सांगली शहर आणि परिसरात खून, टोळी संघर्ष आणि वर्चस्वासाठी होणाऱ्या लढाया सातत्याने समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी विश्रामबाग परिसरात एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले, ज्यामुळे युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक चिंतेत भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे गुन्हेगारी आता केवळ रस्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. जिल्हा कारागृहात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षामुळे कारागृह व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुरुंगात १६ गुन्हेगारांनी दोन सराईत आरोपींवर विटांनी हल्ला केल्याची घटना संघटित गुन्हेगारीच्या वाढत्या प्रभावाचे संकेत देते. सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीमागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्रांशी असलेली सांगलीची जवळीक, सीमावर्ती भागातील वाहतूक मार्ग, वाढते शहरीकरण आणि बेरोजगारी यामुळे गुन्हेगारीस पोषक वातावरण निर्माण होत आहे. काही भागांमध्ये टोळीसंस्कृती, राजकीय आश्रय आणि स्थानिक वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. संजयनगर, कुपवाड, अभयनगर आणि काही उपनगरांमध्ये किरकोळ वादातून गंभीर गुन्हे घडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-crime-body-found-in-a-decomposed-state-inside-a-suitcase/
सोशल मीडियावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नातून तरुणांमध्ये निर्माण होणारी स्पर्धा, शस्त्रांचे प्रदर्शन आणि टोळीबाजीमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून ही चिंतेची बाब ठरत आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक ऑनलाइन चर्चांमध्येही सांगलीतील वाढत्या खून व हिंसक घटनांबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असल्यामुळे गुन्हेगारांच्या हालचाली तुलनेने सुलभ होतात. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणांमध्ये अधिक प्रभावी समन्वयाची गरज निर्माण झाली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी ठरणार नाही. संघटित गुन्हेगारीविरोधात विशेष मोहिमा, तंत्रज्ञानाधारित तपास यंत्रणा, सीसीटीव्ही नेटवर्कचा विस्तार, टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर कठोर कारवाई तसेच जलद न्यायप्रक्रिया यांची आवश्यकता आहे. देशातील इतर राज्यांमध्ये संघटित गुन्हेगारीविरोधात समन्वित आणि व्यापक कारवाया केल्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यासोबत युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवणे, व्यसनमुक्ती मोहिमा राबवणे, शाळा-महाविद्यालयांत जनजागृती करणे आणि नागरिक–पोलीस संवाद मजबूत करणे आवश्यक आहे. सांगलीतील वाढती गुन्हेगारी ही केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित नसून दक्षिण महाराष्ट्राच्या सामाजिक सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा आहे. वेळेत कठोर व समन्वित उपाय न केल्यास या प्रदेशाच्या शांत व सांस्कृतिक ओळखीवर गुन्हेगारीचे सावट अधिक गडद होण्याची भीती आहे.
</description>
      </item><item>
      <title>जागतिक टेनिसमध्ये भारताची  ‘किरण’</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/indias-ray-of-hope-in-global-tennis/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/indias-ray-of-hope-in-global-tennis/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:24:35 -0400</pubDate>
      <description>आंतरराष्ट्रीय ज्युनियर टेनिस वर्तुळात भारताच्या १३ वर्षीय सृष्टी किरण या उदयोन्मुख खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी करत १३ वर्षांखालील (अंडर-१३) वयोगटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. बंगळूरुची राहणारी सृष्टी गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून, तिने आपल्या खेळाच्या जोरावर जागतिक टेनिसमध्ये हा नवा मैलाचा दगड पार केला आहे.सृष्टीने आंतरराष्ट्रीय ज्युनियर सर्किटमध्ये सलग पाच आयटीएफ ज्युनियर विजेतेपदे जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात ग्वाटेमाला येथे झालेल्या 'आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूर ज्युनियर्स जे१००' स्पर्धेत ती उपविजेती ठरली. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिने आयटीएफ ज्युनियर क्रमवारीत ३५७ वे स्थान मिळवले असून, ती १३ वर्षांखालील वयोगटात जगात सर्वाधिक रँकिंग असलेली खेळाडू
बनली आहे.

सृष्टी किरणचे हे यश अधिक विशेष आहे कारण जागतिक क्रमवारीची गणना जास्तीत जास्त १० स्पर्धांच्या कामगिरीवर केली जाते. मात्र, सृष्टीने केवळ ८ मानांकन स्पर्धांमध्ये भाग घेऊनच हे अव्वल स्थान गाठले आहे. आर्थिक अडचणी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे तिला उर्वरित दोन स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नव्हते. आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दोन स्पर्धा कमी खेळूनही सृष्टीने आपल्या सर्वोत्तम खेळामुळे इतके गुण मिळवले की ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली.आपल्या या यशाबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, "माझ्या वयोगटात जगात नंबर वन बनल्याचा मला प्रचंड आनंद आहे. वर्षाच्या सुरुवातीला मी याचा विचारही केला नव्हता; परंतु माझे प्रशिक्षक, कुटुंब आणि पाठबळ देणाऱ्या टीमसोबत घेतलेल्या कठोर परिश्रमांचे हे फळ आहे. सलग पाच विजेतेपदे आणि त्यानंतर मिळालेल्या उपविजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा असून माझ्या खेळात अनेक सुधारणा करायच्या आहेत."

अवघ्या साडेचार वर्षांची असताना सृष्टीच्या वडिलांनी, किरण गोपाळराजन यांनी तिची खेळातील चपळता ओळखून तिला टेनिस खेळायला प्रवृत्त केले. तिच्या वडिलांचे स्वतःचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पैशांच्या कमतरतेमुळे अपूर्ण राहिले होते, त्यामुळे त्यांनी आपली पूर्ण ताकद सृष्टीच्या प्रवासात लावली. सृष्टीची कामगिरी पाहून अमेरिकेतील प्रसिद्ध 'ऑरेंज बाउल' स्पर्धेदरम्यान जागतिक दर्जाचे प्रशिक्षक गॅबे जरामिलो (Gabe Jaramillo) यांच्या नजरेत ती आली. सध्या ती फ्लोरिडा, अमेरिका येथील आरपीएस टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या स्वप्नासाठी तिच्या वडिलांनी बंगळूरुमधील आपला व्यवसाय बाजूला ठेवून तिच्यासोबत अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला.सृष्टी अमेरिकेची प्रसिद्ध टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हिला आपला आदर्श मानते. कोको गॉफची आक्रमक खेळी आणि मैदानाबाहेरची तिची शांत वृत्ती सृष्टीला खूप प्रेरित करते."भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे आणि सीनियर गटात महिला टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम (Grand Slam) जेतेपदांवर नाव कोरणे." हे सृष्टीचे लक्ष्य आहे.सृष्टी सध्या तिचा अभ्यास आणि टेनिसचे कठीण प्रशिक्षण सांभाळत दररोज ५ ते ६ तास घाम गाळत आहे. भारताच्या या 'वंडर गर्ल'कडून भविष्यात टेनिस विश्वामध्ये मोठ्या अपेक्षा आहेत.

जेव्हा सृष्टी वयाच्या सातव्या वर्षी अखिल भारतीय टेनिस असोसिएशन (AITA) अंडर-१० चॅम्पियनशिप जिंकणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली, तेव्हा तिच्या वडिलांना खात्री पटली की त्यांची मुलगी आता त्यांचा संकल्प पूर्ण करेल. त्यांनी हे सुनिश्चित केले की त्यांच्या मुलीला तिचे स्वप्न कधीही सोडावे लागणार नाही. आज, ते सृष्टीच्या प्रवासात पूर्णपणे तिच्या सोबत आहेत. सृष्टीला प्रशिक्षणात मदत करणे, स्पर्धा आयोजित करणे आणि प्रत्येक चढ-उतारात तिच्या पाठीशी उभे राहणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. सृष्टीने जागतिक दर्जाच्या क्रीडा कारकिर्दीत स्वतःचे स्थान निर्माण करावे, हे त्यांचे ध्येय आहे. दोघांचेही हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल यात शंकाच नाही.
सृष्टी किरण आता तिच्या पुढील आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी युरोप दौऱ्यावर जाणार आहे. मुख्य फेरीत प्रवेश मिळाल्यास ती युनायटेड किंगडममधील प्रतिष्ठित 'जे३००' स्पर्धेत खेळताना दिसेल. ही स्पर्धा ज्युनियर सर्किटमधील सर्वात महत्त्वाची मानली जाते आणि प्रसिद्ध अशा 'विम्बल्डन ज्युनियर चॅम्पियनशिप'साठीची पूर्वतयारी म्हणून याकडे पाहिले जाते. सृष्टी सध्या ग्रास-कोर्टवरील हंगामासाठी सराव करत आहे.</description>
      </item><item>
      <title>Navnath Ban : उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही</title>
      <link>https://prahaar.in/2026/06/16/the-strength-of-balasaheb-thackerays-ideology-no-longer-remains-within-uddhav-thackerays-shivbandhan/</link>
      <guid>https://prahaar.in/2026/06/16/the-strength-of-balasaheb-thackerays-ideology-no-longer-remains-within-uddhav-thackerays-shivbandhan/</guid>
      <pubDate>Tue, 16 Jun 2026 14:19:34 -0400</pubDate>
      <description> मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या शिवबंधनात वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही. आणाभाका देऊन वा शिवबंधन बांधून आमदार, खासदार टिकत नाहीत तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे बंधन लागते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांबद्दल ना प्रेम उरले, ना माणुसकी उरली, ना आपुलकी. त्यामुळे उबाठा गटाचे आमदार, खासदार सातत्याने पक्ष सोडून प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनात अडकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शपथा, शिवबंधनाला काहीही अर्थ नाही हे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
https://prahaar.in/2026/06/16/pratap-sarnaik-now-an-rto-office-every-50-kilometers-decision-by-transport-minister-pratap-sarnaik/
उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात, असे सांगणे हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या आमदार, खासदारांना मातोश्रीच्या दरवाजातून परत पाठवतात. मुळात संजय राऊतांनाही अनेकदा मातोश्रीत प्रवेश मिळत नाही हे वास्तव आहे. हा विनोद कॉमेडी सर्कसमध्ये सांगितला तर प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होईल, असे म्हणत  बन पुढे म्हणाले की ज्यांना प्रत्येक गोष्ट पैशांत मोजायची, भ्रष्टाचार करायची सवय आहे. असेच लोक खरेदीविक्रीची भाषा करणार. मुळात खरेदीविक्री करण्याचा अनुभव संजय राऊत यांना जास्त असेल. कारण पत्राचाळीत मराठी माणसांना देशोधडीला लावून खरेदीविक्री कोणी केली याचे उत्तर एकदा संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे.
https://prahaar.in/2026/06/16/horrific-minibus-accident-on-the-shahapur-murbad-road-driver-killed-three-passengers-critically-injured/

संजय राऊत तुमच्या हातात ईडी, सीबीआय आणि न्यायालय दिले तरी तुमच्यासोबत एकही माणूस टिकणार नाही. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची सीबीआयकडून बारा – बारा तास चौकशी करण्यात आली होती. अमित शाह यांना तडीपार करण्यापर्यंत काँग्रेस सरकारची मजल गेली होती. परंतु ना अमित शाह यांनी भाजपा सोडली, ना नरेंद्र मोदीजींनी. आमचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि देवेंद्रजी फडणवीस यांना अनेक खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही अनेक आमदार, नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न केले. पण तुम्ही साधा एकही नगरसेवकही फोडू शकला नाहीत. ईडी - सीबीआयचा गैरवापर करून माणसे तोडता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांना भेटावे लागते. बोलावे लागते, त्यांना संधी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या वाटेवर आला ते बघा, असेही श्री. बन यांनी नमूद केले .

विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने तुमच्या थोबाडीत मतरूपी जोडे मारले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या कानशिलात जोडे मारलेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तर भोपळा देऊन तुमच्या पक्षाला, तुमच्या पक्षप्रमुखाला आणि संजय राऊत तुम्हालाही लोकांनी मारले ते व्रण अजूनही पुसले गेलेले नाहीत. त्यामुळे जनतेचा असा अपमान करत असाल तर जनता तुम्हाला आणखी जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही, असे बन यांनी सुनावले.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-stolen-amount-directly-into-the-petrol-pumps-accounts/

अभिजीत दिपके यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या आंदोलनाला विरोध असेल तर आंदोलनाच्या मार्गाने किंवा लोकशाही पद्धतीने त्याला प्रतिकार करता येतो. परंतु अशा पद्धतीने कोणाला मारहाण करण्याचे समर्थन भाजपा कधीही करत नाही, असेही बन यांनी स्पष्ट केले.</description>
      </item></channel>
    </rss>